Madhyayugna Bhrata

Madhyayugna Bhrata

॥॥॥॥ ७१ 1 111

(0.

१.१४ शं | (७). ठा व्य र डु ी!

हील)

ऐक्र2७89 ७७४ ॥७ ॥७॥७९ ॥॥०॥४6 ॥ 2011 ऐल 0७ 100) ([|॥/७॥७४/ ० 101000

॥0//॥॥॥/॥/.०॥/७.010/068115/11390॥9/39/५0॥90॥घ0303

हिंदु भारताचा अन्त

४ » | । आ ति 1800311… 6 79040

गृ,० ७७ 180 01 1). 3. ग’8’8[)०”7७]4 3801 & (० एज, 1306011080.

& (0118118) 13०00 ७१०1१०४ ४७०४ 3पव॥ ए8’ 0?००1& ठा(शए.

र ग्रंथकत्याची इतर पुस्तके.
१ मराठी. <
9 मध्ययुगीन भारत भाग १ ४-०
2 १7 भाग २ कही
? गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या १
शिवाजी व चेद्रराव मोरे ४ ॅ 9? दुर्दैबी रंगू १–८ : ( परचुरे पुराणिक मुंबई. ल, ना. गोडबोले पुणे. ) र संस्कृत. ; संक्षिप्त महाभारत २-८ संक्षिप्त रामायण १-८ र ( रामचेद्र गोविद काळबादेवी मुंबई. ) ठ इग्रजी. ी पाह(ळ’ए ण िलताळ€ए&ळ] ितेप पता र. १०] 1] 6-8 ठै

१५०] 1[ 6-8 पी १०] 111 १-8 ठं ॥ ७8118901181’30. 8 टा ठाडा 2.7 ठ

१-४४*४/४४४९/४४९/४४९/४५९/४५४९/४५९/४५१९/”५१९/

| | »

(106). त्त 6 पी:

मध्ययुगीन

अथवा. हिंदुराज्यांचा उद्भव, उत्कध आणि उच्छेद ( सु. ६०० पासून १२०० इ. )

भाग तिसरा ५० हिंद भारताचा अंत

१. ॥१०००–१९०० ३) १० ल/द र ])) ॥॥”0॥) ‘/। ॥)0 /0

चिंतामण विनायक वद्य, एम्‌. ए. एलएल्‌. बी आनररी फेलो, मुंबई युनिव्हर्सिटी आणि

हाभारत ए क्रिटिसिझम, रिडळ आफू धि रामायण, एपिक इंडिया या इंप्रजी, संक्षिप्त रामायण व संक्षिप्त महाभारत या संस्कृत

आणि महाभारत उपसंहार, श्रीरामचरित्र, श्रीकृष्ण- चरित्र व भारतीयवीरकथा या मराठी पुस्तकांचं कर्ते यानी लिहिला

।१५८८

लन १९२८

किंमत चार रुपये

प्रकाशक–चिंतामण विनायक वेद्य, भारतेतिहास संशोधक मंडळ ३१२ सदाशिव पेठ पुणे.

मुद्रक’–“गणेश काशिनाथ गोखले सेकेटरी, श्री गणेशा प्रिटिंग वक्‍्से;

४९५ शनवार पेठ, पुणे

हं पुस्तक

ग्रंथकत्योने केळासकासी ठोकमात्य बाळ गंगाधर टिळक

यांच्या

पूज्य व प्रिय स्मृतीस

ख्यांच्या अनेक गुणांबरद्दळ व हिंदुस्थानच्या प्राचीन इते- हासाच्या गहन अभ्यासाबद्दल, तसेंच भारतवर्षाच्या प्राचीन वेभबाच्या अभिमानाबद्दल आणि शेवटी र्‍या ग्रंथाच्या लेखनांत ग्रंथकारास वारंवार दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल सादर व साभार अपण केलें असे,

ह. 10102/0.1:1-4 तुक ट्‌ ५

४*

0040022//022) ॥५.५.॥७५%. रि 04:11.)

ही ५९५४५८५४५८ ५५६ ण १ हँ /. य ग डं १ । १,

1 न हू. “$- ७ > “ह डू त २ अ ) 1 1 । ् र भा! 1 त ७ हती 4 क री

र) “*

223 //८

ह. होऊ ७७0२ ‘पअमगील शशा वागू 1.) ।

१ तनानांगशीड .। ति 0010

७? 7४ लगागॉनिफ

$$ ६ 1-8 षः क 1 ह. गी १ व» | (म्मेः

प्रस्तावना

ईश्वराच्या कृपेनें मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा हा तिसरा भाग, कित्येक वर्षामागें या इतिहासाची रूपरेषा ज्याप्रमाणें ठरविली होती ल्याप्रमार्णे, तयार होऊन वाचकांपुढे हा शेवटचा भाग मी मांडीत आहे. या भागास ‘ हिंदु

  • आरतांचा अन्त’ (1)0७प8]] ठा लातप10019 ) हें नांव दिलें आहे. किंबहुना या समग्र इतिहासाची कल्पना “ रोमन साम्राज्याचा ऱ्हास व अन्त (106०116 810 181) ल 01७ ४01181 ]४1110170 ) या गिबनच्या इतिहासावरून मला सुचली. मध्ययुगीन हिंदु साम्राज्य आणि रोमन साम्राज्य यांच्या ऱ्हासांत बरेंच साम्य आहे. मध्ययुगीन हिंदु साम्राज्य रोमन साम्राज्याप्रमार्णच तु्का्नी* उाच्छिन्न केलें; आणि ज्याप्रमाणें बॉस्फरसच्य । किनाऱ्यावरील कॉनस्टेंन्‌टिनोपल तुकोनी दृल्ला करून घेतल्याने रामन साम्रा- ज्याचा अन्त झाला, त्याप्रमाणें गंगेच्या किनाऱ्यावरील कनोज राजधानी पडली तेव्हां हिंदु साम्राज्याचा अंत झाला. तसेंच युरोपांतील ग्रीकांच्या साम्राज्य देश्यांत तुर्की मुसलमानांचे साम्राज्य कायम झाले, त्याचप्रमाणे हिंदु भारतांत तुके-अफगाण मुसलमानांचे साम्राज्य प्रस्थापित झालें. ग्रीक म्हणजे प्राच्य रोमन लॉक शोयोदि गुणांत फारच हान झाले होते, आणि हीच स्थिति सामान्यतः हिंदु लोकांची झाली होती. ( रजपूत मात्र भ्रीकांच्या विरुद्ध शोये आणि स्वातंत्र्यप्रीति या विषयीच्या त्यांच्या उज्वल कीर्तीत कमी झाले नव्हते, आणि अजूनहि राजपुतान्याच्या डोंगरांत आणि रेतस्यानांत ते आपलें स्वातंत्र्य अर्धेसुर्ध संभाळून आहेत ). पृथ्विराज आणि जयचंद शेवटच्या ग्रीक बाद- शहांप्रमाणें शरत्वांत कमी नसून त्यांनी आपले नांव हिंदुस्थानच्या इतिहासांत रणसंग्रामांत शूरत्वार्ने लढून व रणांगणी आपले देह’ ठेऊन अजरामर केर्ले आहे. तथापि हिंदु भारतांतील सामान्य लोक अनेक कारणांमुळें गरीब झाले होते आणि जोराचा राष्ट्रीय विरोध न करितां त्यांनी पारतंत्र्य कबूल केलें.

या भागांत, याप्रमाणे बहुतेक उत्तर हिंदुस्थान मुसलमानांपुढें पडले, तेथ- पयत म्हणजे सु. इ. स. १२०० पर्यंत हिंदुस्थानचा इतिहास आला आहे. हिंदु

» दिहाबुईन स्वतः अफगाण होता तरी त्याच्या सैन्यांत तुकेच जास्त हाते, आणि रजपूत आपल्या शात्रूंस ‘ तुरकडा ‘ च म्हणत.

ग्र प्रस्तावना.

भारताच्या ऱ्हासास प्रारंभ या भागांतील कालविभागाच्या आरं्भांच ज्ञाला; आणि काबूल व पंजाब सुमारे इ. स. १००० पासून इ. स. १००९ पयेत महमुदाने जिंकले. या भागांतील पहिल्या म्हणजे सहाव्या पुस्तकांत आम्ही हिंदुस्थानावरील महमुदाच्या स्वाऱ्यांचा इतिहास दिला आहे. हा इतिहास मुसलमानी आणि हिंदु मूळ आधार-ग्रेंथांवरून आम्ही पुनः नवीन तयार केला आहे असें म्हटलें असतां चालेल. लाहोरचा राजा जयपाळ, काबूलच्या त्याच नांवाच्या राजाहून भिन्न आहे अशी साधारण समजूत आहे. परंतु उपलब्ध पुराव्याचा काळजीपूर्वक विचार केल्यावरून ही समजूत चुकीची आहे असे दिसून आले; आणि आम्ही या इतिहासांत दाखविल्याप्रमाणे काबू- लच्या शाहांचें पॅरोपॉमिसस पासुन सतलजपर्यंत पसरलेल विस्तृत हिंदु राज्य महमुदापुढें नष्ट झार्ले. पंजाबचे लढवय्ये हिंदु, गझनीच्या मुंसंलभान तुकोपुढे कां पडले याचीं कारणें दार्खविण्याचा प्रयत्न आम्ही या पुस्तकांत केला आहे. या रीतीर्न पंजाब हिंदु भारताच्या बाहेर या कालाविभागाच्या आरंभीं गेला. ७१२ इसवींत सिंध पूर्वीच बाहेर गेलं होतें.

हिंदुस्थानच्या इतर भागांत हिंदु राज्यें सुमारें २०० वर्षे रजपूत राजांच्या सत्तेखाली नांदलीं आणि निरनिराळ्या राज्यांत वेळोवेळीं माळव्याचा भोज, गुजराथचा जयसिंह, कनोजचा गोविंदचंद्र आणि कल्याणचा विक्रम यांसारखे सामथ्येवान्‌ राजे उत्पन्न झाले. तथापि उत्तर हिंदुस्थान १२०० इसवी सुमार शिहाबुद्दीन धोरीपुढें,हिंदु राज्यांचे स्वातंत्रय रक्षण करण्यास पृथ्वराज आणि जयचचंद यांसारख शूर राजे असतांहि, नष्ट झालें. या आपदेचीं कारणें पंजाबच्या ऱ्हासाच्या कारणांहून भिन्न असन तीं आम्ह सातव्या पुस्तकाच्या शवटी विवे- [चली आहेत. हें विवेचन वाचकांस मनोवेधक निदान विचारोत्तेजक वाटेल

पण सर्वांत अधिक मनोवेधक या भागांतील शेवटचें पुस्तक ( आठव ) वाचकांस वाटेल. या पुस्तकांत हिंदुस्थानच्या या कालविभागांतील सामान्य परिस्थिर्ताचें विवेचन आम्हीं केलें आहे. हिंद लोक राष्ट्र या नाल्याने दुबेल कां झाले याचें कारण या परिस्थितींत आहे. या कालविभागांत मुख्य जातींत हजारों पोटजाति कशा झाल्या, धार्मिक ऐक्य निरनिराळे पंथ उत्पन्न होऊन कसें नष्ट झालें, त्याचप्रमाणें आहेसा तत्त्व प्रबल होऊन अनेक लोकांनीं शाकाहाराचा स्वीकार कसा केला आणि शेवटी धमंभोळेपणा वाहून निरनिराळे आगम, उप -

प्रस्तावना. ड्‌

स्मृत्या आणि उपपुराणें कशी उत्पन्न झाली हे आम्ही दाखविल आहे. आमच्या इंतिहासाचा हा भाग सर्वात अधिक महत्त्वाचा असुन या पुस्तकांत आम्ही ली मर्ते नमूद केली आहेत त्यांचा विचार आमचे हिंदु वाचक काळजीपूर्वक करतील अशी आश्या आह

सातव्या पुस्तकांत दिलेला या कालाविभागां्ताल हिंदु राज्यांचा इतिहास आम्ही सुख्यतः कोरीव लेखांवरून तयार केला आहे. प्रसिद्ध युरोपियन व हिंदु विद्वान संशोधकांनी हे कोरावलेख शोधून काढून प्रसिद्ध केळे असून या काल- विभागाचा संगतञार इतिहास या कोरीवलेखांत आलेल्या हकोौकती एकत्र करून आम्ही दिला आहे त्याचे सव श्रेय सदर संशोधकांस दिलें पाहिजे किल्येक मुद्यांसंबेधें या विद्वान्‌ लोकांचा व आमचा मतभेद मधून मधून झाला आहे; आणि कोठें कोठे आम्ही त्यांच्या मताविरुद्ध टीका केली आहे हं खरे; ‘पण त्यांचा आदरयुक्त गोरव करून, हिंदुस्थानचा मुसलमान-पूवे इतिहास बनविण्यास त्यांचेच परिश्रम साधर्नाभूत झाल आहेत, हें अत्यंत आभारपूवेक आम्ही येर्थे नमूद करितों. ज्या ज्या आधारांचा उपयोग आम्ही या इतिहा- सांत केला आहे तो नेहमीप्रमाणे खाली टिपेंत न देतां पुस्तकांतच वाचकांच्या समोर तात्काळ येण्यासाठी जेथल्या तेथेंच दिला आहे. कांहा राज्यांचा इति- हास डों० भांडारकर, फोट, ल्युवर्ड व लेले वगरे विद्वानांनी पूर्वीच संगतवार दिलेला आहे, तोच बहुतेक थोड्याबहुत फरकार्न आम्ही येथें घेतला आहे. ‘पण इतर राज्यांचा इतिहास, विशेषतः कनोजच्या गाहडवालांचा इतिहास, ‘आम्ही प्रथमच या भागांत संगतवार दिला आहे आणि त्या संबंधाचे कांहीं कठीण प्रश्न, उदाहरणार्थ गाहडवाल आणि राठोड यांचें एकत्व, आम्ही या भागांत सोडावले आहेत. |

आमच्या ग्रंथाचा शेवट या भागानें झाला. कारण हिंदु भारताचा अंत येथें झाला; पुढें हिंदु व मुसलमान यांचें मिळून भारतवषे आहे असंच म्हणतां येत. कांहीं हिंदु राज्यें दक्षिण हिंदुस्थानांत आणखी दभर वर्षे नांदली हं खरें; पण या भागांत सांगितलेल्या कारणांमुळे तीहि थोडक्याच धक्यानें पडण्यास योग्य झालीं होती. आणि त्याप्रमाणे ता अल्लाउद्दीन आणि त्याचा सेनापति मलिकूकाफुर यांनी सुमारे इ. स. १३०० त केलेल्या हल्याने ‘एकदम पडलीं हँ प्रत्यक्ष आपल्यास इतिहासांत दिसतें. महाराष्ट्र ( देवगिरी ),

] प्रस्तावना.

तेलंगण ( वरंगळ ), आणि कनोटक ( द्वारसमुद्र ) ही एकामागून एक मलिक काफुरन एका स्वारांत जिंकली व त्यानें हो स्वारी कन्याकुमारी पर्यंत पोह” चाविली. दक्षिण हिंदुस्थान ( मद्रास इलाखा ) पुनः विजयानगराच्या राज्या- खालीं उभे राहिलं, पण तेंहि शेवर्टी १५६५ इसवींत महाराष्ट्रांतील एकवटलेल्या मुसलमानीराज्यांपुढें तालीकोटच्या लढाईत पडले.एका रातांन असं ह्मणतां येईल: की, हिंदुसाम्राज्याचा अंत या वर्षी झाला आणि विजयानगर हंच हिंदुस्थानचे कॉन्‌स्टेनूटिनोपल होय. ( कांन्स्टेन्टिनोपल हल्ली हयात आहे पण विजयानगर अस्तित्वांतून नष्ट झालें आहे ). हिंदु भारताच्या अवश्रेषाचा हा अलीकडचा इतिहास देवागेरींच्या उच्छेदापासुन सुरू होऊन विजयानगरावर आलेल्या या विपत्ती पर्यंत येतो. तो एका स्वतंत्र भागांत देण्यासारखा आहे; आणि ज्या दृष्टीनें हा इतिहास लिहिलेला आहे त्याच दष्टीनं तो लिहावयास पाहिजे; पण ह काम आम्ही दुसऱ्यावर सोंपवितो.

हिंदुस्थानचा या काळचा राजकीय नकाशा तयार करून या भ्रथास जोड- लेला वाचकांस मनोरंजक वाटेल. पण त्याहिपेक्षां अधिक मनोरंजक जे तीन नजरी नकाशे आम्ही स्वतः त्या त्या जागा पाहून तयार करून दिले आहेत ते म्हणजे:–( १ ) पंजाबर्चे स्वातंत्र्य ज्या लढाईच्या मैदानावर गेलें तं छछचें मैदान, त्याचप्रमाणे (२) कोट कांगडा आणि ( ३ ) पृथ्विराजाची जुनी दिल्ली यांचे नकाशे वाचकांस वाटताल. शेवटीं जोडलेली मुख्य वत्तांची सनवारी आणि सूची या दोन्हा या ग्रंथांचा उपयोग करण्यास वाचकांस मदत करताल.

शेवटली गोष्ट ही का, ग्रंथाच्या तपासण्यांत आमच्या स्वतःच्या निष्काळजी– पणार्ने आणि छापखान्याच्या ह्यगयीनें अनेक चुका ग्रेथांत राहिल्या आहेत, याबद्दल वाचकांची आम्ही माफी मागतो. अथोकडे आणि हकीकतीकडे वाच- कांनी लक्ष दिल्यास त्या चुका वाचकांच्या सहज नजरेस येऊन वाचकांचा मनोभंग होणार नाहीं अशी आम्हांस आज्या आहे. कित्येक ठिकाणीं सनांच्या आकड्याच्याहि चुका आहेत, त्या महत्त्वाच्या नसून त्याकडेहि वाचक दुलेक्ष करतील अर्स समजून शुद्देपत्र आम्ही यासाठी मुद्दाम दिलें नाही.

पुणे ता. ३१ जानेवारी १९२६ चि. वि. वेद्य.

विषयानुक्रमाणिका.

पुस्तक सहावें. गझनीच्या महमरुदाच्या स्वाऱ्या.

प्रकरण नांव

१ हिंदुस्थानची राजकीय भूगोलिक माहिती- टि. राजशेखरकृत हिंदुस्थानचं भूगोलिक वणन. २ बुखाऱ्याचे सामानी बादशहा व गझनी राज्याची स्थापना. टि. १ हिंदुस्थानचा राजा जयपाळ २ मोह्याल ब्राह्मण, ३ सबुक्तगीन आणि जयपाळ. ४ महमूद आणि जयपाळ. ५ भाटियावरील स्वारी. ६ मुलतानवरील स्वारी. ७ संयुक्त हिंदूची शेवटली लढाई. टि. संयुक्त लढाईचें ठिकाण. ८ नगरकोटची स्वारी. टि. कांगडा येथील किल्ला व देवळें. ९ १ पंजाबचं मांडलिकत्व. २ पंजाब खालसा झाला.

८५, ८९

टि.१ नेदनचा किल्ला, २ उत्तरशाही राजांच्या दुरुस्त केलेल्या तारखा,९५

१० ठाणेश्वरावरील स्वारी.

११ मथुरेची लॅट.

१२ कनोज पडलें.

१३ कालंजरवर्राल स्वारी, टि. १ या,स्वारींचा स्मिथने दिलेला चुकीचा वृत्तान्त ,» ९ काबुल-पंजाबाचे शाही राजे

१४ सोमनाथावराल स्वारी, टि. १ सोमनाथ; २ सादी व सोम. १५ महमुदाचा सत्य, त्यारचे स्वभाववर्णन व राजनीतिनिपुणत्व.

टि, महमूद किंवा शिवाजी ठुटारु होते काय १६ पॅंजाब-कावूलचा उच्छद, भासणारी कारणें.

र्ट १०१४ ११२ १२० १२७ १३० गदर १४१ १५२३ १६२९

१७ पंजाब-काबूलचा उच्छेद, संभवनीय कारणें १७३ टि. १ आक्षेपांचे निरसन २ पंजाबांतील धमेदीथिल्य दाखविणारे

महाभारतांतील उल्लेख. १८४ १८ महमुदाच्या मागूनचे राज. टि. गझनवी राजांची नार्णी. १९५

परिशिष्टे १ हिंदूंची मूर्तिपूजा; २ कांहीं म्रसलमानी नांवाचे उच्चार व अथ २१३

पुस्तक सातर्वे. तिसरी हिंदु राज्यें. प्रकरण नांव पृष्ठ

१ सांभर व अजमीर येथील चाहमान २२१ २ मेवाडचे गुहिलोत २३१ ३ धारचे परमार राजे–भोज २२९ ४ भोजानंतरचे परमार राजे २६० ५ बुंदेलखंडचे चंदेळ. टि. खजराहो व महोबा २७६, २८६ ६ चेदीचे कलचूरी हेहयराजे. टि. त्रिपुर राजधानी २८८ ७ अनाहिलवाड’चे चालक्य २९८ ८ कनोजचे गाहडवाल ३९१ टि. १ राठोड आणि गहरवार, ३३« २ राठोड म्हणज गाहडवाल दक्षिणचे आहेत काय £ ३१३५ ९ बंगालचे पाल राजे श्‍श्श्र १० लखनोौर्तांचे ( बंगाल ) सेन ३५२ ११ ठाण्याचे शिलाहार ३६१ टि. १ घारापुर्राची एलिफंटा लेणी २७४ ___ २ हृऊ्जम नगर ३७५ १२ कल्याणचे उत्तर चालुक्य ३७५

कल्याणचे कलचूरी ३९४

रै

१३ त्रिकलिंगाचे प्राच्य गंग. ओरिसा ३९७-४०४ १४ तंजावरचे चोल ४०७ १५ दक्षिणेतील महत्वाची मांडलिक राजघराणी. ४१९

(१ ) देवशिरि यादव ४२० (२ ) काकतीय आंध्र ४२१ (३) हलेवीड होयसल ४२३ (४) पांडय ४२४ (५ ) केरल ४२५

. (६) येलबुगे दिंदे ४२७ (५७) सोदत्तीचे रद ४२९ (८) हनगळचे कदम्ब ४२१ ( ९ ) गोळ्याचे कदम्ब ४३२ (१०) कऱ्हाडचे शिलाहार ४३६ वंशावळी ४३०

१६ उत्तर हिंदुस्थानांतील महत्वाची मांडलिक घराणी ४४१ (१) रतनपुरचे हेह्य ४४१ ( २ ) अस्नीचे गोतम ४४२ (३) लगमनपुरचे संगार ४४२ (४) मीरतचे डोर ४४४ (५) बदाऊंचे राठोड ४४५ (६ ) अबूचे परमार ४४६ (७) नढूलचे चव्हाण ४४७ ( ८ ) ग्वालेरचे कच्छवघात ४४७ (९) दिल्लीचे तोमर ४५२ टि. कच्छपघातांच्या उत्पत्तिविषयी हरप्रश्नादशा. चें चुकीचे मत ४५३

१४ हिमाल्यांतील राज्यें १ कारमीर, २ नेपाळ, ३ वबा, ४ नुरपूर ४५७

टि. १ नुरपुर येथाल किल्ला व देवळें ४६५

५ मंडी आणि सुकेत ६ करतवार ४६६

७ बल्लापूर ( बलोर ) अथवा बर्सोहृली ४६९

८ कांगडा ४७० १८ शेवटचा हिंदु सम्राट्‌ रायपिठोरा ४७३ १९ शहाबुद्दीन घोरी आणि हिंदूंची शेवटची लढाइ ४८१ २० पृथ्विराजाशी युद्ध | ड्८्डं टि. १ महमद घोरी आणि पृथ्विराज ४९०८

२ शेवटल्या लढाईतील मुसलमानांची चाळ ४९१

३ शेवटल्या लढाईचे रासांतील वणन ४९३

२१ अजमीर व दिल्ली यांचा उच्छेद ४९६ टि. १ पृथ्विराजाची जनी दिल्ली ४९८

२ कुतुबमिनार 3). णुळक

4

२२ कनोज आणि बनारस यांचा उच्छेद | २३ उत्तर हिंदुस्थानांतील इतर रजपूत. राज्यांचा उच्छेद भा. १

र्ड क भा. २ २५ उत्तर हिंदुस्थानचा उच्छेद–मुख्य कारणें २६६३, आनुषंगिक कारणें

पुस्तक आठवें.

सामान्य पारोस्थाति.

१ जाताचे उपजातींकरण

“धा

ब्राह्मणांच्या पोटजाते ५५० टि. माकों पोलोनें वर्णिलेले लाड ब्राह्मण. ५५७ रजपुतांच्या पोटजाति ५६१ टि. क्षत्रियांची १६ राजकुलें ५६८.कायस्थ ५७१.वेश्‍्य ५७२, शुद्र, अस्पूृर्यजाति५७४ विवाह वगेरे चालींत बदल

धमेक्यनाश व धार्मिक द्वेष

मुसलमानी धम, ५८५ जैनधम ५८८ नवे. वैष्णय मत ६०१ नर्वांन अथवा वार शेवमत ६०७ टि. वौरशेव पंथ व त्याचे संस्थापक याविषर्यी राइसचा लेख ६१५ शैववेष्णवमताच्या एकीचा प्रयत्न ६१८ पंढरपूरचा विठोबा ६२१ टि. १ मोक्षा- विषयांच्या भिन्न कल्पना ६२२ टि. २ कित्येक भागांतील परम- तसहिष्णुता ७२४

४ हिंदूधमोचे बदललेले स्वरुप

वेद (६२७ ) वैविक यज्ञ ( ६२९ ), नैमित्तिक यज्ञ (६३० ), मूर्तिपूजा (६३१ ), मठ आगम आणि तंत्रग्रंथ (६२८ ), संस्कार व कर्मे यांची वाढ (६३९), पुराण ग्रंथांची वाढ (६४१), उपस्त्मत्या आणि उपपुरारणे (६४२ ) कलिवज (६४३ ), शाद्धे- करणाचा निषेध ( ६४५ )

क. 8.

५७७

५८५

६२७

टि. अल्अेरुर्नानें परिगाणित केलेणे उपवास व उत्सवादेन (६४५)

६ राजर्काय परिस्थिति ६४८ टि. शिवाजीचे अष्टप्रधान ६५९ ६ राज्यकारभार– ६६२ अंमली कारभार ( ६६३ ), न्यायपद्धाते ( ६७५ ), दक्षिण हिंदुस्थानांतील लोकसभा ( ६७७ ), फोजी व्यवस्था (६८० ), सन्मानाचे उगमस्थान (६८१ )

७ भाषा व वाड्यय– ६८९ पारोगोष् | 3) डॉ. म्रियरतन यांच्या * हिंदुस्थानच्या भाषांचे निर्राक्षण ‘ ग्रंथां-

तील उतारा. ६३८८

कानडी, तेलगू; (६८८ ); बंगाली, प्राच्यहिंदी, पाश्चिर्माइदी, मराठी, ( ६८९ ).

२ कांहीं आक्षेपांस उत्तर ६९० ३ निरनिराळ्या प्रांतांतील लोकांच्या संस्कृतप्राकृूत ठउच्चाराची

तर्‍हा ( राजशेखर ) ६९६ ४ मूळ कोरीव लेखांतील उतारे ६९७ ५ महत्वाची सनवारी., ७ऊ०९

सूची व नक्ताशा.

साधनग्रेंथ

या ग्रंथाचे साधनग्रंथ कोणते आहेत तें सांगणें फायदेशीर होईल अशी एका मित्राने सचना केल्यावरून ते आम्ही पुढे देतो. हा ग्रंथ किंबहुना हा सवे इतिहास कोरीवलेखांच्या आधारें लिहिला आहे. हे लेख (१ ) इंडियन अँटिकरी, ( २ ) एपिम्नाफिया इंडिका, ( ३ ) .बॉबे ब्रँच रॉयल एसियाटिक सोसायटीचे जर्नल, ( ४ ) बैंगोल एसियाटिक सोसायटांचे जनेल आणि त्याच- प्रमाणें कापेस्‌ एस्पिकृशियोनेरम्‌ यांचे व्हॉल्यूम यांत छापले आहेत. हे सवे ग्रंथ तपासून पाहणें कठीण आहे हें सांगणें नको. पण किलहॉनेनें उत्तरेकडील कोरीव लेख आणि दक्षिणेकडील कोरीवलेख यांच्या याद्या, एपिग्नाफिया इंडिका भाग ५ व ८ यांत छापिल्या आहेत. या याद्या निरनिराळ्या राजवंशानुरूप केलेल्या असून सनवारीनं, लेख कोणकोणत्या पुस्तकांत छापले आहेत ह्यांच्या तपशीलासह, दिल्या आहेत. या रीतीनें आमच्या कालविभागाच्या संबंधीचे कोर्रावलेख आम्हांस सहज काढतां. आले व ते आम्ही मुळांत वाचून त्यावरून आम्ही आपलीं मरते बनविली आहेत. या नंतरचे एपिम्राफिआ इंडिकाचे व इंडियन एन्टेकरीचे भाग आम्हांस चाळून पहावे लागले ह सांगणें नको.

( ६ ) निरानेराळ्या प्रांतांतील जिल्ह्यांचे गेझेटियर यांत “ इतिहास ‘ आणि ‘ लोक ‘ या सदरांखालीं महत्त्वाची माहिती दिलेली आहे, ताहि वाच- ण्यांत आली. आणि शेवटीं (७) मुसलमानी हकीकतीसाठी इलियट भा. १वर तसेंच ‘अल्बेरूनीचा हिंदुस्थान, “यमीनी ‘ आणि “ तबकात-इ-नासिरी ‘ या तीन ग्रंथांची इंग्रजी भाषांतर यांचा आम्हीं उपयोग केला.

इ (क

च. व. बच.

मध्ययुगीन भारत.

भाग २ रा. पुस्तक-सहावे.

गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

नन__२>ः८-ााा

च प्रकरण १ ल. हिंदुस्थानची राजर्काय भूगोलिक माहिती. -* स्स्स (इ. स. १०२०, अल्बेरूनी. )

या भागांतील इतिहास चांगला निश्चित होण्यास हिंदुस्थानची [जकीय भूगोलिक माहिती प्रसिद्ध आरब ग्रंथकार अल्बेरूनी यानें आपल्या * इंडिया ‘ या ग्रंथांत दिलेली अत्यंत उपयोगी गंडणारी असून फार महत्वाची आहे. हिंदुकालविभागाच्या हिल्या भागास म्हणजे इ. स. ६००–८००पर्यंतच्या काळास जसें चिनी प्रवासी ह्यूरनत्संग याचें प्रवासवृत्त अत्यंत उपयोगी पडलें, तसंच महत्वाचें हिंदुस्थानचे अल्बेरूनीरने लिहून ठेविलेले र्णन या कालविभागास म्हणजे १०००-१२००च्या कालास उप-

टर गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

योगी आहे. दोघेहि परस्थ होते, दोघांनीं हिंदुस्थानांत राहून व प्रवास करून संस्कृताचा अभ्यास केला होता आणि दोघेहि बुद्धिवान आणि ऐतिह्यासिंक चिकित्सक बुद्धीचे होते. अल्बेरूनी दोघांमध्ये ज्यास्तच भरवंशाचा ठरेल. कारण तो मुसलमान होता तरी सुद्धां आग्रह- रहित त्याची दृष्टि स्पष्टपणें दिसते; ( ह्यूरनसंग बौद्ध असून हिंदू- विषयीं थोडासा दूषित मनाचा दिसतो ). अल्बेरूनीने हिंदू लोकां- विषया, त्यांच्या धमाविषयीं, त्यांच्या तत्वज्ञानाविषया,त्याचें शास््रज्ञान व कलाज्ञान याविषयीं अनादरबुद्धि दाखविली नाहीं. दोघांनींहि हिंदुस्थानांत राहून हिंदुस्थानच्या पंडितांपासून माहिती मिळविली होती. ( ह्यूरनत्संग हा नाळंदा मठांत कत्येक वर्षे राहिला होता ). अल्बेरूनीनें आपली माहिती मुलतान व पेशावर या दोन ठिकाणी राहून हिंदु पंडितांपासून संपादन केली होती. हिंदुस्थानच्या भूगो- लाविषयीं माहिती त्यानें हिंदु व मुसलमान प्रवाशांपासून संपादन करून त्याची जांचह्ि केली होती. तो मूळचा राहणारा स्वारिझमचा होता. जेव्हां महमुदानं तो देश जिंकला तेव्हां त्या देशांतील केदां- बरोबर महमूद त्यास गझनी येथें घेऊन आला. अल्बेरूनी तेव्हांच

विद्वान, विशेषतः गणिती व ज्योतिषी होता. ज्योतिष-गणित व

फल-प्रीक लोकांकडून आरबांस मिळाळें होतें तें सर्व तो शिकला होता. त्यावेळीं हिंदु ज्योतिष ग्रीकांच्याहि पुढें निदान बरोबरीचे होतें, तें अल्ब्ेरूनी मोठ्या होसेनें येथें शिकला. हिंदुस्थानच्या समम्र स्थितीचे समालोचनाच्या वेळीं आम्हांस अल्बेरूनीच्या या पुस्तकाचा फार उपयोग होणार आहे; कारण त्यानें हिंदूचे शास्त्र, तत्वज्ञान, इतिहास, वाड्यय वगेरे अनेक विषयांवर माहिती मिळवून नमूद करून ठेविली आहे. पण येथें आम्हीं प्रथम हिंदुस्थानची भूगोठिक माहिती त्यानें दिळेली देत आहों. कारण त्यावेळची राजकीय परि- स्थिति समजण्यास ती फारच उपयोगीं आहे. ती माहिती अल्बे-

हिंदुस्थानची राजकोय भूगोलिक माहिती. ३

रूनीने हिंदु भृगोठिक पुस्तकांवरून, त्याचप्रमाणें जाणकार हिंदु व मुसलमान प्रवाऱ्यांकडून मिळवून दिलेलीं दिसते. राजशेखर याचा भूगोलाचा ग्रंथ बहुधा अल्बेरूनी समोर असावा. आह्मी एका टिप्प- णींत राजरोखराच्या ग्रंथाचाहि सारांश देत आहो. प्रवाशांकडून मिळा- लेली अन्तरांची माहितीहि अल्बेरूनी देतो पण, हीं अन्तरे त्यानें फरसाख ( फारशी योजन ) मध्यें दिळेली असल्याने बरीच संरा- यित आहेत. एक फरसाख ४ इंग्लिश मेलांबरोबर सरासरी मानतात एवढी प्रस्तावना करून अल्बेरूनीच्या वरील ग्रंथांतील भगाळिक अध्यायावरून आम्ही पुढील माहिती उध्दत करतों. हा प्रंथ अल्बेखर्नानें इ. स. १०३०त पुरा केला. महमूद त्यावेळीं नुकताच मेला होता. आरब प्रंथकारांनीं नेहमीं हिंदुथानचे सिंध आणि हिंद असे दोन भाग पाडळे आहेत. आरबांनीं सिंध पूर्वीच जिंकून आपल्या राज्यांत व धर्मांत सामिल केलें होतें; अर्थात्‌ ते हिंदुस्थानापासून निराळें पडलें होतें. हिंदुस्थानचा मुख्य भाग म्हटला म्हणजे मध्यदेश ( हें नांव महाभारतांतहि आहे ) आणि मध्य देशाचा मध्य म्हणजे कनोज शहर. यावेळीं कनोज हिंदुस्थानचे राजकीय दृष्ट्याहि केन्द्र होतें. अल्बेरूनी म्हणतो “ कनोज हें हिंदुस्थानांतील सर्वांत श्रेष्ट असलेल्या राजाची राजधानी व राहण्याचें ठिकाण होतें. ‘” दुसऱ्या भागांत सांगितल्याप्रमाणें यावेळीं प्रतिहार सम्राटाचें कुल कनोजेत राज्य करीत होतें. किंबहुना कनोज हिंदुस्थानची सार्वभौम राज- धानी हर्षापासूनच झाली होती. अर्थात्‌ चारशें वर्षांच्या वैभवामुळें, हिंदु संस्कृति, विद्वत्ता व कला यांचेंहि तें केन्द्र बनलें होतें. संपन्न, विद्दान आणि शूर लोक तेथें ओढले गेले होत. तेव्हां हे साहजिकच आहे कीं हिंदुस्थानची भगोलिक माहिती कनोजला मुख्य धरून ब त्याच्या दिशनें अल्बेरूनीनें दिली आहे. ( रामायणांत हिंदुस्थानचा भूगोल कुरुक्षेत्रास मुख्य धरून दिला आहे ), किंबहुना राजशेख-

; गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

राने आपल्या काव्यमीमांसेंत कनोजपासून अन्तर॑ व दिशा सांगाव्या असें स्पष्ट म्हटलें आहे, या म्हणण्यास अनुसरूनच अल्बे- रर्नानॉहे हिंदुस्थानचा भूगोळ सांगितला आहे. गंगायमुनमधील प्रदेश अन्तर्वेदि हिंदुस्थानचा खरोखर मध्य आहे, तेव्हां पूवीचायानीं अन्तर्वेदीला मध्य बिन्दु धरून भूगोल सांगावा असें म्हटलें तें योग्य आहे. अन्तर्वेदीचाहि मध्य बिन्दु कनोज आहे आणि तेथें प्रतिहार साम्राटाचा राजकवि या नात्यानें राजशेखर राहत असे तेव्हां अर्थात्‌ त्याने आणखी कनोज मध्य धरून भूगोल सांगावा असा नियम घातला हेहि ठीक आहे. “ गंगायमुनयोरविनशनप्रयागयोरन्तरमन्त- वेदी । तदपेक्षया विशो विभजतेत्याचारयी: । तत्रापि महोदय- मधिकृत्येति यायावरीयः ‘’ ( महोदय म्हणजे कनोज आणि याया- वरीय म्हणजे राजशेखर हें येथें सांगितळें पाहिजे ).

असो, प्रथम अल्बेरूनी असें सांगतो कीं “जर तुम्हास सिंधला जावयाचें आहे तर तुम्ही सिजिस्तान मधून गेळें पाहिजे, पण हिंदला जावयाचे असेल तर काबूलवरून गेळें पाहिजे ‘! ( आरब लोकांक- रितां अल्ब्रेरूनी सांगतो आहे हें वाचकांच्या लक्षांत येईलच ). “हिंदु- स्थानच्या सरहद्दीवर अनेक हिंदु किंवा त्यासारख्या जाती आहेत त्या अतिदय अशिक्षित असून नेहमीं बंडें करितात ‘” यावरून हं स्पष्ट आहे कीं, या सरहद्दीवर्रल आफ्रिदी वगेरे शूर जाति अद्याप मुसलमान झाल्या नव्हत्या आणि हल्लीप्रमाणें त्या तेव्हांहि सम्राटास त्रास देत. अशा रस्त्याने कनोज पोचून तो म्हणतो ““ कनोज गंगेच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. पण हल्लीं हें शहर उध्वस्त आहे ( महमुदानें ते ठटळें ब मोडले होतें. ) हछीची राजधानी गंगेच्या पूर्वेस बारी येथे एक दिवसाच्या मजलीवर ( २४ किंवा ५० मैल ) आहे” हे बारी हहर हल्लीचे कोणते हं अद्याप निश्चित झाले नाहीं. असो, याप्रमाणें कनोज मुख्य धरून प्रथम आग्रेयीकडीळ शहरें सांगताना

हिंदुस्थानची भूगोलिक माहिती. प

जाजमहु वगेरे ठिकाणें सांगून त्यानें प्रयाग येथील गंगायमुना-संगमावर्राल वृक्षाचा उछ्छेख केला आहे. यावरून हा वटवृक्ष अद्याप तेथे असून त्यावरून जिवाला कंटाळलेळे लोक संगमांत जलसमाधि घेत असें दिसतें ( हल्लीं अलाहाबादाच्या किल्ल्यांत ह्या वटवृक्षाचे खोड दाख- विळें जातं ), प्रयागापासून दक्षिणेकडे समुद्र-किनाऱ्यापर्यंत अल्बे- रूनी गावे (मुख्य) सांगतो, आणि शेवटीं दारुर देशाच्या जोर राजाचें राज्य आहे असें वर्णन करतो, अर्थात द्रविड देशाच्या चोल राजांचे हें खरोखरीचें यावेळीं साम्राज्य असून त्यांच्या अमलाखालीं कांजी, (कांची), मळय,आणि कुंक (काकण) असल्याचें त्यानें सांगितलें आहे. तात्पय बहुतेक हल्लीचा मद्रास इलाखा त्यावेळीं चोलांच्या साम्राज्या- खालीं असून त्यांत कांहीं लहान संस्थानें म्हणजे मांडलिक राज्ये होतीं

यानतर बार्राच्या पुर्वेकडील भूगोल सांगण्यास तो वळतो आणि अयोध्या, बनारस, पाटलिपुत्र व मोंगीर ही शहरें उल्लोखितो. मोंगीर म्हणजे मुद्गर्गारे, येथे बंगालच्या पाल राजांची राजधानी यावेळी होता. पुढें चेपा डुगमपुर ( ? ) आणि शेवटीं गंगासागर, जेथे समुद्रास गंगा मिळते, त्यानें सांगितलें आहे.

पुन्हा बारीपासून पूर्वेस ( म्हणजे ईशान्येस थोडेसें ) गेळें असता भूतान आणि तिवेट लागतें, येथीळ लोक काळे असून तुके लोकां- सारखे बसक्या नाकांचे आहेत. नंतर त्याच्या पूर्वेस कामरूप आणि उलट दिशेस नेपाळ व त्यापलीकडे सर्वांत उंच पर्वत भूते- श्वर आहे.

“ आतां कनोजहून नैक्रृत्य दिशेस जातां प्रथम जजडूति लागते. याची राजधानी खजुराहो आहे आणि यांत दोंन मजबूत किल्ले कालंजर व गवालियार आहित. ‘’ चेदेछ राजांच्या अमला- खालील बुदेल्खंण्डचें ( हछीचें ) राज्य येथे बरोबर वर्णिले आहे. ५“: याच्याहि दक्षिणेस डाहाळचे राज्य असून त्याची राजधानी तेऊर

द गझर्नाच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

( त्रिपुर ) आहे आणि गांगेय हृल्लीं राजा आहे ” हेंहि यावेळच्या हैहृयांच्या चेदि राज्याचें बरोबर वर्णन आहे. आणि यावरून हं सिद्ध होतें की यावेळी (स. १०२३०) चेदीचा प्रसिद्ध राजा गांगेय- देव हयात व राज्यावर होता. अल्बेरूनीच्या ग्रंथांत यावेळच्या दोनच हिंदु राजांचे नांव आठें आहे, गांगेय आणि भोज ( धारचा परमार राजा ).

“ पुन्हा कनोजहून नेक्रदरत्य-पश्चिमेस जाता असी, सहन्य, जेन्द्र, राजोरी आणि गुजरातची राजधानी बझांन लागतात, ” ह शहर कोणते हें ठरविणे अशक्य आहे, पण गुजरात म्हणजे हीचे गुज- रात नसून त्याकाळी कोर्रावळेखांवरून हें नांव जयपुरच्या भोंव- तालच्या भागास होतें. हा इलाखा हल्लीच्या मारवाडांत मोडतो. बझान आमच्या मतें भिनमाळ असावें. कुचलो अथवा गुजरातची ल्युएन्संगने हींच राजधानीं सांगेतलठी आहे. कारण अल्बेरूनी असेंहि येथे सांगतो कीं बझान शहर वैराण असून तेथीळ लोक जडीरा नांवाच्या शहरास गेले होते. “ वझानास मुसलमान लोक नरेना म्हणतात. ” याचें कारण असें दिसतें कीं बझान. मिनमाळ येथें सूर्याचे ( नारा- यणाचें) प्रसिद्ध देवाळय होतें ( भाग १ पा.”५१०) व भिनमाल याचेच नांव श्रीमाळ आणि श्रीमाळी ब्राह्मण व वाणी हल्लीं प्रसिद्ध उप- जाति आहेत. अल्बेरूनी असे सांगतो की “कनोजहून मथुरा जितकी दूर तितकेच मथुरेहून बझान दूर आहे. ‘! कदाचित्‌ या शहराने त्यानें सांबरच्या चाहमानाच्या राज्याचा उल्लेख केला आहे. अजमेर अद्याप स्थापन झालं नव्हतें व तेथें चौहानाची राजधानीहि नव्हृती तेव्हां अजमीर अल्बेरूनी सांगत नाही हें ठीकच आहे. |

म्थुरेहन थेट दक्षिणेस उज्जनीस नेतांना वाटेनें दोनचार शहरें अल्बेरूनीनें सांगितली आहेत तीं निश्चित करतां येत नाहींत. भेल- स्वामि अथवा भेलसा हें नांव आपल्या ओळर्खाचें आहे. पण भेल-

हिंदुस्थानची राजकीय भ्रगोलळिक माहिती. ७

स्वामि नांवाचा तेथे देव आहे म्हणून त्या शहरास हें नांव आहे, ही माहिती नवी व महत्त्वाची आहे. भेलस्वामि ह नांव त्यावेळच्या कोरीव लेखांतहि आठें आहे, पण या नावांचें कारण आपल्यास अल्बेरूनींत सांपडते. स्वामी या पदावरून हा देव विण्णु होता असं दिसतें. भेळशाजवळ एक प्रसिद्ध विण्णुमंदिर असून त्याच्या पुढील गरुडस्तंभावर यवन बौद्ध राजाचा इ. स. पू १०० च्या सुमाराचा लेख सांपडला आहे हे विदित असेलच. पण संस्कृत वाडमयांत भेळ्शाचे नांव विदिशा असं येतें हें सांगितलें पाहजे.

“: आतां बझान पासून दक्षिणस मेवाडचें राज्य आहे. त्याची राजधानी जित्रार ( चितारगड ) आहे. तेथून दक्षिणेस माळ्याची राजधानी धार आहे. धारेच्या पूर्वेस ७ फरसाखावर उज्जनी आहे आणि उजनीच्या पूर्वेस दहा फरसाखावर भेलसा आहे. ‘’ माळवा आणि त्यांतील मुख्य शाहरें याचें हें बरोबर वर्णन आहे.

घारच्या दक्षिणेस कांहीं शहरें सांगितली असून त्यांत गोदावरी वर्राळ वंगर आणि नमेंदेवरीळ नेमार याचा उललेख आहे. “’ नेमा- वरच्या दक्षिणेस ‘ मराठ ‘ देश लागतो आणि मग कोंकण लागतें त्याची राजधानी ठाना समसुद्र-किनाऱ्यावर आहे. ” यावरून पर- कीय लोकांच्याहि तोंडीं या वेळी मराठ देशा हें नांव झालें होते. कोकणांत ठाना राजधानींत शिलाहाराचें राज्य यावेळी असलेलें चांगलें प्रसिद्ध होतें.त्याची ख्यालि कारर्मारापर्यंत होती हें आपण पुढें पाहणारच आहो.

बझान पासून नेैकत्येस अनहिलवाड आहे आणि समुद्र किना- ऱ्यावर सोमनाथ. अनहिलवाडच्या दक्षिणेस लाडदेश व त्याची राजधानी भडोच. व समुद्रकिनाऱ्यावर रिहंजूर. ( या प्रान्तास गुज- रात नांव नव्हते, लाट प्रसिद्ध संस्कृत नांव होतें ).

“: बझानच्या पश्चिमेच मुलतान आणि भाटी आणि पाश्चिम- नैक्रत्य अरोर, बाहमनवा, मनसूर आणि पुढें सिन्थुनदीच्या मुखा-

८ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

वर लह्रानी. ‘’ हों शहरे सिंध मध्ये होतीं आणि आरबांच्या ताब्यांत सिंधप्रान्त होता येथोन अल्बेरूनी पुन्हा कनोजला येतो आणि कनोजच्या उत्तर वायव्येस डोंगरांत शीषारह व पिंजोर असून त्यासमोर मैदानांत थानेश्वर आहे. डोंगराच्या पायथ्याशी जलंदरची राजधानी डहमाल. नंतर बल्ठावर, पश्चिमेस लद्दा व किल्ला राजगिरि, पुढें कारमीरची हद्द पश्चिमेस कूती, आनार, मीरत, पानिपत, “ दोहोंच्या दरमियान यमुना वाहते ‘” कावठल आणि सुनाम. नंतर उत्तरेस जातां आदि. तहौर, जाजमीर, ळुहावरची राजधानी मन्दहकुर राबी नदीवर, चन्द्रभागा, बिआस, नंतर कंधरची राजधानी बाहिंड सिंधु नदी- च्या पश्चिम किनाऱ्यावर, परशावर, डुनपुर,काबुलळ आणि शेवटीं गझनी, यापुढें अल्बेरूनीनें कारमीरचें वर्णन दिलें आहे. तो म्हणतो, “ काऱमीरांत घोडे किंवा हत्ती नाहींत. श्रीमंत लोक पालखींतून फिरतात. ज्यू ठोकांशिवाय दुसऱ्या कोणासाहि काऱ्मीरांत येऊं देत नाहींत. जेलम नदीवर बारामुला सांगून ही नदी जेथून गंगा निघते तेथूनच निघते असे त्याने सांगितळें आहे. - तेथे बर्फ कधीं वितळत नाहीं. जेलम कारमीरांत आल्यावर तिच्या दोन्ही कांठावर राजधानी वसली आहे. नंतर नदी एका दलदलीत शिरते. तेथोन बाहेर पडून एका दरींतून मैदानांत येते. या दरीच्या दरवाज्यावर पहारा असतो “: सिध नदी कुलजेक पर्वतापासून निघते, तेथें गिल्गिट वरून पोंचतात. तेथें भट्ट तुक राहतात. त्यांच्या राजांस भट्ट शह्ा अशी संज्ञा आहे. त्यावरून असें दिसतें कीं हे तुक लोक अद्याप हिंदु होते. गिल्गिटमध्ये अद्याप वैदिक संस्कृति बाकी आहे हें डाक्तर सर- ग्रायसन ( हिंदी-माषा-कोविद ) यानें दाखावेळें आहे, किंबहुना वैदिक भाषाहि येथें अवशिष्ट आहे. कारमीरच्या दक्षिणेस लाहूर आणि राजगिरि आहेत. “सर्वोत अत्यंत मजबूत असे हेच दोन किले

हिंडुस्थानची राजकीय भूगोलीक माहिती. ९

मी पाहिल्यांत आहेत. ही हिंदुस्थानची उत्तर सामा; पश्चिमेस अफगाण जाती राहतात.

हिंदुस्थानची दक्षिण सीमा समुद्र आहे. लहान मोटी सिन्धूची मुखे सोडली म्हणजे समुद्रकांठानें प्रथम कच्छ लागतें व सोमनाथ. ह्या दोन्ही ठिकाणीं चांचे फार आहेत.समुद्र कांठची शहरं एणेंप्रमाणे, तवछेश्वर, लोहरानी, कच्छ, बरोर, सोमनाथ, कंबाया, असाविल, बह- रिज, सिन्दान, सोपारा, ठाना. नंतर लारां देश मुख्य शहर जिसूर नंतर वछभ, दरवाड, शेवटीं सरेदिब (सिलोन ). अल्बेरूनीने शेवटीं रामेश्वरचं मर्णन सेतूसह पश्चिम व पूर्व समुद्रांचे संगमावर असल्याचें केलें आहे. व त्यानें दीव बेटांचेहि वर्णन केलें आहे. ““हीं बेटें बाहेर येतात व पुप्ह्या बुडतात ” (हा चमत्कार पुष्कळांना नाकबूल आहे.)

अल्बेरूनी म्हणतो “ मुलतान येथें पाऊस मुळींच पडत नाहीं. पण डोंगरांजवळ पाऊस आषाढापासून चार महिने पडतो. आणि खुद्द हिमाल्यांत श्रावणापासून अडीच महिन पाऊस असतो. हिमा- लयापलीकडे पाऊस मुळींच पडत नाहीं. कार्मीरांत माघ माहिन्यांत बर्फ पडतें व चैत्रांतहि कांहीं बफाची वष्ठि होते. अल्बेरूनीनं हिंदु महिन्यांचीं नांवे सांगितलीं आहेत, कारण क्रतंचा बदल त्यांत होत नाहीं. मसलमानी महिने सर्व क्रतंत फिरतात म्हणन तो मसल्मानी महिने वापरीत नाहीं हें साहजिक आहे. शिवाय हिंदुज्योतिषाची ल्यास पूण माहती होती

दुदैवाने त्यानं कोणल्याहि राज्यांचीं नांवे किंवा तेथील राजाची नांवें दिलीं नाहींत. त्याचप्रमाणें ल्यांवळीं चाललेल्या राजकीय घडा- मोडीबद्दलहि तो उल्लेख करीत नाहीं. त्यांजविषयीं त्यास माहिती असलीच पाहिजे. महमुदाच्या कोणत्याहि स्वारीचा तो उल्लेख करीत नाहीं. कनोज वैराण झालें आहे एवढेंच तो म्हणतो पण महमुदाच्या लुटीमुळें तसें झालें हें सांगत नाहीं. तसेंच सोमनाथ

१०८ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

सांगतांना महमुदाच्या नुकल्याच झालेल्या विलक्षण स्वारीचा, देऊळ उध्द्वस्त केल्याचा किंवा मूर्ति फोडल्याचा तो बिलकुल उल्लेख करीत नाहीं. प्रत्यक्ष समार घडलेल्या अशा महत्त्वाच्या वृत्तांचा उछेख न करणें अशक्य आहे असें कोणासहि वाटतें. तथापि कोणतेच राज- कौय वृत्त तो उल्लेखीत नाहीं हें निश्चित दिसतं. हें त्याचें मोन जाणून बुजून असावें. यामुळें या मोनामुळें अशा वृत्तांच्या सत्य- तेविषयी प्रतिकूल अगर अनुकूल कोणतेंच अनुमान निघू शकत नाहीं.

तथापि त्याच्या वरील भूगोठिक वर्णनावरून हिंदुस्थानची त्या- वेळची राजकीय स्थिति आपल्यासमोर चांगली उभी राहते यांत हेका नाहीं. प्रथम प्रतिहाराचें बलिष्ठ साम्राज्य त्यावेळीं अस्तित्वांत होते, आणि त्याच्या पूर्वेस बंगालच्या पालांचें मोंगीरचें राज्य होतें. भूतान, नेपाळ, वामरूप आणि तिरहूत याही राज्यांचा उल्लेख निघतो. दक्षिणेकडे केवळ चोलांचे नांव त्यानें सांगितलें आहे. यावेळीं मद्रास इलाख्याभर चोलांचे साम्राज्य निश्चित होते. कालंजरचें चन्दे- छांचे राज्य आणि त्रिपुरच्या चेर्दारचें राज्याहि दिसून येतें. त्याच- प्रमाणें मेवाड व माळवा यांच्या चितोड व धार राजधान्या उल्लेखित आहेत. नाहरवाला ( पाटण ) लाट, व कोंकण या तीन राज्यांचाहि चांगला निर्देश आहे. कछ व सिंधहि उछठेखित आहेत. बझान या शहराने आमच्या मतें सांबर अथवा मारवाडच्या चौहान राज्याचा निर्देश होतो. कनोजच्या उत्तरेस ( वायव्येस ) पानेपत, मीरत, थानेश्वर आणि कपित्थल यांचा उल्लेख योग्य रीतीनें आला आहे. येथे दिल्लींचा उलेख नाहीं हे योग्यच आहे, दिल्ली त्यावेळीं क्षुद्र जागा होती. कदाचित हें शहर अस्तित्वांतहि नव्हतें आणि तोमर राजाहे त्यावेळेस महत्त्वाचें नव्हते, लाहोर त्यावेळीं एका राज्याची किंवा महत्त्वाच्या प्रान्ताची राजधानी होतीं. जलन्धर आणि राजोरी हरी निराळीं राज्ये असावीं. यावेळीं काऱमीर बलाढ्य राज्य होतें आणि

हिंदुस्थानची राजकीय भूगोलिक माहिती. ११

कारमीरचें विस्तृत वर्णन येथें आहे. यानंतर कन्दाराची राजधानी वहिंड सिन्धूच्या पश्चिम किनाऱ्यावर सांगून शेवटीं काबूल व गझनी सांगितली आहे. यावेळीं हिंदुस्थानचे जे राजकीय विभाग होते त्यांचें वर यथायोग्य वर्णन आहे. महाराष्ट्र व कनीट राज्यांचा उल्लेख यांत आला नाहीं हें आपल्या लक्षांत येतें; पण आमच्या मतें त्यांचा निर्देश “ मराठ देश नर्मदेच्या दक्षिणेस ‘ या शब्दांत तसेंच वछह व दरवाड म्हणजे चाट्क्यांचें धारवाड या राब्दांत येतो.

टिप्पणी राजशेखरकृत हिंदुस्थानचे भूगोलिक वर्णन.

कनोजचा महीपाल ( प्रतिहार सम्नाटू ) याचा गुरू आणि राजकवि राजशेखर यानें ( ९१०-९४० ) आपल्या काव्यमिमांसा ग्रंथांत हिंदु- स्थानचा विस्तृत भूगोळ सांगितला आहे. बहुधा हा ग्रंथ किंवा यांत उल्लेखिलेला त्याचाच ‘ भुवनकोरा ? हा ग्रंथ शांभर वषानंतर (१०३० ) अल्बेरूनीनें आपला ग्रंथ लिहिला तेव्हां त्यापुढे असावा असें वाटतं. अलंकारशास्त्रावरील ग्रंथांत हिंदुस्थानचा भूगोळ कशाला आला याबद्दल कदाचित कोणास आश्चर्य वाटेल, परंतु कर्वानीं भूगोलिक चुक्या करू नये, कारण श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या मनाला धक्का पोचतो हं सांगून त्यांने हे भूगोलिक वणन केलें आहे. ( उ. काशी वणन करतांना गोदेच्या पाण्याचे वणन ऐकणारास कसेंसंच वाटेल ), कारची हिंदुस्था- नच्या पूवबभागांत आहे किंवा हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागाच्या लो- कांचा वर्ण भलताच दाखावैणें हेहि चुर्कांचें आहे असे त्यानें स्पष्ट म्हटलें आहे. ( भूगोलाच्या चुक्या। कर्वानें करूं नये, इतिहासाच्या केल्या तरी चालतील), कालिदासाने रघुवंश६सरीमध्यें रामाचा पूर्वज अज यास खयंवरांत इंदुमतीने वरिलें त्यावेळीं तिच्या दासीच्या तोंडी कृष्णाचा उल्लेख घातला आहे ही ऐतिहासिक चुकी आहे. पण सामान्य लोकांस इतके ज्ञान नसतें. कार्शीजवळ गोदा सांगितली तर ती त्यांस तात्काळ चमत्काररक वाटेल ). असो एवढें निश्चित आहे कीं काव्यामांसेतील हा

१२ गझर्नीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

भूगोलिक अध्याय ( सवंद्ध असो वा नसो ) फार महत्त्वाचा आहे. ज्या- प्रमाणें आमच्या पहिल्या काल विभागाच्या ( ६००–८०० इ. स. ) इतिहासास वराहमिहिराचें भूगोल-बर्णन महत्त्वाचें आणि दुसऱ्या काल- विभागाच्या इतिहासास (८००–१००० इ. स. ) स्कंधषुराणांतील हिंदुस्थान-वर्णन महत्त्वाचे, त्याचप्रमाणें या तिसऱ्या कालविभागांस (१०००–१२०० ) हं राजशेखरकृत भूगोलवर्णन फारच उपयोगाचे आहे, मात्र एवढें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं आमचे हे स्वदेशी ग्रंथकार अल्न्रेरूनीइतके विश्वसनीय नाहींत. कारण पूर्ण चोकस बुद्धीने ते लिहीत नाहींत. प्राचीन परंपरागत गोष्टी चालत आल्या तशा हलकी असोत किंवा नसोत, ते धुसडुन दिल्या शिवाय रहात नाहींत. त्याप्रमाणें राजदोखरनें पुष्कळ जुन्या देशांची नांवें आपल्या यादींत दिलीं आहेत. एवढी प्रस्ता- वना करून काव्यमीमांसा अध्याय १७ यांत राजदेखरनें दिलेली हिंदु- स्थानची भूगोलिक माहिती पुढें देतों.

हिमालयापासून दाक्षिण समुद्रापयंत भरतखंडास जो जिंकितों त्यास सम्राठू म्हणतात. आणि कुमारीपुरीपासून बेंदूसरापर्यंत सर्व देश जो जिंकेतो त्यास चक्रवती म्हणतात,

हिंदुस्थानांत मलयादि सात पवत ( कुलपवत ) आहेत. पूर्व पश्चिम समुद्रांमधील व हिमालय-विंध्य पर्वतामधील प्रदेशास आयावर्त म्हणतात- (या लक्षणांत आर्यावर्ताची मर्यादा पूर्वेस वाढवून त्यांत बंगाल सामील केला आहे ) या देशांतील लोकांपासून आचार शिकावा.

यापैकीं बनारसच्या पूर्वेकडील भागास पूर्वदेश म्हणतात. तेथीळ लोक म्हणजे देश अंग, कालेंग, कोसल, उत्सळ मगध मुद्रर विदेह नेपाल घुडू प्राराज्योतिष ताम्रलिस्ते मलळद मत्त वर्तक सुह्य ब्रह्मोचर इत्यादि आहेत, मोठे नद शोण आणि लोहितल्य आणि नद्या गया करतोया कशिपा इत्यादि आहेत, तेथील मुख्य वस्तु लवली ग्रंथपार्गँका अगरु द्वाक्ष, कस्तूरी वगैरे आहेत.

माहिष्मतीच्या दक्षिणेस दक्षिणापथ आहे. तेथील लोक महाराष्ट्र माहिषक अश्‍मक, विदभे, कुंतल, क्रथकेशिक, शूर्पार, कांची, केरल, काबेर, मुरल. वनवासिका, सिंहल, चोड, पाण्डव, पलव, गग नासिक्य

हिंदुस्थानची राज़कीय भूगोलीक माहिती. १३

कुंकण, कोल्गिरि, वलछूर, वगैरे आहेत तेथील नद्या नमदा, तापी,

पयोष्णी, गोदावरी, कावेरी, भीमरथी, वेणा, वजुरा, तुंगभद्रा, ताम्न- पणी, उत्पळवती, रावण, गगा वगैरे होत उत्पन्न होणारे विशेष पदार्थ म्हणजे मल्यावरील चन्दन आणि मोर्ती.

देवसभा नदीच्या पाश्चिमेस पाश्चिमदेश, तेथील लोक म्हणजे देवसभा सुराष्ट्र, दासेरक, त्रवण, भुगुकच्छ, कच्छ, आनार्त, अबुंद, ब्रह्मवथ, यवन वगैरे होत नद्या सरस्वती प्रभावती, मही, हीडरा वगेरे आहेत, तेथील विशेष उत्पन्न होणारे पदार्थ करीर, पाळ, गुगुल, खजूर व क्रमे” लक ( उट ) होत.

पृथूदकाच्या उत्तरेस उत्तरापथ-तेथील लोक शक, केकय, बोकण, हूण, बपायुज, काम्बोज, वाल्हिक, बलव ल्िम्पाक; कुलूत; कीर; तंगंण; तुषार; तुरुष्क, हारहूण, हूहूण, साहुड, हंसमार्ग, रामठ; करकण्ठ इत्यादि राह- तात. नद्या गंगा, सिन्धु, सरस्वती, शतद्र, चन्द्रभागा, यमुना, ऐरावती, बितस्ता, विश्यापा, कुहा देविका इत्यादि. उत्पन्न होणाऱ्या विशेष वस्तु सरळ देवदारु, रुद्राक्ष, कुंकुम, चमर, अजिन, सोवीर, खोतोजन सेंधव आणि घोडे.

“ या चार देशांच्यामर्धाल प्रवेश मध्यदेश होय, ” दुःखाची गोष्ट ही कीं मध्यदेशाबद्दल त्यानें वरप्रमाणें सविस्तर वर्णन न करतां एवढेंच म्हटलें आहे का, येथीळ लोक, नद्या व उत्पत्तचे पदाथे सवांस ठाऊ- कच आहेत. यामुळें पुढीच काळाचे लोक या महत्त्वाच्या मार्हातीस मुकले.

“ हंगा यमुना मधील प्रदेश बिनदानाच्या पूर्वेस आणि प्रयागाच्या पाश्चिभेस अन्तर्वेदी होय, या देशाला उद्देद्दून दिशा सांगाव्या असे प्राचीन ग्रंथकार सांगतात, मी ( यायावर गोत्री ) असें आणखी श्षांगतो कीं यांतहि महोदय ( कनोज पासून दिशा व अन्तर सांगावी.

निरनिराळ्या देशांतील लोकांचे वण येणे प्रमाणें, पूर्वक्डाल लोकांशा सांवळा, दक्षिणेकडी लोकांचा काळा, पश्चिमेकडील लोकांचा पाण्डु आणि उत्तरेकडील लोकांचा श्वेत. कर्वाच्या वर्णनांत सांवळा आणि काळा यांत फारसे अन्तर नाहीं. तसेच पांण्डु व श्वेत यांत नाहीं, विशषष गोष्ट हीं कीं पू्वेकर्डाल देशांतील रजपूतादि स्ियांचा वर्ण गोरच दाख-

१४ गझर्नाच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

बावा पाण्डु [कंवा श्वेत ). त्याप्रमाणे दक्षिणिकडील लोकांतहि दाखवावा.

वरील वरणांसंबंधींची विधानें महत्त्वाची आहेत, यावरून असे दिसतं कीं पूर्वेकडील व विशेषतः दक्षिणेकडील लोकांत जास्त भरणा द्रविडी- वंशाच्या लोकांचा असतो. आणि पाश्चिमेकडीकडे व विशेषतः उतरेकडे आर्य वर्णांचे लॉक जास्त आहेत. दक्षिण व पूर्व इकडेहि वरिष्ट जातीचे ळोक रजपूत-ब्राम्हण वगेरे पाण्डु किंवा गोर वणांचे असत हें विधान आजामितांस या चारी प्रान्ताच्या लोकांस लाणू पडतें,

उत्तरेकडील लोकांत काश्‍मीर व काबूल मुख्य आर्यदेश यांचा उल्लेख नाहीं याचें आश्चर्य वाटते. आणि जे लोक सांगितले आहेत ते बहूतेक तुराणी जातीचे किंबा तुराणी-आर्य मिश्र जाति आहेत, यवनांचा उल्लेख पश्चिमेकडे आहे, अर्थात ते सिंधचे आरब मुसलमान होत. दहाव्या शत- काच्या प्रारंभीं काबुल अद्याप यवनानीं किंवा तुर्कानीं जिंकले नव्हते. ज्या वेळीं राजशेखरानें हा ग्रंथ लिहिला त्या वेळीं काबूलनें अद्याप पंजाब जिंकले नव्हतें, परंतु काइ₹मीरचा उल्लेख येणें जरूर होतें. त्याचप्रमाणें त्रिगतजालंदराचा. पंजाबच्या नद्या सर्व सांगितल्या आहेत; ( काबुल नदी ) ही सांगितली आहे; व उत्पन्नांत मीठ व केशर पंजाब व कारमी- रच्या वस्तु यांचा उल्लेख आहे.

प्रकरण २ रे. बुखाऱ्याचें सामानी बादशहा.

  • “णाय

गझर्नांच्या तुर्की राज्याची संस्कााते आणि शाक्ति नीट टक्षांत येण्यासाठी ज्या सामानी बादशाहीखालीं गझनीचे राज्य उत्पन्न होऊन वृद्धि पावलें त्या बादशाहीची माहिती वाचकांस होणें अवश्य आहे, रा. ए. सो. च्या जनेळ बंगाल जिल्द १५ भाग १ मध्यें एका लेखकाने उतबीय इतर इतिहासकार यांतून माहिती एकत्र करून सामानी बादशाहा संबंधें एक लेख लिहिला आहे, त्यांतन पुढील त्रोटक हकीकत आम्ही देतो. हं साम्राज्य एका पारशी जर- तुष्ट धर्मी पण पुढे मुसलमान झालेल्या एका सरदारानें स्थापिले. त्यांचे नांव असद. त्याचा पुत्र अहमद हा ज्यास्त पराक्रमी होऊन त्यानें समरकंद, वुखारा, आणि या प्रान्तावर सत्ता बसविली. त्याचा पुत्र नसर. त्याचा पुत्न इस्माइल हा सामानी वंशाचा पहिला प्रख्यात बादशाह इ स. ९०३ मध्यें गार्दावर आला. यानें शास्र आणि वाड्ययमम ( पर्शियन व आरबी ) यांचा पुरस्कार केला आणि बोखारा शहर प्रख्यातीस आणिलें. या बादशहांस अमीर म्हणत. ही संज्ञा पुढें छोटे जागीरदाराहि घेऊं लागले. सबुक्तगीनानेंहि हीच पदवी धारण केला व तेथून हिंदुस्थानांत हम्मीर या स्वरूपाने आली. इतिहासकारानीं इस्माइलापासून प्रत्येक अमीरास एक विशिष्ट विशेषण लाविळें आहे. या पहिल्या बादराहास अमीर ‘ माजी ‘ असं म्हणतात. याचा पुत्र अहमद, अमीर शहीद ( धर्म यद्धांत मेल्यानें ) या नांवानें प्रसिद्द आहे. याचा पुत्र नस ( दुसरा ) अमीर

१६ गझर्नाीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

सईद किंवा गंभीर हें नांव पावला. या राजाच्या अमदानींत एक तांब्या पितळ्याचे काम करणारा (कासार) याकूब-इ-ठेस या नांवा- चा मोठा धाडसी उपद्व्यापी वीर उनाड लोकांची टोळी जमवून हिंदुस्थानावर चाळून आला. त्यानें प्रथम हिरात घेतलें ( ३०१ हि, ९१२इ. स,).या वेळचें हिंदुस्थान म्हटलें म्हणजे बहुतेक सर्व अफगा- णिस्तान व्यापून होतें हें लक्षांत ठेविलें पाहिजे.या सिन्धु-पश्चिम भागांचे काबुलिस्तान व झाबुलिस्तान असे दोन प्रान्त होते. ह्मणजे काबुल व झाबुल यांपैकी उत्तरेकर्डील काबुल प्रान्तांत लॉल्लिय यांनें स्थापित केलेला ब्राह्मण शाही वंश राज्य करीत होता. ( ठलछिय ऊफ कछर भांग १ पृ. पाहा ) दक्षिणेकडील झाबुल प्रान्तांत भाटी जातीच (बहुधा) क्षत्रिय राजे राज्य करीत होते.याकुब इ ठेसने झाबुल घेतले इतकेच नव्हे तर काबुलहि घेतले आणि त्या दिवसापासून काबुलचा किल्ला मुसलमानांच्या ताब्यांत राहिला, हिंदूनी परत घेतला नाहीं. कावु- लच्या शाही हिंदु राजांनीं शहर परत घेतलें आणि त्यांनीं आपली राजधानी सिन्धु नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर्रीळ वाहिंड ( उद॒भांड) येथे केळी. या राजधानी विषयी आम्ही पुढें अधिक सांगणार आहां याकूब इचेस यानें गझनी ( एक लहान खेडें ) जवळ किल्ला बांधून गझनी शहराचा पाया घातला. भांवताळचा सर्वे झाबुलिस्तान प्रान्त जिंकून रजपूतांस पूर्वस हाकून देळें. हे भाटी रजपूत सिंधु ओलां- डून पंजाबांत येऊन राहिले. हा हछीच्या अफगाणिस्थानाचा भाग त्या वेळच्या इतिहासांत रहभतांचा देश म्हणून प्रसिद्ध आहे.पर्शियन लिपींत रजपृतबद्दळ रहृभूत वाचले गेळे असल्यानं ही चुकी स्पष्ट- पणें झालेली दिसते ( रव्हटींचा अफगाणिस्थान पहा ). परंभु याकुब इळेस यास सामानी राज्यास हाकून देता आले नाहीं किंवा गझनी येथें राजा स्थापिता आळे नाहीं. तो धमकेतूमप्रमाणें कांहीं दिवस तपली आणि मग अठऱय झाला

बुखाऱ्याचे सामानी बादशाहा. १७

नसर दुसरा याचा पुत्र नुह्ह यास अमीर हमीद संज्ञा आहे. या शद्वाचा अथ स्तुत्य असा आहे ( ३३४ हिस९४३ इ.). याच्या वेळीं प्रथम तुकी गुलाम नोकरींत राहून वर्चस्व स्थापूं लागले. प्रथम सामानी राजांनीं यांस आपले रक्षक ( (81-१5 ) म्हणून ठेविळे. जक्झर्तीस नदी सरहद्द असून पलीकडील तर्क लोक सैन्यांताहि भरती होऊ लागले. तुर्की मुलें गुलाम म्हणूनहि विकत घेतले जात आणि उर आणि धाडसी वीर तरुण तुर्की गुलाम फौजेत अधिकाराच्या जागेवरहि नेमळे जाऊं लागले. प्राच्य देशांच्या इतिहासांत परकी लोक रक्षक म्हणून किंवा सैन्यांत भरती होऊं लागले म्हणजे रक्षि- ताचा किंवा नेमणाऱ्यांचा नाश अखेर होतो असं दिसते. या- प्रमाणें बुखारा येथील पर्शियन ( सामानी ) राज्याचा तुकांनीं नाश केला व गझनी येथें आपले राज्य स्थापिले; या गझनीच्या राज्याचा नाश (दिछी येथील ) अफगाणांनीं केला; दिल्ली येथे अफगाणांचा अशाच रीतीनें मोंगलांनीं रक्षक होऊन नाश केला,मोंगलांचा मराठ्यांनी आणि मराठ्यांचा इंग्रजांनीं पुणें येथें केला. तात्पर्य जें राष्ट्र किंवा राजकुलळ परकायांस सैन्यांत भरती करून ल्यावर आपली भिस्त ठेवतें तें ल्यास गेळेंच पाहिजे, मग तें सैन्य थोडें का असेना £ नूहूच्या अमदानींत घडलेलीं एक मनोरंजक गोष्ट येथ सांगण्या- सारखी आहे; त्यावरून एखादा न्यायी पण कडक मंत्री असं- तुष्ट सरदारांच्या रोषास कसा बळी पडतो हें वाचकांस दिसेल. राजवाड्याचा समोर दोन सुरूच वृक्ष होते त्यांस जोराने वाकवून एका आप्रिय झालेल्या नूहूच्या मंत्र्याच्या दोन्ही पायांस बांधले आणि मग ते सोडून दिले, तेव्हां साहजिकच ते सरळ उभे होऊन ल्या मंत्र्याचे हारीर वर उचलळें जाऊन फाडलें गेळे, इतिहासकार म्हणतो २

१८ गझर्नाच्या महझुदाच्या स्वाऱ्या.

कीं “ न्यायीपणाचा अतिरेक अथेन्सप्रमाणें बुखारा येथेंहि प्राण- घातक झाला. ” र

नूहूच्या पश्चात्‌ त्याचा पुत्र अबदुल मलिक बादशाह झाला. यास अमीर रशीद ( धर्मस्थिर ) असें नांव मिळाळें आहे व त्याच्या नंतर मनसूर गादीवर आला (३४९ हि० ९५९ इ. ). यास अमीर सर्दीद ( धीर ) म्हणतात. याच्या वेळीं बलिष्ठ तुकी सरदार स्वतंत्र लहान राज्यें स्थापूं लागळे. अबदुल मालिक याचा हाजिब ( द्वार- रक्षक ) अटप्‌तगीन तुर्क होता ल्याने याप्रमाणें गझनींचे लहान स्वतंत्र संस्थान स्थापिळें. याचा गुलाम सबुक्‌तगीन हाह्वि कांहीं दिवस सामानी बादशहांचा प्रतिहार होता

मनसूरच्या मागून नूहू दुसरा राज्यावर आला याने ९८६ इ पासून १००१ इ, पर्यंत राज्य केलें. यापूर्वीच अल्पतगीन मरण पावून ल्याच्या नादान मुलास बाजूस सारून तुर्की अमलदारांनीं ह्याचा जावई सबुक्‌तगीन यास गझनीच्या राज्यावर बसाविळे होतें. सबुक- तगीन मोठा शूर असून अत्यंत न्यायी होता. ही योजना नूहुनेंहि मान्य केली. पुढें जेव्हां काशगार येथील तु्कांचा राजा इठेकखान यानें बुखाऱ्यावर स्वारी केली तेव्हां नूहने सबुकतगीनची मदत मागितली. आणि आपल्या धन्याच्या मदतीस सबुकतगीन मोठी फौज आणि इिंदुस्थानच्या राजापासून मिळाविळेळे तीनशे हत्ती ( याची हकीकत पुढें येईल ) घेऊन स्वतः गेला. या युद्धांत सबुक- तगीनचा पुत्र मइमृद ह्वा लह्वान होता तरी हाजर होता व ल्याने लढाईच्या कसबांत आपला पहिला धडा घेतला, या लढाईंत इठेक- खानाचा पराभव झाला. आणि बादशाह नूहूने संतुष्ट होऊन सबुक्‌तर्गांनास नसौरुद्दाला ( दोळतींचा आधार ) ही पदवी दिली आणि महमुदास सैफउद्दोळा ( दौलतीचा खडग ) ही पदवी दिली.

काऱगारच्या तुर्कांचा याप्रमाणें पराभव झाला तरी सामानी बाद-

बुखाऱ्याचे सामानी बादराहा. १९

शाहांचें दिवस मोंजके बाकी होते; व राज्यांत नोकर झालेले तुक आणि राज्यावर बाहेरून स्वाऱ्या करणारे तुर्क यांनीं ब्यांचे राज्य लौकरच ल्यास नेळें. या नाशाच्या पायऱ्या मनोबेधक आहित. नूह मरण पावून त्याचा पुत्र मनसूर गादीवर आला परंतु लौकरच त्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे डोळे काढले आणि गादीवर एक मूळ अबदुल मलिक बसविलें. ही संधि साधून इलेकखानानें वुखाऱ्यावर पुन्हा स्वारी केली आणि शहर काबिज करून बादशाहाच्या प्रत्यक वारसास पकडून केदेंत टाकळे. पण मुंतसिर नांवाचा एक वारस राजपुत्र स्रीच्या वेशानं कैदेंतून पळाला. त्यानें राज्य परत मिळवि- ण्यासाठी शूरत्यानें अनेक प्रयत्न केळे. परंतु दारा शिकोह प्रमाणेच तो दुर्देवी असल्यानें ह्याला जागजागी अधिकार्‍्यांनीं, किंबहुना महमुदाच्याहि अधिकाऱ्यांनी विरोध केल्यामुळें एका शहरांतून दुस- ऱ्यास या प्रमाणें सारखें पळावें लागलें. शेवटीं जंगलांत एक अरबांचा तांडा पडला होता त्यांत आश्रय घेण्यास तो गेला. रात्रीं तांड्याच्या मुख्यानें त्याजवर हछा करून त्यास ठार केलें. आपल्या पूर्वीच्या मालकाबद्दळ महमुदास बराच आदर असल्यानें ब्यानें या गुन्हेगारास पकडून ल्यास हालहाळ करून मारिले. याप्रमाणे सामानी वंशाचा आणि राज्याचा अन्त झाला.

सामानी राज्याची संस्कृति व राज्यव्यवस्था साहाजिकच गझनीच्या राज्यांत वारसदारीनें आली. सामानी साम्राज्य फार मोठें असून त्यांत खोरासान आणि मवारुनहर हे मुख्य प्रान्त असून शिवाय सीस्तान, कर्मान्‌ , जुर्जान, रे, तबरिस्तान वगेरे आणखी मुळूख सामील होते. सामानी राजांच्या राज्यकाळ इस्माईलपासून इंभर वषें असन वर दोन वर्षे आणि १६ दिवस असा नक्की, तारीख- इ–यमीनी ( यमीन म्हणजे महमूद याचा इतिहास ) या प्रंथांत उतबीनें दिला आहे. ( उतबीनें प्रत्येक राजाचें नांव व पदवी

२० गझनाच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

व दिवसांसह राज्यकाळ आपल्या ग्रंथांत दिला आहे ), म्हणजे इ. स. ९०३ पासून सुरू होऊन १००७५मध्यें हे साम्राज्य ल्यास गेलें. या साम्राज्याचे पुष्कळ भाग महमुदाने जिंकून आपल्या राज्यास जोडले हें साहजिकच होते. मख्यतः खोरा- सान आणि ख्वारिझम हे सुपीक भाग या अर्वाचीन पार्शी- यन साम्राज्याच्या संस्कृतीचे केन्द्र होते, ते महमुदानें प्रथम जिंकून आपल्या सत्तेखाढी आणिळें. पार्रियन भाषा या प्रान्तांतीळ विद्वानांनीं या वेळीं फार उर्जेत स्थितीस पोंचविली. अर्थात्‌ हिंदु- स्थानच्या मध्ययुगीन काळांत अन्तर्वेद आणि कार्मीर व त्याहून अर्वाचीन काळांत महाराष्ट्र ज्याप्रमाणें पंडितांचे प्रान्त होते त्याप्र-

माणे सामानी काळांत खोरासान व ख्वारिझ्षम हे प्रांत विद्वानांचे .

वसतिस्थान होतें. अथात्‌ विद्वान लोक या प्रांतांतून गझनीच्या दर- बारांत व पुढें दिछीच्या दरबारांत येत राहून मान व अधिकार पावत. यामुळेंच सरकारी कामाची सामान्यभाषा गझनी व दिल्ली या दोन्ही ठिकाणीं पर्शियन होती आणि आरबी भाषा धार्मिक कामाची व पर- राष्ट्रीय किंवा विशेष महत्त्वाच्या राजकीय लेखांची भाषा होती. राज- व्यवस्थेची पद्धत आणि अधिकाऱ्यांची नांवें बोखाऱ्यांतूनच घेतलीं गेली यांत नवळ नाहीं. या स्थितचिं आणि भरतखण्डांत मध्य- युगीन कालांत असलेल्या स्थितींचें बहुतेक साम्य आहे. मध्ययुगीन हिंदुराज्यांत संस्कृत (आरबाप्रमाणें) राजकीय महत्त्वाच्या लेखांची भाषा होती. दरबारांत विद्वान लोक प्राकृत भाषा ( पर्शियन प्रमाणे) बोलत

आणि सामान्य लोक यावेळी अस्तित्वांत आलेल्या संस्कृत-प्राकुृत-मिश्रित हल्लींच्या लोकभाषा हिंदी,मराठी वगेरे बाळत. गझनीमध्ये तीन भाषा या वेळीं चाळत. धमोकारितां आरबी, वरिष्ट लोकांच्या दरबारी व्यवहारांत | पार्हदीयन आणि फौज व गुलाम यामध्यें तुकी भाषा चाले. बैहकीच्या ।

बुखाऱ्याचे सामानी बादशहा. २२

ग्रंथावरून असें दिसतें कीं महमूद सुद्धां नोकरांशीं जेव्हां कांहीं खासगी बोलावयाचे असे तेव्हां तुर्की भाषेंत बोले.

गझनी राज्याची स्थापना.

जं गझर्नाचें राज्य पुढें महमुदाचे वेळीं इतके बलिष्ट झाले कीं, पश्चिमेकडे खरासान, ख्वारिझम वगेरे प्रांत व पूर्वेकडे सबंध पंजाब प्रान्त त्याच्या सत्तेखालीं आले, तें प्रारंभीं अल्पतगीन यानें स्थापिले हं वर आलें आहे. बुखाऱ्याचा सामानी बादरहा मनसूर याचा तो सर- दार होता. महमुदाचा इतिहास शिवाजीच्या इतिह्वासाशीं इतका जुळता आहे कीं त्यांचे बाप ब आजे यांचेहि इतिहास सारखे आहेत. भोसल्याच्या राज्याचे केंद्र महाराष्ट्रांतील जागा जशी प्रथम माळोजीला मिळाली, त्याप्रमाणें गझनीच्या साम्राज्याचे केंद्र गझनीची जागीर प्रथम अल्पतगीनानें संपादन केली. तो प्रथम मनसूरचा बाप अबदुळ मलिक याचा हाजिब ( द्वाररक्षक ) होता. तो नंतर खुरासानचा सुभेदार झाला, अबदुल मलिक वारल्यावर गादीवर मनसूर बसते वेळीं त्यास त्यानें विरोध केला, त्यामुळें त्यास सामानी साम्राज्य सोडावें लागलें. हिंदुस्थानाच्या प्रान्तांत शिरून त्यानें प्रथम गझनी येथें लहान राज्य स्थापिळे. त्याचा गुलाम सबुकतगीन प्रथम त्याप्र- माणें सामानी बादशहाचा द्वाररक्षक होता; व त्यास त्यानें आपली मुलगी दिली होती.जरी गझनीची जागीर त्यानें स्वतः कमाविळेली होती तरी तो भापल्यास सामानी बादरशाहांचा मांडलिक समजत असे, शाह्वाजीनें त्याचप्रमाणें पुणें व सुपे ही जागीर स्वपराक्रमानें निजाम- शाहींतून मिळविली होती तरी तो आपल्यास व आपल्या जागीरीस विजापुरकराच्या सत्तेखालील मानीत असे. सबुकतगीनाजवळ चांगली तयार फौज असल्यामुळें त्याचा मान व अधिकार सामानी दरबारांत मोठा असे; त्याचप्रमाणें शह्याजीजवळाहि निवडक ब कसलेली फौज

२२ गझर्नाच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

असल्यानें विजापुर दरबारचा तो एक महत्त्वाचा महाली होता. आणि सबुक्‌तगीन सामानी दरबारच्या शात्रशीं लढण्यांत नेहमीं गुंतला असे, ज्याप्रमाणें शाहाजी विजापुरकराच्या शत्रशीं नेहमीं लढण्यास जाई. यामुळें राहाजीप्रमाणें सबुकृतर्गानार्साहे बऱ्याच आणखी विस्तृत जागिरी मिळाल्या. बहूतेक अंशीं ते दोघोहि स्वतंत्र सत्ता- धारी होते तरी दिसण्यांत ते आपल्या वरिष्ट बुखारा किंवा विजापुर येथीळ सत्तेचे मांडलिक असत. दोघांनींहि स्वतंत्र राज्याचा पाया घाळून त्याची जरूरी सामुग्री (फौज व मुंळूख ) संपादन केली होती; परंतु त्या दोघांनीं आपल्या आयुष्यांत स्वातंत्र्य पुकारण्याची महत्त्वा- कांक्षा धरली नाहीं. हे कार्य दोघांनींहि आपल्या पुत्रांवर टाकून स्वातंत्र्यस्थापनेचें श्रेय पुत्रांस दिलें.

सबुकतगीनाची नेहमींची पदवी अमीर असून इलेकखान तु्कांचा पराभव करण्याबद्दल बादशहा नूहूनें त्यास नासिरुद्दीन हा खिताब दिला होता. महमुदाच। समकालीन इतिहासकार अल॒उतबी सबुक्‌ृतगीनास नेहमीं नासिरुददीन या नावानें संबोधितो. त्याच्या न्यायीपणाची आणि शिस्त राखण्याची उदाहरणें पुढें देऊं. एका तुर्की शिपायाच्या हातांत कोंबड्या पाहून, कोठून आणल्या विचारतां विकत घेतल्या असा जबाब विळाला. दाखविलेला विकणारा विचार- पृस करतां म्हणाला “’ तुक शिपाई कधींच पैसे देत नाहींत.!’ तेव्हां सबकतर्गीनास अतिशय राग येऊन त्यानें त्या तुर्की शिपायास सव फौजे समोर उभा करून त्याच्या कानास भोकें पाडून ल्या कोंबड्या त्याच्या कानांस लटकावल्या, अर्थात्‌ त्यांच्या फडफडण्यानं त्याचा जीव अध मेला झाला. अज्ञा कडक शिस्तीने त्या अडदांड तुकास त्यानें आपल्या कह्यांत ठेविळें आणि लोकांच्या उत्कषीत भर टाकली.

अशा न्यायी राजास आणि विशेषतः महमुदाच्या बापास उत्तम कुळांत घालणें हें लोककल्पनेला साहार्जक पसंत वाटलें.

बुखाऱ्याचे खामानी बादशहा. र्र

असें मानतात कीं सबुकूतगीन हा अल्पतर्गानचा गुलाम असला तरी तो एका तुकी सरदारांच्या कुलांत जन्मला असून हें कुळ पर्डियन लोकांचा शेवटचा बादशाह यझइदगिर्द याच्या एका मुलीपासून उत्पन्न झालें होतें. ही गोष्टहि शहाजीप्रमाणेंच दिसते, आणि रशहा- जीच्या कालींच तो शिसोदिया रजपुतांच्या वंशांतील आहे असें मानलें गेळे, उच्च वंशात सबुकूतगीन जन्मला असल्याची हकीकत खुद्द महमुदानें सांगितली ( तबकात नासिरी ). महापुरुषाची उत्पत्ति एखाद्या विख्यात कुलांतच झाली पाहिजे अशी अवश्यकता नाहीं. परंतु राष्ट्राच्या महापुरुषांना विख्यात कुलोत्पत्ति, कल्पित किंवा खरी, सांगितल्यारिवाय लोकसमजुतीचे समाधान होत नाही. असो, ही यज्दगिर्दाच्या वंशातील उत्पत्ति खरी असो वा खोटी असो शहाजी ब सबुकतगीन यांचें साम्य याहि बाबींत दिसतें.

लोकसमजुतीर्न ज्याप्रमाणें रिवाजीस देवाचा अवतार मानतात त्याचप्रमाणे मुसलमान लोक महृमुदाच्या जन्मासंबंधानेंहि दैवी अश मानतात. कारण जसा हिंदूना शिवाजी धमंदृष्टया प्रिय आहे तसा धर्मदृष्टया मुसलमानांना महमूद प्रिय वाटतो. सबुक्‌ूतगीन शिकारीस गेला असतां एक हरिणाचें पाडस त्यास मिळालें. तें घोड्यावर घेऊन तो घरीं येऊं लागला. तल्या पाडसाची माता घोड्यामागें दूरवर धांवत येत असलेली पाहून सबुक्‌तगीनाच्या अन्तःकरणांत दया उत्पन्न झाली व त्या मातेची कीव करून त्यानें तें पाडस सोडून दिलें. त्यास स्वभांत रात्री पैगंबर दिसून त्यानें त्याच्या या दयाशील कृत्याची प्रशांसा केली व ल्यास मोठें राज्य मिळेळ असा आशीवाद दिला. अशीहि आख्यायिका आहे की, महमुदाचा जन्म झाला त्या रात्रीहि सबुक्‌तगीनास एक भाविवेभवसूचक स्प पडलें व आपल्या स्वये- पाक घरांतून एक प्रचण्ड वृक्ष उत्पन्न झाला असें दिसलें. हें स्पप्न तो मंत्र्यास सांगत असतां महमुदाच्या जन्माची त्यास खबर पोचली.

.1:) गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

पैगंबर ज्या वारी उत्पन्न झाळा तो वार ते दिवशीं असल्याने सवुक्‌- तगीन उद्गारला, “ मी पुत्राचे नांव महमूद ठेवितों.. ‘! अशा गोष्टी वीरांबद्दळ त्यांच्या महत्वप्राप्तीनंतर उत्पन्न साहजिकपणें होतात हें सांगावयास नको. तिसरी आख्यायिका अशा आहे कीं ज्या दिवशीं महमूद जन्मला त्या दिवशीं वहिंड शह्रांतीळ मुख्य देवालय खालीं पडलें. मुहम्मद पैगंबराच्या जन्माबरोबर पदियन बादशहांच्या राज- वाड्यांतीळ आतशधघर धरणाकंपानें नष्ट झाळे या आख्यायिके- सारखी ही गोष्ट असून यावरून असें सूचित केलें जाते कीं हिंदु लोकांच्या मू्तिपूजेवर महमूद आपल्या आयुष्यभर हला चढविणार. या आख्यायिका नमूद केल्यावर ऐतिह्यासिक दृष्टया वर्णन करावयाचें म्हणजे तबकातनासिरीमध्यें महमुदाची जन्मातिथि हिजरी स. ३६१ मोहरम ता. १० अशी दिली आहे. ही तिथि म्हणजे इ. स. ९७१ आक्टोबर २ होय (इालियट २ पा. २६१). परंतु फिरिता हि. २५७ मुहरम ८ ही तिथि देतो ( सदर). ही तारीख चार वर्षे सुमारें अगोदर पडते. ( आश्चर्याची गोष्ट कीं शिवाजीच्याहि जन्ममिती बद्दल दोन मतें असून त्यांत तीन वर्षांचा फंरक आहे. )

सबुकतगीनानें ९७७ इ. पासून ९९७पर्यंत राज्य केलें. त्यानें आपलें राज्य दक्षिणेकडे कन्दहार व झाबुलिस्तानची राजधानी बस्त जिंकून वाढविले होतें. पूर्वेकडे हिंदुस्थान होतं तिकडेहि राज्य वाढ- विण्याचा त्यानें प्रयत्न केला होता. हिंदूंचा आणि तुकांचा लढा मुख्यतः सबुक॒तगीनच्या वेळीं सुरू झाला. या बाजूकर्डील त्याचा शेजारी समकालीन राजा जयपाळ हा होता. या जयपाळाचें वर्णन मुसलमानी तवारखांत हिंदुस्थानचा राजा, काबुळचा राजा, आणि . लाहोरचा राजा असं निरनिराळ्या तऱ्हेचे येतें. तेव्हां हा राजा कोण व कोठील होता हं पुढील टिप्पणींत ठरविलें आहे, कारण सर व्हिन्सेंट

बुखाऱ्याचे सामानी बादराहा. ‘ २५

स्मिथ पर्यंत सुद्धां हा प्रश्‍न आनोाश्वित दिसतो आणि निरनिराळीं मतें आपल्या दृष्टीस पडतात.

टिप्पणी-हिंदुस्थानचा राजा जयपाळ.

मुसलमान इतिहासकारांनी सांगितलेला “ हिंदुस्थानचा राजा जय- पाळ ” हा कोण व कोर्ठाल होता £ आमच्य मतें स्पष्टपणें हा काबूलचा शाही ब्राम्हण राज्ञा जयपाल होय, पूर्वभमाग (प्र. १५७ पा. २०२) यांत वर्णिलेल्चा लल्निय राजानें स्थापिलेल्या शाही राजघराण्यांतील चौथा राजा जयपाल हाच मुसलमान तबारिखांचा जयपाल होय असें स्पष्ट दिसते. परंतु ह स्पष्ट व साहजिक अनुमान हलला आघारभूत मान- लेल्या सर व्हिन्सेंटास्मिथ यांच्या हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास या पुस्त- कांत अमान्य केलें आहे. या पुस्तकाच्या १९१५च्या तिसऱ्या आवृतींत खुढील मजकूर आहे. “ या काळांत जयपाल नांवाचा राजा पंजाबांत राज्य करीत असून याची राजधानी भटिंडा होती. हें शहर लाहोरच्या दक्षिण नेक्चत्य दिशेस आणि पतियाळाच्या पाश्चिमेस आहे.याचें राज्य सिन्धु नदीचे वरील खोरें तसेच पंजाबचा बहुतेक प्रदेश सिन्ध प्रान्ताच्या उत्त- रेस पश्चिमडोंगरापासून पूर्वेस हक्रा नदीपर्यंत इतक्या मुलुखांवर होतें. ” हें या प्रदेश्याचें वणेन जरी बहुतेक बरोबर आहे तरी यांत गर्भित रीतीनें असे दाखविलें आहे कीं हा राजा आणि पूर्व-वर्णित काबुलचा ब्राम्हण राजा जयपाल ह्या भिन्न व्याक्ते होत. या पानावरील (प्र. ३८२ खालच्या) टिपंत स्मिथ आणखीं असं म्हणतो की“ हल्लांच्या मताविरुद्ध असलेले हं संक्षित विधान रव्हटींच्या मतानुसार दिलें आहे” याचा ज्यास्त खुलासा स्मिथनें इं. अ. व्हा. ३७ (१९०८) यांत चन्देलां- विषयीं जो लेख लिहिला आहे त्यांत केला असून तेथे “ तबकात-इ– नासिरी ! या ग्रंथाचे रवह्टींनें केलेल्या भाषान्तराचा हवाला ‘ बाहेंडा बरील टपित असा दिला असून आपल्या टीपेंत आणखी असे म्हटलें आहे कीं जयपाल म्हणजे वाहिंडचा जयपाल असें जे मिस डफनें आपल्या “(]1*010102४? या पुस्तकांत म्हटलें ते चुकीचे आहे, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास प्र. ३८३ खालील टिपत स्मिथ आणखी

२१९ गझर्नाच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

असे म्हणतो काँ ओहिंड येथील राजवंश आणि भटिंडा येथील राजवंश यांचा इलिंगटनें घोंटाळा केला आहे. आणि यामुळें त्यानें दिलेली सर्व हकीकत दुर्बोध झाली आहे. ” परंतु रव्हर्टांने दिलेली वरील टिपेतील प्रमाणें व त्याचप्रमाणं या विषयावर जो पुरावा हल्लीं उपलब्ध आहे त्यां- तील प्रमाणे यांचा विचार करतां आम्हास असें वाटतें कीं या जयपा- लाचें जे एक निराळे राज्य स्मिथने स्थापेत केलें आहे तें चुकीचं असून पूर्वीचे इुलियट व मिस डफ या लेखकांचे मत ग्राह्य आहे. याची मिमांसा पुढील प्रमाणें.

प्रथम हें सांगणें अवश्‍य आहे काँ रव्हटीं याने जो हा नवीन राजा कल्पिला याचें कारण असं दिसतें का नासिरी ग्रंथांत वाहिंडच्या ऐवजीं वामंड असे वाचले गेलें. हा शब्द प्रथम नासिरी ग्रंथांत पुढील वाक्यांत आला आहे.“ ज्या दिवर्शी महामुदाचा जन्म झाला त्या दिवर्शी प्ावर- मर्धाल इंडम्रनर्दाच्या कांठीं वामंड शहरांत एका मूतींचे देवालय पडलं ” रंव्हटींने हे देवालय सिंन्धुनर्दीच्या पूर्वेस असलं पाहिजे असे मानून वामंड हें नांब निरनिराळ्या तऱ्हेने वाचण्यांचा प्रयत्न केला. येथे हे सांगितले पाहिजे की पार्शृ॑यन लेखांत व कित्येकदां आरबी लेखांतहि हिंदी नांवांचा थोग्य उच्चार करण्यांत टिंबें गाळलीं गेल्यानं वारंवार घ्वुक्या होतात; कारण ब, प, त, न हां अक्षरे - विशिष्ट टिंबें गळल्याने सारखींच दिसतात, तसेच व आणि द यांचाहि घोटाळा होतो आणि ह, च, ज यांचा भेद राहत नाहीं. कित्येक तक॑ केल्यावर कनल रव्हर्टीनें शेवटीं हे शहर बा्थिंडा असले पाहिजे असं ठरविलें ब याला आधार जम्मूच्या राजांचा एक पार्शियन भाषेंतील इतिहास घेतला. हा इतिहास एका हिंदुळेखकानें लिहिला असून त्यांत असें विधान आहे कीं जय- पाल्ची राजघानी व राहाण्याचे ठिकाण ‘ बथिंडा ? होतं. हा इतिहास कोठे आहे व कधीं लिहिला गेला याचा खुलासा नाहीं. आणि हं दाक्य आहे कीं या इतिहासाच्या प्रतींत वाचतांना किंवा लिहितांना बांडा हा शब्द पार्शयनमध्यें मुळच्या वाहिंडच्या ऐवर्जी वाचला गेला किंवा लिहिलाहि गेला, शिवाय हा जम्मूचा बखरकार अलीकडील लेखक दिसतो; महमुदाचा समकालीन नसावा. अर्थात्‌ त्यानें हे विधान पूर्वील

बुखाऱ्याचे सामानी बादशहा. २७

एखाद्या पार्शयन इतिहासावरून केलें असावें, आणि त्यानें स्वतःच चुर्कानें वाहिंडच्या ऐवजीं बार्थंडा वाचलें असाबें. रेव्हर्टांसारख्या माहितगार इतिहाससंशाधकांचीं या जम्मुबवरीमुळे दिशाभूल झाली याचें आम्हास आश्चर्य तर वाटतेच, पण त्याहिेक्षां रव्हर्टीच्या टिप्पणीं- तील या विधानाने सर व्हिन्सेंट स्मिथची दिशाभूल व्हावी याचें आम्हास जास्त आश्चर्य वाटते. असो, या समजुतीविरुद्ध ज्या प्रमाणभूत गोष्टी आपल्या समोर येतात त्यांचा आपण विस्ताराने ऊह करू.

पाहिली गोष्ट ही कीं महमुदाचा समकालीन व विश्वासाह इतिहास- छेखक अल्बेरूनी हिंदुस्थानचा भूगोल वर्णितांना या जयपालाच्या राजधानीचा बिलकुल उल्लेख करीत नाहीं. आम्हीं मुद्दाम अल्बेरूनीच्या हिंदुस्थानावरील ग्रंथांतून हा भूगोिविषयक अध्याय पुस्तकाच्या आरंभीं दिला आहे त्या वरून वाचकांस महमुदाच्या वेळीं हिंदुस्थानची राज- कीय पारेस्थाति कशी होती हं कळेल, अल्बेरूनीनें वाहिंडचा कंधारची राजघानी म्हणून स्पष्ट उल्लेख केला आहे आणि कंघार म्हणजे गांघार हें सांगावयास नको. वाहिंड सिन्धूच्या पाश्चिमाकिनाऱ्यावर आहे असेंही त्यानें सांगितलें असून वाहिंडहून पेशावर, तेथून काबूल, तेथून गझनी अर्शी शहरं दिलीं आहेत. त्यांने “ रावीच्या पूर्वेस लोहावरची राजधानी मन्दहकूर ” असं लिहिलें आहे. हें मन्दहकूर कोणतें ठिकाण हें ठर- वितां येत नाहीं. पण मन्दइकूर हें बंथिडा नव्हे, कारण तसें तं चुर्कानिहि वाचतां येणार नाहीं. आणि शिवाय ते रावीवर पूर्वेसहि नाहीं. (कदाचित्‌ येथे भाषांतरांत मन्दद्कुरची राजधानी लोहावर रावीच्या पूर्व किनाऱ्यावर असें असलें पाहिजे होते तें चुर्काने उलटें झालें असावें ), वाहिंड आणि लाहोर यांच्या दरम्यान महत्वाचे दुसरें राहर नसावें आणि यावरून असें दिसतें कीं काबुलचेच राजे पंजाबावर राज्य करीत होते. मुसलमानी तवा रिखांवरून स्मिथने दिलेला जयपालाच्या राज्याचा विस्तार बरोबर आहे. सिन्धुनर्दांच्या पश्चिमेकडील डोंगरापासून हें राज्य घग्गर नदीपर्यंत म्हणजे मुसलमानाची. हक्रा नदी येथपर्यंत पसरलें होतें. परंतु हे राज्य काबूल-वाहिंड राज्यापासून निराळे करतां येत नाहीं; म्हणजे दोन्ही राज्ये एकच होत.

२८ गझर्नांच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

दुसरी गोष्ट अशी कीं अल्बेरूनी पूर्वी कांही वर्षोनीं लिहिणारा आरबी इतिहासलेखक अल-इद्रिसी सांगतो कीं गंगेवरील अत्रसा हा एक कनोज राज्याचा सरहद्दीवरील मभनबूत किल्ला आहे व कनोजची हद्द काबूल-लोहावर पर्यंत लागली आहे, यावरून त्यावेळीं काबूल व लाहोर एकच राज्य होतं असें दिसते व त्याची हद्द व कनोजची हद्द एक होती. हिंदुस्थानचे राजकीय विभाग अल्बेरूनीच्या लेखावरून दिसतात. त्यांत पंजाबचे निराळें राज्य दिसत नाहीं. अरबप्रवासी अल-मसूदी लिहितो कीं ( ९५३ इ. स. ) सिन्धु नदी सिन्ध, कततोज, काइमीर, गांघार आणि ताफन या मुठुखांतून येते. यांत फक्त चार राज्यें सांगितलीं आहेत; त्यांपैकी कंधार म्हणजे गांघार होय व त्याची राजधानी पश्यावर (पेशावर) प्राचीन पुरुषपुर ही होती. शेवटी ह ध्यानांत घरले पाहिजे कीं तबकात- इ-नासिरीमध्येंहि वामंड ( म्हणजे वाहिंड ) परशावरमध्यें म्हणजे पेशावर प्रान्तांत आहे असेच सांगितले आहे, जेथील देऊळ पडले ती जागा पेशावर प्रान्तांतील, बाथिंडा सतलजच्या दक्षिणेस आहे.

वर दिलेल्या भूगोलिक प्रमाणांप्रमाणेंच ऐतहासिक प्रमाणेहि हेंच अनु- मान सिद्ध करतात. प्रथम हं कीं. तिन्ही राजांचीं नांवे दोन्ही ठिकाणीं एकच आहेत आणि त्यांचा क्रमाहि तोच आहे.. काबुल-वंद्यांत जयपाल त्याचा पुत्र आानन्दपाल व त्याचा पुल त्रिलोचनपाल आहेत आणि या कल्पित बथिंडा राजवशांतहि तेच राजे त्याच क्रमानें सांगितले जातात- स्मिथनें आपल्या इ० अं. व्हा ३७ मधील लेखांत तिसऱ्याचे नांव ब्राह्मण, पाल असें दिले आहे. परंतु ह्ोोहि पार्शियन लिपींत भलतंच वाचण्याची चुकी आहे. आरंभीचा त, ब वाचल्याने व घुढील ह चवाचल्याने लिलो- चनपालच्या ऐवजीं ब्राह्मणपाळ वाचले गेळे आहे. असे वाचलं जाणें किती साहाजिक आहे हे कोणाहि पर्शियन लिपि जाणणाऱ्यास कळणारे आहे. हेंच मुसलमानी इतिहासांत दिलेलं नांव कित्येकांनी प्रथम तिरो- जनपाल असें वाचलें. ब्राह्मणपाल हें नांव हिंदुलोकांत दिसत नाहीं आणि हें नांव त्रिलोचनपाळ असावे अशी शका अनेक युरोपीय पंडितांसह्दि आली होती. (हें नांव राजतंरंगिणीवरून प्रथम निश्चित कळलें आहे ).

बुखाऱ्याचे सामानी बादशहा. २९

असो; तिन्ही नांवें एक आणि एकाच क्रमानें आल्यामुळें दोन्ही राज्यें एकच आहेत हें निश्चित दिसते.

दुसरें, मुसलमानी तवारीखांत हे “ हिंदुस्थानचे राजे ” ब्राह्मण होते असेंच बहुतेक सवत्र दिलेलें असतं; आणि काबुलचे शाही राजे हे ब्राह्मण होते हें अल्बेरूनीवरून ठरतें. यावेळीं फक्त काबुलांत ब्राह्मण राजे होते, इतरत्र सर्वे ठिकाणी रजपूत राजे होते; यावरूनाहे हीं दोन्ही राज्यें एक असार्वी. तिसरे, वाहिंड संस्कृत उदभांड येथील शाही राजांच्या वैभवाचे जे वर्णन राजतरंगिर्णाकार कल्हणानें केले आहे, तें त्याचें राज्य लहानसे काबूल-पेशावर पुरते मानले तर जुळत नाही. आणि ज्याच्या नाशाविषयी त्यानं इतके दुःख केलें आहे, त्यांचे राज्य विस्तुत असून पजाबभर पसरलें होतं असे मानलें तरच त्याचें वैभव मोठें होऊं शकतें. आणि शेवटली गोष्ट ही की, मुसलमानी बखरकार जेव्हां असे वर्णन करतात कीं पेशावर जवळील युद्धांत जयपालाचा पराभव केल्यावर मह- मुदानें एकदम वाहिंडवर हृललाकरून ती राजधानी हस्तगत केली, तेव्हां आपल्यास बहुतेक निश्चय होतो कौ हें वाहिंड पेशावरजवळ सिंधच्या पाश्चिमेस असलें पाहिजे. तं बाथिंडा असू शकत नाहीं, कारण बाथिंडा येथें पांचण्यास महमुदास पंजाबच्या पांची नद्या ओलांडून सतलजच्याहि दक्षिण- कडील पतियाळाच्या पश्चिमेपर्यत जावें लागतें. तात्पर्य, हिंदुस्थानचा राजा जयपाल याची राजधानी वाहिंडच ठरते.

मुसलमानी ग्रंथांत जयपाल यास कधीं हिंदुस्थानचा कधीं काबूलचा राजा आणि पुष्कळदां लाहोरचा राजा असं म्हटलेले आढळतें. याचें कारण काय हं येथे दाखविणें मनोरंजक होईल, प्रथम हें ध्यानांत घरलें पाहिज कीं दहाव्या शतकांपर्यंत हेलमंड नदीच्या पूर्वेकडील सर्वे भाग हिंदुस्थान समजला जाई. जेव्हां याकूब-इ-लेस यानें गझनी प्रथम घेतली त्यावेळीं ती हिंदुस्थानांतच मोडत होती (भाग १ प. १९१पहा). आणि कन्दहारहि हिंदुस्थानांतच होतं. त्यास राजपुतांचा देश म्हणत. (अलमसऊदी ९५३ इ० ). गझनी राज्य प्रथम स्थापित झाले तेव्हां ते हिंदुस्थानांतून निराळें पडलें. तरी त्याच्या उत्तर, पूर्व, दक्षिण, आणि पश्चिमहि बाजूस हिंदुस्थानर्चाच हृद्द होती. सवुकतागैनानें जवळच चार्री

३० गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

दिशांकडील थोड थोडे भाग जिंकून गझनी राज्यांत सार्मांल केले. गझ- नाच्या पूर्व व उत्तर बाजूस जयपालचें राज्य होतं या प्रदेशास हिंदुस्ता- नच म्हणत आणि येथील लोक अद्याप हिंदु होते. लालिय याने स्थापित केलेला ब्राह्मण राजवंद आरंभीं काबुल येथ राज्य करीत होता. याकूब- इ– लेस यानें काबुल जिंकून काबुलचा किल्ला जेव्हां आपल्या ताब्यांत घेतला तेव्हां असने दिसतें कॉ काबुलच्या शाही राजांनी आपली राजघानी वाहिंड येथे केली. तथापि काबुलच्या शहराचा कबजा त्यांनीं सोडला नाहीं, किल्ला मात्र मुसलमानांच्या ताब्यांत. राहिला. भोवतालचा मुलूखहि त्यांच्या कबज्यांत होता. काबुलचा किल्ला मूसलमानांकडे कां त्यांनीं राहूं दिला हें एक गूढ आहे. काबुलचा किल्ला मुसलमानांच्या ताब्यांत राहिला याबद्दल दोका नाहीं, कारण भुसलमानी लेखक तसें स्पष्ट सांग- तात. कदाचित्‌ काबुलच्या शाही ब्राह्मण राजांनीं मुसलमानांची साम्नाज्य- सत्ता कांहीं वेळ मान्य केळी असावी (भा. १ए. १९३ पहा ). एक काबुल शहा गझर्नीच्या वरिष्ट मुसलमानी सत्तेस तुकोविरुद्ध मदत कर- ‘ण्यासहि तयार झाला होता हे आपण पाहिल्या भागांत पाहिलंच आहे (प्र. सदर ). कारण कोणतेहि असो, काबुलच्या शाही ब्राह्मण राजांस आपली राजधानी सिन्घूच्या पश्चिम किनाऱ्यावरील वाहिंड ( उदभाण्ड- ‘कल्हण ) येथें नेणें सोइस्कर वाटलें.

पण काबुल शहराचा ताबा त्यांकडेच होता आणि ही आपली जुनी राजघानी अशी त्यांची तिजविषयीं सादर श्रद्धा होती. मुसलमानी इति- हास-लेकक असे लिहितात का, काबुलच्या प्रत्येक शाही राजाचा राज्या- भिषेक काबुल येथेच होतो. “ असे झाल्याशिवाय लोक त्यास राजा म्हणून मान्य करीत नाहींत. ”( भा. १ पृ. २०१ ),. यावरून असे दिसतं की हे ब्राह्मण शाही राजे वाहिंड येथे नेहमीं राहत असले तरी राज्या- भिषेकासाठीं काबुलास जात. ह्या त्यांच्या पद्धर्तांची योग्य कल्पना येण्यास ।

अलमसऊदीचे भाषान्तर स्प्रॅन्गर यानें केळें आहे त्यांत पुढील वाक्‍य आहे. “ हिंदु लोक खुरासानच्या पर्वतापासून तिबेटच्या पर्वता- पर्यंत पसरले आहेत.

बुखाऱ्याचे सामानी बादशहा. ३१

अलीकडील इतिहासांतील पेशव्यांचे उदाहरण पुरे आहे. पेशवे पुण्यास रहात पण पेशवाईची म्हणजे कारभाराची वस्त्रे घेण्यास साताऱ्यास नाम- घारी राजांकडे जात. पेशव्याप्रमाणंच काबुलचे ब्राह्मण राजे मुळांत तेथील क्षात्रिय राजाचे सेनापाति होते ( स्फलपाति ही त्यांची संज्ञा असे ). अर्था- तच शाही राजांनीं काबुलास थेऊन राज्याधिकार घारण करावा अक्ी जरूरी लोक समजत. तात्पर्य मुसलमानी ऐतिहासिक लेखकांचे वरील विधान सकृदशनी विलक्षण वाटते. पण मूळ राजघानी कबूल होती नवी वाहिंड होती हं लक्षांत घेतलें म्हणजे यांतील चमत्कारिकपणा नाहींसा होतो.

काबुलच्या शाही राजांची सत्ता पंजाबावर दहाव्या शतकांत प्रस्थापित झाली, अगोदर नव्हे असे दिसतं. नवव्या शतकांत लज्ियास जिंकून कारमीरनें कांहीं दिवस काबुलवर कबजा केला होता हे॑ंआपण पहिल्या भागांत पाहिलळेंच आहे. पंजाबांत त्यावेळीं एका टांक राजाची तसेच कारमीरची आणि कनोजच्या प्रतिहार राजांचीहि सत्ता होती. मुलता- नच्या मुसलमानी राजांची सत्ता मुलतानजवळील कांहीं भागावर असणेंहि संमवर्नाय आहे. अल्‌मसऊर्द्दाच्या पुराव्यावरून असे दिसते कॉ दहा- व्या शतकांत काबुलच्या राजांची सत्ता लाहोरवर असून त्यांच्या राज्याची सीमा कनोजच्या राज्यास लागून होती. पंजाबांतील त्यांची राज- घानी लाहोर असावी. हे शहर प्रथम कोणी वसविले हं सागतां येत नाहीं. लोकदन्तकथेत त्याची स्थापना लवानें केली असं सांतितलें जातें ( लाहोर गॅझेटियर ). ऐॉतहासिकरोत्या विचार करतां ज्या अथी शह्ुएन त्संगने याचा निर्देश केला नाहीं त्याअर्थी त्यानंतर हे शहर आस्तित्बांत निदान प्रसिद्धीला आलें असें ठरते. बहुधा या शज्ञाहीराजांच्या अमदा- नींतच ते प्रसिद्धि पावलें, यामुळेंच या राजांस हिंदुस्थानचे राजे, काबुलचे राजे, वाहिंडचे राजे व लाहोरचे राजने असे मुसलमानी तवारिखकार निर- निराळे नांव देतात. प्राचीन मुसलमानी लेखांत लाहारचं रूप लोहावुर आणि लोहुर असें आढळतें, हा स्पष्टपणें लोहपुरचा प्राकृत अपभ्रंश होय.

आरकेआलाजिकल सुपरिटेडेंट राय ब. दयाराम साहनी यांनींस. १९१७ सालच्या आर्किआलाजिकल रिपोटांत या राजांचे तीन शिलालेख वर्णिले

३२ गझर्नच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

आहेत. या राजांस साहानी काबुल-पंजाबचे राजे म्हणतात हें योग्यच आहे. हे शिलालेख लाहोरच्या म्यूझिअममध्यें ठेविळे आहेत. पाहिला लेख भीमाचा असून त्यास्त या लेखांत “ राजाधिराज गदाघारी भीमदेवं कलक (म) लवर्मनूचा पुत्र ” असे वर्णिले आहे. दुसरे दोन लहान लेख जयपाल्चे असून त्याचें वणन “ भीमदेवपुत्र जयपालदेव ‘ असें आहे. रायबहादर साहनी “ कमलवर्मन्‌ शब्दावरून असे अनुमान काढतात की “ हा क्षत्रिय होता, अल्बेरूनी म्हणतो किंबा अल्वेरूनीवरून समजूत करून घेणारे इतिहास-लेखक म्हणतात त्याप्रमाणें तो ब्राह्मण नव्हता. परंतु आमच्या मतें अल्बेरूनीसारख्या चोकस व माहितगार समकालीन लेखकाचे विधान बाजूस सारणें योग्य नाहीं. हे राजे क्षात्रिय असते तर अल्बेरूनी ब्राह्मण कां म्हणतो याचें कारणहि ध्यानांत येत नाहीं. हिंदु नांवाचें उपपद, मग ते वर्मा, गुस, किंवा दास असो, जातीसंबंधानें निरु- त्तर पुरावा नव्हे. कारण हीं उपपदें मन्बादि स्मृत्यनुरूप क्षात्रिय, वैद्य, व शूद्र यांचीं अनुक्रमें असलीं तरी प्राचीन काळापासून अनुलोमरीत्या पाहि- जेल त्या जातीचा मनुष्य धारण करी असें दिसतें. > त्याप्रमाणें ब्राह्मणा- नींहि केल्याची उदाहरणें आहेत. शिवाय कमलु वगैरे शाही राजे क्षलिय कर्म करीत किंबहूना ते बहुतेक सवंस्बी क्षत्रिय होते. तेव्हां कमळूचे नांव कमलवर्मन्‌ असे शिलालेखांत दिलें आहे यांचें आश्चर्य नाहीं. तात्पर्य हे राजे वणोनें ब्राह्मण होते असें अद्यापहि मानण्यास हरकत नाहीं. त्यांच्या मुली क्षात्रियांस दिल्या जात व ते क्षात्रिय कन्या कर्रीत यांतीह्द कांही वावगें नाहीं.

< क्वग्वेदाचें ऐतरेय ब्राह्मण सांगणारा महीदास ऐतरेय हा ब्राह्मण होता. इतरायाः पुत्रः ऐतरेयः अशा व्युत्त्त्तीनं हा श्ूद्राघुच होता अशी आख्यायिका रचली आहे. पण शरूद्राघुत्र असला तरी त्यावेळच्या वर्ण नियमानुसार व्यासाप्रमाणें तो ब्राह्मणच ठरतो. क्ग्वेदांतील सुदास कित्येक लोक चुकीनें शूद्र राजा समजतात पण, सूर्यवंश व चंद्रवश दोन्हींत सुदास राजा येतो. पंचतंत्राचा लेखक विष्णुगुस हा ब्राह्मण होता. चन्दनदास वेश्य नारायणदास ब्राह्मण वगेरे आणखी उदाहरणें अनेक आहेत,

बुखाऱ्याचे सामानी बादशाहा. ३३

टिप्पणी २-मोह्याल बाह्मण.

मोह्याळ ब्राह्मण सारस्वत ब्राह्मणांची एक शाखा असून पंजाब प्रा- ‘तात बहुतेक सर्वत्र, वायव्य सरहद्दीवरील प्रान्त, आणि अफगणिस्तान या प्रदेशांत राहतात. मोह्याल ब्राह्मण असें मानतात कीं जयपाल व भानंदपाल मोह्याल ब्राह्मण होते. ही त्यांची समजूत योग्य व न्यायाची देसते. कारण मुसलमानांच्या, शिखांच्या व ब्रिटिशांच्याहे अमदानींत शेपाईं व फौजी आफिसर या नात्यानें त्यांनीं आपलें नांव गाजविले आहे. त्या ब्राह्मणांचा असा दावा आहे कीं, आम्हांस दान घेणें किंवा यापार करणें निषिद्ध आहे. महाभारतांतील प्रसिद्ध ब्राह्मण योद्धे अश्व- थामा, कृपाचार्य बगेरे पासून आपली उत्पांत्त आहे असे ते मानतात. ही ष्ट खरी असो वा नसो, काबुलच्या बत्राह्मणश्याही राजांच्या वेळेपासून ही ब्राह्मणजात क्षात्रियघरम वागवू लागली आणि नांवालौकिकास चढली यांत संशय वाटत नाहां. ही यांची परिस्थिति अर्लाकर्डाळ इतिहासां- नील चित्पावन ब्राह्मणांच्या परिस्थितीशी जुळते. पहिला पेशवा बाळाजी वेश्वचनाथ याच्या वेळेपासून चित्पावन ब्राह्मण क्षत्रिय घर्म चालवू लागले, आणि ते पेशव्यांच्या सव अमदानींत फोजी ध मुलकी अम्मलदारीच्या जागा करीत होते. पेकी मुलकी नोकऱ्या अजनाहे ब्रिटिश अमदानींत ते जजावीत आहेत. हल्ली फौजी नोकऱ्या करीत नाहींत हें साहजिक आहे.

मोह्याल ब्राह्मणांची सात कुलें आहेत, व ते कुलाच्या बाहेर पण जा- नीच्या आंतच लग्नें करतात. या कुलांचीं नांवें दत्त, वैद्य, बाली, छिब्बर, मोहन, बमवाळ आणि लव अर्शी आहेत. जयपालादि ब्राह्मण राजे दत्त कुलांतील असून त्यांचें गोत्र भारद्वाज आहे, हें येथे सांगण्यासारखे आहे. प्रसिद्ध रामभुज दत्त चोघरी हे मोह्याल ब्राह्मण होते. माजी अफगाणि- ःतानचे अमीर यांचे मुलकी कारभारी दिवाण नरंजनदास हे भेराचे शहृणारे असून मोह्याल ब्राह्मण आहेत व अद्याप काबुलांत ह्यात आहेत. हीं दोन नांवें सांगितली म्हणजे मोह्याल ब्राह्मण पंजाब व काबूल येथें कसे नामांकित आहेत हें वाचकांस कळून येईल. ज्या अनेक मोह्याल बीरांनीं मुसलमानी व शखि अमदानींत कौर्ते मिळविली त्यांची नांवं येथ देणें अवश्य नार्ही. ३

प्रकरण २ रं. सबुकतगीन आणि जयपाळ.

आ“: >०<ट-नंं–

हिंदुमुसलमानांच्या झगड्याचा, विशेषतः महमुदाच्या हिंदुस्थानांतील स्वाऱ्यांचा इतिहास मुसलमानी ग्रंथकारांनी महमुदाचा समकाटीन अल्उतूबीपासून दक्षिणेस १५०० इ. स. सुमारें झालेल्या फिण्ता- पर्यंत, तसेंच पाश्चात्य ग्रेंथकारांनीं प्रतिभाशाली गिबनपासून इलि- यट व एल्फिस्न्टन व लेनपूल व स्मिथपर्यंत, त्याचप्रमाणें नामांकित फ्रेंच व जर्मन इतिहासकारांनी लिहिला आहे. डॉ. व्हिन्सेंट स्मिथ यानें तर हिंदुस्थानांतील कोरीव लेख व नाणीं यांपासून मिळणाऱ्या माहितीचाहि प्रकाश या इतिहासावर अधिक पाडला आहे. तरीहि या इतिहासाची हिंदी दृष्टीनें व हिंदुस्थानांत झालेल्या अलीकडच्या संशोधनावरून. पुनः विचार करण्याची आवश्‍यकता आहे. ऐति- ह्ाासिक शक्‍याशकक्‍यतेच्या मुशींत घाळून ऐतिहासिक टीकेच्या अग्नींत हा इतिहास तावून सुलाखून घेतला पाहिजे. कांहीं नवीन माहिती | मिळणें शक्‍य नाहीं, पण जुन्या चमत्कारक गोष्टी व कल्पना काढून टाकणें दक्‍य आहे. हेंच आम्ही पुढील प्रकरणांत करणार आहां आणि या इतिहासावर हिंदुस्थानांतील अलीकडील संशोधनाचा , प्रकाश पाडून हिंदु लोकांच्या दष्टिकोनानें त्याजकडे पाहून आमचे विचार वाचकांपुढे मांडणार आहों. हें सांगणें नको कीं सभकालीन | इतिहासकार उतूबी नंतर झालेल्या लेखकांपेक्षां जास्त भरवंशालायक | आहे; पण उतूबीचीहि विधानं ऐतिह्यासिक टीकेच्या कसोटीवर घासून घेतलीं पाहिजेत

सबुकतगीन आणि जयपाळ. ३५

सबुकूतगीन गझनी येथील लहानशा राज्यांत स्थिर झाल्यावर तें राज्य वाढविण्याच्या प्रयत्नास साहजिकच लागला. गझनीची लहानशी मांडठिकी हिंदू-समुद्राच्या पाण्यावरील लहानशा तेल- बिंदूसारखी होती. पण हें तेळ चारी बाजूंस प्रसरण पावलें. तें इतके कीं, त्याचा पुत्न महमूद याच्या वेळीं अफगाणेस्थान, पंजाब व खुरासान वगेरे प्रांतमर तें पसरिळें. सबुकूतगीनानें प्रथम कंदहार व रजपूत राज्याची राजधानी बस्त ही जिंकून घेतली. त्यानें नंतर अल्रुखज म्हणजे ग्रीकांचा अराचोसिया प्रांत, ज्याला पार्थियन लोक ‘ पांढरे ‘ हिंदुस्थान म्हणत ( भाग १ पान १९१ ), तो जिंकून घेतला. त्याचप्रमाणें त्याची राजधानी कसदार जिंकून तेथील राजास मांडलिक बनवून त्याच्या नाण्यावर आपलें म्हणजे सबुक्‌ूतगीनाचें नांव घातळें ( उतूबी. पान ३३ ). याप्रमाणें आपली पिछाडी मजबूत करून त्यानें पूर्व व उत्तर जिंकण्याची महत्त्वाकांक्षा धरली. तेव्हां अर्थातच वाहेंड व काबूळ यांचा राजा जयपाळ याशीं त्याचा झगडा सुरू झाला.

प्रथम आगळीक कोणीं केली ह पाहण्याचीं जरूरी नाहीं. कारण राजे लोकांचा किंबहुना राष्ट्रांचा, मार्गांळ काळांत’च नव्हे तर हृछीच्या विसाव्या शातकांतहि, कायदा व जनावरांचा कायदा एकच आहे, जो सशक्त असेल त्यानें अशक्तांस लुबाडावें; किंबहुना ठार मारावें. उतूबी एवढेंच लिहितो कीं, कसदार जिंकल्यावर विधर्मीयांकडे सबु- कूतगीनानं आपलें लक्ष फिरविले. ‘ मुळ्ख जिंकण्याच्या बरोबर, बऱ्या इश्वरभक्तांची धमश्रद्धाहि वाढली. परमेश्वरास तुष्ट करण्याच्या शुद्ध हेतूने आणि खऱ्या अन्तःकरणाच्या धर्मभावनेनें त्यानें या पवित्र लढाईचे श्रम सोशिळे. आणि त्या दूरदेशांतील पुष्कळ किल्ले ण गढ्या हस्तगत केल्या. त्यानें आपल्या राज्याची सीमा हे किल्ले ब प्रांत जिंकून वाढावली. पण हिंदुस्थानचा राजा जयपाल यानें

करके) “ह

३ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

जेव्हां या गोष्टी पाहिल्या आणि आपली सरहद्द एकसारखी मागें हटत आहे हे लक्षांत आणलें आणि आपल्या राज्यावर हरक्षणीं अनेक प्रकारचें नुकसान कोसळत आहे असें जाणले, तेव्हां दुःखाने तो बेचैन झाला. (उत्‌बी पान८४).यासाठीं त्यानें आपलें सर्व सैन्य सबुकूतगीनास विरोध करण्यासाठीं जमविण्याचा उद्योग मांडिला. अनेक दोस्तांचे सैन्य घेऊन सबुक्‌तर्गानाच्या राज्यांत तो शिरला.त्यास टक्कर देण्याकरितां सबुकूतगीन गझर्नाहून पुढें आला. आणि एक भयंकर लढाई पुष्कळ दिवस चालली. उतूबी वर्णन करतो कीं, “ महमुदानें आपल्या बापास शेवटीं एक युक्ति सुचविली. ती अशी कीं, शत्रूच्या छावणीजवळ एका झऱ्याचे उत्तम पाणी आहे. त्यांत जर एखादी अशुद्ध वस्तु टाकली, तर एकदम प्रचंड वारे वाहूं लागतें आणि अतिशय कडक थंडी पडते असा गुण आहे. ” हें ऐकून नासिरुद्दीन ( सबुकूतर्गीन ) यानें दारूचे कित्येक घडे त्या झऱ्याच्या पाण्यांत फेकाविले. अथात्‌ एकदम आकाशांत धूम्र वणाचे धुर्के दिसूं लागळें. अतिशय थंडी पडली. आणि जयपाळाच्या सैन्यांच फार हाल होऊं लागले. तेव्हां त्याने तहाचे बोलणें लाविलें; व असाहि धाक घातला कीं, तह न झाला तर सर्व रजपूत आपल्या तलवारी घेऊन लढून घारातीर्था देह ठेव- तील. तेव्हां सबुकृतगीनानें या अटीवर तह केला कीं, कांहीं दरब्य व कांहीं हत्ती आणि जयपाळाच्या राज्यांतील कांहीं किछे मुसलमा- नांस द्यावे. तेव्हां जयपाळ आपल्या हद्दींत परतून गेळा, पण स्वरा- ज्यांत पाह्योंचतांच त्यानें किल्ले देण्याचे नाकारिळं. आणि किछ्ठ॒यांचा कबजा घेण्यास जे लोक आले होते त्यांस कैदेंत टाकळे. हे ऐकून सबुक्‌तगीन गझनीस परतला होता, तो पुनः उलटला, आणि जय- पाळाचा प्रांत ळुटीत, लोक ठार मारीत, पोरेंबायका गुलाम करीत । चालला (उतूबी पान ३९ ). त्याने लमघानचा मुळूख अगदीं

खबुकतगीन आणि जयपाळ. ३७

नागवा केला, आणि तो कबजांत घेऊन त्यांतील देवळें पाडून तेथ माशेदी बांधिल्या.!”

“जयपालानें या प्रमाणें आपल्या राज्याचा नाश पाहिला व तहाचें बंधन विश्वासघातानें मोडल्याचें फळ भोगलें, तेव्हां तो अगदीं हतारा झाला. शेवटीं त्यानें हिंदुस्थानांतीळ निरनिराळ्या राजे लोकांस प्ले पाठवून मदत मागितली. एक असंख्य फोज जमा होऊन गझनी- वर चाढून आठी. आपली फोज रात्रूहून थोडी आहे हें पाहून अमी- राने आपल्या घोडेस्वारांच्या कित्येक टोळ्या करून, त्यांकडून शत्र- वर एकामागून एक हछे करविले. अशा रीतीनें त्यानें शत्रस मारे हटविले आणि त्यास घाबरून सोडिलें. शवटीं सवे टोळ्यांनी एक- दम हला केला, आणि कित्येक कैदी केळे व बाकीचे ठोक हत्यारें टाकून पळून गेले. ” येथें कुराणांतील वाक्‍य उतूर्बाने उध्दत केलें आहे. “ इंश्वराचा न्याय जे त्याच्या मार्गातून भलतीकडे जातात त्याविरुद्ध असतो. आणि हा विरुद्ध हुकूम टाळतां येणें अशक्‍य आहे ” हिंदूनीं पुनः सबक्‌तगीनावर स्वारी केळी नाहीं. आणि त्यांचा हा प्रांत इस्ठामाच्या राज्यास कायमचा जोडला गेला, आणि तेथीळ राहिवाशी “’ त्यांचा उत्कर्ष करणाऱ्या काळजीच्या छत्रा- खालीं आणले गेले. आणि ज्या ज्या वेळेस त्यास ( संबुकूतगीनास ) जरूर लागेल, त्या त्या वेळेस एक हजार घोडेस्वार त्याच्या तेना- तास राहूं लागले. ”

सबुकृतगीन आणि जयपाल यांच्यामधील झालेल्या लढायांचें उत्‌. ‘बीनें वरप्रमाणें वर्णन केलें आहे. या लढाया दोन झाल्या असें दिसतें. यापेक्षां जास्त लढाया सांगण्यासारख्या सबुकृतागेनानें जय- पालाशीं केल्या नाहींत. त्याचें लक्ष पाश्चिमेकडे आपला सम्राट म्हणजे सामानी राजा मनसूर बिन नूह यास मदत करण्याकडे, त्याच्या दर- ‘बारांत आपलें वजन वाढविण्याकडे व जाहगिरीदाखल कित्येक प्रांत

शट गझनीच्या महसमुद!च्या स्वाऱ्या.

मिळविण्याकडे गुंतले होते. या दोन्ही लढायांत व पश्चिमेकडील सामानी राज्यांतील खटपटींत महमुदानें आपल्या बापास मदत केल्याचे वर्णन आहे

उतूबीनंतरचे मुसलमानी इतिहासकार या हकीकतींत बरीच आणखी भर घालतात. ती सोडून दिली तरी उतूबीची ही हकीकत सुद्धां शक्‍याशक्‍्यतेचा विचार व ऐतिहासिक टीका यांच्या कसोटीस लावून पाहिली पाहिजे. उतर्बानें या लढायांच्या तारखा दिल्या नाहींत. उतूबीनें दिळेल्या तारखाहि पुष्कळदां चुकीच्या असतात, ( इलि- २ ). सबुकूतगीन इ. स. ९७७ पासून ९९७ पर्यंत राज्य करीत होता; या दृष्टीने ही हकीकत इ. स, ९८० पासून इ. स. ९८५ पर्यंत झाल्याचें मानतां येईल. जर महमुदाचा जन्मकाल इ. स. ९७१ आक्टोबर धरला, तर तो वयानें या वेळीं लहान असून या लढायांत भाग घेऊं शकणारा नव्हता. परंतु जन्मकाळ चार वर्षे अगोदर मानला तर त्याचें वय १४पासून १७पर्यंत येते. आणि या वयाचा तरुण राजपुत्र विशेषत: प्राच्य देशांत लढाईस योग्य मानला जातो आणि प्रत्यक्ष युद्धांताहे तो पाठविला जातो. परंतु त्याच्या बापास त्यानें सछा मसळत दिली असें मानणें योग्य होणार नाहीं. आणि अलीकडील मुसलमान इतिहासकार जे लिहितात कीं, मह- मुदानें शेवटपर्यंत लढाई चालविण्याचा आग्रह धरिला तें तर संभ- वनीय दिसत नाहीं. दुसरी गोष्ट या हकाकतींत जो दैवी चमत्का- राचा भाग आहे तो टाकून दिला पाहिजे. अतिशय थंडी पडली, धुके उत्पन्न झालें, किंबहुना बफ पडूं लागळें आणि पहिल्या लढा- इत हिंदूंची गाळण उडाली ही गोष्ट संभवनीय आहे, पण ती नि- ।. सर्ग-नियमानें झाली, झऱ्यांत कांहीं दैवी गुण होता ल्याने झाली नाहीं. झऱ्याचे पाणी हिंदु लोकांच्या छावणी जवळील मुसलमानांनी अशुद्ध केलें हें मानतां येईल. शत्टूचें पाणी खराब करणें ही लढा-

सबुक्‌तगीन आणि जयपाळ. ३९

तीळ एक चाल आहे. आणि त्या वेळचे रजपृत, विशेषतः राज्य करणारे राजे, दारू पीत नसत ही गोष्ट तत्कालीन अरबी प्रवाशां- नींहि लिहून ठेविली आहे ( भाग इ. २ पान १८५ पहा ). वि रो- षतः जयपाळ ब्राह्मण असल्यानें दारू न पिणारा असला पाहिजे ात्रचें पाणी बिघडविण्याची युक्ते महाभारतांतहि सांगितली आहे पाश्चात्य लढायांच्या वर्णनांतही ती अवलंबिलेली दिसते. गेल्या युरो- पीय महायुद्धांत तिचा प्रकार झाला. शुद्ध पाणी पिण्यास न मिळा- ल्याने आणे एकाएकीं पडलेल्या थंडीच्या कडाक्यानं त्रस्त होऊन ( अशा हवेची संवय उत्तर सपाट हिंदुस्थानांतून आलेल्या शिपा- यांस नसणें साहाजिक आहे ) हा हिंदूंचा जमाव या कारणांनी आपलें कार्य करूं शकला नाहीं. तथापि त्याचा पराभव झाला नव्हता आणि जरूर पडल्यास रजपूत प्राणांतिक युद्ध करण्यास तयार होते. यामुळें असें मानणें जरूर आहे कीं, या वेळीं ठरलेल्या तहाच्या अटी दोन्ही पक्षाच्या इज्जतीस संभाळून होत्या. बहुधा कांहीं नगदी रक्कम व कांहीं हत्ती देऊनच दोस्त राजे परतून घरो- घर गेळे असावे.

ही अशी हकीकत हिंदुस्थानांतील कोर्राव लेखांच्या पुराव्या- वरून जास्त मजबूत होते. पूर्वी भाग २ यांत दाखविल्याप्रमाणे असं दिसतें कौ, चंदेळराजा धंग या हिंदु राजांच्या जमावांत आला होता त्याचे वर्णन शिलालेखांत “ हम्मीरसम ! असे केलें आहे. यावरून ही लढाई बरोबरीची झालेली दिसतें,व असह्य थंडीमुळे केवळ हिंदु परतले. ही लढाई इ. स. ९८० मध्यें झाली असें मानलें पाहिजे. धंग इ. स. ९५० च्या सुमारास राज्य करूं लागला व इ. स. १००० पर्यंत त्यानें राज्य केलें; मरणसमयाीं त्याचे वय १०० वर्षांवर होतें.

फिरितता व इतर अलीकडीळ लेखक लिहितात कीं, दिली, अजमीर, कनोज, कालंजर वगैरे राजे या लढाईंत होते. पण यांत

४० गझनांच्या महसमुदाच्या स्वाऱ्या.

निःसंशय अतिशयोक्ति आहे. कारण यांत नंतर प्रासिद्ध झालेल्या राज्यांचींहि नावें आहेत. आपण पाहिलेंच आहे की, इ. स. ९८० त दिल्ली क्षूळक होती. आपल्या भुगोलिक वर्णनांत अंलबेरुनीनें दिल्लीचा उल्लेख केळेला नाहीं. आणि अजमीरची ह्या वेळेस स्थाप- नाहि झाली नव्हती. सांभरचे चौहान राजे अजून इतके सामर्थ्य- वान्‌ नव्हते कीं ते कांहीं मदत पाठविते. माळ्याचा भोज तर इ. स. १०१०त गादीवर आला. उतूबीनें हिंदुस्थानांतून कोण कोण राजे मदतीस आले होते याचा तपशील दिला नाहीं, हिंदुस्थानां- तीळ कोरीव लेखांच्या पुराव्यांत केवळ धंगाचें नांव मिळतें. प्रतिहार सम्राट्‌ कनोज या लढाइत सामील होणें संभवनीय आहे. चेबा गॅझेटियरवरून असें दिसतें कीं, या धार्मिक युद्धांत चंबाचा राजा साहिलवर्मन्‌ होता.

दुसर्‍या लढाईचे वर्णन ज॑ उत्‌बीनें दिलें आहे तें मात्र संशयित दिसतें. पहिली गोष्ट ही कीं, पहिल्या लढाईत हिंदूंचा नांवाला परा- भव झाला होता. तेव्हां जयपालाच्या हद्दीतील किल्येक किछे मुसल- मानांना देण्याची अट घातली गेली नसावी, निदान ती मान्य झाली नसावी. ती मान्य झाली असती तर विश्वासघात करून मोडण्या- इतका नीतिभ्रष्ट जयपाल नव्हता. हे काबूलचे ब्राह्मण राजे किंवा सर्व हिंदुस्थानांतीळ रजपूत राजे सच्चे इमानाचे होते. खुद्द अल्बे- रूनीनें या काबूल राजांच्या उदात्त स्वभावांचें वर्णन केळे आहे. जरी | हा ग्रंथकार मुसलमान होता, तरी त्यानें हिंदूच्या स्वभावाचे यथाथ वर्णन केलें आहे. त्यानें काबूलच्या शाही राजांच्या सत्यानेष्ठेचे्‌ आणि चांगुलपणाचे पुढील प्रमाणें प्रश्नसायुक्त वर्णन केळं आहे ( सचाऊ भाग २ पान १० ); “ यांच्या सर्वे व्यवहारांत जें योग्य व न्याय्य आहे तेंच करण्याच्या उत्कट इच्छेंत हें कधीं मंदावले नाहींत. उदात्त विचार आणि उदात्त आचार करणारे हे पुरुष आहेत. ‘” अथात

1 ।

सबुक्‌तरग्गीन आणि जयपाळ. 8१

जयपाळानें शत मानून तोडली असेल हें संभवनीय नाहीं. दुसरी गोष्ट हिंदुस्थानच्या निरानेराळ्या राज्यांतील लोक पहिला प्रयत्न फुकट गेल्यानंतर पुनः इतक्या लोकर जमले असर्ताल हें संभवनीय नाहीं. तिसरी गोष्ट, संयुक्त सैन्य इतकें प्रचंड होतें तर त्यांचेजवळ शेकडो हत्ती असले पाहिजेत आणि सबुक्‌तगिनानें पांचपाचशें घो- ड्यांच्या टोळ्या करून वारंवार हे चढविण्याची जी युक्ते योजिली ती सिद्धीस जाणें संभवनीय वाटत नाहीं व हिंदूचा भयंकर पराभव होणे राक्‍य नाहीं. पोरसशीं झालेल्या लढाईत अलेक्झांडरने हाच चाळ चालविली होती असें सर व्हिन्सेंट स्मिथनें म्हटळें आहे. पण अलेक्झांडरचें घोडदळ शिस्त शिकलेले होतें. सबुकतगिनाचें अश्च- सैन्य अलेक्झांडरच्या सैन्यासारखें शिस्तीचे नसावें. याशिवाय रज- पूतांचीहि प्रसिद्धि त्यांच्या अश्वसेन्याबद्दद होती व आहे. आणि एवढ्या मोठ्या हिंदु सैन्याच्या जमाबांत हिंदूजवळ अश्वसेन्य नव्हतें ही गोष्ट संभवनीय नाहीं. खुद्द आरबी लेखकांच्या ठेखांवरून कना- जचे प्रतिहार राजे त्यांच्या मोठ्या व कर्तबगार घधोडदळाबद्दल प्रसिद्ध होते. उत्तर हिंदुस्थानचा प्रसिद्ध सम्राट्‌ू व जयपालाचा शेजारी असा कनाजचा राजा जयपालाच्या मदतीस आलेल्या राजांमध्ये असलाच पाहिजे; व मुसलमानी इतेहासकारांनीं कनोजचा राजा मदर्तीस आला होता असें लिहिलोहि आहे. असें संभवनीय दिसतें कौं, या दुसऱ्या लढाईंचें वर्णन अतिशयोक्तीचें आहे. आणि त्यांत पहिल्या लढाइतीळ अनेक राजे जमा झाल्याची पुनरुक्ति केली आहे. जयपाळ परतल्यावर व संयुक्त फौजा घरीं गेल्यावर कांहीं निमित्त काढून सबुक्‌तगिनानें जयपाळच्या राज्यावर पुनः स्वारी केली असावी. किंबहुना प्रारंभीं सांगितल्याप्रमाणें अशा प्रसंगीं सबब दाखविण्याचीहि आवश्‍यकता नाहीं. अथात्‌ आपल्याच राज्यांतून जयपाळास जितकी फोज जमवितां आली, तितकी त्यानें जमविली

2२ गझर्नाच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

असावी व शेवटीं त्याचा पक्का पराभव झाला असावा. त्याचा संघु- नदाच्या पश्चिमेकडील पुष्कळसा प्रांत यावेळीं गेला. परंतु हल्लींचा वायव्य सरददर्द्दांचा मुख्य भाग म्हणजे गांधारचा प्रांत गेला नसावा. त्याचा दक्षिणेकडील भाग म्हणजे बन्नू गेला असला तरी उत्त- रेक्डाळ भाग कायम राहून परशावर व वहिंड येथें जयपाळ पुढेंहि राज्य करीत असल्याचे आपल्यास दिसतें. सबुक्‌- तगिनानें जिंकलेल्या मुलुखास तेथील राहवाशांस जबरदर्स्तानें मुस- लमान करून पूर्णपणें आपल्या राज्यास जोडलें. इलियटचें असें मत आहि कीं, या दोन्ही लढाया लमुघान अथवा जलालाबादच्या खोऱ्यांत झाल्या ( हलियट २ पान ४३३ ). आणि लमघान व का- बूल नदीच्या उत्तर-दक्षिणचा भाग जयपाळाच्या राज्यांतून कायमचा निघून गेळा. काबुलळचा कोतवाळ अथवा अस्पहदाद याच्या धर्मा तराची जी मजेशीर हकीकत अल्बेरूनीनें सांगितली आहे, ती या- वेळीं घडली असावी. कित्येक लोक अल्पतगिनाच्या वेळेस ती झाली असं जे मानतात ( इलि, २ पा. ४२०) तसें नसावें असें वाटतें. कारण कित्येक काळपयंत जयपाळास काबूलचाहि राजा वर्णिळेळें आढळतें

यानंतर उतूबी म्हणतो कों, सबुकतगिना चें लक्ष सामानी राज्यां- तीळ घडामोडीकडे वेधले, आणि हें शक्‍य दिसतें. कारण त्याच्या राज्याची पूर्वेकडील सीमा सिंधूपलीकडीळ डोंगराची ओळ ही होऊन ती सुराक्षेत होती, या समारास मनसूराहे वारला, आणि त्याचा पुत्र नृह्ह गादीवर बसला. नूहूनें आपल्या कित्येक प्रांतांतील बंडे मोडण्याकरितां सबुकतागनाची नोकरी सांगितली, व ती त्यानें आनं- दानें व स्वामेभक्तीनं बजावून हीं बंडे मोडलीं. या नोकरीबद्दल त्यास खुरासानाची अधिकाऱ्याची जागा मिळाली व त्यानें ती महमुदास दिली. या प्रांतावर असतां एक बंडखोर अबूअली महमुदावर

सबुक्‌तगीन आणि जयपाळ. ४२

चाळून आला; आणि या लढाइत महमुदाचें वैयक्तिक शोय प्रथम दिसून येऊन त्याची कीर्ति सर्वत्र झाळी. याच लढाइत महमुदानें आपल्या तर्फे हिंदु शिपाई व हत्ती घेतळे होते. अन्यत्न आम्हांस वर्णन करणें जरूर पडणारच आहे कीं, हिंदु शिपाई बापडे जो कोणी तनखा देईल त्याच्या वतीनें लढण्यास कोणतीहि हरकत मानीत नाहींत. पण येथें मुख्य गोष्ट सांगावयाची ती ही कीं, महमुदास हत्तींचा उपयोग उत्तम करतां आला, आणि त्याविरुद्ध शत्रूच्या घोडदळास कांहीं करतां आळें नाहीं. “ लढवय्ये हत्तींनी घोडेस्वारांस आपल्या सोंडांनीं धरून त्यांच्या पाठी आपल्या पाया- खालीं मोडल्या, आणि अगणित लोक याप्रमाणें या लढाईत मेले. (उतूबी पान. १६२)

शेवटीं सामानी साम्राज्यांत आपल्या कसलेल्या जबरदस्त सेन्याने सबुक्‌तगीन इतक्या वजनास चढला कीं, तो बुखारा येथें वझीर नेमू लागला व बरखास्त करूं लागला. अशाच प्रकारें शहाजीलाहि निजामशाहींत सुलतान बसवतां व काढतां आले. व ज्याप्रमाणें शहाजीचा दरारा विजापुरास होता, त्याप्रमाणें सबुक्‌तागिनाचाहि सामानी बादशहा नूह याच्या दरबारांत राहिला. सबुक्‌तर्गान गझनी सोडून बट्ख येथेंहि अलीकडे राहूं लागला. आणि शेवटीं त्याचा तेथेंच अन्त झाला. त्याच्या मनांत गझनी येथें परत जावयाचें होतें, परंतु ईश्वरी इच्छा निराळी होती. त्यानें आपल्या शेवटच्या मृत्यु- पत्रांत गझर्नाचें राज्य आपला पुत्र इस्माइल यास दिलें. महमूद खुरासान प्रांताची राजधानी निशापूर येथे रहात असे तो खरासान प्रांताच्या अधिकाऱ्याच्या जाग्यानें संतुष्ट राहील असें सबुकृतागेनास वाटलें असावें. ही हर्कांकत शहाजी-शिवाजीसारखीच झाली. शहाजीने नवीन संपादलेलें बंगलोरचें राज्य आपल्या दुसऱ्या पुत्रास दिलें आणि शिवाजीला पुण्याच्या जाहगिरांनें संतुष्ट ठेविलें, महमूद

४8४ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

आणि शिवाजी अधिक करतृत्ववान्‌ होते तरी आपल्या भावांपेक्षां पित्यास कमी प्रिय होते असे दिसतें. दोन्ही हकीकतींत अधिक कर्तुत्ववान पुत्राने आपला हक्क शेवटीं बजावला आणि तो एकंदर राज्याचा मालक झाला. महंमुदानें गझनीच्या राज्यावर आणि तेथें जमा असंलेल्या खजिन्यावर आपला हक्क सांगितला, व विरोध उत्पन्न झाल्याबरोबर तो गझनीवर चाळून गेला, शहराखालीं त्याची ब इस्माईळची लढाई झाली व शेवटीं इस्माईळचा पराभव होऊन तो कैद झाला वगैरे हकीकत विस्ताराने सांगण्याची जरूरी नाहीं. एवढें मात्र सांगण्यासारखे आहे कीं, या लढाईत इस्माइलच्या बाजूनें हत्तीचे काळेकुट्ट झुंडच्या झुंड लढले पण त्यांचा उपयोग झाला नाहीं. हत्तींचा उपयोग कांहीं एका मर्यादेत आहे. सबुक्तागीनानें व इतर मुसलमान सेनापतीनीं हत्ती ठेवून त्यांचा लढाईत उपयोग केला आहे. यावेळीं सबुक्‌तागीनाचे हत्ती इस्माईलच्या कबजांत होते. पण त्याच्या नालायकीनें त्यांचा परिणामकारक उपयोग त्यास करतां आला नाहव, या लढाईनें महमूद गझनीच्या राज्याचा पूर्ण मालक झाला (इ. स. ९९७ ).

प्रकरण 9 थें. महमूद आणि जयपाळ.

गादीवर बसल्यावर कांहीं काळ महमुदाचें लक्ष पश्चिमेकडे वेधळें होते. आपल्या बापाचे मानमरातब व अधिकार आपल्याकडे चालावेत अशी त्यानं सामानी बादशाहा नूह यास विनंति केली व नूहूनें ती मान्य करून बल्ख, हिरात, बोस्त व सरमध येथील राज्यकारभार त्याचे हातींच चाळूं ठेवला. निशापूरची ( खोरासान ) सुभेदारी व सेनापतित्व हीं मध्यंतरी बेक्तुझून यांस देण्यांत आलीं होती. बेक्तुझन ह्या राजनिष्ट आणि कर्तेत्ववान्‌ होता व नूहूच्या गार्दावर नुकताच आलेला ल्याचा पुत्न बादशाहा मनसूर यानें तीं बेक्तुझनकडेच चालु ठेवावींत असं ठरविलें, परंतु महमूद यास हे खपले नाहीं आणि तो आपलें सैन्य घेऊन बेक्तुझनवर चाल करून गेला. परंतु मनसूर स्वतःच आपल्यावर चाल करून येत आहे असें पाहतांच राजनिष्ट महमुदाला त्याच्या विरुद्ध शस्र उचलवलें नाहीं; तो माघारा फिरला व एका सुरक्षित जागीं त्याने आपला तळ ठोकला. सामानी राज्याला आतां पक्की उतरती कळा लागली होती. उलट्या काळजाच्या कांहीं अधिकाऱ्यांनीं तरुण बादशह्ाा मनसूर यास पकडळें आणि त्या अल्पवयी व सुंदर राजाचे डोळे काढले. या गोष्टीने महमुदास त्वेष आला व त्यानें या बंडखोर अधिकाऱ्यांवर स्वारी केली. तेव्हां मनसूरच्या जागीं त्यांनीं ज्याला गार्दावर बसविलें होतें त्या नवीन राजाला बरोबर घेऊन ते पळूं लागळे. या बेगडी बादशहाचें आधिपत्य अर्थातच महमुदानें नाकबूल केळें आणि खोरा- सन व गझनींचे आपण स्वतंत्र राजे झालां आहोंत अशी त्यानें द्वाही

४६ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

फिरविली, बगदादचा खलिफा कादर बिल्ला यानें महमुदास स्वतंत्र राजा म्हणून मान्यता दिली, त्याला अधिकाराचां वस्रे पाठविली आणि यमीनुद दोलत्‌ व अमीनुल खिलतू म्हणजे पातशाहीचा उजवा हात आणि धर्माचा संरक्षक अशी पदवीहि दिली. खलि- फाच्या संदेश-वाहकांचें महमदनें मोठ्या आदराने स्वागत केलें त्याच्या बापाने व त्यानें अमीर ही पदवी पूर्वींच वापरण्यास सुरुवात केली होती. स्वतंत्र राजा झाल्यावर जी पदवी त्यानें धारण केली ती अमीर ही नसून सुलतान अशी हाती. सुलतान ही पदवी त्या पूर्वी कोणत्याहि मुसलमान राजानें वापरली नव्हती. यापुढें हीच पदवी प्रचारांत आली आणि अमीर म्हणजे हाताखालचा एखादा सरदार असा अर्थ होऊन बसला. उत्बीनें असें लिहून ठेविळें आहे कीं महमूदनें खोरासानमध्यें न्यायानें व शहाणपणाने राज्य केलें आणि आपल्या प्रजाजनांस सुखांत ठेविलें. पूर्वीच सांगितल्याप्रमाणें सामानी पातशाहीची राजधानी बोखारा ही कार॒गरचा तुर्की राजा इलेकूखान यानें हस्तगत केली व सामानी धरण्यांतील सर्वे वारसांस त्यानें कैद केलें. त्यांस पुढें बहुधां मारूनही टाकण्यांत आलें असावें.

शा तर्‍हेनें महमुदाच्या कारकीदीच्या सुरुवातीस सामानी घराणें नष्ट होऊन गेलें. या वृतांतांत आणे विजापूरच्या राज्याच्या अंताच्या वत्तान्तांत केवढें साम्य आहे ! गागाभट्टाकडून राज्याभिषेक करवून घेऊन शिवाजी महाराजांनीं आपलें स्वातंत्र्य जाहीर केलं. महमुदा- च्या स्वतंत्र राज्यपदाळा धमाची आवश्य ती मान्यता देऊन बग- दादच्या खर्लाफानें जशी त्याला सुलतान ही पदवी दिली तशीच गागाभट्टाने शिवाजीस अभिषेक करून छत्रपाते ही पदवी अपण केली. त्यानंतर थोड्याच दिवसांत हिंदुस्थानचा इलेकूखान म्हणजे अवरंगजेब यानें शिवाजीचा स्वामी विजापुरचा राजा याचा मोड करून राज्याच्या शेबटच्या वारसास दिल्लीस नेळें आणि विजापुरचा

|: ४, ;

शै

महमूद आणि जयपाळ. 2७

उरलेला प्रांत मोगल साम्राज्यांत सामिळ करून घेतला, मानवी स्वभाव हा सगळीकडे सारखाच व त्यामुळे त्याच्या करवी आपलें कार्य करून घेणाऱ्या नियतीच्या खळांतहि सगळीकडे साम्य दिसावें होहि स्वाभाविक आहे.

प्रारंभीच्या गोष्टी इ. स. ९९७ व १००० यांचे दरम्यान घड- ल्या ( पुढें पांच वर्षांनीं १००५ मध्यें सामानी राज्याचा पूर्ण अंत झाला ); आणि महमूदच्या राज्यछत्राखालीं सामानीं राज्याचा बराच मोठा भाग आला. खोरासानाचा समावेश त्यांत झालेलाच होता. सामानी राज्यांतील सिस्तान हा प्रांत जिंकण्याच्या तो गडबडीत असतां जयपाल सैन्याची जमवाजमव करीत आहे अशी महमुदास बातमी आली. बहुधा ल्याच्या सेनापतीनीं जयपालाच्या मुलखावर स्वारी केळी असावी आणि त्यामुळें जयपाळ लढाईची तयारी करीत असावा. शिवाजीप्रमाणेंच ताबडतोब निश्चय करण्याबद्दह आणि त्वरेने सैन्याच्या हालचाली करण्याबद्दल महमुदाचीहि ख्याति आहे. याहि- वेळीं या गुणांचा उपयोग करून व्यानें पश्चिमेकडून आपलें तोंड पूर्वेकडे फिरविळें आणि १५००० घोडेस्वार घेउन झपाट्याने तो जयपालाच्या राज्यांत घुसला. अशा त्वरेच्या हालचाली करावयास घोडदळच फार उपयोगीं पडतें आणि महमूद काय आणि शिवाजी काय अशा प्रसंगीं घोडदळाचाच उपयोग करीत, असें आपल्यास दिसून येतें. “ परशावर ( पेशावर ) त्यावेळीं हिंदुस्थानच्या भूमीच्या केंद्रावर होतें” ( उत्नी. पा. २८०). या विधानावरून असें दिसून येतें की, अजूनहि सिंधूच्या पश्चिमेकडील प्रदेशावर जय- पालाचें राज्य चाळू होतें, ( हा प्रांत म्हणजे अवार्चीन वायव्य सर- हृद्दीचा प्रांत होय व त्याची राजधानी वहिंड येथें होती.) जय- पालाची लढाईची तयारी पूर्ण झाली नव्हती असें दिसतें. त्याने

। मागून येणारें सैन्य रणक्षेत्रावर येऊन दाखल व्हावें म्हणून लढाईचे

४८ गझर्नीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

तोंड सुरू करण्याचें लांबर्णावर टाकलें (उत्बी. ८१ ). परंतु सुल- तानानें ही अनुकूल संधि ओळाखिली आणि ताबडतोब जयपालावर हला केळा. लढाइ निकराची झाली आणि मध्यान्हाच्या सुमारापर्यंत ५००० हिंदूंची मुंडकीं तरवारीने रणक्षेत्रांत पडलीं. जयपाल, त्याच्या बायका, ल्यांचीं मुळेंबाळें, त्याच्या कुटुंबांतील इतर लोक व ह्याचे सरदार यांच्यासह कैद झाला. ळुटींत अगणित दागदागिने सांपडले, पाडाव केलेल्या राजघराण्यांतील माणसांच्या गळ्यांत आणे जखमी झालेल्या व मेलेल्या शिपायांच्या अगावर हिरे, माणके व मोतीं यांनीं खचित केलेले हार इतके सांपडले कीं, इस्लामी फौजेस अमयांद संपात्ते लाधली. हिंदी राजे व सरदार यांच्या दागिन्यांच्या सोसाचा उल्लेख अरबी प्रवाऱ्यांनींहि केला आहे ( भाग २ पान १८७ पहा ). परंतु जयपाल, त्याचे सरदार व सैनिकही लग़नांतील मिरवणुकींतल्या- प्रमाणें दागिन्यांनी नटून रणक्षेत्रावर युद्धास जावेत हें विचित्र आहे. बहुधा ते लढण्याच्या तयारींत नसतांच तळावरच त्यांच्यावर हल्ला करण्यांत आला असण्याचा संभव आहे. ल्या प्रांतांत हजारों तरुण पुरुष, मुळें व मुली हस्तगत करण्यांत आलीं आणि “ खारासानच्या बाजूच्या [ म्हणजे सिंधूच्या पश्चिमेकडील ] सव हिंदी प्रांतांना सुल- तानाची सत्ता मान्य केली ”“’हा जय हि- ३९२ (इ.स. १००१) च्या मोहोरमच्या ८ व्या तारखेस मिळाला आणि त्याची बातमी अत्यंत दूरच्या प्रदेशांतहि पसरली. ‘”

पेशावरच्या मैदानांत इ. स. १०० १ मध्यें अश्या प्रकारचें ह संस्म- रणीय युध्द झालं आणि त्यामुळें सिंधुनदीच्या पश्चिमेकडील प्रांतां- वरील हिंदु राज्याचा अंत झाला आणि तेथील लोकांचे हिंदुत्वाहि नाहींसें झाळें. आपल्या जयाची पूणता करण्यासाठीं सुलतान रेटीत रेटीत जयपाठाची राजधानी वाहिंड येथें चाळून गेला आणि त्यानें ती सर करून हस्तगतहि केली. कांहीं ठेखकांचें म्हणणे असं आहे

महमूद आणि जयपाळ. ४९

कीं भातेंडा हेंच वहिंड होय; परंतु हें शक्‍य दिसत नाहीं. कारण भा?डा सतलज नदीच्या दक्षिणेस असल्यामुळें पेशावरपासून फार दूर होईल. पूर्वीच म्हटल्याप्रमाणे आणि इलियटनें फारा दिवसां- पूर्वीच निर्देश केल्याप्रमाणे (२ पा. ४३८) महमुदाळा आपलें लहानसें सैन्य धेऊन सबंध पंजाब प्रांत ओलांडून भातेंडा येथे जाणें शक्‍य नव्हतें. सिंधूच्या पश्चिमेचा सर्व प्रदेश, किंवा उत्बींच्या म्हण- ण्याप्रमाणें ‘खोरासानच्या बाजूचा प्रदेश’ महमुदाच्या राज्यांत सामील करण्यांत आला आणि तेथें मुसलमानी राज्य स्थापन करण्यांत आलें इतकच नव्हें तर लोकांस जबरीने मुसलमानी धमाची र्दाक्षा देऊन “: तेथील किळसवाणा अधार्मिकपणा नाहींसा करून तो सबंध शाद्ध करण्यांत आला. ” “ ज्य! हिंदी वीरांनी सरहद्दीवरील डोंगरांत व किल्ल्यांत बंड उभारून दुष्टपणा केला त्यांच्यावर तरवार चालवून त्यांना शिक्षा करण्यांत आली. ‘” पेशावरावर जातांना अर्थात्‌ ह्यास खेबर वगेरे घाटांतून जावें ठागळें आणि हल्छीप्रमाणेंच त्यावेळीं सर- हृद्दीवरीळ जातीनीं महमुदासहि त्रास दिळा आणि त्यानें त्यांचे नि ष्ट्र पणे पारिपत्य केळें. त्यांना आणि सिंधूच्या पश्चिमेकडील लोकांना बाटविण्यांत आलें तें या वेळीं. महमुदालळा जिंकलेले प्रांत आपल्या राज्यांत सामील करण्याचें माहीत तर होतेंच, परंतु शिवाय सामील केलेल्या प्रांतांतीळ लोकांस बाटवून आपलें राज्य चिरस्थाई कसें करावें हेंहि माहीत होतें, या विषयावर पुढें आम्ही ज्यास्त लिहिणार आहों

-__ आतां आपण जयपालाकडे वळूं. असं सांगतात कों महमुदानें जयपालास व त्याच्या कुटुंबास खोरासान मधीळ एका किल्ल्यांत कोंडून ठेवण्याचा हुकूम दिला, जयपालास इतक्या लांबच्या जागीं नेळें असो किंवा नसो, त्याच्यापासून खंडणीदाखळ ‘५० हत्ती घेऊन व त्याच्या मुलास ओलीस ठेवून घेऊन त्यानें जयपालास लवकरच

१-4

५० गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

सोडून दिले, आणि ल्याला आपल्या राज्यांत जाऊं दिलें. तें राज्य आतां सिंधूच्या पूर्वेस होतें. आपल्या राज्यांत परत येण्याऐवजीं चितेत जळून तो भस्मसात्‌ झाला, शात्रने आपल्याला पाडाव करून कैद केलें यामुळे झालेली अप्रतिष्ठा त्याला सोसवली नाहीं. त्या काळांत पुष्कळ लोक, राजे देखील, अशा तऱ्हेने प्राणत्याग करीत. आपण फार वृद्ध झाल्यामुळें राज्य करण्यास नालायक आहोंत असेंद्वि त्यास वाटळें असावें. उत्बीनें असें म्हटलें आहे कीं, मदमुदाकडे ओलीस असलेल्या मुलास त्याच्या या प्राणत्यागाबद्दल पत्न आलें होतें. बहुधा त्याचा हा मुलगा आनंदपाळ असावा. त्यास महमुदानं सोडून दिलें व आपल्या राज्यांत जाऊन शांतपणे राज्य करूं दिलें. जयपालाच्या या शोचनीय अंतामुळे आणि दुर्दैवी दीर्घ जीवितामुळें त्याच्या- बद्दल कींव वाठल्याखर्राज राहात नाहीं व त्याच्या तेजस्वी प्राण- त्यागाबद्दल तर आदरच वाटतो.

या प्रसंगानंतर सुलतान महमुदानें पश्चिमेकडीळ आपली सत्ता दृढ करण्यासाठीं तुर्की राजा इठेकूखान याच्याबरोबर तह केला. या पर्वींच इठेकखानानें बोखारा आपल्या ताब्यांत घेतलें होते. खोरासान वगेरे आक्सस नदीच्या दक्षिणेकडील प्रांत महमुदास मिळाळे आणि नदीच्या उत्तरेकडील मबरुन्‌नहर प्रांत आणि सामानी राज्याची राज- | धानी बोखारा हीं इलेकखानाकडे राहिलीं. आपल्या मुलास इलेकू- खानाची मुलगी करून घेऊन हा तह महृमुदानें बळकट केला असावा असें दिसून येतं. आपल्या राज्याच्या पश्चिम बाजूस अद्य तर्‍हेनें सुरक्षितता झाल्यामुळें महमुदाला आपले लक्ष हिंदुस्थानाकडे द्यावयास मोळळीक झाली. “’ तेथील संपत्तीने त्याचा लोभ आणि मूर्तीनीं त्याचा धर्मोत्साह प्रदीप्त केला.!” तथापि हिंदुस्थानच त्याच्या विचाराचे ध्येय किंवा सार होतें असें मानण्याची जरूरी नाहीं. कारण त्याच्या कर्तृत्वाला आणि त्याच्या उत्साहाला पूर्वेप्रमाणेंच उत्तरे

महमूद आणि जयपाळ. ५१

कडेही क्षेत्र मिळण्याची आवश्‍यकता होती व तो वाव त्याला मिळा- लाहि. उत्बीनें दोहोंकडील स्वाऱ्यांचें सारख्याच विस्तारानें वर्णन केलें आहे. परंतु आम्हांला आमचें लक्ष हिंदुस्थानांतील त्याच्या काम- गिर्री पुरतेंच मर्यादित करणें उचित आहे. कित्येक वेळां असें भास- विण्यांत येतें कीं दरसाल हिंदुस्थानावर स्वारी करण्याचा महमुदानें पणच केला होता. वस्तुतः ही मोष्ट खरी नाहीं. महमुदाच्या हिंदु- स्थानी वृत्तान्त-ठेखकांस मागाहून सुचलेली ही कल्पना आहे. उत्बीनें अशा पणाचा उल्लेख केलेला नाहीं.

प्रकरण ५ वें. भाटियावरील स्वारी.

त्व न ्न्न्ट्टा्

उत्तरकालीन इतिहासकारांनीं महमुदाच्या बारा स्वाऱ्यांची गणती केली आहे आणि युरोपीय इतिहास-कारांतही हिं संख्या परंपरेने कायम झाली आहे. या स्वाऱ्या बारा पेक्षां अधिक होत्या यांत संशय नाहीं. आपल्या दुसऱ्या भागाच्या परिगशोष्टांत ईल्यिटनें सतरा स्वाऱ्यांची गणती दिली आहे. या स्वाऱ्यांच्या संख्यबद्दल विवरण करण्याची या ठिकाणीं जरूरी नाहीं. तो प्रश्न महत्त्वाचाहि नसून केवळ पांडित्याचा आहे; आणि म्हणून या स्वाऱ्यांचा अनुक्रम लावीत न बसतां आम्ही या स्वाऱ्यांचें सविस्तर वर्णन देत आहा. पेशावरवहिंड घेतल्यानंतर महमुदानें ज्या स्वारीची तयारी केली ती भाटिया वरील स्वारी होय. दुदेंबानें भाटियाची नक्की भौगोठिक स्थिति अजून निश्चित करितां येत नाहीं. कारण या बाबतींत इति- हासकांरांत महत्त्वाच्या बाबींबद्दल मतभेद आहे. आणि असुक एका स्थळालाच भाटिया म्हणावें तर ल्या मताच्या समर्थनाठा भक्कम असा पुरावा नाहीं. पहिल्यानें उत्बीने जे या स्वार्राचें वर्णन केळे आहे तें देऊं ( पा. ३२२-२४ ). “ सौस्तान मधील कारभाराची व्यवस्था लागल्यानंतर भाटिया जिंकण्याचा संकल्प पार पाडण्याचा र नानें निश्चय केला. त्यानें सिहून ( सिंधु ) ओलांडली, मुलतानचा प्रांत बाजूस टाकला आणि भातियापुढें आपला तळ दिला. ल्या शहराचे तट इतके उंच होते कीं गरुडांनांच फक्त ल्यांवर जातां येई आणि व्या तटांवरीळ पहारेकऱ्यांस मनांत आल्यास थुक्राच्या चांदि. णीच्या ओष्टांवर आपल्या चुंबनाचा ठसाहि उमटावितां आढ

भाटियावरील स्वारी. “३

असता ( !!! ). त्याच्या भौवताळी समुद्राप्रमाणें विस्तीण आणि खोल अशा खंदकाचे वलय होतें. आपल्या विख्यात योद्धयांच्या पराक्रमाची घमेंड असलेला तेथील राजा शहराबाहेर पडला आणि त्यानें लढाई दिली. सळतानानें तीन दिवस युद्ध केलें. चोथे दिवशीं स्य आकाश- सागराच्या मध्यावर आला असतां ‘अछ्लाहो अकबर’ या आरोळ्यांनीं आकाशा दुमदुमून गेळे, मुसलमानांनीं हछा चढविला आणि त्यांत काफिरांचा काळेपणा धुतला गेला. बहुतेक सवे शात्रचे वीर किछ॒यांत ळून गेले. परंतु धमाच्या संरक्षकांनीं किल्ल्याचा रस्ता मागोमागच हस्तगत केला, सैन्यांतील तरुण लोकांनीं खंदक भरून काढला आणि रस्ता रुंद केला. किल्ल्याच्या तटावरून दोर सोडून त्यावरून विजयराज खालीं उतरून डोंगराच्या विवरांत निसटला आणि त्यानें जंगलाचा आश्रय केला. तेथे त्याचा पाठलाग करण्यांत आला. इतक्यांत आपला खंजीर काढून त्यानं आपला जीव घेतला. त्याच्या सैन्याचा मोठा भाग तरवारीला बळी पडला व एकशे साठ हत्ती पाडाव करण्यांत आले. त्या देशांतील मूर्तिपूजेचें पाप धुवून काढावें म्हणून त्या शहरांत सुलतानाने आपलें ठाणें वसविले. त्यानें लोकांस मुसलमान केटें, मशिदी बांधण्याची व्यवस्था केळी आणि इमाम नेमून दिळे. तो परत जात असतां बयाच्या सैन्यावर अनेक अनर्थ कोसळले. माणसें मेळीं ब सामानाचाहि नाश झाला. कित्येक अप- कौर्तीनें मेळे आणि कित्येक भीतीनें हैराण झाले. सुलतानाचे अमूल्य प्राण मात्र वांचळे. महमुदाच्या विश्नासांत असलेल्या अबुळ फत बोा- स्तीनें त्याला उत्त्कृष्ट सछा दिला आणि असल्या आकाक्षांच्या आगे साहसांच्या विरुद्ध आपलें मत दिलें, परंतु सुलतानानें त्याचा सछा मानला नाहीं. ”’ उत्बीच्या ठेखणींतन उतरलेले हें लांब लचक वर्णन आम्ही येव- ढ्याच करितां दिलें आहें कीं त्यामळे त्याच्या वर्णनाची काव्यमय

८8 गझर्नांच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

पद्धाते वाचकांच्या ध्यानांत यावी आणि या वर्णनावरून उत्पन्न होणाऱ्या अडचणींची कल्पना व्हावी. या गोष्टीं उर्त्बांच्या प्रत्यक्ष नजरेखाळून गेल्या नाहींत. महमुदाचा चिटर्णांस या नात्यानं मिळा- लेल्या माहिर्तावरून त्यानें त्या लिहिल्या अहित. ही येवढ्या लांबच्या प्रांतावर स्वारी करण्याचें महमुदानें कां ठरविलें हेंच कळणें प्रथम कठिण आहे. उत्बीनें त्याचें कांहींच कारण दिलें नाहीं. पुढें झालेल्या इतिहासकारांनी असें म्हटलें आहें कीं विजयराज हा जय- पाळाचा सामंत होता आणि महमुदालळा द्यावयाच्या खंडणीपैकी त्याच्या वांटयाचा भाग त्यानें दिळा नाहीं, परंतु महमुदानें विजय- राजावर स्वारी करावयास हें कारणच होऊं शकत नाहीं. शिवाय जयपालाची महमुदानें मुक्तता केली तेव्हां त्यानें महमुदाळा कोण- तीही खंडणी देण्याचें कबूल करून घेतलें असावें असे दिसत नाहीं. आनंदपालालाहि सोडून दिळें तें खंडणी देण्याच्या अटावर नव्हे. वस्तुतः महमुदानें जयपालाच्या राज्याचा बराचसा मोठा भाग ळुबाडला होता; आणि तो त्याच्या मुक्ततेबद्दळ पुरेसा मोबदला होता. तेव्हां या स्वारीचे कारण या खंडणीपेक्षां काहीं तरी निराळें असावें. उत्बीच्या बखरींत त्याचा कांहीं पत्ता लागत नाहीं. बहुधा भाटियाचा राजा हा मलतानच्या नेक्रत्येस एक प्रबळ व स्वतंत्र राजा असावा त्यानें सिंधूच्या पश्चिम बाजूच्या मुलखावर आपला हक्क सांगून तेथील लोकांस चिथाविलळें असावें. आपण मागेच पाहिल्याम्रमाणें भट्टी राजे हे सुरुवातीला झाबुलिस्थानचे मालक होते. जयपाळ आनेदपाळ वगेरे राजे ब्राह्मण नसून भट्टी होते अशी जी एक कल्पना आहे ती आमच्या मतें बरोबर नाहीं. शाही ब्राह्मण घरा- ण्यांत नांवाच्या दोवटीं लावावयाचे मानपद जरी ‘देव’चे ऐवजीं “पाल’ झाळें असलें तरी तेवढ्यावरून राजघराण्यांतच पालट झाला असावा | असें होत नाहीं. क्षत्रिय राजानींहि पालप्रमाणेंच देव हें मानपदहि

भाटियावरील स्वारी. “पर

लाविलें आहें आणि शाही राजे जरी ब्राह्मण असले तरी व्यवहारांत ते क्षत्रियच बनले होते. त्यांनी आपल्या मुली क्षत्रिय कुमारांनां दिल्या होल्या आणि क्षत्रिय मुली आपल्या कुलांत करून घेतल्या होत्या. सारांश, भाटियाचा राजा हा जयपालाचा कोणी संबंधी असून ल्याने कांहीं अपराध केल्यावरून महमुदानें भाटियावर स्वारी करण्याचें ठरविलें असावें असं दिसत नाहीं. ही लांबची आणि दुःसाध्य स्वारी करण्याचें महमुदानें कोण- त्याही कारणानें ठरविळें असो, ती त्यानें आपल्या नेहमींच्या उत्सा- हानें पूर्णपणें पार पाडली. बिजेराय ( विजयराज ) हि शौयानें लढला. ल्याने आपल्याला केद करूं दिलें नाहीं. जयपालाप्रमाणें आपली अवमानना होण्यापूर्वींच आपल्या छातीत खंजीर भोसकून घेऊन प्राणत्याग केला. भाटियाच्या लढवय्या नागारेकांनीं प्रायः आपले प्राण धारातीर्थी अर्पिळे. इतर ठोक मुसलमान झाले. लोकांना कैद केल्याचें किंवा ठटाळूट केल्याचें वर्णन येथें आढळत नाहीं. तेव्हां ही स्वारी ठुर्टासाठीं किंवा एखादी प्रसिद्ध मूर्त फोडण्यासाठी करण्यांत आळी असावी असे वाटत नाहीं. भाटियाचे ठोक आणि त्यांचा प्रांत सिंधु नदीच्या पूर्वतीरावर गझनी प्रांताच्या अगदीं जवळ होता. यामुळें तं काळजीचें स्थान होतें आणे म्हणूनच तो प्रान्त पूर्णपणें ताब्यांत आणून बाटविण्यांत आला असावा. परंतु भाटिया शहर कोठें असावें : तं शहर महत्वाचे होतें यांत शंका नाहीं. कारण अट्बेरुनीनें आपल्या भूगोलांत बझानच्या पश्चि- मेस मुलतान, पलीकडे भाटिया होतें असा उल्लेख केला आहे. मुल- तान हें बझानच्या अगदीं पश्चिमेस नसून थोडेसें वायव्येस आहे आणि भाटिया हें मुलतानच्या वायव्येस नसून नेक्रत्यस असावें तेव्हां ते भावलळपर नसावें. शिवाय भावलपुराशेजारीं पर्वतहि नाहींत बाकी येथें हेंहि नमूद करून ठेवणें जरूर आहे काँ भाटिया रह- |

८्द गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

राच्या किंवा किल्ल्याच्या वर्णनावरून असें दिसून येतं कीं भाटिया हें अगदीं पर्वेताजवळ नसावें. कारण, डोंगरी किल्ल्याचें तट गगन- चुबी असले तरी त्याच्या भोंबती खोळ खंदक असणे राक्‍य नाहीं. उत्बीचीं वर्णनें स्वतःच्या माहितीने लिहिळेलीं नसून ती काव्यमय आहेत हें उघड आहे. महमुदानें मुलतान प्रांत बाजूस टाकला असें वर्णनांत आहे तेव्हां तो मुलतानच्या नैक्रव्यस आला असावा. त्याने फक्त सिंधु नदी ओलांडली, दुसरी कोणतीही नदी ओलांडली असे या स्वारीच्या वर्णनांत नाहीं; तेव्हां हे शहर मुलतानच्या नेक्रव्येस सिंधु व सतलज यांचे दरम्यान कोठें तरी असावें. अल्बरुनीने त्याची जी जागा दिली आहे तिच्याश्ीं ही कल्पना जुळती आहे. बिजेरायानें सिंधूच्या तीरावरील डोंगरी अरण्यांत आश्रय घेतला असें ज॑ फेरिस्ताने म्हटलें आहे तेंहि भाटिया हें सतलज व सिंधु यांच दरम्यान होतें असें मानल्यास बरोबर ठरतें.

ईलियटच्या मतें मात्र भाटिया हा पाठ चुकला असावा, व तो शब्द भाटिया नसून भेरा असावा. त्याच्या म्हणण्याप्रमाणे हे शहर झेलमच्या डाव्या किनाऱ्यावर मुलळतानच्या वायव्येस मिठाच्या डोंग- रांजवळ कोठें तरी असावें ( पान ४४० ). जयपाल–आनंदपालादि वाहिंडचे पाळ हे भाटी असून बिजयरायाचे नातठग होते अशी त्याची कल्पना आहे. परंतु वर सांगितल्याप्रमाणें ही कल्पना बरोबर नाहीं व तिची आवश्‍्यकताटठि नाहीं. या स्वारीसाठीं महमूद बन्नूच्या खिंडीने कुरम खोऱ्यांतून येऊन त्यानें सिंधु नदी ओलांडळी आणि मुलतानच्या प्रांतांत न ॥शेरतां त्याच्या कडेनें तो भाटियावर आला असें जे इलियटनं म्हटलें आहे तें निःसंशय बरोबर आहे. आनंद- पालाच्या किंवा मुलतानच्या परकीय इात्रच्या प्रांतांत घुसन आपल्या मार्गात अडचणी उत्पन्न करून घेण्याची महमुदाला इच्छा नव्हती आणि म्हणून तो आड वळणाच्या लांबच्या मागीनें आला

भाटियावरील स्वारी. ण्छ

हें आपल्याला लवकरच दिसून येईल. परंतु यावरून भाटिया मुल- तानच्या वायव्येस येत नाहीं, कारण तसें असतें तर महमुदाला मुलतानच्या कडेनंही जावें लागळें नसतें. बिजेरायाने डोंगरावरील अरण्यांत पळून जाऊन आश्रय घेतला असें उत्बीनें जें वर्णन केलें आहे, त्यामुळे उत्पन्न झालेला पेंच उत्बीचे वर्णन अतिशायोक्तीचें आहे; भाटियाजवळ पर्वेत नसून केवळ डांगर्‍्या होत्या असें म्हण्ट- ल्यानें सहज सुटण्यासारखा आहे. कसंही असो, कोणतंही अवाचीन शहर हें भाटिया होय असं दाखवितां येण्यासारखें नाहीं. अलबे- रुनीच्या काळांत तें शहर प्रसिद्ध असून ते मुलतानच्या नैक्रत्येस सिंधु व सतलज नद्यांमध्ये होतें येवढेंच सांगून ते आजच्या भूगो- लांत निश्चित न करतां स्वस्थ बसणें भाग आहे.

टिप्पणी-भाटिया.

ळा क हिनी

१ भापलपूर गझेटिअरमध्यें भाटिया म्हणज भातेंडा होय असें मानून पुढें असे म्हटलें आहे की “इ. स. १००४ मध्यें महमुदानें भतिंडा सर केलें, तेयील राजा बिजयराज यानं आपला सम्राट आनंद– पाल याच्या विरुद्ध बंड केले होतं व महमुदाच्या अधिकाऱ्यांस त्रास दिला होता ?” “ पुढील स्वार्रत भतिंडाचें मार्गाने महमूद मुलतानवर चाळून आला ” महमुदाच्या स्वार्राचे उत्बीने जे वणन केलें आहे त्या

4५ _€% >

वरून ही दोन्हीही विधानें संभःनीय वाटत नाहींत,

२ भाटनेर, ( हनुमानगड ) बिकानेर संस्थान; या नावाखाली इंपी- रिअल गझटिअरमध्यें असे म्हटलें आहें कीं, महमुदानें या स्थळावर इ. स, १००४ मध्यें स्वारी केली अशी समजूत आहे. ” परंतु याबद्दल शंका आहे असेही पुढें म्हटलें आहे.

(३ ) बिकानेर गझेटिअरमध्योहे अश्यातऱ्हेचा उल्लेख असून आणखी असेंहि म्हटलं आहे कीं राजा दलचंद नांवाच्या एका भट्टी राजापासून तेमूरनें हा किला घेतला. तो किल्ला आते मजबूत असून

ष्ट गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

त्याची चांगळी तटबेदी केलेली होती, “’ तो सर्व हिंदुस्थानांत प्रख्यात होता ” असें त्याचें वर्णन केलेळे आहे (पा. ३९७ )

४ जैसलमिर गॅझोटअरमध्ये भर्ट्टींची प्राचीन परंपरा अशी दिली आहेः—“ ते यदूर्चे वंशज होते. यादव मथुरा सोडून गेल्यानंतर ते सिंधु नदीच्या पलीकडे गेळे आणि गज नांवाच्या एका राजानें गझनी हं शहर वसविले, एका खोरासान राजाने त्यांचा पराभव केला व ते पुनः सिघु ओलांडून परत आले ब पंजाबांत वसती करून राहिले. त्यांनी गझनी पुनः सर केली, परंतु बलंद राजाच्या वेळीं त्यांना पुनः गझनी बाहेर हांकून देण्यांत आलें. बलंदाचा मुलगा भट्टी यानें भोंबतालचे अनेक राजेरजवाडे जिंकले. त्याच्या माणूने त्याचा मुलगा मंगळराव त्याच्या गादीवर आला. परंतु त्याचें भाग्य त्याच्या बापासारखें थोर नव्हते. गझनीच्या राजानें त्याच्यावर स्वारी केली तेव्हां त्यानें आपलं राज्य सोडून दिछें. सतलज ओलांडून तो पळून गेला व त्यानें राजस्ता- नच्या वाळवंटांत आश्रय घेतला. तेथेंच त्याचे वंशज तेव्हांपासून आपलं घर करून राहिले आहेत. ” भाटिया नांवाचें एक शहर सिंधु व सत- लज यांच्या दरम्यान कोठें तरी होतं या म्हणण्याला या लोककथेनं दुजो- राच मिळतो. या शहराचा तुर्कानीं विध्वंस केला तेव्हां भट्टीनीं सतलज ओलांडली आणि वाळवंटांत शिरून ते जेसलमीर येथें येऊन राहिले.

प्रकरण सहावे. मुलतानक्रील स्वारी.

सम्या मम

महंमूद हा दूर हिंदुस्थानांत लढाईत गुंतळा आहे असें पाहून इलेकूखानानें महंमुदाच्या पश्चिमेकडील प्रांतांवर स्वारी केली; व चीनच्या कादिरखानास सहायाठा घेऊन तो जेहून ( आक्सस ) नदी ओलांडून आला. ही बातमी कानावर येतांच महंमद विद्यछ- तेच्या वेगानें गझ्नीस परतला व तेथून बल्खमध्ये गेला. इठेकखाना- बरोबर घनघोर लढाई होऊन त्याचा पूर्ण मोड झाला व तो आक्सस पलीकडे पळून गेला. उत्बीनें असें नमूद केलें आहे कीं, या लढा- इत महमुदाच्या सैन्यांत तुक, खिलजी, अफगाण व हिंदू लोक होते; सैन्याच्या मध्यभागीं त्यानें पांचशे हत्ती उभे केळे होते; तो स्वतः एका मस्त हत्तीवर बसला होता; व त्यानें इलेकखानाच्या निवडक पांचश संरक्षकांवर हला करून आपल्या हत्तीकडून त्यां- तळे बरेच लोक मारविले. यावरून असें दिसून येतें कीं जी साधन- सामुग्री कतत्वहीन नेत्याच्या हातांत कुचकामाची ठरली तिचाच उपयोग करून कतंबगार सेनापतीनीं यहा मिळविले, ज्या हिंद्सैनि- कांस व हत्तींस जयपाठास यश मिळवून देतां आलें नाहीं त्यांचाच उपयोग महमुदानें आपल्या स्वतःच्या तुकोविरुद्ध अत्यन्त यशस्वी

ऱ्हेनें केला.

गझनीस परतल्यावर मुलतानच्या धर्मभ्रष्ट राज्याधिकाऱ्यास मुलतान काबीज करून तेथून हांकून लावावयाचे असें त्यानें ठरविलें. मुल- तान हें त्यावेळीं स्वतंत्र राज्य होतें. सिंधच्या मुसलमानी प्रान्तात उत्तरेला मुलतान आणि दक्षिणेला मनसुरा अशीं दोन राज्यें होतीं.

९० गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या. मुलतानचा राजा मुसलमान होता; परंतु तो करमाती पंथाचा होता. हा पंथ अबदुल्ला बिन मैमान नांवाच्या एका पररियन उपदेशकानें स्थापिला होता. सातवा इमाम अल्ली ‘ हा रोवटचा इमाम असें तो आपल्या उपदेशांत सांगे. मत आत्म्याचे कल्पान्ती पुनरुत्थान होतें ही कल्पना त्याळा मान्य नव्हती व अवतारावर त्याचा विश्वास होता. इराणांतून या पंथाचे उच्चाटन जेव्हां करण्यांत आलें तेव्हां त्या पंथांचे लोक हिंदुस्थानांत आळे व त्यांस येथें पुष्कळ अनुयायी मिळाळे. ( बहुधा हीं दोन्हीं तत्वें हिंदुवर्मावरूनच घेतलीं असावींत ). सात आणि बारा या संख्यांचे पावित्र्य, दाक्षिच्या निरानेराळ्या पाय- ऱ्या, गूढ खुणा व अर्थ, इत्यादि विशेषतः हिंदुस्थानांतील साध्या भोळ्या धार्मिक माणसांस आवडणारीं गूढ तत्ततेहि त्या पंथांत होतीं. मुळतानचा राजा व तेर्थाळ पुष्कळ लोक करमाती पंथाचे होते. महमूद हा कडवा मुसलमान होता. ही धमभ्रष्टता हिंदुस्थानांतूनहि नाहींशी करावयाची असा त्यानें निश्चय केला. किंबहुना असेंहि दिसून येतें कीं मुळतानच्या गव्हनराच्या बापाला सबुक्‍्तगीननें खोरा- सान मधून हांकून दिलें होतें.

मलतानला जाण्याच्या समोरच्या मार्गातील अडचणी आणि धोके महमुदाला माहीत होते. मागें सांगितल्याप्रमाणें भाटियाहून परत जातांना त्याच्या सैन्यास त्रास देण्यांत आला होता. त्याचें सामान- सुमान नाहींसें झालें व त्याचा जीवाहि धोक्यांत पडला होता. दर- बारी उत्बीनें याचा खलासा हि केला नाहीं, मग वर्णन कोठचें श्‌ या इतिहासळेखकानें महमुदाच्या विजयाची काव्यमय वर्णनें विस्ताराने लिहिलीं आहेत; परंतु त्याचे पराजय वंर्णितांनां तो अगदीं संक्षेपाने लिहितो. बहुधा आपल्या राजाच्या व राजघार्नाच्या झालेल्या शोच- नीय अन्तामुळें चिडून जाऊन भातिया प्रांतांतील ढोकांनीं महमूद परत जात असतां त्याच्या विरुद्ध उठावणी करून त्याच्या सैन्याला

सुलतानवरील स्वारी. 4

त्रासवन सोडलें असावें.किंवा हल्लींच्या वायव्य प्रान्ताच्या सरहद्दीवर्राल दर्‍्याखोऱ्यांत व गिरिकंदरांत राहणाऱ्या टोळ्यांनी महमदावर हछे केले असावेत; हे अधिक संभवनीय आहे. या अडचणीचे खरें स्वरूप कोणतेहि असो, या वेळीं लांबच्या व वळणावळणाच्या परंतु कमी त्रासदायक मागाने जाण्याचें त्याने ठरविळे आणि पंजाबचा राजा आनंदपाल याला त्याच्या प्रांतांतून जाण्याबद्दल परवानगी मागितली, यावरून आनंदपालाचें राज्य पंजाबांत तरी खास होतें व तो स्वतंत्र राजा होता असें निश्चित ठरतं. परंतु मळतानचा अधिपाते आनंदपा- लाचा दोस्त असल्यामुळें त्याने परवानगी दिली नाहीं. मुलतानच्या अधिपतीनें सबक्‍तगिनाबरोबर झालेल्या लढाईत जयपालाठा सहा- य्यहि केलें अर्से म्हणतात. महमूद आनंदपालानें परवानगी दिली नाहीं म्हणून स्वस्थ बसणारा नव्हता. त्यानें अगोदर आनंदपाला- वर आणि नंतर मुलतानवर स्वारी करण्याचें ठरविठें. आनंदपालाचा पराभव झाला व काऱ्मीरप्यंत त्याचा पाठलाग करण्यांत आला. ही लढाई पेशावर प्रांतांत झाली असें इलियट म्हणतो; परंतु पेशावर महमुदाच्याच ताब्यांत होतें. या लढाईचें रणांगण पंजांबांत सिंधु नदीच्या पूर्वेस कोठें तरी असावें. उत्बीनें लढाईच्या स्थळाचा मुळींच उल्लेख केलेला नाहीं. तो फक्त इतकेंच म्हणतो कीं, “ तेव्हां सुल- तानाने शहरें व खडी ढटटून उध्वस्त करून जाळून टाकण्याचा सेन्याळा हुकूम दिला. त्यांनीं आनंदपालावर संकटामागून संकट उभें केळें व शेवटीं त्याला कारिमरांत हांकून दिळें. ? आनंदपाठाची अशी दशा झाठेली पाहतांच अबद॒ल फतेहनें आपली सगळी संपत्ति गोळा करून उंटाच्या पाठीवर घाळून सेरेंदिब ( सीलोन ) येथें पाठवून दिली व तो स्वतः मुलतान सोडून पळून गेला

महमदानें मलतानमध्यें प्रवेश केला व तेथील नागरिक धर्मभ्रष्ट

ळे आहेत असें पाहून त्यांच्यावर जबर दंड बसविला. “ या धर्म

द्र गझनांच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

  • (9

स्थापनेचा वृत्तांन्त सव शहरांत पसरून इजितप्तमध्येह्यि पसरला आणि त्या सवे भागांतील अश्रद्धा आणे पाखंर्डापणा यांच मुख्य उगम- स्थानच म्हणजे मलतान’चे बंड तोंडून टाकण्यांत आल. ‘” (उउत्बी ३२८-३२९ ). करमाती नास्तिकवादाप्रमाणें खिलाफती बद्दलचाहि वाद त्यां वेळीं अस्तित्वांत होता. कांहीं ठोक बगदादचा खलीपा हा खरा खलीपा म्हणन मानीत तर इतर इजिप्तच्या खठीफाचे पुढारी- पण कबूल करीत व खुत्ब्यांत ( काझीच्या प्रार्थनेच्या वेळीं राजाचें व खलिपाचें नांव घेतात त्यास खुत्बाम्हणतात) त्याचाहि नांव घालीत, महमूद स्वाभाविकपणेच बगदादच्या खलीफाच्या बाजूचा होता. या- वेळीं इजिप्तच्या खलीफानें पाठविळेलीं सन्मानाची वस्रे त्यानें स्वीका- रिळीहि नाहींत.

