राजा आणि माळी - एक भारतीय लोककथा - मराठी

राजा आणि माळी - एक भारतीय लोककथा - मराठी

राजा आणि माळी एक भारतीय लोककथा

लोककथा नवीन रुपात मांडणारा लेखक : एड्रियन बेंटझ रेखाटनं :क्रिस्टीना आँग

मराठी अनुवाद : नीलांबरी

खूप खूप वर्षांपूर्वी एका सुवर्णमहालात एक राजा रहात होता. राजाला अनेक सल्लागार होते. त्याला नवीन गोष्टी शिकवणं आणि राजकारभारात त्याला मदत करणं ही त्या सल्लागारांची कामं होती.

काही तरबेज खेळाडूंमध्येही आपण राजाला हरवू शकतो हे दाखवायची हिंमत नव्हती.

त्याऐवजी, “ काय हुशारीनं चाल खेळली आहे.. “ असं सल्लागार कौतुकानं म्हणायचे. “ आमचा राजा कधीच चुकत नाही.”

प्रत्येक सल्लागार राजाला जे आवडेल तेच करायला धडपडायचा. त्यामुळे राजाला काही शिकवण्यापेक्षा त्याच्याभोवती गोंडा घोळण्यातच सगळ्यांचा वेळ जायचा.

राजा जर गणितं करताना चुकला तरी कोणीच त्याची चूक सुधारण्याच्या भानगडीत पडायचं नाही. सगळे सल्लागार हो ला हो करुन हसत हसत म्हणायचे, “ राजानं एका जुन्या समस्येचं नवीन उत्तर शोधलं आहे..! “

राजा जर तिरंदाजी शिकत असताना त्याचे बाण निशाण्यावर लागत नसले तरी सल्लागार राजाच्या नेमबाजीची भरभरुन प्रशंसा करत असत. वर म्हणत , “ काय ताकद आहे . काय अचूक नेम साधला आहे ..! “

राजा जर बुध्दिबळ खेळत असेल तर सर्व सल्लागार तो जिंकेल अशीच व्यवस्था करायचे.

तेवढ्यात राजाला काही आवाज ऐकू आले. ते ऐकून तो एका झाडामागे लपला. “ परत एकदा प्रयत्न कर मुली..” एक माणूस म्हणत होता . “ दुसरा कोणता मोहरा तू हलवू शकतेस ? “

” तुम्हाला हे सगळं कसं माहिती बाबा? ” त्या लहान मुलीनं विचारलं .

राजा झाडाआडून हे दृश्य न्याहाळत होता. एक माणूस आपल्या छोट्या मुलीला बुध्दिबळ खेळायला शिकवत होता.

पण आपलं असं सतत कौतुक ऐकून राजाचे कान किटले. “ मी खरोखर कधीच चुका करत नाही का ? “ त्यानं स्वत : लाच एक दिवस प्रश्न विचारला.

एक दिवस आपल्या बागेत तो सकाळी फेरफटका मारत होता. त्यानं विविध रंगांची फुलं फुललेली पाहिली. झाडांवर पिकलेली फळं लगडली होती. मोर आपला ऐटबाज पिसारा फुलवतानाही त्याला दिसला. इतक्या रम्य ठिकाणी मला खरं तर आनंद व्हायला हवा.

” पण मला आनंदही होत नाहीये”. एक उसासा टाकून तो म्हणाला, “ मला काहीतरी आव्हान हवं आहे. “

” किती आश्चर्याची गोष्ट आहे..” राजानं विचार केला. “ हा माणूस माझा माळी आहे . पण तो उत्कृष्ट बुध्दिबळपटु आहे . याचीचिमुरडी मुलगीदेखील माझ्या सगळ्या सल्लागारांपेक्षा चांगलं खेळते.”

माळी मान झुकवून अदबीनं म्हणाला “ मला तुमच्याबरोबर खेळायला आनंदच वाटेल . ही माझी मुलगी. सकाळी बागेत काम करण्याआधी आम्ही रोज थोडा वेळ बुध्दिवळ खेळतो. ”

मग राजानं समोर येऊन माळ्याबरोबर एक बुध्दिबळाचा डाव खेळायचं आव्हान दिलं .

“माझे वडील खूप हुशार आहेत ”. ती चिमुरडी लाजत लाजत म्हणाली.. “ ते जगातले सर्वात श्रेष्ठ बुध्दिबळपटु आहेत .”

राजानं त्या मुलीच्या डोक्यावरुन प्रेमानं हात फिरवला आणि म्हणाला, “ तुझे वडील हा एक भला माणूस आहे हे मला मान्य आहे. पण बुध्दिबळात ते मला हरवू शकत नाहीत.”

मग राजा म्हणाला, “ मला आत्ता माझ्या सल्लागारांना भेटायचं आहे. उद्या सकाळी आपण बुध्दिबळ खेळू .”

” होय , महाराज.” माळ्यानं उत्तर दिलं .

” तुमची आज्ञा होईल तेव्हा मी खेळण्यासाठी हजर होईन . मला जे काही येतं ते तुम्हाला शिकवायला मला आवडेल. “

राजा आणि माळी तीन डाव खेळले. प्रत्येक डाव माळ्यानं जिंकल्यावर राजाला खूपच आश्चर्य वाटलं .

राजा हसत हसत माळ्याला म्हणाला, “ मी तुझा आभारी आहे. बर्याच दिवसांनंतर खेळताना मला मजा येतीय. “

मग राजा खुषीनं शीळ वाजवत आपल्या महालात परतला.

“ नाचणारे हत्ती मिळाले का काय? “

” दुसर् या कोणी राजानं किमती भेटवस्तू पाठवल्या का ? आम्हाला दाखवाल का त्या ? “

त्याला पाहून त्याचे सल्लागार जेवायचं थांबवून डोळ्यात पाणी आणून त्याला म्हणाले, “ महाराज, आम्हाला तुमची खूप आठवण येत होती . घशाखाली घास सुध्दा उतरत नव्हता.”

दुसर् या सल्लागारानं तर्क लढवला.

” सगळ्यांना सुप्रभात ”. राजा आनंदी स्वरात म्हणाला,

“नाही बाबांनो.. ” राजा हसतच म्हणाला. “ अखेरीस मला बुध्दिबळात हरवू शकेल असा माणूस मला सापडला. तो मलात्यातलं सगळं शिकवायला तयार आहे.”

” सांगा बरं, आज सकाळी काय घडलं असेल . ”

“ काहीतरी छानच घडलं असेल “. एका सल्लागारानं अनुमान काढलं .

” ओह..” सल्लागार काळजीच्या सुरात म्हणाले . मग राजाला भूक लागल्यामुळे तो जेवायला बसला.

तेव्हा सगळेजण एकमेकांच्या कानात कुजबुजायला लागले .

नंतर एक सल्लागार म्हणाला , “ तुम्ही त्या माळ्याला जिंकू दिलंत हा तुमचा मोठेपणा होता. “

राजा म्हणाला, “ नाही, माळी माझ्यापेक्षा चांगलं खेळतो त्यामुळे तो जिंकला. ”

” ओह, राजा हे शक्य नाही ”. दुसरा एक सल्लागार म्हणाला. “माळ्यानं कुठेतरी फसवलं असेल. ”

” तो माळी खोटारडा आहे” . सगळे सल्लागार एकसुरात ओरडले. “त्याला शिक्षा मिळायला हवी” .

त्यांनी राजाला हे भरवलं आणि शेवटी राजानं त्यांचं म्हणणं मान्य केलं .

दुसर या दिवशी सकाळी राजा बागेत माळ्याला भेटला. या वेळीत्याचे सल्लागारही सोबत होते. राजा आणि माळी एकामागून एक डाव खेळत होते आणि सल्लागार ते सगळं चुपचाप पहात होते .

परत माळी जिंकला आणि राजा मजेत हसला.

सल्लागार एकमेकांच्या कानात परत कुजबुजायला लागले. “ हा माळी आपल्यापेक्षा हुशार आहे असं राजानं ठरवलं तर आपलं काय होईल? आपल्याला काहीतरी करायला हवं . “

त्या रात्री माळ्याला महालात बोलावणं धाडलं .

राजा म्हणाला, “माळ्या, आजतागायत माझ्यापेक्षा कोणी जास्त चांगला बुध्दिबळाचा डाव खेळलेलं नाही. माझ्या सल्लागारांना वाटतंय , तू मला फसवलंस.” “ आमच्या राजाला कोणी फसवू शकत नाही “ अशी सल्लागारांनी त्याला पुष्टि जोडली .

” महाराज, तुमची काहीतरी चूक होते आहे. मी तुम्हाला का बरं धोका देईन ? “ माळी शांतपणेम्हणाला. “ तुम्ही काहीतरीशिकावं म्हणून मी माझी सर्वोत्कृष्ट खेळी खेळलो. ”

राजा दु: खी स्वरात म्हणाला, “ मी कधीच चूक करत नाही . माझ्या सल्लागारांच्या म्हणण्यानुसार मी कायम बरोबरच असतो. आता तुला तुरुंगात जावं लागेल. ” त्या रात्री राजाला झोप लागली नाही. “माळ्याला खरोखर तुरुंगात डांबायला हवं आहे का ? माझी चूक होते आहे का ? त्याच्या मुलीचं काय होईल मग? “ असे प्रश्न तो स्वत: लाच विचारत होता.

राजानं दुसर् या दिवशी माळ्याच्या मुलीला महालात बोलावलं .