महमूद मुळतानळला कोणत्या मार्गानें गेला व कोणत्या मार्गानें तो परत गेला हें उत्बीने नीट सांगितलेले नाहीं. परंतु पुढील इतिहास- कार तो भातेंडाच्या मागीनें गेला असे म्हणतात; तसा तो गेला नसावा असे वाटतें. भेराच्या म्हणजे उत्तर मार्गीनें परत गेला असें होळियटनें म्हटळें आहे तें योग्य आहें (इ. पा. २ पा. ४३२ ). ही स्वारी कोणत्या वर्षीं झाली होहि नक्की कळत नाहीं. कांहीं इतिहासकारांच्या मतें ती इलेक-खानाच्या पराभवानंतर झाली, कार्हींच्या मतें आधीं झाली. उत्बीला प्रमाण मानून ती अगोदर झाली असावी असे इलियेटला वाटतें. परंतु उत्बीचा वृत्तान्त कालानुरोधानें लिहिलेला नाही आणि त्यानें या स्वारीचे साळ दिलेलें नाहीं. परंतु इठेकखाना बरोबरची लढाई आम्ही या स्वारीच्या पूर्वी दिळी आहे. कारण, आम्ही अपल्या इतिहासाच्या पहिल्या भागांत (पा. १९९ ) उध्टृत केढल्या अलबरुनांनें दिलेल्या आनेदपालाच्या पत्राने (अल्‌बेरुनी भा. २ पा. १०) या मह- तत्वाच्या प्रसंगाच्या वृत्ताची सरणी व्यवस्थित रीर्तानें जुळते.

सुलतानवरील स्वारी. द्र

“ तुकारनीं तुमच्या विरुद्ध बंड केळे आहे असं मी ऐकितों. तुमची इच्छा असेळ तर मी स्वतः येईन किंवा “१०० घोडे १००० सेनिक व १०० हत्ती बरोबर देऊन मी आपल्या मुलाला पाठवीन. माझा तुम्ही पराभव केला आहि. दुसऱ्या माणसानें तुमचा पराभव करूं नये अशी माझी इच्छा आहे. ?”’ मुलतानवर स्वारी कर- तानां निष्कारण स्वारी होऊन पराभव झाल्यानंतर आनंद- पाळानें अशा तऱ्हेचा दाक्षिण्ययुक्त मदत करण्याचा प्रस्ताव केला असता असें वाटत नाहीं. आंतरराष्ट्रीय भाषेंत बोलावयाचे तर खुद्द अट्बेरुनीच्या म्हणण्याप्रमाणे आनंदपालाचेंच वर्तन जसे नेह- मींच न्याय्य व योग्य असे तसेंच याहि वेळीं होतें. त्यानें तेव्हां आप- ल्याला मित्रस्थांनी असलेल्या मुलतानसारख्या राज्यावर किंवा एखाद्या त्रयस्थ राष्ट्रावरह्दि स्वारी करण्याला आपल्या हृद्दीतून महमदा- ला जाऊं देण्याचें नाकबूल केलें हें न्यायाचें व योग्यच होते; परंतु प्रान्सवर स्वारी करंण्याकरितां जमनी आपल्या सरदहद्दींतून जात असता बेलजमने जमेर्नांला जाण्याची परवानगी न दिल्यामुळें जर्म- नीची स्वारी आपल्यावर ओढून घेतली त्या वेळीं जर्मनीनें ञ्याप्र- माणे तो अडथळा मानला नाहीं त्याप्रमाणेंच बलिष्ट राष्ट्रे किंवा राजे असली अडचण मानीत नाहींत. महमुदानं जमनी सारखेंच वर्तन केलें. त्यानें अगोदर आनंदपालाला गांठला व त्याचें शासन केलें. महमुदाच्या अश्या तऱ्हेच्या उघडाउघड अयोग्य वर्तनानंतर आनंद- पालानें वरील पत्र लिहिणें संभवनीय नाहीं. अलबेरूनीनें म्हटल्या- प्रमाणें तो महदमुदाचा हाडवैरी बनला. अलबेरूनीनें त्याचे कारण निराळें दिलें आहे. “’ जेव्हां त्याच्या मुलाला कैद करण्यांत आलें तेव्हां याच आनंदपाल राजाच्या मनांत अगदीं विरुद्ध अशा भावना उत्पन्न झाल्या. त्याचा मुलगा त्रिळोचनपाळ बापाहून अगदीं निराळा होता !’. ह्मणजे मुसलमानांशीं तो स्नेहभावानें वागला आणि ल्याला

द्ड गझर्नाच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

त्यांच्याबद्दल प्रेम व आदर वाटत असे. त्रिळलोचनपालाला कधीं केद करण्यांत आलें ते निश्चित करितां येत नाहीं. तो या मुलतानच्या स्वारींत देखीळ महमुदाच्या हातांत पडला असेल व शेवटीं त्याला महमुदानें सन्मानाने सोडून दिलें असेल, व त्यामुळें त्याची मनो- रचना निराळ्या प्रकारची बनली असेल. हें पत्र देतांना “ त्यांचे परस्पर संबंध हें पत्र लिहितेवेळीं शिथिळ होत चालले होते असें अट्बेरुनीने लिहिळें आहे हें खरें, परंतु त्या वाक्यांत महमुदानें स्वारी करून आनंदपाळाळा जागोजाग त्याचा पाठलाग करून कारिमरांत हांकून लाविलें या सवे गोष्टींचा अंतभीव होण्यासारखा नाहीं. त्याने फक्त पूर्वीचे साधे संबंध–जे कधींच स्नेहाचे नव्हते ते-दाखाविळे जातात असें आम्हांस वाटतें

मुलतानहून परत आल्यावर महमुदानें जरी आनंदपालाचा मुळुख पूर्वी सांगितल्याप्रमाणें लुटून उध्वस्त केला होता तरी तो आपल्या ताब्यांत घेतल्याचें दिसत नाहीं. महमूद सिंधूच्या पलीकडे गेल्यावर आनंदपाळ आपल्या राज्यांत परत आला असला पाहिजे. आपल्या पराभवाचें शल्य त्याच्या हृदयास टोंचन राहिलें व त्यानें यझनीच्या राजाची सत्ता नाहींशी करण्याचा जोराचा प्रयत्न करण्याचा निश्चय केला. त्याचें वर्णन पुढील प्रकरणांत करण्यांत येईल.

प्रकरण सातवे. संयुक्त हिंदूची शवटली लढाई.

आनेदपालानें आपल्या मदतीला हिंदुस्थानच्या अनेक राजांना बोलावले, आपल्या धमीवरील व स्वातंत्र्यावरीळ या वाढत्या संक- टाचा नायनाट करण्यासाठी हिंदुस्थानानें एकत्र होऊन केलेल्या या शेवटच्या प्रयत्नाचे फेरिस्तानें फारच अतिरायोक्तिपूण वर्णन केळे आहें. परंतु उत्बीनें या प्रयत्नाला अशा तऱ्हेचे व्यापक स्वरूप दिलेलें नाहीं. नेहमीप्रमाणेंच सत्य या दोहोंच्यामध्ये आहे. आप- ल्याला हें माहितच आहे कीं काळ जसा मागे पडत जातो तप्ततशा बखरा जुन्या प्रसंगाचे वर्णन अतिशायोक्तीनें करितात. मागाहून येणारा प्रत्येक बखरकार अद्भृततेंत भर घालीत असतो. हिंदुस्था- नच्या प्राचीन इतिहासालाहि हीच गोष्ट लागू पडते; रामायणाच्या किंवा महाभारताच्या प्रत्यक नवीन आवृत्तीत मूळ गोष्टींत अद्भुत वृत्तांची अधिकाधिक भर पडत गेली आहे. मुसलमान इतिंह्यासका कांहीं या नियमाला अपवाद नाहींत, आणि त्यांनाहि विस्मयावह गोष्टींची भर घालण्याचा स्वाभाविक मोह आवरितां आला नाहीं. फेरिस्ता म्हणतो, ( ई. २ पा. ४४६ ):– _ “ महमुदानें हि. २९९ (इ. स. १००८) मध्यें आपलें सैन्य गोळा केळे, आणि हिंदस्थानांत स्वारी करून आनंदपालाचे | र पव्य करण्याचा निश्चय केला. मुलतानच्या मागल्या स्वारीचे बेळीं आनंदपाळ अतिशय उद्धटपणानें वागला होता. आनंदपालानें इतर हिंदूराजांची मदत मागेतली. मुसलमानांस हंदुस्थानांतून हांकून ह| ष्‌

द्द गझर्नांच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

देणे हें आपले पवित्र कतव्य आहे असे त्यांस आतां वाटूं लागले होतें. मदतीच्या निमंत्रणावरून उज्जनी, ग्वाल्हेर, कालंजर, कनोज, दिल्ली व अजमीरच्या राजांनीं संघ केला आणि सबुक्‍्तगिनाविरुद्ध केव्हांहि उभारळे नव्हतें येवढे सैन्ये गोळा केळे. आनंदपालाने स्वतः सैनापत्य पतकरिळें आणि तो महमुदावर चाळून गेला, दोन्ही सैन्ये पेशावर येथे भेटली आणि एकमेकांसमोर तळ देऊन राहिलीं. तीं अशा तऱ्हेनं ४० दिवस स्वस्थ पडून होती. कोणत्याहि बाजला लढाईला सुरवात करावयाची उत्सुकता होईना, मूर्तिपूजकांच्या सैन्यांत दररोज भर पडत होती. काफिर गख्खारहि मोठें सैन्य घेऊन येऊन मिळालें. हिंदुस्रियांनीं आपळे दागदागिने विकळे आणि लांब लांबच्या प्रदेशांतून या विक्रीचे आलेले पैसे आपल्या नवऱ्यांच्या आव्यक गरजा भागविण्यासाठीं पाठवून दिले. ज्या गरीब होत्या त्यांनीं सूत कातून किंवा इतर श्रम करून सांचविलेल्या पैशांतून आपली मदत पाठवन दिली. ”

या लढाईचा समकालीन उत्बी यानें जो वृत्तांत दिला आहे त्याच्याशीं वरील वर्णन ताडून पाहिलें तर तें खरोखरच अतिशयोक्ति पूर्ण ठरळें ““ सुलतान वामंद नदीवर आला तेव्हां वबाळ बिन अद्व- पाल हा त्याला मोठें सैन्य घेऊन आडवा झाला. युद्धाचा अम्नि- सकाळपासून संध्याकाळपर्यंत जळत होता. सुलतानाचे सैन्य पराभव पावून काफिरांच्या हातांत विजय पडतो कीं काय अशी वेळ आली होती. परंतु इस्लामी धमोळा जयाचे मिळालेळें आश्वासन खरें झालें. सुलतानानें आपल्या खास शरीरसंरक्षकांस घेऊन हल्ला केला आणि त्यापुढे बंडखोरांचे पाय तग धरूं राकले नाहींत (उत्बी,पा.३४०–४१)

आपले दागेने विकून आणि सूत कातून अथवा दुसरे कोणते तरी श्रम करून त्याची मिळालेली मजञर्राची रकम पाठवून स्त्रियांनी सैनिकांच्या खचोकरितां मदत पाठविली हें फिरिस्ताचं विधान शुद्ध ॥

संयुक्त हिंदूंची शेवटली लढाई. ६७

२०५

आतिशयोक्तांचें आहे. आपल्या सैन्याचा खच भागविण्या इतके हिंदू- राजे श्रीमंत होते. आणि जरूरच तर व्यापारी आणि देवळें यांच्या- पासून वर्गण्या गोळा करितां आल्या असत्या. उत्बीनें उछेख केला नसला तरी निरनिराळ्या अनेक हिंदू राज्यांतून फौजा आल्या, यावर विश्वास ठेवतां येईळ. कारण गोळा झालेलें सैन्य इतके प्रचंड होतें कीं जयाचे पारडे हिंदूच्या बाजूस कांहीं काळपर्यंत झुकत होतें. शिवाय कोरीव लेखांच्या पुराव्यावरूनहि कांहीं राजे आनंदपालाच्या मदतीला आले होते असें दिसून येतें. परंतु याहि बाबतींत उत्तरकालीन इतेहासाचें अधिष्ठान करून कल्पनेला सुचलीं त्या राज्यांचीं नावे फिरिस्तानें दिलीं आहेत. उज्जनींला जरी मालवाधिपति भोज राज्य करीत होता आणि सैन्य पाठविण्या इतका जरी तो प्रबळ होता तरी उज्जनी या लढाईंत सार्माळ झाल्याचे दिसत नाहीं. परमारांच्या इतिहासांत सांगितल्याप्रमाणें भोजानें तुकांशीं युध्द केळें असा एका कोरींव लेखांत उळेख आहे; परंतु त्यांत त्याला जय मिळाला असें म्हटलें आहे. कालंजरनं या युध्दांत भाग घेतला यांत संशय नाहीं धंगानें पूर्वींच्या संयुक्त प्रयत्नांत सबुकतगिना विरुध्द झालेल्या ठढा- इत भाग घेतला होता, त्याचें अनकरण करून त्याचा मलगा गंड या युध्दांत सामील झाला होता. कनोजला उत्तर हिंदुस्थानची सम्राट्‌ पदवी असल्यामुळें तेथून सैन्य यावें हें स्वाभाविक. ग्वाल्हेर कालंजरच्या राजाचें मांडलिक होते; तेथें कच्छपघात ( अर्वाचीन कघ्छवाह ) कुलांतील समर्थ सामंत राजा राज्य करीत होता. आणि कोरीव लेखांत त्याचा उल्लेख नसला तरी ग्वाल्हेरहून हि फौज ‘ आली असावी. दिल्ली किंवा अजमीर यांचीं राज्यें त्यावेळीं स्थापित झाले नसावीत किंवा. त्यांना या युध्दांत भाग घेण्याची ताकद तरी नसावी. आनंदपालाच्या तांब्यांतील पुष्कळ पंजाबी रजवाड्यांनीं त्याला सहाय्य केळें असावें. फिरिस्तानें कारमीरचा उल्लेख केलेला

दड गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

नाहीं. आणि या प्रसंगीं आनंदपालाच्या मदतीला सैन्य पाठविण्यांत आलें, अशा तऱ्हेचा उल्लेख राजतरॉंगेणींताहि नाहीं. कसेही असो, आपलें स्वातंत्रय आणि आपला धर्म यांच्या नाशाचं संकट उर्भे कर- णाऱ्या गझनीच्या नव्या वाढत्या सत्तपासून हिंदुस्थानचे रक्षण कर- ण्यासाठीं केलल्या या जोराच्या प्रयत्नांत आनंदपालानें प्रचंड सैन्य जमाविलें होतं असें निःसंशय दिसून येतं

ही हिंदुस्थानच्या भवितव्यतेचा निणय करणारीं लढाई पेशावरच्या मैदानांत झाली असं फिरिस्तानं म्हटलें आहे. परंतु इलियटला हे संभवनीय वाटत नाहीं. उर्त्बांनें युद्धाचे क्षेत्र दिळेळें नाहीं. परंतु वाहिंड आणि सिंधूच्या पश्चिमेकडील प्रदेश महमुदाचे अमलाखाठी पर्वींच असल्यामुळे निष्णात सेनापतीप्रमाणें शत्र-सैन्याला त्याच्याच हद्दींत गांठण्याची तजवीज त्यानें केली असावी. उत्बीने वमंद- नदीच्या तीराचा उलेख केला आहे (पा. ३४० ). परंतु ही नदी कोणती हें निश्चित करितां येत नाहीं. ही नदी ओलांडण्यांत आढी होती कौं नाहीं आणि असल्यास कोणी हेंहि त्यानें सांगितळें नाहीं. अटक जिल्ह्याच्या गँझेटिअरमध्यें या लढाईची जागा त्या जिल्ह्यांतील अटक आणि हजरो यांच्या दरम्यान असलेल्या छच्छच्या मैदानांत होती असें म्हटळें आहे, व रावळपिर्डाच्या गॅझोटेअरनें त्याचीच पुनरुक्ति केली आहे. दोहोंच्याहि मतं ही लढाई महमूद व शाहि- काबळ राजा आनंदपाल-तो पंजाबचाहि राजा होता-यांचे दरम्यान झाली. उत्बींच्या बखरींत हें नांव वबाळ बिन अद्वपाल असे दिलें आहे. परंतु तो खास फारशी अक्षर वाचण्याचा दोष आहे. नावां-

तला शेवटला भाग तरी आनंदपाठच असला पाहिजे. वबाल हं

त्याच्या मुलाचे नांव असूं शकेल.

या लढाईचा प्रकार आणि तिचा कालावाधि याचें फिरिस्ताने

जक भ्केडे

केलळें वणन इ. स. १७६१ साठीं पानिपतच्या रणांगणावर हिंदू

संयुक्त हिंदूची शेवटली लढाई. दर्‌

मुसलमानांमध्येंच झालेल्या लढाईच्या हकीकतीशीं इतके तंतोतंत जुळते कीं फिरिस्ताने केळळें वर्णन हें सदाशिवरावभाऊ व अहमद- शाह्या अबदाली यांच्यात झालेल्या लढाईच्या वणनावरून त्यानें नक्कल करून लिहिलें आहे, असा तक करण्याचा कोणासाहे मोह झाला असता. परंतु ती दुसरी लढाई होण्यापूर्वीच दोनशेपेक्षां अधिक वर्षे फिरिस्तान आपलें पुस्तक लिहिलें असल्यामुळें आपल्याला फक्त इतेहासाची पुनरावृत्ति होते या नियमाची आठवण या युद्धामुळे होते. अटकनजीक छछच्या मैदानावर इ. स. १००८ मध्यें हिंदु व मुसलमान सेन्यें समबळ असल्यामुळें दोन पहिलवान एकमेकांशीं भिडूनहि कांहों वेळ हालचाल न करितां स्तब्ध राहतात, त्याप्रमाणें प्रतिपक्षावर सरशी मिळविण्याची योग्य संधि पहात चाळीस दिवस भोंबतालीं खंदक खणून एकमेकांसमोर तळ देऊन दोन्हीं सैन्ये बसलीं होतीं. ज्यांची संख्या अतिशायोक्तीने तीस हजारपर्यंत फुगठी आहे, अशा अधसंस्कृत व अनावृतशिर गख्खरांनीं$ हिंदूंच्या सहाय्यास येऊन मात्र एकाएकी मुसलमानी खंदक ओलांडून मुसलमानांच्या तळावर हला चढविला आणि दहापांच मिनिटांत दहापांच हजार मुसलमान शिपाई कापून काढले. झालें, लढाईस सरवात होऊन दोन्हीं सैन्ये एकमेकांस मिडलीं आणि मध्यान्हापर्यंत उत्बीनंहि म्हटल्याप्रमाणे हिंदूची सरशी होती. परंतु यावेळीं भरती पूरी होऊन ओसरू लागली. अकस्मात्‌ असें होण्याला काय कारण घडले तें उत्बीनें दिलेलें नाहीं, परंतु फिरिस्ता म्हणतो “ गख्खरांचा आवेश

  • गख्खार हे आतां मुसलमान झालेले असून विशेषतः रोवळापिंडी जिल्ह्यांत आहेत. राजा जहांदादखान नावांच्या एका गख्खार संस्था- निकानें असं म्हटलं आहे काँ फिरिस्तानें खोक्करांऐवजीं गख्खार हें नांव चुकून दिल आहे, हला केला तो खोक्करांनी. ही जातहि आतां मुसल- मान झाली आहे.

७० गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

पाहून लढाई त्या दिवशीं थांबवावी म्हणून सुलतान स्वतः लढाईच्या धुमश्चक्रींतून बाहेर पडला. परंतु विधिघटना अशी कीं, आनंदपालळ ज्या हत्तीवर बसला होता तो हत्ती त्याच्यावर फेकलेल्या नक्तेलाच्या गोळ्यानीं आणि बाणांनीं एकाएकीं भडकला आणि तांड फिरवून पळत सुटला. आपल्या सेनापतीने ही पळण्याची इशरत दिली असें वाटून हिंडू सैन्याने लढाई सोडून पळावयास सुरुवात केली, त्यांचा अबद्दला ताईनें पाठलाग केला आणि आठ हजार हिंदू कापून काढल.” ही हकीगत उत्बीनें दिलेलीं नाहीं. परंतु त्याने दुसरी एक गोष्ट सांगितली आहे व ती अधिक महत्त्वाची आहे. ती गोष्ट अशी “ सुलतानाने आपल्या खास शारीरसंरक्षकांस घेऊन हृल्ठा केला व त्यापुढे काफिरांचा टिकाव लागला नाहीं.!’ ही हकीकत मराठे व अफगाण यांच्या दरम्यान पानिपतांवर झालेल्या लढाईत घडलेल्या हकीकतीबरहुकूम आहे. दोनप्रहरपर्यंत जय मराठ्यांकडे होता. इभ्रा- इमखानाच्या पळटणींच्या तोफा आणि हुजुरातीच्या स्वारांचे हले कहर करीत होते. अकस्मात्‌ विश्वासरावाला गोळी लागली व तो आपल्या हत्तीवर ग्रृत्यु येऊन पडला; आणि सेनापति पडला अशी बातमी पसरतांच मराठी सैन्य फुटलें. द्या हितावह क्षणांत महमुदा- प्रमाणेच अबदालीनें राखून ठेवलेळें ( रिझर्व ) अफगाण सैन्य घेऊन निकराचा हला केळा आणि मराठी सैन्य पराभव पावून पळू लागलें. बहुधा शूर परंतु दुर्देवी भाऊसाहेबाप्रमाणेंच अ’नंदपाळाहि हत्तीवरून उतरून लढाइंच्या गर्दीत सामील झाला असावा व धारातीथी ल्याने आपला देह ठेविला असावा. कारण लढाईनंतर त्या दोघांचहि काय लें ते आपल्याला नक्की माहीत नाहीं. ते जिवंत किंवा प्रेता- वस्थेत सांपडल्याचेहि आपण वाचिलें नाहीं. हिंदू व मुसलमान यांच्या दरम्यान १००८ इ. स. मध्ये झालेळं हं अत्यंत महत्त्वाचं युद्ध अशा तर्‍हेचे असून सात शतकांनंतर होणाऱ्या त्यांमधील युद्धाची

0

संयुक्त हिंदूंची शेवटली लढाई. ७१

पू्वीवात्तिच होतें. पानिपतच्या लढाईनंतराहि हिंदूंचे सामथ्ये जसें कांडी काळ टिकळलें तसंच या युद्धानंतराहे हिंदूचे प्राबल्य कांहीं कालपर्यंत पंजाबांत होतें. परंतु हा मर्मा घाव बसला आणि मुसलमानांस हिंदु- स्थानांतून हांकून देण्याचें हिंदूचे सामथ्ये या दोन्ही लढायांत कायमचें नष्ट झालें.

आमच्या इतिहासाचे कथन पुढें चाळू ठेवण्यापूर्वी येथें थोडें थांबून हिंदूंच्या परभावाच्या कारणांचा विचार करणे अवश्य आहे. पानिपतांत काय किंवा छच्छच्या मैदानांत काय मनुष्यबळाची हिंदूंस कमतरता नव्हती, किंबहुना असेल तर संख्याबळ त्यांच्याच बाजूला अधिक होतें. पानिपतप्रमाणें येथेंहि हिंदू शो्यानें आणि जिवावर उदार होऊन लढले. तिसरी गोष्ट, कोणल्याहि लढाईत मुसल्मानांचौ शास्त्रास्रे हिंदूंच्या शस्त्रांश्नांपेक्षां अधिक तेजस्वी नव्हतीं. पानिपतास दोघांच्याहि जवळ तोफा होल्या आणि हिंदूंचाच तोफ- खाना अधिक कारगर होता. छच्छच्या लढाईत तोफा किंबा बंदुका कोणाहि कडे नव्हत्या. त्यांचा त्यावेळीं शोधच लागला नव्हता. दोघांकडेही तींच शास्त्रे म्हणजे तरवार व भाले हीं होतीं. हिंदूच भाळे आणि तरवारी मुसलमानांच्या भाले-तरवारींपेक्षां अधिक तीक्ष्ण नसले तरी कमीहि नव्हत्या. छच्छमध्ये आणि त्याचप्रमाणे पानि- पतालाहि दैवच मुसलमानांस अनुकूल झालें असं कदाचित्‌ म्हणतां येईल. दैव हें जय मिळवण्याच्या कारणांपैकी एक कारण आहे असें जे कबूल करीत नाहींत त्यांना असें म्हणावयास हरकत नाहीं कीं, देवरूपी कारणाचा संबंध या मानवी जगांतील प्रत्येक प्रसंगाशी निगाडित झाला आहे. परंतु दैव अनुकूल किंवा प्रतिकूल आहे असें जेव्हां आपण म्हणतों तेव्हां म्हणण्याचा आदशय असा असतो कीं मनुष्याच्या हातांत नसलेल्या अशा कांहीं आकास्मक गोष्टी विजयी- पक्षाला मदत कारितात आणि पराजित पक्षाची निराशा कारितात.

७२ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

सबुक्‌तगिनाशीं यापूर्वी सिंधु नदीच्या पलीकडे झालेल्या लढाईत एकाएकीं बफोचे वादळ उठलें आणि उष्ण देशांत राहणाऱ्या हिंदु लोकांस तसल्या थंड हवेची संवय नसल्यामुळं त्यांची दैना उडालीं. या लढाईंत आनंदपालाचा हत्ती बाणांच्या व नक्तेलाच्या गोळ्यांच्या तडाक्‍्यांत बेफाम झाला आणि तोंड फिरवून पळूं लागला. परंतु आपल्याला हें ध्यानांत धरलें पाहिजे कीं लढाऊ हत्ती असल्या अस्त्रांचा मार सहन करण्यास शिकविलेळे असतात. बाण किंवा गोळे नवे किंवा विलक्षण नव्हते. ते या ठढढाईतच प्रथम उपयोगांत आणले होते असें नाहीं. या अपघातांत आणि पानिपनतच्या लढाईंत विश्वासरावास प्राणास मुकविणाऱ्या अपघातांत काडीचे अंतर नाहीं. हत्तींच्या लढाईची कांहींह्वे माहिती नसलेल्या अश्या हछींच्या लोकांस अनेक शातकांचें अतर पडलेल्या अशा त्या कालांत सेनापतीनीं आणि विशेषतः स्वतः सैनापल्य अंगेकारिलेल्या राजांनीं हत्तींवर बसून गोळे, बाण आणि विशेषतः बंदुकीच्या गोळ्या यांस सहजासहजी बळी पडावें हें खरोखर विलक्षण आहे असा शोरा मारण्याचा मोह होतो. परंतु बल्खनर्जांक इठेकखानाशीं लढतांना स्वतः महमूदाहे हत्तीवरच स्वार झाला होता असें आपणांस पूर्वीच दिसळें आहे. तेव्हां आनंदपालानें हत्तीवर बसण्यांत घोडचूक केळी अशी आपल्याला कल्पना करितां येणार नाहीं. परंतु विश्वासरावानं पानिपतास हत्ती- वर बसून आपल्यावर बदुकीच्या गोळ्या घालण्या’ची शत्रस मुभा दिली ही घोर चक केली असें म्हणतां येते. आनंदपालाच्या काळांत बंदुका नव्हत्या, त्याच्यावर जीं असें फेकतां आलीं असतीं तीं बाण आणि नक्तेलांचे गोळेच होते आणि त्यांपासून रक्षण करण्यास त्याचें व त्याच्या हत्तीचे चिलखत पुरेसं होतं.

दैव प्रतिकूल झाळें व हत्ती फिरला असें मानळें तरी इतिहास- काराला असें म्हटल्याखेर्राज गत्यंतर नाहीं कीं, अकस्मात्‌ एखादी

संयुक्त हिंदूची शेवटली लढाई. ७३

गप्रतिकूळ गोष्ट मागात आडवी आली असतां शूर व कणखर माण- सांनीं जे घैय व जो युक्तिबाजपणा दाखवावा अशी आशा करण्यांत येते तसं धैर्य किंवा तसा युक्तिबाजपणा केव्हांहि हिंदूनीं दाखविला नाहीं. हा आमचा दोष आम्ही पूर्वीच भाग २ (पा. २४६) मध्ये दाखविलेला आहे.आणि पुष्कळदां खरोखर पराजय झाला नसतांहि नायकत्व करणाऱ्या राजाला एखादा अपघात झाला असतां हिंदु- स्थानांतील सेन्ये पळूं लागून जी विचित्र वतेणूक कारेतात तं राष्ट्री- यत्वाच्या कल्पनेचा पूणे अभाव असल्यामुळे हिंदी सॅनिकांस लढाईत जय मिळविण्यांत स्वतःचे असें कांहींच हित वाटत नसतें म्हणून असें दाखवून दिलें आहे. कसेंहि असो, हिंदी स्वभावांतीळ किंबहुना हिंदु व मुसलमानहि लोकांचा हा दोष नमूद करण्यास हरकत नाहीं कीं, पाश्चात्य आणि विशेषतः ब्रिटिश सैनिकांचा या गुणाबद्दल लौकिक आहे; तसा आपत्काळीं कणखरपणें लढण्याचा हा गुण हिंदी लोकांच्या अंगीं नाहीं. सेनापतीला अत्यंत आवश्‍यक असलेला हा गुण महमुदाच्या ठिकाणीं होता यांत संशय नाहीं. शिवाजी- प्रमाणें तोहि दैव प्रतिकूल दिसळें असतां कधीं निराश न होतां चिकार्टानें लढे. शिवाय महमूद हा खरोखरच विख्यात सेनापाति होता. अहमदशहा अबदालीप्रमाणे त्याच्या जवळाहि निश्चयी आणि शूर शरीरसंरक्षकाचें राखून ठेवलेळें ( रिव ) पथक होतें. गझनीचे राजे व विशेषतः महमूद हें पथक फार खच करून जय्यत तयारानें बाळगीत असत. अहमदशहा अबदालीप्रमाणें महमुदानें योग्यक्षणीं या शरीरसंरक्षकांस घेऊन स्वतः हला केला आणि त्या संस्मरणीय युद्धांत शावटीं जय मिळविला. त्या जयाने अखिल हिंदुस्थानचे नसलें तरी पंजाबर्चे नशीब कायम ठराविळें आणि हा प्रान्त लवकरच मुसल- मानांच्या ताब्यांत गेला.

७४ सयुक्त हंदूचा शेवटला लढाई. टिप्पणी-संयुक्त लढाईचे ठिकाण. पूर्वी सांगितलेंच आहे काँ फिरिस्ताच्या मते ही लढाई पेशावराजवळ झाली आणि कित्येक हिंदी ग्रथकार पेशावर व जमरूद यांच्या दरामे- यान ही लढाई झाडी असे नक्की ठिकाण सांगतात. प्रत्येक बाजूस निदान लाख फोज अशा प्रचण्ड संख्यमधील लढाईंइतकें हे मैदान विस्तीर्ण आहे हेंहि खरे, पण अटक आणि रावळपिंडी जिल्ह्याच्या गॅझेटीयरमध्यें ही लढाई बिंधु नदीच्या पुवकडील छछच्या मैदानांत ह॒जरोजवळ निश्चि- तपणें झाल्याचें विधान आहे. किंबहुना अटक जिल्ह्याच्या प्राथमिक शाळांत चाळू असलेल्या भुगोलांत ही लढाई हजरोजवळ झाली असेंच स्पष्ट लिहलं आहे. आमच्या मतं गॅझेटियर’चें ह॑ विधान मान्यकरण्या- जोगे आहे. हं विधान कोणत्या आघारावर केलें आहे याचा अद्याप आम्हास ठाव लागला नाहीं. उतबीनं एक वामंड नदी उल्लोखिली आहे व ती सुलतानाने बलांडली. पेशावर प्रांन्तांत या नांवाची नदी नसल्यानें आपल्यास येथे दुरस्ती करून नदी (सिन्धु, वहिंड येथे वलांडली, असें घरतां येईल. या लढाईत वइ, स. १७६१ च्या पानिपतच्या लढाईत पुष्कळ साम्य असल्याचें आपण पाहिले आहे; त्यावरून असे सुचते की ज्याप्रमाणें भाऊसाहेब यमुना उतरून अन्तवेदींत अबदालीस गाठण्याचा

न न 1५, वहिड //</>% 56 . छ॑ - रर: रड क्ल हर 9

  • श्र्द् शि श्र टर नर श्& र ह गी तती

3 र्ट श्र यः “च

0 &9)”

ट्र १। द्र र्र

< 311 द यही

दि त्र्य “) »न्प्र ऱ्य /

द््क् कम्ग्ल्परर भन]

1002 - छचच्या मैदानाचा नज़र तझय्राः 7 , ठ्् 12% “ग “ र >“ ॥।

गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या. ७५

विचार करीत आहेत तांच अबदाली यमुना उतरून भाऊसाहेबांसमोर झाला त्याप्रमाणं महमूद स्वतः सिन्धु उतरून आनदपालास आडवा झाला असावा; बहुतेक आनंदपाल दाक्षिणिकडून चाल करीत हजरोस पाचून वाहिंड जवळ सिन्धु उतरण्याचा विचार करीत असावा. पुढे दिलेल्या नजरी नकाशावरून येथील लढाईच्या ठिकाणाची स्थिति वाचकांच्या लक्षांत येईल. शत्रूचे भारी सेन्य ब मजबूत ठिकाण पाहून महमुदाने आपल्या- भोवती खदक खोदला, आनंदपालानें महमूद सिंधु उतरत असतां त्यास कां अडथळा केला नाहीं याचें कारण असें दिसते कां महमूद सिन्धु उतरून इकडे येईल असें त्यास वाटले नसावें, किंवा त्यास योग्य वेळी बातमी नसावी किंवा सिन्धूच्या पूर्वेकडेंसच त्याशी लढावें अशी त्याची इच्छा होती. चचानें महमद कासमास सिन्धु उतरताना विरोध केल्याचे वर्णन जसें सिन्धच्या इतिहासांत आढळतें तसे येथे आनेदपालानें केल्याचे आढळत नाही. कदाचित्‌ आनंदपाळ येऊन पाण्या पूर्वीच महमूद सिन्धु नदी उतरून आला असेल. या कल्पनेत हजरोचा कबजा महमुदाचा असावा. हजरोच्या दाक्षिणेकडील छछचे मेदान अशा प्रचण्ड फोजांच्या लढाईला योग्य असें विस्ताण आहे. या मैदानांत जवळ, १०१५ फुटावर विषुळ पाणी लागतें. मैदानांत खाच खळगे किंवा उंचबेटे नसून पानिपतच्या ( किंवा कुरुक्षेत्राच्या ) मेदानासारखें तें सपाट आहे आणि घोडदळांच्या हालचालीस योग्य आहे. हलीहि या मेदानांत ब्रिटिश फोजांच्या कवायती होतात,

प्रकरण आठवें. नगरकोटची स्वारी.

मक स्य्व्> स्स्स

हिंदु संयुक्त सैन्याचा धुव्वा उडवून त्याला उधळून लावल्यावर महमुदानें त्या अनुकूल पारोस्थतीचा फायदा घेतला व नगरकोटा- वर एकदम चाळ केली. तेथील विख्यात मूर्ति आणि अगागित सं- पत्ति याबद्दल नगरकोट प्रसिद्ध होते. केवळ अमयाद ळूट मिळवि- ण्याच्याच एका हेतूनें महमुदानें केळेडी अशी ही पहिलीच स्वारी. केवळ ठळुटीसाठीं महमुदानें हिंदु देवाल्यांवर हल्ले केळे याबद्दल त्याला दोष देतां येईल किंवा नाहीं याचें विवरण पुढें करण्यांत येईल. येथें येवढेंच सांगितळेंल॑ पुरे कीं त्यानें शिवाजीप्रमाणें वाकबगार अशा बातर्मादारांचें स्वतंत्र खाते बाळगून ळूट कोठें मिळेळ याची बरोबर माहिती गोळा केळेढी असली पाहिजे. उत्तरहिंदुस्थानांतील हिंदु- राज्यांत व्यांच बातमीदार उघडपणे किंवा गुप्तरीतीनें फिरत असावेत. नगरकोट हा कांगडा राज्यांतीळ किला होता. तेथें एक प्रसिद्ध मृर्ते होती. ती कोणल्या देवतेची होती तें कोठें आढळत नाहीं. ज्वालामुखी देवळाचा व या देवळाचा कांहींवेळां घोटाळा करण्यांत येतो पण ज्वालामुखी हें निराळेंच देऊळ आहे. आणि ज्वालामुखी नगरकोटपासून पंधरा मेलांवर आहे; तेथें एका टेंकडीच्या शिखरापासून वायूचे ( गसचे ) उव्क्षप उडतात व याल्ले- करूं आले असतां पुजारी ते पेटावितात. येथें बहुतकरून दुर्गेचे देऊळ सावे. ज्याळामखीप्रमाणेंच नगरकोट येथील मूर्तीची पूजा करण्या- साठीं दूरदूरच लोक येत व मोल्यवान वस्तू देवाला अर्पण करीत तेथील किल्ला फार मजबूत असल्यामुळे मुसलमानी इतेहासकारांनी

नगरकोटची स्वारी. ७७

म्हटल्याप्रमाणें हिंदुस्थानचे राजे आपले खजिनेहि तेथें ठेवीत. नग- रकोट हें अर्वार्चांन नांव आहे. प्राचीन नांव भीमनगर होतें. महा- भारतांतील वीर पुरुष भीम यानं ते राहर वसविले असं सांगतात. परंतु बहुशः तें काबूलच्या ब्राह्मणशाह्ी भीमदेवानें वसविळें असावें. उर्त्बींनें त्याचे नांव “ बहीम किला ‘’ असें दिलें आहे. फारशींत

बहीमच्या ऐवजीं भीम सहज वाचतां येईल. उत्बीनें या स्वारीचा

वृत्तांत दिला आहे तो असा: —

“ आणि मग तो (महमूद) बहीमबगरा ( भीमनगर ) किल्याच्या पायथ्याशीं येऊन पोंचळा. हा किल्ला पाण्यांत पर्वताप्रमाणें उंच आहे. हिंदुस्थानांतील राजांनीं आपल्या प्रसिद्ध मूति तेथें आणून ठेविल्या- मुळें तो त्यांचा खजिनाच बनला होता. मोल्यवान वस्तु आणि जवाहिर यांची ओझींच्या ओझीं माक्ते मिळण्यासाठी तेथे पाठविली होतीं. सुलतानाने त्या किछ्याळा चोहोंबाजनें वेढा दिला. किछ्यां- तील लोक किछ्याचे रक्षण करण्यासाठीं निश्चयाने व चिकाटीने लढू लागले. ……..शेवटीं…. …. ते शरण आले. आणि त्यांनी सुलतानाच्या छत्राखालीं नोकरी करण्याचे मान्य केलें. जवाहीर, हिरे आणि दूर्मिळ संग्राह्य वस्तु सुलतानास इतकीं सांपडली कीं हातांनी तीं मोजतां आली नाहींत आणि हिशेबाच्या वह्या त्यांची नोंद करावयास पुरेनात. सोनें व रुपं सुलतानाने आपळे खजिनदार अल- तूनताश व इस्तरजिन यांचे ताब्यांत दिळें आणि जवाहीर आपल्या स्वतःच्या ताब्यांत ठेवून त॑ सर्वे उंटांच्या व माणसांच्या पाठीवर घा- लन नेलें. त्यांतील जवढ्याची गणती करितां आठी तेवढ्यावरून दिऱ्हमचीं १०७० पुडकी आणे ७००८०० मणसोनेंवर्पेंत्या ठुटींत सांपडलें असं दिसतें. रेशमी कापड व कपडे याविषयीं म्हणाळ तर तीं इतकीं होती कीं सरकारी कारकुनांस त्यांची व्यव- स्थित मोजदादच करितां येईना, अश्या तऱ्हेचे कसब व रम्य बनावट

७८ गझर्नाीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

आपण कोठेच पाहिलीं नाहीं असं लोकांनीं कबल केलें. त्यांना एक रुप्याचें प्रशस्त सबंध घर सांपडलें. तें साठ हात लांब व पन्नास हात रुंद होतं. त्यांत दोरांच्या सहाय्यानें अशा यांजना केली होती कीं सर्व घरांत एकच दालन करावें किंवा निरानेराळ्या खोल्या पाडा- व्या. तें घर लहान मोठें करितां येत असे. त्यांत ग्रकिपद्धर्तांचे जर- तारीचे काम केलेले रेशमी पडदे होते. शिवाय दोन सोन्याचे व दोन रुप्याचे पुतळे होते. अत्यंत विश्वासु असा अधिकारी किछ्या- च्या रक्षणासाठी ठेवून सुलतान गझनीला परतला. तेथें एका दिवाण खान्यांत गालिच्यावर ल्याने हिरे, मोल्ये, पुष्कराज व पा’च यांचें प्रदशेन केळं आणि निरनिराळ्या देशाचे मांडालिक रजवाडे व प्रांतांतून आ- ठेले प्रतिनिधि आणि तुर्काच्या राज्याचे वकील यांनीं तं पाहून आश्च- यानें तोंडांत बोटें घातलीं. ‘? महमुदाला त्याच्या स्वाऱ्यांत कशा अवा- ढव्य लटी मिळत याची वाचकांस कल्पना यावी व अशा तऱ्हेची वर्णनें पुनः पुनः द्यावी लागूं नयेत म्हणन नमुन्यादाखल हं टुर्टाचें वर्णन आम्ही दिलें आहे. येथें हें हि वाचकांच्या नजरेस आणाव- यास हरकत नाहीं कीं, शिवाजीप्रमाणें महमुदाहे लुटींत जी संपात्ते तो मिळवी तिचा तपशीलवार हिशोब ठेवीत असे. त्या लुटीची योग्य तर्‍हेनें किंमत करण्यांत येत असे. सरकारचा एक मोठा विशिष्ट भाग काढून ठेवन बाकीची ळूट शिपायांत वांटण्याबद्दलचें कांहीं नियम पाळण्यांत येत असळे पाहिजेत. नवीन धमोच्या प्रसाराथे सुरुवातीला आरबानीं केलेल्या लढायांत सरकार किंवा खलिफा आणि शिपायी यांत ळुटींची विभागणी करण्याचे जे नियम होते ते कडक- पणें पाळण्यांत येत असत. सारांश, शिवार्जाच्या अमदानींतल्याप्रमाणे ळूट करण्याला व ती वांटून घेण्याला एक पद्धत होती

नगरकोट किल्याभोवतालीं जें दुस्तर पाणी होतें तें इईलियटच्या मतें बाणगंगा व बियाही नद्यांचे. भोमनगर किछ्यापासून सुमारें एक

स कटर

डया पजा

नगरकोटची स्वारी. ७९

मैलावर आहे, हल्लीं जेथें भवानी (देवी) आहे, तेथें होतें (इ. २ पा. ४४५ ). ही नगरकोटची स्वारी छछहजरो येथें संयुक्त हिंदु सैन्या- चचा पराभव झाल्या बरोबर करण्यांत आठी असली पाहिजे. कारण उत्बीनें योाजेलेल्या ‘ आणि मग! या राब्दांनीं तोच अथे स्पष्टपणें दशविला चातो. परंतु कांहीं इतिहासकारांनी ती इ. स. १००९ मध्ये दिळी आहे. ८ (र ७ ७2 ८ वक) > टिप्पणी–कांगडा येथील किल्ला व देवळं.

कांगडा हें एक हिमाल्यांतील उंचावर मैदान आहे, त्याच्या पाठीशी बर्फाच्छादित रांग आहे; व त्यांतून तीन चार खडु म्हणजे लहान नद्या बारा महिने वाहणाऱ्या वाहतात. हा प्रदेश अतिप्राचीन काळी आये- संस्कृतीखालीं आला असावा, आणि महाभारताच्या काळापासून येथें चंद्रवंशी क्षत्रिय राजे ( त्यांस हल्लीं कटोच म्हणतात ) राज्य करीत आले, हें आपण पाहिलेंच आहे. त्यांची आश्रयाची मजबूत जागा म्हणजे कांग- ड्याचा किल्ला हा एक पुराणा किल्ला आहे. ज्यावेळेस तोफा माहीत नव्हत्या, त्यावेळेस हा किल्ला अजेय होता. दोन खोळ खडु उफ नद्या, बाणगंगा आणि मनूनी, यांच्या संगमावर हा किल्ला आहे. ह्या खोल नद्यांच्या संगमाच्या ठिकाणीं त्यांच्या दरम्यान फारच अरुंद जमीनीची पट्टी आहे. नदींच्या कडेची किल्याची बाजू बहुतेक उभी सुमारें तानरां फूट उंच आहे. नद्यांमधील अरुंद जमीनीच्या पट्टींत एक मोठा खंदक खोदला आहे आणि किल्यांत जाण्याचा दरवाजा या कृत्रिम खोलीच्या पलीकडे आहे. या ठिकाणीं थोड्याशा संरक्षकांस किल्याचे संरक्षण कारितां येईल. मुसलमानी इतिहासकारांच्या लेखांवरून या किल्यांत एक प्रसिद्ध देऊळ होतें, हें देऊळ कोणाचें होतें हें ठिकाणावर मिळविलेल्या माहितीवरून व इ. स. १९०७५ च्या अर्किआलॉजिकल सर्व्हे रिपोर्टावरून आपण ठरविण्याचा प्रयत्न करू. या रिपोटोत इ. स, १९०५ च्या धरणीकंपापूर्वी जीं देवळें कांगडांत हातीं त्यांची विस्तृत माहिती दिली आहे.

या रिबोर्टात ह्या किल्याचा इतिहास येणेंप्रमाणें दिला आहे. (पा. ११) “ अजेय महमुदानें इ. स. १००९ त हा किल्ला घेतला. इ. स.

८० गझर्नाच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

१३३७ त तो पुनः महंमद तघलकानें आणि इ. स. १३५१ त त्याच्या घुढील सुलतान फिरोजशहा यानं पुनः घेतला. मुसलमानांच्या हातांत जेव्हां तो जहांगीरनें १६५१त जिंकला, तेव्हां तो कायमचा पडला. जेव्हां मोंगलांची सत्ता कमी झाली तेव्हां तो संसारचंद दुसरा यानें पुनः परत घेतला. कर्नळ नअनकचद जम्मू व॒ काइमीर कोन्सिलचे मेंबर ( हें स्वतः कटोच आहेत ) यांच्या मतें संसारचंदाचा बाप घमंडचंद यानें किल्ला परत घेतला (इ. स. १७८६), तो त्यांनी पुनः रणजी- तसिंगास इ. स. १८०९ मध्यें दिला. शॉखांनीं तो ब्रिटिशांस इ. स. १८४६ त दिला. ब्रिटिश फोज इ. स. १९०० पर्यंत किल्यावर रहात होती. ” (हल्लीं तो घरणीकपानें पडला आहे.)

किल्यांतील मुख्य संस्मरणीय ठिकाणें म्हणजे लक्ष्मीनारायण आणि शीतला यांचीं देवळें होत. हीं दोन्ही परवाच्या धरणीकंपांत पडलीं. आपल्यास असें ग्रहीत घरतां येतं की, महमुदानें हा किल्ला ठुटल्या- नंतरची हीं देवळें होती. ऑबिकेचे देऊळ ( अद्याप येथ पूजा होते ) ही एक साधी इमारत आहे. धराणिकपाने तें बिघडलेले नाहीं, या देव- ळाच्या कृर्तीवरून असे दिसते का, तें मुसलमानी अमदानींत बांधलें गेल. आबिकेच्या दक्षिणेस दोन जैन मूर्ति आहेत. एक नुसती पादुकाची आहे. दुसऱ्यावर आदिनाथाची बसलेली मूर्त आहे. त्याखालीं अंशतः नष्ट झालेला एक लेख आहे. कानेंगहमच्या मतें- त्याजवर १५२३ संवत्‌ ( १४६६ इसवी ) मिती दिली आहे. अर्थात्‌ तो संसारचंद पाहिला याच्या वेळचा आहे. (पान १५)

“: तिसरे चित्र कांगडा शहरांतील इंद्रे्वर देवळाचें आहे. हे देऊळ शिवालय असून तं इंद्रचंद्रानें बांधले असं म्हणतात. कल्हणानें अनंत- देवाचा (इ. स, १०२८-१०६३ ) समकालीन म्हणून ज्या इंद्रचंद्राचें नांव सांगितले आहे, तोच हा इंद्रचंद्र असें मानलें तर हं देऊळ अक- राव्या :शतकापासून आहे असें दिसतं. या देवळाच्या बाजूलाहि दोन जैन मार्त आहेत. त्यापैकी एकावर ‘ लोककाल? ३० ही मिति दिलेली आहि. बैजनाथ देवळांतील प्रशस्तीच्या समकालीन हा लेख आहे असे प्रथम समजलें गेळें. अथातू तो इ, स. ८५४ चा मानला गेला पण

नगरकोटची स्वारी. ८१

हल्ली बैजनाथ लेख संवत्‌ १२०४ चा ठरला आहे, तेव्हां ही मूर्ति इ, स, ११५४ मधली असावी. चार खांबावर असलेला देवळाचा मंडप घरणीकपानें जमीनदोस्त झाला आहे. पण बाकीचें देऊळ जैन मूतींसह जसंच्या तसें आहे. (पा. १६)

““कांगडा जिल्ह्यांतील सवात प्रसिद्ध पूज्यस्थान म्हटले म्हणजे वज्रे- श्वर्राचें देऊळ होय. हं कांगडा शहराचा एक बाहेरचा भाग भवन नांवाचा आहे त्यांत आहे. प्राचीन काळापासून हें ठिकाण पवित्न आहे. पण भूकंपांत जे देऊळ पडलं तें प्राचीन नव्हतें. जुन्या देवळाचा दरवाजा कायम असून त्यांत एक लेख आहे त्यावरून “ श्रींमहंमदाच्या वेळीं! हें देऊळ बांघलें असं दिसतें. कानेंगहनच्या मतें हा दिल्लीस इ. स. १५२३ पासून १५४६ पर्यंत राज्यकरणारा महंमद सय्यद होय. हें देऊळ बांधळें त्यावेळेस कांगड्यांत संसारचंद राजा होता. ” हें देऊळ हिंदु- समाजानें आतां पुनः बांधलं आहे हें सांगितलें पाहिजे.

वरील माहितीवरून असे ठरतें कीं, जें देऊळ महंमुदानें पाडले तं किल्ल्यांताळ लक्ष्मीनारायणाचें किंवा शीतळादेर्वाचें देऊळ नव्हे; किंवा शहरांतील इंद्रेश्वराचे देऊळ नव्हे, कारण या तीन्ही इमारती महमुदा- नंतरच्या आहेत. बाकी राहतात किल्यांताळ ओबिकेचे देऊळ व भवन येथील वज्रेश्वरीचें देऊळ. हें वज्श्वराचें देऊळ पुनः बांधतांना हिंद समाजानें जे एक छापिल प्रासिद्धिपत्र काढलें आहे, त्यांत असें म्हटलें आहे की, महमुदाने हें देऊळ इ. स. १०५९ मध्यें तोडले, तें कांगड्याच्या एका राजानें इ. स, १०४३ त पुन्हां बांधलें. इ. स, १३३७ त महं- मद तघलकानें तें पुनः तोडले. तें हिंदूनीं पुनः बांधलें; पण फिरोजनें इ. स. १३६०त पुनः तोडले. इ. स. १४४०त संसारचंद पहिला याने पुनः बांधलें; पण शेरशहाचा सु नापंति खवासखान यानें इ, स, १५४० त तं पुनः तोडले. ते राजा धरमचंद यानें अकबरच्या वेळेस पुनः बांधलें. ‘ हल्लांचे गुळेरचे महाराज बहुश्रुत आणि विद्वान्‌ असून मोठ्या सभ्य ‘ चालींचे आहेत; त्यानीं आम्हांस असें सांगितलें की,’‘महमुदानें जे देऊळ

’ तोडलं तें भवनमधील वज्रेश्वराचें देऊळ होय. आणि पूवकाळीं भवनाच्या

ळा

२]

८२ गझर्नांच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

भोंवतीं कोट होता. ” पुष्कळांचें मत असंच आहे. पण आम्हांस असें वाटतें की, वज़ेश्वर्राचे पाहलं देऊळ संसारचंद पाहिला यानें बांघलेलेंच होय, या मताची कारणें पुढील प्रमाणें आहेत. मुसलमानी लेखकांच्या सवे वर्णनांत महमुदानें कांगडाचा किल्ला घेऊन तेथील देंऊळ तोडले असं येतं, वज्रेश्वर्रांचे देऊळ किल्यांत नाही; गवन येथें आहे. हा भाग कांगडा किल्ला किंवा कांगडानगर यापासून दोन मेळ दूर आहे. तेथील

जागेची स्थिति वाचकांच्या लक्षांत येण्यासाठी आम्ही एक कोट कांगडा,

कस्य 0१0 काऱ्डयाचा नजरी नक्ारए

नगरकोट आणि भवन यांची स्थिति दाखविणारा नजरी नकाशा येथे देत आहो. भवनाभोंवतीं कोट असला तरी तो मजबूत नसावा. त्याप घेणें कोट कागड्याइतके कठीण नसावं. तघलकानें जें देऊळ मूतींसह पाडले. तोहि किल्यांतच असून हा किल्ला त्यानें घेतल्याचें दिसतें. कटोच राजांनीं किल्ला परत घेतला, आणि पुनः देऊळ बांधलें. पण फिरोज तघलकानें घुनः किल्ला घेतला, अश्या वारंवार आपत्तीनंतर संसारचंद पहिला जु वेळी हिंदूनीं हें देऊळ भवनमध्ये खालीं आणले असं वाटतें-

४4

ही आणखी गोष्ट सांगितली पाहिजे का, इर्लाच्या वज्ञश्वरी देवळातील मूर्ति हातांनी केलेली नसून स्वयंभू मर्ती आहे. म्हणजे जमार्नातून थोडेसें वर आलेल्या एका दगडास डोक्याचा निदान डोळ्यांचा आकांर

नगरकोटची स्वारी. ८३

आहे. देवीची स्वयंभू मूर्त आम्ही हाच प्रथम पाहिली. या स्वयंभू स्थानाविष्यी अशी आख्यायिका आहे काँ, एक शेतकरी शेत नांगरीत असतां नांगराचा फाळ देवीस लागून रक्त बाहेर आलं, त्यामुळें ही देवी सांपडली. स्वयंभू देवाच्या प्रकट होण्याची गोष्ट नेहमी अशीच असते. असे संभवनीय दिसते काँ, बनारस किंवा उजयिनी येथे मुसल- मानी सत्ता स्थापन झाल्यावराहे ज्याप्रमाणें तोडलेल्या जुन्या देवाच्या शेजारीं त्याच देवाचें दुसरे देऊळ हिंदूंस बांधूं दिलें, त्याचप्रमाणें कांग- ड्यांतहि किल्ला मुसलमानांच्या ताब्यांत राहून हिंदूंस त्याच देवतेचे भवन येथें एक निराळें देऊळ बांधण्यास परवानगी मिळाली, हें वज्रेश्वरीचे देऊळ संसारचंद पहिला यानं इ, स, १४४०त बांधलें. पण मूर्तिभजक शेरशह्या याने शेभर वषानंतर तें तोडले, घर्मासंबधी समतोल बुद्धि ठेव- णारा अकबर यानें घरमचंदास तें देऊळ पुनः बांधूं दिलें. वरील मनो- रंजक इतिहासावरून कांगड्याच्या कटोच राजांची उत्कट हिंदुधमश्रद्धा चांगली दिसून येते. इ. स. सोळाशेंच्या सुमारे धरमचंदानें बांधलेले देउळ इ. स. १९०५च्या भूकंगापर्येत कायम होतें. हिंदु समाजाच्या जोरदार घमेभावनेनें हे देऊळ पुनः बांघलें गेलें आहे. फक्त कळसावर सोनें चढणें बाकी आहे.

ही गोष्ट आणखी सांगितली पाहिजे कीं किल्ल्यावरील आबिकेच्या देवळांत अजून कटोच रजपूत पूजा करण्यास जातात. किंबहुना किल्ल्यां तील आब्रिका देवीसमोर प्रथेक कटोच गोदान संस्काराच्या वेळीं काप- लेले आपले केस नेऊन ठेवावेतो असं आम्हांस कळलें. या गोष्टीवरून आणि वनज्रेश्वरी देवांच्या प्रकट होण्याच्या कथेवरून आम्हांस असें वाटतें कौं, महमुदाने तोडलेलें कांगडांतील प्रसिद्ध देवालय आबिकेचें असावें, ( हल्लीचे अंबिकेचे देवालय अकियालाज्ञेकल सव्हेच्या रिपोटा प्रमाणें महमुदाच्या नंतरचे आहे ) किंबा तें किल्ल्यांत वज्रेश्वरराचें मूळचें देऊळ असावें. अनिकेच्या देवाल्यांतील हछीची मूर्तीहे हाताने न केलेली म्हणजे स्य्थंभू आहे. अशा देवळांत चलमूर्त निराळ्या असतात आणि उत्‌ब्रीनोह्े स्पष्ट सांगितलें आहे कां या ठिकाणी हिंदुस्थानच्या लोकांनीं आपल्या अनेक मूर्ति आणून ठेवल्या होत्या,

८४ गझर्नाच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

उत्‌बीनें जें वर्णन केलें आहे काँ, बहीमबग्राच्या किल्ल्याजवळ महमूद पोहोंचला तो किल्ला पाण्यामध्ये पवेतासारवा उंच होता आणि तेथें अलंघ्य खाडा होता ? ( पा. २४९), ते या दोन नद्यांच्या संगमा- वर असलेल्या या किल्ल्याला बरोबर लाणू पडतें. बहीमबग्रा हा शाह भीमनगर असा वाचला पाहिजे, काबूलच्या भीमशहानें भवन शहर वस- विळे अशी समजूत आहे; पण उत्‌बीचे पुढचे वर्णन भवनास लागू पडत नाही, तेव्हां भीमनगर या शब्दांत नगरकोट, भवन आणि कांगडा किल्ला या तिहींचा समावेश करावा,

प्रकरण नववें. (१) पंजाबचे मांडलिकत्व.

–______व:या>व्प्न्न्ल्ट्-

पूर्वी सांगितलेंच आहे कीं, महमुदाचें लक्ष पूर्वेकडे आणि पाश्चि- भेकडे सारख्याच सावधगिरीने विभागलेले असे, त्याची दूरद्ष्टि आणि त्याची अविश्रांत चळवळ दोन्ही दिशांस सारख्याच जागरू- कतेनें चालत असे. किरमान आणि कोहिस्तान या पश्चिमेकडील व उत्तरेकडील दोन प्रांतांतील उद्भवलेल्या अडचणींचा बंदोबस्त करून पंजाबचा प्रश्न कायमचा सोडावण्याकडे त्यांने लक्ष दिलं. पंजा- बच्या राजाला त्यानें वाकविळं होते आणि त्याच्या राज्यांतील एक मजबूत किल्ला कांगडाकोट आपल्या कबजांत घेतला होता. पंजाब राजाच्या आश्रयाचा दुसरा किल्ला नारदीन घेण्याच्या उद्योगास तो आतां छागला आणि हिंदुस्थानाच्या प्रांतांत घुसून ( उत्‌बी वर्णन करतो ) “त्या प्रांताचा विध्वंस करण्यास, मूर्तेपूजकांना शिक्षा देण्यास, मूत फोडण्यास व गरीब व श्रीमंत लोकांस त्रास देण्यास त्यानें प्रारंभ केळा. त्या लोकांचा राजा त्यानें नरकास पाठविला ( ठार मारिला ). हा प्रकार जेव्हां “हिंदच्या’ राजानें पाहिला आणि आपले जवळच व दूरचे प्रांत उध्द्वस्त झाळेळे पाहिले तेव्हां हरण जाऊन महंमुदाचें मांडलिकत्व कबुल करण्यास त्यानें आपले नाते- बाईक त्याकडे पाठविले’? ( उतूबी पान ३६१). उत्‌बीनें या स्वारीचें असं थोडक्यांत वणन केलें आहे. या भागाच्या मथळ्यांत नारदीन हछा करून घेतलें असें जरी त्यानें म्हटलें आहे, तरी त्या इल्याचें त्याने वणन केलेलें नाहीं. उत्‌बीनंतर लिहिलेल्या बखरींवरून इलियटनें असा तर्क केला आहे कीं “या स्वाऱ्या दोन होत्या, कित्येक

८६ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

इतिहासकार म्हणतात त्याप्रमाणें एक नव्हती; आणि नारदीन शब्दांत गुजराथची राजधानी नहरवालाकडे उत्‌बीचा रोख दिसतो. दुसरी स्वारी नंदन किल्यावरील होय.!’ हिचें वणन फिरिस्ता आणि इतर इतिहासकार यांनीं केळें आहे तं पुढें येणारच आहे. उत्‌र्बांच्या लेखांवरून दोन स्वाऱ्या झाल्याचेंहि स्पष्ट दिसते; आणि दुसराचें वर्णन त्यानें पुढं केळे आहे. पण नारदीन म्हणजे नहरवाला असा एकीभाव करणे कठिण आहे. कारण मध्यंतरीचा पंजाब काबीज केल्याशिवाय महमुदास इतकें दूर दक्षिणेस जाणें शक्‍य नव्हते. आमच्या मतें नारदीन म्हणजे पंजाबांतलीच एक जागा असावी, आणि महमुदानें ती घेऊन पंजाबची नासाडी केल्यानें पंजाबच्या राजास त्याचं मांडलिकत्व कबुळ करणें भाग पडलें असावें. या राजाचे नांव काय होतें हें उत्‌बीनें सांगितलें नाहीं, आणि एक राजा ठार झाल्या- चीहि त्याने वणन केलें आहे. यावरून असें संभवनीय वाटते कीं, आनंदपाल स्वतः या युद्धांत मारला गेला असावा, आणि त्याचा पुत्र त्रिलोचनपाळ याने मांडलिकत्व कबूल केळें असावें. अल्बेरूनीच्या सांगण्याचा उल्लेख पूवी आलाच आहे कीं, आनंदपाळ हा अलीकडे महमुदाचा कट्टा शत्र बनला होता, पण व्याचा पुत्र विळोचनपाळ याची मन:स्थिति महमुदाविषयीं अनुकूळ होती. या सर्व गोष्टींवरून आम्हांस असे वाटतें कीं, संयुक्त हिंदूनीं केलल्या पूर्वीच्या लढाईत मारला न जातां आनेदपाल यावेळीं मारला गेला (इ. स, १००९ किंवा १०१० ) आणि त्रिलोचनपालानें मांडलिकत्वाच्या शती मान्य करून महमुदाशीं तह केला. या श्तीमुळें पंजाब गझनवी साम्रा- ज्याचा एक प्रांत बनला. या शर्ती उतूबीनें अशा दिल्या आहेत:– “(१) पंजाबच्या राजानं खंडणी देण्याचें कबूळ केळे आणि गझनवी राज्याचें मांडलिकत्व मान्य केळे. (२) ही खंडणी साठ हत्तीचे जोड (१) आणि एक नगदी रक्कम दोन्ही पक्षाच्या संमतीने ठरेल

पंचाबचं मांडालेकत्व ८७

ती पंजाबच्या लोकांनीं व सरदारांनी गझनीच्या खजिन्यांत भरावी . (३) गझनीतफे आम्ही राज्य करितो हे दाखविण्यासाठी गझर्ना येथें दोन हजार फोज नोकरीस ठेवावी. ( ४ ) दर वर्ष, महिना व दिवस आपलें मांडलिकत्व जाहीर करावे. (५ ) पुढील येणाऱ्या राजानीहि पुढें याच शती चालवाव्या. सदर शतींवर सुलतान राजी झाला ! ! आणि ही ठराविक रक्कम गझनवी साम्राज्याच्या फडणिशी दप्तरांत एक मोठी उत्पन्नाची बाब होऊन गेली. या तहाने व्यापारी व जाणारे येणारे लोक यांचे तांडे खरासान व हिंदच्या प्रांतामध्ये सुरक्षित रीतीनं जाऊं लागलें.’? (पा. ३६२ )

हरएक राज्याच्या उच्छेदाच्या पायऱ्या एकामागून एक वरप्रमाणें
ठरलेल्याच आहेत. आठरों वर्षानंतर झालेल्या मराठी राज्याच्या उच्छे-
दाची येथें आपणांस आठवण होते. प्रारंभी इ. स. १८०३मध्यें
मराठे आणि इंग्रज यांजमध्यें कडाक्याचे युद्ध झालें. ज्याप्रमाणे हिं-
दूंच्या संयुक्त सैन्याचा पराभव इ, स. १००८मध्यें हृजरोजबळ
महमुदाच्या सैनापत्याच्या कोंशल्यानें झाला, त्याचप्रमाणें इ. स.
१८०३ मध्ये असईच्या लढाईंत मराठी संयुक्त फोजेचा पराभव
इंग्लिशांचा कुशळ सेनापति वेल्स्ली यानें केला. ज्याप्रभाणें त्रिलो-
चनपालानें मांडलिकत्व कबूल केळें व तैनाती फॉ ठेविली, त्याच-
प्रमाणें बाजीरावानेहि मांडलिकत्व कबूल करून ब्रिटिशा शिपायांची
एक तैनाती फोज पुणें येथे ठेविली. या तैनातीचा प्रकार मात्र दोन
ठिकाणीं उलट होता, आनंदपालाच्या पुत्राने त्या वेळच्या अंकित राजांच्या पद्धतीप्रमाणे गझनी येथे मुसलमानी साम्राज्याच्या चाकरी- साठीं आपल्या खर्चाने दोन हजार आपली फोज ठेविली. याच्या उलट ब्रिटिशांची तैनातीची पद्धत होती. त्यांनी अंकित राजाच्या दरबारीं म्हणजे राजधानींत ब्रिटिश फोज अकिताच्या खर्चानं तैनात ठेवण्यास भाग पाडळे. शेवटचा उच्छेद करण्यास ही दुसरी पद्धत

८८ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

फार पीरणामकारक आहे हें सांगावयास नकोच; आणि यांत एका प्रकारची जबरदस्त खंडणी आणखीं उत्पन होते. असो, हा शेव- टचा उच्छेद त्रिलोचनपालावर लौकरच म्हणजे चार वर्षांतच कोस- ळळा हें आपण पुढच्या प्रकरणांत पाहूं. बाजीरावाच्या समान उदा- ह्रणांत शेवटच्या उच्छेदानें सुमारे पंधरा वर्षांनंतर बाजी- रावास गांठलें.

अशा प्रकाराने पंजाबचे कांहीं दिवस मांडळिकत्व कबूल करून घेणें महंमुदास जरूर होते. कारण पश्चिमेकडे ज्या अडचणी उत्पन्न झाल्या त्यांजकडे यामुळें स्वस्थ चित्तानें त्यास लक्ष देतां आलें. या पैकीं मुख्य अडचण आम्हीं येथें वर्णन करितों. कारण हिंदी वाच- कांस तिचें महत्व आहे. गझनीस पश्चिमेकडे लागूनच घोरचा एक लहानसा डोंगराळ प्रदेश आहे. यांत एका कडव्या अफगाण लो- कांची जात रहात असे, ब ती प्रवाशी व व्यापारी यांच्या तांड्यास नेहमीं त्रास देत असे. हा प्रांत गझनीला जवळच असल्यानें हा प्रकार महमुदाच्या नाकावर माशी बसल्याप्रमाणें महमुदास त्रास- दायक होई. हे लोक विधर्मी असून मोठे कुरेबाज असत आणि व्यापाऱ्यांच्या व यात्रेकरूंच्या तांड्यांपासून आपल्या कठिण डोंग- रांच्या आश्रयाने जबरदस्त खंडण्या वसूल करीत. अर्थात्‌ त्यांचा पक्का बंदोबस्त करणें महमुद!स भाग पडलें. त्यांच्या कठिण चढा- वाच्या जाग्यांत त्यांजवर हल्ला करण्याचा महमुदानें आपल्या सैन्यास हकूम केला, व तो स्वतः आपळे शारीरसंरक्षक घेऊन गेळा. अड- चणाच्या घाटांतून घुसून धोरच्या राज्याच्या किळ॒याजवळ तो जाऊन पोहोचला. तेथें घनघोर युद्ध झाळें आणि महमुदानें नेहमीच्या युक्ती- प्रमाणें आपल्या शिपायांस पाठ फिरवून पराभव पावून पळत अस- ल्याचा देखावा दाखविण्यास इशारा केला, उत्‌बी लिहता, “ ते दैवह्त फसले. त्या हिंदूंस स्थिर राहवेना, व लुटण्याच्या इच्छेच्या

अयर बया »

पंजाबचे मांडालेकत्व. ८९

मोहानें डोंगर सोडून ते मैदानांत आठे. सुलतानाने फौजेचे तोंड फिरवून त्या सर्वांस जमिनीवर निजाविलें. त्या लोकांच्या मुख्याचा पुत्र कैद झाला व त्या किछ्यांत पिढ्यानुपिढ्या मिळविठेली ळ॒ट व हत्यारें आणि संपात्ति महमुदाच्या हातीं लागली. त्या पुत्राने आपल्या आंगठींत असलेलं विष चोखन प्राण दिला. ” (पा. २३६४-६५) हें वर्णन आम्ही मुद्दाम विस्तारानं दिलं आहे. वाचकांचे लक्ष दोन तीन महत्वाच्या मद्याकडे वेघधेळ. या घोरच्या दर्रांत राहणार लोक अजन हिंदु होते. यांनींच पुढें मसलमान झाल्यावर बाराव्या शात- कांत हिंदुस्थानवर स्वारी करून हिंदुस्थान जिंकठें. महमुदानें या वेळीं त्यांस जिंकून जबरदर्स्तानं बाटविलें. ते कडवे मुसलमान बनून त्यांनीं पुढें हिंदुस्थानच नव्हे तर गझनीच्या तुकांचें राज्याहि जिंकले. दुसरी गोष्ट ही कौ, शिवाजीप्रमाणेंच महमूदाहि लढाईत गनीमी काव्याचा उपयोग करी. तिसरी गोष्ट ही कीं उत्तम राज्यकत्यांच्या लक्षणाप्रमाणें महमुदाचें लक्ष व्यापाराच्या उत्कषासाठीं रस्त्यांच्या सुरक्षिततेकडे असे. खुरासानचा व्यापार वाढावा आणि खुरासान व हिंद यांचे दरम्यान व्यापाऱ्यांचे तांडे सुरक्षित फिरावे अशी त्याची इच्छा होती. त्यावेळीं अठीकडच्या काळाप्रमाणेंच डोंगरांतील रानटी ठोक मध्यवती राजसत्ता ढिली पडली म्हणज या व्यापा- ऱ्यांच्या तांड्यांवर छापे घाळून जबरदस्त दंड वसूळ करीत. त्यांचा बंदोबस्त जितक्या दक्षतेने व सक्तीने हछी ब्रिटिश साम्राज्य करिते, तितक्‍याच सक्तीनें व दक्षतेने महमूद करी, ही गोष्ट वाचकांस दिसून येईल.

(२) पजाब खालसा झाला,

या पुढें चार वर्षेपर्यंत पंजाब व हिंदुस्थान सुरक्षित राहिलें. बहुधा त्रिलोचनपालानें कबूळ केलेली खंडणी तक्रार न करतां साठो-

९० गझर्नाच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

साल दिली. शिवाय महमुदाचे लक्षह्ि पश्चिमेकडे गुंतले होते. खुरासान प्रांत व द्याची राजधानी निशापुर येथें दरम्यान एक भयंकर दुष्काळ पडल्याचें वर्णन उतूबीनें केळें आहे. तुक)चा राजा इलेकूखान यानें या अडचणीचा फायदा घेऊन कांहीं त्वास दिल्या- चेह वर्णन त्यानें केळें आहे. गर्जिस्तान अथवा जार्जिया हा प्रांत सामानी साम्राज्याचा एक भाग हाता, तेथील शार ( जार्जियाच्या राजास शार म्हणत, जसें हिंदूच्या राजास राय, तुकोच्या राजास खान आणि प्रांकांच्या राजास सीझर म्हणत ) महंमुदास जमानी- नासा झाला. तेव्हां महमुदानें नेहमीच्या तडकाफडकीने व पूर्ण तयारीने त्यावर झडप घाळून त्यास जिंकले. या अडचणीतून बाहर पडल्यावर महमुदाला हिंदुस्थानकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला, पंजाब नुसता मांडाटिेक झाला आहे तो पुरा खालसा करण्याची इच्छा मानवी स्वभावाप्रमाणें त्यास होणें साहाजिकच होतें. आणि त्याच मानवी स्वभावाने बंड करून आपल्यावर घातलेले जोखड फेकून देण्याची इच्छा त्रिलोचनपालास होणेंहि साहजिकच होते. तात्पये, एका पक्षानें किंवा दुसऱ्या पक्षानें कांहीं तरी सबब काढून युद्धास सुरवात केटी, वर सांगितलेल्या समान उदाहरणांत इ. स. १८१८ मध्यें पुनः मराठा युद्ध अशाच तर्‍हेनें सुरू होऊन बापू गोखल्याचा पराभव झाल्यावर बाजीराव कायमचा राज्यभ्रष्ट झाला हें वाचकांस अवगत आहेच.

या युद्धाचे वर्णन उतूबीनें पुढील प्रमाणे केळें आहे. (पान. ३८९–३९२) “६. स. १००९ मध्यें ( ४०० हिजरीमध्यें ) हिंदु- स्थान जिंकून, तेथें मशीदी बांधून टाकल्यावर विधर्मीयांचा देश पूणपणे काबीज करण्याची इच्छा सुलतान करू लागला. यासाठी त्यानें आपल्या विजयी फौजा जमा केल्या आणि त्यांच्यावर मोठ्या सन्मानाचा पूर केला. हिंदुस्थानांत आल्यावर पुष्कळ बर्फ पडलेले

पंजाब खालसा झाला. ९१

पाहून तो गझनीस परतला. पण वसंतांत पुन: फिरला. हिंदुस्थानचा राजा एका डोंगराचा आश्रय घेऊन बसला होता, व घाटाच्या अरुंद रस्त्यांत त्यानें हत्ती उभे केलें होते. त्यांने आपल्या राज्यांतील घोड- दळ आणि पायदळ जमा केलें. एक मोठी विधर्मायांची फौज हिंदु- स्थान, सिंध व चारी दिशा येथून जमा होऊन माशांप्रमाणें गोंगाऊं लागली, व युद्ध सुरू होऊन रणांगणावर डोकीं चंडूप्रमाणे उडूं लागलीं. जेव्हां जेव्हां हत्ती लढाईस पुढें येत, तेव्हां तेव्हां मुसलमानी फोज हत्तीच्या सोंडा तलबारीनीं तोडीत व गळे भाल्यांनीं भोसकीत. ज्या वेळेस आपला सरदार “ अबदल्लाताई ‘ पेचांत पडलेला महमुदाच्या दृष्टीस पडला, तेव्हां त्यानें आपल्या निवडक गारदांपैकीं कांहीं तारे त्याच्या मदतीस पाठवून दिले. याप्रमाणें युद्धाचा आभ्नि पेटत राहून शेवटीं विजयाच्या पाण्यानें विझला; आणि महमुदाच्या सुदैवाच्या एका फटकाऱ्यानें शत्रूंचे सवे प्रयत्न घुळीसारखे उडून गेळे, आणि मुसल- मानांनीं त्यांची चीजबस्त व हत्ती ढुटून घेतले……… या रीतीनें हा प्रांत इस्लामाच्या राज्यांत उच्च दजीवर येऊन बसला, आणि महमु- दाच्या स्वाऱ्यांच्या रजिस्टरांत हा विजय नोंदला गेला. ?

वरील वर्णनावरून असें दिसतें कीं त्रिलोचनपालानें अनेक हिंदु- राज्यांतून फौजा जमवून महंमुदाळा शेवटची टक्कर देण्यासाठीं तिस- ऱ्यानदां संयुक्त प्रयत्न केठा. आणि एक जोराची भयंकर लढाई होऊन त्यांत महमुदाच्या चांगल्या नर्शाबानें व त्याच्या शरीररक्षकांच्या शोयानं त्यास पुन्हां जय मिळाला. ही लढाई ४०४ हिजरी अथवा इ. स. १०१३मध्यें झाळी,या तारखेबद्दल इलियटनें उतूबीचाच आधार घेतला आहे. पण कित्येक प्रतींत वर सांगितल्याप्रमाणें ४ ०० हिजरी हेंच वर्ष दिलेळें आढळतें, व तीच तारीख कित्येक इतर मुसलमान इार्तहास- कार देतात, ही लढाई कोठें झाली ह्याजबद्दलहि बराच वाद आहे. उतूबीनें आपल्या अध्यायाच्या मथळ्यांत नारदांन्‌ शब्द दिला आहे.

९२ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

दुसरे लोक नंदूना हें नांव देतात. कांहीं लोकांचें असं मत आहे कीं ज्यूडच्या डोंगरांत झळम नदीवर असलेल्या बालनाथच्या टेकडीजवळ हें युद्ध झाळें. पण इलियटचें असें मत आहे कीं ज्या घाटाचा उल्लेख उतूर्जीनें केला आहे, तो मर्गला घाट असावा (इलियटर पान. ४५१ ),

याच लढाईंचें निजामुद्दीन अहमद यानं ज्यास्त सविस्तर वर्णन

दिलें आहे त्यावरून पुढीळ अधिक माहिती इलियट देतो.

“८ 2०9४ हिजरीमध्यें सुलतानाने बालनाथ डोंगरांत असलेल्या नंदुना किछयावर आपलें सैन्य चालविले. पुरु-जयपाल त्याच्या रक्ष- णाकरितां निवडक सैन्य ठेवून स्वतः कारमीरच्या दऱ्यांत निघून गेला. खालीं सुरुंग लावून व इतर रीतीनें किछा घेतल्यावर सुलतान पुरुजयपालावर चाळून गेला. पण तो आणखी डोंगरांत पळून गेला सुलतानाला पुष्कळ लूट आणि गुलाम मिळाळे. अनेक काफरांस बाटवून आणि इस्लामधर्माचा प्रसार करून सुलतान गझनीळा परत आला.” इलेयटचें असं मत आहे कीं, “ नंदूना किछ्यांत लढणारा हिंदु अधिकारी जयपालाचा पुत्न भीम असावा. किंबहुना उत्‌बीमध्येच हें नांव निडरभीम असें आलेलें आहे. ‘’ ज्या भाषांतराचा आम्हीं येथें उपयोग केला आहे त्यांत आम्हांस हें नांव सांपडलें नाहीं. कदाचित्‌ उन्‌बीच्या भिन्न प्रती उपलब्ध असतील. पुरुजयपाल हा कोण हें इलियटनें बिवेचिळें नाहीं याचें आश्चर्य वाटते. हेंहि नांव चुकीनें वाचलें गेळें आहे हें स्पष्ट होय. कारण यावेळीं त्रिलोचन- पाल हा राजा होता आणि पर्शियन किंवा आरबी लिपीत * त्रिलो- चनपाल ” हा शब्द पुरुजयपाळ असा वाचला जाणें शक्‍य आहे. जयपाल आणि आनंदपालहि यावेळेस जिवंत नव्हते. पंजाबातील शाहींच्या गादीवर त्रिलोचनपाळ होता. त्याचा पत्र भीम आणि त्रिलोचनपाल आपल्या निर्भय पुत्रास ठढाइ करण्यास ठेवून काऱ्मी- संत निघन गेला असे संभवनीय दिसते. या लढाईत निडरभीमा-

पंजाब खालसा झाला. ९३

चचाहि पराभव झाला. उतूर्बीनें पुढें जें वाक्य घातलें आहे त्यावरून असें दिसतें कीं, सर्व पंजाब नेंदान ल्याचा मोठा भाग यावेळी खालसा होऊन गझनीच्या राज्यास जोडला गेला. अल्बेरूनीच्या लिहेण्याप्रमाणें त्रिलोचनपाळ यानंतर इ. स. १०२१ पर्यंत जित्रेत होता; तेव्हां वरील दुसऱ्या हकीकतीचा मेळ घाळून असें म्हणतां येतें कीं तो आणि भीम काइमीरांत जाऊन काऱमीरच्या लगतच्या पंजाबच्या कांहीं प्रांतांत हिमालयाच्या पायथ्याशी आणखीं सात वर्ष राज्य करीत होता.

राजतरगेणीचा प्रकाशक स्टीन याचें असं मत आहे कीं, त्रिलो- चचनपाळ आणि महमद यामध्यें तोशी नदीवर जी महत्त्वाची लढाई झाळी आणि ज्याचे विस्तृत वणेन काइमीरच्या वरील इातहासांत कल्हणानें केळें आहे ती लढाई याचवेळीं म्हणजे हिजरी ४०४ किंवा इसवी १०१३ मध्यें झाली. ही नदी हजारा जिल्ह्यांत पश्चि- मेकडून झेलमला येऊन मिळते. हा जिल्हा कारमीरच्या सरहर्दाळा लागून आहे. या लढाईंत काऱमीरची एक फोज तुंगाच्या हाताखालीं त्रिलोचनपालाच्या मदतीस आली होती. “ या कावेबाज तुकोशीं संभाळून लढाई कर ” असें त्रिलोचनपालानें तुंगास बजाविठें, व डोंगराच्या आश्रयाने त्यास लढाण्याची सला दिली. पण महमुदानें आपल्या नेहमीच्या चालीप्रमाणे एक फॉजेची तुकडी तोशी नदी- पलीकडे पाठविली. तिचा तुंगाने पराभव केला आणि ती पळून नदी उतरून अलीकडे आली. या चालीनें फसून तुंगास जोर चढून तो नदी उतरून मैदानांत येऊन महमुदाशीं लढू लागला. लढाई मोठ्या खडाजंगीची झाली. अनेक काऱ्मीरचे सरदार मृत्यु- मुखीं पडळे व त्रिळोचनपालानोहि स्वतः फार पराक्रम केला. परंतु हिंदूंची बाजू दुर्दैवानं पडणार असेंच ठरळें असल्यानें महमुदाचा जय झाला. त्रिलोचनपाळ काऱ्मीरांत जो पळाला तो पुनः दिसला

९४३ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

नाहीं. काबलच्या शाह्दी राज्याचा येथेच शेवट झाला, त्याविषयी कल्हणानें जो काव्यमय दुःखोद्रार काढला आहे तो आम्ही पहिल्या भागांत दिलाच आहे. त्रिलोचनपालानें इ. स. १०२१ पर्यंत राज्य केळें आणि भीमानें नंतर पांच वर्षे केलें असे जें अलबेरूनीरने ठि- हिळें आहे, त्याचा मेळ दोन तीन तर्‍हेनें घालतां येईल, (१) ही लढाई इ. स. १०२१तच झाली असे मानावें. किंवा ( २ ) त्रिलो चचनपाल हिमालयाच्या डोंगराशीं लगत अस लेल्या एखाद्या क्षूलठक पंजाबच्या प्रांतांत तेथपर्यंत राज्य करीत राहहला. किंवा (३) कनोजेस जाऊन तो १०२१ सालांत पुनः महमुदाशीं लढून मारला गेला.

झेलम गंझोटियरमध्यें निंदूना म्हणजे मिठाच्या डोंगरांतील नंदन नांवाचा डोंगरी किछा होय अशी मनोरंजक माहिती दिली आहे. या ठिकाणीं कार्मीरच्या अमलाच्यावेळीं बांधलेल्या इमारतीचे अव- शेष अद्याप आहेत. पान ६२ वर असें म्हटलें आहे कीं, हा जिल्हा प्रथम कारमीरच्या ताब्यांत होता आणि नंतर काबूलच्या शाहींच्या ताब्यांत गेला. जयपाळ आणि आनंदपाल असे जे मुसलमान इति- हासकारांनी लाहोरचे राजे म्हणून वार्णिळे आहेत ते वस्तुतः काबू- ळढचे शाही राजे होत असेंहि ह्या गझेटियरमध्यें म्हटलें आहे. फिरि- स्ताचा आधार देऊन हा नंदन किल्ला इ. स. १००८ मध्यें मह- मुदानें घेतला असं जे॑गेझेोटियरमध्ये म्हटलें आहे तें मात्र बहुधा चुकीचे आहे व ४०४ च्या ऐवजीं ४०० हिजरी चुकोनें वाचळें गेठें असावें, दुसरें, मिठाच्या डोंगरांतील रजपुतांचे मुसलमानी धर्मांतर शिहाबुद्दीन घोरीच्या वेळीं झालें असें ह्या गॅझेटियरमध्ये म्हटलें असून आणखी असें म्हटलें आहे कौं, येथील राजपूत, जाठ व इतर लोक ह्यांस मद्दमुदानें जरी जबरदस्तीनें बाटविलें तरी त्याची पाठ फिरतांच ते पुनः हिंदु झाळे असावे. पण हा जिल्हा महमुदाच्याच ताब्यांत

पंजाब खालसा झाला. ९”

ह्यापुढे राहिला व त्याचे पुढचेहि राजे त्या जिल्ह्यावर राज्य करीत होते ही गाष्ट आपल्यास लक्षांत ठेवावयास पाहिजे. मिठाच्या डोंग- रांतील मुसलमान झालेले जंजुआ राजपूत हे पंजाबचे फार जुने रह्दि- वाशी आहेत. ययाताचा पुत्र अनु याचे ते वराज आहेत असे मान- तात. किंबहुना लाहोरचा जयपाळ हा जंजुआच होता अशी सम- जूत आहे ( झेलम गॅझेटियर ).

उतूर्बीनें असें वर्णन केलं आहे कीं त्या देवळांत एक दगड सांपडला; त्यावरील लेखांत हें देऊळ चाळीस हजार वर्षांपूर्वी बांधळें असें म्हटलें होतें. तें ऐकून सुलतान उद्गारला, “’ केबढा मूखपणा ! जगतांर्ताळ सर्व शहाणे लोक जगच सातहजार वर्षाहून पुराणे नाहीं असे मानतात. ” या विसाव्या शतकांत आपल्यास ह्या दगडावरचें र्वधान आणि त्यावरची महमुदाची टीका दोन्ही वेडसर वाटतील. बहुधा हा प्राचीन शिटाल्ख अशोकाच्या वेळचा असावा, व सर्भा- वतालच्या लोकांस त्याची खरी मिति माहीत नसल्यानें त्याचा अत्यंत प्राचीन काल त्यांनीं मानळा असावा. असो, मिठाच्या डॉंग- रांतील नंदन हें [काण अत्यंत प्राचीन असावें हें तेथील परिस्थिती वरूनहि दिसतें.

(5 . 1 4 टंप्पणा १-नदनचा किल्ला. झेलम गझेटियरमध्यें ह्या किल्ल्याचे वर्णन पुढील प्रमाणें आहे. ( पृ. ४६-४७ ). ‘“चोआ सेदानशा याच्या थेट पूर्वेस चोदा मेलावर डोंगराच्या खालीं बादनवाछा गांव व वर आरागांव यांच्या दरम्यान मिठाच्या बाहेरील डोंगरांच्या ओळीमध्ये एक मोठी खिंड आहे. ह्या खिंडींतून जाणाऱ्या रस्त्यावर जेथून पक्का मारा आहे अशी एक जवळ पाष!णमय उभी टेकडी आहे. त्या टेकडीवर एक देऊळ, एक किल्ला आणि एक मोठा गांव यांचे विस्तृत अवशेष आहेत. देऊळ पडकें आहे, याच ओळींतील इतर देवळाप्रमाणे इं देऊळ काइमीरी पध्दतीचे आहे.

९६ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

ज्या चबुतऱ्यावर हें देऊळ बांधलें आहे तो देवळाहून जुना, अतिशय प्राचीन काळचा आहे. देवळाच्या नंतरच्या काळांत देवळाजवळच एक मशीद बांघली गेली, तीहि अगर्दी पडक्या स्थितींत आहे. देवळांच्या भोंवतालच्या आंगणांत बहुघा त्याच वेळचा एक शिलालेख आहे. त्याची अक्षरे इतक्ती खराब झालीं आहेत कौ तो लेख आतां वाचणें राक्‍य नाहीं. गझनीच्या महमुदानं हा किल्ला घेतला होता, ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालें आहे ह्याचा चमत्कार वाटतो. ”

आणखी येथे असें सांगण्यासारखे आहे कीं, नंदनापासून सुमारें बारा मेलांवर भेरा शहर आहे. बहिंड गेल्यावर बहुघा आनंदपाल येथ राहिला असावा, हल्लीचे भेरा शहर झेळम नदीच्या पूर्वकांठावर आहे. परंतु पूर्वकाळीं जुनें शहर पश्चिम कांठावर होतें. त्याची जुनी जागा उंच ढिगा- रावरून अद्याप निश्चित दिसते, ब तेथें जुनी नाणी अद्याप सांपडतात. हल्टरींचे भेरा शहर विद्वत्ता, व्यापार व कलाकोडशल्य यांचे केंद्र असून तें पंजाबचें पुणेंच आहे. पंजाबांतील वकील एंजिनियर बगेरे विशिष्ट बुद्धि- वानू लोक पुष्कळसे भेरा येथीलच असतात. हे जातीने क्षात्रिय ( खत्री ) असतात. यांनीं लष्करी पेशा सोडूत मुलकी धंदे उचलले आहेत. भेरा येथे विद्वान्‌ त्राह्षणांचीहि वस्ती आहे. लाकूड, लोखंड आणि कापूस याची उत्तम कारागिरीहि येथे आहे, तात्पर्य प्राचीन राजघानीचीं सर्व लक्षण भेरा येथ आहेत. लाहोर आणि वहिंड यांच्या दरम्यान बरोबर मध्यावर तं असल्यानें शाहीराजांची ही लाहोरच्या खालोखाल तिसरी राज- घानी असावी. इंपीरियल गेझेटियरमध्यें भेराशद्वाखालीं पुढील माहिती दिली आहेः– पुराणें हहर नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर होतें. त॑मह- मुदाने लुटले, व पुनः जागिसखानाच्या एका टोळीनें लुटले. नवींन शहर नदीच्या पूवेस असलेल्या एका मशिदी भोंबती इ० स० १५४९त वसलें, हं हल्लीं एक मोठें रेल्वे स्टेशन आहे.

टिप्पणी २-उत्तरशाही राजांच्या दुरुस्त केलेल्या तारखा.

भाग ९ पान २०१ व भाग २ पान १५७ यांत शाहीराजांच्या प्रत्येक पिढीला वीसवर्षे सरासरी धरून अलूबेरूनींनें त्रिलोचनपालाचा’

पंजाब खालसा झाला. ९७

अन्त इ० स० १०२१ दिला. येथून मार्गे मोजीत, आम्ही शाही राजां च्या तारखा रकान्यांत दिल्याप्रमाणें धरल्या आहेत. त्या तारखा जयपाल ९६० ते ९८०, हल्लीं निश्चित माहिती उत्‌बी आनंदपाळ ९८० ते १०००, व इतर मुसलमानी इतिहास- त्रेळोचनपाल १००० ते १०२१ कार यांवरून मिळते, तद- नुरूप उत्तर राजांच्या मित्या दुरुस्त करावयास पाहिजेत. जयपाल इ० स?

१००१ पर्यंत राज्य करीत होता हें आवण आतां पाहिलें आहे. तो अत्यंत वृद्ध झाल्यानें व शेवटीं मानह्याने झाल्यामुळे चितेवर जळून मेला, तेव्हां त्याचें राज्य बरींच वर्षे टिकलं असं मानावयास हरकत नाहीं, मुख्य राजघानी वहिंड ही महमुदानें घेतल्यावर आनंदपाल राज्यां- तील दुसरें शहर भेरा येथे रहात असावा. वहिंड पासून लाहोरच्या रस्त्यावर हञजरोच्या मार्गे मगला खिंडीतून नेहमीं व्यापारी लोक काबू- ळचीं फळफळावळें लाहोर–मुलतानास व हिंदुस्थानचा कापड वगेरे माळ काबूलास नेत असत, आनंदपाल नारदीनच्या लढाईत १००९ मध्यें मारला गेला, आणि लिलोचनपालानें महमुदाचें स्वामित्व कबूल करून इ० स० १०१४ पर्यंत राज्य केलें, त्यावर्षी महमुदाने हिंदुस्था- नावर स्वारी केली व त्रिलोचनपालानें मर्गला खिंडीत त्याचा विरोध केला, त्याचा पराभव होऊन तो काइमीरांत निघून गेला, निडरभीम भेराच्या रस्त्यावरील नंदनाकेल्ल्यांत लढला पण तोहि पराभव पावून कारमीरांत पळून गेळा, आणि भेरा महमुदानें घेतळें आणि टुटले. त्रिलोचनपालाने कारमीराजवळील पंजाबच्या डोंगराळ प्रांतांत इ० स० १०२१ पर्यंत राज्य केळे. किंवा तात्काळ इ० स० १०१४ मध्येंच महमुदानें त्याचा पाठलाग करून तोशीनदीवरील लढाईत त्याचा परा- भव केला. आणि तो काऱमीरांतून कनोजच्या राज्यपालाकडे गेला असावा. तथापि पुढील प्रकरणांत सांगितल्याप्रमाणें हे॑ संभवनीय दिसत नाहीं. मुसलमानी इतिहासकार राज्यपालाच्या ऐवजी चुकीने हें नांव देतात. भीम कदाचित्‌ कनोजेस गेला असावा आणि पुढें वर्णिलेल्या राहिब म, भा, ७

९८ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

नदींच्या लढाईत तो मारला गेला असावा. या चार राजांचे दुरुस्त केलेले काळ येणप्रमाणेंई—

जयपाळ इ० स० ९६० ते १००१,

आनंदपाल इ० स० १००१ते १००९,

त्रिलोचनपाल इ० स० १ ०९तते १०२१.

भीम इ० स० १०२१ते १०२६,

या घराण्यांतील पुढील एका राजाने माळव्याच्या भोजाचा आश्रय

केला होता असा उल्लेख आढळतो.

प्रकरण दहावे. ठाणेश्वरावरील स्वारी.

येथें थोडेसें थांबून गझर्नाचे प्रारंभीचे लहान राज्य यावेळी किती मोठें झालें होतें तें आपण पाहूं. पुष्कळ विद्वान्‌ लोक असं समज- तात कों महमुदानें केवळ ठुटीसाठीं स्वाऱ्या केल्या, त्यानें राज्यें जिंकून एक बलिष्ठ राज्य स्थापन करण्याचा कधीच हेतु धरला नाहीं. परंतु महमदाच्या राज्याचा विस्तार आतां पावेतो कसा झाला हँ पाहतां ही समजूत चुकीची ठरते. त्यानें आपल्या राज्याचा समजन उमजून विस्तार केला आणि जबरदस्तीनें लोकांस बाटवून राच्याची मजबूती केली. ह्या बाटविण्यांत धार्मिक उत्साह तर होताच, पण राष्ट्राचे सामर्थ्य कोणत्या गोष्टींत असतें याचीहि ल्यास चांगळी कल्पना असावी त्यानें आपल्या राज्याच्या पश्चिमेकडील खुरासान व इतर प्रांत लगत असलेले प्रथम आपल्या राज्यास जोडले, या प्रांतावर सा- मानी साम्राज्याच्या वेळेपासूनच सबुक्‌तगीनाचा ताबा होता. मह- मुदानें यानंतर आपलें लक्ष पूर्वेकडे वळविले. जलालाबाद आणि काबूल हे प्रांत ( लमघानात ) पूर्वीच जिंकून सामील झाले होते व

ठाणेश्वरावरील स्वारी. ९९

तेथीळ लोकांस जबरदस्तीने मुसलमान केलें होतें. हछींच्या वायव्य सरहर्द्वाच्या प्रांतांतील बन्नूचा इलाखा महमुदाने प्रथम जोडला. हा हिंदूंचा प्राचीन प्रांत काबूलच्या शाहींच्या ताब्यांत होता. बन्नूजवळ मोठमोठाळे मातीच ढिगार आहेत. रामाचा भाऊ भरत यानें हा प्रांत प्रथम वसावेला अशी आख्यायिका आहे. असा हा जुना हिंदु प्रांत काबूलशार्हांच्या ताब्यांत होता. कारण या ढिगारांतून जुनीं नाणी, इंडोसिथयन काळांतीळ अझीज व वासुदेव यांचीं, सांपडतात तर्शाच शेवटच्या काबूल्च्या ब्राह्मणी राजांचीहि सांपडतात. परंतु कोण- त्याहि मुसलमानी राजांचीं नाणीं या ढिगारांत सांपडत नाहींत. या- वरून वन्नूचे जुनें शहर महंमुदाने विध्वस्त केलें असं दिसतें. हिंदु- स्थानांत गझनीहून जाण्याचा जुना रस्ता बन्नूवरून कुरमखोऱ्यांतून होता. तो खबर खिंडीतला रस्ता सुरू झाल्यापासून मार्गे पडला आहे ( बन्नू गेझेटियर ). हा प्रांत महमुदाने प्रथम आक्रमून तेथील लोकांस जबरदस्तीने बाटविळें व हिंदुस्थानांत सुलभतेने जाण्याची सोय करून घेतली. नंतर पेशावर प्रांत वहिंडसह महमुदानें जय- पाळाचा पराभव पेश्यावरच्या मैदानांत केल्यावर आपल्या राज्यास जोडला. काबूल्च्या राज्याची वाहिंड ही राजधानी होती. आणि हिंदुस्थानास जाण्याचा दुसरा रस्ता वहिंडखाळून व सिंधु आणे काबलनदीच्या संगमावर होता. क्रम॒ आणि कुभा ( कुरम आणि काबूल ) या दोन नद्यांची खोरी कग्बेदांत सुद्धां प्रसिद्द असलेलीं व बोदेक आयांच्या प्रथम वस्तीतील असलेली याप्रमाणे महमुदाने आपल्या कबजांत घेतली, आणि हे देश मुसलमान केले. यानेतर महमुदान सामानी साम्राज्याचे दूरच प्रांत जिंकून आपल्या राज्यास जोडले आणि पूर्वेकडे पूवीच मुसलमान झालेलें मुलतानर्चे राज्य आपल्या राज्यास जोडलें. पण त्यापूर्वी भाटियाचे राज्य जिंकून

मील केळें. हें राज्य पूर्वी सांगितल्याप्रमाणे मुलतानच्या नेक्त्येस

१०० गझर्नाच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

सिंधु आणि झेलम यांच्या दरम्यान होते. शेवठीं काबूल्शाहीचा राहिलेला प्रांत पंजाब जिंकून त्यानें आपल्या राज्यास जोडला. या प्रांतांतीळ लोकांस जबरदस्तीनें मुसलमान करण्याची पद्धत महमुदानें सक्तीने लाविली नाहीं. ( त्याच्या कारणाचा विचार आपण पुढें करूं). तरी पण या प्रांताताहे पुष्कळ लोकांस त्यानें बाटविळें असं संभव- नीय आहे. याप्रमाणें या मर्यादेपर्यंत आपलें राज्य जवळ जवळचे प्रांत हळुहळू खाऊन त्यानें वाढविले. याच रीतीचा नमुना ब्रिटिश राज्याच्या वाढीचा कलकत्ता, मुंबई व मद्रास या केंद्रांतन हळुहळु लगतचे प्रांत सतेखाटीं आणून झालेला आपल्यास दिसतो. प्रथम ब्रिटिश लोकांनीं बंगाळ मिळविले. नंतर बहार, नंतर यू. पी, व शेवटीं शिखांस जिंकून पंजाब. महमुदाप्रमाणेंच राज्य खालसा कर- ण्याचा ब्रिटिशांचा रस्ता एकच होता. प्रथम पूर्वीची सत्ता जिंकून तास कांहीं दिवस खंडणी देण्यावर कायम ठेवणें; नंतर शेवटचा उच्छेद करणें. असो, याप्रमाणें पंजाब जिंकून तेथें आपली सत्ता कायम केल्यावर पंजाबच्याहि पूर्वेकडे असलेले प्रांत ळुटण्याकडे व. जिंकण्याकडे महमुदानें आपलें लक्ष फिरावेठें. अर्थात्‌ पहिला लग- तचा देश पंजाबच्या आग्नेयीस असलेला ठाणेश्वर, त्याजवर व्यास हछा करणें प्राप्त झालें.

ठाणेश्वर येथे एक स्वतंत्र राज्य असावें असं संभवनीय आहे. कारण अल्बेरूनीनें आपल्या भौगोलिक वर्णनांत ठाणेश्वरचा निर्देश केला आहे. ( गंगा आणि यमुना याच्या दरम्यान एक आणि हल्लीं आहे तेथें पुनः ठाणेश्वरःचा दोनदां उछेख आला आहे. बहुधा पाहिलें नांव दुरुस्त करून ध्यावयास पाहिजे ). त्याशिवाय टाणेश्वरास एक प्रसिद्ध देव होता व हल्लींडि आहे. अठीकडीळ मुसलमान बखरकार याचें नांव जगसोम देतात. ह्या शब्दाचे योग्य संस्कृत रूपांतर’ करितां येत नाहीं, हिंदुस्थानचा प्रसिद्ध शावटचा बोद्ध सम्राट्‌ हषे

ठाणेश्वरावरील स्वारी. १०१

चा बाप प्रतापवर्धन याचें राज्य येथेंच होतें. येथें कांहीं उत्तम हत्ती होते ते मिळण्यासाठीं महमुदानं ही ठाणेश्वरवर स्वारी केली असें म्हणतात. उतूबीनें ह्या हत्तींचे नांव सिट्मान असें दिलें आहे. त्या अर्लांकडील बखरकार त्यास मुसलमान म्हणतात. कारण गुडघे टेकून प्रार्थना करतांना जसें मुसलमान नमतात तसें हे हत्ती नमत असत. बहुधा महमुदाच्या स्वाऱ्यांच सवच हेतु त्या स्वारींत होते. ळूट मिळविणे, प्रसिद्ध हिंदु देवालये फोडणे आणि जवळचें राज्य जिंकून नमविणें. उत्‌बीनें या स्वार्राचे वर्णन पुढीलप्रमाणें केलें आहे. “’ याप्रमाणें महमूद धार्मिक लढाईच्या शाळेत शिकलेली आपली फौज घेऊन ठाणेश्वरवर चालला. व ल्यास असें एक भयंकर रेतस्थान लागलें कीं, तेथीळ हवेंत एक पक्षीहि फिरकत नव्हता. परंतु परमेश्वरकृपेनें त्यास मदत मिळाली व तो व्या जागेस जाऊन पोहोंचळा. समोर एक पाण्यानें भरलेली वाहती नदी होती. ब्याच्या- मागग एक उंच डांगर आणि मध्यंतरी अडचण करणाऱ्या मोठ्या घोंड्यांनीं भरलेली जमीन. शत्रू डोंगरांत जाऊन बसला. दोन उता- रांनी नदी उतरून सुलतानाने शत्रूवर हृछा केला, आणि ल्यास फत्तरामध्यें विस्कळून टाकलें. शत्रूचे भरंवशाचे आधार, पाय हप- टणारे हत्ती ते जागेवरच सोडले. सुलतानाच्या हत्तीनीं त्यास वळ- वून मुक्कामावर आणलें. सैन्यानं युद्धांत इतकें रक्त काढलें की, नर्दाचें पाणी पिण्यालायक राहिलें नाहीं. ” ही हकीकत सरळ आहे. मोठ्या योद्धथाशीं(या राजाचें नांव दिलें नाहीं ) घनघोर युद्ध झाळें. आणि ज्या हत्तीकरितां विशेषत: मह- मुदाने ही स्वारी केळी होती ते हत्ती त्यास मिळाले. येथें एखादी मूर्ति तोडल्याच्या उललेख नार्ही. पण प्रारंभीं उतूबीने मूर्ति तोड ण्याचा हेतु ह्या स्वारींत होता असे वर्णन केलें आहे, या ठाणेश्व- रचा निश्चय करणें शेकास्थान झालें आहे. कारण एका रेंगस्थानां-

१०२ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

तून एका नदीवर पोहोचल्याचे जें वर्णन आहे तें प्रसिद्ध ठाणेश्व- राच्या परिस्थतीशीं जुळत नाहीं व दगडाळ जमीन व उंच पर्वताहि येथें नाहीं ( इलियड. २ पान ४५२ ). पण हं लक्षांत ठेवलें पाहिजे कीं उत्‌बी स्वतःच्या माहितीने लिहीत नाहीं आणि तों वर्णन नेहमीं आतिशायोक्तांचें करितो, ठाणेश्वराजबळ सरस्वती नदी आहे, व कर्नीळ जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये देशाचे वर्णन करितांना असें म्हटलें आहे कीं, ठाणेश्वरच्या उत्तरेस कांहीं डोंगराळ प्रदेश आहेत, त्यांतून वर्षांकाळांत भरण्याऱ्या सरस्वती वगेरे नद्या येतात. ही लढाई ठाणेश्वराच्या अगदीं जवळ नव्हे पण तेथून थोड्या अन्तरावर झाली असावी. इ. स. १०१४ मध्यें ही लढाई झाली असे योग्यरीतीने म्हणतात, व कर्नाळ गॅझेटियरमध्यें तसेंच म्हटलें आहे. पंजाब खालसा केल्यावर दुसऱ्याच वर्षी मुलतानच्या बाजूनें रेतस्थानांतून येऊन महमदानें ठाणेश्वरवर अचानक छापा घातला असावा असें आम्हांस वाटते. सव पंजाब त्याच्या कबज्यांत होता व त्यास पाहिजेल तो मार्ग घेणें शक्‍य होतें. यापूर्वी मुलतानला दुसऱ्यानदां भेट देऊन कामीती पाखंडांत पुनः पडल्याबद्दळ तेथीळ मसलमानांस त्याने शिक्षा केली ह्वोती

या स्वारीची फिरिस्तानें दिलेली हकिकत सवच काल्पपिक आहे असं आम्हांस वाटते. तो चाररीं दोन हिजरी म्हणजे इ. स. १०१ १ मध्ये ही स्वारी घालतो व असें वर्णन करितो कीं, ठाणेश्वरवर हा करून तेथील प्रसिद्ध जगसोमदेव भ्रष्ट करण्याचा महमुदाचा विचार आनंदपाढाला कळला, तेव्हां तो जरी महमुदाचा अकित होता तरी त्याबद्दल त्यानें मोठ्या अदर्बीनें महमुदाचा निषेध केला, पण तो महमुदानें मानला नाहीं व त्यानें असं उत्तर पाठाविळें कीं महमदी धर्माचे भक्त स्वगत पुण्यफळ मिळण्यासाठी मूर्तिपूजा नष्ट करण्याचा नेहमीच प्रयत्न करितात, दिरलीच्या राजानें हें ऐकून ठाणेश्वरच्या

ठाणेश्वरावरील स्वारी. १०३

मूर्तीचे रक्षण करण्यासाठीं सर्वे हिंदुस्थानचे हिंदु बोलाविले. पण हे हिंदु जमण्यापूवींच महमुदानें ठाणेश्वरावर हछा केला. ठाणे- श्वर काबीज केल्यावर दिल्लीवर चढाई करण्याची महमुदाची इच्छा होती; पण त्याच्या सरदारांनीं त्यास सांगितलें की, जोपर्यत आपल्या पाठीवरील पंजाब आपण जिंकून घेतला नाहीं, तोंपर्यंत दिल्लीवर चढाई करणें सुरक्षित नाहीं. ही सवे हकीकत कपोलकल्पित आहे. कारण दिल्ली यावेळीं अस्तित्वांत नव्हती. निदान तें राज्य हिंदुस्था- नास निमंत्रण करीळ इतक्या मोठ्या पदवीस चढलें नव्हतें. तें एक मांडलिक लहान राज्य होतें. दुसरें उतूबीच्या वर्णनावरून नंदनच्या लढाईंत आनंदपाल मरून गेल्यावर व पंजाब खालसा झाल्यानंतर ही स्वारी झाली असं दिसतं. या स्वारीस मागील वर्षात घाढून फिरिस्ताने कल्पित, प्रशंसायुक्त एक वर्णन तयार केळें आहे. यमीनी मध्ये दिळेल्या हकीकतीवरून दिछीचा येथें कांहींच संबंध दिसत नाहीं. समकालीन लेखकांनीं दिल्लीचा कोठोहि उछेख केलेला नाहीं. असं खुद्द इलियटनेंहि योग्य-रीतीनें येथें म्हटळें आहे. ‘गझनी संबंधानें दिल्ली व तेथील राजे यांचा जो फिरिस्ता उछेख करितो तो पायाझुद्ध नाहीं. असंहि इल्यटनें म्हटलें आहे ( पा. ४५४ ). मुख्य कारण हृ को, चार पांच शतकानंतर लिहिणाऱ्या लेखकांस आपल्या भोंव- ताल्ची परिस्थिति विसरणे अशक्य होतें; आणि आपल्या वेळीं प्रसिद्द असलेल्या दिछलीस त्यांना वगळतां येत नाहीं, कोठेंतरी घाला- वेसें वाटते.

प्रकरण अकरावें. मथुरेची लूट.

मागील स्वारीवरून महमुदास कळून च॒कळलें कीं, मध्य हिंदु- स्थानांत स्वारी करणें राक्‍्य आहे. मध्य हिंदुस्थानांतील मथुरा शहर तेथील अनेक देवळे व व्यांतील अमोल संपत्ति याबद्दल प्रसिद्ध होते. मध्यदेशाचा राजा राज्यपाल याविरुद्ध लढंण्यास महसमुदास कारणहि मिळालें होतें. कारण त्यानें पंजाबच्या राज्यास महमुदाविरुद्ध लढ- ण्यास वेळोवेळीं मदत केली होती. पण ही दूरची स्वारी करण्या- पूर्वी त्यानें युद्धाची चांगली तयारी केली, आपली पिछाडी सुरक्षित राहण्यासाठी पश्चिमेकडील प्रांतांतील अडचणींचा बंदोबस्त करणें जरूर होतें. उतूबीनें या अडचणींचे आपल्या प्रंथांत विस्तारानं वर्णन केळं आहे. गझनी येथें प्रचानाची घालमेलहि त्यास करावी लागली. गझनी येथील राज्यपद्धति व्यवस्थित होती; आणि प्रांता- वराळ अधिकाऱ्यांवर महमूद करडी नजर ठेवी. विद्वत्तेचे केंद्र त्यावेळीं खुरासान होतें, व भाषा परियन होती; पण नवा नेमलेला वझीर स्वतः कवि व विद्वान्‌ असल्यानें त्यानें सर्व पत्रव्यवहार अरबींत करावा असा हुकूम सोडला. तुकांचा राजा इलेकूखान द्याच सुमा- रास मरण पावला, व त्याचा भाऊ त्याच्या गादीवर बसला. महमूद हिंदुस्थानांतील मातपूजकांवर चढाई करून त्यास जिंकीत असतां चीनचें व मोगोठियाचे मूर्तिपूजक कारगर येथील मुसलमान तुकांवर एक लाख सैन्य घेऊन घसरले. ही पुढें होणाऱ्या चोगेसखान व तैम्‌र यांच्या भयंकर मोगली स्वाऱ्यांची दोनशों वर्षांपूर्वी सूचना होती इळेकखानाचा बंधु तोगनखान यानें सर्वे महमदी राजांस या स्वारीस

मथुरेची ळूट. १०५

विरोध करण्यासाठीं मदत करण्याविषयीं विनंति केली व महमुदानेंहि ‘ एक तुकडी मदतीस पाठविली. यावेळीं मोगल-तुकांचे घनघोर युद्ध झाळे, आणि चीनच्या मूर्तिपूजकांचा हिंदुस्थानच्या मृर्तिपूजकांप्रमाणें पराभव होऊन बहुतेक सवे मारळे गेले. तोगनखानाच्या तुकाशीं महमदानें पूर्वीप्रमाणेच सख्यमाव ठेवला, आणि आपला मुलगा मसऊद याच्याशीं इलेकखानाच्या मुलीचा विवाह करून हें सख्य वाढविले. या मसऊदास व्यानें बल्कचा अधिकारी नेमिले उतूबीनें आणखी असं येथें वणन केळं आहे कों महमुदाची मुसलमानी धर्माच्या आस्थेविषयीं ख्याति पसरली. व त्याच्या बुद्धि- मत्तेमुळे तो धर्म विवेचण्याचीहि त्यास पात्रता आहे असें लोक समजूं लागले. महमुदानं ठरलेली इस्लामीं मते नवीन कल्पनांनीं बिघडलीं जाऊं नयेत याविषयीं पूर्ण लक्ष ठेविळे. पाखंडी लोक कोण कोण आहेत आणि ते कोठें सभा भरवितात हे शोधून काढण्यासाठी त्यानें हेर ठेविले. राज्याच्या निरनिराळ्या प्रांतांतून व शहरांतून हे पाखंडी हुडकून दरबारांत आणीत आणि मग झाडावर खिळ्यांनीं खिळून किंवा दगडांनी ठेंचून मारीत. अवूबकर एक धार्मिक व आदरणीय सरदार या कामांत सुलतानाला पाठिंबा देत असे. टाहिरटी नांवाचा एक मनुष्य इजिप्तचा राजा व खलीफा याजकडून मी वकील आलो आहे व बरोबर पत्रे व पोषाख आणला आहे असें म्हणत गिझनीस येत होता. हा आपल्यास सय्यदाहि म्हणवी. पण महमुदाच्या हुकमानें ह्यास हिरात येथेच थांबवून खुरासानची राजधानी निशापूर येथें परत नेलें. पाखंडाबद्दल तेथें त्याची चोकशी झाली ब बगदादचा

  • खलिफा कादिरबिछ्ला याच्या संमतीने त्यास देहांत शिक्षा दिली गेली. आपल्या विस्तृत राज्यांत याप्रमाणें महमुदानें पाखंडाचा बंदोबस्त केला, इतकेंच नव्हे तर खिलाफतीचाहि तंटा नाहींसा केला. यामुळें सर्व मुसलमानी प्रदेशांत त्याची कौर्ते पसरली (पान ४४४ ).

१०६ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

धर्मोत्साहानें गझनी येथे काफिरांविरुद्ध केलेल्या स्वाऱ्यांत लढण्या- साठीं लढवई लोक जमा होऊं लागले यांत आश्चर्य नको. त्यांस मूर्तींचा भंग करून आणि देवळें लुटून परळोकांत आणि इहलोकांत या लढण्यानं फल प्राप्त होण्यास वाव मिळण्याची आशा होती.

“६ ख्वारिझम येथें बंड झालें होतें तें मोडून व तो प्रांत आपल्या राज्यास जोडून महमुदानें तिसरी धर्मवेजयाची स्वारी करण्याचा विचार केला व बोस्त येथें येऊन आपल्या सुभ्यांचे त्यानें ञमाखचे पाहिळे, हिंदु लोकांपासून जिंकून इस्लाम राज्यांत मिळविलेले प्रांत

द्रव्याने भरपूर होते, व कारमीराशिवाय कोणत्याहि ठिकाणीं मूर्ति- पूजेचा अंधकार उरला नव्हता. ओक्सस नदी पलीकडील मवरुन्न- हरच्या मैदानांतून वीस हजार लढवय्ये इस्लामी धर्मोत्साहाने आले. त्यामुळे सुलतानाचा विचार पक्का झाला आणि या लोकांसह कनोजवर स्वारी करण्याचा बेत कायम झाला. परदेशी राज्यांस हा कनोजचा मुळूख अगदीं अज्ञात होता.

उतूबीनें कनोजवरीळ कूचाचें आणि मर्थुरेजवळीळ लढाईचे पुढीलप़रमाणें वर्णन केळें आहे..

“ जिहून ( सिंधु ), झेलम आणि चंद्र नद्या ओलांडून तो थेट तिबेटास गेला. तो जेथें जेथें मुक्काम करी, तेथें तेथें लोकांचे वकील येऊन, अंकितत्ब मान्य करून राजनिष्ठा जाहीर करीत. कार्मीरच्या हर्ददवावर तो पोहोंचला तेव्हां कारमीरचा सेनापति शासीन याचा पुत्र हबाळी नोकरीस दाखल झाला. इस्लामी धम ज्यानें स्वीकारला नाहीं त्यास सैन्यांत जागा नाहीं असें त्यांस जेव्हां सांगितलें, तेव्हां पुढील बीनीच्या लुटारूत सामील होऊन तो सेन्यापुढें चाळूं लागला. एका- मागून एक दऱ्या ओलांडीत फौज चालली तेव्हां पहाटेस कोंबडा आरवण्याबरोबर सनई व नगारे वाजू लागत. ( भाग १ पान १४२३ यांत दिलेलें हर्षांच्या कूचाचें वर्णन येथें स्मरते ). हिजरी सन ४०९

2 काट -दात्याऱ्याव.,

| | | | । | ।

मथुरेची ळूट. १०७

(इ. स. १०१८ )च्या रज्जबच्या विसाव्या तारखेस त्यांनीं यमुना मागें टाकिळी, आणि हरून राजाच्या बरणच्या किछ॒यास ते येऊन पोहोंचळे. हा राजा हिंदुस्थानच्या राजांत फार मोठा होता. पण त्यानें जेव्हां महमुदाचा सेनासमुद्र पाहिला, तेव्हां त्यानें दहा हजार माणसां- सह किछ॒याखाठीं उतरून इस्लामी धर्मीचा स्वीकार केला. येथून फोज कलजंदच्या किछ्याजवळ पोहोचली. या कलजंदजवळ आति- शय संपत्ति, मजबूत घोडदळ आणि मोठें पायदळ सेन्य होतें. त्यानें आपलें पायदळ, घोडदळ व हत्ती लाऊन तो एका अरण्यांत सुल- तानाच्या येण्याची वाट पहात राहिला. या अरण्यांत झाडांची इतकी गर्दी होती कीं, सूयाचे किरण त्यांत प्रवेशात नव्हते. वरून एखादी सुई पडती तर झाडांच्या फांद्यांतन ब पानांतून ती खाली आली नसती. सुलतानानें अशा अरण्यांतहि घुसण्याचा आपल्या बिनीस हुकूम केला, व वरच्या किछ्याजवळून एक रस्ता काढला. जेव्हां हिर्या सेनासमुद्राने : अल्लाहो अकबर ‘ अशी आरोळी ठोकली, त्यावेळेस शत्रच सैन्य कांहीं वेळ कायम उभे राहैलें व त्यांनीं आपल्या ठिकाणावरून हछलेहि केळे. पण शेवटीं असें कळून आलें कीं, सव गोष्टी दैवाधीन आहेत आणि तरवार कितीहि चांगली असली, तिचा जोर कितीहि असला, तिची धार कितीहि तौक्ष्ण असली तरी ती जेव्हां मुसलमानाच्या रक्तापर्यंत पोहोंचते, तेव्हां ती दैवी हुकुमाच्या अंकित असते. शेवटीं निरुपाय झालेले शत्रु प्राण वांचविण्यासाठीं नदींत पडले. परंतु कित्येक तरवार्रानें मेळे व कित्येक बुडून मेळे. याप्रमाणें पांच हजार मत्युमखीं पडळे तेव्हां कळजंदानें प्रथम आपल्या बायकोस खंजिरानें मारून आपलं पोट फाडून नरक- गमन केलें. त्याच्या संपत्तीपैकी एकरी पंचाऐशीं हत्ती व पुष्कळ उत्तम ळूट मुसलमानांस मिळाली. शहरामध्ये हिंदु लोकांच्या पूजेचे एक स्थान होतें. तेथें सुलतान पोहोचला तेव्हां आश्चर्यचाकित करणाऱ्या

१०८ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

कल्पनेने बांधठेळे एक शहरच त्यास दिसलें, तें पाहतांच हें स्वर्गा- तीळ भवन आहे असं त्यास वाटलें. ”

हें जें काव्यमय व संक्षिप्त वर्णन महमुदाचा शिरस्तेदार उत्‌बी गझतींत राहून करतो, त्यावरूल या स्वारीचा प्रकार इतर लेखकांच्या मदतीनें आपल्यास निश्चित करतां येतो. महमुदाजवळ यावेळीं समारं एक लाख सेन्य होतें. त्यांत ऑक्सस नदीपर्लांकर्डाट वीस हजार बिनाशैर्स्तांचे मोजेसाठीं आलेले तुकी शिपाई होते. पण महमुदानें कूच करीत असतां कुशळ सेनापतीप्रमाणे जरबेची शिस्त ठेविली होती पहाटेस उठून तो दिवसभर चालत होता. आपल्या जलद चालीनें शत्रस बेसावध गांठण्याचा त्याचा विचार होता. हिमाल्याच्या पायथ्या पाय- थ्यानें तो चाळला.बहुधा पंजाबांतीळ मोठ्या नद्या उगभाजवळ ओलांड- ण्याचा त्याचा हेतु असावा. रस्त्यांत जो जो किछा आला, तो तो या प्रचंड सेन्यासमोर तगला नाहीं. पण त्यानें हिंदु लोकांस अंकित- पणा मान्य करण्याच्या सबबीवर आपल्या सैन्यांत मिळूं दिळें नाहीं. असें केलें असतें तर त्याच्या सैन्यांत एक विरोधी भावनेचे व वेळेस दगा देणारें अंग उत्पन्न झालें असतें. याचसाठीं काऱमीरच्या फोजेस त्यानं फोजेच्या पुढें चालण्यास हुकूम दिला.- ( कार्मीरांतून एखादी फौज खरोखरच आली असेल ह्याविषयीं आम्हांस शंका आहे, याज- विषयीं पुढें जास्त लिहू ). रज्जबच्या विसाव्या तारखेस म्हणजे इ. स. १०१८च्या डिसेबरांत यमुना नदी उतरून गंगा न उतरतां तो दक्षिणेस अन्तर्वेदींत घुसला. कारण कनोज गंगेच्या पश्चिम किना- ऱ्यावर आहे. व कनोजवर हला करतांना दरम्यान गंगानदी ठेवणें इष्ट नव्हतें. कित्येक मांडळिक रजपूत सरदारांनीं त्यास हरकत केली. पण बरणच्या राजाप्रमाणे पुष्कळांनीं नमस्कारच केला असावा. बरण म्हणजे हल्लीचे बुळंदराहर होय यांत इंका नाहीं. हें नगर जुनं असून महाभारतांतील वारणावत होय असें मानतात. येथें

मथुरेची ळूट. १०९,

इ. स. पू. दुसऱ्या शतकांतील शकक्षत्रापांची व कुशनांचीं नाणीं सांपडळीं आहेत, व. गुप्त काळांतील एक ताम्रपटहि सांपडला आहे. येथें एक मांडलिक राजा डोर रजपूत वंशांतला हरदत्त नांवाचा यावेळीं असावा. याचें नांव परियनमध्ये हरून असे वाचलळें गेळें असावें. या राजकुलाचा एक लेख इ. स. १०९६चा सांपडला आहे. त्यामध्ये या कुलाची वंशावळ दिली असून सातवा राजा हरदत्त हा महसु- दास शरण गेला असावा ( बुंदलशहर गॅझेटियर ). दहा हजार अनुयायांसह हा मुसलमान झाला ही बहुधा उत्‌बीची अतिशायोक्ति आहे. येथून दक्षिणेकडे महमूद गेला, तेव्हां त्यास कल्जंदानें मोठ्याशा सैन्यानिशी मथुरेजवळ विरोध केला; व ल्याने अल्लंत घैयोनें व चिकाटीनें महमुदाच्या प्रचंड सैन्याशी टकर घेतली. हा बहुधा क- नोजचा प्रतिहार सम्राट राज्यपाळ याचा सेनापति व मांडलिक असावा.

हिंदूंचे विशेषतः वैष्णवाचें अल्यंत पवित्र मथुरा नगर प्रतिहारांच्या साम्राज्याच्या मध्यभागीं होतें. आणि प्रतिहार सम्राट पुष्कळदां विष्णु- भक्त असत. मथुरा शहर रामाचा बंधु शत्रुघ्न यानें वसविळें असून तें श्रीकृष्णाचे जन्मस्थान होतें. बौद्धांनाह्ि मथुरा पुण्यस्थान आहे. हिंदु काळांत तर मथुरेचें महत्त्व वूर्वीपेक्षांहि अधिक वाढलें. अर्थात्‌ तेथ बांधळेलीं अप्रतिम देवालये आणि त्यांत जमलेलीं अमूप संपात्ते विरोध केल्याशिवाय मूर्तिभंजक ठुटारूंच्या स्वाधीन करणें शक्‍यच नव्हते; आणि राज्यपाळ स्वतः समोर होण्यास जरी नाखुष होता, तरी त्यानें महमुदाशीं लढण्यास मोठें सैन्य पाठविलें असलें पाहिजे, ही लढाई एका अरण्यांत झाली असं वर्णिळें आहे. नकाशांत दिलेल्या महाबन गावांजवळ या लढाईचे स्थान ठरावितात. त्यावेळीं या गावां- भोंवतीं मोठें अरण्य असावें. याच अरण्यांत नंद रहात असून त्यानें श्रीकृष्णास वाढविळें होतें. यामुळें अलीकडच्या कालापर्यंत हें वन तोडीत नसावेत. ही जागा मथुरेपासून सहा मैलावर आहे. या जंगलांत

११० गझर्नाच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

शहाजहानानें वाघाची शिकार केल्याचे दाखले आहेत ( मथुरा गझेटियर ). येथे एक लहान टेकडी असून त्याजवर किछ्लाहि आहे. या गांवचा वंशापरंपरेचा रक्षक कुलचंद्र असावा. तो आपल्य! पाय- दळ, घोडदळ व हत्तींसह मोठ्या निकराने लढला. उत्‌बीनें नेहमीं- प्रमाणे महमुदाच्या विजयाचें कारण देवाची इच्छा असेच दिलें आहे. महमूद जरी एका प्रचंड अप्रतिकार सनेसह आला होता, तरी मह- मुदाळा आपलें पवित्र नगर ठुटण्यास व विध्वस्त करण्यास, हिंदूंनी त्यास बचावण्याचा जोराचा प्रयत्न केल्यारिवाय, मोकळें सोडलें नाहीं, ही गोष्ट हिंदूंस भूषणावह आहे. पण दैवाची गति चुकत नाहीं असें पाहून कुलचंदानें रजपुतांच्या नेहमींच्या रिवाजाप्रमाणे प्रथम आपल्या बायकोस ठार मारून नंतर आपल्यासहि मारून टाकलें. मथुरा नगरीचें केवळ अतिमानुष वैभव आणि महमुदास मिळालेली अवाढव्य संपात्ति याचे वर्णन उत्‌बीनं पुढीलप्रमाणें केलें आहे. “ एक हजार किल्लेवजा मूर्तींची मंदिरें बांधळेलीं असून

शहराच्या मध्यभागीं सर्वाहून उंच असं एक मंदिर बांधलें होतें. त्याच्या सोंदर्यांचें आणि त्यावरील नक्षीचें वर्णन करणें लेखकांच्या लेखणीस किंवा चिताऱ्यांच्या कळमास अशक्‍य आहे. या प्रवासाचा जो वर्णनात्मक ठेख सुलतानाने लिहिला आहे त्यांत तो म्हणतो कीं “अशा प्रकारची इमारत कोणी बांधण्याचे हल्लीं मनांत आणील तर त्यास एक हजार दीनारांच्या एक लक्ष थेल्या त्यावर खचे कराव्या लागतील. आणि आतशय कुशळ कारागिरांच्या मदतीनेंहि दोनशें वर्षांत ती पुरी करतां येणार नाहीं. मूर्तींचे जे ढींग सांपडळे त्यांत पांच मूर्ति झुद्ध सोन्याच्या पांच हात उंचीच्या होत्या. आणि एका मूर्तीवर एक रत्न बसविलेले मिळालें, तें इतकें उत्तम होतं की, बाजारांत पास हजार दीनार देऊन सुलतानाने खुशीनें तें विकत घेतळें असतें. दुसऱ्या मूर्तीवर एक नीलवणीचा नीळमणि चारशे

मथुरेची ळूट. १११

मिसकालळ वजनाचा मिळाला. एका मूर्तींच्या पायाच्या सोन्यांतून चार लक्ष चारशे मिसकाल वजनाचे सोनं मिळालें. चांदीच्या मूर्त । तर इतक्या होत्या कीं, त्यांचे वजन करतां करतां वजन करणारे । लोक थकले, त्या सव नगराचा विध्वंस करून आपल्या फोजेचा ! मोठा हिस्सा तेथे ठेऊन सुलतान कनोजकडे गेला.

कनोजच्या प्रतिहार सम्राटांच्या उतरत्या काळांत महमुदाने ‘ केलेल्या मथुरेच्या ठुटीची हिंदूना हृदयद्रावक अशी ही हकीकत ‘ आहे. अशक्तांकडून सराक्तांकडे संपात्ते नेहमींच जात आली आहे ‘ रोमन साम्राज्याच्या उतरत्या काळांत अलारिकनें केलेल्या रोमन लुटीची गिबननें रसभरित रीतीनें वर्णन केळेली हकीकत या ठिकाणीं आम्हांस स्मरते. “या बाहशाही शहराच्या स्थापनेनंतर एक हजार एकरे साठ वषानीं ज्या शाहरानें मनुष्य जातीचा मोठा हिस्सा जिंकून सुधारला, तें शहर जर्मनीच्या आणि सिथियाच्या रानटी जातींच्या हल्ल्याच्या वावटळींच्या भक्ष्यस्थानी पडळें. गॉथ लोक नुकतेच खिस्ती झाळे असल्यामुळें त्यांनीं व्हाटेकन नामक (खिस्ती) इमारतीचा बचाव केला व तेथें आश्रयास आठेळे अनेक खिस्ती झालेले रोमन लोक वांचविळे. पण इतर रोमन लोकांची निर्दयपणे कत्तळ झाली. सुवर्ण आणि रत्नें लुटली गेलीं. रोममधील अनेक राजवाड्यांतीळ बहुमोल सामान काढळे गेळे. शेकडों मूर्ति त्यांतील किंमती धातसाठीं आटविल्या गेल्या आणि अनेक संदर भांडीं ठढा- ईच्या फरशूनीं फोंडलीं गेलीं. जे दुर्दैवी लोक सन्माननीय स्थाना- पासून आणि उत्कर्षाच्या वैभवापासून एकदम केद्यांच्या दुःखदायक स्थितीच्या रसातळास पोहोंचळे, त्यांची संख्या सांगणें अशक्‍य आहे. रोममधून पळालेल्या लोकांनीं रोमचे प्रांत भरून गेळे, आणि चकित झालेल्या रोमन साम्राज्यांत रोमच्या ह्या भयंकर दैवापघातानें दुःख आणि भीति पसरून दिली.

प्रकरण बारावे. कनोज पडले.

दुःख आणि भीति यांनीं उत्तर हिंदुस्थानचा सम्राट व्याप्त झाला. सम्राट राज्यपाल मथुरा किंवा कनोज येथें न राहतां, रोमचा बादराहा आनोरेरेअस याप्रमाणें जो पळत सुटला तो थेट गंगेच्या पलीकडे बारी येथें जाऊन पोहोंचला. हें ठिकाण अजून निश्चित झालें नाही. आपल्या बातर्मादारांकडून हा सर्व वृत्तात महमूद यास कळलाच. असावा. तथापि त्यानें कुराणावरून शकुन पाहिला, आणि थोडेसें सैन्य घेऊन राज्यपालाचा गंगेच्या पठीकडे पाठलाग केला. राज्यपालाला लढाई देण्याचा मोह पडेल अशी ल्याची समजूत होती. राज्यपाल हा हिंदुस्थानांतील राजांत अग्रगण्य होता व इतर सर्व राजे त्याच्या पुढें मान वांकवीत आणि त्याचें सामर्थ्य आणि महत्पद मान्य करीत असे उत्बीनें जें वर्णन केळें आहे तें योग्य आहे. या राजाचें नांव राज्यपाल असें होतें हे आतां आपल्याला कळून च॒कलें आहे. राज्य- पाळ याचे ऐवजीं फारशींत ‘राजा जयपाल’ किंवा हयपाल असे वाचलं जाणें अगदीं संभवनीय आहे. आपल्याला उपलब्ध झालेल्या कोरीव लेखांच्या पुराव्याच्या अभावीं हा राजा म्हणजे लाहोरचा मृत राजा जयपाल्च होय असें कित्येकांनीं ठराविळें यांत आश्चर्य नाहीं. लाहो- रच्या जयपालाचें राज्य मध्य हिंदुस्थानांतहि असावें असं ईलियट यांस कदाचित्‌ वाटळें असावें. पुढील काळांतील मुसलमान इति- हासकारांनीं त्याचा अनेक निरनिराळ्या नांवांनीं उछेख केला आहले. परंतु ते सर्व कल्पनेचे खेळ आहेत. कांद्दींनी त्याला जयपालाचा पुत्र (मुलगा कुंवरपाळ) असोहे म्हटळें आहे. शाबानच्या ८ व्या तारखेस

कनोज पडले. ११३

( जानेवारी १०१९ इईलियट पा. ४५७) “ महमूद कनोजला पोंचळा, तेथें त्याच्या समोर एक पवेत उभा राहिला. पळत अस- लेल्या सम्राटाचा पाठलाग करण्यासाठीं त्याचें सैन्य गंगा उतरले, राज्यपालास बहुधा त्याला गांठता आलें नाहीं. तेव्हां महमुदाने गंगा नदीच्या किनाऱ्यावरील कनोजचे साती किल्ले सर केळे’”(उत्बी ४५७). “या किछुयाच्या आंत जवळ जवळ १०,००० देवळें बांधलेली होतीं आणि तीं दोन तीन हजार वर्षांपूर्वी बांधलेली होती असें तेथील असल्यवादी मूर्तिपूजकांचें म्हणणें होतें. !’ कनोज हें प्राचीन शहर आहें. पुराणांत वर्णन केलेला विश्वामित्राचा पिता राजा कुशिक तेथें राज्य करीत असे अशी कल्पना आहे. मथुरेप्रमाणेंच कनोजची पवित्रताहि विशेष मानण्यांत येत असे, या काळीं तें शहर भरभरा- टींत होतें. त्याच्या वैभवाला चारशे वर्षांपूर्वी हर्षाच्या काळांत सुरु- वात झाली होती. हुएनत्सँगनें वर्णिलेल्याप्रमाणें हर्षाच्या काळींच त्या शहराचा विस्तार फार मोठा जाहला होता. त्याचे वर्णन पहिल्या पुस्तकांत ( पान २८ ) उद्धृत केळे आहें. अर्ध अधिक लोकांनी शहरांतून आधींच पळ काढला होता. सुलतानाने एकाच दिवसांत सर्व किल्ले घेऊन ते लुटून टाकळे. कनोज मथुरे इतकें भव्य असावेंसें दिसत नाहीं. महमुदानें केलेठढें रसभरीत वर्णन चुकून केव्हां केव्हां कनोजला लाविलें जाते; परंतु उत्बीच्या पुस्तकावरून असें स्पष्ट दिसून येतें कीं तें वस्तुतः मथुरेचेंच आहे. येथील देवळें मथुरेच्या देवळांप्रमाणें महमुदानें उध्वस्त केल्याबद्दल स्पष्ट उठ्ठेख आढळत नाहीं.

“ कनोजहून महमूद मांज नांवाच्या तटबंदी केलेल्या ब्राह्मणांच्या किल्ल्याकडे वळला. ब्राह्मणांनी थोडा काळ त्याचा प्रतिकार केला. परंतु आपल्या प्रतिकाराचा कांहीं उपयोग नाद्दीं असे पाहिल्यावर

ट्र

११ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

ब्यांनीं किल्ल्यावरून खालीं उड्या टाकल्या. कित्येक जणांनी भाल्यांनीं किंवा तरवारीच्या धारेने आपल्यास मारून घेतलें. !” मांज कोणतें स्थळ आहे याचा अजन निर्णय लागलेला नाहीं. तें गंगा नदीवर दक्षिणेकडे हल्लींच्या इटावा जिल्ह्यांत असलें पाहिजे. “तेथून सुलतान अस्तर किछ्यावर आला, तो किल्ला संतापी जंदबाळ याच्या ताब्यांत होता. हा किला एका अरण्यांत टेकडीवर बांधलेला होता; व त्याच्या भोंवतालीं खोळ खंदक खोदला होता. ‘’ अस्तर म्हणन फत्तेपूर जिल्ह्यांत गंगा नदीच्या पाश्चिम तीरावर मजबूत किला आहे, या किछठर्‍याचा मालक बहुधा कनोजचा मांडलिक असावा व त्याच्याकडून आपल्यास अडथळा होण्याचा संभव असल्यानें, त्याला जिंकून महमुदानें आपले मोर्चे “ चंद्रराजाकडे वळविले. त्याच्या ताब्यांत एक फार मजबूत किल्ला होता. ” हा चेद्रराज म्हणजे चंदे राजा होय. कालंजरचा अजिंक्य किल्ला त्याच्या ताब्यांत होता. तो स्वतंत्र राजा होता. उत्बीनेहि त्याचें असे वर्णन केलें आहे कां “त्यानें कधीं दुसर्‍्याचें मांडलिकत्व कबूल केळें नाहीं. गवे आणि आत्मशछाघा यांखेर्राज दुसरें कांहीं त्याला माहीत नव्हतं! (पा. ४८०)

संतापी जंदबाळ (हा बहुधा प्राचीन गोंतम कुलांतील एक

संस्थानक असावा. या कुलाचे ठोक अजूनहि फत्तेपूर जिल्ह्यांत बस्ती करून आहित-फत्तेप्ृर गझेटिअर-अथवा तो यमनेच्या दक्षि-

णेस जालोंन जिल्ह्यांतीळ जगमनपूरचे महाराजे म्हणून प्रसिद्ध . असलेल्या संंगार घराण्यांतील एक संस्थानिक असावा ) आणि चेंद्र- राय यांचे दरम्यान भांडण चाललें होतें असें उत्बीनें म्हटलें आहे. हं भांडण कशाबद्दळ होतें ते॑ कळत नाहीं. त्यांचें हें भांडण चाळ असतांच महमूद चंद्रराजावर चाळून आला. चंद्रराजानें “ज्यापुढें . शत्रला उभें राहवणार नाहीं असें आपलें प्रचंड सैन्य आणि आपला किल्ला यांच्या जोरावर सुलतानाला विरोध करण्याचा निश्चय केला. .

कनोज पडले. ११५

परंतु “ युद्ध करूं नको असा हयबालाने त्याला सला दिला आणि तो आपले सैन्य व खजिना घेऊन पर्वेतांत मागें हटला. !? हयबालाने हा जो सछा दिला तो सुलतानाने चंद्ररायाचा पराभव केल्यावर काल्पांचा किछा आपण आपल्या ताब्यांत ध्यावा या दगलबाजीच्या हेतूनें दिला असें उत्बीचे म्हणणें आहे. परंतु किला सर करण्याच्या भानगडींत न पडतां “ महमुदानें सारखे तीन दिवस चेद्रराजाचा तो जाईल तेथे पाठलाग केला आणि पुष्कळ माणसांस मारून त्यांचीं हत्यारें ब लढाईचा सरंजाम हीं पाडाव केली. त्यांनी कांहीं हत्ती पकडून नेळे व कित्येक हत्ती आपखुषीनें त्यांच्या बरोबर गेळे, व त्यांस यांनीं खुदादाद म्हणजे देवानें दिलेलें असें नांव दिलें. ! “ चेद्ररा- याच्या खाजेन्यांत त्यांना सोनें, चांदी, जवाहीर व इंद्रर्नालमाणे यांची नीन हजार पुडकीं सांपडली. त्यांना गुलाम तर इतके मिळाले कीं यांना प्रत्येकी दहा दिऱ्हमापेक्षां अधिक किंमत आली नाहीं. सुलतान ाझनीलळा परत आला आणि ल्याच्या वैभवाची कौर्ति दिगंत पसरली.’’

कानपूर आणि काल्पापर्यंत दक्षिणेस आठेली ही महमुदाची स्वारी याच्या सर्वे स्वाऱ्यांत खरोखर अत्यंत लांबवर गेळेली, आतिशय फायद्याची, आणि अप्रातिम पराक्रमाची अशी होती. पुढील काळांतील मुसलमान इातेहासकारांनीं आणि विशेषतः फिरिस्तानें त्या काळच्या वास्तावेक इतिहासाच्या आणि अंतरबेर्दाच्या मुगालविषयक अज्ञानाने कित्येक गोष्टी |वेसंगत सांगितल्या आहेत थब कांहीं गोष्टींत वाटेळ ती भर दडपून दिली आहे. आणि फिरिस्तावर अवलंबून राहून महमुदाच्या हालचाली समजावून सांगतांना युरोपीय इतिहासकारांची धांदळ उडाली आहे. परंतु ईलि- यटनें दाखवून दिल्याप्रमाणें हा सर्वे घोंटाळा अधिक विश्वसनीय ब समकालीन माहितीकडे लक्ष न देतां फिरिस्तावर सर्वस्वी अव- ल॑ंबून राहण्याने उत्पन्न झाला आहे ( पा. ४०८ ). अशा तऱ्हेची

११६ गझर्नीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

माहिती उत्बीच्या यमीनी बखरींमध्ये सांपडते आणि आम्ही वर लिहि- लेला इतिहास त्यानें लिहिलेल्या वृत्तानतावरूनच दिला आहे. खरोखर महमुदाच्या स्वारीचा मार्ग बहुशः असा असावा. अंतरवेदींत आ- ल्यावर तो मीरत आणि बरणच्या मार्गानें दक्षिणेस ( मथुरेजवळीळ ) महावनापर्यंत आला; व नंतर यमुना उतरून त्यानें मथुरा लुटली. त्यानें पुनः यमुना ओलांडली व तो कनोजळा गेला. राज्यपालाला मिवविण्यासाठीं तो गंगेपळीकडे थोडासा गेला आणि पुनः माघारे वळून त्याने कनोज हस्तगत केलें. अंतर्वेदीतून दक्षिणेस जाऊन त्यानें र॒का प्रबळ संस्थानिकाचा पराभव केला. आणि काल्पीला यमुना पुनः ओलांडून त्यानं पर्वतांत चंद्ररायाचा पाठलाग केला; परंतु तो कांठजरपर्यंत गेला नाहीं. त्यानें कार्ल्याजवळ यमुना पुनः ओलांडली व मागें वळून आल्या मागीनें तो अन्तर्वेदींतून परत गेला. निझाम-उद्दीन आहमदच्या इतिहासांत त्याच्या स्वारीचा मार्ग अशाच तर्‍हेनें वार्णिळा आहे व ईल्यिटनें त्याचा एक उतारा दिला आहे (भा. २ पा. ४६०-६१ ), त्या उताऱ्यांत निजामुद्दि- नांनें उत्बीच्या वर्णनांत फारच थोडा फरक केला आहे.

खरी अडचण आहे ती हिंदूराजांचीं नांवें आणि त्यांनीं दिलेल्या लढाया हां निश्चित करण्यांत आहे. कोरींव लेखांच्या पुराव्यावरून पूर्वीच आम्ही असें दाखवून दिळें आहे कीं कनोजचा राजा यावेळी प्रतिहार सम्राट्‌ राज्यपाळ हा होता आणि चंद्रराय हा चंदेल राजा गंड होता. हा कोरींव लेखांचा पुरावा ईलियटलळा उपलब्ध नव्हता तो आतां आपल्यास उपलब्ध झाला आहे. हे दोघेहि राजे महमु- दाच्या बरोबर झालेल्या लढाईत आनंदपालाला सहाय्य करण्याकरितां गेले होते. त्यांची खोड मोडल्याखेरीज महमद खास परत जाताना हृयबालानें ( राज्यपालानें ) चेद्ररायाला दिळेला सला मित्रत्वाने दिला होता असें आम्हांस वाटतें. ते दोघोहि महमुदाच्या तावडींत न सांप-

| | ॥। ।

कनोज पडले. ११७

’ डतां निसटून गेले. यामुळें महमूद चिडून गेला असावा आणि । म्हणून उत्बी, निझामुद्दीन अहमद व फिरिस्ता यानीं वर्णन केल्या- । प्रमाणे पुढील वर्षीं त्यानें पुनः त्यांजवर स्वारी केली.

उत्बीनें या स्वारीचा सन दिला नाहां, निझामुद्दिनाने तो हि.

। ४०० असा दिला आहे तर फिरिस्ताच्या म्हणण्याप्रमाणे तो ४१२

आहे व ईलियटला तोच अधिक संभवनीय वाटतो. निझामुद्दीन

: म्हणतो कीं कनोजच्या राजानें सुलतानाची सत्ता मान्य करून तो त्याचा अंकित झाला म्हणून राजा नंदानें त्याला मारून टाकलें असं

ऐकिल्यावरून महमुदाने त्याच्या प्रान्तावर पुन्हां स्वारी करण्याचें ठरविलें. परंतु ही ह्कांकत पुढें घडली असावी आणि हें कारण

देतांना निझामुद्दिनाची चूक झाली आहे. कारण तसें असतें तर पुढें

उत्बी व निझामुद्दीन या दोघांच्या वर्णनांत आल्याप्रमाणे कनोजवर स्वारी करून तेथील राजा हयबाल याचा राहिबच्या लढाईत पराभव करण्याचें कारणच उरत नाहीं. शिवाय उत्बीनें कोठेंहि म्हटलें नाहीं कीं जयपालाने ( राज्यपालाने ) सुलतानाचें स्माभित्व कबल केलें. तो बारीला पळून गेला होता. त्याची व महमुदाची लढाईच झाली नाहीं महमुदानें दुसरी स्वारी केली ती त्याचा पूर्ण पाडाव करण्यासाठीं. असो, या दुसऱ्या स्वारीच्या वेळीं शिवाजी किंवा एखाद्या कसलेल्या सेनापर्ताप्रमाणें आपण राज्यपालावर स्वारी करीत आहोंत हें महमूदानें आपल्या सेैन्यासाहे कळूं दिळें नाहीं असं दिसतें. उत्बी म्हणतो कीं पर्वतांतील निबिड व बळकट जागीं व्यापारी तांड्यांना

त्रास देणाऱ्या अफगाण दरोडेखोरांना शिक्षा करण्यासाठीं आपण

जात आहोंत असा महमुदानें बहाणा केला. हें कार्य उरकल्यावर त्याने एकाएकीं हिंदुस्थानाकडे आपला मोर्चा वळाविला,जेंगळें ओलांडली आणि नद्यांचे उतार उतरून भाोंवताळचा प्रदेश उद्ध्वस्त करीत

जिच्या भोंबर्‍यांत घोडेस्वारहि वाहून जातात अश्या राहिब नदीवर

११८ गझर्नाच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

(ही नदी कोणती तं अजन ठरलें नाहीं ) येऊन तो उतरला. नदी- पलीकडे एका सुराक्षित ठिकाणीं राज्यपालानें आपला तळ दिला होता वब तो कोणालाहि नदी उतरू देत नव्हता. महमुदानें चामड्याचे मोठाळे फुगे करावयास सांगितले. रात्रीच्या अधारांत आठ पुरुष नदींत उतरले. राज्यपालानें ब्यांना अडथळा करण्यासाठीं पांच हत्ती व एक पथक पाठविलें; परंतु महमुदाच्या शिपायांनीं त्यांस दाद दिली नाहीं. त्यांनीं हत्तींना बाण मारून जेर केळं आणि त्यांच्या बरो- बरच्या लोकांना जमिनीवर लोळविले. “’ सर्व आयुष्यभर विश्रांति उपभोगण्यासाठीं आपण एक दिवसाचे श्रम सहन केले पाहिजेत असें सांगून सुलतानानें प्रत्येकाला उत्तेजन दिलें. घोड्यांची आयाळ धरून लोक नदी पोहून गेले. येथे कनोजवर हृल्ठा करितांना तिसऱ्या गोविंदाने केलेल्या अशाच एका अचाट पराक्रमाची आठवण होते त्याचे वर्णन आमच्या दुसऱ्या भागांत ( पा. १६७ ) आलें आहे. महमुदाच्या लोकांनीं राज्यपालाच्या पुष्कळ लोकांस ठार मारले व सत्तर हत्ती पाडाव करून जबरदस्तीनं धरून सुलतानाच्या गोटांत नेळे. काफीर ठोक आपला खजिना टाकून पळाले व सुलतानाला ती ळूट मिळाली. सुलतानानें कुरांणावरून शकुन घेतला होता, तो शकुन खरा ठरला. सुलतान आतां न्यायासना ( राज्या )च्या उच्च- पदावर निश्चळ झाला आणि वाढत्या वैभवाची आणि साम्राच्याची त्याला खात्री येऊन चकली. ‘” या स्वारीचा उत्बीनें दिलेला वृत्तान्त येथें संपला. परंतु येथें हि राज्यपालानें महमुदाचें स्वामित्व कबूल केळें किंवा महमद गझनीला परत गेला असा उल्लेख ल्याने केला नाहीं. तथापि असें वाटतें कीं राज्यपालकडून आपलें स्वामित्व कबूल करून घेतल्याखेरीज महमद परतला नाहीं. ( ‘राज्याच्या उच्चपदावर निश्वळ झाला? या वाक्यांत तो अर्थ गर्भित आहे ). राज्यपालानें सुलतानाला दरसाल खंडणी देण्याचें कबूल केळें असलें पाहिजे,

कनाज पडलं. ११९

याबद्दलचा उल्लेख पुढें येईल. चंद्राच्या आधिपत्याखालीं गाहडवा- लांनीं प्रतिह्ारांना उखडून काढिलें तोंपर्यंत प्रतिहार घराण्याचे राजे राज्य करीत राहिले तरी या नमण्यानें ब करभार देण्याने कनोजच्या वैभवशाली साम्राज्याचा अंत झाला.

इतर इतिहासकारांनीं पुरुजयपालाचा या स्वारीत संबंध आणला आहे. निझामुद्दिनानं त्याचा उल्लेख केला असून महमूद यमुना उतरून जात असतां पुरुजयपालानें त्याला विरोध केला असें म्हटलें आहें. फिरिस्तानें तो पंजाबचा राजा जयपाल याचा नातु होता असें लिहिलें आहे. येथें यभुनेचा उल्लेख राहिबच्या ऐवजीं चुकून करण्यांत आला असावा. राहिब ही घग्गर किंवा अवघ प्रांतां- तीळ दुसरी एखादी मोठी नदी असावी. बारीहि त्याच प्रान्तांत आहे. ओघ ॒ कनोजच्या राज्यांत होतें हें सांगावयास नको. आणि ईलि- यटनें तर्क केल्याप्रमाणे तोशीच्या लढाईत कारमीरच्या सरहद्दीवर पराभव झाल्यानंतर त्रिलोचनपाळ हा कनोजचा राजा राज्यपाल याच्या आश्रयास आला असणें शक्‍य आहे. अलबेरूनानें त्रिलोचनपाल इ. स. १०२१ (हि. ४१२ ) मध्यें मरण पावला असं म्हटळें आहे. राहिब नदीवरील लढाई ल्या साली झाली असावी आणि त्रिठोंचन- पाल ह्या त्या लढाईंत शौर्याने लढून व शिकस्त करून धारातीर्थी पतन पावला असावा.

प्रकरण तेरावें कालंजर वरील स्वारी.

महमुदाचा समकालीन ग्रंथकार व त्याचा चिटणीस उत्बी यानें लिहून ठेवलेल्या वृत्तांताचा मार्गदशनाच्या कामीं होणारा उपयोग येथपासून पुढें आपल्यास होत नाहीं, आणि महमुदानंतर दोन किंवा तीन शतकांनी ज्यांनीं आपल्या हकीकती लिहेल्या त्या इतिह्यासकारां- वर किंवा बखरकारांवर अवलंबून राहणे भाग येतें, ! उत्बीनें आपला वृत्तांत येथेच कां थांबवावा हें सांगणें कठीण आहे. तो हि. ४२० पर्यंत किंबहुना त्याहनंतर हयात होता यांत अणुमात्र शंका नाहीं कारण त्या वर्षी काजी अबदुल्ला सय्यद मक्केच्या यात्रेला गेला असा त्याने उछेख केला आहे. त्याचप्रमाणें तो परत आल्यावर त्याच्या व अबु बकरच्या दरम्यान जो वाद माजला त्याचाहि निर्देश त्याच्या पुस्तकांत आला आहि. या निर्देशाखालीं दिलेल्या पादटिपेंत त्याच्या भाषांतरकारानें असं म्हटलें आहे की, हें साळ जर बरोबर असेल तर उत्बींच्या हयातीची जी समजूत आहे ती पेक्षां तो आधिक काल- पर्यंत जगला असला पाहिज (पा. ४७४ ), आणखी, ‘महमुद दीधकाल जगला’ असें उत्बीनें एकेजागीं म्हटलें आहे; आणि भाषां- तरकारानें पादटीपेंत असा शेरा मारला आहे कीं महमुदाच्या ह॒याती- तील ज्या काळांत उत्बी मेळा असावा असा समज आहे त्यापेक्षां अधिक दीधे काळपर्यंत तो जिवंत असला पाहिजे (पा. ४८३ ). तेव्हां उत्बीन आपला वत्तांत हि. ४२० म्हणजे १०२९ इ. स पर्यंत कां लिहू नये हें गूढ आहे. कदाचित्‌ महमुदाच्या भाग्याच्या पराकाष्टेच्या उत्कषोबरोबर (इ. स. १०२० , उत्बीने आपला वृत्तान्त थांबविला असावा. त्या वेळीं महमुदाचें साम्राज्य इतके

कालंजर वरील स्वारी. १२१
 
: विस्तारळें होतें कीं वायव्येस ख्वारझम आणि जार्जयाचा समावेश
| करून कार्सपेयन समुद्रापयमंत आणि अग्नेयीस पंजाब आणि
ठाणेश्वर यांचा अन्तर्भाव करून सरस्वती नदीपर्यंत तें पसरले
होठ. शिवाय उत्तरहिंदुस्थानाच्या सम्राटाचा राहिब नदी वर्रल लढाईत
पराभव करून व त्याला हतगवे करून त्याच्यावर महमुदानें वार्षिक
खंडणी बसविली होती. आणि इकडे आक्झसनदीच्या पलीकडे
तुर्की राजाचा बहुधा पराभव करून त्याच्याशीं त्यानें दोस्तीचा तह
केला होता. शेवटची गोष्ट ही कीं, मथुरा व कनोजच्या स्वाऱ्यांत
अगणित संपत्ति त्यानें मिळविली होती, मानवीस्वभावानुरूप ती
संपत्ति गझर्नास एक भव्य मशीद बांधून तिच्यावर खर्च करण्यास त्यास
इच्छा झाली. मथुरेचीं अतिशोभायमान देवालये पाहून त्याला ही
प्रेरणा झाली असावी. हीं देउळें “उत्तम कारागिरासही दोनशे वर्षात
बांधतां आलीं नसावीं ” असे त्यानें आपल्या खलित्यांत लिहिलें होतें.
तेव्हां त्याने गझनीला दैदीप्यमान्य मशीद बांधण्याचा संकल्प केला
व त्याप्रमाणें ती बांधलीहि यांत आश्चर्य नाहीं. तेथें जी पूर्वीची
मशीद होती तींत बेताच्या लोकांचा समावेश होई. गझनाचे राज्य
लहानसें असतांना ती बांधलेली होती. उत्बीनें गझनीच्या या विशाल
मशिदीचे वर्णन असें केळें आहे “ हिंदुस्थान आणि खोरासान
येथील गुलाम तिच्यावर रात्लंदिवस खपत होते आणि सढळ हातानें
पगार दिठेळे अधिकारी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ह्यांच्यावर
देखरेख करीत होते. हिंदुस्थान आणि सिंध यांमधून लांकूडकामा-
साठीं वृक्ष आणले होते. दूरदूरच्या प्रदेशांतून संगमरवरी दगडांच्या
चौकोनी व अष्टकोनी प्रचेड शीळा आणल्या होत्या. कारागिरांनी
सज्ञांवरीळ घुमट इतके तंतोतंत वतृलाकार केळे होते कीं
त्यांच्याशीं तुलना केली असतां आकाशाच्या कमानीचा वर्तुळा- काराहि काल्पनिक ठरावा. ‘ तिच्यावर काढलेल्या रंगीत चित्रांत

१२२ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

आणि ठिकठिकाणीं दिलेल्या सोन्याच्या पाण्यांत शुद्ध सोनें हात

सैल सोडून वापरलें होतें. सोन्याच्या मनुष्याकृते आणलेल्या मूर्ती

बडवून दरवाज्यांत आणि भिंतींत पत्रे ठोकले होते. आपल्या स्वत:च्या

बसण्याकरितां सुलतानाने तींत एक स्वतंत्र जागा बांधविली होती. इमारतीची रचना चौकोनी असून चारी बाजूस पुढें आलेलीं दालानें एकमेकांत गुंतलेल्या कामानींनीं जोडलीं होतीं. तिची फरसबंदी पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांची केळली होती. प्रार्थनेच्या मोठ्या दिवाणखान्यांतीळ भिंतीवर सोनेरी पाण्याचीं चित्रें काढलीं होतीं आणि व्यांत जागोजाग वैदूर्यमाणि बसविळे होते. ही इमारत पाह- णारा प्रत्येक मनुष्य आश्चर्याने तोंडांत बोट घाळी आणि म्हणे ‘ ज्यानीं ज्यानीं दमास्कसची मशीद पाहून आश्चर्यानें थक्क होऊन अशा तर्‍हेची दुसरी इमारत बांधणे शक्‍यच नाहीं असें म्हटलें त्यांनी गझननीची मशीद येऊन पहावी. ‘ समोरच उत्सवांसाठीं आणि प्राथंनांसाठीं विस्तीण असा सभामंडप होता. त्यांत एकाच वेळीं सहा हजार इश्वरसेवकांस आपलें काम करितां येत असं. मशिदी लगतच त्यानें एक पाठशाळा बांधून तींत मौल्यवान्‌ आणि दुर्मिळ अश्या अध्यात्मग्रंथांचा संग्रह करून दिला होता. विंद्यार्जनाच्या या पुण्यस्थळीं इमाम,अध्यापक आणि विद्यार्थी हे गोळा होत असत. पाठशाळेला देण- ग्यांतून त्यांना जेवण व इतर आवश्‍यक पदार्थ मिळत. त्याना महिन्याच्या किंवा वर्षांच्या कांठीं कांहीं वेतनाहि मिळत असे. सुलतानाच्या कारकी- दात गझनीचा विस्तार इतर सव शहरांपेक्षा वाढला व ती भव्य आणि मजबूत इमारतींनीं गजबजून गेली. इतर भव्य इमारतींत हजार हत्ती व त्यांचे महात व इतर नोकर राहतील अशी हजार खोल्यांची एक गजशाला होती. परमेश्वराच्या अशीर्वादानेंच देशाची ही सर्व भर-

भराट वार्द्षंत झाठी आहे. (उ. पा, ४६८-६९). सुलतानाच्या

न्यायी कारकौर्दींचें व त्याच्या कनिष्टभावाच्या खोरासानम्धाल राज्य-

| कालंजर वरील स्वारी १२३ । कारभाराचें वर्णन शेवटीं देऊन उत्बीनें आपली बखर संपविली आहे महमुदाने आपल्या धाकट्या भावास खोरासानचा अधिपाते नेमलं । होते; परंतु दुर्देवाने तरुणपणींच तो मृत्यु पावला. महमूद अशा | तऱ्हेने वैभवाच्या शिखरावर पोंचळा असतां तेथेंच उत्बीने आपला वृत्तांत संपविला असावा. ग्रंथाचा शेवट अकस्मात रीतीनें येथेंच ठेला दिसत नाहीं. परंतु त्यामुळे आजच्या काळांत या कर्तेत्ववान्‌ राजानें या पुढें केलेल्या पराक्रमांचा वृत्तांत उत्बीनं लिहिलेला वाचा- वयास न मिळाल्यामुळे आपला फार तोटा झाला आहे. इंलियिटनें राहिव नदीवरील लढाई ही तेरावी स्वारी असें म्हटलें असून निझामु- दोन आणि फिरिस्ता यांच्या आधारावर तिच्या नंतर आणखी चार स्वाऱ्यांचा उछेख केला आहे. निझामुर्दान किंवा फिरिस्ता यांनी कोणत्या आधारावर या स्वाऱ्यांची आपली हकीकत लिहिली तेते सांगत नाहींत. तथापि फार मोठा काळ लोटल्यामुळें आणि या स्वार्‍्यां- च्या स्थळांविषयी गैरमाहिती असल्यामुळें त्यांनीं फार चुकीची विधानें केलीं असलीं तरी त्यांस खात्रीलायक माहितीचा आधार असण्याचा संभव आहे. स्वाऱ्यांच्या नोर्दाचें रजिस्टर अथवा महमुदानें स्वतः लिहून ठेविलेल्या आठवणी अशा तऱ्हेच्या सरकारी लेखांचा उत्बीने उछेक केला आहे. तसेंच त्या काळच्या बेहकी सारख्यांच्या हछीं अनुपलब्ध लेखांतूनाहे त्यांना माहिती मिळाली असण्याचा संभव आहे. तेव्हां या पुढील काळच्या इतेहासकारांनीं केवळ स्वकपोलकल्पित गोष्टी लिहिल्या असाव्या हें संभवनीय वाटत नाहीं. त्यांचें वृत्तान्त आपण सावधगिरीने मात्र वाचले पाहिजेत आणि ते हिंदुस्थानांतील कोरीव लेखांतील पुराव्यांशीं ताडून पाहिळे पाहिजेत. उदाहरणार्थ, नंद नांवाच्या एका राजानें सुलतानाला शरण जाण्याबद्दल कनोजच्या राजाचा वध केला (ई. भा. २ पा. ६३ ) हें तत्कार्लींन एखाद्या मुसल्मान लेखकाच्या आधारावर निझामुद्दिनानें केलेलें विधान चेदेछ

| ४: | झ॒

१२४ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

आणि कच्छपघात शिलालेखांवरून खरें असल्याचें दिसून येतें. त्या शिलालेखांनीं या विधानाला दुजोरा आला आहे. गंडाचा मुलगा विद्याधर यानें कान्यकुब्जाच्या राजाचा नाश केला (ए. इ. १ पा, २२२ ) व या कृत्यांत त्याला भोज व कलचुरी राजा यांनीं मदत केली असें एका चन्देळू कोरीव लेखांत म्हटलें आहे. पुढें चंदेछाच्या इतिहासांत या शिळालेखाबद्दद अधिक उछलेख येणारच आहे. या संयुक्त स्वारीचे नेतृत्व ग्वाल्हेरच्या एका कच्छपघात राजाकडे होतें. शिलालेखांत पुढें असोहि म्हटळें आहे कीं दुबकुडाच्या ( ग्वाल्हेर प्रदेशांत ) ची अर्जन नांवाच्या दुसऱ्या एका कच्छपघात सामंतानें त्या तुमुळ युद्धांत विद्याधर राजाच्या सेवेंत राज्यपालाचा आपल्या बाणांनीं कण्ठच्छेद केला. ‘’ मथुरेच्या मूर्तींचा विध्वंस करणाऱ्या एका परकीय राजाला राज्यपालाने शरण जावे ही गोष्ट त्यावेळच्या रजपूत राजांना आवडली नाहीं आणि चंदेळ, कलचरी परमार व कच्छपघात राजांच्या संयुक्त सैन्यानें कनोज येथे राज्य- पालावर हल्ला केला व त्याचा वध केला. यावरून त्या काळच्या रजपुतांच्या धमोमिमानी वृत्तीची चांगळी कल्पना येते. बहुधा त्यांनीं या पलीकडे अधिक कांहीं केळें नसावें आणि राज्यपाळाचा मुलगा त्रिलोचनपाळ सरळ वारशाच्या हक्काने कनोजच्या राज्यावर बसला असावा.

अशा रीतीने राज्यपालाच्या वधाची हकीकत खरी असली तरी ही हकीकत महमुदानें ‘राजा जयपाला’ ( राज्यपाला ) वर केलेल्या स्वारीच्या व मागें वर्णिलेल्या राहिबच्या लढाईच्या पूर्वी देण्यांत आणि आठ लोकांनीं खोळ राहिब ओलांडली असें म्हणण्याऐवजी त्यांनीं यमुना ओलांडली आणि तेथेही पुनः “पुरुजयपालानें’ महमुदाला विरोध केला असें म्हणण्यांत निझामुद्दिनानें चूक केली आहे. पुढें निझामुदिनानें असेंही म्हटलें आहे कीं हे लोक बारीवर चाळ करून

कालंजर वरील स्वारी. १२५

’ गेळे. परंतु दुसऱ्या कोणत्याही लेखकाने या गोष्टींचा उल्लेख केला ‘नाहीं (ई. २ पा. ४६४ ). राज्यपाल बारीला जाऊन राहिला | होता असे अल्बेरुनीवरून दिसतें, तेव्हां बारीवरील स्वारी आणि ‘ बारीचा पाडाव हीं बरोबर असावींत. असो, वरील गोष्टी राहिबच्या ‘ लढाईनंतर झाल्या असल्या पाहिजेत आणि राज्यपालानें त्यावेळीं शरण जाऊन खंडणी द्यावयाचें कबूल केलें असावें. यानंतरच चंदेछ राजाच्या नेतृत्वाखाली हिंदू राजांच्या संघाने राज्यापाळावर स्वारी केली असली पाहिजे व त्यास ठार केलें असावें. आणि ही बातमी ऐकून महमुदानें चंदेछांचें व ग्वाल्हेरच्या राजांचे पारिपत्य करण्याचं योजिले असावे. शेवटीं निझामुद्दिनाच्या म्हणण्याप्रमाणे चन्देछ राजावर महमुदानें दोनदां स्वारी केली. एकदां बारी जिंकल्यावर आणि दुसऱ्यांदा ग्वाल्हेर आणि कालंजरवर स्वारी केली तेव्हां. निझामु- दिनाच्या आधारावर ईलियटनें ही दुसरी स्वारी म्हणून दिली आहे. राहिबच्या लढाईनंतर महमुदानें चंद्ररायावर स्वारी केल्याचा उछेख उत्बीच्या ग्रंथांत नाहीं, कारण त्यावेळीं राज्यपाल मारला गेला नव्हता. चेद्ररायावर दोन स्वाऱ्या न होतां एकच झाली असण्याचा संभव आहे.

महमुदानें १०२२ इ. स.मध्ये किरात, नूर, लोहकोट आणि लाहोर ( ईलियटनं ही पंधरावी स्वारी म्हटली आहे ) यांवर स्वारी केली. पहिलीं दोन ठिकाणें अनुक्रमे स्वात आणे बजौर होत. तेथें “हिंदुधम अजून थोडा बहूत शिक उरला होता व तेथील लोक सिंहाचे उपासक होते. !’ इंलियटच्या मतें हा सिंह म्हणजे शाक्य सिंह अथवा बुद्ध असावा. हा प्रांत हुएनसैँंगच्या काळांत कट्टा बोद्ध- धर्मी असला तरी या प्रदेशांत दहाव्या आणि अकराव्या शतकांत बैद्धधम पार विलयास गेला होता असें आभचे मत आहे. या सिंहाचा संबंध विष्णूच्या नर-संह अवताराशीं आहे. आम्ही आपल्या

१२६ गझर्नीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

पहिल्या भागांत नरसिंहाची भाक्ते पंजांबांत प्रचारांत होती असें दाखाबिळें आहे. मुलतान हं प्रऱ्हादपूर म्हणजे नरसिंहभक्त प्रऱ्हाद याचे शहर म्हणून प्रसिद्ध होतें. महमुदानें हा प्रांत जिंकला आणि तेथीळ लोकांस मुसलमानी धर्माची दाक्षा दिळी. नंतर तो लोहको- टला म्हणजे काऱ्मीरच्या आ्जैक्य किल्ल्यावर चाळ करून गेला. परंतु त्या दुर्गम देशांत जावयास मार्ग न मिळाल्यामुळे तो सोडून दिंदुस्थानांतीळ प्रांताची राजधानी जी लाहोर%तेथपर्यंत जाऊन तो परत फिरला. येथं त्याला कनोजची बातमी कळली असावी आणि त्यानें ग्वाल्हेर व काळंजरवर पुढील पावसाळ्यांत स्वारी करण्याचा निश्चय केला असावा.

ही पुढील स्वारी त्याने हि. ४०४ (इ. स.१०२३) मध्यें केली. ग्वाल्हेरच्या राजाचें अगोदर पारिपत्य करावयाचें असल्यामुळें त्यानें यमुना ओलांडली असण्याचा संभव नाहीं. ग्वाल्हेरचा राजा लढाई न करतांच त्याळा हरण आला. आणि तो कालंजरच्या राजाचा केवळ सामंत असल्यामुळें महंमूद तेथें फारसा न थांबतां गंडावर चाळ करून गेला. मुसलमान लेखकांनीं त्याला चुकीनें नंद म्हटलं आहे. कांहीं युरोपीय ग्रंथकारांना ही स्वारी घडली असावी कीं नाहीं याबद्दळह दका आहे व या स्वारीत ग्वाल्हेरचा समावेश कां करण्यांत यावा याचा इलियटळा उलगडा करितां आला नाहीं (ई. भा. २ पा. ४६७ ). ग्वाल्हेर व कालंजर येर्थाळ राजांनीं मिळून राज्यपालावर स्वारी केली होती हें आपणांस कोरीव ळेखांवरून कळून चुकल्यामुळें आपल्याला खालेरवरील स्वारीची सत्यत्या व॒ आवश्‍यकता कबूल करावयास हरकत तर उरत नाहींच, पण खाल्हेरवर सुरुवातीस

% लाहोर गॅझेटिअरमध्यें असें म्हटलें. आहे कीं महमूद कर्घींच लाहो- रला गेला नाहीं, वरील विधानाने त्याचे खंडन होतें. गझेटिअरमधील हें विधान विश्वसनीय दिसत नाहीं.

कालंजर वरील स्वारी. १२७

स्वारीकरून तेथीळ राजाचा पराभव महमुदानें कां केला हेंहि आपल्या ध्यानांत येतें. या स्वारीचे सविस्तर वर्णन करून निझामु- द्दीन म्हणतो कीं महमुदानें कालंजरवर दुसऱ्यानदां स्वारी केली; परंतु ही केवळ पुनरुक्ति आहे. वस्तुतः कलंजरविरुद्ध ही पहिलीच स्वारी. (इ. स. १०१८त कनोज आणि मथुरा घेतल्यावर काल्पीवर केलेली स्वारी ध्यानांत घेतल्यास ही दुसरी स्वारी होईल ). यावेळी गंड कालंजरपर्यंत मागें हटला. महमुदानें काळंजरळला वेढा दिला. निझामु- द्दीन म्हणतो “’ मजबुतीच्या दृष्टीनें हा किछा सव हिंदुस्थानांत अद्वितीय होता. नंदाने तीनरों हत्ती नजर केळे आणि तहाचे बोलणें लाविलें. ‘’ सुलतानाची स्तुति करणाऱ्या कांहीं कवि- ताहि त्यानें पाठविल्या, त्या त्या देशांतील विद्रान्‌ लोकांस आणि दरबारी कवींस दाखविण्यांत आल्या. त्यांनीं त्या कवितांची फार स्तुति केली. सुलतान खुष झाला, आणि कांहीं नजराणा पाठवून त्यानें नंदाला पंधरा किल्ले दिळे. काळंजर किंवा ग्वाल्हेर सारखे किठ्ठे जिंकण्यांत आपली शाक्ति वाया घालवावयाची नाहीं असेच बहुधा महमुदानें शहाणपणाने ठरविलें. आणि तेथील राजांनीं त्याचें वर्चस्व मान्य केळे आणि कनोजच्या राजाला महमुदास खंडणी देण्यांत ते आडवे येणार नाहींत असे बहुघा कबूल करून घेतलें असल्यानें त्याचे समाधान झालें. राज्यपालामागून त्याच्या गादीवर आलेल्या त्रिलोचनपालानें बापाने कबूल कलेली खंडणी वर्षाचे वरषीस द्याव- याचें कबूल केळे असलें पाहिजे हें सांगावयास नको. टिप्पणी.

निझामुद्दिनानें दिलेला वृत्तान्त सर्वस्वी मान्य केल्यामुळे सरव्हिन्सेंट स्मिथने इंडियन अंटिक्वेरी भाग ३७ ( पा. १४२ ) मध्यें लिहिलेल्या चंदेल्लां वरील निबघांत या प्रसंगाची निराळी आणि बहुशः चुकीची अशी हकीकत दिली आहे अशी आमची समजूत आहे. स्मिथनें असं

१२८ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या

(44

लिहिले आहे कीं, “ बाराव्या स्वार्रीत जानेवारी १० १९ मध्यें राज्यपाल शरण आला आणि त्यानें दहा लाख दिऱ्हेम आणि ३० हत्तींची खंडणी देण्याचें कबूल केलें. राज्यपालाने महमुदाचें हें वचस्ब कबूल केलें म्हणून

गंडाच्या पुत्राने त्याचा १०१९ मध्यें वघ केला. महमुदाने पुनः स्वारी

केली आणि त्यावेळीं फारशी अक्षरांच्या अपूणेतेमुळें ज्याचें नांव नाट लागत नाहीं परंतु जो हजार हिरशांनीं राज्यपालाचा मुलगा त्रिलोचन- पाळ असावा अशा गंडाच्या मित्रानं यमुनेवर त्याला विरोध केला, परंतु त्यांत त्याला अपयश आलें. महमुदानें नदी ओलांडली. बारी शहर घेऊन तं ठटले आणि नंतर तो दक्षिणेस गडाचे पारिपत्य करण्यास त्याच्या स्वतःच्या राज्यांत धुसला. नेहमीच्या हिंदु पद्धतीप्रमाणे गंडाने ३६००० घोडेस्वार, १, १५,००० पायदळ आणि ६४० हत्तीचं मोठे थोरले सेन्य उभारलें. हें प्रचण्ड सेन्य पाहून सुलतान अस्वस्थ झाला आणित्यानें एका उंच टेंकडीवर जाऊन त्याच्या सैन्याची पाहाणी केली. पण राल्ली गंड पळुन गेला. शत्रने कदाचित्‌ कपट केळे असेळ अशा समजुतीने सुलतानाने सावघगिरीने हला केला; आणि अर्गणित लूट मिळविली. शत्रंचा भ्याडपणा आणि अवाढव्य लूट यामुळें या प्रदेशावर ग्बाल्हेर- मार्गानें पुनः स्वारी करण्याची महमुदाला इच्छा झाली. आणि त्यानें १०२३ इ. स. मध्यें कालळंजरला वेढा दिला, गंडानं त्याला ३०० हत्ती आणि अमयोद नजराणा दिला आणि त्याच्यापासून कालजर आणि पंघरा किल्ले घेण्याचें कबूल केलें, हा महमुहानें मिळविळेला जय अगदीं सहजा- सहजीं मिळाला असतांही १८० वर्षे मुसलमानांनी चन्देललांच्या राज्यावर स्वारी केली नाहीं आणि गंडाच्या वद्यजांना आपलें राज्य स्वतंत्रपणें चालवू दिले. ” वर सांगितल्याप्रमाणें स्मिथने निझामुद्दिनावर निःशंकपणें विश्वास टाकल्यामुळे ह्या हकांगतींत अगदीं उघडाउघड दिसणाऱ्या विसंगत विधानांची गर्दी झाली आहे. निझामुद्दिनानें कालंजरच्या स्वाऱ्या एकी ऐवजी दोन दिल्या आहेत आणि त्या दोन्हीहि चन्देछानी राज्य-

पालाचा पराभव करून स्याचा वध केला त्यानंतर दिल्या आहेत. यामुळें

दुसरी स्वारी अगदीं अनवशयक ठरते. कारण ती केवळ ल॒टीसाठीं आणि कोणतेही कारण नसतां ग्वाल्हेरच्या मार्गानें केली आहे. त्याचप्रमाणें

कालंजर वरील स्वारी. १२९

आपल्याजवळ मुसलमानापेक्षां फार मोठें सैन्य असतां गंडानें रात्री पळ काढला हैं म्हणणें उघडाउघड वेडसरपणाचं आहे. उत्बीनें असली वर्णने दिली नाहींत. परंतु हिंदु राजाकडे प्रचंड सेना असूनहि तो लढाई न कारेतांच पळुन जातो अशा तऱ्हेच्या सामन्यांची कल्पना करण्याचा मोह घुढीळ काळच्या मुसलमान ळेखकांस झाला यांत नवल नाहीं. गंड हा स्वतंत्, अभिमानी आणि शूर राजा होता असे उत्बीने देखील त्याचें वणन केलें आहे. निजामुद्दिनानें वणन केलेला प्रसंग केवळ काल्पनिक आहे. कारण त्याच्याच म्हणण्याप्रमाणें राज्यपालाच्या वघासाठीं कालजर राजाला शासन करावें म्हणून ही स्वारी करण्यांत आली असेल तर यमुना उतरण्याची आणि कनोजवर चाल करून जाण्याची जरुरीच नव्हती. ज्याला त्याचा बाप शरण गेला होता त्या महमुदाला त्रिलोचनपाल विरोध करील हेंहि संभवनीय वाटत नाहीं. शेवटी आठ बारा माणसांनी न जुमानतां जी तुफान नदी ओलांडली त्या राहीबच्या लढाइनतर मह- मुदानें नंदाविरुद्ध स्वारी केली असं उत्बी म्हणत नाहीं. याचें योग्य स्पष्टी- करण असें आहे कीं, नंदावरील स्वारीचा उल्लेख याठिकाणी करण्यांत आणि त्याचप्रमाणें नदाने कनोज राजावर स्वारी करून त्याचा बघ केला तो प्रसंग राहीबच्या लढाईपूर्वी वणेन करण्यांत निझामुद्दिनानें चक केली आहे

आमच्या मताप्रमाणे या प्रसंगाची संगति अशी आहे. कनोजविरुद्ध केलेल्या बाराव्या स्वारींत (१०१९) राज्यपाल शरण गेला नाही; तो बारीला पळून गेला. तेराव्या स्वारींत महमुदाने आपलें सेन्य राज्यपालावर बारीस नेळे आणि बाररीच्या लढाईत त्याचा पराभव करून त्याच्याकडून खंडणी घेण्याच्या अटीवर त्याला त्यानें सोडूत दिळें (१०२१) ग्वाल्हेरच्या साहाय्यानें मेमध्ये नंदाने राज्यपालावर स्वारी केली व त्याला मारून टाकलें, ही बातमी महमूदाला लाहोर येथे १०२२ च्या माचोत समजली आणि त्या वर्षीं डिसेंबरांत त्यानें ग्वाल्हेर व कालंजर या दोहो- बर स्वारी केली आणि गंडाला १९२३ जानेवारींत हरण आणलें. ही संगाति स्वीकारली असतां गंड हा मानी असून अगदी भित्रा म्हणन दाखविला जातो तसा भित्रा दिसणार नाहीं.

म, भा-९

१२३० गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

टिप्पणी-नं. २ काबुलपंजाबचे शाही राजे,

या राजांनीं काबूलपासून लाहोरपर्येत राज्य केलें असें बहुतेक सर्व इतिहासकारांनी कबूल केलें आहे. अल्बेरूनीच्या ग्रंथाचा भाषांतर करणारा सचाऊ याने त्याच्या ‘हिंदुस्थान? या ग्रंथाची प्रस्तावना लिहितांना म्हटलें आहे कीं, “ काबुलिस्तानापासून पंजाबपर्यंत राज्य करणारें पाळ घराणें अलूबेरूनीनें आपले ग्रंथ लिहिले तेव्हां इतिहासाच्या रंगभूमीवरून नाहींसें झालें होतें. आणि त्यांचें राज्य महमूद आणि त्याचे गुलाम अधिकारी यांच्या ताब्यांत पूणपणे गेलें होतें. ” त्यांनीं येवढ्या विस्तीणे प्रदेशावर राज्य केलें हे निर्विवादपणें सिद्ध झालें आहे. कारण या राजां- चीं नाणीं सर्व पंजाबभर सांपडतात. लुधियाना जिल्ह्याच्या गॅझेटिअर- मध्ये असें वाचण्यास सांपडते कौ, काबूल आणि पंजाबचा राजा सामंतदेव याची नाणीं पडक्या सुनेत शहरांतील मार्तींच्या ढिगांत सांपडतात. कुरनप्रभ्राति प्राचीन राजांची नाणीं तेथे सांपडत असून दिल्लीच्या हिंदु किंवा मुसलमान राजांची नाणीं तेथें मुळींच सांपडत नाहींत. यावरून गझनीच्या महमुदानं सुनेतचा विध्वंस केला असें दिसून येतं.

शाही घराण्यांत सामन्त हा प्रख्यात राजा होऊन गेला. तो ९३५ मध्यें सिंहासनावर बसला असें थॉमस म्हणतो ( परंतु हें निश्चित नाहीं- इ. २ पा. ४२५). त्यानें पंजाब जिंकला असावा असें दिसतें. त्याचीं नाणीं तेथें अतिरिक्त सांपडतात. भीमाचीं नाणीं काबुलिस्तानांत सववत्र सांपडतात. परंतु पंजाबांत तीं कचितच आढळतात. त्यानें कोट कांग्राच्या खालच्या बाजूला भीमनगर वसविले हे आपण पाहिलंच आहे. कारमी- रची प्रख्यात निष्ठुर राणी दिद्दा हिचा तो आजा होय. जयपालाचें एकहि नाणें अजून सांपडलें नाहीं हं विचित्र आहे. परंतु आनंदपालाचीं नाणीं पंजाबांत आणि गंगेच्या दुआबाच्या उत्तरभागांत प्रभूतपणें सांप- तात ( सदर ). त्रिलोचनपाळ किंवा भामपाल यांचें एकही नाणें सांपडत नाहीं. बहुघा पंजाबांत कोठेंच त्यांचं राज्य नसावें.

हे राजे रौव असावेत असें त्यांच्या नाण्यांवरून दिसतें. त्या नाण्यां- वर नंदीची आकृति काढलेली आहे. परंतु पहिला भीम हा वेष्णव

काबुलचे शाही राजे. १३१

असावा, कारण त्यानें कारिमरांत केशवाचें देवालय बांधलं असा तरांगे- णींत उल्लेख आहे. याचा निदेश पूर्वीच भाग २ मध्यें (पा. २-६० ) आला आहे. त्या कालांत पंजाबांत व त्याचप्रमाणें काबुलिस्तानांताहि वेष्णवधर्म प्रचाळित होता असें दिसतें.

शेवटचा राजा भीम याने चंद्रराजाला ( बुंदेलखंडचा ) तूं महमुदाशीं लढाई करण्याच्या भानगडींत पडूं नको असा उपदेश करणारें प्न लिहिलें असें इलियटनें म्हटलें आहे. आणि प्रमाण म्हणून उत्बीचा उतारा त्यानें दिला आहे (पा. ४२७ ). तो उतारा पान ४८ वर दिला आहे (इ. २ ), हे पूर्वीच सांगितलें आहे. यमीनींच्या निरनिराळ्या प्रतींत कांहीं ठिकाणीं विशेषतः नांवांच्या बाबतींत निरनिराळे पाठ पडले आहेत. आम्ही अ यमीन्चिं भाषांतर उपयोगांत आणलें आहे त्यांत हे नांब आढळत नाहीं. हा चंद्ररायालळा माघारा फिरण्याचा केलेला उपदेश कनोजच्या राज्यपालाने केला असावा असे आम्ही घरले आहे, तें अधिक संभवनीयाहे आहे. कारण भीम दक्षिणेकडे इतका खालीं येणें शक्‍य नाहीं, त्याचा बाप त्रिलोचनपाल याने ज्याप्रमाणें उपदेश केला असें म्हणतात त्याप्रमाणें भीमार्नही जर केला असेल तर तो महमुदाचा जसा मांडलिक झाला होता तसाच मित्रहि असला पाहिजे. त्याच्या चुलत्याला मुसलमान करण्यांत आलें असा उललेख एका प्रतींत आहे तो सेबक- पालाबद्दल असाबा, जयपालाच्या या नातवानें ( मुलीच्या मुलानें ) मुस- लमानी धर्म स्वीकारला होता ब महमुदानें त्याला पेशावरचा अधिकारी नेमले होतें. पुढें त्यानें बंड केले. महमुदाने त्याच्यावर हला केला व शेवटीं तो मारला गेला.

प्रकरण चोदावें. सोमनाथावर्रील स्वारी.

महमुदांच्या मूर्तिभंगाच्या व लुटाळुटीच्या चरित्रांतीळ अल्यंत संस्म- रणीय अशा वृत्तांता्शी आतां आपण येऊन पोचलो आहोंत. तो वृत्तांत म्हणजे सोमनाथावरील स्वारी होय. शिवाचे अत्यंत पवित्न देवस्थान म्हणून सोमनाथाची त्यावेळीं ख्याति होती. ९ व्या शत- कांतील स्कंद पुराणांत त्याचें सविस्तर वर्णन आहे. अल्बेरुनीनेंहि तीथक्षेत्र आणि चांच्यांचे निवासस्थान असें त्याचें वर्णन केलें आहे. सोमनाथावर हलला करून तेथीळ अपरंपार संपात्ति ठुटावी असं मह- मुदास वाटण्याजोगें ते खास होतें. उत्बी हि. स. ४२० (इ. स. १०२९ ) पर्यंत म्हणजे या स्वारी नंतर चार वर्धे जिवंत असूनहि आपल्या पुस्तकांत दुर्देवाने महमुदाच्या या महापराक्रमाचा उल्लेख करीत नाहीं. या नंतर दोन शतकांनीं आपली बखर लिहीत असतां रशीदुदीननें आणि त्यानंतर बीस वर्षांनीं लिहिणाऱ्या हमीदुछानें या स्वारीचा उछेख केळेला नाहीं (ई. २ पा. ४३०-४३१).या स्वारीचे पहिळें वर्णन सांपडते ते इब्न्‌ असीर याच्या पुस्तकांत. नंत- रच्या लेखकांनीं हेंच वर्णन अधिक खुलवून दिळें आहे (ई. २ पा. ४६८ ). गुजराथच्या सोळखी राजांचा इतिहास त्या घरा- ण्याचा मूळ पुरुष मूलराज याच्या काळापासून गुजराथच्या जैन व हिंदु बखरकारांनी पूर्णपणें दिला आहे. परेतु सोळंखी राजांच्या अत्यंत वैभवाच्या दिवसांत गुजराथवर आलेल्या या आपत्तीचे त्यांत नांवहि नाहीं. मूळराज हा अनहिलवाडच्या गादीवर ९६१म्ध्ये म्हणजे सबुक्तगीनच्या पूवी १६ वर्षे बसला, हा वृत्तांत पुढे एका ग्रकरणांत येणार आहे. आजपर्यंत जे कोरीव लेख उपलब्ध झाळे

सोमनाथवरील स्वारी. १३३

आहित त्यांत या आपत्तीबद्दल एक अक्षरहि आढळत नाहीं. यामुळें गुजराथसारख्या लांबच्या प्रांतांत, जेथें जावयाचें तर एक विस्तीर्ण वाळवंट ओलांडणें आवश्‍यक तेथें, महमुदाने खरोखर स्वारी केली असेल कीं नाहीं याची दका सहज उत्पन्न होते. तथापि आपल्या अत्यंत पवित्र देवस्थानावर आणि राजावर कोसळलेल्या या अनथथीचा उल्लेख करण्याबद्दल हिंदु लेखक हे अनुत्सुक असणार व ज्या मुसलमान छेखकांनीं या स्वारीबद्दह लिहिलें आहे त्यांनीं ते शेंकडों वर्षांनीं लिहिलें असलें तरी त्यांच्या पुढें त्याबद्दळचा कांहीं तरी लेख असावा, त्यांनीं अगदींच कार्ल्पानिक गोष्ट लिहिली असण्याचा संभव नाहीं, असा विचार मनांत आणून ईल्यिटनें इब्न्‌ असीर याच्या पुस्त- कांतून जो उतारा घेतला आहे त्यावर हा वृत्तान्त द्यावयाचें आम्ही ठरविलें आहे (ई. २ पा. ४६९ ).

सुरुवातीसच आम्हांस हें सांगितळें पाहिजे कीं या अतिशायोक्ति- प्रचुर वृत्तातांत पुढील लेखकांच्या लेखांत विस्मयावहतेच्या बाबतींत अधिकाधिक भर पडली आहे. मुख्यतः महमुदाच्या धार्मिक गोर- बाची खुलावट करण्याच्या इच्छेने स्वकपोलकल्पित अशा गोष्टी त्यांनीं या वृत्तांताला जोडून दिल्या. उदाहरणार्थ सोमनाथाच्या मूर्तीत अगाणित संपत्ति सांठविली होती, तेथील ब्राह्मणांनी खंडणी दाखल कोट्यावाधे रुपये महमुदास द्यावयाचें कबल केलें, त्याच्या सेना- पतीनीं ते घेण्याचा त्याला सछा दिला, परंतु महमदानें सांगितलें कीं इश्वराच्या दरबारीं आपण मूर्ति विक्रय करणारे म्हणन न ठरतां मर्ति- भंजक म्हणून प्रसिद्ध व्हावें अशी माझी इच्छा आहे, ही गोष्ट- गिबननं सुद्धां सांगितली आहे-केरिस्ताची नसली तर दुसऱ्या को- णाची तरी कपोलकल्पना आहे. सोमनाथाच्या हकीकतीच्या बनावटीबद्दह टीकां करतांना खुद्द इईलियटनं ज्याचा उतारा घेतला आहे तो वुइल्सन म्हणतो कीं “ या मूर्तीचे अवयव छिन्न विछिन्न

१३४ गझनीच्या महसमुदाच्या स्वाऱ्या.

करण्याबद्दल पूर्वीच्या मुसलमानांच्या लेखांत कोणताहि उछेख नाहीं वस्ततः त्या मर्तीला अवयवच नव्हते, किंबा त्या मर्तीतील संपात्त अस- ल्याबद्दलाहि उछेख नाहीं. ती मूर्ती भरीव असल्यामुळें तींत संपाते लपविली असणेंहि राकयच नव्हतं. मूर्तीत लपवून ठेवलेल्या हिर्‍्यां- चा ब माणकांचा जो शोध फिरिस्तानें लावला आहे त्याला कशाचाहि आधार नाहीं. ” ही गोष्ट अगदीं उघडाउघड वेडसरपणाची आहे कारण सोमनाथाची मार्त म्हणजे एक भरीव दगड असला पाहिजे त्याचप्रमाणें एका विश्वासघातकी हिंदु वाटाड्यानें महमुदाला एका निर्जेळ वाळवंटांत महमुदास नेलें, परंतु इंश्रराची प्राथना करतांच त्यास पाणी सांपडले ही गोष्ट; किंवा गुजराथ प्रांत सुपीक असून त्यांत सोन्याच्या खाणीं असल्यामुळें महमुदाच्या मनांतून तेथेंच राहाव- याचें होतें, परंत खोरासान ही आपली जन्मभमि, तीच राहावयास सोईस्कर असें सांगून ती कल्पना सोडून देण्यासाठीं त्याचे मन अधिकाऱ्यांनीं वळविळें ही गोष्ट विश्वसनीय नाहीं. परत जातांना महमुदानें त्या देशाचा राज्यकारभार पळून गेलेल्या राजाच्या नाते- वाईक असलेल्या व संसार सोडून . विरक्त . झालेल्या दाबा्‌रेलीमवर सोपविला ही गोष्टहि-गुजराथचा त्या वेळचा राजा भीम याचा तो चुलता होता आणि तो खरोखरच सरस्वती नदीच्या तीरी वि- रक्त होऊन राहिला होता असे दाखविण्यांत येत असळें तरी,- विचित्र असून विश्नास बसण्यासारखी नाहीं.

ईलियटनें या स्वारीबद्दळचे पुष्कळ इतिहासकारांचें उतारे दिले आहेत; व ज्यांना विशेष इच्छा असेल त्या वाचकांनीं ते इलियट- च्या प्रेंथांतन वाचावेत. इब्नअसीरच्या मूळच्याच अतिशायोक्तीनें भर- लेल्या वृत्तांतात आणखी तिखट मीठ घाळन आपलें वृत्तांत या इतेहास- कारांनीं लिहिलेळे असल्यामुळें त्यांचा सारांश देण्याची आम्हांस गरज दिसत नाहीं. इब्नअसीरनें दिलेल्या वणंनाचें सार मात्र आम्ही

सोमनाथवरील स्वारी. १३५

। देत आहोंत. “’ सोमनाथाची मूर्ते ही अखिल हिंदुस्थानांत अत्यंत | प्रसिद्ध होती. विशेषतः चद्रग्रह्मणाच्या रात्रीं तेथे फार लोक जमत

असत. माणसें मेल्यावर त्यांचें आत्मे त्या ठिकाणीं जातात अशी समजूत होती. त्या देवालयालळा १०००० गांवें इनाम दिलेली होतीं (! !! ). त्या मूर्तीच्या अभिषेकासाठी दररोज गंगेचें पाणी आणण्यांत येत अमे. एक हजार ब्राह्मण देवाची पूजा करीत आणि यात्रेकरूंना दशन करवीत. यात्रेकरूंची शमश्रू करण्यांत तीनशे न्हावी गुंतठेळें असत. देवळाच्या दरवाजांत तीनशे ख्रिया गाणी म्हणून नाच करीत. ( कालिदासानें मेघदूंतांत वर्णिल्याप्रमाणे शिवा- च्या मूतीसमार प्राचीनकाळी गाणारणी गात व नाचत असत. दक्षिणेतील शिवाचें देवालयांत ही चाळ अजूनहि प्रचारांत आहे. गोवा प्रांतातील मंगेशाच्या देवळांत ती मला दृष्टीस पडली). महमुदाचा प्रतिकार त्यांनीं केला नाहीं म्हणून सोमनाथ इतर हिंदु देवांवर रागावला होता अशी समजत प्रसृत झाली होती. ती जेव्हां मह- मुदाच्या कानावर गेली तेव्हां सोमनाथाची मूर्ति फोडून हिंदूंचे देव खोटे आहेत हें त्यांच्या प्रत्ययास आणल्यास ते खऱ्या धमोचा स्वीकार करतील असा त्यानें विचार केला.

असा निश्चय करून त्यानं ३०००० घोडदळ आणि कांहीं बाजारबुणगे घेऊन साबानच्या दहाव्या तारखेस गझनी सोडली. व तो रमजान महिन्याच्या मध्यभागांत मुलतानठा येऊन पोंचला. बरोबर ३०००० उंटांवर धान्य व पाणी घेऊन वाळवंटांतून अनहिलवाडला जाण्याकरितां तो निघाला. तेथीळ राजा भीम ह! सुरक्षितपणासाठीं एका किछ॒यावर पळून गेला. ( पुढील ग्रंथकारांनी त्या किछ्याचें नांव कन्दन असं दिळे आहे. बहुधा तो कच्छमधीळ कंथड किल्ला असावा, ). महमुद वाळवंटांतून सोम- नाथाळा गेला. (अनहिलवड घेतल्याचें किंवा ते ळुटल्याचें वर्णन येथें

१३६ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

नाहीं). तो वाळवंटांतून दबळवाराला पोंचला.हे स्थळ सोमनाथापासून दहा मुक्कामांच्या अन्तरावर होतें, सोमनाथ महमुदाचा नाश करील अशा विश्वासाने तेथील ठोक पळून न जातां राहिळे होते. परंतु महमुदानं तें शहर घेतलें आणि तेथील लोकांची कत्तळ करून त्यानें सोमनाथाकडे कूच केलें

जिल्काद महिन्याच्या मध्यावर एका गुरुवारी तो सोमनाथास येऊन पोंचळा आणि लाटांनीं धुतलेल्या समुद्राकिनाऱ्यावर त्यानें एक प्रबळ किछा पाहिला. किछ्॒यावर्रील तटावर उभे राहून हिंदु मुसलमाना- कडे पाहून हंसत होते आणि सोमनाथ तुम्हां सर्वांचा नार करील असें त्यांस सांगत होते. द्ुक्रवारी मुसलमानानीं हृया चढविला; हिंदू पळून गेळें, शिड्या लावून मुसलमान तटावर चढलें, व कि- ल्ल्यांत उतरले. नंतर भयंकर कत्तळ सुरू झाली. पुष्कळसे हिंदू देवळांत शिरले, त्यांनीं जमिनीवर देवापुढे साष्टांग नमस्कार घातला आणि जय मिळावा म्हणून देवाची करुणा भाकली. ( येथें दुसरी तटबदी असावी )

दुसऱ्या दिवशीं सकाळीं लढाईला पुनः सुरवात झाली, आणि मुसलमानांनीं हिंदूना देवळांत रेटळें. देवळाच्या दारांत दारुण कत्तल झाली. हिंदू लोक देवळांत शिरत आणि रडून आणि हात जोडून देवाची प्राथेना करीत, आणि देवळांतून बाहेर पडून म्रृत्युमुखीं पडेता लढत. कांहीं लोक नावांत बसून समुद्रांत उतरळे. परंतु तेथोहि त्यांच्यावर हल्ला करण्यांत येऊन त्यांना मारण्यांत किंवा बुडविण्यांत आलें.

शिशानें मढविलेल्या छप्पन लांकडी खांबावर सोमनाथाचें देऊळ उभारलें होतें. मूर्ति आंतल्या एका खोलींत होती. ती पांच हात उंच असून तिचा घेर तीन हातांचा होता. ती दोन हात तरी जमि-

नींत खोळ गेळेढी असावी. ती घडविलेली दिसत नव्हती. तिचा

कांहीं भाग महमुदानें जाळून टाकिला व कांहीं भाग गझनीला पाठ-

सोमनाथवरील स्वारी. १३७

विला. तेथें जामीमशीदींत दाराशींच पायरी म्हणून तो घातला गेला. देवळांत अंधार होता, परंतु तेथें रुनजाडेत झुंबरांचा प्रकार पडला होता. मूर्तीजवळ सोन्याची सांखळी असून त्याळा घंटा लावल्या होत्या व ब्राह्मणांना पूजेळा उठविण्यासाठीं त्या वेळोवेळी वाजविण्यांत येत. खजिना जवळच होता, व त्यांत सोन्यारुप्याच्या मूति आणि अत्यंत मोल्यवान रत्नांनीं जडवलेळें पडदे ठेविळे होते. सगळ्या लुटीची किंमत वीस लाख दिनारांपेक्षां अधिक होती, आणि पन्नास हजारा- पेक्षां जास्त लोक मृत्युमुखी पडळे !? (ई. भा. २ पा. ४६९-७१).

हा वृत्तात अगदीं सरळ आणि विश्वसनीय आहे. ब्राह्मणांनी अथवा पाहिजे तर क्षत्रियांनीं म्हणा देवळाजवळ क्रोधाने संतप्त होऊन प्रतिकार केला. पण तें केवळ मृत्यूला कवटाळणेंच होतें. गुजराथचा राजा भीम याला सोमनाथाच्या बाहेरच शत्रूला जोराचा प्रतिरोध कारेतां आला असता. तो आपल्या नांवाला आणि रजपूत ब्रादाला जागता तर त्याला महमुदानें आणलेल्या सैन्याहून अधिक मोठें सैन्य, किंबहुना घोडदळ हि, रणांगणावर उभे कारितां आलें असतें. परंतु हें ध्यानांत धरळें पाहिजे कीं यावेळीं आपल्या सतत मिळ- विठेल्या जयांनी महमुदाची इभ्रत नेपोलियनप्रमाणें पराकाष्ठेला पोचली होती. एक नेपोलियन म्हणजे लाख माणसांची मदत मानली जाई. परंतु अशा नेपोलियनलाहि वॉटळूंच्या समरांगणावर जर्मन व इंग्रज यांनीं निकराचा विरोध केला. आपत्तीच्या निराश- काळांत जोमाचा कणखरपणा हिंदुळोकांच्या अंगीं दिसत नाहीं. तात्पर्य भीमानें कच्छमधील एका किछ॒याचा आश्रय केला यांत कांहीं आश्चर्य नाहीं. कच्छच्या रणांतील पाण्याचा अडथळा असतां व भरतीच्या वेळीं पाणी वाढावयाचा संभव असल्यामुळें व्यांतून जाणें धोक्याचे होतें तरीहि सोमनाथ घेतल्यावर महमुदानें त्याच्या- चर तेथेंहि हृया केला असं म्हणतात. विजेता महमूद येत आहे

१३८ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

_ असं पाहिल्याबरोबर भीम तेथूनाहे पळाला. तेथोन वाळवंटांतून सिंधच्या मागोनें महमूद गझनीला परत गेला. वाळवंटांत पाणी सांपडणार नाहीं हें त्याला माहीत होतें. तो पाण्याचा मार्गच नव्हता,. तेव्हां विश्वासघातकी हिंदू वाटाड्यांना त्याला फसविण्याची सोयच नव्हती. सिंधूमर्धील चांच्यांनीं त्याला फार त्रास दिला. हे चांचे जूड% देशांतळे असावेत असा समज आहे. पुढें या जाटांविरुद्ध शेबटची स्वारी करून महमदाने त्यांना यथायोग्य शासन केलें.

महमूद सोमनाथाळा आला तो मुलतानवरून वाळवंटांतून, रस्त्या- वर अजमीर. आणि अनहिलवाड घेऊन, पूर्वेच्या रस्त्याने आठा आणि कच्छहून परत जातांना मार्गात मनसूर घेऊन मुलतान, सिंधुनदी या मार्गानें गेला असं कित्येक म्हणतात. माळव्याचा परमारंदेव ( भोज ) त्याच्याशीं लढाई करण्याची तयारी करीत होता व त्यानें त्याला रस्त्यांत गांठळें असतें म्हणन तो या पश्चिमेकडील मागाने गेला. हिंदु लोकांबरोबर लढावें लागळें ततर आपली येवढी थोरली ळूट कदाचित्‌ जाईल अशी त्याला भीति वाटली असावी असेंहि किल्येकांनीं लिहिळें आहे. /

टिप्पणी–सोमनाथ.

सोमनाथपट्टण अथवा सोमनाथ राहर हं काठेवाडच्या पश्चिम किनाऱ्या- वर वसलेले आहे. हल्लीं ते जुनागडच्या राज्यांत आहे. हहर गायकवाड- च्या ताब्यांत आहे. १८४३ मध्यें एका प्रवाशाने ते पाहून ज. रा. ए. सो. भा. १ पान १७३ वर त्याने त्याचें वर्णन दिलें आहे तें असे,. “ प्राचीन देवालय नाद पावलें आहे आणि जुन्या देवळाच्या जागेजव- ळच आहिल्याबाईनें नवें देऊळ बांधलें आहे. परंतु त्याच्या नष्ट झालेल्या

% १०२४ मध्ये सोमनाथाहून परत जात असतां मिठाच्या डोंग- रांतील जाटांनीं त्याला हैराण केलें असे म्हणतात; परतु हे जाट दक्षिण सिंधूवरील असावेत ( झेलम गॅझेटिअर पा, ८३ ).,

’ स्थितांताहे त्याचें विशाल वैभव दृष्टोत्पत्तीस येतं. ” आमच्या मतें हे जने

सोमनाथवरील स्वारी. १३९.

२४ र

*्

म्हणून म्हटलेळें देवालय सिद्धराज जयसिंह ब कुमारपाल यांनीं बांधलेलं देवालय असावे. व महमुदाने ज्या देवालयाचा विध्वंस केला तें बहुधा परमारांच्या एका शिलालेखांत म्हटल्याप्रमाणे माळव्याच्या भोज पर- माराने बांधलेले असावें. या कोरीव लेखाची हकीकत परमारांच्या इति- हासांत येईल, मुसलमान इतिहासकारांनी वार्णिल्याप्रमाणें भोजानें बांघ- ळेळें देवालय बहुधा लांकडाचें असावें. ती इमारत बहुतकरून इ. स. १०२६ मध्यें बांघण्यांत आली असावी, देवळाची नवी दगडी इमारत अंनहिलवाडच्या जयासेहानें बांधावयास सुरुवात केली आणि कुमारपालानें ती पुरी केली. हें गुजराथच्या इतिहासग्रंथावरूनच दिसून येतं इतकंच नव्हे तर सोमनाथपट्टनच्या देवाल्यांतीलळ एका शिलालेखावरूनहि हं दिसून येते. अनहिलवाडच्या इतिहासांत त्या शिलालेखाचा उललेख येईल. या भद्रकाली-देवालय-प्रशस्तीचा सन ११६९ इ. स. असून ती चित्ता- क्षक आहे. तिच्या सुरुवातीस एका ब्राह्मणाचे वणेन दिलें आहे. तो बनारसचा असून त्यानें नाश पावलेल्या देवाल्यांचा उद्धार करण्याचे काम हातीं घेतलें होतें असें वर्णन आहे. [ हीं देवालये बहुधा महमुदाने विध्वस्त केलेलीं असावींत ]. या पुण्यकारक कार्यासाठी तो सर्व हिंदु- स्थानभर हिंडला, तो उज्जनीहून सोमनाथाळा आला. पुढील काळांतील मुसलमान इतिहासकारांनी महमुदाच्या सोमनाथाच्या स्वारीची व तेथील देवालयाच्या विध्वसाची जी हकीकत सांगितली आहे तिला या पावैत्र ब्राह्मणाच्या प्रयत्नाबद्दलच्या उलेखानें बळकटी येते अशी आमची सम- जूत आहे. या प्रशस्तींत असे स्पष्ट म्हटलें आहें कीं आतां ते देऊळ दगडांनी बांधण्यांत आलें आहे. हं दगडाचें देवालय चवदाव्या शतकांत गुजराथच्या मुसलमान राजांनीं फोडले. सोमनाथाच्या देवळाचे चंदनी दरवाजे महमुदानें गझनीला नेले, ह्या आख्यायिकेवर आधुनिक विद्वा- नांचा काडीचा विश्वास नाही. आणि अफगाणिस्थान जिंकल्यावर १८४३ सालीं इंग्रजांनी जे दरवाजे आणले ते आग्य्याच्या किल्यांत धूळ खात पडले आहेत ( सरदेसाई ),

१४० गझर्नाच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

टिप्पणी २–सादी व सोमनाथ

सादीने आपल्या बोस्तानमध्यें सोमनाथाचा उल्लेख केलेला आहे, हं येथे सांगितळें पाहिजे. त्यांत त्यानें एक विचित्र गोष्ट सांगिंतली आहे आणि ती बहुधा त्याच्या स्वतःचें डोक्यांतन निघालेली असावी, आप- ल्या फार मोठ्या प्रवासांत तो सोमनाथाळा आला, तेथे त्याने एक हस्तिदंती मूर्ति पाहिली. ती सागाचें सिंह्मासनावर सोन्याचें ‘वौरंगावर बसविलेली होती. तिच्या अंगावर मूल्यवान हिरें सुंदर आकारांत बस- विले होते. ब्राह्मण पुजाऱ्यानें अशी एक युक्ति केली होती काँ ती मूती [पला हात वर उचली, कमंधमसंयोगानें ही युक्ति सादीच्या लक्षांत मू्तींमागे गाभाऱ्यांत शिरल्याने आली. हें पाहून तो ब्राह्मण पळू लागला आणि या फसवणुकीनें रागावलेला सादी त्याच्यामागे छागळा; आणि त्यानें त्याला ठाराहे मारले, सर्व ब्राह्मण आतां आपला सूड घेतील या भीतीनें सादी त्या देशांतून पळून गेला, ही गोष्ट कल्पित आहे हें अगदीं उघड दिसत आहे. सादीला मुळीं त्या मर्तांचें जवळ देखील [णे अशक्‍य होते; मग तिच्या मागें जाऊं देण्याची गोष्ट कशाला १ शवाय हास्तदताच्या मर्ती करण्याचा प्रधाताहे पर्वी हाता असें वाटत नाही. तथापि इतिहासकारांनी सादीचा हा सोमनाथाचा उल्लेख ध्यानांत घेण्याजोगा आहे. कारण त्यांत महमुदानें सोमन[थावर स्वारी केली आणि तेथील प्रसिद्ध शिवमूर्त भागिळी याचा इषाराहि या हकीकतींत नाहीं, या स्वारीचा उल्लेख व्हावयास हवा होता असे कोणासहि वाटेल. त्या उल्लेखाचें अभावामुळें महंमुदानें सोमनाथावर स्वारी केली होती या गोष्टीचे सत्यतेबद्दळ कांहीं वेळां जी शंका प्रकट करण्यांत येते; तिला दुजोरा मिळतो. सादी इ. स. ११७५ मध्यें जन्मला व तो ४० वें वर्षा- च्या सुमारास म्हणजे अदमासे १२१५ मध्यें हिंदुस्थानांत आला असावा. त्यानें आपलें बोस्तान ८० व्या वर्षी म्हणजे १२५५ चे सुमारास लिहिले. या दोन्ही सालांत गुजराथ नसलं तरी दिल्ली मुसलमानांच्या ताब्यांत होती. ज्या पाहिल्या लेखकानें सोमनाथच्या स्वारीचे वर्णन केलें आहे तो इब्नअसीर होय, कितीहि लवकर म्हटले तरी त्याचें पुस्तक १२७० चे सुमारास लिहिलेळें असावे. अर्थात्‌ सादीनंतर ही हकाकत

महसुदाचा मृत्यु आणि त्याचे स्वभाववणेन. १७१.

ठरते. परंतु कांहीं झालें तरी एखाद्या गोष्टीच्या उल्लेखाचा अभाव, तो उल्लेख असणे अपारिहाय असल्याखेरीज किंबा तो उल्लेख करणें अत्यंत आवद्यक असल्याखेरीज, पुरेसा पुरावा नाहीं. आणि म्हणून त्यावर आपल्याला अवलंबून राहून महमुदाची सोमनाथाची स्वारी काल्पनिक आहे असे आपल्याला ठरवितां येणार नाहीं. सादीनें या स्वारीचा उल्लेख केला नाहीं हे कदाचित्‌ काकतालीय असेल,

प्रकरण पंधरावे. महमुदाचा मृत्यु आणि त्याचें स्वभावर्णन.

सोमनाथची लढाई जिंकून आणि सोमनाथाचचें देवालय उध्वस्त करून आपल्या पराक्रमावर कळस चढविल्यावर महमुदानें कोण- तीहि महत्त्वाची स्वारी अंगावर घेतली नाहीं. कदाचित्‌ अल- क्झांडरप्रमाणें ल्याला जिकावयास पृथ्वीवर कोणताहि प्रदेश उरला नसावा. त्याच्या शेवटल्या पराक्रमाची कीर्ति बगदादेस जाऊन पोंचली तेव्हां सवे बगदाद सोमनाथाच्या विध्वसाची उत्कर्षवर्धक कथा ऐकून विस्मय करीत होतें. आणि खलीफानें महमुदाला * केफु- होळत्‌ वळ इस्लाम ‘ म्हणजे ‘ महंमदी धर्माचा आणि दोलतीचा रक्षक ! अशी आणखी एक पदवी समर्पण केली. ( गिंबन्‌ व ईलि- यट्‌ २ पान ४७४ ). खालेफानं ल्याचे मुलगे मसऊद, महमद व॑ यूसफ यांसहि पदव्या दिल्या. याम्रमाणें महंमदी धर्माच्या अध्वर्यूने गौरव केलेला आणि यशाच्या परमावधीस पोंचळेला महमूद कशां- तहि उणेपणा न येतां या विख्यात पराक्रमानंतर सुमारें तीन वर्षांनीं हिजरी ४२० ( इ. स. १०२९ ) मध्यें ६१ व्या वर्षां बयस्क होऊन आणि आपल्यामागे कर्तेसवर्ते मुलगे आणि अनुभवानें मुर- छेळे मंत्री आणि सेनापति ठेवून मृत्युवश झाला.

तहत गिबनपासून अनेक इतिहासकारांनीं महमुदाच्या चारित्र्या-

१४२ गझर्नाच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

बद्दल अत्यंत गौरवपर अनेक वर्णने केली आहेत. गिबननें म्हटलें आहे कौं, “ दुर्देवाने इतिहास ज्यांनी खचून भरून गेळा आहे, अशा रक्तपाताच्या वृत्तांतास नजरेआड करून थोडा वेळ जगांत निस्संशय अत्यंत विख्यात राजांपैकीं होऊन गेलेल्या महंमुदाच्या आंगच्या सदूगुणांचें विवेचन करणें आल्हाददायक आहे. पोर्वाल्य देशांत त्याच्या नांवाबद्दळ अजूनहि आदर व्यक्त केला जातो. त्याच्या प्रजा- जनांस शांतता आणि संपन्नता याचें सुख उपभोगावयास सांपडलें. त्याचे न्यायाप्रेयत्व आणि औदार्य यांची अनेक उदाहरणें बखरीत दिलेलीं आढळतात, महमुदाचे उत्कृष्ट चारित्र एकाच लोभाच्या दोषानें कलंकित झालेलें आहें. सदेव वाढणारी आणि कधींहि संतोष न पावणारी तृष्णा त्याच्याच ठिकाणीं पूण समाधान पावली. मृत्यु समीप आला असतां इतक्या श्रमाने मिळविलेली, येवढ्या कष्टाने ‘रक्षिळेळी आणि जगाच्या नियमाप्रमाणे कायमची सोडून द्यावी लाग- णारी आपली सवे संपत्ति त्यानें आपल्या पुढें पसरविली आणे डोळ्यांत चमकणाऱ्या अश्रुबिंदूतून ती डोळेभर पाहून घेतली, एक लक्ष पायदळ, पन्नास हजार घोडेस्वार व तेरा हजार लढाऊ हत्ती इतकें आपलें विशाल सैन्य हि त्यानें शवटचे अवलोकन केलें. ? महमूद हा अतिशय विख्यात असा सेनानायक होता हें सर्वा- नांच कबूल केळें आहे. ठेनपूलनें त्याचें असें वर्णन केले, आहे कीं “: महमूद हा प्रसिद्ध योद्वा होता; त्याचें शोर्य अमर्याद होतें आणि त्याचा शारीरिक आणि मानासेक उत्साह कधींहि मंदावला नाहीं, ‘” ठेनपूलनें त्याच्या सुव्यवास्थत राज्यपद्धतीची ब न्यायाप्रिय- तेचीहि तार्राफ करून “’ महमूद हा न्यायाप्रेय, विद्वानांचा चाहता,

स्वभावाचा उदार आणि धर्मशील होता ! अशार्रातीनें सेळजुकच्या प्रसिद्ध वजिरानें केलेल्या त्याच्या वर्णनाचा पुनरुच्चार केला आहे.

९ पान २५ ). “ ज्योतिषशासत्रविशारद अल्बेरुनी, तत्ववेत्ता अल्‌-

महमुदाचा मृत्यु आणि त्याचं स्वभाववणेन. १४२

‘फरीबी, शिरस्तेदार अल्उत्बी, खुरमस्कऱ्या अल्बेहकी यांचे सारखें जोरदार अरबी लेखक आणि अनसूरी, फरुकी, असजूडी सारखे प्रभावशाली फारशी कवि व सर्वांत फारशी वाडययांत होमरप्रमाणें झळ- कणारा फिरदोसी हे सव त्याचे दरबारीं येऊन राहिले होते व त्यानें त्यांना आश्रय दिला यावरून तो विद्वान लोकांचा पुरस्कता किती होता हें सिद्ध होतें,’? अशा तऱ्हेने महमुदाच्या मोठेपणाची योग्य ती वाखाणणी करीत असतां लेनपूलने शेवटीं आपलें असें मत दिलें आहे कां “: महमुदाचें राजनीतिनेपुण्य बेताचंच होतें. त्यानें राज्यकारभारा- च्या नवीन संस्था स्थापल्या नाहींत किंवा राजशासनाची नवीन पद्धति अमलांत आणली नाहीं. त्यानें जे प्रदेश जिंकळे ते एकजीव करून त्यांत सुव्यवस्था उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला नाहीं. आणि यामुळेंच तो मरण पावतांच त्यानें अव्यवस्थितपणें आपल्या राज्य- छत्नाखालीं दाखल केलेले प्रदेरा भराभर स्वतंत्र झाळे. महमुदाविरुद्ध केलेल्या टीकांचा विचार करण्यापूर्वी प्रसिद्ध योद्धा, निपुणसेनापति व न्यायप्रिय राजा येवढेंच नव्हे तर एक जगहिख्यात पुरुष म्हणून आम्हांलाहि महमुदाच्या स्तुतिपर चार शब्द काढले पाहिजेत, आमचे असें ठाम मत आहे कीं, शिवाजी, हर्षे, वॉशिंग्टन, विख्यात पीटर इत्यादि, ज्यांनीं जगाच्या इतिहासांत नांव केळें आहे व ज्यांनीं राष्ट्रांच्या भावितव्यता बदछून टाकल्या आहेत अश्या विघिघटनेनेच दीध कालानें उत्पन्न होणाऱ्या असाधा- रण कर्तृत्वाच्या थोर पुरुषांपैकीं महमूद हा एक होता. त्याची वाग- णूक कडक शिस्तीची होती. त्याच्या स्वाऱ्यांच्या वर्णनांत शहरें आणि देवळें ठुटण्याबद्दळ, कत्तठींबद्दल व पाडाव केलेल्या लोकांना गुळाम करण्याबद्दळ जीं वर्णनें आहेत त्यांत त्यानें स्रियांस मारल्याचा किंबा. त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा उल्लेख सांपडत नाहीं. त्याला न्यायातचें इतकें प्रेम आणि गुन्ह्याची इतकी चीड होती कीं व्यमि-

१४७२ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

चार करतांना त्याचा स्वतःचा मुलगा सांपडता तरी त्यानें त्याला देहांत प्रायाश्चित्त दिळें असते. आपल्या प्रजाजनांचें सुख सवे बा- जूनीं वाढावें म्हणन त्यानें खटपट केली. त्यानें चोरांवर जरब बस- वून व्यापाराचे संरक्षण केलें, आणि निरनिराळ्या प्रांतांतील दळण- वळणाचे मार्ग सुरक्षित केळे. यामुळें खोरासान आणि लाहोर यांच्या दरम्यान व्यापारी तांडे बिनधोक व मोकळेपणाने जात असत. ( उत्बी ). त्यानें निरानेराळ्या प्रांतावर चांगळे अधिकारी नेमले आणि ल्यांच्यावर असा वचक ठेवला कीं त्यांनीं प्रजेवर कधीं जुळूम केला नाहीं. निश्ाप्र खोरासन येथें त्याचा भाऊ नझीर हा प्रांता- धिपति होता. उत्बीनें त्याचें असें वर्णन केळें आहे कीं “ नझीराचीं राज्यव्यवस्था उत्कृष्ट होती, व तो इतका दयाळु होता कोौं त्यानें कधीं कोणाला कठोर शब्द वापरला नाहीं, कधीं कुणाला दुखविलं नाहीं, किंवा कधीं कोणावर अन्याय केला नाहीं. ” ( पा, ४८६) महमूद हा गरिबांचा उत्कृष्ट वाली होता अशी जी उत्बीनें त्याची प्रशंसा केळी आहे त्यांत अतिशयोक्तीचा किंवा खुश्यामर्ताचा भाग नाहीं. “ त्यानें दरिद्री विधवा आणि श्रीमंत सरदार यांस सारखेच वागावेळें, त्याच्या कारकीर्दीत गर्वांचे व जुलुमाचे दरवाजे कायमचे बंद झाले होते. ‘’ “ त्यानें वजनें व मार्पे तपासण्यासाठीं एक अधि- कारी नेमला होता. बाजारांत व्यापाऱ्यांकडे जाऊन त्यांची वजनें व मार्पे ठरीव परिमाणांचीं आहेत कीं नाहींत हें पाहण्याचें काम त्याला करावें लागे. त्यानें रस्ते व्यवास्थत व मोठे केळे. दुकानांची सोय केली आणि गाढवें व ऊंट रस्त्यांतून स्वतंत्र जाण्याची व्यवस्था केली. पूर्वी पेठेंतील रस्ते उघडे असल्यामुळें धूळ व पाऊस यांचा पेठेंतीळ लोकांस मोठा उपद्रव होत असे. त्यानें बाजारांतील रस्त्याच्या दोहो बाजूंच्या घरांची छपरे सारखीं करवून मर्धाळ रस्ते आच्छादून टाकण्याचा हुकुम केला व दोन महिन्यांत सवे रस्ते आच्छादले गेले. या रस्त्यां-

महसुदाचा मृत्यु आणि त्याचे स्वभमाववणेन. १४५

तून सर्व ठिकाणीं सूर्याचे किरण येऊन बाजारांत उजेड पडण्याचीहि यवस्था केली होती व त्यामुळें सूर्यप्रकाशाचा आनंद कोणालाहि मेळूं शके ‘” (उत्बी पा. ४८६ ). “ लोकांस न्याय मिळावा व डोकांच्या सुखसोईत भर पडावी म्हणून आदरसत्काराच्या व धार्मिक देणग्यांत तो वर्षाकांठीं जबळजवळ एक लाख दिनार खर्चात असे ” ( सदर ). या वरून असें स्पष्ट दिसून येतें कीं, प्रजारंजन तत्परता हं राजाचें कर्तव्य आहे ही जाणीव महमदाच्या ठिकाणीं जिवंत होती महमद हा खरा कतेव्योत्सुक असा मसलमान होता, हें सांगा- ब्रयास नकोच. आपल्या धमाच्या ठिकाणीं त्याची पर्ण श्रद्धा होती आणीबाणीच्या वेळीं लढाईंच्या पूवी आणि नंतर तो ईश्वराची प्रार्थना करी. “’ धमोनेष्टांच्या सहाय्याला देव तत्पर आहे ” या कुराणांतील वचनावर त्याची श्रद्धा होती. इतर बाबी प्रमाणे या बाबींताहि शिवाजींत व महमुदांत साम्य आहे. शिवाजीचीहि आपल्या धर्मावर वच आपल्या पवित्र कायीवर अढळ निष्टा होती. आणि संकटाच्या वेळीं तोहि आपल्या इष्ट देवतेची सहाय्य व मार्गदर्शान मिळण्या- साठीं आराधना करीत असे. त्या दोघांच्याहि बाबतींत अशा प्रार्थना आपल्या अनुयायांचा उत्साह व विश्वास वाढविण्यासाठीं केल्या अस- ण्याचा संभव नाहीं असं नाहीं; परंतु बहुधा ल्या श्रद्धेमुळेंच करण्यांत येत असाव्यात. शिवाजी ज्याप्रमाणे संकटसमयीं भवानीची प्रार्थना करून समाधीत देवीचे उत्साहवर्धक व मार्गदर्शक शब्द बोले त्याच प्रमाणे महंमद कुराणावरून आपले शकुन पाही. आमची अशी खातरी आहे कीं दोघेहि या गोष्टी छद्यानें करीत नसून देवावरील अढळ श्रद्धेने व उत्कट धार्मिक भावनेमुळे करीत. मात्र शिवाजीच्या मनोरचनेंत हा फरक होता कीं त्याची आपल्या धमीवर कितीहि श्रद्धा असली तरी दुसऱ्यांच्या धमोबद्दल त्याच्या ठिकाणीं सहिष्णुता म, भा-१०

१४९ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

होती. महमुदानें धर्मोत्साहाच्या भरांत मूर्तींचा विध्वंस केला आणि मत्तिपूजकांचा निष्ठरतेनं नाह केला. परंतु शिवाजीनें मशिदी व फकीर यांचें रक्षणहि केळें ब त्यांचा आदराहि ठेविला. आमच्या मतें महमुदाच्या अंगचा मोठा दोष म्हणजे त्याचें इतर धमोबद्दल असद्विष्णु असलेलें धर्मवेड होय. इतर प्रत्येक बाबर्तात तो अकबरा- पेक्षां श्रष्ट होत!, परंतु या बाबतींत मात्र आमच्या मतें त्याला अकबराची सर नाहीं. महमूद हा स्वभावाने क्रूर नव्हता. दोनतीन शतकांनंतर चंर्गाझ किंवा तैमूर यांनीं आशियांत किंवा त्याहिनंतर दक्षिणेतील मुसलमान राजांनीं हिंदुस्थानांत जशा निरपराध व असहाय माणसांच्या निदेयपणे कत्तली केल्या तशा त्यानें केल्या नाहींत. आतां स्वभाव-दोषाचा विचार करतां महमुदांचा लोभ फारच अतिशायोक्तीनें वर्णिला जातो अशी आमची समजूत आहे. दुसऱ्या कोणत्याहि माणसास इतिहासांत जमवितां आली नाहीं इतकी संपत्ति त्यानें जमविली यामुळेंच तो लोभी असावा अशी लोकांची समजूत असावी. मृत्युसमयीं आपली अगणित संपत्ति पाहून आणि आतां ती आपल्याला कायमची मुकणार हें मनांत येऊन तो रडला ही गोष्ट बहुधा कल्पनानिर्मित असावी व ती खोडसाळपणानें प्रसुत करण्यांत आली असावी. तो इतका धमंनिष्ठ होता कीं माणसाला अपरिहाये सठेल्या मरणाबद्दळ तो रडला असेल हें संभवत नाहीं. शिवाय त्याळा मुलगेहि होते; आणि मनुष्याची मनोदुबलता आपला धन- ग्रह आपल्या मार्गे मुलाच्या स्वाधीन कराबयास होशांने आणि आनंदानें तयार असते, अगाणित संपत्तीचे वारस होणारे ( मिळवि- णारे नव्हे ) राजे जसे मुक्त हस्ताने खर्च कारिेतात तसा तो खर्चिव नव्हता यांत संशय नाहीं. परंतु संळजुकच्या वजिरानें म्हटल्याप्रमाणे तो उदार होता यांतह्दि तिळमात्र संशय नाहीं. समकालीन वजिराच हँ उद्गार मागाहून प्रसिद्ध झालेल्या गोष्टींपेक्षा आधिक विश्वसनीय आहेत

महमुदाचा मृत्यु आणि त्याचे स्वभाववणेन. १४७

विद्ठज्जनांना उत्तेजन देण्यासाठीं दरवर्षी तो पुष्कळ द्रव्य खर्च करी त्यानें एक पाठशाळा स्थापन केली होती, तिला मोठ्या देणग्या दिल्या होत्या. तींत पगारी अध्यापक नेमळे होते. पर्वींच सांगि- तल्याप्रमाणें ( पान ४६६ ) त्यानें बांधलेल्या जागीं भशिदीच्या शेजारीं या पाठशाळेंतील विद्याथ्यांस सरकारी खर्चानें राहण्या- सवरण्याची व्यवस्था ठेविली जात असे. फिरदोर्शाला त्यानें द्र हजार कवितांत हजार सोन्याचे दिनार द्यावयाचें कबूल केलें असतां ६०००० कवितांचे शह्वानामा काव्य तयार झाल्यावर त्यास महमु- दानें सोन्याचे देनार न देतां रुप्याचे दिळे अशी जी गोष्ट सांगण्यांत येते त्या गोष्टींत जरी महमुदावर लोभाचा जो आरोप करण्यांत येतो त्या आरोपाची उत्पत्ति नसली तरी ह्या गोष्टीनेंच बहुधा या आरोपाला दृढता आलीं असावी. ही गोष्टाहे कालान्तरानें नवी रचण्यांत आली असावी. कारण फिरदोसाच्या परंपरेने चालत आलेल्या चरित्रक्थां- तीळ बराचसा भाग अर्वाचीन विद्वानांनी अग्राह्य ठरावेला आहे. ( एन्‌सायक्लोपीडिया ब्रिटानिका ). आमच्या मते तर या प्रचलित गोष्टीने महमुदाऐवजी फिरदोसीचेच लोभ व क्रोध हे विकार स्पष्ट दिसून येतात. कसेंहि असो, या विद्याप्रिय राजानें वाडमयाच्या अभिवृद्धीसाठी आणि इराणच्या पुराण इतिहासाचें संरक्षण व्हावें म्हणून विद्रज्जनांस ज॑ उत्तेजन दिलें त्याची या गोष्टीवरूनच साक्ष पटते. फिरदोसी हा शिया असतां व कदाचित्‌ पाखंडी असतांहि अश्निपूजक इराणचा इतेहास चिरस्थायी करण्याकारितां हें काव्य लिहिण्याचे काम कड्या मुसलमान महंमुदानें त्यालाच सांगितलें. यावरून महमुदाची वाडममयावरील भाक्ते कशी निहतुक होती हें दिसून येतें, “ महमद स्वतः सुनी व कडवा मुसलमान असतां हि त्यानें आरबी संस्थांची आबळ करून फारशी वाडमयाला व विद्येला मदत करून त्यांचें संवधन केळे ( सदर ), याप्रमाणें

१४८ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

ज्ञान आणि विद्वत्ता यांचे ठिकाणीं महमुदाचे जसें निर्हेतुक प्रेम होतें तसें अकबराचे नव्हते. या बाबतींत अकबराहून महमूद हा श्रेष्ट दिसतो. अकबरानें संस्कृत विधेळा उत्तेजन दिलें खरें परंतु तो कट्टा मुसलमान नव्हता. इराणाचा पौराणिक इतिहास लिहेण्याचे सामानी राजांनीं सुरू केलेळें काम पुरें करण्यास त्याच्या कवीस मह- मुदाने सांगितलें होतें. परंतु फारशी कर्वाचें निवासस्थान ज॑ खोरासान त्यांताळ तूस गांवांत जन्म पावळेला फिरदोसी हा आपल्या अद्भुत काव्य- शक्तीने आणि इराणच्या प्राचीन कथांच्या माहितीनें तें काम करण्यास अत्यंत पात्र आहे असें दिसून आल्याबरोबर त्यानें ते काम फिरदोसीस सांगितलें. अलबिरूनीला त्यानें ज साहाय्य केलें त्यावरून तर संस्कृत वाड्मय,तत्त्वज्ञान व शास्त्रीय ज्ञान यांविरुद्धाहि त्याचा आक्षेप नव्हता असें स्पष्ट दिसून येते, अलबिरूनी व फिरदोसी सारख्या असाधारण बुद्वे- मत्तेच्या अनेक पंडितांनीं, कर्वांनीं व तत्त्वेवत्त्याना त्याचा दरबार उज्वल करून प्राचीन काळच्या विक्रमादित्याप्रमाणें किंवा अर्वाचीन काळच्या अकबराप्रमाणें महमुदाची कौर्त अजरामर केली आहे. या कारणांमुळे महमुदावर जो लोमिष्टपणाचा सर्वप्रचलित आरोप कर- ण्यांत येतो, त्यांत फारसें तथ्य आहे असें आम्हाला वाटत नाहीं.

टिप्पणी. तबकात–इ नासिरी मर्घाळ महमुदाचें गुणवर्णन.

महंमुदानें आपल्या वीर्य, शौय, धेय, शहाणपणा, दूरदृष्टि, विवेकयुक्त सल्लामसलत व परिणामकारक उपाययोजना या गुणांनी ् फार मोठा प्रांत जिंकून तेथें मुसलमानीराज्याचा विस्तार केला, खुरासान, ख्वारिझम, तबारिस्तान, इराक, निमरोज व फासे हे प्रान्त व घोर ब तुख्वरिस्थानचा डोंगराळ मुलुख हे सर्व त्याच्या अंमलात आले होते व त्यावर त्याचे अंमलदार अंमल करीत होते. तुकस्थानच्या मलि- कांनीं त्याचें मांडलिकत्व कबूल केलें होतें. त्यानें जिहून ( ऑक्सस’) नदीवर पूल बांधला, व तुराणावर स्वारी केली. तुर्कस्थानच्या खाकानांर्न

महसुदाचें राजनीतिनेपुण्य. १४९

त्याच्या तळावर येऊन त्याचें सम्राटत्व मान्य केलें त्याच्या विनंतीवर महमुदानें सेळजुकच्या मुलाला आपले सर्व भाऊबंद व आश्रित यांस घेऊन जिहून उतरून खुरासानमध्यें जाण्याची परवानगी दिली. त्या काळचे दूरदृष्टिचे लोकांना ही परवानगी देतांना महंमुदानें मोठी चूक केली असे वाटलं, कारण महंमदाच्या मुलाबाळांस यांत धोका आहे हें त्यांच्या ध्यांनी आलं होतें. वा; “कः

महमुदाचं राजनीतिनिपुणत्व.

महमूद हा राजनीतिनिपुण राजा नव्हता असें जं लेनपूलनें त्याचे बद्दल म्हटलें आहे त्याला कांहीं आधार आहे असें आम्हांस वाटत नाहीं. तो मृत्यु पावतांच त्याचें साम्राज्य ढासळू लागले तें तो राजनीतिनिपुण नव्हता म्हणून नव्हे. त्याचीं कारणे अगदी निराळीं आहेत. महमुदानें राज्यकारभाराची एखादी नवीन पद्धाते सुरू केली किंवा नाहीं, अथवा त्यानें हस्तगत केलेले प्रांत निग- डित करून सुसंघटित करण्याचा प्रयत्न केला किंवा नाहीं, हेंच अगोदर खात्रीलायक सांगतां यावयाचें नाहीं. हें म्हणणें सिद्ध कर- ण्यास किंवा तें खोडून टाकण्यास कोणताहि लेखी पुरावा नाहीं. अकबराचे कारकॉार्दीचे सविस्तर वर्णन अबुलफझलनें आपल्या ऐने- अकबरांत लिहून ठेवळें आहे. परंतु महमुदानें आपल्या साम्राज्याचा कारभार कसा चालविला याचे वर्णन करणारा प्रेथकार कोणी झाला नाहीं. तथापि त्याचें राज्य सुसंघटित व सुव्यवस्थित होतें याबद्दल संशय नाहीं. उत्‌बीनें असा उललेख केला आहे कीं गझरनांस त्याच्या . स्वाऱ्यांची हकीकतहि लिहून ठेवली जात असे आणि महमूद स्वतः लढाईच्या धामधुमींतहि आपल्या हालचालीच्या हकीकती (1218- ७७७७३ ) लिहून बाबराप्रमाणें घरीं पाठवीत असे. लढाईच्या धुम- श्वकींत व लुटीच्या घांदलींतहि मथुरेच्या देवाल्याच्या सौंदर्याची प्रशंसा करणारा त्यानें म्थुरेहून पाठविलेल्या एका वर्णनांतीळ एक

१५० गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

पूर्वाछ्टिखित उतारा उत्बीनें दिला आहे. निरनिराळ्या प्रांतांचे व त्यांच्या जमाखर्चाचे तक्ते ठेवण्यांत येत असत; व प्रांताधिपतींवर तपासणी करण्यासाठीं एक स्वतंत्र प्रचान नेमलेला असून त्याची कचेरी व्यवस्थितपणे काम करीत असे. बेहकीनें दिलेल्या ऐकीव गोष्टींवरूनहि असे स्पष्ट दिसून येतें कीं, त्याच्या राज्यकारभारांत सुयात्रेतता होती. तेव्हां त्याच्या राज्यकारभाराची पद्धाते कशा होती हें आपणांस माहित नसलें तरी ती सुव्यवस्थित होती यांत संशय नाहीं. ती पद्धति नवीनच होती कीं पूर्वी गझनींचा ज्या सामानी साम्राज्यांत अंतर्भाव होत होता त्या सामानी साम्राज्याच्या राज्यप- द्वतीचें तींत अनुकरण केलें होतें हें सांगतां येण्याजोगे नाहीं. आणि जुन्याच पद्धतीचें महंमुदानें काळजीपूर्वक व सूक्ष्मपणे अनुकरण केलें, असें असलें, तरी ल्यांत त्याची मुत्सद्देगिरीच दिसून येते. शिवार्जानें सुद्धां आपल्या स्वराज्याच्या ब हिंदुपदपातशार्हाच्या नव्या भावनेला आवश्‍यक असे अनेक फेरफार केले तरी बव्हेशानें विजा- पुरकरांची जुनीच राज्यपद्धाते कायम ठेविली होती. अकबराची राज्यपद्धति नवीन आणि अपूर्व होती हें खरें; परंतु वंश व धर्म यांनीं भिन्न असलेल्या विस्तृत अशा साम्राज्यावर त्याला राज्य करा- वयाचे होतें आणि त्यांतील निरानेराळे प्रांत जर्मान, हवापाणी आणि जनता या सव बाबतींत एकमेकांपासून अत्यंत भिन्न होते. आतां लष्करी व्यवस्थे संबंधें पाहतां अकबर किंवा शिवाजी यांनीं आपल्या लष्कराची व्यवस्था कशी केली होती हें इतिहासांत

प्रसिद्ध आहे, परंतु या बाबतींत महमुदाची व्यवस्था कशी होती

याची माहिती उपलब्ध नाहीं, तथापि व्याच्या लष्कराची संघटना

सुसंबद्ध व सुदढ असावी; कारण कनोज किंवा सोमनाथासारख्या दूरच्या प्रदेशांत, नद्या, पर्वत, व वाळबंटें यांतून नेण्यासारखीं व तटबंर्दावर मारा करण्याजोगी उत्कृष्ट साधनें व यंत्रें त्याच्या सैन्यांत

| श |

  • महसुदाचे राजनीतिनिषुणत्व. १५१

होतीं हें निर्विवाद आहे. गाडस अथवा रक्षक यांच्या पथकांची त्यानें केळेली रचना फक्त त्याच्याच सेन्यांत॑ दिसून येते. आपल्या लोकांतून निवडून काढलेल्या या उत्कृष्ट ५००० शारीर–रक्षकांचा ( बाडी गाडंचा ) महंमुदानें ऐन वेळीं योग्य उपयोग करून घेऊन नेहमीं लढाइत यश संपादन केलें हें प्रसिद्ध आहे.

तेव्हां महमुदानें आपल्या राज्यकारभारांत नंवीन पद्धति सुरू केळी नाहीं किवा आपल्या प्रांतांना सुसंघटित व एकजीव करण्याचा प्रयत्न केला नाहीं असें म्हणण्यास कांहीं एक कारण दिसत नाहीं. इंतक’च नव्हे तर त्याची मुलकी व लष्करी व्यवस्था सुयंत्र व सुटढ होती असेंच म्हणणें जरूर आहे. त्याचं साम्राज्य तो मरण पाव- तांच विस्कळलें यांचें कारण आमच्या मतें असे आहे कां त्याच्या- मागून त्याच्या गादीवर आठेळे राजे राज्यकारभार करण्यास आणि सैन्याचे नेतृत्व स्वीकारण्यास नालायक होते. सर्वच अनियंत्रित राज्यपद्धतीचा हा प्रमुख दोष आहे. मोंगळ वंश्याप्रमाणें मनानें आणि शारिरानें तेजस्वी असे एकामागून एक झालेले राजे क्रचितच दृष्टोत्पत्तीस येतात. व्या घराण्यांत मात्र बाबरापासून अवरंगजेबा पर्यंत अनुक्रमानें सहा सम्राट कतृत्वानें व सामर्थ्याने विख्यात असे होऊन गेले. शिवाजीहि महंमदाप्रमाणेंच आपल्या वारसाच्या बाब- तींत अभागी होता. आणि अठराव्या दतकांत मराठी राज्याची जी भरभराट झाली ती पेशव्यांच्या प्रभावाने झाली. त्यांच्या चार पिढ्या सारख्याच जोमाच्या झाल्या आणि ते सर्वच प्रसिद्ध मुत्सदी व सेनापतिहि होते. ब्रिटिश साम्राज्याची बळकटहि त्यांच्या राज्य- व्यवस्थेचा चांगुलपणा नसून वर इंग्लंडांतीलठ शासनपद्धतीच्या असा- घारणपणावर अवलंबून आहे. इंग्लंडांत अनियंत्रित राज्यपद्धाति तर नाहींच, पण तेथील राज्यकारभार राजा, उमराव व लोकप्रातिनाधि यांचे हातांत असल्यामुळे जुलमी व विषयासक्त राजे राज्यावर येणें

१५२ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या,

आणि नालायख व महत्वाकांक्षी गव्हर्नर किंवा गव्हनरजनरळ हिंदुस्थानांत राज्य करण्यास येणें अशक्‍य आहे, कायदे निर्दोष नसले किंबहुना चांगळे नसळे तरी चालतील. राज्याची बळकटी व भरभराट कायद्यांचा पूणे अमळ करण्यावर अवलंबून असते इंग्ठंडांतील राज्यपद्धतींत क!यद्यांची अमलबजावणी शिथिल होणार नाहीं, अशी काळजी घेतळेली असल्यामुळे कर्तृत्ववान शास्त्यांची व सेनानायकांची अव्यावहत परंपरा चाळ आहे. अनियंत्रित राज्य- पद्धतींत अनेक राजानां केवळ जन्मामळें अमयोद राजसत्तेचा वारसा प्राप्त हात असल्यामुळे ते चेनी निपंजतात आणि सामध्येहीन झाल्यामुळें त्यानां महत्वाकांक्षी सनानायकांस अगर प्रांताधिकाऱ्यांस आपल्या कह्यांत ठेवतां न आल्यामुळें निरानेराळे प्रांत राज्यांतून फुटून बाहेर पडतात व शेवटीं राजघराणेंहि नष्ट होते. आणखी मर्यादित राजसत्तेंत व लोकसत्तेत राष्ट्रीय भावनेचे संवर्धन होतें व त्यामुळें राज्याची किंवा साम्राज्याची शक्ति दृढ होते. कारण मध्येंच एखादा प्रांताधिकारी किंवा सेनापति महत्वाकांक्षी निघाला तरी जोम- दार राष्ट्रीय भावनेमुळें प्रजा अथवा सैन्य त्यास मदत करण्यास पुढें येत नाहीं. सारांश महमुदाच्या साम्राज्याचे त्याच्या निधनानंतर जे तुकडे तुकडे झाले, ते त्यांच्या राज्यपद्धतीच्या सदोषते- मुळे नसून तिच्या अनियंत्रिततेमुळे झाळे, अनियंत्रित राज्य- पद्धतींत कर्तत्ववान राजांची व लायक आणि महत्वाकांक्षाविन्मख प्रांताधिकाऱ्यांची परंपरा राहणें काठिण असतें. त्याचप्रमाणें महत्वा- कांक्षी प्रान्ताधिकाऱ्यांस स्वतंत्र गादी स्थापणे अशक्य करणारी लोकांच्या हृदयांतीळ राष्ट्रीय भावना ल्यावेळीं उद्गत झाली नव्हती हें हि त्याच्या साम्राज्याच्या विळयाचे कारण आहे. त्याचे साम्राज्य त्याच्या पश्चात्‌ विस्कळित झाळें यावरून महमूद हा मुत्सद्दी अथवा राज्यकार्यधुरधर नव्हता असें ठरत नाहीं.

महमूद शिवाजी लुटारू होते काय? १५३

टिप्पणी-महमूद किंब्रा शिवाजी लुटारू होता काय!

व्हिन्सेन्ट स्मिथ यांनीं लिहिलेल्या ऑक्स्फड हिस्टरी आफ इंडिया ‘ या ग्रंथांत महमुदाबद्दल सवोत अधिक निंदास्पद विधान केलेलें आहे. | त्यांत असं म्हटलं आहे काँ, “’ हिंदुस्थानच्या बाबतींत तरी महमूद हा | केवळ लटारू होता. त्याच्या लटारूपणाचे प्रमाण प्रचंड होतें येवढेच. | पंजाब व्यतिरिक्त इतर प्रदेश त्यानें कायमचा जिंकण्याचा प्रयत्न केला नाहीं आणि अमोलिक वस्तु व चिरस्मरणीय देवालयें यांच्या विध्वसापली- कडे त्याच्या स्वाऱ्यांचा परिणाम कांहींएक झाला नाहीं, ” शिवाजी- प्रमाणेंच महमुदानें हिंदुस्थानांत ठुटीसाठी केलेल्या स्वाऱ्या इतक्या अनेक आणि यशस्वी होत्या कीं कोणाचेंहि लक्ष स्वाभाविकपणेच या लुटींवर वेधून जातें ब शिवाजी काय किंवा महमूद काय प्रख्यात चोर, यशस्वी लुटारू, होता अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहण्याची प्रव्रात्त होते. अनेक इतिहासकारांनी महमुदाबद्दल अक्शाच दृष्टीने लिहिलें आहे व त्यानें केवळ लुटाळूट केली, कोणताहि प्रांत कायमचा काबीज केला नाहीं असं म्हणून त्याची किम्मत कमी लेखिली आहे, परतु एखादा प्रांत हस्तगत करून राज्यविस्तार करणें हें लुटारूपणापेक्षां कमी निंद्य आहे काय १ आमच्या मते तर राज्य खालसा केल्यानें दुसऱ्यांच्या स्थावर मालमत्तेचा व विशेषतः त्यांना अत्यंत मोल्यवाज्ष्‌ वाटणाऱ्या त्यांच्या जमिनीचा अप- हार करण्यांत येतो. आणि राज्य खाळसा करितांना जरी जिंकलेला प्रदेश कायमचा काबीज होऊन त्यांत व्यवस्थित राज्य सुरू होते तरी त्याने नवींन सुखावह राज्यपद्धाते अमलांत येते असें नाहीं. मुसलमानी राज्यपद्धाते हिंदु राज्यपद्धतीपेक्षां अधिक चांगली कधीच नव्हती आणि तशी ती होऊंहि शकली नसती. आणि कोणतेंहि परराज्य स्वराज्यापेक्षां केव्हांहि वाईटच, कारण त्यामुळे प्रजाजनांची व्यवस्थित व कायदेशीर लूट मात्र सतत चालू होते. परकी राज्यांत अपरिहाये जबर करबंदी झाल्यानं प्रजाजनांच्या संरक्षणास आवश्‍यक असलेल्या करांपेक्षां आधिक कर-वबसूल होऊं लागल्याने केवळ व्यवस्थित तऱ्हेने लूट चाळू होते असें म्हटलें पाहिजे, महमुदानें हिंदुस्थानचा कोणताहि प्रांत आपल्या राज्यांत

१५४ गझर्नीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

सामील करण्याचा किंबा कायमचा काबीज करण्याचा प्रयत्न केला नाहीं, असें म्हटलें तर खरोखरच महमुदास उच्च कोटींत नेऊन बसवावा लागेल, कारण त्यानें दुसऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याची किंवा त्यांच्यावर परराज्याचें जू लादण्याची हांब घरली नाहीं असरे म्हणावें लागेल. परंतु हं अलौकिक यदा त्याच्यागाठीं बांधतां येण्याजोगे नाहीं. कारण सामान्य राजांप्रमाणेंच त्यानें हिंदु राजांचे प्रांत खालसा करून आपल्या राज्यांत सामील करण्याचा शक्‍य तो प्रयत्न केला हें आपणांस दिसून येतें. ब्रिटिशांनी ज्याप्रमाणे मुंबई,- मद्रास व कलकत्ता या आपल्या केंद्रां- तून राज्यविस्तार केला त्याप्रमाणेंच एखाद्या चाणाक्ष मुत्सद्याप्रमाणें किंवा राजनीतिनिषुणाम्रमाणें गझनीभोंबताली क्रमाक्रमाने आपल्या राज्याचा विस्तार करीत महमुदानें आपलें साम्राज्य कसं उभारले तं पाहू या. सुरुवातीस तो झबुलिस्तानचा म्हणजे गझनीच्या भोवतालच्या प्रांताचा राजा होता. हा प्रांत एका कालीं रजपूतांच्या ताब्यांत होता. त्यांपासून तो त्याने घेतला. तो सामानी सम्राटांच्या वतीने खोरासानचा प्रांताधि- कारीहि होता. आक्झसच्या पलीकडील तुर्का टोळ्यांच्या स्वार्‍्यांनीं सामानी साम्राज्य जव्हां खिळखिळे करून बुडविले तेव्हां त्यानें खोरासान आपल्या राज्यांत सामील करून घेतलें; व इलेकखान्‌ तुकाला सामानी साम्रांज्यांतील ऑक्झस पलीकडील उत्तरेचा प्रांत म्हणजे मवरुननहर काबीज करू दिलें. याप्रमाणे या दोघां प्रबळ राजांनीं एकमेकांची सोय करून घेतली. पुढें इंग्रजांप्रमाणेंच क्रमाक्रमाने महमुदानें झाबुलिस्तानच्या पूव बाजूस व खोरासानच्या पाश्चिम बाजूस आपल्या राज्याचा विस्तार केला. हेंहि पुनः त्यानें घाईने एकदम केलें नाहीं. महमुदानें किंवा त्यांच्या बापाने अगोदर काबुलिस्तान हस्तगत केलें; नंतर हल्लांच्या वायव्य सर- हदी प्रांताचा खालचा भाग बन्नु व त्या लगतचा प्रदेश यांवर आपला अमल बसविला व शोवटीं उत्तरेकडचा भाग पेक्यावर व बाहिंड हे आपले करून घेतले. आपल्याला हें माहितच आहे कां हे तिन्ही प्रांत काबूलचा शाही वंद्याचा ब्राह्मण राजा जयपाल याचे होते. जयपाल सर्व पजाबावराहे राज्य करीत असे. इंग्रजांनीं ज्यापमाणें दक्षिणेंत मुंबईत बसून पेशव्यांचे हातून वसई वगेरे एकामाधून एक लिल्हे आपल्या राज्यांत सामील

महमूद शिवाजी लुटारू होते काय? १५५

केले त्याप्रमाणेंच महमुदानें जयपालाचा एक एक प्रांत हस्तगत करण्याची याक्ते केली, त्यास एकदम निराश करून टाकलें नाहीं. बाजीरावाप्रमाणें आनंदपालाकडे सिंधूच्या पश्चिमेकर्डाल सव राज्य गेल्यानंतर पंजाबचा प्रांत शेलूक ठेवण्यांत आला होता. त्याच्याकडून त्या प्रांताबद्दल खंडणी घेण्यांत येत असे. अखेरीस अपरिहाये असणारा शेवटचा घाव त्यांवर पडला आणि बाजीराव व आनंदपाल या दोघांचींहि राज्ये नाहींशी झाली बे तीं विजयी सत्तांनी आपल्या राज्यांत सामील करून टाकली, मह- युदाच्या पूवेकडील साम्राज्यांतील अत्यंत मोठा प्रांत जो पंजाब त्याचा अपवादानें उल्लेख करण्यांत व्हिन्सेन्ट स्मिथने महमुदाने आपल्या निर- नेराळ्या स्वाऱ्यांत मोठमोठे प्रांत कसे काबीज केले व आपल्या राज्याचा वेस्तार केला याची कबुलीच दिली आहे.

इतकेंच नाहीं; जिंकलेल्या प्रदेशांतील लोकांस जबरीनें बाटवून व पुसलमान करून आपल्या साम्राज्याचे हर्ढाकरण करण्याचाहि महमुदानें यत्न केला. राज्याच्या एकीकरणास त्या राज्यांतील लोकांच्या घर्मभाव- मा एकच असणें कसें जरूर आहे हें महमुदानें ओळखले होतें. त्याने उत्तरेस घोर प्रांतात व अफगणिस्तानच्या इशान्य भागांत स्वात व बिजोर पा प्रांतांतील लोकांस बाटविण्याचा पद्धतशीर प्रयत्न पण सुरू केला, पण संघूनदींच्या पश्चिमेकडील भागांत जितक्या जोरानें ह्या उपक्रम करण्यांत आला तितक्या जोरानें तो पूवभागांत झाला नाहीं. पंजाबांत बाटविण्या- य उपक्रमाचा जोम फार दिवस टिकला नाहीं. तरी सुद्धां पंजाबांत विश- गतः पश्चिमभागांत बहुतेक लोकांस सक्तीने मुसलमान करण्यांत आलें आणि आजमितीलाहि या सक्तीच्या धरमत्यागाचें परिणाम स्पष्ट दिसत आहेत. हिंदूंच्या दृष्टीने ही फार मोठी आपत्ति होती. परंतु मुसलमान रजा या नात्याने आपल्या राज्यालगतच्या व आपल्या अंमलाखाली आलेल्या प्रांतांतील लोकांस बाटविण्यांत महमुदाचे राजकीय धोरण देसून येतें यांत संशय नाहीं. %

सवे लोकांस मुसलमान केल्यास पंजाबांतील पूर्वांचे हिंदु लोक मुस-

क. कही. ५ 3,

मानांच्या बरोबरीचे हक्क मागतील व बंडहि करतील तेव्हां सवांस न बाट.

१५६ गझर्नाच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

ड्भ

याविरुद्ध असा आक्षेप काढितां येण्याजोगा आहे काँ, महमुदाच्या शेवटच्या स्वाऱ्या, म्हणजे मथुरा, कनोज ब सोमनाथ यांवर्रल स्वाऱ्या केवळ ल॒टीसाठी केलेल्या होत्या; राज्यविस्ताराची [किंवा जिंकलेला प्रदेश कायमचा आपल्या अंमलाखाली आणण्याची महमुदाची त्या स्वाऱ्यांत तरी इच्छा नव्हती, परंतु हृ म्हणणें देखील सत्याला घरून नाहीं, अंतवेंदी, ओध अगर गुजराथसारखे दूर अंतरावरचे प्रदेश एकाएकीं राज्यांत -सामील करून टाकतां येणं किंबा त्यांवर कायमचा अंमळ बसविणे शक्‍य नव्हते. सुरुवातीस खंडणी अथवा कांहीं लाग वसूल करणें व शेवटीं दर- म्यानचा प्रांत सर्वस्वी पचून गेल्यानंतर पुढचा आपल्या राज्यांत सामील करून ठराविक पद्धतीने क्रमाक्रमानेंच राज्यविस्तार करणें अवश्य होते. याच पद्धतीने इंग्रजांनीं बंगाल, त्यानंतर बिहार, त्यानंतर ओघ व शेवटी पंजाब कायमचे आपले केले. कनोजचा राज्यपाल हा प्रथम महमुदाच्या हातून निसटला तेव्हां महमुदानें पुनः ओघवर स्वारी केली, बारी हस्तगत केली आणि शेवटीं राज्यपालाला खंडणी देण्यास भाग पडले हं ध्यानांत घरले पाहिजे. कनोजच्या राज्याने ही खंडणी गझनीस अनेक वर्षे पावेतो दिली असावी, कारण कोरीव लेखांत आपल्याला असा पुरावा सांपडतो कीं सवे कनोज राज्यांत जर्मान महसुलाबरोबरच हा खंडणीचा कर सवे प्रजे- कडून वसूल करण्यांत येत असरे, विद्वान्‌ लोकांस या वेळच्या ताम्रश्ासनां” तील “ तुरुष्कदंड ” या शब्दाचे (.तुकोसाठीं वसूल केलेला कर याचें ) इंगित लक्षांत आलें नाहीं याचें आश्चर्य वाटते. या कालांतील कनोज प्रांतांतील कोरीव लेखांतच तुरुष्कदंडाचा उल्लेख आढळतो. त्रिलोचन- पालाच्या झुशी येथील १०२९६इ.च्या शिलालेखांत तुरुष्कदंडाचा उल्लेख नाही, परंतु या नेतरच्या कोरीव लेखांतील उल्लेखांवरून गाहडवाल राजे देखील त्यांचा गझनीच्या राज्यांशी कोणताहि संबंध नसतां हा कर वसूल करीत असत असे दिसून येतं. बेजबाबदार राजे एकदां सुरू झालेला व फार वर्षे वसूल होत असलेला कर त्याचें प्रयोजन नाहींस झाल्यावरहि वसूल करतात हें

वितां अध्यीसच बाटवावें ब अश्या तऱ्हेने दुही कायम राखावी म्हणूत मह-

मुदानें निम्मे लोकांसच मुसलमान केलें असावें काय

महमूद शिवाजी लुटारू होते काय? १५७

वाभाविक आहे, ते तो क्वचितच बंद करणार. असो, या तुरुष्कदंडावरून मराठ्यांच्या चोथेची आठवण होते. चोथ वसूल करण्यासाठी मोंगलांच्या राज्यांत मराठ्यांनीं आपल्या अधिकाऱ्यांची व्यवास्थित योजना केली होती, त्याचम्रमाणे तुकी सेनिक व अधिकारी हा दंड वसूल करण्यासाठीं कनो- /जच्या राज्यांत राहिले असण्याचा संभव आहे, व याच तुकोस भोजानें अथवा कणानें हांकून लाविले असावें असें आम्हीं यांच्या वृत्तान्तांत दाखाविलळं आहे. तुरुष्कदंडाचा उल्लेख फक्त कनोज राज्याच्या प्रांतांतील दानलेखांतच आहे. तो चेदी किंबा बंगाल प्रांतांतील कोणत्याहि दान- ‘लेखांत नाहीं; त्याचप्रमाणें परमार किंवा सोलखी राजांच्या ताब्यांतील ‘ मुलखांतील म्हणजे माळवा व गुजराथ प्रांतांतील कोरीव लेखांत कोठेंहि त्याचा उल्लेख नाहीं, याची आम्ही खात्री करून घेतली आहे, यावरून । असं निर्विवाद दिसून येतं कीं, महमूदानें कनोजवर कायमची खंडणी । बसविली होती. इंग्रजांनीं एकोणिसाव्या शतकांत ज्याप्रमाणें आपलें ‘ घोरण अबाधित राखले त्याप्रमाणें महमुद्मनंतर त्याच्या गादीवर आलेल्या । राजांनीं जर त्याचें घोरण जोमानें पुढें चालविले असते तर कांहीं कालानें ! कनोज त्यांच्या राज्यांत सहज सामील होऊन गेले असतें. सोमनाथाची । स्वारी देखील कधीं काळीं सफल होणाऱ्या राज्य-विस्ताराच्या इच्छेनेच । महमुदाने केळी होती. अशा तर्‍हेच्या स्वाऱ्या केवळ ल॒टीसाठीं केलेल्या । असल्या तरी त्यांनीं शेजारच्या राज्यांची शक्ति ढांसळते व शोवर्टी राज्य- । विस्ताराचा मार्ग मोकळा होतो. या कारणांनी महमूद हा केवळ टठुटारू ‘ होता, त्याला राज्य-विस्तारांची इच्छा नव्हती अश्शी त्याच्या बद्दल कल्पना करून घेणें इतिहासकारास शक्‍य नाहीं. त्यानें काबूलापासून लाहोरपर्यंतचें सर्व विस्तृत शाही राज्य आपल्या राज्यांत सामील करून टाकलें. ते काय थोडं होतं ? ह स्पष्ट दिसत असतां महमुदाला राज्य- विस्ताराची कल्पना नव्हती असें म्हणणें ह मानवी स्वभाव व प्रत्यक्ष इति हास या दोहोंच्याहि विरुद्ध आहे

परंतु राज्य-विस्ताराचा कोणताहि हेतु मनांत न धरितां केवळ टुटी- साठी म्हणून महमुदानें हिंदुस्थाबांत स्वाऱ्या केल्या असें घरून चाललें ‘ तरी पुष्कळ इतिहासकारांनीं महमुदाचे जे डाकू, लुटारू म्हणून वणन केलें

वा

१५८ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

आहे तें योग्य होईल काय £ हाहि प्रश्न विचाराह आहे. अश्या तऱ्हेच्या । चुकीच्या वर्णनानें अयथाथ कल्पनांचा प्रादुमीव होतो व त्यामुळें कसे

अनर्थकारक परिणाम होतात हं विस्ताराने सांगण्याची अवइयकता नाहीं, आणि म्हणून इतिहासांत वापरावयाचे हद्द अधिक काळजीने वापरले पाहिजेत ब ऐतिहासिक व्यक्तींचे वर्णन वस्तुस्थितीला घरून केलें पाहिजे, । इतिहासांत दोन प्रसिद्ध पुरुषांच्या बाबतींत या प्रकारचा फार मोठा अन्याय झाला आहे. महमूद व शिवाजी यांचें बहुधा दरोडेखोर किंवा ठटारू असं वणन बहु्या करण्यांत येतें, त्यांनी लुटीसाठीं केलेल्या अनेक स्वाऱ्या; त्यांत त्यांस सदेव मिळाळेळा विजय आणित्यामुळे त्यांना प्रात्त झालेली अमर्याद संपात्ते यामुळें वाचकांचे डोळे दिपावतात व त्यांस हें वर्णन खरं वाटूं लागतें. पण आपण हं विसरतों कौ महमूद आणि शिवाजी यांस वास्तविकपणें

दरोडेखोर किंवा लुटारू म्हणणें योग्य नाहीं. आणि या राब्दांनी जेव्हां.

त्यांचें वर्णन केलें जातें तेव्हां या शब्दांनी जो नेतिक अधःपात सुचेत होतो तो वगळूनच ते शब्द समजले पाहिजेत, खून आणि दरोडे हे काय- द्यानेंच नव्हेत तर नैतिक दृष्टीनेंहि ग्हणीय आहेत हें विसरतां कामा नये.

: अलेक्झांडर व दरोडेखोर ? यांची गोष्ट विनादपू्ण आहे परंतु तिनं प्रस्था-

3 १-० आ र

पित होणारे तत्व मात्र चुर्कांचे आहे. दरोडेखोर हा आपल्याच देशवांध- वांची संपात्ते बळजबरीने लुटतो तर अलेक्झांडर आपल्या शत्रूंचा प्रदेश ‘छुटीत होता आणि तो दरोडेखोराप्रमाणें नीति-दृष्टया दोषी नव्हता. ‘एखाद्या व्यक्तीने प्रजा होऊन एखाद्या सरकारची सत्ता कबूल करणें म्हणजे कोणत्याहि प्रसंगी आपल्या मनगटाच्या शक्तीचा उपयोग न करितां आपल्या फियीदींची दाद सरकारच्या मार्फत लावून कोणार्चीहि वस्तु कायदेशीर रीतीने घेईन, अन्य रीतीने घेणार नाहीं असं मान्य करणें आहे. व आपल्या अशक्त शेजाऱ्याची स्थावर किंवा जंगम भिळ- कत त्याच्या स्वतःच्या संमतीशिवाय किंवा कायद्याच्या मागाखेरीज आपण हिरावून घेणार नाहीं, किंवा केवळ संरक्षणाच्या कायदेशीर प्रसंगाखरीज दुसऱ्यास इजा करणार नाहीं, असा करार तो करितो; यामुळें ती व्यक्ति जेव्हां आपल्या प्रजाबन्धूंचा जीव अथवा मालमत्ता अन्यायाने हरण करिते तेव्हां ती खून किंवा दरोडा हा गुन्हा करिते आणि तिनें केलेला गुन्हा

महमूद शिवाजी लुटारू होते काय? १५९

पा संबंध या प्रमाणें व्यक्त किंवा अव्यक्त कबुलीवर अजून रचले गेले नाहींत, राष्ट्रांच्या व्यवहारांत पाशवी शक्तीचा किंवा मात्स्य-न्याय सर्व ‘इतिहासमर चालत आलेला दिसतो. या मात्स्यन्यायाने, म्हणजे मोठ्या राष्ट्राने लहान राष्ट्रावर केव्हांहि व कोणत्याहि कारणासाठी झडप घालावी ‘आणि त्याचा प्रदेश व संपात्ते यांचा अपहार करावा ही जी अनिष्ठ पर- परा सुरूं होते ती गेल्या युरोपीय महायुद्धाने सर्व राष्ट्रांच्या नजरेस स्पष्ट- ‘पणे आल्याने राष्ट्रसंघाची व्यवस्था अमलांत आली आहे व यापुढें । अशक्त राष्ट्रास स्वतंत्र राहण्याचा हक्क आहे हे मान्य होईल. पण मागील | काळांत परंपरागत रूढीनें ब लोकांच्या सामान्य समजुतीप्रमाणे प्रत्येक । बलिष्ठ राष्ट्राला बर्लर्हान राष्ट्रावर स्वारी करून त्याचा प्रदेश व त्याची । संपात्ते हिरावून घेण्याचा निार्ववाद हक्क असे, जरी एखादी अपवादक व्याक्ति । मी बलाचा उपयोग दुसऱ्याचे राज्य हरण करण्यास करणार नाहीं अक्या । उच्च तत्वाची इतिहासांत सांपडेल. ‘ नेशे बलस्येति चरेदघमम्‌! या । महाभारतोक्त महान तत्वाप्रमाणें चालणारी एखादी ‘मेरीया थेरेस्सा? । पोळंडबर स्वारी करणार नाहीं. किंवा एखादा अशोक कालेंग जिंक- । तांना लाख मनुष्ये मारलेली पाहून तीव्र पश्चात्ताप होऊन मी यापुढें । युद्ध करणार नाहीं, अशी प्रतिज्ञा करणारा राजा मिळेळ, पण या अपवा- | दवानें सामान्य नियम अधिक सिद्ध होतो आणि इतिहासांत बलिष्ठ राष्ट्र अशक्तास गिळंकृत करतानांच नेहमी दिसतात. भारतीय दिग्विजय तरी याच तत्वावर झाले. युद्धमान राष्ट्रास ठुटीचा हक्क तर पूर्वीपासून सववत्र _ मानला गेला आहे, लेल्या महायुद्धांत जमरनीनें फ्रान्सास लुटलेळं आपण पाहिळ आहे, अश्या लुटीमुळे दुबेळ राष्ट्राची बचावाची ताकद कमी होते व प्रबल राष्ट्राची चढाईची शाक्ते वाढते हं लक्षांत लिहिलें नाहीं, इंग्ल- डनें ही गोष्ट केक वेळां केली आहे. इंग्लंड व स्पेन यांचे दरम्यान युद्ध चाळू असतां ड्रेक व हॉकिन्स यांनी अमेरिकेहून सोनें भरून येणारी स्पेनची जहाजें कित्येक वेळां ठुटलीं आहेत. युद्धाची सबब नसतांहि ड्रेकनें चिली व पेरूची शहरें लुटली, परंतु इंग्रजी इतिहासकारांनी त्याच्या

८२. हे » 502 32:

या कृत्यावरून त्यास दरोडेखोर म्हणून संबोधिले नाहीं. हिंदुस्थानच्या

१६० गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

इतिहासांत इंग्रजांनी पॉँडीचरीस फ्रेंचांस लुटलं आणि १८५७ च्या बंडांत लढाईस उभे राहून वेढ्यांत पडलेलें झांशी शहर हस्तगत झालें, तेव्हां तेथील नागरेकांची कत्तल करून तें शहर लुटण्यांत आलें. पण असें असूनाहे हीं इंग्रजीची कृत्यें खून आणि दरोडे आहेत असे त्यांचें काय- द्याच्या किंवा नीतिशास्त्राचे दृष्टीनेंहि वणेन कारेतां येणार नाहीं किंवा त्यांचा अधिक्षेप कारितां येणार नाहीं. महमुदानें किंवा शिवाजीनें आपल्या प्रजांस तर कधींच लुटले नाहीं, हें ध्यानांत ठेवले पाहिजे. चोऱ्या कर- णाऱ्यांस त्यानें नेहमीं शासन केले आहे. शिवाजीला राजा या नात्याथें आपण करावयाच्या कतंव्याची जाणीव इतकी जाग्रत होती कां जेव्हां जेव्हां त्याच्या प्रजाजनास त्याचे किंवा शत्रूचेहि सेनिक ठुटीत तेव्हां तेव्हां तो त्यांच्या नुकसानीबद्दळ भरपाई करून देत असे. तात्पर्य शिवाजी किंवा महमूद यांचा इतिहासांत ठटारू किंवा दरोडेखोर म्हणून जेव्हां उल्लेख करण्यांत येतो तेव्हां त्या शब्दांचा जो स्वाभाविक निंदाव्यंजक अर्थ तो कधींहि आमिप्रेत नसतो हें पूर्णपणें घ्यानांन वागावेलें पाहिज. हे ध्यानांत ठेवलं पाहिजे कीं शिवाजीनें स्वराज्य स्थापनेच्या उच्च उद्देशानेहि खून कधींच केला नाहीं किंबा तो करण्यास कोणास प्रवृत्त केलें नाहीं आणि शिवाजीनें मोंगळ किंवा विजापुर राज्यांतील श्रीमंत शहरें लुटलीं तीं त्या राज्यांशी त्याचें युद्ध असतां व आपण स्वतंत्न राजे आहों अशी स्पष्ट बा प्रत्यक्ष राजसत्ता धारण केल्यावर लुटली हें लक्षांत ठेविले पाहिजे, अश्या रीतीचा लुटण्याचा हक्क वर सांगितल्या-

& चंद्रराव मोरे याचा खून शिवाजीन करविला अश्शी समजूत कित्ये- कांची व यदुनाथ सरकारचीहि आहे. पण ती चुकीची आहे. शिवाजीनें जावळीवर स्वारी केली तेव्हां मुख्य चंद्रराव मोरे हा दत्तक आलेला अज्ञान होता व तो रायगडला निसटून गेला हें आतां सिद्ध झालें आहे. त्याचप्रमाणे त्याचा दत्तक देणारा बाप लढाईत मारला गेला, प्रस्तुत स्थलीं ह्या विषयाचा ज्यास्त ऊहापोह न करितां चंद्रराव मोरे आणि शिवाजी हा मराठींत निबंध आम्ही लिहिला आहे तो वाचण्याची वाचकांस शिफारस करतो.

महमूद शिवाजी लुटारू होते काय? १६१

प्रमाणें युद्धमान राष्ट्र (1381]]112617611(8 ) यांनीं नेहमां चालविला आहे.

सारांश महमूद किंवा शिवाजी यांचे नेहमीच्या अर्थाने दरोडेखोर म्हणून वर्णन करणें ऐतिहासिक व तत्वज्ञानाच्याहि दृष्टीनें चुकीचे आहे. त्यांची कृत्यें राजा या नात्यानें दुसऱ्या राजाद्ी प्रत्यक्ष युद्ध करीत असतां झालेली आहेत. अथात्‌ त्यांस सामान्य कायद्याची किंवा नीतीची तत्वे लावतां येत नाहींत. राष्ट्राराष्ट्राचे व्यवहार प्राच्य देशांत व पाश्चात्य देशांत ज्या तत्त्वावर होतात, त्या तत्वानं बलिष्ट राष्ट्राचा क्षुलक कारणानें किंवा कारण नसतांहि बलहीन राष्ट्रावर स्वारी करण्याचा अधिकार मान्य केला

आहे आणि जित राष्ट्रास लुटण्याचा त्यानें अधिकार नेहमींच “चालविला

आहे. हजारो लोकांस महमुदानें जबरदस्तीने बाटावेलें हे कृत्य प्रत्येक मनु- ष्यास ईश्वराची भाई युक्त वाटेल त्या रीतीने करण्याचा हक्क आहे त्या हक्कास बाध आणणारें असल्यानें निंद्य आहे. हिंदूंचा देवळें किंबा मूर्ति फोडणें हे महमुदाचे कृत्यहि मानुष्यकाच्या उच्च दृष्टीनें रानटी धमंवेडाचं म्हणून निःसंशय निंद्य आहे. पण एकाराजानें दुसऱ्या राजाविरुद्ध युद्धांत केलेलें कृत्य कायदा किंवा नीति यांच्या दृष्टीने दूष्यम्हृणतां येत नाहीं. आणि जरी या कृत्यांत कित्येक संस्मरणीय उत्तम वसञाचा नारश॒ झाला तरी महमुदास सुद्धां शिवाजीची दरोडेखोर संज्ञा लावितां येणार नाहीं असें मत नमुद करणें आम्हास भाग आहे.

म…भा, ११

प्रकरण सोळावें. पंजाब-काबूलचा उच्छेद-भासणारीं कारणें.

सिंधचा उच्छेद महंमद कासमच्या नेतृत्वाखाली अरबांनी केला (इ. स. ७१२), पंजाबचा उच्छंद महमुदाच्या नेतत्वाखाली तु्कानी केला (१००९), आणि उत्तर हिंदुस्थानचा उच्छेद महंमद घोर्राच्या नेतत्वाखाळीं अफगणांनीं केला ( ११९३ १२०० ), या प्रत्यक

उच्छेदाचीं कारणें एकच नव्हती म्हणजे वस्तुतः फारच निरनिराळीं होती. भाग २ मर्ध्ये आम्ही सिंधच्या ऊच्छेदाच्या कारणांचा विचार केला. आणि आपल्यास असे दिसलें कीं, सिंधचा उच्छेद मुख्यत: चचच्या कांहीं मांडलिक राजांच्या फितुरीपणामुळें. आणि बौद्ध लोकांच्या : मनोदोबल्यामुळे झाला. त्यावेळीं जसें सिंधवर एका ब्राह्मणाचें राज्य : होते,त्याचप्रमाणें यावेळीं पंजाबत्रर एक ब्राह्मण राजा राज्य करीत होता. परंतु दाहर आणि आनंदपाल हे दोघेहि रजपुतांच्या शोयानें लढले. हीं दोन्ही ब्राह्मण राजकुलें आचरणाने क्षात्रियच होती, आणि प्राचीन काळापासून म्हणजे महाभारतयुद्धांत लढणाऱ्या द्रोणापासून अली कडच्या पेशव्यापर्यंत ब्राह्मण राजे व सरदार क्षत्रियांइतकेंच शोर्यानें लढत आले आहेत. किंबहुना उत्तर हिंदुस्थानांतील पांडे वरे ब्राह्मण | शिपाई इतर शिपायाप्रमाणेंच ब्रिटिश फोजेंत शूरत्वानें लढले. दैवी चमत्काराने जो अपघात दाहरवर येऊन पडला. तोच आनंदपाल याजवर त्यांच्या अत्यंत जोरानें चालविलेल्या युद्धांत येऊन पडला आणि जसा दाहरचा हत्ती रणांगण सोडून पळाला तसा आनंदपालाचाहि पळाला. दाहरचा हत्ती तर मुळींच, न॒ थांबता एका सरोवरांत जाऊन पडला, आणि त्यानें

पंजाब-काबूलचा उच्छेद-भासणारीं कारणे. १६३

आपला ताप पाण्यानें हामन करीत असतां, दाहरला तलावांत फेकून देले. पण असले अपघात प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यांत घडतात. ते उच्छेदाचें खरे हेतु मानतां येत नाहींत. पूर्वी सांगितल्याप्रमाणें या जगताच्या घडामोडीत सर्वव्यापी आणि सर्वावर ताबा करणारा दैवाचा ग्रागा चाललाच आहे. यासाठीं कारणांची ऐतिहासिक मीमांसा करि- नांना दैवास विचारांतून वगळळें पाहिजे. सिंधच्या आणि पंजाबच्या रिस्थतींत वरील दोन गोष्टी एकच असल्या तरी पंजाबच्या उच्छेदाची वरीं कारणें सिंधच्या उच्छेदाच्या कारणांहून भिन्न आहेत. कोणी हेंदु राजानें किंवा सरदारानें दगलबाजी केली असे पंजाबच्या इते- सांत आपल्यास आढळत नाहीं. कदाचित्‌ मुसलमान इातेहासकार उतत्री हा महमुदाचा चिटणीस असल्यानें त्यास सर्व गुक्षे ठाऊक भसूनहि याचा उल्लेख त्यानें आपल्या बखरींत मुद्दाम केळा नसावा.तथापि याअर्थी सिंधचे मुसलमान इतिहासकार सुद्धां हिंदूंच्या फितुरी गोष्टी ठेहितात त्याअर्थी असा उल्लेख पंजाबच्या इतिहासांत नसल्यानें, पंजा- च्या उच्छेदाच्या कारणांत राजद्रोहाचा समावेश करितां येणार नाहीं, भस म्हणण्यांस हरकत नाहीं. त्याचप्रमाणें पंजाबमध्ये धर्मभेद नव्हता र्थीतू त्यापासून उत्पन्न होणारें मनोदोर्बल्याहि नव्हतें. दुसऱ्या ॥गाच्या शबटल्या प्रकरणांत वर्णन केल्याप्रमाणें हिंदुस्थानांत यावेळीं [वंत्र एकच धमे म्हणजे हिंदुधर्म नांदत होता. आणि वैष्णव आणि वया मतांच्या भांडणानें हिंदुधर्मीची जी त्रिस्थळीं धांदल पुढें उडाली, हवि भांडणे यावेळीं नव्हती. ल्या भागांत सांगितल्याप्रमाणें देशांत एकच ॥म॑ असल्याची जी अत्यंत सुखी अवस्था ती यावेळी दिंदुस्थाना गोर्गीत होता. कारण बौद्धधर्म यावेळीं नष्ट झाला होता आणि मुस- मानी धम अद्याप दूर होता. दुसर्‍या अनेक बाबतीत या दहाव्या ॥तकांत भारतदेश सुखीं होता.व सामर्थ्य आणि उत्कर्ष यांच्या परमा- ॥धीस पोहोचला होता. अर्थात्‌ डोंगराच्या शिखरावर पोहोंचलें म्हणजे

ति

१६४ गझर्नांच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

जसा पुढें उतारच लागतो ल्याप्रमाणें हिंदुस्थानाच्या वैभवास निसर्ग- नियमानेंच उतार लागला. हा उतार कोणत्या रस्त्यांनी लागला हें सांगण्याचे काम इतिहासकारांचें आहे

या उताराची निरनिराळ्या ग्रंथकारांनी निरनिराळीं कारणें सांगि तलीं आहेत. आणि लोकहि निरनिराळी कारणें समजतात. परंतु हीं कारणें पंजाबांत बहुतेक मुळींच नव्हती, किंवा तीं खरीं कारणें होऊं शकत नाहींत, असें आमचें मत आहे. उदाहरणाथ लेनपूळ म्हणतो, ‘* एकी आणि भांडणे, उत्तर आणि दक्षिण, वंश आणि हवापाणी या बाबतींत दोन्हीकडे विरोध असून, त्यांत आणखी मुस- लमानांचा धार्मिक उत्साह आणि ठुटारूचा लोभ यांची भर पडली” फ्रेंच इतिहासकार सचाऊ म्हणतो कीं, “’उत्तरहिंदुस्थानचे राजे इतके अदूरद्षष्टि होते कीं, त्यांस भावी संकट दिसळें नाही, आणे ते एक झालें नाहींत ( अल्‌बेरूनीच्या भाषांतराची प्रस्तावना पहा ). सर- देसाई यांचें मत असें आहे कौ, “ हिंदुस्थानांत लहान लहान राज्यें असून तीं एकमेकांत नेहमीं भांडत असतात, हें महमुदानें जाणले शिवाय ल्याजजवळ मोठी फौज असन तिचा खर्चे चालविणे, व तिचा कोठेतरी उपयोग करणें त्यास प्राप्त होते’‘.पण हीं निरनिराळीं मतें साधार नाहींत असं आम्हांस वाटतें तें कसं याचा आपण विस्तार- पूवक विचार करूं.

हिंदुस्थानांतील हिंदु राजांना भावीसंकटाची कल्पना नव्हती. आणि ल्यांनीं एर्कानें विरोध केला नाहीं, ही कल्पना मुळांतच अवास्तव आहे व ही गोष्ट मुसलमानांनींच लिहिलेल्या इतिहासा- वरून दिसते. हिंदुस्थानच्या सरह्ृदीवर एक नवा भयप्रद धर्म येऊन थडकला,आणि त्यानें इ. स. ७१२ मध्यें सिंध खाला, त्यावेळींच मेवार आणि सांबर यांतील पहिल्या रजपूत वरांच्या नेतृत्वाखाळी, ( भार दोन पान ८ यांत दाखाविल्याप्रमाणें) हिंदूंनीं अरब लोकांस जोराच

पंजाब-काबूलचा उच्छेद्‌-भासणारीं कारणे १६

प्रतिकार केला, आणि त्यांचा पूर्वेकडील आक्रम कायमचा बंद केला तीनशे वर्षानंतर तुक लोक नव्या धर्मांतराच्या धमेवेडाने प्रोत्साहित ‘ होऊन गझनी येथें येऊन स्थिर बसले व तेथून हिंदूस त्रास देण्यास आणि त्यांच्या देवळांचा विध्वंस करण्यास त्यांनीं प्रारंभ केला. पण ‘ याहि पूर्वी सुमारें ६० वर्षे भावी संकटाचा अनुभव हिंदू लोकांस ‘ आला. कारण याकूब-इ-लेस यानें जेव्हां जाबुलिस्थान घेतलें, तेव्हां ‘ ह्याच्या अधिकाऱ्याने सखावंद या शहरांतील एक प्रलिद्ध हिंदु देवा- ‘ लय पाडून टाकिले, आणि काबूलचा ब्राह्मणशाही राजा कमलु या ‘ धर्मोच्छेदक कृत्याने चकित झाला ( इलि २ पा. १७२ ). तात्पय ‘ हिंदु राजांना बऱ्याच वर्षांच्या अनुभवानं भावी संकटाची कल्पना ‘ पूवीच आली होती. आणि त्यांनीं तीनदां एकत्र होऊन महमुदाच्या सेन्यापेक्षां मोठी सैन्यें त्याच्या विरुद्ध जमविली. पण तिन्ही नामोइ- रम झालीं. तेव्हां हिंदु राजे संकटाज्ञानांत घोरत पडले होते, आणि त्यांनी एकी केली नाहीं ही कल्पना ऐतिह्याच्या विरुद्ध आहे. याहि पुढें जाऊन असें म्हणतां येतें कीं, हिंदुराजांनीं एकवट्टून लढण्याची अवऱ्यकताच नव्हती. हिंदुराज्यें यावेळी लहान होतीं ही ॥ कल्पना अवास्तव आहे. पंजाब व काबूल मिळून शाही राज्य सबु- क्तगीनाच्या किंवा खुद्द महमुदाच्या प्रारंभीच्या लहान गझनी राज्या- पेक्षां कितीतरी मोठें होतें ! शाहीराज्य जर योग्य तयारींत असतें ‘ तर त्या एकट्या राज्यास गझनींचा विध्वंस करण्यास राक्‍य झालें ‘ असतें. याहिपेक्षां कनोजचें राज्य विस्तीण आणि सामर्थ्यवान्‌ होते किंबहुना आरब प्रवाशांनींच लिहून ठेविळें आहे कीं, कनोजच्या राज्यांत चार फौजा नेहमीं जय्यत चार दिशास असत. आणि त्या इतक्या सामथ्येवान्‌ होल्या कौ, त्यास मुलतान घेऊन सिंधमधून अरबांस हांकून देतां आले असतें. चेदेछ राजा धंग याचें राज्यहि कांहीं लहान नव्हतें आणे कनोजचा राजा राज्यपाल याचा प्रसिद्ध

१६६ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

भोज याच्या तुलनेने त्याचा जरी अगदीं अधःपात झाला होता तरी कालंजर व ग्वाटेर किल्ल्यांचा राजा धंग इतका शूर व शक्तिमान्‌ होता कीं, त्याने एकटयाने महमुदाचा नाश केला असता. तात्पर्य महमुदाचेच राज्य यावेळी लहान होते, आणि त्याचीच फोज यावेळीं थोडी होती याची जाणीव पुष्कळांस नाहीं. त्याची फौजाहे एकाच जातीची व लोकांची नव्हती. तींतील शिपायी तुक, अफगाण, कर्द, आणि परियन अशा जातीचें असन या लोकांत आपसांत भांडणे नेहमीची असत तात्पयं महमृद एकाच जातीचं असंख्य लोक घेऊन जांगेसखान किंवा तैमूर लंग जसा सात किंवा चार लाख मोगल स्वार घेऊन वावटळाप्रमाणें अशियाखंडांत कास्पियन समद्रापासन सिंधुनदापर्यंत देश उघ्वस्त करीत व पांचशे वर्षाताहे दुरुस्त होणार नाहीं, इतका नाश पांच वषीत करीत आला, तसा आला नव्हता. महमुदाची फौज जयपा- लाच्या फौजेच्या मानानें पहिल्या मोठ्या लढाईत लहानच होती. किंबहुना ती आनंदपालाच्या दुसऱ्या लढाईतील फौजेच्या मानानेहि लहान होती, असें मुसलमानी इतिहासावरून दिसतं. तीहि हिंदु- फोजेपक्षां जास्त एकजीवाची होती व तेणेंकरून एकी आणि भांडणे यांचा विरोध ठेनपूलनें म्हटल्याप्रमाणे दोन्ही पक्षांत होता असें मानतां येत नाहीं. त्याचप्रमाणें उत्त, आणि दक्षिण हाहि विरोध नव्हता. किंबहुना काबूलच गझनीच्या उत्तरेस आहे आणि काबू- लच्या जयपालाचे शिपाई अद्याप न बाटलेळे असे अफगाणच होते आणि हे न बाटलेळे अफगाण मुसलमान झालेल्या अफगाणापेक्षां कमी शूर होते असे मानतां येणार नाहीं. तुक आणि आर्य असा वंरा- भेद असला तरीहि दोन्ही फौजांच्या युद्धसामर्थ्यांत कांहीं फरक पडतो असें आम्हांस वाटत नाहीं. उत्तरेकडील रानटी लोक, तुक व अफगाण, पंजाब आणि राजपुताना यांतील आयोपेक्षां जास्त ग्र व कष्ट सोसणारे अशी एक भ्रांत साधारण समजूत दिसते. अब-

पंजाब-काबूल्चा उच्छेद-भासणारीं कारणं. १६७

दालीच्या अफगाणांनीं पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा जो पराभव केला, त्याचे एक कारण अशा प्रकारचा वंशभेद होता हे संभव- नीय आहे. मराठ्यांपेक्षां अफगाण शारीरबलानें, शूरत्वाने आणि क्रोयीने अधिक आहेत ही गोष्ट आमच्या मतं कबृळ केली पाहिजे पण सिंघनदीपलीकडील तुक ब अफगाण आणि पंजाब व राजपु- ताना यांतील आर्य यांच्यांत अश प्रकारचा फरक पूर्वी होता किंवा हृीं आहे, असें इतिहासावरून किंवा हल्लीच्या पारोिस्थितीवरून दिसत नाहीं. पंजाबचे जाट व रजपूत, मग ते शीख, हिंदु किंवा मुसलमान असोत, हिंदुस्थानांतीलच नव्हे तर सर्व जगांतील उत्तम शिपायांत गणळे जातात. आणि हे जाट व रजपूत महमुदाच्या काळीं सर्वच हिंदु होते. ब्रिटिश हिंदी सेन्याच्या भरतीचा मुख्य प्रदेश हछीहि पंजाब आहे. अमृतसर गेझेटियरमध्यें म्हटलें आहे कीं (पान ३३ ), “ मांझा प्रदेशांतील शीख जाटांत असे लोक सांपड- तात कीं, ते जगतांतील कोणत्याहि देशांत मानबी जातीचे उत्तम नमुने म्हणून मानठे जातील. राजपुतान्यांतील रजपुतांविषयी म्हणावें तर, तुक ब अफगाण, मोगळ व पर्दियन यांच्याही] झाठेल्या अनेक लढायांत त्यांनीं आपलें नांव गाजविळें आहे, जसवंतसिंगाच्या राठो- डांनीं अवरंगजेबाच्या वेळीं कित्येक वर्षे अफगाणिस्तानावर ताबा चालविला आहे.तात्पय शारीरिक सामर्थ्य आणि शोय यांच्या बाबतींत जयपाल आणि आनेदपाल यांचे शिपाई महमुदाच्या तुक व अफ- गाणापेक्षां हीन होते असं कधींहि म्हणतां येणार नाहीं.

पंजाबच्या उच्छेदाची कारणमीमांसा स्पष्टपणें न कारितां सर व्हिन्सेन्ट स्मिथनें पुढील वाक्यांत कांहीं कारणें सूचित केळी आहेत. “: घर्म, सामाजिक रीति, कल्पना आणि लढाईची तर्‍हा या बाब- तींत अगदीं नवीन असलेली एक परकी शाक्ति हिंदुस्थानच्या रंगा- वर या वेळीं अवतीर्ण झाली, ” ह्या वाक्याचा विचार करितां प्रथम

१६८ गझनीच्या महसमुदाच्या स्वाऱ्या.

हें मान्य केळें पाहिजे कीं, शस्त्राख्रांचे वैशिष्टय आणि फौज चाल- विण्याच्या विशेष रीति हें एका राष्ट्रचें दुसऱ्या राष्ट्रावर वर्चस्व स्थापित होण्यास महत्त्वाचें साधन आहे. शास्त्र आणि शिस्त यांतं ब्रिटिश फौज हिंदुफोजेपेक्षां अधिक सुधारली असल्याकारणानें ब्रिटनपुढें हिंदुस्थान केव्हांहि पडणारच होतें. परंतु यावेळीं मुसलमानांच्या बाजूस हें कारण अनुकूल खचित नव्हतें. महमुदानें तोफांचा उप- योग केला या फिरिस्ताच्या म्हणण्यांत अनंक्र।निझम्‌ ( कालवैपरीत्य) आहे. अशाच तऱ्हेने तो महमुदाविरुद्ध . लढण्यास दिल्ली व अज- मीर येथील राजे आले होते असा कालविपरीत निर्देश करिता. ज्या- प्रमाणे दिल्ली व अजमीर या राजधान्या महमुदाच्या वेळीं अस्तित्वां- तच नव्हत्या, तशा तोफाहि नव्हत्या. एन्‌सायक्कोपीडिया ब्रिटानिका- मध्ये “ गनपौडर!” ( बंदुकीची दारू ) या शब्दाखालीं जी माहिती दिली आहे, त्यावरून पुढील विधानें करितां येतात. ( १ ) बंदु- काच्या दारूचा शोध एका जमनानं इ. स. १२४५ मध्यें लाविला किंवा राजर बेकननें इ. स. १२२५ मध्यें लाविळा असे मानतात. (२) या दाख्चची माहिती प्राचीन ग्रीक, हिंदु किंवा अरब लोकांस

नव्हती. ल्यास बभकणारी वस्तु उत्तन करण्याची एक रीत माद्दीत होती, व ते तिचा उपयोग लढाईत करीत. पण ( एक्सठोजिव्ह ) स्फोटक मिश्रणाची त्यांस माहिती नव्हती आणि बंदुका किंवा तोफा त्यांजजवळ नव्हत्या. ( ३ ) हिंदुस्थानांत स्फोटक दाख्तचीं शस्त्रे उपयोगांत आणल्याचा पहिला दाखला इतिहासांत पानिपतच्या लढा- इत बाबरनें केल्याचा आढळतो. ( ४ ) पश्चिमेकडेह्दि तोफांचा प्रथम उपयोग क्रूजझेडमध्ये इ. स. १०२८ पासून इ. स. १२०० पर्यंत आढळत नाहीं. यावरून आपल्यास असें खात्रीनें म्हणतां येतें कीं, महमुदाजवळ अग्न्यस्रें नव्हतीं आणि हिंदूमप्रमाणेंच त्याचीहि भिस्त साध्या शास्त्रांवर, तलवारी, बच्यी आणि भाळे यांवरच होती, मुसलमान

पंजाब-काबूलचा उच्छेद-भासणारीं कारणे. १६९

बखरकार या शास्त्रांचींच वर्णनें काव्ययुक्त करितात ( इली. २ ), हे उतूबी व बैहकी यांच्या लेखांवरून दिसून येतें. किंबहुना शस्त्रांचे । वर्चस्व जर असेल, तर तें हिंदूच्या बाजूसच होतें. असें स्पष्ट दिसतें ‘ कीं, हिंदूंना उत्तम पोलाद करण्याची कला अवगत होती. दिल्ली येथीळ लोहस्तंभ कसा बनविला याचें अर्लांकडील शास्त्रज्ञांस गढच आहि. हवा, पर्जन्य खाऊनाहि तो मुळींच गंजत नाहीं, अशा बना- वटीचें लोकांस आश्चर्य वाटतें. महमुदाचे शिपाई हिंदुस्थानच्या तर- वारीस फार चहात. उतूबीने काव्यमय वर्णन करतांना एका तुर्की शिपायाच्या तलवारीकडून “ मी उत्तम कुळांतीळ एक हिंदु आहे असें वदविळें आहे (पान २१६ ). अर्थात्‌ येथें हिंदुस्थानांत केलेल्या तलवारीचे पोलाद जास्त चांगलें असं या गोष्टीकडे इशारा आहे. आपल्यास असेहि दिसून येतें कीं, रणभूमीवरीळ ठुटींत मारल्या गेलेल्या हिंदु शिपायांच्या तरवारी व इतर हत्यारें यांकडे मुसलमानांचे विदोष लक्ष असे. ( पंजाबांत काला-बाग येथें अद्याप लोखंड निघतें आगि भेरा व निजामाबाद या शहरांची तेथें तयार होत असलेल्या उत्तम तरवारीबद्दल अद्याप ख्याति आहे. या तरवारींचे नमुने लाहोरच्या म्युझियममध्ये पाहण्यास सांपडतात ), फौजेच्या शिस्तीचे मुसलमानाकडे वैशिष्ट्य होतें आणि हल्छोंच्या- प्रमाणें कवाइती पायदळ फलटणा होल्या, असें आम्हांस वाटत नाहीं. धोडे मुसलमानाकडे अधिक चांगळे असतील; कारण अफ- गाणिस्थान व पर्शिया ह्या देशांत चांगळे घोडे निपजतात हें राज- शेखरानेंहि लिहिलें आहे. पण राजपुतान्यांतहि निपजळेले घोडे वाईट नसतात; आणि अरबस्थान व पाशिया येथील घोड्यांची आयात त्या वेळींहि पुष्कळ असे, कनोजचे प्रतिहार सम्राट राजपुतान्यांतील मूळचे असल्यानें, आपल्या घोडदळाबद्दल प्रसिद्ध होते. आणि त्याम- ळेंच त्यांस ह॒यपति ही संज्ञा होती, हें आपण पाहिळेंच आहे. या-

१७० गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

शिवाय हिंदूकडे सेन्याचें एक जबरदस्त अग अधिक होतं. मुसल- मानाकडे हत्ती मुळींच नसून हिंदूकडेसच ते होते. पुढच्या काळांत तुकानांहि ह्या अंगाचा लोभ उत्पन्न झाला व त्यांनीं ते वाढविले. कारण सबुकू-तगीन व महमूद यांनीं काइगारच्या तुकाविरुद्ध हत्ती उपयोगांत आणल्याचा आणि फायदेशीर रीतीनें आणल्याचा दाखला आपल्यास सांपडतो ( उतूबी ), सांगण्यास चमत्कार वाटतो कीं, महमुदाच्या तुकाविरुद्ध हिंदूस हत्तींचा उपयोग फायदेशीर रीतीनें करतां आलां नाहीं; पण महमुदास त्याच हत्तींचा उपयोग इठेकु- खानाच्या तुकोंविरुद्ध फार परिणामकारक रीतीनें करतां आला. ही गोष्ट महमुदाच्या उत्कृष्ट सैनापत्याची ब हिंदु सेनापतींच्या कमी कोशल्याची साक्ष पटविण्यास पुरे आहे. महमुदानें हें हिंदु सैन्याचे अंग कसं निरुपद्रवी केळे, याचें वर्णन मुसलमानी प्रंथकार करीत नाहींत. अलेक-झांडरनें पोरसचें गजसेन्य कसें नामोहरम केटें, याचें वर्णन ग्रीक इतिहासकार देतात. हेंहि आणखी सांगितलें पाहिजे कीं; सबुक्‌॒ तगीन व महमूद यानीं हत्तींचा उपयोग आपल्या सैन्यांत करूं लागल्यावराहि हत्तींचे महात हिंदूच असत. गझनी येथें पुर्ढाल एका राजाच्या वेळीं हत्तींचे हिंदु महात आपल्या कामांत गाफिल राहिल्यामुळे त्यांस जबर शिक्षा केल्याचा दाखला इतिहासांत मिळतो ( बैद्की ). हल्लीं ही कला हिंदूंमधून नष्ट झाली असून हत्तींचे स्व महात हल्लीं मुसलमानच असतात ही चमत्कारिक गोष्ट नमूद कर- ण्यासारखी आहे ( इली. २ पा. १४२३ ).

वरील सर्व ह॒कीकतीवरून तुकांची लढण्याची पद्धातिे कशी निराळीं होतीं हं दिसून येत नाहीं. मात्र तुक जिंकलेल्यांना जास्त निर्दयतेनें वागवीत हा फिरक दिसतो. सवे जगतांतील लोकांत हिंदु- लोक जिंकलेल्या लोकांना अत्यंत सदयतेनें वागवीत असे इतिहास निःसंशय सांगतो. महमुदाचे तुक जशी लढवय्ये लोकांची बहुधा

पंजाब-काबूलचा उच्छेद-भासणारीं कारणे, १७१

कत्तळ करीत तशी कत्तल हिंदूंनी कधींहि केली नाहीं. महमूद क्रूर नव्हता असे जं आम्ही पूर्वी म्हटलें आहे, तें इतर मुसलमान जेत्यांच्या तुलनेने, विशेषतः मोगळ जंगीजखान किंवा तैमूर यांच्या तुलनेने म्हटळें आहे. हिंदु जेत्यांच्या तुलनेनें पाहिलें असतां, महमुदाची पद्धत हिंदुस्थानच्या अधिक सदय लोकांच्या अन्तःकरणांत धडकी भरविणारीच होती. लढणारे लोक बहुधा कत्तल केळे जात, निरपराधी लोक गुलाम केळे जाऊन दूर देशीं पाठविळे जात आणि गांव व शहरं उध्वस्त केली जात. युरोपांतहि प्राचीन व हल्लींच्या काळींसुद्धां हिंदु कालांतील लढायांपेक्षां जास्त क्रूर- तेने युद्धे होतात असं म्हणावें लागतें. ग्रीक व रोमन लोक तर जिंक- ठेल्या लोकांशीं फारच क्रूरतेने वागत आणि कत्तल व गुलामगिरी हे लढाईतीळ पराजयाबरोबरचे नेहमीचेच परिणाम असत. या दृष्टीने पाहतां महमुदाची लढाईची पद्धत नवीन होती. परंतु पंजाबाच्या उच्छेदाचे कारण हं मानतां येणार नाहीं. कारण हिंदु फौजा प्रथम कां जिंकल्या गेल्या याची आपण मीमांसा करीत आहा; कदाचित्‌ एका लढाईंत जिंकल्या गेल्यानंतर जो परिणाम हिंदूंस भोगावा लागला, त्याने पुढील लढायांत हिंदु शिपायांचें मनोधेय खचणें राक्‍य आहे.

तुकाच्या व हिंदूंच्या राजकीय कल्पना एकाच तऱ्हेच्या होत्या. प्रातिनिधिक संस्थांची फार प्राचीन काळीं कदाचित्‌ हिंदूंना कल्पना असेल. पण या वेळीं दोघांनाहि प्रातिनिधिक राज्यपद्धाते, लोकांचे हक्क किंवा राजांचा जबाबदाऱ्या यांची कल्पनाच नव्हती. त्यांना एकच राज्यपद्धति ठाऊक होती, ती अनियंत्रित राजसत्ताक होय. अवोचीन काळांत राष्ट्र अथवा लोक यांची जी कल्पना उत्पन्न झाली आहे, त्याच! त्यांस गंधहि नव्हता. अर्थात्‌ राष्ट्रीयत्व किंवा स्वदेश- भाक्ते ही भावना त्यांस मुळींच नव्हती. राजवंशांत जन्मल्याने राज्य पद मिळे, किंवा युद्धांत जयरूपानें प्रकट झालेल्या परमेश्वरी कृपेचे

१७२ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

फळ राज्यपद असं मानीत. यामुळे राष्ट्रीयत्वाच्या आणि स्वदेश- प्रीतीच्या उच्च प्रेरणेनं गेल्या युरोपीय महायुद्धांत जमन आणि फ्रेंच जसे लढले, तसे महमुदाचे तुक किंवा जयपालाचे हिंदु लढले नाहींत. तात्पय चिकाटीची लढाई राष्ट्रीय भावनेने प्रेरित होऊन केल्यानें तुकांस नेहमीं जय मिळत गेळा असे म्हणतां येत नाहीं. अशी भावना तुकांत नव्हतीच. ते महमुदासाठीं लढत होते, राष्ट्रा- साठीं नव्हे. मुहम्मदी-ध६मीचा उत्साह स्वदेशप्रीतीच्या जागीं होता हें खरें आहे. नवीन धर्मांतर केलेल्या तुर्क ब अफगाण लोकांचा धर्मोत्साह महमुदाच्या विजयाचे एक कारण निःसंशय होतें. परंतु हा धर्मोत्साह म्हणजे कल्पनांचे नावीन्य नव्हे. आणि जर हिंदूचा तितकाच प्रबळ धर्मोत्सह त्यास आडवा आला असता तर पंजा- बच्या उच्छेदाचें कारण तो होऊं शकता ना.

शेवटीं ही गोष्ट सांगावयाची कीं तु्कांच्या चालीरीतींताहे असें कांहीं नावीन्य नव्हतें कीं तं हिंदूंच्या अपजयाचें कारण होऊं शकेल तुके आणि हिंदू यांच्या राजकीय कल्पना जश्या सारख्या होत्या तशा त्यांच्या चालीरीतीहि सारख्याच होत्या. पंजाब आणि काबूलचे हिंदु त्यावेळीं मांसाहारीच होते. हींहि हिंदुस्थानच्या इतर प्रांतां- पेक्षां पंजाबांत मांसाहाराचा प्रघात अधिक आहे, पंजाब काबुलांतील हिंदु त्यावेळीं गोमांस-भक्षक नव्हते ही गोष्ट खरी आहे, पण काबुल-पंजाबाच्या पराजयाचें हें एक कारण असेल असें आम्हांस वाटत नाहीं.

िओशशशशसकसासवपाफ्ेओेयझह््ससस्सस्र्स उ

प्रकरण सतरावे. पंजाबचा-काबूलचा उच्छेद–संभवनीय कारणें.

राष्ट्र. लोक किंवा राज्यें यांच्या नाशाचीं कारणें हा एक अल्यंत
खोळ विचाराचा पण मनोरंजक प्रश्न प्राचीन व अर्वाचीन इतिहास-
कारांपुढें असतो; आणि निरानेराळ्यां प्रसंगीं इतिहासकार निरनि-
राळे सिद्धांत बांधतात. अर्थात्‌ हे सिद्धांत सर्वव्यापी असू शकत
नाहींत. ग्रीसचा उच्छेद रोमनें केला, रोमचा गॉथ लोकांनीं केला,
आणि कॉनस्टॅनटिनोपलचा तुकोनीं केला; या तिन्ही प्रसंगीं निर-
निराळी परिस्थिते होती. साहजिकच तिन्ही नाशाचीं कारणें
निराळीं मानलीं पाहिजेत. याचप्रमाणें हेंदुस्थानांतहि सिंधच्या
इ. स. ७१२ मधील, पंजाबच्या इ. स. १०९९ मधील, उत्तर
हिंदुस्थानच्या इ. स १२०० मधील. आणि दक्षिण हिंदुस्थानच्या
इ. स. १३०० सुमारें झालेल्या नाशांचीं कारणें निराळीं आहेत.
आणि हिंदुस्थानच्या इतिहासकारापुढें या प्रत्यक प्रसंगीं निरनिराळीं
असलेलीं नाशाचीं कारणें काय आहेत हें दाखविण्याचे कठिण काम
उभें असतें. असे जरी आहे तरी रोमन बादशाहीच्या ऱ्हासाचा
प्रसिद्ध इतिहासकार गिबन याचे सामान्य विचार शाश्वत महत्त्वाचे
आहेत. आणि ल्यांत कित्येक सिद्धांत असे आहेत कीं, ते सर्वत्र
लागू पडतील. पश्चिमेकडील रोमन बादशाहाच्या अंताचीं कारणें
पंजाबच्या उच्छेदाला जीं कारणें सांगतां येतात त्याहून भिन्न असली
तरी गिबनचे विचार आपल्या या मीमांसेच्या प्रसंगीं बरेच मार्गदर्शक
होतील, यासाठीं ते आम्ही येथें उध्दत करतों.

रोमचे सुदैव हेंच प्रीसच्या दुर्देवाचें कारण ! असें साहजिक मानण्याकडे प्रवृत्ति होते, [तिचा प्रथम विरोध केला पाहिजे. तो

१७४ महसुदाच्या गझनीच्या स्वाऱ्या.

ग्रीक लोकांचा मोठा इतिहासकार पोलिबियस्‌ यानें रोमच्या राज्यव्य- वस्थेचें अद्वितीय गुण आणि रोमच्या मोठेपणाचीं खोळ कारणें वर्णन करून केला आहे. या राज्यव्यवस्थेंत लोकांच्या सभेची स्वतंत्रता आणि सानेटचे(वरिष्ट लोकांच्या लोकसभेचें)शह्माणपण व त्याच प्रमाणे बादशहाचा अमलबजावणीचा अधिकार यांची योग्य सांगड घात- ठेली आहे. प्रल्यक नागारिकानें दहा वर्षे देशाच्या सेवेसाठी फोजेत नोकरी केलीच पाहिजे अशा निबेधानें नेहमीं फोजेत तरुण व स्वातंत्र्याप्रेय शिपायांचा सारखा ओघ कसा येत असे, रोमच्या फौजी रिस्तेत मासेडोनियन लोकांच्या फेटँक्स पेक्षांहि रोमन ठिजन्‌ ही प्रत्यक्ष काम करण्यास अधिक क्षम कशी होती, हें त्याने दाखविलें आहे. तात्पय पॉलिबियसच्या मतानें शांतता व युद्ध या दोहीं वेळीं अमलांत असलेल्या विशिष्ट राज्यब्यस्था यानींच रोमन लोकांना भीतिशून्य व आलस्यरहित करून नेहमीं विजय मिळत असे. सर्व जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा रोमन लोकांनीं धरली, आणि सिद्धीस नेली. यांत न्यायाचा जो श्वाशत नाश होत असतो, तो शहाणपणा आणि शौर्य या दोन राजकीय सद्गुणांच्या जोरानें चालविला’’ असें होतं तरी सुद्धां रोमन राष्ट्र ल्यास गेळें. “ अतिशय वाढ होणें याचा हा सहज आणि अपरिहार्य परिणाम आहे. वैभवांत ऱ्हासाचीं मुळें उत्पन्न होतात. नाशाचीं कारणें नवीन नवीन विजयाच्या वाढींत वाढतात. दूरदेशाच्या लढाइत विजयी फळटणें भाडोत्री शिपायांचे दुर्गुण शिकळे. आणि व्यांनीं प्रथम रोमचें प्रजासत्ताक राज्य गाडून पुढें बादशाहीचाहि अंत केला. ज्या शिस्तीमुळें फलटणी आपल्या शत्रूस, भयप्रद होत त्याचप्रमाणें आपल्या राजास झाल्या. ती शिस्त बिघडून टाकण्याची युक्ति बादशहास अमलांत आणावी लागली. आणि फोजी राज्यव्यवस्थेचे नियम ढिले पडून रोमन बादशाही रानटी लोकांच्या पूरांत गडप झाली. ”

पंजाबचा-कावूलचा उच्छेद-संभवनीय कारणें. १७५

५ रोमन राज्यांत खिस्ती-धर्माचा शिरकाव, व निदान या वेळीं झालेला खिस्तीधमीचा ऱ्हास याचाहि कांहीं संबंध रोमन बादशाही- च्या अंताशीं आहे. खिस्ती धर्मोपदेशक सहनशीलतेचा आणि मनो- दोबल्याचा उपदेश करूं लागळे. अर्थात्‌ लोकांस कार्यक्षम करणारे सद्‌गुण कमी लेखण्यांत येऊं लागले. शलर्यादि स्फू्तीचा जो थोडा अवशेष होता तो मठांत पुरला गेला. सरकारी आणि सावकारी वित्ताचा मोठा भाग भक्तीच्या व दयाधर्माच्या कामांत खर्चे होऊं ‘ लागला. जो पगार शिपायांवर खच व्हावयाचा तो स्त्रीपुरुषांच्या भिकारी झुंडीवर खर्च होऊं लागला व त्यांस आम्ही संसार सोडून ब्रम्हचर्य बाळगून राहलो आहों या पलीकडे दुसरा गुण दयेच्या पात्रतेस दाखाबितां येत नव्हता. धर्मसंस्था व राज्यसंस्था या होन्ही धार्मिक विवादांनीं भांबांवून गेल्या व बादऱाहाचें लक्ष फौजेच्या कवायतीकडून धर्मसभेच्या भांडणाकडे लागलें. रोमन बाद. शाहींत एक नवीनच प्रकारचा जुळूम चाळू झाला. आणि धर्म-मत| कारितां निरनिराळ्या लोकांचा छळ होऊं लागून हे लोक साहजिकच राष्ट्राचे शत्र बनले. ” ( बरीचा गिबन भाग. ४ पान १७२-१७५) हा उतारा बराच लांब आहे. पण यांत आलेले विचार व याच प्रकरणांतील आणखी विचार शाश्वत महत्त्वाचे असून, व ते सवेत्र लागू पडतात. आम्हांस येथे पंजाबच्या नाशाचींच कारणें पहाव - याचीं असून पश्चिमेकडील रोमन बादशाहाच्या नाशाच्या कारणांहून तीं अगदीं भिन्न असलीं तरी या विचारांनी दाखविलेली दिशा बिन- मोळ आहे. तिचा उपयोग यावेळीं जितका आहे, त्याहिपेक्षां पृथ्वि- राजाच्या काळीं उत्तर हिंदुस्थानचा नाश कां झाला या प्रश्नाचा आम्हांस या पुस्तकाच्या शेवटीं विचार करणं आहे, त्यावेळी जास्त उपयोग होईल.

पंजाबांतील हिंदुलोकांची परिस्थाते आणि गशझर्नाच्या मुसल-

१७९ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

मानांची परिस्थिति यांचा विचार करून राष्ट्राची शाक्‍ति वाढवि- णाऱ्या कोणत्या गोष्टींत मुसलमान अधिक होते व हिंदु कमी होते हें आपण पाहिलें असतां पंजाबच्या उच्छेदाची खरी कारणें कोणतीं आहेत याचा आपल्यास निर्णय करतां येईल. हिंदूच्या बाजूला तंटे आणि मुसलमानांच्या बाजूळा एकी अशी पारोस्थाते नव्हती हे आपण पूर्वी पाहिलेच आहे. तंटे व भांडणें हे जितके हिंदूंचे भ्रीद होतें, तितकेंच तुकाचेंहि होते. आऑक्सस नदी पर्लाकर्डाळ तुको- मधील बेर्काचें वर्णन करतांना उतूबी कुरणांतील पुडींलळ वाक्‍य उध्दत करतो. ““ तं जर एक असतील, तर त्यांची शक्ति खरोखरच मोठी आहे, पण त्यांचीं अन्तःकरणें विभिन्न आहेत. त्यांच्यामध्ये द्वेष आण शत्रुत्व आम्ही कायमचे पाठविले आहे.’‘दुसरें, तुक लोक हिंदूच्या इतकेंच सुधारळेळे किंवा रानटी होते. त्यांचीं शखें एकच होतीं. त्यांच्यांत लोकांच्या राजकीय सभा नव्हत्या. त्यांच्यांत राष्ट्रीय भावनाहि नव्हती. आणि त्यांच्यांत लिजन्‌ अथवा फॅलॅक्स अशा प्रकारच्या शिस्ती फळटणीहि नव्हत्या. तिसरें, पंजाबचें हिंदु राज्य अवाढव्यहि झालें नव्हते. अर्थात्‌ रोमन बादशाहीप्रमाणे ते आपल्या भारी वजनानेंच खालीं पडलें असें म्हणतां येत नाहीं, गांथ आणि व्हॅन्डालू यांच्या असंख्य झुंडी रामज राष्ट्रावर जसा कोसळल्या तशा तुकाच्या झुंडीहि हिंदुस्थानावर आल्या नाहींत. चौथी गोष्ट ही कीं, काबुलच्या अफगाणापेक्षां किंवा पंजाबच्या रजपुतांपेक्षां तुक लोक जास्त शूर किंवा शरीरसामर्थ्याचेहि नव्हते किंवा लढाईतील मेह- नतीस जास्त सरावलेलेहि नव्हते. किंबहुना महमूद व व्यांचे मागचे सुलतान यानीं आपल्या लढायांत पंजाबच्या हिंदूंचा उपयोग केला आहे. महमुदाची ऑक्सस नदी पलीकडील तुकाचा राजा इलेक- खान याशीं जी लढाई झाली तींत महमुदाच्या तर्फे हिंदू मोठ्या शोर्यानें ढळे असें वणंन आहे. पांचवे पंजाबचे हिंदु राज्य वाईट

पंजाब-काबूलचा उच्छेद-संभवनीय कारणं. १७७

रीतीनें चाललें होतें असेंहि दिसत नाहीं. आणि यामुळें मुसलमाना- कडे कांहीं हिंदु लोक फितुर झाळे असेंहि वर्णन सांपडत नाहीं. शेवटची गोष्ट ही कीं, महमदाचें गझनी येथील राज्य जयपालाच्या काबल–पंजाब राज्यापेक्षां प्रारंभी लहानच होतें. अर्थात्‌ त्याचें सैन्याहे जयपालाच्या सेन्यापेक्षां प्रारंभी थोडें असलें पाहजे. जय- पालाच्या राज्यांत धार्मिक किंवा राजकीय तंटे बखेडेहि असल्याचें दिसून येत नाहीं. तात्पर्य एक पक्ष सबळ किंवा दुर्बळ होण्याची हीं जीं प्रथम दर्शनी कारणें, तीं नसल्यानें आपणांस बाजस ठेविलीं पाहिजेत. ब तुकांचे वर्चस्व हिंदूंवर कोणत्या अन्य बाबतीने होतें किंवा हिंदु हीन होते याचा आपणास विचार करावयास पाहिजे.

( १) तुकांची मोठी वर्चस्वाची बाब म्हणजे त्यांचा नेता मह- मूद याचें वैयाक्तिक सामर्थ्य हे होय. आपणांस व्यक्तींच्या सामर्थ्याची नेहमीं योग्य किंमत असत नाहीं. पूर्वी सांगितल्याप्रमाणे निसर्गाने वेळोवेळीं बौद्धिक व शारीरिक अल्थंत सामर्थ्य असलेले पुरुष उत्पन्न होतात, व ते राष्ट्रांचे दैव किंवा मानवी जातीचं स्वरूप बदळून टाकतात. एक बुद्ध किंवा एक जीजस यांचें सामर्थ्य एवढें होतें कीं अर्धे जग शांततेच्या मार्गाकडे त्यामुळे वळळें, तर एका महमदानें दुसरें अधे जग धमतत्त्वाच्या प्रसारांत बलाचा उपयोग करण्याच्या तत्त्वाकडे प्रवण झालें. राजकीय घडामोडीकडे आपण पाहिलें तर | एका शिवाजीनें मराठे लोकांस दोनशें वर्षे स्वातंत्र्य मिळवून दिलें आणि त्यांची कीर्ति हजारों वर्षांकरितां कायम केळी. आमची अशी पक्की समजत आहे कीं, शिवाजीच्या वैयक्तिक सामर्थ्याशिवाय ‘ मराठ्यांनी जो पराक्रम केला तो त्यांस करतां आला नसता, आणि आमर्चे असं पक्के मत आहे कीं, महमुदाच्या व्यक्तीशिवाय तु्कांना . पंजाबच्या हिंदूचा पाडाव करितां आळा नसता. महमुदाची म.«.भा, १९

१७८ गझर्नीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

स्थिति शिवार्जाच्या स्थितीसारखी हुबेहूब आहे. कधीं न डगमगणारें शोर्य आणि कधीं न थकणारा उत्साह दोघांसहि असून दोघांनींहि मोठीं धोरणें बांधली आणि दोघांसहि निश्चय व युक्तिमत्ता असल्यानें त्यांनीं आपली कल्पना सिद्धांस नेली. मुसलमानी अमलाच्या जोख- डांतून जवळीळ विजापुरची सत्ता नाहींशी करून किंवा दूरच्या मोगल बादशाही फोजांचा पराभव करून महाराष्ट्राला सोडवितां येईळ अशी कल्पना शहाजीच्या वेळीं कोणासाहे झाली नसती. पण शिवाजीनें हा अशक्‍य दिसणारा बेत केला आणि तो आपल्याच आयुष्यांत आपल्या अद्वितीय संघटनाशक्तीनें व आपल्या आध्यात्मिक वजनाने सिद्धीस नेला. त्याचप्रमाणें गझनीचें लहानसे राज्य जवळीळ काबूलच्या शक्तिमान राज्यास धुळीस मिळवील, किंवा दूरच्या कनो- . जच्या बादशाही फोजांचा पराभव करील ही गोष्ट त्यावेळी न | साहे संभवनीय वाटली नसती. असें असूनहि महत्त्वाकांक्षेनें प्रेरित । होऊन हा घाडसाचा घाट महमुदानें घातला, आणि आपल्या : उत्साहाने व वैयक्तिक वजनानें तो सिद्धीस नेला. शिवाजी आध्या- . त्मिक दृष्टया महमुदापेक्षां उच्चतर पायरीवर अधिष्ठित होता यांत शंका नाहीं. कारण आपल्या लोकांस परकीय सत्तेच्या व परकीय धमीच्या कचाटींतून सोडविण्याचें उदात्त कार्याकडे त्यानें आपलें . सामर्थ्य लाविले. या उलट महमुदानें परकी लोकांस गुलामागेरींत आणण्याचा आणि पराराज्ये जिंकून त्यांवर आपला परकीय धर्म, लादण्याचा उपक्रम केळा व सिद्धीस नेला. असे जरी आहे तरी, दोघांनींडि अशक्य दिसणारे बेत केळे आणि ते आपल्या अद्वितीय, गुणांनीं सिद्धीस नेळे असेंच म्हटळें पाहिजे, दोघांपार),’हे प्रारंभीं एक लहान राज्य व एक ल्हान सैन्य होतें. पण दोघांनीठि आपल्या घटनासामर्थ्यानें व युक्तिमत्त्वानें आपलें राज्य व सैन्य वाढविले. शिवाजीला तर बापाच्या वेळची फारच थोडी फोज शिळाली होती.

पंजाब-काबूळचा उच्छेद-संभवनीय कारण. १७९

पण तिचेंच त्यानें असं सामरथ्येवान्‌ सैन्य बनविले कीं, ते बादशाही मोगळ फौजांना पराभूत करून धनसंपन्न मोगल शहरांना ठुर्टात होतें. हाच प्रकार महमुदाने केला, व त्याचें सेन्य इतकें वाढलें की, मरण- समयीं तें एक लाख पायदळ, पन्नास हजार घोडे आणि तेराशे हत्ती इतकें मोठें होतें. सरदेसाई म्हणतात कीं, “ महमुदाजवळ प्रारंभीच मोठें सैन्य होतें; त्यास खाऊं घाळून हिंदुस्थान जिंकण्यांत त्याचा उपयोग करणें त्यास भाग होतें.” पण ही गोष्ट खरी दिसत नाहीं. कदाचित्‌ महमुदाजवळ शिवाजीपेक्षां प्रारंभीं अधिक सैन्य असेल. तथापि महमुदाजवळ प्रारंभीं मोठें सैन्य होतें असें मानळें तरीसुद्धा तो जर नालायक असता तर हळू हळू फौजेस रजा देऊन सेन्य कमी करण्यास त्यास कोण आडवा आला असता £ तुके किंवा अफगाण लढत्रायी माणसें पुष्कळ नोकरीस मिळण्यासारखीं असलीं ‘तरी, त्यांस देण्यास पगार कोठून आणावयाचा ? देवळें आणि मूर्त यांची ळूट मागाहून आली. शिवाजीलाहि प्रारंभीं साधने कोठून मिळालीं ? शिवाजीचे “र शिपाई प्रारंभीं शांत स्वमावाचे मावळे होते, कज्जाख तुक नव्हते, महापुरुषांचे महत्त्व यांतच दिसून येतें ‘कीं, ते आपल्या राक्तीनें माणसें व द्रव्य मिळवितात, आणि माण- सांस योग्य रीतीनें तयार करतात. आणि द्रव्याचा योग्य उपयोग करि- तात, हें मोठेंपण अढळ निश्चय आणि जळजळणारी इच्छा यांतच असतें. महाभारतांतील प्रसिद्ध विदुलळाख्यानांत पराभव पावून व | राज्यभ्रष्ट होऊन रडत बसलेल्या आपल्या पुत्रास विदुला म्हणते, | “पुन: लढण्याचा दढनिश्चय करून राज्य परत मिळविण्याचा उद्योग कर, ऊठ. तुला मनुष्ये व धन लागेल तें मिळाठेंच पाहिजे.!’शिवाजी | व महमूद यांचें संघटनासामर्थ्ये व आध्यात्मिक वजन यांवरून स्पष्ट , होतें कीं, त्यांनीं आपल्या लोकांस चिकाटीने लढण्यास लायक करून । यांच्यासाठी प्राणहि देण्यास उद्युक्त केळे. इतकेंच नव्हे तर हे जे

१८० गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

तेजस्वी शस्त्र त्यांनीं बनविले, तें त्यांनीं आपल्या कह्यांतहि ठेविलें. गिबननें म्हटल्याप्रमाणे टढवयी पलटणी शत्रूसच भयप्रद नसून माठकासहि भयप्रद होतात. जेथें राष्ट्रीय भावना जागृत नसून राजद्रोही अधिकारी अथवा सेनापति यांच्या महत्त्वाकांक्षस आळा घालण्यास संमर्थ असत नाहीं, तेथें धन्याच्या वैयक्तिक तेजानेंच असले मह- त्त्वाकांक्षी लोक ताळ्यावर राहतात. धन्याची दाब ठेवणारी व्यक्ति नाहींशी झाली म्हणजे हेंच भयप्रद सैन्य आपल्या धन्याचाच नाश करिते. महमुदाच्या मागून आलेले राजे. नालायक असल्यानें असा प्रकार गझनीसच घडून आला. पुष्कळ मांडलिक स्वतंत्र झाले, आणि एक गझनी’चा राजा त्याच्या सेनापतींनी धरून आंधळा केला. तात्पर्य महमूद अथवा शिवाजी यांनीं जें सामर्थ्यवान्‌ सैन्य तयार केळें आणि आपल्या कामाकडे त्याचा जो यशस्वी रीतीने उपयोग केळा, त्याव- रूनच शिपायांच्या व फौजी अधिकाऱ्यांच्या अन्तःकरणावर त्यांच्या आध्यात्मिक वजनाचा दाब किती होता हं स्पष्ट होतें. आतां महमुदाच्या विरुद्ध पक्षाकडे पाहिळे तर सेनापति किंवा घटक, या बाबीचें सामर्थ्य असलेळें कोणी पुरुष दिसत नाहींत. जयपाळावर जो प्रसंग येऊन पडला, तो त्यानें घैयीनें आणि तेज- स्वितेने निभाविला. पण ज्या वेळेस त्यास भावी संकट दिस लागलें, तेव्हां मजबूत फौज तयार करण्यास त्यास काय हरकत होती? किंब- हुना प्रारंभापासूनच कोणत्याहि प्रसंगास तोंड देण्यास समर्थ असे शक्तिमान सैन्य नेहमीं बाळगण्यास काय अडचण होती £ कोणताहि राजा किंवा राष्ट्र याचें प्रथम कतेव्य हें आहे कीं, लोकांचे अंतस्थ व बाहेरील शत्रूपासून रक्षण करण्यास समर्थ अशी जय्यत े ठेवावी. जयपालाला मनुष्य किंवा धन या साधनांची उणीव मुळींच नव्हती. किंबहुना हर्षाजवळ प्रारंभीं मध्यम प्रमाणाचीच फौज होती. तिच्या जोरावर त्यानें उत्तर हिंदुस्थान जिंकले, तेव्हां तो नेहमी

पंजाब-कावूळचा उच्छेद-संभवनीय कारणे, १८१

एवढी मोठी जय्यत फौज ठेवी कीं, तिचें एक अंग ६०००हत्ताचें होतें. आणि एवढ्या अवाढव्य सैन्याचा खर्चे कोणतीहि शहरें किंवा देवळें ळुटल्याशिवाय तो चालवी, एवढें करूनहि प्रयाग येथे भरलेल्या दर पांचवार्षिक दानसमारंभांत ब्राह्मण व श्रमण यांना लाखों रुप- याचें दान करी. महमुदाच्या विरुद्ध लढणाऱ्या हिंदु राजांचा मोठा दोष असा दिसतो कीं, काबूल वब कनोज या दोन्ही ठिकाणच्या राजांनीं त्यांचे प्रसिद्ध पूर्वज भीम व भोज यांच्या उदाहरणाविरुद्ध

सैन्याची हयगय केली. गिबनच्या अजरामर शब्दांत बोलावयाचे तर

बहुधा शिपायांचा तनखा देवळांचे भोग व मूर्तींचे अलंकार यांत खर्च झाला, कारण दोन्ही ठिकाणीं यावेळीं खड्या फौजा अस- ल्याचें वाचण्यांत येत नाहीं. दहाव्या शतकांतील अरबी प्रवाशांनी लिहून ठेविलें आहे कीं, हिंदुस्थानाची ख्याति तेथीळ फोजांविषया अहे. ही ख्याति अकराव्या शतकांत हिंदुस्थानांतील राज्यांनी गमा- वली, काबूलपंजाबचें राज्य एक मोठी फौज बाळगण्याइतके खचित

_ विस्तृत होतें; आणि वास्तविकपणें देजारील राजांची मदत माग- ‘ ण्याचें आणि संयुक्त सैन्य जमा करण्याचे कांहीं कारण नव्हते. या

हगाबयय्य य अओअअााशााआथथ्य”ावायययपकाडर्नका

संयुक्त सैन्यासह्ि कांहीं करतां आलें नाहीं. कारण तीस कोणी मोठा सेनापति-नेपोल्यिनच्या विरुद्ध लढण्यास समथ असा डबूक आफ वेलठिंगटन-लाधला नव्हता. कांहीं लोकांची अशी समजूत आहे कीं, संयुक्त सैन्याचा उपयोग एकजीव फोजसारखा होत नाहीं. पण हें बरोबर नाहीं, कारण संयुक्त फौजा फ्रान्सच्या मैदानावर मा- गील आणि चाढू शतकांत यशस्वी रीतीनें लढल्या आहेत. एक नेता व नियामक संयुक्त सेन्यास पाहिजे यांत संशय नाहीं. हिंदु- स्थानांत संयुक्त फौजा यावेळीं जयपाल किंवा आनंदपाल यांच्या

१८२ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

एकट्याच्याच नेतृत्वाखाली होत्या. ल्यास जय आला नाहीं याचें कारण सैनापत्यांत ते महमुदाच्या बरोबरीचे नव्हते. असो, ल्यास जय न येण्याची आणखी जीं कारणें झालीं त्यांचा आपण आतां विचार करू.

(२ ) हिंदू लोकांच्या धार्मिक भावनांचा कोमळपणा पंजाबच्या उच्छेदाचें एक कारण आहे यांत इंका नाहीं. दोन्ही बाजूळा जी भावना प्रधान होती, ती राष्ट्रीय नसून पूर्वी सांगितल्याप्रमाणे निः- संशय धार्मिक होती. पण मुसलमानांची धार्मिक भावना उत्कट आणि जळजाळित होती, तर हिंदूची धार्मिक भावना मृदु आणि बहुतेक मळमळित होती. ठेनपूलच्या शब्दांत म्हणावयाचे तर मुस- लमानी धर्मोत्साह व ठुटारूंचा ठोभ महमुदाकडे प्रोत्साहक असला तरी या स्थितीचा प्रतिकार हिंदू-धर्मीचा तितकाच प्रबळ धर्मो- त्साह आणि लुटल्या जाणाऱ्या लोकांचा संताप यांनीं झाला असता तर मुसलमानांचे कांहींच चाललें नसतें. कारण देवळें ठुटलीं गेली, मूर्तींचे दागिने काढले गेळे, इतकेंच नसून शेंकडों किंबहुना हजारों हिंदू जबरदस्तीने बाटविले गेळे.अशा पारोस्थितींत बाटलेल्या व ळुटलेल्या लोकांच्या शोर्यानें व संतापानें हिंदु लोकांनीं लढले पाहजे होते असें आपल्यास वाटतें. शिवाय, दोन्ही फौजांची संख्या व संस्काते सारखीच असतां, किंबहुना हिंदूंच्या बाजूला वर्चस्व असतां, हिंदूनी पराभव कधींहि मान्य करावयास नको होता. परंतु हिंदूची धर्मभावना जरी खोळ असते, तरी ती अनेक कारणांनीं नेहमींच नरम असते.पहिली

कॅस्मिथच्या ऑक्सफडं हिस्टरी आफ इंडिया या पुस्तकांत असें म्हटलें आहे की, दुसऱ्या संयुक्त सेन्याचें नेतृत्व अजमीरचा राजा बीसलदेव यानें घेतलें होते. पण ह्या विधानाला आधार दिलेला नाहीं; आणि ं गोष्ट सत्याहे दिसत नाहीं. खरी मानली तरी सुद्धां बीसळ माठा सेनापाते होता अशी त्याची ख्याति नाहीं. |

पंजाब-काबूलचा उच्छेद-संभवनीय कारणे. १८३

’ गोष्ट, हिंदू नेहमीं साहिष्णु असतो. हा एक साधारण अनुभव

आहे कीं, कुराणाची किंवा पैगंबराची थोर्डाशी निंदा ऐकून मुसल-

मानाला तौत्र संताप येतो, तर हिं, वेदांची किंवा रामकृष्णांची निंदा

शांतपणें ऐकून घेतो, दुसरी गोष्ट, हिंदू स्वभावानं मारामारीवर न येणारा असतो. हिंदुधर्मात अहिंसेचा मुख्यतः उपदेश असल्यानें हिंदूला शांततामय मार्गाची नेहमीं संवय असते. तिसरें, हिंदूच्या

’ मूतिविषयक कल्पना चुर्कांच्या होत्या व अजून आहेत. जेव्हां मूर्तीनां
आपल्या सामर्थ्याने मुसलमानांचा प्रतिकार करितां आला नाहीं, _ तेव्हां धभभाळेपणानें हिंदूंस असें वाटलें कीं, जर देव सुद्धां नम्र ‘ होणें योग्य समजतात, तर मनुष्यांनीं विरोध करणें निर्थक आहे. ‘ पण ही गोष्ट ध्यानांत ठेविली पाहिजे कीं, मूर्ति म्हणज एक प्रर्ताक ‘ आहे, प्रत्यक्ष देव नव्हे, आणि या प्रतीकाचा जर अपमान झाला, तर तो मूर्तीच्या धातूचा किंवा दगडाचा अपमान नव्हे किंवा ज्या,

देवाची ती प्रतिमा असेल त्या देवाचा नव्हे. कारण देव अपमाना-

च्या कक्षेच्या वर आहे. तर जे लोक त्या मर्तीला मानतात, त्या लो- कांचा खरोखर ता अपमान आहे. मुंबईमध्ये व्हिक्टोरियाच्या पुत- ळ्याच्या तोंडाला जेव्हां कोणीं काळें फांसळें, तेव्हां त्या संगमरवरी दगडाचा तो अपमान नव्हता किंवा ल्या चांगल्या राज्ञाचा नव्हता. पण तो अपमान ज्या ब्रिटिश राष्ट्राने तो पुतळा उभारला होता, ह्याचा तो अपमान होता, व या कृल्यांत हेतुहि त्याचाच अपमान करण्याचा होता. पण चुकीच्या समजुतीने [किंवा भोळसटपणानें हिंदूची अशी कल्पना झाली कीं, या कलियुगांत सनातन धमाचा अवमान होणे ठरठेंच असल्यामुळें महमदाच्या विरुद्ध देवतांचंहि सामथ्ये चालत नाहीं, अशा भलव्याच समजुतीचा परिणाम द्दिदूंच्या मनावर झाल्याशिवाय राहिला नाहीं. आणि प्रत्यक्ष जेव्हां कित्येक अपघात महमुदाला अनुकूल असे घडले, तेव्हां तो समज दृढ झाला

१८४ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

आणि हिंदुलोकांनीं संतापानें व तीत्रतेनें युद्ध केलें नाहीं. ज्या लो- कांचीं देवळें भ्रष्ट झालीं, आणि ज्या लोकांचीं घरें उध्वस्त झाली व्या लोकांस अश्या तऱ्हेचा संताप व तीव्र दुःख जरूर यावयास पाहिजे होतें,

(३ ) पंजाबच्या उच्छेदाचे कारण लोकांची राजकीय उदार्सान वृत्ति हेंहि एक होतें. दुर्दैवाने यापूर्वी बारा शतकें पंजाबावर परकी राजांची सत्ता होती. किंबहुना असोहि म्हणतां येतं कीं, पोरसच्या काळापासून तों रणजीतसिंगापर्यंत वीस शतके पंजाबांत स्वराज्य नव्हतें. परकी म्लेच्छ किंवा हिंदु राजे एकामागून एक पंजाबावर अलेक्झांडरपासून महमुदापर्यंत राज्य करीत आले होते. मॅसिडोनि- यन, मोर्थ, शक, बेंकट्याचे ग्रीक, कुशान, हूण, काऱ्मीरी, सिंधी व शेबटीं काबूलचे शाही राजे पंजाबावर राज्य करीत आले होते. आणि महमुदानंतर गझनी व दिल्लीच्या राजांनीं पंजाबावर आठशे वर्षें राज्य केलें. अथात्‌ शीखांचा राजा रणजीतसिंग होईपर्यंत दोन हजार वर्षे पंजाबावर स्वदेशी राजा झाला नाहीं. महमुदानें पंजाब जिंकला त्यावेळीं पंजाबच्या लोकांच्या अतःकरणांत स्वराज्य-भावना छुप्त होती. पंजाबचे ठोक जरी .आ्य आहेत, तरी त्यांना सामर्थ्य असूनहि स्वराज्य भोगण्याची इच्छा नव्हती, यामुळें गझनीहून मुस- लमान तुर्कानें राज्य केलें काय किंवा काबूलहून हिंदु अफगाणांने राज्य केलें काय हें त्यांस सारखंच होतें. राजकर्त्यांत जो यावेळीं बदळ होत होता, त्याविषयीं ते उदार्सांन होते. स्वातंत्र्याच्या रक्षणाकरितां झगडणाऱ्या लोकांचा जोराचा प्रतिकार, अर्थात्‌ पंजाबच्या लोकांनीं महमुदाविरुद्ध केला नाहीं; आणि पंजाब प्रांत हिंदुस्थानांतून एका लढाईंत तुटून निराळा झाला. एका लढाईत राज्यें गेल्याची उदा- हरणें पाश्चात्य इतिहासांत आहेत. खुद्द इंग्लंड विल्यम दि काँकररनें एका ढढाईंत जिंकले. पण इंग्ळंडमर्धांळ लोकांनीं नोर्मन राजे आपले

आक्षेपांचे निरसन. १८५

केले; याउलट गझर्नाच्या मुसलमान राजांनीं पंजाबचे लोक आपले केळे. आणि ज्याप्रमाणे सिंध इ. स. ७१२ मध्यें मुसलमानी राज्यांत सामील झाला, त्याप्रमाणें पंजाब इ. स. १००९मध्यें हिंदुस्थानांतून निराळा पडला.

टिप्पणी आक्षेपांचे निरसन.

येथें असा एक आक्षेप उत्पन्न होतो की, हीं दोन कारणें–धार्मेक भावनांचे शैथिल्य आणि राजकीय उदासीनता–पंजाबच्याच उच्छेदाचीं नव्हे तर सव हिंदु राज्यांच्या उच्छेदाचीं कारणे आहेत. किंबहुना बहु- तेक आशियांतील राष्ट्रें याच कारणानें पडलेली आहेत ही गोष्ट खरी आहे. व याच भागांत सातव्या पुस्तकाच्या अंतीं उत्तर हिंदुस्थानाच्या उच्छे- दाची कारणें काय झालीं याचा विचार करतांना या दोन कारणांचा आम्हांस उल्लेख करावा लागणार आहे. नरम धार्मिक भावना आणि राजकीय परिस्थितीविषयी औदासीन्य हें सवे हिंदुस्थानांतील लोकांचे प्रमुख स्वभावदोष आहेत. पण आम्हांस येथे विशेष हें सांगावयाचें आहे कौं, इ. स. १२०० च्या सुमारें झालेल्या उत्तर हिंदुस्थानांतील रजपूत राज्यांच्या विध्वंसाचीं जीं निराळी मुख्य कारणे झाली, तीं पंजा- बांत मुळींच नव्हतीं. म्हणजे जातींचे कडकबंधन वब आपसांतील लढाया या पंजाबांत मुळींच नव्हत्या. उलटपक्षीं पंजाबांत जीं दोन कारणें अस्ति- त्वांत होतीं, त्यांचा परिणाम इतर ठिकाणापेक्षां पजाबांत जास्त जोराचा होत होता. तेव्हां पंजाबाच्या उच्छेदाची हाच दोन मुख्य कारणे आहेत असं ठरवावे लागतें. तें कसें तं आपण विस्ताराने पाहू. टोकांच्या घार्मिक अथवा राजकीय वृत्ति त्यांच्या ऐतिहासिक परिस्थितीमुळे उत्पन्न होतात आणि त्या कद्या बदलतात याचें परीक्षण इतिहासावरून करतां येते.

पंजाब प्रारंभापासून वैदिक आर्यांचा देश आहे यांत विवाद नाहीं. येथेच वेदाचे मंत्र बहुतेक सवे तयार होऊन गाइले गेले. येथेच उत्तर- कालीन वैदिक संस्कात परिणत झाली. व्याकरणाचा आचाये पाणिनि आणि तत्त्वज्ञानाचा गुरु अश्वपति यांचे देश गांधार व मद्र होत. सिंधु-

१८९६ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

नदीच्या पश्चिम व पूर्व बाजूच्या या देशांतील ब्राह्मण क्षत्रियांचे बहुविध उल्लेख उपनिषद!मध्यें आहेत. पण “’ सिंधुषष्ट पंचनदा’चा हा देश घुढीलळ काळांत मगघाच्या खालोखाल बोद्ध धर्माचा माहेरघर बनला. बुद्धाने खुद्द अफगाणिस्थान व पंजाब या देश्शांत यशस्वी रीतीनें आपला घमोपदेश केला. आणि याच देशांत पुढील काळांत कनिष्काच्या वेळेस महायान बौद्ध पथ निर्माण झाला. पुरुषपुर आणि तक्षशिला हीं बैदिक काळांतील प्रसिद्ध स्थानें बोद्धधर्माची विद्याकेंद्रे बनली. तेव्हां पंजाब जरी वैदिक आयोचा मूळ देश असला, ( आणि अजूनहि पंजाब मुख्यतः भारतीय आर्य आहे ही गोष्ट सर एच्‌ रिस्ले यानीं इ. स. १९०१ च्या सेन्सस वेळीं घेतलेल्या शीर्षमापावरून सिद्ध झाली आहे ) तरी हिंदु- स्थानच्या इतर भागांपेक्षा पजाबची हिंदु–घर्मभावना कमी तौत्र होती. इ. स. पूर्वे २५० च्या सुमारास हल्लींच्या स्वरूपांत आलेल्या महाभार- ताच्यावेळींहि हा फरक दिसत होता ( टिप्पणी पहा ), हुएनत्संग इ. स. ६३०८ मध्ये हिंदुस्थानांत आला, त्यानेंहि लिहून ठेविलें आहे की, कापिदा अथवा काबूल नगर म्हणज्ञे जलालाबादसह, व उद्यान म्हणजे स्वात तक्षशिलेसह हे देश पूर्ण बोद्ध होते. आणि पेशावर व पेजाब अर्धे बोड होते. (माग शपान२४४पहा.) पंजाबांत वैदिक काळांतच जातिबंधनें शिथिल होतीं, तीं बोद्ध-काळांत अधिक शिथिल झालीं. सरस्वतीच्या प्रदेशांत ब्राह्मण घर्म वाढला. आणि उत्तर हिंदुस्थानांत जातिसंस्था जोरावली; पंजाबांत मात्र जातिबघने शिथिल राहिलीं. “ आज ब्राह्मण, उद्यां क्षात्रिय, परवां वैश्य, तेरवां नापित आणि मग पुनः ब्राह्मण पंजा- बांत होतो ” असें महाभारतांत वर्णन आहे. हर्षानंतर कुमारिळ व शकर यांच्या प्रयत्नाने बोड्ध धर्मांचा उत्तर हिंदुस्थानांत उच्छेद झाला आणि इल्लींचा हिंदुघरम उदय पावला, त्यावेळेस पंजाबांतूनाहे बोद्धघर्म नष्ट झाला, परंतु हिंदुघमांची केंद्रे दक्षिणेंत दूर असल्यानें पंजाबांत असलेल्या वर्णशौथिल्यावर त्याचा प्रभाव पडला नाहीं व खानपानादि व्यवहाराहि पंजाबांत निराळा राहिला. यामुळें महमुदानें ज्या वेळेस पंजाब जिंकला त्यावेळीं लोकांची हिंदुघर्मभावना इतरत्रपेक्षां अधिक नरम होती. वणा- श्रमधर्मावर जो दृढ विश्वास गंगायमुना- प्रदेशांतील लोकांचा आहे तो

आक्षेपांचे निरसन. १८७

पंजाबांत नव्हता. यामुळें पंजाबांतील लोकांनीं जबरदस्तीच्या बाटविण्यास विशेष जोराचा प्रतिबंध केला नाहीं. ब महमुदानें फोडलेल्या मूतींची पूजा करणें, आर्यवंद्याचे सवे शारीरिक सामथ्ये असलेल्या हिंदु जनतेत जितकी सुलभता दिसणें शक्‍य नाहीं तितक्‍या सुलभतेने त्यांनी सोडून दिलें राजकीय ओदासीन्यासंबंधीं पाहतां हिंदुस्थानच्या इतर भागांपेक्षां पंजाबांत हें ओदासीन्य जास्त होतें. म्हणजे याहि बाबतींत पंजाबची स्थिति अधिक वाईंट होती. फार प्राचीन काळापासून पंजाबांतच नव्हे तर सर्व हिंदुस्थानांत राजकीय भावना निद्रिस्तच आहे. बहुतेक सर्व प्राच्य लोकांच्या राजकीय कल्पना अजूनाहे असंस्कृत आहेत. राष्ट लोकांचे आहे, राजाचें नव्हे, ही कल्पना अलीकडील काळांतच उत्पन्न होत चालली आहे. अनियात्रित राजसत्तखालीं नेहमींची राजकीय कल्पना म्हणजे देश राजाचा आहे, राजा देशाचा नव्हे. अर्थात्‌ लोकांपेर्काच राजा असला पाहिज अशी आवश्यकता नाहीं. वैदिक काळांत आयोच्या यापेक्षां जास्त पायाशुद्ध कल्पना होत्या. आणि लोक म्हणजेच खरोखर राष्ट समजलें जाई. वैदिक काळांत राष्ट्राचे आणि राजाचें नांव लोकां- बरूनच असे. एकवचनी लोकांचें नांव राजारथीा आणि अनेक वचनी राष्ट्रार्थी वापरीत, उदाहरणाथ मद्र, कुरु, शल्य, पांचाल इत्यादि शब्द पहा, अलेक्झांडरच्या काळापयतसुद्धां पंजाबांत असे कांहीं लोक किंवा राष्ट्र होती की, त्यांच्यांत राजाच नव्हता. अरायन इतिहासकाराने लिहिलें आहे कीं, “मालव, योधेय, शाल्व वगेरे लोकांत राजा नव्हता. त्यांच्यांत राज्यव्यवस्था लोकसत्ताक होती. महाभारतांत अशा लोकांना गण संज्ञा आहे. असो, वेदिक काळांत किंवा भारतकाळांत निराळी स्थिति असली तरी त्या अर्लांकडच्या काळांत सर्व देशांत राजसत्ताच चालूं झाली, आणि देश किंबहुना देशांतील लोक राजाची खासगी मिळकत मानूं जाऊं लागले, अथातच अशा राजव्यवस्थखालीं राष्ट्रीय भावना उत्पन्न होणें शक्‍य नव्हतें. पण पंजाबचा व इतर प्रांतांचा फरक हा कीं, उत्तर हिंदु- स्थानांत स्वदेशी राजे असल्यानें तेथें थोडी तरी राष्ट्रीय भावना जाग्रत होती. परंतु पंजाबांत सारखें परकी राज्य शतकेंच्या शतकें चाळू अस- ल्यानें तेथं ही थोर्डीहि राष्ट्रीय धुगधुगी बाकी नव्हती, यामुळें राज्य कोण

ग््द्ट गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

करतो आहे, याविषर्यी लोक पूर्ण उदासीन असत, या कारणानें जेव्हां आनेदपाल लढाईत हरला तेव्हां साधारण लोकांनो मुळींच विरोध केला -नाही आणि शांतपणें महमुदाची राजसत्ता मान्य केली,

या सर्व कारणांवरून हिंदु धार्मेक भावनेचे शैथिल्य व राजकीय औदासीन्य यामुळेंच पंजाबाचा महमुदाच्या हल्ल्यापुढें सहज उच्छेद झाला, ब्रिटिश सत्तेखालीं आणि एकंदर सुधारलेल्या जगताच्या बदल- लेल्या परिस्थितींत पंजाबांताहे राष्ट्रीय भावना जाण्त होत आहे. परंतु पंजाबांत मिन्न घमोच्या झगड्यांत हिंदूंना आपलें स्थान कायम ठेवणें असेल तर त्यांनीं आपली धमश्रद्धा, जर्री ती स्थिर आहे तरी, इतकी मजबूत केली पाहिज कॉ, तिची शाक्ते शोख किंवा मुसलमान यांच्या घार्मिक भावनेच्या शक्तीबरोबर होईल.

याच राजकाय कल्पनांच्या चुकीमुळे हिंदू शिपायांचा मोठा जो एक दोष दिसतो व ते पाश्चात्य आर्य लोकांप्रमाणे डांबून युद्ध करीत नाहींत तो उत्पन्न झालेला आहे. देश राजाचा, लोकांचा नव्हे अशी कल्पना असल्यानें लढाइच्या जयापजयांत आपलेपणाचें हित शिपायांना वाटत नसते. लढाई हरळी तर एक नवीन राजा येईल आणि तो जुन्या राजा इतकाच मान्य करावयास हरकत नाहीं, कारण राजा आपल्या देशाचा नसला तरी चालतो अश्ली समजूत असते. महाभारतकाळीं आयोची मनःस्थिति निराळ्या प्रकारची होती. यामुळें भारतीययुद्धांत ते चिकाटीने शेवटपर्यंत लढले, भारतीयुद्धाच्या शोवटच्या दिवशीं. जेव्हां दुयोंधन रणांगणांत दिसेनासा झाला, तेव्हां कांहीं शिपाई व फोजी अधिकारी राजा कोठे आहे म्हणून विचारू लागले. पण इतरांनीं जबाब दिला कौ, “ राजाची चोकशी कशास कारेतां £ तुम्ही चिकार्टाने लढा आणि जय मिळवा, मग राजाविषयीं आपण विचार करूं. ” हें महार्ष व्यापांचें वणन मननीय आहे, अशा प्रकारची मनःस्थिति पुढील काळांत राहिली नाहीं. कारण राष्ट्र राज्य झालें, राजाची मिळकत, लोकांची नव्हे अशी कल्पना झाली.तात्पर्य हिंदु शिपायांची पळून जाण्याची प्रव्रात्ते, मृत्यूच्या भीतीमुळें नव्हे तर स्वदेशभक्तीची स्वहिताची कल्पना त्यांस लढाईच्या जयापजयांत नसते, ह्यामुळे होते. बेहकीनें एक मजेची गोष्ट सांगितली

आक्षेपांचे निरसन. १८९..

आहे. हिंदु शिपायी नाइक ऑक्सस नदी पलीकडील तुकांविरुद्ध झालेल्या लढाइत गझनी राजांच्या तर्फे लढत. किंबहुना त्यांच्या शोर्यांची बेह- काने तार्राफ केली आहे. एके प्रसंगीं लढाईत पराजय झाला व हे लोक पळा, गझनीस परतल्यावर त्यांच्यावर पळाल्याच्या आरोपावरून चौकशी’ बसून ते नोकर्रांतून बरखास्त केले गेले, तेव्हां कांहीं जणांनी शिक्षा ऐक- तांच अपमानामुळे आपल्या पोटांत कट्यारी खुपसून तेथ्रेंच प्राण दिले, मसऊद सुलतानाने त्यांजविषयां दुःख दाखविले नाहीं किंबा त्यांच्या आत्मयज्ञाची प्रशंसा केली नाही, “ या लोकांनीं याच कट्यारी शत्रुवर चालवीत असतां आपला प्राण कां वेचला नाही १” असें जे मसऊद म्हणाला यांत तथ्य आहे. आत्महत्त्या करण्यांत जी मृत्यूची निर्भयता दिसते ती शत्रूशी शोबटपर्यंत लढण्यांत कां दाखविली जात नाहीं £ असो.. हिंदु शिपायांचा हा स्वभावदोष त्याच्या चुकीच्या राज्यकल्पनंमुळें व त्यांस युद्धाच्या निकालांत कांहींच स्वहित वाटत नसल्यामुळें उत्पन्न होतो, मृत्यूच्या भीतीमुळें नव्हे असें आम्हांस वाटतं.

येथें आणखी असा प्रश्न उपस्थित होईल कौ, पंजाबांत या. वेळीं किंवा पूर्वकाळीं क्षत्रिय नव्हते काय ? आणि असतील तर त्यांनीं आपलें राज्य स्थापण्याचा कां प्रयत्न केला नाहीं : पूर्वी सांगि- तळेंच आहे कीं, पंजाबांतीळ बहुतेक लोक आर्य आहेत. अर्थातू महमुदाच्या वेळीं व तत्पूर्वी हजारों क्षात्रिय व वैश्य शुध्द आर्य- रक्ताचे पंजाबांत होते. परंतु अलेक्झांडर व तदुत्तरचे जेते यांनीं नेहमीं ठढवय्यी लोकांची कत्तळ केली असल्यामुळें राज्यकरणारीं घराणीं पंजाबांत नष्ट झालीं. ज्या शूर क्षत्रिय जातींनी अलेक्झांड- रला विरोध केला, त्यांचे म्हणजे शिबि, मालव, मद्र, योधेय वगैरे यांचे वंशज अद्याप पंजाबांत आहेत व महमुदाच्या वेळीं होते. पण! ते सव शेतकरी झाले होते. विदाषतः गांवचे पाटील बनले होते. अशा प्रकारचा आपद्धरम क्षत्रियांकरितां स्मृत्यांमधून—मुख्यतः परा- शरस्मृतींत-सांगितला आहे ( भाग २. पान ३२३ पह्ा ). यामुळें:

१९० गझर्नीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

पंजाबांतील क्षात्रियांना, ते शूर, सामर्थ्येवान्‌ असूनहि त्यांचा प्राचीन- काळापासून चालत असलेला स्वभाव जो इंश्वरभमाव अर्थात्‌ दुसऱ्या- वर राज्य करण्याची इच्छा व दुसऱ्यांचे राज्य सहन न करण्याचा निश्चय हा जो क्षत्रियांचे स्वभावजकम म्हणून भगवद्वीतेंत सांगितला आहे तो पारखा झाला होता. आपल्या गांवांत जोपर्यंत एकाप्रकारचें अर्थस्वातंत्र्य उपभोगावयास मिळत आहे, तोंपर्यंत देशावर कोण राज्य करीत आहे ह्याकडे ते लक्ष देत नसत. राजकीय सत्ता मग ती ग्रीक, रक, कुशान, हूण किंबा तुक या परकीयांची असो किंवा सिंध अथवा कारमीर येथील स्वदेशी राजांची असो, अश्या जमीनदारांना कधींहि त्रास देत नसे. त्यामुळें हें गांवोगांव पसरलेले क्षत्रिय राजास त्रास देत नसत. यामुळें एक भेद, राज्य करणारे क्षत्रिय आणि रेती करणारे क्षत्रिय असा उत्पन्न झाला, हा भेद पंजाबांत अद्याप मानला जातो. राज्य करणारे क्षत्रिय म्हणजे रजपूत, प्रत्यक्ष राज्य करणा- रांचे पुत्रपौत्र, कधींहि शाती करीत नसत व नाहींत. एक गांब कां होईना तेवढ्यावर ते राज्य करीत. ही राज्य करण्याची क्षत्रियांची लालसा महाभारतांत युधिष्ठिराने दुर्योधनापाशीं जी शावटची मागणी केली तींत प्रतिबिंबित आहे. “ आम्हांठा निदान पांच गांवें दे. एका भावाला एक, आणि बाकीचें राज्य तूं भोग, ‘’ या वाक्यांत दिसणारा रजपूतांचा राज्य करणारा स्वभाव, पंजाबांत जे रजपूत शिल्लक उरले त्यांना पंजाबाच्या बाहेर पूर्वे हद्दीवरील हिमालयाच्या पायथ्याचे प्रदेश किंवा राजपुतान्याचीं वाळबंटें किंवा तेथूनह्दि पूवे व दक्षिण देश यांत घेऊन गेला. भाग २ यांत दाखविळेच आहे कीं, राजपु- तान्यांतील हलछलींचीं राज्य करणारीं ‘उराणीं ग्राक, राक, कुशान, हूण, तुर्क यांच्या स्वाऱ्यांच्या वेळीं पंजाबांन निघाळेली आहेत. मुख्यत चव्हाण, परमार, भाटी किंबहुना राठोड सुध्दां पंजाबांतेन आलेले आहेत,आणि पंजाबचे हिंदु तसे. मुसलमान झाळेळे रजपूत आपणांस

आक्षेपांचे निरसन. १९१

वर सांगितलेल्या रजपूत कुलांचच मानतात. तुकाच्या स्वाऱ्यांमुळें
झाबुलिस्थान प्रांत भाटी रजपुतांच्या कबजांतून गेला, तेव्हां ते पंजा-
बांत पसरले, आणि शेवटीं राजपुतान्यांत जेसलमीर येथें स्वराज्य स्थापून
राहिळे. मिठाच्या डोंगरांतीळ मुसलमान जंजुआ रजपूत हे अनूच्या
वंशांतळे आनव मानले जात असून पंजाबांतील अल्येत शूर क्षत्रियां-
मध्ये त्यांची गणना आहे. हे व इतर लढवय्ये हल्लींचे क्षत्रिय लोक
जे रजपूत गांवाचे पाटील बनून व कधीं शेतकरीहि होऊन
स्वतंत्रता बाळगून राहेले त्यांचेच वंशज आहेत.

. आतां हे जे क्षत्रिय गावांगावांतून राहिले त्यांनीं सुद्धां प्राचीन काळीं राज्ये स्थापण्याकडे दुर्लक्ष केळें याचें कारण असं कीं, बाहे- ‘ रील जे म्लेच्छ राजे राज्य करीत ते जितांचा धर्म स्वांकारून स्वदे- शनि राजे बनत. ज्याप्रमाणें नोमन लोक जेते होते तरी जितां- च्याच खिस्तीधमीचे असल्यानें ब्रिटन व संक्सन यांच्याशी एक- जीव झाले, त्याचप्रमाणे प्रीक, कुशान, आणि हूण हे हिंदुस्थानांत आल्यावर बौद्ध किंवा वैष्णव होत ( शेवटचा मिहिरकुल ह्या कडकडीत शैव बनला होता ). यामुळें त्यांचें राज्य परकी राज्यासारख भासले नाहीं. कारमीर, सिंध व काबूल यांचे राजे पुढें पंजाबावर राज्य करूं लागले, ते तर हिंदूच होते, आणि रितीभाती व संस्कृति यांत लो- कांशीं एकजीवच होते. त्यांचं राज्य परकीय असें कधींच वाटलें नाहीं. तुकोनीं जेव्हां पंजाब जिंकला, तेव्हां मात्र जित ब जेते यांच्या धमभेदामुळे, विशेषतः देवळें व मूर्ती फोडल्या गेल्याने, हे परकी राज्य असह्य झालें असलें पाहिजे. ह्याशिवाय मुसलमानी राज्य हिंदुराज्यापेक्षां जास्त जुलमी असे हें आम्ही पुढें दाखाविणारच आहों. असे होतं तरी पंजाबांतील शूर जमीन धारण करणाऱ्या क्षत्रियांनी आपलें राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला नाहीं. याचें दुसरें कारण झाळें तें या बहुतेक जाति जबरदस्तीने बाटविल्या गेल्या हें होय.

१९२ गझर्नाच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

पंजाबच्या पश्चिमेकडील भागांतील बहुतेक लढवय्या जाति मुसलमान झाल्यामुळें पंजाब प्रांतांतील लोकांत एक मोठी फट पडली आहे. हिंदुस्थानांतील सर्व लोकांत पंजाबचे लोक शूर व सशक्त असूनहि या दुभंगामुळें सर्वांत स्वराज्य मिळविण्यास अत्यंत अशक्त झाले आहेत. या क्षत्रिय जातीनीं जबरदस्तीने बाटविण्यास कां जोराचा विरोध केला नाहीं याची उपपत्ति अज्ञा दिसते की, एक तर कत्तलीं- तून आपणास बचावण्याची प्रबल इच्छा,आणि दुसरें आपल्या जमिनी व आपल्या वंशपरंपरागत पाटिलक्या इत्यादि वतनें कायम ठेवण्याची लालसा. याशिवाय हिंदूची धमभाळेपणाची समजूत अशी आहे कीं मनुष्य एकदां गोमांस खाऊन किंवा असंच इतर पातक जबरदस्तीने कां होईना करून बाटला म्हणजे तो पुन्हां हिंदू होऊं शकत नाहीं; यामुळेंहयि या कायमचे मुसलमान बनलेल्या लोकांची सहानु- भूति, जरी ते मूळचे क्षत्रिय होते तरी, साहजिकच मुसलमानी राजा- कडेच वळणार. यामुळें या परकी अमलांतहि स्वदेशी राज्य स्थाप- ण्याचा प्रयत्न शेवटीं शीख राजे १८ व्या शतकांत होईपर्यंत पंजा- बांत झाला नाहीं. शीख धर्माने मुसलमानी जुलमाचा प्रतिकार एका प्रकारची कास्न्क्रिप्शन,म्हणजे प्रत्येक मनुष्यांस शिपाई शिक्षण देण्याची पद्धत, प्राचीन प्रास किंवा रोम अथवा अर्वार्चान जर्मनी किंवा फ्रान्स या देशांत जारी आहे तशी अंमलांत आणून केला आणि मुसलमानांस जिंकळे, गुरु गोविंदर्सिंगास प्रत्येक शिखास शिपाई बनविण्याची आवश्‍यकता कळून आली, आणि पंजाबांतींळ ठोक जाल्याच लढ- | वय्ये असल्यानें गुरु गोविंद्सिंगास मुसलमानी धर्माप्रमाणे शीख धर्मीस लढवय्या धर्मे बनविण्यांत यश॒ आलें. पंजाबचा इतिहास . शिखापर्यंत थोडक्यांत असा आहे व शिखांपावेतो पंजाबांत स्वराज्य कां स्थापन झालें नाहीं व तेथील लोकांत राजकीय औदासीन्य काँ । होतें याचें विवरण असें आहे. पुढील परिस्थितींत पंजाबच्या लोकांची

पंजाबांतीळ धरमदोथिल्य दाखविणारे उलेख. १९३

जागृत झाळेली राजर्काय भावना हीं लोक दूभंग नसून त्रिभंग झाळे आहेत अशा वेळीं काय करूं शकेल हें सांगणें या ग्रंथाच्या उद्देशाच्या बाहेरचे आहे. तें राजकीय बाबींत पुढाकार घेतलेल्या वर्तमान व भावी लोकांवर सोपविले पाहिजे.

उत्तर हिंदुस्थानांतील हिंदू राजांनीं पंजाबावर आपले राज्य स्था- पण्याचा प्रयत्न कां केला नाहीं याचें कारण थोडक्यांत सांगूं. पंजा- बचे अर्धे लोक मुसलमान झाले होते, आणि ते अशा प्रयत्नास अनु- कूल झाळे नसते. काऱ्मीर किंवा कनोज असा प्रयत्न करण्यास या- वेळीं समर्थ नव्हता. सांबरचे चव्हाणांचे राज्य दूर होते आणि त्यांच्याताहे इतका कोणी प्रबळ राजा झाठेला दिसत नाहीं. बीसल ‘तिसरा हा जर आणखी कांहीं वर्षे वाचता, तर त्यानें कदाचित्‌ हा प्रयत्न केला असता. आपल्या वंशजांनीं असा प्रयत्न करावा असा त्यानें आग्रह्याचा उपदेश आपल्या एका शिलालेखांत त्यांस केला आहे त्याचा उल्लेख पुढें चव्हाणांच्या इतिहासांत येईल.

टिप्पणी-पंजाबांतील धमेशेधिल्य दाखविणारे महाभारतांतील उललेख.

कणेपर्व अध्याय ४० ते ४६ यांत कण आणि शल्य यांमधील एक जोराचा संवाद दिला आहे. त्यांत पंजाबच्या लोकांचें घार्मेक अना- ‘चार आणि वाईट चार्लांचे प्रकार कर्णाने दाखविले असून शल्यानें त्याचें उत्तर फारसें दिलेलें नाहीं. यावरून त्या काळीं आर्यावतीचे लोक म्हणजे हल्लींच्या वू. पी. व दिल्लीचे लोक पंजाबांतील हिंदूकडे श्रुद्र दृष्टीनें कसे पहात तं दिसते. “’ लोक आपल्या घरामध्ये इंसत खिदळत, गोमांस ‘खात व दारू पीत नाचतात आणि सक्यु व मासे खातात. मद्र देशांत ब सिंधुपळीकडील गांधार देशांत थुद्धता राहिली नाहीं. वंचू चावण्यावर जो मंत्र आहे त्यांत एक वाक्‍य असे आहे, “ मद्र देशाच्या लोकांशी

म…भा, १३

१९४ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

मी व्यवहार ठेवणार नाहीं, या पुण्यानें ह॑ तुझें विष नष्ट होवो. ! (अध्याय ४३ ), अध्याय ४४ मध्यें आणखी असे सांगितलें आहे. “वाहिक देशांत, जेथे पांच नद्या आणि सहावी सिंधु वाहते तेथे, कोणी जाऊं नये. कारण तो देश हिमालयानें किंवा गंगा, यमुना व सरस्वतीनें पवित्र झालेला नाहीं. किंवा त्यांत खरा धर्म व शुद्धताहि राहिली नाही. गोमांस लशुनासह खाणारे आणि ‘णूळ व तांदुळ यापासून केलेली सुरा पिणारे लोक शीलवर्जित आहेत. या देशाचें नांवच आरट्ट आहे. आणि तो घर्महीन आहे, मनुष्यानें तेथे जाऊं नये. तो व्रात्यांचा म्हणजे धर्मसस्कार- हीनांचा आणि यज्ञहीनांचा देश आहे. जर तुम्ही युगंधर नगरांत पाणी प्याळ आणि अच्युतस्थलांत रहाळ किंवा भूतलव्याच्या तलावांत स्नान कराल तर तुम्हास स्वगे कसा मिळेल १ आरद्ट बाहिक देशांत आर्यानें दोन दिवस राहूं नये. तेथे ब्राम्हण आज क्षात्रिय होतो, मग वेश्‍य, मग शूद्र आणि शेवटीं नापित होऊन पुनः ब्राम्हण होतो. ” शल्यानं आपल्या जबाबांत एवढेंच उत्तर दिलें आहे कीं चांगले ब बाईट ळोक प्रत्येक देशांत असतात.

प्रकरण अठरावे. महमुदाच्या मागूनचे राजे.

महमुदानें हस्तगत केलेला पंजाब व काबूल हे प्रांत जरी यापुढें

हिंदु हिंदुस्थानचे भाग उरले नाहींत तरी महमुदाच्या नंतरच्या राजां च्या कारकीर्दीतील गझनीच्या राज्याचा त्रोटक इतिहास, त्यांत आले- ल्या हिंदु हिंदुस्थानच्या उछ्लेखांच्या अनुसंधानाने, देणें आवश्‍यक आहे. गझर्नाच्या राजघराण्याचा संक्षिप्त इतिहास मिनाजउससिराजनें तबकात-इ-नासिरीमध्यें दिला आहे. मिनाजउस्‌सेराज हा विद्वान्‌ गृहस्थ पुष्कळ राजांच्या कारकौर्दीत–नासिरुद्दीन व धिआसुउद्दीन यांच्या कारकीर्दांतहि-दिलछलीचा व त्याभोंवतालच्या साम्राज्याचा काझी होता ( इलिअट्‌ २ पान २६० ). त्यानें हा इतिहास ल्हिन हि. स. ६५० च्या सुमारास तो नासिरुद्दीन यास अपण केला. बैहृकीनें मसाउदच्या कारकौदींचा सन १०५० च्या सुमारास लिहिलेला गोष्टीरूपाचा सविस्तर वृत्तांतहि उपलब्ध आहे. त्यानें लिहिलेल्या गोष्टी बहुधा त्याच्या डोळ्यादेखत घडलेल्या आहेत. आणि हा ‘ वृत्तांत माहितीने भरळेळा आहे. ह्या दोन पुस्तकांवरून हिंदु हिंदु- । स्थानच्या उछेखांस उद्देशून जरूर असलेला महमुदानंतरच्या गक्- ‘ नबी राजांचा त्रोटक इहातिहास या प्रकरणांत आम्ही देणार आहोंत. ।__ महमुदाचे दोघेहि मुलगे मसाऊद व महंमद हे एकाच दिवशी ‘ दोन मातांच्या पोटी जन्मास आळे. मसाउद हा शरीराने असा ‘ शक्तिमान्‌ होता कीं, त्याची गदा खुद्द महमुदासाहे पेळत नसे. ‘ परंतु तो उच्छुंखळ आणि भांडखोर होता. महंमद हा शांत आणि | हुशार होता; आणि त्यामुळें बापाची त्याच्यावर मर्जी होती. मसा-

१९६ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

ऊद प्रजेला व सैन्याला पीडा देईल अश्या समजुतीने महमुदानें महंमदाला युवराज नेमिळें आणि खलिफाकडून खुतब्यांत त्याच्य नांवाचा समावेश करण्याची परवानगी मिळविली. याबद्दल एका अधिकाऱ्याने खासगी संभाषणांत मसाउदचें सांत्वन केळें असंतां मसाउदनें मुसलमानांच्या नेहमींच्या उत्साहाने उत्तर दिलें “ सिंहा- सनाच्या निर्णयाचा अधिकार कागदाच्या भिंडोळ्यांपेक्षां तरवारींतच चांगला दिसून येतो. ‘” आणि अपेक्षेप्रमाणेच वस्तुस्थिति घडून आली. महमुदाम्रमाणेच बापाच्या मुयुत्समयीं मसाऊद हा खोरासान’चा प्रांताधिकारी होता. आणि गझर्नाच्या राज्यावर बसलेल्या महंमदावर, महमुदानें जशी आपला भाऊ इस्माएकळ याचेवर स्वारी केळी होती तशीच, मसाउदनें तात्काळ स्वारी केळी. पण मसाउदनें महमुदावरहि ताण केली. त्यानें आपल्या भावाचे डोळे काढले आणि ल्याला संदैव कडक कैदेत वागाविळें. महमुदाचें प्रचंड साम्राज्य आपल्या अधिकारांत आणल्यावर त्याच्या भावानें निरानेराळ्या अधिकार्‍्यांस दिलेला पैसा त्यांचें हाळ करूनहि एकूण- एक मसाऊदनें वसूळ केला. महमुदांत व शिवाजींत जसं साम्य होतें त्से ह्ररक बाबतींत त्याचा मुलगा मसाउद आणि संभाजी यांच्याताहे| होतें. संभाजीहि मसाऊदप्रमाणेंचे शारीरानें सामर्थ्यवान्‌ होता; आणि त्यानेंहि बापाच्या मृत्यूनेतर आपला भाऊ राजाराम यास पदच्युत करून त्याच्या आईचा जीव घेतला. त्यानें. साधारणपणें दहा वर्षे जोमानें राज्य केलें; शेवटीं अवरंगजेबानं त्यास पकडून त्याचा क्रूरपणे अंत केला. मसाउदचाहिे दहा वर्षांच्या तेजस्वी कारकार्दीनंतर असाच शोचनीय अंत झाला. संभाजी व मसाउद याः दोघांचाहि आपआपल्या धर्मावर पूर्ण विश्वास होता. महमुदाप्रमाणेंच मसाऊदनेंहि धमसुधारकांचा छळ केला आणि हिंदुस्थानावर धर्म- प्रसारा्थ कांहीं स्वाऱ्या केल्या.

महसुदाच्या मागूनचे राजे. १९७

महमुदानं आपल्या घराण्याच्या हातीं दिलेल्या राज्याची कारभार- पद्धति कशी व्यवस्थित होती हें बैहकीनें लिहिलेल्या तपशीलवार सरस वृत्तांतावरून दिसून येतें. प्रधानांना वसे य्यावयाची तीं मोठया समारंभान देण्यांत येत. सव गोष्टींत सुलतान आपल्या प्रधानाचा शिरस्त्याने सछा घेत असे व सुलतान व प्रधान यांचें दर- म्यान जो खलित्यांचा व्यवहार होई तो सुलतानाच्या प्रायव्हेट सेक्रे- टरीमार्फत होत असे. सव हुकूम लेखी सुटत असत. हिंदुस्थानां- तीळ पंजाबप्रांताचा कारभार काझी व सेनापति यांचें माफत चाल- विण्यांत येई. ते दोघेहि लाहोरास रहात. मुलकी राज्यकारभार कार्झाचें हातीं असून तो कर वसूळ करी व न्याय देई. आणि लढाया करण्याचें, तसेच खंडण्या वसूळ करण्याचें, आणि हत्ती पाडाव करून आणण्याचे व बंडखोर हिंदूंना जिंकून शासन करण्याचें काम सेनापतीकडे असे (ईंलियट २ ,पा. ११९). अहमद निआल्तगिन याची जेव्हां हिंदुस्थानचा सेनापति म्हणून नेमणूक झाली तेव्हां द्याला सुलतानाकडून खिछृत आगि सुलतानाचा तोंडी हुकूम मिळाला, व लगेच एक लेखी सनद देण्यांत आली. नंतर

. शपथेचा विधि झाला, आणि आपण सुलतानाची नोकरी एकनिष्ठ-

पणाने बजावं अश्या अथाच्या करारावर त्यानें आपली सही केली आणि मग हे सव कागद सुलतानास दाखवून दप्तरदाराचे हवालीं

करण्यांत आले ( होलियट २ पा. ११९). निआल्तगिन हिंदुस्थानांत आला तेव्हां त्याचें बरोबर गुलामीतून मुक्त केलेळे कांहीं बंडखोर सैनिक व गुलाम पाठविण्यांत आले होते. त्यांच्यावर देखरेख करून त्यांना उद्योग लावण्याचे काम निआल्तगिन यास सांगितलें होतं. मोजेची गोष्ट ही कीं, त्यांना चेद्रभागेचें पठीकडे जाऊं देऊं नये किंवा लाहोरच्या सैन्यांत मिसळूं देऊं नये अस हुकूम देण्यांत आला होता. ते लाहोरास गेल्यास त्या राजाधानीच्या शहरीं कांहीं बखेडा

१९८ गझर्नाच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

उत्पन्न करतील, आणि स्वतंत्र हिंदुस्थानांत जाऊं दिल्यास ते घोटाळा माजवतीळ अशी समजूत असावी.

सेनापतीच्या अनेक कामांपैकी हें एक काम असे कीं, ल्याने पंजाब-हिंदुस्थानांत स्वाऱ्या करून तेथील ठाकुरांपासून खंडण्या वसूल कराव्यात, हें ठाकुर म्हणजे लढाऊ व स्वतंत्र बाण्याचे आणि ता- ब्यांत ठेवण्यास कठिण असे जमीनदार होते. ते क्षत्रिय वणीचे असून त्यांचें वर्णन पूर्वी करण्यांत आलेंच आहे. निआल्तगीनानें हिंदुस्था- नांत स्वारी केली व तो बनारसपर्यंत चाळ करून गेला.“ महमूदहि इतका खालीं उतरला नव्हता ”’ असें बैहकीनें म्हटलें आहे. यावरून असे निर्विवाद दिसून येतं कीं, महमुदानें राज्यपालाचा राहिब नदी वर पराभव केला तेव्हां तो बारीच्या अलिकडे आला नसावा. राहिब ही औंधमधीळ कोणती तरी ( घागरा किंवा गोमती ) असावी. निआ- ल्तगीन व काझी यांच्यांत कांहीं बाबतींत तंटा उपंस्थित झाला. (ब्रिटिश हिंदुस्थानांतहि मुलकी ब फौजी अधिकार्‍्यांत तंटे होऊन अतिशय नुकसान झाल्यानें रोवटीं हिंदुस्थानच्या राज्यपद्धतींत गव्ह- नेर जनरलाची हुकमत सेनांपतीवर कायम झाली आहे ). मुख्य प्रधानाने निआल्तगीनळा असें सांगितलें आहे कीं, तुं हिंदुस्थानचा सेनाध्यक्ष आहेस व काझीची कोणल्याहि तध्हेची तुझ्यावर हुकमत नाहीं ( इलिअट २, पा. १२८ ). निआल्तगिननें काझीशीं भांडण केळें व मसाउदच्या संमतीनें हिंदुस्थानांत स्वारी केली. काझीशीं झालेल्या भांडणांत मसाउदने निआल्तागेनाचा पक्ष उचलला होता

या स्वारीचें वर्णन बेहकीनें पुढीलप्रमाणें केलें आहे. “ निआल्त- गीन गंगा उतरला आणि दक्षिण तौरानें चाल करूंन गेला. ह्यानें आपलें सैन्य अकस्मात्‌ बनारस पुढें उभें केलें. तें शहर गंगाच्या राज्यांत होतें. त्याचं क्षेत्र दोन चौरस फर्लांग (५ मेळ) होतें व ह्यांत पाणी विपुल होतें. ( गंगाच्या ) भातीमुळें सैन्य शहरांत फक्त

महसुदाच्या मागूनचे राजे. १९९

सकाळपासून दुपारपर्यंतच राहिलें, सैन्यांतील लोकांनीं सुगंधी विक- णारे, जवाह्विरे व जरतारी काम करणारे यांचीं दुकानें ळुट्टून फस्त केली; व सोनें, चांदी, सुगंधी द्रव्ये आणि जवाहीर यांच्या लाभानें आभर होऊन ते सुरक्षितपणें परत गेले. ‘’ बेहकीनें हें सर्व आपल्या डोळ्याने पाहिळें असण्याचा संभव आहे. तो त्यावेळीं हयात होता यांत तर वाद नाहीं. त्यानें या स्वारीचा कालइ. स. १०३३ दिला आहे. बनारस शहर हें त्रिपुरचा कलचूरी राजा गांगेयदेव याच्या राज्यांत या वेळीं होतें असं दिसतें.

गांगेयदेव हा सामथ्येवान्‌ राजा होता. त्याचें सैन्य बहुधा जवळच कोठें तरी असावें, आणि त्याचें सामर्थ्य प्रसिद्ध असल्यामुळें तुर्क ल्याला फार भात असत. बाजारांत कापडवाले, गंधी ब जबाहिरे यांचीं दुकानें होतीं. या धंद्यांची अजनहि बनारसेंत भरभराट आहे. बनारसंत पाणी मुबलक होतें असा जो उल्लेख आहे तो विहिरांच्या पाण्यास किंवा हहराभावतालच्या प्रदेशांतील पाण्यास उद्देद्यून असावा. खुद्द बनारस गंगेच्या तीरावरच वसलेले आहे,

या यडास्वी स्वारीनें निआल्तगिनाचें डोके महत्वाकांक्षनें फिरून गेळें आणि आपलें स्वतंत्र राज्य स्थापण्याच्या कल्पना त्याच्या मनांत घोळावयास लागून तुकस्थानांतून तुकी लोकांस सैन्यांत दाखळ कर- ण्यास त्यानें सुरवात केली, परंतु ही गोष्ट काजीनें मसाउदच्या काना- वर घातली. त्याने निआल्तगिनाठा बडतर्फ केळें आणि त्यास शक्‍य- तर जिवंत पकडण्यासाठी एका हिंदु सेनापतीस हुकूम दिला. नि- आल्तागिनाचा अखेर पराभव झाला आणि सिंधूनदीवर जाटांनीं त्याचा पाठलाग केला व त्याळा मारून टाकलें. प्रबळ सेनापाति किंवा गुलाम हे रात्रप्रमाणेचे मालकासहि कसे पीडाकारक होतात हं या गोष्टींवरून प्रत्ययास येतें

या महत्वाच्या व विश्वासाच्या कामगिरीवर हिंदुसैनिकांची व

२०० गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

सेनापतीची योजना करण्यांत आली होती, यावरून गझनीच्या मुस- लमान राजांच्या अमलाखालीं हिंदूस जबाबदारीच्या जागांवर नेम- ण्यांत येत असे असें दिसून येतें. मुसलमान लेखकांनी देखील त्यांच्या शौर्याचे वर्णन केलें आहे. हिंदु सैनिकांच्या भरतीस महमु- दाच्याच कारकीदीत सुरवात झाली, जयपालानें २००० सैनिकांचे दळ कांहीं कालपावेतो गझनीस ठेविलें होतें. हिंदुस्थानच्या हिंदु सैनिकांनी आपला अतिशय छळ करणाऱ्या आपल्या शात्रकडे भाडोत्री शिपाई म्हणून राहावें हें इलियटलाहि विचित्र वाटले, (ई. २ पा ४४८). परंतु हिंदुळोकांचे पूर्वीच वर्णन केलेलें धार्मिक व राजकीय औदासीन्य ध्यानांत घेतलें असतां त्यांनीं परकीय अंमलांत नोकऱ्या- धरून नेहमींच आपल्या राजानेष्ठेनें व युद्ध-प्रावीण्यानें गोरव कसा संपादन केला याचे आश्चर्य वाटणार नाहीं, हिंदूंना आरंभीच मिळालेल्या या व इतर मानांचा इलियटनें उल्लेख केला आहे. आपल्या राज्यारोहणाला विरोध करणाऱ्या आपल्या सररदारांविरुद्ध सावंद नांवाच्या हिंदूंची मसाउदनें योजना केली. (या लढाइत सावंद हा आपल्या सैनिकांसह गारद झाला ). विजयराजाला महमुदानेंच सेनापाति नेमळें होतें व मसाउदच्या नंतर पुढील सुल- तानांनीहि पुनः त्याला नोकरीवर बोलाविले. अशा अनेक उदाह- रणांचा ईल्यिटनें उलेख केला आहे (ई. २, पा ६० ). जाटांनीं निआल्तगिनाला ठार मारलें ताहि आपल्या राजाच्या राजानिष्ठपणें सवेत.

निआल्तगिनाची बनारसेवरील स्वारी यशस्वी झाली यावरून कनोजचें राज्य कसें दुबळ झालें होतें हें दिसून येतें. त्याला आतां साम्राज्य-पदवी उरली नव्हती. राज्यपाळ मरून गेला होता. त्रिलो चनपाल त्याच्या गादीवर आला होता. प्रयागास त्यानें केलेल्या दान पत्नाचा उछठेख मागे आलाच आहे बनारस प्रमाणें प्रयागाहे गांगे- याचे ताब्यांत गेळे असावें. कलचूरींच्या इ’तेहासांत गांगेयाचा अंत

आक

महमुदाच्या मागूनचे राजे. २०१

प्रयागास झाला याचा उल्लेख येणार आहे. त्रिलोचनपालानें किती
वर्षें राज्य केळें व त्याच्यामागून राजा कोण झाला हं माहीत नाहीं.
कोलब्रुकनें प्रसिद्ध केलेल्या लेखांतील एका भंगलेल्या शिलालेखांत
एका यशःपालाचा उल्लेख आहे (२ पा. २७८). या लेखांत
त्याला महाराज ही पदवी लावली आहे परंतु परमेश्वर या नेहमांच्या . पदवीचा उपयोग केलेला नाहीं. त्यानें यमुनेचे दक्षिणेस व प्रया- ‘ गाचे नैक्रत्येस कोसंबी–मंडलांत एक दानपत्र केलें आहे. कनो- जचा औधवर पूर्ण अमल होता. परंतु निआल्तगिनाच्या स्वारीने प्रोत्साहन मिळून तुर्क लोक औधमध्यें अधिकाधिक घुसूं लागले. महमुदाचा भाचा साळार मसऊद याच्याबद्दह जी एक असंभाव्य गोष्ट सांगण्यांत येते तीवरून असं अनुमान करावयास खास जाग आहे कौ, तुर्कानीं विशेषतः औधमध्ये बऱ्याच स्वार्‍या केल्या अस- ल्या पाहजेत;कारण या गोष्टींचा सव प्रसंग औध प्रान्तांतील आहे. त्यावेळीं साठार मसाउदचा तळ ओघ प्रांतांतील सध्याच्या बाराबांकी जिल्ह्यांत सत्रेख येथें होता व तेथून त्यानें अवघांत निरनिराळ्या भागांत स्वाऱ्या केल्या अशी समजूत आहे. ओधमधीळ अनेक जिल्ह्यांत या साधुपुरुषाच्या जागा आहेत अशी कल्पना आहे.या स्वाऱ्या इ,स. १०३८ पासून १०१५५० पर्यंत झाल्या. सालारची गोष्ट अगदींच कल्पनिक नाहीं; कारण बदाऊन येथें सांपडलेल्या ( ए. इ. २, ६४ ) एका राठोड शिलालेखांत असं म्हटलें आहे कीं, राठोड राजांपैकीं मदनपाळ राजाने कोणत्याहि अमिराला स्वारी करणें अराक्य करून टाकळे. या शिंलालेखाबद्दल विस्तृतपणे विवेचन आम्ही दुसर्‍या एका प्रकरणांत करणार आहोंत, या शीलालेखांत काल दिलेला नाहीं व त्यामुळें मदनपालाचा काळ निश्चित करितां येत नाहीं. तर्थापे आमची समजूत अशी आहे कीं हा स्वा- ऱ्यांचा उल्लेख निआल्तागेन किंवा सालार मसाऊद यांस उद्देशून

ब्र

२०२९ गझनीच्या महसुदाच्या स्वाऱ्या.

असला पाहजे. हिंदुस्थानांतील रजपूत राजांना विशेषतः या पवित्रा ती्थीवरील स्वाऱ्यांमुळें क्रोध आला. आणि माल्वाथिपाति भोज ( इ. स. १०४० ), त्रिपुर्चा राजा कर्ण कलचूरी व शेबटीं गाहडवाल चंद्रराजा यांनीं तकांस व इतर परकीयांस उत्तर हिंदु- स्थानाबाहेर हांकून लावून “ परकायांच्या जूलमांतून देशाची सुटका केली; हा कथाभाग पुढें येणार आहे. चंद्राने कनोज काबीज केलें ब तेथें आपलें प्रबळ राज्य प्रस्थापित केळे. अशा तऱ्हेनं प्रतीहारांचें दुबळ झालेलें घराणें इ. स. १०८० त नष्ट झाळें. हे अलीकडचे प्रतीह्मार राजे पूर्वांच सांगितल्याप्रमाणें गझनीचे मांडलिक बनले होते. त्यांनीं आपल्या राज्यांतील गांवांवर तुरुष्कदंड नांवाचा कर बसविला होता. गाहडवालाहे तो दंड वसुल करीत परंतु तो त्यांनीं तुकांस दिला नाहीं असे दिसतें. दान दिलेल्या गांबीं तो इना- मदारास मिळे.