” तुझे वडील काही दिवस बाहेरगावी जाणार आहेत “. राजा तिला म्हणाला, “ तोपर्यंत तू इथे महालात रहा. “

माळ्याची मुलगी वडिलांशी बोलायला आत गेली तेव्हा राजा आणि त्याचे सल्लागार तुरुंगाच्या कोठडीच्या बाहेर प्रतीक्षा करत थांबले.

मग माळ्यानं राजाला बोलावलं . “ माझ्या मुलीचा सांभाळ केल्याबद्दल मी आभारी आहे. तो म्हणाला.

माझ्याकडे तुमच्यासाठी एक महत्वाची भेटवस्तू आहे. “

मग त्यानं राजाला पीचची एक बी दाखवली.

काही दिवसांनंतर राजा त्या मुलीला घेऊन तिच्या वडिलांना भेटायला गेला. मुलीनं बागेतली फळं एका टोपलीत वडिलांसाठी नेली होती.

राजाचे सल्लागारही त्यांच्याबरोबर गेले. “ तुमचं संरक्षण करायला आम्ही सोबत येतो आहोत. तो माळी तुम्हाला काय करेल किंवा काय बोलेल याचा काय भरवसा ? “

ती बी पाहून राजाच्या सल्लागारांचे डोळे लालसेनं चमकले.

त्यातल्या एकानं ती बी हातात घेतली आणि म्हणाला, “ आम्ही हे राजासाठी पेरु . ते सगळेजण म्हणाले. पिकल्यानंतर आम्ही पीचची फळं तोडू . “

पण माळ्यानं ती बी हातात ठेवून मूठ बंद केली. फक्त एकच गोष्ट आहे , “ तो समजुतीच्या स्वरात म्हणाला.. कोणीतरी खास व्यक्तीनंच ही बी पेरली पाहिजे . आणि त्या व्यक्तीनं कधीच कोणती चूक केलेली नसली पाहिजे. नाहीतर ही जादू चालणार नाही.”

हे ऐकून सल्लागारांचे चेहरे पांढरे पडले. “ आम्हाला एकदम आठवलं , खूप कामं करायची पडली आहेत . आम्हाला हे बी पेरायला वेळ नाही. ” असं ते म्हणाले.

” ही एक जादूची बी आहे “. माळी म्हणाला.

” एका रात्रीत या बीपासून झाड उगवेल आणि झाडावरचं प्रत्येक फळ सोन्याचं असेल . “

मग माळ्यानं ती बी राजाला दिली. “ महाराज , तुम्ही ही बी पेराल का ? “

एका सल्लागार ती बी हातात घट्ट पकडून म्हणाला, “ राजा आपले हात खराब करू शकत नाही “. तो म्हणाला. “ आणि आमच्या राजाकडे आधीच खूप सोनं पडलंय. “

मग माळ्याची मुलगी त्या सल्लागारांकडे बोट दाखवत म्हणाली, “कृपया या सबबी सांगणं बंद करा. ती

ओरडली. राजादेखील चुका करतो हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. माझ्या वडिलांना तुरुंगात टाकून राजानं मोठी चूक केली आहे.”

मग राजानं त्या छोट्या मुलीचा हात आपल्या हातात घेतला आणि तो म्हणाला, “तू अगदी बरोबर बोललीस मुली. पुढे तो म्हणाला, मी खूप चुका केल्या आहेत. तुझ्या वडिलांना तुरुंगात टाकणं ही तर सर्वात मोठी चूक होती . मी तुझ्या वडिलांना मुक्त करतो.”

“पण या मूर्ख सल्लागारांवर विश्वास टाकणं ही माझी त्यापेक्षाही मोठी चूक होती.” राजा हसत हसत म्हणाला.

” त्या पीचच्या बीमध्ये जादू बिदू काही नाही. प्रत्येक माणूस कोणती ना कोणती चूक करतोच हे दाखवण्यासाठी माळी त्या बीचा उपयोग करत होता. “

” उद्यापासून..” राजा आपल्या सल्लागारांना म्हणाला..

” तुम्ही सगळे शाही तबेल्यात काम कराल . हत्तींना आंघोळी घालायचं काम कराल. मी माझ्यासाठी नवीन सल्लागार नेमतो.”

त्या दिवसापासून राजा आनंदात रहायला लागला.

तो रोज सकाळी माळ्याबरोबर बागेत बुध्दिबळ खेळायचा. कधी कधी तो जिंकायचा.

राजानं आपल्या प्रजेला मदत करण्याचे सतत प्रयत्न

केले.

काहीवेळा त्यानं चुकाही केल्या.

पण त्या चुका त्यानं आपले नवीन सल्लागार - माळी आणि त्याची मुलगी - यांच्या मदतीनं सुधारल्यादेखील…!!

समाप्त

See More Hide

PDF डाऊनलोड करा

 

 

comments powered by Disqus