हा वृत्तात आवश्‍यक असला तरी प्रस्तुत विषयाला सोडून केवळ प्रासंगिक असा आहे, तेव्हां आतां आपण पुनः गझनवीच्या राजांच्या वृत्तान्ताकडे वळूं. बेहकीनें असं लिहिलें आहे कीं एका वर्षी गझनी नदीला एकाएकीं पूर आलाव त्यामुळें शहरांत भयंकर नुकसान झालें. नदीवरीळ पूळ सबंधच्या सबेध वाहून गेला. याकुबइलेस व त्याचा भाऊ यांनीं बांधळेला गझनीचा किल्ला मात्र जशाचा तसा कायम राहिला. गणितांत पारंगत असलेल्या मसाउदने नवीन एक प्रचंड एकाच कमार्नांचा पूल बांधला. त्यानें अनेक राजवाडेहि बांधळे आणि सुंदर बागाहि लाविल्या |

परंतु सामर्थ्यं, शोर्य, विद्वत्ता, प्रजाहितर्बुद्धि वगेरे अनेक सदूगुण अंगीं असतांहि मसाउदची कारकीर्द द्दैवाची झाली; व कमनशिबानें आपल्या राज्याच्या अर्ध्या अधिक भागास त्यास मुकावें लागलें बेहकी म्हणतो “ अमीर मसाउदमध्यें वैगुण्य असें कोणतें होतें £

ल. २३ महसदाच्या मागूनचे राजे. २०३

त्याच्या जवळ विश्वासू नोकर, उत्तम अधिकारी, नामांकित योद्धे आणि प्रसिद्ध विद्वान्‌ हे सर्व होते. परंतु नियतीने असं योजिले होतें कीं, त्याची कारकीर्द कष्टाची व त्रासाची व्हावी आणि खोरा- ‘ सान, रूबारिझम, रे आणि जब्बाल हे प्रांत त्याच्या अमलांतून निघून ‘ जावेत. ” “ या अमिरानें आपली पराकाष्ठा केळी आणि मोठाली ‘ सैन्ये उभारली. निरानेराळ्या योजनांचा विचार करण्यांत त्यानें झोपेशिवाय रात्रींच्या रात्री घालविल्या. परंतु त्याची स्थिति खालावतच गेली!” ( ईलियिट २). कदाचित्‌ त्याच्या विचारांचे अनिबद्ध स्वातंत्र्य आणि दुसऱ्याचा सला ऐकून घेण्याची नाखुषी हें त्याच्या अप- कर्षांचें कारण असावें. महमुदानें खोरासानमध्यें कांहीं सेल्जुकी तुकांस वसाहत करण्याची परवानगी चुकीनें दिली होती. आणि तेथेंच बंडाला सुरुवात झाली. मसाउदचा थोरला मुलगा शहाजादा मोदूद हा नेहर्माच्या शिरस्त्याप्रमाणे खोरासान व बल्ख या प्रांतावर अधि- कारी होता. तो अधिकारी असतांना सेलजुकी तुकानीं बंडाचा झंडा उभारिला. गझनीच्या सैन्याचा पराभव झाला.त्या प्रांतावर आक्ससच्या उत्तरेकडूनहि स्वारी करण्यांत आली. तेव्हां प्रचान व इतर अधिकारी यांनीं मसाउदाला जातीनें तु्कांवर चाळून येण्याविषयीं सछा दिला. हा सछा न जुमानतां मसाउदनें हिंदुस्थानांत धमप्रसार करण्याच्या हेतूने स्वारी करून सतलजच्या दक्षिणेस सांप्रतच्या हिस्सार जिल्ह्यांत हान्सीला वेढा दिला; व अशा रीतीनें आपलें राज्य पंजाबापलीकडे वाढाधण्याचा प्रयत्न केला. ही स्वारी इ. स. १०३७त झाली. त्या प्रांतावर व किछ॒यावर ताबा कोणत्या राजाचा होता हें निश्चित झा- ठेळें नाहीं. हिस्सार गेझेटियर ( पा. १९ ) मध्यें असें म्हटलें आहे कीं, हान्सीचा हा प्राचीन किल्ला चाह्मान विश्यालदेवाचा पुत्र अनुराज याच्या ताब्यांत होता. अनुराजाचा पुत्र तेष्टपाळ यास तेथून

२०४ गझनीच्या महमसुदाच्या स्वाऱ्या.

हांकून देण्यांत आलें. त्यानें पुढें बुंदीचे हाडा घराणें स्थापिले. > परंतु पुढें चाहमानांच्या इतेहासांत आपल्याला असे दिसून येईल कीं, या काळांत त्यांचा वाक्‍्पति राजा राज्य करीत होता आणि गौरीदकर ओझा यांचें असें म्हणणें आहे कीं, बुंदीचे चाहमान घराणें नडूलच्या चाहमान घराण्याचा १२ वा राजा आसराज याचे पासून उत्पन्न झालें. किछ॒यावरीळ राजाचें नांव कांहींहि असो, तो चाहमान होता व तो शोयोनें लढला यांत संशय नाहीं. बेहकीनें या वेढ्याचें वर्णन असें केळे आहे, “’ वारंवार अत्यंत निकराच्या लढाया होत असत, किछृयावरीळ शिवदीनें जिवावर उदार होऊन किल्ला लढविला. विजयी सैन्यांत ( मुसलमानांत ) गुलामाहे अति- शय शोयानें लढले. सरतेशेवटी पांच ठिकाणीं सुरुंग खोदण्यांत आले व रबिउल अव्वल पूर्वी १० दिवस एका सोमवारीं किछ॒याच्या भिंती कोसळल्या. किल्यावर मारा करून तो पाडाव करण्यांत आला, ब्राह्मण व इतर प्रमुख लोकांस ठार मारण्यांत येऊन त्यांच्या बायका पकडून नेण्यांत आल्या. सांपडलळेंळा सवे खजिना सैन्यांत वांटण्यांत आला. हा किल्ला हिंदुस्थानांत विठाद्ध किला म्हणून प्रसिद्ध आहे.” (३9२७१४०)

वरील वर्णनावरून दोन नवीन अशा गोष्टी दृष्टोत्पत्तीस येतात, पहिली सुरुंगाची. त्या काळी बंदुकीच्या दारूचा शोध लागला नव्हता अशी हल्ली समजूत आहे. तेव्हां दुसरे कोणतें तरी स्फोटक द्रव्य वापर- ण्यांत आलें असलें पाहजे खास. तें काय होतें हें सांगणें मात्र

काठण आह. ब्राह्मणाचा कत्तल हा दसरा गाष्ट हाय. महूमुदाच्या

लढाईंतीळ क्रौ्यांत यामुळें पुढें पाऊल पडलें, ( उत्बीनं आपल्या सविस्तर वर्णनांत या गोष्टीचा उछेख केला नाहीं. कदाचित्‌ हा

< हा मजकूर कोठून घेतला आहे हें समजणे कठीण आहे,

धि र

| महसुदाच्या मागूनचे राजे. २०५ ।

॥ ! उल्लेख चुकून राहिला असावा. ). पंजाबातील क्षत्रिय व चाहमान | वेगेरे उत्तर हिंदुस्थानांतील रजपूत यांच्या स्वभावांत फरक होता. या रजपुतांनीं राज्यें केली होती, त्यांना दुसऱ्याच्या अमलाखाली राह- ण्याचे माहित नव्हेते. यामुळें लवकरच दिल्लीच्या तोमरांनीं हा किल्ला व व्या भोवतालचा प्रांत तुर्कांच्या ताब्यांतून सोडवून घेतला असें दिसून येते. फिरिस्तानें लिहिल्याप्रमाणे इ. स. १०४३ मध्यें ‘ हे तोमर चांहमानांच्या आश्रयाखाली उदयास येत होते. गझर्नास परत आल्यावर आपण मोठी चूक केली असं मसाऊद- ला आढळून आलें. अम्ञेयीकडे आपलें राज्य वाढवीत असतां वायव्ये- कडील अत्यंत महत्त्वाचा खोरासान प्रांत तो गमावून बसला होता, महमुदालाच फक्त पूव व पश्चिम या दोहा दिशांस अनुसंधान राखतां आठे. मसाउदरचे लष्कर दूर हिंदुस्थानांत लढाईत गुंतलें आहे असें पाहून सेळजुकी तुकांनीं खोरासानवर स्वारी केळी आणि ल्या प्रांताला खालसा केलें. ते आतां गझर्नावर चाडून येण्याची तयारी करीत होते; आणि त्यामुळें मसाऊद भांबावून गेला. आपलें सव कुटुंब व खाजिना घेऊन हिंदुस्थानांत निघून जाण्याचा त्यानें निश्चय केला व त्याप्रमाणें हकूमहि सोडले. त्याच सरदार, सेनापति, सै- न्यांतील अधिकारी व त्याची आईंडहि यामुळें संतापून गेली व ल्या सर्वानी त्याचा क्रोधपूर्ण निषेधहि केला. परंतु नेहमीप्रमाणेच मसा- उदवर त्याचा कांहीं परिणाम झाला नाहीं. त्याला उपदेश करण्याची किंवा सल्ला देण्याची सोयच नव्हती. मोंज ही कीं, त्या शूर राजाचा हा निश्चय ज्योतिषावर उभारलेला होता. – महंमदानें जरी आपल्या घर्मात ज्योतिष पाहण्याचा तीव्र निषेध केला आहे, तरी तुक आणि अरब यांचा हिंदूप्रमाणेंच ज्योतिषावर विश्वास असे’‘त्याच्या मुख्य प्रधा-

– अल्बिरुनी हा गणितज्योतिषी व फलज्योतिषी हाता.

२०६ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

नाने मसाउदच्या या निश्चयाचा निषेध करून त्यास असं कळाविळें कीं, आपली बायका माणसें व खाजिना घेऊन उत्तर हिंदुस्थानांत निघून तुम्ही गेलात तर ही बातमी शात्रूंत व मित्रांत पसरंल्याबरोबर प्रत्येकाला आपली सत्ता वाढविण्याची हांव असल्यामुळें संकट ओढ- वल्याखेरीज राहाणार नाहीं. ‘’ परंतु तो निरोप ऐकून तो दुर्दैवी मसाऊद उत्तरला कीं, “ या वेडयाला आपण काय म्हणतो आहोंत हेंच कळत नाहीं.मी जें जे ठराविळें आहें तेंच योग्य आहें. तूं प्रेमानें लिहिलें आहेस हें मला कबूल आहे. स्वस्थ रहा आणि माझें हुकुम पाळ. कारण मला जं दिसतें आहे तें तुला दिसूं शकणार नाहीं. मसाउदनें शहर व किल्ला कोतवाल बुअल्ली याचे हृवालीं केला व त्याला सांगितळें कीं, “ युवराज मौदूद, प्रधान व बरेचसे सेन्य हीं सर्व दूर राहतील. कांहींहि होवो, उन्हाळ्यांत सर्व नीट जुळवून घेईन, ज्योतिषांनी असें सांगितले आहे कीं हिंवाळा मला अनु- कूल नाहीं. ” कोतवालानें ल्याला विनवून सांगितळें कीं, झनाना व व खजिन) कोठें तरी बळकट ।कछूयांत सुरक्षित ठेवावा व तुम्ही येथे रहावे; परंतु सुलतानाने त्याला उत्तर केलें हीं, “ आपल्या बरोबरच बाळगावयाचीं.’/असें म्हणून हिंदुस्थानच्या प्रवासांत आपल्याला शांति व सुख मिळावें यासाठीं त्यानें देवाची प्राथना केली. ( बैहकी ई० २ पा० १६२ ).

हिंदुस्थानांत जाऊन आपल्या प्रह्यांची आनेष्टता टाळावी असा सुलतानाचा हेतु होता. आजच्याप्रमाणें त्या काळींहि वाहिंद, मार्मि- नारा (2) बरशोर (पेशावर) व किरिल(१) हीं शहरें व ल्याभोंबताळचा सिंधूच्या पश्चिमेकडील प्रांत हिंदुस्थानांत मोडत होते (ई. २ पा, १५० ). असो, हिंदुस्थानांतहि अनिष्ट प्रह्मंनी मसाउदचा नाश करावयास कमी केलें नाहीं. मार्गालटन घाटांतून ( हसन-अबदाल- च्या पाश्चिमेस थोड्या मैलावर रावलपिंडी व अटक यांच्या दरम्या-

महसुदाच्या मागूनचे राज. २०७

नच्या डोंगरांत ) तो जात असतां मुसलमान व हिंदु बंडखोर गुला- मांनींच त्याला पकडून कैद केलें. त्यांनीं अंध महंमदाला कैदेतून ‘ बाहेर काढलें आगि त्याला राज्यावर बसविलें ब मसाउदला गिराच्या | किछठ॒यावर नेऊन मारून टाकण्यांत आलें. मसाउदच्या या शोच- नीय अंतानं संभार्जाच्या करुणास्पद मृत्यूची आठवण होते. त्यानेंहि ‘ मसाउदप्रमाणेंच आपल्या बापाने कमाविलेल्या राज्यांताळ फार मोठा ‘ मराठी भाग घालवून दूर कनांटकांत लहानसा प्रान्त शिल्लक ठेविला ‘ आणे तो भाग गशझर्नाच्या राजांना हिंदुस्थान जसा आश्रयास उपयोगी पडला त्याप्रमाणें राजारामास आश्रयस्थान झाला. दोघेहि अत्यंत शर, विद्वान्‌ १ धर्मोत्साह्यी असूनहि आपल्या हट्टाने आणि सदुपदेशाचा अव्हेर करून दु:खांत बुडाळे.विपुल साघनसामुग्री असून । तिचा उपयोग करण्याची पात्रता नसेल तर ती कुचकामाची ठरते हे ‘ दोघांच्याह्ि चरित्रावरून स्पष्ट दिसून येतें. सुरुवातीस पुरेशी साधन संपात्ते नसतांहि महमूद व शिवाजी हे मोठेपणास चढले ( यांतच त्यांचा थोरपणा आहे ) आणि मसउद आणि संभाजी विपुल साधनें ‘ असून हि राज्यनाश होऊन मारले गेले.

आम्ही मसाउदच्या कारकौर्दींचा इतिहास इतका सावस्तर दिला आहे तो अशासाठी कीं, त्याच्या सान्निध्यानें महमुदारचे महत्व . स्पष्ट होतें आणे शिवाय त्याच्या कारकार्दीत हिंदुस्थानांत आणखी . प्रांत काबीज करण्याच्या हेतूनें बनारसच्या व हार्न्साच्या दोन * मह- _ त्वाच्या स्वाऱ्याहि झाल्या. आतां गझनीच्या इतर राजांचा इतिहास हिंदुस्थानशीं संबंध येणाऱ्या गोष्टींचा उल्लेख करून थोडक्यांत देऊं.

% सरदेसाई यांच्या ग्रंथांत तिसऱ्या एका स्वारीचा उल्लेख आढळतो त्या स्वारींत त्यानें कारर्मारांत सरस्वती नदीवर’वा एक किल्ला हस्तगत केला. परंतु बेहकीनें या स्वारीचा उल्लेख केला नाहीं, कारमीरांत सर- स्वती नांवत्वी नदी नाहीं, आणि तरंगिणीत!हे या स्वारचिं नांव नाही-

२०८ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

महंमदानें सह्या माहिनेच राज्य उपभोगिलें. मसादउचा मुलगा मोंदूद ह्या आपल्या बापाचा सूड उगविण्याकरितां बल्ख मधून तांत- डीनें निघाला. तो बल्ख प्रांताचा सुभेदार होता. त्यानें अफगा- णिस्थान आपल्या ताब्यांत घेतळें आणि हिंदुस्थानांत येऊन आपल्या चुलत्याचा पराभव केला व त्याला व त्याच्या सर्व मुलांना कैद केलें. त्यांचा व आपल्या बापास कैद करणाऱ्या तुर्की ब हिंदु गुलामांचा त्यानें वध करविला. नंतर तो गझर्नीस परत गेला व तेथे त्यानें नऊ वर्षे राज्य केलें. त्याचे मुलगे कर्तत्वहीन होते. त्याच्या सरदा- रांनीं व अधिकाऱ्यांनी त्याचा एक मुलगा व चुलता अल्ली या दोघां- स एकदम राज्यावर बसाविलें. परंतु ते दोघेहि दुबेळ निघाले व त्यांच्या कारकार्दांत सववत्र गोंधळ माजला. दोन महिन्यानंतर त्यांना एका किछयावर पाठविण्यांत आलें व इ. स. १०’“५०मध्यें महमुदाचा तिसरा मुलगा अबदूल रशीद यास राज्यावर बसविण्यांत आलें. इराण व खोरासानचा सेळजुक राजा अल्प अस्लीन हा गझर्नावर चाळ करून आला; परंतु महमुदाचा एक सरदार तुम्रीळ यानें त्याचा पराभव केला, तुम्रील हा महमुदाच्या शिस्तीत वाढलेला निघड्या छातीचा गुलाम होता व महंमदानें त्याला गझनीच्या सैन्याचा सेनापाति केलें होतें. जय मिळवून परत आल्यावर त्यानें अबदुल रशीदला ठार मारून ल्याची गादी बळकावली. त्यानें आणखी अकरा राजकुमा- रांचा वध केला आणि फार निष्ठुरपणानें राज्य चालाविळें. त्यानें चाळीस दिवस जलुमानें राज्य केल्यावर एका तुर्की शिलेदारानें त्याचा सिंहासनावरच खून केला.

एका किळ्यांत दोनच राजपुत्र न मरतां बंदींत शिक राहिळे

होते. तुम्रीलानें त्यांचीहि व्यवस्था लावण्याचा हुकूम सोडला होता. पहारेकऱ्यानें एकच दिवस हुकुम अमलांत आणण्याला उशीर केला, इतक्यांत तुम्रीलच्या खुनाची बतामी येऊन पोचली. सुदैवाने अशा

मि अअजायाय्या

महमुदाच्या मागुनचे राजे. २०९

रीतीनें त्या राजपुत्रांचे प्राण वांचलळे आणि हे राजपुत्र फरुक्जाद व ‘ इभ्राइम दोघेहि अनुक्रमाने सळतान झाले. दोघांनींहि न्यायाने आणि दयाशीलतेनें राज्य केलें. इभ्राइम हा अत्यंत धर्मशील होता. त्यानें कुराणाचे फारशींत भाषांतर केलें. त्याला चाळीस मुली व ठत्तीस मुलगे होते. यामुळें राजघराणें पुनः एकदां राजपुत्रांनीं गजबजून गेलें. सुलतानाने आपल्या मुलींची विद्वान लोकांशीं लग्नें लाविलीं. त्यांपैकी एक मुलगी प्रसिद्ध ग्रंथकार नासिरी याच्या पणजास दिली होती. इसम्राइम हा शाहूसारखा होता. शांतींत व वैभवांत ४२ वर्षे राज्य करून तो इ. स. ११० ०मध्यें मरण पावला. त्याचा मुलगा मसाउद यानें बापापेक्षांहि अधिक न्यायाने आणि उदारपणे राज्य केलें. त्यानें सर्व महमुदी प्रांतांती त्रासदायक कर बंद केळे ( आणि सर्व साम्राज्यांतील ) व झाबुलिस्तानांतील हे कर अजिबात उडवून टाकले. त्याच्या कारकॉार्दीत त्याच्या हेजिबानें हिंदुस्थानावर धार्मेक स्वारी केली व तो गंगा उतरून “’ महमुदाखेरीज दुसरा काणी जेथ- वर गेला नव्हता अशा ठिकाणापयत हिंदुस्थानांत आला होता.” या स्वारीच्या स्थलाचा व कालाचा उल्लेख आढळत नाहीं. परंतु यामुळें सालार मसाउदाच्या स्वारीची असंभमनीयता दिसून येते; कारण महमूद ओऔओधमधीळ बार्राच्या अलिकडे आला नव्हता. १७ वर्षे राज्य करून हा राजा ५०९ हि. (इ. स. १११८) मध्यें मृत्युवश झाला. यावरून यार्चांच ओधमधीळ स्वारी अमीराची शेवटची स्वारी असावी, आणि बहुधा बदाउनच्या शिलालेखांत जिचा उल्लेख आहे ही हीच स्वारी असावी.

त्याचा वडील मुलगा अस्ठीन हा त्याच्या नंतर गादीवर आला, परंतु अस्लानचा धाकटा भाऊ बेहूराम यानें त्यास हांकून लाविलें. या कामीं त्याला त्याचा मामा संजर सुलतान याची फार मदत

म…भा, १४

२१० गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

झाली. त्यानें पुष्कळ वर्ष ( ४१ ) राज्य केठें परंतु त्याची कारकीर्द त्याला सुखाची झाली नाहीं. हिंदुस्थानांतील प्रांताधिकाऱ्यानें दोनदां बंड केलें व दोनदां सुलतानाला त्याच्यावर स्वारी करावी

लागली, एकदां मुळतानाजवळ व दुसऱ्यांदा शिवालिक डोंगरांत. त्या

बंडखोराचा अखेर नाश झाला. धोरी ( गोरच्या ) सरदारांनी बेद्दराम हिंदुस्थानांत गेळा असतां तिकडे गझनी हस्तगत केळी आणि ती जाळून नष्ट केली, त्याचा इतिहास पुढें धोरीच्या बृत्तांतात येईल. बेहराम हिंदुस्थानांत कांहीं दिवस राहिला व घोरी सरदारांनीं गझनी सोडून दिल्यानंतर परत गेला. त्याचा मुलगा खश्रू हा त्याच्या मागून हि. ५५२ इ. स.११ ५९) मध्ये राजा झाला. घोरी सरदारांनी गझर्नांच्या राज्याचा पायाच डळमळीत केला असल्यामुळे आणि खश्र हा दुबळ राजा असल्यामुळे गॉश॒ तुकाच्या टोळ्यांनी गझनीवर हला केला व तें शद्दर हस्तगत करून, गिआसउद्दीन घोरीनें त्यांना घालवून देईतो, बारा वर्षे पावेतो तें आपल्या कबजांत ठेविळें. मागील वहिवाटीप्रमाणे खश्रू ह्या लठाहोरास येऊन राहिला व तेथें त्यानें सात वर्षे राज्य केलें. त्याचा मुलगा शांत खूश्रू यानें पुढें थोडी वर्षे राज्य केल्यावर, त्यास हि. ५८७ इ. स. ११९१ मध्यें महंमद घोरीनें कैद केळें व त्याला व त्याच्या मुलाला धीआसउद्दीन घोरीच्या हुकुबावरून हि. ५९८ इ. स. १२०६ मध्यें मारून टाकण्यांत आळे. अशा तऱ्हेने महमुदाच्या वंशाचा अंत झाला. बेजबाबदार राज्यपद्धतीला आळा घालणारी राष्ट्रीय भावना प्रजेंत उत्पन्न झाली नसली म्हणज अशा राज्यपद्धतींत कसे भयंकर अनर्थ घडतात हं गझनीच्या राजांच्या हतिह्यासावरून ठळकपणें दिसून येतें. प्रत्येक देशांत राज्याच्या वारशाबद्दळ कांहीं तरी नियम असतात, ( पाश्चात्य देशांत हे नियम स्पष्ट व व्यवास्थित स्वरूपाचे आतां झाळे आहेत ). परंतु महत्वाकांक्षी व पापपुण्याचा विचार न कारितां

१ क

0१००-०० > ७. कजा कीण “७०-८४

॥ । ॥। |

गझ्लनवी राजांची नाणी. २११

निःशेकपणें वागणाऱ्या लोकांस ताळ्यावर आणणाऱ्या राष्ट्रीय भावनेचा । उदय प्रजेंत झालेला नसतो तेव्हां राजे व राज्यघराण्यांतील राज्यपदावर ! येण्यासारखे कोणतेहि नातलग या सर्वांचे अशा घोर तऱ्हेने व इतक्या । माठेबा प्रमाणांत खून करण्यांत येतात कौं राजघराण्यांत जन्माला येणें ही ! एकमोठी आपत्तिच होते. हिंदु राज्यांतहि जरी ही राष्ट्रीयत्वाची भावना । अस्तित्वांत नव्हती तरी असे प्रसंग कचित आढळून येतात. बहुधा हिंदु । लोकांच्या स्वभावांत कायद्यांची बंधनें पाळण्याची इच्छा आधिक व क्ररता । कमी असल्यामुळें असें झालें असं म्हणतां येतें

हं पुस्तक थेथें संपलें पुढच्या पुस्तकांत गझनवी राजघराण्याला

खो देणाऱ्या घोरी राजांचा इतेहाास प्रथ्वीराजाच्या वृत्तांताबरोबर । देण्याचें योजेळें आहे. कारण त्यांनीं प्रथ्वीराजाचा पराभव केला

आणि हिंदुस्थान कायमचे जिंकिले. येथें हहे आणखी नमूद केलें पाहिजे कीं, वर वणिलेल्या स्वारी व्यतिरिक्त अनेक लहान सहान स्वाऱ्या साहसाप्रिय व महत्वाकांक्षी तुकांनीं ह्विंदस्थानांत केल्या अस- ल्या पाहजेत. त्यांचा उछछेख मुसलमान प्रंथकारांनीं केला नसला तरी पुढील पुस्तकांत येणाऱ्या अनेक रजपूत राज्यांच्या इतिहासांत

’ ही गोष्ट निदर्शनास येईल.

टिप्पणी-गझनवी राजांची नाणी.

जर्नल रॉयल एशिआटेक सोसायटी भाग ९ पान ६७ व भा. १७ पान १५७ मध्यें मि. थॉमस्‌ यांनीं लिहिलेल्या निबंधांत पुढील मनो- रंजक माहिती आढळते. आपल्या राज्याभिषेकाची आठवण राहण्यासाठी गझर्नांच्या प्रत्येक राजानें आपल्या नांवार्ची नाणीं पाडली होतीं. हिंदु- स्थानांताळ बहुतेक राजे अशा तऱ्हेने नांणीं पाडीत असत, आपल्याला अल्पतगिन,सबुक्तगिन व इस्माइल यांची नांणीं सांपडतात व त्यांवरून ते या अनुक्रमानें गझनीच्या गादीवर बसले असें दिसून येतें. परंतु या सर्व नाण्यांवर सामानी बादशाह मनसूर अथवा नूह यांचीही नावें कोरलेली आहेत व त्यावरून हे गझनीचे राजे सामानी सम्नाटांचे मांडलिक होते

२१२ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

असें दिसून येतें. महमूद हि. २८९ (इ. स. १००० ) मध्यें स्वतंत्र झाला असावा. कारण त्यासालच्या नाण्यांत सामानी राजाचे नांव पाहि ल्यानेंच वगळलेलं दिसतं. त्याच्या सुरवातीच्या नाण्यांवर महमुदाला सैफुद्दोला असें म्हटलं आहे.ही पदवी नूहने त्याला हि.३८४ (इ.९९५) मध्ये दिली. नंतरच्या नाण्यांत खलिफानें दिलेल्या अलअमीर–यमीन- उदौलत व अमीन–उलूमिळत या पदवीचा उल्लेख आढ: ळतो. त्या नंतरच्यांत “ मलीक उल्‌ ममालिक ” ( राजांचा राजा ) असा उल्लेख आहे. शेवटी तो विख्यात होऊन पदवीची कोणतीच जरूर नसल्यामुळें नुसतं महमूद येवढेंच नाण्यांवर खोदलेले आहे. त्यानें आप- ल्याला सुलतान किंवा गाझी असं कोठेच म्हटलेले नाहीं, सुलतान ही पदवी प्रथम इब्राइमच्या नाण्यांवर आढळते (हि ४६१इ.स. १०६१), महमुदाची फारशी ब संस्कृत अश्शा दोन्ही भाषांत खोदलेली नाणींहि सांपडली आहेत. तां हिंदुस्थानांतील प्रजेकारेतां होती. त्यांतील देव- नागरी लिपीतील छाप मनोरम असून त्यावरून महमुदाच्या दरबारीं हिंदी पंडित असावेत असं दिसतं. तो छाप असा आहेः-‘““अव्यक्तमेक महम्मद-अवतार नृपति महमूद. ” त्यांनी महमुदाला पैगंबर महंमदाचा अवतार बनविला असून पेगबराला अव्यक्त असें म्हटलें आहे. कांडी वेळा अयं टंक महमूद संवत्‌ ४१२ येवढेंच लिहिलेलें आहे. हीं नाणीं लाहोरास पाडली होती. लाहोर, निशापूर ब पश्चिमेस आणखी तीन चार ठिकाणें येथें टांकसाळी होत्या. काबुलांस टांकसाळ नव्हती. सामंतदेवाच्या नांवाची जीं काबूलच्या शाही राजांची नाणीं आहेत त्यांचें अनुकरण आपल्या नाण्यांत गझनवी राजांनीं केलेलं आहे. त्यांत एका बाजूला कुशीवर पडलेला नंदी असून दुसऱ्या बाजूला घोडेस्वार व महमूद किंवा मसाउद याचें नांव आहे. मोदूदच्या व पुढे इभ्राइमच्या हि. ४३२ (इ, स. १०४९१) नाण्यांवरहि नेदी कोरलेला आहे. सबुच्- गिन व महमूद यांच्या नांण्यांचें वजन काबूलच्या हिंदु राजांच्या बाणांच्या वजना इतके आहे. शाही ब्राह्मणराजांची नाणीं रुप्याची होतीं(दिऱ्हाम-द्रम्म) गझनी व निद्यापूर टांकसाळींतील नाणीं सोन्याची होती ( दिनार ). हिंदु व

मुसलमान राजांची तांब्याची व लहान चांदीचाीहे नाणीं होती.

परिशिष्ट हिंदूंची मूतिपूजा.

सोमनाथाच्या मूर्तिभंगाच्या व लुटीच्या हकीकतीवरून वरील विषया- कर कांहीं सुचलेले विचार गिबनप्रमाणें इतिहासाचा क्रम थांबवून न देतां वे येथें पारिशिष्टरूपाने आम्हीं देत आहों. दहाव्या शतकाच्या अंती ‘मूर्तिपूजेसंबंघाने बराच भोळसटपणा हिंदुस्थानांत वाढून त्यापासून मुस- । लमानी घरमांच्या लोकांस फायदा घेण्यास साघन झालें होतें, महमुदाच्या | मूर्तिमंजक स्वाऱ्या हिंदु लोकांच्या या भोळेपणाच्या प्रकारासंबंधें डोळे !’ उघडण्याकरितांच झाल्या असें म्हणतां येईल, या स्वाऱ्यांपासून निघणारा । चो अद्याप हिदूंनीं घेतला नाहीं असें दुर्दैवाने म्हणावें लागतें. मूर्तिपूजा ! बैदांत सांगितली आहे कीं नाही,किंबा ती बुद्धीस पटते किंबा नाही, हा ‘ ‘घर्मविषयक प्रश्न आम्ही येथे विवेचित नाहीं. हल्लीच्या हिंदुघर्मात मूर्ति- ‘ पूजा निःसंशय मान्य आहे आणि इंश्वर-प्रणिघानाच्या दृष्टीने ती योग्य तऱ्हे मान्य आहे असे म्हणतां येतं, पण मूर्तिपूजेपासून कांहीं भ्रांत सम- “जुती मनुष्याच्या मनांत रूढ होतात, विशेषतः मूर्तीतच त्या देवतेची शक्ति आहे ही चुकीची समजूत उत्पन्न होते. ही गोष्ट हिंदूंनाच लागू -नसून प्राचीन काळापासून जेथे जेथें मूर्तपूजञा चाळू होती तेथ तेथ होती. बौद्ध घर्म आरंभीं इंश्वराचेंच अस्तित्व आहे कीं नाहीं ह्या विषयीं मुग्ध होता. पण थयुढें तो भयंकर मूतिपूजेंत शिरला आणि बुद्धाच्याच मूर्ति चोहोकडे पुजू लागल्या. हुएनत्संग कितीहि विद्वान्‌ व तत्त्वज्ञानी असला तरी बुद्धाच्या शर्राराचे अवशेष किंबा बुद्धाच्या मूर्ति यांत चमत्कारांचे सामथ्ये होतं असें मानी, हें पाहून आपल्यास आश्चर्य वाटतें.(मा.१,पा. १- १५० ). हिंदु लोकांत मूर्तिपूजा पूवीच थोडीबहुत रूढ होती, ती बोद्ध र्म उच्छेदिल्यावर त्याच्या अनुकरणानें अधिकच वाढली आणि मूर्तींचे आ्रावित्र्य व त्यांच्या ठिकाणीं असलेलें अद्भुत सामर्थ्य या विषर्यांच्या कल्पना इतक्या वाढल्या कीं कनोजचे प्रातेह्मार सम्राट मुलतान घेण्यास

२१४ गझनीच्या महमुदाच्या स्वाऱ्या.

समर्थ होते तरी ज्या ज्या वेळेस ते मुलतान घेण्यास ज्ञात त्या त्या वेळी

तेथील मुसलमान अधिकारी ‘ सूयाची येथील प्रसिद्ध मूर्ति तुम्ही पुढें

याल तर आम्ही फोडून टाकू ? अशी घमकी देऊन त्यांस मार्गे परत- वीत (भा. २ पा. २६९ ). पश्चिमेकडे सुद्धां रोमन व ग्राक इतर लोकांपेक्षा तत्त्वज्ञानांत पुढें होते तरी त्यांचा कांहीं मूतींच्या अद्धत

सामर्थ्यावर विश्वास असे. खिस्तीघमात प्रारंभी निराकार देवाचा उप-

देश केला गेला आणि त्याचा प्रसार मूर्तिपूजक रोमन व ग्रीक लोकांत’

मूर्तीत कांहीं सामथ्ये नाहीं असें सिद्ध करूनच झाला, सोमनाथाच्या घुजाऱ्यांच्या मृतींचा अनादर करणाऱ्या महमुदाचा नाश करण्याविषयी

सोमनाथाच्या मूर्तीस केलेल्या निरर्थक केविलवाण्या प्राथना वाचतांना आपल्यास अलेक्झांडूया शहरांत अशाच प्रकारचा देखावा त्यापूर्वी सहाशे वर्षे झालेला गिबननें हुबेहुब वर्णन केला आहे त्याची आपल्यास आठ- वण होते. थिओडोशियस बादराहाच्या ( ३८९ इ, ) हुकुमाने अलेकू- झांडया येथील सिरपिसची मूर्त फोडली गेली, त्यावेळचें वृत्त वर्णन करतांना गिबन म्हणतो, “’ अलेक्झांड्या सिरपिस्‌ देवतेच्या मूतांच्या’ विदोष संरक्षणाखालीं आहे अशी समजूत असल्यानें सिरपिसचें शहर असे नांव घेण्यांत या नगरास भूषण वाटे. त्याचें देऊळ रोमच्या कॅपि- टळ भागांत असलेल्या इमारती पेक्षांहि विर्स्तार्ण आणि वेमवबशाली होतें.. शहरच्या सपाटीवर शंभर फूट उंच. केलेल्या “एका कृत्रिम प्रशस्त उंच- वस्यावर हें देऊळ बांधलें होते. थिओडोशस्‌ बादशहानें मूर्तंपूजकांचे यज्ञ सर्वत्र बंद केले होते तरी सिरपिसच्या शहरांत व देवळांत चालू होते. कारण अशी भोळसट समजूत खिश्चन लोकांची सुद्धां होती काँ; हे विधि जर बंद झाले तर नाईल नदीला पूर येणार नाहीं, इजिसमध्यें पिकें येणार नाहींत आणि कॉनस्टॅनटिनोपल राजघार्नास खावयास मिळ- णार नाही, परंतु शेवटीं सिरंपिसचें देऊळ व मूति तोडण्याविषयीं बाद- शहाचा सक्तीचा हुकुम आला. निरनिराळ्या धातूचे अनेक पत्ले एका ठिकाणीं ठोकून सिरपिसची भव्य मूर्त बनविली होती, ती एवढी प्रचंड. होती कीं, गाभाराच्या दोन्ही भिंतीस ती लागली होती. उजव्या हातांत राक्षसस्वरूषी एका सपाचे डोकेंब घड असून त्याच्या शेपटीला तीनः

हिंदूची मूर्तिपूजा. २१५

फांट्यांच्या शेवटीं कुल्ला, सिंह आणि लांडगा यांची डोकी होतीं. या मूर्तींचा उपमर्द करण्यास कोणी हात उठवील, तर लागलीच आकाश ब पृथ्वी एक होऊन एकदम सृष्ट्यारंभीचा कलऴोळ माजेल असा विश्वास होता. एक निघड्या छातीचा शिपाई हातांत कुऱ्हाड घेऊन शिडी लाऊन वर चढला. पाहणाऱ्यांच्या गदीतील खिस्ती लोकसुद्धा या उपमदांच्या भयंकर परिणामाच्या भारतीने गांगरून गेळे, सिरीपसच्या मूर्तींच्या गालावर शिपायानें एक जोराचा प्रहार केला आणि तो तुटून खालीं पडला, पण आकाश व पृथ्वी यांत कांही एक गडबड न होतां तीं नेहमीच्या शांत, निश्चल व व्यवास्थत स्थितींत राहिली. कांहीं एक झालें नाहीं, यामुळें तो शिपाई जास्त जोरांत येऊन त्यानें अनेक प्रहार मारून मूर्तांचे तुकडे तुकडे केळे, आणि ते तुकडे अलेक्झँड्या शाहरांतून अपमानास्पद रीतीनें ओढून नेले. नाईल नदीला उशीराने कां होईना नेहमीप्रमाणे पूर येऊन इजिसच्या सपाट प्रदेशांत पुष्कळ पीक आलें, आणणि भावी वर्तेविणाऱ्यांचें मयंकर भविष्य खोटें झालें, घुष्कळ लोक अलेक्झँंडरियाचे रक्षण करणाऱ्या मूर्तीत कांहीं सामर्थ्य नाहीं असे पाहून खिस्ती झाले. ”

गिबननें या ठिकाणी विषयांतर करून मूर्तींच्या अदभुत सामर्थ्यावर घर्मांची सत्यासत्यता मानणें कसं अयोग्य आहे हें दाखविलें आहे. मूर्त घातु किंवा दगड किंवा लाकुड यांच्याच बनलेल्या असून त्यांत अद्‌भुत सामथ्ये असणे शक्‍य नाहीं, असें सामथ्य आपल्या भक्तींत आहे. असो, खिस्ती धर्महि बोद्ध धर्माप्रमाणे पुढें मूतिपूजैत शिरून जो भोळसटपणा त्यानें प्रारंभीं निषेध केला,त्याच भोळसटपणांत शिरून ्जासस व मेरी यांच्या मूति पुजू लागला. याच्या विरोधानें त्याचा सहज परिणाम मुसलमानी घमांचा उदय झाला. याच प्रकारचे मूतींविषयीं असलेळे भोळसर समज दूर करण्यास महमुदाच्या स्वाऱ्या झाल्या असं म्हणतां येईल, पण आणखीहि एक दुसरी भोळसर समजूत दूर करण्यासाठीं या स्वाऱ्या झाल्या असे म्हणतां येतें. देवळें व मूर्ति यांत सोने आणि जवाहीर अतिशय लादणें हा वेडसर प्रकार आहे असें लोकांच्या निदरीनास या स्वाऱ्यांनी आणलें. कारण मूर्तिभजकांच्या धार्मेक समजुर्तास त्या द्रव्याविषयींच्या लोभाची आणखी

भर ‘पडते, सबंध सोन्याची मूर्ति बनविण्यांत गुण कोणता ? किंवा त्याज- बर अमोल जवाहिर घालण्यांत पुण्य कोणतं £ केवळ सोन्याची पांच हाताची मूर्ति इंश्वर-प्रणिधान करण्यास जास्त साघनीभूत होत नार्ही. हिंदुघर्मांचे प्राचीन आचार्य लहान लहान निरनिराळे साहजिक स्थितीत अंसलेले दगड शिव, विष्णु, गणपति ब सूर्य यांचे प्रतीक मानतात आणि वैदिक तरद्षिं तर प्रत्यक्ष सूये ब वायु यांची उपासना करीत. परंतु सुंदर मूर्त बनविणे हं मनुष्याच्या मनास साहजिक आवडते, व त्याजवर बिनमोल जवाहीर लादण्याकडेहि मनाची प्रच्रात्त होते. शिंवपूर्जंतहि मुख्य ठिंगपूरजा म्हणजे दगडांच्या कांहीं सहज आकृतीची पूजा प्रशस्त मानली आहे. पण तेथहि वैभवशाली राजे स्वयंभू ठिंगाच्यावर सोन्याचे मुकुट हिरे माण- कांनी सुशोभित केलेले घालतात; आणि मूर्तिभंजक मुसलमानासच नव्हे ‘तर हिंदू चोरांस किंबहुना भावी लोमी राजांस किंबहुना पुजाऱ्यांसहि लोभ उत्पन्न करून देवाचा अपमान करण्यास प्रवृत्त करतात. हिंदुस्था-

नच्या इतिहासांत नवी देवळें बांधून त्यांस मोल्यवान देणग्या देण्याची अनेक उदाहरणें आहेत, विशेषतः मथुरा, कोटकांगडा, सोमनाथ व उजयिनी वगेरे पुण्यस्थानांत शेकडों वैभवशाली राजे आणि हजारो श्रीमंत च्यांपारी यांच्या देणग्यांनीं संपत्ति भरून गेली होती. इतिहासकार व शासनरशास्त्रवेत्ते असें म्हणूं शकतात की, या संपत्तीचा उपयोग राजांनी समथ सैन्ये ठेवण्यांत व श्रीमंतांनी समाजाची सुस्थिति वाढविण्यांत करा- धयास पाहिजे होतां, पण त्याकडे दुलेक्ष होऊन देवळांत व मूतींवर संपत्ति अमोप जमा झाली, व यामुळें देशाच्या ऱ्हासांस दोन्ही रीतीनें मदत झाली. एकीकडे बाहेरील विजेत्यास लोभ उत्पन्न होऊन त्यांचें आर्थक सामर्थ्य वाढळे आणि दुसरीकडे आमच्या राजांचे व लोकांचें विरोधाचे सामथ्ये कमी झाले, अद्यापाहि या दोन गोष्टीकडे हिंदु लोकांचे लक्ष जितकें वेघावें तितकें वेधत नाहीं. मूर्तिपूजा सोडणें जरूर नाहीं; पण विशिष्ट मूतींत अद्भुत सामथ्ये आहे अशी भोळसर भावना वाहूं न देतां आपल्या भावनेंत सामथ्ये आहे ही कल्पना हढ झाली पाहिजे. त्याचप्रमाणे मंदिरास किंवा मूर्तीस द्रव्य ज्यास्त देण्यांत विशेष पुण्य आहे ह्ोहि कल्पना कमी झाली पाहिजे. कारण अक्या द्रव्यापासून महंत किंवा

हिंदूंची मूर्तिपूजा. २१७

घुजारी यांची नीतिमात्र बिघडते आणि चोरांच्या किंवा मूर्तभंजकांच्या देवतेचा उपमर्द करण्याच्या इच्छेस जोर येतो.

तथापि मनुष्यस्वभमाव एकाच तऱ्हेने मनुष्यास एकच कृत्य कराव- यास प्रब्रृत्त करतो हे शोवटीं सांगण्यासारखे आहे.मूर्तिभजक व देवळें लुट- णारा महमुद यालाहि याच स्वभावाच्या प्रब्रृत्तीनं गझनी येथे एक प्रचंड मर्शाद बांधून लुटून आणलेल्या सोन्यानें व हिरे माणकांनीं तिच्या भिंती श्रृंगारण्याची इच्छा झाली. आणि ज्या लोभानें तो प्रब्र्त झाला होता. तोच लोभ पुढील विजेत्यांस त्यानें उत्पन्न करून ठेवला. ऐतिहासिक लेखांबरून असे दिसतं की, ही मशीद तेथील मोल्यवान शुंगाराच्या लोभाने चीनच्या मूर्तेपूजक प्रचंड टोळ्यांनी विध्वसिली.जेगिसखानानें बुखारा येथील जामी मशीदीची केलेली अंवमानना लुवैनीच्या जहानकुशाग्रंथांत ( इलियट भा. २ पा. ३८८) वर्णिलेली आहे. आणि बुखारा येथील ह त्याचें कृत्य तेथून पळून आलेल्या एका मुसलमानाने पुढील लहान पण जोरदार वाक्यांत केलें. “ मोंगल आले व खोदून, जाळून, कत्तल करून ळुटून परत गेले.?/’हाच जंगिसखान जलालुद्दीन याचा पाठलाग करून ६१८ हिजरी(१२२६ इ.)मध्यें परतला तेव्हां गझनीवर आला. त्यानें सवे रहि बाशयांस बाहेर काढलें व मोजिलें आणि त्यांतील कारागीर निराळे करून बाकीच्या सवाची कत्तल करण्याचा हुकूम दिला, त्यानें शहरहि उध्वस्त केलें व ओगताई मेलेल्यांची प्रेते पुरून हिरातेकडे निघून गेला ( इलियट २. पा. ३९० ), दुसऱ्या एका उताऱ्यांत असे सांगितलें आहे कीं ओगताईनें चार महिने वेढा दिल्यानंतर हल्ला करून गझनी शहर घेतलें ब पायासह खोदून तें त्यानें जाळून टाकलें व सुमारें दोन लक्ष लोक त्यानं कत्तल केले ( इलि. २. पा. ५६९)

परिशिष्ट २

कांहीं मुसलमानी नांवांचे बरोबर उच्चार व अर्थ.

कित्येक मुसलमानी नांवें चुकीच्या प्रकारानें लिहितात, त्से न हो- ण्या’चा या पुस्तकांत प्रयत्न केला आहे आणि त्या नांबाचा अथे पुढें दिल्याप्रमाणें कोशावरून मिळतो.

नांव अर्थ १ अल्प तगीन ( तुकी ) अल्प ऱ- सशक्त तगीन, तिगीन, सम पेहलवान, २ सबुकतगीन ,, सबुकऱचपळ, तगीनःपेहेलवान. ५ महमूद ( आरबी ) स्ताति केलेला. ४ मुहम्मद ,, स्तुतिकरणारा ( हे नांव पेगंबराचेहि आहे ) ५ शिहाबु्दहीन ,, शिहाब > उल्कातारा, उत -_चा, दीन र धर्म. ६ कुतुबुद्दीन ,, __ कुतुब > धुवतारा, उत > चा, दीन- घम. ७ घियासुद्दीन ,, | घंमाचा मदतगार ८ ( यिएल्तामेश ) अल्तमष फोजेचा सरदार ९ अल्बेरूनी. अलू र तो, बेरूनी > बाहेरचा,

कित्येक प्रांतांची व शहरांची नांवे शुध्दरीतीनें पुढील प्रमाणें लिहिलीं आहेत. खोरासान, सीस्तान, बल्ख, बगदाद ( बाग > उपवन, दाद न्याय ), निश्ापूर, बुखारा.

सालवारी.

इ. स. ७१२ सिंध प्रांतांचा उच्छेद. ९०३ इस्माइल पहिला, बुखाऱ्याचा सामानी वंशीय बाद-

९०३-१० १५ सामानी साम्राज्य. [ शहा. ९१२ याकूब-इ–ठेस कासारह्ा प्रथम हिंदुस्थानांत गझ- नीवर येतो.

९४३ तुर्की गुलाम सामानी राजांचे संरक्षक म्हणून राहतात.

९५९ मनसूर सामानी बादशह्ा होतो व ह्याच्या कारकीदीत तुकी गुलाम सरदार बनून लहान राज्यें स्थापन करतात,

९६७ सपतंबर ३० महमुदाचा जन्म. ( या विषयीं

९७१ आक्टोबर २ मतभेद आहे )

९७७–९९७ सबुक्तगीन.

९८० सबुक्तगिनाची वहिंडचा व काबूलचा राजा जयपाल यावर स्वारी.

९८६-१००१ दुसरा नृह॒ पातशहा.

१००१ महमुदाची जयपाळ राजावर पेश्ावरचे मैदानांत स्वारी.

१००४ ,9 भाटियावर स्वारी.

१००८ ,? संयुक्त हिंदूराजांसह्ह आनंदपालाची लढाई. १००९ » नरगरकोटची स्वारी.

१०१३ ,» त्रिलोचनपालाची शेवटली लढाई.

१०१४ » ठाणेश्वरची लढाई.

१०१८ 5; मथुरा व कनोजवर स्वारी.

(१)

१०१९ महदमुदाची कनोजवर पुनः स्वारी. १०२१ राहिंब नदीवर्राल लढाई.

१०२२ महमुदाची स्वात वगैरेवर स्वारी. १०२३ महमुदाची कालंजरवरील स्वारी, १०२५ महमुदाची सोमनाथावरील स्वारी. १०२९ महमुदाचा मृत्यु.

१०३० अल्बेरुनी आपला प्रंथ संपवितो.

९१०–९४० राजशेखर कवि.

९५०–१००० धंगराजा,

९६०–१००१ जयपाल. १००१–१००९ आनंदपाल.

१०१० त भोजराजा माळव्याचे गादीवर येतो.

१००९–१०२१ त्रिलोचनंपाल. १०२१-१०२६ भाम, १०३० गांगेयदेव ( चेदीचा राजा ).

पुस्तक सातवे तिसरीं हिंदु राज्ये प्रकरण पहिलें

सांभर वध अजमीर येथील चाहमान.

सांभर येथीळ चाहमानांचें घराणें हें मागील कालविभागांतील वि- ख्यात रजपूत घराण्यांपैकीं एक होतें. या कालविभागांतहि ते भरभ- राटींत राहिळे, किंबहुना, त्याचें वैभव या कालविभागांत अधिकच वाढलें. आम्ही आपल्या चौथ्या पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणांत ( पानं १४१ते१४७) त्यांच्या अभ्युद्याचा इतिहास दिला आहे ‘ सांभर किंवा ज्याला सपादलक्ष म्हणजे सव्वालक्ष गांवांचा प्रांत म्हण- तात, तेथें राज्य स्थापणारा या घराण्याचा मूळ संस्थापक सामंत हाता. सिंधमधून अरबांनीं इ. स. ७५० किंवा ७७५च्या सुमारास ज्या स्वाऱ्या केल्या त्यांचा मोठ्या जोमानें प्रतिकार केल्यामुळें तो विख्यात झाला. या घराण्यांतील शेवटचा राजा पृथ्वीराज याच्या- पर्यंत चाहमानांच्या सिंहासनावर एकामागून एक आलेल्या सर्व ‘ राजांस मुसलमानांशीं अखंड लढत राहावें लागलें; आणि त्यांनीं हा लढा उत्साहानें व चिकाटीनें चालविला. दुसऱ्या भागांत या साम- ‘न्तानंतरचा प्रख्यात राजा पहिला गूवक याचेपासून ज्याचा संवत १०३० (इ. स. ९७३ ) चा हर्ष शिळाठेख उपलब्ध झाला आहे त्या दुलळभापर्यंतची वंदयावळहि दिलेली आहे. या भागांत दु्ळभा-

म 1) भा ७७ क १ ष्‌

२२२ तिसरी हिंडु राज्ये

पासून चाहमान घराण्यांतील होवटचा चक्रवर्ती राजा प्रथ्वीराज याच्या पर्यंतची वंशावळ आम्ही देत आहों. कविराज ऱयामलदासांनें बंगालच्या रा. ए. सो. च्या जरनलमध्ये बिजोलिया शिलालेखांत दिलेली ही सर्वे वंशावळ प्रसिद्ध केली आहे; तिच्याबद्दळ कीलहानेनें ए. ई. भाग ८ मध्यें ब रायबहादुर गोरीशंकर ओझा यांनीं टॉंडूच्या राज- स्थानच्या हिंदी आवृतींत (पा. २९४ ) च्ची केली आहे. टोंडनें आपला सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिल्यानंतर उपलब्ध झालेल्या अनेक लेखां- वरून बहुतेक विद्वानांच्या मर्ते असं सिद्ध झाळें आहे कीं इतिहास या नाल्यानें पृथ्वीराजरासेलळा जवळ जवळ कांहींच किंमत नाहीं. तेव्हां मुख्यतः पृथ्वीराजरासेवरून टोंडनें दिलेली चाहमान राजांची वंशावळ व त्यांच्या तारखा या स्वाभाविकपणेच चुकीच्या असून खऱ्या वंशावळीकरितां व तारखांकरितां आपल्याला कोरीव लेखांचा आधार घेणें जरूर आहे. आणि निरनिराळ्या राजांचे काळ गाणि- तानें जळवूनच ठरविलें पाहिजेत. राजपुताना ग्याझेटिअर भाग ३ (पा. ६५ ) मध्यें ‘चाहमानांची वंशावळ दिलेली आहे, ती अर्था- तच बिजोलिया शिलालेखावरून दिठेली आहे. परंतु आमच्या मता- प्रमाणें दुरुस्त करण्याजोग्या अशश चुका तींत थोड्या आहेत. दुलभा- पासून तहत पृथ्वीराजापर्यंत आमच्या मताने बरोबर असलेली सांब- रच्या चाहमानांची वंशावळ देऊन तिच्याच जोडीला राजपुताना ग्याझेटिअरमध्दे दिलेली वंशावळ आह्यीं देतों व पंडित गोरराशंकर ओझा यांनीं निरानराळ्या राजांबद्दल प्रदर्शित केलेल्या विचारांचा हिं निर्देश करतों.

सांभर व अजमीर येथील चाहमान. २२३

बिजोलिया शिलालेख. राजपुताना ग्याझेटिअर.

१ दुलभ इ. स. १७७ १ दुलभ | २ गोविंद रा. ९८८ २ गोविंद ३ वाक्षाते ४ वीयंराम ३ वाक्पाते (रा, १००३) |

५ श्रीचंद (रा, १०३३) ४ पुत्र विजयराम

& गोपेन्द्र ७ विग्रहराज उर्फबीसल३रा ७५ दुलभ ६ विग्रह | (रा. १०६३ )न्राजदेवी |

८ परथ्वीराजशला(रा. १०७८) ७ परथ्वीराज

| ९ अजयंदेव (रा.१०९३) ८ अजयपाल “: सोमल्यदेवी . | २० अणोराज अथवा आना ९ अर्णोराज पुल्न किंबा पोत्र

; ११ विग्रहपाळ 2१३ सोमेश्रर १० वसल (विग्रह) | बाॉसल ४्था ठे. ११६९६इ.स. | १९पर्थ्वाराज १२सोमेश्वर १२ पृथ्वबीभटर्रा ले.११६३इ. | १४ पृथ्वीराज ३ रा. २१३ प्रर्ज्वाराज रा. ११६९. शाहाबुर्ददाना बरोबरच्या लढाईत ११९२ सालीं पडला.

तिसऱ्या किंवा शेवटल्या पृथ्वीराजाबद्दलळ आम्ही स्वतंत्र प्रकरण हेणार आहोंत, कारण शहाबुद्दीन धोरी बरोबर ल्याने केलेल्या

२२४ तिसरी हिडु राज्ये

संग्रामांत उत्तर हिंदुस्थानचा, किंबहुना परिणामतः सर्व हिंदुस्थान- चाच, पाडाव झाल्यामुळें त्याचें चरित्र विस्तृत रीतीनें यावयास पाहिजे. त्याच्या राज्यारोहणाचा काळ सन ११६९ घेण्यास कोणतीहि हरकत नाहीं. या बद्दढ्ची चचा आम्ही पुढें करणार आहों. दुलभाच्या कारकादीस इ. स. ९७३ मध्यें सुरुवात झाली असावी, तेथन तिसरा पृथ्वीराज सन ११६९ मध्यें राज्यारूढ हाइतो. १९६ वषांच्या कालांत तेरा राजे होऊन गेले. प्रत्येक राजाच्या कारकी- दांचे सरासरी प्रमाण १’५ वषषांचें पडले. चाहमानांच्या वंशावळीच्या मागल्या भागांत निरनिराळ्या राजांचे राज्यारोहणकाळ ठरविण्या- साठीं आम्ही सरासरी प्रमाण पंधरा बर्षांचंच धरलें आहे हे वाचकांचे ध्यानांत असेल.

वेगवेगळ्या राजांबद्दल बोलावयाचें तर दुलभराज हा त्याच्यापूर्वी झालेला राजा विग्रहराज याचा भाऊ होता असें हर्ष-शिलालेंगवांत आहे. विग्रहराज हा खरोखरच लोकविख्यात होता. हा वीसल राक्षस झाला व त्यानें अजमीरचा उच्छेद केला अशी बाष्कळ कथा पृथ्वीराज- रासेंत दिळी आहे. पृथ्वराज-रासेतील धुंडा दानव हाच विग्रहराज ह्वोय असें म्हटलें तरं त॑ चालण्यासारखे आहे. परंतु पूर्वीच सांगितल्याप्रमाणें विशेषतः ३ र्‍या पृथ्वीराजाच्या पूजांच्या बाबतींत तरी पृथ्वीराजरासेची इतिहासांत गणना करणें शक्‍य नाहीं. आणि व्यामुळें बिजोलिया लेखांत सांगितलेले राजे पृथ्वीराज-रासें- तील राजांतून हुडकून काढून ते अमुकच आहेत असं निश्चित ठर- वीत बसण्यांत कांहीं एक अर्थ नाहीं, तल्या कथेत आणखी असेंहि सांगितलें आहें कीं, धुंडादानव हा पृथ्वीराजापूर्वी २०० वर्षे होऊन गेला; व ह्याला सारंगदेव नांवाचा मुलगा होता. सारंगदेव हें शिलालेखांतीळ वंशावळींत आढळूनाहि येत नाहीं. सारंगदेवाला आर्णा- राज नांवाचा मुलगा होता असें रासेंत सांगितळें आहें. परंतु शिला-

सांभर व अजमार येथील चाहमान, २२५

लेखांवरून असें दिसून येतें कीं अणोराज हा दुसऱ्या वीसलाचा

किंवा तिसऱ्या विग्रहाचा नातू होता. विम्रहाचा राज्यारोहणकाल अदमासे इ. स. १०६३ असावा, आणि यावरून तो तिसऱ्या पथ्वीराजापूर्वी फक्त १०० वर्षेच होऊन गेला हे स्पष्ट आहे. तेव्हां रासेचा विचारच सोडून दिला तर आपल्याला असें दिसून येईल कीं, वाक्पति हा इ. १००३ पासून सांबरचा राजा होता; आणि

अतएव तो गझर्नाच्या महमुदाचा समकालीन असावा. परंतु व्याच्या आयुष्यांत महमुदाचे तुक व चाहमान यांच्यांत संग्राम झाला

असावा असें दिसत नाहीं. कारण महमूद हा अजमीरपर्यत केव्हांहि आला नाहीं. इ. स. १००० मध्यें अजमीर ही चाहमानांची राज- घानीच नव्हती. सबुक्तगीन अथवा महमूद यांना विरोध करणाऱ्या राजसमाजांत सामील असल्याबद्दल अजमीरच्या राजांचाहि उलेख फिरिस्तानें केला आहे. परंतु ही केवळ त्याची कल्पना आहे. शिहा-

बुद्दीन घोर्रच्या काळांत अजमीरचे राजे प्रसिद्धीस आठेले असल्या-

मुळें अजमीरचा काळ मागें ठोटूनहि त्यानें असें विधान केलें असावें यानंतर, बिजोठिया शिलालेखांतील श्रीचंद्रा ऐवजीं पंडित गोरीशंकर यांनीं चामुंड हें नांव दिळें असून चामुंडाने (हम्मारकाव्यांत वर्णिल्या- प्रमाणें ) मारवाडांत–येथें विष्णूचे देवालय बांधिळें असेंहि म्हटलें आहे. इकडे, कोल्हार्न सिंहट व दूसळ अशीं दोन वेगवेगळ्या राजांची नांवें देतो ( पहा. ए. इं. ८ परिषोष्ट ). पहिल्या पृथ्वी- राजाने रणथंभोर येथील जैन देवालयास सुवणकुभ अर्पण केला अशीं आख्या गोरीशंकरनें दिली आहे. त्याचा मुलगा अजयंदेव यानें अज- मीरचा किल्ला बांधला, ११ व्या शतकाच्या शेवटीं हलछीरचें अजमीर त्यानें बसविळें व आपली राजधानी सांबरहून हलठवून अजमिरास नेली असें म्हणतात. त्याच्या व त्याची राणी सोमलादेवी हिच्या

‘नांवचीं पाडलेलीं नाणीं सांपडलीं आहेत (इं. अँ. १९१२). या

२२६ तिसरी हिंदु राज्ये

वरून तो राजा वैभवशाली असला पाहिजे, त्याचा पुत्र अर्णोराज ऊर्फ आना हा अधिकच वैभवशाली होता. त्याने बंधारा घाळून ( अजमीरचा ) आनासागर तलाव बांधळा आणि अशा तऱहेने “ मुसलमानांच्या स्वारीने अपवित्र झाळेली जागा शुद्ध करून घेतली.!’ ( पृथ्वीराजविजय काव्यांतीळ ही बहुधा कविकल्पनाच असावी. कदाचित्‌ याच्या वेळीं अजमारवर मुसलमानानीं चढाई केली असावी ). हरविलास सारडा यांनीं त्याची कारकीदे इ. स. ११२५ते ११५० दिली आहे, वंशावळींत आम्ही जो गणित करून अनुमानानं काळ दिला आहे, त्याच्यांत व यांत फारसा फरक नाहीं. गुजराथच्या कुमारपालानें सं. १२०७ किंवा सन ११५० मध्यें अर्णोराजाच्या कारकीदीत अजमीरवर स्वारी केळी असें पंडित गोरीदशंकर यानीं म्हटलें आहे. इंडियन अन्टिक्वेरे १९०२ मध्यें लिहिलेल्या निबं- घांत मि. हरविळास सारडा यांनीं असें दाखावेलें आहे कीं अर्णा- राजानें गुजराथच्या कुमारपाळाबरोबर दोनदां युद्ध केळे; एकदां संवत १२०२ मध्ये व पुनः १२०७ मध्यें. (यावर्षी अरणोराजास दिलेल्या आपल्या बहिणीचा अर्णोराजानें केलेल्या अपमानाचा सूड उग- वण्यासाठीं कुमारपालानें अजमीखर स्वारी केली ). अणोंचा दुसरा मुलगा बीसलदेव किंवा ४था विग्रहराज ह्या आपला ज्येष्ठ भाऊ जगदेव यास बाजूस सारून राज्यावर बसळा. जगदेव हा आनाचा खून करून पितृधाती झाल्याने त्यास बहुतकरून गादीवर बसूनच दिलं नसावे. वीसलदेव हा आनापेक्षांहि प्रख्यात असा राजा होऊन गेला. हल्लीं दिलीस असलेल्या ( अशोकाच्या ? ) लोहस्तंभावर ल्याने आपला एक लेख खोदविला असून त्यांत ल्याच्या पराक्रमाचें उत्कट

% रा. सारडा यांनी अन्यत्र अजयपालाच्या कारकादींचा काल इ.

स. ११६५ ते ११७५ कसा दिला असावा ह सांगणें कठीण आहे’ बहुधा हे आंकडे चुर्कानें छापले गेळे असावेत,

सांभर व अजमीर येथील चाहमान. २२७

’ असं वर्णन केलेलें आहे. –“ हा यात्रेला निघाला असतां, ल्याने ‘ विन्ध्यापासून हिंमाल्यापर्यंत ज्या राजांनीं त्याचा प्रतिकार केला त्यांस ‘ जिंकले व ज्यांनीं त्याच्यापुढे मान वांकविली त्यांच्यावर अनुग्रह केला. ‘ आणि मुसलमानांच्या कत्तली करून आर्यावर्त हं पुनः एकदां खरें | खुरे आयोवत म्हणज आर्यांचे वसतिस्थान केळे. तो आपल्या वंश- । जांस असा जोमाचा उपदेश करीत आहे कीं, विंध्य आणि हिमालय ‘ यांच्या द्रम्यानच्या मुलखावर आम्ही कर बसवून तेथील राजांस ‘ आमचे सामंत केलें आहे; उरलेली पृथ्वी जिंकण्याविषयीं तुमची । मनें उद्योगशून्य होऊं देऊं नका. ” त्यानें आपल्या राज्याचा कारभार मोठ्या जोमाने केळा आणि थोर कृत्यें करण्याची महत्त्वा-

| मानांनीं अनेक स्वाऱ्या केल्या आणे पुष्कळ ठिकाणीं आपलीं ठाणीं | बसाविलीं हें आम्ही यापूर्वीच सांगितठें आहे. बीसलदेवानें या मुसल- | मानांस पंजाबांत हांकून ळाविळें आणि आयोवते त्यांच्या जुलमांतून | मोकळें करून पुनः एकदां त्याचे नांव अन्वर्थ केलें. वासलदेवाने दिल्ली जिंकली असा बिजोलिया लेखांत जो उछेख आहवे त्याबद्दल

“- आविन्ध्यादाहिमाद्रेविराचिताविजयस्तीरथयात्राप्रसंगात्‌ उद्ग्रीवेषु प्रहर्ता नृपतिषु विनमत्कन्घरेषु प्रसन्नः। आयावते यथार्थ पुनरपि कृतवान्‌ भ्लेंच्छविच्छेदनाभेः देवः शाकभ्भरीन्द्रो जगति विजयते बीसलो क्षाणिपालः ॥ ब्रूते संप्रिते चाहमानतिलकः ज्ाकंभरी-भूपातेः श्रींमाद्वेग्रहराज एष विजयी सन्तानजानात्मजान्‌ । अस्मामिः करदं व्यघापि हिमवद्दिन्ध्यान्तराल भुवः । शोेषस्वीकरणाय मास्तु भवतामुद्योगद्रून्यं मनः ॥ (इ. अ. १९पा. २१८)

२२८ तिसरी हिंदु राज्यं

शका प्रदर्शित केली जाते; परंतु या अश्योकस्तंभावरील लेखानें त्या गोष्टांची सत्यता पटून येते. प्रतोल्यां च वलमभ्यां च येन विश्रामितं यरशाः | ढिल्ठिकाग्रहणश्रान्तमाशिकालाभलंभितम्‌ ॥ ‘ ह्या बिजोलिया लेखांतील शहोकाचा अर्थ लावणें बरेंच कठिण आहे. प्रतोळी व वछभी आणि त्याचप्रमाणें ढिठ्ठिका बव आशिका हे राब्द द्यर्थी आहेत यांत संशय नाहीं (त्यांवरून या नांवांचीं शहरें व घराचे निरानेराळे भाग दर्शविळे जातात ). परंतु त्यावरून हे स्पष्ट दिसून येते कौं दिल्ली सर करण्यास वीसलदेवास’ मोठा प्रयास पडला. जिक्ञासु वाचकांकरितां बिजोठियाचा ठेख व लोहस्तंभावरील लेख हे मुळांत परिशेष्टांत दिळे आहेत.

वैकुंत, जाबालिपुर, पी आणि दिल्ली यांचा विजेता ( बिजो- लिया शिलालेख ) वीसलदेव हा जसा विख्यात योद्धा होता, तसाच तो अजरामर कोर्ति संपादन केलेल्या धारेच्या भोजराजाप्रमाणें कवि आणि कवींचा चाहताहि होता. अजमीर येथें अलिकडे दोन शिला सांपडल्या आहेत. त्यांपैकीं एकीवर खुद्द बीसलदेवानें लिहिळेळें एक . नाटक कोरलें असून दुसरीवर त्याच्या दरबारच्या एका कर्वांचें नाटक कोरलें आहे. हरकेलि हें नाटक स्वत: वीसलदेवानें लिहिलेळं असून व्यांतीळ संविधानक किराताजुनीय या सुप्रासिद्ध महाकाव्यावरून घेतलेले आहे. आपल्यास अजुनाप्रमाणे शिवाने दर्शन दिलें असे या नाटकांत वीसलदेवाने दाखाविळे आहे. हें नाटक सं, १२१० (इ. स. ११५३ )मध्ये रचिळें आहे असे दिसतें. दूसऱ्या नाटकाचं नांव लालितविग्रहराज असं असून तं दरबार कवि सोमदेव यानें रचिले आहे. त्या नाटकांत असं दाखाविळें आहे कीं विम्रह्राजाचचे वसंतपाल नावांच्या राजाच्या (हा राजा बहुधा काल्पानिक असावा ) कन्येवर प्रेम जडले; तिलाहि तो आवडला होता; व त्यानें तिळा अमीराबरोबरचें युद्ध संपल्याबरोबर तुजकडे येतो असा निरोप पाठ-

सांभर व अजमीर येथील चाहमान. २२९

विला आहे. ही गोष्ट ऐतिहासिक दृष्टया खरी असावी. या हम्मीरा- ( अमीरा ) जवळ अगणित तुर्क, (ते बहुधा अफगाण असावेत) होते असे म्हटलें आहे. दोघांनींहनि आपले गुप्त बातमीदार एक- मेकांच्या सैन्याच्या तळांत पाठविले होते. शेवटीं दूतांमार्फत दोघांत संधि झाला असं दडशविलें आहे.

वीसलसर नांवाचा तढाव बांधून आनासागर बांधणाऱ्या आपल्या पित्याप्रमाणेंच बीसलदेवानें आपलं नांव अजमीरमध्यें चिरस्थायि केलें आहे. त्याने आपल्या लोहस्तंभ–लेखांत आपला पिता आना याचें नांव अवेळुदेव असे दिळं आहे. (या आनानं आनासागर नांवाचा तलाव बांधला, त्या तलावाच्या कांठावर पुढें शहाजहानानें संगमरवरी बारादरी बांधली आहे ), बीसलदेवानें संस्कृत विद्याथ्यांसाठीं एक विद्यालयाहे बांधिले होतें. त्या विद्यालयाची शहाबुद्दीन घोरीनें मशीद बनवून टाकली. ती आज ‘अढाई दीनकी झोंपडी’ या नांवानें प्रसिद्ध आहे.

वबीसलदेवाचा शेवटचा उपलब्ध असलेला लेख (दिछीचा लोहस्तंभ) संवत १२२०सन ११६३चा आहे. त्याच्या मागें त्याचा अज्ञान मुलगा अपरगांगेय याचा बिजोलिया शिलालेखांत उल्लेख आलेला नाहीं. पितृघा- ती जगदेवाचा मुलगा म्हणजे वीसलदेवाचा पुतण्या पृथ्वीभट किंवा दुसरा पृथ्वीराज हा या अज्ञान मुलाला बाजूला सारून गादीवर बसला त्यानें थोडीच वर्षे राज्य केलें. त्याच्यानंतर वीसलदेवाचा कनिष्ट बंधु सोमेश्वर हा सिंहासनावर बसला. ल्यानेंह्यि अल्पकालच राज्य केलें. त्याच्यानंतर त्याचा पुत्र ब चाहमान घराण्यांतील होवटचा राजा ३ रा पृथ्वीराज राज्य करूं लागला. पृथ्वीराजाबद्दलच्या प्रकरणांत सोमेश्वर व पृथ्वीराज यांच्या राज्यारोहण-शकाची ज्यास्त चचा आम्ही करणार आहां. परंतु येथे येवढें सांगणें जरूर आहे कीं सोमेश्वराने कांहीं दिवस तरी राज्याचा उपभोग घेतला असला पाहिजे. कारण बिजो-

२३० तिसरी हिंडु राज्ये

लिया शिलालेखांत सोमेश्वरानें रेवना नांवाचा गांव दान दिल्याचा उललेख असून या उठ्लेखानेंच तो लेख संपला आहे. तेव्हां तो लेख सं. १२२६ सालीं फाल्गुन वद्य ३ स इ. स. ११५१६९ मार्चच्या सुमारास लिहिण्यांत आला तेव्हां सोमेश्वर राज्य करीत असला पाहिजे. आमच्या दुसऱ्या भागांत ( पा. १४ ) सिद्ध करून दाखाविल्या- प्रमाणे व पृथ्वीराजविजय आणि हम्मीरकाव्य यांत वर्णिल्याप्रमाणे चाहमान हे सूर्यवंशी रजपूत आहेत. ते अभिकुल होत ही अलि- कडची कल्पित कथा असून त्या कल्पनेचा शिलालेखांमुळें परि- स्फोट झाला आहे. पंडित गोरीशंकरांचे मतहि असेच आहे. परंतु पंडित गौरीशंकर हे चाहमानांस चंद्रवंशी क्षत्रिय मानतात हें मात्र विचित्र आहे ( पहा टोंडच्या राजस्थानची हिंदी आवृत्ति). पण ही बहुधा छापण्यांताळ चूक असावी, |

प्रकरण दुसरं मेवाडचे गुहिलोत.

बप्पा रावळानें स्थापिळेळें राज्य या कालविभागांत जसेंच्या तसें अबाधित राहिलें; आणि मागील विभागांतल्या प्रमाणेच या विभागांतठोंहि मेवाडचे गुहिलोत राजे तितकेच शोर्ययुक्त

’ आणि स्वातंत्र्याप्रिये होते. त्यांचे स्वातत्र्यावर मनापासून

इतके प्रेम हाते की, इतर राष्ट्रांच्या किंवा कुलांच्या प्रदे- शाचा किंवा स्वातंत्र्याचा अपहार करून आपला प्रदेश वाढवि- ण्याचा प्रयत्न त्यांनीं कधींच केला नाहीं. याच्या पूर्वीच्या काय किंवा या कालविभागांत काय इतर राजघराण्यांतील राजाप्रमाणे सम्राट किंवा चक्रवतीं पदाची आकांक्षा त्यांनीं केव्हांहि धरली नाहीं. चाह- मान, कलचूरी, गाहडवाळ हीं घराणीं या कल्पनेने भारी गेलीं होतीं. वस्तुतः हिंदुस्थानांत साम्राज्य स्थापण्याचा हा मोहृ कोरव- पांडवांच्या प्राचीन कालापासून तो तहत पृथ्वीराजाच्या कालापर्यंत हिंदुस्थानच्या अनर्थाचें कारण झाला आहे, आणि ल्यापासून स्वाभा- विक होणारा फायदा मात्र यातलिताहे झालेला नाहीं; कारण या साम्राज्याच्या कल्पनेंत जमन साम्राज्याप्रमाणें सर्व उत्तर किंवा दक्षिण हिंदुस्थान एका राजठछत्राखालीं संघटित करण्याचा हेतु नव्हता; इतर राजांकडून “ जितो5स्मि ‘ असे म्हणवून ध्यावे, पण त्यांच्या राज्याला कोणत्याहि तऱ्हेने धक्का लावूं नये अशी कल्पना होती. असो, येथे येवढेंच सांगणें पुरें कीं, सम्राट पदाचा मान मिळविण्याच्या अहं- काराला मेवाडचे राजे केव्हांहि बळी पडले नाहींत; पण ह्यांनी आपल्या स्वातंत्र्याचे जिवापाड जतन केलें. बाराशे वर्षाच्या अनेक. कष्टकर प्रसंगांत आणि परिवर्तनांतहि मेवाडचें राज्य आजपर्यंत

हेद राज्यं

०२५१२ तिसरा

नी

-अबाधितपणें कायम राहिलें यांतील इंगेत हेच असावें. ते आपल्या प्रदेशांत आणि गोरवांत संतुष्ट होते, आणि म्हणूनच बप्पा राव- ळानें प्रस्थापित केलेल्या राज्यांतील सर्व प्रदेशावर आजहि ते राज्य करीत आहेत.

या कालविभागांत ( १०००-१२०० इ. ) मेवाडचे राजे पर- राज्यांच्या आणि विशेषत: मुसलमानांच्या स्वाऱ्यांपासून प्राय: सुरक्षि- तच राहिळे. काबूल किंवा कनोज येथील चक्रवती राजांस मुसल- मान हिंदुस्थानचे राजे असे मानीत. मेवाडचे हे ल्या अथाने हिंदु- स्थानचे राजे नसल्यामुळेंच बहुधा महमुदाच्या तुकांनीं देखील मेवाड- वर स्वारी केली नाहीं. कदा’चेत्‌ तें राज्य संपन्न नसावें आणि त्यांत द्रव्याच्या संग्रह्मानें भरून गेलेली देवस्थाने अथवा तीथक्षेत्रेहि नसावींत. यामुळें मेवाडचे राजे अनायासानें अबाधित राहू शकले आणि तेथील ओजस्वी राजघराणें विल्यांत अंत पावणारी र्‍्हासाचीं नुसती चिन्हेंहि उत्पन न होतां अविच्छिननपणें राज्य करीत राहिले.

दुसऱ्या भागांत आटपुरा येथील संवत १०३४ म्हणजे इ. स. ९७७ च्या शिलालेखावरून बप्पारावळापासून शक्तिकुमारापर्यंतची मेवाडच्या राजांची वंशावळ दिलेली आहे. या भागांत त्या वंशावळीचा शाक्तिकुमारानंतरचा इ. स. १२०० पर्यंतचा उत्तरभाग देत आहों. पृथ्वीराज-रासेंत समरासंहृ हा अजमीर आणि दिल्ली येथीळ तिसऱ्या पृथ्वाराजाचा समकालीन राजा म्हणून दिला आहे ते चुर्काचें आहे हें आतां सर्वत्व मान्य करण्यांत आलें आहे. समरासंहाच्याच शिला- लेखांवरून समरासंह हा १३ व्या शतकाच्या अखेरीस होऊन गेला हं स्पष्ट दिसत आहें. दुर्दैवाने रासेतीळ हकिकत सवे रजपुतांच्या राज्यांतील भाटांनीं मान्य केल्यामुळें त्यांच्या वंशावळी चुकीनें दूषित झाल्या आहेत. मेवाडच्या गुहिलोतांचा ज्यांत संबंध आला आहे असे नानाप्रकारचे कोरिव लेख व त्यांत दिलेल्या त्यांच्या वंशावळी

२. स्य क किस.

मेवाडचे गुहिलोत. २३३

! यांचा एकत्र विचार करून रासेनें दिलेली चुकीची कथा प्रचारांत कधीं आली, हें आपल्याला बहुतेक निश्चित करितां येते. अशा तऱ्हेचे जे कित्येक कोरीव लेख आहेत, त्यांतील पहिला म्हणजे सं.

१३४२ (इ. १२८५ ) चा अबू अचलेश्वराचा शिलाठळेख होय. त्यांत पुष्कळ राजांची साविस्तर वर्णने आहेत. त्यानंतर जोधपूर प्रांतातला सं. १४९६ [इ. स. १४३९] चा राणपुरा [ बाणपुरा ] येथील शिलालेख; त्यांत बप्पा पासूनची वंशावळ अगदीं मोजक्या शब्दांत दिली आहे. शेवटचा शिलालेख म्हणजे रायसागर येथील सं. १७३२ [इ. १६७५] चा शिलालेख. समरासेंह्ाचें लयन पृथ्वी- राजाची बहीण पथा हिचेबरोबर झालें होतें व शहाबुद्दीन धोरी बरो

बर झालेल्या शेबटल्या लढाईत प॒थ्वीराजाबरोबर समरसिंह ग्ृत्य्‌ पावला, ही रासेंत दिलेली कथा या लेखांत प्रथम दृष्टोत्पत्तीस येते. या लेखांत खुद्द रासेचा उछेख केळा असून त्यामुळें मागील दोन लेखांत दिलेल्या वंशावळींत फिरवाफिरव करणें अवऱ्य झालें. समर- सिंह हा, ज्या जेत्रसिंहाच्या कारकीर्दीत इ. स. १२१६ मध्यें मेवाड व तुक यांची पह्दिली लढाई झाली त्या जेत्रसिंह्याच्या तेजसिंह् नांवाच्या मुलाचा मुलगा होता असं त्या लेखांत दिळें आहे. अबूच्या लेखांत तर तुरुष्क सैन्यरूपी समुद्राचा अगस्त्यच असें जेत्रसिंहाचें कीर्ति- प्रद बर्णन केळे आहेक$ या लढाईविषयीं आम्ही पुढें लिहिणार आहोंत, परंतु येवढयाहि वर्णनावरून असे स्पष्ट दिसून येईल को, समरासिंहाचा आजा जेत्रासेह ह्या देखील पृथ्वीराजाला समकालीन नव्हता, तात्पर्य इ. स. १४२९ च्या रणपुरा लेखाचे नंतर आणि

, इ. स. १६७’५ च्या रायसागर लेखाचे पर्वी पृथ्वीराज-रासंतील

कथा प्रचारांत आली असली पाहजे. तिजकडे दुलेक्ष करून, अबू

% तुरुष्कसेन्याणवकुंभयोनेः ।

२३४ तिसरीं हिंदु राज्ये

आणि बाणपुरा येथीळ शिलालेखांवरून टोंड्य्या राज- स्थानाच्या हिंदी आवृत्तीत पंडित गोरीरंकरांनी या काळांतील मेवाड घराण्याची जी वंशावळ तयार केली आहे तीच आम्ही देणार आहोंत. याच घराण्यांतील विजयसिंह नांवाच्या एका राजाचा सं. ११६४ (इ. स. ११०७ ) चा आणि तेत्रसिंहाचा सं. १२७० (इ, स. १२१२ ) चा असे दोन उपलब्ध शिलालेख आहेत. इ. स. ९७७ च्या आटपुरा शिलालेखांतील शक्तिकुमारापासून पासून विजयसिंहापर्यंत १० राजे झाले, त्यांच्या कारकीदीची सरासरी ११०४>५२२– १२८ -_१२ वषांची पडते; आणि शाक्तिकुमारापासून जेत्रसिंहापर्यंत १९ राजे झाले असून त्यांच्या कारकीदींची सरासरी १०७२१ > रईई– १२:८८ बर्षे अशी बसते. यावरून असे दिसतें कीं, मागील काळाप्रमाणेंच या काळांतहि गुहिलोत राजांच्या कार- कीदीचे सरासरी मान इतर राजघराण्यांच्या मानानें बरेंच कमी आहे. ही बंशावळ तारखांसह्द निश्चित करण्यासाठीं गुहिलोतांच्या वंशा- वळीतील या भागांतील राजांच्या कारकीदींची सरासरी १३ व ११ वर्षे घरून व त्याप्रमाणें निरनिराळ्या राजांच्या अनुमानिक कारकीर्दी कल्पून आम्ही ही वंशावळ समरासिंह्वापर्यंत देत आहोंत आणि निरानेराळ्या राजांच्या बाबतींत पंडित गोरीदंकर यांची टोंडच्या राजस्थानाच्या आवत्तींतून व इतर ठिकाणांतून घेतलेल्या माहितीचा उपयोग करणार आहों गुहिलोत वंशावळ.

१ शक्तिकुमार ( राज्यारंभ इ. स. ९७७ )

२ अंबाप्रचाद र मद दद.)

३ शिवम ( ग १००३)

४ नरवमी ( आ १०१६)

मेवाडचे गुहिलोत. २३५

५ कौतेंवर्मा ( अ १०२९ ) द्‌ नव ( व १०४२ ) ७ वैर ( द १०५५ ) ट हंसपाल (९ शः ९०६८) ९ वेरिसिंह ( शर ४५८४१७ १० बिजयबिंह ( पि १०८)

| शिलालेख ११०७ ) 4*- ११ अरिसिंह ( राज्यारंभ इ. स. १११८) ।

१२ चंड ( ह ११२९) -£ विजयसिंह ( न ११४० ) नै शड रणासिंह ( रि ११५५ ) १५ भौमसिंह ( य ११६२ ) १६ सामतसिंह ( मू ११७३ ) १७ कुमारसिंह ( शर ११८४ ) श्व मय सिंध ( 9 ११९५) लेख १२०३ १९ पद्मसिंह ( रि १२०६ )

]

२० जैत्रासेंहह ( ळे. १२९१३, १२२९”) |

२१ तेजासेंह ( ल, १२६७ ) 1

२२ समरबिंह (ले. १२७८, १२८३, १२८७, )

आतां या वंशावळींतीळ राजांबद्दल व्यक्तिराः विचार करूं. सुरु- बातीस हें सांगितलें पाहिजे की अबू व चितोडगड येथील शिला-

२१६ ठिसरीं हिंदु राज्ये

लेख एकाच सुमाराचे असून दोन्ही वेदरार्मा नांवाच्या एकाच ठेख- कानें लिहिळेळे आहेत. परंतु चितोडगडच्या शिलालेखांत अंबाप्रसाद व शरुचिवर्मा हे शक्तिकुमारानंतर आणि नरवर्म्याच्या पूर्वी दिळेळे आहेत. शिवाय दैत्यांप्रमाणें उप्न असलेल्या अशा धर्मशत्रूंचा शक्तिकुमाराने निःपात केला असाहि त्यांत उछेख आहे. हा उल्लेख खास मुसल- मानांबद्दल असला पाहिजे, आटपुरा शिलालेखावरून या राजाची कारकौर्दी ९७७ इ. मध्यें सुरू झाली असं आम्ही दिले आहे. याच सालांत गझनीचा सबुक्तगीन तक्तनशीन झाला; आणि हिंदुस्थानास ग्रासून टाकणाऱ्या संकटाचा प्रादुर्भाव झाला. काबूलच्या जयपालाने इ. स. ९८९मध्यें सबुक्तगीनावरुद्ध उभारलेल्या हिंदु राजांच्या संघांत शक्तिकुमार सामिळ झाला असावा असें मानण्यास जागा आहे ( स्मिथची अ. हि. इं. ).

चितोडगडच्या शिलालेखांत नरवर्म्याच्या नंतरचे राजे अबूच्या शिलालळेखांतल्याप्रमाणेच दिळे आहेत; व यामुळें आम्ही त्याची प्रमाणळेखांत गणना केली नाहीं, परंतु अबूच्या शिलालेखांत अंबा- प्रसाद आणि शुचिवमी यांचा उल्लेख नसला तरी त्याच्याच लेखकानें लिहिलेल्या चितोडगडच्या शिलालेखांतील राजांच्या यादींत या राजांचा समावेश केळेला असल्यामुळे आम्हीहि आमच्या वंशावळोंत त्यांचा समावेश केला आहे. यावरून असेंहि दिसून येतें कीं अबूचा शिला- लेखांतील आणखीहि कांहीं नांवाचा उल्लेख यावयाचा राहिला असावा; आणि तो तसा राहिला आहे असेंहि आढळून येतें. अबा- प्रसाद नांवाचा राजा यादींत विचित्र वाटतो. पण हृ नांव दुसऱ्या राजघराण्यांतील लेखांत आळे आहें ( कळचूरी )) आणि चितोड- गडच्या शिलालेखांत त्याचा उल्लेख आला असल्यानें त्याबद्दल संशय बाकी रहात नाहीं. योगराज [ ६ ] व हेमपाळ [८] हीं नांबें परकी वाटतात. त्यांचा उल्लेख अबूच्या शिलालेखांत आठेला

मेवाडचे गुहिलोत. २३७

आहे आणि त्यांत हंसपालाऐवजीं वंशापाळ असं नांव दिळें आहे. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे सं ११६४ चे विजयसिंहाचे एक ताम्रपत्र ‘मिळाळें आहे. अबूच्या व बाणपुराच्या लेखांत विजयसिंहाचे ऐवजी विक्रमसिंह असें नांव दिळें आहें.रणसिंह किंवा कर्णसिंह याचा उछेख अबूच्या लेखांत नाहीं, परंतु तो बाणपुराच्या लेखांत आहे. असें असण्याचा संभव आहे कीं भाटानीं आपल्या कल्पनेने कांहीं निमीण केलेल्या राजांचीं नांवे या लेखांत दिलीं असावींत आणि या नांवाचे राजे होऊन गेळे कीं नाहीं हा संशयच आहि. रणसिंहापासून पुढें दोन शाखा झाल्या, मोठी रावळ, आणि शिसोदा येथें जाऊन राहिलेली धाकटी राणा, अशी जी दंतकथा आहे तिचा उछलेख अबूच्या शिलालेखांत नाहीं, परंतु या दंतकथेबद्दल संशय उरत नाहीं. कारण चितोडच्या प्रारंभीच्या राजांस रावळ म्हणत व हमीरापासून पुढच्या राजांस राणे म्हणतात. तें कां याचें विवेचन टिपेंत केलें आहें.*बाप्पारावळापासून एकंदर २६ रावळ झालें असें रायसागरच्या कालक्रमाने अखेरच्या असलेल्या शिलालेखांत म्हटलें आहे. त्या शिला- लेखांत ही दन्तकथा संग्राहित झालेली दिसते.

रणसिंहापासून र्भामासंहाखेरीजचीं बाकीची नांवें सवे लेखांत सारखींच आहेत. अबच्या व राणपुराच्या लेखांत भीमसिंहाऐवजीं क्षमसिंह असं नांव दिलें आहें. हे राजे अबूच्या शिंलाळेखाच्या काळा- तीळ किंवा नुकतेच पूर्वी होऊन गेळेळे असल्यामुळें त्यांच्या बाब-

६ रावळ म्हणजे लहान राजा ह नांव बप्पा पासून चाळू झालें.राणा म्हणजे ( राजानक ) मांडलिकराजा, हं नांव हम्मीर छोट्या घराण्यांतून येऊन गादीवर बसला तेव्हां पासून उदेषुरजे राजे लावूं लागले.तेंच हल्लीं ‘वीर मोठ्या अर्थाचे झालें आहे.

म. भा…१६

२३८ *“ तिसरा हिडु राज्ये

तींत चूक होण्यासारखी नाहीं. सांमतसिंहाच्या कारकीर्दीची सुरुवात बहुधा इ. स. ११७९ मध्यें झाली असावी असे अनुमान आहे. तो तिसऱ्या पृथ्वीराजाचा समकाठीन असावा. पंडित गौरीशंकरांच्या कल्पनेप्रमाणे रासेंत भर टाकणारा किंवा आपल्या स्वतःच्या कबिता चेदाच्या म्हणविणाऱ्या नवीन कवीचा सांमत व समर या नांबांत घोंटाळा झाला आणि त्यामुळे इ. स. १२८२ चा समरासेद हा पृथ्वीराजाचा समकालीन बनविण्याची त्यानें घोडचूक केली.

प्रकरण तिसरं. धारचे परमार राजे.

१ भोज.

मुंज व सिंधुराज यांनीं माळव्यांतील परमारांचें राज्य पूर्वांच स्व- तंत्र व वैभवशाली केलें असल्यामुळें या कालविभागाचे सुरुवातीसच परमांरांची गणना प्रबळ राजांमध्ये होऊं लागली होती. भोजचे कार- कौदींत परमार राजांचे वैभव व कॉर्ति अधिकच वाढली; इतकेच नव्हे तर ती अगदीं शिखरास जाऊन पोह्होंचली. मुंज मृत्यु पावला ल्या वेळीं लक्ष्मी आणि इंद्राणी यांचा आधार तुटला नसला तरी सरस्वती देवीचा आधारच तुटला असें वाटून कवि निराश झाले.% लक्ष्मी आणि वीरश्री यांस कोठेंतरी दुसरीकडे आश्रय मिळेल परंतु सरस्वती मात्र आतां कायमची अनाथ झाली अशी त्यांस चिंता वाटूं लागली. परंतु भोजानें त्यांची ही चिंता निर्थक आहे असें प्रत्य- यास आणून दिलें. लक्ष्मी, वीरश्री आणि सरस्वती या तिघींसहि त्याचे पदरीं सारखाच आश्रय मिळाठा. पौराणिक कालांतील राम व युधिष्ठिर आणि तदनंतरचे कालांतील विक्रम ब हाल यांचेप्रमाणें शस्र आगि शास्त्र या दोहोताहि निष्णात असलेला भोज हा ऐति- हासिक कालांतील उत्कृष्ट क्षात्रियत्वाचा आदरीच होऊन गेला.

भोजानं विद्ठज्जनांचा परामषे तर घेतलाच पण शिवाय तो प्रसिद्ध ग्रंथकार होता. ल्याने अनेक व विविध विषयांत प्रावीण्य संपादन केलें होतें. त्यानें ज्योतिष, अलंकार, शिल्प,योग ब व्याकरण

202 *)

% लक्ष्मीर्यास्याते गोविंदे वौॉरश्रावीरवेश्‍माने । गते मंजे यशःपुंजे निरालंबा सरस्वती ॥

२४० तिसरी हिंदु राज्ये

शास्त्रांचा अभ्यास केला होता आणि या प्रत्येक विषयावर त्यानें आजहि प्रमाणभूत मानण्यांत येण्यासारखे ग्रंथ लिहिले आहेत. अलं- कारशास्त्रावरीळ सरस्वतीकंठाभरण, योगशासत्रावरीळ राजमातंड व ज्योतिषशास्त्रावरील राजमुगांक-करण हे त्याचे ग्रंथ सुप्रसिद्ध असून त्यांवरून त्या त्या शास्त्रांत त्यानें केवढें मोठें प्रावीण्य संपादन केलें होतें ह स्पष्ट दिसून येतें. या ग्रंथांनी विद्वत्तेविषयी त्याची कोौर्ति इतिहासांत चिरस्थायी झाली आहे. घार येथे त्यानें संस्कृत विष- यांच्या उच्च आध्यापनासाठीं पाठशाला बांधली होती, आणि त्या पाठशाळेंतील शिलांवर अनेक विषयांवरील संस्कृत सुभाषिते कोरली होती. मुसलमानांनीं या पाठशालेची मशीद बनवून ठाकिली; कमा- लमोळा म्शीद या नांवानें आज ती धार येथे आस्तत्वांत आहे. संस्कृत सुभाषिते कोरलेल्या शिलांचा फरशीं ऐवजी या मशिदींत उपयोग करण्यांत आला असून आतां त्या इतक्या झिजल्या आहेत कीं त्यांवर कोरलेलीं अक्षरे ओळखणे शक्‍य राहिलें नाहीं. परंतु या सरस्वती-सदनाला किंवा भारती-भुवनाला लागून एक जुनाट विहीर आहे, ती “ अक्कलकुवी * या नावानें प्रसिद्ध आहे; आणि ती पाहून ज्या कालीं त्या पाठशालेंत अध्ययन करणारे व सरस्वतीसदनाच्या दिवाणखान्यांत वादविवाद करणारे विद्ठज्जन या विहिरीचे पाणी पिऊन आपल्या ज्ञानांत व हहाणपणांत भर टाकीत होते त्या का- लाची आठवण होते. कर्नल ल्युआर्ड व मि. लेले यांनीं “धार आणि माळव्याचे परमार ‘ या नांवाच्या आपल्या पुस्तकांत भोजाच्या वाड्मय–विषयक श्रेष्ठत्वाबद्दळ ह्या व इतर दुसऱ्या ज्या कित्येक लहान मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या खरोखरच मनोवेधक आहेत; आणि या दोघा विद्वान ग्रंथकारांनी धारच्या परमारांचा सुसं- बद्ध व सविस्तर इतिहास देण्यासाठीं परमारांच्या माहितीसाठीं उपलब्ध असलेल्या हरएक साधनांचा उपयोग करून घेतलेला असल्यामुळें

घारचे परमार राजे-भोज. २४१

या इतिहासांत अवऱ्य देण्याजोग्या गोष्टी त्यांच्या या ग्रंथामधून उध्दत करून घेण्यास कोणतीच हरकत नाहीं

( १ ) जरी भोजाचा हिंदुधमशासत्रावरील असा कोणताहि ग्रंथ उपलब्ध नाहीं, तरी त्या शास्त्रावरील ग्रंथकार म्हणन कित्येक सुप्रसिद्ध प्रंथकारांनीं भोजाच्या मताचा उछेख केलेला आहे. अशा तऱ्हेने शूलनाथानें प्रायश्चित्त–विवेकांत व रघु- नंदनानें मनुटीकेंत व विज्ञानेश्वरानंहि आपल्या सुप्रसिद्ध मिताक्षरंत भोजाचा उल्लेख केलेला आहे, या गोष्टीनं भोजाच्या बुद्धीचे नुसतें विविधगामित्वच दृष्टोत्पत्तीस येतं असं नाहीं, तर त्याच्या राजशा- सनांताल नैपुण्याचीहि खात्री पटते. (२) धर्मशास्त्राप्रमाणेंच मुलकी राज्यकाभारपद्धति ही पूर्ण अवगत असल्याखेरीज हिंदुधरम–शास्त्रा- वर त्याला आपला ग्रंथ लिहिताच आला नसता; कारण, हिंदु लो- कांत धम–पुस्तकांत या दोहोंचाहि समावेश होतो, (३ ) भोजानें आपल्या प्रजाजनांच्या शिक्षणाकडे व त्यांच्या ऐहिक सुखाकडे पुष्कळ लक्ष पुरावेलें होते. एका विस्तीण खोऱ्या भांवतालच्या टेंकड्यांत बंधारे धाळून त्यानें ‘ भोजसर ‘ नांवानें प्रसिद्ध असलेला तलाव बां- धिला आणि बहुतकरून त्याचे कालवे काढून त्यानें त्यांचा राती- साठीं उपयोगहि केला असावा. हाच तलाव हल्लीं फोडून एक सुपीक परगणा भोपाल राज्यांत झाला आहे. (४)त्याच्या उपलब्ध झालेल्या दोन दानपत्रांवरून त्याच्या सरकारी दफ्तराची भाषा कशी सुटसुटीत होती हें दिसून येतें. या दफ्तराचा उछेख आम्ही पुढें करणारच आहों. परंतु येथें येवढें नमूद करून ठेवणें जरूर आहे कीं त्याच्या राज्यकारभाराची पद्धाते आणि व्यवस्था हीं नमुनेदार होतीं.

भोजाचें वाड्मयांतील उच्चपद जसें सुप्रसिद्ध आहे तसें त्याने राजकारणांत संपादन केलेलें महत्व प्रसिद्ध नाही; आणि अजून पावता निश्चितपणें ठरविण्यांतहि आलेलें नाहीं. तो इ. स. १०१०

२४२ तिसरी हिंदु राज्ये

चे सुमारास सिंहासनारूढ झाला ( क. ल्युआड व मि. लेले यांचें मतें या पूर्वीच तो गादीवर आला असावा ); आणि त्यानें कमींतकमी चाळीस वर्षें तरी राज्य केलें. सर व्हिन्सेंट स्मिथनं त्याचा मृत्युकाल इ. स. १०६०चे सुमारास म्हणून दिला आहे. पंडित गोरॉशंकर यांच्या म्हणण्याप्रमाणे तो १०५”९चे थोडा पूर्वी ( म्हणजे संवत्‌ १११२ ) असावा. त्यानें अनेक हिंदी राजांबरोबर युद्ध केटी. उदे- पर प्रशस्तींत वणिल्याप्रमाणे चदीचा राजा इंद्रनाथ, गुजराथचे राजे पाहिळा जोग्गळ व भीम, आणि कर्नोट, लाट व त्याचप्रमाणे गुजर व तुरुष्क राजे यांच्याबरोबर त्यानें केलेल्या युद्धाचा उल्लेख प्रामु- ख्यानें करण्याजोगा आहे ( ए, इं. १ पान २२२). यापैकीं त्याची ( तुरुष्क ) तुकांबरोबर जी लढाई झाली तिचा पहिल्याने विचार करूं. या लढाईपूवी मुंज राजानें एका हूण राजावर विजय संपादन केला होता असें या प्रशस्तीत जवळच म्हटळें आहे; आणि अर्थात यावरून असें स्पष्ट दिसून येतें कीं या प्रशस्तींत हूण व तुर्क शद एकमेकांबद्दल समानाथीं म्हणन योजिळे जाऊन गोंधळ केलेला नसून त्यांच्यातील भेद कायम राखिला आहे. तेव्हां पूवी उछलेखिळेला हूण राजा हिंदु राजा असला पाहिजे, कारण त्यांकाठी हिंदुस्थानांत हूण लोक आलेले किंवा राहिलेले नव्हते, आणि शिमाय हूण ही संज्ञा एका रजपूत कुळालाहि लाविळेली आढलते. मुंज राजाचा राज्यकाल ९९७ इ. ते १०१० इ. हा आहे; आणि या कालावरून अमीर सबुक्‍तगीन याचे विरुद्ध लढण्यासाठी रजपूत राजांनीं केलेल्या संघांत मंज राजाहि सामील झाला असावा असे कोणासहि स्वाभाविकपणे वाटेल. परंतु त्याप्रमाणें तो सामील झाला असावा असे वरील उल्ले- खावरून ठरत नाहीं. गझनीच्या महमुदाच्या कोणल्या स्वारीत भोज त्याचे विरुद्ध लढला हें निश्चित करणें कर्ठाण आहे. सोमनाथ येथें महमुदाबरोबर जे राजे लढले त्यांत तो नव्हता येवढें खचित. कारण

धारचे परमार राजे-भोज. २४३

त्याने तुकांचा पराभव केला असें या प्रशस्तींत म्हटलें आहे. तब- कातू-इ–अकबरीमध्ये असा एक उललेख आहे कीं, महमुदानें सोम- नाथ येर्थे हिंदु राजांचा पराभव केल्यावर हिंदुस्थानांतील अत्यंत प्रबळ अश्या राजांपैकीं परमारदेव ह्या आपल्याला आडवून धरण्यासाठी तयारी करीत आहे असे कळल्यामुळे महंमुद आपली मिळविलेली ठूट घेऊन मुलतानच्या वाळवंटाच्या पश्चिम भागांतून निघून गेला. या उल्लेखाच्या जोरावर क. ल्युआर्ड व मि. ठेले यांनीं सुचाविलेल्या कल्पने प्रमाणे महमुदाचें हें मुलतानच्या रेतमैदानांतून निघून जाणें हाच त्याचा कदाचित्‌ भोजानें केळेंला पराभव असावा. तबकातू-ई-अक- बरीमध्यें हिंदुस्थानांतील प्रबळ राजांपैकीं एक म्हणून ज्या परमार- देवाचें वर्णन केळें आहे तो भोजच असला पाहिजे. तें वर्णन दुसऱ्या कोणत्याहि परमार राजास जुळण्याजोगें नाहीं. शिलालेख लिहिणारे लेखक बहुराः स्तातिपाठक असतात; आणि त्यामुळें मह- मुदाने भोजास टाळले तेव्हां त्याचा भोजानें पराभवच केला असं त्यांनीं म्हणावें हें स्वाभाविकच आहे. भोजाने सोमनाथाचे देवालय बांधिळें असा उदेपूर प्रास्तीमध्ये जो उछेख आहे ब्यावरून हेंहि संभवनीय दिसतें कीं प्रशस्तींतील हा उल्लेख या प्रसंगाचाच ( सोम- नाथाच्या युद्धाचा) असावा.बहुधा महमुदानं सोमनाथाचे देवालयांतील मूर्ती फोडली इतकंच नाहीं तर तें देऊळहि उध्वस्त केलें असावें. आणि क्षत्रिय व॒ शिवोपासक भोजानें ताबडतोब देवालय पुनः बांधावे आणि मूर्तींची पुनस्स्थापना करावी हें त्याच्या शोयोस जाभेसें आहे असें म्हणतां येतें.

भोजाच्या राज्यारोहणाचा काळ १०१०च्या आधीं जर धरिला तर इ. स. १००९ सालीं आनंदपालानें जमविलेल्या हिंदु राजांच्या फोजेत भोजानेहि आपलें सैन्य पाठविलें असण्याचा संभव आहे. प्रशस्तींत जो उल्लेख आहे तो स्वतः भोजाबद्दल नसून त्याच्या सेना-

२४७४ तिसरी हिंदु राज्ये

पतीनीं किंवा पथकांनी तुर्कादींचा पराभव केला असा आहे. पण यां लढाइत आनंदपालानें तुकांचा पराभव केलेला नसल्यामुळें प्रश- स्तींतील या उद्लठेखाचा संबंध याहि लढाईशीं जोडतां येण्या- जोगा नाहीं.

उपलब्ध अशा सर्व ग्रंथांचा उपयोग करून क. ल्युआर्ड व मि. ठेले यांनीं आपल्या पुस्तकांत भोजाचे आपल्या भाोंवतालच्या हिंदु राजांबरोबरचे राजकीय संबंध आणि त्यांच्यामधील युद्धे यांचे उत्तम वर्णन दिलें आहे. मालव राज्याचे. पूर्वेस हददीला हृद्द मिडून चेदींचें राज्य होतं; उत्तरेस चितोडचें होते; पश्चिमेस अनहिल- वाडच्या चालुक्यांचे होतें; आणि दक्षिणेस कल्याणच्या चाठक्यांचे होतें. शेजारीं असलेल्या राज्यांत कधीं दोस्ती तर कधीं वैर हे चाला- लावयाचेंच व त्यामुळें चितोडचें गुलोहित राज्य वगळळें असतां बाकीच्या तिन्ही राज्यांबरोबर भोजास वारंबार लढावे लागलें. मागें सांगितल्याप्रमाणें गुहिलोतांनीं सम्राट पदाची हांव कधीं धरिली नाहीं; किंवा कधीं आपल्या सरहद्दी वाढविण्याचा उपक्रमाहे केला नाहीं. आणि यामुळें भोजाने चिताडबरोबर लढाई केल्याचा उल्लेख सांपडत नाहीं. चदी, अनहिलवाड व कनौट यांच्याबरोबर त्याची सतत युद्धे होत व मधून मधून त्यांत खंडहि पडे; त्या युद्धांत त्याचा कधीं विजय तर कधीं पराजयहि होई आणि पराजय झाला असतां शत्रु नेहमीं धार जवळ जवळ किंवा कदाचित्‌ धारेंतहि घुसत. गुज- राथेंत त्याचा प्रतिस्पधी भीम होता व त्यानें १०२ १ते१०६३पर्यंत राज्य केळं. एकदां भीमाच्या गेरइजेरींत भोजाचा जैन सेनापति कुलचंद्र यानें गुजराथवर स्वारी करून गुजराथची राजधानी अन- हिलवाड (पट्टण ) ही काबीज केळी आणि तेथें इतकी मोठी ळूट केली कीं ‘ कुलचंद्री’ ळूट हे शब्द लोकांच्या तोंडी कायमचे राढ्ून गेळे आहेत. भामानोहि याचे उटद्टं काढण्याकरिता आपल्या धोडद-

घारचे परमार राजे-भोज. २४५

ळानें धारेवर अकस्मात्‌ छापा घातला आणि धार टुटून टाकली. परंतु भाम आणि भोज यांच्यांताळ वैर लवकरच शमले आणि त्यांचे एकमेकांच्या दरबारीं वकीलहि प्रेमानें राहिळे. अनाहिल- वाडचा वकील दामोदर हा विनोदी आणि हुशार मुत्सद्दी म्हणून प्रसिद्ध आहे.

. पूर्वेचें चदी आणि दक्षिणचें कर्नीट राज्य यांच्या बरोबरचे भोजाचें वैर जवळ जवळ पिढीजादच होते व त्यानें भोजाचें नुकसानहि फार अधिक झालें. कारण चेदीचे हैहय आणि कर्नाटचे चालुक्य यांच्यांत बहुधा सोयरिकीचा संबंध असे. चदीच्या युवराजाची बहीण ही कनोटच्या तैलपाची आई होती. मुंज आणि तैलप यांच्यांत सतत लढाई चाळत आली होती आणि सरते शेवटीं मुंज पक- डला गेला आणि तैलपाकडून मारलाहि गेला हें आपण पूर्वी पाहि- ठेंच आहे ( भाग २ ). युवराजामागून गांगेयदेव हा राज्यावर आला आणि त्यानें १०१० ते १०३८ पर्यंत राज्य केलें. त्याच्या नंतर कर्णदेव हा गादीवर आला. तो हैहय कुलांतील अत्यंत साम- थ्यंवान्‌ असा राजा होऊन गेला आणि त्यानें १०३८ पासून १०८० पर्यंत राज्य केलें. दक्षिणेंत कल्याण येथें जयसिंह (१०१८ते १०४०) व सोमेश्रर (१०४० ते १०६९ ) हे भोजाचे समकालीन राजे होत, जयसिंहानें एकदां धारेश्वर स्वारी | केली आणि भोजाचा पराभव केला असे दिसतें. या गोष्टीचा उछेख ‘ जयसिंहाच्या शिलालेखांत केळेला आहे% ( इं, अँ. भाग ५पा.१५ ). ‘ गांगेयाप्रमाणेंच जयसिंह्यासाहे भोंजानें १०४० सुमारास पराभूत केलें असावें. गांगेयाच्या पराभवावरून’च माळव्यांत प्रचलित अस-

% मि, लेले यांचे ग्रथांत मुद्रणदोषानें या प्रसगाच) सन छके ९०० दिला आहे. हा शक भोजाच्या कारकीदींशी विसंगत असल्यामुळं तो ९४१ म्हणजे इ, स, १०१९ असला पाहिजे.

२४९६ तिसरा हिंदु राज्यं

ठेली “ कहां राजा भोज ओर कहां गंगां तेली ‘ ही म्हण प्रचारांत आली असावी. (मि. ठेले यांनीं मार्मेकपणें सुचाविल्याप्रमाणें मुळांत या म्हणींचा संबेध तेलंगणाच्या गांगेयाशीं असावा. तेलंगण त्या वेळीं चदींच्या राजछत्नाखालीं होतें.)* हें कांहींहि असो, जयसिंहा- नंतर त्याच्या गादीवर आलेल्या सोमेश्वरानें माळव्यावर उलट स्वारी केळी आणि शूर भोजाचा पुरा पराभव केला. या प्रसंगाचा उल्लेख बिल्हणानें आपल्या विक्रमांकदेवचरित्रांत केळा आहे [ पा. १९१ ]. पुढें भोजानें सोमेश्वरावर स्वारी करून त्याचा पराभव केला असावा; आणि वर सांगितलेल्या उदेपूर प्रशास्तींतील उद्ले- खाचा संबंध या किंवा याच्या पूर्वीच्या पराभवाशीं असावा.

परंतु लक्षांत धरण्याजोगी गोष्ट अशी कीं, या लढायांमुळें माळवा किंवा त्याबरोबर लढत असलेलीं त्याचे भोवतालची इतर राज्यें यांची सत्ता किंचितहि कमी झाली नाहीं. कारण राज्याची मर्यादा वाढ- विण्याचे लोभानें हीं युद्धे करण्यांत आलेलीं नव्हती. आणि शिवाय माळवा, चेदी, कर्नीट व गुजराथ हां सर्वे राज्यें सारखीच सामर्थ्य- वान्‌ होतीं; आणि त्यांचे सर्वांचे राजेहि सारखेच कर्तृत्ववान होते. उलट या युद्धांनीं या राजांचे व त्यांच्या सैन्याचे क्षात्रयुण संवधित केले. परंतु भोज मृत्यु पावण्याच्या वेळीं ( उदेपूर प्रशास्तींतील शब्द अगदीं स्पष्ट आहेत व त्याप्रमाणें भोज मृत्यु पावल्यावर, त्याच्या मृत्यूच्या अगोदर नव्हे% ) गुजराथचा भाम व चेदीचा कणे या ‘ दोघांनीं एकवट्टन माळव्यावर केलेल्या स्वारीमुळे मालवराज्यांत | गोंधळ माजला, आणि त्याची सत्ता डळमळली. बिल्हणानें विक्र-

– कणाला त्याच्या एका शिलालेखांत त्रिकालिंगाचा ( तेळगणाचा ) राजा असे स्पष्ट म्हटलें आहे. (ए. इ. २) |

< तत्नादित्यप्रतापे गतवति सदनं स्वर्गिणां भर्गभक्ते । व्याप्ता धारेव घात्री रिपातिमिराभिरे मोलिलाकस्तदाभूत्‌ ॥

घारचे परमार राज-भाज. २४७.

मांकदेवरचरितांत (३, ६७ ) सांगितल्याप्रमाणें भोजाचा वारस’ जयसिंह हा कल्याणचा राजा आहवमहछ–सोमेश्वरर याचे दरबारीं आश्रयाकारितां गेला आणि कर्नाट व माळवा यांमधील पिर्ढाजाद वैर विसरून सोमेश्वरानें त्याला मदत केली आणि त्याचें धारचें वडि- लार्जित सिंहासन त्यास परत मिळवून दिलें. त्यांवळचे हिंदुस्थानां- तीळ राजे राज्यविस्तारासाठीं युद्धे करीत नसत हें यावरून स्पष्ट दिसून येते. आणि या प्रसंगावरून हेंहि आणखी स्पष्ट होतें कीं, त्याकाळीं निरनिराळ्या राज्यांतील जनतेला आपल्यावर पिढी- जाद राज्य करीत असलेल्या राजवंशांतीलच कोणा तरी राजानें राज्य करावें अशा इच्छा असे. भाग २ पान २२१मध्यें सांगि- तल्याप्रमाणें आरब प्रंथकारांनीं ही गोष्ट नमूद करून ठेविली आहे, कीं कोणत्याहि राजानें दुसऱ्या कोणत्याहि राजांचें राज्य हस्तगत केळें असतां तो पराभूत झालेल्या राजाच्या वंशांतील कोणातरी राजपुरुषास मोकळ्या झालेल्या सिंहासनावर बसवितो. परंतु सांप्रतच्या कालविभागांत ही राष्ट्रीयत्वाची अस्पष्ट भावनाहि हळुहळूं मावळत गेली. ८ प्रस्तुत प्रसंगीं जयसिंहयाला आपलें सिंहासन परत मिळविण्यास तिर्‍्हाईत राजाचें साहाय्य ध्यावे लागलें हे आपल्यास दिसत आहे ). याच्या कारणाचें विवेचन पुढें केलें जाईल.

__ भोज इ. स. १०५५ पूर्वीच मृत्यु पावला असावा, कारण त्याचा पुत्र जयासेंह यानें त्याच वर्षी धारेहून प्रसिद्ध केळेळें एक शासनपत्र उपलब्ध झालें असून (ए. इ ३, पा. ४६ ), त्यांत ‘जयसिंहाने आपण भोजाचा पुत्न असल्याचें स्पष्ट म्हटलें आहे. यामुळें व्हिन्सेंट स्मिथ यानें आपल्या अली हिस्टरी ऑफ इंडिया या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तींत ( १९१४ ) हि भोजाचा ग्रृत्युशक इ. स. १०६० हा कसा दिला आहे हें समजत नाहीं. स्मिथने हा शक कोणत्या आधारावर दिला आहे हें नमूद केलें |

२४८ तिसरी हिंदु राज्यं

नसल्याकारणानें या शकारचे अधिक विवेचन करितां येत नाहीं. इ.स. १०१९ (संवत १०७६)मध्यें किंवा त्याच्या पूर्वीच्या वर्षी भोजाने कोंकण जिंकले असें त्या सालच्या त्याच्या श]सनपत्रावरून स्पष्ट दिसतें (ए. इ.१ १).आपल्या राज्यारंभीं त्याने कोकणाशी युद्ध कां केलें हें सम- जत नाहीं ( त्यावेळीं त्याचें वय सुमारें बास वर्षांचे असावें ). भोजानें कोंकण जिंकले ही गोष्ट नाकबूल करतां येण्याजागी नसली तरी तो आपल्या राज्याबाहेर इतका लांब गेळा कसा हें गूढ अजून उकललेलें नाहीं. बहुधा या कोकणच्या स्वारीची उत्पात्ते कल्या- णच्या पांचव्या विक्रमादित्याच्या ( १००९–१०१८ ) लढाईतून झाली असावी. या लढाईंत क. ल्युआडे आणि मि. लेले यांनीं म्हटलें आहे कौं भोजानें विक्रमादित्याला कैद केळें आणि मारून टाकलें. पण विक्रमादित्याचा लढाईचा हा प्रसंग जर निःसंशय घडून आला असता तर भोजानें आपल्या लेखांत कोकणच्या स्वारीपेक्षां त्याचाच अधिक विस्तृत उल्लेख केला असता; कारण कर्नोटच्या राजापेक्षां कोकणचा राजा कमी महत्वाचा होता आणि खरोखरच ही लढाई झाली असेळ तर ती कोकणच्या स्वारीचे वेळीं झाली असली पाहिजे. हिंदुस्थानचा सामान्य इंतिह्यास वाचणाऱ्या वाच-. कांस या लढायांचें महत्व मुळींच नसल्यामुळें त्यांच्याबद्दळ अधिक | विचार करण्याची आवश्‍यकता नाहीं. भोजाच्या मृत्यूच्या थोडेसें पूवी किंवा नंतर कर्णदेव आणि भीम यांजबरोबर झालेलें त्याचें युद्ध मात्र अतिशय महत्वाचे आहे आणि. ल्याबद्दलच्या उछ्लेखांचे आम्ही काळजीपूर्वक पर्राक्षण करणार आहोंत. भीम आणि करण या दोघांनीं मिळून धारेवर स्वारी केली, धार &आधार करून दिसणारे तरंगिणी आणि विक्रमांकदेवचरित यांचा क.

ल्युआर्ड ब मि. लेले यांनीं आपल्या परमारांवरील पुस्तकांत योग्य उल्लेख केला असून त्यांतील कथांचें चांगलें विवेचन केलें आहे (पा. २२-२३)

घारचे परमार राजे-भोज. २४९.

हस्तगत केली व भोजाला पळवून लाविलें आणि त्यांतच पुढें भो- जाला मृत्यु आठा अशी जी हकीगत मेरुतुंगानें सांगितठी आहे त्यामळे या बाबतींत एक विपरीत ग्रह उद्धत झाला आहे अशी ‘आमची समजत आहे. या प्रबंधांतून सप्रसिद्ध अनेक राजांविषयीं ‘कल्पित अशा कित्येक कथा सांगितल्या जातात हें ठोकविश्रृत आहे आणि त्यामुळें या क्थांचें कसून परीक्षण करणें अवश्यक आहे. मेरूतुंगानें दिलेल्या या गोष्टीला उदेपूर प्रशस्तीमधीळ एका छोकाचा आधार आहे अशा किलहार्न यांची प्रथम समजूत होती. परंतु पुढें नागपूर प्रशस्तींतील तश्याच धर्तींचा एक शॉक देतांना ही गोष्ट संभवनीय नाहीं आणि तिच्या सत्यत्वाविरुद्ध पुष्कळ प्रमाणे देतां येण्याजोगी आहेत अशी सूचना त्यानें केली आहे. भोजासारख्या ‘सामर्थ्यंवानू व भाग्यवान्‌ राजावर अशी स्वारी केली जावी,तींत त्याचा ‘असा पराभव व्हावा आणि त्याचा अशा दर्दरोंत अंत व्हावा हें आम्हांस विश्वासाई वाटत नाहीं. उदेपूर प्रशस्तातीलळ नवव्या छो- ‘कावर कोल्हॉननें अशी टीका केली आहे कीं, “ शेवटीं भोज हा ‘आपल्या इात्रंच्या तडाक्यांत सांपडला हें या चरणांत कबूल केलें आहे. ” परंतु ह॑ म्हणणे चुकीचे आहे. कारण या चरणांत फक्त इतकेंच म्हठळें आहे कीं भोजानं इहलोक सोडल्या नंतर धारा ही ‘ अधःकारांत ट॒प्त झाली (आदिल्याप्रमाणें प्रतापवान्‌ आणि शिवभक्त अस्ता ‘ भोज राजा स्वर्गाला गेल्यानंतर). त्याचप्रमाणें नागपूर प्रशस्त प्रसिद्ध |

करितांना भोजाचा अंत अमंगळ असा झाला असं कीलहानने म्हटलें ‘ आहे; परंतु पुढें त्यांस मेरुतुंगाची हकीकत सर्वस्वी विश्वसनीय वाटली ‘ नाहीं, नागपूर प्रशास्तींतील शब्दरचनेवरूनाहे भोजाचा अंत शोचनीय झाला असं दिसत नाहीं. “ भोज हा इंद्राच्या बंधुते प्रत

तत्रादित्यप्रतापे गतवाति सदनं स्वार्गंणां भर्गभक्ते ।

२५० तिसखरीं हिंदु राज्ये

“पावला असतां ( मेळा असतां) व राज्य विपदूग्रस्त झाळें असतां ‘!– र्‍या वाक्यावरून भोज शांतपणे मरण पावला आणि त्यानंतरच आपत्तींचा प्रादुर्भाव झाला असें दिसून येतें. या कोणत्याहि लेखांत भोज मृत्यु पावण्याच्या वेळीं दुःखाचा काल प्राप्त झाला असे म्हटलेले ‘नाहीं. आणि यावरून हें स्पष्ट दिसून येतें कौं भोज मृत्यु पावल्या- नंतरच भोजाच्या शात्रूंस माळव्यावर स्वारी करण्यास ही संधि आहे असें वाटलें. भोजानंतर त्याच्या गादीवर आलेला ब्याचा पुत्र जय- सिंह्द याचा अंत मात्र अथुभ तर्‍हेनें झाला. त्याचा उल्लेख पुढें येई- ठच. भोजाचा अंत शोचनीय झाला असे भेरुतुंगानें जं म्हटलें आहे त्यास नागपूर किंवा उदेपूर. प्रहास्तीर्तात कांहीं आधार नाहीं. दुर्दै- वानें सर व्हिन्सेंट स्मिथ यांच्या तिसऱ्या आवृतींत ही गोष्ट तशीच ठेवण्यांत आळी आहे; आणि व्यामुळें ती येथें खोडून काढणें अवश्य झालें आहे. मेरुतुंगानें दिळेली ही हकीकत कशी बनावट आहे हें दाखविण्यास आणखीहि प्रमाणे आहेत. भोजासारख्या सुप्रसिद्ध राजावर केलेल्या या काल्पनिक यरास्वी स्वारीचा उल्लेख चदी हैह- यांच्या कोणत्याहि लेखांत नाहीं. इतकेंच नव्हे तर भीमाच्या या विक्रमाचा उल्लेख गुजराथ चाल्क्यांच्या .ठेखांतहि कोठें आढळत नाहीं. वास्ताविक त्यांच्या कित्येक लेखांत र्भामाच्या नांबामागें कोण- तेंहि विशेषण लावलेले नाहीं; परंतु जयसिंह सिद्धराजाचे वर्णन सर्वदा अवंतिनाथाचा जेता या शाब्दानीं केलेलें आहे. जर खरो- खरच भीमाने भोजाचा पराभव केला असता तर अवंतिराजा- पैकीं एखाद्या लहानशा राजावर जयसिंह्यानें मिळविलेल्या विजयापेक्षां र्भामाच्या यशस्वी कारकोदींस अत्यंत उज्वळता आणणारा हा परा- क्रम खास अधिक महत्वाचा मानला गेला असता. दुसर, नागपूर प्रशास्तींत भोजाच्या मृत्यूनंतर धारेवर ञ्या स्वाऱ्या झाल्या म्हणून

– तस्मिन्वासवबन्धुतामुपगते राज्ये च कुल्याकुल॥

धारचे परमार राजे-भोज. २५१

म्हटलें आहे त्यांत भीमाचा उछ्लेखहि नाहीं. त्यांत चेदी कर्ण आणि कर्नाटचा राजा यांचा उछेख आहवे. ते दोघे एकत्र झाळे असावेत किंवा माळव्या वरील प्रभुत्वाबद्दळ दोघांत चढाओढ सुरू झाली असावी, या मुद्याचे विवेचन आम्ही पुढें करू. परंतु नागप्रप्रशा-

. स्तींत भामाचा उछ्ेख नसल्यामुळें गुजराथच्या राजांच्या पराक्रमाची

कल्पित वर्णनें देऊन बहुधा त्यांना खूष करण्यासाठीं ग्रेथ लिहि

’ णाऱ्या मेरुतुंगावरील विश्वास उडावयास ही एकच गोष्ट पुरेशी ‘ आहे. सारांश आमची अशी खात्री आहे कीं भोजाचा अत शांत-

पणें झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर शत्रनीं धारेवर स्वारी केली याच प्रसंगाशीं जोडला गेळेला दुसरा असा एक गैरसमज आहे कीं भोज पराभूत होऊन मृत्यु पावल्यानंतर जी अराजकता माजली ती

नाहींशी करण्याला गाहडवाल राजा चंद्रदेव यानें मदत केली; नव्हे

त्यानेंच ती मोडून काढली. या गैरसमजाचा उगम गाहडवाळ राजा चेद्रदेव याचा दोन शासनपत्रांतील त्याच्या स्तुतिपर असलेल्या चर- णांचा अर्थ लावण्यांत आहे. मदनपालाच्या शासनपत्नांत ( इ. अ. १४ पा. १०३ ) भोजाचा स्पष्ट उल्लेख आहे. परंतु भोजाचा मृत्यु किंवा त्या मृत्यूनंतर माजलेली अस्वस्थता यांच्यांशीं गाहडवाल राजा

चंद्र याचा कांहीं संबंध होता अश्या अथी ते चरण लावितां येणार

नाहींत. त्याचप्रमाणें दुसऱ्या लेखांतूनहि हा अर्थ काढतां येणार नाहीं (इं. अँ. १८ पा. ११. ल्या चरणांचा वाजवी अर्थ काय होतो हें आम्ही पुढें लवकरच दाखविणार आहोंत ). तसेंच चंद्र- देवाच्या उत्केषाचा काल हा भोजाच्या मृत्युकालाशीं (स. १०५५ सुमार ) जुळत नाहीं. त्याचा उत्कर्ष पुढें पुष्कळ वर्षानी इ. १०८० च्या सुमारास झाला. शिवाय चंद्राच्या मदतीची आवश्‍यकताच नव्हती. कारण चेर्दाच्या कणदेवानें स्वारी करून अस्वस्थता माज- विली असली तरी ल्युआर्ड व लेळे यांनीं आपल्या पुस्तकांचें पान

२५२ तिसरी हिंदु राज्ये

१५ वर म्हटल्याप्रमाणे कनाटकाचा राजा सोमेश्वर यानें परमार राजाचें मित्रत्व केळे. (पा २७ वर भोजाचे मागून जयसिंह यास कणे व भीम यांनांच सिंहासनावर बसविलें असा अगदीं विरुद्ध उल्लेख यांत आहे ). प्रबंधकारांनीं पुष्कळ काल्पनिक गोष्टी घुसडल्या आहेत; परंतु त्यांनीं देखील गाहडवाळ ( किंवा राठोड ) राजा चंद्र- देव याचा कोठें उल्लेख केलेला नाही. आणि आपल्याला असें म्हणावयास कांहींच हरकत नाहीं कीं, हा सर्व गैरसमज वर सांगितलेल्या दोन चरणांचा च॒कींचा अर्थ लाविल्यामुळे उत्पन्न झालेला आहे

हिंदुस्थानच्या वृत्तांतांत ज्यांनीं चिरस्थायी कॉार्ति संपादन केली आहे अशा विख्यात राजांत भोजाची गणना प्रामुख्यानें केली पाहिजे. तो आपल्या मालव देशाचा स्वतंत्र राजा होता इतकेंच नव्हे तर त्याची सत्ता सर्व हिंदुस्थानभर मान्य केली जात होती. या गोष्टींचे रहस्य अद्याप पुरतेपणी ओळाखिळें गेळें नाहीं. “ तो हिमाल्यापासून रामाच्या सेतूपर्यंत राज्य करीत होता ‘ असे उदेपूर प्रशस्तींत जें म्हटलें आहे, तें शब्दशाःच पाहूं गेळें तर मिथ्या आहे यांत संशय नाहीं. परंतु पुरातन कालीं सावेभोमत्वाच्या कल्पनंत इतर राज्यांत प्रत्यक्ष अमळ बसविण्याच्या पद्धतीचा अंतभीव होत नसे. सावेभो- मत्व हें फक्त इतर राजांनीं एखाद्या राजाची सत्ता कबूळ केली होती इतकेंच दर्शवीत असे. अशा तऱ्हेची स्तुति त्याच मात्र राजघरा- ण्यांतील शिलालेखांत केली असल्यास ती आश्रित भाटांनीं केलेल्या अतिशयोक्ती-पलीकडे मानली जाणार नाहीं. परंतु अशा तऱ्हेची स्तुति जेव्हां इतर राजघराण्यांतींल लेखांतून केलेली आढळते तेव्हां ती सत्यावर उभारलेली आहे हें कबूल केळें पाहिजे. या रीतीनें सावे- भौम गाहडवालांच्या ठेखांवरून या स्तुतीचं दर्ढाकरण झालेलें आप- ल्याला आढळून येतें. मदनपाळ आणि गोर्वदचंद्र यांच्या शासन

घारचे परमार राज-भोज. २१३

पत्नांतीळ ज्या दोन छोकांचा अर्थ चुर्कानें लावला जातो असें वर
सांगितलें आहे त्याच चरणांत भोजाला हिंदुस्थानचा सावभौम राजा
असें मानण्यांत येत असे याचा पुरावा सांपडतो. दुसऱ्या शासन-
पत्रांतीळ छोकांत (इं. अँ. १४ पा. १०३) असे म्हटठें आहे कॉ
जेव्हां श्रीभोज भूप हा देववधूंच्या नेत्रांचा पाहुणचार मिळविता झाला व जेव्हां श्रीकण हा कर्तशोष झाला आणि भामि त्रस्त झाली तेव्हां भमीनें राजा चेद्रदेवाला प्रेमानं आपला पति म्हणून वरिलें व त्राताम्हणन त्याच्या वर तिने विश्वास टाकला. ‘ यावरून असं स्पष्ट दिसून येतं कीं पृथ्वीवर ( हिंदुस्थानच्या भूमीवर ) चंद्रदेवापूर्वी होऊन गेलेले सम्राट्‌ पदाची सत्ता धारण करणारे विख्यात दोन राजे भोज व कण हे होते. ह्या भोज, प्रतिहार सावभौम घराण्यांतील भोंज नव्हे. कारण ‘तो भोज (८४०-८९० ) कधींच मत झाला होता (भाग २ पा, १३३ पहा ). हा भोज १०५’५ इ. स. मध्ये मृत्यु पावठेला ‘माळ्याचा भोजच असला पाहिजे. या छोकांत ज्या कणीचा उल्लेख आला आहे तो १०६३ ते १०९३ पर्यंत राज्य करणारा अनहिलवाडच्या चालुक्यांपैकीं कर्णदेव असावा किंवा चदींचा राजा ‘गांयेयदेव याचा पुत्र कर्ण हा असावा. कणाच्या मृत्यूनतर सावे- भोमत्व चंद्रदेवाकडे आलें असें म्हटलें असल्यामुळें तो चालुक्य कर्णदेव नसावा असा संशय उत्पन्न होतो. गुजराथचा कर्ण ११ व्या शत- ‘काच्या दहाव्या दशकांत मत झाला असावा असें दिसतें. आणि ‘त्याचा उत्तराधकारी जो जयसिंह सिद्धराज त्याच्याप्रमाणें, कणीचे
  • “जमाती

याते श्रीभोजभूपे विबुघधवरबधूनेत्रसीमातिथित्व । श्रीकर्णे कीतिशेषं गतवति च नुपे क्ष्मात्यये जायमाने | भतारं यं घरित्री त्रिदिवविर्थानभ प्रीतियोगादुपेता । त्राता विश्वासयूवे समभवदिह स क्ष्मापातेश्वंद्रदेवः ॥

म, भा…१७

२५४ तिसरी हिंदु राज्यं

स्तुतीनें भरळेळें वर्णन केळेळें आढळत नाहीं. चेदीचा कण हा जरी
आपल्या कुलांतील अत्यंत सामथ्यवानु राजा होता व भोजाच्या मृत्यूनंतर
त्यानें माळवा काबीज केला असला तरी ब्यान पुष्कळ वर्षे राज्य
उपभोगिळं आणि चंद्रदेव हा सन १०८०च्या सुमारास उत्कर्षास
चढू लागला त्या वेळीं तो हृयातहि होता. त्या छोकांत असं म्हटलें
आहे कीं कर्ण मेल्यानंतर चेद्रदेवाला सावभौमत्वाचा मान मिळाला,
तेव्हां हा चेद्रदेवाच्या उदयाचे वेळीं मृत झालेला सम्राट कर्ण को-
णता हे निश्चित करणें जरा कठिण आहे. हा कर्ण कोणता या
प्रश्नाचे समाधानकारक उत्तर कसेंहि दिळें तरी येवढे मात्र खास कीं
था झोकाचा संबंध माळव्याशीं नाहीं; कारण माळव्यानं चंद्रदेवाला
आपला राजा म्हणून कधींच मान्य केलें नाहीं. भोज, कर्ण आणि
चेद्र हे तिन्ही राजे माळवा, चंदी आणि कनोज या निरनिराळ्या
राज्यांत राज्य करीत होते, छोकांत जो उलेख आहे तो फक्त आखिल
हिंदुस्थानांतील सावभोमत्वाचा असून तो अगदीं स्पष्ट आहे.
क्षमात्यये ! या शब्दाने सूचित केळेला उपद्रव आणि गाहडवालांच्या पहिल्या लेखांतील छोकांत स्थूलतः वर्णिळेला उपद्रव ह्यांत कोण- तेंच अतर नाहीं (ए. इ १८ पा. ११). त्या छोकाचं भाषांतर असे होईल.* “’ राजा चंद्रदेवार्न उद्धट आणि धीर अशा योध रूपी तिमिराचा नाश केला आणि आपल्या विक्रमाने सवे प्रजांचा

उपद्रव शमवून टाकिला. ” क्रूर तुर्कींच्या स्वाऱ्यांनीं सर्व हिंदु प्रजांनां दिलेल्या उपद्रवाचा यांत स्पष्ट उछेख आहे. वस्तुतः भोजानें-

हि हा उपद्रव कमी करण्याचें कामांत आपलें सामर्थ्य उपयोगांत

  • तस्यासीत्तनयो नयेकरसेकः क्रान्तद्विषन्मडलो । विध्वस्तोद्धतर्धारयांधातामेरः श्रीचंद्रद्वेवो नृप: येनोदारतरप्रतापशामेताशोषप्रजोपद्रवं । श्रामद्वीधधपुराधिराज्यमसम दोविक्रमणार्जितम्‌ ॥

थारचे परमार राजे-भोज. २५५

आणलें होतें; आणि म्हणूनच अश्या संकठाचें निरसन करणारा ‘पहिला सावभौम राजा म्हणून त्याची कीर्ति राहिली होती. भोजाची कारकीर्द १०५५ त संपली. त्याच्या नंतर ह्या अधिकार चेदींच्या कणीकडे गेला. परकीयांचा जञळूम नाहींसा करण्याचें हें काम कणाोनंतर चंद्रदेवावर पडलें. आम्ही कनोजच्या वत्तान्तांत हे पुढें दाखविणार आहों कीं चंद्रदेवानं याच हेतूनें कनोजच्या सार्वभौमाच्या सिंहयासनावरून तेथीळ दुबल प्रतिहार राजास काढळें आणि तेथें आपल्या घराण्याची स्थापना केली. या दृष्टीनें पाहिळें असतां उदे पूर प्रशास्तींत भोजाची हिंदुस्थानचा सार्वभौम म्हणून जी स्तुति केली आहे ती अतिशयोक्त,ची दिसत नाहीं, शिवाय गाहडवालांच्या या ळेखाचाहि तिला प्रत्यंतर पुरावा आहे. हीच दृष्टि कायम ठेविली तर उदेपूर प्रशस्तींतील दुसर्‍या होकाच्या अर्थावराहे एक नर्वानच उजेड पडतो, ल्या £होकांत “ भोजानें गुजरांच्या राजाला जिंकले ‘ असा उछेख आहे. हा राजा हछीं आपण ज्याला गुजराथ समजतो त्या गुजराथ प्रान्ताचा राजा र्भाम नसून त्या काळच्या इतर राजांच्या लेखांत ज्यांचा गुजेर राजे म्हणून निर्देश केला जातो (भा. २ पा. ९८, १६३ ), त्यापैकीं म्हणजे कनोजच्या प्रतिहार राजांपैकीं कोणीतरी असला पाहिजे. वास्तावेक पाहतां सांप्रतच्या गुजराथला गुजराथ हें नांव इ. स. च्या ११ व्या शतकाच्या शेवटीं मिळाळें हें आम्ही पुढें स्पष्ट करून दाखाविणार आहों. या छोकां- तीळ गुजर या शाब्दानें बहुशा दुर्बळ होऊन तुकांचे मांडलिक आणि मित्र बनलेल्या कनोजच्या प्रतिहार राजांचा निर्देश होत असावा, तेव्हां भोजानें पूर्वेस नुसत्या गांगेयदेवाचाच पराभव केला असें नव्हे तर राज्यपाळानंतर कनोजच्या गादीवर आलेल्या दुर्बळ प्रति- हार राजांचा आणि त्याच्या मदतीस आलेल्या तुकांचाहि पराभव केला असावा असा संभव आहे. अशा प्रकारें त्यानं परकीय व

२५९६ तिसरी हिंडु राज्ये

विधर्मी तुकांच्या संकटांतून उत्तर हिंदुस्थानची सवे भमि मोकळी केळी. या झछोकांत असें म्हटलें आहे कीं भोजानें पाठविलेल्या केवळ सैन्यानें किंवा सेनापतीनें त्या राजांचा पराभव केला. भोजानें आपलें सैन्य उत्तरेस पंजाब आणि दिल्लीपर्यंत पाठाविळें असावे हें अत्यंत संभवनीय आहे. सर व्हिन्सेंट स्मिथनें ज्या समुद्रगुप्ताशी भोजाची तुलना केली आहे त्या समुद्रगुप्ताप्रमाणे जरी भोजानं सव पृथ्वीचा दिग्विजय करण्याचा उपक्रम केला नाहीं, तरी सर्व देशभर त्याची सत्ता प्रस्थापित झाली होती किंवा मान्य झाली होती. आणि यामुळें उदेपूरप्रशस्तात वर्णिल्याप्रमाणे हिंदुस्थानच्या चारी दिशांस सोमनाथ, रामेश्वर, सुंडीर ( पूव किनाऱ्यावर ) आणि केदार सारख्या दूरदूरच्या ठिकाणीं त्याला शिवाची देवाल्यें बांधतां आलीं. त्याने आपल्या स्वतःच्या राज्यांत महाकालाचे देवालय बांधलें याचा निर्देश करणें नको व त्यांत महत्त्व नाहीं. परंतु ज्या शिवाचा तो धर्मनिष्ट भक्त होती त्याचीं देवाल्यें इतक्या दूर दुसऱ्यांच्या राज्यांत त्याठ बांधतां आलीं यावरून त्याचें सावेभौमत्त्व, वैभव आणि कर्तेत् यांचा पुरावा मिळतो. या ठिकाणीं हिंदुस्थानांतील सर्वे तौर्थक्षत्रांत अशाच तऱ्हेने देवालये आणि घाट बांधणाऱ्या, अलिकडील काळां तील पुण्यश्लोक माळ्व्यांतीलच राणी देवी अहिल्याबाई, हिच्यांहि सत्तेची, वैभवाची व कर्तृत्वाची आठवण झाल्याखेरीज रह्ात नाहीं मल्हाररावानें इतर राज्यांतून ळुट््न आणलेल्या अगाणित संपत्तीर्च जी ठेव अहिल्याबाईला लाधली तींतून तिनें निरनिराळ्या क्षेत्रांतीर पुण्यस्थानें बांधलीं. भोजानेहि बहुधा तसेंच केळें असावें. अनहिल वाडच्या व इतर राज्यांत त्याच्या सेनापतीनीं जी ळूट केली ती खर चून त्यानें सर्व हिंदुस्थानभर हा धमीदाय केला असावा. आपल्य समकार्लांन महमदाप्रमाणें भोजानें केवळ हांव म्हणन किंवा विष योपभोगाच्या आसक्तीनें टूट करून द्रव्य सांचविळें नाहीं. सः

घारचे परमार राजे-भोज. २५७

हिंदुस्थानभर ज्यानें आपली कोर्ति दुमदुमत राहील अशीं पुण्यप्रद देवाल्यें बांधण्यांत त्यानें ते वेंचून टाकलें. दूरच्या कार्शमरांत देखील, जथें त्याची सत्ता कोणी कबूल केली नव्हती तेथें, त्यानें आपल्या खर्चाने एक पुण्यकुण्ड बांधळें आणि त्या देशांत आपलें नांव करून ठेवळें.’ भोजाच्या थोर कीतीस आणि विमल्यशास मान देऊनच काऱमीरच्या तत्कालीन राजान बहुधा हा तलाव बांधू दिला असावा. पण महमुदाप्रमाणं भोजानें अनेक देश टढुटल्याचा उल्लेख इति- हासांत मुळींच सांपडत नाहीं; तेव्हां अशी कल्पना करावयास हर- कत नाहीं कीं भोजाची संपात्ते त्याच्याच देशांत उत्पन्न झालेली असावी. त्याच्या कारकीदीत माळवा अत्यंत भरभराटींत असावा असें दिसतें. त्याचा राज्यकारभार इतका उत्तम होता कीं त्याच्या राज्याचें उत्पन्न फार मोठें असूनाहि प्रजेवर कराचा बोजा फारसा पडत नसे. त्याची ही विपुल संपात्ति त्याच्या देशाची भरभराट व त्याच्या राज्यकारभाराची सुव्यवस्था आणि सुखप्रदता यांची साक्ष पटविते.

भोज हा जसा प्रसिद्ध ग्रंथकार होता तसाच तो विद्दज्जनांचे विख्यात आश्रयस्थान होता. भोज हा विद्वान्‌ लोकांचे बाबतींत अतिशय उदार असे. कदाचित्‌ त्यानें कवींना दिलेल्या उदार देणग्यांच्या कथा अतिरशायोक्तीच्या असतीळ. कोणत्याहि कवीनें एकहि जरी नवीन आणि सुंदर छोक आणला तरी त्यास भोज एक लाख रुपये देत असे

  • कल्हणानें राजतरंगिणीमध्यें याबद्दल एक सरस गोष्ट सांगितली आहे. तो म्हणतो माळव्याच्या भोजानें असा नेम केला होता कीं कारमी- रांतील पापसूदन तीर्थाच्या पाण्याने दररोज प्रातः काळीं मुखप्रक्षालन करावयाचें. पद्मराज नांवाचा कारमीरच्या राजाच्या मर्जींतला एक सर- दार या ती्थोचे पाणी कांचेच्या भांड्यांत भरून भोजाकडे नेहमीं पाठ- बीत असे व अशा तऱ्हेने त्याने भोजाचा हा नेम पार पाडला,

२५८ तिसरी हिंदु राज्ये

असें त्यांत सांगितळें आहे. तथापि त्याचा समकालीन जो महमद त्याच्यांत ब भोजांत या बाबतींत मोठें अतर आहे. महमदाची वाग- णक याच्या अगदीं विरुद्ध होती, या गोष्टी जरी कथालेखकांच्या अतिशयोक्तीनें भरलेल्या आहेत असं म्हटलें तरी विद्रज्जनांना त्यानें दाखावलेल्या अनुपम उदारतेबद्दळ संशय नाहीं, त्याचे राजवेभव किंवा त्यानें बांधाविळेलीं विशाळ मंदिरे आज अस्तित्वांत नाहींत; किंबहुना त्यांची स्मातिहि आज शिल्लक उरलेली नाहीं, परंतु त्याच्या ह्या उदारतेनें मात्र त्याची कौोर्त अजरामर केली आहे. त्याच्या दरबारांत कोणी जुना अथवा नवा कालिदास हाता असा आमचा विश्वास नाहीं. ही केवळ कथाळेखकांची कल्पना असावी; किंवा नवसाहसांकचरिताचा कर्ता आणि भोजाच्या बापाचा राज- कवि पद्मगुप्त यालाच कालिदास ही पदवी देण्यात आली असावी. धनपाल नांवाच्या दुसऱ्या कबीचाहि भोजाबरोबर उल्लेख केला जातो. वडनगरचा विद्वान्‌ ऊबट यानें आपली बाजसनेयि संहितेवरील टाका भोजाचे कारकारदीतच उज्जयनींत लिहली (ल्युआर्ड व ठेले पा.२१). भोजाचे दरबारांत दुसरेहि पुष्कळ विद्वान लोक असले पाहिजेत, परंतु त्यांचीं नांवें अजून माहित झालेलीं नाहींत.

सारांश भोजाची कितीहि स्तुति केली तरी थोडीच आहे. त्याची हिंदुस्थानांतील अत्यंत विख्यात राजांत गणना करावयास हरकत नाहीं. इतर देशांतील रिलालेखांनींहि त्याला कविराज आणि मालव-

चक्रवती असे म्हटलें आहे तं यथायोग्य आहे.’ तो माळव्याचा

सावभौम राजा होता. ( चक्रवती या विशेषणाचा अर्थ आम्ही पुढें विशद करणार आहों ). त्याचा माहिमा वर्णन करावयाचा अत्यन्त

  • क्षिप्रे मालवचक्रवर्तिनगरी घारेति को विस्मयः ।॥ (ए. इ. १ पा. २९७ गुजराथच्या चाटुक्याची वडनगर प्रशस्ती.)

थधारचे परमार राजे-भोज. २५९

सुंदर व संक्षिप्त मार्ग म्हटला म्हणजे उदेपूर प्रशस्तींत केलेल्या त्याच्या वर्णनाचा अनुवाद करणें हाच होय. ‘अञ्याम्रमाणें अन्य कोणाहि राजास करतां आलें नाहीं असें भोजानें राज्य केले, आज्ञा केल्या, दाने दिलीं आणि शास्र जाणली ‘.* या एका लहानशा वाक्यांत त्यानें सर्व हिंदुस्थानभर केलेल्या भव्य बांधकामाचा, त्याच्या सार्वभौम सत्तेचा, कावि आणि विद्वान लोक यांना दिलेल्या उदार देणग्यांचा आणि त्याच्या विज्याळ ज्ञानाचा आणि विविध विष- यांच्या अध्ययनाचा उल्लेख सरस रीतीनें केला आहे.

शासितं विहितं ज्ञातं दत्तं तद्यन्न केनस्वित्‌ । राजस्य श्रीभोजस्य प्रशस्यते || (ए. इ. १ पा, २२)

हा -स जी ऱ्

“७७ प्रकरण चाथे. भोजानंतरचे परमार राजे.

भोज हा केवळ माळव्यांतीळ परमार राजांतच नव्हे तर हिंदु- स्थानांतील सर्व हिंदुराजांतहि निःसंशय अत्यंत श्रेष्ठ असा राजा असल्यामुळें त्याचा वृत्तांत इतका सविस्तर देण्यांत आढळा आहे. माळव्याचें परमार राजघराणें भोजाच्या अमदानींत वैभवाच्या शिख- राला पोंचल्यामुळें स्वाभाविकपणेंच ल्याला भोजानंतर उतरतीकळा लागली. त्याचा मुलमा जयसिंह याची कारकीर्द आपत्तींत गेली आणि बहुधा ती कारकीद अल्प काळच टिकली असावी. चेदींचा राजा कर्ण यानें भोजाच्या ग्रृत्यूनंतर थोड्या अवधींतच जयसिंहाळा हांकून लावल्यानंतर तो आहवमछू सोमेश्वराकडे आश्रयासाठां गेला आणि सोमेश्वराच्या आज्ञेवरून त्याचा पुत्र विक्रमादिल्य यानें जयसिंहाला त्याच्या घराण्यांत पूवीपार चाळत आलेल्या माळव्याच्या सिंहासना- वर बसविलें असावें, असे राज्यावर आल्यावर जयसिंहानें १०५६ सालीं धारेहून काढलेल्या शासनपत्रावरून दिसतें. त्यानें अमरेश्वरच्या ब्राह्म- णांना पूरणक पट्टकांतीळ ( पुर्णासा ) नर्मदेच्या तीरावरील मान्धाता हा गांव दान केला. त्याची कारकीदे अल्प काळांतच संपल्यामुळे, त्याला दुसऱ्यांच्या मदतीनें आपले राज्य परत मिळवावे लागल्यामुळें आणि कदाचित्‌ पुनःहि हांकून लावळें असल्यामुळे उदेपूर आणि नागपूर येथील परमारांच्या ज्या दोन महत्त्वाच्या प्रशास्ति आहेत

त्यांत त्याच्या नांवाचा उल्लेख नाहीं. जयसिंहाच्या कारकीदीत माज-

लेल्या गोंधळांतून एका उदयादिल्यानें आपल्या पराक्रमानें माळ-

भोजानतरचे परमार राजे. २६१

व्याची सुटका केलीं.’ हा उदयादिल्य भोजाचा आप्त होता एव- ढाच उल्लेख आहे. त्याचें व भोजाचें नातें कोणत्या प्रकारचे होतें याचा उल्लेख केलेला नाहीं व त्याचा अजून शोध लाग- छेळा नाहीं. उदयादिल्य राज्यावर आल्यापासून माळ- व्याच्या राज्याच्या दुसऱ्या वैभवकालाला सुरुवात झाली; परंतु तो मुंज आणि भोजाच्या कालाइतका दैदीप्यमान झाला नाहीं. हा वैभ- बाचा काळ मुसलमानांचा अमल वसेतो सुमारें दोनशे वर्षे टिकला. उदयादित्य हा सामर्थ्यवान्‌ होता आणि त्याच्यांत त्याच्या पूर्वजांची विद्याभिरुचिह्िि होती. भोंजाप्रमाणेंच त्यानेंहि पुष्कळ बांधकामे केलीं, त्यानें आपल्या नांवानें बसविलेल्या उदेपूर शहरी शिवाचे भव्य देवालय बांधलें आहे तें ब्याच्या वैभवाची आणि कोशल्याची साक्ष अद्याप पटवीत आहे. नागपूर व उदेपूर प्ररास्तींतील उदयादि- त्याबद्दळचा उछेखांवरून त्याने आपल्या स्वतःच्या सामथ्यानें माळ- व्याचे राज्य परत मिळविले; कोणा परक्या राजाचें सहाय्य घेतलें नाहीं असं स्पष्ट दिसतें. नागपूर प्रशास्तींत तर कर्णाट राजाचा उल्लेख माळव्याच्या रात्रंचा साहाय्यक म्हणून केला आहे; मित्र म्हणून नाहीं

तस्मिन्वासवबन्धुतामुपगते राज्ये च कुल्याकुले ।

मझस्वामाने तस्य बंधुरुदयादित्यो5भवद्भूपातिः ।॥।

येनोध्दत्य महाणवोषममिलत्कण1टकर्ण प्रभू-!

त्युबींपालकदार्थतां भुवमिमां श्रीमद्वराहायितम्‌ ॥

*- बिल्हणाच्या काव्यात एका “छोकावरून क. ल्युवाडे व लेले यांनीं असे विधान केलें आहे की, भ्रार परत मिळविण्याच्या कामीं कल्याणचा चालुक्यराजा ६ वा यिक्रमादित्य यानें उदयादित्य राजास मदत केली आमच्या मते हे त्यांचे विधान चुकीचें आहे. मोज ही आहे कीं, त्यांनी याच गोष्टांचा उल्लेख पुनः एकदां १५ व्या पानांताहे केला आहे.

२६२ तिसरा हिंदु राज्ये

येथें कील्हॉर्ननें प्रभुमुवीं असा पाठ दिला आहे पण आम्ही त्या रेवजीं प्रभृत्युवी असा घातला आहे. प्र पुढील नष्ट झालेलें अक्षर भु असं वाचळें असतां त्या राब्दाठा अ्थीहि येत नाहीं व तो अशु- द्वाहि होतो ). या झछोकाचें भाषांतर असें होईल कीं, “जेव्हां तो ( भोज ) इंद्राच्या बन्धुतेप्रत गेला ( मेळा ) व राज्यांत त्रास उत्पन्न झाला, आणि राज्याचा स्वामी निमग्न झाला, तेव्हां भोजाचा भाऊ- बंद उदयादित्य राजा झाला आणि त्यानें कर्ण-कर्णीट प्रभाति राजांनीं संयुक्त झालेल्या समुद्रांप्रमाणें त्रस्त केलल्या भूमीला वराहाप्रमाणें उचळून धरली. ‘” येथें आपल्याला स्पष्ट दिसून येतें कीं कर्णाट रा- जाचा उल्लेख शत्र म्हणून केला आहे. पाहेल्यापासून या प्रसंगाचा यथायोग्य बोधच झालेला नाहीं. किल्हॉर्नने अशी कल्पना प्रचलित केली कीं भोजाचे स्वतःचेच शेवटचे दिवस त्रासांत गेले. या रछोकांत भोज मेला असतां असे शब्द वापरले आहेत ल्यावरून व नागपूर प्रशस्तीतील शब्दप्रयोगावरून त्रास उत्पत्न झाला तो भोज मेल्यानंतर हे उघड आहे. गांगेयाच्या भोजाने केलेल्या पराभवानें चेरदांचे मलीन झाळेळें यश उज्वळ करावयास ही साधि बरी आहे असं मनांत आणून गांगेयाचा पुत्र कर्ण यानें भोज मेल्यानंतर स्वारी केली असावी व तिच्यामुळे हा त्रास उत्पन्न झाला असावा. भोजाचा मुलगा जयासंह हा दुबळ असल्यामुळें पळून गेला आणि कल्याणला जाऊन सोमेश्वराच्या आश्रयास राहिला. सोमेश्वरानं आपलें पिढीजाद वैर विसरून आणि कदाचित्‌ चेदींच्या वाढत्या सामर्थ्याला आळा बसावा म्हणन ल्याला मदत केली; आणि माळ- व्याच्या सिंहासनावर व्यास बसाविळें. विक्रमांकदेवचरित सर्ग ३ मधील छोकाचा संबंध भोजपुत्र जयसिंह यास सोमेश्वरानें सिंहास- नावर बसविण्याशीं असला पाहिजे. दुदैवाने त्या छोकांत मालव राजाचें नांव दिलेलें नाहीं ( स माठवेन्दुं रारणं प्रविष्टमकटके स्था-

भोजानंतरचे परमार राजे. २६३

पर्याते स्म राज्ये-विक्रम ३). परंतु हा राजा भोज किंवा उदयादिल्यहि असूं शकणार नाहीं. कर्णानें पुनः स्वारी करून दुबेळ जयसिं- हास पुनः पळवून लावळें असावें. यानंतर त्या हतभागी राजाब- ददल कांहींच ऐकूं येत नाहीं ( नागपूर ठेखांतील “मभ्ने स्वामिनि * या शब्दांनीं हीच गोष्ट सुचविली जाते ). दक्षिण आणि उत्तर कडील सै- न्यांनीं माळव्यांत समुद्रांप्रमाणं एकवट्टून राज्य बुडवून टाकळे आणे त्या संकटांतून आपल्या स्मतःच्या शोर्यानें देशाचे उदयादित्याने रक्षण केलें. (ए. इ. ९ पा, १०८ पहा:-महाकलहकल्पान्ते यस्योद्दाम भिरारागै: । काति नोन्मूलितास्तुडा भभ्तःकटकोल्बणा: ।॥). मेरुतु गानें हा घोटाळा सरू केला; परंतु तत्कालीन शिलाठेख आणि बिल्हणाचें विक्रमांकचारित योग्य रीतीने लावळें असतां त्याचें म्ह- णणें असत्य व काल्पानिक आहे हें पूर्णपणें सिद्ध होतें.

उदेपूरच्या देवालया इतके उत्तुंग शिखर सर्व हिंदुस्थानांत कोठेंहि नाहीं आणि मध्यें चुना किंवा दुसरें कांहींहि न घालतां त्याच्या शिळा एकमेकीवर अढळ बसविलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या घडणीच्या कोडल्यामुळेंच त्या एकमेकींत घट्ट बसलेल्या आहेत. या देवालयांत परमार राजाचे कित्येक शिलालेख आहेत; हें देवालय म्हणजे परमारांच्या कुलक्रमागत कौर्तीचें संग्र- हालयच आहें. या शिलाळेखांतील सर्वांत जुने दोन शिलालेख उदयादित्याचे स्वतःचे आहेत. त्यांवरून या देवालयाच्या बांधका- मास सन १०५९ मध्यें सुरुवात झाली म तें १०८० मध्यें संपळें असे दिसतें ( ल्युआर्ड व लेळे पा. २९). या राजाची कारकीर्द दीर्घकालीन झाली. त्यानं १०५६ तें १९८१ इ. स. पर्यंत राज्य केलें. त्याच्यानंतर त्याचा मुलगा लक्ष्मणंदेव हा गादी- वर आला. तो झूर योद्धा व प्रसिद्ध विद्वान्‌ होता, नागपूर प्ररस्तांत त्याच्या स्तुतीचे पुष्कळ छोक असून त्याचा सर्वात अधिक गोरव

२६४ तिसरा हिंडु राज्ये

केलळला आहे. ल्यांत त्याच्या दिग्विजयाचेंहि वर्णन केलें आहे. या दिग्विजयास त्यानें गोड राज्यापासून सुरुवात केळी, व नंतर ‘चेदि, चोल, पांडब, सिंहलद्वीपचें राज्य व इतर राज्यं यांचेवर विजय मिळ- वून शेवटीं वंक्ष ( ऑक्सस्‌ ) नदीवरील तुरुष्क आणे हिमाल्यां- तीळ कौर राजा यांचेवर विजय मिळवून आपला दिग्विजय पुरा केला असा या प्रशर्स्तांत उछेख आहे. ( नेहमीप्रमाणे त्यांत “कोर! शब्दावर छेष केला आहे, व कौर राजानें पिंजर्‍्यांतील पोपटा- प्रमाणे गाऊन लक्ष्मणदेवाची स्तुति केली. असं वर्णन केलें आहे ). हा लेख त्याच्यामागून त्याच्या सिंहासनावर आलेला त्याचा धाकटा भाऊ नरवमा यानें लिहिला असून त्यांत निःसंशय शिलालेखांत सहज दिसून येणारी अतिशयोक्ति आहे. हा राजा ( नखर्मा ) उत्कृष्ट कवि असून कालिदासानें रघूच्या पौराणिक दिग्विजयांत उल्लेखिलेल्या वंक्ष्‌ नदीचा त्याने उछेख केला आहे यावरून त्यानें कालिदासाच्या ग्रंथावरून आपल्या कविता लिहिल्या आहेत असे दिसतें. ज्या शिलळाळेखांत ऐतिह्यासेक वस्तुस्थिति दिळी जावी अशी अपेक्षा असते त्यांताहे कशी अतिशयोक्ति केली जाते याचे उदा- हरण म्हणन आम्ही या अतिरायोक्तींचा उछेख केला आहे. मुख्य ह कीं यावरून समकालीन आणि विश्वासाई असे शिलालेखाहे सत्याच्या कसोटीवर घांसून घेण्याची अवश्यकता असून त्यांचें योग्य पर्राक्षण व्हावयास पाहिजे. ही वर्णनें खोटीं आहेत असें दाखविण्यास कोण- ताहि पुरावा नसला तरी इतर राजांच्या आगि रहक्‍य तर परकी- यांच्या लेखांत त्यांस पुष्टि देणारा पुरावा नसेल तर त्यांच्या सत्यत्वा- कडे साशंक दृष्टीनें पाहिलें पाहिजे.

लक्ष्मणदेव निपुत्रिक निवतंला, व त्याच्या मागून त्याचा धाकटा भाऊ वर सांगितलेला नरवमेदेव हा सिंहासनारूढ झाला. तो मोठा कवि होता. ब्यानें इ. स. ११०४सालीं लिहिलेल्या नागपूर प्रश-

भोजानतरचे परमार राजे. २९”

स्तींपूर्वी केव्हां तरी तो गादीवर आला असावा. उज्जनीच्या महा- काल देवाल्यांत सांपडलेल्या एका अप्रसिद्ध शिलाळेखाच्या खंडाचा लेखक तोच असावा (ल्युआर्ड व लेले पा. २९ ), धारेच्या भोज- शाळेंत आणि उज्जनीच्या महाकालाच्या देवालयांत कांहीं शिलालेख सांपडळे आहेत. ते सर्पाकृति असून त्यांतील शहोकांत पाणिंनीचे संस्कृतांतील नामांचे व धातूंचे प्रत्यय दिळे आहेंत; व त्याबरोबरच उदयादित्य व नरवर्मदेव यांच्या नांवाचा उछेख करून त्यांच्या शो- यांचा व विद्वत्तेचा छेषयुक्त निर्देश केला आहे.” हे छोक धार व उज्जयिनीच्या पाठशाळंत अभ्यासक्रमांत घातलेले असावेत.

उदयादित्याचा कनिष्ट मुलगा जगदेव हा अत्यंत शूरोदार असा राजपुत्र होता. चालुक्यांच्या आश्रयास असतांना गुजराथेंत, माळव्यांत व इतर देशांत त्यानें केलेल्या अद्भूत पराक्रमांचें वर्णन प्रबंधकारांनीं फार केलेळें आहे. तें खरं असो वा खोटें असो, इति- हासांत त्याच्या नांवाचा व कादंबरी लेखकांना आधारभूत झालेल्या त्याच्या साहसाप्रियतेचा उछेख करणें आवश्‍यक आहे.

उद्यादित्य व भोज यांचे प्रमाणेच नरवर्मा हाहि शिभवक्त होता. परंतु इतर धर्मांचे बाबतीत, आणि वशेषतः: गुजराथ व माळवा या प्रांतात त्याकाळीं प्रसार पावत असलेल्या जैन धर्माविषयी, हे सर्व राजे सहिष्णुतेनें वागत. जैन धमांचे उपदेशक वादविवदांत प्रवीण असत.नरवमैदेव हिंदु आणि जैन पंडितांतील वादविवाद वारं- वार ऐकत असे. महाकाल देवालयांत जैन मुनि रत्नसूरि आणि शैव मतवादी विद्याशिववादी यांचे मध्यें झालेल्या एका बादाचें

  • उदयादित्यनामांकवणेनागकृप॥णका । शिन, फणिश्रेणी सृष्टा सुकविबन्घुना | कवीनां च नृपाणां च हृदयेषु निवोशेता ॥ (ल्युआडे व लेळे पा ३० )

२६६ तिसरां हिंदु राज्ये

‘बर्णन आहे. प्रायः या वादांत जैन पंडितांना विजय मिळत अस- ल्यामुळें ज्या राजांपुढें हे वाद होत त्या राजांवर जैन पंडितांचा पगडा बसत असे. परंतु परमार राजे हे अखेरपर्यंत शिवभक्तच ‘राहिळे; आणि नरवर्मा हा जैन पंडितांची प्रशांसा करी आणि जैन ग्रंथकारांनी त्याचा सादर उललेख केला आहे तरी त्याने केव्हांहि जञैन धर्माचा स्वीकार केला नाहीं (ल्युआर्ड व लेळे पा. ३२१ ). नरवर्म्याने इ. स. ११३३पर्यंत राज्य केलें. त्याचेनंतर त्याचा मुलगा यशोवर्मदेव हा सिंहासनावर आला. त्यानें आपल्या बापाच्या प्रथम वषेश्राद्वाबद्दल इ. स: ६ १९० सालीं दिलेळें दानपत्र उपलब्ध आहे. गुजराथ व माळवा यांच्या <रम्यानचें वैर जुनाट होतें; व नरवर्म्याच्या वेळपासूनच या दोन देशांत लढाया चाळू होत्या. परंतु जयसिंह सिद्धराजाचे अमलांत गुजराथचे सामर्थ्य वाढळें आणि जयसिंहानें यशोवर्म्याठा त्याच्या कारकीर्दींचें शेवटीं युद्धांत पराभत केलें आणि त्याच्या कुटंबासहित केंद केळे. अनाहिलवाडांत त्याला लांकडी पिंजऱ्यांत ठेवण्यांत आलें होतें असें म्हणतात. अनेक प्रबन्धकारांनीं या गोष्टीचें साविस्तर वर्णन दिलेलें असून स्वतः जय- सिंहाच्याहे शिलाठेखावरून तिचे सत्य प्रत्यग्नमास येतें (इ. अ. १० पा. १५९ ). जयसिंहानें माळवा आपल्या राज्याला जोडून टाकला आणि त्या देशाचा राज्यकारभार पाहण्यासाठीं आपल्या एका जैन प्रधानाला पाठवून दिलें. चालुक्यांच्या शिलालेखांत जयसिंहाला बहुश अवंतिनाथ असें म्हटलें आहे व त्यावरून कांहीं काळपर्यंत उज्जनी व धार यांचा ज्यांत समावेश झालेला आहे असा माळ- व्याचा एक विस्त्त भाग चालक्‍्यांच्या ताब्यांत होता असें सिद्ध होतं. शेवटीं कांहीं तरी याक्ते करून यश्ोवम्यानें केदेंतन आपली सुटका करून घेतली आणि अजमारच्या एका चव्हाण राजाच्या मदतीनें आपल्या राज्याचा कांहीं भाग परत मिळविला. त्याच्याशीं

भाजानंतरचे परमार राजे. २८७

जयसिंहानें तहाहि केला. जयासेंहद सन ११४२मध्यें मरण पावला. त्याच्या मागून थोड्याच दिवसांनीं ग्ृत्यूनें यश्योवम्यासह्दि गांठिलें. अशा तर्‍हेनें यश्नोवम्यान ११३३ ते ११४३६, स पावेतो राज्य केलें. त्याच्या अमदानींत माळव्याचें सामर्थ्य कायमचे ऱ्हासास लागळें त्याची आई ममलादेवी ही चेदि राजकन्या होती. तिच्या स्मरणा प्रात्यथ यश्ोवर्म्याने इ. स. ११२४मध्यें दिळेळें दानपत्र सांपडलें आहे. या दानपत्राप्रमाणें धारिंत ठिकरीच्या पूर्वेस थोड्याशा मैलावर असलेला रेघवा हा गांब दान केळेळा आहे. ( ल्युआडे च लेले, पा. ३४ ).

यशोवर्मदेवानंतर जयवम हा राजा झाला. त्याच्या कारकॉर्दांत गुजराथनें पुनः माळव्याचा पाडाव केला. आपल्या सर्व शत्रूंचा पराभव करून इतिहासप्रसिद्ध कुमारपाळ गुजराथेंतील सिंद्दासनावर यापूर्वीच बसला होता. बछ़ाळदेव नांवाच्या एका मालव राजानें या शत्रंस मदत केली व त्यामुळें कुमारपालानें त्याचें शिर कापून तें आपल्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर टांगून टेवळें असे प्रबंधकारांनीं वर्णन केलेलें आहे. कुमारपालाच्या वडनगर-प्रशस्तींत या गोष्टींचा उलेख आहे, परंतु बछठाळदेव या नांवाचा निर्देश केला नाहीं. हा राजा कोण असावा हें अजून निश्चित झालेलें नाहीं, परंतु भोजा- च्या घराण्यांतील हया परमार नसावा असा समज आहे. कौलहाननें अशी कल्पना सुचविली आहे कौं, यशोबर्मा बं्दांत पडला असतां माळव्याच्या कांहीं भागांचा ताबा कित्येक साहसिक माणसांनी घेतला असावा. परंतु या गोष्टांचा उलगडा पुढीळ तऱ्हेने करतां येण्याजोगा आहे. तो असा कीं बह्लाळदेव हें जयवर्मदेवाचेंच दुसरं नांव असावें. कारण गुजराथचे किंवा अन्य कोणत्याहि देशाचे राजे भोज घराण्यां- तून न आलेल्या व मालव राज्यांतींठ प्रदेशाचा अपहार करणार्‍या एखाद्या माणसाला माळव्याचा राजा म्हणून मान्यता देतील अथवा

२९८ तिसरी हिंदु राज्य

त्याचा उच्छेद केल्याबद्दल प्रतिष्ठा मिरावितील हे संभवनीय आहे असें आम्हांस वाटत नाहीं. परंतु येथे तर तसें स्पष्ट झालें आहे* तेव्हां अशो कल्पना करावयास हरकत नाहीं कौं कुमारपालाबरोबर झालेल्या लढाइत स्वतः जयवर्माच मारला गेला असावा,

या लढाईच्या व पराभवाच्या धामधुमींत जयसिंहाचा कनिष्ठ बंधू लक्ष्मीवमी यानें आपल्या बाहुबलाच्या जोरावर भोपाळ ते हुर- गाबाद पर्यंतचा माळव्याच्या पूर्वेभागांतील डोंगराळ मुळ्ख काबीज केला, तेथें आपली सस्ता बसविली आणि महाकुमार हें नांव धारण केलें. त्यानें वापरठेळें “समाधिगतपंचमह्ाशब्द’ हें विशेषण तो स्वतंत्र राजा नसून माळव्याचा सामंत होता हें निःसंदेह व्यक्त करीत आहे असें असलें तरी त्यानें मिळविलेली सत्ता त्याला कोणी दान म्हणून दिळेळी नसून ती त्यानें आपल्या तरवारीने प्राप्त करून घेतली

होती असे त्याच्या शाखच्या शिलालेखांत स्पष्टपणें म्हटलें आहे

( इं. अ. १९ ). क. ल्युआडं व मि. लेले यांनी प्रस्तुत कालाच्या वृत्तान्तांत उपयोगांत आणलेले 1प(९”॥”७४॥प]] 810 तैप8] एप]€6 (राज्यद्वैविध्य ) शब्द वरील कारणामुळें माळव्याच्या या परिस्थितीला योग्य तऱ्हेनें लागू पडत नाहींत असं आम’ःचें मत आहें. जयवर्म्यांच्या अमदानींत माळव्याचा बराचसा भाग गुजराथच्या ताब्यांत गेला आणि ल्याच्या मृत्यूनंतर किंवा त्याच्या कारकीर्दींनंतर टक्ष्मणवर्म्यानें माळव्याच्या राज्याच्या कांहीं भाग द्दस्तगत केला. जयवर्माची कार- कीद केव्हां आणि कशी संपली हें कळत नाहीं. किलहानची कल्पना

अशी आहे कीं त्याला द्याचा धाकटा भाऊ अजयवर्मा यानें पद-

*वडनगर प्ररास्तांत हे शब्द पुढीलप्रमाणें आहेत. “ द्वारालबितमाल-

वेशशिरः । आणि अबूच्या लेखांत पुढीलप्रमाणें आहेत. “ यश्चोलुक्‍्य

कुमारपालनुपतिप्रत्यथितामागतं गत्वा सत्वरमेव मालवपतिं बललाळमाल-

ब्धवाब्‌ू ( ए. इ.८ पा २११ ),

भोजानेतरचे परमार राज. २८९

युत केळे. परंतु वर सुचविल्याप्रमाणें कुमारपालानें ल्याला लढाईत द केलें आणि शेवटीं चंद्रावर्तांच्या यश्ोधवलानें त्याचा शिरच्छेद रला असावा हं संभवनीय दिसतं. शिलालेखकांनीं ‘ राज्येव्यताते ? 1 शब्दप्रयोग बहुधा त्याच्या दुःखकारक झालेल्या अतामुळें जाणून जून केला असावा, इतकें खास कीं त्याची कारकीदे अचानक तीने संपली. टक्ष्मीवर्म्याच्या दानपत्राचा काळ १०६३ इ. स. आहे ( ए. इ. १८ पा. २५४ व १९ ). त्यापूर्वी केव्हांतरी, हुधा इ. स. ११४३ नंतर थोड्याच वर्षांत तो राज्यारून पदच्युत ळा असावा.

यशोवर्मी यास जयवर्मा, अजयवमी व लक्ष्मीवमी असे तीन त्र असावेत. जयवर्म्यांची कारकीर्द संपल्यावर स्वाभाविकपणेच अजयवमाी माळव्याचा राजा झाला आणि पदामभिषिक्त भ महाराजा- घेराज परमेश्वर! हीं नेहमींची विरुद्धे त्याच्या नांवाबरोबर वापरण्यांत ऊं लागलीं. परंतु टक्ष्मीवम्यीने आपल्या सामर्थ्यांने भोपाळ व हुदा- ॥बादच्या भोंबवतालीं आपलें संस्थान स्थापलळं आणि वर सांगितल्या- [भाण सामंत ही पदवी धारण केली. परमारांच्या या दोन्ही शाखा ॥ीन पिढ्यापर्यंत चालल्या व शेवटीं देवपालदेवाच्या कारकारदीत करूप झाल्या. परंतु माळव्यावर दोन राजांची सत्ता होती हे म्हणणें आम्हांस संमत नाहीं. टक्ष्मावर्म्यांचे घराणें प्रत्यक्ष स्वतंत्र असलें री त्यानें सामंतपदानें संतुष्ट होऊन अजयवम्यीच्या घराण्याचें वर्चस्व न्य केलं होतं.

भोजाच्या कालापासून माळव्याची राजधानी असलेली जी धारा- नगरी तिच्या सर्भावतालच्या प्रान्तावर राज्य करणारा आणि माळ- याच्या राजघराण्यांतील क्रमप्राप्त वारस अजयवर्मा याचें नांव फक्त याच्यानेतर झालेल्या राजांच्या शिलालेखांत पहावयास सांपडतें.

म, भा…१८

२७० तिसरी हिडदु राज्ये

त्याच्याविषयी कोणतीहि माहिती उपलब्ध नाहीं. पुष्कळ वेळां जय- वमाखेरीज अजयवमी यां नांवाचा दुसरा एखादा राजा होता कौं काय याबद्दल संशय प्रकट केला जातो; परंतु या ठेखांवरून अजयवर्माच्या अस्तित्वाची खात्री पटते. संस्कृतांत विशेषतः संधि केळेळ असतां कोणता शब्द वापरला आहे हें निश्वयानें सांगणें कठौण असते. परंतु टक्ष्मीवम्याच्या लेखांत जयवमे आणि विंध्यावम्यांच्या ठेखांत अजय- वम हीं नांबें स्पष्ट रीतीनें दिसतात. पहिल्या लेखांत अजयवमीचा : उछलेख कां नाहीं ? याचें असें उत्तर देतां येईल कीं जयवर्म्यांच्या : हयातींतच आणि कदाचित ल्याच्याच संमतानें लक्ष्मीवर्मा यानें आपले संस्थांन स्थापिले असावें. अजयवर्मानें कांही काल मुख्य घराणे चालविले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा विंध्यवर्मा हा राजा झाला व त्यानें आपल्या पैतक प्रदेशांपैकीं बराच भाग परत मिळविला असावा असं दिसतें. उदेपूरच्या प्रख्यात शिवाच्या देवालयांतील शिलालेखावरून हा भाग ११ डिसेंबर ११६३ या दिवशीं गुजराथच्या कुमारपालाच्या ताब्यांत होता असे दिसून येतें.. त्या दिवशीं चंद्रप्रहणानिमित्त कुमारपाठांने एक दान केलें आहे, (इं. अ. १८ पा. ३४३ ). त्याचा प्रतिनिधि महाराजपुत्र श्री. वसंतपालळ हा होता. चाहडानें लिहून ठेवळेठे सन ११६६ चें एक दानपत्र आहे. चाहड हा बसंतपालानंतरचा प्रातिनिधि असावा.. झलस्वामी ( भेलळसा ) जिल्ह्यांतीळ एका गांवचे ११७३ इ. स. सालचें गुजराथच्या अजयपालदेवाचें दानपत्र आहे. गुजराथच्या अजयपालळंदेवाची कारकीर्द ११७६त संपल्यानंतर विंध्यवर्म्यानें हा प्रदेश पुनः परत मिळविळा असावा; अजयपालाच्या उदेपूरच्या, ११७३ च्या शिलालेखावरून तों पावेतो गुजराथची सत्ता पूर्व माळव्यावर होती असे दिसून येतें, अजयपालाच्या नंतरचा राजा बहुधा अज्ञान असावा आणि त्याच्या कारकीदीत माळवा पूर्णपणें

भोजानतरचे परमार राजे. २७१

परमारांच्या अमलाखालीं आला असावा. विंध्यवम्याचा नातू अर्जुन- वर्मा यानें १२१५ सालीं केलेल्या दानपत्रांत विंध्यवर्मा हा मोठा योद्धा होता असे त्याचे वर्णन केलें आहे. धारचा मांडोगड नांवाचा किल्ला ( मंडपदुर्ग ) त्याच्या ताब्यांत होता यांत संशय नाहीं. त्यांतील रका प्रसिद्ध न झालेल्या शिलालेखावरून बिल्ह्ण या नांवाचा रक कवि त्याचा मंत्री होता असं दिसून येतं* ( ल्युआर्ड- आणि ठेले पा. ३७ ), यावरून हा राजा कविजनांचा पुरस्कर्ता होता असे दिसतें. ज्याची आधिक माहिती आम्ही पुढे णार आहांत त्या आशाधर नांवाच्या जेन ग्रंथकाराने विंध्यवम्यीच्या पा आनुवोशिक वृत्तीचा उलेख केळेळा आहे.विंध्यवर्म्यानें सुमारें १६० ने ११८० पर्यंत राज्य केलें ( ल्युआड व लेले, पा. ५८ ) आणि याच्यानंतर त्याचा मुलगा सुभटवर्मा राज्यावर बसला. तोहि प्रताप- आन्‌ राजा होता आणि त्यानें माळयाचे सामथ्यांत अधिक भर कली, त्यानें आपलें राज्य परत मिळविले इतकेंच नाहीं तर त्यानें गुजराथेवर स्वारीहि केळी. देवगिर्राच्या एका यादव राजानें माळ- याचा पराभव.केल्याचा उललेख आहे, परंतु बहुतकरून हा विजय हत्वाचा नसावा. क. ल्युआड आणि मि. लेले यांनीं सुभटवर्मानें ११८० ते १२१० इ. स. पर्यंत राज्य केलें असे लिहिलें आहें. याच्यानंतर अर्जनवर्मा राज्य करूं लागला. त्याचीं १२११,१२१३ ह १२१५ इ. स. ची मंडपदुर्ग ( मांडू ) भगुकच्छ ( भडोच ) आणि नमदेवरील अमेरेश्वर ( मांधाता ) या गांवातून प्रसिद्ध केलेलीं ानपत्रे उपलब्ध झालीं आहेत, त्यानें गुजराथचा राजा दुसरा जय- संह याचा पराभव केला असें म्हटळें आहे. दरबारच्या कवीनें या वे जयप्रसंगावर लिहिलळेळें व कमालमोळा मशिदीत वापरलेल्या

(२ ४.

  • विन्ध्यवर्म-नृपतेः प्रसादभूः । सान्धितिग्रहिक बिल्हणः काविः ॥।

२७२ तिसरा हिंदु राज्ये. शिलांबर कोंरळेळे एक नाटक धार येथे राजेश्री ठेळे यानीं शोधून काढलें आहे. या नाटकाची अक्षरं लावून तें एपिम्राफिआ. इंडिकाच्या ८ वे भागांत प्रसिद्ध केलें आहे. जेन पंडित आश्याधर याचा शिष्य व राजाचा गुरु मदन-हा गोड ब्राह्मण होता-यानें हें नाटक लिहिलें आहि. एका वसंतोत्सवाचें वेळीं या नाटकाचा प्रयोग सरस्वतीभुव- नांत करून दाखविण्यांत आला होता, या नाटकांत अजुनवर्मा हा भोजाचा अवतार आहे असे त्याचें वर्णन केळें असून ही त्याची स्तुतिह्ि अत्यंत उचित अशीच आहे. कारण अर्जुनदेव हा नुसता कवींचें आश्रयस्थानच नव्हता; तो स्वतःहि कवि आणि प्रंथकार होता.’ अमरुशतकावरीळ रसिकसंर्जावनी नांवाची टीका हा त्याचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्यानें भोजाच्या प्रंथांवरह्चि टीका लिहिल्या असें म्हणतात. तो आपला पूर्वज जो भोज ल्याच्याप्रमाणेंच शूर, विद्रान्‌, आणि उदार होता असें दिसते, आणि भोजाप्रमा- णेच तो दैवशालीहि होता; कारण माळव्याचें वैभव त्याच्या मृत्यू- नंतर नष्ट झालें. तो इ. स. १२१६ त मेला असावा,कारण व्याच्या नंतरच्या राजाचें १२१८ सालचे. दानपत्र सांपडलें आहे.

अजुनवम्यांनंतरचा राजा दुसऱ्या परमार घराण्यांतील लक्ष्मी वम्यींचा नातु देवपालवमी हा झाला. अजुनवमी बहुधा निपुत्रिक मेला असावा. त्याच्या कारर्कादींतहि जैन पंडित आज्ञाधर हा जीव- मान होता. त्रिषष्टिस्यृति आपण इ. स. १२१५ मध्यें या राजाच्या कारकादींत पुरी केटी, असें आशाधरानें म्हटलें आहे.

यानंतरचा राजा जयतुंगदेव याच्या वेळींहि आश्याधर हयात होता; कारण आपल्या धमोमृृतावरीळ टीका जयतुंगाचे अमदानींत

*काव्यगान्घर्वसर्वेस्वनिधिना येन सांप्रतम्‌ । भारावतारणं देव्याश्चक्के पुस्तकवबीणयोः ॥ (ए. इ.९ पा. १०८ )

भोजानंतरचे परमार राजे. २७३

आपण इ. स. १२२9 मध्यें लिहिली असें त्यांचें म्हणणें आहे. देवपालदेवानें इ. स. १२१६ ते १२४० पर्यंत राज्य केलें असें म्हणण्यास हरकत दिसत नाहीं ( क. ल्युआड व लेले

यावरून देवपालदेवाचे कारकीर्दीत इ. स. १२३५ मध्यें अल्त- मशान माळव्यावर स्वारी केली आणि उज्जर्नाचें महाकालाचे देवा- लय उध्वस्त केलें. या प्रसंगानंतर अनेक वर्षे माळवा मुसलमानांच्या अमलाखाली न जातां स्वतंत्र राहिला होता; आणि देवपालाच्या पुढील पांच वंशजानीं माळव्यावर राज्य केलें. १ जयतुंग ( १२४० ते १२५६ ), २ जयवर्मा (१२५६–१२६१ ), ३ जयसिंह (१२६१–१२८० ), ४ दुसरा भोज ( १२८०–१३०१ ) आणि “५ जयसिंह. जयासंहाचा इ. स. १३०९ . चा उदेपुरांतील शिलालेख आतां उपलब्ध झाला आहे. रोवटीं दिछीहून आलेला प्रांताधिकारी ऐनुलमुल्क यानें माळवा सर केला. त्यानें चंदेरी, उज्जायेनी. धार आणि मांडू हीं सर्वे घेतलीं (ल्युआर्ड व लेले).

अशा तऱ्हेनं चार शतकांच्या उञज्वळ सत्तेनंतर माळव्यांतील विख्यात परमार घराण्याचा अंत झाला. उमटवाड्यांतील राजगड आणि नरासेंहगड ( भोपाळ एजन्सी ) चे राजे आणि भेवाडांतील बिजोलियाच संस्थानिक हे माळव्याच्या परमार राजांचे हीचे वंशज आहेत (गोरीशंकर ओझा-टॉडचा राजस्थान ).

जयवर्म्यांचे मृत्यूनंतर किंवा तो पदच्युत झाला तेव्हां ११४४ इ. स. चे सुमारास लक्षीवम्याने स्थापिठेल्या स्वतंत्र शाखेचा थोडक्यांत उल्लेख केला म्हणजे या प्रकरणाचे कार्य संपलें. लक्ष्मीवर्म्याचा मुलगा महाकुमार हरिश्चंद्र याचे इ. स. ११७८चे दानपत्र उपलब्ध आहे. हरि- श्वद्राचा मुलगा उदयवमी याचे इ. स. १२००चे एक दानपत्र उप- लब्ध झालें आहे. वर सांगितल्याप्रमाणें हरिश्वंद्राचा मुलगा देवपाल- देव हा सर्व माळव्याचा राजा झाला. या शाखेने भोपाळ ब हु

२७४ तिसरी हिंदु राज्ये. गाबादच्या भोवतालच्या भागांत राज्य केंलें असावें; त्याचीं दानपर्त्रे भोपाळ व हुरंगाबाद येथें केलेली आहेत. माळव्याचा विस्तार पूर्वेस भोपाळपासून पश्चिमेस धारपयंत आणि दक्षिणेस नर्मदेपासून उत्तरेस विंध्यप्वत आणि त्याच्या पलीकडे मदंसोर पर्यतचे पठार इतका होता. कधी हा विस्तार कमी होई; कधी दक्षिणेकडे तापी आणि वऱ्हाड यांचा त्यांत समावेश होई. कर्धी कधीं नागपुरासकट मध्य- प्रांतावराहे परमारांचा अमळ बसला होता,

भोजापासून या परमार घराण्याची वंशावळ पुढीलप्रमाणें आहे (ए. इ. मधील किल्होनंच्या वंशावळी भाग ८ ).

१ भोज लेख १०२१ (१०१०ते १०५५सु.) र जयासैंह 171 १९०५५ (१०५५ते १०५९ सु.) ३ उदयादित्य [एक आसत ] (१०५९ते १०८० सु.) डं न ((‘१०८१’ते ११०८४ सु.) ष्‌ नरव्सा ले. ११०४व११०७ (११०४ते ११३३सु. )

६ यशोवमा ले, ११३४बव११३५ (११३३ते १९४र्सु. ) ]

७ जयवमी ८ अजयवर्मा ( ११४४-११६० सु. ) लक्ष्माविर्मा ₹९४३(२१९४रते.. | ११४४ सु.) ९ विंध्यवर्मा (११६०–११८०) हरिश्चंद्र (११७८–११७८सु.)

| १० सुभटवर्मा (९१८०–१२१० ) | | । ११ अजुनवर्मा (९२१०-१२१६ १२ देवपाल

१२११,१२१२,१२१५ (१२१६–१२४० ) १२१७,१२२९,१२३२

येणेंप्रमाणें या १२ राजांनीं इ. स. १०१० ते १२४० पर्यंत

चा ॅकीती

भोजानंतरचे परमार राजे. २७५

राज्य केलें. त्यांच्या प्रत्येकाच्या कारकॉर्दाचें सरासरी प्रमाण (उर ) २० वर्षांचे आहे. हिंदी राजघराण्यां नेहर्माचें प्रमाण आहे

ह्या राजघराण्यांत भोजाचा मुलगा जयसिंह हा दुदेंबी होता. त्यानें चारच वर्षे राज्य केलें; आणि त्यांताहे कर्ण आणि कर्नाट यांच्या दरम्यान त्याची वाताहात झाली. यशोवर्मा त्याच्याहि पेक्षां अधिक दुदैंवी. त्याचा पराभव झाला, तो कैद झाला, आणि गुज- राथच्या जयसिंहिराजानें त्याला पिंजऱ्यांतहि कोंडून ठेवलें. जयव- म्यांच्या दुर्दैवाने तर कडेलोट केला, कुमारपालाने त्याला नुसता पराभत किंवा बंदिवानच केला नाहीं तर त्याचें शिरहि उडाविलें आणि तें आपल्या प्रासादाच्या प्रवेशद्वारावर लटकविलें, कुमार- पालाच्या वडनगर प्रशस्तींत म्हटल्याप्रमाणे गुजराथच्या राजांनीं माळव्याच्या राजांच्या केलेल्या या दुर्दशमुळें इतर राजांच्या उरांत घास्ती बसलठी.* परंतु गुजराथच्या राजांची हीं कृत्ये हिंदु राजांस न शोभणारी व त्यांच्या हातून न होणारीं अश्ीींच होतीं. मुसल- मानांची बंदिवान्‌ राजांस वागविण्याची जी पद्धत हिंदु राजांच्या ऐकिवांत आली तिचे हं अनुकरण असावें.

*इष्यन्मालवभूपबन्धनर्विधित्रस्ताखिलक्ष्मापातेः (ए. इं. १ पा. २९७.)

वच प्रकरण पांचवं. बुंदेलखंडचे चेदेछ.

बुंदेलखंडच्या चंद्रात्रेय म्हणजे चंदेछ़ क्षाविय राजकुलाची परंपरा याहि कालविभांत चाळू राहेळी (इ. स. १००० ते १२००). जरी ती पूर्वीपेक्षां जास्त वैभवयुक्त नव्हती, तरी पूर्वीच्या शातकां इत- कीच (भा. २ पहा ) ती तेजस्वी राहिली. या कुलाचें नांव गोत्र- नांम आहे. गोत्रनांमाचा नियम प्राचीन. ब्राह्मणांत व क्षत्रियांत होता. आणि चेंद्रात्रेय हें नांव गोत्रकत्याचें “पाराशरे’ यांचा गोत्रकर्ता परा- शर याप्रमाणें किंवा पिटरसन्‌ , जानसन्‌ वगेरे इंग्रजी आडनांवाप्रमाणे होतें. या राज्याचें वर्णन अल्बेरूनीनें बरोबर केळें आहे. त्यांतील मुख्य किले काळंजर आणि ग्वाल्हेर हे त्याने सांगितळे असून त्यांची राजधानी खुजुराहा ही त्यानं सांगितळी आहे. इतर अरब लेखक त्यांच्या राजास चंद्रराय म्हणतात. हिंदी राब्द “ चंद्र ‘ चंद- बर्दार्यानौहि या राजांबद्दल रासांत उपयोगिळा आहे.

या कुलांतील सर्वांत मोठा राजा धंग होता. हा पूर्वीच्या काल- विभागाच्या अंतीं राज्य करीत होता. तो इंतका पराक्रमी व प्रासेद्ध होता कीं, पंजाबच्या जयपाल राजानें सबुक्तगीनाविरुद्ध त्यास मद- तीस बोलाविळें होते. आणि चेदेछकुलाच्या लेखांत त्यास ‘ हम्मीर- सम ‘ असें म्हटलें आहे. लेख लिहिणारे अतिशयोक्ति कारेतात, पण अगदींच खोटीं विधानें करीत नाहींत. म्हणूनअन्यत्न आम्ही सांगितल्या- प्रमाणें संयुक्त हिंदु सैन्याची सिंधुपळीकडे सबुक्त्गीनाशीं जी लढाई झालीं तींत कोणत्याहि पक्षाचा जय झाला नाहीं. अर्थात्‌ धंगाला हम्मीरसम असें जें म्हटळें आहे त्यांत खोटेपणा नाहीं. धंग सुमारें दोभर वषांचा म्हातारा होऊन प्रयाग येथें पवित्र अशा गंगायमुनासं- गमी करीशचितेंत जळून देहत्याग कारेता झाला.

बुंदेलखंडचे चंदेल. २७७

धंगामागून त्याचा पुत्र गंड गादीवर बसला. हाहि तितकाच पराक्रमी निघाला. यानेंहि जयपालाचा पुत्र आनंदपाल ह्यास मह- मुदाविरुद्ध मदत केली. या लढाइत मात्र हिंदूंचा पक्का पराभव झाला; व यामळेंच महमदाचे चंदेछाशीं जे वेर चाळू झालें त्याची गति आम्ही अन्यत्र वर्णिली आहे. गंड इ. स. १००० मध्यें गादी- वर आला आणि इ. स. १०२३ पर्यंत त्यानें राज्य केलें. त्याचे १००२ व १०२२ इ. .स. असे दोन लेख सांपडळे आहेत. ३७ मध्यें चंदेछावरीळ सर व्हिन्सेन्ट स्मिथनें एका विस्तृत लेखांत या कुलाच्या राजांची हकीकत दिली आहे. त्यांतून आम्ही मित्या व वृत्ते घेऊन जेथें जरूर दिसली तेथे चंदेछांच्या व इतरांच्या मूळ ठेखांतून कांहीं विशेष माहिती देत आहों. येथून पुढें महोबा ही चंदेल्लांची राजधानी होती.

गंडाच्या मागून त्याचा पुत्र विद्याधर गादीवर आला. यानं १०२८ पासून १०३० पर्यंत दोनच वर्षे राज्य केळे. युवराज असतांना कनोज- वर स्वारी करून महमुदाला हरण जाऊन त्याचे अकितत्व पतकरून राजपूत नांवाला कलंक लावणाऱ्या राज्यपालाचा यानें पराभव केला, एका कच्छपघात लेखांत असे वरणिळें आहे कीं, या युद्धांत चंदे- छांचा मांडलिक अर्जुनदेव यानें बाण मारून राज्यपाळाचा कंठ छेदिला.€ या लडाईनें विद्याधराचे पराक्रमाबद्दह ख्याति झाली. आणि एका त्याच्या खंडित लेखांत असे वर्णन आहे कीं, हा पलं- गावर पडला असतां भोज व कलचूरी राजा त्याची सेवा करीत होते. बहुधा भोज आणि गांगेय यावेळचे दोन बलिष्ट राजे तुकांना विरोध करून त्यांस राज्यपालाच्या मध्यदेशांतून हाकळून कनोजच्या

*श्रीविद्याधरदेवकायीनेरतः श्रीराज्यपालं हठात्‌ । कंठास्थिच्छिद्नकबाणनिवहेहत्त्वा महत्याहवे | ( ए. इं. २ पान २२७),

२७८ तिसरा हिंदु राज्ये.

सम्राटास त्यांच्या तडाख्यांतून सोडविण्याच्या कामीं विद्याधरास मदत करण्यास आले होते.

याप्रमाणें हिंदुस्थानचे प्रसिद्ध हिंदु राजे विद्याधराच्या सैनापत्या- खालीं, राज्यपालानें तुकांस शरण जाऊन तुकांची एक फौज आपल्या रक्षणाकरितां ठेऊन घेतली होती त्यास शिक्षा लावण्याकरितां त्याज- वर चाळून गेले. चंदेलांचे राज्य कनोजच्या राज्यास लागून होतें. अ्थोतू या संयुक्त सेनेचा मुख्य अधिकार विद्याधराकडे साहजिकच आला. ‘तल्पभाजम्‌! ह्या विशेषणावरून विद्याधर पलंगावरच पडून त्यानं आपला सेनापति व मांडलिक ग्वालेरचा कच्छपघात राजा यास स्वारीवर पाठविलें. भोज व गांगेय यानींहि बहुधा स्वतः न जातां आपल्या तर्फे या लढाईंत फौजा पाठिवल्या. त्या अथोत्‌ विद्याधरा- च्या हुकुमाखालीं काम देत होल्या.

विद्याधरामागून विजयपाल राज्यावर आला. त्याने इ. स, १०२० पासून इ. स. १०४० पर्यंत म्हणजे थोडाच काळ राज्य केलें ( स्मिथ ). विजयपालामागून त्याचा ज्येष्ठ पुत्र देववमेन्‌ राजा झाला त्यान इ, स. १०४० पासून इ, स. १०६० पर्‍यंत राज्य केलं त्याचा एक लेख इ. स. १०५० चा सांपंडला आहे (इं. ए. १६ पा. २०५ ), या लेखांत देववर्मी आपल्यास कालंजराधिपति म्हण- वितो. परमभदट्टारकादि नेहमीच्या स्वतंत्र राजाच्या पदव्या त्यास

“या लेखांतील शब्द (ए. इं. १ पा. २२२ ) महत्त्वाचे पण संदिग्ध आहेत.विहितकन्याकुव्जभूपालभड्गं । समरगुरुमुपास्त प्रोढभीस्तल्पभाजम्‌ सहकलचुरिचन्द्रः शिष्यवःद्धाजदेवः ॥ या ठिकाणीं बहुघा लेख वाचण्यांत चुकी झाली असून प्रोढभीः या ऐवजीं प्रोढघीः असं पाहिजे. प्रोढ शब्द भीशीं जोडला असतां कांहीं अर्थ निष्पन्न होत नाहीं. लेखकाचा आारय असा दिसतो काँ, भोजासारखा बुद्धिवान राजा लिपुराच्या प्रासद्ध कल- चूरी गांगेय राजासह युद्धांतील या गुरूशीं शिष्यवत्‌ आचरण करीत होता.

बुदेलखडचे चंदेल. २७९

लाविल्या आहेत, हा लेख सहरवास येथील आपल्या सैन्याच्या मुक्कामावरून त्यानें जारी केला असून माता भुवनदेवी हिच्या सांव- त्सरिक श्राद्वानिमत्त त्यांत गांव दान दिला आहे.

देववर्मनूच्या मागून त्याचा भाऊ कोर्तिव्मन्‌ गादीवर आला. यानें भावाहूनहि ज्यास्त कीर्ति मिळविली आणि ज्यास्त वर्षे राज्य केलें; म्हणजे सुमारें १०६० पासून ११०० पर्यंत चाळीस वर्षे राज्य केलें. याचें दोन लेख सांपडले आहेत. एक इ. स. १०९८ चा असून दुसर्‍यावर मिति नाहीं. यांत गंड, भोजाचा समकालीन विद्याधर, गांगेयाचा समकालीन विजयपाळ आणि कणांचा सम- कालीन देववमेन्‌ यांचा उछेख आहे. चेदींच्या राजवंशांत त्रिपु- रचा कर्ण अतिशय पराक्रमी राजा झाला. त्यानें कौर्तिवगन्‌चा पराभव करून त्यास राज्यांतून हांकून लाविलें. पण शेवटीं कौर्ति- वर्मनून गोपाल नांवाच्या एका ब्राह्मण सेनापतीच्या सहाय्यानें “अनेक राजांचा नाश करणारा’ कण याचा पराभव केला आणि आपलें राज्य परत मिळविले, या जयाचा उछेख कृष्णामेश्रानें केलेल्या प्रबोधचंद्र नाटकांत आला असून इ. स. १०६५ त हं नाटक राजासमोर करून दाखषीलें. वेदांत तत्त्वज्ञानावर हें नाटक रचिले असून ज्ञान, भाक्ते, वैराग्य इल्यादि गुणांस मनुष्यरूप देऊन ती यांत पात्रे केलीं आहेत. कौर्तिवमेनूर्ने चंदेळ घराण्याचें पहिलें नाणें पाडून आपली कोौर्ति अधिक स्थिर केली. या नाण्याची तऱ्हा गांगे- याच्या नाण्याप्रमाणेंच आहे. मात्र लक्ष्मीच्या ऐवजी हनुमान घातला आहे.हनुमान चंदेछांची कुलदेवता नाहीं,परंतु त्यांचें ते आवडतें दैवत होतं असे दिसतें. खजुराहो येथील एका हनुमानाच्या मूर्तीच्या खालीं चेदेळांचा एक लेख अद्याप पहावयास मिळतो. देवगड येथे इ. स. १०९८ ‘चा एक लेख मिळाला आहे (इ. ए. १८ पा. २३८ ). हा त्याचा प्रधान वत्सराज यानें देवगडचा किला चेदींपासून घेतला

२८० तिसरा हिंदु राज्ये.

त्या विजयस्मरणार्थ खोदला आहे. ललितपूर जिल्ह्यांतील पूर्वेकडील एका डोंगराच्या ओळींत एका रमणीय जागीं हा किल्ला आहे ( स्मिथ ). या लेखावरून इ. स. १०९८ च्या पुढेंहि कौर्तिवर्म्यानें राज्य केलें असें ठरतें.

कौर्तिवर्मनूच्या मागून त्याचा पुत्र सछक्षण राजा झाला, यानें इ. स. ११०० पासून इ. स. १११० पर्यंत थोडेच दिवस राज्य केळे. माळवा आणि चेदी यांची लक्ष्मी यानें हरण केली एवढा उल्लेख याविषयीं सांपडतो ( ए. इं. १ पा. ३२७), याच्या मागून याचा पुत्र जयवर्मन्‌ गादीवर आला. त्यानेंहि थोडेंच राज्य केलें. (१११० ते ११२० ). ह्याच्याविषयीं विदोष सांगण्यासारखं नाहीं. किलहॉनेने आपल्या वंशावळींत याच्या नांवावर एक लेख दिला आहे. पण तो याचा प्रसिद्ध पूवेज धंग याची एक प्रशस्त गोड कायस्थ लेखकाने केवळ पुनः लिहून ठेवलेली आहे (ए. इं, १ पा. १४७ ). जयवर्मन्‌ळा पुत्र नव्हता, तेव्हां कौर्तिवर्मनूचा घाकटा पुत्र पृर्थ्वावर्मन्‌ जयवमनूचा चुलता राजा झाला. त्यानें इ. स. ११२० ते ११२५ पर्यंत पांचच वर्षे राज्य केलें हें साहजिक आहे. या तिन्ही राजांनीं काढलेलीं सोन्यारुन्यांचीं नाणीं सांपडलीं आहेत. शेवटल्याचें एक तांब्याचें नाणेहि सांपडळें आहे.

आतां आपण चंदेल वंशांतील दुसरा प्रसिद्ध राजा पृथ्वीवमन्‌चा पुत्र मदनवमन्‌ याच्या कारकीर्दीशीं पोहोचलो. यानें पुष्कळ वर्षे म्हणजे इ. स. ११२५ पासून ११६१५ पर्यंत जोरानें राज्य केलें किलहॉर्ननें आपल्या वंशावळींत (ए. इं. ८) याच्या नांवावर आठ लेख इ. स. ११२९ पासून इ. स. ११६२ पर्यंत दिळे आहेत चेद बरदाई म्हणतो कीं, गुजराथचा प्रसिद्ध राजा जयसिंह याचा यानें पराभव केला. पण गुजराथचे बखरकार लिहितात कीं, जय- सिंह्यास यानें खंडणी दिली. तथापि ते आणखी मजेची गोष्ट अशी

बुंदेलखंडचे चंदेल. २८१

सांगतात कीं, जयसिंह आपल्या राजधानीशीं पोहोंचला तरी मद- नवमन्‌ इतका बेफिकीर होता कीं, तो आपल्या विलासबागेंतून हाळला नाहीं, जेव्हां बातमीदारांनीं सिद्धराज येऊन पोहोंचलळा अशी खबर दिली, तेव्हां तो इतकेच म्हणाला कीं, “’ हा द्रब्यलोभी मनुष्य कांहीं द्रव्य मागतो आहे. याला कांहीं द्रव्य द्या, !! जय- सिंहाला मदनवर्मनच्या या स्वभावाचे मोठें नवल वाटलें. त्यानें स्वतः जाऊन विलासोद्यानांत मदनवमन्‌ची भेट घेतली, व त्यानेंहि जय सिंहास थाटाची मेजवानी दिली. परंतु कालंजर येथें मदनाचा एक लेख आहे त्यांत गुजर राजाचा पराभव केल्याचें विधान आहे. त्यांत माळवा व चदी या राजांचाहि त्यानें पराभव केल्याचे वर्णन आहे, कनोजचे गाहडवाल म्हणजे बनारसचे राजे याशीं त्याचा स्नेह होता. यानें महोबास एक मोठा तलाव बांधून त्याच्या कांठीं दोन मंदिरें बांधिली. हा तलाव मदनसागर म्हणून प्रसिद्ध आहे. बहुतेक चंदेळ राजांनीं विस्तीर्ण सुंदर तलाव आणि देवळें बां- धिलीं आहेत, त्यांची माहिती पुढील टिप्पणींत आह्यीं देऊं. मद्‌न- वमनाने काढलेलीं सोन्याचांदीचीं नाणीं पुष्कळच सांपडलीं आहेत.

दीधैकाळ राज्य करणाऱ्या राजांचा नेहमीं अनुभव आहे त्याप्र- माणें याचा ज्येष्ट पुत्र प्रतापवर्मन्‌ त्याच्या आगोदर मेला व त्याचा धाकटा मुलगा यशोवर्मन्‌हि मेला. त्याचा पुत्र परमर्दि देव हा मद- नानंतर गादीवर आला. यालाच परमळ असोहि म्हणतात. हाच चेदेछ घराण्याचा शेवटचा प्रसिद्ध राजा होय. यानें इ. स. ११६८ पासून इ. स. १२०३ पर्यंत दीधेकाळ राज्य केलें. याचें नांव व याच्या दोन शर सरदाराचें नांव अल्ह व उघल् यांची कीर्ति बुंदेल- खंडांत घरोघर गाइली जाते, हे दोन वीर बनाफरवंशी राजपूत असून त्यांनीं परमलाकारितां प्रथ्विराज चव्हाणाशीं झालेल्या युद्धांत आपला प्राण वेंचळा. पृथ्विराज रासाच्या महोबाखंडांत चंदवर्दाईनें

२८२ तिसरी हिंदु राज्ये.

अल्ह व उघल्ल यांचें रारत्वाचे व स्वदेर-प्रीतीचे पराक्रम गाइले आहेत, ते मेल्यानंतर पृथ्यिराजानें परमालाचा पराभव केला. ही लढाई काळीसिंधला मिळणारी एक नदी पहुज हिच्या कांठीं अस- लेल्या सिसरागडजवळ झाली. प्रथ्विराजाने लागलीच मोहोबाचा कबजा करून तेथे आपला सरदार पज्जून यास अधिकारी नेमले. ही रासांत दिळेली हकीकत मदनवरमन्‌ यानें स्थापलेल्या मदनपूर गांवीं सांपडलेल्या पृथ्विराजाच्या लेखावरून खरी ठरते. पण पर- मर्दीचा पुत्र समरजित्‌ यानें पज्जूनास हांकून लाविळें असें जे चेद लिहितो तें खरें दिसत नाहीं. कारण परमर्दीच्या मागून त्याचा पुत्न त्रेळोक्यवर्मन्‌ गादीवर आला असें कोरीव लेखांवरून दिसतें. कदा- चित्‌ समरजित्‌ हा त्याचा धाकटा भाऊ असेल

पृथ्विराजानें केळेला परमर्दीचा पराभव स्मिथच्या मतें फारच जबर होता. त्यामळे इ. स. १२०३ मध्यें जेव्हां कतुब॒द्दिनानें चेदी- वर स्वारी केली तेव्हां त्यास त्याचा चांगळा विरोधी करतां आला नाहीं. परंतु परमदींचा हा पराभव इ. स. ११८२ मध्यें झाला. त्यानंतरच्या वीस वर्षाच्या काळांत त्यास आपलें सामर्थ्य बरेंच परत मिळवितां आलें असावें. तथापि पृथ्विराजाच्या स्वारीमुळें परमर्दीची शक्ति कमी झाली हं मान्य करावे ठागेळ आणि प्रथ्विराजानें अन्यत्र दाखविल्याप्रमाणे ही राष्ट्रीय दृष्टया चुकी केली. हिंदुस्थानांतील पराक्रमी क्षत्रिय घराण्यांपैकी चंदेळ प्रसिद्ध होते. असो, परमर्दीनें कुतुबुद्दिनास विरोध केला आणि महोबा सोडून कालंजरच्या कि- ल्ल्याचा त्यानें आश्रय केला, मुसलमान इतिहासकार लिहितात कीं तो शेवटीं शरण आला. कांहीं खंडणी, कांहीं हत्ती व कांहीं किल्ले देण्याच्या अटीवर तो मोकळा झाला. पण या अटी अमलांत येण्या- पूर्वीच तो मरण पावला, त्याचा सेनापति कालंजर किल्ल्याचे ठिकाण मजबूत समजून व परमर्दी उगीच शरण गेला असे मानून लढत

बुंदलखडचे चंदेल. २८३

राहिला. अर्थात्‌ कालंजरचा वेढा कायम राहिला. शेवटीं अवर्षणा- मुळें किछ॒यावर पाणी न राहिल्याने अजपालठास शरण जावें लागलें. किल्ल्यावरील सर्वे लढवय्ये बिनशत शरण येऊन क्षीण झालेल्या शरी- रांनी किछयाबाहेर पडले. कुतुबुद्दिनानें राज्य खालसा करून तेथें एक प्रांताधिकारी नेमला व तो दिछीस परतला. याप्रमाणे परमददी घराण्याचें यशास्त्री चारित्र संपळें. त्यांचा शेवटचा राजा-पराक्रमानें होवटचा नव्हे–परमदी होता.

परमर्दांच्या नांवावर किलहाननें सात लेख इ. स. ११६७पासून इ. स. १२० पर्यंतचे दिळे आहेत. त्यानंतर आणखी एक लेख इ. स. ११७३चा सांपडला आहे (ए. इ. १६), त्यांत त्याच्या पूर्वीच्या दोनच राजांचे नांव आलें आहे,पृथ्वीवर्मन्‌ आणि मदनवर्मनू, हे सर्वे लेख पाहतां असे दिसतें कीं, परमर्दी हा एक मोठा दाता होता. त्यानें अनेक ब्राह्मणांस अनेक गांव दिले (ए. इ. पा.१७०), इतकेच नव्हे तर तो मोठा विद्वानांचा आश्रयदाता होता,ए.इ.पा,२०० बर दिलेल्या लेखांत त्याची केलेली स्तुति उतरून घेण्यासारखी आहे. “€ याच्या राज्यांत त्रिरोधाचें नांबच राहिलें नाहीं. कारण लक्ष्मी आणि सरस्वती यांच्यामधील वैरह्दि त्यानें काढून* टाकलें.” याच्या राज्यांत सर्वे लोक सुखांत होते, आणि सव तऱ्हेचें धान्य समृद्ध होतें असेंहि वर्णन आहे. हा लेख इ. स. ११९५चा म्हणजे पृथ्वीराजांन परमदॉंचा पराभव केल्यानंतर तेरा वर्षांनीं केलेला आहे.

चेदेछुघराण्याचा मोठेपणा परमदीबरोबर संपला, तथापि हे घराणें बुंदेळखंडांत त्यानंतर बरीच वर्षे राज्य करीत राहिलें. त्रेलो- क्‍्यवमेन्‌ त्यामागून गादीवर आला. त्याचा पुत्र ्वारवमन्‌ यानें एक

*परस्परविरोधस्य तस्य राज्ये कथेव का । संगतं श्रींसरस्वत्योरापे येन प्रवार्तितम्‌ |

र्ट तिसरा हिंदु राज्ये.

लेख लिहिला आहे त्यांत तुकाच्या विपत्तिसमुद्रांतून भमीस वर काढणारा असें त्रेटोक्यवर्मनचे वर्णन केलें आहे. यावरून त्यानें कालंजर किल्यांतून तुकांस हांकलळं व चेंदेलांच्या पूर्वीच्या राज्याचा बराच भाग आपल्या अमलाखाली आणला.% किलुयावरीळ एका लेखावरूनहि किला परत घेतल्याचें शाबित होतं ( स्मिथ ). त्रेटो- क्यवमेन्‌ यानें १२०३पासून १२४५ पर्यंत बरींच वर्षे राज्य केलें. त्याच्या मागून त्याचा पुत्र वीरवर्मनू गादीवर आला. त्याचे बरेच लख सांपडले आहेत. ( किलहानंनें इ. स. १२५१ पासून इ. स १२८६परयंत पांच लेख दिले आहेत ). वर सांगितलेल्या इ. स. १२६१ च्या लेखांत ( ए. इं. १ पा. २२७) ह्याची राणी राजपूत दधीच वंशांतील ( यांना दाहिमाहि म्हणतात ) कल्याणदेवी नांवाची होती असें सांगितळें असून हा ठेख तिनें बांधलेल्या एका विहिर्रावर आहे. यावेळीं चेदेछांचें राज्य किती मोठें होतें हें सांगतां येत नाहीं. मदनवर्मनूच्या वेळेस चंदेछांचें राज्य दक्षिणेस मेछुस्वामी अथवा भेलसा येथवर होतें यांत हका नाहीं ( इं. ए. १६ पा. २०८ ). वीरवमनच्या मागे भोजवर्मनू राजा झाला. त्याचे दोन ठेख सांपडळे आहेत. पैकीं एक इ. स. १२८८चा आहे. यापुढे चेदेछधराण्याचा थांग लागत नाहीं. पण कोौरतसेनानें शीरशहास विरोध केळा आणि प्रसिद्ध पराक्रमी राणी दुगीवती हिने अकब- राच्या सेनापर्ताशीं लढाई देऊन भा. २ पा. १३३ यांत सांगितल्या प्रमाणे रणांगणावर देह ठेविला, या दोन हकीकती मात्र यापुढें मिळतात. हल्ली चंदेछांचे वंशज प्रसिद्ध बंगाल्यांतील गिधोरचे महाराज आहेत.

*त्रेलोक्यमलछश्व शक्यास राज्यं प्रसिद्धदुर्गप्रविधानवेघाः | तुरुष्ककुल्यांबुषििमग्नधाचरी समद्भाते विष्णुरिव प्रतन्वनू ॥

बुंदेळखंडचे चंदेल. २८५

महोबाच्या चेंदेल्लांची वंशावळ.

१ गंड (इ. स. १०००ते१०२० ) ले, १००२,१९,२२, ।

२ विद्याधर ( १०२०–१०३० ) |

३ विजयपाल ( १०३० -१०४० ) राणी भुवनदेवी ]

४ देववमन्‌ ५ कोर्तिवमन छे.१०९८ ( १०४०-१०६० )ले १०५१ ( १०६०८-११०० 3 | ६ सलक्षण (११००-१११०) | | । ७ जयवमेन ले. १११७ ८ प्रथ्वीवर्मन्‌ (१११०ते११२०) (१२२०ते१२२५)

९ मदनवर्मन्‌ (११२५-११६५) ठे. ११२९३०,३१,३९,५१ (8: ५५,५८,६२. प्रतापबमन्‌ यशोबमनन

] १० परमार्देदेव (११६५-१२०३) ले, ११६७, | ६८५३७२१५८२: ८४. ९५ १२९०१. ११ ल्लेलोक्यवर्मन्‌ (१२०३-१२४५)ले.१२१२, 1

१२ वीरवर्मन्‌ राणी कल्याणदेवी ले. १२६१,

| (१२४५-१२८७ )६२,६८,८१,८६, १३ भोजव्मन्‌ ले. १२८८.

२८६ तिसरी हिदु राज्ये. टिप्पणी. खजुराहो व महोबा, (सरव्हिन्थेन्ट स्मिथ, इं. ए. ३७.)

चेदेछांची जुनी राजघानी खजुराहो हल्लीं छत्रपूर अंस्थानांत महो- बांच्या दक्षिणेस एक क्षुलूक खेडं आहे. बुंदेटळखड अथवा जझोती ( जजाकर्मुक्त ) याची हुएनत्सांगने सांगितलेली प्राचीन राजधानी सागर जिल्ह्यांतील एरण होती (मद्रास येथील प्राच्य कोविदांच्या कान्फ- रन्समध्ये वाचलेल्या निबंधांत हिरालाल ही गोष्ट मान्य करीत नाहींत). जझोतीच्या मर्यादा हल्लीं जझोतिया ब्राह्मण राहातात त्यानें अद्यााहे निश्चित होते. पुढे सांगिल्याप्रमाणें बाराव्या शतकापासून ब्राह्मणांचे भेद त्यांच्या देशावरून पडले, अथात्‌ जझोतीमध्यें राहणारे ब्राह्मण जझोतिया ब चेदी या देशांत राहणारे ब्राह्मण रःजधानी त्रिपुरबरून तिवारी, त्याचप्रमाणें कनोजमध्ये राहणारे ब्राह्षण कनोजिया म्हटले जातात. असो, बुंदेलळलखडची राजघानी खजुराहो दहाव्या शतकांत मुसलमानी स्वाऱ्यांच्या बाहेर होती. आणि अकराव्या बाराव्या शतकांत महोबा राजधानी अस- ल्याने खजुराहो मुसलमानांच्या तडाक्यातून वांचलें. यामुळें सुदैवाने तेथील प्रचंड व सुंदर देवळें अद्याप जर्झांच्या तर्शाच आहेत,आणि त्यामुळे त्या का- ळचे हेंदूलोकांचे कलाकोशल्य व चंदेलांचें वेभ4 आणि धम,त्सुकय अद्याप आपल्यास दृष्टांस पडत. खजुराहो येथील सर्वांत मोठें देवालय म्हणजे घंगाने बांघलेलें खंडेरिया महादेवाचे देऊळ होय. त्याच्या खालोखाल त्याच राजाने बांघलेले विश्वनाथाचे व लालर्जाचें देवालय आणि त्याचा बाप यशोवमेन यानें बांधलेले रामचंद्राचें देवालय आहेत. याच काळात बांधळेलीं दोन जेन देवाल्येहि ५॥ाहण्यासारखी आहेत. देवी जगदांबी आणि कुंवरमठ ही स्थानंहि उत्तमांपेकी आहेत. वरील खजुराहो येथील देवालये उत्तर हिंदुस्थानांतील सवे देवालयांत आधक संदर असून त्यांची सुबक रचना, त्यांचे अवाढव्य प्रमाण आणि त्यावरील बारिक कोरीव काम हीं वाखाणण्यासारखी आहेत. त्यावरील वाटोळी शिखरें खांबांच्या आाधा- राशिवाय बनावेळेलीं असल्यामुळे विशेष लक्ष देण्यासारत्वी आहेत

बुंदेलखंडचे चंदेल. २८७

या कालविभागांत महोत्रा चंदेल़ांची राजधानी होऊन तेथाहि अनेक प्रेक्षणीय स्थळे निमाण झालीं आहेत. विशेषतः मागील व ह्याहि काल- विभागांतील चंदेल राजांनीं बांधलेल्या तलावांनीं महोबा नामांकित झालें आहे. पूर्वीच्या कालविभागांत राहिलानें राहिल्य-सागर बांधला, आणि या कालविभागांत कीर्तिवमनानें कौरतसागर बांधला. मदनव*च्‌ याने पूर्वोक्त मदनसागर व त्याच्या कांठावरील दोन काळ्या दगडाची देवा- लये आणि काकरिया मठ हे बांधले. बांदा जिल्ह्यांत महोबा हें हल्ल तहाशिलीचें ठिकाण आहे; आणि झांज्ी-माणिकपूर रेल्वेवरील एका स्टेश- नावरून त्यास रस्ता जातो.

चंदेलांच्या राज्यांत अनेक नामांकित किले होते. स्वात जास्त मइ-

त््वाचे ग्वाल्हेर व कालंजर हे किले अल्वेरूनांनाहे सांगितलें आहेत. कालंजर तर महाभारतकाळापासून शिवाचे पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या पहाडाच्या चारी बाजू उभ्या असून वर पुनः एक भिंत बांधलेली आहे; व वर जाण्याच्या रस्त्याला जागजागी दरवाजे बांधलेले असून तेहि फार पुराणे आहेत. ज्या वेळेस मुपलमानांनीं कालंजर घेतलें त्या वेळेस ब्रेलळोक्यवमन्‌ हा अजयरगड येथें कांहीं काल रहात होता. हाहि किला मोठा मजबूत आहे. कालंजर व अजयगड या दोन्ही किल्यावर अनेक ॥दाला-

लेख आहेत.

प्रकरण सहावे. ०-४” ४५८ € च ५-९ चदाच कलच्रा हहय राज. मागील कार्लविभागांत असलेळें ब या कालविभागांत जास्तच बैभवास चढलेले तिसरे राजपूत घराणें चदीचे हैहय रजपूत कुल होय. भा. २ पा. २११ वर सांगितल्याप्रमाणे हें घराणें प्रसिद्ध शुद्ध क्षत्रियांचे होतें; कित्येक कल्पना करतात त्याप्रमाणें नवीन झालेले अशुद्ध क्षत्रिय नव्हते.ते चंद्रवंशी होते व पुराणांत प्रसिद्ध असलेला रावणाला जिंकणारा सहस्त्रार्जुन याजपासून उत्पन झालेले होते. चदींच्या या काळांतील लेखांतहि ही गोष्ट सांगितली आहे. किंब- हुना एका लेखांत (इं. ए. १८ पा. ११६ ) त्यांचें गोत्र आत्रेय दिळें आहे. ही गोष्ट या काळच्या इतर कोर्रावटेखांत बहुधा सांप- डत नाहीं. यावरून असं दिसतें की, हें कुल घ्मामिमानी व धमा- चरणी होतें. त्यांच्या इतिहासावरूनहि हीच गोष्ट दिसल. बहुतेक राजपुतांप्रमाणें यांचे कुलदैवत शिव होतें. आणि त्यांची राजधानी जबलपुराजवळील त्रिपुर होती. त्रिपुर किंवा तिउर येर्थाळ तिवारी ब्र,ह्मण उत्तर हिंदुस्थानांतील ब्राह्मणांची एक प्रसिद्ध शाखा आहे.

या कालाविभागाच्या आरंभीं त्रिपुरांत गांगेय राज्य करीत होता. मागीळ भागांत याचा राज्यारोहण-काळ दर पिर्ढास वीस वर्षे धरून आम्हीं १०२० इ. दिला आहे. पण बहुधा तो राज्यावर यापूवी बराच काल आला असावा. या वंशांतील तो सवांत अधिक कौर्तिमान्‌ राजा होता. त्यानें सोनें, चांदी व तांबें यांचीं पुष्कळ नाणीं पाडली. तीं हलली पुष्कळ सांपडतात. व चमत्कार हा आहे कीं, याचीच न,णीं सांपडतात; याच्या मागून झालेल्या राजांची सांपडत नाहींत, या नाण्यांच्या तऱ्हेचे अनुकरण शाजारच्या कित्येक राजांनीं केळे व

0 क. र. »2. क > चेदीचे कलचुरी हेहय राजे. २८९

महंमद घोर्रानोहे केळें ( गोरीशंकरचा डॉड ), कनोजच्या प्रतिहार सम्राटांच्या पडत्या स्थितीचा फायदा घेऊन यानें विस्तृत प्रदेश जिंकले कनोजचे पूर्तेकडीळ प्रदेश त्या राज्यांतून सुट्टन गांगेयाच्या ताब्यांत आले. बनारस त्याचे ताब्यांत होतें. हें नियाळतगीननें बनारस लुट- ‘ल्याची जी हकीकत आम्हीं पूर्वी दिली आहवे तेथे सांगितठेंच आहे. (इोलि, २. बेहकी. )

त्यानें तेलंगण अथवा त्रिकलिंग यास प्राच्य चाटक्यांपासून ( यांस चोठानीं यावेळीं नष्ट केलें) जिंकून घेतलें. माळव्याच्या भोजाशाहि याचे युद्ध झाठें त्यांत याचा बहुधा पराभव झाला. पण परमार किंवा दी यांच्या लेखांत या गोष्टींचा दाखला मिळत नाहीं. गझुर्नाच्या महमुदानं यास त्रास दिळेला दिसत नाहीं. त्याची स्वारी चंदेछलांच्या कालंजरपर्यंतच गेली, पलीकडे गेली नाहीं. तथापि गांगेयाची कोौर्त एवढी होती कौं, अट्वेरूनीने त्याचें नांव सांगितलें आहे, चदींच्या ळेखांत याजविषयीं विशोष हकीकती सांगितल्या नाहींत. पण त्यास विक्रमादित्य ही संज्ञा त्यांत बहुधा लावली आहे (ए. इं.२ पा.३). त्याचा एकच लेख इ. स. १०६७चा सांपडला आहे ( किल्हॉर्न ए. इं.८ ) आणि बहुधा तो इ. स. १०३८मध्यें दिवंगत झाला असावा. म्हातारपणी तो प्रयागास जाऊन राहिला आणि तेर्थे वारला असें कांहीं लेखांत सांगितठें आहे. त्याच्या चितेवर शंभर राण्या जळून सती गेल्या ही एका चंदी कोरीवठेखांत सांगितळेळी गोष्ट बहुधा अतिरशयोक्ति असावी (ए. इं. २ पा. ३ ). त्याच्या मागून त्याचा पुत्र कर्ण गादीवर बसला. हा त्याहूनाह्यि जास्त महान्‌ राजा झाला त्याने अधिक विस्तृत प्रदेश जिंकले. त्याची सत्ता बनारस पर्लाकडे बिहारांत होती. बनारसेंत त्यानें कर्णमेरु नांवाचे देऊळ बांधलें. चेदींच्या लेखांत त्यास त्रिकलिंगाधिपाति असे म्हणलेलें आहे (ए. इं. २ पा. ३०८ ). त्यानें चोलांपासूनाहे तेळंगणाचा बराच भाग जिंकला.

२९० तिसरी हिदु राज्ये

त्यानें कर्णावती नांवाचें एक नवीन नगर वसवून तें वेदवित्‌ ब्राह्म- णांस अमग्रह्मर दिळें ( ए. इ. २ पा. ३ ). हें हृछीं तेऊर जवळ कर्ण बेळ नांवाचे खर्डे आहे. त्यानें अनेक राजे जिंकले. या राजांची यादी नेहमीप्रमाणं चोळ, पांडय, मुरल, अंग, बंग, कलिंग या नांवानी भरलेली आहे. चंपारण्य यानें उध्वस्त केळें असे ( ए. इ. २ पा. १० ) सांगितळें आहे. किल्हॉनेच्या मत चंपारण्य म्हणजे मध्यप्रांतार्ताळ एखादी अप्रासेद्द जागा असावी. पण रा. जयस्वालाने हे बिहारांतीलटच प्रसिद्ध चपारण्य होय असें योग्य रीतीनं अर्लाकडे दाखविळें आहे. आणि त्या देशापर्यंत कणीनें प्रदेश जिंकला यांत संशय नाहीं ( बिहार व ओरिसाचे जनंढळ १९२४ ). एकर छत्तीस राजे त्याची सेवा करीत होते ( गोरीशुंकरचा टॉड ). भोज मेल्यावर त्यानें माळवा उध्वस्त केला, आणि त्याच्या पुत्रास देशो- घडीला लाविलें हं पूर्वी सांगितठेंच आहे. ही हकीकत परमारांच्या नागपूर प्रशस्तींत सांगेतलटी आहे. पण चेदीच्या कोरीव लेखांत ती दिटेटी नाहीं याचें आश्चर्य वाटतें. बहुधा माळवा कणीच्या ताब्यांत थोडा’च वेळ राहला; आणि तो उदयादित्यानें लवकरच परत घेतला, यामुळे चदीच्या लेखांत ह्या विजयाचे महत्व नाहीं. दुसरा एक लट्ख ( इं. ए. १८ पा. २१६ ) त्यानंतर दभर वर्षांचा असून त्यांत त्यानें जिंकलेल्या दक्षिण देशांत चोळ आणि पांड्या, पूवी देशांत हण आणि गोड आणि उत्तरेकडे गुजर आणि कौर असे सांगितटळे आहेत. अर्थात्‌ त्याचा विजय उत्तरकड हिमा- ल्यापयंत गेटला होता. ही गोष्ट खराखरच संभवनीय [दिसते कां उत्तरेकडे गुजर म्हणजे प्रतिहार सम्राट तुकारचें मांडलिकत्व मानून होते त्यांस कर्णाने जिंकून तुकांस देशांतून हाकटून दिलें. ही गोष्ट कणाचे नांव गाहडवालांच्या टेखांत ज्या रीतीनें आठें आहे त्यावरून निश्चित दिसते. ह्या डेख ( इ. ए, १४ पा. १०३ ) पूर्वीच उछे-

चेदाचे कलचुरी हेहय राजे. २९१

खिला आहे. परकी राष्ट्रांच्या लेखांत मिळालेला हा पुरावा अत्यंत

महत्वाचा असून तो पुढीलप्रमाणे आहे, “भोज स्वर्गास गेला आणि

कर्ण कीतिदोष झाला, तेव्हां पृथ्वीला अतिराय त्रास झाला. परंतु तिळा गाहडवाल चंद्रदेव याच्या ठिकाणीं आश्रय मिळाला. ) या वाक्‍्यांतीळ भोज माळव्याचा आहे आणि कर्ण हा चदीचा राजा कर्ण आहे. या दोघांनी तुकोशीं युद्ध करून मध्यदेशास त्यांच्या त्रासापासून मुक्त केलें होतें. भोजानें सुमारे १०२० पासून १०४० पर्यंत आणि कर्णानें बहुधा १०४० पासून १०८० पर्यंत. चंद्रदेवानें कनोज जिंकून निर्माल्यबत्‌ झालेल्या प्रतिह्यारांचा या सुमारास उच्छेद केला. ‘ जेव्हां पृथ्वीस त्रास झाला ? ह्या वाक्यांत तुकाच्या वारंवार होणाऱ्या स्वाऱ्यांचाच उछ्लेख आहे. या काळांत यांचे राज्य पंजाबांत कायम झाल्यानं तेथील राजधानी लाहोर येथून मध्यदेशांत ते वारंवार स्वाऱ्या करीत. या प्रकारची एक स्वारी इ. स. १०५०त लिहि- णाऱ्या!” बेहकीनें वर्णिली आहे. तो म्हणतो, “’ लाहोरचा सुभेदार नियाल्तगीन याने बनारसेवर स्वारी केळी. या शहरास महमूद सुद्धां पोहोंचला नव्हता. नियाळतगीनानें इ. स. १०३३त काशीत पोचून बाजार लुटला. या वेळेस तेथें गंगाचें ( गांगेयाचें ) राज्य होतें.!? पण हें बहुधा पूर्ण बसलें नव्हते. करणाने शेवटीं बनारस आपल्या पक्के ताब्यांत घेतलें; आणि उत्तरेकडे हिमालयाच्या डोंगरांतील कौर लोकांवरहि स्वारी केली. अर्थातू त्यानें तुकांचा जुळूम अगदीं मिटविला. बिहार व चेपारण्य हें सुद्धां त्यानें जिंकले.

भोजाच्या प्रसिद्ध उदाहरणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न प्रत्येक हिंदु राजा करूं लागला, त्याप्रमाणें कर्णानोहे बिद्वानांस आश्रय दिला. ही गोष्ट एका लखांत सहजगत्या आली आहे. “’ त्याची कोर्ति

२९२ तिसरी हिदु राज्ये. कववीनीं वाढविली व त्याच्या मनाचं इंद्रियाप्रमाणें विनोदन केलें%?” (इं. र. १८ पा. २१६ ). या कवींची नांवें अजून समजलीं नाहींत. कदाचित्‌ संशोधकांचे लक्ष इकडे अद्याप गेलें नसावें.

करणाने बरींच वर्षे राज्य केळे असा समज आहे. किंबहुना तो बाराव्या शतकाच्या आरंभापर्यंत राज्य करीत होता असे मानतात. पण वरील बाहडवालांच्या लेखांत चेद्रदेवानें कर्ण वारल्यावर ( इ. स. १०९०वच्या सुमारे ) कनोज जिंकले असं सांगितलें आहे. यासाठीं कर्णाचा राज्यकाळ इ. स. १०४० ते १०८० पर्यंत अम्ही मानता. त्यानें कळचरी घराण्यास यशाच्या शिखरास पोहोंच- विले; सदेवानें त्याचा पुत्रह्ि हें यश पुढें चालविण्यास योग्य होता

हा पुत्र यशःकर्ण कणांची एक राणी हूण राजकन्या अब्े्लदेवी हिच्या पोटीं जन्मलेला गादीवर आला. यानेंहि पुष्कळ वर्षे म्हणजे इ. स. १०८० पासून सुमारें इ. स. ११२४पर्यंत राज्प केलें. यानें आंत्राचा पराभव केला असे लिहिळें आहे. यांत दक्षिणच्या चोळ राजांचा किंव्रा कठिंगनगराच्या गंगांचा त्यानें पराभव केला, असा अर्थ होतो.गोदावर्राच्या मुखाजवळ आंध्र देशांत असलेल्या भीमे- श्वरशिवाचें त्यानें पूजन केळे अते वर्णिलठें आहे (ए. इं. २ पा. ३). याच्याह्े ल्खांत इ. स. ११२२ त हौ गोष्ट सांगितलेली आहे. गाहडवालानीं कनोज घेऊन उत्तरेस आपली सत्ता स्थापन केल्या- मुळें याचा उत्तरेकडील राज्यविस्तार संकुचित झाला असला पाहिजे. गोविंदचंद्राने यानं इ. स. ११२० त केलेळें एक दान पुन: कायम केलं, यावरून उत्तरेकडील याच्या राज्याचा कांहीं भाग कनोजच्या ताब्यांत होता असें स्पष्ट दिसते.काशी तर चंद्रदेवाच्या लेखांत सांगि-

  • अनयन्त परागाड यराःसवदन! [श्रयः

| नोविनोदनेयेस्य कवीन्द्रेरिन्द्रियेरिब ॥

चेदीचे कलचुरी हेहय़ राजे. २९३

तल्याप्रमाणे त्याच्या ताब्यांत गेलीच होती. माळव्याचा लक्ष्मदेव यानेंहि याचा पराभव केला असे सांपडतें,

__ यशःकणीमागून त्याचा पुत्र गप्रकर्णदेव गार्दावर आला. यानेंद्वि ‘ पुष्कळ वर्षें जोरानें राज्य केळें अपे कोरीत्ठेषखावरून दिसतें. मेवा- ‘डच्या गुहिलोत घराण्यांतीळ राजकन्या आल्हणदेवी ही ह्याची ‘राणी होती. तिनें एक कोरीवलेख केला असून तिची कुलपरंपरा त्यांत येणेप्रमाणे दिळी आहे (भेराघाट लेख ए. इ. १ पा. १० ). “ शोभिलगोत्रांत हंसपाळ राज, झाला, त्याचा पुत्र वैरिसेंह, त्याचा पुत्र विजयसिंह, त्याची राणी धारा नगरीचा राजा उदयादित्य याची कन्या शामलादेवी होती. तिची मुलगी आल्हणदेवी. /? या वर्ण- नावरून दोन तीन गोष्टो दिसतात. रजपूत लोक कुलनांवालाच यावेळीं गोत्र मानू लागळे. गोभेळ म्हणजे गोहिळ कुलनांत्र होतें. रजपूत क्रषिगोत्र कमी महत्वाचे मानूं लागळे असावे. कारण क्ररषि- गोत्र पुणेहिताचे आहे, अशी कल्पना यावेळीं चाळू झाली. यावे- ळच्या कुठनामांतच गोत्र म्हटळेळें कित्येक लेखांत आढळतें. दुसरें, गुहिलोत राजांचा वंश मेत्राड लेखकांनी हंसयाठ, वैरितेंह, विजप- सिंह अता दिळेळा यावरूनहि बरोबर ठरतो. ह्याविषयी पूर्वा आप- ल्यास थोडासा संशय आलेला होता (इं. ए. १८ पा. २१६ पहा ). ३ यांत मेत्राडच्या ऐवजीं प्राग्वाट हा ऱाब्द वापरला आहि. याचा अर्थ काय हें नीट समजत नाहीं. पण प्राखाटांत माळ्याचा अन्तर्भाव निःसंशय दिसतो व उदयादित्य परमार माळध्याचा राजा घारानगरीत राज्य कर्रांत होता असे स्पष्ट दिसतें. शेवटली गोष्ट ही कीं, चदीचे हेहय कुल उत्तम रजपूत कुल मानठें जात होतें; आणि म्हणूनच मेवाडच्या गुहिलोताशीं ब माळ्याच्या परमाराशीं त्यांचा विवाहसंबेध झाला, हीं दोन उत्तम रजपूत कुठें होतीं. त्याचप्रमाणे पाख्रेराज चव्ह्माणाची आई म्हणजे सोमेश्वराची राणी ही कुलचूरी

२९७ तिसरी हिंदु राज्ये.

राजकन्या होती हें पुढें आम्ही सांगूं, ही बहुधा आल्हणंदेवीचीच
मुलगी असावी किंवा तिचा पुत्र नरसिंहवमन्‌ याची कन्या असावी.
हा लेख इ. स. १०५५ चा आहे. यावेळीं बहुधा तिचा
पुत्र नरसिंहवर्मन्‌ अल्पवयी असून त्याची प्रतिनिधि ती होती.
यशाःकर्ण याचें राज्य इ. स.११२४ त, व गयकणाचे राज्य इ. स.
११५४ त संपले असावें. त्याचा एक लेख इ. स.
११५१ चा मिळाला आहे (इं. ए. १८ पा. २१० ). नरसिंह-
वर्मन्‌ याचे तीन लेख सांपडले आहेत, ११५५, ११५८, ११५९.
हा लौकरच तरुणपणी वारला. पण याचा राज्यकाळ महत्त्वाचा
आहे, कारण याच्या कोरीवलेखाच्या काळापासून चेदीराजांच्या
पदवींत एक फरक झाला. हा व याचे पुढचे राजे “स्वभूजसंपादित-
नरपतिगजपतिअश्वपातिराज्यत्रयज्ेता ! अशी पदवी घेऊं लागले.
वामदेवपादानुध्यात ‘ असेंहि ते आपल्यास म्हणवूं लागले. या पदवीचा अथ मळींच लागत नाहीं. कारण यांचे पृवेज तेच गांगेय कर्ण, यशःकर्ण, गयकर्ण दिळे आहेत. असे दिसतें की, पहिली पदवी यानीं कनोजच्या गाहडवालांच्या अनुकरणाने घेतली. गाहड- वालहि आपल्या लेखांत यावेळेपासून पुढें ही पदवी घेतात. (गोविंद- चंद्राचा दानलेख ११६८ चा इ. ए. १५ पा. ७ ). कनोजचे प्रति- हार सम्राटू यांस हयपति ही संक्षा होती हें आपल्यास आठवेलच. आणि बंगालचे राजे गजपाते होते (भा. २ पारोशीष्ट ६ पा. ४४९). बहुधा आंध्रांच राजे नरपति संज्ञाक असावेत; आणि ज्यानें या तीन राजांस जिंकले, त्यानें ‘ नरपतिगजपत्यश्चपतित्रेराज्यजेता ‘ ही पदवी घेण्यास हरकत नाहीं. गाहडवाटांनीं कनोज, बंगाळ आणि आंघ्रहि जिंकले होतें; आणि चदीनींहि जिंकले होतें. यामुळें या दोघांनींहि ही. पदवी घेतली असावी. नरसिंहान घेतलेडी ही पदवी भपक्‍याची दिसते तरी तो शूर होता, आणि त्यानें आंध्रांस जिंकळें होतें. पण त्याचा

चेर्दाचे कलचुरी हेहय राजे. २९५

पूर्वज कर्ण यानें कनोज, बंगाल, व आंध्र या तिघांस जिंकलें होतें. आश्चर्य हें की, कणाने आपल्या लेखांत ही पदवी घेतली नाहीं, त्याचा पणतु नरतिंह यानें घेतली,

इ. स. ११६९च्या त्याच्या लेखांत नरासंहाला ‘ डहालिया महा- राज ‘ असं म्हटलें आहे (इं. ए. १८ पा, २१४ ). यावरून बुंदे- लखंडच्या कांहीं भागाचा तो राजा असावा असें दिसतें. यमुना- नदीवरील कोसंबी जथळच्या घाटावर त्याने एक देऊळ बांधलें, ल्या- वरून त्याची सत्ता यमुनेपर्यंत असावी.

नरासेहानें इ. स. ११५२पासून इ. स. ११७० पर्यंत राज्य केलें असं मानतां येईल. त्याच्या मागून त्याचा भाऊ जयसिंह गादी- बर आला, इ. स. ११७५व१ १७७च्या सांपडलेल्या त्याच्या दोन लेखांत त्यानेंहि वरील पदव्या घेतल्या आहेत. त्यानें बहुधा इ. स. ११७८पर्यंत राज्य केळे. कारण त्याचा पुत्न विजयसिंहवर्मन्‌ याचा ११८०चा लेख सांपडला आहे. याचा ११९६चा आणखी एक लेख सांपडला आहे ( इं. ए. १७ पा, २२८ यांत नक्की तारराख २७ ऑक्टोबर ११९५ दिली आहे ). गौरारंकरानें यानंतर आणखी दोन राजे म्हणजे शेवटल्याचा पुत्न अजयसिंह आणि त्रैलोक्यवर्मन्‌ सांगितले आहेत. विजयपालाच्या इ. स. ११८०च्या लेखांत अजय- सिंहाचे नांव आलें आहे, आणि त्रैलोक्यवमन्‌ याचा इ. स.,१२४१ चा लेख सांपडला आहे. या घराण्याचा अंत कसा झाला हें सांपडत नाहीं. बहुधा अलतमश किंवा त्याचा मागचा सुलतान याच्या वेळीं मुसलमानांनी तें नष्ट केळं असावें. या घराण्याच्या मोहोरेवर दोन हत्ती आणि मध्यें लक्ष्मी असें चिन्ह आहे व त्यांच्या निशाण!वर नंदी आहे.

२९६ तिसरां हिंदु राज्ये.

त्रिपुरच्या हेहयांची वंशावळ. १ गांगेय ( १०१०-१०३८) ले. १०३७ २ कुंग (१०३८-१०८० ) ले, १०४२ राणी आवेल्हंदेवी हूणकन्या. ३ की ( १०८०–११२४) ले. ११२७,११२२.

| ४ गयकर्ण (२१२४–११५२) ले. ११५१ | राणी आल्हणदेबी गुहिलोत कन्तप्रा. काता कल लह. 0 0. का वताना ‘५ नरसिंह ( ११५२–११७० ) ६ जयासेंह (११७०-११८०) ले. ्र५५,५४,५६. ले. ११७५,७७.

७ विजयासह ( ११८०–११९८ ) ले. १ १८०,११९६ टॅ यित ( गोरीशकर टॉड ) ९ वा टिप्पणी–कलचुरींची गजधानी तिवर अथवा त्रिपुर, ( जबलपूर गॅझेटियर १९०८ ) ्

प्राचीन हिंदुस्थानांत कलचूर्रांची राजधानी त्रिपुर हे प्रसिद्ध शहर होतें. त हल्ली मोडकळीस आलेले असून जबलपूरपासून दहा मेलावर अस- लेल्या हल्लोच्या तेवर खेड्याच्या रूपाने अवशिष्ट आहे. हा गांव माबळल रॉक्स म्हणजे नमंदेच्या काठी असलेले संगमरवरी पहाड याजजवळ आहे. तिवरजवळ इसवी सनाच्या तिसऱ्या दातकायासूनचे लेख सांपडतात. त्रिपुरजअळ कणांनें वसविलेळें कणीवती शहराहि सध्यां मोडकळीस आ- लेळें आहे. त्याठिकाणी हल्ट्रीचें क्णबेल नांवाचें खेडें आहे. येथे बेलाची पुष्कळ झाडें असल्यानें या नांबांत बेल शब्द आला आहे. ( कदाचित्‌ या शहरांत कणानें बसविलेले ब्राह्मण बहुतेक शेव असून शिवपूजेस

चेदचे कलचुरी हेहय राजे. २९७

लागणाऱ्या ब्रिल्व पत्राकरितां त्यांनीं बेलाचीं झाडें लाविलीं असावीं ), शहराच्या अवश्षेषापैकीं तुंदर कोरलेल्या मू्तीशिवाय येथें कांहीं उरलें नाहीं. कारण येथील घाट आणि देवळे यांतील दगड व विटा रेल्वेपूल मोर्‍्या वगेरे बांधण्याकरिता हल्लीच्या काळांत कंत्राटदारांनी नेळे आहेत. एक जुनी पायऱ्यांची विहीर मात्र नुकतींच सांपडली आहे. ती झाड-

झुडपांत गडप झाली हाती. या व्रिहीरीचें पाणी गांवकऱ्यांना उपयोगी पडतें. एक विस्तीणे तलावहि या मोडलेल्या नगराजवळ आहे.

प्रकरण सातवे. अनहिलवाडचे चालुक्य.

गुजराथच्या चाटुक्यांच्या ( सोळेबाचा ) इतिहास बॉंबे गॅझेटियर व्हॉ. १ भा. २ यांत जैन लेखांवरून व तत्कालपर्यंत सांपडलेल्या कोरीव लेखांवरून संगृहीत करून विस्तृतरीतीनें व उत्तम तऱ्हेने दिला आहे.त्याचे मुख्य आथार जेन ग्रंथाचा म्हणजे हेमचंदाचें द्याश्रयकाव्य आणि मेरुतुंगाचें विचारश्रेणी ज्यांत निरनिराळ्या राजांच्या कार- कीदींच्या मित्याहि दिल्या आहेत हे होत. परंतु हे आधार व इतर प्रबंध यांत अनेक काल्पनिक किंगरहुता खोट्या गोष्टी अद्भूवरस वाढ- विण्याकारितां दिठेल्या असल्यानें सरळ इातेहासाला त्या गोष्टी टाकून देणें भाग आहे.शित्राय हिंदु काळच्या भारततर्षाच्या सामान्य इतिहासाला या गोष्टींचे फारसें महत्व नाहीं. यासाठीं चालुक्यांची हकीकत देतांना महत्वाच्या व अत्यंत साधार अशाच वृत्तांवर आम्ही लक्ष पुरवू. ह्याशिवाय गेझेटियरनंतर जे कोरीव ठेख नवीन उपलब्ध झाळे आहेत त्यांतील माहिती संग्रहीत करू. े

प्रथम गोष्ट ही सांगितली पाहिजे कीं ही चोटक्यपरपरा दक्षि- णच्या चालूक्यांहून भिन्न आहे. जरी त्यांचें नांव एक दिसते आणि जरी प्राचीन कवि व बखरकार यानीं त्यास एक मानलेले आहे, तरी दुसऱ्या भागांत सांतितल्याप्रमाणें निरनिराळ्या रजपूत कुलांच्या गो- त्रांस फार महत्व आहे, आणि ब्राह्मणांत कुलनांब एक असलें तरी ब्राह्मणांत गोत्रभेदानें जसा कुलभेद होतो त्याप्रमाणें क्षत्रियांताहि होतो. कारण हीं गोत्रे त्यांचीं स्वतःची असून विज्ञानेश्वराच्या वेळे- पासून पुरोहितांचीं गोत्रे आहेत असें मानण्यांत येऊं लागलें, पण तसें तं नाहीं. दक्षिणच्या चालुक्यांचें गोत्र मानव्य आहे. हें त्यांच्या

अनहिळलवाडचे चालुक्य. २९९

| सहाव्या शतकांतील लेखांतच स्पष्ट आहे.दक्षणचे उत्तरचालु- म्य तैलप वंगेरे याच कुलांतले होते.त्यांनी आपल्या लेखांत आपले गोत्र देळेळे नाहीं. गुजराथच चालुकयह्ि आपल्या लेखांत आपलें गोत्र देत नाहींत, तथापि एका चदींच्या लेखांत त्याचें गोत्र भारद्वाज दिलेलें आढळतें (एपिं. इं. भा. १ पा. २५३ ). हा लेख दहाव्या शतकां- नला आहे. तसंच प॒थ्वीराजरासामध्यें चदानें चालक्यांचे हेंच गोत्र दळें आहे. हछींहि रेवाचे व गुजराथचे सोळेखी हेंच आपले गोत्र

रेतात. तेव्हां प्राचीनकाळापासून यांचें गोत्र भारतद्राज आहे, असें नेश्चित दिसतें. अर्थात्‌ सहाव्या व दहाव्या शतकांतील दक्षिणचे [लुक्य आणि गुजराथचे चालुक्य हे भिन्न आहेत. जरी गेझेटियर ग त्याचप्रमाणे पंडित गोरीशंकर ओझा दोन्ही कुलास एक मानतात, वरी आमच्या मतें ते भिन्न आहेत. दुसरी गोष्ट अशी कीं, ज्या भागांत या चाठ्क्यांचं राज्य स्थापित पराठे, त्यास ‘गुजराथ’ ही संज्ञा अद्याप मिळाली नव्हती हें वाच- कांनीं लक्षांत ठेवावे.त्यांची अनहिलवाडपट्टण ही राजधानी सारस्वत- मंडळांत होती.आणि याचसाठीं मथळ्यांत यांस गुजराथचें चालुक्य न हणतां आम्ही अनहिलवाडचें चालटक्य असें म्हटलें आहे. गझे- टेयरनें गुजराथचं चाळेक्य असं नांब दिलें आहे. पण या कुलाचा यंस्थापक मूलराज याच्याच लेखांत असं म्हटलें आहे कॉ, यानं रस्वतमं&ल संपादन केलें ( इं. अँ. ६ पा. १). बाराव्या शत- मध्याच्या सुमारास मात्र चालुक्यांच्या लेखांत त्यांच्या देशाचे व गुञरभूमि असें येऊं लागलें. (इं, ए. ६ नं. ४ मि. संवत्‌ १२८० अथवा १२२३ इसवी ). या आमच्या मताला अनुकूल ए. दिवाट्या यांचेंहि मत आहे.गुजराथ हें नांव दहाशेतीस इसवीपेर्यंत ( अलबरेरूनीनें आपल्या ग्रंथ यावेळीं लिहिला ) जयपुरच्या भोंव- नालीळ प्रांताचे होतें. तें तेथून दक्षिणेकडे कां आळे आगि प्रथम

३०० तिसरी हिंदु राज्ये.

ह्छांच्या गुजराथच्या उत्तरभागास आणि नंतर हल्लीच्या गुजराथच्या दक्षिणभागास लाट ही संज्ञा होती, त्यासाहे कां लागूं झालें, या प्रश्नाचा योग्य निर्णय अद्याप झाला नाहीं. परंतु या देशास हें नांव येथील राज्य करणारे चालुक्य गुर्जर किंवा गुजर जातीचे होते म्हणून मिळालें ही कल्पना चकीची आहे.पूवेभागांत दिटेळे आमचं मत अद्याप कायम आहे, कारण हे चालुक्य अथवा सोळंखी आपल्या कोणव्याहि लेखांत आपल्यास गुजर म्हणत नाहींत. दुसऱ्या राजांच्या लेखांत ल्यास गुर्जरराजे असे म्हटलें आहे; आणि तेहि आपल्या लेखांत बाराव्या शतकाच्या मध्याच्या पुढ आपल्यास गुजेरभूमाच राजे ग्हणवतात; तरी पण गुजरजातीचे किंबा वगाचे हे राज होते असे त्यानीहि किंवा इतरांनहि म्हटलेले नाहीं. यामुळे गुजराथ हँ नांव या प्रान्तास दुसऱ्या कारणामुळें पडलें हा ।नश्चय आहे.

अ डबुवाथबअअअजयययवन्खकक यश कभ करळाटससििॉगॉऑऑििबि न य”… -.

तिसरी गोष्ट सांगणें जरूर आहे ती ही कीं, हे राजे शैव म्हणजे शिवभक्त होते. ।कित्येकांची समजत आहे त्याप्रमाणें हे कधीहि जन झाले नाहींत. हे राजे परमतसाहिष्णु होते; आणि सव हिंदु- लोक तसेच असतात,.परतु याहिपठीकडे जाऊन ते जेनसाधूरंचे प्रशं- सक व आदर करणारे होते. पण या वेळच्या इतर सर्व रजपुता- प्रमाणें ते हिंदू आणि शिवभक्तच राहिले. त्यांच्या टेखांत त्यांनीं आपल्यास कोठेंच जैन म्हटलेळें नसून या लेखांच्या प्रारंभी जिनाची

कोठेंहि स्तृति नाहीं, नेहमीं शंकराची स्तुति असते. किंबहुना या कालांतील प्रसिद्ध जैन महापंडित हेमचंद्र याचा कट्टा शिष्य राजा

कुमारपाल हाहि आपल्यास शिवभक्त म्हणतो,आणि याचे वर्णन कोरीव

लेखांत “पावताश्रसादटब्धलक्ष्मी’ असेंच येतें.शिवाय त्यानें शिवाची.

अनेक देवाल्यें बांधिटी. वस्तुतः या कुलाचा देव सोमनाथ होता.

सोमनाथाचें प्रासिद्ध स्थान त्यांच्या देशांत व ताब्यांत होतें. कुमार-

पालानें पुढें जैनधमे स्वीकारला असें जेन लेखक दाखविण्याचा

अनहिलवाड्चे चालुक्य ३०१९

प्रयत्न करितात हें खर. किंबहुना सोळेखीराजांप्रमाणे चावडा राजेहि जेन होते असे ते म्हणत. परंतु सोळेखींच्या अमलांत तयार झालेले कोरीवटेख अशा समजुतीस मुळींच आधार देत नाहींत. यामुळे हे राजे नेहमीं रौवच राहिळे, जरी जेनधमाठा ते मदत करीत आणि यांच्या राज्यांत पुढे सांगितल्याप्रमाणें जैनथमांचा जरी उत्कष झाला तरी हे हौवच होते असच आपल्यास मानलें पाहिजे.

॥ या तीन मुख्य मतभेदाच्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यावर बॉँबे- गॅझेटियर व्हॉ. १ याच्या मुख्य आधार आम्ही अनहिलवाडच्या चालु- क्यांचा इतिहास सारांशरूपानें पुढें देत आहों. या कुटाचा संस्था- पक मूळराज होता. तो पाटणच्या शेवटच्या चापोत्कट राजाचा ॥भाचा होता. बहुधा या राजाच्या वेळीं राज्यांत अंदाधुंदी माजली ॥असावी, आणि मूलराजाने आपल्या बाहुबलाने राज्य संपादन केलें |आणि व्यवस्था लाविटी, असंच वर्णन नेहमीं कारीवळेखांत येतें. गुञजराथचे बखरकार मूलराजान आपल्या मामास ठार मारून राज्य अन्यायाने हस्तगत केळें अशी जी हकीकत सांगतात ती बहुधा खरी नसावी. इ. स. ९६१ पासून ते इ. स. ९९६ पर्यंत न्यायानं आणि जोराने सव कुलसंस्थापकांप्रमाणे मलराजानें राज्य केळे. शाजारच्या राजांशी म्हणजे कच्छच्या व सिंधच्या राजांशी त्याचे पुद्रप्रसंग झाठे. त्य’नें पूवीच मोठें असलेळें एक राज्य हस्तगत केळे होतं, तेव्हां त्यास आपली सत्ता व आपला हक्क पराक्रमाने कायम करणे जरूरच होते. कच्छचा खेंगारराजा याच्या मदतीनें उठलेल्या ।“ ग्रहरिपूचा !? त्यानें पराभव केला. यास सिंधच्या अरबांचीहि प्रदत होती, व त्याजपासून त्यानें सोमनाथाच्या कबजा घेतला असें १्णन आढळतें. प्रहरिपु हें नांव नसून अन्वथानें चावडा कला- पैकी कोणी मांडलिक बंडखोर असावा. दक्षिण व उत्तर कडील राजे | म. भा…२०

३०२ तिसरी हिदु राज्ये.

म्हणजे लाटचा बारप व सांबरचा विप्रहराज याशींहि मृलराजास लढावें लागळें. बारप हा कनीटकाचा राजा तेळप याचा सेनापति असावा. कारण परमारांच्या लेखांत कर्नाट आणि लाट हवे नेहमीं एकत्र येतात. ठाट हा एक मांडलिक प्रांत असून तेथे एक कर्नी- टकचा प्रांताधिकारी राज्य करी. बारप टढाईत मारला गेला असें वणंन आहवे. मूलराजानें या दो-ही राजांशीं निरनिराळी ठढाइ देऊन त्यांच्या स्वाऱ्यांचा प्रतिकार करून आपळे राज्य सुरक्षित ठेवले. यानंतर म्हातारपणी मूळराजानें आप आयुष्य धार्मिककुत्यांत घाटविळें.. त्याने पाटण येथे एक शित्रालय बांधले. हिंदूस्थानच्य, निरनिराळ्या. गांतून विद्वान ब्राह्मण बोलावून त्यानं सिद्धपूर वंगेरे ठिकाणी त्यांस, वसविले. ग॒जराथतीळ ओदीच्य व गोड ब्राह्मण आपण मूठराजाच्या वेळेला आठो असें मानतात मलरांजानंतर ब्याचा पुत्र चामुंड गार्दावर वसला. त्यानें इ. स ९९७ पासून इ. स, १०१० पर्यंत राज्य केळें असं जन बखर- कार म्हणतात. यानें माळव्याचा सिंधुराज यास टढाइत ठार मारळें असें कुमारपालाच्या वडनगर-प्रशस्तींत . वर्णन आहे. या लढाईची तारीख पडेत गोरीरकरानं इ, स. १०१० मानली जाह. ( भा. २ १२३ पहा ). या वषाच्या नंतर ती मानणें शक्‍य नाहीं; पण ती यापूर्वाहि झाठली असूं हकळ. कारण पूर्वी सागितल्याप्रमाणं माळव्याच्या भोजाचा राज्यारंभ इ. स. १०१० च्या पूर्वाहे दिसतो मुंजानें मटराज काशीयात्रस जात असतां त्याचा अनादर केला आणि चामुंडानें याबद्दढ सूड घेतला अशी जी गोष्ट सांगतात तौ कल्पित असावी | चामुंडाला तीन पुत्र होते. वभ, दुर्टभ आणि नागराज, ज्येष्ट गादीवर बसला व थोडाच वेळ राज्य करून मरण पावला, यामुळें त्याचें नांव कोरीवटेखांत पुष्कळ वेळ येत नाहीं. त्याचा भाऊ दुलभ

अनहिलवाडचे चालुक्य ३०३

त्याच्यानंतर गादीवर आला. त्यानें इ. स. १०१० पासून १०२२ पर्यंत बारा वर्षें राज्य केलें. याच्या कारकीदीत विशेष गोष्ट झाठेठी

॥समकाटीन होता. हेहि मोठे बलवान्‌ व पराक्रमो राजे होते १|भोजाशीं झालेल्या याच्या लढायांचें वर्णन पूर्वी आलेंच आहे. असें हणतात कौ, कर्णाने भोजाचा पराभव केला, त्यावेळीं भोजानें एक पुवरणाची पाटखी त्यास नजर केटी. भीमाने भोज व कर्ण या

॥ोष्टी खऱ्या किंवा खोट्या असोत, हे तिन्ही राजे मोठे पराक्रमी असून यांच्यांत वारंवार लढाया चाळत व मधून मधून मैत्री व एकी होई यांत हेका नाहीं. कर्ण आणि भीम मिळून भोजाच्या मृत्यू-

॥३

। या राजाच्या वेळीं गझनीच्या महमुदाची प्रासेद्ध सोमनाथावरील स्वारी झाली, ही स्वारी खरोखर झाली कां नाहीं याचा आम्ही अन्यत्र विचार केला आहे. सोमनाथ येर्थांळ एका कोरीवटखांत असं “वणन आहे कीं, “भीमानें सोमनाथाच्या पूवीच्या ठांकडी देबळांऐवजीं “दगडाचे देऊळ बांधिळे. !? आतां उदेपूर प्रशास्तीमध्ये भाजाने सोम- नाथाचे देऊळ बांधिळें असें वणन असल्याच आपण पाहिळेंच

३०४ तिसरी हिंदु राज्ये आहे. गॅजझेटियरमध्यें सोमनाथाच्या टेखाचा ठाव ठिकाणा ऱ् नाहीं, त्यामुळे तो ठेख काय किंमतीचा आहे हे आम्हांस सांगतां. येत नाहीं. आपल्यास अशी कल्पना कारितां येईल की, भोज आणि भीम, दोघांनी मिळून दगडी देऊळ बांधिले. वब खरोखर पाहतां भीमाची मान्यता व मदत मिळाल्याशिवाय भोजास देऊळ बांधणें, शक्‍यच नव्हते

भीमाच्या मागून त्याचा दुसरा मुटगा कर्ण हा गादीवर | | वडील मुलगा मूळराज बापाच्य, ह॒यातींतच मेला होता. कणानें इ. स.) १०६४ पासून इ. स. १०९४ पर्यंत शांतपणें राज्य केलें. कर्णसर नांवाचा एक तलाव त्यानें बांधला, त्यानें एक नगर बांधून त्यास कणी वती नांब दिळें. ही त्याची दुसरी राजधानी झाली. हेंच हछीचें अह- मदाबाद. संत्रे पराक्रमी हिंदु राजांप्रमाणें यानेंहि शिव आणि दुगी यांचीं अनेक देवालये बांधिलीं. शेजारच्या राजाशी याचीं थोडीच युद्धे झाडी. पण हम्नीर-चरित्रांत असें वर्णन आहे कीं, सांबरचा चव्हाण राजा दुस्सल याच्याशीं झाटल्या टढाइत कणे मारला गेटा.

किलहानच्या बंशावळींत (ए. इ. ८ ) ्भामाच्या नांवावर एक वोरीव टेख [दटटा आह. ता इ. स. १०२९ मधला असन त्यात भीमाबद्दळ कांहींच माहिती मिळत नाहीं (इं. ए. ६ पा. १९३) कर्णाच्या नांवावरह्ये एकच आहे. तो इ. स. १०९१ मधला अ त्यांताहे कणीबद्दळ विशेष महिती नाहीं (इ. १ पा. ३१७ कुमारपालाच्या वडनगर-प्रशस्तींतह्वि दोघांबद्दल विशाष महिती नाहीं *“ माटव-चक्रवतींची धारानगरी पंचधारामध्यें ( घावण्याची तय किंवा शस्त्राची धारा / यांत प्रवीण असलेल्या आपल्या कुशळ अश्व दलाच्या जोरावर त्यानें जिकली ”’ असे त्यांत म्हटळें आहे. आणि कणीबद्दळ मामुली प्रशासा केटी आहे, इ. स. १०९१ मधील कणाच्या लेखावरून असे सिद्ध होतें कां, गुजराथच्या बखरकारांनी

अनहिलवाडचे चालुक्य ३०५

कणाची राज्यमयीदा इ. स. १०६४ पासून इ. स. १०९४ पर्यंत दिली अहि ती योग्य आहे.

कणीनतर त्याचा पुत्र जपरसिंह गादीवर बसला. याची आई
कर्नीट-कदंब-राजकन्या होती. कणाच्या म्हातारपणीं तिचें लग्न
झाळेळें दिसतें. कणाच्या मृत्युसमय्रीं जयसिंह लहान होता, अर्थातू
जयसिंह्याच्या आइनें कांहीं दिवस राज्यकारभार चालविला, तिच्या
मदतीस लायक व स्वामिभक्त कारभारी होतो. जयसिंह ऊफ सिद्ध-
राज हा गुजराथ चालळुक्यांपैकीं सर्वांत अधिक बलवान राजा झाला.
॥यानें अनेक इमारती बांधल्या. गुजराथेंतीळ कोणतीहि जनी इमा-
॥रत जयसिंहसिद्वराजानें बांधी असे लोक म्हणतात, सिद्धप्र
॥ येथीळ रुद्रमाळ ( रुद्रमेहालय ) नांवाचें प्रसिद्ध शिवालय त्याने
॥बांधलें. याचे फक्त अवशेषच शिछुक आहेत, पण त्यांवरून सुद्धां
संपूण देवालय किती प्रचंड आणि उत्तम कारागिर्राचें होते हें
लक्षांत येते, पाटण येथील सहस्त्रटिंग नांवाचा तलाव त्यानें बांधला.
॥त्यानें मोठाठीं युद्धेंहि केळी. माळ्याशीं त्याचें युद्ध बारा वषें चालठें
॥ होतें. याचा प्रारंभ नरवर्मन्‌ परमाराच्या वेळीं माळव्यावर्रील स्वार्राने
झाला व अंत यशोवर्मनूचा पराभव व कारागृहवास यानें झाला, हं
पूवी सांगितठेच आहे. धारा कावरीज करून तो पुढें मदनपाळ
चंदेळवर चाळून गेला व त्यापासून त्यानें खंडणी घेतली. पण चेंदे-
लांच्या कालंजर यथीळ एका लेखांत जयासेहाचा पराभव झाला असें
लिहिलें आहे (ज.बी.ए. एस १८४८ पा. २१९). माळतरा त्यानें
जिंकला यांत हेका नाहीं ब माळव्याचा बराच मोठा भाग पुष्क
काळ पावेतो गुजराथच्या ताब्यांत राहिला. यामुळें कोरीवळेखांत
अव्रंतिनाथ ‘ अशी यास संज्ञा पुष्कळदां येते. एका कोरावलखां- घरून असें दिसतें कीं, त्यानें कच्छ प्रांत जिंकन तो आपल्या राज्यास जोडला व तेथें प्रांताधिकारी नेमून राज्य चालाविळें, कोर्राव-

३०६ तिसरी हिंदु राज्य.

लेखांत यास बबेरकजेता असेंह्वि म्हटलेले असतें. या राब्दावर बऱ्याच दंतकथा रचल्या आहेत व बरेच तर्क बांधले गेळे आहेत. दंतकथाचें तात्पर्य असे कौं, बर्बरक म्हणजे भूतपिशाच्यांचा राजा. आणि जयसिंहासिद्धराजास भूतपिशाच्चांवर इतकी सत्ता मिळाली होती कीं, त्यास वाटेल तें सिद्ध करतां येई. ह्या गोष्टी अविश्वसनीय असल्यानें ह्या शब्दाची व्युत्पात्त प्राचीन-इतिहात - संशोधकांनी निराळ्या तऱ्हेने लावण्याचा प्रयत्न केटा आहे. त्यांच्या मतें बबरक म्हणजे कोणी जंगली लोक असावेत किंवा म्लेच्छ असावेत. पुराणां- तरीचे बबर हेच ते होत; ह्मणजे बत्रेर म्हणजे आफ्रिकेर्ताल वबर होत. ब्युहुटरच्या मतं हल्लीं काठेवाडच्या दक्षिण भागांत असलेलें बोबरे मिल हे ते असावेत ( गॅझेटियर ). आमच्या मतें बर्बर ह्अजे अरव होत (व्हा. १ पा. १५४ पहा ). सिंधमधून आलेल्या अरबांच्या स्वारीचा जयसिंहानें पराभव कटा असावा. भोजाच्या प्रसिद्ध उदाहरणाच्या अनुकरणानें जयतिंह हाहि विद्वानांचा चाहता होता. मोठमोठे जैन व हंदू पंडित याच्या दर- बारी असत. या सर्वात भ्रष्ठ पंडित जैन हेमचंद्र होता हे सांगा- वयास नको. त्यानें आपलें संस्कृत व्याकरण या राजास अपण ‘ करून त्याचें नांव सिद्धहेम ठेविळें. त्याच्या द्वथाश्रय काव्यांत चालुक्यांचा इतिहास असून,त्याच्या व्याकरणसूत्रांची उदाहरणें अहत. आपल्या समोर पंडितांचा वादा्ववाद करविण्याची सिद्धराजास होस असे. अशा एका वादांत एका दिगंबर पंडिताचा एका खंबायत येथल श्वेतांबर जैन सूरीने पराभव केल्याची गोष्ट सांग- तात. दिगंबर पंडिताने बायकांस मोक्ष नाहीं आणि कपडे नेस- णाऱ्या यतींसाहि मोक्ष नाहीं असें प्रातिपादन केलें होत. बहुधा हो गोष्ट श्वतांबर पंथांतून निघालेली असेल. गुजराथेंत श्वेतांबरांचें प्राबल्य आहेच.

अनहिलवाडचे चालुक्य ३०७

टू नव्हत तर वौराहिं सिद्धराजाच्या आश्रयास येत. या सर्वांत प्रसिद्ध जगदेव परमार होता. हा उदयादिल्याचा कनिष्ठ पुत्र होता. याच्या शोयच्या अद्भूत गोष्टी बखरकारांनी सांगितल्या आहेत. त्या सवे खऱ्या नसल्या तरी तो एक महाशार बीर होता हें निःसंशय हाय.

गॅझेटियरमध्यें जयसिंह सिद्धराजाची फार स्तुते केळेली असून तो अत्यंत सामर्थ्यत्रानू , अत्यंत धार्मिक व अल्यंत उदार होता असें योग्यरीतीने वणिळे आहे, सोमनाथास जाणाऱ्या यात्रिकरूंवर जबर कर असल्यानें किल्येक गरीब श्रद्भावान्‌ यात्रकरू अडकून दुःख करीत बसठेळे पाहुन जयहिंहाच्या मातोश्रीस फार वाईट वाटून तिनें रदबदली केटी, तेव्हां त्यानें या कराचे उत्पन एक टाख रुपये होते तरी तो कर तात्काळ उठवन टाकला. वडनगरप्ररास्तीत तर असें वणिलें आहे कीं, त्यानें आपल्या राज्यांतीळ सर्व कर्जेदारांचीं कर्जे फेडून त्यास क्रणमक्त केळें व यामुळे तो शककता झाला. हिंदुस्थानांत अशी समजत आहे कीं, नवा शक सरू करणाऱ्याने आपल्या राज्यांतील सत्रे कर्जदारांची कर्म फेडलीं पाहिजेत आणि ओदायाच्या कमालीचे हे कृत्य सिद्धराजानें खरोखरच सिद्धीस नेळे असें वडनगरप्रशास्तीवरून दिसतें. त्यानें नवा शक सुरू केला यांत दइंका नाहीं. कारण या शक्तांतीळ कित्येक टेख काठेवाड व गुजराथमध्ये सांपडळें आहेत. सगळ्यांत अटीकडचा लेख विराव- ळचा आहे. यांत तारीख चार शकांत दिली आहे. त्रिक्रमराक १३२०, वलभीदक ९४५, सिंहशक १५१ व हिजरीशक ६४२.” तात्पर्य

  • यावरून चार शक गुजराथेत चार राज्यांचे दर्रांक यावेळी चाळू होते. त्यापैकी मुसलमानी अंमल नुकताच सुरू होत होता. परंतु गुजराथेत अजुनदेव वाघेला यावेळीं राज्य करीत असल्याचा यांत उल्लेख आहे.

३०८ तिसरी ह्‌

जयासंहास लेखांतून सिद्धराज व चक्रवती या संज्ञा योग्य रीतानें दिलेल्या आहेत.

किळहाननें आपल्या वंशावळींत जयसिंहाच्या नांवावर इ. स. ११३८ व ११३२९ असे दोन टेख दिळे आहेत. दुसरा ळेख चालु- यांचा नसून त्यांच्या एका मांडळिक राजाचा आहे. त्यांतील पहिल्या ॑ोकांत असे म्हटळें आहे कीं, जयसिहाने सोराष्ट्र आणि माळतरा येथील राजांस कैद केळें. पुढील राजांच्या ळेखांत अवातनाथ, त्रिभु- वनगंड, ब्बरकजिष्णु, सिद्धचक्रवर्ती अस जयसिंहाचें नेहमीं वणंन येते (इं. ए. ६ नं. १ पहा ). जय़पिंहानें बखरकारांच्या मतें इ. स. १०९३ पासून ११४३ पर्यंत ५८ वर्षे राज्य केलें. तो लहान असतांच गादीवर आठा आणि इ. स. ११३९ मधील त्याचा टेख वरप्रसणें सांपडला आहे यावरून त्यानें पुष्कळ वषें राज्य केळें असेच ठरते. त्याठा भूतपिशाच सिद्ध होतें तरी व त्याजजवळ सिद्गरस अथवा तेजस्वी ओपघें होती तरी आणि त्यानें अनेक पुण्पक्रत्यें केटी होतीं तरी त्याला मुलगा झाला नाहीं. आणि वारसा पहिला भीम याचा तिसरा पुत्र कृष्णराजा, याचा नातू त्रिभूअनपाल, याचा पुत्र कमारपाठ याकडे अखेरीस गेला. दुसरोहि वारस असून यावेळीं गारदाचा तंटा पडला व बाहेरील राजे तंट्यांत घुसळे; पण अखेरीस कुमारपाळ आपल्या पराक्रमाने व जैन अमा- त्यांच्या मदतीनें अजमीरचा अर्णोराज व माळव्याचा बछ़ाळ यांचा कोरीवलखांत वणिल्याप्रमाणें पराभव करून अखेरीस गादीवर बसला. यानेंहि आपल्या पूर्वीच्या राजांप्रमाण॑ शहाणपणाने व न्यायानं पुष्कळ वर्ष-बखरकारांच्या मत इ. स. ११४३ पासून इ. स. ११७३ पर्यंत तीस वर्षे-राज्य केळे. खरोखरच चार हुशार क्तृत्ववानू व न्यायी एकामागून एक दीध राज्य करणारे भीम, कर्ण, जयसिंहृव कुमारपाळ असे राजे इतरत्र थोडेच आढळतात. नहरवालाच जयसिंह

अनहिलवाडच चालुक्य ३०९

व कुमारपाल यांच्या गोष्टी अरब ग्रंथकारांनी इ. स. १२२” इतक्या पूर्वकालीं सांगितल्या आहेत. ऊफीच्या जम्भीयत-उल॒ हिकायतमध्यें पिशाच्चावर सत्ता चार्लवेिणारा जो जयसिंह सांगितला आहे, तोच जयसिंह सिद्धराज; व गुपील म्हणजे क्ुमारपाळ असून त्याजविषयीं असे सांगितळें आहे कीं या राजास गार्दावर येण्यापूर्वी पुष्कळ देश फिरावे लागळे व पुष्कळ संकटे भोगावी लागली यामुळें हा फार न्यायी निघाला. गुजराथचे बखरकार लिहितात कीं, भावी वारस या दृष्टीनं कु- मारपाळ जयसिंहास अप्रिय झाला; तेव्हां हेमचंद्राच्या उपदेशाने कुमा- रपाळ गुजराथ सोडून दक्षिणेकडील व पूर्वेकडील राज्यांत फिरत राहिला. हेमचंद्रानें त्याच्या भावी वैभवाचे भविष्य केलें होतें, त्या प्र- माणें त्यास राज्याहि मिळाले. त्यामुळें कुमारपालाची ह्या प्रसिद्ध जैन पंडितावर फार भाक्ते जडटी; आणि जेनधमांबद्दल त्यास अत्यंत आदर वाटूं लागला. कुमारपाठाचे अत्मसंयमन व उच्चनीति हां जनधरमांच्या त्याजवरीळ पगड्याधुळेंच आलेटीं दिसतात. शहोेवटली गोष्ट ही कीं, कुमारपाळ गादीवर आला त्या वेळेसच पन्नास वर्षांचा होता. अर्थात्‌ राजे लोक ज्या बयांत जुलमी व दुर्गुणी निपजतात त्या वयाच्या तो पढीकडे गेला होता,

त्याची पहिली लढाई अजमीरच्या अर्णाराजाशीं झाली. अर्णो- राजास त्याची बहीण दिली होती. त्याच्या भावाच्या तर्फेने कदा- चित्‌ अर्णोराज त्याजवर उठला असावा. ह्या टढाईच्या संतरधे . अनक चमत्कारिक गोष्टी सांगतात. पण कोरीव लेखांवरून असें । दिसते कां, कुमारपालानें या लढाईत स्वतः मोठा पराक्रम केला आणि अर्णोगजाच्या छातींत बाण मारून रक्त काढठें.* कोरीव-

  • अर्णोराजनराधिराजह्ृदयक्षिसेकबाणत्रणाच्योतलोे हिततर्पणादमदयः्चण्डीं भुजस्थायिनाम्‌ ॥ ( वडनगरप्रशास्त ) ए. इ. १

३१० तिसरी हिदु राज्य

लेखांत याचें नेहर्मांचें वर्णन “ स्वभुजपराक्रमनिर्जितशाकंत्ररी भूपाल ” असें येतें. धहुधा याच लढाईत बडनगरप्रशास्तींत सांगि- तठेला माळव्याचा बल्लाळ राजा अर्णोराजाचा साथीदार असून लढाईत मारला गेळा.. कोकणचा राजा म’िकाजुंन याजवर कुम’र- पालानें आपला सेनापति अंबड यास दोनदां पाठाविळें. दुसर्‍या टढाईत मह्छिकार्जुनाच्या हत्तीवर चढून अंबडानें त्यावें डोके कापिलें. आणखी एकर गोष्ट अशी सांगतात कीं, चदीचा राजाहि कुमार- पालावर चाळून येत होता. पण हत्तीवर बसून जात असतां एका झाडाच्या फांदींत त्याचा कंठा अडकून त्याचा कंठ दाबा जाऊन तोच मेला. पूर्व माळव्यांतील उदेपूरच्या देवळांत कुपारपाठाचे शिलाठेख सांपडळे आहत; त्यांवरून माळव्याच्या बऱ्याच भागावर गुजराथेचें अद्याप स्वामित्व होतें. पश्चिम राजपुतान्यांतीलळ बालमेर येथे त्याचा लेख सांपडला आहे. खुद्द मेवाडांतीठ चितोड येथें त्याचा लख सांपडला आहे. हे जरासें चमत्कारिक आहे; क’रण चितोड व तेथील गुहिलोत राज्य यांस कुमारपाटाने जिंकले ह संभवनीय नाहीं. या टेखांत असें सांगितळें आहे कीं, कर्णीवर स्वारी करून परत येत असतां हा प्रसिद्ध किछा पाहण्यास तो गळा होता, बहुधा चितोडच्या राजानें सन्मान्य पाहुणा म्हणून त्याचा सत्कार केला असावा. कुमारपालाची एक राणी गुहिलोत राजकन्या होती अशीहि दंतकथा आहे. यासंबंधामुळें मित्र म्हणन त्याचे चितोड येथे स्वागत झाळें असावें, आणि चितोडच्या राजधानीं किल्ल्यांत त्याचा शिला- ठटेख कार दिला असावा, कुमारपालाच्या सत्तेचा विस्तार फार मोठा होता. पण जैन बखरकार त्याच्या सत्तेचे अतिरायोक्तीनें वर्णन करि- तात. तो त्यांच्या धमाचा अत्यंत प्रेमाचा चाहता असल्यानें त्यांनी असें फुगवून टिहिळें आहे कीं, त्याच्या राज्याची उत्तर मर्यादा तुकाच्या राज्याशी भिडली होती

_ चालुक्य ३११

कुमारपालाहि त्याच्या पूर्वींच्या राजाप्रमाणे मोठा बांधणारा होता. त्याने कित्येक जैन विहार बांधून दिले आहेत, किंबा त्याच्या प्रधानांनीं बांधळे आहेत, सोमनाथाचे देऊळहि त्यानें बांघटें असे जैन बखर- कारानींच लिहिलें आहे. किंबहुना ‘ मी कोणतें पुण्यकृल्य करूं ? असे कुमारपाटाने विचारल असतां हेमचद्रानेंच ‘ सोमनाथाचं देउळ बांध ! असं सांग्तल्याचें वर्णन आढळतें. अथात्‌ कुमार- पाटानें सोमनाथाचे दगडी देवाटय बांधलें. भोजानेहि सोमनाथाचें दगडी देवाटय बांघळें होते आणि भोौमाने’हि बांधलं होतें. हेंच काम जयसिंहाने|हे केल्याचा स्पष्ट दाखटा आहे. बहुधा हें देवा- ल्य समद्राच्या इतके जवळ हाते की, समृद्राच्या टाटा देवळाच्या पायावर आपटत असत. यामुळे पूर्वीचे बांधणारे समुद्राच्या पाण्यांत लांकडी खांब घाटीत असावेत. कुमारपाटानें दगडी देवालय बांघळें यांत दोका नाही. सोमनाथाच्या देवळाच्या आवाराच्या बाहर असलेल्या भद्रकाटीच्या देवळांत इ. स. ११८९चा एक शिटट्ख आहे, त्यांत ह्या गाष्टींचा स्पष्ट उलेख आहे. एक वनो- जिया ब्राह्मण तपरवी बनारस’चा राहणारा सव हिंदुरथानभर देव- स्थानांचा उद्भार वरीत माळव्याच्या मागं सोमनाथास आला, त्यानें सामनाथाचें देऊळ बांधण्याविषयीं जयासंहास विनंति कटी. आणि जयसिंह्ानें देऊळ बांधण्यास सुरवात वळी व कुमारपालानें तं काम हावटास नेलें. सोमनाथाचें देऊळ बांधण्यासाठी गुजराथच्या राजांस उद्युक्त करण्याचें श्रय या शिटाटेखावरून “भावबृहस्पाते ‘ नांवाच्या लकुटीद-पंथाच्या या ब्राह्मण यतीस लाहे. परंतु जैन बखरकार तें श्रय आपण घेतात आणि हेमचंद्राच्या उपदेशानें कुमारपाटानें देऊळ बांधलें असे सांगतात. आपल्यास दोघांसाहि श्रय देतां येईल. क,रण कुमारपाल हिंदु व जैन, यति व पंडित यांचा सारखा आदर करी. ह्या रिटाटेखासंबधी अधिक चचा आम्ही अन्यत्र कटी आहे.

३१२ तिसरी हिंदु राज्ये

कुमारपाळ आपल्या कारकीर्दांच्या रवटीं शेवटीं जैन झाला हे कितपत विश्चतनाय आह याचा विचार करणें बाकी आहे. जेव्हां सोमनाथाचें देऊळ बांधत हात, तव्हां हेमचंद्राच्या सांगण्या- वरून मद्य. मांस व मैथुन या तान मकारापासून निवृत्त राह- ण्याचा त्यानें पण केळा होता; आणि दोन वर्षे पर्यंत ह त्रत पाळून जेव्हां देऊळ बांधळें गेठें, तेव्हां तथे जाऊन त्यानं देवाची पूजा केटी. यावेळीं हेमचंद्रानेहि देवास नमस्कार केला. पण हें व्रत जैनांचेच नसून मनुस्मृत्युक्त हिंदुचाहे आहे. आपल्या कुल- देवाची भक्ति व आपला पूज्य गुरु हेमचंद्र याची भाक्ते ह्या दोहांची छाप कुमारपालावर होती. हिंदू टोक या बाबतींत नहमींच पर- मतसहिष्णु असतात. हलीहि अनेक भक्तोमान हिंदु मुसलमान फकिरांचे शिष्य असल्याचे प्रासद्ध आहे. तेव्हां कुमारपालाने जैन मुनीस मानणें किंवा जैन विहार बांधणें आश्चर्यकारक नाही.हेमचंद्रहि आपल्या शिष्याप्रमाणें परमतसाहेष्णु होता. त्यानें सोमनाथाच्या मूर्तीस ही जीनाचीहि मर्ति आहे अते म्हणन नमस्कार केला. कसेंहि असलें तरी आपला कुलदेव सोडून कुमारपाठ शेवटीं जैन झाला ही गोष्ट संभवनीय नाहीं, कारण त्याच्या किंवा त्याच्या मागूनच्या राजांच्या कोण- त्याहि टेखांत ‘ उमापतिप्रसादलब्धलटक्ष्मी: ‘ असंच त्याचे नेहमीं वर्णन यते, ज्याप्रमाणें हर्षाच्या लेखांत त्यास परम सोगत म्हटळें असून त्याचा बाप प्रतापवर्धन यास परममाहश्वर *्हटलेळें असतें, त्याप्र- माणें टेखांत कुमारपाठास कोटेंहि जैन म्हटलेढें आढळत नाहीं. तथापि जैनधर्मानें विशेष पुरस्कार केटेल्या अहिंसेच्या तत्त्वाबद्दळ कुमारपाठाचा इतका आदर वाढला होता कीं, त्यानें हर्षाप्रमाणे

  • न मांसमक्षणे दोषो न मद्ये न च मेथुने ॥ प्रवृत्तिरषा भूतानां निवत्तिस्तु महाफला ॥

अनहिळलवाडचे चालुक्य ३१३

। आपल्या राज्यांत प्राणिघात, नेहमीं नव्हे तरी पण कांहीं विशिष्ट । पिवशीं, बंद करण्यासाठीं आपल्या राजसत्तेचा उपयोग केला । असे मानण्यास खचित जागा आहे. जैन बखरकार टिहितात कों, त्यानें जीधहत्त्या बिलकुळ बंद केटी, व तो माळव्याच्या शिला- दित्याप्रमाणे घोडे ब हत्ती यांना सुद्धां पाणी फडक्यांतून गाळून प्यावयास देई (भाग १ प्र. पहा ). परंतु एखढें जरी आपण मानलें नाहीं, तरी एका मांडलिक राजानें कांहीं विशिष्ट दिवशीं प्राणिहत्या बंद केल्याचें कोर्रीव टेखांत वर्णन आढळतें. मारवाडां- तील रतनपूर व हरसोदा येथ दोन शिटाटेख सांपडले अहित ( भाव० इन. पान २०६ ); त्यांत असं म्हटलें आहे कीं, कुमार- पाठाच्या अमलाखाळीलळ दोघा मांडलिक राजांनीं. एकादशी आणि अमावास्या या दिवशीं प्राणिहृत्त्या बंद केटी. ““ जो कोणी करील त्यास पांच द्रम्म दंड होईल. ‘” जर मांडलिक राजांनीं याप्रमाणें प्राणिहृत््या बंद केटी. तर ती वरिष्ठ राजांच्या संमर्तानंच बंद केली असली पाहिजे. कदाचित्‌ कुमारपाठानेहि आपल्या राज्यांत अताच हुकुम सोडला असेल, पण हं अनुमान निश्वयाचें नाहीं. असो, पण रतनपूर येर्थांलळ टेखांतच कुमारपाटाचें वर्णन करतांना ‘ पावेती- पतीच्या प्रसादाने प्रकव झाठेळा ‘ असेंच वर्णन केलेलें आहे. तसंच वडनगरप्रशस्तींत * कुमारपाठानें वडनगराभोंवतीं तट बांधला ‘ असें म्हटळें आहे. नागर त्राह्मण प्रासेद्ध शिवभक्त असून त्यांचे हें मूलस्थान आहे. या सर्व गोष्टींवरून असें अनुमान निघतं कीं, कुमारपाळ आपल्या प्जांप्रमाणेंच कट्टा शिवभक्त होता ञन धघमाविषयीं त्यास इतका आदर होता कीं, त्याताठीं व हेम- चंद्राच्या वजनामुळे त्यानें जैनांना पावित्ल असलेल्या कांहीं तिथीस प्राणेहत्या बंद केटी असावी. असे बंदचे हुकूम जैनांच्या मतास

३१४ तिसरा हिंदु राज्ये

मान देऊन क्रित्येक़ शहरांत विशेषत: जैनांच्या पचोसन दिवतांत अकबरानेंहि बंद केल्याच्या सनदा हीं चाल आहेत

किलहांनने कुमारपालाच्या नांवावर इ. स. ११४५पासन इ.स १ १६९प्यंत सात ठेख दिळे आहेत (ए, इं. ८). यावरून बखरकारांनी दिळेटी इ.स. ११४३पासून इ. स. १ १७७पर्यंतची याची राज्यमयादा संभत्रनीय दिसते. कुमारपाळाल हि पुत्र नव्हता. यामुळें त्याचा पुतण्या अजयपाळ गादीवर बसला. तो मोठया तामसी स्वभावाचा हाता. त्यानें जैनांचा जोरानें छळ केळा इत$च नव्हे, तर हिंदू दिवाणांनाहि तो छळू लागला. इ. स. ११७९ मध्यें म्हणजे गादी- वर आल्यावर लोकरच द्वारपालानें एके दिवशीं त्याचा खून केला, साळुंबर येथीक राजास जिंकून त्यास कर देण्पास त्यानें लाविलें असे एका कोर्रावलेखांत म्हटळ आहे; पण हं संभवनीय वाटत नाहीं.

त्याच्यामागे त्याचा अल्पवयी मुलगा मूळराज हा गार्दावर बसला. यामुळें यास बालमूळराज असेहि म्हटळेठें आढळतें. त्याची आई नायकीदेव्री एका परमाडी कदंबकर्नाटकी राजाची कन्या होती. ती प्रतिनाथ्रे म्हणून राज्य करू लागली. त्या राजाच्या वेळीं महमद घोरीनें गुजराथेवर स्वारी केली, पण तींत त्याचा पराभत्र झाला. हा पराभत्र हिंदूंना सूषणास्पद आहे आणि चाढुक्णंच्या लेखांत यामुळे मूळराजाचे प्रशंसापर वर्णन येणे साहजिक आहे.* जयाचे श्रेय राजाला दिळे जातें यांत हीका नाहीं. पण एका लेखांत या जयाचे श्रय मूळाजाच्या आईस दिलेलें आहे. राजपूत ख्रिया शोर्याबद्दल व

  • आहवपराभूतदजुयरगुर्जनाधिराज (इ. ए.६ पा. १९४) 1 चौळुक्‍्यर।जान्त्रयपू’जितस्य़ यस्यानुभावादबलापि संख्ये । हम्मीरराजं तरसाजिगाय ॥ ( वेरावळ लेख भा. इं, पा. २४)

अनहिळलवाडचे चालुक्य ३१५

। मृत्यु तुच्छ मानण्याबद्दह व धम आणि अन्र यांच्या अत्यंत काळजी- । बद्दल इतिहासांत प्रसिद्धच आहेत. ही राजपूत राणी कनीटकची ॥ होती ह्याबद्दल दाक्षिणात्यांत अभिमान वाटणे साहजिक आढे. ती । लढाईत हजर असून तिनें गझर्नाच्या राजाविरुद्ध गुजराथ सेनेचे । नेतृचर स्त्रीकारलेळें दिसते. या लढाईचे वर्णन आपल्यास कोठेंहि । आढळत नाही, पण गुजराथ सैन्याच्या शोयानें ती जिंकटी आणि । गुजराथच्या सेनापतींनी घोडदळ व हत्तीदळ उत्तम रीतीनें चालविळें । असें दिसतें. गुजराथचे बखरकार म्हणतात कीं, अत्यांच्या मदतीस । पाऊस आला. पण पावसानें जेत्यांसच कां मदत करावी हें समजत । नाहो. आतां हें मान्य करावें टागेळ कीं, घोर्राजवळ पुरेशी फोज नसावी व गुजराथची फौज जास्त असावी. कारण गोरीस मुलतान । व उछ मार्गे रेतस्तानांतन यावें लागलें होते. पराजयाचें कारण । कांहीं असलें तरी या पराजयानें मुसलमानी सत्तेपासून ग॒जराथेस आणखी रांभर वर्षें वांचविळे आणि नहरवाला राज्याच्या फोजची । कोते वाढली. इ. स. ११७८त ही टढाइ झाली. गदरार-घाटाच्या । जवळ ही लढाई झाल्याचे गॅझेटियरमध्ये वर्णन आहे (पा, १९५). । मुसलमानी इतिहासकार या लढाईचा बहुधा उलेख करीत नाहींत. । पण मूळराजाच्या मागून भाम गादीवर आला त्याशीं ही लढाई । झाल्याचे ते लिहितात. गोराशंकरच्या मते ही त्यांची चुकी आहे. कदाचित्‌ महंमद घोरीनें आपला अपजय धुवून काढण्याकरिता । दुसऱ्यावेळीं प्रयत्न केळा असेळ. गश्भनांच्या महमुदाचें अनुकरण ॥ घोरी कर्रांत होता हे स्पष्ट आहे. त्यास प्रारंभीं कमी यश आलें; पण शेबटीं महमुदाहूनहि जास्त यश त्यास आलें हें आपण पुढें पाहूं. । मूळराजानंहि थोडीच वर्षे राज्य केले. त्याच्या मागून त्याचा भाऊ ‘ भाम गादीवर बसला. तोहि अल्पवयी असल्यानें राज्यकारभार पाठक । मातोश्रींनीं चाटविला. ह्या भामास भोळा र्भाम म्हणतात. यानें

रक तिसरी हिंदु राज्ये

जयसिंहासारखे पुष्कळ वर्षें राज्य केलें. इ. स. ११७८ पासून १२४ १पर्यंत ६२ वर्षे यानें राज्य केळें असें ज म्हणतात ते १िश्चा- साहे आहे. कारण हा अल्पवयांतच गादीवर आला. तो जयसिंहा- प्रमाणें आपल्यास सिद्धराजहि म्हणवी. अगदीं बरोवर लिहिणें तर तो आपल्यास “ अभिनवसिद्धराज’ अशी पदवी, त्याचे गुण मोठे नव्हते तरी, घेई. याचे राज्यकाळांतीळ पुष्कळच कोरीव टेखइ. स

११९९ पासून इ. स. १२३८ पर्यंतचे सांपडले आहेत. अर्थात्‌ बखरकार सांगतात त्याप्रमाण इ. स. १२० शयपंत ह्यान राज्यक

यांत दका नाहीं. त्याची सत्ता मात्र त्याच्या मांडटिकांनीं व सरदारांनी बळकावली होती. पण ते नेहमीं त्यास अनहिलवाडचा राजा मानीत. उदाहरणाथ जयंतसिहाच्या एका लेखांत (याबद्दल पुढें जास्त ल्हि) हटलं आहे कीं, अनहिटवाड येथें भीम राज्य करीत आहे. वाघेला सरदार टवणप्रसाद व त्याचा पुत्र वीरघवळ हे पुढें इतके बलवान झाले कीं, र्भामानें *्वारधवळ माझा वारस आहे! असाहि जाहीर केलें. हे वाघेठे सरदार चोट्क्य कुटाचीच एक शाखा असून त्यांचा संस्थापक अर्णोराज हा कमारपालाच्या मावशीचा मुलगा होता. त्यानें कुमारपाठास गादी मिळवून देण्याच्या कामांत मदत केल्यामळें कुमारपालानें त्यास अनहिलवाडजवळील व्याघ्रपछी हा गांव इनाम दिला. ह्या गांवावरून वाघेला हं कुलनांव उत्पन्न झाळें. अर्णोराजाचा पुत्न लवणप्रसाद हा दुसर्‍या र्भामाचा मोठा शूर सेनापति होता. व पुढें वीरधवल हा भामाचा पुढचा वारस त्रिभु- वनपाल यानें चार वर्षे राज्य केल्यावर त्यास बाजूस सारून स्वतःच अनहिलवाडचा राजा झाला ( गोरीशंकरचान्टोड ). त्रिभतरनपाठाचा एक ताम्रपट संवत्‌ १२९९ म्हणजे इ. स. १२४१ चा सांपडला आहे. ह्यावरून या राजानें कांहीं काळ राज्य केलें हें निश्चित दिसतं. पण खरा मालक वीरधवल होता, त्यानें त्यास लवकरच

अनहिलवाडचे चालुक्य २१७

॥जूस सारून अनहिलवाड येथ बाघेला राजघराण्याची स्थापना रली त्याच्यानंतर हें घराणें चार पिढ्या चाललें. वीसलदेव, अजुनदेव, ररंगदेव आणि कर्ण (इ. स. १२८६ ते इ. स १३०४ ). कणी- या वेळेस मुसलमानांनी गुजराथ कायमचे जिंकलें. हें वाघेला कुल (क मोठें शूर घराणं होतें. त्यांचें दोन प्रसिद्ध जैन प्रधान वस्तुपाळ पाणि तेजपाळ यानीं गिरनार येथील प्रसिद्ध जैन मंदिरे बांधिली. ॥घेला कुलाचें हल्लांचे वारस रेवा येथील राजघराणें होय; व मूल- ॥जाच्या चोटुक्य कुलाचे वारस ळूनावाडा, रूपनगर-मेवाड आणि पारवाडांतील कोट येथील राजे होत ( गौरीहकराचा टॉड पहा ). ॥ांचे वंशज कांहीं मराठ्यांतहि आहेत. सातारा जिल्ह्यां्ताळ कऱ्हा - चे डुबल हे आपल्यास गुजराथच्या चाट्क्यांचे वंशज मानतात. | ऱ गोत्र भारद्वाज आहे.

। संवत्‌ १२६० म्हणजे इसवी १२०२ मर्धाल कोरीव लेखाचा | | जयंतासिह कोण होता याचा विचार करणं बाकी आहे (इं. ., ६ नं.४ पान १९७). या लेखांत त्याला चाटक्यच म्हटलें आहे. ण ्भामाचा व ल्याचा काय संबंध होता, हें ह्यांत सांगितलेले नाहीं. ॥थापि “ तदनंन्तरं स्थाने ! ह्या शब्दांवरून तो भीमानंतर ्भामाच्या (वजीं राज्य करीत होता असें स्पष्ट दिसतें. शिवाय ‘दुष्टकालरूपी ‘पमुद्रांत बुजटेल्था गुजरभूमीचा वराहासारखा उद्धार करणारा, आणि ‘प्रापत्तींच्या दावानठानें दग्ध झालेल्या गुजरबाजास पजन्याप्रमाणें ‘॥ोषण करणारा,” अशी या लेखांत जयंतसिंहाची प्रशंसा केलेली आहे. | प्राशिवाय गुर्जर राजांना लावल्या जाणाऱ्या सर्व पदव्या व बिरुदे हो आपल्यास लावितो; आणि “अनाहिलवाड येर्थे प्रतिष्ठित झाठेला’ से आपलें वर्णन करितो. ह्या सव गोष्टीवरून इ. स. ११९७मध्यें | तुबुद्दीन ऐबक्‌ यानें गुजराथेवरील केलेल्या स्वारीचा यांत बहुधा

३१८ तिसरा हिंदु राज्ये

उल्लेख आहे (बाम्बे गॅझेटिअर पा. १९’५–१९७).महमुदाच्या स्वारीच्या वेळीं जसा पहिला भाम निघून गेळा तसा दुसऱ्या भीमानेंहि कुतु- बुद्दीनच्या वेळीं अनहिलवाड टाकून एखाद्या दूरच्या किछ॒याचा आ- श्रय घेतला असें संभवनीय दिसतें. कुतुबुद्दीन अजमीर घेऊन अन- हिलवाडवर चाळ करून आला; व अबुपरवताच्या खालीं सरहद्दीवर गुजराथसेन्यानं त्याचा विरोध केला. परंतु धारावर्ष परमार व इतर गुजराथ सैन्याचे अधिपति यांचा पराभव झाला (गौरीदकर ). अथात्‌ गजराथ उघडे पडळें आणि ठुटलें गेलें. कदाचित जयंतर्सिह या रार चौळुक्‍्य राजपुत्लानें अनाहिलवाडांत राहून त्याचा बचाव केला. कुतु- बुद्दीनाने देश ठढुटून परत कूच केले, त्यामागे राहलेल्या मुसलमानी शिपायांस जयेतसिंहाने हाकळून देऊन गुजराथेस मुक्त केलें. याप्र- कारें त्याने केलेल्या कामागेरीचें काव्यातिरयोक्तीचें वणन मळत खरें असलें पाहिजे* जयंतार्सेहाने अनहिलवाड येथें निदान तीन वर्षे राज्य केळें असावें. त्याचा लेख इ. स, १२०२ मधला असून भीमाचा एक लेख भाद्रपद अथवा सप्टंबर इ. स. ११९९ चा अनहिलवाडहून प्रसिद्ध केळेला मिळाला आहे (इं. ए. ११ पा. ७१); आणि यावरून मुसलमानी फौजा देशांत शिरून लोकांस ल्लास देत असतांना भीम कांहीं काळ अनहिलवाड येथे होता असं दिसतें. यान- तर केवळ निरुपायाने त्याने अनहिलवाड सोडलें असावें. सर्व आपत्ति टळून देश मोकळा झाला, तेव्हां तो पाटणला परत आला आणि त्याने इ. स. १२४२ पर्यंत राज्य केलें. त्याचा शेवटचा कोरीव लेख जो सांपडला आहे, तो इ. स. १२३९चा आहे. भीमानें जीं बिरुदे *भीमदेवस्तदन्तर स्थाने परमट्टारक, महाराजाधिराज, परमेश्वर, चोलुक्यकुलकल्पबल्लीविस्तारणदीप दुःसमयजलघिजलमग्रमेदिनी- मंडलोद्धरणमहावराह, दुदैवदावानळदग्घगुजरघराबीजप्ररोहेकपर्ज न्यैकाड्रावीर ( इं, ए. ६ पा. १९७)

अनहिलवाडचे चालुक्य ३१९

धारण केलीं तीं फारच फुशारकी मारणारी आहेत. तो आपल्यास अभिनवसिद्धराज म्हणतो, इतकेंच नव्हे तर सप्तम चक्रवतींहि म्हणतो. गुजराथेतील भरतखंडाचा सातवा सम्राट्‌ असे तो काँ ‘म्हणतो हें लक्षांत येत नाहीं. कदाचित्‌ पहिल्या र्भामापासून चौलक्य ‘राजे मोजन सर्वांस चक्रवर्ती ठरवून त्यानें आपल्यास सातवा चक्र- ‘बर्ती म्हटलं असावें. या कुलांतील बहुतेक सवे राजे पराक्रमी होते यांत शका नाहीं; कदाचित्‌ अपवाद असेल तर या शेवटच्या भीमा- ‘चाच,होय. याला भोळा योग्यरीतीने म्हणत. कोरीव लेख लिहि- णारांनीं त्याची जी भरीव स्तुति केली आहे, तिचा पोकळपणा त्याच्या लक्षांत आला नाही. असो, या चौलुक्य राजकुलाची वंश्ा- वळ राजांच्या संभवनीय राज्यारोहणकाळासह आणि त्यांच्या लेखाच्या काळासह आम्हीं पुढें देत आहों. भाम दुसरा याच्या गैरहजेरीत राज्य करणारा जयंतसिंह याचें नांव गौरीदकर ओझा यांच्या मता- प्रमाणें व बॉँबे गॅझाटेअर व्हॉ. १ भाग भाग १ यांत दिल्याप्रमाणें बगळून आम्ही वंशावळ देतों. ( किल्हॉर्ननें आपल्या वंशावळींत ‘जयंतसिंहाचें नांव दिलें आहे. )

३२० तिसरी हिंदु राज्ये

अनहिवाडच्या चोलुक्य राजांची वंशावळ.

(मुंबई गॅझेटियर व्हा. १ भा. १ व किलहानंच्या बंशावळी: ए. इ. ८)

१ मूलराज राजीचा पुत्र (इ. स. ९६१ ते ९९६ ) |

२ चामुंड (इ.स. ९९७.ते. १००९ |

1 । । ३ वलळूभ (१०१०) ४ दुलभ (१०१०-१०२१) नागराज

| ५ भीम पहिला (९०२१-१०६३) | लेख १०२९

1-0, 0,0ललरकही का की ६ कण (१०६१३-१०९३) ले. १०२९ खेमराज | उफ ७ जयासेंह सिद्धराज (१०९३-११४३ हरिपाल

ळे. ११३८-११३९ ]

त्रिभुवनपाल | ॥ । महापाल -_ ८ कुमारपाल (११४३-११७३) | ले. ११४५,५०.५२,५३,६३,६५ ९ अजयपाल ११७३-११७८६ | ले. ११७३-११७५ | गोण ना क्क र्या १० मूलराज दुसरा ११ भीम दुसरा (११७८-१२४१) ११७६-१७७८) ले. ११९९,१२०७,०९,१६,

| १८,२६,२८,३७,३१ १२ त्रिभुवनपाल-. ले, १२४२

प्रकरण आठवं. कनोजचे गाहडवाल.

मध्ययुगीन हिंदु भारतातिहासाच्या तिसऱ्या कालविभागांत ( इ.स. १०००–१२०० ) जीं नवी रजपूत घराणीं उदयास आलीं, त्यांत सर्वांत प्रसिद्ध व सर्वांत बलिष्ठ कनोजचे गाहडवाल घराणें होतें, गाहडवाल राष्ट्रकूटांची एक पोटशाखा होय असें मानतात. परंतु या प्रश्नाविषयी विवाद आहे व त्याचा आपण पुढें विचार करूं. गाहडवाळ कोठून आले होहि गोष्ट निश्चित नाहीं; व ह्याहि विषयावरचे आमचे मत पुढें देऊं. या घराण्याचे अनेक लेख सांप- डळे आहेत; त्यावरून यांतील पाहिला प्रसिद्ध पुरुष गाहडवाल मही- यल याचा पुत्र चंद्र * यानें आपल्या बाहुबलाने कान्यकुब्जाचें राज्य मिळविळें आणि देशास त्रासापासून मुक्त केलें. ‘ ह्दी त्याची स्तुति गाहडवालांच्या प्रत्येक लेखांत दिळेडी आढळते. कोणत्या वर्षी हा पराक्रम त्यानें केला हें निश्चित नाहीं. तथापि सुदैवानें किलहॉर्ननें इ. स. १९०८ सालीं उत्तरेकडील राजांच्या वंशावळी ए. इं.८ मध्यें दिल्या, त्यानंतर चंद्रदेवाचे खुद्द तीन ठेख सांपडले आहेत; त्यां- पैकीं पुढील दोन लेखांत त्याची केलेली स्तुति विस्तृत आहे. पण यांतील त्याचीं विशेषणें नीटशी समजत नाहींत. यांत असें म्हटलें आहे कीं, चंद्राने नरपति, गजपाति व त्रिशांकुपाति यांस जिंकून पांचालळराजास जिंकले (ए. इं. १४ पान १९२ ). पांचाल म्हणजे कनोजचें राज्य यांत दहोकाच नाहीं. या लेखांचा काळ इ. स. १०९३ पासून १०९९ चा आहे. आणि इ. स. १०९१ चा त्याचा ठेख त्यास मामुली विशषणें लावणारा ए. इं. ९ पा. ३०२

३२२ तिसराीं हिंदु राज्ये

मध्ये छापला आहे. चंद्रानंतरच्या एका राजाच्या लेखांत ( इं.र॒. १४
पा. १०३ ) असें सांगितलें आहे कीं, चेदीचा कर्ण मेल्यानंतर
चंद्राने प्रथ्वीस तिच्यावर आलेल्या संकटांतून मुक्त केलें. या कर्ण
राजानें इ. स. १०८० पर्यंत राज्य केलें असें आह्मी ठरविलं आहे. वरील
कारणांवरून चेद्रदेवानें इ, स. १०८० नंतर कनोज जिंकले असें
अनुमान निघते. याच लेखांत असें म्हटळें आहे कीं, ‘ चंद्रदेवानें
अनेक शत्रु राजे जिंकून कान्यकुब्ज ही आपली राजधानी केली,!
कनोज हर्षाच्या वेळेपासून हिंदुस्थानचे रोम किंवा कॉन्सस्टॅन्टिनो-
पळ बनलें होतें. ज्या राजानें तं घेतळें तो हिंदुस्थानचा सम्राट
मानला जाई. अर्थात्‌ जेव्हां चंद्राने कनोज आपली राजधानी केली
तेव्हां त्यानें जरी प्रतिहार घराण्याचा शेवटचा सम्राट राजा सहज
जिंकला होता, तरी इतर अनेक राजे त्यास आडवे आले असावे
पूर्वोक्त चेद्राच्या दोन लेखांत (ए. इं. १४ ) पांचाळ राजाला
चपल ‘ हँ विशेषण लाविलें आहे, यावरून असें अनुमान निघतें कॉ, त्या प्रतिहार राजाचा, तो दुसऱ्या बाजीरावाप्रमाणें पळत असतां, चन्द्रास ठिकठिकाणाहून पाठलाग करावा लागला असावा

चंद्राने याप्रमाणे कनोजचे राज्य जिंकून देशास तुकाच्या त्रासा- पासून मुक्त केळे असावें. पूर्वी सांगितल्याप्रमाणें कनोजचे प्रतिहार राजे गझनीला जी खंडणी देत होते, ती वसूळ करण्यासाठी जाग- जागीं तुकांचे अम्मलदार ठेवलेले होते, त्यांस त्यानें हांकळून दिलें असावें. या खंडणीचे नांव गाहडवालांच्या ठेखांतीळ तुरुष्कदंड या शब्दाने अजरामर करून ठेविलें आहे. ह्याशिवाय चंद्राने उत्तर हिंदुस्थानांतील मुख्य क्षेत्रे काशी, कुरिक (कनोज), उत्तर कोशल (अयोध्या) ब इंद्रस्थान (हं कदाचित्‌ इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली असेल) आपल्या कबजांत घेतली असं वार्णिळेळें असतें. अर्थात्‌ तुकांच्या स्वाऱ्यांपासून हिंदू पवित्र क्षेत्रांचे रक्षण करणें ह हिंदु राजांचे कर्तव्य

कनोजचे गाहडवाल. ३२३

त्याने बजाविळें (इं. ए. १४ ). ही चंद्राची स्तुति गाहडवालांच्या बहुतेक सर्व लेखांत दिळेली आढळते, त्याने अनेक तुठादान करून तीं विद्वान्‌ ब्राह्मणांस दिलीं. तात्पर्य चंद्र मोठा पराक्रमी होता इतकेंच नव्हे, तर तो अत्यंत धर्मनिष्ठ हिंदु होता; आणि ल्याने कनोज जिंकळें याचा अर्थ हिंदूंनी म्ठेच्छांच्या त्रासापासून आयी- घतीस मुक्त करण्यासाठीं जोराचा धार्मिक प्रयत्न केला असा समजला

पाहिजे. भोजानेहि हीच सेवा केली होती (१०४०) व नंतर

कणीनें (१०६७); पण चंद्राने उत्तर हिंदुस्थानांत कनोजचें राज्य जिंकून व मजबत करून हिंदुंचं राज्य कायमच्या पायावर बसविले आणि हिंदु भारताचं आयुष्य दोभर वर्षे आणखी वाढावल चद्रामागून त्याचा पुत्र मदनपाळ गादीवर आला. याच्या व याच्या पुढील राजांच्या लेखांत याची बरीच स्तुति केळेली आहे. पण ती नेहर्माच्या वहिवार्टांची आहे; त्याच्यापासून विशेष ऐतिहासिक माहिती मिळत नाहीं. याच्यामागून याचा पुत्र गोविंदचद्र हा गादीवर आला. साधारणपोण तिसऱ्या पिरढांचा राजा तेजस्वी व बल- वान्‌ असतो या नियमाप्रमाणे गोंबिंदचेद्र हा खरोखरच गाहडवाल राजांमध्ये सर्वांत अत्यंत पराक्रमी राजा निघाला. लेखामध्ये याचें वर्णन “ नवीन स्थापिलेल्या राज्यास यानें आपल्या बाहूनीं दोरख- डाप्रमाणे बांधून स्थिर केलें ” असें येतें. “ याचे लढाऊ हत्ती तिन्ही दिश्ांस सारखे फिरत होतें ‘ असेहि म्हटलेळे आहे, बहुधा हर्षाप्रमाणेच गोविंदचंद्रानेंहि हें सेनांग फार मोठें ठेवलें असावें व त्याचा सतत उपयोग पूर्व, दक्षिण व पश्चिम या तिन्ही दिशांस तो करीत असे. उत्तर दिशेस हिमालय पर्वत होता; व ती त्याच्याराज्याची स्वयंराक्षेत सीमा असून तिकडे विशेष टक्ष देण्याचें त्यास कारण नव्हते. € नरपति–हृयपाति–गजपति–त्रैराज्यावजेता ‘ हं बिरुद त्यानेच प्रथम धारण केलें. हें तीन राजे किंवा हीं तीन राज्ये

३२४ तिसरी हिंदु राज्ये.

कोणतीं हें ठराविणें कठीण आहे व याची चचोहि झालेली नाहीं. बहुधा हृयपतीचे राज्य म्हणज कनोजच्या प्रातिहारांचे राज्य. गजपति म्हणजे बंगालचे राज्य आणि नरपति म्हणजे चेदींचें राज्य. पहिळे दोन शब्द याप्रमाणें अन्यत्र पूर्वी उपयोगिळे गेळे आहेत; व त्यांचा अथ वरप्रमा्णच भाग २ पा. ३५० यांत आम्ही दिला आहे. नरपति म्हणजे चेर्दारचें किंवा तेलंगणाचेंहि राज्य असू शकेल. या ““तेलंगणाच्या राजानं त्याच्या पदकमलाचं चुंबन घेऊन त्याचें मांडलि- कत्व कबूल केळे ‘’ असें वणन आले आहे. चंद्रदेवाच्या लेखांत जो गिरिपाते आणखी सांगितला आहे, तो आंघ्रराजा किंवा चदी राजा असावा. कारण दोघांच्याहि राज्यांत पुष्कळ डोंगर आहित. आणि आंध्र राजाचें गिरिपाति असं वर्णन भाग २ पा. ३५० वर दिलेल्या छछोकांत आहे. कोणताहि अथ घेतला तरी गोविंद चंद्राने आपली सत्ता चारी दिशांस वाढावेली आणि वंग, आंध्र ब चेदी राज्यांच्या सीमा बऱ्याच आकुंचित केल्या असें मानण्यास हरकत नाहीं. बनारस त्याच्या ताब्यांत निःसंशय होतें व बनारसच्या पूर्वे- कडील बराच प्रांत त्याच्या सत्तेखाठीं असावा. बनारस प्रांतांतील अनेक गांवें त्याने दान दिलीं आहेत व हीं दानपत्रे बनारस येथून प्रासद्द झालीं आहेत. यावरून कनोजच्या राजांची बनारस ही दुसरी राजधानी होती. किंबहुना जयचंद्रास व इतरांस मुसलमानी ठेखक बनारसचा राजाच म्हणतात. ह्यावरून कित्येक असेंहि मानतात कीं, हें राजे मुळांत ह्या शहरचेच होते

असो, ज्याप्रमाणें पूर्वेस गोड राजांशीं गोविंदचंद्रास युध्द करावे लागलं, त्याप्रमाणें पाश्चिमेकडे लाहोरच्या मसलमानाशींहि गोविंद्चं- द्रास युद्ध कश्लबे लागळें असलेच पाहिजे. आणि या रीतीनें खरो- खरच गोविंदचंद्र युवराज असतां त्यानें केलेल्या दानळेखांत मुसल- मानाशीं झालेल्या या युद्धाचा सरळ व अतिशयोक्तिरह्ित उछेख

कनोजचे गाहडवाल. ३२५

आहे. येथील अहोक फार महत्त्वाचा आहे आणि त्याचें भाषांतर येणे- ग्रमाणेंः–( या दानठेखाच्या वेळीं यमुना नदीवरील आसटिका गावीं तो होता. या गांवाचा पत्ता लागला नाहीं, पण ह्या वायव्येस असावा. या दानलेखाच्या वेळीं मदनपाळ गादीवर होता, ) “ “गोड राजा- च्या दुर्वार हत्तींची गंडस्थळें फोडण्यानें भयंकर दिसणारा आणि आपल्या असम युद्धाने हम्मीरास वैर बंद करण्यास भाग पाडणारा गोविंदचेद्र आपल्या सतत फिरणाऱ्या अश्वदलाच्या टापांचीं चिन्ह म्हणजे राज्याच्या मोहोरेची चिन्हेंच उमटलीं असलेल्या पृथ्वीचे राज्य संपादन करता झाला. ” या वर्णनावरून पंजाबच्या तुकोशीं गोविंदचंद्राच्या झालेल्या अनक खटखटींची चांगळी कल्पना येते, आणि तुकांना तह करणें त्यानें भाग पडलें असें दिसतें. ह्या वर्ण- नावरून आणखी हेंहि दिसतें की, कनोजच्या भोज प्रतिहाराप्रमाणें गोविंदचंद्राजवळहि उत्तम प्रकारचे मोठें अश्वसेन्य होतें; व तो त्याचा नेहमीं उपयोग करून त्यास सतत फिरतं ठेवी.

गोविंदचंद्र अत्यंत प्रबळ राजा होता इतकेंच नव्हे, तर तो स्वत विद्वान्‌ असून माळव्याच्या भोजाचें उदाहरण पुढें ठेऊन आपल्या दरबारांत विद्वानास आश्रय देत असे. त्याचे वर्णन या बाबतींत विविध-विचार-विद्या–वाचस्पति या विशषणानें गाहडवाल लेखांत येतें. अर्थात निरनिराळी शास्त्रे व तत्त्वज्ञान यांत तो ब्रृहस्पातिच होता. असेंहि सांगतात कौं, त्याचा लढाई खात्याचा प्रधान लक्ष्मी- घर यानें “व्यवहारकल्पद्रुम? नांवाचा ग्रंथ, धर्मशात्र व काम चालवि- ण्याची पद्धत ह्या विषयांवर लिहिला. या कारणांनीं गोविंदचंद्रास

*दुर्बारस्फारगौडद्विरदवरघटाकुम्भनिर्भेदर्भीमो हम्मारं न्यस्तवैरं मुहु रसमरणक्रीडया यो विधत्ते ॥ शश्वत्संचारेवल्गत्त्तुरगखुरपुटोलछेखमुद्रासनाय- क्षोणास्वीकारदक्षः स इह विजयते प्राथंनाकल्पवृक्षः || १ |

३२६ तिसरीं हिंदु राज्ये.

समुद्रगुप्त, हर्ष, भोज, शिवाजी, महमूद, अकबर इत्यादि महान्‌ विजेते व विद्वानांचे चहात अशा राजांच्या मालिकेत घालावयास हरकत नाहीं, र गोवेंदचंद्राने इ, स. १११४ पासून इ. स. ११५५ पर्यंत दीधकाळ राज्य केळ. इ. स. ११०४ पासून इ. स. १११४ पर्यंतची आणखी दहा वर्षे गोविंदचद्राच्या राज्यकाळांत सर व्हिन्सेन्ट स्मिथनें चुर्कानें घातली आहेत (ए’ प. 1. तिसरी आवात्त). पण गौरीशंकर ओझा यांनीं गोविंदचंद्राचा राज्यारंम इ. स. १ ११४ हा बरोबर दिला आहे. हा तारखांचा मतभेद महत्वाचा असल्यानें आम्ही यावेळचे लेख मुद्दाम तपासून पाहिले. इ. स. ११०४ पासून इ. स. ११०९ पर्यंतच्या दानलेखांत गोविंदचंद्राने स्पष्टपणें युवराज नात्याने मदनपाळ राज्य करीत असतां असं स्पष्ट सांगून सही केली आहे. तेव्हां हीं वर्षे मदनपालाच्या राज्यकालांत धरली पाहिजेत. किल्हॉनेनेहि इ. स. ११०४, इ. स. ११०६, इ. स. ११०७ व इ. स. ११०९ च लेख मदनपालाच्या नांवावर दिले आहेत. इ. स. ११०४ चा पहिला लेख इं. ए.१४ पा. १०३ यांत छापला आहे. आणि तो इटावा जिल्ह्यांतील बसही गांवचा प्रासिद्ध लेख आहे. त्यांत गोविंदचंद्रास ‘महाराजपुत्र’ म्हटलें आहे. याचा अर्थ महाराजाचा पुत्र असाच ध्यावा. शेवटल्या वाक्यांत “ हा लेख पुरोहित जागूक याच्या सल्याने केला आहे. ‘ असं म्हटलं आहे. महत्तम वाल्हण व प्रतिहारी गोतम यांच्या सल्याचाहि उल्लेख आहे. इ. स. ११०५ चा लेख इं.ए. २ पान ३५८ यांत छापला असून तो वरील लेखासारखाच आहे. त्यावर विस्तृत चची पुढें करूं. ह्यांत पांचाळ देशांतील एक गांब दान दिळें असून देणाराचा मुक्काम गंगाकिनारी सांगितला आहे. शेवटल्या वाक्यांत हा लेख वरील अधिकारी व राजाची मातोश्री राल्ह. देवी यांच्या अनुमतीनें केलां

कनोजचे गाहडवाल ३२७

। आहे असं म्हटठें आहे. इ. स. ११०७ चा तिसरा लेख सारांश
। ख्पान जे. आर. ए. एस. १८९६ पान ७८६ वर छापला आहे.
॥ राणी प्रथ्वीश्रीका हिनें मदनपालाकारितां बनारस येथ हा लेख केला.
। चौथा लेख इ. स. ११०९ चा इं. ए. १८ पान १५ वर छापला
॥ आहे. यमुनेवरील उपरिनिर्दि्ट आसटिका गावीं सूर्यम्रहणानेमित्त
। गोविंदचंद्र महाराजपुत्रान ““ मदनपाल राज्य करीत असतां! हें दान
। दिलें. ह्या लेखाच्या शेवटीं राज्याधिक्ाऱ्यांची अनुमति सांगितलेली
। नाहीं. ही सव विस्तृत माहिती आम्ही मुद्दाम देतो याचें कारण,
। यावरून दोन तान महत्वाची अनुमाने निघतात. मदनपाल इ. स,
। १०९७ मध्यें गार्दावर आला अशी पूर्वी समजूत होती, पण आतां
इ. स. १०९९ चा चंद्राचा ठेख उपलब्ध झाला आहे. संवत्‌
। ११५४ म्हणजे इ. स. १०९७ चा लेख किल्हॉर्ननेंहि चंद्राच्या
नांवावर दिला आहे. हा लेख (इ. एं. १८ पान ११) मदनपालाने इ, स.
१०९७ त चंद्राने केलेल्या एका दानाला संमाति देण्यासाठीं केला.
। ही संमाते किंवा हा लेख केव्हां झाला हं सांगितलेळें नाहीं. पण
चेद्र इ. स. १०९९ मध्यें जिवंत होता, त्यानंतर ही गोष्ट झाली
। असावी. यासाठी चंद्राचा राज्यकाळ आम्ही सुमारे इ. स. १०८०
पासून इ. स. ११०० पर्यंत धरतों ब इ. स. ११०० मध्यें मदन
पाळ राज्यावर आला असें मानतो. तो राज्य करीत असतां इ. स.
११०४, ११०५, ११०७, ११०९ चे चारी लेख गोविंद-
चेद्रानं केळें याचें आश्चर्य वाटतें. यापैकी एक लेख मातुश्री
। राणी राल्हदेवी हिनें केला आहे; आणि दुसरा लेख मदनपालाची
राणी पृथ्वीश्रीका पांचाल देशांत असतां तिच्या संमतीने झाला
’ आहे, यावरून असें अनुमान निघू शकतें कौ, या अवधींत
मदनपाळ आजारीपणामुळें किंवा अन्यकारणानें स्वतः राज्य- कारभार करीत नसून त्याचा पुत्र व राणी दान देणें वगैरे जीं

३२९८ तिसरी हिंदु राज्ये

कामें खुद्द राजाने करावयाचीं असतात, तीं करण्यास अधिकृत केलीं गेलीं होती. आणखी असेंहि दिसतें कीं, रजपूत राण्या प्रतिनिधि म्हणून अनेकदां राजांबद्दल काम करण्याचा अधिकार चालवीत. इ. स. ११०९ च्या शेवटच्या लेखांत गोविंदरचंद्र वयाने ब साम- र्थ्यीने इतका मोठा झाला असावा कीं मातुश्री राणीची संमाति घे- ‘ण्याची त्यास आवश्‍यकता उरली नव्हती. गोविंदरचंद्र स्वतः मुक्त्या- रीनें इ. स. १११४ त दान देतो ( किल्हॉर्न आणि गोरीदशकर ) यावरून दरम्यान म्हणजे १११० मध्यें तो गादीवर आला अर्से मानतां येतें.

गोविंदरचंद्र तरुणपणींच गादीवर आल्याने पुष्कळ वर्षे राज्य “करीत होता. बनारसजवळ एके ठिकाणीं एकर्वांस ताम्रठेख एकदम -सांपडळे; यांपैकी चौदा गोंबिंदचंद्राचे इ. स. १११४ पासून इ. स. ११५४ पर्यंतचे असून किलहांनेनं ए. इं. ४ मध्यें छापळे अहित. एकंदरींत आजपर्यंत त्याचे चाळीस लेख मिळाळे आहेत. अगदीं अलींकडचा केळला लेख इ. स. ११५४ चा आहे. ह्याच्या पुढचा राजा विजयचंद्र याचा इ. स. ११६१ चा सवोत अगो- -दरचा लेख सांपडला आहे. तथापि गोविंदरचंद्राचा राज्यकाळ इ. स. १११० पासून इ. स. ११५५ पर्यंत आम्ही धरतों; याच्या अली- कडे धर्रात नाहीं, याची कारणें लौकरच पुढें येतील. गोविंदचंद्राच्या दोन राण्या नयणकेलीदेवी आणि गोसलादेवी या नांवाच्या होत्या. पहिलीपासून झालेला पुत्र राज्यपाल याने युवराज नात्यान इ. स. ११४२ त एक दान दिलें आहे. तो बापाच्या पूर्वी मेला असं दिसतें.

विजयचेद्र गोविंदचेद्रामागून गादीवर आला. तोहि प्रबळ व कुशल होता. त्याच्या पुत्राच्या ळेखांत त्यानें दिग्विजय केला असें वणन आहे. पृथ्वीराजरासांत याचे नांव विजेपाळ असें दिलें आहे, “आणि ल्यांतहि यानें दिग्विजय केला असे वर्णन आहे. याचेंहि हम्मी-

कनोजचे गाहडवाल ३२९.

शीं युद्ध झाल्याचें इ. स. ११६८ च्या लेखांत वर्णन आहे. या
वर्णनांत बापापेक्षां त्यानें हम्मीराची खोड जास्त जिरवली असं
हम्मीरानें उगीचच्या उगीच पृथ्वीस त्रास देऊन संतप्त केठे तो ‘डोकांचा संताप हम्मीरांच्या स्रियांच्या डोळ्यांतील अश्रप्रवाहानीं त्यानें हामविला ‘ या काव्ययुक्त वर्णनावरून* दिसतें. शात्रवरीळ ॥बिजय त्याच्या बायकांच्या दुःखानें वर्णन करण्याची ही संस्कृत कवींची तऱ्हा चमत्कारिक आहे. असो, यावेळी हम्मीर म्हणजे उ खुश्र; हा घोरीच्या भीतीनें गझनी सोडून लाहोर येथेंच येऊन राहला ‘होता ( ११५२ ). गझनीच्या राजवशास यावेळीं उतरती कळा न , तेव्हां त्याचा विजे- ।पालानें पक्का पराभव केला हें आश्चर्यकारक नाहीं. विजयचंद्राचा ॥पुत्र जयचद्र हा इ. स. ११६८ त मांठा असून युवराजाहे झाला ‘होता. ही गाष्ट याच लेखावरून दिसते (इं. ए. १५पा.७) जयचंदाचा राज्यारोहण समारंभ इ. स. ११७०, १३ जून रोजीं

। चंद्राच्या राज्यकाळ इ. स. ११५५ पासन इ, स. ११७० हा । निश्चित होतो । जयचंद्राहे प्रबल राजा होता. पण यावेळीं अजमीरच्या चाह-

। मानांनीं कनोजच्या गाहडवालांपासून हिंदुस्थानच्या सम्राटाचा मान । हिसकून घेतला होता. ही गोष्ट विजयचंद्राच्याच वेळीं झाली असे दिसतें. कारण अजमीरच्या विप्रहपालानें दिल्ली जिंकून तेथे आपला ‘ लेख इ. स. ११६३त खोदविला आहे. यांत अशी फुशारकी मारली आहे कीं, विप्रहपालानें हिमालय आणि बिंघ्य यांतील प्रदेश जिंकून ‘ आयोवर्तास म्लेच्छांपासून पूर्ण मुक्त केळे. विजयचंद्राचा दिग्विजय

  • मुवनदलनहलाहम्यहम्मीरनारीनयनजलदघाराधोतभूतोपतापः ।

३३० तिसरी हंदु राज्ये

इ. स. ११६२च्या पूर्वी झाला असावा आणि त्याचा राज्यारंभ इ. स. ११५५त होऊन त्याचे विस्तृत विजय इ. स. ११५”५पासून इ. स. ११६०पर्यंत मानळे पाहिजेत

शेवटीं हं सांगितलें पाहिजे कीं, कनोजच्या गाहडवालांच्या राज- वंद्यातीळ पांची राजे जयचंद्रासह्द मोठे कर्तृत्ववान्‌ होते. ते सामर्थ्य- वान्‌ व विजयी असून त्यांच्याजवळ मोठ्या फौजा होत्या. त्यांनीं अनेक ब्राह्मणांस दानें दिळीं आणि विद्दज्जनांचा परामर्ष घेतला, संस्कृतांतिल पंचमहाकाव्यापैकीं नैषघकाव्य जयचदाच्या दरबारां- ताल श्रीहषकवीनं केळे आहे. जरी जयचंद ह! गर्विष्ठ होता आणि त्यानें पृथ्विराजाशीं शात्रत्व करण्यांत सवस्वनाशक चूक केली, तथापि त्याचा मृत्यु मानयुक्त झाला. महमद घोरीशीं लढतांना त्याचा हत्ती गंगेंत जाऊन तेथें तो बुडून मेला. यामुळे हल्लीच्या प्रसिद्ध रजपूत- राजकुलांपैकीं एक अत्यंत वी्यशाळी कुल म्हणजे जोधपूरचे राठोड ह आपली उत्पात्ते कनोजच्या गाहडवालांपासून झाली असं मान- तात यांत आश्चर्य नाहीं. मेवाडचे गुहिलोत वलभीच्या मैत्रकांपासून किंवा अलीकडील साताऱ्याचे भोसले मेवाडच्या गुहिलोतांपासून आपली उत्पात्ते मानतात, तशीच ही गोष्ट आहे. ही राठोडांची समजूत साधार आहे किंवा नाहीं याचा विचार पुढील टिप्पणींत विस्तृत रीतीनें आपण करू.

टिप्पणी–राठोड आणि गहरवार.

जोधपूरच्या राठोडांची दंतकथात्मक समजूत अशी आहे की, त्यांचा जो मूळ षुरुष मारवाडास प्रथम आला तो सीहाजी जयचंदाचा पणतु किंवा भावाचा नातु होता. संयुक्त प्रांताचे गहरवार (यांचा हृल्लीचा मुख्य प्रातेनाधि मिझापूर जिल्ह्यांतील कांतितचा राजा होय ) हेहि असतें मान- वात कीं, आम्ही जयचंदाचे सरळ वंशज आहोंत. जयचंदाच्या कुलाचे

राठोड आणि गहरवार ३३४१

| नांव कनोजच्या राजांच्या कित्येक लेखांत गाहडवाल असं स्पष्टपणें जेव्हां आढळले, तेव्हां जोधपूरचे राठोड व संयुक्तप्रांताचे गहरवार हे एका कुलाचे असून ते कनोजच्या गाहडवाल राजांचे वंशज आहेत कींकाय हा प्रश्न चर्चित होऊ लागला. डॉ. होनलने इ. ए. १४मध्यें या प्रश्नाची चचा केली आहे; आणि दोन तीन कारणांवरून या उत्पत्तीविषयी शका नमूद केली आहे. पहिलें कारण असें कीं, गहुरवाराचे गोल काइयप आहे आणि राठोडांचं गोतम आहे. दुसरें, या दोन कुलांत परस्पर विवाह होतो. आणि तिसरं, गहरवारांस इतर रजपूत शुद्ध कुलाचे समजत नाहींत. या तिन्ही गोष्टी खऱ्या असतील किंवा नसतील; पण त्यांवरून जोघपूरचे राठोड त्यांच्यांत प्रचालित असलेल्या दंतकथेप्रमाणें कनो- जच्या गाहडवालांपासून उत्पन्न झाले नाहींत असें सिद्ध होत नाहीं. यावी कारणें घुढें दिल्याप्रमाणें आहेत.

पहिली गोष्ट ही की, खुद्द चंद्रदेवाच्या अत्यंत जुन्या लेखांत गाहड- वालांचा वंश सूर्यवंश सांगितला आहे ( आसीदसीददययुतिवंशजातः वगेरे ), आणि चंद्रदेवाने आपल्या पुढील दोन लेखांत आपलें नांव चंद्रादित्य दिलें आहे. जोधपूरचे राठोडाहे आपल्यास सूयवंशी राठोड मानतात. ( गहरवार आपल्यास जयचंदाचे वशज मानूनाहे चंद्रवंशी मानतात हें आश्चर्य आहे ). हे राठोड दक्षिणच्या मालखेडच्या राष्ट्रकूटाहून यामुळें भिन्न आहेत, कारण ते दुसऱ्या भागांत सांगितल्याप्रमाणें चद्रवंशी रज- पूत म्हणुन वार्णिलेळे आहेत. राष्ट्रकूट हें नांव देशाचा मुख्य अधिकारी या अर्थानें अधिकाराचें नांव आहे. आणि या अथाने प्राच्य चालुक्यांच्या लेखांत तो शब्द आलाहि आहे ( भा. २ पा. १४४ ), अर्थात्‌ इं नांव भिन्न कुलांचें अथवा जातींचे अर्लांकडच्या देशपांडे किंवा जोशी या नांवा- प्रमाणें असूं शकेल, अर्थात्‌ उत्तरेस राज्य करणारे राष्ट्कूट दक्षिणेस राज्य करणाऱ्या राष्ट्कूटांहून भिन्न आहेत. जरी हे उत्तरेचे राजपूत मुळांत जोघपूरच्या दंतकथेंत मानल्याप्रमाणं दक्षिणच्या कल्याण नगरचे असले ‘ तरी ते भिन्न आहेत, गाहड हें गांव कोठें आहे हें अद्याप ठरणें आहे. दुसरं, गाहडवाल या शब्दाचा अथे काय आणि तो शब्द या कनो- जच्य राजांच्या लेखांत कसा येतो हें आपण पाहूं, इल्लींचें नांव गहर-

(4

३३२९ तिसरी हिंदु राज्ये

वार असून त्याचें मूळ स्वरूप गाहडबालळ आहे हें अलीकडेच कळलें आहे, या ज्ञानाच्या अभावीं गहरवार शब्दाची व्युत्पात्त चमत्कारिक तऱ्हेनें दोन तीन प्रकारे लावीत असत. त्याचा अथे घर बाहेर-घराच्या बाहेर किंवा ग्रहवर म्हृणजे शनि अहाचे जिंकणारे ( मिझापूर गेझेटियर

]

पा. २०४ ) असा करीत. पण आतां मूळ नांव गाहडवाल मिळालें आहे

त्याचा अर्थ लावतांना क्षत्रियांतील जम्मूवाल वगेरे नावांवरून व वैश्यां- तील अग्गरवाल शब्दांवरून गाहडगांवचे राहणारे असा बोघ घेतां येतो.

तेव्हां हे कुलनाम राहण्याच्या गांबावरून पडलें आहे, बहुघा राठोड

वंशाच्या दुसऱ्या शाखांपासून या शाखेचे भिन्नत्व दाखविण्यास हें नांव लोकप्रचारांत प्रिय झाळें असावें. कनोजच्या नाहडवालांच्या अनेक लेखांत राष्ट्रकूट नांब दिलेलें नाहीं. बहुधा मुख्यत्वे वंश म्हणजे सूर्यवंश सांगितलेला असतो. चद्रदेवाच्या अगदी पूर्वांच्या लेखांत हा वंराच सांगितलेला आहे. गोविंदचंद्र युवराज असतां मदनपालाच्या अमलांत जे लेख त्यानें लिहविले त्यांतच गाहडवाल नांव सांपडत. कनोजच्या सवे राजांच्या लेखांचें जें मामुली स्वरूप असते,त्याहून या लेखांचें स्वरूप निराळें आहे हें सांगण्यासारखे आहे. श्रीच्या नमनाचा ठराविक सकहोक यांच्या प्रारंभीं नसून त्यांत प्रथम दामोदरास नमन आहे, आणि गाह- डवाल वंशांत महीयल राजा (इ. ए. १४पा, १०३ आणि ए. इं. २ पा. ३५८ ) किंवा महीतल राजा (इ. ए. १८ पा. १५ ) उत्पन्न झाला असं सागितले आहे, हे लेख पांचाल देशांतच तयार झाले आहेत; आणि लोकांत या देशांत ।प्रेय झालेलें गाहडवाळ कुलनांव त्यांत दिले आहे. या कुलाचे वंशनांव हं नव्हतें असें दिसतें. म्हणूनच इतर लेखांत या दरबारानें ठरविलेल्या मायन्यांत तें नांव नाही.

गाहडवाल या विशिष्ट कुलाचं हें वंशनांव नाहीं ह॑ निःसंशय सिद्ध करणारें सर्वांत बलिष्ट प्रमाण आमच्या मतें असें आहे काँ, सर्व रजपूत लोकांत मान्य झालेल्या छत्तीस राजकुलाच्या यादींत हें नांव नाहीं. ही यादी केव्हां तयार झाली आणि छत्तिस संख्या कायम झाली याचा बहुतेक निश्चित अंदाज करता येतो. आपण पाहिलेंच आहे का, (भा. २ पा. ७७) कल्हणानें इ. स. ११४८ राजतरंगिणी लिहिली, त्यांत

राठोड आणि गहरवार ३३३

र .- कुलांची छत्तीस संख्या सांगितली आहे. अथात्‌ ही यादी $ गा सनापूर्वी झाली असली पाहेजे. तसेंच या यादींत कछवाहांचें नांव ग माहे हे दहाव्या हतकाच्या अताच्या सुमारास प्रसिद्धीस आले. तेव्हां ₹ री मोजदाद अकराव्या शतकांतळी आहे असें अनुमान निघतें. ही ९ भोजदाद कां केली गेली याचा विचार या भागाच्या शेवटां हिंदुस्थानची . पामाजिक समालोचना करतांना आपण करू. पण एवढें येथे सांगणे जरूर आहे कीं, पूर्वीच्या कालविभागांत (इ, स, ८०० ते १००० ) जातीचं बंघन ढिले असून निरनिराळ्या जातींत अनुलोम विवाह होत असत (भाग २ पा, ३२० ), पण या तिसऱ्या काल–विभागांत (१०००ते १२०० ) असले विवाह बंद पडले. आणि प्रत्येक जात आपली मयोदा कायम करून विवाहांची कडक बंधने अमलांत आणू ठागली. या रीतीनें आपली जात मयादित करणें रजपुतांसहि जरूर प्राटलं, यामुळें ही छत्तीस कुळांची मोजदाद अकराव्या शतकांतच झाली ईं वरील अनुमान दढ होतें. किंबहुना गोविंदचंद्राच्या एका लेखांतालि रका ‘छोकावरून हें अनुमान हृढतम होतें. या महत्वाच्या शछोकाबद्दल ज्यास्त पुढें लिहू. हा लेख गोविंदचंद्रानें युवराज असतां पांचाल देशांत केलेला असून त्या वेळी प्रचलित असलेल्या समजुती त्यांत प्रतिबिंबित प्ताल्या आहेत. पहिला गाहडवाल राजा चंद्र याच्या वेळीं हिंदु आस्तिक प्रमांनें जी पुनः उसळी मारली, त्याबरोबरच सूर्यवंशी ब चंद्रवंशी क्षात्रिय हुलांनी आपलीं जातिबधनं इढ केलीं. असो, या वेळेस लर छत्तीस फुलांची परिगणना झाली असं स्पष्ट आहे, तर गाहडवाल हें नांव कुल- गांव असतें तर तें या यादीत निराळें निश्चयाने पारेगणित झालें असते. आतां कनोजचे गाहडवाल प्रसिद्धीस येण्यापूर्वी ही यादी झाली म्हणजे ‘ अकराव्या शतकाच्या पूवोघोत झाली असें मानतां येईल, आ्याणि यामुळें यांत हे नांव नाही अर्सीाह म्हणतां येईल, पण चंद्रमाटाने ज्या वेळेस ग्रख्विराजरासा लिहिला आणि त्यांत छत्तीस राजकुलांचीं नांबे सांगितली यावेळेस जयचदाचे गाहडवालकुल यक्षाच्या परमावर्धास पोहोचले होतें नेव्हां चदाच्या छत्तीस कुल्यादींत हं नांव जरूर आलें असतें. जर

म, भा…२२
  • अठ स. €–र क्य ऱ्यग्व्य कु च्य भन.“

—€

कलि १०८ ल्क “मा

३२४ तिसरा हिंदु राज्ये

लहान लहान राजांची कुलनामेंहि या यादीत आहेत, तर जयचंदा- सारख्या भ्रबळ राजाच्या कुलाचे नांव बगळणें अशक्‍य आहे. आमच्या मतें चदाची ही यादी सर्व उपलब्ध यादीत जुनी आहे ( भा. २ पा. ७७). पण रासाग्रेंथ अव्वलपासून अखेरपर्यंत सोळाव्या शतकांतला बनावटी आहे,(आमच्या मतें तो मूळांत पृथ्वबिराजाच्या वेळचा ग्रंथ असून त्याचा विस्तार केवळ सोळाव्या शतकांत झाळेला आहे) आणि गहरवार शुद्धकुळ रजपूत ना्हात अशी सोळाव्या शतकांत कल्पना असल्यानें त्यांचें नांव रासांताळ यादीत नाहीं. असे मानलें तरी दुसऱ्या दोन याद्या, एक जेनांची व दुसरी कुमारपालर्चारताची, हाडनें दिल्या असून त्या फार जुन्या आहेत. त्या गाहडवालांच्या उदयानतरच्या आहेत. कारण कुमारपालाचा राज्यकाल इ. स. ११४३ पासून ११५३ पर्यंतचा आपण पूर्वी पाहिला आहे. त्याहूनह्दि अलॉकडचें कुमारपाळ चरित असलें पाहजे. या दोन्ही यादींत गहरवारांचें नांव निराळे दिलेळें नाहीं. जयचंदाच्या वेळीं ब त्याच्यानंतर शंभर दोनशें वर्षे गाहडवाल हिंदुस्थानांत प्रसिद्ध, असले पाहिजेत. तेव्हां त्यांचे नांव यादांत न येणे असंभाव्य आहे. ह्या यादामध्यें ठरळेली संख्या छत्तीसाहे भरत नाहीं. तेव्हां त्यांत. आणखी कांहीं नांवे सांगतांहि आलीं असती. किंबहुना जयचंद्र- सूरीच्या इ. स, १४०० च्या सुमारास लिहिलेल्या रंभामंजरी जयचंद्र हा नायक असून सूत्राधाराच्या प्रारंभींच्या वाक्यांत अगदी प्रथमच “छत्तीस कुळ राजवंशांना शिरोमाणिभूत?’ असेंच जयचंदाचे वर्णन केलें आहे. तात्पर्य, गाहडवाल हें नांब वंशनांव नसून एका शाखाकुलाचें नांव गांवावरून पडलेलं असले पाहिजे,

आतां मुख्य कुल अथवा वंश गाहडवाल राजांचा कोणता हा प्रश्न उपस्थित होतो, छत्तिस नांबांच्या यादींत असलेल राष्ट्रकूट कुल हेंच यांचें मुख्य कुळ असलें पाहजे असा पूण संभव दिसतो. आमच्या मते या गोष्टींचा निदर्शक बदाऊं राष्ट्रकुट लेख आहे. या लेखाची अद्याप निश्चित होत नाहीं. जयचंदाच्या पराभवाच्या पूर्वीचा तो

1 षट्वरिंशद्राजन्यवंशभालस्थलल्यमान श्री इक्ष्वाकुवंशभूषणस्य,

राठोड आणि गहरवार. ३२३५

यांत शका नाहीं; कारण त्यांत मदनपाल या राजाविषयीं असं म्हटलें आहे को, “मुसलमानांच्या हिंदुस्थानावरील स्वाऱ्या यानें अशक्य केल्या” ( ए. इं. १ पा. ६४). या लेखाच्या आरंभीं पुढील “कोक आहे.

  • प्रख्याताखिलराष्ट्रकूटकुलजद्ष्मापाळदोःपालिता । पाज्ञयालामिधदेशभूषण- करीबोदामयूतापुरी । ‘ यांत प्रारंभीं आखिल व प्रसिद्ध असं विक्षण राष्ट्रकूट कुळाला लाविले आहे; यांतील आखिल शब्द सर्वव्यापि अशा अर्थाचा

*्3

आहे, व त्यावरून राष्ट्रकूट कुलाच्या अनेक शाखा असून त्या सर्व पांचाल देशाला व्यापून ( यांत कनोजचा अन्तभाव होतो ) राज्य करीत आहेत ‘ असे म्हटलें आहे. किंबहुना कनोजच्या राज्यास पांचाळ राज्य अश्लीच सर्वत्र संज्ञा आहे. ( अल्बेरूनीनें कनोज पांडवांकरितां प्रासद्ध आहे असें जे म्हटलें आहे तें पांचालाकरितां असें समजलें पाहिजे. पांडवांचे मुख्य आघार पांचाळ असून द्रोपदी त्या देशाची कन्या होती. ) पांचाल देशांत राज्य करणाऱ्या सवे राष्ट्रकूट शाखा अखिल शब्दाने सूचित होत नसर्ताळ, तर छोकांतील तो अखिल शब्द अथेद्यून्य आहे असे म्हणावें छागेळ, जयचंदाच्या पराभवापूर्वीचा हा पुरावा असून यावरून असें दिसतें को, जयचंद राठोड होता ही गोष्ट नेतर जशी सर्वत्र मान्य आहे,

  • तशीच त्याच्या वेळींहि मान्य होती. छत्तीस राजवंशांवेकीं दुसऱ्या कोणत्याहि राजवंश्ांत गाहडवालांना घालण्यास एखादी देतकथा किंवा लेख याचा आघार आपणांस मिळत नाहीं. अथोत्‌ संयुक्त प्रांताचे गहरवार व जोधपूरचे राठोड हे एकाच वंशाचे म्हणजे राष्ट्रकूट वंशाचे आहेत असेंच ठरतें.

या निर्णयाविरुद्ध जीं कारणें दाखविलीं जातात, तीं आमच्या मतें विशेष बलवान नाहींत. गहरवारांचें हल़वचिं गोल काऱ्यप आहे हें खरें. परंतु गाहडवालांचे सरळ वंशज राज्यभ्रष्ट झाल्यानें ऐश्वर्यददीन झाले; त्यांच्यांत षुरोहिताची संस्था कायम राहिली नाहीं, यामुळें ते आपलें मुळ गोत्र विसरले असावेत. क्वचित्‌ प्रसंगीं धार्मिक विधींच्या वेळीं गोत्रोच्चार १ जरूर असतो, तेव्हां ज्यांना गोत्राचें स्मरण नाहीं, त्यांनीं काऱयप गोत्र

  • घ्यावें हा नियम ठरलेलाच आहे; त्या नियमान्बयें हं गोत्र आलें असेल, किंवा असें आधिक संभवनीय आहे काँ, गहरवारांनीं नवे पुरोहित

३३६ तिसरा हिंदु राज्ये. आपल्या पडत्या काळांत घेतले आणि ज्या क्षात्रियांना गोत्र नाहीं, त्यांनीं पुरोहिताचें गोत्र घ्यावें या विज्ञानेश्वराच्या नवीन चाळू झालेल्या सिद्धांता- प्रमाणें त्यांनीं नवीन गोत्र घेतलें असावें. कदाचित्‌ असेंहि. असूं शकेल की, याच नियमानुसार सिहाजीच्या जोघपूरच्या वंशजांनी नवीन गोत्र गौतम घेतलें असावे, आणि गाहडवालांचें जुनं गोत्र काश्यप असावं. गाहडवालांच्या लेखांत दुदेंवाने त्यांचें गो दिलेलें आढळत नाहीं. किंबहुना यावेळच्या बहुतेक रजपूत कुलांच्या लेखांत गोत्र दिलेलें नसतें. कनोज येथे जाऊन अनेक ब्राह्मण कुलांपा्शीं आम्हीं स्वतः जञयचंदाच्या गोत्राविषयीं चौकशी केली. त्यानें राजसूय यज्ञ केला अश्ली प्रसिद्ध बोलवा आहे, ब त्यावेळीं अनेक कनोजी ब्राह्मणांची कुळें क्रत्विकू, अध्वयु वगेरे यज्ञांत काम करणाऱ्या ब्राह्मणांची असलीं पाहिजत. त्या ब्राह्मणांपार्शी यज्ञासंबघीचा एखादा कागद मिळविण्याचा आम्हीं प्रयत्न केला, परतु तो सिद्धीस गेला नाहीं. तथापि असा संभव दिसतो कीं, जयचंदाचें. गोत्र कायप नसावे. कारण उपरिनिर्दिष्ट रंभामंजरी नाटकांत जयचंद आपल्या मुख्य राणीस काइयपकुलनंदिनी असें संबोधितो. रजपूत घरा- ण्यांत राण्यास त्यांच्या बापाच्या कुलावरून हांक मारण्याची चाळ आहे. हें प्रसिद्ध आहे. तात्पर्य, या सर्व कारणांवरून गाहडवाल व राठोड यांच्या गोत्रभेदावरून त्यांच्या एकवंशात्वाबद्दलच्या अनुमानास बाघ येत नाहीं. अथात्‌ राठोड व गहरवार यांच्यांत परस्पर विवाह होतो या गोष्टी- नेहि बाघ येत नाहीं, प्रथम तर ही गोष्ट सत्य नाहीं असेंच पुष्कळ लोक म्हणतात; पण ती सत्य मानली तरी हीं कुलें पूर्वा एक वंशाची होतीं. ह्या म्हणण्यास बाघ येत नाहीं. कारण क्षत्रियांच्या निरानेराळ्या वंद्यांत विशेषतः पंजाबांत अश्शी लग्न करण्याची चाळ सुरू झाली आहे, जम्मूस तर एका पंडिताने असें सांगितलें की, एकाच गोलांत पंचवीस पिढयानंतर लयन करण्यास हरकत नाहीं असें स्मातिवचन आहे. ही गोष्ट जरी चूक आहे, तरी रञपूतांत एकाच कुलांत ल्ञें होऊं लागलीं आहेत हें नाकारतां येणें शक्‍य नाहीं. आणि गहरवार हें ज्या अथी एक निराळें कुल झालें आहे आणि टोडनें दिलेल्या छत्तीस कुलाच्या अगदीं अलीक- डील चोथ्या यादींत गहरवार व राठोड हे निराळे सांगितळे आहेत, त्या.

राठोड आणि गहरवार. ३३७

अथी असे विवाह क्वचित्‌ झाले असतील, पण येथेहें सांगितले पाहिज का, ‘राजपुतान्यांतील रजपूत, कुलाच्या बाहेर विवाह करावा हा नियम छत्तीस ‘ कुलाच्या यादीबरहुकूम कडकडीत पाळतात. यांत गोत्रांचा नियम पाळला जात नाहीं हें खरे. उदाहरणार्थ ‘जांडजा? आणि ‘चूडासमा’ हें एक गोत्राचे असळे तरी आपसांत विवाह करितात. छत्तीस कुलांच्या पहिल्या तीन यादींत त्यांचें नांव नाही, पण चोथ्या यादींत हीं कुले गहरवार राठोडाप्रमाणंच निरानेराळीं सांगितली आहेत.

शेवटीं गहरवार कमी दर्जाचे रजपूत आहेत अशी जी कल्पना केली आहे. ती चुर्कांची आहे. आणि ते तसे असतील तर इल्लॉंच्या ‘ गहरवारास तसें करणारी कांहीं विशिष्ट कारणें असतील. कनोजचें | राजघराणें गाहडवाल होतें ही गोष्ट हल्लीं समजली आहे; या गोष्टीने या कल्पनेस कायमची मूठमाती दिली पाहिजे. कारण जयचंद, गोविं- दचंद्र आणि चंद्र हे त्यांच्यावेळीं उत्तम कुलीन क्षत्रिय मानले जात होते. सर व्हिन्सेन्ट स्मिथने असा तक केला आहे कौ, गाहडवाल हे मूळचे “भर? लोक होते. या तकाला कांहींच आधार नाहीं, मदनपाल युवराज गोविंदचंद्राच्या पूर्वाळिसित ताम्रठेखांत एक महत्वाचा छोक आहे. (इं. ए. १८ पान १५) तो या विषयासंबंधारने येथे देणें मह- त््वाचं आहे. ह्याचें भाषांतर येणंप्रमाणेंः–सूय॑ आणि सोम यांपासून झालेलीं प्रसिद्ध क्षात्रिय कुलें विध्वस्त झाल्यावर जगतांत वेदध्वनि बंद झाला. असे पाहून ब्रह्मदेवाने घर्ममार्ग पुनः कायम करण्यासाठी आणि क्षत्रियांचे प्रसद्ध दोन वंश पुनः स्थापन करण्यासाठीं स्वतः अवतार घेण्याचें मनांत आणलें. आणि वरील ( गाहडबाल ) कुलांत महाराज

| प्रध्वस्ते सूर्यसोमोद्गवविदितमहाक्षत्रवंशा-द्र्‍येस्मिन्‌ । उत्सत्रप्रायवेदध्वाने जगदखिलं मन्यमानःस्वयम्भूः | कृत्वा देहग्रह्मय प्रवणमिह मनः शुद्धबुद्धिधोरेत्र्या- सुधी घममागान्प्रातिथमिह तथा क्षत्रवंशद्दये च ॥ वंशे तत्र ततःस एष समभूदभूपालचूडामाणेः । प्रध्वस्तोद्धतवेरिवीरतिमिरः श्रीचंद्रदेवोनुपः ॥

३३८ तिसरा हिंदु राज्ये

चंद्रदेव राजचक्राचा ‘चूडामाणि उत्पन्न झाला, त्यानें शत्रृंच्या उद्धत वीरांनी उत्पन्न केलेला अन्धघःकार नाहींसा करून टाकला. ” यावरून असें दिसतें कीं, ( गाहडवाल राजकुलाचा संस्थापक चंद्रदेव यानें सूर्य- चंद्रवंशी क्षात्रियांची आणि वैदिक घमाची पुनः स्थापना केली असे त्या- वेळीं लोक समजत, तो धघमंशील क्षालिेय रामासारखा वेद आणि घनु- वेंद या दोहोंत प्रवीण होता असे लोक मानीत असें दिसतें. या “छोका- वरून असाहि दिसतें काँ, महंमुदाच्या शदिपायांनीं व त्याच्या नेतर आ- लेल्या मसऊद या सुलतानाच्या सैन्यानें त्यावेळीं क्षत्रियांचा बराच नाश केला असावा. आणि राहिलेल्या क्षात्रियांत वौदिक—घमोीचरणाचा बराच लोप झाला असावा. अर्थात्‌ चंद्रदेवे गाहडवालास लोक ब्रह्मदेवाचा अवतार मानूं लागले हें साहजिकच होतं. कारण ब्रह्मदेवानंच प्रथम वेद उच्चारला आणि ब्राह्मण व क्षत्रिय उत्पन्न केले. यावरून हं निश्चित होतें की, कनोजचें गाह॒डवालकुल कम अस्सल क्षाश्रय होते अशी सम- जूत त्यांच्या वेळीं तरी असणें शक्‍य नाहीं. आणि छत्तीस राजकुलांमध्यें त्याची गणना व्हावयासच पाहिजे होती. आणि तशी ती मुख्य कुल राठो- डांत झाली असेंच मानलें पाहिजे.

हा भाग संपवितांना वरील नछोकावरून निघणारीं आणखी दोनतीन अनुमानें सांगणें अवश्‍य आहे. पहिली गोष्ट ही कीं, बाराव्या शतकाच्या: पूर्वार्धात क्षात्रिय वंश दोनच मानले. जात होते. आश्निवशासह तीन मानीत नसत, दुसरी, वंश शब्द दोन अर्थानें वापरला लात असे; महा वंश आणि कुल, वरील ‘छोकांत या दोन्ही अर्थानें तो आला आहे. त्याच- प्रमाणे भा, ९ पा. २२ वर छत्तीस वंशांची यादी रासामधून जी आम्हीं दिली आहे त्यांताहे तो दोन्ही अर्थानें आला आहे. तिसरी गोष्ट ही की, कलियुगांत क्षात्रिय उरले नाहींत हा सिध्दांत यावेळीं अस्तित्वांत आला नव्हता. निदान उत्तर हिंदुस्थानांत जेथें हा ताम्रळेख लिहिला गेला आणि त्यांत ब्रह्मदेवाने स्वतः चंद्रदेवरूपानें अवतार घेऊन क्षात्रियांचें सूबेचंद्रवंश पुनः प्रस्थापित केळे असें वर्णिले आहे, तेथें निदान हा सिध्दांत प्रचाडित झालेला नव्हता, यावरून भा. २ परिशिष्ट ४ पान ४१२–४ १७ वर आम्हीं जें मत प्रतिपादन केलें आहे त्यास पुष्टि मिळते

राठोड म्हणजे गाहडवाल हे दाश्षिणचे आहेत काय ? ३१९, टिप्पणी, राठोड म्हणजे गाहडवाल हे दक्षिणचे आहेत काय ?

जोधपूर बिकानेरचे राठोड हे भाग दोनमध्यें वर्णिलेल्या राष्ट्रकूटांहून आमच्या मतें भिन्न आहेत, हे राष्ट्रकूट सात्यकांच्या वंशांत जन्मलेले चद्रवशी क्षात्रय आहेत असें त्यांच्या कोर्रांव लेखांत सांगितलेले असतं. परंतु जोधपूर-बिकानेरचे राठोड (राष्ट्कूट ) ब॒ कनोजचे गाहडवाल | हे त्यांच्या लेखांत सूर्यवंशी वार्णलेळे असतात. तेव्हां ते जरी दक्षिणेतून ‘ आले असले, आणि ते राष्ट्कूट हें हुद्याचें नांव जरी एकच घेतात तरी । मल्खडच्या राष्ट्कूटाहून भिन्न मानले पाहिजेत, हे राठोड दक्षिणेंतून आले । अश्ली सामान्य समजूत आहे ही तरी खरी आहे काय? या प्रश्नाचा विचार आम्ही या टिप्पणींत चारणांच्या लेखांवरून व रंभामंबरी नाटिका ( यांत जयचंद हा नायक आहे ) हिच्या आघारें करणार आहोत, गाहडवाल आपल्या लेखांत आम्ही दक्षिणेतून आलों असे, ज्याप्र- माणें बंगालचे सेन आपल्या लेखांत आम्ही कनांटकांतून आलो, आम्ही कर्नाटक क्षत्रिय आहोंत असे स्पष्ट म्हणतात. त्याप्रमाणें, म्हणत नाहींत, पण असें न म्हणणें कांहींच अनुमानाला जागा देत नाहीं. विधान अवश्य असल्याशिवाय विघान नसणें यावरून अनुमान कांहींच निघत नाहीं. बिकानेर दरबारच्या ग्रेथसंग्रहालयांतील सरकारी ख्यात लेतांवरून असे दिसतं कीं, राठोड हे मूळचे अयोध्येचे व तेथून एका राजानें येऊन परस्पर कनोज शहर घेतलें, पण ही हकीकत विश्वसनीय नाहीं, कारण ऐेतिहासिक काळांत इ. स. ४०० पासून इ. स. ११०० पर्यंत कनोज, हें मौखरी, वधेन, वर्मा व प्रतिहार इतक्या राजकुलांच्या ताब्यांत होतें. शिवाय हे, ख्यात जयचंद आणि त्याचा बाप विजयपाल यांचा उल्लेख ‘ करतात, पण गोविंदचंद्र आणि त्याचे पूर्वज यांचा उललेख कर्रांत नाहींत. ‘ गोविंदचंद्र व त्याचे पूवज यांचा उल्लेख जोधपूर दसरांतील लेखांतहि ‘ नाहीं. जोघपूर येथील एका ख्यात वहीत ब्रिकानेर प्रमाणेच दक्षिणचा ‘ उल्लेख नाहीं, पण दुसऱ्या एका वहीत असें आढळतें कीं, विपुलाचा ‘ खुत्र नंदपाळ कनांटकचा राजा झाला, आणि त्याचें वंशज कनोजस येऊन

३४० तिसरी हिंदु राज्ये

राज्य करू लागले, या कनोजच्या वशांत विजयपालाचा पुत्र जयचंद हा शेवटचा राजा झाला, विजयपालाच्या बापाचे नांव अभयचंद असे दिलेलें आहे. (हें नांब गोविंदचंद्राचें अन्य नांव असावे.) आणि त्याच्या बापाचे नांव ब्रम्ह अस दिलें आहे. कोरीवळखांत चंद्रदेव ब्रम्हाचा अवतार होता असे वागेलें असल्याचे आपण आतांच पाहिल आहे. तेव्हां या दंतकथे- वरून गाहडवाल दक्षिण कनाटकांतून आलं असें दिसत. पण जोधपूर येथींल ठेखांतहि कल्याणचे नांव नाहीं. याच सरकारी वहीसारखा राज घुरोहितापाशीं जो वंशलेख आहे त्याच्या मथळ्यांत असे शब्द आहेत-

अयाचध्या पाछे कुकनदरा, गड कल्याण, कनांटकदंश पाछे कनोज ‘ हं वाक्‍्यहि संदिग्ध आहे. कारण कल्याण कोकणांतील आहेव कनाटकांतहि

आहे, कनांटकचे कल्याण सोमेश्वर चालुक्यानें अकराव्या शतक्राच्या मध्याचें सुमारें स्थापन केलें; तेव्हां गाहडवाल बहुघा तेथून आले नसा-

वेत. अर्सोह असू शकेल की, ते प्रथम अयोध्येहून कोकणांत गेले व तेथून कनांटकांत व शेवर्टी कनोजेस आले. ही एक संदिग्धता आहे तरी राठोड ऊफ गाहडवाल हे दखूखन

म्हणज महाराष्ट्रांत उत्तरेकडे गेले असें कित्यक कारणांवरून दिसतें.

पाहिली गोष्ट ही कों, हुद्याचें नांव राष्ट्रकूट हे दक्षिणेकडील लळेखांतच सांपडते. किंबहुना देश किंवा प्रांतवाची राष्ट्र शब्द दक्षिणेंतच येतो. (मलू राष्ट्र, गोपराष्टर, पांडुराष्टू हें महाभारतांतील देशांच्या यादींत दक्षिणेतले देश आहेत. तसेंच अशोकाच्या शिलालेखांत राष्ट्रीक हा शब्द दक्षिणे तच येतो. ) दुसरं, जोधपूर येथे अशी समजूत आहे कौ, राठोडांच्या

(र 1

कुलदेवांची मूर्त जोधपूरच्या एका राजाने दक्षिणेतून आणली, तिचें इल्कॉंहि नांव नागनोची ! असं मराठी आहे. तिसरें नयचंद्रसूरी यान

रंभामंजरी नांवाची एक नाटिका लिहिली असून तींत जयचंद नायक आहे. ही नाटिका जयचंदानेतर दोनशे व्षोनी प्राकृत महाराष्ट्रांत लिहि- लेली आहे, यांत एक शुद्ध मराठींत रचलेली कविता पाहून आम्हांस आश्चर्य बाटले. पहिल्या अंकाच्या प्रारंमांच वैतालिकांच्या तोंडांत जय- चंदाच्या स्तुतिपर गावयाचें जे पद्य घातलेले आहे तें मराठींत आहे. जरि पेखिला मस्तकावरि केशकला पु । तरे परिख्‌खटा मयूराचे पिच्छप्रतापु |

राठोड म्हणजे गाहडवाल हे दाक्षिणचे आहेत काय? ३४१

जरि नयनावैषयु केला वेणीदण्डु । तरी साक्षात्जाला भ्रमरश्रेणीदण्डु ॥ जारे हग्गोचरि आला विश्ालभालु | तरी अर्घचन्द्रमण्डळ मईलऊणयुजाळु ॥ भूजुराल जाणूद्द्वेधीकृत कंदर्पचायु | नयननिर्जित सुजला खेजनु निःप्रापुत ॥ मुखमण्डळु जाणु शश्रांक देवताचे मण्डल । सर्वांग सुंदर मूर्तमंतकामु । कल्पन्दुम जैसे सवलोकआशाविश्रासु ॥

बहुतेक सर्वे नाटक दरबारी महाराष्ट्रो भाषेंत असून हें एवढेंच पद्य मराठींतळें घातलें आहे. ह्यावरून असें अनुमानें निघेल कीं, नयचंद्र हा दक्षिणचा जैन पंडित असावा. पण ह्याहिपेक्षां विशेष समवनीय अनुमान असें की, जयचंदाच्या दरबारचे वैतालिक दक्षिणचे असावेत. आणि यांचीं स्तुतिपर पद्ये मराठींत गावयाचा परि- पाठ असावा. तात्पर्य, गाहडवाल कुल दक्षिणेतून आलेले दिसतं, आणि ही त्यांची परंपरा नयचंद्रसुरीच्या कालापर्येत माहित असावी, दहाव्या व अकराव्या शतकांत दक्षिणचे क्षात्रिय व उत्तरेच क्षात्रिय असा भेद पडला नव्हता. आणि महाराष्ट्रांतील गाहडवाल हे उत्तम क्षत्रियांत गार्णले जात होते. याच नाटकांतील जयचंदाच्या प्रशंसापर पहिल्याच विशेषणावरून हें दिसते.हें दक्षिणचें राष्ट्रकूट कुल उत्तर हिंदुस्थानांत सर्वे देशभर बदाऊं- पासून मिथिलेपयेत पसरले, ही गोष्ट अकराव्या दतकांतील लेखांवरून स्पष्ट दिसते, या कुलाची गाहडवाल नांवाची एक शाखा असून तिने कनोज जिंकून तेथे आपले साम्राज्य स्थापन केलें.

ही टिप्पणी संपवितांना या नाटकावरून दोन गोष्टी दिसतात त्या

अन्यत्र सांगितल्या असल्या तरी येथ पुन्हां आम्ही सांगतों. जयचंदाच्या

पाहिल्याच विदशेषणावरून छत्तीस राजकुलांचें शिरोभूषण ग[हडवाल कुल मानलें जात होतें. अथात्‌ तं निराळें कुल असतें तर छत्तीस कूलांच्या प्राचीन यादींत त्यांचें निराळें नांव यावयास पाहिजे होते. दुसरं, जयचंद आपल्या मुख्य राणीस * काइ्यपकुळलनंदिनी ? असे संबोधितो. राजपुतांत राण्यांस त्यांच्या जन्मकुलावरून संबोधण्याचा प्रधात हृल्लींहि आहे. अथात्‌ या राणीचा बाप काऱ्यप-गोत्री होता, तेव्हां गाहडवालांचें गोळ काश्यप किंवा शांडिल्य असू शकत नाहीं.

प्रकरण नवव. बंगालचे पाल राजे.

आमच्या इतिहासाच्या दुसऱ्या कालविभागांतीळ पाळ राजांचा इतिहास भाग २ प्रकरण ९ यांत आम्हीं दिला आहे. तेथें महीपाळ पहिला येथपर्यंत हकिकत आली आहे. तिसऱ्या काल-विभागांतहि

हें पालघराणें राज्य करीत होतें. (इ. स. १०००ते इ. स. १२००). _

पीळ ०

अर्थात्‌ पुष्कळ काळपर्यंत राज्य करीत असलेलें हें राजघराणें संस्म- रणीय आहे असें जं सर व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो ते बरोबर आहे. तथापि, या राजघराण्याच्या राज्यकालाचे दोन ठळक विभाग पडतात; आणि आश्चर्य हं कीं, पह्िळा विभाग महीपाळ पहिला याच्या शेवटीं म्हणजे या भागांत घेतलेल्या कालविभागाच्या आरंभींच पडतो. बहु- तेक पालांच्या लेखांत असें लिहिलेठें आढळतं कीं, महीपालाचें राज्य ( किंवा त्याच्या बापाचे ) या सुमारास कांहीं वेळ नष्ट झाळें. कारण महीपालानें ‘ अनधिकृत लोकांनीं बळकाविलळेलें आपलें पैतृक राज्य पुनः मिळविले ‘ असें नेहमीं या लेखांत वाक्य* येतं ( सारनाथ ठेख इ. स. १०२६ इं. ए. १४ पान १३९ ). सर इ्हिन्सेन्ट स्मिथ यानें इ. स. १९०९च्या इं. ए. मध्ये पालांच्या उपलब्ध सर्व लेखांची यादी विस्तृत माहितीसह दिली असून त्यांची वंशावळहि प्रत्येक

राजाच्या राज्यारोहणाच्या संभवनीय काळासह दिलेली आहे. ल्या

यादींत महीपालाचा राज्यारोहण-काल स्मिथनें इ. स. ९८० धरला

आहे. कारण यानें पुष्कळ वर्षे राज्य केळे, इतकेंच नव्हे तर लेख

नंबर १७ मध्यें त्याचें राज्यवष ४८ दिलें आहे. तर इ. स. ९८०

  • अनधिकृतविठुप्तं राज्यमासाद्य पित्र्यम्‌ ।

बंगालचे पाल राजे. ३४३

हा त्याचा राज्यारंभकाळ धरला असतां अनधिकृत लोकांनीं राज्य बळकावल्याचा काळ हाच धरला पाहिजे. मागेपुढे धरणें योग्य होणार नाहीं. दुर्दैवाने कोणीं राज्य बळकाविळें व कसें याचा तपशील कोण- त्याही लेखांत मिळत नाहींत. मागच्या भागांत (पा. २३२४ ) आम्हीं असा तके केला आहे कीं, महमुदाच्या स्वाऱ्यांनीं जो धक्का हिंदु- स्थानास बसला तो बंगालपर्यंत पोहोंचला. आमचे असे म्हणणें नाहीं कीं, मुसल्मानधरमीं तुक त्यावेळीं इतके दूर पूर्वेस पोहोंचळे. पण हे मानणें राक्‍य आहे कौं, जे रजपूत राजे पंजाबांतून किंवा वायव्ये- कडील प्रांतांतून राज्यभ्रष्ट होऊन देशोधडी लागले, त्यांच्यापैकी कोणी तरी इतके पूर्वेस येऊन हें राज्य बळकाविलें. हिंदुस्थानच्या इतिहा- सांत असा प्रकार कित्येकदां घडला आहे. ( उदाहरणार्थ, अछलाउ- द्दिनानें चितोडांतून स्थानभ्रष्ट केलेले शिसोदिये नेपाळांत जाऊन राज्य बळकावून बसले. किंवा राठोड हे जयचंदाच्या पराभवानंतर मार- वाडांत जाऊन राज्य बळकावून बसले. ) पण हीं, दिनाजपूर लेख जे. आर. ए. एस्‌. बंगाळ १९११ यांत छापला आहे. त्यांत गोडाच्या एका कांबोज राजानें दिनाजपूर येथे शिवाचे देवालय बांधलें असें वर्णन आहे. यावरून असा तक॑ बांधला आहे कीं, या लेखाची तारीख शके ८८८ म्हणजे इ. स. ९६६ ही वरील वृत्ताच्या जवळ असन एखाद्या कांबोज राजानें गोंडावर स्वारी करून राज्य बळका- विळें असावें. ( काम्बोज म्हणजे पश्चिम तिबेट). या राजापासून किंवा त्याच्या वारसापासून आपल्या बापाचें गोडराज्य महीपालाने घेतलें असावें. परंतु हा प्रकार फारच लवकर उत्पन्न होतो. आणि विग्रह- पालाच्या वेळीं राज्य दुसऱ्या कोणीं बळकावले असें कोणत्याही ले- खांत सांगितलेले नाहीं, आणि विग्रह्ममालानें इ. स. ९६०पासून इ. ]काम्बोजान्वयजेनगोडपतिना तेनेन्दुमोलेरयम्‌ । प्रासादो निरमाये कुंजरघटावर्षे जगदभूषण: ॥

३४४ तिसरी हिंदु राज्ये

स. ९८*०पर्यंत राज्य केळे. शिवाय वरील दिनाजपूर लेखांत कांबो जाने पालांचें राज्य घेतलें असे वर्णन नाहीं. आणि पालांच्याहि लेखांत त्यांचे राज्य एखाद्या कांबोजराजानें घेतलें असेंहि वणेन नाहीं, तेव्हां असेंहि म्हणतां येते की, गोडराज्यांतीलच एखाद्या मांडलिकानें हा बखेडा उत्पन्न केला असेल आणि तो महीपालानें मोडून त्यास हुस- कावून लाविलें असेल.

या मध्यंतरी राज्य बळकावण्याची खरी हकीकत कांहीं असो,
मर्हापाळ पहिला यानें पाल-राजघराण्याच्या नवीन आयुष्यास प्रारंभ
केला. आणि न्यायानें व पराक्रमाने ४८ वर्षावर राज्य केलें. सर्व
पालराजांमध्यें त्यानें आपळें नांव बंगालच्या लोकांच्या स्मृतींत कायम
ठेविळें आहे. “ ओरिसा व कुचबहारच्या कोपऱ्यांत सुद्धां त्याच्या
स्तातिपर गाणीं अद्याप ऐकू येतात. ‘ त्यानें आपलें राज्य पश्चिमे-
कडे मगध व बिह्ार यांवर पूर्ण बसविलें आणि पूर्वेबंगाल व उत्तर-
बंगाल किंबहुना ओरिसा व आसाम त्याच्या राज्यांत अन्तभूत होतें त्याच्या कारकादींत बौद्ध धमाला पुन: जोर आला. व धमपाळ आणि इतर कित्येक साधु मगधांतून इ. स. १०१३ मध्यें तिबेटांत गेळे त्या देशांत गौतमाच्या धर्मास त्यानीं पुन: पूर्वीच्या उज्वलतेस आणलें ([स्मथ. पा. ४००) अतिश नांवाचा दुसरा धमेप्रचारक विक्रम- शीलाहून महीपालाच्या पुढचा राजा नयपाल याच्या कारकीदीत इ. स. १०४२त तिबेटास गेळा. असो, मह्दिपाळ पहिला यानं इ. स. ९८०पासून इ. स. १०३८पर्यंत स्मिथच्या मतें राज्य केलें. त्याच्या मागून त्याचा पुत्न नयपाल व त्याच्यामागून त्याचा पुत्र तिसरा विप्र- हपाळ इ. स. १०५९मध्यें राजा झाला. चर्दाचा कण प्रतिहार सम्रा- टांच्या उतरत्या काळांत आपली सत्ता बनारसच्या पूवेस विशेषतः चेपारण्यांत वाढवीत होता. त्याचा पराभव विग्रहपालानें केला असें ‘वर्णन आहे. याचा “ आमगाछी ? ठेख भाग दोन यांत आम्हीं वर्णि-

बंगालचे पाल राजे. ३४५.

। लाच आहे. हा तानदां प्रसिद्ध झाला आहे. डॉ. होर्नळ याने ( इ. | ए. १४ पा. १६२) नंतर किल्हॉननें दुरुस्त करून (इं. ए. २१ । पा. ९७ ) आणि शेवटीं आर. डी. बानरजीने, विग्रहपालळ इ. स. । १०८०मध्यें मरण पावला. त्याचा ज्येष्ठ पुत्र महीपाळ दुसरा गादी- ‘ वर आला. येथपर्यंत पाळ घराण्याचा दुसरा विभाग सुमारें रंभर वर्षे उत्कर्ष पावला. आणि येथून त्याच्या सत्तस उतरती कळा लागली. मह्ीपाळ दुसरा आपल्या भावास कैदेंत टाकून जुलमानें राज्य करूं लागला. यामुळें कैवर्तानीं एका दिव्योकाच्या नेतृत्वाखालीं बंड केलें. महौपाल या बंडांत मारला गेला. तेव्हां त्याचा धाकटा भाऊ शूरपाल । यानं थोडा वेळ राज्य केलें. पण वरंद्रामध्ये म्हणजे उत्तर बंगालमध्ये । कैवतांची ही बंडाळी मोडली नाहीं. आणि दिव्योकाच्या मागे तेथें त्याचा पुत्र भीम सत्ताधारी झाला. विम्रहपाळ तिसरा याचा कनिष्ठ पुत्र रामलाल हा मोठा जोरदार आणि लायक राजा निपजला. त्यानें हूरपालानंतर वरेंद्र जिंकण्याची तयारी केली. त्याची राजधानी अद्याप गोंड म्हणजे पश्चिम बंगालांतील मोंधीर येथेंच बहुधा असावी. याचा मामा “ मोहन ‘ मिथिळेचा मांडलिक राष्ट्रकूट कुलांतला होता, त्यानं व इतर मांडलिकांनीं व कांहीं दोस्त राजांनीं-यांपैकी पीथीचा देव- रक्षित एक होता-अशा सर्वांनी मदत केल्यानें रामपालानें भीमास जिंकळें. भीम शेवटीं मारला जाऊन वरेंद्रांत रामरायाची सत्ता कायम झाली. हा तपश्ीळ एका काव्यावरून मिळाठा आहे. हें काव्य सुंध्याकरनंदि * रामपालाच्या सांधिविग्नहेक प्रधानाचा पुत्र याने केलेलें असून त्यांतील प्रत्येक छोक द्वय्थी आहे, अर्थात्‌ हें काव्य समकालीन पुराव्यासारखं आहे. तें बरेंद्राची राजधानी पोंडवर्धन येथे लिहिलें गेळें. त्यांत एका अर्थानें रामपालाचा इतिहास दिला आहे; व दुसऱ्या अर्थानें अयोध्येचा अवतारी राजा राम याचा इति- हास दिला आहे. या काव्याच्या पहिल्या सगौवरच टीका असून

३४६ तिसरी हिंदु राज्ये

अर्थबोध होतो. बाकीच तीन सर्ग अजून लागले नाहींत. आणि ताराप्रसादशास्त्री यांनीं या सर्व हकीकती प्रोसीडिंग आर. ए. एस्‌. बेंगॉल १९०० इसवी यांत प्रसिद्ध झालेल्या आपल्या या रामचरि- तरावरील लेखांत दिल्या असून, आणखी असं म्हटलें आहे कीं, या दृह्यर्थी छोकांच्या तीन सर्गात बरीच ऐतिहासिक माहिती भरलेली सध्यां अज्ञात आहे. ( पान ७३ ).

सुदैवाने गोविंदचेद्राची एक राणी कुमरंदेवी हिच्या आअतिराय महत्त्वाच्या सारनाथ लेखावरून वरील हइकीकतीस चांगला दुजोरा मिळतो. हा लेख ए. इं. ९ पान ३१९ वर छापलेला आहे. या लेखांत तीन रजपूत कुलांची म्हणजे पाल, राष्ट्कूट व गाहडवाल या कुलांची अतिशय महत्त्वाची माहिती आपणांला मिळते. आम्ही या तिन्ही राजांच्या विषयीं माहिती पालास प्रारंभ करून देतों. यांत असें सांगितळें आहे कीं, रामपालाचा उत्कष, त्याचा मामा मथन अंगदेशाचा राजा ( मांडलिक ) याने पीर्थाचा राजा देवराक्षित यास जिंकून करविला. * हें पीथी कोठें आहे हें सांगतां येत नाहीं. पण हा लेख प्रसिद्ध करणारा स्टेन कोनो यांच्या मते वेंगी देशांतील पीठापूर हें ते होय. महण हा गोंड देशांतील निर्भय वीर होता असें वर्णन आहे. यावरून गोड राजा रामपाल याचा तो मांडलिक ठरतो. तो अज्ञापहि वर्णिला आहे. अज्ञ म्हणजे मिथिल येथील तो राजा असावा. त्याला शकरंदेवी नांवाची कन्या होती. देवरक्षिताचा परा- भव केल्यानंतर रजपुतांच्या चालीप्रमाणें त्यासच त्यानें ती मुलगी

गॅः

गोडे5द्वेतमटःसकांडपटिकःक्षत्रेकचूडामाणिः । प्रख्यातो महणो5व्यप!क्षितिभुजां मान्योडभवन्मातुलः ॥ तं जित्वा खलु देवराक्षितमधात्‌ श्रीरामपालस्य यो । लक्ष्मी निर्जित-वैरिरोधन तया दैदीप्यमानो दयाम्‌ ॥

बंगालचे पाल राजे. ३४७

दिली. तिच्यापासून प्रसिद्ध राणी कुमरंदेवी उत्पन्न झाली; व तिनें

या लेखानें संस्मरणीय केलेला बौद्ध विहार बांधला. यावरून असे दिसतें कीं, देवराक्षित हा बौद्ध होता. व ह्याची मुलगी कुमरदेवी

हीहि बौद्ध होती. गोविंदचेद्र हा कट्टा हिंदु असून त्याशी तिचा

विवाह झालेला होता. त्याचे वर्णन गहडवाल वंशांतील चंद्रराजाचा पोत्र व मदनचंद्राचा पुत्र असें यांत केळें आहे. गहडवालांना प्रासिद्ध

’ क्षत्रवंश असे म्हटलेळें आहे. ह्यावरून ते उत्तम क्षत्रिय त्या वेळीं

समजले जात होते. तसंच महनाला क्षत्रचुडामाणि म्हटलेले आहे, ह्यावरून तोहि उत्तम राजपूत होता असें ठरतें. वर निर्दिष्ट केलेल्या रामचरित्रांत तो राष्ट्रकूट म्हणजे राठोड होता असें सांगितळें आहे. त्याची बह्वीण ही रामपाठाची आई होती. यावरून रामपालहि रज- पूत ठरतो. महनाची कन्या देवरक्षिताला दिली होती ह्यावरून तोहि रज- पूत दिसतो. या विवाहसंबंधानें राष्ट्रकूट व गाहडवाल एक असा जो आम्हीं सिद्धांत प्रतिपादिळा आहे त्यास बाध येत नाहीं हें लक्षांत ठेविळें पाहिजे. कारण देवरक्षिताची मुलगी राष्ट्रकूट कुलांतील स्त्रीपा- सून झालेली गाहडवालाला दिली; म्हणजे राष्ट्रकूटाच्या मुलींची मुलगी गाहडवालाला दिलीं, अर्थात्‌ राष्ट्रकूट आणि गाहडवाल यांत हा शारीर- संबंध झालेला नाहीं. असो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट पालाशीं संबद्ध नसली तरी या लेखांत आलेली येथें सांगण्यासारखी आहे. गोविंद्चंद्राच्या ताब्यांत बनारस होते हें आपल्यास ठाऊकच आहे. या लेखांत असें वर्णिळें आहे कीं, तुरुष्क शिपायांनीं दूषित केलेल्या वाराणर्शाचें रक्षण करण्याकरितां हरानें सांगितल्यावरून हरीने गोविं- दचेद्ररूपानें अवतार घेतला. 1 स्टेन कोनोनचे असें मत आहे कीं, | जगाति गहडवाले क्षत्रवंशेप्रसिद्धे जानि नरपतिचन्द्रश्वन्द्रनामा नरेन्द्र: ।

वाराणसी भुवनरक्षणदक्ष एको दुष्टां तुरुष्कसुभटादवितु हरेण । उक्तो हरिःस पुनरलर बभूव तस्माद्रोबिंदचंद्र हाते सुप्रथिताभिधानः ॥

३४८ तिसरा हिडु राज्ये

या छोकावरून गोविंद्चंद्राच्या वेळीं बनारसेवर तुकाच्या स्वाऱ्या झाल्याचें दिसतें. पण वरीळ छोकाचा अर्थ तुर्की शिपायांनीं पूर्वीच विटाळलेल्या बनारप्तेचें रक्षण करण्यासाठीं गोविंदचंद्र आला. म्हणजे तुर्की शिपायांनीं या शद्वाचा संबंध रक्षणाकडे न घेतां, दुष्टाकडे ध्यावा. त्याशिवाय बनारसाला दुष्ट म्हणतां येणार नाहीं. या लेखां- वरून बनारसेवर तुकांचीं स्वारी झाली ही गोष्ट निश्चित होते, . परंतु हें दूषण पूर्वींच घडळें असावे; किंबहुना या शद्वांत अहमद | नियाल्तर्गीन यानं केलेल्या स्वारीचा उल्लेख दिसतो. कोनोनें जे भाषांतर दिलें आहे त्यांत दुष्टाम्‌ ‘ या शब्दांचे भाषांतर चुकीनं . राहिलें आहे. ( छो. १६ पान ३२७), ।

बंगालचे पाल राज़े ३४५९

हा लेख आपली मिति सांगत नाहीं, तरी यांत जो राजांचा मेबेध-म्हणजे रामलाळ याचा मामा महन होता आणि गोविंदचंद्राची कुमरदेवी ही महनाच्या मुलीची मुलगी होती असा-दाखाविला र आहे, यावरून रामलाल हा गोविंदचंद्राच्या पूर्वीचा दिसतो, स्मिथने याचा राज्यारंम इ. स. १०८० दिला आहे तो अर्थात्‌ बरोबर आहे. प्र त्यानें सर्व बंगालवर पुष्कळ वर्षे राज्य केलें. मिथिल देश त्यानें ९ ्नुकला आणि ्भामासाहि त्यानें लढाईंत मारलें या गोष्टी बेद्यदेवाच्या क्रमोली येथील लेखांतहि सांगितल्या आहेत. ( ए. इं. २ पा.३५०) प्रांत त्याचा पुत्र कुमारपाळ हा कामरूपाचा राजा एका द्यर्थी छो- क्रांत उछेखिळा आहे. आणि रामपालानें रामाप्रमाणें भामरूपी रावण पारा व मिथिळेची कन्या म्हणजे भूमि मिळविली असं खुबीने प्रणंन केलें आहे.” त्यावरून भामाने उठावेलेलें बंड फार मोठें होतें. आणि त्याशीं लढणें रामाच्या समुद्रोळंधघनासारखें कठीण होतें. जे. आर. ए, एस. बंगाळ “५१९ पान ६८ वरील लेखांतहि या बंडाचा उछठेख आहे. याचा जास्त उछलेख पुढं येईल, । रामपालामागून इ. स. ११३० मध्ये कुमारपाल गादीवर बसला. उपरिनिर्दिष्ट ए. इं. २ यांतील लेखांत त्यांचे नांव नाहीं. आणि याच्या मागन इ. स. ११३६ त याचा मलगा गोपाळ तिसरा शादीवर आला. या दोन राजांविषयीं विशेष गोष्टी सांगितलेल्या मिळत नाहीत. गोपाळाचं नांब तर, त्याचा चुलता मदनपाल इ, स. ११४० त ल्याच्या मागून गादीवर आला, त्याच्या एका अलीकडे पतांपडलेल्या लेखांत मिळालें आहे. याचा एक ताम्रलेख जे. आर. ए रस. बंगाळ ६९ भा. १ पा. ६६ मध्यें प्रासद्द झाला असून त्यांतही *तेने येन जगजये जनकभूलामाद्ययावयशो) . . क्षोणीनायकभीमरावणवघायुद्धाणवोऴघनात्‌ ॥ म, भा…२३

३५० तिसरीं हिंदु राज्यं

मनोरंजक माहहती दिली आहे कीं, हा गांव एका ब्राह्मणास, त्याची राणी चित्रमाटेका हिला समग्र महाभारत ऐकवंल्याबद्दल दान दिला गेला. यावरून ह्या राजा बोद्ध होता तरी तो ब्राह्मणांस अनुकूळ होता व त्याची राणी ब्राह्मणाकडून महाभारत ऐेकण्याइतकी माक्ति- मान्‌ हिंदु होती असें दिसतें. दुसरें या पालांचें बहुतेक दानठेख पोंडूवधन भुक्तीमधळे म्हणजे वरेंद्र अथवा उत्तर बंगालमधले आहेत आणि सेनांचेहि दानठेख याच प्रांतांतठे आहेत. सेनांची सत्ता मुख्यतः पूव बंगल्यांत होती, आणि उत्तर बंगाळ पाल व सेन यांत वाटलेले असावें. पश्चिम बंगाळ व मगध बिह्ारासह पालांच्या सत्ते- खालीं असावें. मदनपालाच्या कारकारदीतील राजकीय घडामोडी आपल्याला विशेष माहीत नाहीत. परंतु त्याच्या वेळेस पालांच्या राज्यास उतार लागला. मदनपालाच्या मागें त्याचा मुलगा गोविंदपाळ इ. स. ११६१ मध्यें गादीवर आला. एक लेख विक्रम संवत्‌ १२३२ चा त्याच्या राज्यकाळाच्या चौदाव्या वर्षांचा (स्मिथची यादी पह्ा. ) सांपडला आहे. त्यावरून ह वर्षे निश्चित होतें. याच्यामागून महींद्रपाळ गादीवर आला. याचे ठेख सांपडलेले आहेत. त्यांतील शावटचा ११९३ चा आहे. लोकांच्या दंतकर्थत बिह्ारवर स्वारी करणारा मुसलमान महंमद बखत्यार खिलजी यानें ज्या इंद्रथ्ुम्नाचा नाश केला, तोच हा असावा.

बाराव्या शतकांत बंगालचे दोन भाग पडून एकमेकांशीं विरोध करणारीं दोन राज्यें म्हणजे पश्चिमबंगाल्यांत मोंघीर येथील पालांचे आणि पूर्व बंगाल्यांत गौर येथें राज्य करणाऱ्या सेनांचें अशीं दोन राज्ये झालीं हें दुर्देव आहे. हे दोन्ही प्रांत वंद व भाषा यांनीं एक असून यांची सामाहि स्पष्ट आहे. अशा प्रांतांत दोन सत्ता उत्पन्न होण्यापासून दोघांचोहि बळ कमी झालें. आणि दोहोंत धर्मभेद अस- ल्यानें ह्या दुष्ट पारिणाम जास्तच झाला. याचा परिणाम असा झाला

बंगालचे पाल राजे. ३५१

कीं, दोघांनाहि एका परकी सत्तेने व धमाने सहज एक मनुष्यहि खर्ची न घालतां जिंकठें. याचा इतिहास पुढें येईलच.

सुदैवाने पाळ राजांच्या मित्यांबद्दल फारसा तंटा नाहीं. आणि पालवंश!च्या या दुसऱ्या भागांतील राजांची वंशावळ, त्यांच्या ले- खांच्या मित्या व सर व्हिन्सेन्ट स्मिथ यानें सुचावळेळे त्यांचे राज्या- रोहण-काळ (इ. ए. १९०९ ) यांसह आम्हीं पुढें देत आहों. या मित्यांवरून सेनराजांच्या मित्यांबद्दल दुर्देवाने जो फारच विवाद आहे त्याचा निर्णय करण्यास आपल्यास बर्रांच मदत मिळेल.

बंगालच्या उत्तर पाल राजांची वंद्यावळ. ( सर व्हिन्सेन्ट स्मिथ इं. ए. १९०९ पा. २४४ ) महीपाल पाहेला ( ९८० ) लेख १०२६. । नयपाल (१०३२९) ले. १०४२.

विग्रश्‍याल तिसरा (१०३६) ले. १०५७. |

|) । । महीपाल दुसरा (१०८०) शझूरपाल दुसरा (१०८२) रमापाल (यक्षपालट १०८४ ) 1 । मदनपाल

(११४०) गोपाल तिसरा (११२३६) राणी चित्रमटिका

स््स्क््या कुमारपाल (११३०)

90 नची

1 गोंविंदपाल (११६४)

| ढे. ११७५, ११७८ महेंद्रपाल (११८०) ले. ११९३

ऊर्फ दंतकर्थंतील इंद्रचयुम्न.

__ प्रकरण दहावे. लखनोतीचे ( बंगाल ) सेन.

बंगाळचे सेन राजे मुख्य तीनच असले तरी फारच कडाकक्‍्या- च्या विवादाचे आस्पद झाळे आहेत. ल्यांच्याविषयी असलेली माहती थोडी आणि संशयित आहे. इतकेंच नव्हे, तर इतिहासकार व इतिहाससंशोधक यांनीं आपापल्या पूवग्रहानुरूप दुर्दैवाने याकडे भिन्द्ृष्टि लाविळी आहे. मुसलमानी इतिहासकारांनीं निदान यांच्या बाबतींत तरी अतिशयोक्ति करून महंमद बखल्यार याचे धाडस आणि हिंदु राजांचा भित्लेपणा कमालीचा दाखावेला आहे. डा. डी. आर भांडारकर यांचा पृवेग्रह रजपुतांची अनार्यापासून उत्पत्ति झाली या कल्पनेकडे असल्यानं ते, सेन हे मुळांत परकी ब्राह्मण अथवा पुजारी असन पुढें क्षत्रिय झाळे असं दाखावितात, तर बंगालचे हल्लींचे सेन हे वैद्य जातीचे असल्याने सेन राजे वैद्य जातीचेच होते असं म्हण- तात. तेव्हां या तिन्ही गोष्टींचा आपल्यास विस्तारपूबेक विचार करा- वयास पाहिजे. पण व्या पूर्वी या मतभेदांतून जितका निर्विवाद सेन घराण्याचा इतिहास आपल्यास मिळतो तो आपण प्रथम पाहूं

सेनांचा प्रारंभीचा इतिहास देवपाडा शिलालेखांत स्पष्टपणें दिला आहे. (ए. इं. १ पा, २००). या लेखांत असं सांगितळें आहे कीं, दाक्षिणात्य एक सरदार सामन्तसेन कनीटक राजाचा मांडलिक होता, व कनीटक ठुटण्यास आलेल्या अनेक इत्रंस त्यानें ठार केळं. होतें. तो वृद्धपणीं तेथून निघून गंगाकिनारीं येऊन राहिटा. आणि पूवे बंगाल्यांतील काशीपूर येथ ([स्मथ ) त्यानें एक लहान राज्य स्थापिळें. त्याचा पुत्र हेमंतसेन बलवान्‌ राजा झाला, त्यापासून राणी यशोदेवीच्या पोटीं विजयसेन या घराण्याचा पाहिला विख्यात राजा

लखनातोचे ( बंगाल ) सेन. ३५३ जन्मला. यानें कामरूप राजावर स्वारी करणाऱ्या गोड राजास जिंकळे व एका कलिंग राजासहि जिंकटें, असें या लेखांत सांगितलें आहे. गौड राजा म्हणजे पाश्चिम बेगाल्यांतील मोंधीरचा पाल राजा होय. तो व कलिंग म्हणज ओरासाचा राजा हेच दोन सेनांचे प्रबळ प्रातेस्पर्धी होते हें उघड आहे. विजयसेन हा धमंनिष्ठ हिंदु होता. आणि पाल राजे बोद्ध होते. अर्थात्‌ सेनसत्तेचे स्थापन म्हणजे बंगाल्यांत आस्तिक हिंदुधरमांचें पुनरुज्जीवन होय. किंबहुना देवपाडा लेखांत विजयसेनानें अनेक यज्ञ केल्याचे उछेख आहेत. सर व्हिन्सेन्ट स्मिथ, विजयसेन हा ह्या घराण्याचा पहिला स्वतंत्र राजा, असें म्हणतो तें योग्य आहे. पण याच्या स्वतंत्रतेची मिति ११ १९ इसवी त्यानें दिलेली बरोबर दिसत नाहीं. याच्या पूर्वीची ती मिती असावी. लक्ष्मणसेन-शकाचा प्रारंभ १११९ इसवी आहे. कित्येक लेखांच्या या शकांत आणि शालिवाहन शकांत दिलेल्या मित्यांवरून किलहॉ- नेने हें आरंभ वर्ष निश्चित केळे आहे. अबुलफजलनेंहि सेन शका- रंभवर्ष १०४१ शाढिवाहन दिलें आहे. तिरहूतचे लोक सेनशका- रॅम १०२८ शा. शक मानतात हें चूक आहे असें किल्हॉर्न मानतो, (इं, ए. १९ पा. ७) पण हा मुद्दा निश्चित झाला तरी सेनशक कोणीं सुरू केला आणि कधीं या प्रश्नाबद्दल फारच मतभेद आहे. सेनांचे तीन राजे सामंत, हेमंत व विजय यांचे राज्यारंभ स्मिथ इ. स. १०८०,११०० आणि १११९ मानतो ( हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास आवृत्ति ३ री पा. ४१९ ) ह्यावरून त्याच्या मतें लक्ष्मण- सेनानें आपला हक आजा विजयसेन याच्या राज्यारंभापासून सुरू केला. गौरीशंकर ओझा असे म्हणतो कीं, ह्या हक विजयसेनाचा पुत्र ब्ठाळसेन यानं मिथिलदेश जिंकल्यावेळीं आपल्यास लक्ष्मणपुत्र झाल्याची खबर ऐकून सुरू केला. ( प्राचीन ळेखमाला पा. ४२ व हिंदी टॉड, पा. ५२६), मिस्टर डी. आर. बानर्जी यांनीं बळाळसेनाचा

३५४ ___ तिसरी हिंदु राज्यं

एक नवीन लेख ए. इं. १४मध्यें छापतांना असें म्हटळें आहे कीं, (पा. १६९ ) हा शक टलक्ष्मणसेनानें आपल्या राज्यारंभाच्या स्मर- णाथ सुरूं केला. हें मत साधारणरीत्या सरळ आणि शकस्थापनेच्या नेहमीच्या कल्पनेस अनुसरून आहे. किंबहुना तत्कालीन मुसल- मानी पुरावा ( तबकात्‌-इनासिरी ) असा आहे कीं, बछाळसेन वारला त्यावेळेस त्याची राणी गर्भवती असून गर्भातील लक्ष्मणसेनावर जन्मा- पूर्वींच मुकुट ठेविला गेला. ही तबकातनें ज्या अनेक असंभाव्य गप्पा मारिल्या आहेत त्यांपैकीं एक गप्प असेल; परंतु इतिहासदृष्टया असें

मानतां येईल को, लटक्ष्मणसनाचा जन्मे आपल्या बापाच्या मरणा-

नंतर इ. स. १११९त झाला. आणि लक्ष्मणसेनानें हा शक स्थापन केला. ही गोष्ट मानली तर त्यानें आपल्याच राज्यारंभापासून म्हणजे जन्मापासून तो शक सुरूं केला असें मानणें साहजिक आहे. पण यावराहि एक हेका उपस्थित होते; तीही कौं,लक्ष्मणसेनाच्या एका लेखांत त्याचें राज्यव्ष ७ दिलें असून त्याला परम वैष्णव म्हटलें आहे. (जे. आर. ए. एस. बंगाळ ४४ भा. १ पा. ७ ). ज्याअर्थी जन्मा- पासून तो राज्य करू लागला त्याअर्थी तो सात वर्षांचा लहान असतां त्याच्या पालकाने हया लेख केला असें मानेळें पाहिजे. पण ज्याअर्थी त्याचा बाप आणि ल्याचा आजा हे दोघेहि शैव होते, त्या- अर्थी हा सात वषांचा दौवच मानला जावा. परमवैष्णव कसा होऊं शकेल £ तात्पर्य हा प्रश्न अद्याप संशायेतच आहे. जोपर्यंत या सेन राजांच्या एखाद्या लेखांत त्यांच्या राज्यवर्षांबरोबर विक्रम किंवा राक- वर्ष दिलेलें मिळणार नाहीं, तोपर्यंत याचा निकाल लागणार नाहीं. पालराजांच्या प्रमाणेंच या सेनराजांच्या दानलेखांताहे दान देणाऱ्या राजाचें केवळ राज्यवर्षेच दिलेलें असतें, यामुळें या राजांची वंशा- वळ तर्कावरून दोन तर्‍हेनें देणें आम्हांस भाग आहे. एक सर व्हिन्सेन्ट स्मिथ यानें सुचाविळेल्या मित्यांची व दुसरी आर. डी,

ल्लनाताच ( “५९७ /) स्वन. «७

बानर्जी यांनीं सुचाविलेल्या मित्यांची. कित्येकांनी असाहि तर्क केला आहे कीं, लक्ष्मणसेन दोन होते, परंतु मुसलमानी लेखकांनीं टि हि- ल्याप्रमाणें लक्ष्मणसेन एकच होता. आणि तो इ, स. ११९९ त 1८०व्या वर्षी वारला असें आम्हीं निश्चित धरतो.

। हा मित्यांचा घोटाळा बाजूस ठेऊन सेन राजांचा इतिहास निश्चित ॥ झाला आहे तो थोडक्यांत पुढीलप्रमाणें आहे. विजयसेन हा प्रथम । स्वतंत्र राजा असून तो पूर्व बंगालवर राज्य करीत होतो. पाश्चेम | बंगालवर पालांचें राज्य होतें. त्याचा पुत्र बठाळसेन त्याहूनाहि । सामथ्यवान्‌ होता. त्यानें मिथिल देश जिंकून पालांची सत्ता आणखी । कमी केली. येर्थाठ कैव्तांनीं बंड करून दुसरा महीपाळ किंवा रामपाल यास कैद केलें होतें. त्या कैवतीस यानें जिंकले. हा आस्तिक । हिंदु होता. व त्यावेळच्या इतर रजपूत राजांप्रमाणें स्वतः विद्वान्‌ . । असून विद्वानांचा चाहता होता. त्यानें दानसागर नांवाचा ग्रंथ । लिहिला आहे. आणि दुसरा एक ग्रंथ लिहणे त्यानें सुरू केलें; तो । त्याचा पुत्र लक्ष्मण सेन यानें संपावेला. ब्रद्धपणीं आपल्या राणीसह क्षेत्र प्रयागास जाऊन त्रिवेणीच्या पवित्र संगमांत त्यानें जलसमाधि

घेतली. ( गोरीशंकर )

याच्या मागून लक्ष्मणसन गार्दावर आला. तोहि आपल्या बापा- सारखाच पराक्रमी व विद्वान्‌ होता, सेनांची राजधानी गोर ही होती हे शाहर हांच्या माळडा जिल्ह्यांत बंगाल्यांत आहे. आणि अद्याप हं जुनें नगर तेथें दाखवितात. पण टक्ष्मणसेनानें जवळच नवीन नगर वसविले, त्यास लक्ष्मणावती म्हणजे लखनोती असं नांव आहे लक्ष्मणसेनाने या रीतीनें अनेक राजाप्रमाणे या काळांत आपल्या नावांचे शहर कणाच्या कणावतीप्रमाणे किंवा विक्रमाच्या विक्रमपृर- प्रमाणे (या जुन्या राजधान्या त्रिपूर व कल्याणजवळ स्थापिल्या गेल्या आहेत,) स्थापिले. लक्ष्मणसेन अनाहिलवाडचा जयासहृ व कल्याणचा

त १000000000 वत 3201 र

विक्रमादित्य यांच्यासारखा पराक्रमी असून त्यांच्याप्रमाणे एक नवीन  

शकहि त्यानें सुरू केला, या शकारचें आरंभ वर्ष किल्हॉनेनें इ. स.

१११९ ठरविलें आहे. वरील इतर दोन शकाप्रमाणे हा बंद न पडतां.

अद्याप तिरहूतमध्यें चाढू आहे.

आपल्या वडिलाप्रमाणेंच लक्ष्मणसेन विद्ठानू असून विद्वानांचा

आश्रयदाता होता. ज्यांचे ग्रेथ कालाच्या महोदर्धावर अद्याप तरंगत आहेत असे पंडित त्याच्या दरबारांत होते. हलायुध, उमापतिधर, शरण, गोवधेना’चार्य, धोरी, जयदेव, ( गीतगोविंदाचा कतो ) आणि श्रीधरदास हे त्यांपैकी प्रासद्द आहेत. या राजाचे पूर्वज शेव होत

पण हा वेष्णव होता असं त्यानें आपल्या लेखांत लिहिलें आहे

हरीची भक्ति करणारे बंगाल्यांतील आधुनिक कवी त्याच्या वेळेपासून उत्पन्न झाळे. बंगाल्यांत हरिभक्तींचा उगम याजपासून आहे. आणि वणाोश्रम धमीची पुनः स्थापना किंबहुना कुलीन विवाहाची चमत्का- रेक संस्था अमलांत आणणारा त्याचा बाप बहाळसेन होता. या दोन्ही गोष्टींबद्दल हिंदुस्थानची सामाजिक परिस्थती या भागांतील वर्णनाच्या वेळीं आम्हांस जास्त लिहावे लागेल. लक्ष्मणसेन स्वतः फारच उत्तम वैयाक्तेक गुणांचा आगर होता. विश्वसनीय लोकांनीं असं सांगितलें आहे कीं कोणीहि लहान मोठा त्याच्यापासून अन्याय पावला नाहीं. त्याचे औदार्य तर कणीसारखे दृष्टांतमत होतें

या राज्याच्या अन्ताविषयीं आम्हीं पुढील एका प्रकरणांत लिहू

परंतु पूवेबंगाल्यांताळ सेन राजांची सत्ता याबरोबर नष्ट झाली आणि देश मुसलमानांनी जिंकला. तथापि पूर्वभागांत याही पलीकडे कांहीं सेन राजे तेराव्या शतकाच्या अंतापर्यंत राज्य करीत होते. लक्ष्मण- सेनाचे तान पुत्र माधवसेन, केशवसेन आणि विश्वरूपसेन विक्रम- पुरांत राज्य करीत होते, आणि केशव आणि विश्वरूप यांचे लेखहि सांपडळे आहेत. तबकात्‌वरून असें दिसतें कीं, जेव्हां नासिरुदी-

लखनोताीचे ( बंगाल ) सन. ३५७

। ननें ठलखनौतीवर स्वारी केली, तेव्हां बंगालचा बंडखार खिलजी । सुभेदार पूर्वेकडे वंगराजावर स्वारी ‘ करण्यास गेला होता. [ म्हणजे । ही स्वारी वर सांगितलेल्या सेन राजांवर होती. ] गौरीशंकर ओझा । म्हणतात कीं, ( हिंदी टॉड पा. ४३८ ) दनुजमाधव हा यावेळीं ॥ विक्रमपूर सोडून चंद्रद्वीपांत गेला होता. त्यानें पुढें बालबनला बंड- खोर सुभेदारास शासन करण्यास मदत केली व त्यास नदीतून । पळून जाऊं दिळें नाहीं. शिवाय दनुजमाधव।नंतर चार राजे चंद्र- पुरांत झाळे, हावटचा जयदेव असून ल्याबरोबर सेन घराण्याचा अंत झाला असंहि गौरीशंकर यांनीं लिहिलें आहे.

सेन घराण्याचा उपलब्ध झालेला वृत्तांत थोडक्यांत वरप्रमाणें
आहे. शेवटीं हे राजे कोणत्या जातीचे होते या वादग्रस्त प्रश्ना-
। विषयीं विचार करूं. लखनोती मुसलमानांनी कशी जिंकली यावि-
। षयीं वाद आहे तो पुढें एका प्रकरणांत सांगूं. डॉ. डी. आर. भांडा-
रकर सेनराजे हल्लीं सर्व हिंदुस्थानांत प्रसुत असलेल्या ब्रह्मक्षत्र जा-
तीचे होते असें म्हणतात. पण हे राजे आर्य क्षत्रिय म्हणजे रजपूत
। असून चंद्रवंशी होते असें स्पष्ट आहे. भांडारकर म्हणतात त्याप्र-
। माणे ब्रह्मक्षत्र नव्हते किंवा हल्लींचे बंगाल्यांतील वैद्य म्हणतात त्या-
। प्रमाणें वैद्य जातीचेहि नव्हते. कारण, उपरिगनेर्दिष्ट देवपाडा लेखांत
। प्रारंभींच असें स्पष्ट सांगितलें आहे कीं, सामंतसेन चेद्रवशांत
उत्पन्न झाला होता. हा शब्द रजपृतांनाच लागू पडतो. ब्रह्मक्षत्रांना
किंवा वैद्यांना लागत नाहीं. त्यांच्यांत सूर्यवंशी चंद्रवंशी हा भेदच
। नाहीं. पूर्वोक्त पूर्व प्रहानें मन भरळें असल्यानें भांडारकरांचें लक्ष या
लेखांतील सामंत सेनाविषयींच्या £छोकांत असलेल्या ‘ब्रह्मक्षत्रियाणाम्‌!
शब्दाकडेच गेलें. पण या शोकाच्या पूर्वीच्याच छोकांत काय
सांगितलें आहे हे त्यांनीं पाहिलें नाहीं. व तेथें हे राजे चंद्रवंश्ांत
जन्मले असें सांगितलेळें आहे इं लक्षांत घेतलें नाहीं. यामुळे या

३५८ तिसरी हिंदु राज्ये

बिधानाशीं जळतां असा ‘ ब्रह्मक्षात्रयाणाम्‌* या शब्दाचा अर्थ घेतला पाहिजे. भाग २ मध्यें (झर. २ पहा) आम्हीं दाखाविलें आहे कीं, हा

शब्द हिंदुधमाभिमानी व त्या धमाप्रमाणे आचरण करणाऱ्या रज- पुतांना लावलेला सांपडतो. किल्हॉ्ननेंहि याचें भाषांतर दिलेळें

चुकीचे आहे, आणि ह्याच्या अथात ब्राह्मणांचा समावेश होऊं शकत नाहीं, ब्राह्मण व क्षत्रिय कुलांचा शिरोमाणे असा याचा अथ नसून ब्रह्मयुक्त म्हणजे ब्रह्म अथवा वैदिक कम करणाऱ्या क्षात्रिय कुलांचा शिरोमाणे असा याचा अथ आहे. किंबहुना पाहिल्या ओळींत असलेला ब्रह्मवादिन्‌ शब्द सामन्ताला याच अर्थानें लाविलेला आहे धर्मोभिमानी क्षत्रिय शब्द, बोद्ध झालेल्यापासून अथवा इतर क्षत्रियांपासून आपला मिन्नपणा दाखावेण्यासाठीं ब्रक्मक्षत्रिय असा शब्द आपल्यास लावून घेत. तात्पर्य, या शब्दांत जातिवाचक अथ मुळींच नाहीं. जाति पूर्वीच्याच छोकानें ठरली आहे; ह्यांत हे चद्रवशी आहेत असं सांगण्यांत हे रजपूत आहेत असेंच निष्पन्न झालेलें आहे

पण थोडा वेळ भांडारकर म्हणतात त्याप्रमाणें वरील शाब्दानें हे ब्रह्मक्षत्र जातीचे आहेत असे . मानले त्तरी यापुढें जे आणखी विधान त्यांनी केलेले आहे आणि जें मान्य करून सर व्हिन्सेन्ट स्मिथनें आपल्या इतिहासांत उध्दत केळें आहे त्याला आधार काय £ हें विधान असं आहे. (स्मिथचा इतिहास तिसरी आवृत्ति पा ४२०) “मीं अन्यत्न आपलें मत सांगितल्याप्रमाणे नवीन आलेल्या लोकांचे हे त्राह्मण असून पुढें हे हिंदुसमाजांत समाविष्ट होण्या-

पर्वी क्षत्रिय झालेले आहेत. ही कल्पना केवळ कपोलकल्पित निरा-

घार आहे. यांना ब्रह्मक्षाविय म्हणतात म्हणन आणि ती एक निराळी जात आहे म्हणन ते एका बाहेरच्या परकी जातीचे मुळांत ब्राह्मण (१) होते आणि पूर्वी ब्राह्मण असून मागून क्षत्रिय

लखनोर्ताचे ( बंगाल ) सन. ३५९

आणि हा बदल ते हिंदुसमाजांत समाविष्ट होण्यापूर्वी झाला हे एकावर एक चढविलेले तर्क कसे उत्पन्न होतात ! बाहेरून आलेल्या जाति हिंदु लोकांत समाविष्ट झाल्या किंवा नाहीं ह्या प्रश्नाची चची ॥आम्ही भाग दोनमध्ये केलीच आहे. पण वरील तर्क येथें भांडारकरानीं ।केवळ पूर्वग्रह्मानें केळे आहेत आणि स्मिथनेंहि पुष्कळ रजपूत कुळें ॥परकी लोकांपासून उत्पन्न झालीं आहेत ह्या कल्पनेच्या पूर्व प्रहानें |ह्या तक॑ मान्य केला आहे,

। हा निश्चय सेनांचा चंद्रवंश सांगितला आहे एवढ्यावरूनच अनु: ‘मान काढून होतो असें नसून बंगाल जे. आर. ए. एस. व्हा. ५ प्रोसीडिंग पा. ४८७ यांत छापलेल्या लक्ष्मणसेनाच्या माढर्रीनगर ।दानलेखांत क्षत्रिय शब्द स्पष्ट वापरला असल्यानें पक्का होतो. या लेखांत वीरसेनाच्या कनोट क्षत्रिथ कुलांत सामन्तसन जन्मला असें स्पष्ट म्हटळें आहे. हा कुल–संस्थापक वीरसेन कनीटकी किंवा दाक्षिणात्य होता हा प्रश्न महत्त्वाचा नाहीं. देवपाडा येथील बल्लाळसेनाच्या पूर्वीच्या लेखांत दाक्षिणात्य शब्द आलेला आहे. त्याचा अथ महाराष्ट्र देशांतील ब्राह्मण किंवा क्षत्रिय असा होतो. पण मराठा क्षत्रिय किंवा कर्नाटक क्षत्रिय हा भेद अगदींच थोडा आहे. त्या काळांत उत्तरेकडील क्षत्रिय आणि दाक्षिणकडील क्षत्रिय असाहि । भेद उत्पन्न झाला नव्हता; निदान विकोपास गेला नव्हता. त्यांच्यांत । विवाहसंबंध चाळूच होते. जेव्हां हे क्षत्रिय बंगाल्यांत गेळे तेव्हां सर्व व्यवहारांत ते बंगाली झाले. उत्तरेकडील क्षत्रियांशीं त्यांचें विवाह, । इतकेंच नव्हे तर त्यांचे नोकरचाकर व अधिकारी बंगाली होते. । त्या काळांत मराठा किंवा कर्नाटक क्षत्रिय बंगाल्यांत जाऊन राज्य । स्थापन करतो, हो गोष्ट आणि अर्लाकर्डाच्या काळांत शिंद्यासारखा मराठा सरदार राज्य स्थापन करतो यांत फार भेद आहे. शिंद्याचे ‘ मुख्य नोकरचाकर दाक्षिणी व त्यांचे विवाहसंबंध उत्तरेकडील लोकांशीं

३६० तिसरां हिंदु राज्ये र न होता, दाक्षिणतीळ लोकांशींच होतात. तात्पर्य, सेन राजे पुढे पूर्णपणें बंगाली झाले. “आम्ही दाक्षेणेतून आलो ‘ एवढी स्माते मात्र त्यांनीं ठेविली. ही ध्यानांत धरण्यासारखी गोष्ट आहे कीं महाराष्ट्र-कनोटकांतून, विशषतः कल्याणहून आम्ही आलो अशी स्मृति हल्लींचे दोन उत्तरेचे रजपूत अद्याप ठेवतात, राठोड व सेन त्यावेळेस सवे हिंदुस्थानभर क्षत्रिय होते हें लक्षांत घेतळे म्हणजे या गोष्टीस कांहीं महत्त्व नाहीं. असो. आम्ही हं पुनः नमद करतो कीं, लखनौतीचे सेन राजे रजपत म्हणजे वणाने *क्षत्रिय होतें अर्लांकडे उत्पन्न झालेल्या ब्रह्मक्षत्र जातीचे नव्हते. त्यांस लाव- लेला ब्रह्मक्षत्र ह्या शब्द त्यांचे बैदिकधर्माभिमानित्व केवळ सुचवितो. किंबहुना सर व्हिन्सन्ट स्मिथनें स्वतः लिहिलें कौ, लक्ष्मणसेनाचें कुल हिंदुस्थानांतील सव राजांस आदरणीय होतें. आणि तो भारत वषांचा खलीफा वंशपरंपरेचा ( अथात्‌ धमंदृष्टया नेता ) मानला जात असे.

“सेन राज्ले द्रविडी वंशाचे होते किंबहुना चोल होते असें कित्येकांनी सुचाविले आहे, पण द्रवीड कर्नाटकाहून अत्यंत भिन्न आहेत. व द्रविड शब्द टखांत नाहीं. चोल वंशांत ते जन्मले असल्याचा संभवहे नाही.

प्रकरण अकरावे. ठाण्याचे शिलाहार.

‘हासाच्या या कालविभागांत (इ. स. १०००पासून १२००पर्यंत)
।हं राज्य पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वास चढले. आणि तें बहुतेक स्वतंत्र
॥ होतें. यांचा देश म्हणजे प्राचीन महाभारताचा अपरान्त होय.
॥ त्याची राजधानी तेव्हां शूर्पारक ( सोपारें ) होती; व बुद्धाने आपला
। धम उपदेश करण्यास तेथें आपला शिष्य पूर्ण यास पाठविलें होतं
’ आणि नंतर खिस्त-पूर्वकाळांत या देशांत अरब व प्रक जहाजे येऊन
मालांचीं व कल्पनांची आयात व निर्गत करीत. शिलाहारांचे राज-
। कुलहि फार जुनें होतें. त्यांचे रिलाळेख कपरदिन्‌ पासून सुरू
। होतात. हा अमोधवर्ष राष्ट्रकूठाचा मांडलिक होता. त्यानें बोद्ध
। यतीस कांहीं दानें देऊन त्यांचा शिलालेख हक ७६५ म्हणजे इ.
। स. ८४३ ह्या वर्षी ठाणें जिल्ह्याचा प्रासिद्ध कन्हेरी ( कृष्णागिरी )
। लेण्यांत खोदला आहे. ह्या लेण्यांत शातवाहूनांच्या काळापासन म्हणजे
सुमारे खि. पृ. १००पासून तों अर्लाकडे १५० ०इसवीपर्यंत, म्हणजे
। पोतुगीजांचा काळपर्यंत बौद्ध संन्याशी रहात आले. शिलाहारांचें
। राज्य सुमारें पांचरीं वर्षे इ. स. ८००ते१३००पर्यंत ठाणें जिल्ह्या-
। वर होतें. ते प्रारंभीं राष्ट्रकूटाचें मांडलिक होते. आणि पुढें अपरा-
। जितांच्या वेळेपासन स्वतंत्र राजे झाले. यांचा ले. इ. स. ९९७चा
सांपडळा असून प्रासेद्ध झाला आहे. (भदात ताम्रपट ए. इं. ३ पा
२५७). या लेखांत अपराजित आपल्यास अद्याप ‘महामंडलेश्वर! म्हणतो आणि आपले वरिष्ठ राजे म्हणचे राष्ट्रकूट यांची समपर

३६२ तिसरा हिडु राज्यं भी

वंशावळ देऊन, शेवटचा राजा कक्कल ह्यास चाडुक्य तैल्पानें मारळे असें सांगतो. ही गोष्ट दुसऱ्या भागांत आम्हीं याच राजाच्या इ. स. ९९३ सालांतील म्हणजे चार वर्षांपूर्वीच्या एका अद्याप प्रसिद्ध न झालेल्या लेखावरून सांगितलीच आहे. ह्यांतहि राष्ट्रकूटांची वंशावळ विस्तृत रीतीनें दिली असून राष्ट्रकूटांच्या राज्याचा अन्त झाला ह्या- बद्दल दुःख प्रदार्शत केलें आहे. ह्या अंतानंतर बहुधा अपराजित स्वतंत्र झाला असावा. तरी त्याने मामुली वहिवाटीस ट व पूर्वीच्या राजाबद्दलच्या आदराने महामंडलेश्वर हीच आपली पदवी कायम ठेविळी आहे, याच कारणांनीं ओंधचे वझीर, हैद्राबादचे निजाम व पुण्याचे पेशवे आपल्या पूर्वीच्या परतंत्रतेच्या पदव्या स्व- तंत्र झाल्यावराहे कायम ठेवतात. ह्या कुलाच्या पुढील लेखांत अप- राजितास “ मृगांक ‘ व “ बिरुदकराम ‘ अश्या दोन पदव्या दिल्या आहेत; व गोमराजाचा त्यानें उत्तम सत्कार केला, ऐय्यपदेवाशी. त्याने लढाई केळी व मिछमास ( सेडणदेशचा ) मदत कली असें आणखी सांगितळेळे॑ आहे. यावरूनहि त्यानें स्वतंत्रपणें राज्य केळे असे दिसतें. यार्चे राज्य. ‘ कोंकण चोदाशे राज- घानी पुरी ‘ असं वर्णिलेले असते. या शब्दांत राज्याचा जुना ऱ्य ( चौदार्शे गांवे व जनी राजधानी यांचा उछ्लठेव आहे. पण य त्याचे राज्य मोठें असून त्यांत ठाणा व कुलाबा हे जिल्हे, रत्ना जिल्ह्याचा चिपळूणचा भाग व घांटावर्राळ मावळचा डोंगराळ इतक्यांचा अन्तर्भाव होत होता असं वर सांगितलेल्या अद्याप अप्रासेद्ध असलेल्या लेखावरून दिसतें. एवढ्या प्रदेशांत १४०० हून जास्त गांवे आहेत, तेव्हां १४०० ही संख्या पुरीच्या राज्यास पूवेकाळापासून मामुलीप्रमाणे लागत आली असावी. नवीन राष्य नवीन राजधानी ठाणें (स्थानक) सह बरंच विस्तृत उत्तर शिला-

ठाण्याचे शिलाहार. ३६३

हारांच्या वेळीं असावें. ह्या शिलाहारांच्या अमलाखालीं कोंकणचे राज्याच्या प्रकषोहे झाला होता. कारण एका अरबी लेखकाने (इ. स. ९७६ ) असें लिहिलें आहे कीं, खंबायतपासून सैमूर- पर्यंतच्या देशांत गांवें जवळ जवळ असून पुष्कळ जमीन शेतीखाली अहे. (भाग पा. )

अंपराजितापासून शिलाहार राजे स्वतंत्र होऊन उत्कर्षांस चढले आणि यामुळें त्यांची गणना हिंदुस्थानच्या महत्त्वाच्या राज घराण्यांत हाऊ लागली. पुढील राजांच्या कारकादीपासून दुसऱ्या अपराजिता- च्या वेळेपर्यंत ह्या घराण्याची जास्तच कौर्ति झाली. या दुसऱ्या अपराजिताचे इ. स. ११८५ व इ. स. ११८७ चे दोन लेख सांपडळे आहेत.( 7. 8. 8. मुंबई १२ पान ३३ ). हा आपल्यास कित्येक पूर्वीच्या राजामप्रमाणेंच कोंकण चक्रवती म्हणवितो. ही पदवी नादयुक्त असून स्वातंत्र्य व सामर्थ्य दाखविते. त्यांच्या वंशा- वळींत दाखावेल्याप्रमाणें अपराजितापासून अपराषदिल्यापयंत अकरा राजे होतात आणि सुमारे दोनशें दह्ा वषांचा काळ होतो (इ. स. ९९० ते इ. स. १२००). म्हणजे दर पिर्ढांस नेहमींची सरासरी वास वर्षे पडतात. या सरासरीचा उपयोग करून व विशिष्ट राजांचा सांपडटेल्या लेखांची मिति मिळवून घेऊन प्रत्येक राजाचे राज्यकाल संभवनीय दिसतात ते त्यांच्या वंशावळींत आम्ही दिले आहेत.

[स्कंद पुराणांतील देशांच्या यादींत कोंकणाला छत्तीस हजार गांवें दिलेलीं आहेत, आणि लघु कोकणाला १६०० दिली आहेत. (भाग पा, ५१हा दुसरा आंकडा शिलाहारांच्या लेखांतील पुरी कोकणच्या आंकडयाला जवळ आहे. मोठया कोंकणांत सात कोंकणांचा अन्तर्भाव होत असे. कराटंच वराटेच मराठं मालव तथा । हविंग तौलवं चाथ केरलं चेति ससकम्‌ ॥ ( सह्याद्रे खंड ).

३६४ तिसरी हिदु राज्ये

या रीतीनें विचार करतां अपराजिताचा राज्यकाळ इ. स.९.९० पासून इ. स. १०१०पर्यंत आम्हीं धरला आहे. त्यामागून त्याचा वडील पुत्र वज्जड गादीवर बसला व वळडामागें त्याचा. बंधु अरि-

केसरी हा गादीवर आला. याचा ताम्रळेख ( ठाणा ताम्रपट ॥ २.1. पा. २५७ किलहॉर्नच्या वंशावळी ) सांपडला असून त्याची तारीख इ. स. १०१७ आहे. वज्जडाचा राज्यकाळ आम्ही यामुळें इ. स. १०१०पासून इ. स. १०१५पर्यंत धरता. व आरिकेसर्राचाहि राज्य- काळ थोडा धरावयास पाहिजे. याच्याच वेळीं भोज परमाराच्या इ. स. १०२०च्या दानलेखांत ( भाग २ पहा आगि ए. इं. ११ पा. ८१ ) सांगितलेला कोंकणचा पराभव भोजानें केला असं दिसतें. याचा उत्तराधिकारी वज्जडाचा पुत्र छित्तगज याचा एक लेख इ, स. १०२८चा सांपडला आहे. हा लेख म्हणजे प्रसिद्ध भांडुप शिला- लेख होय. (इं. ए. ५ पा. २७७ ). यामुळें अरिकिसरी याची राज्य- मर्यादा इ. स. १०१५पासून इ. स. १०२५पर्यंत धरून छित्त- राजाचे राज्य इ. स. १०२५पासून इ. स. १०४५पर्यंत वीस वर्षांचे आम्हीं धरळें आहे. छित्तराजाचं हें भांडुप दानपत्न फार मह- तत्वाचे असून त्याजाविषयीं आम्ही पुढे लिट

व्याच्यानेतर त्याचा भाऊ नागाजुन गादीवर आला व त्यानें दहा वर्षें राज्य केलें असावें. त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ मामवानी याने बरंच वषें राज्य केलें असावें. याचा राज्यकालळ इ. स. १०५५ पासून इ.स.१०८५ पर्यंत तीस वर्षे ह्या आम्हीं धरला आहे.कारण त्याचा एक लेख इ. स. १०६० चा सांपडला आहे. तो ‘ आम्र- नाथा’च्या देवळांत म्हणजे कल्याणापासून सहा मेळ असलेल्या

जी. आय. पी, स्टेशनाजवळील प्रसिद्ध अबरनाथाच्या देवळांत आहे.

ह्यांत राजाचें नांव महमवानी दिळें आहे. ( हें नांव कोठें मामवानी कोठें मुम्मुनी असें आढळतें ). या लेखांत असे म्हटलें आहे कौ,

ठाण्याचे शिलाहार. ३६५

न्या कच्या देवळांऐवजीं दगडाचे देऊळ राजगुरूनें बांधाषिलें, ‘ जर. 5. &. 8 मुंबई ९ पान, २१९ ). देवळाजवळ आणखी [क शिलालेख सांपडला आहे; त्यांत एका स्थानिक अधिकाऱ्याने *वळांजवळ आणखी एक इमारत बांधल्याचें लिहिळें आहे. (उ. 1 .9. भृंबई १२ पान ३२९ ) ह्या लेख त्याच मितीचा म्हणजे इ. स. १०६० चा आहे.

| मामवानी-राजा याचा पुतण्या अनंतदेव ( नागाजुनाचा पुत्र) हा ।याच्या मागून गादीवर आला. तो मोठा पराक्रमी असावा असें दिसतें. यानें आपल्या इ. स. १०९४ च्या लेखांत कांकणचक्रवती असें आपल्यास म्हणवून घेतळें आहे. हा ताम्रलेख ( खारेपाटण इं. ए. २ पा. ३३ ) सुप्रासिद्ध संस्कृत पंडित जास्टिस तेलंग यांनीं प्रसिद्ध क्रेळा आहे. त्याबरोबर तोंपर्यंत सांपडलेल्या लेखांची माहिती एकत्र न शिलाहारांची वंशावळाहि त्यांनी दिळी आहे. एका मंत्र्याची (श्रेष्ठीरळव्यापारी) जहाजें कोकणच्या बंदरांत येतील, त्यावरळ जकात प्राफ केल्याबद्दल हा ताम्रपट आहे. या राजाचें नांव अनंतपाळ असेंहि आढळतें. यानें इ. स. १०८५ पासून इ. स, ११२५ पर्यंत राज्य केळें असावें. याचा पुत्र अपरादित्य पहिला, हाहि प्रसिद्ध राजा झाला. कार्मीरांत एक पंडित-सभा भरली होती त्यासभेस याचा एंक पंडित प्रतिनिधे गेला होता असे मंखानें श्रीकंठरचरि- न्नांत सांगेतळें आहे. यानें इ. स. ११२५ पासून इ. स. ११४५ पर्यंत राज्य केलें असावें. याचा पुत्र हरपाळ याचे लेख इ. स. ॥१११९, ११५० व ११५३ असे सांपडले आहेत, हे ध्यानांत ।घेऊन आम्ही अनंतपाळ राज्यकाल चाळीस वर्षे, अपरादित्य वीस वर्षे आणे हरपाल दहा वर्षे धरला आहे. हरपाठाचे लेख शिला- ‘छेख असून ते आम्हांस पाहावयास मिळाले नाद्दींत. बाँबे गझे|टियर म, भा. ,.२४

€€. ९३

३६६ तिसरी हिंद राज्ये

*्ढ

व्हॉ. १ भा. १ यांत शिलाहारांची एकंदर हकीकत जळवन प्रथमच दिली आहे, त्यांतील उल्लेखांवरून हे लेख आम्ही सांगितले आहेत या हकीकतींत असें वर्णन आहे कीं, अनंगपालाच्या राज्यांत क सांत तंटे होऊन देवाब्राह्षणांचा छळ झाला. हे तंटे कशाविष होते हें जाणणें कठीण आहे. मुसलमान लोकांची वस्ती या राज्यांत बरीच झाली होती असें दिसतें. कारण राष्ट्रकट राजे हे अरबांस अनुकूळ असत. उत्तरेकडील राजाप्रमाणे ते परधमंद्वेषी नव्हते ( व्हा० २ प्र. १० ) बहुतेक प्रत्येक बंदरी राहरांत सोमनाथपा- टण आणि खंबायत यांपासून चोळ ( सैमूर ) पर्यंत अरब लोकांच्या वसाहती होत्या; आणि कांहीं गांवांत त्यांनीं आपल्या ० बांधल्या होत्या. अभ्निपूजक ( पार्शी ) आणि मुसलमान यांच्यामर्धा एका तंट्याची हकीकत अरबी लेखकांनीं दिळी आहे. अनहिलवाड. च्या जयसिंह राजाकडे हा तंटा गेटा तेव्हां तो स्वतः तोडलेली मशीद पहाण्यास गेला व त्यानें ती आपल्या खर्चाने बांधून दिली ( इलियट २ पान १८३ )-हा कोंकणांतील तंटा राजा आणे लाचे संबंधी यांच्यामधील असावा व मुसलमान लोकांनीं या संधीस उत्तर, हिंदुस्थानांतल्याप्रमाणें देव-ब्राह्मणांचा छळ केला असावा. परंतु शेवटीं अनंतपाळ विजयी झाला व त्यानें बंडाचा बीमोड आपले विरुद्ध नातेवाईक आणि देवत्राह्मणांचे छळ करणारे जबर शिक्षा केल्या. (इ. ए. ९ पान १७ ). यामुळें कोंकण दोन शतकें हिंदु राहिले | हरपालाबद्दळ आपल्यास विशेष माहिती मिळत नाहीं. इ. स. ११५३ मधील त्याचा मिळालेला लेख जमेस धरून यानें इ. स.. ११४५ पासून इ. सं. ११५५ पर्यंत राज्य केलें. याचा पुत्र मल्लि- कार्जुन यानें बरींच वर्षें राज्य केलें, यांने राजपितामहृ ही पदवी, धारण केल्यामुळें गुजराथचा चाढुक्य राजा कुमारपाळ यानें कोंकण

ठाण्याचे शिलाहार. ३६७

*प्रंकण्यास आपला सेनापाति अंबड यास पाठविलें. बलसाड जवळ ॥ढाई होऊन तींत अंबडाचा पराभव झाला. पण अंबड पुनः तयारी ॥रून आला व दुसऱ्या लढाईंत मल्लिकार्जनाचा पराभव झाला. इत- च नव्हे, तर गुजराथच्या इतिहासांत सांगितल्याप्रमाणें जगदेव ॥रमाराने मल्लिकार्जनास ठार मारिले. यानें इ. स. ११५५ पासून ॥. स. ११७५ पर्यंत राज्य केलें असावें. याचे दोन लेख इ, स. ॥ १५६ व ११६० ( चिपळूण व वसई ) मिळाल्याचे गॅझोटियर व्यं लिहिलेलें आहे. परंतु त्यांचा पत्ता तेथं दिलेला नाहीं. ॥ याचा पुत्न दुसरा अपरादिल्य हा या वंशांतील या काळांतील वटचा राजा होय. तो सर्वात श्रेष्ठाहि होता. तो आपल्यास लेखांत ॥हामंडलेश्वर न म्हणतां महाराजाधिराज आणि कोंकण-चक्रवतीं म्हणवितो, त्यानें स्वतंत्रपणें कोंकणच्या बऱ्याच मोठ्या भागा- ॥र॒ राज्य केलें. त्याच्यानंतराहे कोंकण बरींच वर्षे स्वतंत्र राहिलें. भर वर्षांनंतर येथे मार्को पोलो नांवाचा प्रवासी आला त्यावेळींहि स्वतंत्र होतें. अपरादिल्य अनेक नामांकित हिंदु राजाप्रमाणे वतः मोठा विद्वान्‌ होता आणि याज्लवल्क्यस्मृतीवरील प्रसिद्ध रका अपराक ही त्यानेच लिहिली. हा प्रंथ हिंदुधमेशास्त्रावर हि आधारभूत मानला जातो, कारमीर सारख्या दूर देशांत पाचा मुख्य आधार घेतात. ह्यावरून त्यावेळच्या निरनिराळ्या हिंदु- थानच्या राज्यांत बरेंच दळणवळण असावें. पूर्वी सांगितलेंच आहे कीं, मंखाच्या श्राकंठचारित्रांत (हा कारमीरी कावि ३१०स० ११३५ भे ११५५ पर्यंत होता) काऱमीरांत पंडित सभा भरल्याचें वर्णन आहे. त्या सभेस कोंकणच्या पाहिल्या अपरादित्यातर्फे तेजःकंठ नांवाचा पंडित गेला होता. ह्या पंडिताच्या दळणवळणामुळें दुसऱ्या अपरादिल्याचा हिंदु धमोवरीळ ग्रंथ कारमीरांत लवकरच प्रसिद्ध स्राला असावा. याचा एक लेख इ० स० ११८४चा सांपडला

३६८ तिसरी हिंदु राज्ये

असून प्रसिद्ध झाला आहे. (५. 1. &. 3. मुंबई १२ पान ३३३) | याचा राज्यकाळ इ० स० ११७५ ते इ० स० १२०० घरावयास, हरकत नाहीं

ठाण्याच्या शिलाहार राजवंशांतील पुढील राजाशी आपल्यास कर्तव्य नाहीं. आणि त्याविषयीं फारशी माहिती उपलब्ध नाहीं. किल्हॉर्नच्या वंशावळींत ( ए. इं. ८) आणखी सोमेश्वराचे नांव आहे. याचा लेख इ. स. १२७९ चा सांपडला आहे; आणि गझे टियरमध्ये केशीदेवाचें आणखी एक नांव आहे. पण सोमेश्वरानंतर बरींच वर्षे हा वश राज्य करीत असावा. महाराष्ट्र इ. स. १२ न मध्ये मलिकूकाफरनें जिकल्यानंतर मुबारक्‌ याच्या सेनापतीने १४ शतकांत ठाणें जिंकळें. पाटणहून ( सोमनाथ किंवा अनहिलवाड एक बिंब नांवाचा राजा व पैठणहून कांहीं क्षत्रिय आल्याची कथा बाँबे गॅझेटियर व्हा. १ भा. २ ह्यांत दिळी आहे. आणि महाराष्ट्रांतील प्रसिद्ध हतिहास-संशोधक वि. का. राजबाडे यांनीं नुकतीच विस्तृत रीतीनें वर्णिली आहे. ही कथा ह्या ग्रंथाच्या आटोक्‍्याच्या बाहेरची आहे. पण एवढें येथे सांगितलें पाहिजे कीं, शिलाहारांचं राज्य नष्ट झाल्यावर, निदान इ. स. १२६० नंतर हवे लोक कोकणांत आले असावे.

कांहीं महत्त्वाच्या गोष्टी या शिलाहार राजांबद्दल व त्यांच्या लेखां- बद्दल सांगणें जरूर आहे. पहिली गोष्ट सांगणें ही कीं, सर्व क्षत्रिय राजे आपल्यास सूर्य किंवा चेद्रवंशाचे म्हणतात, त्याप्रमाणें हे म्हण- वीत नसून हे आपली उत्पात्ते, जांमूतवाहन नांवाच्या प्रसिद्ध दंत: कथांत नागास वांच/विण्याकरितां आपळें शरीर गरुडास अपण कर: णाऱ्या पुराणांतील, देवयोने विद्याधरापासून झाली असें आपल्या लेखांत लिहितात, यावरून हे शिलाहार क्षात्रिय नसावे अशी कल्पन! होणें साहजिकच आहे, परंतु हे शिलाहार क्षत्रिय होते इतकेंच नव्हे

ठाण्याचे शिलाहार. ३६९

र ते क्षत्रिय मानळेहि जात असत याबद्दह इंका नाहीं. कारण ‘ त्यांचें नांव छत्तीस राजकुलांच्या यादींत सर्वत्र दिळेळें आढळतें. ‘प्रकराव्या शतकाच्या अंतीं किंवा बाराव्या शतकाच्या प्रारंभीं ही पदी बनली असावी. कनोजचा गाहडवाल धर्माभिमानी सम्राट ,’वन्द्र यानें क्षत्रियांच्या सूर्यचेद्र वंशाचे पुनरुज्जीवन केलें, त्याच्या ,प्रमांत किंवा फार झालें तर गोविंदचंद्राच्या अमलांत ही क्षत्रिय- | झाली असावी हँ आम्हीं पूर्वी दाखविलच आहे. या ।कालनिश्वयाचा आणखी पुरावा शिलाहारांचें नांव या छत्तीसांत ॥आहे ह्यावरून मिळतो. विद्याधर-वंशा आमच्या समजुतीप्रमाणे

संच दाखवितो कीं, हे क्षत्रिय होते. कारण आपले मांस तोडून प खाऊं घालणें हें कठिण कमे क्षत्रियच करूं शकेल. ( येथें भारतांतील कणाच्या गोष्टींची आठवण होते. ) आणि कदाचित्‌ लाहार क्षत्रियांनीं दाक्षिणंतीळ नागवंशी लोकांस मदत केल्याचाहि कथेत उल्लेख असावा. हे शिलाहार आपल्या लेखांत आपण तगरपुरापासून आलों असें नेहमीं सांगतात. या शहराचें नांव टॉल- मीनें दिलें असून, तें तो पैठणच्या पूर्वेस गोदावरीवर सांगतो, या- वरून मराठ देशाच्या ऐन मध्यांतळे हे शिलाहार क्षत्रिय दिसतात, अनंतदेव ऊर्फ अनंतपाल याच्या वेळीं हे हिंदुस्थानांत स्वतंत्र व प्रबळ राजे प्रसिद्धीस आले. याचा राज्यकाळ इ. स. १०८५ पासून इ. स. ११२५ पर्यंत आम्ही दिला आहे. क्षात्रियांचीं प्रत्यक्ष राज्य । करणारीं घराणीं छत्तिसांच्या यादींत सांगितलीं गेटीं, तेव्हां ठाण्यांच्या । शिलाहारांचे नांव ल्यांत साहाजिकच आलें. ते जरी आपल्यास विद्या- घरवंशी म्हणवीत, तरी ते क्षत्रिय व रजपूत म्हणून प्रसिद्ध होते. आणि त्यांची कोत काऱ्मीरापर्यंत गेली होती. मंखानें वर्णिलेल्या कारमीर पंडित सभेस दोन राजांचे प्रतिनिधि आल्याचें वर्णन आहे. कोंकणच्या अपरादित्य राजाचा तेजःकंठ प्रतिनिधि आणि कनो-

३७० तिसरी हिंदु राज्ये ग

जच्या गोविंदरचेद्राचा सुबळ. अ्थांतू कनोज, कोंकण आणि काइमीर यांचा इ. स. १०८५ मध्यें निकट संबंध आला. (1. 3. न | ..3. १२ जादा अंक पान ५१ ). यामुळें छत्तिस राजकुलांच्या यादींत शिलाहारांना जागा मिळाली आहे याचें आश्चर्य नको. २ इ. स. ११५४ च्या कल्हणाच्या राजतरागेणींत छत्तिस राजकुलांचा उल्लेख आहे, ३ या यादींतीळ शिलाहार उत्तरहिंदुस्थानांत दिसत नाहींत. ते केवळ दक्षिणचेच आहेत. राठोड व चाठुक्य हे उत्तरे- चेहि रजपूत आहेत व दक्षिणेचोेहि आहेत; पण शिलाहार मराठे रजपूत आहेत. ४ शिलाहार मराठे अजूनहि दक्षिणेंत उत्तम रजपूत मानळे जातात. याचा दाखला कोल्हापूर येथे नुकतेच प्रसिद्ध, झालेल्या * सिद्धांतविजय ‘ ग्रंथांत १०५ पानावर भोज शिलाहा राचा शके १११३ म्हणजे इ. स. ११९१ चा एक समतम्र | दिला आहे ल्यावरून मिळतो, यांत या शिलाहार राजानें आपल्यास क्षत्रिय-शिखाचूडामणी म्हटलें आहे, ५ हे शिलाहार मराठ्यांच्या ९६ ‘कुळांच्या यादीतील रोलार असून यादव किंवा चंद्रवंशांतळे मानले गेळे आहेत | या कोरीव लेखांतील दुसरी विशिष्ट गोष्ट सांगण्याची ही कीं, देणगी देणाऱ्या राजाच्या बरोबर पांच प्रधानांचा त्यांच्या नांवांसह उल्लेख असतो. या कोंकणच्या राज्यांतच प्रधानांचें इतके महत्त्व मानलें जात होतें हें चमत्कारिक आहे. कदाचित्‌ राजा जबाबदार नसून प्रधान जबाबदार असतात हृ अलीकडच्या काळांतीळ तत्त्व त्यावेळीं कांकणांत मान्य होऊन त्याची अमलबजावणी होत असे. मुख्य प्रधानाच्या नांवामागें सर्वाधिकारी हें विदोषण लागत असे, किंवा ‘राज्यचिंताभारसमुद्दनमाहत्म’ असें लागे (इ. ए. पा२५७). सांधे आणि विम्ह्म करणारे प्रधान कधीं दोन असत. आणि जमी- नीचे रजिस्टर ठेवणारा प्रधान निराळा असून ( स्रीकरण ) खजि-

ठाण्याचे शिलाहार. र ३७१

वे प्रधान ( भांडागारिक ) दोन असत, कदाचित्‌ खाजगी- एक व बाहेरच्या खाल्याकडचा एक किंवा जमिनीचा वसूल

म्हटलेले आहेत. शिवाजीनें जेव्हां इ. स. १६६० त अष्टप्रधान- ॥॥ व्यवस्था अमलांत आणली, त्यावेळेस या देशांत इ. स. १०००च्या ॥॥ सुमारास असलेली जुनी व्यवस्थाच अमलांत आणली. आणि यांच्या लेखांत नेहमीं वापरळेला शब्द ‘ प्रधान * हाहि पुनः उप- ४ योगांत आणला, तिसरी चमत्कारिक गोष्ट अशी कीं, या प्रधानांच्या नांवाच्या ए) शोवटीं नेहेमीं ‘ ऐरय । हें उपपद येतें. याजवरून कित्येक विद्वा- ॥ नांनीं असा तर्क केला आहे कॉ, हे तगर येथून आठेळे शिलाहार आंध्र देशांतून आळे असावे. आणि आंध्र देशांतळे हुषार लोक ॥ आणून त्यांसच तेथें प्रधान नेमीत असत. आंध्र देशांतील लोकांच्या नांवांत “ ऐय्य ? उपपद असतें. पण तगर आंत्रांत आहे हें आम्हांस मान्य नाहीं; किंबहुना तें महाराष्ट्राच्या मध्यावर आहे असें आम्ही पूर्वी म्हटलें आहे. जरी ते आंध्रांत होतें असें मानळें, तथापि शिला- हार महाराष्ट्रांत विशेषतः कोंकणांत इतकी शतके येऊन राहिले होते कीं, ते कणकणराः मराठे बनले होते. त्यांचे संबंध, त्यांची सहानुभूती व त्यांची भाषा मराठी झाली होती. यामुळें इ. स. १००० पासून इ. स. १२०० शोंच्या काळांत आंध्र देशांतील लोकांविषयी भाषा, चालीरीति व शरीरसंबंध यांनीं अत्यंत भिन्न असलेल्या लोकां- विषयीं त्यास प्रेम असेळ असें आम्हांस वाटत नाहीं, यामुळें हे प्रधान आंध्र देशाचे रहिवाशी असतील असें आम्हांस वाटत नाहीं. कर्नाटकांतले हे अधिकारी असतीळ असा एक संभव आहे. कारण

३७२ तिसरी हिंदु राज्ये

माळखेडचे राष्ट्रकूट हे जातीनें मराठे होते तरी देशानें कर्नाटकाचे राजे असल्यानें, त्यांचे मांडलिक होते. पण राष्ट्रकूटांच्या व उत्तर चालुक्यांच्या लेखांत दान घेणारे किंवा इतर लोक, यांचीं नांवे “ऐय्य’ उपपदान्त नाहींत. हें गूढ आमच्या मतें पुढील प्रमाणे सोडविता । | येईल. पूर्व किनाऱ्यावरील आंध्र देशांतल्याप्रमाणेंच पश्चिम किना- ऱ्यावराहि वरिष्ठ वणीच्या लोकांस आर्य म्हणण्याची चाल असे. त्याचेच प्राकुत ऐय्य रूप आहे, कोकणांत सामान्यतः अनाय कोळी लोकांची वस्ती आहे. आणि हे खालचे लोक पाठीमागून आलेल्या ज्या आर्यवंशीय लोकांनीं ह्या देश जिंकून ल्यास सुधारण्याच्या दशेस

आणला, त्या वरिष्ठ ठोकांस नेहमीं आर्य म्हणन संबोधीत. टॉल- मीच्या भगोलांत देशाच्या या भागास विशेषतः “ अर्याके ‘( म्हणजे आरयंदेश ) अशी संज्ञा आहे. घाटावर मात्र होती करणारे लोक भाग एक यांत सांगितल्याप्रमाणें मिश्र आर्य अथवा मराठे आहेत. म्हणून तेथें वरिष्ठ वणीच्या लोकांस आर्य म्हणण्याची चाळ उद्भवळी नाहीं. आंध्र देशांताहे खालच्या जातीचे लोक हे कोकणांप्रमाणंच अद्याप अनार्य आहेत. तेथें आर्य अथवा “ ऐय्य म्हणण्याची चाल कोकणांप्रमाणेंच उद्भवली. या बाबतीसंबंधें आम्हीं आपल्या स्वतःचा पुरावा देऊं शकतो. कोंकणांतीळ एक कोळी जातीचा गांवढळ वरिष्ठ जातीच्या कारकूनास “’ अज्जा ‘ असे संबोधितांना आम्हीं ऐकले आहे. हा शब्द ऐकन आम्हांस आश्चर्य वाटलें. पण वरिष्ठवणीच्या लोकांस आर्य म्हणण्याच्या चालीचा हा अवशेष आहे असे आमच्या लक्षांत आलें. शिलाहारांच्या ठेखांत भ अय्य ‘ उपपदांत नांवें नेहमी ब्राह्मणांचींच नसतात. उदाहरणाथ, खारेपाटण लेखांत ‘* महादेवय्या प्रभू आणि श्रीसोमणय्या प्रभु ‘ अशीं दोन नांवें आलीं आहेत. हे प्रभु हछींच्या कोकण कायस्थ प्रभूचेच पूर्वज दिसतात. तसेंच अप- राजिल्याच्या इ. स. ११८७ च्या लेखांतील ( 0. 3. 18, अ. 3.

ठाण्याचे शिलाहार. ३७३

१२ पा. ३३३ ) अनंत पै हाहि प्रभू असावा. परंतु हल्लींच्या कायस्थ प्रभंस ही गोष्ट संमत नाहीं. ब्राह्मणांची नांवे कधीं कधी उपपदांत असतात आणि क्षात्रियांच्या नांवांच्या शावटीं भट आणि राऊळ हीं उपपदें येतात.

शेवटची चमत्कारिक गोष्ट सांगावयाची ही कॉ, ह्या शिलाहारां- च्या कित्येक लेखांत ‘ हजमनगरपौरन्तिव्गप्रभूति ‘ असें एक कठीण पद येते; पण ह्याचा अथ नीट लागत नाहीं, ‘हैय्यमन! किंवा हऊ्ज- मन ? हं एक निःसंशय नगर आहे; आणि तें दहाव्या शतकांतील अरब लेखकांचे व हल्छींचैहि ‘ सञ्जान ? शहर होय असेंहि दिसतें. .॥ पण दोन लेखांत एका हञऊ्जमन लोकांच्या नगराचंच नांव कां यावें £ आणि हे त्रिवर्ग कां £ शहरांचे ब तालुक्यांचे व प्रांतांचे अधिकारा- ,॥र्‍्यांचा उल्लेख सामान्यतः त्यांत यावा हें साहजिक आहे. याचें कारण असं कोणीं सुचाविळें आहे कीं, ‘ हञ्जमन * ही पूर्वीची राजधानी असावी. पण हें खरें नव्हं; पूर्वीची राजधानी पुरी व हृ्ींची ठाणे; आणि दोघांच्याहि रहिवाशांचा उल्लेख लेखांत येत नाही. अशी कल्पना केली कीं, या ठिकाणचे तीन प्रकारचे लोक अत्येत महत्त्वाचे होते, तर त्यांचे नांव सांगणें जरूर होईल. असें संभवनीय आहे को, या विशिष्ट बंदरांत बाहेरचे लोक फार येऊन बसले होते. चीन व जपान प्रमाणे बाहेरचे कोण लोक येतात या गोष्टीवर दुर्देवाने हिंदुस्थानच्या राजांनीं नजर ठेविली नाहीं; आणि वाटेल त्या धमोच्या लोकांस वाटेल तेथें येऊन वसाहत करण्यास मुभा दिली. किंबहुना हे लोक आपल्याच मेजेस्टेटांचा अधिकार मानण्याचा हृक्क संपादन करीत. हे तीन प्रकारचे ठोक संजान येथ बरेच येऊन राहिळे असावे. पारशी, अरब आणि ज्यू किंवा नीग्रो. हे तिन्ही जातीचे लोक व्यापारी असून सर्व राज्यांतील लोकांशीं व्यापार करीत आणि वारंवार तंटेहि उपस्थित करीत. त्यांना अ’पल्या

क का याव्या धा… “य “व्यय 0. १७ ७-4 स शि. “व बड ल… दाळ अ,

३७४ तिसरी हिंदु राज्ये जातींत विशिष्ट अधिकार असत. ही गोष्ट अरब लेखकांनींहि लिहिली आहे. इंजमन नगराचे तीन जातीचे लोक विशिष्ट महत्त्वाच अस- ल्याने या दान-सनदा त्यांनाहि उद्देशून निघत असंहि मानतां येते.

असो. हिंदुस्थान देशाच्या अन्य महत्त्वाच्या सामान्य बाबीसंबं- घानें आणखी कांहीं गोष्टी या लेखांत आहेत त्यांचा आम्ही सामान्य निरीक्षणाच्या वेळीं उछेख करूं. बाहेरील देशाचा व्यापार कोकणाच्या: अनेक बंदरांशीं चाळे. संजान, सोपारा, वसई, ठाणें, कल्याण, चौल आणि चिपळूण वगेरे बंदरांतून येणाऱ्या माढावरीळ जकातीच्या: उत्पन्नाचा आंकडा मोठा असे. ठाण्याचा किल्ला मुळांत बहुधा शिला- हारांनीं बांधला असावा. कारण तेथील पाया खोदतांना अनंत- राजाचा इ. स. १०१७ चा ताम्रपट सांपडला. एलिफंटार्ची सुंदर कोरीवलेणीं यांचें वणन टिपणींत देऊं.

(9 २ €५___€%१ (> अ) ७9210 2 टप्पणा-घारापुराचा एठल्फटा लणा.

मुंबईपासून समुद्राने कांही भेलावर दूर, ठाणें ब पनवेल यांच्या रुंद खार्डांत हीं लेणी असून त्यांत पुष्कळ सुंदर खोदीव कोरीव काम व मूति आहेत. मुख्य लेण्याच्या तोंडावर दोन मोठमोठ्याल्या दगडांचे हत्ती कोरले आहेत. ते समुद्रांत दूरवर दिसतात यामुळें पोतुर्गाजांनी हीं लेणी प्रथम पाहिली तेव्हां त्यास हत्तीची लेणी असे नांव दिलें. येथेच पुरी शहर होतें. तें हल्ली उध्वस्त आहे. तें पूवी कोंकणची राजघानी होतें. सहाव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंतची मुंबई पुरी होती, ही गोष्ट शिलाहारांच्या लेखांत “पुरीकोंकणचतुदंशशत? असे शब्द येतात ह्यावरून सिद्ध आहे. एका मोठ्या खार्डाच्या तोंडाशी हें बेट असल्यानें किना- ऱ्याबरील व्यापार करणारी व दूर अरब्रांच्या देशास जाणारी जहाजे येथें आश्रय घेऊ शकत असल्यामुळें हें बेट कोकणची राजधानी होण्यास योग्य आहे असें प्राचीन काळींच दिसलें असावें. ह्या बेटांत बोडकालीन इमारतांचे अवशोष आहेत. पण येर्थाल महत्त्वाच्या इमारती हिंदु आहेत… ब त्या आठव्या शतकापासून शिलाहारांच्या राज्याच्या वेळच्या आहेत ,

घारापुरीचीं एलिफंटा लेणीं. ३७५

भगवानलाल इंद्राजी असें म्हणतो काँ, त्यांतील बांधण्याची तऱ्हा ब सुंदर मार्त येलोरा येथील कोरीव कामाच्या वेळच्या दिसतात; आणि म्हणून हीं लेणी आठव्यापासून नवव्या शतकांपर्यंतची असावीं.राष्ट्रकूट राजा कृष्ण यानें येळोरा येथील देवालय खोदून तयार केलें. राष्ट्कूटांचे मांडलिक शिलाहार यांनां त्याचें अनुकरण करून आपल्या पुरी नगरच्या शेजारीं हीं लेणी खोदला असावींत, शिलाहारांची राजघानी आठव्या व नवव्या शतकांत होती. बलरामाच्या तीर्थयात्रेत भागवतांत आयो ह्वैपारथेमी ( बेटांतली देवी ) सांगितली आहे. ती बहुधा या बेटांतल्या एका लेण्यांतील पावतीची मूर्त असावी, आणि या उल्लेखावरूनाहे भागवत पुराणाचा काल दहावें शतक ठरतो. सगळ्यांत मुख्य लेण्यांतील अत्यंत भव्य मूर्त म्हणजे त्रेमात॑ (एलिफंटा) लेण्यांतील मुख्य काम आहे. हं खोदण्याचे श्रय कोणत्या शिलाहार राजास आहे हें सांगतां येत नाहीं. राजघानी ठाण्यास गेल्याने पुरी विध्वस्त झाली असावी, ठाणें हहर जास्त आंत असून तेथील बंदर अधिक सुरक्षित आहे, ठाण्याच्या शिलाहारांची हर्काकत पुरी तेथील एलिफंटा लेणी यांच्या वरील वणेना- शिवाय संपूण होऊं शकत नाही.

टिप्पणी-हञ्जमननगर,

वरील हर्कांकतींत हंजमन म्हणजे संजान असे जं अनेकांनी ठराविलें आहे, तं आम्हीं मान्य केलें आहे, परंतु चित्तराजञाचा भांडुपचा ताम्रपट डा. फोट यांनीं ए. इं १२ पान २७५ वर पुनः प्रसिद्ध केला आहे; त्या लेखांत याजविषयीं त्यांनीं संशय प्रकट केला आहे. इ. स. ७६६ मध्ये आपण संजानास प्रथम आलों असें पारशी लोक सांगतात, इरा- णांतुन सुटून प्रथम काठेवाडांताल दीवला आलों आणि तेथून संजानला असें ते म्हणतात, आणि ते असोहे म्हणतात कां, या वस्तीला संजान हें नांव आपण दिलें आहे. डॉ. फोट यांचें असें म्हणणे आहे का, मुळां- तल्या हंजमनाचें सजमन असें नांव व्हावयाचे नाही; आणि आरबी प्रवाशांनी सांगितलले सिंदान म्हणजे कछच्या किनाऱ्यावरील. खंबायत. जवळील सिंदान होय; हें संजान नव्हे, आमच्या मतं ह्या अडचणी अ

३७६ तिसरा हिंदु राज्ये

रिह्ा्य नाहींत आणि डॉ. फोट यानी कोरीव लेखांत असलेले हंजमन म्हणजे कोणतें दुसरें शहर हं सुचविले नाही. त्यांची अशी कल्पना आहे की, हंजमन म्हणजे शिलाहारांच्या राज्यकारभाराचें एक दुसरं मुख्य ठिकाण, ठाण्याच्या राजघानी शिवाय होतें ( पा, ५९). परतु ही कल्पना इंजमननगर या वणेनाशी जुळत नाहीं; आणि त्रिवर्ग म्हणजे वरिष्ठ तीन वर्ण असेंहि मानतां येत नाही. कारण दानशासन सगळ्याच लोकांस माहित झालें पाहिजे, आम्हीं या शब्दाचा असा अर्थ लावला आहे की संजान येथें तीन जातीचे परकी लोक होते, आणि त्यांचा कारभार स्वतंत्र असे; देशांतील लोकांशीं त्यांची देवघेव. असे; म्हणून त्या लोकांसहि इनाम गांव दिल्याची माहिती जरूर असे, कारण इनामदारास विषरीष्ट हक्क असत. इंजमन हें नांव अडचण उत्पन्न करतें हं खरें. पण आम्हांस असें वाटतें कॉ, पूर्वी असलेल्या एखाद्या गांवाजवळ पारशी लोकांनी संजानची नवी वस्ती टाकली. संजानवें ठिकाण समुद्रास लाणून अस- लेळें लहान पण सुराक्षित बंदर या नात्यानें फारच चांगलें आहे. आम्हांस अशी माहिती मिळाली आहे कीं, बंदराजवळ एका जुन्या किल्ल्याचा अवदोष हल्ली आहे. आणि संजान गांवाभोंवतीं असलेल्या तटाचेहि अव- शेष आहेत. हें पुराणें ठिकाण संशोधन करण्यासारखे आहे. बादामीचे चालुक्य सम्राट असतां पारशी लोक संजान येथे आले. त्यावेळीं कोंक- णांत अनेक मांडलिक राजे होते. बेंदराजवळ वस्ती करण्यास ज्या जाघ- वाने त्यांस परवानगी दिली, तो या मांडलिकांपैका एक असावा, हें ठिकाण परकी लोकांच्या वसतीचें झालें. ते लोक आपल्या संबंर्धांचा राजव्यवहार आपणच पहात. व त्यांचेच मॅजिस्ट्रेट ( न्यायाधिकारी ) असत. संजान हें नांव पारशांनीं दिलं असावें. आणे कोकणचे गांव- करी त्याचा उच्चार हंजमन अथवा इंय्यमन असरा करीत. हाच उच्चार कोरीव लेखांत येणें साहजिक आहे. अरबी प्रवाशांनी सांगितलेले पिंदान आणि संजान एक किंवा मिन्न हा येथें प्र्षच नाही. संजान हें एका पार्शीयन गांवाचें नांव आहे; आणि पारशानीं आपल्या नब्या वसतीस तें नांव दिलें, हंजमन नांव नव्हे. इंजमन हा स्थानिक उच्चार अतून तो कोरीव लेखांत आला, हं स्राइजिक आहे.

हनजमनगर ३१७७

हंजमन हं निराळें नांव दिलें असें डा, जे, मोडी म्हणतात, तसं मानण्याची आवदयकता नाहीं. नांबांत ‘म? कोणीकडून शिरला हं सांग- ण्याची खरी अडचण आहे. त्रिवर्ग म्हणजे पारशी, मुसलमान आणि । हिंदु असाच अर्थ असूं शकेल. कारण पारशांत तीन वर्ण नाहींत, शेव- । टली गोष्ट ही काँ, अल्बेरूनीनं भूगोलिक माहिती देऊन अंतरेंहि दिलीं आहेत. त्यांतील सिंदान इं संजानच दिसतं. तें सोपाऱ्याच्या उत्तरेस लाणून सांगितलेले आहे. आणखी एक अशी कल्पना आहे काँ, हंजमन नगर म्हणजे हंजमन नांवाचें नगर नव्हे, तर इंजमनचें ( षरष्टींतत्पुरुष ) म्हणजे अंजुमनचें नगर असा अर्थ करतां येईल.

३७८ तिसरी हिंदु राज्ये.

ठाण्याच्या शिलाह।रांची वंशावळ.

( बॉंबे गॅझोटियर व्हा १ भाग २, किलहानंच्य वशावळी ए. इं. ८ आणि गोरीदंकरचा टोड. ) (१) अपराजित ले. ९९७ इ, (९९० ते १०११ )

| । (२) वज्जड (१०१०–१०१६ (३) अरिकेसरी ले, १०१७ (“१८९५८०५ |

(४) छिंतरान ले. १०२६ (५) नागाराज (६) मामवानी राजे ल १०६० (१०२५ते१०४५) ( वकक की 3 ((१०८५५-९पट्या (७) अनेत देव कोंकण चक्रवती ले. १०२४ (१०८५ ते ११२५) (८) अपरादिय पहिला ले. १०३८( ११२५ते ११४५ ) (९) इरपाल ले. ११४९, ५०, ५३२ (१०४५ ते ११५५ ) (१०) मालिकाडुन 5५ ५५६५/१५५५ते. १ रप)

(११) अपराजित्य दुसरा कॉकण चक्रवर्ती ठे, १०८४, ८७ (११७५–१२०० )

| काशेदेव लेख १२०३, १२२९८

| सोमेश्वर लख. १२५९

प्रकरण बारावें कल्याणचे उत्तर चालुक्य.

ह्या कालविभागांत महाराष्ट्रावर चाटक्यांची सत्ता होती. पहिल्या भागांत वर्णिलेल्या पाहिल्या कालविभागांतील पूर्व चाळुक्याप्रमाणेंच आणि दुसऱ्या भागांत वर्णिलेल्या मालखेडच्या राष्ट्रकूटाप्रमाणेंच हेहि अत्यंत बलवान्‌ होते. पूर्वीचे चालुक्य आणि राष्ट्रकूट हे मराठे क्षत्रिय होते. विशेषतः राष्ट्रकूट हे दक्षिणच आर्यवंशाचे अत्यंत प्राचीन लोक होत. ह्या प्राचीन राष्ट्रकूटांना जिंकून पूव चालुक्यांनीं आपलें राज्य स्थापन केलें. पण त्यांना जिंकून राष्ट्रकूटांनीं पुनः आपलें राज्य

। चालविले. पुनः राष्ट्रकूटांना उत्तर चाठक्यांनीं जिंकून आपण सत्ता- । धीश झाले, हे आपल्या येउरच्या शिलालेखांत (इ. २. ८ पा. १९) ‘ पूव चाटुक्यापासून राष्ट्रकूटांचा शेवटचा राजा कक्कल यास जिंकणारा । चाडूक्य तैल्प ह्या पर्यंतची मध्यंतर्राची सर्व वंशावळ देतात, उत्तर । चाठक्यांचा पूर्वे चाळुक्यांशीं संबंध आहे. ह्याबद्दल पुष्कळ शका । घेतात. पण आपल्या लेखांत उत्तर चाढुक्य पूर्व चाढ़क्याशीं जो । संबंध जोडतात, तो अमान्य करण्यास कांहीं कारण नाहीं. हे पूर्व । चाडुक्यांच्याच पदव्या धारण करतात. आणि आपले मानव्य गोत्रच । सांगतात, ( ए. इ. ९ पान २०६ ). ते चंद्रवंशी क्षत्रिय होते आणि । त्यांनीं अयोध्येत एकूणसाठ पिढ्या! राज्य केळे, ही कल्पना त्यांनी ‘ वेंगीच्या प्राच्य चाढुक्यापासून घेतली. भाग १ यांत सांगितलेंच । आहे कीं, पूव चालुक्यांच्या कोणत्याह्दे लेखांत या गोष्टी सांगितलेल्या नाहींत. तथापि या दोन्ही गोष्टी मानण्पास हरकत नाहीं. ह्यावरून ते

इ. स. ४०० च्या सुमारास दक्षिणेंत आठे असें ठरतें. त्यांचा वंशज

: तल्प हा विक्रमादित्य आणि चेर्दाच्या राजा लक्ष्मण याची कन्या

३८० तिसरी हिदु राज्ये.

बोंधादेवी यांचा पुत्र होता. त्रिपूरचे हय, दक्षिणचे चालुक्य आणि राष्ट्रकूट मराठे क्षत्रिय राजे यांस आपल्या मुली नेहमीं देत असें दिसतें. शेवटचा राष्ट्रकूट राजा कक्कल याचा प्रारंभीं तैळप एक बलवान्‌ मांडलिक असावा. त्याचें मांडलिकी राज्य कोठें होतें हे स्पष्ट कळत नाहीं. तें बादामी भोवतीं असणें शक्‍य आहे. पण या चालुक्यांच्या लेखांत त्यांच्या मळ राजधानीचे नांव सांगितलेले नाहीं

राष्ट्रकूटांच्या सत्तेस उतरती कळा लागण्याची संधि साधून तैल्पानें ककवलास जिंकून आपलें चालुक्य राज्य दक्षिणेंत स्थापिले. त्याने लढाईंत कक्कलांचे दोन सेनापति मारल्याचें एका ठेखांत म्हटळें आहे, ह्या सेनापतीवर कक्कलाचा मोठा भरंबसा असून ते त्याच्या जुळुमी कृत्याचेद्दि मदतगार होते. (येऊर लेख इ. ए. ८ पान १७). तैळपानें चोळ, आंध्र, उत्कळ व इतर दक्षिणचे मराठे मांडलिक राजे यांस जिंकून राज्य स्थापन केळें आणि कुंतल देशांत न्यायाने आणि प्रतापानें राज्य केळे. *कुंतलाचें नांव या वंद्याच्या लेखांत स्पष्टपणें येतें. ( इं. ए, ८ पान १८); ‘ आणि लोकांस सुख दिलें! या

*टीप—चालुक्यांच्या देशास पुष्कळ लेखांत कुंतल शब्द लावलेला आढळतो, कुंतल म्हणजे हल्लींचा सदर्न मराठा कंट्री. यांतील पुष्कळ भागाची भाषा कानडी आहे. भाग २ पा. २७७ यांत सांगितलेले पुळ- केशीचे तीन महाराष्ट्र म्हणजे पूर्वी सांगितल्याप्रमाणें विदभ, मध्य महाराष्ट्र व कुंतल असे होत. हे सर्व मिळून मोठा महाराष्ट्र. यासच १ उत्तर महाराष्ट्र म्हणजे तापी आणि वधा नदीचा प्रदेश, ९ मध्य महाराष्ट्र म्हणजे गोदावर्राचा प्रदेश आणि ३ दक्षिण महाराष्ट्र म्हणजे कृष्णा नदाचा प्रदेश म्हणतां येतं, कुंतल देश्याची मुख्य खूण कृष्णा नदी सांगितली आहे. ( इं. ए. ८ पा. १८), या ठिकाणीं महाराष्ट्र आणि कनाटक यांचा मिलाफ होतो. तुंगभद्रेच्या पलीकडे मुख्य कनाटक, येथे यावेळीं गंग ब त्यानंतर होयख्रल राजे राज्य करीत होते.

कल्याणच उत्तर चालुक्य.

| राष्ट्रकूट राजांच्या काळांत बहुधा लोकांवर जुळूम होत भंसांव असं दिसतें,

तैल्प.नें इ, स. ९७३ पासून इ, स. ९९७ पर्यंत २४ बे ज्य केलें. मुंजाशीं झालेल्या त्याच्या युद्धाचे वर्णन दुसऱ्या भागांत आलंच आहे. या युद्धाचे शावटीं अपमानास्पद रीतीने त्यानें मुंजाचा बध केला असें गुजराथचे बखरकार सांगतात. पण ह्या हकीकती- ‘ विषयीं आम्ही पूर्वीच इंका प्रदशित केली आहे. बहुधा मुंज लढा- | हैत मारला गेला असें आमचें मत आहे. परंतु येऊर लेख आणि मिरज टेख एका प्रसिद्ध कविराजास तैलपानें कैद केल्याचें सांग- तांत. मिरज लेख १०२४ इसवीचा आहे; आणि या हृकीकतींच्या जवळचा आहे. तेव्हां लढाईत पाडाव झाल्यावर मुंजाला तेल्पानें ‘केदंत ठेवलें असावें. परंतु त्याला पिंजऱ्यांत ठेवे, दारोदार भिक्षा मागावयास लाविली व शेवटीं त्याचा वध केला, या गोष्टी असंभ- बंनीय दिसतात. हिंदुराजे इतके क्रूर असत नाहींत. शिवाय ह्या लेखांत ह्या गोष्टींचा उछेख नाहीं. (इ. ए. १३२ पा. १७. या टेखां- ‘तील कित्येक शोकांचें जे भाषांतर येथें केळे गेळें आहे, त्याहून मिन्न अर्थ छोकांचा आम्ही समजतो ). एक हूण राजा आणि माखाडचे राजे तसेंच चेदी व उत्कट यांचा पराभव तेल्पाने केल्याचे या लेखांत वर्णन आहे. ही अतिरायोक्ति असली तरी ही गोष्ट अशक्‍य ‘नाहीं. कारण तैलप यावेळीं राष्ट्कूटांच्या बिस्तृत राजशक्तीचा स्वामी । झाळा होता; आणि राष्ट्कूटांनीं तर कनोजपर्यंत स्वाऱ्या केल्या ‘ होत्या. तैलपांचा सेनापति भारप हा लाट देशावर राज्य करीत ‘ होता यांत इंकाच नाहीं. तैल्पाच्याच वेळेच्या सुमारास मूलराज ‘ सोळेखीनें गुजराथेवर आपला ताबा बसवून पाटण येथें राज्य सुरू केलें, ‘ त्याशी विरोध करून भारप्यानें युद्ध केलें ह पूर्वी सांगितलेंच आहे. | म. भा…२५

डी… ० आल्य)… आकर ही. आयी आ ह.

३८२ तिसरी हिदु राज्ये

राष्ट्रकूट वंशांतीळ जाकववा नांवाची राजकन्या हिच्या पोटी तैलपास दोन पुत्र झाले, ते सत्याश्रय आणि देववर्मन्‌. पैकीं सत्या. श्रय गादीवर बसला, मिरज किंवा येऊर लेखांत त्याजविषयीं विराष कांहीं सांगितलेले नाहीं. परंतु याच्या साम्राज्याच्या वेळीं दक्षिण कोंकणांतील एका मांडालिक शिलाहार राजानें खारेपाटण येथील दानलेख लिहिला (3. 0. 5. &. 8. भा. १ ). या लेखाविषयी दोनतीन महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. यांतील शिला- द्वार राजा रट्टराज आपल्या सम्राटाचं नांव सत्याश्रय स्पष्ट सांगतों. पण उत्तर कोंकणच्या शिलाहारांच्या लेखांत कोणा सम्राटाचें नांव येत नाहीं. पूर्वीच्या त्यांच्या लेखांत राष्ट्रकूट सम्राटांचा उल्लेख आहे. यार वरून असें दिसतें कीं, उत्तर चाठुक्यांच्या ताब्यांत उत्तरकोंकणां- तील शिलाहार नव्हते. दुसरी गोष्ट, प्रधानांचीं नांवें ह्या लेखांत उत्तर शिलाहारांच्या लेखांप्रमाणे नाहींत. तिसरं, दान घेणाऱ्या ब्राह्मणांचे नांव ‘ ऐय्य ‘ उण्पदांत नसून “* आर्य ‘ पदांन आहे. यावरून असें दिसतें कीं निदान संस्कृत लेखांत कनाटकांत ‘ ऐय्य ! उपपद लावीत नसून आर्य लावीत.

सत्याश्रयाने इ. ९९७ पासून इ. स. १००८ पर्यंत राज्य केलें. तो निपुत्रिक असल्यानें त्याचा पुतण्या म्हणजे देशवर्मन्‌ अथवा यशोवर्मन्‌ आणि भगवती यांचा पुत्र विक्रमादित्य गादीवर बसला, राज्यावर बसल्याच्याच वर्षी कोरिलेला त्याचा एक लेख सांपडला आहे. (उ. 8. ५. 8.४पा ४), यानं थोडाच वेळ राज्य केलें. याच्या मागून याचा भाऊ जयसिंह गादीवर बसला. याचा एक लेख १०१९ इसवीचा सांपडला आहे. (इं. ए. ५ पा. १७). त्यांत असे म्हटलें आहे कौ, ‘ भोजकमलास हा सूर्य झाला आणि माळव्याच्या संयुक्त राजांचा यानें पराभव केला. ‘ माळव्याचा भोज राजाचा यानें खरोखर्रांच पराभव केला असावा, मुंजाला मारल्याबद्दळ दक्षिणच्या

कल्याणचे उत्तर चालुक्य. ३८३

चालुक्यांचा सूड घेण्याचा भोजाचा प्रयत्न विफल गेला. गुजराथ बखरकारांनीं भोजानें तैलपावर सूड काढून त्यास ठार मारळें अशी सांगितलेली हकीकत खोटीच आहे. ( बॉबे गॅझेटियरनेंहि हें सांगि- तलंच आहे ). कारण भोज तैल्पाच्या मृत्यूनंतर गादीवर आला, गॅझेटेयर ज॑ म्हणतो कीं हा सूड तैलपाच्या नंतरचा राजा विक्र- मादित्य याजवर भोंजानें काढला तेंहि शक्‍य दिसत नाहीं. कारण त्याने १००८ ते १०१८ पर्यंत राज्य केलें. हा काळ भोजाच्या राज्यकाळांत पडतो हृ खरें; पण ही गोष्ट दक्षिणच्या चालुक्यांच्या कोणत्याहि लेखांत सांगितलेली नाहीं व माळव्याच्या परमारांच्या ळेखांतहि नाहीं. तेव्हां ही नेहमींची सूडाची गोष्ट पृथ्वीराजाने शिहाबु दौनचा सूड घेतला या रासांत सांगितलेल्या सुडाच्या गोष्टीप्रमाणे काल्पनिक आहे. भोजास एखाददुसर्‍्या लढाईत जय मिळाला असेल पण शेवटीं वर सांगेतल्याप्रमाणें जयासेंह्वाने त्याचा पराभव केला. तथापि चोलराजा राजराज यावेळीं दक्षिणेकडे उदयास येत होता. त्याच्या स्वारीपासून विक्रमादित्यास बराच त्रास झाला. नऊ- लक्षा एवढी प्रचंड सेना घेऊन त्याने सवे महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. व बायकापोरांसाहि ठार केलें असें वर्णन आहे. हे लेखकांच्या अति- शयोक्तीमुळें झाठेळें आहे, तरी विक्रमादित्याचा पराभव झाला ही गोष्ट खरी. चाल्यांचा आणि चोलांचा अथवा महाराष्ट्राचा आणि मद्रासचा हा वंशपरंपरेचा तंटा पुष्कळ वर्ष चालला होता. आणि राजराजानें सत्याश्रथ किंवा विक्रमादित्य यांचा पराभव केला होता, तर राजराजाचा पुत्र चोलळराजा राजेन्द्र याचा पराभव जयासिंहानें केला. मिरज लेखांत असे स्पष्ट सांगितलें आहे कीं, दक्षिणेकडे चोलांना जिंकून व पश्चिमेकडे सत्त कोंकणांना जिंकून उत्तरेकडे दिग्विजय करण्याकरितां निघाला असतां, जयासिंहानें कोल्हापुर येथे मुकाम केला; तेव्हां हें दान त्यानें दिलें. सप्त कोंकण कोणतीं हँ

३८४ तिसरी हिंदु राज्ये. पूर्वी सांगितळें आहे. हे सात राजे नव्हते. यापैकी उत्तर कोकण जयसिंहानें जिंकळें नसावें. हे दान रके ९४% म्हणजे १०२४ इसतवीचे आह. यानेतर जयांसिंह ऊर्फ जगदेकमहछु याने माळव्याचा भोजं याचाहि परांभव करून पुष्कळ वर्षे राज्य केलें. गोरीशंकराचे मतं आहे कीं, भोजाशीं झालेल्या टढाईतच जयसिंह मारला गेला. पण हा तर्क पूर्वींच्या विक्रमादित्याला लागू आहे; जयसिंहाला लागू नाहीं. कारण विक्रमादित्याच्या काळांत लिहिला गेलेला येऊर येथील लख जय- सिंहाचा असा अंत झाला ही गोष्ट सांगत नाहीं,

जयसिंह १०४० मध्यें मठा असावा. त्याच्या मागून त्याचा पुत्र सोमेश्वर गादीवर बसला. हा आपल्या सत्रे प्त्रेजांपेक्षां आंधेकच नामांकित झाटा. येऊर शिलालेखांत त्याचें वर्णन पुढीलप्रमाणं आहे. ‘: माळव्याचा राजा पराजित होऊन आश्रयाकरितां एखादें मंडळ पहात रानोरान फिरत आहे. चोलांचा राजा समुद्रकिना- ऱ्यावर्रालळ ताटवंनांत दडून राहिला आहे. कान्यकुन्जाचा राजा हिमालयाच्या एकां दरींत सोमेश्वराच्या प्रतापाच्या भीतीनें मन व्यग्र होऊन लपला आहे. ‘ हा माळव्याचा रांजा स्वतः भोज असावा. कारण भोजाच्या मागूनच्या राजास सोमेश्वराने स्वतःच मदत केली. कान्यकुब्जाचा राजा प्रतिहारांचा दुर्बळ वरांधर ज्याचा परांभव मह- मंदानें केला तो राज्यपांळ असावा. चोलांचा राजा राजेंद्रच स्वत असूं. शकेल. बिल्हणाच्या विक्रमांकदेवचरितामध्यें या हकीकतींचें उत्तम वर्णन आहे. सोमेश्वराचा पुत्र विक्रमांक याचा राजकवि तो असंल्यांनें त्यांचें वर्णन काव्यमय असलें तरी समकालीन इततिहासा- सारिखे आहे. त्यांत सोमेश्वरानें भोजाला जिंकून धांरसुद्धां कबजांत घेतली असें वर्णन आहे. अर्थात्‌. भोज आश्रयासाठी रानोमाळ भट- कत राहिला, चदीचा कर्ण यांचाहि त्यानें पराभव करून त्यास लढाइत ठार मारिठें असें वर्णन आहे ( विक्र १ छो. १०२-१०३);

कल्याणचे उत्तर चालुक्य. ३८५

पण ह संभवनीय दिसत नाहीं. ही उत्तरेकडील विजयी स्वारी कनोजपर्यंतहि गेळी आणि कनोजचा प्रतिहार राजा महमुदाच्या वेळेप्रमाणे राजधानी सोडून हिमाल्य़ांत पळाला असावा. येऊरच्या लेखांत चोलराजाच्या मृत्यूत्रिषयीं वर्णन नाहीं, तश्रापे असें सांगित- ठेळें आढळतें कीं, इ. स. १०३७ त राजेंद्र चोलाशी सोमेश्वराची जी लढाई कोप्पन येथें झाली, त्यांत राजेंद्र मारला गेला. या गोष्टीचा उललेख येऊर लेखांत यावयास प!हिजे होता, पण त्यांत तो समुद्र- किनाऱ्यावर पळाला एवढेंच वर्णन आहि. हा लेख बिक्रमांकाच्या वेळेस लिहिला गेला, तेव्हां त्यांत तुंगभद्रवरील कोप्पमच्चा लढाईचा, ज्यांत राजेंद्र मारला गेळा, दाखला नाहीं याचें आश्चर्य वाटतें.

सोमेश्वरानें “कल्याण’ हृ नवें नगर बसवून तेथे आपली राजधानी नेली असे म्हणतात. उत्तर चालुक्यांची राजधानी येथपावेतों कोठे होती हँ निश्चित दिसत नाहीं. कदाचित्‌ पूर्वींच्या राष्ट्रकूटांची मल- खड किंा त्याच्याहि पूर्वींच्या च ठुक्य़ांची म्हणजे त्यांच्या पूर्वजांची राजधानी बदामी हच त्यांचें मुख्य ठिकाण असावें. बिल्हणानें कल्याण नगर ( अलीकडच्या बेद्रजअळचें ) सोमेश्वरानें बसविल्याचें स्पष्ट सांगेतळें आहे. कुलपरंपरागत शाट्ट चोल यांना अधिक जवळम्हणून तेथें राजधानी केली असावी. भरतखंडाच्य़ा अनेक प्रसिद्ध हिंदु राजांप्रमाणें सोमेथर कवीचा व विद्वानांचा चाहता होता ( येऊर छेख आणि ब्रिल्हण १ ब ४ ). इ. स. १०६८ त इतर प्रसिद्ध धंग वगेरे नामांकित हिंदु राजांप्रमाणे सोमेश्वर जेव्हां तापाने आजारी पडल’, तेव्हां तुंगभद्रा नदींत देकराचें स्तोत्र गात चेत्र वद्य अष्टमी आदितवार रोजीं त्यानें जलळसमाति घेतली.

सोमेश्वर जिवत असतांनाच त्याचा दुसरा पुत्र विक्रमादित्य आपल्या शोयांनें ब शहाणपणाने नांवास चढला होता. बहुधा सोमेश्वराच्या युद्धांत विक्रमादित्यच सेनापाते असावा. बिल्हणानें कांची .शहर

३८६ तिसरा हिडु राज्ये

सोमेश्वरान घेतळें असें जें वर्णन केळें आहे त्याचा अर्थ विक्रमाने खरोखर सदर शहर घेऊन ठुटलळं असाच होतो. कारण एकदां बापाने आणि नंतर मुलानें असें कांची दोनदां घेतलें गेळें हं संभव- नीय नाहीं. बाप जिवंत असतांच विक्रमाने चारी दिशा जिंकल्या असें बिल्हणानेंहि वर्णन केलें आहे. त्यानें चेर, सिंहळ, गंगेकोंड, चोल, वेंगी, वंग आणि आसामाहि जिंकले, असें बिल्हण लिहितो, बहुधा या दरबारी कवींची ही अतिशयोक्त असावी. त्यानें दक्षिण- हिंदुस्थान सबंध जिंकळें यांत हुका नाहीं. हे विजय संपादित असतां बाप मेल्याची खबर मिळाली तेव्हां तो राजधानीस परतला. तेथें त्याचा वर्डाल भाऊ सोमेश्वर गार्दावर बसला होता. त्यास त्यानें राजा म्हणून नमस्कार केला. दोघां भावांत कांहीं दिवस प्रेम राहिले. परंतु शेवटीं नेहर्माप्रमाणें तंटा उर्पास्थत होऊन विक्रमादित्य राज- धानी सोडून कांचीकडे गेळा. वडील भावानें त्याच्यावर फौज पाठ- विली तिचा त्यानें पराभव केला. विक्रमादित्य बनवासीस पोहोंचून तेथें कांहीं दिवस राहिला. तेथून तो गोव्याकडे गेळा. तेथील मराठा कदंब राजा जयकेशी यानें त्याचा अंकितपणा मान्य करून त्यास मोठी खंडणी दिली. ( विक्रमादिल्यानें पुढे या. जयकेशीच्या नात- वाला आपली मुलगी दिली 7. 0. 7. 8. 3 98. ९ पान २४२, २६८, २७९ ). यानंतर अळूप आणि चर यांस जिंकून तो चोलाकडे वळला. चोल राजानेंहि त्याशीं सख्य करून त्यास आपली मुलगी दिली. याप्रमाणें आपलें सामर्थ्य वाढवून विक्रमादित्य तुंगभद्रेकडे वळला.

पण लौकरच अशा हकीकती घडून आल्या कीं, कुंतल देशाचा मुकुट विक्रमाच्या डोक्यावर बसला. चोळ राजा इतक्यांत मरण पावला; त्याचा पुत्र म्हणजे विक्रमाचा मेहुणा. यास दुसऱ्या वारसानीं इरकत केली. विक्रमाने कांचीस पोहोचून आपल्या मेहुण्यास

कल्याणचे उत्तर चालुक्य. ३८७

, गेलांच्या गादीवर बसावेळें व तो परतला. पण चोलांचा एक प्रबल

  • राजिंग यानें त्या मेहण्यास पुनः पदभ्रष्ट केळं आणि सऱ्या बंडखोर सरदारांस घेऊन तो विक्रमावर चाळून आला. त्यानें वेक्रमाचा भाऊ सोमेश्वर यास विक्रमावर पश्चिमेकडून हृया करण्यास गोलाविळें, विक्रम याप्रमाणें दोन सैन्याच्या कचाटींत सांपडला, पण यानें निरानेराळ्या दिवशीं दोघांना एकामागून एक युद्ध देऊन यांस इतके पराभूत केळे को सोमेश्वर केद झाला. तेव्हां वेक्रमानें एकदम कल्याणावर चाल करून सोमेश्वरास पदच्युत करून एजमुकुट आपल्या डोक्यावर चढविला. हे वृत्त शके ९९८ म्हणजे १. स. १०७६ मध्यें घडळें. अर्थात्‌ दुसर्‍या सोमेश्वरानें इ. स. १०६९ पासून १०७६ पर्यंत सात वर्षे राज्य केलें.

विक्रमादित्य उत्तर चाटुक्यापैकीं सर्वांत प्रबलतम राजा झाला,

  • राज्याहि फार वर्षे केळे. इ. स. १०७६पासून इ. स. ११२६ पर्यंत पन्नास वर्षे तो गादीवर होता. त्यानें त्रिमुवनमछु ही पदवी धारण केली. ज्याप्रमाणें पवे चालक्य वछुभपदांत पदवी धारण करीत किंवा राष्ट्रकूट राजे वर्षे-पदांत पदवी घेत, त्याचप्रमाणे उत्तर चालूक्य मछुपदांत एक नांब घेत. पहिला राजा तैलप यानें आहव- मह हें बिरुद घेतलें होतं व तेंच विक्रमाचा बाप सोमेश्वर यानेंहि घेतलें होते. आपला समकालीन गुजराथचा चाट्क्य राजा जयसिंह याप्रमाणें विक्रमादित्यानेंहि आपल्या नांत्राचा शक सुरू केला. हा एक लक्षांत घेण्यासारखा योग आहे कीं, हे दोघे समकालीन राजे मोठे पराक्रमी होतें आगे दोघानींहि आपले शक सुरू केळे व ते शक कांहीं वेळ चाळून नष्ट झाले. (इं.ए.१२पृ.१८९ मध्यें ढीटचा लेख.)

कऱ्हाडच्या शिलाहार राजाची कन्या चेंद्रलेखा हिने विक्रमास स्वयंवरांत वरिलें असें बिल्हणानें वर्णन केळं आहे. पण हें वर्णन अनैतिहासिक दिसतें. कारण स्वयंवराची चाळ या वेळेस बंद पडली

३८८ तिसरी हिंदु राज्ये

होती. शिवाय दाक्षिणचा सम्राट विक्रम खुद्द जेथे वर उर्पा झाला, तेर्थे कन्येस दुसरा एखादा राजा बरणें शक्‍यच नव्हते | राजे त्याच मांडाळेकच असावेत. ही राजकन्या विलक्षण सुस्वरूप होती. कल्हणानें असे लिहिळें आहे कीं, काऱ्मीरचा राजा हषया तिच्या सोंदर्याची कीर्ति ऐकन कन टक जिंकून तिचे हरण कर ण्याचा निश्चय सभेंत प्रसिद्धपणें उच्चारला.* आमच्या मते ही एक दुसऱ्या कवीची कल्पना आडे. तत्कालीन राजाप्रमाणे विक्र मालाहि कित्येक बायका होल्या. या बायकांना निरनिराळीं खचाकारेतां तोंडून दिलेलीं असत.

विक्रमाचा धाकटा भाऊ जयसिंह यास त्यानें बनवासी प्रान्ताधिकारी नंमळें होतें. त्यानें बंड करून मोठ्या सेन्यानि विक्रमावर चाळ केली. परंतु शेबटीं त्याचा पराभव होऊन तं केदेंत पडला. विक्रमाने शेवटीं त्यास माफी दिली असें बिल्हण म्हणतो

ब्रिक्रमाच्या दीधराज्यकाळात सत्रत्र शांतता राहिली; परंतु एक होयसल राजा विष्णुतर्धन याच्या नेतृत्वाखाठीं व गोव्याच्या कदंब राजाच्या मदतानें दक्षिणच्या अनेक राजांच्या एका संघाने विक्रमा- बर स्वारी करून कृष्णेपर्यंतचा मुलुख उद्ध्वस्त केला. (इं. ए. २ पा. ३०० आणि 3 3 75. 35. 8 ११ पान २४४ ). न घराण्यांतील आचगी नांवाच्या सरदारास विक्रमाने या संघावर पाठ विलें व त्यानें त्याचा पर्ण पराभव केला. बिमाक्रादेत्य चोलराजा स्वतः एकदां लढला व या य॒द्धांतहि त्यास जय आला. आचगी गुजराथच्या व माळव्याच्या राजांनाहि जिंकल्याचें वर्णन आहे; पण हीं युद्ध महत्त्वाची नसार्वात

कनाटभतुः पेमाडेः सुंदरा चंदलामिघाम्‌ । अलेख्परालखितां वीक्ष्य सा&

भरूत्पुष्पायुघाहतः ॥ १ ॥ स विटोंद्रेचितो र्बातत्रपश्चक्र सभान्तरे । प्रतिज्ञा चन्दलावाप्त्ये पेमाडेश्व विलोडनें ॥ २ ॥ ( राजतरंगिणी ७. ११२४

कल्याणचे उत्तर चालुक्य. ३८९

असो, विक्रमाचा राज्यकाळ म्हणजे दक्षिणच्या लोकांचा सोख्य-

। कायदे चाळू असत ही गोष्ट त्याचा प्रधान विज्ञानेश्वर यानें याझ- वल्क्यस्मृतीवरील आपली प्रसिद्ध टीका मिताक्षरा यावेळीं लिहिली । ह्या एकाच गोष्टीवरून सिद्ध होईल. बंगाळ व्यतिरिक्त सर्व हिंदु । स्थानभर ही टोका अद्यापहि हिंद कायद्याअरील श्रेष्ठ पुस्तक म्हणून । मानली जाते. आणि पश्चिमेकडील कायदेपंडित व ब्रिटिश काटेहि । हिला मान देतात. यावेळीं हिंदुस्थानांतील सर्व मोठ्या राज्यांत हिंदु- । धमीचा खोळ अभ्यास होत हाता असें दिसतें. कारण मिताक्षरे- खेरीज ठाण्याचा शिलाहार राजा अपरादित्य यानें स्वतः लिहिलेली अपराक नांवाची ह्य!च स्मतीवरील विद्वत्तापूर्ण टीका यानंतर थे,ड्याच । काळांतील आहे. तर्सेच कनोज येथें गोबिंदचंद्राच्या आश्रयाने लक्ष्मी- । धरानें व्यवहारकल्पतरु हा कायद्यावरील ग्रंथ लिहिला. असो, मिता- क्षरेच्या तीन्ही भागाच्या शोवटल्या तीन झछोकांत तीन गोष्टीची अत्यंत स्तुति केली आहे. अत्यंत सुंदर कल्याणनगर, अत्यंत विद्वान पंडित िज्ञानेश्वर आणि अत्यंत प्रतापी हिमालयापासून रामेश्वरापर्यंत व पूर्वसमुद्रापासन पश्चिमसमद्रापर्यंत राज्य करणारा व्रिक्रम विक्रमादेत्याच्या मागून त्याचा पुत्न सोमेश्वर तिसरा गादीवर बसला. तो बापाइतकाच पराक्रमी असुन बापाहूनाहे जास्त एका बाबतींत म्हणजे वरिद्दत्तत होता. त्यानें केलेला ग्रंथ मानसोळास ऊर्फ अभिलबितार्थचिंतामाणे सवे शास्त्रांचे आधारस्थान आहे. राजनीति- शास्त्र, युद्धशासत्र, अश्वशाखत्र, गजश्रासत्र, काव्य, तर्क,दान, ज्योतिष्य, किंबहुना सत्रे शाखत्रें जीं जीं मनुष्याच्या सुखाकरितां उत्पन्न झाली आहेत तीं, सवे ह्या ग्रंथांत आहेत. ज्योतिष्य शास्रांत तर शके १०५१ चेत्न शुद्ध प्रातिपदा द्युक्रवार या दिवसाचे प्रहगाणित करण्याचे

हश

३९० तिसरी हिंदु राज्ये

धुवांक त्यानें दिलें आहेत.यावरून हा ग्रंथ त्यानें आपल्या राज्याच्या

पांचव्या वर्षी लिहिला. एका दीधकाळाच्या राज्यानंतर तो गादीवर आला, तेव्हां तो वयाने मोठा होता हं सांगावयास नको. त्यानें थोडंच म्हणजे अकरा वर्षे राज्य केलं

सोमेश्वराच्या मागून इ. स. ११३८ त त्याचा पुत्र जगदेकमछु

गादीवर आला. आणि वत्याच्यामाग्न इ. स. ११५० त त्याचा

भाऊ तैल दुसरा गादीवर आला. यावेळी चाल़क्यवंशाची शक्ति कमी झाली आणि तेल्पाचा सेनापाते विजल एक कलचुरी क्षत्रिय यानें त्याविरुद्ध बंड केलें. कोल्हापुरचा मांडलिक राजा विजयाक व तेलंग- णचा स्वतंत्र काकतीय राजा यानें बिज्जलास मदत केली. कांही वर्षे कल्याणमध्यें बहुतेक कैद भोगल्यावर तो तेथून निसटला, आणि घारवाड जिल्ह्यांतील अण्णेगिरी येथे येऊन कांहीं दिवस एक लहानसे मांडलिक राज्य त्यानें स्थापिळें. विजलानें चालक्यांची सत्ता बळका- वून कल्याणास राज्य चालविले इ० स० ११६२ मध्यें तैळपावर विजञ्जलानें हल्ला केला आणि स्यास बनवासीकडे पिटाळून लावून त्यानें आपले स्वातंत्र्य पुकारिळे. या कलचुरींच्या बळकाविलेल्या राज्याचा थोडक्यांत पुढें इतेह्ास सांगूं.

कल्याण येथें लिंगायतांचा पंथ याच वेळीं निमीण होऊन विज्जलाचा खून झाला आणि कलचूरीची सत्ता ऱ्हास पावली. तेव्हां तैल दुसरा याचा पुत्र सोमेश्वर याने चालुक्य राज्य पुनः स्थापिले आणि आपली राजधानी इ. स, ११८२ त आण्णेगिरी येथें केली. यांत ब्रह्म नां- बाचा एक मांडलिक ( इ. ए. ११ पा. ) मदतगार होता. पण देवगिरीचे यादव व द्वारसमुद्राचे यादव यावेळीं उदयास्त येत होते; आणि ल्यानीं ब्रह्मावर हा केला होयसल वंशांतील वबीर- बल्लाळ यानें ब्रह्माचा पराभव केला. आणि यादवानीं उत्तर चाल-

कल्याणचे उत्तर चालुक्य. ३९१

सत्तेचा अंत केला, शके ११११ म्हणजे. इ. स. ११८९.
पृंतर सोमेश्वराचा पत्ता लागत नाहीं,

चाक्यांच्या लहान लहान शाखा महाराष्ट्रांत निरनिराळ्या ठिकाणी य करीत असल्या पाहिजेत. एक शाखा कोंकणांत नि:संशय गी. कल्याणच्या चालुक्य वंशाच्या एका शाखेतील राजाचा ; लेख सांपडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यांत चाळके नांवाचे मराठे कळ ठिकाणीं आहेत. कऱ्हाडेच डुबळ कुल मात्र चालुक्यांचे ळं तरी ते त्या चालुक्या पैकीं नसून पूर्वी सांगितल्या प्रमाणें याग २ ) भारद्वाजगोत्री उत्तरेकडील चालुअ्यांवैकी आहेत

असो, ह्या उत्तर चालटक्यांचे इतके लेख सांपडले आहेत कीं गि ते इतक्या पूर्वकाळीं सांपडले आहेत कीं, बर्‍याच वर्षामागें ‘येक विद्वानांनी त्यांचा इतिहास लिहलेला आहे. रॉयळ एरी ठेक सोसायटी लंडन पुढें मद्रास सिव्हिळ सव्हिसंपैकी बोल्टर यट यानें एकट्याने इ. स. १८२५ त दक्षिण हिंदुस्थानच्या या ॥ंच्य।”५९ ६ कोरीव लेखांच्या नकला ठेवल्या (1 ४. १. 5.9). यतः या सव साधनावरून डॉ. भांडारकर (रा. गो. ) णि डॉ. फ्रट यानीं या चालुक्यांचा इतिहास दिला आहे. वरील क हृकीकतींत आम्ही भांडारकरांनीं डेक्कनचा प्राचीन इतिहास | दिलेल्या वृत्तांताला धरूनच इतिहास दिला आहे, आणि कांही [न माहिती मिळालेली व आमच्या थोड्याशा कल्पना त्यांत मिळ- या आहेत. किल्हॉ्ननें कल्याणचे उत्तर चालुक्य या सदरा- ठीं दक्षिणच्या कोरीव लेखांच्या आपल्या यादींत जे अनेक लेख गेतळे आहेत, ते सव तपासून पाहणें अशक्‍य आहे. कारण ब्रीहि संख्या नंबर १४० पासून नंबर ३१५ पर्यंत १७५ इतकी ते. पण या उत्तर चाटुक्यांचा इतिहास विद्वानांनी उत्तम नि’श्वत ग्र आहे ल्यामुळें शंकास्थानें बहुतेक उरलेली नाहींत असें आम्हांस

३९२ तिसरा हिंदु राज्ये

वाटते, कदाचित्‌ हे मराठे होते किंबा कनाटकी होते हा तंठ्याच प्रश्न निघेळ.पण हा भेद केवळ दिखाउ आहे असं आमचे मत आह

या राजांनीं इ. स. ९७३ पासून इ. स. ११८९ ‘पर्यंत म्हण: सुमारें २१६ वर्षें राज्य केलें. पुढील वंद्याबळींत दाखबिल्याप्रमा हे राजे ११ झाले. अर्थात्‌ नेहमीचीच वीस बषा’ची सरासरी द पिढीस पडली. या राजांच्या अमलांत दक्षिणेंत जी धार्मिक व साम जिक स्थित्यंतरे झाठीं, किंबहुना सर्व हिंदुस्थानांत झाली म्हणा बौद्ध धर्मांचा अन्त तसेंच जैनधर्माचा उत्कर्ष ब उतार वंगेरे बात्री बद्दल आम्ही या पुस्तकाच्या शबटीं देशाच्या सामान्य परिस्थती निरीक्षण करणार आहों तेथें जास्त लिहू.

कल्याणच्या उत्तर चालुक्यांची वंशावळ. ३९३

कल्याणच्या उत्तर चालुक्यांची वैशावळ. ( बॉंबे गॅझेटीयर ब भांडारकर आणि किलहाने वंशावळी ए. इं. ६ ) (१) तेलप ९७३-९९७ इं. (उ. नूरमाडि, आहवमल, रागा मी ले.श., ८९५, ९०२.4, 71 १९

क || क र 1 (२ ) सत्याश्रय ( ९९७-१००८) देशवमनू ( यशोवमंन )

ले. ह, ९२४, ३०, ४189: |

६… माजला परश यी (३) विक्रमादित्य त्रिमुवनमल़ (४) जय सिंह जगदेकमल(१०१८-१०४०) (१००९-१०१८) ले. श. ९३० ले. रा. ९४०, ४१, ४४, ४९,

प०, २५७७७ २९

(५) सोमेश्वर पहिला, आहवमलछ़ ( १०४०-१०६८ )

(६) सोमेश्वर दुसरा (१० ६८-१०७६) (७) विक्रमादित्य दुसरा*

मुक्‍्नेकमल़ ले, शं. ९९३, ९६, ९७. त्रिभुंबनमल पमाडी (१०७६-११२५) ले, दा. ९९९, १००१४, ८, ८२ ९, १२५ ५, १७, १८, २० वगरे,

(अ

| ी (८) सोमेश्वर तिसरा (११२६-११३८) मण्गी ७ ८ क श.. १७५, र

१ ) हे र ह हि र र वि | (९) प्रतापचंद जगदेकमल़ (११३८-११५०) (१०) तेलप दुसरा लै; दा, १०६१, ६४, ६६; ६९, ७३ (११५० ११८२) नूमाडि त्रेलोक्यंमल़ ले; सं. १०७६, ७७* र र र | ह पजा (११) सोमेश्वर चोथा ( ११८२-११८९ ) त्रिभुवनमलल ले. ह. ११०६, ११४

___ *किल्होर्न विक्रमादित्य दु, यांचा माऊ जयसिंह ब त्यांचा पुत्र

३९४ तिसरी ॥हदु राज्य.

कल्याणचे कलचूरी. ि यांचा इतिहास येथं थोडक्यांत आम्ही देतों. त्यांनीं फार राज्य केलेंहि नाहीं व ते बहुतेक बंडखारच राहिले. विज्जन ( १ ज़ हा एक कलचूरी मांडलिक होता. त्रिपुरचे कलच्री हे आ मुली दक्षिणच्या राजांस नेहमीं देत. तेव्हां एखाद्या राणीचा बंद या नाल्यानें जाहगीरदार झालेल्या सरदाराचा तो वंशज अ अर्किआलळॉजिकल सेव्ह रिपोर्ट पश्चिमहिंदुस्थान नंबर १० य प्रसिद्ध झालेल्या एका दानठेखांत तो जगदेकमछाचा महामंडळे होता असें वर्णिळें आहे. लौकरच सेनापतिनाल्यानें प्रबळ हो त्याने आपल्या मालकास बाजूस सारिळें आणि इ. ११६५ त कल्याणचा राजा असें आपलें नांव प्रसिद्ध केलें, धार्मिक तंट्यांत त्याचा लौकरच खून झाला. त्याचा ब्राह्मण प्र बसव यानें जैनधर्माच्या विरोधी–ब्राह्मण धर्माच्या नव्हे– आपला लिंगायत पंथ यावेळीं स्थापन केला. या भिन्न मताचे विर वर्णन आम्ही पुढें देऊं. बिज्जन हा जैन झाला होता. तो लिंगाय- तांच्या यतींचा म्हणजे जंगमांचा छळ करूं लागला. यामुळें जो तंठा उपस्थित झाला, त्याची हकीकत जैनांनी व लिंगाइतांनीं अगदीं भिन्न दिली असल्यामुळें निश्चितपणें सांगतां येत नाहीं. या तंट्यांत इ. स. ११६७ त विज्जनाचा खून झाला यांत शंका नाहीं. त्याचा पुत्न सोम अथञ्रा सोयीदेव राज्य करूं लागला, त्याच्या राणीनें एका ब्राह्मणाला दिलेळे दान त्यानें एका ठेखांत मंजूर केलेलें आहे (इं. ए. १० पान १८३ ). यानें इ. स. ११७६ पर्यंत राज्य केलें. तेव्हां त्याच्या मागून त्याचा

विष्णुवधेन विजयादित्य याचाह देऊन विक्रमाचा पुत्र जयकण याचा १०८७- ११२१ पर्येत स्वतंत्र उल्लेख करतो. हा बापाच्या अगोदर मेला.

कल्याणचे कलचूरी. ३९५

मुलगा संकट हा गादीवर आला, याचेह्ि कांहीं लेख सांपडले आहेत. इ. स. ११८३ मध्ये पूर्वी सांगेतल्याप्रमाणें चाट़क्य सोमे- श्वरानें आपलें राज्य यापासून हिसकावून घेतलें. या रि्तानें कलचूरी राजांनीं इ. स. ११६० पासून इ. स. ११८४ पर्यंत चोवीस वर्षेच राज्य केळे. पण यांचा राज्यकाळ लिंगायतांच्या धर्ममताच्या उदयामुळें प्रसिद्ध आहे. यांच्या वेळीं वैऱयलोकांतून जैनमताचा लोप होत चाळलळा आणि बौोद्धमत तर बिलकुल नष्ट झलें. दक्षिण महाराष्ट्रांत यावेळीं वेश्‍्य बहुतेक ठिंगायत झाले. ( बा. ग. व्हा. १ भा. २ पान २८८)

४. 1४. 3. 3. ( १८३७ ) यांत असें सांगितलें आहे कीं या कल्चूरी राजांची उत्पात्ति मलखेडच्या जैन गुरूनी सांगितल्या प्रमाणें कल्याणचाच महामंडलेश्वर सन्तरस नांवाच्या काळंजरपुरनिर्गत कल- चूरी वंशातल्या एका सरदारापासून झाली ( पा. १९ ). यांत विज्ज- नाचा वंश संतरसापासून आठवी पिढी धरून पुढें दिल्याप्रमाणें सांगितला आहे

विज्जन त्रिभुवनमलछ़ ] |

सोमेश्वर देव उर्फ रायमुरारी संकटदेव आहवमलळू

प्रकरंण तेरावे. त्रिकेलिंगाचे प्राच्य गंग.

हिंदु डतिहासांच्या या कालविभागांत कलिंग देशांत एक नवीन रांजघराणें उदयास आलें. ‘ त्रिकटिंगांच्या प्राच्य गंगास ‘ किल्हॉननें उत्तर हिंदुस्थानांतील मानळें आहे हें योग्यच आहे.पंण कलिंग तेथीळ ( हीचे वबिजागापट्टम ब॑ गंजाम जिल्हे ) लोकांचे वंश आंणि भाषा यांच्या दृष्टीनें दक्षिण हिंदृस्थानांत समाविष्ट केळ पाहिज. तरी पण | प्रांचीन काळापासून अंग, वंग, कटिंग अशी जोडी लागलेली आहे. आंणि ब्रिह्ारं, बंगाळ ब ओरिसा हे अलिकडच्या इतिहासांतहि नेंहमीं सांधलेळे असतात. कलिंग देशांत फार प्राचीन काळीं आर्य स्वारी करणाऱ्यांनी वप्ताते केली, त्यांच्याहि पूर्वींच्या काळांत कलिंग . देंशांस जाणें आर्य लोक पाप समजत असत; मंग तेथे राहण्याची गोष्ठच नको. तथापि अशोकाच्या वेळेपासून आणि ल्योहि पूर्ती ब्राह्षण-काळापासून आर्यांची बरींच संख्या कटिंगांत वस्ती करू | लागली. अशोकाने मोठा प्रयत्न करून ब.एक लाख लोक मारून . हा देश जिंकला, तेव्हां तो बोद्ध झाला. या देशांचे पिनीच्याहि काळीं तीन भाग मानीत असत; यामुळेंच व्रिकलिंग हो संज्ञा उत्पन झाली असावी ( विजागापट्टम गझेाटयर पा. २६ ), दक्षिणच्या किल्येक देशांच्या नांवांस या रीतीनें एक संख्या अगोदर जोडणें ही तऱ्हा तीन महाराष्ट्र, सप्तकांकण, त्रेराज्यपछुव (भा. १ पा.२॥२०१) अश्या । उदाहरणांत ॥दितून यते. कटिंगाचे हे तीन भाग कोणते होते हँ ठराषणें कठिण आहे. बहुधा ते ( १ ) मुख्य कलिंग म्हणजे पूर्व किनाऱ्यावरील ह्ळ्ठांचे गंजाम, विजागापट्टम आणि गोदावरी द्दे जिल्हे (२ ) आंत्र म्हणजे पूर्वघाटाच्या वरचा मुड्व आणे (३) ओडू

त्रिकलिंगाचे प्राच्य गंग. ३९७

  1. छी १51

अथवा ओरिसा, महानदीच्या उत्तरेकडे, हे तीन प्रदेश असावेत. त्रिकलिंगाहून बेंगी भिन्न मानला जात असे (भा. १ पान ३०४). नवव्या शतकाच्या अखेरपर्यंत कलिंग बेंगीच्या प्राच्य चालुक्यांच्या सत्तेखाली होतें. त्यांची राजधानी गोदावर्राच्या दक्षिणेस होती. या प्रदेशांतील सामान्यजन द्रविडी वंशाचे आहेत.आणि बाहेरून आलेले आर्याहे, अनार्य तेलगू भाषा तेव्हां बोलत होते ब हल्लीं बोलतात, अकराव्या दातकाच्या आरभीं या प्रदेशांत प्राच्य गंग उदयास आले, ते आपल्या कोरीव लेखांत गंगवाडीतील कोलाहल शाहरांतून . म्हणजे दक्षिणेकडून आपण येथ आलों असें सांगतात ( जरनल | ६४ भा. १ पा. २३७ ). पण या देशांत यांची वस्ती बरेच दिवस होती. नवीन उदयास येणाऱ्या चोल सत्तेपुढें प्राच्य चालक्य- ‘ बेंगी येथें पडले, या संधीचा फायदा घेऊन हे प्राच्य गंग वज्रहस्ताच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र झाले. ह्याचा पुत्र राजराज, चोलांचा प्रसिद्ध वेंगीची सत्ता नष्ट करणारा राजा राजेंद्र, याची मुलगी रूपसुंदरी ‘ हिचा नवरा होता. त्यांचा पुन्न अनंतवर्मन्‌ यास अर्थात्‌ गंग आणि न्चोळ यांच्या वंशांत उत्पन्न झाल्यामुळें चोडगंग म्हणत. नेहमीप्रमाणे हा वंशांतील तिसरा असल्यानें अतिशय प्रबळ राजा झाला व नेहमीं- प्रमाणे त्यानें पुष्कळ वर्षेहि राज्य केलें. या राजांचे कोर्राव लेख सांपडले आहेत. ज्याअर्थी वेंगीच्या प्राच्य चालुक्यांची सत्ता याज- कडे आली आणि त्यांची राज्यव्यवस्थाहे आली, त्याअर्थी यांचे लेखाहे प्राच्य चालक्यांच्या लळेखाप्रमाणें विस्तत व निश्चित माहितीने “भरलेले आहेत. त्यांत नेहमीं शकवर्ष दिलेलें असतें व प्रत्येक राजाचा निश्चित राञ्यकाळ दिलेला असतो. किंबहुना शेवटच्या किंवा मह- त्त्वाच्या राज्याच्या राज्यारोहणाचा काल वर्ष, महिना, वार, मिति इतक्या निश्चित तऱ्हेने दिळेला असतो. त्याचप्रमाणें या लेखांत ह… मे. मा…रद

| ९ 1।

(४,

३९८ तिसरी इदंदु राज्ये

यांच्या कुलाचे गोत्र ब चंद्रापासूनची विस्तृत वंशावळ दिलेली असते.

यामुळें या वंशांतील राजांच्या संबंधी मितींचा घोटाळा मुळाच नाहीं. यांच्या ठेखावरून यांचा मिळणारा इतिहास निश्चित रीतीने आम्ही पुढें देतो. मात्र राजांच्या स्तुति नेहमीप्रमाणे अतिशयोक्तिपूण अस- ल्यानें त्यांतून ऐतिहासिक वृत्ते फार थोडी सांपडतात. समकालीन राजांचे थोडथोडे उल्लख त्यांत आहेत, त्यावरून मध्ययुगीन हिंदु

इातिहातावर कांहीं थोडासा प्रकाश पडतो.

वर सांगितल्याप्रमाणें त्रिकटिंगांत पहिला प्रसिद्धीस आलेला

राजा दुसरा वज्रहस्त होय. याचा दानलळेख इ. स, १०५८ ऱ | इ. एं. ४ (पा. १७५ ते १८८ ) यांत छापला आहे, त्यांत ह्या. कुलाची संपूर्ण हकीकत दिली आहे. हे चंद्रवंशी कुळ असून त्य गोत्र आत्लेय आहे. कुलास नांब देणारा राजा गांगेय ( भीष्म नव्हे होता. हें कुल काटेंगांत येऊन “ गोकणे ‘ शिवाच्या! प्रसादाने किं गांत सत्ता पावलें. या महादेवाचे देऊळ महेंद्र पर्वतावर आहे. प्रथम मांडलिक होते, व॒ पंचमह्ाशब्द ( पांच राजकीय वाद्यं ) त्यास मिळाले होते. यांच्या पांच शाखा झाल्या, ल्या ९ व्या शत कांत पुनः एकत्र झाल्या, वज्रहस्ताला “ परमभट्टारक ‘ इत्यादि स्वतंत्र राजांची बिरुदे या लेखांत लाविलीं असून याचा राज्याभिषेक काळ इ. स. १०३८ दिला आहे. या कालांतील इतर राजकुलाप्र-

माणें हें कुल हौव असून वज्रहस्तहि परम माहेश्वर होता. यानें जंगी आणि ओरिसा दोन्ही राजांचा पराभव केला. यानें तीस वर्षे राज्य केलें. याचे कित्येक लेख मिळाळे असून त्यांपैकी दोन किल्झेर्नने याच्या नांवावर दिळे आहेत. याचा इ. स. १०५८ चा लेख: गद्यांत असन फारच संकाठेत आहे. या लेखांत याचा राज्याभिषेक ( काळ इतका निश्चित दिळा आहे कौ, वर्ष, महिना सांगितला आहे इतकेंच नव्हे तर चंद्राचे नक्षत्र व बरोबर लम्नहि दिळें आहे. हा |

त्रिकालेंगाचे प्राच्य गग. ३९९

कलिंगनगराहन प्रसिद्ध झाला आहे. गंजाम जिल्ह्यांतील पालाकि- मेडी तालक्‍्यांतील मुखालिंगम्‌ हृ गांव समुद्र किनाऱ्यापासून कांहीं मैळावर असून तेंच कलिंगनगर होय असें आतां निश्चित झाले आहे.

बज्रहस्तामागून ल्याचा मुलगा राजराज इ. स. १०५८त गादी- वर आला. यानं आठ वर्षे राज्य केठें. याचा पुत्र अनातिवर्मन्‌ याच्या एका लेखांत (इं. एं १८ पा.१६६) असें सांगितठें आहे कीं, यानं वेंगींच्या विजयादित्यास चोल राजाविरुद्ध मदत केली. आणि उत्क- लाच्या राजासह्ि ( बहुधा सेन राजाविरुद्ध ) मदत केली. प्राच्य चालक्यांचा इतिहास भा. १ पा. २३४ यांत सांगितलेला आहे, त्याव- रून विजयादित्य* इ. स. १०६३ पासून इ. स. १०७८ पर्यंत राज्य करीत होता, त्याच्यापूर्वी २७ वषाचे अराजक होतें असें सां- गितळें आहे. या अराजकामुळे कलिंगाच्या प्राच्य गंगांत स्वतंत्र होण्यास साधि मिळाली. राजराजाचा एक ब्राह्मण मांडलिक वनराज याच्या लेखांत (ए.इ. ४पा. २१४) असें म्हटलें आहे की, वनराजानें चोलाशीं प्रथम युद्ध केळें (कदाचित्‌ बिजयादित्यास मदर्तास गेठें असतां). नंतर त्यानें बेगी जिंकून ती लुटली, आणि दानार्णवास ठार केलें. हा लेख इ. स. १०७५ चा आहे. अर्थात्‌ राजराज इ. स. १०७६ पर्यंत राज्य करीत होता,

राजराजाची राणी प्रसिद्ध चोळ राजा राजेंद्र याची मुलगी रूपसुदरी होती. तथापि या पुळे वें्गाचे रक्षण करण्याकरितां चोळाशीं लढण्याचे त्याने सोडलें नाहीं. राजगज आणि रूपसुंदरी यांचा पुत्र अनंतवर्मन्‌ हा प्रारंभी सांगितल्याप्रमाणें या कुलांतील सर्वांत बलिष्ठ राजा होता. याचे अनेक लेख सांपडले आहेत. ( किल्हॉर्ननें

*येथे मागील भागांत चुहीनें ज्रिनशादिल्या ऐवजी विक्रमादित्य ‘पडलें आहे.

४०० तिसरीं हिंदु राज्ये

आपल्या वंशावळींत ए. इं. मध्यें याच्या नांवावर चार लेख दिले आहेत) इ. स. १०८१ चा पूर्वोह्लिखित (इ. एं. १८ पा. १६५) लख फारच विस्तृत आहे. यांत राजराजानें द्रामेळ (चोल) याशीं युद्ध करून विजयादव्याचें रक्षण केलें अते सांगितळें आहे. अनंत- वर्मनू यानेंहि स्वतः उत्कल राज्यास पश्चिमेस मदत दिली आणि वेगास पूर्वेस दिली; व या रीतीनें दोन दिशांस दोन जयस्तंभ उभे केळे. चोढानीं कलिंगाला जिंकले असे आपल्या लेखांत लिहिलें आहे; पण तें ठौक दिसत नाहीं. अनंतवमनूचे अधिक प्रासेद्ध नांव चोलगंग आहे; याचे कारण आम्हीं पूवी सांगितलेंच आहे याचें राज्याभिषेक-वषे इ. स. १०७६ दिलें असून त्याचा नक्की शुभमुहृताहे दिळा आहे. यानिमित्त त्यानें एक दानहि केलें (इं. ए. १८ पा. १६३). याचे आणखी तीन लेख इ. स. ६१०८१ ११८८ आणि इ. स. ११३२५ इ. ए. १८ मध्येंच छापिळें आहेत. यापैकीं एकांत राजराजेश्वर नांवाचें त्याच्या पित्याने बांधलेळें एक शिवालय होतं त्यास यानें गांवदान दिला आहे.

बंगाळ ४- 1. 3. 3. ६५ भा. १ पा. २४० यावर एक लांब- लचक ताम्रलेख याचा प्रसिद्ध झाला आहे. त्यांत यानें उत्कळ अथवा ओरिसा जिंकून आपल्या राज्यांत सामील केल्याचे व तेणें- करून भूमि, द्रव्य, हजार हत्ती, दह्या हजार घोडे उत्कटरूपी समुद्र मंथन करून यास मिळाले असें लिहिलें आहे. यावरून असें ठरतं कीं, ओरिसांत केसरी घराण्याचा अंत यावेळीं झाला. जगन्ना- थाचें प्रसिद्ध देवालय चोटुगंगानें बांधिळें असेंहि यांत लिहिलेले आहे. “ जो जगन्नाथ सवे जगाचा उत्पत्तिकती आणि सर्वजग

व्ह

*नेमथ्योत्कलसिन्धुरापमपररं गंगेश्वरः प्रासवनकः कौर्तिसुध करं तथा लक्ष्मी घरण्यासमम्‌ । माद्यद्दन्तसहस्मश्वनियुतं रत्नान्यसख्यान वे तं सिन्धोः किमियं प्रकर्षमथवा भूयस्तदुन्माथना ॥

त्रिकालिंगाचे प्राच्य गंग. ४०१

व्यापून राहणारा तो या सुंदर देवळांत येऊन राहिला आणि लक्ष्मीहि रतनाकराचें धर सोडून येथे आनंदाने राहिली !? असें २८ जब्या श्छोकांत या देवळाचें काव्यमय वर्णन केलें आहे. चोडगंग आप- ल्यास परमवैष्णत्र लेखांत म्हणवितो; यावरून या कुलाचें दैवत बदळन विष्णुभक्ति या कुलांत या वेळीं सुरू झाली, विष्णुभक्ति यावेळीं काटेंग, उत्कल आणि वंग येर्थे प्रचलीत होऊन टक्ष्मणसेन हा वंगांत परमत्रैष्णव राजा झाला. धर्मविषयक प्रकरणांत वैष्णव मताचा उदय व प्रसार याविषयीं विस्ताराने लहू.

या एकशे सात लांब वत्तांच्या छोकोंच्या लेखांत ( शिवाय शेवटीं गद्यमाग आहेच ) चोडगंगाची फारच स्तुति केळेली आहे, यानें एका मंदार राजाचा पराभव करून त्याची राजधानी उध्वस्त केली आणि तो गंगेपलींकडे पळून गेला असें वर्णन यांत आहे. हा राजा कोण आणि मंदार कोठें आहे हें कळत नाहीं. चोडगंगानें पुष्कळ वर्षे राज्य केलें या लेखांत सत्तर वर्षें राज्य केळें असं लिहिलें आहे. पण याचा पुत्र कामाणव याचा राज्याभिषेक काळ १०६४ शक म्हणजे ११४२ इसवी दिला आहे. या पुत्राने दह्या वर्षेच राज्य केलें. दीर्धे राज्या- नंतर हा गादीवर आल्यानं त्यानें थोडीं वर्षे राज्य केळे हें साहजिक झाळें. कारण गादीवर बसतांनाच तो बयानें मोठा असावा. इ. स. ११५२ त याचा सावत्रभाऊ राघव गादीवर बसला, ल्यानें पंधरा वर्षे राज्य केलें. त्याच्यानंतर चोडगंगाचा तिसरा पुत्र राजराज हा इ. स. ११६७ त गादीवर आला. त्यावेळेस तो बहुधा वयाने लहान होता. त्यानें पंचवीस वर्षे राज्य केलें. त्याच्या मागन ११९२ त चोडगंगाचा चोथा पुत्र अनियंकभीम राज्यावर आला. या सत्र राजांची स्तुति या दीघ ठेखांत ( बंगाल ६५ भा. २ ) नेहर्माचीच आहे; व दात्रंचे पराभव यानीं केळें इतकेंच वर्णिळं आहे. पण यांचे राज्या- भिंषेक काळ शुभमुहरूतयुक्त दिळेळे नाहींत. यावरून असें दिसतें

४०२९ तिसरी हिंदु राज्ये

कीं, त्यांच्या कारकादीं महत्त्वाच्या क्षाल्या नाहींत. आनेयंक ऊर्फ अनंगर्भाम यानें सहजच दहा वर्षें राज्य केलें. ओरिसा यावेळीं गंगाच्या पूर्णपणें ताब्यांत होता. कारण एका चेद्रवंशी गोंतमगोत्री ओरिसाच्या क्षत्रिय मांडलिकानं ( त्याचं नांव स्वप्नेश्रर होतें. ) अनि- यंकभीमातफे कित्येक टढाया जिंकल्या आणि त्याच्या कारकौरदीत ओरिसांत स्वप्नेश्वर मेघवाहन नांवाचें शिव देवालय बांधलें आणि तेथे एक प्रशास्ति कोरविठी. ( बंगाल 1. 1. ५. 8. ६१ पा, १८) अनियंकभीमामागून इ. स. १२०२ मर्ध्ये त्याचा पुत्र राजराज गादीवर आला. त्यानें सतरा वर्षे राज्य केलें. या प्रकरणांत आम्ही या रांजराजापर्यंतच इतिहास देतो. तथापि त्याच्यानंतर कित्येक राजे दोन शतकॅपर्यंत राज्य करीत होते. या वेश्याचा दोवटचा लेख नरासंव्हाचा आहे.तो १३८४चा पूर्वॉक्त बंगाल ६५ भा.२ पा.२६० चा जो दीघ टेख आम्ही सांगितला आहे तोच होय. या घराण्याचा कता व केव्हां अंत झाला हृ सांगता येत नाही. परंतु पुढील एका भागांत सांगितल्याप्रमाणें बह्मामनी राजांच्या वेळीं या प्रदेशावर दुसऱ्या एका राजवंशाची सत्ता कायम झाली. या वंशाविषयीं कांहीं सामान्य माहिती -देऊ. गंगांचें हँ कुल चेद्रवंशी होते. आणि ब्यांच्या लेखांत प्राच्य चालुक्यांच्या लेखांच्या अनुकरणानें चंद्रापासून वंशावळ दिलेली असते. ययातीचा पुत्र तुवसु, त्याचा पुत्र गांगेय, असं यांत म्हटलें आहे. यदु आणि तुवसु या दोघांचा उछेख त्रहगेदांत आलेला आहे (भा. २ पा. ४३४). परंतु हे तुर्वसु नष्ट झाले आणि पांचालांत सामील झाले असे वेदांत म्हटलें आहे. तेव्हां गंगांच्या लेखांत तुर्बसु अपुत्र असल्यानें गंगेला प्रसन्न करून त्यानं पुत्र मिळविला ही कथा कोंठून आली £ चोल, पांड्य, केरळ आणि कोल हे दाक्षिणेकडील राजवंश हरिवंश्यातहि तुर्वसूचे वंशज म्हणून सांगितले आहेत. आणि पृथ्वीच्या वाटणींत

त्रिकलिंगाचे प्राच्य गंग. ४०३ यतातीनें ल्यास आग्नेय दिशा दिली असे म्हटलें आहे, चोल, पांड्य वंगेरे फार प्राचीन राज्ये आहेत. पण ते यादवांपासून आपली उत्पात्ते मानीत नाहींत यावरून ते महाराष्ट्रीय आयांहून मित्न आहेत. गंगहि आपली उत्पत्ति तुर्वसूपासून आपल्या लेखांत माननात, तेव्हां ते दाक्षिणच्या हिंदुस्थान मिश्र आर्यशाखपैकीं आहेत. तथापि हे गंग पूर्णपणें हिंदू व वैदिकधर्मीमिमानी होते. ते पूर्वी शिव्रपूजक होते. आंघ्रांत शैव मताचा पुरस्कार त्यानीं केला. आंध्र अद्यापहि मुख्यत्वे शैव आहे. अलीकडचे राजे मात्र वैष्णव झाले. द्दा परिणाम ओरिसा- मधून आलेल्या धममताच्या पगड्याचा असावा, ओरिसाहि प्रथम शैव होतें, पण ह्या कालविभागांत तें वैष्णव मताचे माहेरघर झालें.

हे राजे इतर देशांतील यावेळच्या राजांप्रमाणे स्वतः विद्वान्‌
असून विद्वानांचे आश्रयदाते होते. या राजदरबारांत असलेल्या प्रसिद्ध
संस्कृत विद्वानांची नांवं अद्याप मिळालेली नाहींत. तर्थापे राजराज
आणि अनंतवर्मन्‌ चोडगंग यांची लेखांत जी स्तुति था बाबतींत
सांपडते ती खरी मानण्यास हरकत नाहीं. राजराजाच्या मुखांत
श्री आणि सरस्वती दोनी वसत होल्या. ‘ तसेंच ‘ चोडगंग वेदांत आणि शास्त्रांत किंबहुना शिल्प व इतर ललितकलामध्ये निष्णात होता. जणूं काय लहानपणीं खुद्द सरस्वती त्याची दायी होती ‘” त्याचें स्थापत्यशास्त्रांतील प्रावीण्य जगन्नाथाच्या देवालयानें अजरामर झाले आहे. या तऱ्हने माळव्याच्या भोजाचा तो खरा अनुयायी

*घात्री तस्य सरस्वर्त॑सममतप्रनं नचत्मीतवान्‌ । तत्सारस्थतमायत्रालकतमः श्रीचोडगगश्वरः ॥ तास्द्वेदमातेः कथं निपुणता शास्त्रषु ताद्कथम्‌ । तादक्काव्यकृतिः कथं परिणातेः शिल्पेषु तादक्कथम्‌ ॥ (उ. 1. 9. 93. बंगाल ६५ पा. ३३१)

४०४ तिसरा हिदु राज्ये

होता. या गंगांच्या काळीं तेलगु भाषेस आणखी उन्नति मिळाली. राजराजाच्या एका लेखांत तेलगूचा प्रत्यक्ष उपयोग सांपडतो. (ए. इं ४ पा. ३१४ ) या गंगांचें लांछन नंदी होतें. आरिसा.

हं प्रकरण संपवितांना आम्ही ओरसाचा थोडासा इतिहास देतों, कारण या कालविभागांत ओरेसा त्रिकरिंगाचाच एक भाग झाला. ओड आणि पोंड़ अतिप्राचीन काळीं द्रविड म्हणजे अनायंवंशीं होते अद्यापहि ह शबरांचे स्थान आहे. तसेंच खोंड, भर्य आणि हृमय ह्याह्ि द्रविड जाति येथे आहेत. ह्यालाच उत्कळ आणि मेकल म्हण- तात ( कटक गेंझेटियर पा. १७ ). आर्यांची येथे ढोकरच वसती झाली. पण पुढें येर्थाल ब्राह्मण व क्षत्रिय येथे बोद्ध-कालांत धर्महीन झाले, केसरींच्या राज्यफाळीं नवीन ब्राह्मण व क्षत्रिय येथें आठे व त्यानीं अशोकाने चाळू केलेल्या बुद्ध-पूजेऐवजीं शिवपूजा प्रस्थापित केली. या केसरीराजांचा इतिहास भा. १ प्रकरण १२ यांत दिला आहे. त्यांनीं आठव्या शतकापासून बाराव्या दातकापयत राज्य केलें. कित्येकांचे असें मत आहे कीं, केसरी राजंचे कोणतेहि ठेख अद्याप सांपडले नसल्यानें यांच्या आस्तत्वाबद्दल हुका आहे. परंतु कटक गझेटियरमध्यें असे म्हटलें आहे कीं अशी इंका घेण्याची आतां आवर्यकता नाहीं. कारण उद्योत केसर्रांचे दोन ठेख हल्लीं मिळा- लेळे आहेत, एक खंडगिरीच्या टेकड्यांतील एका गुहृंत आणि दुसरा भुवनेरधर येथील ब्रम्हेश्वराच्या देवळांत. एम्‌. सिल्‌्व्हन्‌ लेव्ही यानीं असेंहि दाखावेळें आहे कीं, एका बौद्धसूत्राच्या जपानी भाषान्तरांत बौद्धसंन्यासी भाषांतरकारानें इ. स. ७९६ त उत्कलाच्या राजाकडून जपानच्या बादशाहाकडे आपण आलो आणि या राजांचें नांव परम-माहेश्वर महाराज शुभकेसरी असें होतें असें म्हटलें आहे.

ओरिसा. ४०५ (कटक गॅझेटियर पा, २२). या गोष्टीं या गझेटियरनें नवीन दिल्या आहेत, आणि त्या भाग १ यांत दिलेल्या माहितीरिवाय आणखी आपल्यास अलीकडे मिळाल्या आहेत; यामुळें इतिहासाच्या पूर्ततेसाठी येथें आम्हीं त्या देतों. केसरी राजांनीं भुवनेश्वर येथें बांघ- लेल्या अनेक देवाल्यांचें विस्तृत वर्णनाहे या गॅझेटियरमध्यें दिलेले आहे. ही प्रचंड देवाल्यें त्यावेळच्या उत्तम शिल्पज्ञानाची आणि केसरी राजांच्या ऐश्वर्याची साक्ष पटावितात. चोलांच्या लेखांवरून आपल्यास असें कळतें कौ, राजेद्रानें ओरिसा इ. स. १०२१ त जिंकला; परंतु हे जिंकणें कायमचें नव्हतें. यानंतर प्राच्य गंग उदयास आले, त्यांनीं मात्र ओरिसा जेंकून कायमचा आपल्या राज्यास जोडला. चोडगंगाचा इ. स. १११८चा एक लेख असं सांगतो कौ, तो ओरिसाचा पूर्ण मालक होता. जगनाथाचें हछींचे प्रसिद्ध देवालय पूर्ती सांगितल्याप्रमाणे त्यानें बांधिळें (सुमारें ११५० इसवी). त्यानें जयपूर येथें आणखी ‘एक देवालय बांधून त्यांस आपलें नांव गंगेश्वर दिलें. चोडगंगाचा पुत्र राघव याचा पराभव बंगालच्या विजयसेनानें केला ( पूर्वोक्त गॅझेटियर पा. २४ ). पण हाच राघव तो होय याविषयीं इंका आहे. कारण ह्या राघवाचा राज्यकालळ इ. स. ११५६ पासून ११७० पर्यंतचा आहे, विजयसेनाचा राज्यकाळ इतक्या अलीकडे येऊं शकत नाहीं. भुवनेश्वर येथे मेघेश्वर नांवाचे प्रचेड देवालय याच्या पुढचा राजा अनियंक भीम याच्या मेहुण्यानें बांधळेळें आम्ही पूर्वी उल्लेविळेंच आहे ( ११९३ आणि ११९८). बंगालच्या म्हणजे ठखनोर्तांच्या सुलतानांनी ओरिसावर कित्येक स्वाऱ्या केल्या. आणि कटक जिल्ह्यांतीळ चाटेश्वर येथील एका जगन्नाथाच्या देवळांत एक लेख आहे, त्यांत विष्णु, भीमाचा एक ब्राह्मण प्रधान, यानें यवनाशीं लढाई देऊन त्यास परास्त केळें असं

४०६ तिसरी हिंदु राज्ये

वर्णन आहे. तबकात व इतर मुसलमानी इतिहास ओरिसांत झालेल्या. मुसलमानांच्या अनेक स्वाऱ्यांचें वर्णन देतात, व दिल्लीच्या फिरोज तघलकानेंह्ि ओरिसावर स्वारी केल्याचें सांगतात. विजयानगरचे राजे आणि बहामनी राजे यानीं ओरिसावर व तेथील गजपाति राजांवर स्वाऱ्या केल्या. रोवटीं १४३५त शेवटला गंगराजा मेल्यावर त्याचा प्रधान कापिलेंद्रदेव याने, बहामनी सुलतान दुसरा आदिलशाहा याच्या मदतीनें, हें राज्य बळकाविळें आणि येथे नवीन सूर्यवंशी, राजघराणें स्थापन केलें ( कटक ग. पा. २५).

त्रिकालिंगच्या प्राच्य गंगाची वैश्ावळ, वज़्हस्त पाहला रा. ३५ वर्षे ( 984-१०१९ ) मधुकामार्णव रा. १९ व. ( १११९-१०३७ ) १ वजदत्त दुसरा रा. ३० वर्षे (१०३८-१०६८) ले. १०५८

२ राजराज रा. ८ वर्षे ( १०६८-१०७६ ) राणी राजेंद्र चेलाची कन्या राजसुंदरी |

। ३ अनंतवर्मन्‌ चोड गंग रा. ७० (१०७६-११४२ ) प्रसद्ध जगन्नाथ देऊळ बांघणारा

व ॥। ग.ल स्किन शा ०००२7२२ ०११ ता त्मा ०च्य्या | ४ कामार्णव १० वर्षे ५ राघव रा. १५ वर्षे ६ राजराज ७ अनियंकभीम. :: (११४२-११५२) (११५२-११६६) १५वर्षे रा. १*वर्षे , (११६७-११८२) (११८२-११९२), .

८ राजराज रा. वर्षे १७ (११९२-१२०९)

प्रकरण चोदावें. तंजावरचे चोल.

हा एक इतिहासांतील ध्यानांत घेण्यासारखा चमत्कार आह को, पारतवर्षाच्या निरनिराळ्या भागांत पराक्रमी राजे बहुतेक एकाच ळीं होऊन मध्ययुगीन भारत इतिहासाच्या या कालविभागाच्या प्रारंभीं यानीं नवीं राज्यें स्थापन केलीं, किंवा जुन्या राववंशास नव्या वैभ- [स चढविलें.( कदाचित्‌ दुर्देवाने मध्यदेश अथवा कनोज यास अप- द झाला ). याप्रमाणे मूळराजानें गुजराथेंत इ, स. ९७४१ इस- [त चालुक्य वंश नवीन स्थापन केला; मुंज परमाराने माळव्यांत च सुमारास परमारवंशास कातीस चढविले. तेलप चाढुक्यानें त्तर चालुक्य वंश दक्षिणेंत इ. स. ९७७ त स्थापन केला. उत्तरेस झनीस याचवेळीं सबुकत्‌गीनानें तुर्का राजवंश स्थापेला, तर क्षिण हिंदुस्थानांत चोलराजा राजराज यानें चोलांच्या वंशास वैभ- स इ. स. ९८५ त चढविले. आणि पूर्वेस महीपालानें मोडलेल्या लसत्तेस इ. स. ९८०त पुन्हां स्थिर केळ. ( धंगानें बुंदेलखंडाची हीर्ते सबुकृतगीनाशीं झालेल्या इ. स. ९८० तीळ लढाईत पर- च्चास पोहोचविली ). तात्पय १० व्या शतकाच्या चोथ्या पादांत हुतेक एकाच वेळीं झालेले हे निरनिराळे पराक्रमी व महत्त्वाकांक्षी जे एक अनुमान सुचवितात. पण तें इतिहासाच्या मर्यादेच्या हेर आहे. म्हणून त्याची चचा आम्हीं येथें करीत बसत नाही,

या पराक्रमी पुरुषापैकी राजराज चोल हा कमी दर्जाचा नव्हता. णो आदिल्यचोलाच्या मागून गादीवर आला. आदिल्यचोलानेंच छूव सत्तेपासून चोलवंशास मुक्त करून अधिकारास चढविले होते. जराज पहिला याने आपल्या पराक्रमाने व उद्योगांन दक्षिण हिंदु-

४०८ तिसरी हिंदु राज्ये

स्थान-यास तामलभू म्हणतां येईल-साम्राज्यपदास चढविले. ‘चोलांनीं साम्राज्येश्चये एक शतकपर्यंत दक्षिणहिंदुस्थानांत नव्हे, तर! उत्तरेकडहि भोगिलें. या चोल राज्याचा इतिहास.या भागांतील कालाविभागांत बरोबर पडत असून तो श्री. के. व्ही. सुत्रह्मण्य ऐय्यर यानीं चांगला सांगितला आहे; व डॉ. स्मिथनेंहि आपल्या हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासांत दिला आहे. या दोन प्रंथकारा- वरून पुढील संक्षिप्त हकीकत आपल्या कांहीं अधिक विधानांसह. आम्हीं देतों. याचें मुख्य कारण असे कीं, या चोल राजांचे लेख अनेक आहेत इतकेंच नव्हे तर ते सर्वे तार्मील व कानडी भाषेंत आहेत यामुळें ते प्रत्यक्ष आम्हांस तपासतां येत नाहींत.

दक्षिण हिंदुस्थान म्हणजे तामील प्रदेश हा हवा,जमीन-उत्पन्न, लोक आणि भाषा या दृष्टीनें भरतखंडाचा अगदीं स्वतंत्र भाग पडतो. प्राचीन संस्कृत ग्रंथांत यास द्रविड देश म्हटळें आहे. ( कोरीव लेखांत यास द्रामिळ असाहि शब्द लाविलेला आहे ). ज्या- प्रमाणे पंजाबचे लोक प्राधान्याने आर्यवंशी आहेत, त्याप्रमाणे येथील लोक प्राधान्याने द्रविडवंशी आहेत. तथापि आतिशय प्राचीनकाळी सुद्धां येथील तामिळ संस्काते उच्च होती. यामुळें आर्य जातीचे बाहेरून येथें आलेले लोक थोडे असल्यानें भाषा आणि वंश याहि दृष्टीनें द्रविडी झाळे. चोल, पांड्य आणि केरल हे येथील तीन राज- वंश महाभारतांत व हरिवंशांतहि प्रसिद्ध आहेत. ययातीचा पुत्न तुवसु याच्या वंशांत हे झाले असें हरिवशांत सांगितलें आहे. हां देश अतिशय सुपीक पण गरम आहे. पूर्वेकडे सपाट आणि पंश्चिः मेकडे डोंगराळ आहे. येथील उत्पत्तीच्या वस्तु अगदीं विशिष्ट ( अनन्य ) आहेत. म्हणजे मोती, मिरी आणे लसण्या (रतन) ही येथेंच उत्पन्न होत असल्यानें येथे प्राचीन काळापासून पाश्चात्य रोमन साम्राज्यांतीळ सोनें प्रभूतत्त्वाने येत असे ( स्मिथ ). आम्ही

तंजावरचे चोल. ४०९.

आणखी एक चोथी वस्तु यांत सामील करता. ती कार्पास वस्र होय, महाभारतकःळीं सुद्धां सूक्ष्म कार्पास वस्त्रामद्दल तामिल देशाची प्रसिद्ध होती. राजसूय यज्ञाच्या ( साम्राज्याभिषेकाच्या ) वेळीं युधिष्ठिराला चोल व पांड्य राजांनीं सूक्ष्मकापीस वस्रे नजर केली असें महा- भारतांत वर्णन आहे. तात्पर्य, तामिळ प्रदेश नेहमीं सम्रद्ध असे; आणि प्राचीन काळापासून आर्य बोद्ध व जैन धर्म या देशांत चढा- ओढीसाठीं प्रयत्न करीत. हार्चि धार्मिक विशिष्ट चढाओढ ब हाच द्वेष याहि काळांत या देशांत आपल्यास दृष्टीस पडतो. याचें वर्णन पुढील एका प्रकरणांत येईल. ही चढाओढ अद्यापहि चाळू आहे. या द्रावडांच्या प्राचीन देशांत आणि चोलांच्या प्राचीन वंशांत इ. स. ९८५त पहिला राजराज गादीवर आला. सर्व महत्त्वाकांक्षी राजांप्रमाणें त्यानें प्रथम एक जोरदार सैन्य तयार करण्याकडे लक्ष दिलें. आणि नंतर त्या सैन्याच्या जोरावर त्यानें आपले राज्य वाढविलें. वेाकुरी म्हजजे तद्देशीय धनुभधोरी भिल्ल यांस त्यानें शिवाजीनें जसें मावळे तय!र केलं त्याप्रमाणें तयार केळं व त्यांच्या अनेक पल- टर्णांस आपल्या निरनिराळ्या बिरुदांचीं नांवें दिलीं ( ऐय्यंगरचा प्राचीन दक्षिणापथाचा इतिहास पा. २४५ ). त्यानें हत्तींचे पथक तयार केलं आणि पायदळाहि तयार केलें. यांत बहुधा तेलंग्यांची भरती असे. महमुदाप्रमाणें यानेंह्ि एक निवडक शारीररक्षकांचें पथक तयार केलें. हा तंजावर येथें राज्य करीत होता. येथन तिन्ही दिशांसः त्यानं आपलें राज्य वाढावेलें. दक्षिणेस पांड्य, पश्चिभेस केरळ आणि उत्तरेस पछव राजांस त्यानें जिंकले. पाश्चिम किनाऱ्यावर्राल चरांच्या जहाजांचे आरमार त्यानें बुडविळें. या विजयापासून सोनें, चांदी, मोती या रूपाने त्यास अतिराय लट मिळाली. ही गोष्ट असंभवनीय नाहीं. त्यानें गंगवाडी, कुडमठे ( कुर्ग ), नोळंबवाडी, ( बल्लारी ) आणि पूत्र चालुक्यांचे वेंगी जिंकून कलिंगह्ि जिंकले. या जिंक-

४१० तिसरी हिंदु राज्ये

ण्याचा अर्थ त्यानें हीं राज्ये खालसा केलीं असा नव्हे, त्यानें या राजांस केवळ मांडलिक बनविळें. याप्रमाणे शाक्तिवर्मन्‌ यास पूत्र चालुक्यांच्या राज्यावर मांडलिक म्हणून त्यानें बसविलें. त्याच्या पुढचा राजा विमलादिल्य यास त्यानें आपली मुलगी दिली (भा. १ पा, ३१० पहा ). आणि हा संबंध विमलाचा पुत्र व नातु यानींहि चोळ राजकन्या वरून चाळू ठेवला. अशा प्रकारचे विवाह म्हणजे मातुलकन्यपरिणप दाक्षिणाः, लोकांतच चाळू आह. अनेक स्मृतीनी असता वित्राह निषिद्ध केला आहे, तरी श्रीकृष्ण आणि रुक्मिणी, अर्जन आणि सुभद्रा यांच्या काळापासून असे विवाह दाक्षिणात्यांत रूढ आहेत.राजराजानें सिलोनाहे जिकलें आणि तेथून येणाऱ्या उत्प- नाचा एक हिस्सा त्यानें यानंतर राजराजेश्वर नांव’चे शिवाचें देवाळय तंजावर येथें बांधलें त्याच्या खचाकडे लावन दिला. या देवळानं त्याचें नांव दक्षिण हिंदुस्थानांत अजरामर झाळें आहे (ऐग्यर पा. २४८) झेत्रटीं पाश्चात्य चालुक्य राजा सत्याश्रय याजवर त्यानें हछा करून त्याचा पक्का पराभव केला. या वेळेस त्याची फोज नऊ लाख होती व त्यानें पारे, बायका, ब्राह्मण यांचीहि कत्तळ केली असें अति- शायोक्तांचे वणन आहे. कारण असे क्रोये हिंदूंच्या युद्धांत केव्हांच दिसळें नाहीं. या व्रिजयानें. त्याच्या कीतींची आणि सत्तेची वाद्धि झाली व पुष्कळ द्रव्याहि त्याला मिळून तंजावर येथें राजराजेश्वराचें प्रचंड व सुंदर देवालय त्यास बांधतां आलें; व त्यानें आणखीहि देवालये बांधिली. या वेळेच्या उत्तम कारागिरांच्या कौशल्याची ही देवळें साक्ष पटवितात.

पण राजराज पहिला केवळमोठा जेता किंवा मोठा बांधणारा होता असे नाहीं. तर तो मोठा राजकार्यकुशलहि होता. प्राचीन

काळापासून दक्षिण हिंदुस्थान काळव्याकारतां प्रसिद्ध आहे. पण

कावेरीचे जे तीन प्रचंड कालवे आहेत ते राजराज पहिला याने

तजावर’चे चोल. ४११

बांधळे आहेत. त्यानें मोजणी करवून धाऱ्याचाहि बंदोबस्त इ. स. १०११त केला. ही सर्व्ह-सेटटमेंट इतकी बार्राक आहे कीं, वेञीचा ( बिघ्याचा £; १ ५२, ४२८, ८००००० इतका हिस्सा स्यांत मोजून त्याच्यावर धारा बसाबिला आहे (ऐेय्यर पा. २४९). दक्षिण हिंदृस्थानांतील त्यावेळच्या जमाबंदी अधिकाऱ्यांची व गणि- त्यांची कौर्त या मोजणीनें कायम झाली आहे. अद्यापाहे तिकडील गणिती व जमावंदी अधिकारी हे हुशार म्हणून गणले जातात. राजराजाच्या मागूनच्या राजाने इ. स. १०८६ त म्हणजे ब्यावषी इंग्लंडांत डम्सडे नांवाचें मोजणी रजिस्टर तयार झालें, त्यावर्षी आपल्या राज्याची जमाबंदीकरितां मोजणी केली असें स्मिथनें म्हटळें आहे, (हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास पा. ४८६ तिसरी आवत्त),

राजराज हा शिवभक्त असल्यानें अप्पार वगैरेत्रेसष्ट पुराणे दौवसंत कवि यानीं केलेलीं तामिळ भाषेंतील शिव!चीं स्तुतिपर पदें त्यास फार आवडत. यानें त्यांच्या मूर्ति ह्या राजरानेश्वराच्या देवळांत बसवून ही पदें नेहमीं गाववण्याचा त्यानें बंदोबस्त केला. आपल्या आईबापांच्याहि मूर्त या देवळांत त्याने बसविल्या, त्याची आई सती गेळी असून ही स्रापुरुषें तामील देशांत पुण्य दंपत्य म्हणून अद्याप पूज्य मानलीं जातात.

शेवटली महत्त्वाची गोष्ट ही की, राजराज गायन आणि नर्तन यांचा पुरस्कर्ता होता आणि त्यानें अनेक कुशल नाचणाऱ्या त्याच- प्रमाणें गाणारे, सनईवाळे आणि मृदंगादि वारे वाजविणारे बोलावून तंजावरास बसाविले. याच्या वेळीं नाटयशास्त्राचा अभ्यास बिदोष झाला. आणि याच्या वेळीं मुद्दाम त्याकारेतां बांधिटेल्या नतनशालांत ग:यन- नतनाचा प्रत्यक्ष अभ्यास होत असे, विद्याल्येह्दि बांधटीं गेढीं आणि त्यावर विद्वान्‌ आचायांची नेमणूक झाली. ते विद्याथ्यांस विद्यालयां- तून व देवळांतूनह्दि वाड्यय़ व शास्र शिकर्वात (ऐेव्यर पा. २५१).

४१२ तिसरी हिंदु राज्ये

राजराज अतिशय धर्मशील होता हें सांगावयास नकोच. त्याने ब्राह्मणांस व मंदिरांस अनेक दाने दिलीं. त्याच्या राण्यानीं व अधि- काऱ्यानींहि दानें दिलीं. परंतु तुलादान त्यानें केलं तें येथें सांगण्या- सारख आहे. म्हणजे राजाचे वजन सोन्याने करून तं ब्राह्मणांस दिलें गेलें. हें दान त्याकाटीं राजे टोकांत फार प्रिय असावें. कारण या कालविभागांतील कनोज आणि त्रिकलिंग राजांच्या लेखांतहि याचा उछ्लेख पुष्कळ येतो. या ठिकाणीं आणखी एक अशी गोष्ट सांगितली आहे कीं, राजराजाची मख्य राणी एका सुवणेघधेनच्या उदरांतून या दानाच्या वेळीं गेली. अर्थात्‌ ब्राह्मणांना पुष्कळच सुवण मिळाळें (या प्रकारच्या दानाची मात्र दुसर्राकडे कोठे हकीकत किंवा कल्पना मिळणार नाहीं ). ब्राह्मण म्हणजे खरे ब्राह्मण धर्मो- चरणांत आयुष्य घालाविणारे, आणि यजन, अध्ययन, अध्यापन यांत काळ घालविणारे यांचा चरितार्थ राजानें चालविणें इष्ट आहे. तेव्हां अशा दानांनीं हीचे विद्याखाते आणि धर्मखातं जीं कार्म करितात, तींच पूर्वी होत असत. राजराजाच्या वेळची राज्यव्यवस्था फारच बारकाईची आणि सुधारटेटी होती. आणि राज्यकारभाराच्या सर्व खात्यांत रजिस्टर वगेरे सर्ब दप्तर चोख ठेवलें जाऊन त्याजवर तपासणी-दार ठेवलेले असत. दक्षिण हिंदुस्थानांत जी बारकाईची पंचायत गांत्रव्यवस्था चाल होती, तिचा उछेख ऐय्यरनें केला नाहीं याचें आश्चथ वाटतें तिचा उल्लेख डॉ. स्मिथ यानें केला आहे; आणि ती हीं नष्ट झाली आहे ह्याबद्दल त्यानें दुःखोद्राराहे काढला आहे, पुढील राज्यकारभाराच्या सामान्य प्रकरणांत आम्हीं याचा जास्त उल्लेख करूं. राजराजाच्या मागून इ. स. १०१४ तल्याचा पुत्र राजंद्र गादी- वर आला तो आपल्या बापाहूनाहे ( हकय असेल तर ) अधिक परा- क्रमी निघाला. ल्याने पुष्कळ वर्षे म्हणजे इ. स, १०४४ पर्यंत

तंजावरचे चोल. ४१३

राज्य केलें. त्यानं पूर्वीहून अधिक विस्तृत देश जिंकले.पांड्य व केरल राजांनीं बंडे केली त्यांस पुनः जिंकून त्यांचे देश त्यानें खाळसा केलें; व तेथें आपल्यातफे प्रतिनिधि नेमले. यांस चोल पांड्य व चचोळ केरल अशी संज्ञा होती. (या संक्ञेवरून हे प्रतिनिधि पांड्य ब केरल या हक्कदार राजाबद्दळ राज्य करीत असा अर्थ होतो. ) यान पाश्चात्य चालुक्य ( जयसिंव्ह तिसरा ) याचा पुनः पराभव केला. सिलोनच्या राजासहि यानें जिंकले. या विजयानं उत्साह वाढून त्याने आपला विजय गंगाकिनाऱ्यापर्यंत नेला. आणि कलिंग, वंग ( महीपाल पहिला ), इंद्ररथ (£) कोसळ आणि कनोजसुद्धां जिंकळें. या विजयावरून त्यानें गंगैकोंड ही पदवी धारण केली व त्रिचनापछ्छीजवळ * गंगैकोंड चोलपुरम्‌ ! नांवाचें शहर वसविले. त्रिचनापल्ली जिल्ह्यांत यांचे अवशेष अद्याप लोक प्ररंसितात. येथें एक त्याने प्रचंड तलाव बांधला आहे. याचा बंधारा सोळा मैल लांब आहे. शेताला पाणी देण्याकरितां त्याला योग्य ठिकाणीं मोर्‍्या ठोषल्या आहेत ( स्मिथ प्राचीन इतिहास पा. ४६६ ). यानें एक मजबूत आरमारहि बांधाविळें आणि बंगालचा उपसागर ओलांडून ब्रम्हदेशाचा एक भाग जिंकला. हे अनेक विजय त्याच्या कोरीव- लेखांत जरी अतिरायोक्तीनें वर्णिळे आहेत, तरी याचें राज्य फार विस्तृत होतं ह्यांत इंका नाहीं. कारण अट्वेरूनीनें सुद्धां असें वर्णिळें आहे को, खुद्द प्रयागपासून सवे आमग्नंयीचा देश ( म्हणजे हृ्लींचा मद्रास इलाखा व मध्य प्रांताचा व निजामच्या राज्याचा पूर्व भाग ) चोलांच्या अमलाखालीं होता. एवढें विस्तृत राज्य फार दिवस टिकणें शक्‍य नव्हतं आणि त्रिकठिंग आणि चेदी यानीं इ. स. १०४० च्या सुमारास कृष्णेच्या उत्तरेस पूर्वी सांगितल्याप्रमाणे _ आपली सत्ता बसविली.

म, भा…२७

४१४ तिसरी हिंदु राज्ये

राजेंद्र बीर होता आणि विद्वानूह्मि होता. कोरीव लेखांत त्याला पंडित ही पदवी लावठेळी आढळते. चीनकडे त्यानें एक वकील

पाठविला होता. त्यानें मोठें आरमार ठेवलं होतें हे॑ निश्चित आहे.

राजेंद्रानं उत्तर हिंदुस्थानांतून ब्राह्मण आणवून त्यांस दक्षिण हिंदु- स्थानांत वसविले. दाक्षेण व पर्वेचे धार्मिक राजे बहाळसेन वगैरेंनी ही व्यवस्था केलेली दिसते. राजेंद्राच्या वेळीं चोळ साम्राज्य वैभ- वाच्या शिखरास पोहोचलं, यांतील पराक्रमी पुरुषांपेकीं नेहमीं- प्रमाणे हा तिसरा होता

याच्या मागून याचा पुत्न राजाधिराज गादीवर आला. हाहि बालेष्ठ राजा होता. पण मांडलिक राजांस यानें क्ररतेनें वागविले सिलोन राजास याने ठार माराविठें. एका चेर राजास हत्तींच्या पायीं

दि. याबद्दल विशेष माहिती देणें आवरयक नाहीं; पण यावरून

राज्यास उतरती कळा लागली हें स्पष्ट आहे. आहवमछू सोमेश्वर याचा एका लढाईत यानें पराभव केढा. पण इ. स. १०५२ त झालेल्या कोण्पम्‌ येथीळ दुसऱ्या लढाईंत तो स्वतः मारला गेला. तात्काळ ल्याचा धाकटा भाऊ राजेंद्रदेव यास रणमैदानावरच राज्या-

भिषेक झाला, हिंदुस्थानच्या इतिहासांतीलळ ही एकच लढाई आहे

कीं ज्या लढाईंत राजाच्या मृत्यूनें सेनेचा पराभव झालेला नाहीं.

राजेंद्रदेवानें आपल्या शोर्यानें ह्या दिवसाचा हा अपघात भरून काढला आणि आहवमल्लाचा पराभव केला आणि तो तुंगभद्रेपलीकडे पळून

गेला. चोलांचा आणि उत्तर चाठुक्यांचा, या काळबिभागांत पाहिल्या कालांबेभागांतीळ ( ६००-८०० ) पूव व पूर्व चाढुक्याप्रमाणें नेहमीं तंटा चाळत असे. दोन शेजारची बरोबर्राचीं राज्ये, फ्रान्स आणि जर्मनीप्रमाणे, एकमेकाशी युद्ध करण्यांत आनंद मानतात. पण दोन्ही पराक्रमी असल्यास एकाचा दुसऱ्यावर जास्त काळ पगडा बसत नाहीं.

तंजावरचे चोल. ४१५

राजेंद्रदेवानें इ. स. १०५२ पासून १०६२ पर्यंत दहा वर्षे ‘ राज्य केलें. त्या मागून त्याचा भाऊ वीरराजेंद्र राजा झाला. हाहि ‘ पराक्रमी होता. नेहमीप्रमाणे पांड्य व केरळ यांशी याची युद्धे झालींच, पण पाश्चात्य चाठुक्याशीं याच्या तीन लढाया झाल्या. नर्मदेच्या दक्षिणेकडील भरतखंडांत चोळ आणि चाटुक्य हेच दोन सम्राट होते. म्हणजे महाराष्ट्र आणि मद्रास यांची तुंगभद्रा ही जरी सहा- जिक सीमा होती, आणि विशेष तंट्याचें कांहीं कारण नव्हतें, तरी हे सम्राट आपसांत लढत. वौरराजंद्राचा कांहीं बेळ जय झाला. पण इ. स.१०७०च्या लढाईत तो मारला गेला. बेलगोळच्या जैनांवर त्यानें जुळ्म केला यामुळें त्यांनीं शाप दिल्याने तो मेला ( अय्यर पा. २६२ ) अशी समजूत होती. ऐय्यरनें दिलेली हकीकत या राजाच्या राज्यकालाबरोबर संपते. पण बाराव्या शतकाच्या अंतापर्थंत आपल्यास चोलांचा इतिहास देणे आहे. बिल्हणानें, वीरराजेंद्राने विक्रमांक चालुक्य़ाला आपली मुलगी दिली असें वर्णिलेले आहे. ही गोष्ट ऐय्यरनें सांगितली नाहीं ह्याचे आश्चर्य वाटते इ. स. १०७०त वौरराजेंद्राचा मृत्यू झाल्यावर त्याच्या मागून कोणी गार्दावर बसावें याचा तंटा पडला आणि विक्रमांकानें जाऊन कांची येथें आपल्या बायकोचा भाऊ अघिराजेंद्र यास गादीवर बसाविलें. पण तो निघून गेल्याबरोबर अघिराजेंद्राचा खून झाला. आणि पहिल्या राजेंद्राच्या मुर्लांचा मुलगा ( प्राच्य चाळक्य राजाचा पुत्र ) राजेंद्र चोळ दुसरा राजा झाला. हा राजेंद्र लहानयणापासून चोल- दरबारींच रह्दात होता. आणि त्यानें आपला बाप वेंगी येथें इ. स. १०६२ त मेल्यावर वेंगीवरचा आपला हक्क सोडून चुलत्यास दिला होता, राजेंद्र गंगेकोंड यानें त्यास दत्तकाहे घेतलें होतें असे म्हण- तात. ( पण क्षत्रियांत मुलींचा मुलगा दत्तक होत नाहीं. ) खरी गोष्ट कांहीं असो, हा योग्य रीतीनें चोलांच्या गादीवर बसला आणि

४१६ तिसरी हिंदु राज्ये

त्यानें एक नवा वंश सुरू केला. या वंशयास स्मिथ चाठुक्य-चोळ म्हणतो. हा इ. स. १०७१४ गादीवर बसला. स्मिथनें इ. स.

१०७० पासून १०७४9 पर्यंतची चार वर्षे अघिराजेंद्राची म्हणजे

मारला गेलेल्या विक्रमांकाच्या मेहुण्याचीं धरली आहेत. राजेंद्राने

मोठ्या पराक्रमाने ४८ वर्षे राज्य केलें. म्हणजे १०७० पासून १११८पर्थत राज्य केळें.याची राजधानी गंगेकोंड चोलपूर ही होती अनन्तवर्मन्‌ चोडगंग याचा त्यानें पराभव केला असे स्मिथनें सांगि- तळें आहे. हा पराभव नांवाचाच असला पाहिजे. कारण करललिं- गाचा हा राजा चोडगंग फार पराक्रमी होता असें आपण पाहिलेंच आहे. या युद्धाचे वर्णन एका तामील कवीनें कलिंग तुप्परणी नां- वाचे काव्यांत केलेळें आहे. ( गौरीशकरचा टॉड पा. ४२८ आणि इं. ए. १९ ) तामिल मुलखाची जमीन मोजणी व जमाबंदी स्मिथनें सांगितलेली या राजाच्या वेळीं झालेली आहे. याचा काळ

आणखी एका गोष्टीसंबंधानें महत्त्वाचा आहे. श्रीवेष्णव मताचा

संस्थापक रामानुज हा याच्या राज्यकाळीं होता.पाच महान्‌ साधूच्या शापानें अधिराजेंद्र मारला गेला अशी समजूत आहे. याविषयीं आणि याच्या मताविषयीं धर्मविषयक सामान्य प्रकरणांत आम्हास अधिक लिहावयाचे आहे. येथें येवढेच सांगणें आहे कीं, शैवमत आणि

वैष्णवमत यांमधील मोठा तंटा यावेळीं सुरू झाला, तेव्हांपासून .या तंट्यानें हिंदुधर्माची दुर्दशा केली व पूर्वींच्या शतकांत जी एकी

हिंदुधमांत होती, ती ह्यापुढें कायमची नष्ट झाली, राजेंद्र दुसरा यानें कुलोत्तं] ही नवीन पदवी धारण केली.

याच्या मागून इ, स. १११८त विक्रमचोल राज्यावर आला. तोहि. पराक्रमी होता. ह्याचे चालुक्य, पांड्य, करठिंग इत्यादि कुलक्र- मागत शत्रंशीं यद्धप्रसंग झाळे आणि याच्या पराक्रमाचेंहि वर्णन

एका स्वतंत्र काव्यांत केलेलें आहे. (इं. ए. २२ पा. १४२)

तंजावरचे चोल ४१७

याच्या मागून इ. स. ११३५ त दुसरा कुलोत्तंग गादीवर आला त्यानें अकरा वर्षे राज्य केलें. त्या मागन इ. स. ११४५त त्याचा पुत्र राजराज दुसरा गादीवर बसला. त्यानें १९ वर्षे राज्य केलें इ. स. ११६५ पासून इ. स. १२६७ पर्यंत आणखी चार राजे झाले; राजाधिराज ( ११७२ ), कुलोत्तंग (तिसरा) (११७८) राजराज तिसरा ( ११९०) आणि राजेंद्र चोड तिसरा (१२१६), शेवटीं चोलांची सत्ता पांड्य राजा जटावर्मन सुंदर पांड्य यार्ने नष्ट केली. दक्षिण हिंदुस्थानचे मुसलमानानीं मलिक काफूर, अहाउर्दान खिलजी याचा सेनापति, याच्या वेळीं इ. स. १३१०ते १३११ पर्यंत केलेलें शवटचें निर्मूलन प्रसिद्ध आहे.

या चोल राजांविषयीं कांही सामान्य विधाने करण्यासारखी आहेत. चोल आपल्यास शिबीच्या कुलांत जन्मलेले सूर्यवंशी क्षत्रिय लेखांनी दाखावेतात; परंतु पूर्वीं सांगितल्याप्रमाणे चोल, पांड्य, केरळ ब कोल हे चंद्रवशांत तुवसुपासून उत्पन्न झाल्याचे हरिवंदांत सांगितलें आहे. हे राजे शिवभक्त होते; आणि चोलांच्या पहिल्या वंशाच्या शेवटीं दुदैवाने ते जास्त धर्ममोळे झाले आणि हिंदुराजांची परमतासहिष्णु नेहमींची वात्त सोडून त्यांनी आपल्या सत्तेचा उपयोग जैन धर्म व वैष्णव मत दाबून टाकण्याकडे केला, ही मोठी त्यांनी चूक केळी. हा विषय पुढें विस्ताराने येईलच. चोलांचे ध्वजचिन्हृ व्याघ्र होतें. या राजांनीं पुष्कळ सोन्या-चांदीचीं नाणीं पाडली; तीं हल्लीं उपलब्ध आहेत.

४१८ तिसरी हिंदु राज्ये

तंजावरच्या चोलांची वंशावळ. ( गौरीशंकरचा टॉड पा. ४२५–४२६) परांतक | भादे. यवर्मन्‌ १ राजराज ( ट्या १०१२ ) | (कन्या) कुमारदेवी-लम्न विनयादित्य चालुक्य वेंगीच.

२ राजेंद्र (१०१२-१०१८) | (कन्या) राजराज-लम्न-अम्मगा

फिक कणात क्त कत्या तश २ राजाधिराज (१०१८-१०५२) ४ राजेंद्रदेव (१०५२-१०६२ ) वोरराजेंद्र ( १०६२-१०७२ ) |

अघिराजंद्र १०७२ त खून झाला. राजेद्रकुलोततुंग (१०७०-१११८) वो ( १११८-११३५ ) झुलोछुंग दुसरा ( ११३५–११४६ )

० राजराज तिसरा ( ११४६–११६५ ) |

क 0: ७/७— हीर 06 2260001:

अराजक कांहीं काळ

११ रालाविराज दुसरा वगेरे ११७२

प्रकरण पंधरावें. दक्षिणेतील महत्वाची मांडालिक राजघराणी’.

नमेदेच्या दक्षिणेस दोन मोठीं राज्यें किंबहुना साम्राज्ये होती; पाश्चात्य चाठक्यांचे महाराष्ट्र कर्नाटकांतील व दक्षिण हिंदुस्थानां- तील चोलांचे वर्णन येथवर झालें. त्याचप्रमाणे पश्चिम किनाऱ्यावर शिलाहारांचे एक स्वतंत्र राज्य होते. आणि पूर्व किनाऱ्यावर त्रिक- लिंगाच्या प्राच्यगंगांचें राज्य होतें; यांचींही वर्णने झालीं. ह्या महत्त्वाच्या राज्याशिवाय हिंदु इतिहासाच्या तिसऱ्या कालविभागांत (इ. स. १००० ते १२०० ) कांहीं महत्त्वाची मांडलिक राज्यें होतीं. तीं बाराव्या नंतर तेराव्या शतकांत ज्यास्त बलवान्‌ होऊन स्वतंत्राह्ने झाठी. त्यांचे कित्येक कोरीव ठेख सांपडलेहि आहेत. त्यांचा तेराव्या शतकाचा इातेह्ास या पुस्तकाच्या मर्यादेच्या बाहेर आहे, तरी त्यांचा प्रारंभींचा मांडलिकी इातेहास या भागांत देणें जरूर आहे. दक्षिण हिंदुस्थानचा उच्छेद चोदाव्या शतकाच्या आरंभीं अछाउद्दीन खिलजी आणि त्याचा सेनापति यानें केलेला इतका महत्त्वाचा आहे कीं, त्याकरतां एक स्वतंत्र भाग करावा लागेल. पण हीं उच्छेद केलेलीं राज्यें बाराव्या शतकांत मांडलिक स्वरूपाची होतीं, तरी त्यांचा इतिहास या कारणानें महत्त्वाचा असल्यानें या भागांत देणें जरूर आहे आणि तो आम्ही या पुढील प्रकरणांत देतों.

या प्रकारचें पहिळें महत्त्वाचे राज्य म्हटलें म्हणजे देवगिरी ( दोळताबाद ) येथील यादवांचे होय. हेमाद्रीनें यांची विस्तृत प्रशस्त लिहिली आहे, त्यावरून या कुलाचा संस्थापक दढप्रहार यानें नाशिक जिल्ह्यांतील चंद्रपुरी अथवा चांदोड येर्थे इ. स.

४२० तिसरी हिदु राज्ये

८४३च्या सुमारें एक लहान राज्य स्थापिले, ( गोराशंकराचा टॉड आणि बॉंबे गॅझेटियर भा. १ छेद १). याच्या वंशजांपैकीं मिछम दुसरा कल्याणच्या चाळुक्य तैळपाचा बलवान्‌ मांडलिक होता माळ- व्याच्या मुंजाबरोबर झालेल्या तैल्पाच्या युद्धांत हा मोठ्या शौर्याने लढला. यांत मुंज कैद झाला हे पूर्वी सांगितलेंच आहे. मिछमाचा एक लेख इ. स. १०००चा सांपडला आहे. याच्या मागून त्याचा पुत्न वेसुगी आणि त्याच्यामागन त्याचा पत्र भिम तिसरा राजा झाला. चालुक्य जयसिंह तिसरा याची कन्या त्याची राणी होती आणि मांडलिकी नात्यानें त्याच्या अनेक लढायांत यानें भाग घेतला, या मागून तीन राजे झाल्यानंतर सेडणचंद्र गादीवर आला. हेमचंद्राच्या प्रशस्तींत असं लिहिलें आहे कीं, परमाडी विक्रमादित्य चालुक्य यास कल्याणची गादी मिळविण्यास त्यानें मदत केली. इ. स. १०६९ चा एक लेख सांपडला आहे. सात राजे आणखी झाल्यानंतर अपर गांगेयाचा पुत्र भिछम चोथा यानें स्वातंत्र्य धारण केलें. सोमेश्वर चालुक्य कल्याण येथे कलचुरी राजांच्या बंडामुळे दक्षिणेस शक्ति- हीन झाला होता, यामुळें मिछमास महाराष्ट्राच्या उत्तर भागांत स्वतंत्र राज्य स्थापितां आलें. आणि यार्न देवगिरी वसवून इ. स. ११८७मध्ये तेथे आपली राजधानी केली. याचें राज्य नर्मदेपासून कृष्णेपर्येत होते. अर्थात्‌ याळा शेजारच्या राजाशी युद्धे करावी लागलीं. विशेषतः दक्षिणेंत होयसळ यादवांनी आपली नवीन सत्ता स्थापन केली ( हें आपण पुढें सांगू ) त्याशी ह्यास लढावे लागले याचा पुत्र जैतृगी अथवा जेत्रपाळ यास काकटीय आंत्रराजाशीं लढावे लागलें. आंघ्रराजा रुद्र लढाईत मारला जाऊन त्याचा पुत्र गणपति कैद झाला. पण जैतुगीने त्यास मक्त करून आंघ्राच्या गादीवर बसविलें, जेतुगी स्वतः विद्वान्‌ असून विद्वानांचा आश्रय- दाता होता. प्रसिद्ध दाक्षिणात्य ज्योतिषी भास्कराचार्य याच्या पूर्वा

दक्षिणेतील महत्वाची मांडलिक राजघराणी. ४९१

’ थोडासा झाला. त्याचा पुत्र लक्ष्मीधर हा जैतुगीचा मुख्य दरबारी पॉडेत होता. हा इ. स. १२१०त मरण पावला आणि याच्यामागून सिंघण, या कुलांतील दुसरा प्रतापी राजा गादविर आला. देवगि- रीच्या यादवांचा इतिहास आम्हीं येथेच सोडतों. पुढील इतिहास पुढें देतां येईल. या राज्याचा उच्छेद अछाउर्द्दानानें केला हें प्रसि- द्धच आहे.

दुसरें मांडलिकी राज्य सांगण्यासारखं देगागर्राच्या पूर्वेस काकती- यांचे आंध्र राज्य होय. हे काकतीय आपल्यास सूर्यवंशी क्षत्रिय म्हणवितात. त्यांचें राज्य आंत्रांत पूर्वेकडील घाटाच्यावर असून त्यांची राजधानी अभ्रमकोंड ( याचें नांव पुढें उरंगळ-बरंगळ झालं ) ही होती चांदोडच्या यादवाप्रमाणेंच हे प्रारंभीं पाश्चिम चाठक्यांचे मांड- लिक होते. यांचा पहिला स्वतंत्र राजा बेटाचा पुत्र प्रोढ हा होता आणि यानं इ. स. १११७ इसवीमध्यें राज्य करण्यास प्रारंभ केला. याचा एक लेख सांपडला आहे ( ऐय्यर पा, २७७ ). या लेखाचा काल चालुक्य-विक्रम ४२ असाहि दिला आहे, यावरून हा मुलुख अद्याप चालुक्यांच्या सत्तेखाठीं होता. प्रोलानें दी्धकाल म्हणजे ११६०पर्यंत राज्य केलें. यानें तैळ तिसरा याचा पराभव केल्याचे वर्णन आहे. याच्यामागून याचा पुत्र रुद्र गादीवर बसला, तो नि:संशय प्रबळ राजा होता. यानें पुष्कळ शहरांवर हछा करून तां उध्वस्त करून तेथील लोकांस ओंरगळू येथें आणून तें वसावेळें असं सांग- तात. यानें पुष्कळ देवालयें बांधिळीं आणि अनेक विद्वानांस आश्रय दिला. याची सत्ता इतकी प्रबळ झाली को, कांचीपासून विंध्यापर्य तचे राजे याचा आश्रय घेत ( ऐय्यर ), याच्यामागून याचा धाकटा भाऊ महादेव इ. स. ११९ १मध्यें गादीवर बसला. ऐय्यरचा असा तक आहे कौ, पूर्वी सांगितल्याप्रमाणें जैतृगी यादव याच्या लढा- इत जो काकतीय राजा मारला गेला तो ह्या असावा. गणपति ह्वा

४२२९ [तसरा ॥हदु राज्ये

महादेवाचा पुत्र असून तो १ १९८त गार्दावर आला आणि लाने प्रनापयुक्त राज्य ६२ वर्षे केलं. याच्यावेळचे अनेक कोराव लेख सांपडलेळे आहेत; पैकीं राजवर्ष ६२चाहि एक आहे. यानें चोल,

कलिंग, सेउण, कर्नाट, लाट, वेलनाडु यांच्याशी युद्ध केळे. याची

देवगिरीच्या यादवाशीं झालेली लढाई म्हणजे कुलागत शेजारी शत्रशीं लढाई होय. यांत जय दोन्ही पक्षाकडे क्रमाक्रमाने जात असे. याचा दोवटचा लेख इ. स. १२५०चा आहे. याला मुलगा नसन मुलगी होती. ल्या रुद्रम्मा मुलीने त्याच्यानंतर तीस वर्षें राज्य केलें. तिच्या पाठीमागून शवटचा राजा प्रतापरुद्र गादीवर आला. (इ. स. १३१६ ). हा कवींचा प्रसिद्ध आश्रयदाता होता आणि वैद्यनाथ याने अलंकारशास्रावर केलेला उत्तम प्रंथ यालाच अर्पण केलेला असून त्याचे नांब याच्या नांवावरून प्रतापरुद्रीय असें ठेव-्‌

लेळें आहे. हें राज्य शेवटीं मुसलमानांनीं उाच्छिन्न केलें हे विश्रृत

आहे. मध्यप्रांतांतीलळ हृल्लींचे बस्तर संस्थानचे राजे हे काकती- यांच्या वंशांतील आहेत,

तिसरें महत्त्वाचे राज्य हछेर्बाड अथवा द्वारसमुद्र येथील होयसळ या यादवांचें होतें. हेही प्रारंभीं पाश्चात्य चालुक्यांचे अंकित होते.

  • किंबहुना राष्ट्रकूटांच्या वेळेपासून ते तसे असावे. यांचा पहिला प्रसिद्ध राजा विनयादिल्य असून त्याचा इ. स. १०४०चा लेख सांपडळा आहे. ( गौरीदकर टोंड पा. ३३३ ). याचा पुत्र एरयंग यास तीन मुलगे होते. पैकी ज्येष्ठ बाळ हा चाठुक्यराजा जय-

सिंह तिसरा याचा प्रसिद्ध मांडलिक होता. त्याचें मुख्य

शहर बेलापूर ( हल्लीचे बेळूर ) हें होते. पण बहछाळच्या नंतर बेट्रिग ऊर्फ विष्णुवर्धन हा राजा स्वतंत्र होऊन त्यानें निराळी राज- धानी केली. कल्याणचा विक्रमांक या बलवान्‌ वरिष्ठ राजाशीं लढून त्यानें आपलें स्वातंत्र्य नष्ट केलें. त्याचा जरी त्यास पक्का मोड

दाक्षिणताल महत्वाचा माडालक राजघराणा. ४२९२३

करितां आला नाहीं तरी शेजारचे राजे गंग, कंदब, तुलुव आणि ‘पांड्य यांचा त्यानें पूर्ण पराभव केला. याच्या वेळचे बरेच लेख इ. स. १११५ पासून ११३८ पर्यंत सांपडळे आहेत (गौरीशंकर).

याने रामानुजाला आश्रय देऊन वैष्णवमता’चा प्रसार केला. या- मुळें याचा राज्यकाळ फारच प्रसिद्ध आहे. या सत्पुरुषानें यास मर्ता- तर करावयास लाविलें. आणि त्यानें द्वारसमुद्र येथे आपली राज- धानी करून, तेथें विष्णूचें देवालय बांधलें. हे अद्यापही पाहाणा- रास चार्कत करून सोडते. यानें बेळूर येथेंहि दुसरें प्रचंड विष्णु- मंदिर बांधलें.

याच्यामागून याच पुत्र नरासेह्ह गादीवर आला. याने ११७३ पर्यंत राज्य केलें. त्याचा पुत्र बीरब्ठाळ या कुलांतील अत्यंत बलिष्ठ राजा झाला. शेवटचा चालुक्य राजा सोमेश्वर याचा सेनापति ब्रम्ह याचा यानें पराभव केला. इ. स. ११९१त देवागेर्रींचा यादव राजा याचाहि पराभव करून कुंतलदेश यानें आपल्या राज्यास जोडला. तेव्हां दक्षिण हिंदुस्थानांत हीं दोन प्रबळ साम्राज्ये झालीं. म्हणजे देवगिरीचे यादव आणि द्वारसमुद्राचे होयसल. स्वतंत्र राजांच महा- राजाधिराज हें उपपद याने प्रथम धारण केलें, पुष्कळ वर्षे राज्य केल्यावर हा १२२०च्या सुमारें वारला, तेव्हां याचा पुत्र नरसिंह राजा झाला. होयसल सत्ता याच्या वेळेपासून कमी होऊ लागली. तरी इेभर वषेपयंत त्यांचें राज्य बलवान्‌ होतें. ते शेवटीं मलिकू- काफूर याच्या मुसलमानांच्या स्वारीनें इ. स. १३२१०च्या सुमारास उध्वस्त केलें.

चौथे राज्य सांगण्यासारखे, जरी ते स्वतंत्र झालें नाहीं, या काल- विभागांत मांडलिकच राहिलें, असें प्राचीन कालापासून प्रसिद्ध अंसलेले पांड्यांचें राज्य होय. महाभारतांत चोलांसह पांड्यांचा उल्लेख आहे आणि रामायणांत त्यांचे हे नेहमींचे साथी सोडून त्यांचा स्वतंत्र

४२४ तिसरी हिंदु राज्ये

उछेख आहे. कालिदासाने इंदुमतोच्या स्वयंवरांत एका पांड्य राजाचा, उल्लेख केळेला आहे आणि त्याची राजधानी उरगपूर होती असे सांगितळें आहे. ही राजधानी व तीबरोबरच पांड्यांची सत्ता करिकाळ चोळ याने (इ. स. सुमारें १०० ) उच्छित्न केली; तेव्हांपासून कित्येक रातकें पांड्य चोलांचे किंवा इतरांचे मांडलिक द्वोते. त्यांचो राजधानी मदुरा होती. हिचा उछ्ठख छोनीनेंहि केला आहे. ह्याव- रून असें ठरतें कीं, कालिदास एििनीच्या पूर्वी म्हणजे इ, स. पू. पहिल्या शतकांत होऊन गेला. कारण त्यानें पांड्यांच्या मदुरा राज- घानीचा उछेख केला नसून उरगपूर राजेधानांचा उल्लेख केला आहे. असो, हा एक प्रासंगिक विषय आम्हीं सांगितला. पांड्य या काल- विभागांत ( १०००-१२०० ) परतंत्रच राहिले. ११व्या शत- काच्या प्रारंभींच चोळ राजा राजराज यानं दक्षिण हिंदुस्थानावर आपलें साम्राज्य स्थापिले हें आपण पाहिळेंच आहे. तेराव्या शत- कांत जटावर्मन्‌ सुंदर पांड्य हा स्वतंत्र झाला आणि त्यानें आपलें विस्तृत राज्य स्थापिळें ( १२५१-१२७१ ). किल्हॉननें पांड्यांची संलय़ वंशावळ ११००पासून १५६७पर्यंत दिली आहे; परंतु ती. | येथे देण्याचें प्रयोजन नाहीं. कारण पांड्य १२०० नंतर स्वतंत्र | झाले. मलिककाफुराची स्वारी १२००च्या सुमारास झालेली, पांड्यांच्या सत्तेस खिळखिळी करून सोडणारी होती तरी दक्षिण हिंदुस्थानांत ( मदुरा आणि तिनेवल्ली जिल्ह्यांत ) पांड्य बरींच वर्षे राज्य करीत होते. त्यांना नेहमीं ताम्रपणी नदीच्या मुखांतील मोक्तिकांच्या उत्प- त्तीपासून मोठाच करभार मिळे. याप्रमाणें पांड्यांचा थोडासा या काळांतीळ इतिहास सांगून आपण चर अथवा केरळ यांच्या इते- हासाकडे वळूं. | केरळ अथवा मलबार आणि त्रावणकोर याचा या काळविभागां- तीळ इतिहास पी. सुंदर पिछठे एम्‌. ए. यांनीं प्रयासाने शोधून काढून

दक्षिणेतील महत्वाची मांडलिक राजघराणी ४२९५

वाचकांपुढे इं. ए. ३५ मध्यें मांडला आहे ( पा. २४९-२५५ ). आम्ही त्यांतील मुख्य मुख्य गोष्टी त्यांची परवानगी न घेतां येथे वा- चकांपुढें मांडतों.केरळ अथवा विरल याचा अर्थ डोंगराळ देश असा असून हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरील उत्तरेकड मलबार व दक्षि- णेकडे त्रावणकोर इतका मुळूख त्यांत येतो. कधीं कधीं कोंगूभूमि म्हणजे हछांचे सेटळम आणि तिनेवल्ली जिल्हे यांत मोडत. पण नेहमी किंवा सहजरांतीनें नव्हे. या दक्षिणच्या कोंपर्‍्यांत उत्तरेकडील हिमाल्याप्रमाणेंच अत्यंत पुराणे द्रवीड ब आयवंश, त्यांच्या समा- जव्यवस्था, त्यांच्या चालीरिती व धर्म जशाचे तसे एखाद्या दगडां- तीळ अवशेषाप्रमाणें संभाळून ठेवले आहेत. म्हणजे द्रविडी, कनिकर अथवा डोंगरी माणसें यांपासून तों आय ब्राह्मणांचा उच्चत्तम नमुना म्हणजे नंबुद्री ब्राह्मण ( याच जातीर्ताळ आद्य इंकराचार्य आहेत. ) यांपर्यंत आपल्यास सव प्रकार पहावयास सांपडतात. भाषा, मनुष्य- वंशस्वरूप, सामाजिक व्यवस्था, विवाहचाली इत्यादींचा अभ्यास या प्रांतांत करण्यासारखा आहे. कारण येथें अतर घडामोडी किंवा बाहेरील स्वाऱ्यांच्या आपात्ते मुळींच कोसळल्या नाहींत, किंबहुना नंबुद्री बाहझ्मणांचा व नायर ( नागर ) क्षत्रियांचा हा देश एका रीतीनें संस्मरणीय आहे. कारण येथून इंकराचाययांच्या नेतृत्वाखाली एक धार्मिक स्वारी बाहेर पडून तिनें सर्व हिंदुस्थानास जिंकले. पूत किनाऱ्यावरच्या पांड्याप्रमाणें पाश्चेम किनाऱ्यावरच्या या केरलांचा इतिहास महाभारत–रामायण–कालापर्यंत मागें जातो. संस्कृत ग्रंथांत पांड्य, चोल, केरल यांची नेहमी सांगड सांपडते.

हृल्लींची त्रावणकोरांत राज्य करीत असलेली क्षात्रिय कुळा फार प्राचीन आहे. तिच्या दप्तरचे लेव हल्लींच्या राजापासून पस्तीस पिढ्या मागें म्हणजे इ. स. १३२३५ पर्यंत जातात. या कुळाचा यापूर्वीचा इतिहास आपल्यास कोरीव लेखावरून काढला पाहिजे.

४२६ तिसरां हिंदु राउ

तसा इतिहास पिले यांनीं काढून एक जळविलेठी हकीकत दिलेळी आहे. त्रावणकोरांत असलेली अक्षरवटिका संस्कृत अक्षराहून भिन्न आहे हं प्रथंम सांगितळें पाहिजे. या अक्षरास वत्तेलथे किंवा चेर पांड्य म्हणतात. त्रावणकोरचा शकह्ि निराळा आहे. त्याचें नांव कोळुमशक असून त्याचें पहिळं वषे ८५५ इसवी आहे. शिला- ठेखांत प्रथम त्रावणकोरच्या राजाचे नांव आढळते तें. वारकेरलवर्मन्‌ असं आहे. हं ११३५च्या लेखांत मिळतें. हा राजेंद्र चोलांचा मांड- लिक होता. त्याच्या नांवान महादेवाचें देवालय यानें बांधलें. वेनाड म्हणजे त्रावणकोर एक सुशासित देश असन तेथें कर ऐनजिनसी

नगदी वसूल होई असे दिसतें, चोळ आणि चालुक्य यांच्यापासून यानेच प्रथम बरीच सत्ता मिळांवेली, इ. स. ११२४च्या दुसर्‍या एका शिलालेखांत याचें नांव आहे. यावेळच्या राज्यपद्धतींत प्राम- संस्था आणि मंदिराचे अधिकारी या दोघांचाह्ि समावेश झालेला दिसतो.

इ. स. ११६१ च्या एका शिलालेखांत याच्या पुढच्या राजाचें राविवमन्‌ असें नांव मिळतें. योने ञवणकोरवर अगदीं दक्षिणच्या इलाख्यासहद अगदीं स्वतंत्रपणें राज्य केलें. कारंण यावेळी राजेंद्र मरून चोलांची सत्ता कमी झाली होती. याच्या पुढच्या राजाचें वीर उदय मार्तंड असे नांव ११७३ च्या एका लेखांत मिळते. आणि इ. स. ११८९ च्या लेखांत आदित्यराम राजाचें नांव मिळतें. पिछले यांच्या मते उत्तरेकडे कपदेश किंवा कुपकांचा मुळख आणि मलबारचा कांहीं प्रांत जिंकून यानें आपलें राज्य वाढविले. याच्यामागून दुसरा केरलवमेन्‌ या राजाचें नांव इ. स. ११९३च्या शिलालेखांत मिळतें. एका ग्रंथांत त्रिखडी असें याचें नांव आहे. याचा पुढचा राजा वीर-रामवमन्‌ त्रिखडी याचें वणन इ. स, ११९६ च्या विस्तत शिलालेखांत आहे. या लेखांत देवळांच्या कारभारावर नजर ठेव-

दक्षिणेतील महत्वाची मांडालिक राजघराणीं. ४२७

‘णाऱ्या एका ६०० जणांच्या सभेचें वर्णन आहे. त्याचप्रमाणें राज्या- च्या अठरा विभागांच्या अधिपतींच्या सभेचे वर्णन आहे. यावरून राज्यकारभार मुख्यतः येथें लोकांच्या प्रतिनिधींच्या हातांत दिसतो. ही व्यवस्था प्राचीन काळच्या व्यवस्थेचा अवशेष आहे. पुढील राजे वीरराम, केरळवर्मन्‌ आणि वीर रविवमन्‌ होते. दुसर्‍याचा एक लांब लेख इ. स. १२२५चा सांपडला असून त्यावरून त्या काळीं जमा- बंदीची व्यवस्था कशी होती हें पिछले यानीं दाखविलें आहे. त्रावण- कोरचें हृल्लींचें राजघराणे १२ व्या शतका इतकें जुनें आहे. त्याची राजधानी तेव्हांच त्रिवेंद्रम होती आणि प्राचीन काळापासून राज्य- व्यवस्था सुरक्षित व प्रामसंस्थच्या हातांत असे,

तुंगभद्रेच्या उत्तरेस कुंतल म्हणजे हछींच्या दाक्षिण महाराष्ट्र देशांत चार मांडलिक घराणीं होतीं. त्यांचा उछेख ह्या भागांत केला पाहिज, तीं याच कालविभागांत पडत असून स्वतंत्र नव्हतीं तरी बलिष्ठ होतीं. हल्लींच्या निजामच्या राज्यांतील येलबुग येथील शिंदे घराणें पहिलें होय. यांचे लेख कानडी भाषेंतील सांपडले आहेत. बॉंबे गझेटियर व्हॉ. १ भा. २ (पा. ५ :२-“५७५ ) यांत यांचा इति- हास दिला आहे. त्यावरून पुढील संक्षिप्त माहिती कांडी आमच्या विधानासह देतो. या देशांस * शिंदवाडी, नाड! असें या लेखांत म्हटलें आहे; यावरून असे स्पष्ट दिसतें की, हे शिंदे मराठे असून कानडी बोलणाऱ्या मुळुखावर त्यांचें राज्य होतें. ( भा. १ यांत सांगि- तल्याप्रमा्णे मराठे आणि कानडे हा भेद काल्पनिक आहे; म्हणजे हा वंश नसून भाषाभेद आहे ). बिजापूर जिल्ह्यांतील बदामीपासून यांचा मुळ्ख लागतो, आणि त्यांत धारवाड जिल्ह्यांतील बागलकोट आणि नेरळ यांचा सभावेश होतो. इं. ए, ७पा, ३०६ वर दुसऱ्या एका शिंदे कुलाचा उल्लेख आहे. त्यांत मुंजाचें असें वर्णन केलें आहे. “ भोगावती पुरवराधीश्वर नागवश [तलक प्रत्यंडक चतुःसहसत

४२८ तिसरी हिंदु राज्ये

राजा” आमच्या मतें पहिल्या कालाविभागांत सेंद्रक या नांवार्ने आलेल्या कुलाचीच ही परंपरा आहे. तेथें पुलकेशी चालुक्य याचा मामा सेनानंदराज सेंद्रक याचा उल्लेख कर्नाटकांतील कृष्णा व तुंगभद्रा या नद्यांमधील एका जमिर्नाचें दान देण्याबद्दल विनंति केली, असा आला आहे. (भा. १ पान २११). हें कुळ नागवंशी होतें व येल्बुर्गचे दिंदेहि नागवंशी होते. हींच शिंदे कुलहि त्यांचेच प्रति- निधि असून नागवंशी आहेत.

उत्तर चालुक्यांच्या अमलाखाली हे येलबुर्गचे शिंदे फार बलवान्‌ मांडलिक होते. यांतील पहिला प्रसिद्ध राजा आचगी. यास दोन पुत्र होते, ते बम्म आणि सूर्य होत. यांचा उललेख इ. स. १०७६ च्या एका लेखांत आला आहे. बम्माचा पुत्र आच ऊर्फ आचुगी दुसरा हा विक्रमादित्याचा पराक्रमी सेनापति होता. यानें एका होयसळ राजाचा पराभव केला. इ. स. ११२२ च्या एका लेखांत याचा उल्लेख आहे. आचुगीचे दोन पुत्र पेरमाडी आणि चोकंड दुसरा. यांचा उठठख इ. स. ११४४ व ११६३ च्या लेखांत आहे. चोकंडाला चार पुत्र होते. एका राणीपासून आचगी तिसरा व पेरमाडी आणि दुसऱ्या बायकोपासून बिज्जळ आणि विक्रम, या चौघांचा उछेख इ. स. ११६८ त ११९० च्या लेखांत मिळतो, कल्याणचे उत्तर चाटुक्य नष्ट झाल्यावर आणि होयसळांचा उत्कर्ष झाला तेव्हां या शिंदे कुलाची सत्ता कमी होऊन ते स्वतंत्र होऊं शकले नाहींत. यांचा देश शेबटीं देवगिरीच्या यादवांच्या तुंगमद्रे- पर्यंत पसरलेल्या राज्यांत समाविष्ट झाला;

दुसरें महत्त्वाचें मांडालिक कुल येथें सांगितळें पाहिजे तं सोंद-

“किंबहुना शिंद्यांची अनेक कुळें आहेत, उदाहरणार्थ इं, ए. १४मध्यें कऱ्हाड ताठुक्‍्यांताल आणखी एका शिंदे कुळाचा उल्लेख आहे,

दक्षिणतील महत्वाची मांडलिक राजघराणी. ४२९

चज

त्तींच्या रट्टांचे होय, यांचा इतिहास बॉबे गझाटियर व्हा. १ भाग २ पा. ५५४९-५५” वर डाक्तर प्रोटनं दिला आहे तो आम्ही येथें सारांश रूपानें देतों, हे राजे स्पष्टपणें महाराष्ट्राच्या एका राष्ट्रकूट सम्राटाच्या वंशातळे असावेत. यांचें राज्य ‘ कुंडी ३००० । म्हणजे हल्लींच्या बेळगांव व धारवाड जिल्ह्यांच्या एका भागावर होतें. यांची राजधानी प्रथम सोंदत्ती ( सुगंधावती ) आणि मागून खुद्द बेळगांव ( वेणुप्राम ) होती. गेझेटियरला हे राष्ट्रकूट वंशांत जन्मठे अस- ल्याविषयीं संशय आहे. परंतु राष्ट्रकूटांबद्दळ ‘रटट’ हा शब्द नवव्या शतकाइतका जुना आहे आणि हल्लीचे रेडी हेडि रट्ट किंवा राष्ट्रकूट आहेत. ते आपल्यास मूळचे लटटळ्रपुरवराधीश्वर म्हणतात. यांचें लांछन सिंदूर ( हत्ती ) असून ध्वजावर सोन्याचा गरुड असे. हाच त्यांच्या मोहोरेवर आहे. हे राजे प्रथम पाश्चात्य चालुक्यांचे अंकित होते. पण कलचूरींचें बंड झालें, तेव्हां ते स्वतंत्र झाळे. ते शिंधा- इतके बलवान नसल्यानं त्यांचा होयसळानीं पराभव केला. पण शेवटीं याचाहि प्रदेश देवगिरीच्या यादवांच्या राज्यांत सामील झाला,

यांचा पहिला मुख्य राजा कार्तवीर्य पहिला ऊर्फ कत्त होता. याचा उल्लेख इ. स. ९८० च्या शिलालेखांत आहे. हा तेल दुसरा, आहवमछु याचा मांडलिक होता. यानें आपल्या कुंडीच्या राज्याची सीमा ठरवून घेतली. याचे पुत्र दावरी आणे कनकैर असे दोघे होते. दुसऱ्याचा पुत्र एरग यानें इ. स. १०४० त एक संस्कृत लेख लिहविला आहे (इं. ए. १९ पा. १६१). त्यांत तो आपल्यास जयासेद्द जगदेकमछु याचा सामंत म्हणवितो. याच्या बिरुदांत ‘रट्ट- वंशोद्धवलट्टळ्रपुरवराधीश्वर गरुडध्वज’ वगेरे पदें आहेत. एका पदांत यास गायनांतील विद्याधर असें म्हटलें आहे. एका जेन दानलेखां- तहि याचा उल्लेख आठा आहे. प्रो० पाठक यांनीं इं. ए. १४ पा.

की माट

४३० तिसरा हिंदु राज्ये

२३ वर हा छापला आहे. याचा भाऊ अंक सोंदेत्तीच्या १०४८ च्या शिलालेखांत उल्लाखिला असून त्याचा पुत्र सेन पहिला होता. याचा पुत्र कन्नकैर दुसरा यानें इ. स. १०६९पासून इ. स. १०८८७ पर्यंत बरेच लेख केलेळे सांपडळे आहेत. आपला भाऊ कातेवीर्य दुसरा याच्यासह यानें बरींच वर्षे राज्य केलें. विक्रमादिल्य सहावा याचा सामंत असें यांचें वर्णन आहे, याचा पुत्र सेन दुसरा इ. स. १०९१ पासून ११२१ पर्यंतच्या अनेक लेखांत उल्लेखित आहे. याचा पुत्र कातवीर्य तिसरा याचे कित्येक लेख इ. स. ११४३ ते ११६६ पर्यंतचे सांपडले आहेत. त्यांत यास कत्त किंवा कत्तम असौहे म्हटलें आहे. कल्याणच्या कलचूरीच्या बंडाचा फायदा घेऊन यानें इ. स. ११६५ नंतर आपलें स्वातंत्र्य पुकारले व एका लेखांत आपल्यास चक्रवतीहि म्हणवून घेतळें आहे (बॉबे जे. आर. ए. एस, १० पा. १८१). हें स्वातंत्र्य सोमेश्वरानें विरोध केला तरी त्यानें तीन पिढ्यां पावेतो भोगेळें; म्हणजे याचा पुत्र लक्ष्मीधर पहिला, त्याचा पुत्न कातवी्य चवथा, त्याचा पुत्र लक्ष्मीधर दुसरा. यास शेवटीं देवगिरीच्या सिंगण यादवाचा अधिकारी विचण यानें १२२८च्या सुमारें जिंकलें. हे रट्ट शिवभक्त होते. परंतु यांची जैनावराहि कृपा असून जैन देवाल्यांस त्यानीं दानें दिलीं आहेत,

तिसरे महत्त्वाचें मांडलिक राज्य हनगळच्या कदंबाचे होतें. हे कदंब फार पुराणें मराठे कुळ आहे. अशोकाच्या राष्ट्रकूटाच्या म्हणजे रट्टांच्या अथवा राष्ट्रिकांच्या इतकें ते जुनें आहे. प्राचीन चालुक्याच्या समकालीन कदंबापैकींच बहुधा ते असून, त्याच वंशाचे व गोत्राचे असल्यानें, आपल्या लेखांत चालुक्यांचे मानव्यगोत्र व हारीतिपुत्र- वंश ढावीत. ते मुळांत बनवासी येथें राज्य करीत होते. हेहि कदंब ( कादम्ब रूपहि आढळतें ) आपल्यास बनवासी पुरार्धाशच म्हणत आणि ह्याच मुठुखावर त्यांचें राज्य असून धारवाड जिल्ह्यांतील

दक्षिणेतील महत्वाची मांडलिक राजघराणी. ४३१

हनगळ “५०० चा प्रदेश आणखी त्यांच्या ताब्यांत होता ( शिला- लेखांत हन्नुराळ असें येतें ). यांचे लांछन सिंह असून ध्वजावर वानरराजा हनुमान असे. हे विष्णूचे भक्त म्हणजे बनवासी ऊर्फ जयन्ती येथील मधुकेशवाचे ते उपासक होते. बॉंबे गॅझेटियर व्हा. १ भा. २ पा, ५५९-“५६३ वर फ़ीटनें दिलेल्या यांच्या इतिहासाचा सारांश आम्ही येथें देतो.

या कदम्बांची विस्तृत वंशावळ प्रथम इं. ए, १० पा. २४९ वर छापलेल्या त्यांच्या लेखांत ( ११०८ इ. ) मिळते. या कालविभा- गांत राज्य करणारा पहिला राजा कौर्तिवर्मन्‌ (दुसरा) इ. १०५८ त राज्य करीत होता; हा सोमेश्वर चालुक्य व विक्रमादित्य सहावा यांचा सामंत होता ( इं. ए. ४ पा. २०६ ). पुढें याचा चुलता शान्तिवर्मनू दुसरा हा बनवासी १२०० व हृनगळ ५०० वर विक्रमादेल्य सहावा याचे वेळीं १०८९ इ. त राज्य करीत होता. याचा पुत्र तैळ याचे अनेक लेख सांपडळे आहेत, ते १०९९ पासून ११२८ पर्यंत असून त्यांपैकी करगुदरीचा ११०८ चा लेख आम्ही प्रथम उछ्लेखिळेला हे सर्व लेख हनगळ तालक्‍्यांत मिळाले आहेत. हनगळ राजधानीस पांथीपुर व विराटनगर अशींहि नांवें आहेत. ही होयसळ विष्णबर्धनानें वेढा देऊन हस्तगत केली ११३५ इ. त हा वारला, त्या वेळीं त्याचें पुत्र मयूरवमत्‌ आणि मल्ठिकाजुन त्याच्या सहकारानें राज्य करीत होते. हे येथें सांगण्या- सारखं आहे कीं, या दक्षिणच्या राज्यांत युवराज, पुत्र किंवा बन्धु, बरोबरच राज्य करितात. इ, ११२४ त त्याचा तिसरा पुत्न तेलम हनगळांत एकटा राज्य करीत असल्याचें मिळतें. याचा पुत्र काम- देव ११८९ इ. त हनगळ बनवासी आणि पुलिगेरी वर चालुक्य शेवटचा राजा सोमेश्वर चौथा याच्या अमलाखाली राज्य करीत असल्याचा दाखला आहे. त्याप्त दोवटीं होयसळ राजा प्रसिद्ध वीर-

४२२ तिसरी हिदु राज्ये

बल्लाळ यानें जिंकिले. याशिवाय दुसरे लहान मांडलिक कदंब कुळा- पैकीं होते, पण ते कमी महत्त्वाचे असल्यानें त्यांचा इतिहास न देतां आम्ही याच कुलाच्या गोवा शाखेकडे, ती महत्त्वाची अस- ल्याने, वळतो.

हे गोव्याकडचे ( गोपकपट्टणचे ) कदंब वरील कदंब घराण्या- चीच शाखा होती. पण हनगळच्या कदंबाच्या लेखांत जी कदंबाची उत्पात्ते दिली आहे त्याहून ह्यांच्या लेखांत निराळी उत्पात्ते दिली आहे. दक्षिण कोंकणच्या शिलाहारांपासून यांनीं कोंकणांत गोवा हस्तगत करून घेतलें. आणि ह्याशिवाय बेळगांव जिल्ह्याच्या खाना- पूर तालुक्‍याचा घाटावरचा प्रदेश ( ह्याला पळासेंगें म्हणत ) त्यांनीं आणखी मिळविला. सप्तकोटीश्वर नांवाच्या शिवटिंगाचे हे उपासक होते, विष्णूचे नव्हते आणे हवे आपल्या लेखांत कलियुगसंवताचा उपयोग करतात; शालिवाहन शकाचा करीत नाहींत. यांचे लेख संस्कृतांत आहेत; कानडींत नाहींत. कारण गोवा प्रदेशांत म्हणजे दक्षिण काॉकणांत कानडी भाषा बोलत नाहींत. ह्याशिवाय यांची व अन्यकदंबांची एकवाक्यता आहे. म्हणजे मूळचे हे बनवासीचे आहेत आणि लांछन सिंव्ह व ध्वज वानर. यांचाहे आहेत. यांचे गोत्र मानव्य आहे; वंश हारितीपुत्र आहे. आणि महासेन मात॒- गण-प्रसाद-लब्ध-लक्ष्मी असें हंहि विशेषण लावतात. हें विशेषण जुन्या कदंबाच्या लेखांतून येते. ( बॉंबे जनॅळ ९ पा. २३५ ). ते आपल्या पूव राजांचीं नांवें देत न बसतां वंशा- वळ गुहछु पासून सुरू करितात. याचा पुत्र षष्टदेव ऊर्फ छट्‌ याचा एक लेख इ. स. १००७ चा सांपडला आहे. या कदंब घराण्यां- तीळ हनगळ शाखेंत छट्‌ म्हणून जो पहिला राजा सांगितला आहे आणि ज्याची सरासरी मिति इ. स. १००० ठरते तोच हा असावा, आणि याच्यापासून हा शाखा-भेद झाला असावा. याचा पुत्र जयके-

दक्षिणतील महत्वाची मांडलिक राजघराणी. ४३३

शिन्‌ बलिष्ठ राजा होता. गुडिकट्र्लेखांत याचें फारच वर्णन केलें आहे (बोबे जे. आर. ए. एस.भा. ९ पा. २९२) कपादिद्रीपाचा एक राजा मावनी यास यानें ठार मारळें असें वणंन आहे, करपर्दिद्रीप म्हणजे गझेटियरच्या मते हल्लींचें साष्टी बेट होय. ठाण्याचा अनंत- देव राजा याच्या लेखांत ज्या आपत्तींचें वर्णन आहे त्याच्याशी ह्या स्वारीचा कांहीं संबध नसावा असें आम्हांस वाटते. चोलळ* आणि चालुक्य ( विक्रमादित्य ६ ) राजे यांची मैत्री यानें संपादन केली असेंहि वर्णन आहे; आणि यानेंच प्रथम गोवा हो आपली राज- घानी केली.याची निश्चित मिति इ. स १०५२ आणि १०५३आहे. गुजराथच्या कणाची राणी मैनछदेवी ही एक कदंबांपैकीं राजकन्या होती असे वर्णन आह, ती याच राजाची मुलगी गंझेटियरच्या मतें असावी. याच्या नंतरचा राजा विजयादित्य याचा पुत्र जयकेशिन्‌ दुसरा यास विक्रमांक चाळुक्यानं आपली मुलगी म्हणजे सोमेश्वराची बहीण दिली होती ( इ. ए. १४, पा. २८८), हा विवाह बाल- विवाह दिसतो; या राजाची निश्चित मिति इ. स. १११९ आणि ११२५ इसवी आहे. विक्रमचाळक्य शकवर्ष पन्नास असा शक या दुसऱ्या लेखांत दिला आहे, याचें मुख्य राज्य पळसिंगे १२०० आणि काकण ९०० हच होतें; पण ह्याशिवाय अन्य. प्रदेशहि विक्रमाचा जांवई या नात्यानें त्याजकडे होते. तो आपल्यास कोंकण

*चालुक्यचोलभूपाली कांच्यां मित्ले विघाय यः ।

पेम’डितू्य नेघोषे5प्यारसीद्राजापितामहः ॥ बॉँबे जे, आर, ९ पा.१४२

2 2!

]श्रीपेमांडिनृपः पयोनिधिनिभः सोमानुजां कन्यकां । यस्मे विस्मवक|रिभूरिविमवैदच्वेभकोशािमिः ॥

ख्यातः श्रांपतये स मेललमहादेवीं कृताथो5भवत्‌ ।

४३४ तिसरां हिंदु राज्ये

चक्रवर्ती म्हणूं लागला आणि स्वातंत्र्य मिळविण्याची त्यानें इच्छा धरली. यामुळें याच्यावर आचुगी पहिला विक्रमाचा मांडलिक यानें हा करून त्याचा पराभव केला. आचुर्गाच्या लेखांत त्यानें गोवा व कोंकण घेतलें असं वर्णन आहे. इ. स. ११४७ च्या लक्ष्मणाच्या लेखांत सोमनाथाला कांहीं देणगी देण्याच्या वेळीं यास नजराणे मिळाळे असा उछेख आह ( गॅ. पा. ५६९ ). जयकेशीला दोन पुत्र होते, पेर्माडी आणि बिजयादिव्य. हे शिव आणि विष्णु यांचे अनुक्रमें भक्त होते. यास मलवेरमार अशीहि पदवी आहे. ही पदवी होयसळांची आहे. विजयादिल्य ह्या फार विद्वान्‌ होता आणि वाणीभूषण अशी यास पदवी मिळाली. ही पदवी एका लेखांत त्यास लावठेली आहे. तेथीळ उतारा देण्यासारखा आम्ही खालीं देतों.* पेरमाडीची राणी सोमवंशोत्पन्न कमलादेवी हिनें दोन सुंदर कोरीव दगडाचीं देवाल्यें एक नारायणाचे व दुसरें लक्ष्मीचें बांधली. हीं धारवाड जिल्ह्यांतील संपगांव ताट॒क्यांत अद्याप आहेत. त्यांत लेखाहि आहेत. त्यांत पेरमाडीची इ. स. ११४७ ही मिति मिळते, विज- यादिल्य या मितीनंतर त्याचे बरोबर राज्य करूं लागला असें दिसतें. दोघांचे नांव इ. स. ११५८ च्या कोरीव लेखांत ( इं. ए. ११ पा. २७३ ) त्याचप्रमाणें हळशी येथील इ. स. ११७१ च्या लेखांत ( कलियुगवष ४२७२) मिळतें. कऱ्हाडचा राजा विजयादित्य यानें या गोव्याच्या राजास पुनः गादीवर बसविलें असें एका शिला- हार लेखांत सांगितळें आहे. त्यावरून यांचें राज्य मध्यंतरी दुसऱ्याने हिसकलें असावें. तथापि हे राजे बलवान्‌ असून त्यांनीं आपलीं

ह आलवा आव क अ कही लडी 2.६4 01 3 औक. 3४ कही 0 क ह /:. आ… “१६ क क क्क क

*भ॒गो कुन्ते प्रासे घनुषि विषमे चासिफलके । वरे वाद्ये गीते सरस- कविताशास्त्रविसरे । तुरंगाद्यारोहे स्मृतिषु च पुराणेषु पुरुजित्‌ । पारिज्ञा-

ह.

नाद्योभूज्जगाते बहुविद्याघर इति ॥

*्ळ

दक्षिणर्ताल महत्वाची मांडलिक राजघराणी. ४३५

नाणींहि पाडलीं होतीं. पेरमार्डाचे इ. स. ११८२ चें सोन्याचे नाणं सांपडलें आहे.

विजयादित्याचा पुत्र जयकोरीन्‌ हा इ. स. ११८७ त गादीवर आला असें दिसतें. याचें राज्यवर्ष तेरा व पंधरा (इ. स. ११९९) व ( १२०१ ) यांतील याचे लेख मिळाळे आहेत. त्याची १२०० व १२१० चां सोन्याचीं नाणींहि मिळाली आहेत. याचा पुत्र त्रिमुवनमछु व त्याचा पुत्र छट्ट अथवा षष्ठदेव दुसरा. हा इ. स. १२४६ त गादीवर आला. राज्यवर्ष पांच इ. स. १२५० यांतील याचा गोव्याचा ठेख मिळाला आहे. हुबळी त!छुक्‍्यांत याचा दुसरा लेख इ. स. १२५७ चा मिळाला आहे, त्यावरून हा स्वतंत्र राजा दिसतो. हें राजघराणें केव्हां व कसे विल्याला गेळं हे॑समजत नाहीं. यापुढील यांचे कोणतेहि लेख सांपडले नाहींत. बहुधा देव- गिरीच्या यादवांनीं यांस जिंकठें. (जे. बी. आर. एस,९ पा. २४७) यांचे अगदी प्रारं्भांचे पूवज हरिवमन्‌ वगेरे आपल्यास ‘ मानव्य- सगोत्र ‘ इत्यादि विशेषणे जैनलेखांताहे घेतात. बेळगांव जिल्ह्यांतील पळासेंगे येथे हे कित्येक जेन लेख सांपडले आहेत. ( बॉबे जे. आर. ए. एस्‌. पा. २२५ ते २४१ )

शेवटले मांडलिकी घराणें वर्णावयाचे म्हणजे कऱ्हाड अथवा कोल्हा- पूर येथील शिलाहार घराणें होय, हें शुद्ध मराठा क्षत्रिय घराणें असून याचे लेख संस्कृतांत आहेत, मूळ शिलाहारांच्या तान शाखा झाल्या. ठाण्याचे, राजापूरचे ( खारेपाटण ) आणि कोल्हापूरचे. हे राष्ट्रकूटांचे मांडलिक होते. यापैकीं ठाण्याचे शिलाहार पूर्वी सांगि तल्याप्रमाणे राष्ट्रकूटांनतर स्वतंत्र झाळे. पण कऱ्हाडचे शिलाहार चालुक्यांच्या सत्तेच्या केंद्राला जवळ असल्यानें महामंडलेश्ररच राहिले, तथापि ते बलवान्‌ होते; आणि त्यांनीं कोंकणच्या एरोला- हारांचा प्रदेश आपल्या सत्तेखाली आणला. सणफुलु यानें स्थापि-

४३६ तिसरा हिंदु राज्ये लेली दक्षिण कोकणची ( राजापूरची ) शाखा या कालविभागांत नष्ट झाली. अर्थात्‌ या भागांत दोनच शिलाहार राहिळे, ठाणे व कऱ्हाड येथील

हे शिलाहार कऱ्हाड १४०००, मिरज ३०००, कुंडी ४००० आणि दक्षिण कोंकण एवढ्या प्रदेशावर राज्य करीत होते. यांची राजधानी कऱ्हाड होती. यांचा मुख्य किछा पनाळ ( प्रणालळक ) होता; अर्थात्‌ अलिकडील मराठ्यांच्या इतिहासाशी या किल्याने सांखळी लागते. यांची उत्पत्ति पूर्वी सांगितल्याप्रमाणें विद्याधर वंशांत असून हे प्रारंभी तगरांत राज्य करीत होते. यांचे लांछन सुवण गरुड असून ते आपल्यास “’महाक्षात्रिय’? म्हणवीत. ( ए. इं.३ पा. २०९ ). हे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे भक्त होते. तिच्या प्रसादाने आपल्यास हें ऐश्व्य मिळालें असे ते मानीत. ठाण्याच शिलाहार शिवभक्त होते. आणि ल्यांची कुलस्वामिनी पावती अथवा आयो ह्वैपायनी भागवतांत सांगितळेली होती. ह्या सर्वे गोष्टींवरून हीं दोन्ही शिलाहार राजघराणीं मुळांत निःसंशय एक ठरतात.

कऱ्हाडच्या या शिलाहारांचा इतिहास बॉँबे गझेटियर व्हा. १ भा. २ यांत डॉ. प्रोट यानीं पा. ५५४४मध्यें दिळा आहे. आणि डॉ. भांडारकर यांनीं दक्षिणच्या इतिहासांत पा. ९२ वर दिळा आहे. दोघांस कोरीव लेखांचाच आधार आहे. आणि त्यावरूनच या काल- विभागांतील ( १००० ते १२०० ) जेतिग दुसरा यापासूनचा इति- हास आम्ही येथें सारांश रूपानें देतों. ल्याला चार मुलगे होते. पैकीं गॉकाचा पुत्र नरासेंह याचा इ, स. १०५८चा लेख सांप- डला आहे. हा बलिष्ठ असून याने कित्येक देवळें बांधिलीं. बहुधा याच्या पूर्वीच गोंकानें दक्षिण कोंकण जिंकले होतें. हा खिलिगिली या किल्ल्यावरून राज्य करीत असे असं लिहिळें आहे. फीटच्या मते. हा किछा निश्चित करितां येत नाहीं, परंतु हा पन्हाळ्याहून दूर

दाक्षिणेतील महत्वाची मांडालिक राजघराणी. ४२३७

असावा. पण भांडारकर यास पन्हाळाच मानतात. फुटिच्या मतें विक्रमांकाची प्रसिद्ध राणी चंद्रलेखा ही याचीच मुलगी असावी. ती शिलाहार राजकन्या होती यांत दंका नाहीं व विक्रमाचा कल्याण येथील राज्यारोहणावा काल इ. स. १०७६ आहे. तेव्हां हा तर्क संभवर्नाय आहे. नरसिंहानें बरींच वर्षे राज्य केळे.

नरसिंहाला पांच पुत्र होते. ते त्याच्या मागोमाग राज्यावर आले. ज्येष्ठ गूवळ व त्याचा धाकटा भाऊ भोज पहिला ह्यांचे ठेख सांप- डले आहेत. त्याचा धाकटा भाऊ बछ़ाळ याचा एका कानडी लेखांत उछेख आहे (इं. ए. १२ ). शेवटला पुत्र गंडरादित्य याचे अनेक लेख सांपडले आहेत. याने प्रयाग येथें टक्षत्राह्षण-भोजन घातलें असें वर्णन आहे. मिरज प्रांतांत एक मोठा तलाव यानें बांधला व त्याच्या कांठीं शिव, बुद्ध आणि जिन यांचीं देवालये बांधिली. याची राज्यव्यवस्था चांगली व न्यायाची होती (भांडारकर ).

याच्यामागून बिजयादित्य गादीवर बसला. याचे दोन ठेख इ. स. ११४८ व ११६३ चे सांपडळे आहेत. एका लेखांत एका जैन देवळास गांव दिला असून जिनाचें नमन प्रारंभी आहे (ए. इं. ३ पा. २०७ ). यांत विजयादित्याची थोडक्यांत वंशावळ सुटसु- टित स्तुतिविरह्ित दिली असून दान करणाऱ्याची प्रशंसा मात्र विस्ताराने दिळी आहे. विजयादित्यालळा अनेक बिरुदे लाविलेलीं आहेत. त्यांत कित्येक कानडी आहेत. पैकीं शनवारासेद्धि हें चम- त्कारिक असून त्याचा अथ लक्षांत येत नाहीं. या जैन लेखांतह्ि महालक्ष्मीच्या प्रसादाने यास वैभव मिळालें असें वर्णन आहे. त्याव- रून हे शिलाहार हिंदु होते यांत इंका नाहीं. पण हे राजे जेनांचे चहाते होते असें दिसतें. यामुळें कुमारपालाच्या वेळेस जसा गुज- राथेंत जैनधर्माचा प्रसार झाला, तसा दक्षिण महाराष्ट्रांत यांच्या वेळीं जञैनधर्माचा प्रसार झाला. याचा पुत्र भोज दुसरा याच्या दानलेखा-

४२८ तिसरा हिंदु राज्ये

वरून असें दिसतें कौ, विजयादित्य हा प्रतापी राजा असून ठा- ण्याचा शिलाहार राजा ( बहुधा मलिकार्जन ) यास आपलें राज्य परत मिळविण्यास यानें मदत केली. यानें गोव्याच्या कदंबासहि मदत केली. कल्याणच्या चालुक्यांची सत्ता इ. स. ११५७ च्या सुमारें विज्जळ कलचूरीनें बळकाविली. त्यासहि ह्याने मदत केल्याचे दिसतें. तेव्हां विजयादित्याची सत्ता पुष्कळच वाढली. याचा पुत्र भोज दुसरा यानें स्वातंत्र्य घारण केलें यांत नवल नाहीं. अर्थात्‌ यावेळीं लिहिलेल्या एका जेन ग्रंथांत ह्यास महाराज पश्चिम–चक्रवर्ती असें म्हटलें आहे. उत्तरेचे शिलाहार याचवेळी आपल्यास कोंकण चक्रवर्ती म्हणवूं लागले हें स्मरणांत येईल. भोज दुसरा याचे अनेक लेख इ. स. ११७९ पासून १२०५ पर्यंतचे मिळाळे आहेत. त्यानें ब्राह्मणांस व जैन देवाल्यांसह्ि दानें दिलीं आहेत. ए. इ.३ पा.२१४ यावर छापलेल्या दानलळेखांत दोन करहाटक घैसास ब्राह्मणांचा उललेख आहे. या नावांचें महत्त्व आम्ही पुढे सांगूं. पण ब्राह्मणांचे गोत्र-शारवाभेदाशिवाव उपनांव किंवा पोटभेदांचे नांव प्रथमच या लेखांत येते. तसेंच मराठे सरदारास नायक ही संज्ञा या लेखांत प्रथम दिसते, भोज जरी बलवान्‌ होता, तरी त्यास आपलें स्वातंत्र्य कायम रांखतां आलें नाहीं, आणि या कुलास प्राच्य चालक्यानंतर साम्राज्य मिळविणाऱ्या यादवानीं जिंकळें. इ. स. १२०५ नंतर या कुलाचा कोठें उल्लेख सांपडत नाही; तेव्हां हा बहुतेक निश्चय होतो कौं, राज्य करणारें कुल या नात्यानें शिलाहार ( शेलार ) पुढें राहेळे नाहींत.

वंशावळी. ४३९

वंशावळी. (१) शिलाहारांची वंशावळ. १ जार्टग २ रा. ।

गोंक तीन बंधु. |

नरासेंह १०५८ ।

। । ॥ | | गुवल भोज बल्लाळ गेडरादित्य विजयादित्य | भोज दुसरा ११७९-१२०५ (२) सोंदत्तीच्या रट्टांची वंशावळ.

0« 6

कोतवीर्य १ ला ( ९८० इ, स. ) न पहिला 1 एरंग ( १०४० इ. ) अक (शवेटी) सेन ब्ह्हा कन्नकेर दुसरा (१०५८-१०७६ ० दुसरा

१०८२-१०७७) | १०६९,१०७६,१०८६,८७ सेन दुसरा (१०९६,११०२,११२८ )

| कातंवीर्य तिसरा ( ११४३,.११६५ ) | लक्ष्मीदेव दुसरा | ?6_6% 1. च्छ ह. । क्त कातंवाये चाथा मालकाजुन १२०१, ६

११९्‌वा2%२रर८…:] लक्ष्मीदेव दु. १२२०

४४० तिसरी हिदु राज्ये | (३) गोव्याच्या कद्बाची वश्यावळ. गुह 1 छट्ट ऊफ षष्ठदेव ( १००७,१००८) | जयकेशिंनन पहिला (१०५२,५२३ ) | विजयादित्य ] जयकेशिन्‌ दुसरा ( १११९-११२५ ) | राणी मेनलदेवी विक्रमादित्य ६ ह्याची कन्या,

|) ट्इ दरी…

9 | शिवचित्त पेरमाडी (११४७,४८,) विष्णुचित्त,विजयादित्य दु. | (११५८-११७२) जयकेशिन्नध तिसरा ( ११८७-१२१० ) | |) चरिभुवनमलळ ।

छट्टय शिवचित्त, रष्ठ्रदेब दुसरा (१२४६,४७, आणि १२५७ ) (४) हनगलच्या कदुंबाची वद्यावळ.

ळछ्ट ( १००५ )

1 जयसिंह (१०२० ) |

| | मावली तेल पहिला (१०४०) शांतिवर्मन्‌ (१०८९)

| कौर्तिवर्मन २ रा तेळ दुसरा (१०९९, ११२९)

तिक कन कालात | मयूरवर्मन दुसरा मल््रिकाजुन तेलम (११४९) (११३१) (११३२–११४५)….

० ($-.

कीत९व दुसरा कामदेव (१०६८) (११८१–१२०३)

प्रकरण सोळावे उत्तर हिंदुस्थानांतील महत्त्वाची मांडलिक घराणीं.

या कालविभागांत उत्तर हिंदुस्थानांत राज्य करणाऱ्या ज्या मांडाळिक घराण्यांचे कोरीव लेख मिळाळे आहेत, त्यांचा संक्षिप्त इतिहास या प्रकरणांत देण्याचा विचार केला आहे. उत्तरेच्या पूर्व- कडीळ कोपर्‍्यास प्रारंभ कारेतांना आपल्यास प्रथम आसामचं राज्य दिसेल. भारतोतेहासाच्या एकंदर काळांत आसाम कधीं स्वतंत्र तर कधीं बंगालचे मांडलिक रहात आलं आहे. या काळांत एक ब्राह्मण सेनापति वेद्देव येथें राज्य करीत असून त्याने आपला अधिराज गोडाचा कुमारपाळ याच्या तर्फे एक दानलख केला आहे ( ए. इं. २ पा. ३५१); याचा उछेख आम्हीं पूर्वी केलाच आहे. नंतर बिहार अथवा अंग येथील मांडलिक राजा राष्ट्कूट महण गोडाच्या रामपा- लाचा मामा मांडलिक असून त्याचा उछेख पूर्वा आला आहे.बंगाल- बहारांत आणखी मांडलिक असावेत पण त्यांत हे आसाम (कामरूप) व बहार ( अग ) मुख्य दिसतात.

आतां पालांच्या गोंड राज्याच्या दक्षिणेस आपल्यास दक्षिण कोसलांत रत्नपूर येथें हैहय कठचुरींची एक शाखा दिसते. किल- हॉननें यांची वं्यावळ पुढीलप्रमाणे दिली आहे (ए. इ. ८), कोकछ यास अठरा पुत्र असून त्यांपैकीं एका धाकट्या पुत्राचा वंशज कलिंग- राज यानें हा देश जिंकला. याच्या मागून याचा पुत्र कमलराज व त्यामागे त्याचा पुत्न रनराज गादीवर आले. यानेंच रत्नपूर वसविले व तेथे एक सुंदर शिवालय बांधिलें.“यामुळें शिवाच्या सतत सानिध्याने हे हाहर कुबेरपुरीशीं स्पा करूं लागले.!’ याचा पुत्र पृथ्वाराज हाता. व त्याचा पुत्र जाजहठ पहिला.याचा टेख१ १ १४चा सांपडला आहे.ए,इं.

४४२ तिसरी हिंदु राज्य

१ पा. ३४ यांत एक गांव आपल्या गुरु रुदनसिंगासाठीं एका शिवदेवाल्यास दिलें आहे. यानें जाजळपुर नांवाचें शहर वसविले. याचा पुत्र रत्नदेव दुसरा यानें त्रिकाठेंगाच्या प्राच्य गंगांचा पराभव केल्याचें वर्णन आहे. याचा पुत्र प्रथ्वीदेव दुसरा याचा एक लेख ११४१चा सांपडला आहे. (इं. ए. १० पा. ८४). याचा पुत्र जाजछ । दुसरा यानें इ. स. ११६७त केलेला दानलेख सांपडला आहे. ( ए. इं. १ पा. ४०); आणि याचा पुत्र रत्नदेव तिसरा याचा ठेख ११८१चा (इ. ए, २२ पा. ८२ ) सांपडला आहे. याचा पुत्र पृथ्वीदेव तिसरा याचाहि लेख ११९०चा (ए. इं. १ पा. ४७) मिळाला आहे. हें घराणें स्वतंत्र दिसतें. त्रिपुराच्या हैहय राजकुलाशीं त्यांचे मांडटिकी नाते नांवापुरतेंच असावें. या देशास त्यांच्या लेखांत तोमर म्हटलेळें आहे. हे शिवभक्त व वैदिकधमीभिमानी क्षत्रियकुल होते. कारण यांच्या लेखांत यांचे कृष्णात्रेय गोत्र प्रवरासह दिलेलें असते (ए. इं. १ पा. ४० ).

हल्लींच्या यू. पी. कडे वळून पाहतां औध, अंतर्वेद आणि बुंदेलखंड यांत बरींच मांडलिक घराणीं असावींत. परंतु आपल्यास दोनच रजपूत घराण्यांचा उल्लेख मिळतो व तीं. अद्याप कायम आहेत. हृ्टींच्या यू. पी. मध्यें गौतमाचे प्रसिद्ध रजपूतघराणें आहे. फत्तेपूरगझेटियरमध्ये हें घराणे फारच प्राचीन असून याचे गोत्र भारद्वाज आहे असे सांगितलें आहे. अर्गळच्या एका गौतमराजास जयचंदाची बहीण | दिली होती. जयचंदाचा खजिना अस्नीच्या किछ्यांत होता असं वर्णन आहे, तो बहुधा यांच्या ताब्यांत असावा. दुसरें घराणें संगरांचे होय. यांचा एक लेखहि सांपडला आहे. छत्तिस राजकुलांच्या यादींत यांचे नांव आहे, यांचे हीचे राजघराणें जगमनपूरचे महाराज होत जगमनपर जालोन जिल्ह्यांत आहे. यांची एक लहान शाखा इटावा जिल्ह्यांतील भरेद्द येथें आहे. क्ृष्यश्वंग आणि दशरथाची कन्या, रामाची

उत्तर ॥हंदस्थानाताल महत्वाचा माडालेक घराणा. ४४३

बहीण शांता यांपासून हें कुल झालें असें मानतात. हें प्रथम अंग अथवा बिहार येथें होतें. तेथें सेंगारांचा पहिला राजा दरारथ-कन्या शांता हिंचा पुत्र चतुरंग राज्य करीत होता. दुर्योधनाने कर्णास अंग राज्य दिल्यावर संगार मध्यप्रांत ( पश्चिम ) आणि मध्य हिंदुस्थान (पूर्व) असा पसरलेला डहाल देश आहे तेथें आले. तेथे त्यांनीं पुष्कळ वर्षे राज्य केलं. तेथे त्यांचीं हछीं संस्थानेह्दि अवशिष्ट आहेत. महा- राष्ट्रांत व गुजराथेंताहे त्यांचे राज्य होते असे तें म्हणतात; आणि कांहीं सेंगार पूर्वेकडे जाऊन बंगालच्या राढ प्रांतांत त्यानीं एक राज्य बरद्वान येथें स्थापिले. आणि बरद्वानचा एक राजपुत्र सिंव्हलद्दीपास जाऊन तेथें त्यानें आपल राज्य स्थापिले. या राजपुत्राचा बाप सिंह- बाहु यावरून सिव्हल हं नांब पडलें असा महावंशोत दाखला मिळतो. यांचा एक राजा कर्ण यानें यमुनेच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेलें कनार ( कर्णावती) हें शहर स्थापिळें.जगमनपूरच्या सेंगारांच्या सत्तचें मूळ ठिकाण कनार हें आहे. येथें अद्याप एक पुराण्या किछ्॒याचा अवशेष असून तेथें जगमनपृरचे महाराज दसऱ्याच्या दिवशीं दशेनास जातात. माळव्यांतील सिरॉज येथेहि (गुजराथ येथून येथं ते आठे) अलीकडे मोंगलांच्या वेळेपर्यंत यांचें राज्य होतें

या कुलाचा जो लेख सांपडला आहे तो बनारसहून प्रसिद्ध झाळा आहे. तेथे बहुधा हा दान देणारा राजा यात्रोनेमित्त गेला असावा ह, स. ११३9 ( संवत्‌ ११९१) त, गोविंदर्चद्र राज्य करीत असतां,सिंगरान्व यवत्सराज यानें ब्राह्मणांस एक गांव दान दिला. या छेखाची तऱ्हा गाहडवालांच्या ठेखाप्रमाणें आहे. यांत ज्यानें प्रथम राजपट्टी म्हणजे मांडलिकी राजमुकुट मिळविला तो सिंगरोटाहून आला असें वर्णन आहे. वत्सराजाच्या पूर्वजांची नांत्रें येणेप्रमाणे दिलीं आहेत:—१ कमलपाल, २ ख्रल्हण, ३ कुमार, ४ लोहडदेव आणि ५ दान देणारा, वत्सराज यावरून कुलस्थापक कमल्पाळ हा इ

४४४ तिसरी हिंदु राज्ये

स. १०५० च्या सुमारास येतो. अर्थात्‌ त्याचें राज्य गाहडवालांच्या । उदयापूर्वांपासून होते. कनारच्या विशोकदेवास जयचंदाची मुलगी दिली होती, अशी यांच्यांत माहिती चाळू आहे. हें राजकुल धर्मनिष्ठ वैदिकधर्मी क्षत्रियकुल होतें. यांचें गोत्र शांडिल्य या लेखांत सांगि- । तळठेंहि आहे (ए. इं. ४ पा. १२१ ). बहुधा या काळाच्या लेखांत गोत्र सांगितठेळ मिळत नाहीं.

हें सांगण्या सारखे आहे कीं राजा भगवन्तदेव हा कनारच्या मुख्य । घराण्याची शाखा भरेह येथील राजा होता.भोजादि राजाप्रमाणे विद्वान असून तो पंडितांचा आश्रयदाता होता. याच्या वेळीं हिंदुघर्मावरीळ । एक प्रसिद्ध ग्रंथ नीलकंठभट्टानें लिहून त्यास या राजाचें नांव भगवंत- भास्कर असं दिलेलें आहे. व्यवहारमय्‌ख हा या ग्रंथाचा एक भाग असून तो कोंकण, गुजराथ वगैरे मुंबई इलाख्याच्या कित्येक भागांत हिंदु लांचा आधारभूत ग्रंथ मानला जातो

पाहिजे. मीरत येथे महमुदाच्या इतेहासांत सांगितठेळे डोर र न | राज्य करीत होते. हस्तिनापूर मीरत जिल्ह्यांत गंगेच्या किनारी आहे आणि हे डोर रजपूत कदाचित्‌ पांडवांच्या वंशांतीळ असतील. ।

पांडवांचे हछींचे वंशज तुवर मानळे जातात. बदाऊं येथें राष्ट ज्ड्ञा

उत्तर हिंदुस्थानांतील महत्त्वाची मांडलिक घराणीं, ४४५

कूटांची एक शाखा राज्य करीत होती असें तेथील जुन्या किल्ल्यांत तांपडलेल्या लेखावरून सिंद्ध आहे (ए. इ. १ पा. ६४ ). या ेखाचा काल दिलेला नाहीं. या लेखावर विस्तृत विवेचन पूर्वी आलेच आहे. त्यांत राजे सांगितठें आहेत ते १ चंद्र, २ विग्रहपाल, ३ भुवनपाळ ४ गोपाल, ५ त्रिभुवनपाल व त्याचा पुत्न ६ मदनपाल ( याच्याविषयीं असा उछेख केला आहे कीं, याच्या पराक्रमाने इम्मीर गंगेवर येऊं दाकला नाहीं.) ७ देवपाल बंधू, नंतर ८ ्भाम- पाळ ९ शूरपाल, नंतर १० अनंतपाळ ११ लक्ष्मणपाल भाऊ. बदाऊं कुतुबुद्दीनने इ. स. १२०८ मध्यें घेतलें, तेव्हां हे अकरा राजे सुमारें इ. स. १००० पासून १२०० पर्यंत मानतां येतील.

हे राठोड आणि गाहडवाल, तसेच अंग देशांतील राष्ट्रकूट एकाच वंशाचे आहेत आणि ते सूयवंशी असून दक्षिणच्या माल- वडच्या राष्ट्रकूटांहून ( हे चंद्रवंशी होते ) भिन्न आहेत, हें आमचे मत पूर्वी सांगितलेंच आहे. मध्य हिंदुस्थानांतील राठोड व गुजरा- थचे व हथोर्डाचे ( राजपुताना ) राठोड दक्षिणच्या राठोडांच्या वंशा- तळले आहेत असं गौरीइकरांचे मत आहे (टॉड पा. ३६४). जोध- [रचे राठोड हे उत्तरेकडील राठोड वंशांतीळ असून गाहडवालाप्र- माणें सूर्यवंशी आहेत. आणि दक्षिणंतील कल्याण येथून आल्याची दंतकथा जरी त्यांच्यांत असली तरी राष्ट्रकूट हे नांव आधिकाराचे

असल्यानें सामान्य असूनहि भिन्न कुलाचें असूं शकल्याने ते मालख

डच्या राष्ट्रकूटांहून भिन्न आहेत

काठेवाडामध्यें चूडासमा हे यादव आहेत.आणि जाडेजा हेहि यादव आहेत.ही दोन्हीं कुळे या कालविभागांत राज्य करीत असल्याचा दाखळा्‌ नाहीं.यांतील कच्छचे जाडेजा गझनीहून आले अशी समजूत ओह महमुदाच्या वेळेपूर्वांच ते आळे असतील. पण या बाबतींत कोरीव हे… म. मा. रर

४४६ तिसरा हिंदु राज्ये

लेखाचा आधार नाहीं. काठेवाडांताळ सर्वांत महत्त्वाची गुहिळ रजपूत कुळी ( भावनगरचे हृल्लींचे राजे याच कुळींतीलळ आहेत ) असून त्यांचा एक लेख मिळाला आहे. त्यावरून ते. गुजराथच्या चालुक्यांचे मांडलिक होते. हे गोहिल मेवाडच्या गुलोहिताहून भिन्न आहेत; व चेंदाच्या रासामधीळ छत्तीस रजपूत कुलांच्या यादींत त्यांचा निराळा उल्लेख आहे.

यांच्यानंतरचं महत्त्वाचें मांडलिक घराणें म्हणजे अबूचे परमार होत. परमार मूळचे अबूचेच असावेत. कारण ह्यांच्या उत्पत्तीच्या कथेत पहिला परमार अबूपर्वतावर वसिष्ठाच्या अभ्निकुंडांतून उत्पन झाला असें सांगितठें आहे. अबूचा पहिला प्रसिद्ध राजा धूमराज होय.पण आपल्या कालविभागाच्या काळाच्या आरंभीं जो परमार राजा होता त्याचा प्रधान देवल यानें देलवाडा येथे इ. स. १०२३ त आदिनाथाचें सुंदर देवालय बांधल्याचा दाखला सांपडतो. त्याचा पुत्र पूर्णपाळ हा गुजराथच्या भीमाचा सामंत असून इ.स. १०४५त राज्य करीत होता.याचा पुत्र धुवमट आणि त्याचा पुत्र रामदेव यांचा उल्लेख अबू पर्वेतावरील तेजपाल-वस्तुपाल यांच्या प्रशस्तीत आहे. | रामपालाच्या नंतर ल्याचा पुत्र विक्रमसिंह राजा झाला. कुमारपा- लाचा अर्णोराजाशीं जो युद्धप्रसंग झाला, त्यांत विक्रमसिंह अणॉ- | राजाच्या बाजूस जाऊन मिळाला, तेव्हां कुमारपालानें अबूर्चे मांड- लिक राज्य त्याचा पुतण्या यशोधवल यास दिलें. याचा पुत्र प्रसिद्ध वीर धारावर्ष हा होता. हा महमद घोरीशीं झालेल्या युद्धांत गुजरा- थसंनेचा आधिर्पाते होता. हे युद्ध इ. स. ११७८ मध्यें झालं र - त्यांत घोरीचा पराभत्र झाला, असे मुसल्मान इतिहासकारांनींहि . लिहिलें आहे. चालुक्यांच्या प्रकरणांत सांगितठेंच आहे कीं, यावेळीं ।, गुजराथचा राजा मूळराज अल्पवयी होता. कुतुबुददीनाशी इ. स. , ११९७ त झालेल्या युद्धांत गुजराथ सेनेच्या अधिपतींपेक्रो एक

उत्तर हिंदुस्थानांतील महत्वाची मांडालिक घराणी. ४४७

घारावर्षच होता. या युद्धांत त्याचा पराभव झाला. याच्या वेळचे अनेक लेख इ. स. ११६३ पासून इ. स. १२०८ पर्यंत मिळाले आहेत ( गोरीशंकराचा टॉड पा. ३८४ ). रासामध्यें अबूचे राजे जता आणि सलख दिले आहेत हे गोरीदकराच्या मतें काल्पनिक आहेत. परंतु धारावर्षाचे हे बंधु असतील आणि ते धाकटे अस- ल्यानें पुथ्विराजाकडे जाऊन त्याचे सरदार बनले असतील.

नडूलचे चव्हाण हें एक पराक्रमी मांडालिक घराणें असून त्याचा येथें उळेख केला पाहिजे. सांबरच्या चव्हाणांची ही एक शाखा होती. पहिला राजा लक्ष्मण हा वाक्‍्पाति राजाचा पूर्वी सांगितल्या- प्रमाणे धाकटा भाऊ होता (भा. २ पा, १५१ ). याचे वंशज नडूल येथे राज्य करीत होते. आणि ते गुजराथच्या चाटक्यांचे मांडलिक असून त्यांच्या तके नेहमीं लढत. उदाहरणार्थ, एक राजा आसराज कुमारपाळाचा सेनापाति म्हणून माळव्याशीं लढला. हा एक प्रतापी राजा असून अनेक तलाव व देवळें त्यानें बांधडीं व विद्वानांस आश्रय दिला. याचा धाकटा बंधु माणिकराय याजपासून हल्लीचे बुंदीकोट्याचे प्रसिद्ध घराणें उत्पन झालें आहे ( गौरींशकरचा टॉड पा. ४०८ ). याचा पुत्र अल्हण आणि पोत्र कल्हण यांचे दोन ठेख संवत्‌ १२०९ व १२३४ म्हणज ११५२-११६७ इसवीचे सांपडळे आहेत.कल्हणाचा धाकटा भाऊ हाहि एक प्रसिद्ध राजा झाला. अबूजवळ झालेल्या शिहाबुद्दीन घोरी याच्या पराभ- वाच्या लढाइत हा हिंदुसैन्यांत होता. जालोर व इतर किल्ले याच्या ताब्यांत होते. जेव्हां अछाउर्दानानें जालोरवर स्वारी केळी ब अल- तमशानें मंडावर वर स्वारी केली, त्यावेळीं ह्या मुसलमानाशीं लढठा गोरीशंकरच्या मते शोवटचा राजा कन्हडदेव याच्या वेळीं जालोखर अहाउर्द्वनानें स्वारी केली ( टॉड पा ४० ).

शेवटचे दोन महत्त्वाचे उत्तर हिंदुस्थानांतील रजपूत येथें नमूद

४४८ तिसरा हिंदु राज्ये.

करण्यासारखे म्हणजे ग्वालेरचे कच्छपघात व दिर््ठांचे तोमर हे होत. यांपासूनच हल्लींच प्रसिद्ध रजपूत कच्छवा आणि तवर हे उत्पन्न झाळे आहेत. कच्छपघात कुलाचे अनेक लेख सांपडले आहित. त्यांत ग्वाळेर किल्यावर्राल प्रसिद्ध सासबहू मंदिरांतील ठेख आणि ग्वाठेर संस्थानांतील ग्वाठेरपासून नैक्र्रत्येस ७६ मैलांवर असलेले दुभकुंड येथील जैन देवाल्यांतील शिलालेख मुख्य आहेत. त्यावरून कच्छपघातांची पुढील हकीकत आम्ही देतों. गोरीशंकरचा टॉड व किल्हॉनेच्या वंशावळी (ए. इ, ८) याहि आधारास घेतल्या आहेत. या कच्छपघातांचें राज्य ग्वाल्हेर संस्थानांतील नरवर जिल्ह्यांत प्रारंभी होतें. महाभारतांत प्रसिद्ध असलेल्या नळ’चा निषध देश हाच होय; आणि भवभूतीचा माठतीमाधवांतीळ सिंधुपारासंगम येथेंच आहे. या राजघराण्याचा एक राजा वज्रदामन्‌ यानं ग्वाले- रचा किछा कनोाजच्या प्रतिह्ारांच्या साम्राज्याच्या पडत्या काळांत बळकाविला. याचें राज्य ग्वाळेरीस इ. स. ९७७च्या सुमारें होतें ( जे. आर. ए. एत. बंगाळ ३१ पा. ३१९३ ). या लेखांत त्यास महाराजाधिराज म्हटलें आहे, यावरून तो बहुधा स्वतंत्र असावा. परंतु ढोकरच व्यास बुंदेळखडाच्या चेदेलांचे अधिराज्य कबूल करणें भाग पडलें असावें. अर्थात्‌ अट्ब्नेरूनीने चेंदेलांच्या राज्यांत दोन मजबूत किल्ले ग्वाठेर व कालंजर सांगितळे आहेत तें योग्यच आहे. वज्रदामन्‌ याचा पुत्र मंगलराज याच्या धाकटया र. पासून अलवर आणि जयपूर येथील हल्लींचीं कछवाहृ रजपूत ण ी | घराणीं उत्पन्न झालीं असें मानतात. खालेर्रास मंगळराजाचा री कौर्तिराज गार्दावर बसला. यानें माळव्याचा पराभव केला असे वर्णन आहे, म्हणजे भोजाचा त्यानें पराभव केळा असावा. गझनीच्या मह- मुदाने कीतिराजाच्या वेळीं ग्वाळेरीवर स्वारी केली असावी. आणि | कौर्तिराजानें आपल्या राज्याचा बचाव ल्यास तीस हत्ती देऊन आणि

उत्तर हिंदुस्थानांतील महत्त्वाची मांडलिक घराणीं. ४४९

त्याचें नांवाला मांडलिकत्व कबूल करून शहाणपणाने केला.याचा पुत्र मूलदेव यासच त्रेळोक्यमछ आणि भुवनमछृ अशीं नांबें होतीं. याचा पुत्र देवेपाळ ऊर्फ अपराजेत आणि त्याचा पुत्र पद्मपाळ. याचा पुतण्या महीपाळ ऊर्फ भुवनैकमछु. यानें इ. स. १०९३त वर उल्ले- खिळेळा सासमहूचा लेख लिहविला (इं. ए. १५ पा, ३६ ). बरील सव हकीकत या लेखांत दिली आहे. कौर्तिराजाने पावती- पतीचे देऊळ सिंहमन नगरांत बांधळें असें यांत आणखी सांगि- तळें आहे. ग्वालेर किल्यावरीळ सासबहू मंदिरांतील हा लेख ( ११५० संवत्‌ ) लिहण्यापूर्वी थोडाच काळ महापाळ गादीवर आला होता. हं विष्णूचे मॉंदेर आहे; आणि तें पक्मपालानें सुरू केळें असल्धामुळें या देवास पद्मनाथ असं नांव दिळें आहे. या राजाच्या वेळेपासून कच्छतवाह वैष्णव झालेळे दिसतात. ह त्यांचे लक्षण अद्याप कायम आहे. वर सांगितलेळें या देवळाचें सासबहु ह नांव कसे पडळं याविषयीं बराच गैरसमज आहे. आमच्या मतें याचा अथ मोठें ब लहान देऊळ एवढाच आहे. खालियार गझे- टियरमध्यें हा शब्द सहसत्रबाहूवरून व्युत्पादिण्याचा प्रयत्न केला आहे. पण सह्तब्राहु हें नांव शिवाचे किंवा विष्णूचे प्रसिद्ध नाहीं. यामुळें ही व्युत्पात्ते बरोबर दिसत नाहीं. सासबहूचे धाकटें देवालय मोठ्या देवाल्यासारखेंच असून तें इ. स. ११०८मध्ये बांधळें गेळें (इं. एं. १६ पा. २०१ ).

मह्दीपालानंतर गौरीदंकरानं पुढील राजे मिल्यांसह दिळे आहेत( टॉड पा.३७३);पुत्र त्रिभूवनपाल ऊर्फ मधुसूदनपाळ (ग्वाळेर गॅझेटियर), इ. स.११०१४; त्याचा पुत्रविजयपाल इ. स. ११३३; त्याचा पुत्र शूर- पाल इ. स. ११५५ आणि युवराज अनंगपाल,याचा पुढचा राजा शहा- बुद्दीननं इ.स. १ १९६त खालेर किल्ल्याला वेढा दिला त्यावेळीं तेथें अस- लेला सोळेखपाळ असावा. परंतु ग्वाठेर गेझेटियरमध्ये असे सांगि-

४५० तिसरी हिदु राज्य

तळें आहे कीं, इ, स. ११२९तच परिहारानी कच्छवराहापासून ग्वाटेरचा किल्ला घेतला, हें खरे असेल तर हा सोलंखपाळ परिहार ठरतो. हा किल्ला शेवटीं कुतुबुद्दीनच्या स्वाधीन झाला असे दिसतें. पण श्रीमन्त बळवंतराव भय्यासाहेब रिंदे यानीं प्रसिद्ध केलेल्या खा- ठेरनाम्यांत असें सांगितलें आहे को, तो किल्ला परिहारानीं पुनः घेतला; आणि अल्तमशानें तो पुढें सांगितल्याप्रमाणें परत घेतला. मुसलमानांची नवी राजधानी दिल्ली जवळ आहे अत्तें वाटून कच्छ- पघातांनीं तो किला सोडुन दूर प्रयाण केलें असावें किंवा ते नर- वरला परत गेले असावे. |

ग्वालेरच्या नैक्रत्येस ७६ मैलांवर असलेल्या दुभकुंडास या घराण्याची एक शाखा राज्य करीत होती, तिचे दोन ठेख सांपडले आहेत (इं. ए, १४ पा. १०) आणि (ए. इं. पा. २९३ या लेखांत फार मनोरंजक माहिती मिळते. यांत सांगितलेला पहिला राजा युवराज होय; आणि याचा पुत्र अजुन. यानें राज्यपाल कनो- जचा प्रतिहार राजा यास बाणांनीं ठार केठें.चंदेछ राजा गंड व त्याचा मदतगार ग्वालेरचा कच्छपघात राजा कौतिराज यांच्या नेतृत्वाखाटीं रजपूत संयुक्त सैन्यानें राज्यपालावर स्वारी केली व्यावळेस ही गोष्ट झाली असल्याचें वर्णन पूर्वी आठेंच आहे. याचा पुत्र अभिमन्यु याचें घोड्यावर बसण्यांत व शस्त्रास्न॑ चालविण्यांत विलक्षण कोशल्य

माळव्याच्या भोजानं प्रशंसिळें अर्ते वर्णन आहे.* याचा पुत्र विजयपाल ह्याची मिति इ. स. १०४४ आणि ल्याचा पुत्र विक्रम-

४” “3

सिंह याची मिति १०८८ निश्चित आहे. हें राजघराणें ग्ाटेरच्या

  • य॒स्यात्यद्वुतवाहवाहनमहारास्त्रप्रयोगादिषु । प्राबीण्यं प्रविकत्थितं एथुमतिश्रीभोजपृथ्वीभुजा ॥दुभकुंड ले. इं ए. ३.

उत्तर हिंदुस्थानांतील महत्त्वाची मांडालिक घगाणीं. ४५१

घराण्याचें मांडलिक असावें ग्वालेरचे राजे मात्र चंदेछांचे जरी नांवाला मांडलिक होते, तरी ते वस्तुस्थितींत स्वतंत्रच होते.

या कुलाचें नांव ‘कच्छपाघात’ लेखांत ‘कच्छपारि’ असेंहि आढळतें. कच्छपघात राब्दावरूनच प्राकृत भाषेच्या नियमानुसार कच्छवाह ह ह्लींचे नांव निघतें. कुठांची नांवें निरनिराळ्या प्रकारानें उत्पन्न होतात हं आम्ही पूर्वी सांगितलेंच आहे; आणि कच्छपघात नांव कसें निघाले हें समजणे दुर्घट आहे. याची व्युत्पात्ते कांहीं असलीं तरी कच्छवाह कुल उत्तम रजपूत कुठांत नेहमींच गणलं गेळें आहे; आणि चंदाच्या छत्तीस राजकुलांच्या यादींत त्यांचे नांव पाहिळें आहे गाहडवालांच्या उदयापूर्वी यांचा उदय असल्यानें गाहडवालांच्या वेळीं जी यादी पहिली बनली त्यांत यांचें नांव प्रथमच येणे साह- जिकच होतें. कारण कनोजच्या नीतिभ्रष्ट झालेल्या प्रतिहार राजास शासन करण्यास निघालेल्या संयुक्त रजपूत सेन्याचें आधि- पब्य कच्छपघातांकडेच होतें.

शेवटीं आपल्यास तुवरांचा इतिहास द्यावयास पाहिजे. जसें कच्छपघात शब्दावरून कच्छवाह हें हछींचें नांव सहज निघतें तसं शिलालेखांत आलेलें तोमर नांब यावरून तुवर हें नांव सरळ निघतें. अनंगपाल तोमरानें नवव्या शतक्रांत दिछी शहर वसविले असें मानतात. पण अल॒बेरूनीच्या वेळीं हें शहर महत्त्वाचे नव्हते; आणि प्रतिहारांच्या सत्तेखाटीं असलेलीं दिल्लीची मांडलिकी त्यावेळी क्षछक असावी. हे तोमर प्राचीन दिछी म्हणजे इंद्रप्रस्थ प्रथम स्थापणारे पांडव यांचे सरळ वंशज आहेत असें मानतात. कुतुबु- द्दीनाच्या वेळीं दिछीजवळ इंद्रपत नांवाचें खेडें होतं, हें तत्कालीन इतिहास,,ताज-उल्‌-मासर्‌ यावरून स्पष्ट आहे (इडियट २पा, २१०). तोमरांचें नांव पूर्वी सांगितल्याप्रमाणं चव्हाणांच्या लेखांत आलेलें आहे, त्यांचे हे शेजारी आणि अथात्‌ सहजशात्रु होते. अद्यापपर्यंत तोमरांचें

४५२ तिसरी हिंदु राज्य.

स्वतःचे लेख सांपडले नाहींत. परंतु इतरांच्या लेखांत त्यांच्या दिल्ली येथील राज्याचा उलेख मिळतो, त्यावरून आणि दिल्ली गॅझेटियर- वरून त्यांचा त्रोटक इातहास आम्हीं पुढे देतो.

दिल्ली येथाळ प्रसिद्ध लोहस्तंभ म्थुरेहून उपट्टन आणून जुन्या दिछ्लोजवळ अनंगपाळ दुसरा यानें इ. स. १०५२ मध्यें उभा केला असें या स्तंभावर्राल लेखांत म्हटलं आहे. ( निदान १५०० वर्षे हा स्तंभ उन्हापावतांत असून बिलकुल गंजला नाहीं व त्यावरील अक्षरें अद्याप स्पष्ट आहेत.). हा राजा कनोजच्या तम्राटांची सत्त! महमुदानें तोडल्यामुळे प्रबळ झाला. अनंगपालाच्या वंशानें दिली व त्या भोंबताळचा प्रदेश यावर सुमारे एक शतक राज्य केल्यावर त्यास वीसलदेव ऊर्फ विग्रहराज तिसरा चाहमान, प्रसिद्ध प्रथ्वीराजाचा चुलता, यानें इ. स. ११५२च्या सुमारें जिंकले. तेव्हांपासन दिल्ली चाहमानांच्या सत्तेखाठीं आली. रासामध्ये जी कथा दिली आहे कीं तोमरांचा शावटचा राजा अनंगपाळ तिसरा निपुत्रेक होता, त्यानें आपल्या मुलीचा मुलगा पृथ्वीराज यास राज्य देऊन बदरिकाश्रमास स्वतः प्रयाण केलें ती कथा काल्पनिक आहे. कारण प्रथ्वीराजाची आई तोमर कुलांतील नसून चेदीकुलांतील- होती, किंबहुना रासांतील बहुतेक हकीकत काल्!निक आहे. यामुळं त्यांत सांगितलेल्या अनेक गोष्टी ऐतिह्यासिक मानण्यास मोठी अडचण आहे, दिल्ली गझे- टियरमध्यें असें सांगितठें आहे कीं, ठालकोटचा किल्ला ( हा अद्याप दिसतो ) प्रथम अनंतपाल दुसरा यानें बांधला. आणि पृथ्वीराजानें दिल्लीच्या पुराण्या शहराची बाहेरची भिंत बांधली. ती अद्यापहि | दाखावितां येते. जेव्हां कुतुबुददीननें हृछा करून शहर घेतलें तेव्हां ही भिंत आणि हा किल्ला कायम होता,आणि तो घेणें अशक्य दिसत होते.

“ दिल्लीचा ‘ गोबिंदराय मुसलमानी इतिहासकारांनी सांगितला असून त्यानें पहिल्या लढाईत शहाबुद्दीन घोर्राला पकडले असें वर्णन

उत्तर हिंदुस्थानांताल महत्त्वाची मांडालिक घराणीं. ४५२३

आहे; आणि दुसऱ्या लढाईत तो मारला गेला. हा चौडाण होता किंवा तुवर होता हें सांगतां येत नाहीं. या लढाइनंतर तुंबर चोही- कडे पसरले. पण त्यांचा मुख्य भाग चेबलच्या अलीकडे हल्लीच्या ग्वालेरच्या संस्थानांत बसला यामुळें या भागास तवरघार असें म्हणतात. महाराष्ट्रांतहि तवर आले असून माने वगेरे घराणी तवर मानलीं जातात.

जनरल कनिंगहंम यानें अबुलफजलनं दिलेल्या हकीकतीवरून आणि भाटांच्या लेखांवरून तवरांची वंशावळ दिली आहे; आणि ती गौरी शकरनें पा. ३४८ वर ( टॉड ) उतरून घेतली आहे. परंतु तिच्या पुराव्याला कोरीव लेखांचा आधार मिळत नाहीं. दिल्लीचा लाळकोट किछा बांधणारा अनंगपाल दुसरा याची तांब्याची नाणीं मिळाठी आहेत ( १०५१ इसवी ). तोमरांनीं दिल्ली वसविली, तिच्या भोवतालचा मुलुख हरियान याजवर प्रथम तोमरांचे राज्य असून नंतर चोहानांचें होतें, या गोष्टी संवत्‌ १३८४ म्हणजे इ.स. १३२७ चा एका विहिरींत रिलाठेख सांपडला आहे त्यावरून सिद्ध होतात. चोहानांचे तीन राजे थेथे झाले, वीसलदेव, सोमेश्वर आणि प्रथ्विराज ( दिल्ली म्युझियम शिलालेख इं. ए. पा. २१८) टिप्पणी–कच्छपघातांच्या उत्पत्तीविषयीं हरप्रसादशास्त्री

यांचं चुकीर्चे मत.

या भागांत एका प्रसिद्ध हिंदुस्थानच्या पंडिताचे चुकीचं मत आम्हांस खोडावें लागत आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मागील भागांत चंदे- हांच्या उत्पत्तीविषयीं चुकीचं सर व्हिन्सेन्ट स्मिथ या युरोपियन पंडिताचे मत आम्हांस खोडावं लागलं होतं.भाटांच्या ख्यातांच्या संशोधनाबद्दलचा

*देशो5स्ति हरियानाख्यः प्राथ्वव्यां स्व।संनिभः ढि।लिकाख्य| पुरी तत्र तोमरेरास्त निर्मिता ॥ तोमरानन्तरं तस्या राज्यं निहतकटकम्‌ | चाहमाना नृंपाश्नक्कुः प्रजापलनतत्पराः |

(44

४५४ तिसरी हिंदु राज्ये

रिपोर्ट (इ. स. १९१६) करितांना महामहोपाध्याय हरप्रसादशास्त्री छिहितातः “ कच्छवाह आपली उत्पत्ति रामाचा पुत्र कुश यापासून मानतात. आणि ते असे म्हणतात कां आम्ही नरवर्हन आलों. नरवर

हा निषादांचा देश आहे. येथ प्राचीन काळीं कच्छपघात वंशाचे लोक

्ं

होते. इल्लरीचे कच्छवा हे त्यांचे प्रतिनिधि असून अःपृरय आहेत. तेव्हां

त्यांचे हे राजे केव्हां तरी क्षात्रिय झाले. ” यासारखा वेडसर लेख आम्ही आजपर्यंत पाहिला नाहीं. असली विलक्षण तकंबाह्य अनुमानें काढण्यास पंडितांनांहि मोह व्हावा ही दुःखाची गोष्ट आहे. बहुतेक 1: 213 रष १ यल य ड

युरोपियन पंडितांचा व थोड्याशा एतेददशीय पंडितांचा एक दग्रह असा आहे का, क्षत्रिय जाति अस्पृदयादि मूळच्या रहिवाशांपासन किंबा बाहे- रच्य़ा म्लेच्छांपासून उत्पन्न झाल्या हं आम्ही पूर्वी सांगितलंच आहे किर्‍येक़ तकंरहित वेडसर अनुमाने या दुग्रहामुळें कशीं निघतात याचें हँ फारच लक्ष्यांत राहण्यासारखें उदाहरण आहे

पाहिळी गोष्ट अशी कीं, नरवर हा निषादांचा देश नाहीं. याचें खरें नांव निषघ हे आहे. या निषधांचा राजा नेषघ नल येथे राज्य कर्गत: होता. दुसरी गोष्ट नरवराच्या भोवती कच्छवा नांबाचे कांही अस्पृदय लोक आहेत यावरून असें अनुमान निघू शकत नाहीं कीं ते पूर्वीच्या कच्छपघातांचे हल्लीचे प्रातानाचि आहेत. कारण नरवर जिल्ह्यांत राहणारे एकटे कच्छवाच लोक नाहींत; आण ‘ कच्छ्राहा ‘ हा शब्द “* कच्छ- वाहून भिन्न आहे. शिवाय कच्छवबा लोक येथे पुष्कळ असले तरी त्यांचे राज हेहि कछवाच असले पाहिजेत असा तक करतां येत नाही. ही अनुमानदोषापी तऱ्हा नेहर्मांच्या प्रकारची आहे. याच दोषी रीतीनें व्हिन्सेंट स्मिथ यानें चंदेल गोंड लोकांत राज्य कारितात म्हणून स्वतः गोंड आहेत असें अनुमान काढलें. वस्तुतः हिंदुस्थानच्या इतिहासाचा नेहमींचा क्रम असा आहे कीं,रजपूत वीर आपल्या जन्मभूमातून म्हणजे मध्य देशांतून निघून दूर मिल़-गोडांच्या मुलखांत जाऊन राज्ये स्थापन करितात. याच प्रकाराने बाप्पा रावळानें मिल्लांच्या मुलखांत जाऊन

राज्य स्थापन केलें. पण तेवढ्याने बाप्पा रावळ स्वतः मिलछ़ होता असे

वटे

ठरत नाही. ब्रिटिश लोकांनीं बंगाल्यांत राज्य स्थापन केलें म्हणून ब्रिटिश

उत्तर हिंदुस्थानांतील महत्त्वाची मांडालिक घराणीं. ४५५

बंगाली होऊं शकत नाहींत. तेव्हां कच्छवाहा हलींच्या अस्पृरश्‍य अस- लेल्या कच्छवांच्या देशांत राज्य कर्रत होते म्हणून ते प्रारंभी स्वतःच कच्छवा होतें अथच ठरवितां येणार नाही.

तिसरी गोष्ट ही कौ, कच्छवा आणि कच्छवाहा हे शब्द एकच मानले तरी हे दोन्ही लोक एकच जातीचे आहेत असें अनुमान काढ- ण्यापूवीहि आपल्यास थोडेसें थांबले पाहिजे. कच्छवाहा रजपूतानी तें नांव देशांवरून घेतले असेल, दुसऱ्या भागांत आम्ही दाखावलें आहे कीं, गुजर प्रतिहार हें नांव प्रतिहारानीं ते गुजरांच्या देशांत राज्य करीत होते म्हणून घेतलें. ते स्वतः गुजर नव्हते हे आम्ही दाखविलळेंच आहे. कदाचित्‌ उलट कच्छवांनी आपलें नांब आपल्या राज्यकत्योपासून घेतले असेल, वरिष्ठ जातीचं नांव खालच्या अस्पृदय जातीनं घेतल्याची कित्येक उदाहरणें दाखवितां येतील, उदाहरणार्थ चांमारांत चोहाण वगैरे नावें आहेत. माळव्याच्या सोंदिया लोकांतहि चोहाण, परमार वगेरे नावें आहेत, तेव्हां क्षात्रिय जातीचें नांव ब दुसऱ्या एका जाताचें नांव एकच असलें तरी क्षलरिय जात त्याच वंशाची आहे असें अनुमान काढण्यापूर्वी थोडेसे थांबलं पाहिजे, आणि कच्छपघात क्षात्रिय तर प्राचीन काळ।पा- सून उत्तम रजपूत मानले गेळे आहेत; चंदाच्या छत्तीस राजकुलांच्या यादींत त्यांचे नांव पहिलें आहे; तेव्हां कच्छवाहाविषयीं असं अनुमान काढणें गैर आहे. हिंदुस्थानांत जातिभेद पहिल्यापासून फार जोराचा आहे, यामुळें अस्पृरपांचे अस्पृदय राजे वरिष्ठ दर्जाचे क्षत्रिय होऊं शकत नाहींत. निदान त्यांनीं धमांच्या बाबतींत कांहीं तरी विलक्षण पराक्रम करावयास पाहिजे होता; परंतु या अस्पृद्यांच्या कल्पित राजानीं कांहीं पराक्रम केळे असल्याचा कोठेच ठाव ठिकाण लागत नाही. तेव्हां अश्या प्रासद्ध रजपूत कुलावर हा केलेला आरोप आश्चयेजनक आहे.

सवात आश्चर्याची गोष्ट ही की, या सर्व तकांचा जो पाया त्याचा पत्ताच नाहीं असें चोकशी अंती कळलें. खालेर संस्थानांतील नरवर येथील मुलकी अधिकारी रा. भालेराव यांचेकडे चौकशीकारितां नरवरांत किवा नरवराच्या भोवती कच्छवा नांवाची कोणी अस्पृइय़ जात नसल्याचे आम्हांस कळलें आहे.

४५९ तिसरा हिंदु राज्ये.

शेवटीं हें सांगावयास पाहिजे की, कच्छपघात या शब्दावरून कच्छ- वाह ह्या शब्द प्राकृताच्या नियमाप्रमाणे योग्य रीतीनें निघतो. हा शब्द किवा त्याचा सभानार्थक शब्द कच्छपारि हा लेखांत आलेला असून त्याजवरून अश्ली कल्पना करणें साहजिक आहे कीं, हे कच्छबाहा रजपूत या कल्पित अस्पृश्‍य़ कच्छवांचे शत्रु होते आणि ते स्वतः कच्छवा नव्हते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे कच्छपघात नांव कसं निघाले हं आम्हांस सांगतां येत नाहीं. तरी नरवरजभळ कच्छवा नांवाचे कांही अस्पृद्य लोक आहेत ( ही गोष्ट वरप्रमाणें खोटी ठरली आहे) असे मानूर्नाहे या नांवाची

व्युत्पत्ति सहज लागते, कच्छवा लोकांस मारून यांनी येथे राज्य केळे

म्हणून त्यास कच्छपघ्रात नांव मिळाळं असें सरळ अनुमान निघत सतां हरप्रशाद उलटे अनुमान ते स्वतः कच्छबा आहेत असे काढतात

अ हें आश्चर्य नव्हे काय १

2५०५ करक…

प्रकरण सतरावे. हिमालयांताल राज्यें,

या कालविभागांतील हिमाल्यांतील राज्यांचा इतिहास देणें बाकी आहे. हीं राज्यें म्हणजे मुख्यतः कारमीर व नेपाळ, आणि चंपा नुरपर, कांगडा, मंडी, सुकत वगेरे होत. नेपाळचा इतिहास जितका ठाऊक आहे तितक्रा हिंदुकालाच्या रहोवटपर्यंतचा आम्ही पूर्वी दिळेलाच आहे.या भागाच्या कालविभागांत म्हणजे इ.स. १०००पासून १२०० पर्यंत या राज्यांचा इतिहास जो येतो तो आम्ही थोडक्यांत पुनः येथे सांगतों. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या संशोधनावरून विदोषतः पंजाब हिस्टॉरिकळ सोसायटीच्या लेखावरून कित्येक गोष्टी नवीन किंवा दुरु्स्ताच्या आणखी येथे देतां येतील.

१ काझमीर.

या कालाविभागाच्या प्रारंभीं कारमीरच्या राज्यावर लोहरवंश होता. कुप्रासिद्ध दिद्दा राणा मेल्यावर हा वंश आला. ती लोहरच्या एका राजाची मुलगी आणि काबूलच्या भीमशहाची नात होती. आपले पुत्र व पोत्र यांची पालक या नात्यानें व पुढें स्वतःच्या अधिकाराने पुष्कळ वर्षे राज्य केल्यावर ती इ. स. १००३ मध्यें मेली. तेव्हां तिच्या भावाचा पुत्र तिच्या आज्ञेने कारमीरच्या गादीवर आला. त्या- चाच वंश या सर्व कालविभागांत राज्य करीत होता. या वंशाचे सवे राजे लायक असल्यामुळें मुसलमानी विजयाच्या लाटेंतून कार्मीरचें राज्य बचावलें. या लाटेनें महमुदाच्या वेळीं पंजाब बुडविळें आणि नंतर शहाबुद्दीन घोरीच्या वेळीं सबंध उत्तर हिंदुस्थान बुडविले. लोहरवंशाचा इतिहासं राजतरॉगेणीवरून इ.स. १ १४३पर्यंत प्रथमभा- गांत दिलाच आहे. कल्हणचा इतिहास या सालापर्यंतच आहे.पुढील

४५८ तिसरी हिंदु राज्ये.

इतिहास जानराजाचा पीराशाष्ट ग्रंथ आहे त्यावरून देतां येईल.पहिल्या भागांत ( पा. २२७-२३२ ) दिलेळा इतिहास प्रथम थोडक्यांत आणखी कांहीं माहितीसह देऊ

स्व वंशस्थापकांप्रमाणेंच संप्रामराज शहाणा आणि समर्थ राजा होता. त्याने इ. स. १००३ पासन इ. स. १०२९ पर्यंत राज्य केळे. या भागांत पूर्वी दाखविळेंच आहे को, महमुदाने कारमीरचा सरहद्दी किल्ला घेण्याचा प्रयत्न दोनदां केला पण तो दोन्ही वेळां फसला. कार्मीर एक मोहोरबंद राज्य होतं. त्याची मोहोर महमदात तोडतां आली नाहीं. कारमीराचा बचाव त्याच्या टळध्य पवेतापुळें झाला असें जं स्मिथनें म्हटलें आहे तें बरोबर आहे. पण काइमी- । रचा पराभव झाला असं दिसत नाही. तथापे भा. १ पा. २२८ । वर आम्हीं ज॑ विधान केलें आहे कौ, संग्रामाच्या वेळेस क!रमीरवर स्वारी झालीच नाहीं तें थोडेसें बदळून असं विधान करणें जरूर आहे कीं, काइमीरावर दोनदां स्त्रारी झाली, परंतु महमुदास कारमी- रांत शिरतां आलें नाहीं. शाह्दी राजा त्रिलोचनपाळ यानें संग्रामानं पाठविठेल्या काइमीरच्या फौजच्या मदतीनें जी लढाई इ. स. १०२१

केली,तींत त्याचा पराभव झाला हं आम्ही या भागांत व भा.१पा २२७ वर वर्णन केलेंच आहे.यापुढें त्रिलोचनपाळ एका ठिकाणाहून दुसरीकडे असा पळत राहिला. त्याचा पुत्र भीम याचा ग्ृत्यु इ. स. १०२७ त झाला, परंतु त्याचे दुसरे मुलगे किंवा पुतणे रुद्रपाळ वगेरे कार्मीरांतच संग्रामाच्या संरक्षणाखालीं तो त्यांचा संबधी असल्यामुळें राहैळे. |

हे शाही राजपुत्र संग्रामाचा पुत्र व उत्तराधिकारी अनंतराज (१०२९ ते १०३९ ) याच्या फार उपयोगी पडले. याच्या कार- कीदींत काइमीरच्या एक राजद्रोही सरदाराने कारमीखर तुकांची स्वारी आणली व तीस दरदानीं मदत केली. पण शाही राजपु-

हिमालयांतील राज्ये. ४५१९

न्रांच्या पराक्रमाने व खुद्द अनंतराजाच्या विक्रमानें या भयंकर सैन्याचा पूर्ण पराभव झाला आणि काइमीर मुसलमानांच्या सत्तेपासून तीनशे वर्षे बचावळें. या लढाईचे वर्णन भा. १ पा. २२८ वर आम्ही केळेंच आहे. अनंतराज आणि त्याची राणी सूर्यमती एका विगत राजाची कन्या हें जोडपे फारच धार्मिक होतें. त्यांनीं बरींच वर्षे न्यायानें व पराक्रमाने राज्य केलें. म्हातारपणी त्यानीं वनवास पत्क- रून पुत्र कलश यास गादीवर बसातरिठें. पण या पुत्नानं त्यांचे फार- हाल केले. त्या दु:खाने अनंत मेळा आणि त्याची राणी सूर्यमती सती गेली. इतर बाबतींत कलश॒ चांगला राजा निघाला. त्याचा पुत्र हषे यानें बंड केले, पण तो पराभव पावून कैदेंत पडला.कलश इ. स. १०७३ त मेला. तेव्हां त्याचा दुसरा पुत्र उत्कर्ष गादीवर बसला. परंतु लोकांचें प्रेम हर्षावर होतें. कारण त्यावेळच्या सर्व राजामध्यें हर्ष मोठा गुणवान्‌ होता. तो स्वतः विद्वान, संगीताचा भाक्ता आगे विद्वानांचा चहाता होता. किंवहुना त्याची तुलना त्याच्याच नांवाचा कनोजचा हषे अथवा माळव्याचा भोज याशीं करितां येईल. पण दोघांच्या अगदीं विरुद्ध त्याचा अत अत्येत दुदैवी झाला. त्याच्या तर्फे त्याचा दुसरा भाऊ विजयमछु यानें उत्कर्षावि- रुद्ध बंड केलें. त्यांत उत्कर्षाचा पराभव होऊन तो लढाईंत इ. स. ११८९ त मारला गेला. विजयमल्लानें हर्षास कैदेंतून काढून गादी- बर बसाविलें व त्यानें इ. स. १०८९ ते ११०१ पर्यंत राज्य केलें. निजयमलछञानें कित्येक निःरइंक सह्लागरांच्या नादी लागून शेवटीं हर्षाविरुद्धहि बंड केलें. पण त्यास त्यांत जय आला नाहीं. हर्षाने यानंतर त्याच्या साथीदारावर निर्दयतेनें जुळूम चालविला आणि ल्या- मुळें अदाधुंदी आणे जुळूम इतका माजला कीं, चुलत घराण्यांतील एक राजपुत्र उच्चळ यानें एका बंडांत पुढाकार घेतला, हर्षाचा परा- भव होऊन राजधानी उच्चलाच्या कबजांत आली, हर्षाच्या राण्यांनीं

४६० तिसरी हिंदु राज्ये.

राजवाड्यांत आपणांस जाळून घेतलें आणि हर्षानें स्वतः एका मठांत आश्रय घेतळा.त्याचा पुत्र भोज काऱ्मीरांतून हद्दपार केला गेला होता तो त्याच्या मदतीकारितां आला. पण उच्चलाशीं झालेल्या लढा- इत तो मारला गेला, याप्रमाणें दैव चोहोकडून प्रतिकूळ झालेलें पाहून हृर्ष मठास वेढा देऊन बसलेल्या सैनिकांवर तलवार घेऊन धावला आणि मारला गेला. याप्रमाणें लोहरवंश्याची पहिली शाखा कार्मीरावर सुमारे दांभर वर्षे पराक्रमानं राज्य करून (इ. स.१००३ ते ११०१ ) उच्छिन झाली.

उच्चलानें इ. स. ११११ पर्यंत राज्य केलें. आणि त्याचा भाऊ

सुस्सल यानें इ. स. ११२८ पर्यंत राज्य केटें. कल्हणानें इ. स.

११४८ त आपली राजतरंगेणी संपविली, त्यावेळेस सुस्सठाचा ।

पुत्च जयसिंह राज्य करीत होता. हे तिन्ही राजे पराक्रमी व चांगले होते. कल्हणानें बारक्या सारक्या राजकारणाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्याकडे लक्ष देण्याचें कारण नाहीं

हा लोहरवंश रजपूत होता. अथात्‌ काऱ्मीरांत हिंदुस्थानांतील इतर सवे भागाप्रमाणें अकराव्या बाराव्या शतकांत रजपूत राजेच होते यापूर्वीचा पवेगुप्ताचा वंश वेश्‍य होता. आणि त्याच्या पूर्वीचा यशस्क- राचा वंश ब्राह्मण होता. हे दोन्ही वंश वस्तुस्थितींत क्षत्रियच मानले पाहिजेत. कारण ल्यांचा विवाहसंबंध क्षत्रिय धराण्याशीं होत असे, आणि त्यांचा आयुष्यक्रम क्षत्रियांचाच होता. लोहरराज घराणें भट्ट रजपूत होते असें सांगतात.

काऱ्मीरांतीळ डामर हे एक लढाऊ, तंटेखोर देशी लोक होते. हे

नेहमीं वंडखोरांस मदत करीत. हषराजानें या डामरांची कत्तल कर- ण्याचा हुकूम दिला होता. परंतु त्यांनीं दोन बंडखोर राजपुत्रांस मदत

देऊन शेवटीं हृषीचा जीव घेतला (पंजाब जनरल भा, २ पा. ८१).

हिमाल्यांतील राज्ये. ४६१

अर्थात्‌ उच्चलास गादी मिळाली ती सामर्थ्येवान्‌ डामरांच्या मद- तीनेंच मिळाली.

जोनराजानें आपल्या तरंगिणींत जयसिंहानंततर १२०० पर्यंत दोनतीन राजे सांगितलें आहेत. त्यांची नांवे सांगण्याची आवर्य- कता नाहीं. जयसिंह्ाने एका त्रिगर्तराजास भुसलमानाच्या विरुद्ध मदत केल्याचे वर्णन पुढें येईल,

२ नेपाळ.

हिमाल्यांतीळ दुसरे मोठें राज्य नेपाळचें होतें. त्याचा पिल्या कालविभागांतीळ इतिहास पहिल्या भागांत आम्ही दिला आहे. ( ६०० ते ८०० ). दुसऱ्या कालविभागांत (८०० ते १०००) नेपाळांत एक रजपूत राजवंश राज्य करीत होता, यानेंच नेपाळ शक इ. स. ८८५ चाळू केला तो अद्याप चाळू आहे. तिसऱ्या काळविभागांत ( इ. स. १००० ते १२०० ) हाच वंश नेपाळांत राज्य करीत असावा. ल्यास हिंदू किंवा मुसलमान इतर राजांकडून उपसर्ग झाला नाहीं. त्या वंशांतील राजासंबंधानें कांहीं विशिष्ट माहिती उपलब्ध झालेली नाहीं एवढें सांगून कारमीर व नेपाळ यांच्या दरम्यान असलेलीं कित्येक महत्त्वाची राज्यें पुढें वर्णन करूं अलीकर्डाल संशोधनांत त्याजाविषयीं बरीच माहिती मिळाली आहे.

३ चेबा. भाग २ मर्ध्ये चंबा संस्थानबद्दळ आम्ही संक्षिप्त माहिती दिलीच आहे. काऱ्मीरच्या आश्नेयीस हें संस्थान असून ते बहु- तेक काऱ्मीरच्या ताब्याखालीं असे. सूर्यवंशी आदेवर्मन्‌ यानें इ. स. ६२० च्या सुमारें येथील राजवंश स्थापिला असे कनिंग- इमनें निश्चित केलें. परंतु अलीकडील शिलालेख व ताम्रळेख यांच्या

म. भा…२०

३९२ तिसरा हिंदु राज्यं

सेशोधनावरून डॉ. व्होजेलनें जी माहिती मिळविली आणि तिच्या वरून अर्कलॉजिकल सर्व्हे रिपोट नवीन माळा भाग ३६ हिस्सा १ इ,स. १९११ यांत प्रसिद्ध झाली, आणि पंजाब हिस्टॉरिकल सोसा- यटीचे जमेल व्हा. २ यांत डॉ. हृचिन्सन यांनीं त्याचा संक्षिप्त लेख लिहिला ( पा. ७५ ते ८० ) त्यावरून असें दिसतें कीं, सूर्यवंशी मेरुवर्मन्‌ यानें गंगाकिनाऱ्यावरील कलापप्रामहून येऊन येथें ७०० इसवी सुमारें राज्य स्थापन स्थापन केलें.

हळूहळू हें राज्य रावीच्या खोऱ्यांत विस्तार पावलें. त्यावेळीं राज-

घानी ब्रह्मपूर अथवा ब्रम्होर येथें होती. याचा एक वंशज साहि- लवमनू याने हृल्लीची राजधानी चेपा स्थापिली. याचे नांव या राज्यांत सर्वतोमुखी आहे. याचा पुत्र युगाकरवर्मन्‌ याचे दोन ताम्र-

लेख सांपडळे आहेत. अद्याप सांपडलेल्या सर्व लेखांत हेच जुने आहेत या सर्व लेखांत इ. स. १३३० पूर्वी कोणतेंहि शक वर्षे दिलेलें नसून केवळ राज्यवर्ष दिलेलें असतें. इ. स. १३३०च्या ठे-

खांत प्रथम शासत्रशक ( कलियुग शक ) व ्वक्रमसंवत्‌ दिला आहे. हे लेख बहुतेक गुप्तकाठीन अक्षरांत लिहिळे आहेत. पुढील लेखांत

शारदा अक्षरें व शेवटीं नागरी अक्षरं उपयोगिलीं आहेत. अक्षरांच्या

तऱ्हेवरून वर्रीलळ दोन लेख १०व्या शतकांतळे दिसतात. राज-

तरांगेणीवरून असें समजतं कीं, क्रारमीर राजा अनंत (१०२८ते .:

१०६३ ) यानें चंपावर स्वारी करून सालवर्मन्‌ यास जिंकलें.

आसटवर्मन्‌ हा कल्शाच्या वेळीं कार्श्मारास गेला होता. याची बहीण : बप्पिका ही कल्झाची राणी होती. प्रसिद्ध दुर्देवी हर्ष हया यांचा पुत्र होता. आणि आसटानें त्यास व त्याचा पुत्च भोज यास मद-

तहि केली. आसटाचा पुत्र जासट यानें भोजाचा पुत्र भिक्षाचार

यास इ. स. ११०३मध्यें मदत केळी; परंतु तिचाहि कांहीं उप-

योंग झाला नाहीं. जासटाच्या नंतरचा राजा उदयवरमन्‌ यानें मात्र

हिमाल्यांतील राज्य. ४६३

इ. स. ११२१त सुस्सळाळ। मदत केली. कारण सुस्सलानें दोन चंपा राजकन्या विवाहिल्या होत्या. कार्मीरांतील भाऊबंदकीच्या या लढाईमुळें चंबा बहुधा स्वतंत्र झाळे ( पा. ७९ ).

यानेतरचे चेबाचे राजे इ. स. १२००पर्यंतचे झाले त्यांचीं नुसतीं नांवें आम्हीं देत नाहीं. हें राजघराणें चेबांत हल्लींहि राज्य करीत आहे हं सांगण्यासारखे आहे. या डोंगरी राज्यास मुसलमानी स्वाऱ्या करणाऱ्यानीं,गझनवी महमुदाच्या घराण्यानें किंवा महमदघोरानें किंवा त्यानंतरच्या बादशदह्वानीं, अकबरापर्यंत उपसर्ग केला नाहीं.

हवे सूर्यवंशी क्षत्रिय असून यांचे गोत्र योपनाश्व ( युवनाश्व ? ) दिलेलं आढळतें. या राज्यांत यांच्या पूर्वी आलेले कांहीं स्थानिक राजे आहेत, त्यांना राणा म्हणतात ( कोरीव लेखांत राजानक शब्द येतो ). यांच्याहि पूर्वी आलेल्या लोकांस राठी किंवा ठाकूर अशी संज्ञा आहे. हे राणाहून कमी दजीचे मानळे जातात. ( चनाल जेठा, राठी कनेठा अशी येर्थाल म्हण येथें देण्यासारखी आहे ).

ी ४ नुरपूर.

नुरपूरचे राज्य हें हिमाल्यांतील पुराणें संस्थान नाहीं. दिल्लीहून आलेल्या एका तुवर राजपुत्राने तें स्थापिले अशी नूरपूरची दंतकथा आहे. त्यानें एका पठाण सरदारास पथानकोट येथून हांकून दिलें व त्यानें डोंगरांत जाऊन नूरपूरचा किल्ला बांधला. याचें मूळचें नांव वनेर होतें; नूरपूर हें नांव नूरजहानवरून पडलें अशीं समजूत आहे. पथानकोट येथें राज्य स्थापण्याचा काळ ११ व्या शतकाचा मध्य भानळा जातो, पण ही सर्व गोष्ट असंभवनीय दिसते. कारण पंजाब यावेळीं गझनीच्या सामर्थ्ययुक्त राज्याखालीं होतें, तेव्हां रखाद्या रजपूत राजपुत्राने पथानकोट येथून पठाणांच्या फोजेस द्दाकून लावून तेथें एक राज्य स्थापिळें हें शक्‍य नाहीं. ही दन्तकथा पथानकोट पा शब्दावर भ्रांत समजुतीने रचलेली स्पष्ट दिसते. पण पथान हा

४६४ तिसरी हिंदु राज्ये.

शब्द प्रतिष्ठान यांचें प्राकुत रूप आहे, आणि आम्हांस असें वाटतं. कीं, महमुदाच्या पूर्वीचे प्रतिष्ठान असून येथें एक तोमर राजा असावा, आणि महमुदाच्या स्वाऱ्यामुळें त्यानें पयानकोट सोडून डोंगरांत जाऊन धनेर येथ राज्य स्थापिले असावें. त्यानें हल्लीं पडक्या स्थितींत असलेला नूरपूरचा किल्ला एका नदीच्या कांठावर मजबूत जागा पाहून तेथ बांधला. या भागांतील काळविभागांत हाच वंश नुरपूर येथें राज्य करीत राहिला, किंबहुना अद्याप पावेतो याच वंद्यातळे राजे येथे आहेत, पण हलींच्या राजास राज्याधिकार नाहीं या पथानेया रजपूतांचे गोत्र आत्रे आहे. याजवरून अशी शका येते कीं, हे खरोखर तोमर नसावेत. हे आपल्यास पंडीर ( पांड - वांचे वंशज ) म्हणवितात. पण पांडवांचें गोल आणि त्यांचे द्ृ्ठीचे वंशज तोमर यांर्चे गोल्ल वैयाघ्रपद्य आहे. कदाचित्‌ हे पेथानिया धनेर येर्थे आले तेव्हां नवे पुरोहित करून त्यानीं नवं गोल्ल घेतलें. असेल. पंजाब हिस्टारिकलळ सोसायटीचे जनेल व्हॉ. २ पा. १७ यांत असे सांगितळें आहे कौ, पथानकोटचे मूळचें गांव जुन्या किल्ल्याच्या पूर्वेकडील उंचवट्यावर होतें. या किल्ल्याचे ठिकाण तेथें उंच पडलेल्या ढिंगाऱ्यानें निश्चित होतें व तेथें जुनी नाणींहि. सांपडतात. यावरूनह्ि असें दिसतें की, पथानकोट हें पठाणानीं वसाविलेळें नवें शहर नसून पुराणें हाहर आहे; व ल्याचं जुनें न | प्रतिष्ठान असावें. नुरपूरच्या राजघराण्याच्या दोन वंशावळी एकमेकां- हून भिन्न मिळाल्या आहेत. कनिंगह्वमनें इ. स. १०९५ अस नूरपूर घराण्याच्या स्थापनेचा काळ दिला आहे; आणि हा संस्थाप दिल्लीच्या एका राजाचा धाकटा भाऊ जेठपाल होता अशी सम आहे. वंशावळींत जसपाळ याजवर अशी टीप दिली आहे कीं, ह्वा संस्थापकापासून पंधराव्या पिढीवर होता, व यानें अह़्ाउद्दीन खिलजी ( १२९५ते१२१५ ) यास विरोध केला. वीस वर्षार्च

चुरपूर येथील किल्ला व देवळे. 2६५

पिढी धरून ज्येष्ठपालाचा काळ इ. स. १००० सुमारें येतो. अथात्‌ हे तोमर दिल्लीहून आलेलें नाहींत असेंच दिसतें. कारण दिल्लीची या वेळेस स्थापनाहि नव्हती. तेव्हां हे पंजाबांतीलच तोमर असावेत आणि त्यानीं महमुदाच्या स्वाऱ्याच्या वेळीं पूर्वींच अस्तित्वांत असलेलें प्रतिष्ठान घेतळें असावें व तेथून ते पुढें नुरपूर येथे डोंगरांत गेळे असावे. टिप्पणी–नुरपूर येथील किल्ला व देवळें.

घनेर अथवा नुरपूर येथील पडका किल्ला फार मजेची जागा असून नुरपूरच्या गांवालगतच आहे, व हल्ला तहशील व इस्पिताळ या किल्यांतच आहे. किल्यांत बरेच तलाव आहेत यावरून पूर्वी किल्यास पाण्याचा चांगला पुरवठा होता. यांत एक महादेवाचे लहान मंदिर चांगल्या स्थितींत आहे. पण किल्यांतील सर्वोत महत्त्वाची इमारत म्हणजे एका ढिगारांतून अर्लांकडे खोदून काढलेला एका जुन्या देवळाचा खालचा चबुतरा ही होय. देवळाचा वरचा भाग नष्ट झाळेला आहे, पण व्वबुतरा चांगल्या स्थितींत असून त्याच्या दगडांवर फारच सुंदर चित्रे कोरलेली आहेत. त्यांत घुराणांतील देखावोहे आहेत आणि मध्ययुगीन हिंदु काळांत लोकांच्या राहणींत प्रत्यक्ष फिरणारी माणसें, हत्ती, घोडे, उंट, गाई ही दाखाविलीं आहेत. ही चित्रें हुवेहुब असून त्यांवरून त्या- वेळच्या खोदणाऱ्यांची उच कला सिद्ध होते. जुन्या दिललोतील कुतुब मशिदींतील खांबावर जे खोदकाम आहे तितकेच, किंबहुना त्याहून सुंदर हें खोदकाम आहे. हें मंदिर विष्णूचे देव!लघ असावें. मुसलमान मार्तमजकांनीं प्रत्येक चित्राचे डोके टाकीनें उडविलें आहे.

या जुन्या देवळापासून कांहीं अतरावर एक नवीन देऊळ आहे. हें अकबराचे वेळीं बहुघा बांधलें असावें. यांत मुरलाघराची काळ्या दगडाची एक सुंदर मूर्ति आहे. हीं मार्त वरच्या मजल्यावर ठेवलेली आहे. अर्थात्‌ नेहमींच्या सांप्रदायाविरुद्ध ही गोष्ट आहे. खालच्या मजल्यावरराल मोठ्या दालनांत व वरच्या मजल्यावराह्ि सर्व भिंतीवर

.

कृष्णाच्या बाललीलांची अनेक रंगित चित्रे काढलीं आहेत, तीं फारच

४६६ तिसरी हिंदु राज्ये.

प्रेक्षणीय आहेत. त्यांवरून अकबराच्या वेळीं तुरपूरच्या लोकांचे पोशाख,

4२.२ ८.

दागिने व रहाण्याच्या चालीरीति यांची योग्य कल्पना होते. १__ (१ ४०% सक ५ मडा आणे सुकत, या डोंगरी संस्थानाचा संक्षिप्त इतिहास पहिल्या भागांत आम्ही

दिलाच आहे (पा. २७९, ३८०), येथ आम्ही कांही आणखी माहिती हचिद्सन आणि व्होजेलू यांच्या लेखावरून (पंजाब जनेळ ७ पा. १४)

आमच्या कांहीं विधानासह देतों. ह्या हिमाल्यांतील भूभाग कुळूसह एक

प्राचीन राज्य होता. त्यांत राहणारे मूळचे लोक कुर्नद नांवाचे होते, हृल्ट्रीं येथे शेती करणारे जे मुख्य कनेत हेच ते होत. या देशांत तिबेट- हून बोद्ध लोक दरसाल येतात. कारण प्रास्रेद्ध साधु पड्संभव हा मंडी

इलाख्यांतील रावळसर तलावावर रहात होता अश्ली समजूत आहे.

वह व व

हिंदु लोक असे मानतात का हें ठिकाण लोमश ञहूषीच्या राहाण्याचे होतं.

मंडी सुकेत येथील राजघराणें अत्रिगोली चंद्रवंशी रजपूतांचें आहे. ।

यांच्या नांवाच्या रोवटीं नेहमीं सेन उपपद येते. या उपपदावरून एक

चुकीची दंतकथा अशी उत्पन्न झाली आहे काँ, हे लोक बंगाल्यांतून येथें आले व बंगाल्यांत यांचा शेवटचा मोठा राजा लखनोतीचा लक्ष्मण- सेन होता (इ. स. ११६९–११९८ ). सर लेपलू ग्रिफिनने सुद्धां

  • प्रजाबचे राजे ? ह्या आपल्या पुस्तकांत ही दंतकथा मान्य केली आहे. पण कार्नेगहम यास ती मान्य नसून त्यानें लक्ष्मणसेनापू्बी पांचशे वर्षे सुकेतचे राजघराणें स्थापन झालें असें म्हटलें आहे. हाच सिद्धान्त हाचे- न्ूसन्न्‌ आणि व्होजेलू यांर्ना पूर्वोक्त लेखांत कित्येक कारणांनी मान्य केला आहे. आमच्या मतं याच सिद्धांताचा आणखी पुरावा बंगालच्या सेन-

राजांच्या कोरीव लेखांत असा मिळतो कीं, ते कर्नाटकांतून मुळांत

आलेले क्षात्रिय होते, असे त्यांत स्पष्ट म्हटलें आहे. याविरुद्ध सुकेतमंडीची

नहा ७. ह

दंतकथा अशी आहे काँ, त्यांचे पूवेज प्रथम इंद्रप्रस्थांत राज्य करीत होते, तेथून ते बंगाल्यांत जाऊन त्यांनीं छखनोतीची स्थापना केली,

तात्पर्य नांवावरून उत्पन्न झालेल्या स्थानिक दंतकथा बहुतेक अनेति-

मंडि आणि सुकेत- ४८७

हासिक असतात आणि त्या सोडाव्या लागतात. पथानियांनीं पथानकोट थेथून पठढाणास हाकलून दिलें ही नांवावरून निघालेली गोष्ट जशी आप- णांस सोडून द्यावी लागली, त्याचप्रमाणें सेन नांवावरून निघालेली बंगा- लमधून लक्ष्मणसेनानंतर लखनौतीहून आपण आलों ही मंडीसुकेत राजां च्या संबंधाची दंतकथा आपल्यास सोडून दिली पाहिजे.

तथापि या संस्थानांतील बंशावळींस आधारभूत मानून त्या आपल्यास विचारांत घेतल्या पाहिजेत. काोरीव लेखाहून जरी त्यांची किंमत कमी आहे तरी या वंशावळींतून कांहीं इतिहास काढतां येईल. मा. १ पा. ३२३० मध्यें सांगितल्याप्रमाणें का्नेंगहमच्या मतें सुकेतमंडी राजवंशाचा संस्थापक वीरसेन यानें हें राज्य इ, स. ७६५ च्या सुमारास स्थापिले. हें वर्ष कानेंगहमने असें निश्चित केलें का, वीरसेनापासून बाहुसेन आणि बाहुसेनपर्यंत ( यांच्यावेळीं राज्याचे दोन भाग सुकेत आणि मंडी असे झाले ) दहा पिढय़ा गेल्या, आणि निर्मेडी येथील शिलालेख खोदवणारा ससुद्रसेन यापर्यंत सहा आणखी पिढ्या गेल्या. अजबरसेन याचा एक ताम्रळेख सांपडला असून त्यांत प्रथम विक्रम संवत्‌ दिला आहे. तो सं. १५८४ म्हणजे इसवी १५२७ चा आहे. या अजबरसेनापर्यंत समुद्रसेनापासून आणख अकरा पिढ्या झाल्या, तेव्हां वीरसे- नापासून इ. स. १५२७ च्या अजबरसेनापर्यंत २७ पिढ्या होतात आणि दर पिढीस तीस वर्षे धरतां वीरसेनाचा काळ इ. स. १५२७८१० -_ ७१७ इसवी होतो; आणि मंडिसस्थान स्थापणारा बाहुसेन याचा काळ १०१७ किंवा ९८७ इसवी येईल. ठोकळ मानानें बाहुसेनानें १००० इसवीच्या सुमारे मंडी स्थापिली असें धरतां येते आणि समृद्र- सेनानें निमेडचा लेख ११५० च्या सुमारे खोदविला. हचचिन्सन्‌ आणि व्होजेल यांचें मत असें आहे की आपण पेचवीस वषाची सरासरी घेतली तरी कांहीं नांवे वश्धावळींतून गळलीं असतील याचा विचार करतां काने- गहमनें जो काळ ठरविला आहे तो योग्य दिसतो. या काळाचा मेळ आणखी चपा येथील देतकथेशी मिळतो. चपाच्या एका राजाची गर्भ- वती राणी सुकेतच्या राजाकडे आश्रयाला गेली आणि तिचा पुत्र मोष- नाश्व यास या राजानें चपाच्या गादींवर बसावैलें अशी ही दतकथा आहे.

४६८ तिसरा हिंदु राज्ये.

आपण पेचंवीस वर्षे दर पिर्ढांस घेतली तर वीरसेनाचा काळ १५२७

  • ६७५२८५२ येतो. आणि बाहूसेनाचा काळ ८५२–२५० - ११०२ आणि समुद्रसेनाचा काळ ११०२–१५०-१२५२ येतो. तात्पर्य सुकेत च्या संस्थानाची स्थापना ८०० च्या अलीकडे येऊं शकत नाहीं, आणि | मंडीची ११०० च्या अलीकडे. समुद्रसेनाचा शिलालेख १२२७ संवत्‌ म्हणजे ११७० इसवी कानेंगहम मानतो, त्याप्रमाणें डो. फ्लीट मानीत नाहीं. या लेखांत काळांचा आंकडा फक्त सहा दिला आहे. हा शास्त्र- . शकांचा मानतां येईल आणि अक्षरवटिकेच्या तऱ्हेवरून हा लेख सातव्या शतकाच्या अलीकडचा नाहीं असें तो म्हणतो, पण हा अडचण आपण . केलेल्या वरील गणितास बाघ आणीत नाहीं. कारण निर्मैड लेखाचा ळेखक समुद्रसेन वंशावळांतील समुद्रसेनाहून भिन्न घरतां येईल. आणि । हीच गोष्ट खरी दिसते; कारण लेखांत सांगितलेले त्याचे पूवज वश्यावळीं- तीळ सागितलेल्या पूवजांहून भिन्न आहेत. कांहीं असो; आपण मंडीची स्थापना १००० किंवा ११०० धरली तरी पजाबांत महमुदाच्या वेळी [किंबा नतर झालेल्या मुसलमानांच्या स्वाऱ्यामुळे सुकेत राज्य सेन रज- घुतांनीं स्थापन केलें असे दिसतें. शाहुसेन व बाहुसेन हे दोघे भाऊ होते व ते आपसांत भांडले ही दतकथा नेहर्मांच्या स्वरूपाची आहे अश्या देतकथंत दोन भाऊ जवळ जवळ उच्चाराच्या नांवाचे असतात. तथापि सुकेत हे जुनें राज्य आहे आणि ते ८०० च्या सुमारास स्थापन झालें असें मानतां येईल. ही चमत्कारिक गोष्ट आमच्या नजरेस आली काँ, कांगडयाचे कटोच रजपूत सुकेतच्या घराण्याशी विवाहसबंघ करितात, पण मंडीच्या घराण्याशी करीत नाहींत, पण मंडी व सुकेत एकच वंद्य आहे. ही गोष्ट गुलेरच्या महाराजांनीं आम्हांस सांगितली, मंडी अथबा सुकेत यांचा १२०० पुढील इतिहास या पुस्तकाच्या बाहेरचा आहे. या डोंगरी रजपूत राज्यावर बराच काळपावेतों मुसलमा- नांच्या स्वाऱ्या झाल्या नाहींत आणि या व पूर्वींच्या कालविभागांत ही राज्यें काइमीरच्या अमलाखाली नसून स्वतंत्र होती ( ८००ते१२०० ).

कडरतवार व बललापुर ४९८९.

६ कइतवार.

करतवारचें (प्राचीन काष्ठवाट) लहानसे संस्थान या कालविभागांत रका रजपूत घराण्याच्या अमलाखाली कादमीरच्या साम्राज्यांत अंतभूत होतें. आणि काष्ठवाटचा उत्तमराज हें नांव राजतरंगिणीमध्यें १०८७ इसर्वीत गारमीरचा राजा कलश याच्या दरबाराला जे आठ मांडलिक आले होते त्या नांवांमध्यें आळें आहे (मा.१ पा.२-१२७). सुकेत आणि मेंडीचे राजे या दरबार वर्णनांत नार्हांत हे लक्षांत ठेवलें पाहिज. हचिन्सन आगि व्होजल यांनीं पंजाब जर्नल भा. ४ (पा. २९-४१ ) यांत करतवार संस्थानच्या इतिहासावर जो लेख लिहिला आहे त्यावरून येथील राजे मंडी व सुकेत येथील घराण्यापैकींच आहेत. आणि हेहि झापण गोड देशाहून आलो असें मानतात. यांच्या नांवाच्या अं्ताहि सेन उपपद येतें. पण या नांवावर रचलेलीं गोड देशाहून आल्याची दृतकथा चुकीची आहे हे आम्हीं वर सांगितलेंच आहे. करइतवार येथील हल्लींचे राजे मुसलमान असून त्यांनीं दिलेल्या वंशावळींत वर १०८७ चा उत्तमराज नाहीं, यावरून तो या वंशाचा नसावा. तेव्हां सुकेतहून आलेला पाहिला राजा कन्हपाल हा यानंतर येथ येऊन त्यानें १२०० च्या सुमारे हृ संस्थान जिंकले असे ठरतं. १२०० नंतरच्या काळांत किंबा मोंगळ काळांत झालेल्या राजांची हकीकत व्होजेल आणि हाचिन्सज्ञ्‌ यांनी आपल्या लेखांत दिली आहे, तरी ती येथें आपल्यास देण्याची आवश्‍यकता नाहीं. हल्ली हें संस्थान कारमीरचा भाग आहे, रणजितासेंगानें ते जिंकले, हें घराणें चद्रवेशी आणि अत्रिगात्री आहे. उत्तमराज हा कोणत्या गोत्राचा व रजपूस कुलाचा होता ते सांगतां येत नाही.

७ बह्लापुर (बालोर) अथवा बसोहली.

हे एक दुसरे डोंगरी संस्थान काइमीरच्या ताब्यांत हल्लीं आहे. येथील राजाचे नांव वर सांगितलेल्या कलशाच्या दरबारांतील आढ मांडलिकांच्या यादींत आहे. ह्यांचा इतिहास हृचिन्सन व व्होजेल यांनी पजात्र जर्नल व्हा, २ पा. ७७ ते ९७ वर दिला आहे. त्यावरून आम्ही

॥।

४७० तिसरी हिंदु राज्ये.

आमच्या कालभांगांताल त्यांचा इतिहास देतों. हा राजवंश पांडवांपासून झालेला आहे असें मानतात. ते अलाहाबादेहून प्रथम अलमोड्यास आले, तेथन हरद्वार, तेथून सुकेतमार्गे पहाडांत आले. अशी दतकथा

आहे ती, मान्य करण्यासारखी आहे. कारण पांडवांचे शेवटचे पौराणिक वैशज कौद्यांबी येथे राज्य करीत होते. आणि ऐतिहासिक कालांतील त्यांचा मोठा प्रासिद्ध राजा कथासरित्सागरांताल उदयन होता. ह

आपला प्रधान योगघरायण यासह कोशांबी येथे राज्य करीत होता

असो, हें कुल चंद्रवशी ठरते; पण यांचें गोत्र सांगितलेले नाही. हा. राजवंश हलला नष्ट झाला आहे. तथापि यांच्या भावाबंदाचें वंशज बालो- रिया रजपूत म्हणून प्रासैद्ध आहेत. या राज्याची स्थापना ९००. इसवीच्या पूर्वी भोगपालानें केली, त्याची प्राचीन राजधानी बल्ला पूर(बालोर

होती. या राज्ञाच्या नांवाच्या शोवटीं पाळ उपपद येतें. त्रिलोचनपाल ११ व्या शतकाच्या पूर्वार्धात राज्य करीत होता. त्याचा पुत्र तुग व! नातू कलह हांता. या कलकश्याचे नांव कारमारच्या कलशाच्या दरबार-. यादींत आहे. पद्नक आणि त्याचा पुत आनंद हीं वल्लापूरत्र्या राजाची आणखी दोन नांवें तरांगे्णांत आहेत. पण तीं बालोरिया बब | वशावळींत मिळत नाहींत. ह्या दाघांनी हषांचा नातु मिक्षाचार या

उव्चळ व सुस्सल यांनी बळकाविलेली कारमीरची गादी परत मिळवि- ण्याच्या कामीं, ते संबंधी असल्यानें, मदत केली, परंतु त्यांस यश मिळाले नाहो, व ते शेवटीं उलट पक्षास जाऊन मिळाले, जयसिंहाने बालोरच्या एका राजास राज्यभ्रष्ट केलें असं वणन आहे. परंतु जय- सिंहाच्या नंतरच्या काळांत या मागचे राजे स्वतंत्र झाल अस दिसते. त्यांचीं नुसती नांवें १२०० पर्यंतची येथें देण्याचीं आवश्‍यकता नाही.

८ कोट-कांगडा.

जालंदर राज्याची हकीकत पूर्वी भा. १२ पा, ३३७ यावर दिलीच आहे. हं राज्य, भारतीयुद्धांत सुशम्यानें कोरवबांच्या बाजूनें युद्ध केलें, तेव्हांपासून चालत आलेलें होतें. हाच कटोच राजांच! ज्ञात पूवज होय. त्याच्या वशांतील हर्ळाःचे सरळ वारस, महाराजा सर जयचंद, कांगडा

कोट-कांगडा. ४७१

जिल्हा लंबाग्राम येथें राहतात, हे रजपूत राजे विद्वान्‌ असून पूर्व हिमा- ल्यांतील रजपूत लोकांत मोठे वजनदार आहेत. त्रिगर्त देशांत मेदा- नांतील जालंघर व डोंगरांतील कांगडा यांचा समावेशन होत असे. त्यांत महमुदाचे वेळीं कोण राजा होता हं अद्याप आम्हांस ठरवितां आलें नाहीं. हा राजा, काबूल पंजाबचा शाही राजा आनंदपाल, याचा मांडालिक असावा हं आम्ही पूर्वी सांगितलेंच आहे आणि ह्यानें संयुक्त हिंदूंच्या शेबटल्या लढाईत भाग घेतला असावा. हिंदूंचा पराभव झाल्यावर कांगड्याचा राजा परत येण्यापूर्वीच महमुदानें झपाट्यानं कोट- कांगड्यावर स्वारी केली असावी, किल्याचा कांहीं काळपर्यंत तेथील रखवालदारानीं बचाव केला, परंतु किल्ला शेवर्टा पडला आणि आंतील अमोप संपत्तासह्ह महमुदाच्या ताब्यांत गेला. पूर्वी दिलेल्या टिप्पणींत सांगितल्याप्रमाणें कोंट-कांगडा अजेय होता, आणि म्हणुनच तेथें अमोप संपत्ति जमली होती. महमुदाचा समकालीन इतिहासकार उतूबी याच्या लेखावरून असें दिसतें काँ, महमुदाचें प्रचंड सैन्य पाहून संरक्षकांचा धीर खचला, आणि जोराचा विरोध न करितां त्यांनी शरणचिठ्डी दिली. आमच्या मतें हे लोक भाडोत्री होते, आपल्या देशाच्या स्वातंन्न्याकरितां लढणारे शूर बीर नव्हते. कारण उतूबी म्हणतो, “’ ते हरण आले आणि त्यांनीं सुलतानाच्या निशाणाखालीं नोकरी करण्याचें कबूल केलें. नंतर त्यांनी दरबाबा उघडला आणणि नम्रपणें सुलतानाची नोकरी घरली (उत्‌बी पा. ३४१). याप्रमाणें हा अजेय किल़ा आंतील प्रचंड नि्घी- सह महमुदाच्या हातांत पडला. महसुदाने त्यावर कायमचा कबजा करून जेव्हां तो तेथून परतला तेव्हां तेथें आपले विश्वासू रक्षक ठेविले. त्रिग्त राजांचे मैदानी राज्य यापुढें नाहींस झालें आणि त्यांनीं डोंगराचा आश्रय घेतला. त्यांनीं १०४४ त दिल्लीच्या राजांच्या प्रोत्साहनाने चार महिन्यांच्या वेढयानंतर किला षुनः परत घेतला. उत्‌बीनें एखादे मंदिर किंवा एखादी मूर्त येथ तोडल्याचें वर्णन केलेलें नाहीं. इतर इतिहासकार मात्र तसें करतात, पण कोणती मूत तोडली याचा कोठें उल्लेख मिळत नाहीं. कांगडा येथ आम्हीं माहिती मिळविली, त्यावरून अंबिका किंवा वज्रेश्वरी देंबरर्चि येथें प्रासद्ध देवालय होतं. हें देवालय ज्वालामुखीच्या

देवीहून मिन्न होते. ज्वालामुखी कोट-कांगड्याहून रवास मैल दूर’ आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणें या देवीची मूर्त महमुदानें तोडली असावी आणि कांगडा राजांनीं किला परत घेतला तेव्हां ती मूर्त पुनः बसविली असावी. कांगडा राजांचा १२०० पर्यंतचा इतिहास थोडक्यांत सांगतां येईल. कल्हणानें राजा इंद्रचंद्र याचा उललेख १०४०.त केला आहे. आणि यानंच किल्ला परत घेतला असावा, कांगड्यांतील दुसऱ्या राजाचें नांव आपल्यास सांपडत नाहीं. पण जोनराजाच्या तरंगिणींत तुकानी एका त्रिगते राजाचा पराभव केला आणि तो कारर्मारांत पळाला. त्यानें जय- ख्रेंह्याच्या मदतीनें स्वारी करणाऱ्या तुकीचा पराभव करून आपलें राज्य परत मिळविले असें वर्णन आहे. कटोच राजांच्या वशावळींतून पुढील राजांची नुसतीं नांवें देणे जरूर नाही, ही कटोच राजांची वंशावळ | हिमालयांतील राजांच्या भ्र्व वंशाबळींत भरंवश्शलायक आहे हं सांगण्याची जरूरी नाहीं. कांगड्याचें वणन आम्ही अन्यत्र प्रकरणांत केलेंच आहे.

४७२ तिसरा हिंदु राज्ये. | । ।

प्रकरण अठरावे शेवटचा हिंदु सम्भाटू रायपिठोरा-

या वीर्यशाली हिंदु सम्राटाचें चरित्र चेदभाटाच्या रासांत संपूर्ण- पणें दिळें आहे. चेद भाटास प्रथ्विराजाच्या समकालीन मानतात. परंतु हल्लीचा रासा ग्रंथ एका मूळग्रंथाचें अतिशय वाढलेळें स्वरूप आहे आणि त्यांतील कित्येक वृत्ते व विधाने विश्वसनीय आधघारा- ‘ वरून ( शिलालेखादि ) खोटीं ठरलीं आहेत. तेव्हां रासांतील चरि- त्रापैकीं कोणता भाग खरा आहे हें ठरविणें मुष्किल झालें आहे. तथापि आणखी दोन ऐतिहासिक काव्यें आपल्या मदतीस घेण्यासा- रखीं आहेत. पहिलें पुथ्विराजविजय काव्य. हें प्रुथ्विराजाचा दरबार- कवि एक काऱ्मीरी पंडित यानें ठिहिळें आहे. हे प्रथम ब्यूल्हर यास सांपडले; आणि यांतील सारांश अजमीरचे हरविलास सारडा यानीं अलीकडे प्रसिद्ध केला आहे (जे. आर. ए. एस्‌. १९१३). दुसरें हमीरकाव्य जे. बी. कीर्तनें यानीं प्रासिद्ध केलेलें. पण पाहिलें काव्य अपुरें असून त्यांत पृथ्विराजाची शेवटपर्यंतची हृकीकत दिलेली नाहीं. आणि दुसऱ्यांत पृथ्विराजाचा वंशज हम्मीर याचा मुख्य परा- क्रम वर्णिलेला आहे. असो, या तीन आधारांवरून पृथ्विराजाचें चरित्र बनविण्याचा प्रयत्न करूं. रासांतील हकीकत जितकी संभाव्य व अविरोधित आहे तितकी आम्ही ग्रहण केली आहे.

पृथ्विराजाचाच एक शिलालेख मदनपूर येथें सांपडला आहे. परमर्दिदेव चेदेछ याचा पराभव केल्यानंतर इ. स. ११८२ त द्वा खोदवला गेला, यांत प्रथ्विराज सोमेश्वराचा पुत्र आणे अणौोराजाचा नातु वर्णिला आहे; पण प्रृथ्विराज व सोमेश्वर यांच्या आईची नांबें यांत दिठेली नाहींत. दिल्लीच्या अनंगपालाची मुलगी प्ृथ्विराजाची

४७४ तिसरी [हिंदु राज्य.

माता ह्वोती असें रासा म्हणतो. पण हम्मीरकाव्य आणि प्रृथ्विराज- विजय यांत चदी हैद्दय राजपुत्री कर्पूरदेवी त्याची माता होती असें सांगितठें आहे. अथोत्‌ हं दुसरें विधान जास्त संभवनीय आहे. रासांत पृथ्विरजाचा जन्मकाळ आनंदसंवत्‌ १११५ म्हणजे इ. स. ११४९ दिला आहे व प्रृत्युसमयीं त्याचें वय त्रेचाळीस वर्षाचे सां- | गितळें आहे, म्हणजे त्याचा मृत्यु इ. स. ११९२ त योग्य तर्‍हेनें पडतो. पण टोंडनें त्याचा जन्मन्संबत्‌ १२१५ (इ. स. ११५८ ) दिला आहे. अर्थात्‌ त्याचें मृत्युसमयीं वय चौतीस वर्षाचे ठरते. रायबह्यादूर गोरीशकर ओझा यांच्या मतें जन्मकाळ संवत्‌ १२२५ म्हणजे इ. स. ११६८ असावा. तेव्हां मृत्युसमयीं त्याचें वय चो- वीस वर्षाचे येते, पण हं असंभवनीय दिसतं. बिजोलिया शिलाले- खांत ( जे. ए. एस्‌. बंगाळ ५४ भा. १ पा. ३१, ४० ) वीसल- देव ऊर्फ विग्रह तिसरा यानें दिल्ली जिंकली असे सांगितलें आहे व हं वृत्त वीसळाचा दिल्ली येथील लोहस्तंभावर लेख आहे त्यांतहि सांगितळें असून ह्या लेखाचा नक्की काळ ९ एप्रिळ ११६४ (किल हॉन इं. ए. १९ पा. २१८) असल्यानं हा विजय ११६३ डिसे- बरांत मानतां येतो. बिजोलिया लेखांत वीसलानंतरचा राजा पृथ्वि- राज दुसरा सांगितला आहे. त्यानें एका जैन देवळास दान दिले, त्यानंतर सोमेश्वर गादीवर आला व त्यानें दुसऱ्या एका जैन मंदि- रास दान दिलें इतकी हकीकत आहे. या लेखाचा काळ इ. स. ११७० आहे. परथ्वीभट म्हणजे प्ृथ्विराज दुसरा याचे इ. स. ११६७ व ११६९ चे लेख मिळाळे आहेत ( किल्हॅने ए इ. ८). यावरून असा निश्चय होतो कौ, तो ११६४ आणि ११६७ यांच्या दरम्यान गादीवर आला व त्यानें ११३९ पर्यंत राज्य केलें. ब्या- मागून सोमेश्वर गादीवर आला. त्यानें इ. स. ११७० नंतर किती वर्षें राज्य केळें हें सांगतां येत नाहीं. गौरीशंकरच्या मर्ते त्याने १२३६

शेवटचा हिंडु सम्राट्‌ रायपिठोरा. ४७५

(इ. स. ११७९ ) पर्यंत राज्य केलें. बापाच्या मृत्युसमयी पृथ्विराज लहान होता. त्याच्या वतीनें पृथ्विराज-विजयकाव्यांत सांगितल्या- प्रमाणे त्याची आई राज्यकारभार करीत होती, पण ११८२ मध्यें तो इतका मोठा व सामर्थ्येवान्‌ झाला होता कीं, त्यानें परमर्दिर्वे- वाचा पराभव केला. यावेळीं त्याचें वय २१ वर्षांचे धरलें तर त्याचा जन्म ११६१ त येऊन त्याचें वय सोमेश्वराच्या मृत्युसमयीं म्हणजे ११७९ त १८ वर्षे पडतें. या वयाचा हिंदुराजपुन्न अल्पवयी सम- जला जाणार नाहीं, आणि येर्थे पृथ्विराजविजय लेखाशीं विरोध येतो. तेव्हां आमच्या मतें १ १७९ पर्यंत सोमेश्वरानें राज्य केलें . नसावें. असो, पृथ्विराजाच्या जन्माच्या तीन मित्या येणेंप्रमाणें मिळतात. रासा ११४९ इसवी वैशाख वद्य द्वितीया देतो. पृथ्विराज-विजय- मध्ये पुढील मिति व ग्रहांची स्थिति दिळेळी आहे. ज्येष्टवद्य द्वादशी- वेशाख आुक्व पक्ष संपल्यावर मंगळ मकरी, शाने कुंभांत, गुरु मानेत, सूर्य मेषांत, चेद्र वृषभांत आणि बुध मिथुनांत असतां जन्म झाला.’ टीड ११५८ इसवी देतो आणि गोरीशंकराच्या मतें ११६८ इ. जन्मकाळ आहे. पृथ्विराजाच्या जन्माच्या वेळीं सोमेश्वर राजा झाला नव्हता. त्याचा भाऊ विग्रह तिसरा राजा असल्यानें तो अन- हिलवाडच्या जयसिंह सिद्धराजाच्या दरबारीं रहात असे. सिद्धरा- जाची मुलगी कांचनदेवी सोमेश्वराची आई होती. पृथ्विराज दुसरा मरण पावल्यावर सोमेश्रर अजमीरास आला आणि त्यानें कांहीं वर्ष राज्य केळे, अशी हकीकत नक्की आहे, ही गोष्ट त्याचीं कांहीं तांब्याचीं नाणीं सांपडलीं असल्यानें सिद्ध आहे. पृथ्विराजाच्या जन्माची

“ही ग्रह्स्थाति काल्पनिक दिसते. कारण ज्येष्ठ शु. द्वादशीस सूर्य मेषांत असूं क्षकणार नाहीं किंवा चंद्र वृषभांत. अथात्‌ या काव्यांताहि काल्पनिक ग्रह उच्छ व स्वग्रर्हांचे दिले आहेत. या ग्रहइस्थितीवरून जन्म

(21

बर्ष काढणें दक्‍य नाही. पण जन्माची तिथे व महिना खरा असावा.

४७६ तिसरा हिंदु राज्ये.

जागा रासांत दिल्ली सांगितली आहे, पण ती अनहिलवाड किंवा. चदीची राजधानी त्रिपुर असावी. पृथ्विराजविजय काव्यांत . लवाड सांगितली आहे ( जे. आर. एस्‌. १९१३ पा. २७३ ).

पृथ्विराजाच्या जन्माचा काल व स्थळ यांचा विचार केल्या आपण वल्याच्या लयनाकडे वळूं. तो सहजच अल्पवयांतच मोठा मज-। वूत असावा, आणि त्यावेळच्या हिंदु रिवाजाप्रमाणें त्याचें लग्नहि। लवकर झालें असावें. रासांत त्याच्या अनेक राण्या सांगितल्या आहेत. । पण पहिली व मुख्य राणी अबूचा जेता परमार याची कन्या इंछिनी ह्दी होती. या लग्नाची हकीकत रासांत दिलेली वेडसर आहे. अबूच्या | या परमार सरदाराची थोरली कन्या चालुक्य राजा भीम यास दिली | होती. तिच्या धाकट्या बाहिर्णाचें विलक्षण लावण्य ऐकून ल्यानें। तीहि राजकन्या लग्नांत मागितली. पण बापाने तिचें लग्न पृथ्विराजाशी । केलें. यामुळें अबू राज्यावर भामानें स्वारी केली. इकडून पृथ्विराज । र्भामावर चाटून गेला. तेव्हां र्भामाने शिहाबुद्दीन घोरीला पृथ्वी.) राजावर उत्तरेकडून स्वारी करण्यास उद्युक्त केळे; आणे आपण | स्वतः दक्षिणेकडून त्याजवर चाळून गेला. पाथविराज व त्याचा सेना- | पति कैमास यांनीं दोघांचा निरनिराळ्या वेळीं पराभव केला. या । वेळीं शहाबुर्ददान पकडला गेला. रासाच्या आश्चर्यकारक अतिशयो-। क्तीनं शिह्वाबुर्ददान पृथ्विराजाच्या कैदेंत कित्येकदां सांपडला आहे, । आणि दरवेळीं औदार्यानें पृथ्विराजानें त्यास सोडून दिलेलें आहे. । परंतु ही गोष्ट असंभवनीय दिसते. असो, पृथ्विराज व परमार राज- कन्या इंछिनी यांचें लग्न झाळें व या कारणानें गुजराथचा भौम याशीं पृथ्बिराजाचें युद्ध होऊन त्यांत र्भामाचा पराभव झाला असें. मानण्यास हरकत नाहीं.

पृथ्विराजाच्या दुसऱ्या राण्या वर्णन करण्याची जरूरी नाहीं. पण त्याची शवटची राणी कनोजचा गाइडवाळ राजा जयचंद याची

शेवटचा हिंदु सप्राट्‌ रायपिठोरा ४७७

कन्या संयोगिता हिजबद्दल दोन शब्द लिहिले पाहिजेत. रासांत या लग्नावर कादंबरीच रचली आहे. जयचेदानं हिचा स्वयंवर मांडला, तेव्हां त्याचा शत्रु पृथ्विराज यास त्यानें बोलावलें नाहीं, इतकेंच नव्हे तर त्याची थट्टा करण्यासाठीं स्वयंवर मंडपाच्या दरवाजावर त्यास भालदार बनवून त्याची प्रतिक्ृाते उभी केली. पण कलीनें स्वप्नांत संयोगितेचें लग्न पृथ्विराजाशीं पूर्वीच लाविलें असल्याने तिनें लग्ना- चची माळ ल्या भालदाराच्याच गळ्यांत घातली; र्वारोदात्त प्रथ्विराज लागलीच तेथें पोहोचून त्यानें राजकन्येचे हृरण केळें. यावेळीं जय- चेंदाच्या प्रचंड सैन्याशी त्यास लढावे लागळें ब या युद्धांत दोन्ही- कडचे अनेक बीर रणांगणांत पडले. ही सर्व कथा इतकी रमणीय आहे कीं, ती खरी वाटत नाहीं. परंतु कित्येक म्हणतात त्याप्रमाणें ती सर्वथैव खोटी नाहीं असें आम्हांस वाटतें. ञ्यूलियटप्रमाणें संयोगि- तेनें आपली प्रीति पुंथ्विरजास कळावेली असावी आणि त्यानें एका एकीं कनाजवर हृल्ा करून तीस युद्ध करून नेलें असावें. चदानें रासांत आणि बिल्हणानें यापूर्वी विक्रमांकचारेतांत (११२५ इ. ) वणेन केला असला तरी स्वयंवरविधि त्यावेळीं लुप्त होता. असो, या प्रीतिकथानकानें पृथ्विराजाचें नांव लोकांत अजरामर झालें आहे, सर व्हिन्सेंट स्मिथ या लग्नाची मिति-बहुधा रासावरून-१ १७५ देतो ( प्राचीन इतिहास पा. ३८७ शे. आकर. ). परंतु टॉडप्रमाणें पृथ्विराजाचा जन्म ११५८ मानला तर ११७५त तो सतरा वर्षा- चाच ठरतो. रासाप्रमाणें त्याचें वय सव्वीस वर्षांचें ठरतें, कांहीं झालें तरी पृथ्विरजाचा अत (इ. ११९२ ), ११७५त लग्न धरलें तर लग्नानंतर १७ वषांनी होतो; पण लग्नानंतर रासाप्रमाणें लव- करच त्याचा अंत झाला, तेव्हां असें संभवनीय दिसतें कीं, हें लग्न

११८५त झालें, हाच मिति रासांत दिलेली आम्हांस आढळली आहे. म, भा…३११

११७५ इ. हें वर्ष स्मिथच्या इातहासांत चुकीनें पडलें असावें असें आम्हांस वाटतें. पृथ्विराजाची एक राणी देवगिरीच्या यादवांपैकीं . होती असें रासांत वर्णन आढळतें

रासामध्ये दिलेल्या पृथ्विराजाच्या चारित्रांतील अनेक गोष्टी | ( त्याचा हुशार प्रधान ब शूर सेनापति केमास याचा वध वगैरे 91 येथें देण्याची आवश्‍यकता नाहीं. मुसलमानांच्या युद्धाशिवाय इतर । त्याची युद्धे झालेलीं जीं संभवनीय दिसतात तीं आम्हीं येथे देतो. । त्याच्या शेजारची महत्त्वाची सामर्थ्यंवान्‌ राज्यें गुजराथ, बुंदेलखंड । आणि कनोज हीं होतीं. व त्यांवर चालुक्य, चंद्देळ व गाहडबाल कुलांतळे यावेळीं राजे होते. तेहि पराक्रमी व हुशार होते. भीम, | परमर्दिदेव आणि जयचंद या प्रत्येकाशी पृथ्विराजाचें युद्ध झालें, । आणि त्या प्रत्येकास पराजेत करून त्यानें आपलें वचेस्व स्थापिले. या प्रत्येक लढाईत जीं अनेक शूरत्वाचीं कृत्ये झालीं तीं वर्णन करणें । जरूर नाहीं. पण अल्ह आणि उदल्ह बनाफरवंशी रजपूत परमर्दि- | देवानें आपल्या राज्यांतून हाकून दिले होते; आणि पुथ्विराजानें मोहो- | बावर स्वारी केली तेव्हां स्वदेशाकारतां तुम्ही परत या अशी आपल्या । मातेचा काकुळतीचा निरोप ऐकून परत आले आणि ‘पृथ्वीराजाशीं । लढून युद्धांत मरण पावले इत्यादि अनेक वीर्योत्साहजनक व ह्ृदय- । द्रावक हकीकती चंदाच्या रासांत दिलेल्या आहेत, त्या शूर रजपुतांस । अत्यंत प्रिय असल्यानें राजपुतान्यांत चंदाचें काव्य पृथ्वीराजरासा । सवतोमुखीं झालें आहे. पण इतिहासकारास या सर्वे गोष्टी मजबूत | समकालीन लेखी पुराव्याच्या अभावीं कितपत खऱ्या आहेत हं. ठरवितां येत नाहीं. परमर्दिदेवाशीं लढाई इ. स. ११८२ मध्ये झाली, आणि त्याचा पराभव झाला, ही गोष्ट चेदेछांच्याच राज्यांत मदनपूर येथें खोदलेल्या पुथ्विराजाच्या लेखावरून पर्वी सांगितल्याप्रमाणें सिद्ध होत आहे |

४७८ तिसरी हिंदु राज्ये. ।

शेवटचा हिंदु सत्ता रायापिठोरा. ४७९

हरबिलास सारडा यांनीं जे. आर. ए. एस. १९१३ मध्यें पृथ्विराजेविजय काव्याचा जो सारांश दिला आहे त्यांत पथ्वीराजाच्या युद्धाचा किंवा त्याच्या विवाहांचा उलेख नाहीं. त्यांत दोन प्रधानांचें नांव आलें आहे. एक कदंबवास (कैमास) आणि दुसरा भवनेकमछ हे मोठे शूर होते, पण त्यांच्या पराक्रमाची हकीकत दिलेली नाहीं. तथापि गुजराथेंतून एक दूत आला आणि त्यानें ‘ गुजराथेंत शिह्वा- बुद्दीनचा पराभव केला ‘ ही द्युभवार्ता सांगितली असें वर्णन आहे पृथ्विराज वयांत येऊन स्वतः राज्य करूं लागल्यानंतरची ही हकी- कत आहे. ही लढाई पूर्वी सांगितल्याप्रमाणें ११७९ मध्यें झाली हे गुजराथच्या प्रकरणांत सांगितलेंच आहे. यावेळीं पृथ्वीराज वयांत आला होता. अर्थात्‌ त्याचें लहान वयांतील राज्य अल्पावर्धाचेंच दिसतें.

या शेजारील राज्यांबरोबर झालेल्या युद्धांचे ह्यानकारक पारणाम कसे झाले याबद्दल पुढें बोळूं. पण या युद्धांताळ विजयानें पृथ्वि- राजाजी कौर्ति वाढली आणि उत्तर हिंदुस्थानाचा तो सम्राटू सहजच मान्य झाला. म्हणजे अजमीर आणि दिल्लीचा तो राजा असून उत्तर हिंदुस्थानचा सम्राटू म्हणजे ‘चक्रवती झाला. ( ज्याप्रमाणें जॉर्ज पांचवा इंग्ठंडचा राजा आणि हिंदुस्थानचा सम्राट आहे ). हे चक्रवर्तित्व रजपूत राजांत नेहमीं तंट्याचें मूळ असे; आणि प्रत्येक राजा पराक्रमी झाला म्हणजे चक्रवती होण्याचा प्रयत्न करी. आपण पाहिलेच आहे कौं, कांकणचे शिलाहार राजे आपल्यास कांकण–चक्रवर्ती म्हणवीत. सम्राटाचा मान मिळविण्याकारितां यावेळी दोन प्रतिस्पर्धी होते. अजमीरचा पृथ्वीराज आणे कनोजचा जयचंद. जयचंदाचा आजा गोवेंदचंद्र हा खरोखरच सर्व उत्तर हिंदुस्थानावर सम्राटू झाला होता. पण त्याच्या पुत्रापासून वीसलदेवानें हा मान हेसकावून घेतला व त्यानें दिछी जिंकून आपल्या राज्यास जोडल्याने चोहानाची सत्ता प्रबळ झाली. पृथ्वीराज आणि जयचंद यांच्यामध्ये

४८० तिसरी हिंदु राज्ये.

हीच स्पर्धा चालली आणि त्यामुळें हिंदूची मुसलमानांस | न वेळीं विरोध करण्याची ताकद कमी झाली. त्यामुळें दोघांचा नाश, कसा झाला हं पुढील प्रकरणांत पाहू

टिप्पणी-रासांत एर्थ्वाराजाच्या चरित्राच्या पुढील मित्या दिल्या आहेत

जन्म आनंद सं. १११५-११४९ इ.-१२०५ विक्रम सं.

दिल्ली येथ दत्तक , ११२२-११५६ ,, १२१३

केमासाशी युद्ध ,, ११४०-११७४ ,, १२८१

कनोजवर स्वारी ,, ११५१-११८५ ,, १२४२

दोवटचं युद्ध व मृत्यु ११५८-११९२ ,, १२४९ र) ( रासाची बनारसची आवृत्ति पा, १४० )

१) र.

” ०५८ /५ “9 “5

प्रकरण एकोणिसावे शाहाबुर्दीन घोरी आणि हिंदूंची शवटची लढाई.

. गझनींचा तुर्को राजा महमूद यानें पंजाबचा उच्छेद केला, आणि घोरचा अफगाण राजा शिहाबुद्दीन यानं उत्तर हिंदुस्थानचा उच्छेद केला. तेव्हां ज्याप्रमाणे गझनीच्या तुर्की राज्याचा उदय पंजाबच्या उच्छेदाचा इतिहास देण्या पूर्वी आम्हांस वर्णन करणें जरूर पडलें, त्याचप्रमाणें उत्तरहिंदुस्थानांतील राजपूतांच्या उच्छेदाचा इतिहास देण्यापूर्वी आम्हांस या घोरच्या राज्याचा इतिहास देणें जरूर आहे.

गझनीच्या वायव्येस घोरचा डोंगरी इलाखा आहे. त्यांत अफगाण जातीचे लोक राहतात. अफगाणिस्थानाच्या इतर भागाप्रमाणेंच येथील राजे व लोक पूर्वी हिंदु होते. गझर्नाच्या महृमुदाच्या वेळीं किंवा थोडेपूर्वी हे मुसलमान केळे गेळे. गझनीच्या सुलतानांच्या अधिप- त्याखालीं पुष्कळ काळ घोरचे राजे राहिळे. पण सुलतान बहिरा- माच्या वेळीं त्याशीं यांचा तंटा उपस्थित झाला, बहिरामनें अनाव- वयक रीतीनं कुतुबुद्दीन घोरीचा वध केला व नंतर सैफुदीन त्याचा भाऊ यास गझनी येथें अत्यंत हाळ करून ठार केलें. त्याचा तिसरा भाऊ अल्लाउद्दीन यानं सूड घेण्याची प्रतिज्ञा केली आणि तो गझनी वर चाळून आळा. सुलतान बहिरामहि एक प्रचंड फोज घेऊन गझनीच्या बाहेर पडला. त्याच्या फौजेचे महृत्वाचें अंग गजसेन्य होतें. कांहीं वीरांच्या शौयानें अछाउद्दीनानें या गजसैन्याचा परा- भव केला. बहिरमाच्या इतर सैन्याचा शेवटीं पराभव झाला तेव्हां तो गझनीस अलह्ाउद्दीनच्या रोषास बळी सोडून पळून गेळा.अछाउद्दीनानें गझनीवर आपला सूड भयंकर रीतीनं उगवला. त्याने तें शहर सारखं सात दिवस लुटळें ब जाळलें. जो जो पुरुष सांपडला तो तो ल्याने

४८२ तिसरी हंदु राज्ये.

ठार केळा, व बायका व मुलें गुलाम केलीं. महमुदी राजांचे वाडे पृथ्वीमध्यें अद्वितीय होते ल्या सर्वांचा त्यानें विध्वंस केला. याप्रमाणें । कूर कृत्य करून आपल्या भावांचे मृतदेह घेऊन तो घोरला परतला | व आपल्या पूर्वजांच्या स्मशानांत त्यांस त्यानें पुरळें ( तबकात्‌ । नासिरी. इलियट २ पा. २८९ ), राजाच्या गुन्ह्याबद्दल लोकांवर । केवढा हा भयंकर सूड !!! बाहराम हिंदुस्थानांत पळून गेला, पणतो । रस्त्यांतच मेळा. या त्याच्या निद॑य कृत्यामुळे अछाउद्दीन धोरीस जहान-सोज ( जगाचा जाळणारा ) असें योग्य रीतीनें म्हणतात. त्याच्या मरणानंतर त्याचा मुलगा गादीवर बसला. पण तो लौकरच मेल्यानें त्याचा पुतण्या धियासुदीन महम्मद बिन साम धोरची राजधानी फिरोजकोह येथें राज्य करूं लागला, व त्याचा भाऊ मुएजुद्दीन महम्मद बिन साम गझनी येथें ११७२ त राजा झाला. महमुदी सुलतान खुश्र हा हिंदुस्थानांत पळाल्यावर गोझू तुर्कानीं १२ वर्षे गझनींचा कबजा केला होता, त्यास धोर्रीनें पिटाळून लाविले. तो आपला बंधु घियासुर्ददान याच्या तफे म्हणून जरी गझनींत राज्य करीत होता तरी वस्तुतः मुखत्यार होता. तो महत्त्वाकांक्षी आणि उत्साही असल्यानें गझनीच्या महमुदी सुलतानांचें हिंदुस्थानांतील सवे मुळुख किंबहुना स्व हिंदुस्थान जिंकण्याचा त्यानें विचार करावा हें साहजिक आहे. महंमद घोरीस शिह्वाबुद्दीन (धर्माचा प्रज्वलित तारा) असा किताब होता.

त्याने प्रथम मुलतान आणि त्या भोंबताळचा प्रांत १ १७५ इसवींत जिंकला. आणि ११७८ त उछ-मुलतानच्या मार्गे नाहरवालावर त्यानें आपली फौज नेली, नाहरवाठाचा राजा यावेळीं अल्पवयी होता. तबकातमध्यें त्याचें नांव भीम चुकीने दिलें आहे. गुजराथच्या इति- हासांत आम्ही सांगेतलेंच आहे कीं, याचें नांव मूलराज होतें व तो भीमाचा वडील भाऊ होता. मूलराज अल्पवयी होता तरी त्याज-

शाहाबुदीन घोरी आणि हिंदूंची शेवटली लढाई. ४८३

वळ मोठी फौज आणि अनेक हत्ती होते. या लढाईत सुलतानाचा पराभव झाला तेव्हां तो परतून गेला,

११७९ इसवींत त्यानें पेशावर घेतलें, ब दोन वर्षानंतर सुल- तान खुश्रु याची राजधानी लाहोर हिजवर त्यानें हल्ला केला. गझ- नीच्या राजांची शक्ति कमी होऊन त्यांचे राज्य यावेळीं नष्ट होत चाललें होते. खश्र माठिकनें आपला मुलगा ओर्लांस पाठविला आणि एक हत्ती नजर केला, तेव्हां घोरीनें यावेळीं त्याची गय केटी. त्यानें सिंधकडे लक्ष फिरवून देवाळ जिंकून समुद्रापयंतचा सवे प्रदेश काबीज केला. ११८४ मध्यें तो लाहोरवर पुनः चाळून आला. रस्त्यांतील सर्व प्रदेश त्यानें ळुटून फस्त केला. पण यावेळीं शिया- लकोट हें शहर व किल्ला त्यानें बांधला. खुश्रु मलिक यास त्याचा विरोध कारितां येईना, तेव्हां तो लाहोरच्या बाहेर येऊन सुलतानाच्या स्वाधीन झाला. त्यास घोरानें कैद करून फिरोजकोह धोरची राज- धानी येथ पाठविले. तेथून त्याच्या मुलासह ११९१ त एका ‘कि- ल्ल्यावर त्याची रवानगी झाली, तेथेंच सुभार॑ १२०५ इसवीत तो मारला गेला, गझनवी शेवटचा सुलतान याची ही वर्तणूक आणि मृत्यु, विजापूरच्या शेवटच्या सुलतानाच्या अवरंगजेबाशीं झालेल्या वतनाप्रमाणेंच होता. मुएजुद्दीन घोरीनें लाहोरास एक अधिकारी नेमला, तेथें तबकात्‌ लिहिणारा ग्रंथकार याच्या बापास हिंदुस्थानच्या फौजेचा त्यानें काजी नेमिळं, असा बंदोबस्त करून तो गझनीस परतला ( इलि. २ पा. २९५ ). याप्रमाणें पंजाबांत जन्या नि: शक्त झालेल्या महमुदी राजवंशाच्या ठिकाणीं नवीन पराक्रमी व महत्वा- कांक्षी राजा गझनवबींच्या गादीवर आला. त्याचा उत्साह व उरक महमुदासारखाच होता, आणि त्यानें उत्तर हिंदुस्थानच्या रजपूत राजांशी युद्धे सुरवात करून त्यांचा अंत केला. शेजार शेजारजे राजे याचप्रमाणें इतिहासांत एकमेकांशीं युद्ध करीत आले आहेत.

प्रकरण विसावें. पृथ्विराजाशीं युद्ध,

घोरीच्या राज्यास लागूनच यावेळीं अजमीर व दिल्लीचा राजा पृथ्बिराज याचें राज्य होतें. वैयक्तिक गुणांत आणि राज्याच्या साम- थ्यांत हे दोघे सम्राट बरोबरीचे होते. या सम्राटांच्या झगडण्याचा इतिहास चंदभाटानं रासांत निराळा .दिला आहे आणि निजाम- उद्दीनने ताजुळ-मासर या ग्रंथांत ( याचाच अनुवाद तबकांत मध्यें आहे) निराळा दिला आहे. दोन्ही बाजू आपापल्या नायकाचे गुण अतिशयोक्तीनें दाखवतात. पण ऐतिहासिक रीतीनें विचार करितां ताज आणि तबकात यांत दिलेली हकीकत, या वृत्तानंतर वीस आणि पन्नास वर्षांनीं लिहिळी असल्यानें, रासाच्या हकीकतीपेक्षां अधिक विश्वसनीय आहे. रासाचे हृल्लींचे स्वरूप पृथ्विराजानंतर सुमारें तीनशे वर्षांचे असल्यानें त्यांत बहुतेक कथेला अद्ठूत रसाची जोड मिळाली आहे. आम्ही या कारणास्तव मुसलमान लेखकांनी दिलेली हकीकत धरून व त्यास ऐतिहासिक छाननीचा कस लावून पुढील वृत्त देतों. तथापि येथें हें सांगितलें पाहिजे की, ताजमधील हकीकत ज्यास्त तपर्शालवबार आणि काव्ययुक्त नाहीं याबद्दळ वाईट वाटतें. अर्थात्‌ ताजचा घोरींचा इतिहास उत्‌बीने लिहिलेल्या महमुदाच्या इतिह्यासाबरोबर मांडतां येत नाहीं.

प्रथम तबकातमधून दिलेला उतारा वाचकांसमोर मांडला पाहिजे ( इलि. २ पा. २९५ ). महमद धोरीनें हिंदूंच्या प्रदेशावर स्वारी करून युद्धास सुरवात केली, आणि सिरहिंदचा किल्ला घेऊन तेथें मुसलमान अधिकारी नेमला. “’ रायपिठोरा या किल्ल्यावर चाळून आला, तेव्हां सुलतानानें नरायन येथें त्याचा विरोध केळा, यावेळीं

पृथ्विराजाशी युद्ध. ४८५

हिंदुस्थानचे सर्व राजे ‘रायकोला’ बरोबर होते. ‘’ ( कोला राब्द निंदाव्यंजक आहे ). पृथ्विराजानें या युद्धाकरितां बहुधा हिंदू लोकांचें संयुक्त सैन्य, मुसलमानांची ही हिंदु लोकांच्याविरुद्ध आगाळिक मुळां- तच उपटून काढण्यासाठी, जमविळें असावें; आणि मग सुलतानावर चढाई केली असावी. परंतु संयुक्त सैन्य जमा झाल्याचा उपोद्वलक पुरावा कोरीव लेखांत मिळत नाहीं. “या लढाईत सुलतान एक भाला घेऊन दिछीचा गोविंदराव याजवर चाळून गेला. तो हत्तीवर असून सुलतान घोड्यावर होता. गोविंदरायाच्या तोंडावर सुलतानानें भाला मारला आणि त्याचे दोन दांत तोडले; परंतु गोविंदरायानें आपल्या भाल्याच्या फेकीनें सुलतानाच्या बाहूवर जोराची जखम केली. सुल- तानानें घोड्याचे तोंड वळवून बाजू काढली. घोड्यावरून कांहीं वेळाने तो पडूं लागला तेव्हां एक तरुण धाडसी अफगाण सुलता- नाच्या घोड्यावर उडी मारून बसला आणि त्यास सांवरून त्यानें सुरक्षितपणे घोड्यासह बाहेर काढलें. पण फौजेने सुलतान मेला असं समजून कच खाऊन पळ काढला. याप्रमाणें मुसलमानांचा हा महत्वाचा पराभव झाला.” हा वत्तांत खरा आहे किंवा हा पराभव नेहमीप्रमाणे अधिक संख्याबलानें किंवा विशिष्ट युद्धकोशल्यानें किंवा शोर्यानें हिंदूंस मिळाला याची चचा करणें आवश्यक नाहीं. एक गोष्ट तथापे येथें सांगण्यासारखीं मुसलमानांच्याच वर्णनावरून दिसते तो ही कीं मुसलमान हिंदुप्रमाणेंच खरोखर पराजय झाला नसला तरी सेना- नायक राजा मेल्याची खबर ऐकून पळतात. पण हें आश्चर्यकारक नाहीं. पूर्वेकडील फौजा राष्ट्राकारेतां ठढत नसून राजाकारितां लढतात. राष्ट्रीय भावना जशी हिंदूच्या अंतःकरणांत नसते तशी मुस- लमानांच्याह्ि अंतःकरणांत नसते, राष्ट्रीय भावनेऐवजीं धार्मिक भावना _ असते ती यावेळीं दोन्ही बाजूला सारखींच होती. असो, या लढाईंत

४८द तिसरी हिंदु राज्ये.

शहाबुद्दीन धोरीचा पक्का पराभव झाला यांत शंका नाहीं (११९१ इ.) हिंदु लोकांमध्ये अशी समजूत आहे चालत आली आहे कीं, यावेळीं सुलतान पकडला गेला, रासांत वर्णिळेला धीर पुंडीराचा । कथाभाग स्पष्टपणे काल्पनिक आहे, तरी पण जेव्हां गोविंदरायानें । ( याचें नांब रासांत मुळींच आलें नाही. आणि हा पृथ्बिराजाच्या पुढच्या ळढाइत मारला गेला ) सुलतानला जबर जखम केली आणि सुलतान आपल्या घोड्यावर डळमळू लागला, त्यावेळेस पुंडीरनें । घोड्यावर उडी मारून त्यास पकडळें असेळ आणि शेवटीं कैद केलें असेल. प्ृुथ्विराजानें तीस हत्ती आणि पांचशे घोडे घेऊन सुलता- नास परत जाऊं दिलें अशी आणखी समजूत आहे. ही हकीकत ऐतिहासिक रीत्या खरी दिसते. ताजमध्यें या पराजयाचें वर्णनच नाहीं व सुलतानच्या पृथ्विराजावरील दुसऱ्या स्वारीपासूनच हा इतिहास- कार शहाणपणाने इतिहास देतो. ही गोष्ट अशक्‍य आहे कीं, रासांत सांगितल्याप्रमाणें सुलतान अनेक लढायांत पुन्हां पुन्हां कैद झाला आणि पृथ्विराजानें औदार्यानें त्यास दरवेळी बंधमुक्त केळें. कृष्णाच्या व जरासंघाच्या वेळेपासून तों मुंजापयंत लोक असल्या गोष्टी एकाच्या अनेकपट करितात. कल्याणच्या तैंलप चाळूक्यास मुंजानें सहा वेळ पराजित करून पकडळें आणि सहा वेळ खंडणी घेऊन सोडून दिलें असें गुजराथचे बखरकार अतिरायोक्तीनें सांगतात. पण अतिरायो- क्तीला सुद्धां कांहीं आधार असतो, आणि म्हणून शाहाबुद्धीनला या टढाइत कैद झाली आणि पृथ्विरारानें त्यास खंडणी घेऊन सोडून दिलें हदी गोष्ट मान्य करण्यासारखी आहे. महमुदानोहि जयपालास पहिल्या लढाईनंतर अशीच खंडणी घेऊन कैदेंतून मुक्त केल्याचे आपण पाहिलेच आहे. | या वृत्तासंबंधानें खरी हकीकत कांहीं असो, सुलतानाचा परा- भव झाला हं दोन्ही बाजूस मान्य आहे. या लढाईंचें ठिकाण नरा-

पृथ्विराजाशी युद्ध. ३८७

यन म्हणून दिलें आहे. हें मुळांत तरायन असावें. “लढाईची जागा सरस्वतीच्या मैदानांत सांगितली आहे. पण कनिंगहूमच्या मतें लढा- ईचें नक्की ठिकाण रोक्षी नदीच्या कांठीं तराइन पासून चार मेल आणि कर्नालच्या उत्तरेस दहा मैल होतें. तराइन याचें नांव अझीमा बाग असेंहि आहे. !? ( इलियट २ पा. २९५ ). कर्नाल गॅझेटियर ( १९१८) यांत अगदीं अलीकडची माहिती पा. १० वर येणेंप्र- माण दिली आहे. “’ ही लढाई नारदकमध्ये नईवाडी नार्दिना गांवा- जवळ ठाणेश्वरच्या दक्षिणेस तैरा मैळ आणि तरावडीपासून तीन मैळावर झाली. ?

तबकात नासिरामध्यें पुढील हकीकत अशी दिली आहे कौ, सुलतान परत फिरल्यावर पुथ्विराजाने सिरहिंदच्या किछथयास वेढा दिळा व तो अकरा महिने चालला, हें जर खरे असेल तर सुल- तान पकडला जाऊन नंतर बंधमुक्त झाला हें संभवनीय दिसत नाहीं. कारण सुलतानाला सोडतांना त्यानें अन्यायाने घेतलेला किला सोडून देण्याची शर्त त्याजवर निःसंशय घातली गेली असती आणि युद्ध पुढें सुरू राहिलें नसते. किंबहुना इतक्या लवकर लढाईहि झाली नसती. सलतानानें परतून तयारी केली आणि एक फारच मोठें सैन्य घेऊन तो लढाईसाठी पुन: पथ्वीराजावर चाळून आला

ताज-उल॒-मासिरमध्यें ही सर्व हर्काकत गाळून इतिहासास असा प्रारंभ केला आहे कौ, एक विश्वास आणे पूज्य इसम घधुलतानानें अजमीरला पाठविला, आणि पृथ्विराजास असा निरोप कळवला कीं, त्यानें इस्लामी धर्म स्वीकारून सुलतानाचें मांडलिकत्व कबूल करावें. या रीतीनें या प्रंथांत या प्रकरणास धार्मिक स्वरूप दिलें आहे. महमुदाच्या स्वाऱ्यांप्रमाणें महंमद घोरीच्या या युद्धांत कांहीं घार्मिक हेतु होता असं आम्हांस वाटत नाहीं. जरी मुसलमान लेखक तीस धार्मिक स्वरूप देतात तरी हो लढाई केवळ राज्य-

४८८ तिसरा हिदु राज्ये.

बिस्ताराकरितांच होती; आणि अधिक ऐतिह्यासिक स्वरूप असलेल्या तबकात ग्रंथांत हिचें वर्णन असेंच केलेलें आहे. |

ताजमध्यें या शेवटल्या लढाईची तपशीलवार हकीकतहि दिली नाहीं. त्यांत एवढेंच म्हटलें आहे कीं, या लढाईंत इस्लामाच्या फोजेचा जय झाला, आणि एकलाख हिंदु तात्काळ नरकाच्या अग्नींत जाऊन पडले. तबकात हा खरा इतिहासप्रंथ आहे. त्यांत महत्त्वाचा तपशील दिला आहे. इस्लामी फोजंत असलेल्या एका शिपायापासून प्रत्यक्ष हकीकत ऐकून हा लेखक ल्हितो कीं, इस्लामी फौज एक लक्ष वीस हजार चिलखत घातलेल्या घोडेस्वारांची होती. ( हिंदूकडील फोजेची संख्या दिलेली नाहीं). सुलतानाची फौज येण्य पूर्वीच किला सर झाला होता. हिंद्फौज परतन नरेनाजवळ पडली होती. (तेव्हां या दुसऱ्या लढाईंचें ठिकाण पूर्वीचेंच होतें असं दिसतें ). या लढाइत मुसलमानांच्या चार्लांचे वर्णन तबकातमध्यं पुढील प्रमाणें केलेलें आहे

सुलतानाने आयली फोज अशी लावली कीं, आपल्या फॉजचा मुख्य भाग निशाणांसह मागेंच ठेविला व तेथें हत्ती ठेवले. हलका चिलखते घातलेले घोडेस्वार यांच्या दहा दहा हजाराच्या चार तुकड्या केल्या व त्यांना पुढें पाठवून शत्रस पूर्ववाजूस आणि डाव्या बाजूस त्रासवून सोडण्यास सांगितलें. याप्रमाणे शत्र त्रस्त झाला तेव्हां चोघांनीं मिळून त्याच्यावर भरघांब हृया केला. या चालीनें शत्र बिस्काळित झाला आणि पराभव पावला. इंश्ररानं आम्हांस जय दिला आणि शत्र पळाला. ” (पा. १९७)

या लढाईची जी तऱ्हा मुसलमानी इतिहासकार लिहितात त्याव- रून जयपाळ व आनंदपाळ यांच्याशीं झालेल्या महमुदाच्या लढाई- प्रमाणेच ती दिसते. म्हणजे घोडेस्वारांच्या तुकड्यांनीं वारंवार हछा करणें आणि शेवटीं रिझवे फोजेनें एकदम हृया करणें. अहमदराहा अबदार्लीचीहि युद्धाची तऱ्हा अर्शाच होती. हिंदूनीं कोणत्या तऱ्हेन

पृथ्विराजाक्ी युद्ध. ४८९

या हछ्याचा प्रतिकार केला हें कळत नाहीं. रासांतील युद्धाची वर्णने काल्पनिक आहेत आणि चेद हा महाभारतांतील व्यूह्ांची वर्णनें नक्कल करून निरानेराळ्या प्राण्यांची आकृति व्यूहास देतो. रासांतील वर्णने प्रत्यक्ष पाहणाऱ्यांचीं नसून कित्येक शतकांनंतर कवीच्या कल्पनेंतून निघालेली आहेत. कांहीं असो, युद्ध घनघोर झालें आणि लढाईचा परिणाम पुष्कळ वेळ अनिश्चित होता, ही गोष्ट “ परमेश्वराने आम्हांस जय दिला ! ह्या तबकातमधील. एका वाक्यावरून दिसून येते. असई किंवा रासी येथील लढायांप्रमाणें शत्रू- पाशी असलेलें हल्यार अधिक सुधारलेले नसल्यानें किंवा हिंदूहि शूर- त्वांत कमी नसल्यानें किल्येक लोक म्हणतात त्याप्रमाणें हीं लढाई सहज विजयाची नव्हती. पृथ्विराजानें या शेवटच्या लढाईत अतिशय परा- क्रम केला हें निर्विवाद आहे. यावेळीं त्यास दैव प्रतिकूळ होतें रासामध्यें असें वर्णन केलें आहे कीं, संयोगितेशीं विवाह झाल्यावर पृथ्बिराज केवळ ऐषआरामांत दंग झाला आणि त्यानें सैन्याकडे दुर्लक्ष केळे; पण हें सर्व काल्पनिक दिसतें. पृथ्विराज यांवेळीं रासांत दाखविल्याप्रमाणे दिल्लांत नसून अजमीरांत होता. दिर्छाचें महत्त्व कुतुबुर्दानापासून वाढलें. जे इतिहासकार अलीकडच्या काळांत लिहि- तात त्यांस व खुद्द फिरिस्ता यास, दिल्ली मध्ये आणण्याचा मोह सुटत नाहीं; आणि रासांमध्यें तर सर्व हकीकत दिल्लीचीच दिली आहे. यामुळें रासांतलीं वर्णनें ब लढणाऱ्या वीरांचीं नांवें सर्व काल्प- निक आहेत; विशेषतः चितोडच्या समरसेहाची दिळेडी हकीकत त्याज्य आहे, हं पूर्वी सांगितलेंच आहे.

पृथ्विराजाचा अंत कसा झाला याबद्दल रासांत दिळेळी हृकोकत अनोतिहासिक कल्पनेची कमाल आहे. यांत नेहमींची सूडाची गोष्ट बनविली आहे. महमद घोरी गख्खरांच्या हातून सिंधुनदीच्या किना- ऱ्यावर मारला गेल्याचा वृत्तांत विसरला गेल्यावर किल्येक शतकांनीं

४९० तिसरी हिंदु राज्ये.

ही सूडाची गोष्ट निघाली. परंतु पृथ्विराज कसा मेळा याचें अद्या- पहि पानिपतच्या लढाईंत भाऊसाहेब किंवा जनकोजी रिंदे कसे मेले याप्रमाणेंच गूढ आहे. ताज ब तबकात यांत भिन्न वृत्तांत दिला आहे. तबकात इतकेच म्हणतें की, “’ रायापेठोरा हत्तीवरून खालीं उतरला आणि घोड्यावर बसून भरधांव बाहेर निघाला, पण सरस्वतीजवळ पकडला जाऊन नरकास पाठवला गेला ‘ ताजची निराळी हकीकत अशी .आहे कीं (पा. इ. २ २१५) ““’अजमीरचा राय पकडला गेला आणि त्यास जीवदान दिलें गेलें. पुढें तो अजमीर येथें नेला गेला तेव्हां तो कांहीं विरुद्ध बेत करतांना पकडला गेला (या बेताचे स्वरूप स्पष्टपणें लक्षांत येत नाहीं ). तेव्हां त्यास ठार मार- ण्याचा हुकूम दिला गेला आणि त्याप्रमाणे एका तलवारीनें या दैव- हीन नीचाचे शरीर धडापासून वेगळें केलें गेलें.!? अशी भिन्न हकी- कत असल्यानें पृथ्विराज कसा मेला हें ठरावेणें कठिण झालें आहे.

  1. 1.) 3 (५ (5. (1. टिप्पणी नं. १-महमद घोरी आणि पृर्थ्वाराज.

रव्हटॉनें तबकातचें भाषांतर केलें आहे. त्यांत इलियटनें दिलेल्या उताऱ्याहून पाहिल्या लढाईविषयीं कांहीं भिन्न वर्णन केलें आहे. “ दोन्ही फोजा जेव्हां शिस्त लागून एकमेकांवर चालून गेल्या, तेव्हां सुलतानानें एक भाला घेऊन दिल्लीचा गोविंदराय हत्तीवर बसून सैन्याच्या पुढें येत होता त्याजवर हल्ला केला. सुलतानानें गोविंदरायाच्या तोंडावर भाला मारला व गोविंदरायानें सुलतानावर एक सांग फेकली. तिनें त्यास मोठी जखम केली. सुलतानानें घोड्याचें तोंड वळवून मागें प्रयाण केलें. परंतु जखमेच्या वेदनेने त्यास घोड्यावर फार वेळ बसबेना. इस्लामच्या फौजेचा पराभव झाला आणि ती पक्की उघळून गेली. सुलतान घोड्यावरून खालीं पडत होता तें पाहून एका खिलजी तरुण पोरानें सुलतानास ओळखून त्याच्या घोडयावर उडी मारून मागें बसून सुलतानास घरले व घोड्यास आपल्या आवाजानें इशारा कर्रांत सुलतानास रणांगणाच्या बाहेर काढलें. फ्रौजेत सुलतान नाहीं असें पाहून फोजेनें मोठा दुःखाचा आक्रोश केला;

शेवटल्या लढाईतील मुसलमानांची चाल. ४९१

आणि फौज मागें हटत पाठलागापासून सुराक्षित अत्ना ठिकाणीं तिनें मुक्काम केला. इतक्यांत एकाएकीं सुळतानहि येऊन पोहोचला, ” (पा. ४६१–२३ ),

या ठिकाणी रव्हटींनें एका टिपेंत नंतरच्या इतिहासकारांनी व फिरिस्तानें दिलेली हकीकत व हल्लींच्या इंग्रजी इतिहासकारांनी फिरिस्तावरून दिलेली हकीकत दुसऱ्या टीपेंत दिली आहे. फिरिस्तानें पिठोराची फोज दोन लाख माणसें आणि तीन हजार हत्ती अशी दिली आहे. तो आणखी असं सांगतों का, मुसलमानी डाव्या व उजव्या बाजूचा पराभव झाला होता व त्यांनीं तांडाहि फिरावेले होतें. पण मध्यावर असलेल्या सुल- तानाने तें मनांत न आणतां शत्रूवर जोराचा हल्ला केला. शेवटली सांगण्यासारखी गोष्ट अश्शी काँ, एका हर्काकतींत पुढील वर्णन आहे. “ सुलतान घोड्यावरून खालीं पडला आणि तों कोणास रात्र पडे पर्येत समजला नाहीं. रालीं रणांगणावर गुलाम त्याचा तलास करण्या- कारेतां आले, तेव्हां तो त्यास म़ेतामध्यें सांपडला.” या मिन्न वर्णनावरून रासांत दिलेली सुलतानं पकडल्याची हकीकत संभवनीय दिसते. तब- कातच्या वर्णनावरून सुद्धां ज्या वेळेस त्यास जखम झाली त्यावेळेस तो आपल्या फोजेहून दूर होता असें दिसतं; आणि परत फिरल्यावर तो कसा बसा घोड्यावर राहिला, या वेळीं हिंदूक्डील तरूण राजपूत धीर घुडीर त्याची ती दशा पाहून झपाट्यानें पुढे आला असावा आणि त्यानें त्यास पकडले असावे. त्यास मुक्त करून “माझ्याशी घुनः लढ? असे वीरोदात्त प्रर्थ्वाराजानें सांगणें त्याच्या स्वभावाला आअविरोधी नाहीं, याच गोष्टीवरून मुंजानें तेलाला सहा वेळां सोडलें ही कथा उत्पन्न झाली असावी. महमुदानें खंडणी घेऊन जयपालास सोडलें त्यावेळेस सुद्धां आपल्यास पुनः युद्ध करावें लागेल असेंच महमुदासहि वाटलें असावे.

टीप नं. २-शेबटल्या लढाईतील मुसलमानांची चाल.

टॅव्हटींनें केलेल्या तबकातच्या भाषांतरांत एथ्वीराजाच्या शेवटच्या लढाईतील .चार्लांचें थोडेखं निराळे वणन षुडीलप्रमाणे आहे, ( पा. ४६७ ) “सुलतानानें आपल्या फोजेची मांडणी केली. फोजेच्या मध्यावर

४९२ तिसरा हिंदु राज्ये.

सामानसुमान, निशाणें आणि हत्ती यांस कित्येक मेल मागें ठेवलें. त्यानें आपल्या फोजेचा रांगा नीट लावून सावकाशपणे चाल केली. पण हलक्या हत्याराचें व चिलखताचे घोडेस्वार चार टोळ्यांत विभागळे, व त्यास (पुढें जाऊन) शत्रूवर ‘चारी बाजूनें हल्ला करण्यास सांगितले, डावी ब उजवी बाजू, अघाडी व पिछाडी यावर दहा हजार घोड्यावरील घनुष्यवाल्यांनी शत्रूच्या फोजेस सारखें गुंतवावे आणि त्यांचें हत्ती, घोडे आणि पायदळ लढाइंस पुढें होतील तेव्हां. एकदम तोंड फिरवून एका घोड्याच्या टप्यावर त्यांच्यापुढे पळत सुटावे अशी सुलतानाने मुसलमानी फोजेख आशा केली आणि ती तिने अक्षरशः पाळली, परमेश्वराने इस्लामास जय दिला आणि शत्रूची फोज मारली गेली, मेजर रव्हटीं हा एक फोजी अधिकारी असून या वर्णनावर अज्ली टीप देतो कीं या लढाईतील वर्णिलेली मुसलमानांची चाल नीट लक्षांत येत नाहीं, फोजी दृष्टीनें आम्हांस या वर्णनावर कांहीं टका करतां येत नाही. पण एवढें सांगण्यासारखे आहे कीं मुसलमानानीं जिंकलेल्या तीन्ही मोठ्या लढायांत ( दोन महमुदाच्या आणि एक शिहाबुद्दीनाची ) मुसलमानी घोडदळानें मोठें काम बजाविलें, हिंदूचा भर नेहमी त्यांच्या हस्तिसेन्यावर दिसतो. किंबहूना कोरीव लखांतहि वीरांची मोठी स्तुति म्हणजे त्यानी हत्तींचे मस्तकांचे कुंभ फोडले अर्शीच येते, परतु अलेकू- झंडरच्या वेळेपासून हिंदुस्थानांतील हत्ती ससवलेल्या घोडदळापुढें टिकू शकत नाहींत. महमुदाने तुर्कस्थानच्या तुकाविरुद्ध हत्तीचा उपयोग केला हं खरें. परंतु त्याचें घोडदळ हत्तीपुढें जाण्यास सरावळेले नव्हतें. दुसरें, शत्रूच्या फोजेलळा अघाडीवर व पिछाडीवर वारंवार त्रास देण्यापासूनाहे जय मिळविण्याच्या कामांत बराच फायदा होतो. शिह्ाबुद्दीनानें मुख्य फोज सावकाह चालविली याचें कारण आपल्या घोड्यांच्या विभागास शत्रूच्या अधाडीवर व पिछाडीवर हल्ला करण्यास वेळ मिळावा हें होतें. प्राचीन हिंदूंची लढाईची तऱ्हा व महाभारतांतील व्यूह इल्लीच्या फोजी विशिष्टज्ञांनी अभ्यासण्यासारखे आहेत. परतु आम्हांस असे दिसतं की, हिंदु सरळ लढणारे असत; शात्रस फसविणें किंवा एकाएकीं त्यावर छापा घालणें इत्यादि युक्त्या ते योजीत नसत, शेवटले सांगणे हं काँ,

शेवटल्या लढाईचे रासांतील वर्णन. ४९३

एक मजबूत राखीव भाग ( रिझर्व ) ठेवणें आणि त्या भागानें ऐनवेळी | जोराचा दृल्का करणें पुष्कळ वेळां फायदेशीर असतें. ह्याशिवाय हत्ती पराजित झाले म्हणजे आपल्याच फोजेत भीति पसरवून नाशहि कारेतात हं सांगण्यासारखे आहे. ह लक्षांत घेऊन बहुधा शिह्ाबुद्दीनानें या लढाईत आपले हत्ती कित्येक मेल मागें ठेविलें,

टिप्पणी नं. ३-शेवल्या लढाईचे रासांतील वणेन,

शिह्ाबुद्दीन घोरीशीं झालेल्या प्रथ्विराजाच्या शेवटच्या लढाईचे वर्णन रासांत दिलेलें बहूतेक सवे काल्पनिक असलें तरी येर्थे थोडक्यांत देणें मनोरंजक होईल. रासा ग्रंथ महाभारताच्या घतींवर स्पष्टपणें बनविला आहे हं आम्ही कित्येकदां सांगितलेंच आहे. महाभारताचे अनुकरण करून युद्धापू्वी झालेलें अनेक अपशकुन रासांत प्रथम सांगितले आहेत. पृथ्बिराजाला श्याप झाल्याची एक कथा यांत सांगितली आहे. नवी राणी संयोगिता हिच्या नादानें एथ्विराजानें राज्यकारमार अगदी टाकून दिला असोहे वणन आहे. एक सरदार हाहुलीराय याचा एथ्विराजाने अपमान केला त्यामुळें त्यास सोडून तो कांगडा येथ गेला व तेथून त्याने शिहाबुद्दी नचें मन वळवून त्यास प्रथ्विराजावर हल्ला करण्यास लाविलें असेंहि वर्णन आहे. मुसलमानी हकीकतींत या वर्णनांस दुजोरा सांपडत नाहीं. प्रत्यक्ष युद्धाच्या सर्व वर्णनांत असा दोरा चालतो की, भावी अपयश्याची काळी छाया राजषुतांच्य अतःकरणांत पानिपत येथ मराख्यांच्या प्रमाणें भरून गेली होती. १ण मुसलमानी हर्कांकत वर्णनावरून आपल्यास असें दिसत नाही. पृथ्विराजाचा पूर्व लढाईंत जय झाला होता आणि फाजिल आत्मविश्वा- सानें त्यानें घोरीस सोडुन दिले होते. सिराहदचा किला नुकताच स्वाधीन झाला होता. पण रासांत सव वृत्त भलतंच करून या युद्धाला निराळी जागा व निराळा काळ दिला आहे. पाहेल्या लढाईनंतर दुसऱ्याच वर्षी ही लढाई झाली, आणि पथ्विराज सिरहिंदहून अजमीर किंवा दिली येथे परतलाहि नव्हता. रासामध्यें शिहाबुर्हदान पकडल्यानंतर कित्येक षो्नीं ही लढाई झाली आणि दिल्लींत संयोगितेशीं एथ्विराज मोज

म, भा…३१२

ल्श

४९४ तिसरा हिडु राज्यं.

कित्येक वर्षे करीत राहिला असें वर्णन आहे. लढाईची जागा पानिपतचे मैदान दिसतं. सर्व कुरुक्षेत्रास पानिपतचे मैदान म्हणतां येईल. या रीतीनें मैदानाची जागा जरी जवळ येते तरी या लढाईस पानिपतची लढाई म्हणतां येणार नाही.

शिह्ा बुद्दीनची कोज एकलक्ष घोडा, नऊ लक्ष पायदळ आणि दहा हजार हत्ती सांगितली आहे, ही स्पष्टपणें अतिशयोक्ति आहे. हिंदूची फोज एके ठिकाणीं ८३ हजार आणि दुसरे ठिकार्णी सत्तर हजार सांगि- तली आहे. हा अंदाज बरोबर दिसतो. पूर्वीच्या लढाईतील मृत्यूनीं आणि सिराहंदच्या वेढ्यांतील मृत्यूनीं एथ्विराजाची फोज बरीच कमी झाली असावी. या लढाईत एक लक्ष पंचवीस हजार घोडा मुसलमानी फोजेची मुसलमानी इतिहासकारांचीं सांगितलेली संख्या असल्यानें हिंदूंच्या संख्ये- पेक्षां मुसलमानांची संख्या जास्त होती असं दिसतें

रासांत हिंदूच्या फो्लेची मांडणी ( काल्पनिक ) येणेप्रमाणे दिली आहे, डाव्या बाजूस तेहतीस हजार फोजेनिशी अनेक सरदारांसह समर- स्रिंह होता. उजव्या बाजूस एकवीस हजार फोजेनिशीं जेतराव परमार होता, अघाडीला एकोर्णांस हजार फोजेनिशी हाहुलीराय होता. आणि मध्यावर सर्व युद्धावर नजर ठेवीत पएथ्विराज दहा हजार फॉजेनिशी होता. येथे महाभारताच्या वणनानुसार अनेक रजपूत घराण्यांचे प्रसिद्ध परवेज काणत्याना कोंणत्या फोंजबरोबर असल्याचें वणन आहे. ही तपक्षीलवार हकीकत हिंदुस्थानांतील रजपूत कुलांना शाश्वत महत्त्वाची वाटते हें सांगा- वयास नको.

ऐन लढाइंच्या प्रसंगीं प्रत्येक पक्षाने दुसऱ्यास तहाचे निरोप पाठ- विणें व एकमेकांस दूषणें देणें हा ठराविक प्रकार भारती युद्धापासून परवांच्या युरोपीय भारती युद्धापयेत चालत आलेला रासांताहे अव- मानिलेळा नाहीं. पण रासांत वार्णिळेले संदेश किती अनेतिहासिक आहेत, हें “ मळा अधी पंजाब दे आगि तुझा युवराज ओलीस दे?

1 ।

ह्या शहाबुद्धीनच्या मागण्यावरून दिसेल, कारण सर्व पंजाब प्रांत घोरी-

च्या पूर्वीच ताब्यांत होता, किंबहुना लाहोर राजघानीसह सबंध पेजाब

या ढढाई पूर्वी मुसलमानांच्या ताब्यांत सुमारें दोनशें वर्षे होता.

शेवटल्या लढाईचे रासांतील वणेन. ४९५

प्रयक्ष युद्ध तीन चार दिवस चाललेले दाखविलें आहे. आणि दर दिवशीं निरनिराळे व्यूह महाभारतांतल्याप्रमाणें वार्णिळे आहेत. बहुधा सामुदायिक युद्ध न वर्णितां निरनिराळ्या योद्धथांचीं द्वद युद्धे महा भार- तांतल्या प्रमाणेंच वर्णिली आहेत. आणि युद्धाचे वैचित्र्य तितकेच काल्यानेक पण मनोरंजक आहे. ता’च वर्णनेंहि पुनः घुनः आली आहेत. | पकडल्याचें वर्णन चारदां आहे. प्रथ्विराजानें आपल्या बाणांनी अनेकांस मारले, नंतर तलवारीने, नतर कऱ्यारीनें मारिले शेवटीं पकडला जाऊन त्यास गझनीस नेलं व तेथें काराग्रहांत त्याचे डोळे काढले गेले. अघ असतांनाहि आपल्या शद्ववेची घनुष्य चालविण्याच्या चातुर्याने शिहा- बुद्धीनचा त्यानें प्राण घेतला आणि नतर त्यानें आपल्या स्वतःस मारून घेतलें. अश्या रीतांचा हा शेवटचा काल्पानिक चमत्कार आपल्या कथानकावर चेदानें कलशरूपी चढविला आहे. ही सूडाची कथा खरी मानण्यास योग्य नाहीं हें आम्हीं पूर्वी सांगितलेंच आहे.

महाभारतांतील युद्धाप्रमाणेंच पृथ्बिराजाकडील सर्व बीर मोठे पराक्रम करून शेवटीं रणांगणांत मारले गेले असें दाखविलें आहे. या युद्धाचे वर्ष आनंदसंवत्‌ ११५८ म्हणजे ११९२ इस्रवी मात्र रासांत बरोबर दिलें आहे.

प्रकरण एकविसावे. अजमीर व दिल्ली यांचा उच्छेद.

पृथ्विराज दुसऱ्या लढाईत पराजित होऊन मारला गेल्यावर, पंजा- बघ्या हिंदूच्या स्वातंत्र्यनाद्याच्या पहिल्या लढाईप्रमाणेंच (१००८) हा दुसरा प्रसंग उत्तराहंदुस्थानाचा स्वातंत्र्यनाशक झाला. रणनीति- कुशळ सेनापतीप्रमाणे शिहाबुद्दीन घोरीनें शत्रूची मुख्य राजधानी अजमीर याजवर एकदम चाल केली. ती विरोध केल्याशिवाय पडली आणि टढुटली गेली हे सांगणें नको. ताज वर्णन करतो, “ द्रव्य इतकें मिळाळें कीं, समुद्र व डोंगर यानीं लपविलेली सर्व संपात्ते येथें बाहेर काढली असेंच वाटलें. सुलतान अजमिरास असतां त्यानें सव मूर्ति तोडल्या व देवळें पाडिलीं आणि त्यांच्या जागीं मशिदी आणि शाळा बांधल्या. ‘’ विग्रह्राज तितरा यानें संस्कृत पाठशाळा बांधली होती, तिचें रूपान्तर “ अढाई दिनकी झोंपडी ! या नांवाच्या मश्ी- दीत घोर्राच्या हकमान झालें हे आम्हीं पूर्वी सांगितलेंच आहे ( ताज पा. २१५ ), अजमीर जिंकून व ठुटन घेतल्यावर राजनीतिनिपुण मुत्सद्याप्रमाणे शहाबुद्दीनने अजमौरचें राज्य पृथ्बिराजाच्या मुलाच्या स्वाधीन केले; ते एकदम खालसा केळे नाहीं. पण पृथ्बिराजाचा पुत्र रेनसी यास एक वार्षिक खंडणी देण्याचें कबूळ करवून आपला मांडलिक बनविले, ताज म्हणतो, “’ त्याच्या ठिकाणीं शहाणपणाची चिन्हें आणि चांगुलपणाची लक्षणें दिसत होतीं. ‘” याचा अर्थ असा कीं, परिस्थिते ओळखण्याइतका व खंडणी आणि मांडलिकत्व कबूल करण्याइतका तो शाहृणा व चांगला होता. ह्या हकीकती- वरून पृथ्विराज लढाइत मारला गेला हेंच खरें दिसतें. कारण अज- मीरांत पृथ्बिराजाचा शिरच्छेद झाला असता तर रेनसीनें मांडलिकत्व कबूऴ करून राज्य पतकरिळें नसतें ग

अजमीर व दिल्ली यांचा उच्छेद. ४९७

अजमीरचा बंदोबस्त केल्यावर चोहाणांची दुसरी राजधानी दिल्ली इजवर सुलतान चाळून गेला. “ तेथें त्याच्या समोर सव हिंदुस्था- नांत उंच व मजबुतपणा यांत अद्वितीय असलेला एक किला उभा राहिला. किल्ल्याने विरोध केला आणि दोन्ही बाजूस रक्ताचे पूर वाहिले. सरतेशेवटी किल्ल्याच्या अधिकाऱ्याने गुलामीच्या रस्त्यावर येऊन खंडणी देण्याची व नोकरी करण्याची शर्त मान्य केली. नंतर सुलतान गझनीला परत गेला. परंतु फौज दिलछलीजवळ मोजे इंदरपत येथें राहिली. ‘/ जिंकलेल्या मुळ्खांत ताबेदारी आणि खंडणी अमलांत आणण्यासाठी फोज ठेवणें जरूर असतें हें सहज लक्षांत येईल.

तबकात लिहिणारा ग्रंथकार म्हणतो कीं, ‘। अजमीर राजधानी, सर्व शिवालिक डोंगर आणि हांसी, सरसूती आणि दुसरे प्रांत या लढा- इंतील जयाची फळें होत. ‘’ ५८८ हिजरी (११९२६. स. ). शिवालिक डोंगर याचा अर्थ सपादलक्ष म्हणजे अजमीर देशाच्या सरहद्दीवरील डोंगर. या सवे प्रांतांचा अधिकार कुतुबुद्दीनकडे सांगि- तला गेला व तो कोहरामच्या किल्ल्यांत राहूं लागला. कोहरामचे हछींचे नांव निश्चित नाहीं. दिछींत जो अधिकारी प्रथम लढला आणि नंतर शरण आला तो कोण होता हें ठरवितां येत नाहीं. तबकात असें म्हणतो कौं, दिछीचा गोविंदराय पृथ्विराजाशीं झालेल्या शेवटल्या लढाइत मारला गेला. तेव्हां चौहाणांच्या तर्फे कदाचित्‌ तेथें दुसरा अधि- कारी असेल व त्यानें अजमीरचा राजा रेनसी यानें मांडलिंकी कबूल केली हें जाणून आपणहि तेंच मान्य केलें असावें.

पण हा कांहीं वेळ मिळाळेला अधिकार टिकला नाहीं, कारण अशा मांडलिकी मागून दोवटचा उच्छेद लौकर येणारच. ताज- मध्ये जतवानू म्हणून नांव दिळें आहे ( हें नांव पर्शियनमध्यें चोहानाच्या ऐवजीं स्पष्टपणें चुकीनें वाचळें गेळें आहे ), या नांवाच्या सरदारानें हांसीवर हला केला. त्याचा प्रतिकार करण्यासाठीं कुतुबु-

४९८ तिसरी हिंदु राज्ये.

द्दीन एकदम चाळून आठा आणि एक खडाजंगीची लढाई झाली. “ देन पोलादाचे डोंगर एकमेकावर आदळले. आणि रणभूमि वीरांच्या रक्ताने लाळ झाली. जतवान्‌ मारला गेला आणि हिंदूचा पूर्ण परा- भव झाला. हांसीचा किल्ला मुक्त होऊन दुरुस्त केला गेला. कुतुबु- द्दीननें मीरतकडे वळून तोहि किल्ला घेतला. शेवटीं त्यानें दिल्लीवर दृ्ला करून तोहि किल्ला घेतला. त्यानें शहरांत शिरून मूर्त आणि मूर्तिपूजा यांपासून शहरास मुक्त केलें, आणि मंदिरांच्या ठिकाणीं मशीदी बांधल्या. !? दिल्लीवर हा हृछा करण्यास काय कारण झालें हे ताजमध्यें सांगितळें नाहीं. तबकातमध्येहि जास्त खुलासा नाहीं. त्यांत थोडक्यांत असें म्हटलें आहे कोौं, तेथून ( कोहृरामहून ) निघुन कुतुबुद्दीननें ११९३ त मीरत घेतळें आणि व्याच वर्षी त्यानें दिल्ली काबीज केली. तथापि कारण असें कल्पितां येईल कीं, कुतुबु- द्दोनला राजधानी करण्यासारखे मजबूत व महत्त्वाचे ठिकाण पाहिजे होतें. अजमीर पृथ्विराजाच्या मुलास दिलें गेल्याने आपल्या सत्तेची राजधानी करण्यास दिछीच योग्य आहे असें त्यानें पाहिलें. याप्रमाणें दिली मुसलमानी राज्यास जोडली जाऊन लौकरच ती हिंदुस्थानची राजधानी पुढें सांगितल्याप्रमाणे झाली. टिप्पणी १-पृथ्विराजाची जुनी दिल्ली.

गाडन साहेबाच्या “ दिल्लीची सात शहरें ” या पुस्तकावरून आणि जुनें मुसलमानी वृत्तांत व भारतीय कोरीव लेख, तसंच एकंदर जागेचं आम्हीं स्वतः केलेलं निरीक्षण, यांवरून ज्या दिल्लांत एथ्विराज राज्य करीत होता त्या दिल्लीची योग्य कल्पना देतां येते. एथ्बिराजाच्या दिल्लीहून इंद्रप्रस्थ गांव कुतुबुद्दीनच्या वेळीं निराळे होते ही गोष्ट मुसल- मानी लेखांवरून स्पष्ट आहे. हं गांव व हृल्ला प्रसिद्ध असलेले इंद्रपतू एकच होय. याच्या नेक्त्येस सरासरी दोन मेळावर अनंगपाल़ तोमराने लालकोट नांवाचा किल्ला बांधला आणि एक शहर वसविले तंच हल्लीच

पृथ्विराजाची जुनी दिली. ४९९.

मेहेरोली नांवाच्या लहान गांवाजवळ असलेलें मूळ दिल्ली शहर होय. लालकोंट किल्ला हल्लीं लेथ कुतुबुर्ददानची मशीद आहे तीच जागा असावी. कारण मथुरेहून आणलेली लोखंडी लाट या मक्षीदीच्या चौकाच्या मध्य- भागीं उभी केलेली आहे. ( ही लाट अनंगपालानें म्थुरहून आणली अशी समजूत आहे ). हल्लीं कुतुब्‌ मशीदींची पश्चिमेकर्डाल भिंत उभी नाहीं. अनंगपालानें बांधलेल्या लालकोट किल़्यांत पुष्कळ जेन व हिंदू देवालयें होतीं, तीं सर्व पाडून त्यांचे सुंदर कोरलेले खांब आपल्या मशी दीच्या चौकाच्या चार बाजूंची द लाने बांघण्यांत कुतुबुद्दीननें उपयोगांत आणले, कुतुबुद्दीनने या खांबावरचीं कोरीव चित्रें जशीच्या तर्शींच राखिली आणि लोहस्तंभास आपल्या जागींच राहूं दिलें यावरून या पहिल्या हिंदु बादशह!चें चांगुलपण दिसतें. “पांचव्या शतकापासून हा लोहस्तंभ उघड्या इवेंत व पावसांत गंबल्यावांचून कसा उभा आहे ह्यांचे आश्चर्य हांच्या पाश्चात्य लोखंड बनविणाऱ्यांसाहि वाटतें. हा एक उभा बिनसंघी खांब असून याचें वजन सतरा टन असावें. त्यावरील एका लेखांत चंद्र नांवाच्या राजानें हा स्तंभ विष्णु देवतेस अर्पण केला असे वर्णिले आहे. हा जेथें उभा केला तेथेंच ठेवून तो मध्यावर घेऊन आपल्या मर्शाद्ाचा चॉक कुतुबुद्दीननें बनविला, हें त्याचें कृत्य गोरब करण्यासारखे आहे. कारण ऱ्होडस्‌ जिंकणाऱ्या मुसलमानांनी तेथील स्तंभ त्यांतील पितळ्यासाठी उपटून ज्यू लोकांस ( यूरोपांतील मारवाड्यांस ) विकला ( फग्यूसन). जेन देव- ळांचे स्तंभ अबूच्या पाहाडावर असलेल्या जैन देवळांच्या स्तंभां सारखेच आहेत ( फर्ग्यूसन ). पण हिंदु देवळांचेहि आणखी येथें स्तंभ आहेत, त्यांच्यावर्राल कृष्ण, त्याची माता यशोदा व गाई आणि वांसरें यांचीं चिरत्रे फारच सुंदर आहेत ( फनशवे ). ह्याशिवाय प्रसिद्ध शिवदूत कॉर्ति- मुखाची डोका, त्यांतील दंतपाक्ते स्पष्ट दिसणारी, आपल्यास दिसतात. अनंगपालाचा किल्ला पुष्कळ विस्तृत असून त्यांत अनेक वाडे व हिंदु देवळें यावरून होती.

हा किला आणि दिललांचें शहर अनंगपालानें १०५२ च्या सुमारें बांघलें व त्याच सालीं स्तभ येथे लाविला ही गोष्ट स्तंमावरीलच एका लेखानें सिद्ध आहे. सुमारें शंभर व्षोनतर चाहमानांनीं शहर व किल्ला

/ भिंत

१ डल राज्ञार्‍्य्या जुन्या दळू

खः ग > ,», सै-प्र-ति., 4५१

“मेहरोठी र्‍यास चुदीने ‘इस्तेनापूर म्हणतात”

कुतुबमिनार. ५०१

जिंकला आणि तोमरराज्य आपल्या राज्यास जोडलें, त्यावेळीं एथ्विराजानें शहर वाढवून त्या भोवती आणखी भिंत बांघली, “’ पृथ्विराजानें बांघ- लेली ही भिंत कुतुब्‌ मशीदीच्या भोवती हल्लींहि निश्चित कारेतां येते. ” इल्ली या मशीदीच्या पश्चिमेस सुमारें पाव मेलावर भिंर्ताचा एक बराच लांब भाग त्याच्या वतुळघसांसह दिसतो. ही शहराची मिंत असावी किंवा किळ्याची आणखी बाहेरची भिंत असावी. हल्ल किल्ला दिसत नसला तरी कुतुबामेनाराच्या भोंबतीं एक भुईकोट किल्ला कल्पनेत आणतां येतो.हा डोंगरासारखा पुढें उभा राहिला असें वणन ताजुल्मासर मध्यें आहे.

नव्या शहराचें व किल्याचें नांव मुळांत ढिलिका असावें. हें तोम- रानी नांब दिलें असें आम्हांस वाटतें. दोन शिलालेखांत या रूपाने हें नांव आलें आहे. संवत्‌ १२२० (इ. ११६३) चा बिजोलिया लेख आणि १३३६ इंसवीचा पूर्वोक्त विदिरींतील लेख यांत हें शहर तोम- रानीं बसविलें असं स्पष्ट आहे. आणि नंतर येथे चाहमानानीं राज्य केलें. तात्पर्य दिछ़ली हें नांव १०५० इसवी इतके जुनें आहे. या नांवाचा अर्थ काय हें सांगतां येत नाहीं. कारण मूळरूप दिल्िका याचें संस्कृत मूळ ल्क्षांत येत नाही. _हा बहुधा प्राकृत देशी शब्द असावा, आणि याचा अथे हल्लीच्या भाषेतल्याप्रमाणें ढिला असा असावा, या रशाहरा-

च्या नांवाविषरया प्रसिद्ध जनवार्तार्‍या अर्थानें आधारभूत असावी असें वाटतं.

टिपणी नं, २-कुतुबामनार.

कुतुबामिनार याचा आकार, याची कल्पना व याची रचना प्रारंभा- ‘पासून मुसलमानांची आहे किंवा पूर्वी असलेल्या एका कौर्तिस्तेमाला कुतुबुद्दीन व अलूतमश यानीं मिनाराचें रूप दिलें, या मनोरंजक प्रश्नाचा उहापोह, संशोधकांनी जनरल कानेंगहमपापून हल्लींचे रायबाहद्दर दयाराम साहनी, पंजाब सकलचें आर्केआओलाजिकल सुपारेटेंडट, यांपर्यत केला आहे. हा पूर्वी असलेला कगोतेस्तंम माणून मिनार केला गेला हं मत कांहीं वषांपुर्वी कंवरसेन एम्‌. ए. ( त्या वेळचे लाहोरच्या ला काळेजचे प्रिन्सिपांल, हल्लीं काश्‍मीर संस्थानचे चाफ जस्टिस ) यार्नी प्रथम पुढें मांडळे आणि हल्ल्रींहि त्याचें मत तसेंच आहे. मात्र सहानी यांनीं दाख-

न €४. €*

५०२ तिसरी हिंदु राज्ये.

बिल्याप्रमाणें मिनारावर असलेल्या एका संस्कृत लेखाचा काळ संवत्‌ १२०४ नसून संवत्‌ १७०४ आहे, हे त्यानीं मान्य केलें आहे. हे येथे सांगितलें पाहिजे कीं, मिनाराच्या खालच्या मजल्यावर भिंतीवर बाहेरून कुराणांतील अरबी वचनें खोदली आहेत. तसेंच कित्येक पार्शियन भाषें- तील लेख खोदले असून त्यांत शिहाबुद्दीन, धियासुर्ददीन, कुतुब॒ददीन आणणि अलतमशा यांचीं नांवें आहेत. पण ह्याशिवाय कांहीं संस्कृत व हिंदी लेखाहि मिनाराच्या निरनिराळ्या मजल्यावर खोंदलेळे आहेत हें आश्चर्य करण्यासारखे आहे. तथापि हे सवे इ. स. ११९३ च्या अली- कडचे आहेत, तेव्हां त्यांचा फारसा विचार करावयास नको. फक्त एक ळेख संवत्‌ १२०४ (इ. स. ११४७ ) इतका जुना कंवरसेन मानीत होते, पण तोहि हल्लीं संवत्‌ १७०४चा आहे हे त्यानीं मान्य केलें आहे.

तथापि कंवरसेन यानी आणलेली मुख्य प्रमाणें अजून शिलक राह- तात. हा मिनारा माआझिना म्हणजे प्रार्थनेस बोलावण्यासाठीं उंच बांधलेला मनोरा नाहीं ही गोष्ट सर्वांस मान्य आहे; व ती कुठुब्‌ मशी- दीर्शी या मिनाऱ्याचा कांहीं संबंध नाहीं यावरूनहि स्पष्ट होते. दुसरें कुठुबुद्दीन किंवा अलतमडा यानीं हा मनोरा बांधला असा लेख मिना- ऱ्यावर कोठें नाहीं, त्यांची फक्त नांवें मात्र दिसतात. तिसरें, भिंतीच्या बाहेरील बाजूवर असलेली अरबी कुराण-वाक्‍्यें जर नीट पाहिली, तर तीं भिंतीवर माणून खोदली आहेत असं स्पष्ट दिसतं. मुळांतले दगड बाहेर काहून पुनः बसविले गेले आहेत हें जनरळ कानेंगहमचे आरके यालाजिकल अल्निस्टंट मि. बेग्टर यांस प्रत्यक्ष दिसून आले. ह्याशिवाय हे अरबी लेख माणून खोदले याचीं आणखीहि चिन्हें आहेत. या प्रश्ना- वरचीं दोन्ही बाजूची अनुकूल प्रतिकूल कारणें यापेक्षां विस्ताराने या टिप्प्णींत देणें जरूर नाहीं, परंतु अरबी, पर्शियन, नागरी लिपीत असलेले यावरील लेख डॉ. हृरोविट्झ यानी प्रसिद्ध केल आहेत, त्यावर गाडन सँंडरसन लिहितांना वरील विवाद विषय बाजूस ठेऊन म्हण- तात का, “ मिनार मुळांत हिंदु आहे किंबा मुसलमानी आहे हा वाद अद्याप चाळू आहे. पण रचनेवरून मिनार हिंदु असल्याचें प्रमाण एकच

षुढें आणलें जातें की, याची तारेच्या आकृतीची रचना जुन्या हिंदु

कुतुबामेनार. ५०३. देवळांच्या आकृतीसारखी आहे. पण या प्रमाणाचे महत्त्व गझनी येथ असले मिनार आणखी असल्याचें समजतें त्यावरून कमी होते. ”? संस्कृत व हिंदी लेख अद्याप सवे तपासले गेले नाहींत व अभ्यासिले गेलोहे नाहींत. आणि रा. ब. दयाराम साहनी आपले मत अद्याप ठाम नाहीं असं म्हणतात, अशा परिस्थितींत हा विषय अद्याप अनिश्चित आहे असे म्हणावें लागतं. पण हेंहि दाखविणे जरूर आहे को, कवर- सेन यांनी दाखावेलेलं रचनेवरचें प्रमाण केवळ तास्काकृतींवर नसुन अरबी कुराणलेख भिंतीवर माणून खोदलेले आहेत ह्यावर आघारभूत आहे आणि बेग- लर यांनीं दगड पुनः बसविलेले आहेत ही गोष्ट मान्य केलेली आहे.

शेवटी हें सांगतां येतें की, कार्तिस्तंम उभारण्याची चाल प्राचीन काळापासून हिंदुस्थानांत चालू होती. उदाहरणार्थ रघुवंश सर्ग बारांत कौर्तिस्तंभाचा उल्लेख आहे. ( कॉर्तिस्तम्मद्वरयमिव तटे दक्षणे चोत्तरेच ।) तसंच एका स्रेन कोरीव लेखांत लखनातीच्या लक्ष्मणसेनानें प्रयाग, बनारस आणि जगन्नाथ या तीन ठिकाणीं कीतिस्तंभ उभारले असे वर्णन आहे. असें संभवनीय दिसतं काँ, हा कौर्तिस्तंभ पाहिल्या मजल्यापर्यंत वासिल- देव चोहाणानें बांधला. याने उत्तर हिंदुस्थान जिंकून सर्व आरया- वतोतून म्लेछ लोकांना हांकळून त्यास खरा आर्यावते केलें हो त्याची कृति कोर्तिस्तंभ बांधण्यासारवी होती. आणि ती शिवालिकस्तभावर खोद- लेल्या पूर्वोछ्रिखित रछोकांत वणेन केळेली आहे. दिल्ली प्रयासानें जिंकल्या- नंतर ( ढिल्िकाग्रहणश्रान्तमू-बिजोलिया लेख ) त्यानें अनंगपालाच्या लालकोट किल्ल्यांत हा कौर्तिस्तम उभारळा असावा. वीसलळ आणि लक्ष्मणसेन बहुतेक समकालीन होते आणि उत्तर हिंदुस्थानांत पाश्चिम व पूव भागांत बहुतेक सम्राट झाळे होते. लक्ष्मणसेनानें वर सांगितल्याप्रमाणें कौ्तिस्तम उभारिळे, तेव्हां बीसलानोहि दिल्लीस कौर्तिस्तंभ बांधणें दाक्य आहे.

चाहाणांच्या प्रकरणांत आम्ही दाखाविळेंच आहे का. वीसलानें अज- मीर येथें संस्कृत विद्यालय बांधलें, तेंच हलला शिहाबुर्ददीनच्या हुकुमाने मुसलमानांनी रूपांतर करून ‘ अढाई दिनकी झोंपडी ‘ नांवाची हल्लीची मशीद बनाविछी आहे. यावरून बीसल!चा कल नामांकित इमारती बांधण्या*

५०४ _ तिसरी हिदु राज्य. कडे दिसतो. आपल्या विजयानंतर तो लोकरच मृत्यु पावला. आणि त्याचा सुरू केलेला कौर्तिस्तंभ पाहिल्या मजल्याशंच थांबला. त्याच्या नंतरचा राजा एथ्विराज दुसरा व तसाच सोमेश्वर हे लौकरच वारले. प्ृथ्विराज तिसऱ्याच्या कारकॉार्दींत कोर्तिस्तंमाचे काम पुढें चाललं अस.वं. कुतुबुद्दी- नन दिल्ली जिंकल्यावर किल्ल्यांताल देवळें तोडून ब त्यांच्या सुंदर स्तभांचा उपयोग करून त्याने आपली मशीद बांघली, तेव्हां त्याने र्वासलाच्या कौर्ति- स्तंभाचे रूपांतर करून मुसलमानी मीनार बनविला आणि अलूतमशने त्याजवर तिसरा व चवथा मजला चढवून त्यास पुरें केलें असे दिसते.

याप्रमाणे मूळ बांधणारा बीसळ असोव अन्य असा, आमच्या मतें रचनाप्रमाणानें हृल्टीचा मिनार मूळचा कौर्तिस्तंभ मुसलमानी र्मानार केला आहे यांत सराय नाही.

अजमीरची पाळी यानंतर लौकरच आली. ताज अशी हकीकत देतो कीं, पृथ्विराजाचा भाऊ हिरज ( हें नांव हरिराजाबद्दल स्पष्ट- पणे चुकीनें वाचळें गेळें आहे) यानें रणथंभोर येर्थाळ चोहाण राजावि- रुद्ध बंड केलें. तेव्हां त्याच्या बंदोबस्तास कुतुबुर्दान धांवून गेला. इरिराज पळाला, तेव्हां ताज म्हणतो, “ पृथ्विराजाच्या मुलाला पोशाख दिला गेला व रेनसीनें दोन सोन्याव्बी कलिंगडे, मोठ्या चातुर्याने मुर्शांत बनविलेलीं, व पुष्कळसे धन नजर केलें ‘’ याप्र- माणे मुसलमानांच्या मदतीनें रेनसीनें कांहीं दिवस राज्य केलें. त्याचें पुढें काय झालें हें कळत नाही. पण तो लवकरच मेला असावा, आणि बहुधा हरिराजानं येऊन स्वतः अजमीरचें राज्य बळकावले असावे. ताज हरिराजासच अजमीरचा राजा म्हणतो ( इलियट २ पा. २२५ ). त्यानें अर्थातच पारतंत्र्य मान्य न करून बंडाचे नि- शाण उभारलळें, “ जेहतर (१) दिल्लीच्या सीमेपर्यंत चाळून आला. आणि तेर्थांह लोक एकाएकीं जुलळमाच्या अधःकारांत सांपडले. !! कुतुबुर्दानने आपल्या फौजेचा मोठा भाग त्याजवर पाठविला, तेव्हां त्याचा पराभव झाला. गरमी असतांहि कुतुबुदीन खुद्द अजमीरवर

शिाायापीवि 293.

अजमीर व दिल्ली यांचा उच्छेद. ५०११

चाळून गेला. “ जिहितर ( हरिराज ) डोंगरावरील किल्ल्यांत गेला, तेव्हां त्याला वेढा दिला गेला. शेवटीं निराश होऊन त्यानें आपल्यास चितेवर जाळून घेतलें; आणि किल्ला सहजच हस्तगत झाला. अजमीरचा मुळुख पूर्वकाळच्या वैभवास पोहोचला. आणि धर्म पुनः प्रस्थापित झाला, रस्ते चोरांच्या भारतापासून मुक्त केळे गेळे आणि त्रस्त झालेली रयत त्यांच्या त्रासापासून सोडविली गेली. ‘’ याचा अर्थ अजमीरचे राज्य खालसा केलें जाऊन तेथें मुसलमानी राज्याची व्यवस्थित सत्ता चाळू झाली.“ अंकित रईस व राणे ( जमीनदार ) शरण आले आणि सरदारांच्या कपाळांनीं व हिंदच्या प्रसिद्ध ठो- कांच्या डोक्यानीं जमीन घांसली गेली. याप्रमाणे अजमीरची व्यवस्था लावून कुतबुद्दीन दिल्लीस परत गेला.’? ही हकीकत ११९४त घडली, तेव्हांपासून पुढे अजमीर मुसलमानी साम्राज्याचा प्रांत बनला.

या गोष्टी मंगलाना ( मारवाड ) येथें सांपडलेल्या एका शिला- लेखावरून आणखी सिद्ध होत आहेत. इं. ए. २१ पा, ८७ वर हा लेख छापला असून तो संवत्‌ १२७२ (१२१५ इ. ) चा आहे, एक पायऱ्याची विहीर या लेखाने लोकांस अपण केली असून त्यांत एका मांडलिक दाहिमा राजानें कांहीं लाग ( कर ) बसाविळे आहेत. या लेखांत प्रथम त्यावेळच्या मुसलमान बादशाहारचें नांव शमसुदीन सुरत्राण हम्मीर गोरगजिस्तानचा राजा हें देऊन त्याच्या सत्तेखाली रण- थेंबोर येर्थे वळणदेव राज्य करीत आहे असें म्हटलें आहे. यावरून चव्हाणांची राजधानी यावेळीं रणथंबोर होती. हा लेख छापणारे जोघपूरचे रमाकरण पंडित यांच्या मतें पुथ्विराजाचा नातु म्हणजे हम्मीरकाब्यांत सांगितलेल्या गोविंद’चा पुत्र वळण होता. असें दिसते कीं रेनसी अजमीरचा राजा झाला तेव्हां गोवेंदाला रणथंबोर दिलें. हरिराजानें रणथंबारवर प्रथम हृल्का केला. नंतर रेनसी मेल्यावर ल्याने अजमीर बळकाविलें, व त्याचें बंड शेवटीं कुतुबुद्दीनानें मोडले.

प्रकरण बार्वीसावें. कनोज आणि बनारस यांचा उच्छेद.

अजमीर आणि दिल्ली यांचा उच्छेद होऊन चाहमानांनीं मांड- ठिकी कबूल केल्यावर उत्तरहिंदुस्थानांतील दुसरें प्रबळ राष्ट्र म्हणजे कनोज आणि बनारस येथील गाहडवालांचे, त्याचा उच्छेद करण्याकडे शिह्वाबुर्ददानानें आपलें लक्ष फिरविले. अशी साधारण समजूत आहे कीं, जयचेदानें आपला शत्रु प्रथ्विगज याजवर हल्ला करण्यास शिहाबुद्दीनास प्रवृत्त केलें, व॑ त्यामुळें ज्या शत्रूस त्यानें घरांत घेतलें त्यासच तो बळी पडला. परंतु आमच्या चोकशींत जयचंदानं बाहे- रील शत्रस आंत घेतलें असा पुरावा मिळत नाहीं. त्यानें पृथ्विरा- जास मदत केली नाहीं हं खरं, प्रथ्विराजानें धोरींचा निरोध कर- ण्यासाठीं जमविलेल्या संयुक्त सैन्यांत त्यानें भाग घेतला नाहीं हें खरें असावें. बहुघा त्याची मदतहि प्रथ्विराजानें मागतली नसेल. पृथ्विराजानें एक संयुक्त फोज जमा केली ही गोष्ट पूवी दाखविल्या- प्रमाणें तबकात मध्यें सांगितली आहे, याप्रमाणें कोणकोण राजे पृथ्विराजाच्या मदतीस आले होते हें समजण्यास ऐतिहासिक पुरावा मिळत नाहीं. रासांतील हकीकती इतिहास मानण्या इतक्या विश्च- सनीय नाहींत. कोणी गुहिलोत राजा मदतीस आला होता याब- इलाहि शका आहे. आलाच असेल तर तो समरासेंह नसून सामंत- सिंह ( समत्‌्सिंग ) असावा. हें कांहोंडी असो, जयचंदानें शिह्ा- बुद्दीनास हृछा करण्यास लाविलें हें सिद्ध नाहीं, एवढेंच आम्हांस येथें सांगणें आहे. त्याच्यावर जी आतां पाळी आली ती देराद्रोहा- बद्दल शिक्षा म्हणून नव्हे तर शिह्ाबुर्दानच्या हिंदुस्थान जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेतील पुढची पायरी होय.

कनोज आणि बनारस यांचा उच्छेद. ८५०७

अतिशयोक्तीनें वर्णन करणाऱ्या ताजग्रंथांत ह्या युद्धाचा तपशील- वार वृत्तांत दिळेला नाहीं. तो थोडक्यांत म्हणतो कौं, ““ सलळतान चिलखत घातलेले ५०००० स्वार घेऊन गझनीहून निघाला. मूति पृजकांचा मुख्य आणि बनारसचा राजा जयचंद हा ल्यास समुद्र- कांठच्या वाळूप्रमाणें असंख्य सेना घेऊन विरोध करण्यास सामोरा झाला. आपले असंख्य वीर आणि अनेक लढाऊ हत्ती यांचा गवे वाहणारा राय एका उंच होद्यांत बसून पुढें होता. त्यास एका बाणानें प्राणांतिक जखम झाली आणि तो खालीं पडला. ” ( इलियट २ पा.२२२-२३). “ मूर्तिपूजेचें पाप या भूमीतून नष्ट केलें गेळे, आणे अमयाद ळूट हातीं आली; ती पाहतां पाहतां डोळे थकले. नंतर बादशाही फोजेने असनींचा किल्ला ताब्यांत घेतला. यांत रायाचा खजिना सुरक्षिततेसाठीं ठेवला होता ”” तबकातमध्ये ही लढाई एका वाक्याने सांगून सोडून दिली आहे. “ सुलतान गझनीहून परत आला आणि बनारस व कनोजपर्यंत येऊन ५९० झहिजरीमध्यें ( ११९३ इ. ) ‘ चेदनवा/ जवळ राय चयचंदाचा त्यानें पराभव केला आणि ३०० हत्ती पकडून आणले. !” तबकात लिहिणारा या लढा- इचा जास्त तपशीलवार वृत्तांत देत नाहीं हें दुदैव आहे, बहुधा पृथ्विराजाच्या लढाईपेक्षां ही लढाई ल्यास कमी महत्त्वाची वाटली असावी. पण जयचंद हा हिंदुस्थानचा सर्वांत अधिक बलवान राजा होता आणि तो गर्वयुक्त व शूर राठोड होता. तो राज्यपाला- प्रमाणे पळून न जातां स्वतः आपल्या धमाच्या व स्वातंत्र्याच्या भय- प्रद शत्रशीं लढण्यास समोर झाला. अर्थात्‌ या लढाईंचें जास्त वर्णन द्यावयास पाहिजे होते. लढाईची जागा चेदवाह हें कनोज आणि इटावा यांच्या दरम्यान आहे असें समजतात. हिंदुस्थानचे ठेखहि या वृत्ताबद्दल कांहीं माहिती देत नाद्दींत. पण अबुलफजल्च्या प्रंथांत अशी दंतकथा नमूद आहे कों, जयचेदाचा हत्ती गंगा पोहून जात

५०८ तिसरा हिंदु राज्ये.

असतां जयचंद बुडून मेला. वरील समकार्लान मुसलमानी लेखव ही दंतकथा एके ठिकाणीं केली असतां आपल्यास असें मानतां येतें की, जयचेद लढाइत घायाळ झाला, तेव्हां शत्रूच्या हातांत न सांपड- ण्यासाठी त्यानें आपला हत्ती गंगेंत नेऊन शूर आणि धर्मर्शाठ हिंदूप्रमाणें गंगेमध्ये जळसमाधे घेतली, तबकातमध्ये असें आणखी सांगितळें आहे कीं, रणभूर्मावर जयचेदाच्या मृत देहाचा पुष्कळ तपास केला गेला, परंतु ते सांपडलें नाही. एक आणखी विधान त्यांत असें आहे कों, पुष्कळ तपासानंतर एक प्रेत सांपडलें व त्याच्या वृद्ध स्वरूपावरून तें जयचंदाचें समजले गेलें. ( हें विधान तबकात नंतरच्या एका वृत्तांतावरून रवह्टीनें पा. ४७०च्या टिपेंत केलेले आहे ). परंतु आमच्या मतें जयचंद हा वृद्ध नसावा. तो तरुण असतांच ११६९मध्यें राज्यार आला आणि ११९३मध्यें २४ वर्षे राज्य केल्यावर मरण पावला.

कनोज आणि अस्नी ढुटल्यावर शिहाबुद्दीन बनारस जिंकून लुटण्याकरितां पुढें घांवला हें साहजिकच आहे. बनारस गाहड- वालांची दुसरी राजघानी होती. या वृत्तांचें वर्णन ताजमध्यें पुढील प्रका- रचे आहे. “ बादशाही सैन्य बनारसवर चाठून गेठें; आणि तेथें एक हजार देवळें तोडली गेलीं आणि त्यांच्या चबुतऱ्यावर मशिदी उठ- विल्या गेल्या. दिनार आणि दिऱ्हम्‌ या नाण्यांच्या चेहऱ्यावर बाद- शाहाचें पुण्यकारक नांव आणि पदव्या ठोकल्या गेल्या. !? याचा अथ असा कीं, हा प्रांत खाळसा केला जाऊन हिंदूची सोन्याचांदीचीं नाणी टांकसळींत नेऊन त्यावर शिहाबुर्दानाचें नांव ठशांनीं उमटविळें.

“ शिहाबुद्दीननें राहराचा आणि भोंवतालच्या प्रांताचा बंदोबस्त करून या प्रसिद्ध प्रवित्र युद्धाचा वृत्तांत इतिहासांत लिहून जगभर प्रसिद्ध केला आणि तो परतला. परततानां अस्नी येथें त्यानें कांहीं दिवस मुक्काम केला; तेथें भोंबवताळूचे मुख्य व वृद्ध लोक येऊन

कनोज आणि बनारस यांचा उच्छेद. ५०९

त्यांनी आपलें आकितत्त्व कबूल केलें आणि दुर्मिळ वस्तु नजर केल्या. ? यावरून असें दिसतें कीं, देशानें कांहींच विरोध केला नाहीं व ही राजसत्तेची बदल लोकांनीं ताबडतोब मान्य केली. या गोष्टीवर आम्हीं पुढें टीका करणार आहों. हिंदुस्थानांत कुतुबुद्दीनास व्हाइसरॉय (राजप्रातिनिधि) नेमून शिह्ाबुद्दीन गझर्नांला परत गेला.

पुर्ढाल हालचाली.

कुतुबुद्दीनाचें चरित्र आम्ही पुढें देणार आहों. पण येथे हँ सांगणें जरूर आहे कौं, तो मोठा लायक अधिकारी होता. आणि इतक्या नि:ःपक्षपात रीतीनें तो न्याय करीत असे कौ, “ लांडगा आणि बकरी एका तलावावर पाणी पिऊं लागलीं. !’ (ताज इलियट २ पा. २२५). यामुळें देशांत लौकरच स्वस्थता झाली. पण बंड- खोर लोकांचें तो कडक शासनहि करीत असे, “’ काठजवळ एक त्रास देणारी जात होती; ती फार त्रास देऊं लागली तेव्हां त्यांची सबंध कत्तळ करवून लोकांच्या डोक्यांचे तीन बुरूज त्यानं केलें. पूर्वी सांगितल्याप्रमाणं अजमीर येथील हरिराजाचें बंड ११९५ त कुतुबुर्दीनानें तात्काळ मोडळें. ११९६ त शिहाबुद्दीन हिंदुस्थानांत पुनः आला आणि कुतुबुद्दीन जाऊन त्यास मिळाला. थंगर येथील किल्ला मजबूत असून विरोधी झाला होता, त्याजवर चाळून जाऊन दोघांनीं त्याजला वेढा दिला. विरोध चालविणें अशक्य आहे असें पाहून तेथीळ राजा कुंवरपाळ शरण आला, “’ त्याला जीवदान दिलें गेळें परंतु त्याचें राज्य खालसा केलें गेलें. ‘! ( ताज इलियट २ पा. २२७ ), हें ठिकाण अद्याप निश्चित झालें नाहीं. गौरीशंकरच्या मतें ह्वा कुंबरपाल केरोलीच्या यादव घराण्यापैकीं होता आणि व्यास या- वेळीं बियानांतून हांकून दिळें गेळें ( टॉंड पा. २४६ ). सुलता-

सम, मा. .देरे

५१० तिसरी हिंदु राज्ये.

नाचा जिंकलेल्या इलाख्यांत विरोध करणारे सर्व किछे जिंकण्याचा बेत होता. तो यानंतर ग्वाळेरवर चाळून जाऊन ल्या किल्ल्यास त्यानें वेढा दिला. ताज ग्रंथ असें सांगतो की, “ग्वालेरचा राजा सोलळंखपाल यानें मांडलिकी व खंडणी कबूल केली, तेव्हां त्यास क्षमा करून किल्लाहि परत दिला. ” नंतर सुलतान कुतुबुद्दीनास पुनः राजप्रति- निधि नेमून गझर्नीस परत गेला. कुतुबुदीननें बंडखोर मांडलिकांस ताळ्यावर आणण्याचे काम पुरें केळें. सुलतान त्रास देणाऱ्या ग- ख्खार लोकांस जिंकण्यासाठीं हिंदुस्थानांत परत आला त्यावेळीं कुतु- बुद्दीनानें त्यास मिळून मदत केली व त्यांचा मोड केला. पण शेवटीं पूर्वी सांगितल्याप्रमाणें याच गख्खार लोकांनीं सुलतान सिंधुनदीच्या कांठीं मुक्काम करून उतरला असतां १२०५ इसवींत त्याचा खून केला.

यानंतर हिंदुस्थानांतील तुका सरदार व सेनापतीनीं कुतुबुद्दीन यास सुलतान व हिंदुस्थानचा बादशहा निवडिळें. आणि हा त्याचा अधिकार घोरचा राजा, शिह्ाबुद्दीनचा भाऊ, यानेंहि मान्य केला; कारण त्यास गझनी व हिंदुस्थान हदी दोन्द्दी राज्यें भोगण्याची मह- त्त्वाकांक्षा नव्हती. याप्रमाणें हिंदुस्थानची स्वतंत्र तुर्की गुलाम बाद- शाही सुरू झाली व त्याची राजधानी दिल्ली होऊन तेथें मुख्यतः कुतुबुद्दीन राहूं लागला,

प्रकरण तेर्वासावें. उत्तर हिंदुस्थानांतील इतर रजपूत राज्यांचा उच्छेद.

भाग १

अजमीर व दिल्ली, कनोज व बनारस हीं शहरें घेऊन तेथीळ दोन पराक्रमी रजपूत राज्यें, चव्हाण आणि राठोड, उछिन्न करून खालसा केल्यावर शिहाबुद्दीनासमोर उत्तर हिंदुस्थानांतील दुसरीं राजपूत घराणी भराभर पडलीं; किंबहुना आश्चर्यकारक झपाट्याने पंचर्वास वषांच्या आंत पडलीं; आणि सवे उत्तर हिंदुस्थान मुसलमानांनी गुलामीत आणलें. या उच्छेदाचा मुसलमान इतिहासकारांनीं दिलेला वत्तांत साहजिकच मनास थक्क करून सोडणारा असला पाहिजे. पण तो अतिशयोक्तिपूरणे असला तरी अविश्वासास पात्र नाहीं. कारण पुढे एका प्रकरणांत दिलेल्या कारणांनीं उत्तर हिंदुस्थान यावेळीं पड- ण्यास योग्यच झालें होतें. ह्या सर्व वृत्तांत १२०० इसवी नंतरचा असला तरी या इतिहासाशीं इतका संबद्ध आहे कीं, तो दिल्या- शिवाय हें पुस्तक संपूण करतां येत नाहीं. किंबहुना मध्ययुगीन हिंदुभारतेतिह्यासाचा तो शेवटचा अध्याय आहे. दक्षिणेंत मात्र हिंदु राज्ये एक शतकपर्यंत आणखी राहिलीं हं सांगितले पाहिजे.

उत्तर हिंदुस्थानांतील हीं दुसरीं हिंदु राज्यें जिंकण्याचे काम शिह्ाबुर्दानाच्या सेनापतीनीं सिद्धीस नेळें. विशेषतः त्याचा गुलाम कुतुबुद्दीन याने नेळें. मुसलमानांत त्यावेळीं गुलामांची प्रथा असून या गुलामांना, विशेषतः तुकस्थानांतून आणलेल्या गलामांना, खिश्चन डोक ज्या निर्दयतेनें अमेरिकेंत व इतरत्र नीग्रो गुलामांना वागवीत त्याहून फारच निराळ्या रीतीनं, वागवीत हें पाहून आश्चर्य वाटतें.

कतुबुर्हनचाच इतिहास ध्या; तो फारच आश्चर्यकारक आहे. साध्या

५१२ तिसरीं हिंदु राज्ये.

गुलामाच्या स्थितींतन चढत चढत तो हिंदुस्थानचा पहिला बाद- शहा झाला. तो सुस्वरूपहि नव्हता, त्याच्या उजव्या हाताची करं- गळी तुटली असल्यानें त्यास ऐबक म्हणत. पण तो शरीरानं मजबूत होता आणि युद्धांत पराक्रमी असे. ह्याशिवाय ल्यास विलक्षण शहा- णपण होतें; ह्यामुळे तो एका जागेवरून दुसर्‍या जागीं ‘चढतच गेला. त्याचें औदाये इतर्के होतें की, या औदार्याच्या गोष्टी सांग- तांना मुसलमानी इतिहासकारांस मोठा आनंद वाटतो. यापैकीं एक गोष्ट अशी आहे कीं, त्यानें हिंदुस्थानचा बादराह्या झाल्यावर एक लक्षाहून कमी इनाम कर्धांच दिलें नाहीं, लहान असतां खुरासानची राजधानी निशापूर येथील काजीला तो विकत मिळाला. त्याच्या घरी त्याच्या मुलाबरोबर घोड्यावर बसणें व शस्त्र चालविणें ह्या कला तो शिकला. या कला त्यास काजीनें शिकू दिल्या हें त्याच्या त्या मुसलमान धन्यास फारच भूषणावह आहे. काजीपासून विकत घेऊन एका व्यापाऱ्याने त्यास गझनीस आणले; तेर्थे शिह्ाबुददीन घोरीनं त्यास विकत घेतलें आणि प्रथम फौजेत ब नंतर आपल्या साम्राज्याच्या मुळकी कारभारांत त्यास लाविलें. या नोकरीत तो वाढ- तच गेला, आणि शोबटीं प्रथ्विराजाचा पाडाव झाल्यानंतर पंजाबच्या पलीकडील आपल्या हिंदुस्थानी प्रांतावर कोहराम येथें त्यास त्यानें प्रांताधिकारी ( गव्हनर ) नेमिले.

या मोठ्या सेनाप्तांचा थोडक्यांत इतिहास देण्याचा आमचा हेतु इतकाच कीं, इतिहासामध्ये वैयक्तिक महत्त्व फार परिणामकारक असतें. मोठीं माणसें वेळोवेळीं उत्पन्न होऊन ते राष्ट्राची भवित- व्यता बदलतात. हिंदुस्थानांतील मुसलमानी सत्तेचा उदय आणि हिंदु राज्याचा उच्छेद यांच्या कारणापैकीं महमूद, शिहाबुर्दान, कुतु- बुददीन अशा व्याक्ति यांवेळीं निर्माण झाल्या हें एक होय. “तबकात- नासिरी’ या इातह्ासाचा कतो कुतुबुद्दीनाची हकीकत लिहितांना

उत्तर हिंदुस्थानांतील इतर रजपूत राज्यांचा उच्छेद. ५१३

प्रारंभीं योग्य तऱ्हेने म्हणतो, “’ जेव्हां सर्व शक्तिमान्‌ इश्वर आ- पल्या लोकांस मोठेपणाचे आणि राजास योग्य अशा. स्वभावाचे ठदाहरण देऊं इच्छितो त्यावेळीं उत्पत्न केलेल्या एखाद्या मनुष्यास शो्य आणि औदार्य हे गुण तो देतो आणि मग शत्रु आणि मित्र या दोघांवराह्े त्याच्या उदारतेचा आणि युद्धसामर्थ्यांचा परिणाम होतो !” ( इल्यिट २ पा. २९८ ). असलीं माणसें, उदाहरणार्थ शिवाजी किंवा बाजीराव ध्या, आपल्या भोंबतीं शूर वीरांची पथके सहज जमवितात आणि ते शेवटीं राज्य स्थापून राजवंश चाळू कर- तात. असो, उत्तर हिंदुस्थान जिंकण्याचे काम कुतुबुद्दीनाने चालाविळें व अऴतमडानें पुरें केळे. हाहि तुकस्थानांतील एक गुलाम असून कुतुबुद्दीनाप्रमाणें शूर, उदार आणि भाग्यवान्‌ होता आणि कुतु- बुर्द्दानानें त्यास आपली मुलगी दिली. हें आश्चर्यकारक आहे कौ, हे गुलाम उच्च पदवीस पोहोंचळे तरी गुलामच राहिळे व बऱ्याच उत्तर वयांत गुलामीपासून मुक्ततेची सनदापत्रे त्यांस मिळालीं. आम्ही त्यांच्या विजयाचा इतिहास पूर्वीच सांगितळेला समकालीन ग्रंथ ताजुल्मास्सर यावरून आणि तबकात-इ-नासिरी या बहुतेक सम- कालीन म्हृणजे नासिरुद्दीनच्या वेळीं लिहिलेल्या प्रेंथावरून देतां,

दिल्ली-कनोज पडल्यावर गुजराथ म्हणजे अनहिलवाडचें राज्य पडळें, याचा इतिहास गुजराथ चालुक्यांच्या लेखावरून आम्ही दिलाच आहे. पण याच वृत्ताचा मुसलमानी इतिहास समकालीन ताज-उल-मासर यांत जो प्रकार वर्णन केला आहे तो आम्हांस येथें दिला पाहिजे. त्यांत असें वणन आहे की, ११९५ त कुतुबुद्दीन अजमिरास आला असतां, त्यास अशी खबर लागली कीं मेर लोकांनीं (हे त्यावेळी हिंदु होते) नहरवाल्याकडून फौज बोलावली आहे. या हालचालीचा बंदोबस्त करण्यासाठीं ल्याने आपली फोज पाठविली; त्या फौजेचा पराभव हेऊन तिचा अजमीरपर्यंत पाठलाग झाला, आणि

५१४ तिसरा हिदु राज्ये. नाहरवाला फोजेनें अजमीरच्या किल्यास वेढा दिला. कुतुबुद्दीनानें । गझनीहून कुमक मागिवळी व ती आली. ती पाहून गुजराथची फौज परतली. मुसलमानांनी अर्थात्‌ चढाईची चाळ स्वीकारून गुचराथेवर स्वारी केली. “पाळी आणि नदूळ येथील उंच किले टाकून दिळेळे सांपडळे आणि हिंदूची फोज अबूच्या डोंगराच्या पायथ्याशी एका घाटाच्या तोंडावर राय कणे आणि घाराबर्स यांच्या अधिपत्या- खालीं उभी दिसली. याच खिंडींत पूर्वी शिह्ाबुद्दीन घोरींचा पराभव | झाला असल्यामुळें मुसलमान हिंदूंवर . हल्ला कर्रांनात. तेव्हां एक याक्ते योजिली गेली, आणि मुसलमानी फौज भ्याल्यासारखें दाखवून अजमीरकडे परतली. यामुळें हिंदु खिंड सोडून मुसलमानांवर हल्ला करण्यास मैदानांत आले. मैदानांत खडाजगीची लडाई झाली आणि शेवटीं हिंदूंचा पूण पराजय झाला. हिंदूंचे सेनापाते मारळे गेले किंवा हस्तगत झाळे. राय क्ण पळून गेला पण वीस हजार गुलाम वास हत्ती व अमर्याद रास्तरं जेत्यांच्या हातांत पडलीं. शिवाय इतकी ळूट मिळाळी कीं, जणूं काय सर्वे पृथ्वीतीळ राजांचे खजिने मुसलमानांच्या ताब्यांत आले. नहरवाला शहर व गुजराथचें राज्य मसलमानांज्या सत्तेखाली आले. विजयी खुश्रची ( सुलतानाची ) निशाणे अजमीरला परत येऊन दिल्लीस आली. कुतुबुद्दीनानें नाना प्रकारच्या मोल्यवान्‌ व दुर्मिळ वस्तु गझनीस पाठविल्या. ” ( इलियिट २ पा. २८० )

या वर्णनावरून असें दिसतें कीं, अबू पर्वताजवळ एका ठिकाणीं पूर्ण जय मिळाल्यावर कुतुबुर्दान एकदम नहरवाळा ( पाटण ) वर चाल करून गेला; आणि तें शहर कार्बांज करून व्यानें लुटले. हँ वृत्त ११९७ मध्यें घडळें असें म्हटळें आहे. पण पूर्वी सांगितल्या- प्रमाणे र्भामानें ११९९ त अनाहिलवाड पाटणटहून एक दानलेख केळा आहे. तेव्हां अस मानावें लागतें की, अनाहेंलवाडचा कबजा

उत्तर हिंडुस्थानांतील इतर रजपूत राज्यांचा उच्छेद. ५१५

उशीराने म्हणजे ११९९ त घेतला गेला. गुजराथेचा विध्वंस करून राजधानी मुसलमानांनी कबजांत घेतली ही गोष्ट जयंत- सिव्हाचा १२०२चा दानलेख यांत सांगितलेली, गुजराथची भयंकर स्थिति सिद्ध करते. र्भाम पळाल्यानंतर या जयंतसिंहानें चाटूक्यांच्या सत्तेचें दैव पुनः फिराविळें आणि मुसलमानांस हांकळून देऊन गुज- राथरचें राज्य व त्याची राजधानी मोकळी करून त्यानें भीमाच्या ऐवजीं अनहिलवाडांत कांहीं वर्षे राज्य केलें. जयसिंह सिद्धराजाने बांधलेल्या कांहीं मंदिरांचा नाश या वेळीं झाला असें मानतां येते. या हछ्यानं गुजराथचें राज्य बरेंच खिळखिळे झालें; परतु आणखी शभर वर्षे तें कायम राहिलें.

गुजराथेची सत्ता याप्रमाणें उध्वस्त करून आणि अजमीर कब- जांत ठेवून कुतुबुद्दीनानें आपल्या सरहद्दीवरील दुसऱ्या सामधथ्येवान्‌ हिंदु राजाकडे म्हणजे कालंजरकडे लक्ष फिराविळें व त्या किल्ल्यावर हृछा केला. चंदेल्लांच्या प्रकरणांत या हल्ल्याचे आम्ही वर्णन केलेंच आहे. मात्र समकालीन ताजुल-मासर्‌ यांत दिलेल्या हकीकतीवरून दोन चार आणखी तपशीलाच्या गोष्टी आम्ही येथ देतो. “ ५९९ हिजरी ( १२०२ इसवी ) कुतुबुद्दीन अळतमशला बरोबर घेऊन कालंजरवर चाळून गेला. परमार ( परमर्दिदेव ) किल्ल्यांत पळून गेला. परंतु पुष्कळ काळपावेतां जीवावर उदार होऊन लढल्या नंतर तो शरण आला आणि महमुदानें मांडलिकाच्या ज्या शर्थी चन्देछांवर घातल्या होल्या त्याच पुनः त्यावर घातल्या गेल्या. पण त्या अमलांत येण्यापूर्वीच तो मरण पावला. त्याचा मेहता अजदेव हा इतक्या सहजरीतीनें नमण्यास तयार होईना व त्यानें बराच विरोध केला. पण त्यानंतर मोठें अवषेण पडल्याने किल्ल्यावरील पाण्याचीं सर्व कुंडे सुकून गेल्याने त्यास रारण यावें लागलें. कालंजरचा किला सगळ्या पृथ्वींत प्रसिद्ध असलेला घेतला गेला आणि तेथील देवळें

५१६ तिसरीं हिंदु राज्ये.

पाडून ल्यांच्या मशिदी केल्या गेल्या. पत्नास हजार लोक गुलाम- करून नेले. वीस हत्ती व असंख्य शस्त्रे ठ॒टींत मिळाली. नंतर विजयी निशाण महोबावर चाललीं, व त्या प्रांताच्या राज्याची व्यवस्था हसन अमीर अल्ली याकडे दिली गेली. ‘’ हीहि हकीकत गुजराथच्या हृकीकतीप्रमाणें चेदेछांच्या कोरीब लेखांवरून प्रत्यंतरानं सिद्ध होते. चेदेळञानीं कालंजर किल्ला आणि राज्याचा बराचसा भाग परत मिळ- विला आणि गुजराथेप्रमाणेच हा राजवंश स्वतंत्रतेने आणखी शंभर- वर्षे चंदल्लांच्या प्रकरणांत सांगितल्या प्रमाणें राञ्य करीत होता. अजमीर, दिल्ली, कनोज व बनारस येथें पूर्णपणें बसलेल्या मुसल- मानी सत्तेच्या सरद्दद्दीवरील तिसरें महत्त्वाचें हिंदु राज्य बंगालच्या सेनांचें होतें. मुसलमानी इतिहासकारांनीं बंगालच्या उच्छेदाचा जो इतिहास लिहिला आहे तो अत्यंत आश्वयंजनक आहे. बखत्यार खिलजीचा पुत्र महंमद यानें हा देश जिंकला; कुतुबुद्दीनाने नव्हे. याचा वृत्तांत ताजुू-मासर्‌ या समकालीन प्रंथांत नसून तबकात– इ-नासरीमध्यें स्पष्ट निर्देशानं ऐकलेल्या हकीकर्तावरून सांगितला आहे. हा तबकातमध्ये सांगितलेला वृत्तांत आमच्या टीकेसह आम्ही पुढें देतों. महमद बखत्यार हा एक खिलजी ( अफगाण, तुकी नव्हे ) घाडसी मनुष्य असून नोकरीच्या शोधार्थ शिहाबुद्दीन घोर्रजवळ त्याच्या विस्तार पावणाऱ्या सत्तेच्या वेळीं आला. विजयी लोक दूर- दूरचे प्रांत जिंकू लागले म्हणजे त्या लोकांच्या मुळच्या देशांतील अनेक धाडसी माणसें आपलं नशीब काढण्यास पुढें येतात. शिवाजी किंवा बाजीराव यांच्यावेळीं मराठे वीरगडी अश्याच रीतीनें नोकरींत राहून नवीन जिंकलेल्या प्रांतावर फोजबंद अधिकारी झाल्याचें आप- ल्यास अवगत आहेच. महमद बखत्यार खिळजी असाच धाडसी वीरगडी असून कित्येक वेळां नाकारठा जाऊन शेवटीं मिर्झापूरचा प्रांताधिकारी नेमला गेला. तुक व अफगाण यांचें सैन्य जमा करून

उत्तर हिंदुस्थानांतील इतर रजपूत राज्यांचा उच्छेद. ५१७

त्यानें प्रथम बिहारावर हृया केला व तो जिंकून देश आणि शहरें त्यानें लुटलीं. बिहार नांवाचें एक बोद्ध वसतिस्थान ठुटल्यारचें यांत । आणखी वर्णन आहे. हें बहुधा विक्रमशीलळ असावें, आणि त्यानें । तेथील डोकें मुंडळेले, विरोध न करणारे, सर्व बौद्ध भिक्षू कत्तल । केळे आणि त्यांची सर्व पवित्र पुस्तकें फेकून दिलीं, “कारण तीं वाचण्यास किंवा त्यांचा अर्थ सांगण्यास कोणी उरला नाहीं,! हें वृत्त । बहुधा ११९९ त झालें. कारण महमद बखत्यार कुतुबुद्दीना समोर । ओध व बिहार जिंकून, नजराणे घेऊन आल्याचे वर्णन ताजुल्मा- । सिरमध्ये आहे. ( ह्यावेळी कुतुबुद्दीन मोहोबा येथे बहुधा असावा ), । कुतुबुद्दीनानें त्यास पोशाक देऊन त्याचा सत्कार केला व बिद्वारांत । त्यास पुनः पाठविलें.

। ** नंतर त्यानें बंगाल जिंकण्याचा बेत करून गुप्तपणे एक फौज । तयार केली आणि बंगालची राजधानी नडिया हिजवर एकाएकीं हल्ला केला. ओत्सुक्यानें फोजेच्या पुढं चालत तो एकच घोडेस्वारा- । सह नडियास पोहोचला व बेधडक निरुपद्रवी रीतीनें घोड्याचा व्यापारी अशा स्वरूपाने शहरांत शिरून राजवाड्याजवळ आला. तेथें तलवार काढून पाहरेकऱ्यावर त्यानें एकदम हल्ला केला. अर्थात्‌ राजवाड्यांत गडबड उडाली, पण त्यास कोणीच विरोध केला नाहीं. । वृद्ध राजा लक्ष्मणसेन जेवणास बसण्याच्या तयारींत होता; तो गड- । बड ऐकून व चोकशी अंती खबर कळून तात्काळ पाठीमागच्या दर- । वाजानें पळाला तो जगन्नाथास जाऊन पोहोचला. महमदाची फौज लीकरच येऊन थडकली आणि तिनें राजवाड्याचा आणि शहराचा कबजा घेऊन प्रांत स्वाधीन करून घेतला. अथोत्‌ कोणीहि विरोध । न केल्यानें शहर ठुटलें जाऊन उध्वस्त केलें गेलें. महमद बखत्यार यानें बंगाळची मुख्य राजधानी गौर ऊफ लखनोती ही कबजांत । घेऊन ती आपलीहि राजधानी केली. ‘’

५१८ तिसरी हिंदु राज्ये.

या वर्णनाच्या सत्यतेबद्दळ अनेक विद्वानांनी शंका घेतल्या आहेत. बंगालचे सरकार राजकीय बाबींत इतकें बेफिकिर व निद्रिस्त होतें कीं, त्याला एक मोठी फौज इतक्या दूरवर चाळून येत आहे ( विक्रमशीलाहून नडियापर्यंत ) याची खबरच लागली नाहीं, किंवा दिल्ली व कनाज पडल्याचा डंका सर्व हिंदुस्थानभर वाजत असतां अशा भयंकर शात्रशीं टकर देण्याची त्यानें कांहींच तयारी केली नाहीं, किंवा प्रत्यक्ष शत्रू येऊन पोहोचल्यावर नडियाच्या किंवा बंगालच्या राज्याच्या वतीने एक हातहि उठविला नाहीं याचें आश्चर्य वाटतें. तबकात-इ-नासेरी या ग्रंथाच्या कर्त्याला ज्या मुस- लमानांनी माहिती दिली त्यांनी फारच अतिशयोक्ते केळी अतावी किंवा खुद्द इतिह्यासकाराचीच ही अतिशयोक्ति असावी. टक्ष्मणसेन राजाच्या जन्माची अशी एक वेडसर गोष्ट यांत सांगेतली आहे कीं ज्योतिष्यांनीं सांगितळेळा उत्तम जन्माचा मुहूर्त साधण्यासाठी त्याच्या गार्भेणी आईचे पाय बांधून वर टांगळे होते. या वेडसर हृकीकती- वरूनच तबकातमध्यें दिळेला सर्व वृत्तांत वेडसर आहे असें सिद्ध होतें. या वृत्तांतःचें वष तबकातमध्यें ११९९ दिलें आहे व लक्ष्मणसेन शकाचे ८० वें वर्ष म्हणून आणखी सांगितळें आहे. परतु आम्हांस असें वाटतें की, ही हकीकत १२०२ च्या सुमारास घडली, लोकांनीं मुळींच प्रतिकार केला नाहीं याचें कारण यांत असं दाखाविळें आहे कीं, त्या वृद्ध राजाच्या ब्राह्मण मंत्र्यानीं भोळसटपणें त्यास पूर्वी असं सांगितळें होते कीं, “रक तुर्क येऊन तुझे राज्य घेईल असें आमच्या ज्योतिषांत भविष्य निघतें आहे.’ एक आणखी अशी गप्प मारली आहे कीं, या जेत्याचे लक्षण काय निघतें असा राजानें प्रश्न केला तेव्हां त्या विद्वान्‌ ज्योतिष्यांनीं उत्तर दिळें की, जता आजानुबाहु आहे; तेव्हां राजानें कोणत्या तुकोचे हें लक्षण आहे याची चौकशी केटी आणि महमद बखृत्यार याचे असे लांब हात आहेत असं

उत्तर हिंदुस्थानांतील इतर रजपूत राज्यांचा उच्छेद. ५१९

कळलें. यांत कांहीं तथ्य असेल कीं, हिंदु लोकांचा विरोध भारत- वर्ष म्लेच्छाच्या ताब्यांत जाणार या पुराणांतील कथांनी किंवा तत्कार्लांन ज्योतिष्यांच्या वेडसर भयप्रद भाविष्यानीं लंगडा पडला. परंतु तबकातनें दिळेळी वरील हकीकत सकृददरानींच इतकी वेडसर दिसते कीं, ती खरी नसावी; आणि आम्ही त्यानें दिळेला बंगालचा उच्छेदाचा वत्तांत अतिशयोक्तीचा अर्थात्‌ असत्य मानतो. महमद बखल्यारचा बराच विरोध झाल्यानंतर बंगाळ पडला. आणि तोहि एकदम नव्हे तर गुजराथ आणि बुंदेलखंड याप्रमाणे हळू हळू पडला असेच दिसतें.

तबकातमध्यें ही उलट सुलट केलेली हकीकत १२५०च्या सुमा- रास लिहिली गेळी व ती महम्मद बखत्यार बरोबर असलेल्या दोन गप्पीदास वीरांनीं, जेत्यांचे शौर्य आणि जितांचा भ्याडपणा वाढवून,

  • दिसते. तसेंच एका अपरिष्ित देशांत परकी लोक एकदम आले म्हणजे तेथील लोकांचे स्वभाव व विचार न समज- ल्यानं साहजिकच जे गेरसमज उत्पन्न होतात त्यामुळें व तिसरें, हिंदु लोकांच्या ज्योतिषविषयक भोळसट कल्पनांची थट्टा करण्याच्या हेतून ही हकोकत बनली असावी. या परकी वत्तांताच सल्यत्व एका हिंदुस्थानांताळ समकालीन लेखाच्या कसोर्टानें तपातळें पाहिजे, हा लेख म्हणजे केरवसनाचा बाकरगंज येथील शिलालेख होय (जे आर. ए. एस्‌. बंगाळ व्हा. ७ पा. ४० ते ५०). या लेखांतील हकीकत दुसऱ्या बाजूला लक्ष्मणसेनाच्या पराक्रमाची व दान देणा- ऱ्या केशवसेनाच्या पराक्रमाची अतिशयोक्तीनें तार्रफ करणारी आहे हें खरें. पण त्यांत लक्ष्मणसेनाच्या या अत्यंत अपमानास्पद परा- जयाची कांहींच गंधवार्ता नाहीं. असें कदाचित्‌ म्हणतां येईल कीं, रीव लेखांत लेख लिहिणाऱ्याच्या पराजयाचं वर्णन न करणें मनुष्य भावास साहजिक आहे. तुरुष्काशीं झालेल्या लढायांचा प्रतिकूल

५२० तिसराीं हिंदु राज्ये.

उल्लेख बुंदेलखंड आणि गुजराथ यांतील लेखांतल्याप्रमाणें येतो, नाहीं असें नाहीं. पण आपल्यास निदान असें म्हणतां येतें कीं प्र | सेन हा एक शूर राजा होता व त्यानें बनारस, जगन्नाथ ब प्रय येथें तीन जयस्तंभाहे उभारले होते. तसेंच केशवसेन हा अद्याप पूर्व बंगाल्यांत एक शक्तिमान्‌ राजा होता हेंहि मान्य केलें पाहिजे. लक्ष्मणसेनाचे वंशज पूर्व बंगाल्यांत त्यानंतर बरींच वर्षें राज्य करीत! होते. तेव्हां शूर टक्ष्मणसेन लढाई केल्याशिवाय पळून गेळा ही! गोष्ट संमवनीय दिसत नाहीं, यामुळें. असेंच मानणें वाजवी होईल! कीं, लक्ष्मणसेन मेल्यानंतर माधवसेनाच्या लहानपणाच्या राज्याच्या वेळीं हें वृत्त घडलें. माधवसेनाचें नांव या बाकरगंज ताम्रपटांतून खोडून काढलेले स्पष्ट दिसतें ( सदर पा. ४९ ). या सर्वे कारणां- वरून दोन विरोधी विधानांचा मेळ घालतां बंगालचा उच्छेद बर्‍याच विरोधानंतर झाला व तोहि एकदम न होतां हळुहळु झाला.

. पण तबकातनें दिळेळी हकीकत एक वेळ खरी मानली तरी सुद्धां ती हकीकत जितकी मानली जाते तिनकी अपमानास्पद नाहीं. प्रथम हें लक्षांत ठेवलें पाहजे कीं, नडिया ही सेनांची मुख्य राज- घानी नव्हती. ही एक ब्राह्मणांची नवीन वसाहत होती. गंगेमधीळ एका बेटांत ह्या त्राह्मणविहाारच होता. आणि तेथें लक्ष्मणसेन कधीं कधीं रहात असे. राजवाड्यावरीळ पाहरेकरी फारच थोडे असावे आणि इाहरांताहि फौज नांवापुरतीच असावी. दुसरें अशा ठिकाणा- वर एकाएकीं हछा करणं अश्नक्य नाहीं. किंबहुना इतिहासांत असे अचानक हलले कित्येक नमूद आहेत. दक्षिणेंतील देवगिरीवर अशाच प्रकारचा अचानक व फसवेगिरीचा हछा यानंतर इंभर वर्षांनीं अह्लाउद्दिनानें केला. फार कशाला ? या वृत्तानंतर पांचच वर्षांनी हिंदुस्थान जिंकणारा शिहाबुर्ददन सिंधु नर्दाच्या पूर्वे किनाऱ्यावर मुकाम करून तंबूंत निजला असतां दहा पांच गख्खरांनीं ठर

उत्तर हिंदुस्थानांतील इतर रजपूत राज्यांचा उच्छेद. ५२१

| नजर चुकवून पाण्यांतून जाऊन, तंबूंत घुसून शिहा- बुद्दीनाचा खून केला.” तिसरी गोष्ट अश्शी कीं, अशा अचानक हल्ल्यांतून जीव वांचवून पळून जाऊन दुसऱ्या ठिकाणीं राजधानी करून तेथन विरोध चाळू ठेवणें मळींच अपमानास्पद नाहीं; उलट योग्य आणि प्ररासनीय आहे. कनोजचा राज्यपाल व गुजराथचा भीम यांनीं महमुदाविरुद्ध हेंच केळे आणे अर्वाचीन मराठ्यांच्या इतिहासांत राजारामाने औरंगजेबाविरुद्ध इंच केलें. किंबहुना अली- कडील सरकारें सुद्धां हेंच करितात. वेढा दिळेळी राजधानी सोडून दुसरी राजधानी करून तेथून ते विरोध चाळू ठेवतात. लक्ष्मणसेन ब त्याचे वंशज यानी हेंच केलेलें दिसतें. नडियाच्या पूर्वेस मह- तत्वाचे शहर विक्रमपुर होतें. तेथून प्रासेद्द केलेंठा लक्ष्मणसेनाचा एक दानलेख सांपडलाहि आहे. ती आपली राजधानी करून तेथून पूवबंगाल्यावर शंभर वर्षे त्यांनी आणखी राज्य केलं, व गुजराथ आणि बुंदेल्खंडाप्रमाणेंच मुसलमानाशीं तेथून त्यानीं विरोध केला खुद्द तबकात मध्यें लिहिळें आहे कीं, ज्यावेळेस नासिरुद्दीन लख- नोतीवर चाळून गेला, तेव्हां खिळजी तेथे नसून आपली फौज घेऊन £ बंगच्या प्रांतांत घुसण्याच्या इराद्याने ‘” पूर्वेकडे गेला होता. याचा अर्थ त्याने सेनराजावर स्वारी केली होती (रव्हर्टी पा. ६२९). हाहि विरोध शेबटीं हिंदु राज्य स्थापन करण्यास उत्तर हिंदुस्थानच्या इतर ठिकाणांप्रमाणें बंगाल्यांतहि कां समर्थ झाला नाहीं हा खरा प्रश्न आहे आणि या असमर्थतेचीं कारणें पुढील प्रकरणांत आम्ही विस्ताराने देऊं.

  • मुलसमानी घोडयाचे प्यापारी त्या वेळीं राजघार्नांत येणें ही एक हमीची गोष्ट होती. हिंदु राजांना आरबी व इराणी घोडे नेहमीं पसंत सत व त्यांजबद्दल ते मोठमोठ्या किंमतीहि देत, यामुळें मुसलमान घोड्याचे व्यापारी त्या काळीं हिंदु राजांकडे वारंवार येत; यामुळें त्यांच्या

प्रेण्याने कोणालाहि संशय उत्पन्न होत नसे.

प्रकरण चाविसावं. उत्तर हिंदस्थानचा उच्छेद. भाग २.

मुसलमानी साम्राज्याच्या अगदीं सरहद्दीवर असलेलीं मजबूत हिंदु राज्यें चालुक्य, चन्देळ व सेन यांप्रमाणे कुतुबुद्दीननें व मइ- मद बखत्यारनें जिंकली किंवा नरम केलीं. त्यापलीकडे असलेलीं हिंदु राज्यें जिंकण्याचे काम त्याच्या मागचा सुलतान अल्तमशा यानें केलें. तोहि तितकाच रदार आणि दैववान्‌ होता. कुतुबु्द्दीनाप्रमाणेच तो प्रथम गुलाम होता. त्याचें गुण व शौर्य शिहाबुर्दानच्या लक्षांत आलें. त्यानें त्यास गुलामीतून मुक्त केलें व कुतुबुद्दीनाप्रमाणेच एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सारखी बढती दिली. कुतुबर्दीननें त्यास आपली मुलगी दिली. तबकातमध्ये अशी एक गोष्ट सांगितली आहे कौ, अलतमशला शिहाबद्दीन गझनी येथ खरेदी करूं लागला तेव्हां व्यापारी पुढें केळेली किंमत घेईना. तेव्हां शिहाबुद्दीननें हुकूम केला की, यास गझनी येथे कोणी बिकत घेऊं नये. कुतुबुद्दीनानें बाद- शह्हाचा हुकूम पाळून त्यास दिल्ली येथें खरेदी केळें (इलियिट २ पा. २२२ ). “कुतुबुद्दीन लोहूर ( लाहोर ) येथें मरण पावला तेव्हां शमसुद्दीन अल्‌तमश॒ हा बदामी येथें प्रांताधिकारी होता. तेव्हां एकंदर सरदारांच्या संमतीनें दिल्लीच्या सेनापतीनें त्यास दिछीस बोळाविळें आणि सुलतान निवाडेलें. कांहीं फौजेच व प्रांताचे अधि- कारी, कुबाचा इत्यादि, या निवडणुकीस विरोधी झाले. परंतु ईश्वर. कृपेनें त्यांचा पराभव झाला आणि प्र्येक इसम जो विरोधी किंवा बंडखोर झाला तो पराजित होऊन दिल्ली, बदायं, औध, बनारस आणि शिवालिक डोंगर हे सवे प्रांत त्याच्या कबजांत आले. व्र

यापासून लाद्दोर प्रांताहे सोडबिळा गेला आणे सिंध व बखर १२१७

उत्तर हिंदुस्थानचा उच्छेद भाग २ रा. ५२३

’ त कुबाच्यापासून घेतला गेला. घियासुद्दीन बखूत्यार याच्या ताब्यां- ताल बंगाल प्रांतहि जिंकला गेला; व त्यानें आल्तूमशचें मांडलि- कत्व मान्य करून खंडणी दिली. ”’ याप्रमाणें दिळीचें मुसलमानी साम्राज्य दुसऱ्या एका लायक राजाच्या सत्तेखालीं आलें आणि त्यानें आपलें लक्ष प्रथम राज्यांतील बंडखोर हिंदु सरदार जिंकण्याकडे दिलें. ६२३ हिजरीमध्ये (१२२७ इसवी ) तो रणथंबोरवर चाळून गेला. “’ या किल्ल्यापुढें सत्तर राजांनीं हात टेकले होते. सुलतानाच्या नोकरांनीं ईश्वराच्या कृपेनें तो किला घेतला. ६२४ हिजरीमध्यें ( १२२७ इसवी ) तो शिवा- लिक प्रांतांतील मंडावर वर चाळून गेला आणि ईश्वराच्या कृपेनें तेंहि हस्तगत करून पुष्कळ ढूट संपादून सुलतान दिल्लीस परत आला ( रुहटींचा तबकात पा. ६१८). ह्या दोन जागा बहुधा चोहाण सरदारांच्या ताब्यांत असाव्या, आणि ते बंडखोर झाल्यानें त्यांच्यावर हृछा केला गेला. रणथंबोरवर कुतुबुद्दीनानंहि हछा केला होता हे॑ आपण पूर्वी ॥ पाहिलें आहे, व तेथील सरदार शरण आल्याने बचावला होता. चोहाणांनीं रणथंबोर पुनः घेतलें व तेथला शेवटचा राजा हम्मीर- ॥ महाकाव्याचा नायक-शूर हम्मार हा होता. हीं मंडावर बद्दल ॥ थोडासा विवाद आहे, आणि शिवालिकमध्ये तें राहर होतें असें म्हटलें आहे ( इलियट २ यांत डोंगर म्हटलें आहे, पण रॅवहटींने प्रांत ॥ म्हटलें आहे ), यामुळें हा विवाद उत्पन्न झाठेला आहे. मंडावर प्रमा- णच हांसी शिवालिक डोंगरांत आहे असे वर्णन येतें, परंतु तें शहर हिमालयाच्या पायथ्याशी नसून कणोल जिल्ह्यांत आहे. आम्ही पूर्वी १ सांगितलेंच आहे कीं, शिवालिक राब्दानें सांबरच्या चोहाणांचा सपादलक्ष देश बोधित होतो ( भा. २ पा. ३६ ). बहुधा मंडावर हें मुळांत नाहरराय प्रतिह्वाराचें असून प्रथ्विराजानें तें जिंकल्यावर

५२४ तिसरी हिंदु राज्ये.

चौहाणांच्या राज्यांत आलं व यावेळीं तेथें चोहााण राजा राज्य करीत असावा. मंडावर हल्लीं पडक्या स्थितींत आहे; आणि जोधपू्रच्या अवाचीन शहरापासून चार मेलावर आहे | अल्‌तमशनें यानंतर स्वालेरच्या किल्ल्यावर चाळ केली, कुतुबुद्दी- नानें हा किल्ला शरण आल्यामुळें सोडला होता. मुसलमानी साम्रा- ज्यांत हें एक मजबूत ठिकाण होतें, आणि तें कवजांत घेणें महत्त्वाचें होतें. यावेळीं हा किल्ला कछवाहांच्या ताब्यांत नव्हता. ते तेथून अंतरावर असलेल्या अंबरच्या किल्ल्यास गेले होते. यावेळीं ह्वा किछा प्रतिहारांच्या ताब्यांत होता. श्रीमंत बळवंतराव भय्या साहेब शिंदे यांनीं प्रसिद्ध केलेल्या खाल्हेरनाम्यांत परिहारांनीं हा किछा कबजांत घेतल्याचे सांगितलें आहे. ग्वाल्हेर गेझोटयर असें म्हणतें कीं, परि- हारानीं हा किल्ला कछवाहांपासून ११२९ त हिसकावून घेतला, आणि कुतुबुद्दीनानें सांठखपाल प्रतिहार याजपासून तो घेतला होता १२१० त अलतमदाच्या ताब्यांत तो किल्ला होता. पण परिहारांनीं तो परत घेतला. यामुळें त्याजवर हृया करणें भाग पडलें. “ ६२९ हिजरी ( १२३२ इसवी ) मध्यें अल्‌तमशनें किल्ल्यास वेढा दिला. मलिक्‌देव ( रव्हटीं याठिकाणीं मंगळ देव म्हणतो ) बसिळ देवाचा पुत्र ( रनहटीं मालदेव वाचतो ) यानें ही लढाई चालविली. अकरा- महिनेपर्यंत मुसटमानी फौज वेढा देऊन बसली होती. शेवटीं मलि- कदेव रात्रीं पळून गेला. सुलतानाच्या तंबूसमोर १७०० लोकांना शिक्षा दिली गेली, ग्वाल्हेर येथें अधिकारी नेमून सुलतान दिल्लीस परत आला ”’ ( इल्यिट २ पा. २२७ ). आम्हांस असें वाटतं कीं ज्या लोकांस शिक्षा झाली ते लोक सुलतानाच्या फौजेपेकींच असावे. मलिकदेवास पळण्यास त्यांनीं वाव दिला हा त्यांचा अपराध होता. हे ठोक मलिकदेवाचे नसावेत. मलिकदेवाचे लोक पकडले गेले असं येथे सांगितळें नाहीं; आणि शिक्षा दिली हे शब्द त्या लोकांस लागूं

उत्तर हिंदुस्थानचा उच्छेद भाग २ रा. ५२५

होणार नाहींत, ह्याशिवाय आणखी गोष्ट अशी कोौं, बाबरच्या काळीं ह्या किल्ल्यांत एक शिलाळेख होता. त्यांत रजपूत स्रियांनी किल्ल्या- वर चिता रचून आपल्यास जाळून घेतळें असें वर्णन होतें; आणि त्या जागेस अद्याप जोहारताळ म्हणतात ( ग्वाल्हेर गझेटियर पा. १२५ ). रजपूत शिपाई वेढा घातलेल्या फोजेतून फुट्टन जातांना मारळे गेळे असावे व कांद्दी सुटळेहि असावे. ग्वाल्हेर किल्ल्याचा नंतरचा इतिहास प्रिन्स बळवंतराव भय्यासाहेब यांनीं दिलेला येथे विस्तारानं देण्याची आवश्‍यकता नाहीं. त्याचे स्वामित्व नेहमीं बद- | गेठें. तेमूरलंगाच्या वेळीं हा किछा तोमरांनीं घेतला. तो पुनः बाबरनें घेतला. मोंगलांच्या अमदानींत राजपुत्रांना कैदेंत ठेवण्याचे हे ठिकाण होतें, पुढें भदोरा राजांनीं तो घेतला व त्यांपासून शिंद्यांनी घेतला. इंग्रजांनीं दिंद्यापासून दोनदां घेतला पण हल्लीं तो शिंद्याक- डेच आहे.

“ ६३२ हिजरी मध्यें ( १२३४ इसवी ) अल्‌तमशनें माळव्या- वर फौज नेली व त्यानें भेलश्याचें राहर किल्ल्यासह घेतलें, तेथे एक देऊळ होतें, तं तीनशे वर्षे बांधीत असावें. ते १०५ गज उंच होतें. ते उध्वस्त केलें गेळं. !! ( इलियट २ पा. ३२८ ). हें देऊळ हुधा अल्‌बेरूनीनें सांगितलेळें भेछस्वामी (विष्णु) चें देऊळ असावें. ह. स. पू. पहिल्या शतकांतील लेख असलेला गरुडस्तंभ बेतवानदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर असलेल्या विष्णूच्या देवळाचा असावा. हँ देऊळ पूर्वीच पडलेळें असावें. तें कांहीं असो, उदेपूरचें शिवार्चे देवालय अद्याप उभें आहे आणि मुसलमानांच्या तडाक्यांतून तें गाचले ह्याचें आश्वय वाटत, या शिवाच्या देवळाचा वर उद्ठेख शाहीं. उदयादित्य परमारानें हें देऊळ बांधळें असून याचेंहि शिखर उंच आहे. आणि तें अद्याप परमारांच्या वैभवाची साक्ष देत

म, भा..,.२४

५२६ तिसरी हिंदु राज्ये.

आहे. भेलशाचा उच्छेद शेवटचा परमार राजा देवपाल याच्या कारकीदीत झाला. उत्तर परमारांच्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणें यानें १२१६ पासून १२४० पर्यंत राज्य केलें |

“८ भेलशाहून अल्‌तमश उज्जनीवर चाळून गेला. तेथें महाका- लाचे प्रसिद्ध देवालय होतें, तं त्यानें तोडळं आणि या काळापूर्वी १३४६ वर्षीं राज्य करणाऱ्या विक्रमादित्याची मूर्तिह्ि फोडली. हिंदूंचा शक याच्या राज्यापासून चालतो. ( या आंकड्यावरून १२८९ इसवी हा काळ येतो. पण उज्जनीचा उच्छेद १२३४ त झालेला आहे. तेव्हां आपल्यास असें मानतां येईल कीं, विक्रमाने ५५ वर्षे राज्य केलें ). कांहीं तांब्याच्या मूर्ति सांपडल्या त्या ब महाकाळाची दगडी मूर्ति दिल्लीस नेली ‘’ ( इलियट २ पा. ३२८ ). वरील हकी- कतींत अतिशयोक्ति नसून थोडक्यांत सांगितलेलं वृत्त खरें मानण्यास हरकत नाहीं. तत्कालीन हिंदु लेख आपणांस पुराव्याच्या मजबुतीस मिळत नसला तरी मह्ाकाळाचें देऊळ त्यावेळीं तोडळें जाऊन त्याच्या ठिकाणीं मशीद बनली ही गोष्ट निःसंशय आहे. कारण इतिहास असें सांगतो कीं, राणोजी शिंद्याच्या वेळीं या मशिदीचें रूपांतर केळें जाऊन पुनः हिंदु महाकालारचें देऊळ बनलें. राणोजी शिंद्याचे वंशज अद्याप उज्जनीवर राज्य करीत आहेत व ते महाकालाचे भक्त आहेत. महाकाळाचे हृल्लींचे उंच शिखराचें देऊळ राणोजी शिंद्याचे शेणवी दिवाण रामचंद्रबाबा यांनीं बांधलें असून हा निपुत्रिक अस- ल्यानें त्याने आपली सर्व संपात्ते हें देऊळ बांघण्याकडे लाविली ( १७४५ इसवी ). बहुधा हललींचें देऊळ पूर्वीच्याच देवळाच्या ठिकाणीं आहे. हं येथें सांगण्यासारखं आहे कीं, उज्जनीच्या र | मान राज्यकत्यांनी मूळ तोडलेल्या देवळापासून जवळच महाका दुसरी मूर्त स्थापन करण्याची परवानगी दिली आणि त्यास दृद्ठी व॒ म्हणजे जना महाकाळ या नांवानें संबोधितात

उत्तर हिंदुस्थानचा उच्छेद भाग २ रा. ५२७

ही माळव्यावरील स्वारी बहुधा प्रसिद्ध हिंदू देवालये तोडण्या- च्याच इराद्याने झाठी असल्यानें महमुदाच्या सोमनाथावर्राल स्वारी- सारखी धार्मिक स्वारी होती. माळवा जिंकून त्यास धभुसल्मानी सत्ते- खालीं आणण्याचा यांत प्रयत्न नव्हता. बहुधा हा प्रांत दूर म्हणजे ग्वाळेरप्रमाणें मुसलमानी राज्यास लागून नव्हता, यामुळें परमा- । रांची सत्ता यापुढे आणखीं शंभर वर्षे गुजराथ येथील चाट्क्य सत्तेप्रमाणें टिकली. माळव्याचा शेवटीं विजय अल्लाउद्दीन खिल- जीच्या वेळीं झाला. । याप्रमाणें आम्हीं उत्तर हिंदुस्थानांतील मुख्य मुख्य राज्यांचा । उच्छेद म्हणजे चोहाण, राठोड, चाटक्य, चेदेछ, सेन, कच्छवाह । आणि परमार यांचा उच्छेद वार्णिळा. मेवाडच्या गुहिलोतांची पाळी । यानंतर आली. याची फारशी हकीकत मिळत नाहीं. मेवाडवर हल्ला । नासिरुद्दीनच्या वेळीं झाला. त्यावेळीं जेत्रसिंह राजा होता (१२५३ । इ.) आणि गुहिलोतांची राजधानी नागदा उच्छिन्न झाली. तथापि | जैत्रसिंहानें मुसलमानांचा पराभव केला व मेवाडची डोंगरी राजधानी । शाबूत राहिली. गुहिलोत तेथें पराक्रमाने पुढें राज्य करीत राहिले, ते । अह्लाउर्द्दान खिलजीनें चितोड घेईपर्यंत, सु. १३२०० इ. पर्यंत, होते,

प्रकरण पंचाविसावें. उत्तर हिंदुस्थानचा उच्छेद. -मुख्य कारणें-

उत्तर हिंदुस्थानाच्या उच्छेदाची कारणें पंजाबाच्या उच्छेदाच्या कारणांहून निराळीं असलीं पाहिजेत व आहेत. पंजाबांत राजपूत राज्यें नव्हतीं. पंजाब पूर्वी सांगितल्याप्रमाणे नेहमीं बाहेरच्या राजांच्या सत्तेखालीं होता. त्यावर प्रथम सिंध, नंतर काऱ्मीर, नंतर काबूल्ची सत्ता होती. उत्तर हिंदुस्थानावर आतांपर्यंत हिंदु व स्थानिक राजे राज्य करीत होते. उत्तर हिंदुस्थानानं बाहेरून आलेल्या स्वारी कर- णाऱ्यांस नेहमीं पराजित करून बाहेर हांकडून दिळें होतें. अलेक- झांडरनें सतळज नदी मुळींच ओलांडली नाहीं. मिनँडर अयोध्ये- पर्यंत आळा; पण पुर्ष्पमित्रांने शेवटीं त्यास हांकळून दिळें. शक मथथु- रेपयंत आले होते, पण त्यांसाहे विक्रमादित्यानें हांकटून दिलें कुशन व हूण उत्तर हिंदुस्थानाच्या पश्चिम भागांत बरींच वषे राज्य करीत राहिले हें खरं. पण त्यांस अनुक्रमें पाटलीपुत्राचा स्कंदगुप्त व मंदसोरचा विष्णुवर्धन आणि शेवटीं ठाणेश्वरचा प्रतापवर्धेन यांनीं हांकळन दिले. ६००इसवीपासून १०० ०इसवीपर्यंत बाहेरच्या स्वाऱ्या हिंदुस्थानावर झाल्या नाहींत. १०१९मध्यें महृमुदाने राज्य- पालास जिंकून उत्तर हिंदुस्थानावर खंडणी बसावेठी, पण गाहड- वालांनीं ठलोकरच या बाहेरच्या रत्रस हांकळटन देऊन ही खंडणी बंद केली; व महमुदाच्या सत्तेखाली मान वांकविण्याबद्दल चेंदेछ व व कच्छवाहा यांनीं राज्यपालावर स्वारी करून त्यास ठार मारिले होतें. तात्पर्य उत्तर हिंदुस्थानच्या आर्य राजांनीं आपलें राज्य बाहे- रच्या स्वाऱ्यांपासून नेहमीं कायम ठेविळें होतें. हिंदु काळांतील

उत्तर हिंदुस्थानच्या उच्छेदाची मुख्य कारणे. ५२९

राजपूत राजवंश निःसंशय जास्त पराक्रमी असून त्यांस पारतंत्र्य बिलकुल खपत नव्हते, त्यांचा शिहाबुर्दान घोरीपुढें उच्छेद कसा झाला £ शस्त्रांची कमतरता मुळींच नव्हती व लायक सेनापतींचीद्दि नव्हती. किंबहुना अजिंक्य चोहाणांनीं मुसलमानांच्या हल्ल्यास तोंड देणारा सर्वे श्रेष्ठ वीर पृथ्विराज पुढें केला होता. त्यानें एकामागून एक चार राजांना जिंकले होतें. मुसलमानांच्या विजयाच्या लाटेला मजबूत बंधाप्रमाणें त्यानें अडवून धरलें होतें. हा बंध तुटल्याबरोबर मुसल- मानांच्या जयाचा पूर उत्तर हिंदुस्थानभर ठोढ्याप्रमार्णे पसरला व पांच वर्षाच्या अवधींत सर्व रजपूत राज्यें त्यानं उळ्थून टाकलीं चौहाण आणि राठोड, चंदेछ आणि सोळंखी, यांसारखी शूर राजपूत राजघराणीं कां उच्छिन झाठीं आणि उत्तर हिंदुस्थान पुन उठूं शकत नाहीं अशा रीतीनें कां पडलें £ हा प्रश्‍न आहे

विरुद्धपक्षांत शरीरबळ व शोर्यबळ यांत अंतर नव्हतें. रजपूत लोक तुर्क किंवा अफगाण जेत्या इतकेच शक्तिमान , शूर व कष्टसह होते. शस्रांचाहि अधिक उत्क्षे कोणाकडेहि नव्हता, अफगाण व राजपूत दोहोंजवळ अन्न्यस्तें नव्हती. ते एकाच शस्त्रांनी म्हणजे तलवारी, बाण व भाले यांनीं लढत होते; आणि दोघांजवळहि हत्ती आणि तेहि सारख्याच संख्येचे होते. मोंगळांनीं मात्र रजपुतांस तोफांच्या सहाय्याने जिंकलं व उत्तर इतिहासांत शिंद्यांच्या मराठ्यांनी रजपुतांस तोफांनींच जिंकलं. पूर्वी सांगितल्याप्रमाणें सुधारलेली शास्त्र पाश्चात्य देशांमध्ये भौतिक शास्त्राच्या जोरावर जीं निघाठीं आहेत त्यापुढे हिंदुस्थान पडणें ठरलंच होतं. पण शिहाबुद्दीनच्या काळीं कोणल्याहि पक्षाजवळ अनग्न्यस्रें नव्हतीं. ब्यांचा उछेख चंदबर्दाई व फिरिस्ता कालातिक्रमानें करितात.

शिहाबुद्दीन घोरी व त्याचे मुसलमान यांचा धार्मिक उत्साह राजपुतांच्या धार्मिक उत्साहापेक्षां जास्त होता असेंहि म्हणतां येत

हळ श्*

५३० तिसरा हिंदु राज्ये.

नाहीं. जरी शिहाबुद्दीन याचें वर्णन मुसलमान इतिहासकार धार्मिक

युद्ध करणारा म्हणून करितात, तरी तो वस्तुत: प्रदेश जिंकण्याक- रितां युद्ध करीत होता, धर्माचा विस्तार करण्याकरितां नव्हे, किंब- हुना उत्तरहिंदुस्थान जिंकण्यांत त्याचा हेतु लोकांस मुसलमान कर- ण्याचाहि दिसत नाहीं. आणि उत्तर हिंदुस्थानांत धर्मांतर मोठ्या प्रमाणावर झाळेलॉहिे दिसत नाहीं (याची कारणें लौकरच पुढें देऊं ). दुसऱ्या पक्षी राजपूत व उत्तर हिंदुस्थानचे टोक यांचा धार्मिक उत्साह पंजाबच्या लोकांच्या धार्मिक उत्साहापेक्षां अधिक तीत्र होता. पूर्वी सांगितठें आहेच कीं, पंजाबांतील हिंदुधर्मभावना नेहमीच मृदु होती व आहे; आणि सरस्वती, यमुना आणि गंगा यांचा प्रदेश

हिंदु धर्माची जन्मभूमि असल्यानें हिंदु धमंभावनेचे मजबूत ठिकाण

होतं व आहे. यामुळे आमचा समज असा आहे कों, दोन्ही पक्षा- कडे धार्मिक भावनाया काळीं सारखीच बलवान होती.

सर्वांत मुख्य कारण या उच्छेदाचें जें समजलें जातें व योग्य रीतीनें समजळें जाते तें राजपुतांचीं आपसांतील युद्धे हें होय. राजपूत राजवंश आपसांत आपला प्रदेश वाढविण्याकरितां युद्ध॑ करीत नसत हें खरें. पण आपलें वर्चेस्व स्थापित करण्यासाठीं ते नेहमीं आपसांत लढत. याच वेळीं उदाहरणार्थ पृथ्विराज आपल्या शेजारील गुजराथ,

बुंदेळखंड आणि कनोज या तीन राष्ट्रांवर वर्चस्वासाठी चाढून गेला.

या लढाया नेहर्मींच कसोशीच्या असत; किंबहुना युरोपांतील राष्ट्रांतील

युद्धाप्रमाणें त्या चिकार्टाच्या असून दोन्ही पक्षाक्डील शूर वीर पुष्कळ

संख्येनें युद्धांत मरत. यामुळें या चारी राष्टंची म्हणजे चोहाण, राठोड चंदेळ आगि सोळंखी यांची युद्धशाक्ते कमी झाली; आणि प्रत्येक

राष्ट एकेकटें समानरात्रूश्ीं लढून उच्छित्न झाठें. आपसांतील लढाई हें राजपूत लोकांचें सदाचें व्यंग आहे. राजपुतांनी तोफखान्याकडे

नेहमींच दुलंक्ष केलें असल्यानें अर्वाचीन युद्धांत ते नेहर्माच बलहीन

य आल

उत्तर हिंडुस्थानच्या उच्छेदाचीं मुख्य कारणे. ५३१९

राहिलें; तथापि तेव्हांहि ते जर आपली सर्व शाक्ते एकवटते तर मोंगलांस तं केंव्हांहि हांकळून देते असं मनूचीनें आपल्या बखरींत स्पष्ट लिहिलें आहे. आणि याचर्रातीनें त्यांनीं मराठ्यांसाहे दाद दिली नसती ( इग्लिशांस नव्हे,, कारण मराठ्यांचा तोफखाना युरोपीयांच्या हातांत होता. शिहाबुद्दीन उत्तर हिंदुस्थान जिंकण्याची महत्त्वाकांक्षा धरून होता ही गोष्ट रजपुतांस खबर देणाऱ्यांकडून कळलीच असली पाहिजे होती. तेव्हां त्याच्या विरुद्ध आपसांतील भांडणे बाजूस ठेऊन त्यांनीं एकजूट करावयास पाहिजे होती, सर्वास खाऊन टाकणाऱ्या ह्या समान शत्रविरुद्धाहे त्यांनीं आपलीं भांडणें बंद केलीं नाहींत आणि ते एकामागून एक उच्छिन्न झाले.

यावेळची हिंदुस्थानची स्थिति १८व्या शतकाच्या अंती अस- लेल्या जमर्नांच्या स्थितीसारखी होती. त्यावेळीं जमनींतहि अनेक लहान लहान पण बलवान्‌ राज्ये होतीं व त्या प्रद्यकांतील राजा पवित्न रोमन साम्राज्याच्या बादशाहीचा भव्य मान मिळविण्याचा प्रयत्न करी, आणि दुसऱ्या जमन राजांस नष्ट करण्याचा नव्हे, पण नम्न करण्याचा प्रयत्न करी. त्याचप्रमाणे हिंदुस्थानांताहे प्रत्यक रजपत राजा चक्रवर्ती होण्याचा प्रयत्न करी व दुसरीं राज्ये खा- ठसा न करितां मांडलिक बनविण्याचा यत्न चालवी. यामुळें इतर राज्यें बलहीन होऊन जेताहि बलहीन होत असे. कारण त्याचा प्रदेश व उत्पन्न न वाढल्याने त्याची शाक्तेहि वाढत नसे. उदाहर- णाथ माळव्याचा भोज इतर राजपत राजांशी टढला आणि ल्यांस नमवून आपल्यास मालवचक्रवती त्यानें म्हणवून घेतलं. त्याच- प्रमाणें चदींचा कणे ह्यानेंहि चक्रवर्ती होण्याचा प्रयत्न केला आणि गुजराथचा कुमारपाल यानेंहि सम्राटाचा मान मिळविण्यासाठी धड- पड केली, याकाळीं गाहडवाळ आणि चोहाण यामध्ये सुमार तास वर्षेपर्यंत ही चडाओढ चालली. प्रथम विजयचंद आणि विम्रहराज

५३२ तिसरी हिंदु राज्ये.

यामध्यें चाळून नंतर जयचेद आणि पृथ्विराज यामध्यें चालली आणि दोघेहि बलहीन झाले. रासांत सांगितलें आहे कौं, प्रृथ्विराजाच्या शंभर सामंतापैकीं ९० सामंत जयचंदाची कन्या संयोगिता हृरण करण्यांत पडले. तात्पये शिहाबुद्दीनपुढें सवच राजपूत राजवंश पडले

ह्यांत आश्वये नाहीं. अशाच परिस्थतींत जमन राज्येहि नेपोळियन

पुढे निरानेराळीं पडलीं.

पण जर्मनीचा कायमचा पराभव झाला नाही, आणि जमनी परसत्तेखाठीं कायमची गेली नाहीं. याउलट उत्तर हिंदुस्थान काय- मचे जमीनदोस्त झालें. तेव्हां आपल्यास खरोखर कारण शोधून काढावयाचे तें तात्पुरते विजय झाल्यावर म्हणजे एखाददुसऱर्‍्या सढाईंत हार आल्याने कांहीं काळ परसत्ता स्थापित झाली तरी उत्तर हिंदुस्थान आपल्या पायांवर पुन: उभें राहून स्वतंत्र कां झाळें नाहीं या गोष्टीचे कारण पाहावयाचे आहे. आमच्या मतं या काळा- च्या सुमारास जातिबंधनं हिंदुस्थानांत अधिक दढ झालीं हें ह्या अधःपाताचें कारण आहे. सामान्य निरीक्षणाच्या भागांत आम्ही दाखाविणारच आहों कौ, या कालविभागाच्या आरंभीं जातिबेधन बरेंच शिथिल होतं, तं बाराव्या शतकाच्या अंतीं फारच घट्ट झालें, आणि हिंदुस्थानांतील हृल्लींची जातिव्यवस्था तिच्या असंख्य पोट- जाति आणि त्यांचे बारिकसारिक भेद यांसह अमलांत आली क्षत्रिय पूवी वेश्‍्य स्रिया करीत आणि ब्राह्मण क्षत्रिय आणि वेर्‌य स्रिया करीत. कधीं या उलटहि गोष्ट घडून येई. पण आतां प्रत्येक जात व पोटजात लग्नें आपल्यांतच करूं लागली व रोटीव्यवहाराहि त्यांनीं आपल्यांतच ठेविला. रोटी व बेटी व्यवहार पूर्वी खुला अस- ल्यानें सामाजिक सहानुभाति हिंद लोकांच्या निरनिराळ्या विभागांत चाळू होती ती अथात्‌ नष्ट झाली, आणि त्याच्या ऐवजीं आपसांत उदार्सानता किंबहुना द्वेष उत्पन झाला.

उत्तर हिंदुस्थानच्या उच्छेदाचीं मुख्य कारणे. ५३३

पण जातिबंधनें अधिक कडक होण्याचा याहपेक्षां जास्त हानि- कारक परिणाम झाला तो हा कीं, राष्ट्रांची युद्ध करण्याची शक्ति । कमी झाली. हृल्लींहि या कारणानें कमी होणारी हिंदुस्थानची युद्ध- । शक्ति आपल्या चांगली लक्षांत येत नाहीं. तेहतीस कोटी लोकांचं । एक राष्ट्र चार कोट लोकांच्या राष्ट्राने २ टाख सैन्यानें कसें ताब्यांत । ठोवेळें आहे, याबद्दल सर्व प्रथ्वबीमर आश्चर्य वाटतें. पण हें नेहमी । लक्षांत ठेवळें पाहिज कीं, हिंदुस्थान देशांत लढाऊ जातींची संख्या । कदाचित्‌ चार कोटी सुद्धां भरणार नाहीं. ब्रिटन मध्यें शिपाई | भरती करण्यासाठीं सबंध भूमि, समग्र लोकसंख्या चार कोटीची । आहे, तर हिंदुस्थानांत एक पंजाब खेर्राज करून इतरत्र लोकांचे ‘वंशामुळे आर्य आणि द्रविड असे दोन भाग मुख्यतः पडतात आणि ‘त्यांतहि जातीमुळे लढणारे आणि न लढणारे असे दोन भेद पडतात. हिंदुस्थानांतील द्रविडवंशीं लोकांची संख्या निम्यापेक्षां आधेक आहे, ।आणि त्यांत न लढणारेच जास्त आहेत. आर्य-वंशीयांतहि प्राचीन ।परंपरेनें व हल्लीच्या धंद्याने केवळ क्षात्रियच लढण्यास तयार अस- ।तात. याचा परिणाम असा झाला आहे कीं, हिंदुस्थानांतील लोक- “संख्येपैकी सुमारें एक दशांश लोक लढाईस लायक असतात आणि |ब्याहूनाहि कमी लढाईस तयार असतात. बाकीचे नऊ दशांश स्वभा- ॥बानें आणि परंपरेनें लढण्यास अयोग्य असून कोणीहि बाहेरचा ॥मजबूत राजा किंवा राष्ट्र येऊन विजय पावून राज्य स्थापन करील ‘तर त्याची सत्ता कबूल करण्यास तयार असतात. अन्यत्र आम्ही ।दाखविणार आहों कीं, राष्ट्राची कल्पना हिंदुस्थानांत मुळांत होती ॥तरी ती कायम राहिली नाहीं; आणि सव लोकांनीं बाहेरच्या लो- /कांच्या सत्तेस कधींहि विरोध केला नाहीं. विशेषतः या काळीं ।जातिबंधनें अति कडक झाल्यानें स्वातंत्र्याकरितां ठढणाऱ्या लोकांची संख्या आपसांतील भांडणामुळे फारच कमी झाली होती आणि हे

५३४ तिसरी हिंदु राज्ये.

लोक म्हणजे राजपूत पडल्या बरोबर सर्व देश कांहीं विरोध न कारितां परकी सत्तेस मान्य करिता झाला. कडक जातिसंस्थेचा हानिकारक परिणाम देशाच्या स्वातंत्र्या-

करितां लढणाऱ्या लोकांची संख्या कमी झाल्यामुळें होतो, ही गोष्ट

प्राचीन स्मृतिकारांच्या लक्षांत आली होती आणि त्याचा प्रतिकार

करण्यासाठी त्यांनीं असा उपाय योजला होता कीं, सामान्यत: शास्त्र घरणे हें क्षत्रियांचेंच काम असले तरी तीन्ही वरिष्ठ वर्णाचे क्तेब्य

जेव्हां धर्मावर घाला येतो त्यावेळीं शस्त्र घरण्याचें आहे. धर्म शब्दांत आपल्याकडील हिंदु कल्पनेप्रमाणे रांजशासनशास््राचाहि अन्तर्भाव

होतो, आणि परधर्मी व परदेशी लोकांची सत्ता स्थापन होणं म्हणजे

घर्मावरच घाला होय. ‘ शस्त्रं द्विजातिमिम्राह्य धर्मा यत्रोपरुध्यते असें मनूचे वचन आहे. परंतु जव्हां पिढ्यानुपिढ्या ठोक शांत- तेचा धंदा करितात आणि शास्त्र न घेतां नम्रयणानें राजकीय सत्ता मान्य करण्यास सरावलेल असतात, तेव्हां ते एकदम शस्त्र घेऊन

लढवय्ये होतील अशी आशा करणें चुकीचे आहे. किंबहुना पूर्वी सांगितलेंच आहे कीं, शिहाबुद्दीननें कनोज जिंकले तेव्हां देशांतील

रईस आणि जमीनदार यांनीं त्यासमोर येऊन त्याची सत्ता खुषीने

कबूल केली, आणखी हंहि लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, उत्तरहिंदुस्था-

नांत लोकवस्ती मुख्यत: द्रविड वंशी आहे, पंजाबांतल्याप्रमाणें आर्य-

वंशी नाहीं. द्ृ्लींहि क्षात्रियांची लोकसंख्या तेथें फारच कमी आहे.

तात्पर्य शिह्याबुद्दीन घोरी यास आपली फोज भरती करण्यास पंजाबची

सव लोकसंख्या, तसेंच अफगाणिस्थान आणि खुरासान किंबहुना

तुर्कस्थान या देशांतील समग्र लोकसंख्या, उपयोगांत आणतां आढी

तर राजपूत राजांस हिंदुस्थानांत सैन्ये उभारण्यास फारच थोडी लोक-

संख्या उपयोगी पडली आणि याच कारणानें लोकांनीं एकवटून

परकी सत्तेस विरोध केला नाहीं. ह येथे सांगण्यासारखं आहे कीं, प

उत्तर हिदुस्थानच्या उच्छेदाचीं मुख्य कारणं. ५३५

हल्लीच्या काळीं पाश्चात्य देशांत समग्र लोकसंख्या फोजेच्या भरतीस देशाच्या स्वातंत्र्यावर घाला येण्याच्या प्रसंगीं उपयोगी पडते. उदाह- रणार्थ गेल्या महायुद्धांत जमनीने सत्तर ठाख शिपाई रणांगणांत उभे केळे. आणि तेथें राष्ट्रीय भावना इतको बलवान्‌ आहे कौ, या राष्ट्रीय प्रयत्नांत सव राष्ट्रांतील लोकांनीं आपापल्या परी भाग घेतला. या दृष्टीने उत्तर हिंदुस्थानचा यावेळचा विचार केला तर त्याची स्थिति अगदीं उलट होती. फोजेंत भरती होण्यास एक क्षत्रिय जातच उपयोगांत पडली. कांहीं वैय व कांहीं ब्राह्मण यावेळीं लढले ही गोष्ट खरी. पण या अपवादक उदाहरणांनीं मुख्य सिद्धांतच निश्चित होतो. तो हा कीं, ब्राह्मण व वेऱ्य तेव्हां आतांप्रमाणेंच सामान्यतः लढाईस नाखुष किंबहुना नालायक होते. गुप्तांच्यावेळीं किंवा वर्धनांच्या वेळी किंवा दाहर किवा लल्लियाच्या वेळीं परिस्थाते याहून मिन्न होती. दुसरं, चाललेल्या तंट्याविषयीं लोकांमध्यें मुळींच आत्मभाव नव्हता, म्हजजे परकी सत्ता मान्य करण्यास ते विरोध न करतां तयार होते. याचें एक आणखी कारण असें होतं कीं हें नवीन मुसलमानी राजे ॥ आपला धर्म वाढविण्यास महमुदाप्रमाणें जोराचा प्रयत्न करीत नव्हते हें आम्ही दाखविणार आहों.

स्वातंत्र्यप्रिय व शूर रजपूत जे युद्धांत बाकी राहिले ते बहुतेक राज- पुतान्यांतील रेतस्थानांत व डांगरांत किंवा इतरत्र जाऊन ल्यांनीं आपलं स्वातंत्र्य तेथे कायम ठेवलें आणि ह्यामुळें सामान्यतः उत्तर हिंदु- स्थान व विशेषतः मध्य देश अधिकच निर्वीय झाला. यामुळें उत्तर हिंदुस्थान इतकें बलहीन झालें कीं त्यास पुनः उठतां आलें नाहीं व त्यानें राष्ट्रीय विरोध केला नाहीं. युरोपांत लहान लहान राष्ट्रांनी सुद्धां त्यांना गुलार्मात आणण्याच्या प्रयत्नांस नेहमीं विरोध करून कसं यश संपादन केलें याचें कारण वर प्रमाणें आहे. या उलट हिंदुस्थानांत मोठमोठाले देश, सांबर-कनोजसारखीं राज्यें सुद्धां, मुस-

५३६ तिसरा हिंदु राज्य. लमानांनी कायमची जमीनदोस्त केलीं. हवे देश किंवा हीं राज्ये एके- | कटीं सुद्धां मुसलमानी जेत्यास यशस्वी रीतीनें विरोध करण्यांइतकीं । मोठी होतीं. पण वस्तुस्थाते अशा होती कीं, यांनीं राष्ट्रीय विरोध कधींच केला नाहीं. केवळ रजपुतांनींच विरोध केला तो ह्यांच्या आपसांतील लढायांनीं त्यांचे संख्याबळ कमी झाल्यानें यशस्वी झाला नाहीं. सोविएस्की, पोल लोकांचा सर्वश्रेष्ठ पुढारी, व्हियन्ना येथें तु्कांचा पुढें वाढणारा लोंढा बंद करूं शाकला याचे कारण दैवयोग नव्हे. पोलंडचे लोक प्रांसच्या लोकांपेक्षां जास्त शर होतें यांत तर शेका नाहीं, पण पोळडचे लोक सवराष्ट्रशक्तीनें लढले, आणि म्हणून विजयी झाले. उत्तर हिंदुस्थानांत पृुथ्विरिज आणि जयचंद यांचा पराभव दैवयोगाने झाला असे म्हटलं तरी लोकांनीं सावत्रिक विरोध केला असता तर मुसलमानांस उत्तर हिंदुस्थान जिंकतां आले नसतें. सावराष्ट्रिक विरोधाची आवश्यकत! व शक्ति हिंदुस्थानांत प्रथम शिवाजीनें जाणली अशी आमची समजूत आहे.त्याच्या उदात्त कल्पनेनं प्रेरित होऊन महाराष्ट्राने सावेराष्ट्रेक विरोध केला, आणि ओरंगजेबाशी प्राणान्तिक युद्ध केलें. मराठ्यांनी म्हणजे क्षत्रिय, ब्राह्मण व सामान्य लोक म्हणजे शूद्र यांनीं एकवटून राजारामाच्या वेळीं पूर्ण एकादिलानें युद्ध केळे आणि मोंगल साम्राज्याची सबंधशाक्ते महाराष्ट्रास चिरडून टाकण्यासाठी औरंगजेबाने आणली होती तरी तिच्यावर ताण करून त्यांनीं ती निर्जांव केली. याप्रमाणे शिवाजी आणि राजाराम यांच्या वेळच्या मराठ्यांनी हिंदूस्थानाच्या इतिह्दासांत सावेराष्ट्रिक विरोध केला आणि स्वातंत्र्य मिळविळें ब राखिळें. पाश्चात्य राष्ट्रशात्रांत जो सिद्धांत द्ृ्धी मान्य झाल आहे कौं, ‘ कोणतीहि सत्ता कितीहि मोठी असली तरी ती, जर लोक मग ते कितीहि थोडे असोत सारवराष्ट्रिक विरोध करतील तर ल्यांचें स्वातंत्र्य हिरावुं हाकत नाहीं ‘ त्या सिद्धांताचे उदाहरण हिंदुस्थानच्या इतिह्यासांत मराठ्यांनी दाखाविळें आहे. जेव्हां

उत्तर हिंदुस्थानच्या उच्छेदाचा मुख्य कारणे. ५३७

हिंदुस्थानांतील राज्यांवर हिंदुच राजे मग ते कोणल्याहि कुलाचे असोत राज्य करीत असत, तेव्हां राष्ट्रीय विरोधाची आवश्‍यकता जाणणें हिंदुस्थानास शक्‍य नव्हतें. मुसलमानांचे परकी राज्य तीन शतकें झाल्यानंतर मराठ्यांना त्याची प्रथम कल्पना आली, शिखांनींहि धार्मिक फौंजबंदी करून पुढें मराठ्यांचे अनुकरण केलें. हल्लीं इंग्रजी राज्याखाली हिंदुस्थानच्या लोकांस राजकीय स्वातंत्र्य मिळावणें असेल तर त्यांनीं सार्वराष्ट्रीय प्रयत्नाची आवश्‍यकता पूर्णपणे जाणली पाहिजे,

असो, या इतिहासावरून भविष्यकाळाकरितां बोध घेणं तर तो हा कीं, ₹जपुतांनीं एकत्र होऊन एकी करण्यास शिकळें पाहिजे, इतकेंच नव्हे तर हिंदुस्थानच्या सर्वे लोकांनीं विशेषतः हिंदूंनी, ज्यांच्यांत जातिसंस्थेमुळें बेकी हें त्यांचें नेहर्मांचें लक्षण ठरळें आहे त्यांनीं, एकत्र कार्य करण्यास शिकले पाहिजे. जाति नष्ट करून टाका हें हिंदूस सांगणें शक्‍य नाहीं हें खरें; कारण आज हजारों वर्षें हिंदु- समाजाची जी उत्क्रांते होत आहे तीपुळें जातिसंस्था येथे उत्पन्न होऊन वाढली आहे; आणि यामुळें हिंदु लोकांस जाति,निदान चातुर्वण्ये टाकण्यास उद्युक्त करणें शक्‍य नाहीं. आणखी गोष्ट अशा कीं जाति- बंधनानेंच राजपूतांचा विशेष शोययुक्त आणि धौरोदात्त स्वभाव वाढलेला आहे, व तो आनुवाशिक संस्काराचे फळ आहे. किंबहुना जातीची शुद्धता राखण्यास राजपूत विशेष काळजी घेतात ती योग्य आहि असेंच म्हणतां येतें. पण सर्व प्रांतांतील राजपुतांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि बरोबरीच्या नाल्यानें एक झालें पाहिजे. ह्याह्विपेक्षां अत्यंत आवश्‍यक हें कीं, हिंदूनीं आपळे जातीचे अनेक भेद विसरून एकेठिकाणी समान हक्काच्या तत्त्वावर जम- ण्याचा व आपापली मुख्य जात स्वतंत्र ठेऊनहि एकत्र होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निरानेराळया उपजाति काल्पनिक कारणानें उत्पन्न झाल्या आहेत त्या नष्ट करावयास मुळींच हरकत नाहीं. स्वतंत्र

५३८ तिसरा हिंदु राज्ये.

निरनिराळे भाग राजकीय कारणांकारितां एकत्र होऊं शकतात ही गोष्ट अमेरिकेंतील संस्थानांनी प्रथम मनांत आणून प्रत्यक्ष | | आणली; आणि तेंच उदाहरण जमंनीनें प्रत्यक्ष सोडविले. हिंदु लोक स्वतंत्र जातींत विभागिळे असले तरी त्यांचें राजकी कारणांकरितां एकीभवन हाच पुढील काळापुढें महत्त्वाचा प्रश्न आहे; आणि पूर्वीचा इतिहास आपल्यास तेंच शिकवितो. तो सिद्धीस नेणें शक्‍यहि आहे. जर ल्याकारेतां रोटीव्यवहार, खानपानादे | एकी, याची आवश्‍यकता असल्यास आणि कोणत्याहि एका देवतेची भाक्ते जरूर असल्यास, दोन्ही गोष्टी अमलांत आणाव्या. असो, शेवटीं हें सांगणें को, राजपुतांमधील बेकी म्हणजे हिंदुस्थानच्या बाहूमधीळ बेकी आणे जातीचें कडक बंधन, ज्यामुळे लोकांचे नऊ दशांश परकीय सत्तेस विरोध करण्यास अशक्त किंवा अनिच्छु झाले, हीं दोन कारणें उत्तर हिंदुस्थानाच्या कायमच्या गुलामीची मुख्यतः झाली असें दिसतें,

प्रकरण सव्विसावें उत्तर हिंदुस्थानचा उच्छंद-

आनुषंगिक कारणें,

उत्तर हिंदुस्थानच्या उच्छेदाची मुख्य कारणें आमच्या मतें (१) निरानेराळ्या राजपूत राज्यांच्या आपसांतील लढाया आणि त्यामुळें उत्पन्न होणारे दौर्बल्य व (२) जातीचे टर्ढाकरण व त्यामुळें राष्ट्रास ताल रजपुतांखर्राज इतर लोक युद्धास अनिच्छु व असमर्थ होणे, हीं मागील प्रकरणांत आम्ही विस्तारानं सांगितली. या प्रकरणांत ज्या कित्येक आनुषंगिक कारणांनी ही हिंदु राज्यें पडण्यास मदत झाली, त्या कारणांचा ऊहापोह आम्ही करतों. हीं कारणें स्वतंत्ररीत्या उच्छेद करूं शकत नव्हतीं म्हणून त्यास आम्ही आनुषोगेक म्हटलें आहे. देशाच्या सामान्य निर्राक्षणाच्या भागांत येथे सांगितलेल्या किल्येक गोष्टींचा निर्देश येणार आहे. पण या कारणांच्या विचारांत त्या स्वतंत्र सांगितल्या असल्या तरी पुनरुक्तांचा दोष येणार नाही,

(१) प्रथम गोष्ट ही पुनः सांगितली पाहिजे कीं सवे राज्यांतील लोकांच्या अंतःकरणांत राष्ट्रीय भावनेचा अभाव होता. हिंदुस्था- नांत यावेळीं किंबहुना सर्वे आशिया खंडांत सत्र राज्ये होतीं, लोक्‍यें नव्हतीं. लोकांस राज्य आमचें आहे आणि राजा आमच्यापैकींच असला पाहजे असें वाटत नव्हते. उलट देश राजाचा आहे, आणि ! ज्याला देवानें सत्ता दिली त्यानें राजा व्हावें अशीच कल्पन! होती.

लोकांची अशा कल्पना असल्यानें राष्ट्रीय भावना उत्पन्न होणें राक्‍य
नव्ह्तेव त्याचप्रमाणें स्वदेशप्रीति हा गुणहि उत्पन होणें शक्‍य नव्हतें. (भा. १ पा. १७८ व भा. २ पा. ३४९ ). राजभक्तीचा गुण उत्पन्न होत असे, किंबहुना प्रुथ्विराजरासांत वाखार राजभक्तीचाच

५४० तिसरी हिंदु राज्यं.

उपदेश केटेटा आढळतो. माठकाकरितां प्राण देणें हाच व वीरांचा परमधर्म आहे; अर्थात्‌ त्या मालकाच्या ऐवजी दुसरा मालक आला तर त्याच्या करितांहि रजपूत वौरानें मरावें मानळें जाई. ह्यामुळेंच आपल्याला इातेहासांत मसलमान राजांसाठीं- हि व इतर मालकासाठाँ प्राण देणारे क्षत्रिय आढळतात. ही गो ज्या जातीचा स्वभावधर्म राज्य करणें आहे त्याहि रजपुतांची होती, मग इतर जातींच्या सामान्य लोकांची तीच मनोभावना होती हँ. सांगावयास नको

(२) राष्ट्राच्या हल्लींच्या कल्पनेंतील मूलभूत तत्त्वापेकी एक तत्त्व म्हणजे एकभाषा हें त्या काळच्या राज्यांमध्ये उत्पन्न झालें होतं ह खरें. म्हणजे गुजराथ, राजपुताना, अंतर्वेद, बंगाल, महाराष्ट्र, तेलं- गण, तामिळ नाडु आणि मल्याटम्‌ या प्रांतांत भिन्न भिन्न भाषा म्हणजे हछीच्या गुजराथी, राजस्थानी, हिंदी, बंगाली, मराठी, तेळंगी तार्माळ आणि मल्याळी ह्या स्वतंत्र भाषा उत्पन्न झाल्या होत्या. परंतु हे देश राष्ट्रें बनठीं नाहींत व त्यांत एकभाषत्त्वानें एकराष्ट्रेयत्त्वाची कल्पना उत्पन्न झालीं नाहीं. उलट या प्रत्येक प्रांतांत अनेक राज्यें असून तीं एकमेकाशी झगडत असत. याचे कारण वर सांगितलेली राष्ट्राची चुकीची कल्पना हच होय. याजाविषयीं जास्त विस्तार पुढें येईल. पण एकभाघत्त्वानें या प्रांतांत राष्ट्रीय भावना उत्पन्न झाली नाहीं ह येथें स्पष्ट सांगावयाचं आहे

३ राष्ट्रीय भावना उत्पन्न न झाल्यानें परकी लोकांनीं देशांत येऊन राहणें याळा वहुधा विरोध कोठेचं झाला नाहीं. कारमीर आणि तिबेट या अपवादाखेरीज ( यांच्या सीमा दूलॅध्य होत्या ) इतर ठिकाणीं परकीयांना देशांत येऊन राहण्यास मनाई नव्हती; किंब- हुना त्याकडे टक्षहि नव्हते. यामुळें मुसलमान ठोक निरानेराळ्या देशांत बिनहरकत येत जात आणि पुष्कळ वेळां वसति करून

उत्तर हिंदुस्थानच्या उच्छेदाची अन्य कारणं. ५४१९

’ रहात. याप्रमाणें नाहरवाला, खंबायत, सोपारा आणि महाराष्ट्र किंब- हना सबंध कनोजचें राज्य यांत मुसलमान येऊन राहिळेळे आप- ।ल्यास आढळतात.

। है मुसलमान आमच्याच अधिकाऱ्यांनी आमचा इनसाफ करावा ।असा हृ धरीत, ही गोष्ट मुसलमानी लेखकांच्याहि विधानावरून ।सिद्ध होते. आणि ठाण्याच्या कोरीवलेखांतीळ हंजमन-नगर-त्रिवग ।या पूर्वाठिखत शब्दावरून तीस दुजोरा मिळतो. राष्ट्रांत परकी लोक असल्यास राष्ट्राची शक्ति हीन होते ही गोष्ट हठींच्या पाश्चात्य राष्ट्रांच्या लक्षांत आलेली आहे व ते परकी लोकांच्या येण्या जाण्यावर ।|सक्त नजर ठेवतात. हिंदू राष्ट्रंना राष्ट्रीय भावनेच्या अभावामुळं या गोष्टीची जाणीव झाली नाहीं; किंवा परकायांवर करडी नजर ठेव- ।ण्याची आवरयकता त्यांस भासली नाहीं. प्रत्यक्ष पुरावा नसला तरी ही गोष्ट सहज लक्षांत येईल कीं, निरनिराळ्या राष्ट्रांत मुसलमानांची ।वसाति झाल्यानें त्यांच्या उच्छदास मदत झाली.

४ राष्ट्राच्या उच्छदास भोळसट समजुती चाहि कांहीं कारणभाव लागतो हे सांगण्यासारखे आहे, आणि हिंदूस्थानाच्या उच्छेदास ।भोळसट समजुती दुधारी तल्वारीप्रमाणें दोहोंकडून .कारणाभूत झाल्या. मुसलमानांची अशी समसूत होती की, त्यांचा जय ठेव- | छेलाच आहे. उत्‌बीनें कुराणांतलें वाक्य दिळें आहे कौ, “ जे लोक

ईश्वराच्या विरुद्ध आहेत त्यांच्यावर ईश्वराचा कोप आहे आणि तो

  • बनारस गझीटयरमध्यें असें सांगितले आहे कीं मुसलमानांनी बना- रस जिंकण्याच्या पूर्वीचे कांहीं मुसलमानी मोहळ बनारसेंत आहेत ॥दंतकथा कदाचित्‌ विश्वसनीय नसेल, तथापि चंद्र, गोविंदचंद्र किंवा जय ।चंद यांनी परवानगी दिली नसली तरी त्याच्या पर्वी प्रतिहारांच्या वेळीं इं मुसलमान येऊन बसळें असावं म. भा…३१५

५४२ तिसर्री हिदु राज्यं

कधींहि टाळतां यावयाचा नाहीं. ‘’ या उलट हिंदु लोकांची अशी कल्पना ह्वोती कीं, हिंदूंचा पराजय ठेवलेलाच आहे आणि कालि | युगांत भारतवष म्लेंच्छांनीं उध्वस्त होणारच. लोकांच्या मनावर भोळसट समजुताचा ह्याप्रमाणें दुष्परिणाम झाल्याची कित्येक उदा- हरणें हातिह्मासांत आहेत, मेक्सिकाच्या अइटेक लोकांत अशी सम- जूत होतीं कीं, पूर्वेकडून येणारे लोक आपण्यास जिंकणार. ज्यावेळीं. गॉथ आणि व्हँडळ या रानटी लोकांनीं रोमन साम्राज्य उदध्वस्त केलें, त्यावेळीं बायबलांत भविष्य केल्याप्रमाणे जगताचा अंत होत आहे असें ख्रिस्ती लोकांस वाटलें, व त्यांनीं त्या लोकांस विरोध केला नाहीं. जरी अद्याप लेखी पुरावा आम्हांस मिळाला नाहीं, तरी हिंदुस्थानांत यावेळीं हिंदूस असें वाटलें असावें कीं, नवीन होणारा फेरबदल अलंध्य आहे आणि अशा भोळसट समजुतीनें त्या फेरबदलास त्यांनीं निमुटपर्णे मान दिली.

५ प्रत्येक राष्ट्राचे हें आद्य कर्तव्य आहे कीं, त्यानें एक मज- बूत आणि पुरेशी फौज नेहमी बाळगावी. यावेळी हिंदु राष्ट्रांनी बहुधा ह्या कतेव्याकडे दुर्लक्ष केलें असावें. पूर्वींच्या भागांत सांगि- तल्याप्रमाणें. हिंदूस्यानची या बाबतींत पूर्वी. कीर्ति होती पण ती यावेळीं नष्ट झाळेली दिसते. हर्ष किंवा भोज ( प्रतिहार ) यांच्या वेळीं जशा खड्या फौजा होत्या, तशा यावेळी कोणत्याहि राष्ट्रांत बहुधा नव्हल्या. राज्याची फोज मुख्यतः सामंतांनीं आणावयाच्या पथकांची असे. हे सामंत तंतोतंत नसले तरी बहुतेक इंग्लंडांतील बॅरनसारखे असत. ते राज्याच्या उपयोगासाठी कांहीं ठराविक संख्येचे लढवय्ये बाळगीत व त्यांचा खर्च आपापल्या संस्थानांतून करीत. मोगलांच्या वेळींहि अशीच व्यवस्था दिसते, आणि हजारी व पंचहजारी असे सरदार असत, पृथ्विराजाच्या जवळ राज्याची स्वतंत्र खडी फौज असावी असें दिसतें. परंतु हवी इज्र

उत्तर हिंदुस्थानच्या उच्छेदाची अन्य कारणं. ५४३

फोज बहुधा थोडी असावी. आपल्यास ठाऊकच आहे कीं, पानप- च्या लढाईनंतर पेशव्यांनीं एक मजबूत हुजूर फौज ठेवण्याकडे लक्ष केळे आणि राजघोरणी अहल्याबाई नाना फडणविसाची हुजूर थकाकडे दुर्लक्ष करण्याबद्दल वारंवार कानउघाडणी करी. सामंतांनीं भाणलेलीं पथकें याजवर विश्वास ठेवणें, संख्येच्या किंवा लायकीच्या टीने, नेहमीं शक्‍य नसते हं सांगावयास नकोच. महमुदाची व शिहाबुद्दीन घोरीची त्वतंत्र ठेवळेली फौज, हिंदुराजांनीं घाईने जम- विलेल्या सामंतांच्या पथकांच्या फोजेपेक्षां जास्त काम करणारी होती. कारण सामंत ऊर्फ फोजी सरदार हे बहुधा जोरानें लढत नाहींत, नर्सेंच त्यांना आपापली जहागिर संभाळण्याचा मोह पडत असतो ब ते प्रसंग विशोषी जड होऊं ळागणाऱ्य। परसत्तेकडे वळून आपली हागिर संभाळतात, हा इतिहासांतील अनुभव आहे, तात्पर्य यावेळी हिदु राज्यांत स्वतंत्र ब मजबूत खड्या फौजा नव्हत्या हेंहि त्यांच्या परिणामी उच्छेदाचे एक कारण होतें असें आम्हांस वाटतें. ६ हिंदुस्थानची बुद्धिमत्ता युद्धशासत्राच्या अभ्यासाकडे या काळी हूलक्ष करीत होती व त्याचप्रमाणे राष्ट्रशास्राच्या खऱ्या सिद्धांताकडेहि दुलेक्ष करीत होती असें आम्ही मोठ्या मिनतवारीनें म्हणतो. धाह्मण-क्षत्रियांची बुद्धिमत्ता यावेळीं अलंकारशास्त्राच्या अभ्यासांत गुंतळी असून त्यापेक्षां विशषष उपयोगी शास्त्राच्या जरूरी अभ्यासा- तिनें दुलक्ष केलें. संभोगविप्राळंभ शुंगारांतीठ नायिकांचे शारीक भेद व काव्याचे रसादिगुण आणि काव्याचे दोष यांच्या ॥एलतत्त्वाच्या छाननीकडे आणि भाषेच्या सोंदर्याकडे देशांतील उत्तम म बुद्धीचे लक्ष लागलें होतें. किंबहुना राजेहि काव्यश्ासत्रावर व ॥ट्यशास्त्रावर विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिण्याकडे वेळ देत. या काळांतील ए शास्त्रावरील ग्रंथांवरून हिंदूच्या बुद्धीचे सूक्ष्मत्त्व सिद्ध होतें हें वरं, तथापि यापेक्षां जास्त महत्त्वाच्या विषयांकडे ती बुद्धि वळाव-

५४४ तेसरा हिंद राज्ये.

यास पाहिज होती. राजांची दृष्टि आणि संपात्ति सेनापतींपेक्षां राज- कवींकडे जास्त वळे, आणि सेन्यभूमीपेक्षां रंगभूमि त्यांस अधिक गुंतवी. अलंकारशास्राचा सूक्ष्म अभ्यास, जनरुचि व नीति. यांच्या दूषित प्रवाहयासहि कारणीभूत झाला. आणि तो राजशेखराच्या कर्पूर- मंजरीपासून तो नयचेद्रसूरीच्या रंभामंजररापर्यंत शुंगाररसाच्या बाढत्या लोंढ्यांत आपल्यास दृष्टीस पडता. लोकांची आभिरुाचचे किती बिघडली होती हँ नियमयुक्त ब्राह्मणांस दिलेल्या दानपत्रासारख्या दर- बारी लेखांच्या आरंभीसुद्धां जो रुंगारयुक्त छोक कनोजच्या लेखांत आढळतो ल्यावरून दिसून येईल, किंबहुना या काळविभागांत ऐष- आराम वाढणें अपरिहार्य होतें. कारण मार्गांळ कालविभागाच्या अती दुसऱ्या भागाच्या शबटल्या प्रकरणांत सांगिल्याप्रमाणें, हिंदू राज्यांच्या वेभवाचा कळस झाला होता. उत्कषोचा कळस झाला म्हणजे नीर्तास उतार लागन ऐषआराम वाढतो आणि लोकांचे मानासिक व शारीरिक सामथ्ये कमी होतं ही गोष्ट इतिहासांत रोमन लोकांत. अरबांत, मोंगळांत व इतर लोकांताह्दि आपल्यास दिसून येते. तेव्हां ह्याहि कारणानं १२ व्या शतकाच्या अंती हिंदू राज्यें कमजोर झाली होतीं.

७ शेवटी उत्तरहिंदुस्थानांतील रजपूत राज्यांच्या उच्छेदाची का- रणमीमांसा करितांना आम्हांस बौद्ध अहिंसा-तत्त्वाचा पुनरुदय या काळीं झाला ह्याकडे वाचकांचे लक्ष वेधावयाचें आहे. या काळीं नवीन वैष्णवधर्माचा उदय, त्याचप्रमाणे जैनधर्माचा अधिक प्रसार आणि लिंगायत आणि इतर मतें यांची स्थापना यांवरून हा प्रभाव आपल्या दृष्टीस पडतो. वैष्णबधर्म किंवा जैनधर्म किंवा इतर मतें यांचा उद्य हे उत्तरहिंदुस्थानच्या उच्छेदाचें मुख्य व प्रत्यक्ष कारण नाहीं; म्हणजे ज्याप्रमाणें सिंधच्या उच्छेदाचे बोद्धधम हें प्रत्यक्ष कारण होतें तसें नाहीं ह्वी गोष्ट आम्हांस मान्य आहे. पण यावेळीं सवे हिंदु समाजांत अहिंसा तत्त्वाचा जास्त पुरस्कार झाला, यामुळे

उत्तर हिंदुस्थानच्या उच्छेदाचां अन्य कारणं. ५४५

। तो समाज रामप्रधान आणि अहिंसाप्रवण झाला हें नाकबूल करितां । यावयाचे नाहीं. सर्व धर्मनिष्ट ब्राह्मण, शैव किंवा वैष्णव, त्याचप्र- । माणे सर्व वैर्‌य शैव, वैष्णव किंवा जैन, यांनीं प्राणिहिंसाल्याग हेंच । धर्माचें मुख्य तत्त्व मान्य केळें आणि पुढें वर्णन केल्याप्रमाणे त्यांनीं । मांसभक्षणाचा पूर्ण परित्याग केला. यामुळें असा परिणाम झाला कौ, । रजपुतांशिवाय बाकीचा हिंदुसमाज युद्धास अनिच्छु व अशक्त । झाला, अशा प्रकारचा परिणाम मनुष्यस्व्रभावावर होणे अपरिहार्य । आहे असें आम्हांस वाटते. याची जास्त चर्चा येथे करणें अनाव- । इयक होय. रजपुतांशिवाय हिंदुस्थानचा समाज सर्व राज्यांतून (हद्रां- । नींहदि ब्राह्मण-वैऱ्यांचे अनुकरणानें व तसेच दारिद्यानें मार्ग उच- । लावे हें साहजिक आहे ) हिंदुस्थानांतील हत्तीसारखा झाला, त्याचा । प्रचंड आकार व त्याची प्रचंड शक्ति याच्या विरोधानें हत्ती स्वभा- वानें भित्रा आणि नरम असतो. व हत्तीचे प्रतिकार करण्याचें शत्र म्हणजे त्याची सोंड, ही मृदु असून सहज तोडतां येते. हत्ती प्राण देण्यास नेहमीं भितो आणि दारूचा थोडासाहि त्याच्यावर सोसाटा फेकला तर तो आपलें अंग संकुचित करतो, अशा हत्तीलाहि लढ- ण्यास शिकवितां येतें व घेर्याने दारूच्या सोसाट्यापुढेंहि उभें राह- ण्यास तयार कारितां येतें हं लक्षांत ठेविळें पाहिजे. तसेंच वनस्प- त्याहारी हिंदूंस सुद्धां युध्दास समर्थ आणि बीर्यकृत्यें करण्यास घाडसी. बनवितां येते. पण असें शिक्षण नसल्यास हिंदु स्वभावाने भित्रा असल्याने ल्यास जिंकतां येतें आणे परसत्तेस वाकवितां येतें. इतिह्यासांस त्राह्षणशूर सेनापतींची व जैन वीर सेनापतींची या कालविभागांत कित्येक उदाहरणें आहेत. परंतु सामान्यतः लोक लढाईस सरावलळेले नसल्यानें ब स्वभावानें शांतताप्रिय असल्यानें जेव्हां राजपुत्रांचा पराभव झाला तेव्हां सतलळजपासून ब्रह्मपुत्रापर्यंत आणि हिमाल्यापासून विंध्यापर्यंत सर्व हिंदु राज्यें मुसलमानांच्या

८८ [तसरा एइडु राज्य

सत्तेखालीं एका पंचवीस वर्षाच्या थोड्या अवधींत खुशीने र करितां गेढीं. पहिल्या भागाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणें हिंदूस विशेषतः त्या हिंदूस ज आपल्या धार्मिक समजूतीनें मांसाहार समजतात ल्यांस, इतिहासाचा संदेरा असा आहे कीं, त्यांनीं शारी रिक शिक्षणाने व मानसिक विचाराने आपल्यास असें समर्थ वे पाहिजे कीं, या जगतांत मानवी वंशाच्या भिन्न शाखांत शारीरिक! झगडे कधींहि बंद व्हावयाचे नाहींत हें लक्षांत ठेऊन अशा झग- ड्यांत आपल्यास माननीय रीतीनें भाग घेतां येईळ व आपलें अस्तित्व कायम ठेवतां येईल. ।

डया जया ला

क ला, …

पुस्तक आठवं

सामान्य परिस्थिति

प्रकरण पहिलें. जातीचें उपजातीकरण.

आम्हीं या भागाचे प्रारंभीं सांगेतल्याप्रमाणें या कालाविभागाच्या आरंभीं हिंदु भारताची सामाजजक परिस्थिती कशी होती हें निश्चित कर- ण्याचे अल्यंत महत्त्वाचें साधन म्हणजे अलबेरूनीचा हिंदुस्थानावरील इ. स. १०३०मध्यें लिहिलेला ग्रंथ होय. अल्बेरूनी मुलतान येथें व, पंजाबांत इतर हिंदु लोकांत राहिला असून तो एक मार्मेक निरी- क्षण करणारा होता. पण दुर्दैवाने हिंदुधर्मपुस्तके त्यानें स्वतः अभ्यासिलीं असल्यानें पुस्तकांत वाचलेल्या गोष्टी व प्रत्यक्ष पाहि लेल्या गोष्टी यांची तो मिसळ कारितो. यामुळें दुसऱ्या भागांत अरबी प्रवा्यांचे जे ठेख आम्हीं उध्दत केळे आहेत, त्या मानानें अल्बे- खरूनीचीं विधानं इतकी विश्वसनीय वाटत नाहींत. तथापि या काल- विभागांत हिंदुस्थानच्या सामाजिक स्थितीचें वर्णन देतांना हिंदुस्था- नांवरीलळ आपल्या पुस्तकांत जात या विषयावर जे अलबेरूनीर्ने लिहिळें आहे तें आम्ही प्रथम उध्दत करितों. सदेवानें त्यास पर्शिया व ग्रास यांच्या इतिहासाची माहिती असून हिंदुस्थानच्या परिस्थि- तीच्या तुटनेस या पाश्चात्य देशांतील गोष्टी तो देतो.

अल्बेरूनीनं ग्राक आणि रोमन लोकांतच नव्हे तर परियन लोकांताह्दे प्राचीनकाळीं जाति उत्पन्न झाल्या असें दाखावेळें आहे.

५४८ सामान्य परिस्थिति.

“ प्राचीन खुश्रू ( बादशहा ). यांनीं. ह्या . तऱ्हेच्या मोठया संस्था उत्पन्न केल्या होत्या. त्या एखाद्या व्यक्तीच्या विविष्ट सदूगुणामुळें ् ळाचळुचपतीनोहे मोडतां येत नव्हत्या. जेव्हां अर्देशिरनें इ बादशाही पुनः प्रस्थापिली, तेव्हां जाति अथवा वग त्यानें पुढील- | प्रमाणे पुनः कायम केळे, ( १ ) सरदार आणि राजपुत्र (२) जोगी, अ्नीचे पुजारी आणि कायदेपॉडेत ( ३ ) वैद्य, ज्योतिषी व इतर शास्रज्ञ ( ४ ) शेतकरी व कारागीर. या चार वगामध्यें एक- मेकापासून भिन्न सामान्यांत विशषाप्रमाणें पोटभेद होते. याच प्रका- राच्या व्यवस्था हिंदु लोकांत आहेत. आम्ही मुसलमान सर्व लोक बरोबर. मानतो, केवळ सद्गुणामुळें त्यांत उच्चर्नाच भेद. करितो. या कारणानें आमच्यांत आणि हिंदु होकांत समजूत पडण्यास मोठा अडथळा आहे.!’

““हिंदुळोक जातीस वर्ण अथवा रंग म्हणतात आणि उतप्तांच्या दृष्टीनें ते त्यास जाति म्हणतात. प्रारंभापासून या जाति चार आहेत. सर्वांत वरिष्ठ ब्राह्मण होत. त्यांच्याखालीं क्षत्रिय येतात, पण त्यांचा दर्जा ब्राह्मणांच्या फारसा खालीं नाहीं. यानंतर वैऱैय आणि शद्ध येतात. या. दोन वर्गामध्येंहि फारसें अतर नाहीं. पुष्कळ गोष्टींत या सवांची भिन्नता असली तरी ते एकाच शहरांत अगर गावांत राहतात | किंबहुना एकाच घरांत अगर बिऱ्हाडांत ते सामील असतात.!/ (सचाऊ भा. १ पा. ९९ ते १०१).

या लांब उताऱ्यावरून असं दिसून येईल कीं, हिंदूच्या जातीचें हें. वर्णन भाग २ मध्यें पूवीच्या अरब लेखकांनी दिलेल्या वणना इतके तपशीलवार व खरें नाहीं. क्षत्रियांचे दोन भेद म्हणजे राज्य करणारे क्षात्रिय आणि शेती करणारे क्षत्रिय, इब्‌न खुरदादबा यानें सांगितलेले (भा. २ पा. १७९ ), येथ मुळींच दिलेले नाहींत. बहुधा इ. स. १०३० पर्यंत पंजांबांत रजपुतांची इतकी कत्तल झाली

जातींचे उपजारताकरण. ५४९

असावी कीं, निदान त्यांची पारोस्थाते इतकी खालावली असावी कीं, त्यांचे भिन्नत्व आलबेरूनीच्या लक्षांत आलें नाहीं. गाहडवाळ कोरीव लेखांतील पूर्वी दिलेलें विधान या वेळच्या समाजाच्या परिस्थितीला सत्यत्त्वाने लागू दिसतें. म्हणजे.“ क्षत्रिय राजघराणीं बहुतेक पंजाब व यू. पी. मर्ध्ये नष्ट झालीं होतीं, आणि वेदाचे अध्ययन बहुतेक बंद झालें होतें, तेव्हां चंद गाहडवालानें या दोहोंची पुन: स्थापना केली. ‘’ दुसरें, धमपुस्तकावरून कदाचित्‌ हीं विधानें अल्बेरूनी करीत आहे. प्रत्यक्ष निरीक्षणावरून नव्हे. शिवाय लग्नाविषयी तो कांहींच येथें लिहीत नाहीं. इब्न खुरदादबा यानें असें लिहिले आहे कीं, ब्राह्मण आणि क्षत्रिय आपल्या खालच्या वर्गांच्या मुली करितात. आणि आपल्या समोर प्रत्यक्ष राजरोखराच उदाहरण चव्हाण स्रीश्ीं विवाह केल्याचे आहे. बहुधा अल्बेरूनीच्या काळीं ( किंवा पुढें जातिबंधनें दृढ झाल्यावर ) असले मिश्रविवाह बिलकुल बंद झाले होते. तिसरें, चार वर्गांच्या दरम्यानच्या जातींचा उछेख अलबेरूनी मुळींच करीत नाहीं. पण त्या पुष्कळ असाव्या. शिवाय मुख्य मुख्य जातींच्या पोटविभागांचाहि तो उल्लेख करीत नाहीं. हे विभाग बहुधा त्याच्यानंतर उत्पन झाले.

पशियन लोकांम्धाीळ जाति स्व आर्यवंशीं असल्यामुळें हिंदुमर्धाल जाताहरून त्या मिन्न आहेत. हिंदूच्या जाति आर्य आणि अनार्य असे लोक एकवट्टून झाल्या आहेत. साहजिकच शूद्वांचा वर्ण पर्शियन लोकांत नाहीं. शिवाय परियन जातीत धंद्यांचा निबंध असून विवा- हाचाहि निबंध होता कीं काय हें आपल्यास ठाऊक नाहीं. प्राति लोम विवाह हिंदुळोकांत बुद्धपुवकाळांतच बंद झाळे होते, आणि अनुलोम विवाहू या काळीं बंद झाले. शेवटीं सवे जीत एकाच घरांत व बिऱ्हाडांत सरमिसळ राहतात असें अल्बेरूनी लिहितो, हें विधान ‘पंजाबाच्या संबंधानें सत्य दिसतें. कारण निरानेराळ्या वणांत खाण्या-

५१५० सामान्य पारास्थात.

पिण्यांत व चालीरीतींत सव मांसाहारी असल्यानें तेथे फारसा फरक

नव्हता. बाकीच्या देशांत अशीच स्थिति नसावी. निदान १०३० त अशी स्थिति असली तरी पुढील दोन शतकांत आहिंसा तत्त्वाचा

पुनः जोर होऊन परिस्थाति इतकी बदळून गेली को, अनेक जातींनी मांसाहार सोडला. अर्थात्‌ मांसाहारी व शाकाहारी लोक एकाच घरांत । राहणें शक्‍य नव्हतें. याचमुळें जातींची वाढ अट्बेरूनीनंतर तुटक- |

पणांत इतकी झाली कीं, मूळच्या हिंदुस्थानांतील चार जातींच्या ऐवजीं या कालविभागांत देकडों किंबहुना हजारों पोटजाति पुढें सांगितल्याप्रमाणें उत्पन्न झाल्या.

पहिल्या भागांत आम्ही सांगितळें आहे कीं, ब्राह्मण, क्षत्रिय व वैदय यांची एकेकच अविभक्त जात पहिल्या कालविभागांत होती (६०० ते ८०० ). हीच परिस्थिति दुसऱ्या कालविभागांतहि राहिली (८०० ते १००० ). परंतु तिसऱ्या कालविभागांत या प्रत्येक जातांचे शेकडो पोटविभाग पडळे असे कोरीव लेखावरून सिद्ध होतें. याचीं कारणें वर सांगितल्याप्रमाणें पुढील दिसतात. (१ ) खाण्याच्या व्यवहारांतील फरक. ( २ ) जातीच्या कमीअधिक अुद्ध- तेच्या कल्पना. ( ३ ) निरनिराळ्या देशांतील निरनिराळे स्वाज. या कारणांनी प्रत्येक वर्ण निराळा घेऊन या कालविभागांत त्याचे पोटविभाग कसे पडले हें आपण आतां पाहूं,

ब्राह्मणांच्या पोटजाति.

आरंभीं सर्वे हिंदुस्थानवर ब्राह्मण जात निःसंशय एक होती. एक हजार इसर्वांच्या पूर्वी ब्राह्मणाचे वर्णन नेहमीं त्यांच्या गोत्रार्ने व शाखेने कोरीव लेखांत येतें. णाणि त्यांत कोणत्याहि पोटावभागाचें नांव दिलेलें आढळत नाहां. या कालविभागांताहे कांहीं काळ अशाच तऱ्हा दृष्टोत्पत्तीस येतं, उदाद्दरणार्थ, इ. स. १०५० चा चेंदेछांचा

कॉ ऑर…

ब्राह्मणाच्या पोटजााते. “५५५१

एक दानलेख इंडियन अँटिक्वेरी १६, प. २०६ वर छापला आहे, त्यांत दान घेणाऱ्या ब्राह्मणाचे वणन भारद्वाज गोत्र त्रिप्रवर यज- वेद शाखा इतकेंच केलें आहे. कलचूरी दानळेख कहला, जिल्हा गारखपूर, इ. स, १०१७ मधील एपिग्राफिका इंडिया भाग ७, पृ. ८६ यांत छापला आहे, त्यांत दान घेणाऱ्या अनेक ब्राह्मणांचे वर्णन त्यांचें गोत्र प्रवर व शाखा आणि राहण्याचे गांव देऊन केलं आहे. याचप्रमाणें एक दाक्षिणंतील उत्तर चाटुक्यांचा लेख इ. स. १०७० चा बी. बी. आर. ए. एस्‌. भा. १२, प्र, ५१ यांत दिला आहे, त्यांत दान घेणारा ब्राह्मण कौशिक गोत्र बव्हूच होता, एवढेंच वर्णन आहे. यानेतर आपणांस ब्राह्मणांचे राहण्याचे देश कोरीव ळेखांत दिळेळे आढळतात. उदाहरणार्थ, वडनगर येर्थाल कुमार- पालाच्या प्रशास्तीचा लेखक नागर ब्राह्मण होता असें वर्णन आहे. हा लेख संवत्‌ १२०८, म्हणजे इ. स, ११५१ चा आहे. चेदेळ आणि गाहडवाल यांनीं दिलेल्या कांहीं दानठेखांत दान घेणारे ब्राह्मण यांचें वणन ठक्कुर शब्दाने केळे आहे. (एपे. इं. ४, ए. १२१). तसेंच गाहडवाळ आणि हैहय यांच्या कांहीं दानलेखांत ब्राह्मणांचे वणन राऊत या राब्दानें केलेलें आहे (एपि. इं. भा. १४, प. २७४). दाक्षेण माळव्यांतीलळ एका सामंताच्या दानलेखांत इ. स. ११३५ त दान घेणाऱ्या ब्राह्मणाचे वर्णन गोत्रप्रवर देऊन शिवाय कणोट या शब्दाने केळळें आहे ( इंडियन अँटिक्वेरी भा. १५ ). कऱ्हाडचे शिलाहार यांच्या एका दानलेखांत दान घेणारे ब्राह्मण करहाट घैसास असें दिळेळे पाहून आम्हांस आश्चर्य वाटलें. (वैसास व पट्व- घेन हीं आडनांवें कोकणस्थ व कऱ्हाडे ब्राह्मणांत अद्याप आहेत, व तीं धंदेसूचक आहेत; पण हे धंदे कोणते हा निश्चय होत नाही). याप्रमाणें राहण्याच्या देशाचें नांव सांगणें इतकें महत्त्वाचे झालं कौ, पुढें पुढें ब्राह्मणांचे गोत्र व शाखा देणें बंद झालें. डदाहरणार्थ सास-

५५२ सामान्य परिस्थिति.

बाढू (गाल्हेर) मंदिरांतील शिलालेखांत दान घेणाऱ्या ब्राह्मणांची नार्वे गोत्राशिवाय दिलेलीं आढळतात. हा लेख १०९३ इसवीचा आहे (इं. अटि. भा. १५ पा. ३९). गुजराथचा भोळा र्भाम याच्या एका दानळेखांत दान घेणाऱ्या ब्राह्मणाचे वर्णन गोत्र व शाखा न देतां नुसते त्यांचं नांव रेकवालजातीय अश्या शब्दाने पोटजातीचा निदेश करून दलेले आढळतें. इ. स. १२०७ चा हा लेख आहे (इं. अँटे. भा. ११ पा. ७२ ). १२४९ इसवाच्या कोकणांतील एका दान- लेखांत ३२ दान घेणाऱ्या ब्राह्मणांची नांव॑दिलीं आहेत. त्यांत त्यांचीं गोत्रे दिलीं आहेत, पण झाखा दिलेली नाहीं, त्याऐवजी प्रत्येक ब्राह्मणांचे आडनांब दिलेलें आहे. यावेळी आडनांवें उत्पन झालेलीं होतीं असें दिसते. तीं धंद्यावरून किंवा राहण्याच्या गांवा- बरून किंवा इतर विशेषावरून उत्पन्न झाळेलीं दिसतात. शाखेचे महत्त्व नाहींसे होऊन यावेळीं आडनांबांचें महत्त्व वाढलें. हीं आडनांवें ब्राह्मणांत दीक्षेत, राऊत, ठक्कुर, पाठक, उपाध्याय तसेंच पट्टव- धन वगेरे दिसतात.* याप्रमाणें गोत्राचा उछेख कांहीं काळ येतो, कारण त्राह्मणांत त्याचे महत्त्व अद्यापपर्यंत आहे, पण प्रवर आणि शाखा यांचा उललेख येणें बंद झालें. हछीं ब्राह्मणांत यांची माहिती बहुधा ढुप्त होत चालली आहे ही दुर्दैवाची गोष्ट होय.

ब्राह्मणांचे हृरछांचे मुख्य दोन भेद पंचगोड आणि पंचद्राविड यांचा उछठेख कोरीव लेखांत अजूनहि १२०० पर्यंत नाहीं, स्कंदपुराणांतहि हा उल्लेख नाहीं, याचें आश्वये नको; कारण स्कंदपुरांण नवव्या शतकोंतलें आहवे हें आम्हीं मध्ययुगीन भारत, भाग २, यांत दाख- विलें आहे. ह्या भेद मध्ययुर्गांन कालानंतर म्हणजे इ. स. बाराशें-

  • त्रिवाडी हें नांव या लेखांत आलें आहे, तसेंच क्रमित हें नांव आलें आहे, यांचा अथ लक्षांत येत नाहीं.

ब्राह्मणांच्या पोटजाति. ५३

नंतर उत्पन झाला असावा असें दिसतें. या भेदाची कल्पना गोड मांसाहारी आहेत, आणि द्राविड शाखाहारी आहेत, यावर बसविली असावी. हे भेद नसले तरी ब्राह्मणांचे अनेक पोटभेद राहण्याच्या देशावरून किंवा शहरावरून इ. स. १२०० च्या पूर्वीच उत्पन झाळे होते हें निर्विवाद आहे. या भेदाची कारणें निरनिराळ्या चालीराते व तसेंच जातीच्या शुद्धतेची कल्पना हीं झालीं असावीं. स्कंदपुराणांतील नागरखंडांत नागरब्राह्मणांचा इतिहास आणि ल्यांचा मुख्य देव हाटकेश्वर शिव याची कथा दिली आहे. तेथें एक गोष्ट अशी सांगितली आहे कीं, एक अविज्ञात ब्राह्मण त्यांच्या शहरी आला व त्याळा एका नागर ब्राह्मणाने आपली मुलगी दिली. पुढें तो ब्राह्मण नसून चांडाळ आहे, असें कळलें तेव्हां जातीत मोठा घोटाळा उत्पन्न झाला; आणि नागरांनीं तेव्हांपासून असा नियम केला कीं, नागरज्ञातींतील ब्राह्मणाशिवाय दूसर्‍या कोणास मुलगी द्यावयाची नाडी. यासाठी त्यांनीं नागरांचीं कुळें परिगाणित केलीं. हळु हळु हीच व्यवस्था बहुतेक सर्वे जातींत आणि पोटजातींत अमलांत आली. किंबहुना पोटजातीला ज्ञाति हा शब्द योग्य रीतीनें लागू झाला. अबू येथील शिलालेखांत लिहिणारा नागर-ज्ञाति-माजा असें आपलें वर्णन करतो ( संवतू १२३१ म्हणजे १२७४ इसवी ), ही गोष्ट कल्पित असेल आणि स्कंदपुराणांत मागून घुसडली गेली असेल; परंतु या गोष्टीवरून लग्नसंबंध त्याच देशांतील ज्ञातीच्या कुलांतच संकुचित कसा झाला, यावें कारण बरोबर दिलेलें सांपडते. आणि याच कार- णाने राहण्याच्या देशावरून ब्राह्मणांच्या पोटजाति उत्पन्न झाल्या असं अनुमान होतें, या मोठ्या पोटजाति कार्झमरापासून दक्षिणे- पर्यंत झालेल्या पुढीलप्रमाणें दिसतात. १ काश्मिरी, २ नगरकोटिया (नगरकोट म्हणजे कांगडामर्धांल कटोच राजाची राजधानी) ३ मुहियाळ, ( पंजाबांत ही पोटजात आहे ), ४ सारस्वत, ५ गौड ( गुड म्हणजे

र) सामान्य परिस्थिति.

बंगाळ नव्हे तर ठाणेश्वराभोंवतालचा प्रदेश ), ६ नारनोळ, ( पत- याळा ), ७ कनोजिया ( कनोज देशांत राहणारे ), ८ सरजुपारिया ( शरयु पलीकडील), ९ जझोंते, ( जझोती म्हणजे बुंदेलखंडांत राह- णारे ) १० तिवारी ( त्रिपुर हेहृयांच्या राजधानीमध्ये राहणारे ) ११ सिंधी, १२ नागर, ( नगर म्हणजे वडनगरमध्यें राहणारे ), १३ श्री- माली ( श्रीमाळ राजपुतान्यांत आहे ). १४ पुष्करणा ( पुष्कर येथें राहणारे, १५ दसोरे ( दशपूर ऊर्फ मंदसोर ), १६ माळवी, १७ मोढ ( मोढ अथवा धर्मारण्य येथें राहणारे ), १८ गुजराथी, १९ बंगाली, २० मैथिळ, २१ ऊरिया २२ देशस्थ, २३ चित्पावन ( चित्तपोळण म्हणजे चिपळूणभावतीं राहणारे, ) २४ कऱ्हाडे, (कऱ्हाडच्या शिलाहारांच्या देशांत राहणारे), २५ गोड सारस्वत, २६ कर्नाटक, २७ आंध्र अथवा तेलगु, २८ तामिळ आणि २९ मल्याळी ( नंबुद्री ). या व अशा ब्राह्मणांच्या मुख्य पोटजाति त्यांच्या राह- ण्याच्या देशावरून नांवें पावलेल्या आपल्या दृष्टीस पडतात. यांताह्ि आणखी पोटविभाग आहेतच. दशा विशा वंगेरे इतर पोटभेद कित्येक कारणांवरून पडलेलें उत्तरेस दिसतात, आणि दक्षिणेंत ऐय्यर ऐयंगार आचार्य वगेरे दिसतात. तत्त्वज्ञानाच्या भेदांवरूनसुध्दां असे भेद पडले आहेत, आय्यर हे स्मात आहेत; म्हणजे शिव आणि विष्णु यांस ते सारखेच समजतात. पण अयंगार हे नारायणाला सर्वांत श्रेष्ठ देव मानतात, आणि रामानुजाच्या तत्त्वज्ञानाचे ते अनुयायी आहेत. यानंतर मध्वाचार्यांचे अनुयायी दैततत्त्वज्ञानी यांचाहि एक निराळा पोटविभाग झाठेला दिसतो; आणि त्यास आचार्य म्हणतात, या सर्व पोटभागांत विवाहसंबंध बंद झाळे, पण कांहीं कांहींत अनन- व्यवहाराहि बंद झाला.

या कालविभागाच्या प्रारंभीं उत्तर हिंदुस्थानच्या त्राह्मणजाति, वंश व आचार, यांत अधिक शुद्ध आहेत अशी कल्पना असल्याचे दिसून

ब्राह्मणांच्या पोटजा ति. ५५५

येतें, हें आश्चर्य आहे, दंतकथात्मक पुरावा असा सांपडतो कीं, दक्षिणेंतील कित्येक राजांनीं आपल्या देशांत वसति करण्यास या काळांत उत्तर हिंदुस्थानांतील ब्राह्मण कुटुंबांस बोलाविठें. उदाहर- णार्थ बंगालचा राजा बछठाळसेन यानें पांच कनोजिया ब्राह्मणांस बंगाल्यांत वसाते करण्यास बोलाविले. हे ब्राह्मण आदिसूर याच्या वेळेस आले, अशी दंतकथा आहे, पण हं काल्पनिक नांव आहे, किंवा आदिसर म्हणजे सेनांचा पहिला राजा असा अर्थ ध्यावा याचप्रमाणे केसरी राजाच्या वेळेस उत्तर हिंदुस्थानातून ओरिसांत वसाति करण्यास ब्राह्मण बोलाविले गेळे, असा इतिहास दिसतो गुजराथेंत मूलराजानंहि उत्तरेकडील शंभर ब्राह्मण वस्ती करण्यास बोलाविले. त्यांस हीं गुजराथेत ओदीच्य म्हणतात. किंबहुना थेट दक्षिणेस तामिळ देशांतहि एका चोल राजानें उत्तर हिंदुस्थानां- तन ब्राह्मण वस्तीस बोलाविले, अशी कथा आहे. या सवे ठिकाणी नवीन आलेल्या ब्राह्मणांनी निराळी पोटजात बनवून ततद्देशीय ब्राह्मणांशीं रोटीबेटीव्यवहार, त्यांस कमी दर्जाचे मानून, बंद केला. या रीतीनें आणखी पोटजाति उत्पन्न झाल्या. याचप्रमाणें असें आप- ल्यास मानतां येतें कीं, पंजाब, आणि यू. पी. मधून किव्येक ब्राह्मण मुसलमानांच्या स्वाऱ्यामुळें व पुढें मुसलमान जेत्यांच्या जुलुमामुळें दक्षिणेकडे निवून आले. गोव्यांताळ गौडसारस्वत ब्राह्मण याप्रमाणे सरस्वर्तांच्या प्रदेशांतून यावेळी इकडे आले असावे, त्यांची अशी कल्पना आहे कीं ते बंगाल्यांतून आळे, पगं ही कल्पना अनेति- हासिक वाटते. गुड हें नांव ठाणेश्वराभोंवतालच्या प्रदेशास वराह- मिहिराने दिलेलें आढळते. आणि या ब्राह्मणांचा मुख्य म्हणजे विशष जो मत्स्याह्मार तो महाभारतांतहि एका दीधे दुष्काळांत सरस्व- तांच्या तीरावरील ब्राह्मणांनीं मत्स्याहार करून बेदरक्षण केलें, या कथेत वार्णिळेला आहे. बंगाली ब्राह्मणहि याच मूळ सरस्वती देशां-

५५द सामान्य पारिस्थाति.

तून पूर्वेकडे गेळे, आणि म्हणून त्यांच्या देशांस गोड हें नांव पडले. गोव्याचे गौंड सारस्वत ब्राह्मण बंगाल्यांतून आल्याची दंतकथा मान- | ण्यासारखी नाहीं असें आम्ही म्हणतों, याचे एक कारण असें की, बंगाळ सोडून ते इकडे येण्याचें ऐतिहासिक प्रयोजन दिसत नाहीं, आणि दुसरें वंगाल्यांच्या भाषेंत ज्या उच्चाराच्या विशेष गोष्टी आहेत त्या त्यांच्यांत दिसत नाहींत; म्हणजे स चाष, अ चा आ, असा उच्चार गोडसारस्वतांत दिसत नाहीं.*

त्याचप्रमाणें कांहीं दक्षिणी ब्राह्मण चाठक्यांनीं वेंगी ( पूव किनारा) देश जिंकल्यावर जेल्यांबरोबर आध्र देशांत गेळे. आणे तेथे त्यांची एक निराळी पोटजात बनली, त्यांस हृ्ीं नियोगी म्हणतात. तात्पर्य ब्राह्मणांच्या हालचाली जेत्यांबरोबरहि या काळांत झालेल्या आहेत, तश्या अर्वाचीन इतिहासांत मराठ्यांच्या विजयानंतर झाल्या.

नागर ब्राह्मणांनी आपली ज्ञात ठरविण्याची, गोत्रे व कुटुंबं मोजून, जी व्यवस्था केली, ती या सर्व ब्राह्मणांच्या पोटविभागांनी अमलांत आणली, आणि लग्नसंबंध व अन्नव्यवहार आपल्यांतच मर्यादित केला. या सर्वे पोटविभागांना वर सांगितल्याप्रमाणें राहाण्याचा देश अथवा शहर यांजवरून नांवें पडलीं; अर्थात्‌ ही नांवें लग्नसंबंध मर्यादित झाल्यानें महत्त्वाची झालीं आणि गोत्र व शाखा यांचे महत्त्व नाहींसें झालें.

परंतु हें सांगितलें पाहिजे कीं, या सर्व पोटविभागांनीं आपला

  • चित्पावनांतहि आपण बाहेरून आलों अशी दंतकथा आहे. त्यांच्या गोरवणांवरून पंजाबच्या डोंगरी प्रदेशावरून ते इकडे आले असावे, आणि कांहीं काळ वसईजवळ राहिल्यानंतर चिंपळून इलाख्यांत म्हणजे दोन शिलाहारांच्या राजांच्या सरहद्दीवरील तंर्याच्या डोंगरी प्रदेशांत त्यांनी आपली याच सुमारास वस्ती केली. परशुरामाचे मूळ स्थान वसई- जवळ आहे, हं आम्ही महाभारतमामांसेंत दाखावेळेंच आहे.

माकांपोलोने वार्णलले लाड ब्राह्मण. ५५७

: प्राचीन वैदिक धर्म निश्चयाने पाळला. त्यांनीं आपले वेद व शाखा
ब तदनुरूप संस्कार पाळले, इतकंच नव्हे, तर आपल्या गोत्रप्रवराची आठवण कायम ठेविली. वैदिक सूत्रांनी हं गोत्र व प्रवर सांगितलेले असून तेच हल्लीं सर्व हिंदुस्थानांत प्रचाठित आहत, व स्मृतींचा सगोत्रविवाहाचा निषेध सर्व ब्राह्मण पाळतात. ब्राह्मणांच्या हजारों पोटजाति असल्या तरी गोत्रप्रवर एकच असून सगोल्लानेषेध सर्वांनी अद्याप पाळला आहे. ब्राह्मण व क्षात्रिय यांच्यांत आडनांवें सुरू झालीं ‘ आणि त्यांस महत्त्व प्राप्त झाळें आणि त्यामुळं गोत्राचा उछ्ठेख । कोरीव लेखांत येणे बंद झालें; तरी पण गोत्रांची स्माते ब्राह्मणांनी विशेषतः दक्षिणेंत कायम राखिली आहे हें अभिनेदनीय आहे. टिप्पणी मार्कोपोलोनें वर्णिलेले लाड ब्राह्मण.

। मार्को पोलो यानें लार देश्यांतील ब्राह्मणांचे केलेले वर्णन येथें उष्दत । करून त्याची चर्चा करणं अवदय आहे. माक! पोलो हिंदुस्थानांत । १२८० सुमारें आला होता व त्यानें १३००इ. सुमारें आपलें भ्रवासवृत्त । लिहिले, हं वृत्त अथात्‌ आमच्या काळानंतर शंभर वर्षांचे आहे; तथापि । तें गैरलागू आहे असं म्हणतां येत नाहीं. देशाची परिस्थिति त्याच्या । वेळीं १२०० इ. प्रमाणेंच असावी; कारण मुसलमानांनी दक्षिण देश । इ, १३०० नंतर जिंकला. लार देशाविषयी तो म्हणतो:-( मिस-यूल्चा । मार्को पोलो भाग दोन पा. ३६०) “’ हे सर्व ब्राह्मण पश्चिमेकडील त्या देशांतून आलेले आहेत. ते उत्तमव्यापारी आणि अत्यंत सत्यनिष्ठ आहेत. । ते मांस खात नाहींत आणि दारू पीत नाहींत आणि स्वघमंनिष्ठेने व एक- । पत्नीन्रतानें राहातात. खांद्यावरून पाढीवर व छातीवर येईल असें घात- | लेळे कापसाचें सूत्र ते बाळगतात. त्यांचा राजा शक्तिमान व संपत्तिमान्‌ ।असून तो या ब्राह्मणांस चोळ देशांत उत्तम हिरे व उत्तम मोती खरेदी । करण्यास पाठवितो. आठवड्याच्या प्रत्येक दिवश्यी निरनिराळ्या शुभ व ।। अश्रुभ वेळा आहेत असे ते मानतात भाणि शुभ वेळींच ते व्यापार करि-

म, भा…३६

५५८ सामान्य परिस्थिति.

तात. ते तपस्वी वृत्तीने राहणारे असल्याकारणानें दीर्घायुषी असतात. ते नेहमी एक वनस्पती दातांनी चावितात आणि त्यामुळें त्यांचें दांत उत्तम असतात.

“: दुसरे कांही ब्राह्मण चुगी ( जोगी ) नांवाचें येथे आहेत, ते प्राति- मापूजन करून असतात. ते यांच्याहूनाहे दीधकाळ म्हणजे १५० पासून २०० वर्षैपर्येत जगतात. ते भात व दूध एवढेंच खातात, गंघक आणि पारा यांपासून तयार केलेलें एक पेय ते दिवसांतून दोनदां पितात; त्यानें त्यांचे आयुष्य वाढतें. यांपैकी कांही तपस्वी अजून केवळ नग्न स्थितींत फिरतात. जस्ताचा किंवा सोन्याचा एक लहान बेल ते आपल्या कपाळावर बांघतात. गाईंच्या शेणाच्या गोवऱ्यांची राख ते आपल्या अंगाला फासतात. कोणा त्यांची स्रेवा केली तर त्याव्या कपाळाच्या मध्यभागीं ती राख ते लावितात, स्वगफळाच्या ( केळीच्या? ) झाडाच्या बाळलेल्या पानावर ते जेवतात, ते कोणाही प्राण्याची हिंसा करीत नाहींत. फार काय माशी किंबा मच्छराहे ते मारीत नाहींत. ते पुष्कळ दिवसांचा उपास कारितात तेव्हां ते पाण्याशिवाय कांहां खात नाहींत. ते जामिनीवर निजतात; असे असूनहि ते दौर्घकाळ जगतात. ते प्रेत दहन करितात. ”

या वर्णनावर मिस्‌ यूल एका टिपत म्हणते कीं, “ लार देशांत दक्षिण गुजराथ, ठाणे आणि चोल यांचा अन्तर्भाक होतो. कोंकणी ब्राह्मणांनी, गोव्यांतून त्यांना हांकलून दिलें तेव्हांच व्यापार पतकरिला. ब्राह्मणांच्या सत्यवादित्वाची ही प्रशसा वाजवी आहे, आणि ती ग्रीकांइतकी जुनी आहे. ग्रॉक लेखकांनी तर ती केलीच आहे पण नंतर हुएनत्सांगनें व त्या अलीकडे अरबी प्रवाशांनीहि केली आहे. ”

बर्रील वर्णन माकोपोलोचे कोणास उद्देशून आहे हँ ठरविणे बरेंच कठिण आहे. लार देशांत अरब प्रवाशांच्या वर्णनावरून ठाणें व कुलाबा जिल्ह्यांचा अन्त्भाव होतों हें खरें व त्याची भाषा ही स्वतंत्र लारी नांवाची होती. पण मार्को पोलोनें पुढें ठाण्याच्या राज्याचे निराळें वर्णन दिलें आहे. ठाण्यांत शिलाहार राजे राज्य करीत होतें हे॑आपण पाहि- लेंच आहे, लार देश गुजराथेहूनहि निराळा होता. कारण गुजराथेचें मार्को पोलोनें निराळे वर्णन केळें आहे; आणि १३०० इसवी सुमारें गुज-

४९%

माकांपांलान वाणलल लाड ब्राह्मण ५८८५९

” राथचे निराळें राज्य असून पाटण राबघानींत बाघेला राज्ञे राज्य करीत होते. या भागाची भाषा निराळी व चमत्कारिक आहे असूहि त्यानें ‘वणेन केलं आहे ( पा. २९२ ). अर्थातू १३०० पर्यंत हल्लांचा दक्षिण ‘गुजराथ म्हणजे लार देश उत्तर गुजराथेहून निराळा, भाषेने तसाच राज- ।सत्तेने, होता.लार देशांतील लोकांचा एक निराळा स्वतंत्र राजा असावा. ।पण पूर्वींच्या शतकांत ते राष्ट्रकूटांच्या सत्तेखाळीं आणि नंतर कल्याणच्या ‘पाश्चम चालुक्यांच्या सत्तेखाली होते. या लार देशांतील ब्राह्मणांची हल्ली |एक निराळी जात आहे असें प्रसिद्ध नाहीं. परंतु बहुघा त्या काळीं लाड ब्राह्मण अशी निराळी जात असावी आणि ते व्यापाराकरितां चोल व पांड यांच्या देशा इतक्या दूर प्रदेशांत जात, या देशांत हिरे ब मोती ‘उत्पन्न होत. कोंकणी ब्राह्मण यांची सत्यभाषणाबद्दल इतर ब्राह्मणाप्रमाणे ‘प्रासाद्वि असली तरी व्यापाराबद्दल प्रासाद्वे नाहीं. पट्टवर्धन, घळिस आणि ‘घेसास हीं आडनांवें कोकणस्थ व कऱ्हाडे ब्राह्मणांतच हल्लीं आहेत. ‘त्यांचा उल्लेष्व गोव्याच्या कदंबांच्या शक ११७१ म्हणजे इ. स. १२४९ ‘च्या कोरीव लेखांत ( जे, आर, ए. एस. मुंबई ९ पा. २४३ ) आला असून या नांवावरून असें दिसतं का, हीं कुटुंबं व्यापारी हाती. ।या आडनांवांवरून कोणत्या व्यापाराचा बाघ होतो हें आम्हांस ठरवितां येत नाही. कऱ्हाडचा शिलाहार राजा भोज दुसरा याच्या ११९० इस- बीच्या कोरीवलेखांत चार ब्राह्मणांची नांवें आलीं आहेत ती येणंप्रमाणें:- (१) आदित्यभद्ट (२) लक्ष्मीघरभद्ट (३ ) कऱ्हाटक प्रभा- |॥कर घेसास आणि (४ ) वासियन घैसास ( गोत्राचा कोठेंच उल्लेख नाहीं), येथे कऱ्हाटक हा शब्द ब्राह्मणडपजातिवाचक स्पष्ट आहे ॥आणि वैसास ह्या शब्दांत धार्मिक नव्हे अद्या एखाद्या धंद्याचा बाघ होतो. परंतु मार्को पोलोनें सांगितलेला हिरा आणि मोतीं यांचा घंदा ।निश्चयानें हे करीत नव्हते. तेव्हां आम्हांस असें वाटतं काँ दक्षिण हिंदु- ‘स्थानभर पसरलेली लाड ब्राह्मणांची एक निराळी जात असावी. ती ॥हिऱ्यामोत्यांचा धदा करणारी असून तिच्या सत्यभाषित्वाबद्दल ख्याति ॥असावो. माका पोलोंची गांठ या ब्राह्मणांशीं पांडय देशांत पडलंली दिसते कारण पांड्य देशाच्या बहुतेक पाठोपाठ त्यानें लार देशाचें वर्णन केलें

 
५६० सामान्य परिस्थिति.

आहे. माबार नांवानें त्याने वर्णिळला देश निश्चयाने पांडब देशच होय. कारण मोतीं येथेच सांपडतात, तसंच पुडील वर्णन या देशालाश्व तंतो- त लागू पडते. “या देशांत शिंपी मुळींच नाहींत. सर्व लोक, पुरुष व स्त्रिया, श्रीमंत व गरीब, राजासुद्धां, बहुतेक नागवे फिरतात. एक दढुंग- णाभोंबतीं वस्त्र मात्र असतें. शिपाई सुद्धां भाला ब ढाल घेऊन अश्याच नभ स्थितींत लढाईंस जातात. नझ़ राजाची खूण एवढीच काँ, त्याचें नेसण्याचें वस्र सूश्म असतें आणि गळ्यांत मोल्यवान रत्नांचा हार असतो ? या वणेनावरून रघुवंद्यांतील कालिदासानें केलेल्या वर्णनाची ( पाण्ड्योयमंसार्पितलम्बह्वारः वगैरेची ) आठवण होते. द्रविड देशांतील ब्राह्मण इल्लींहि बहुतेक नझ स्थितींतच फिरतात. या नंतर माका पोलो मुताफिली देशाचें वर्णन कारितों. या नांवाचा माग लागत नाहीं, पण हा देश म्हणजे वरंगळचें आंत्र राज्य निअयानें होय. कारण त्यावेळीं येथे राणी राज्य करीत होती असं वर्णन आहे ( ही प्रसिद्ध प्रतापरुद्राची सुलगी होय ), आणि येथील डोंगरांत हिरे सांपडतात हं वर्णन गोवळ- कोंड्याच्या खाणीला लागू पडते. या दोन देशांत बहुधा लाड देशांतील ब्राह्मणाची गांठ त्यास पडली असावी. कारण लागलीच त्याने पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या लाड देशाचें वर्णन केलें आहे. अथौत्‌ हा लाट म्हणजे हल्लींचा दक्षिण गुजराथ होय. ज्या जोरगांचे पुढें वणन केलें आहे ते शेव जोगी दिसतात. पण कपा ळाबर धातूचा बैल बांधणारे हे लोक जंगम नसावेत. कारण जंगम प्रेत जाळींत नाहींत, पुरतात. वीर दैव लिंगायत मत यावेळीं उत्पन्न झालें होतें हें खरे. पण लिंगायत अद्याप कोंकण किंवा लाट देश येथें गेल नव्हते. तेथे अजूनहि ते थोडेच सांपडतात. मिस यूल म्हणते त्याप्रमाणे असे जोगी हल्ला सांपडत नाहींत, ते जेनाहे होऊं शकत नाहींत. हे प्राणिहिंसा करीत नाहींत, मार्श किंबा मच्छरहि मारीत नाहींत, दीध उपबास करितात, यावरून जेनांच कल्पना होईल. पण जेन गोवऱ्यांची राख वापरीत नाहींत किंवा आपल्य शिष्यांच्या कपाळास लावीत नाहींत. तेव्हां हे हलला अत्तित्वांत नसले ल्या पंथाचें शैव तपस्वी असावे. ते कदाचित्‌ लकुलीशाचे अनुयायी

रजपूतांच्या पोटजाति. ५६१

॥ असतील. याचें पुण्यस्थान पूवी सांगितल्याप्रमाणे भडोच जवळ आहे. ॥ तात्पर्य एकंदर वर्णनावरून लाड ब्राह्मण म्हणजे कॉकणी ब्राह्मण नसून | हल्लीं दक्षिण गुजराथेत नसणारे पण सर्व दक्षिणदेशांत (हैदराबादसुद्धां) ॥ सांपडणारे व्यापारी ब्राह्मण असावेत असा आमचा तक आहे. हे व्यापारी । असून अत्यंत धार्मिक जुन्यामताचे अस्त. या प्रदेशांतील ब्राह्मण आपल्यास । लाड म्हणवीत नाहींत असे चोकशी अंतीं समजतें, तेव्हां माका पोलोनें । बर्णिडेळे लाड ब्राह्मण कोणते हा प्रश्न अनिश्चितच राहतो

रजपूतांच्या पोटजाति. पुढच्या महत्त्वाचा वर्ण म्हणजे क्षत्रिय वर्ण. याचा विचार करितां । आपल्यास असें दिसतें कीं, या कालविभागांत याचेहि पोटभाग । ब्राह्मणांइतके पुष्कळ नसले तरी पडले. हें स्पष्टच आहे कीं राहा- ण्याच्या देशावरून किंवा शहरावरून रजपुतांचे भाग पडणें राक्‍य । नव्हतं. क्षत्रियांचे दोन मुख्य विभाग या पूर्वीच पडळे होते, होती । करणारे व शेती न करणारे. शेती न करणाऱ्यांचा दर्जा साहाजेकच | दुसरा लागला. शेती न करणारे क्षत्रिय म्हणजे देशाचे राजे आणि । गांवचे मुख्य किंवा प्रांताचे अधिकारी, यांचा दजो मोठा मानला गेला. या क्षत्रियांसच विशेषत्वाने आतां राजपूत म्हणं लागले. हा । शब्द या काळच्या कोरीव लेखांत साधारणपणें राज्य करणारे क्षत्रिय । अश्या अथानं येतो. उदाहरणाथ, ए. इं, १४ पा. १५९ बह़ाळ- ॥ सेनाचा लेख यांत “ जज्ञिरे राजपुत्राः ‘ असा प्रयोग आला आहे. । राजपुतांचा दर्जा भाग २ यांत दाखविल्याप्रमाणे (पा. १७८) । जाह्मणांपेक्षांह्यि मोठा प्रथम ठरला, मागीळ शतकांतीळ अरब लेख- । कांनी वर्णिळेला हा रजपुतांचा वरिष्ठ दर्जो अलबेरूनी सांगत नाहीं. । कारण पूर्वी सांगितल्याप्रमाणें तो पुष्कळ वेळां प्रत्यक्ष स्थितीकडे ॥ न पाहतां हिंदुधर्मशास्रावरून विधानें करितो. किंवा असेंहि असू ॥ शकेल कीं मुसलमानी स्वाऱ्यांचे काळांत बहुतेक राज्य करणारीं

५६२ सामान्य परिस्थिति.

पंजाबांतीळ रजपूत घराणीं नष्ट झालीं. गाहडवाल राजा चेद्र यानें उत्तर हिंदुस्थानांतून जुळूम करणाऱ्या मुसलमानांस हांकळून र आणि क्षत्रिय वर्णांची पुनधेटना केली त्यावेळीं साहजिकच धर्मशा- स्रांत सांगितलेली क्षत्रियांची जागा त्यांस मिळाली; म्हृणजे ब्राह्म- णांच्या नंतर त्यांचा वर्ण लागला, परंतु सर्व बाबतींत ते ब्राह्मणांच्य बरोबर्रांचे होते. कारण अटबेरूनी स्वतः कबूल करितो कीं, त्यां दजा ब्राह्मणांहून विशषष खालीं नव्हता. उदाहरणार्थ, वेदांचे अध्य- यन करण्याचा त्यांस अधिकार होता, व ते वेदांचा व शास्त्रांचा अभ्यास करीताहि. आपण पाहिलेंच आहे कीं, भोज, गोविंदचद्र वगेरे प्रसिद्ध राजे वेदिक व लौकिक विरदयेंत विद्वान्‌ ब्राह्मणांप्रमाणें प्रवीण होते.

नेहमींच्या रीतीनें रजपूत म्हणजे हिंदुस्थानांतील राज्य करणाऱ्या क्षत्रियांनीं ११०० इसवीच्या सुमारें त्यावेळची धर्मीनिष्ठ शुद्ध क्षत्रिय राजघराण्यांची यादी करून एक आपली पोटजात बनविली. या यादींत पंजाब साहजिकच बाहेर राहिला. कारण तेथं मुसलमानांचे राज्य होतं. आणि खरोखरच पंजाबांत राज्य करणारीं क्षत्रिय घराणीं उरलींहि नव्हतीं. हिमाल्यांतील राज्य करणारीं घराणींहि या यादीत आलीं नाहींत. याचें कारण दुसरें असून ते आम्ही पुढें सांगू दक्षिण हिंदुस्थानांतील राज्य करणारीं घराणीं धुद्धां द्या यादीतून वग- ळलीं गेलीं, हीं शुद्ध आयंवंशी क्षात्रिय वणाचीं नाहींत असं बहुधा समजले गेळें असावें. महाराष्ट्रांत मात्र राज्य करणारा क्षत्रिय घराणीं या यादींत घेतलीं गेलीं आहेत. कारण उत्तर हिंदुस्थानांत राज्य कर- णाऱ्या क्षत्रिय घराण्यांशीं त्यांचें विवाहसंबंध चाळत आले होते अशा राजपूत घराण्यांची संख्या २६ ठरली. आणि ही संख्या ठो- करच ठराविक होऊन ११५९ इ. मध्यें लिहिळेल्या कल्हणाच्या राजतरोगेणींत आपल्यास या संख्येचा उछ्छेख सांपडतो. प्रारंभीच्या

रजपूतांच्या पोटजाति. ५६३

छत्तिसाच्या यादींत कोणतीं घराणीं होतीं हें ठरविणे काठेण आहे. कारण त्यावेळेस लिहिलेली विश्वसनीय यादी दृ्ीं आपल्यास उप- लब्ध नाहीं, रासा हांच्या स्थितींत १६ व्या शतकांतला निःसंशय असला तरी (भा. २ पा. ७० पहा ) रासांत आलेली यादी प्रथ्वि- राजाच्या समकाढीन आहे असें आम्ही मानतो. रासांतील ही यादी हिंदुस्थानच्या ११०० इ. च्या सुमारास असलेल्या राजकीय स्थि- तीशीं खरोखर जळते कौं नाहीं याचा आम्ही एका टिप्पणींत विचार करूं. या परिगणनेनें निरानेराळ्या राजकुलांची कुलनामें जास्त मह- त्वाची झालीं व प्रत्येक कुलाचे गोत्र निराळें होतें तरी त्या गोत्राची किंमत विवाहाच्या बाबतींत सुद्धां कमी झाली. किंबहुना या कालां- तीळ कोरीव लेखांत कुलनामच गोत्रनाम झाळें आणि गुहिलगोत्र, प्रतिहारगोत्र असा शब्दव्यवहार चाळू झाला (भा. २ पा. १७७ पहा).

रासांतीळ यादींत लखनाचे सेन यांचें नांव नाहीं ही गोष्ट प्रथम नजरेस येते. यावरून बंगाल्यांत त्यांची सत्ता १ १०० इसवी नंतर प्रस्थापित झाली या मतास पुष्टि मिळते, दुसरी गोष्ट लक्षांत येते ती ही की दक्षिण हिंदुस्थानांतील राज्य करणारीं सर्व घराणीं म्हणजे गंग, चोळ, पांड्य आणि केरळ या यादींत नाहींत. याचें एकच कारण असें दिसतें कों पूर्वी सांगितल्याप्रमाणें क्षत्रियत्वाबद्दद यांचा दावा उत्तर हिंदुस्थानांतील कोणत्याहि क्षात्रियांशीं यांचा विवाहसं- बंध नसल्यानें मान्य केला गेला नाहीं. महाराष्ट्रांतील राज्य करणारा क्षत्रिय घराणीं भोगोलिकदृष्टया मध्यवार्त असल्यानें वंश-दृष्टयाहि मध्यस्थितींत होतीं. शिलाहार हेंच एक खरें मराठे घराणें छत्तिसाच्या यादींत गणलें गेठें आहे हें आम्ही पूर्वी सांगितलेंच आहे. दक्षिण देशचे चाळुक्य व राष्ट्कूट आमच्या मतानें उत्तर हिंदुस्थानच्या त्याच नांवाच्या कुलांहून भिन्न असले तरी त्या नांवाखाली छत्तिसाच्या यादींत त्यांचा अन्तर्भाव होतो ही गोष्ट नाकबूळ करितां येत नाहीं,

५६४ सामान्य परिस्थिति.

पण गोव्याच्या कदंबाचे नांव छत्तिसाच्या यादींत नाहीं ही गोष्ट

लक्षांत घेण्यासारखी आहे. याच कालविभागांत गुजराथच्या चाट्क्य कुलांत कदंबांच्या दोन राजकन्यांचा विवाह झाल्याचा पुरावा आहे. बहुधा उत्तर हिंदुस्थानांतील रजपुतांनीं आपली पोटजात उत्तरहिंदु- स्थानालाच मर्यादित केली आणि महाराष्ट्रांतील क्षत्रिय कुलाशीं विवाह-संबंध चाळू ठेवणें बंद केलें. उदाहरणार्थ कर्ण वाघेलानें आपली मुलगी देवगिर्राचे यादवास देण्याचें नाकारिळें ( इ. स. १३०० ). याचें कारण असें दिसतें कीं, दक्षिण हिंदुस्थानच्या अनाये मानटेल्या राजघराण्याशींहि त्यांचा विवाहसंबंध होत असे.

| । श

। र ।

| ।

यामुळें मराठा क्षत्रियांनीं शिळाहारासह या काळानंतर आपली एक

निराळी पोटजात केली आणि हीं कुळें मोजून ९६ कुळांतच विवाइ- संबंध मर्यादित केला.

पश्चिम ह्विमाल्यांतील रजपूतांचा एक निराळा संघ होऊन एक निराळी पोटजात बनली. ते बाजूला पडले होते इतकेंच नव्हे तर त्यांच्यांत चमत्कारिक विवाह्याच्या रीति चाळू हात्या. प्राचीन हिंदु- स्थानांत वरिष्ठ वर्णाने खालच्या वर्णांतीळ स्त्रिया करण्याची चाल होती, ती हिमाल्यांत तेव्हां अवशिष्ट होती व अद्याप आहे. यांत विवाहाची संतति कमी दर्जाची न होतां बापाच्याच जातीची होत असे. ह्याप्रमाणें हल्लींहि पंजाबालगतच्या हिमाल्याच्या प्रदेशांत क्षत्रियांचे तीन दर्जे आहेत, म्हणजे रजपूत, राणा अथवा ठाकूर आणि राठी. रजपूत ठाकुरांच्या मुळी विवाहितात आणि ठाकूर राठींच्या मुली; पण ते त्यांस आपल्या मुली देत नाहींत. ह्याप्रमाणें

  • कुमारपाल चरितांत अद्या विवाहाचा उलेख आहे. कणो5पि कनाटनृपाडुगजायाश्वकारपाणिग्रहणं जयाया: । त्याचें एका काइमिरी राजकन्येशी विवाह झाल्याचें वर्णन त्यांत आणखी आहे. कणींय कारमीरपातिः स्वपुत्रीं प्रेपीद्थो मेणलदेविनाम्नींम्‌।

रजपूतांच्या पोटजाति. ५९५

: हिमालय प्रदेशांत जुनी मिश्रविवाहाची चाळ रजपुतांत चाळू आहे ॥ तरी त्यांच्या वंशाच्या शुद्धतेंत कांही फरक नाहीं. कारण राठी हे मोंगलवंशी नसून आर्यवंशी आहेत. किंबहुना ते केवळ शेतकी करीत असल्यानें दुसऱ्या दर्जाचे क्षत्रिय आहेत. शिवाय त्यांच्यांत कोरेवा म्हणजे विधवाविवाह प्रचलित आहे. पण रजपुतांत ब्राह्मण आणि वेऱ्यांप्रमाणेंच तो निषिद्ध आहे. “ पंजाबांतील जाति व उपजाति ” या पुस्तकांत हिमालय प्रदेशांतील रजपुतांच्या पोटवि- भागांची सविस्तर माहिती दिली आहे. या रजपुतांत कटोच जात अग्रणी असून त्यांतील मुख्य कुल लंबाग्रामच्या महाराजाचे आहे. पण या सूर्यवंशी आणि चेद्रवंशी श्रष्ट’, मध्यम व कनिष्ठ कुलांचीं नांवें जमुवाल, गुलेरिया वगेरे, राहाण्याच्या ठिकाणावरून पडलेलीं येथें विस्तारानं देण्याची आवश्यकता नाहीं.

खुद्द पंजाबांत पश्चिमेकडील क्षत्रिय, महमुदाच्या आणि शिहा- बुद्दीनाच्या वेळेस जबरदस्तीने मसलमान केले गेले. हे लोक रजपूत नांव वापरीत नाहींत व ते ल्यांस आवडतहि नाहीं, पण ल्यांत महा- भारत म्हणजे ग्रीक काळांतील क्षत्रिय नांवें योधेय ( जोह्िया), आनव (जंजुआ) वगेरे अद्याप बाकी आहेत;आणि कांहीं हिंदु चाली-मूल झाल्या- वर किंवा लग्नाच्या वेळी ब्राह्मणांस बोलावणें-इल्यादि अद्याप शिल्लक आहेत. पंजाबच्या पूर्वभागांत रजपूत अजून सांपडतात; परंतु ते पूर्वेकडील व दक्षिणेकडील देशांतन मुसलमानी काळांत आलेले असावेत. कारण छत्तिसाच्या यादींतील ठराविक कुलनामें परमार चव्हाण, तुवर, राठोड, कछवाह वगेरे ते घेतात आणि त्यांचे विवाह संबेधहि दिल्ली आणि रजपुतान्यामधील क्षत्रियांशीं होतात.पंजाब आणि

*यांस मिया म्हणतात, हा शब्द मुसलमानी असून त्याचा अर्थ परमपूज्य असा आहे.

५६६ सामान्य परिस्थिति. | सरस्वतीचा प्रदेश तसेच पांचालदेश हा ब्राह्मणक्षत्रियाची मूळ भूमि । आहे. हिंदुस्थानच्या दक्षिण व पूव भागांत असलेले सर्व ब्राह्मण व । क्षत्रिय येथूनच गेळेळे आहेत. तेव्हां परमार व चव्हाण, राठोड आणि कडछवाह हीं कुलनामें मूळचीं पंजाबांतून आठेलीं असावींत. किंवा हीं नांवें महाभारतांत आलेलीं नसल्यानें दक्षिण व पूर्व देशांत म्हणजे मध्यदेशांत व राजपुतान्यांत सहाव्या शतकांत किंवा नंतर कुशान व हूण लोकांच्या स्वाऱ्यामळें जे क्षत्रिय पंजाबांतन बाहेर पडले त्यांच्यांत मागाहून उत्पन्न झालीं असावींत. छत्तिसाच्या यादीं- तीळ कुलनामे महाभारतांत सांपडत नाहींत हें निश्चित आहे आणि ज्याअर्थी पंजाबाच्या पूवेभागांत ३६ तीलच्‌ नांवें सांपडतात, ल्या- अर्थी हे रजपूत दक्षिणेकडून तेर्थ गेळे असावेत. स्थानिक दंतकथाहि या अनुमानाला अनुकूल आहेत. कारण पूर्वपंजाबचे रजपूत असें मानतात कीं, आम्ही राजपुताना व दिल्लीचा प्रदेश येथून पंजा- बांत आलां. याकरितां या राजपुतांचा निराळा संघ न मानितां राज- पुताना संघांतच त्यांचा अन्तभाव केला पाहिजे

याप्रमाणे हिंदुस्थानच्या क्षात्रियांचे तांन पोटविभाग होतात व ते ११०० पासून १२००किवा १३०० इसवीपयंत उत्पन झाले. (१) छत्तिस कुलाचे रजपूत, राजपुताना, गुजराथ, काठेवाड, माळवा, यू. पी. आणि पूर्व पंजाब येथं राहणारे. ( २ ) पश्चिम हिमाल्यां- तीळ रजपूत आणि ( ३) मराठा क्षत्रिय. हे तान विभाग आपसांत विवाह करीत नाहींत व रोटी व्यवहारह्ि करीत नाहींत, तेव्हां नेह- मींच्या व्याख्येप्रमाणे त्यांस ठराविक निबेधाच्या पोटजाति म्हणण्यास हरकत नाहीं. याप्रमाणें शुद्ध क्षत्रियांच्या पोटजाति तीनच आहेत तरी दुसऱ्या अनेक पोटजाति आपल्यास क्षत्रिय मानतात, यांचेहि अस्तित्व आपल्या कालविभागापययंत बहुधा मागें जातं. शेतकीचा

. त क्य >

धंदा करितात म्हणून ज्यांस कमी दजोचें लेखिळें जाते, त्यांचा अन्त-

रजपूतांच्या पोटजाति. ५६७

भीव वरील क्षत्रियांत करणं अवश्यक आहे. उदाहरणाथ, हिमालय प्रदेशांतील राठी व दक्षिण देशांतील मराठे; राठी आणि मराठे हे शद्व मूळ राष्ट्र शद्वावरूनच निघाळेळे दिसतात आणि ही व्युत्पत्ति असे दाखविते कौ, हे लोक राष्ट आहेत म्हणजे वस्ती करून राहळठेळे हातकरी अथवा सामान्य जन असून ते शूद्र म्हणजे मजूर यांहून भिन्न आहेत. अल्बेरूनीनें चार वणीचें जें वर्णन केळे आहे त्यावरून मात्र असा बोध होतो कीं, रजपूत म्हणजे क्षत्रिय हे ब्राम्हणांच्या बरोबरचे मानळे जात, तर शेती करणारे क्षत्रिय व वैश्य यांचा दजी शूद्रांहून फारसा आधिक मानला जात नसे. कारण दोघांसाहे वेदाध्ययनाचा अधिकार नव्हता. या शेतकरी क्षात्रियां व्यातीरैक्त दुसऱ्या पोटजातिहि क्षत्रियाचा दर्जा सांगत आहेत, ल्या ह्याच कालविभागांत उत्पन झाल्या असाव्या. तथापि बुंदेले, रघु- वंशी वगैरेच्या वर्गाबद्दल निश्चित पुरावा आपल्यास उपलब्ध नाहीं. हिंदु समाजाचा कल नेहमी अनेक पोटजाति उत्पन्न करण्याकडे असून त्या आपल्या जवळच्या वरच्या वर्णांत समाविष्ट होण्याचा हक्क नेहमीच बाळगतात.

दक्षिण हिंदुस्थानचे म्हणजे मद्रास इलाख्यांतील क्षत्रित्र आप- ल्यास सूर्यवंशी व चंद्रवंशी मानतात. त्यांची एक निराळी पोटजाति ‘ आहे, ती वरीळ गणनेंत आम्ही धरली नाहीं. जेथपर्यंत आम्हांस पुरावा मिळाला तेथपर्यंत कोरीवलेखांत दक्षिणेकडील क्षत्रियांचे उत्तरकडील क्षत्रिय कन्याशीं विवाह झाल्याचें उदाहरण आम्हांस मिळाळें नाहीं. मनुस्मृतीत द्रविड वीरजाति ब्रात्य क्षत्रिय मानल्या आहेत, आणि पुराणांत तर त्यांची उत्पत्ति सूथवंश्ांत अस-

  • अशोकाच्या शिलोलेखांतील राष्ट्रिक शद्ठाचा अर्थ स्मिथच्या मतें पाश्चिम घाटावरील राहणारे असा आहे. पण हिमालय प्रदेशांतील वरील . राठी लोकांचाहि त्यांत निर्देश होईल,

५६८ सामान्य परिस्थिति.

ल्याचा आधार आहे. आंत्र क्षत्रियांस राज म्हणतात; हा राठू

संस्कृत आहे; आणि वेह्लाळहि म्हणतात. दक्षिण हिंदुस्थानच्या क्षत्रियांच्या दजाबद्दल जास्त चचो करण्याचीं सबळ साधने आम्हांस उपलब्ध झालीं नाहींत. कारण हा विषय विंस्तत रीतीनं व माहितीने

सी > पह.

विवेचिळेला आम्हांस कोठें आढळला नाहीं

टिप्पणी-(क्षत्रियांचीं छत्तीस राजकुलें.)

आम्हीं असे वर मानलें आहे की, क्षत्रियांची ही छत्तिस राजकुलांची यादो गाहडवाल चंद्रराजाने, एका कोरींव लेखांत सांगितल्याप्रमाणें सूये व चंद्रवशीं रन्षपूत कुलांची जेव्हां पुनःस्थापना केली त्यावेळेस तयार केली गेली. चंद्राने १०८० पासून ११०० इसवी पर्यंत राज्य केलें. अथोत्‌ ही परिगणित केलेली छत्तीस कुलें त्यावेळेस प्रत्यक्ष राज्य करीत असलीं पाहिजेत, ही मूळ बनलेली यादी आपल्यासमोर नाही, आणि टोडनें ज्या दोन पुराण्या याद्या अपुऱ्या व बऱ्याच चुकीच्या दिल्या आहेत, त्या म्हणजे रासांतील यादी आणि कुमारपालचरित संस्कृत यादी ह्या होत. ( टोडनें आणखी दोन याद्या ज्या दिल्या आहेत त्या अलीकडच्या आहेत, कारण त्यांत घडघडीत अलीकडची नांवें आहेत ). या दोन लञुन्या याद्या आपण जुळवून पाहिल्या तर त्या एकाच मुळा- वरून नक्कल केलेल्या दिसतात, त्या कश्या जुळतात किंबा न जुळतात तें आपण येथें पाहूं.

रासांतील यादी. कुमारपालचरित्रांतील यादी. रवि इक्ष्वाकु शाशे सोम यदु यदु ककुस्त्थ नः परमार परमार सदावर नः चव्हाण चव्हाण

चालुक्य चालुक्य

क्षात्रियांची ३६ राजकुल. ५६९

रासा कुमारपालाच, ठिंदक छेदक शिलार शिलार आमीर न दोयमत मक्कान मक्कान चपोत्कट चापोत्कट परिहार परिहार धान्यपालक घान्यपालक राज्यपालक$क राज्यपालक निकुंप निकुंप

हूल हूण गुहिळ, गुहैलघुत्र गुहिळ

व त अजि

गोरीशकर ओझा यानें या यादीबरील लिहिलेल्या टिप्पणींत आणखी आठ नऊ नांबें कुमारपालचरित्रांत असलेलीं पण टाडनं गाळलेलीं

44

दिलीं आहेत, त्यांपेकी तीन आणखी जुळतात तीं अशी–

राठोड राठ कारट्टपाल कारट्टपाल अनिग अनग

दोन्ही यादीत पुष्कळ नांवें अशीं आहेत कीं, त्यांचा ठावठिकाण आपणांस लागत नाहीं, आणि टाडलाहि लावतां आला नाहीं, शिवाय कित्येकांचा त्यानें जो ठिकाणा लावळा आहे तो चुकीचा आहे. हल्ली आपल्यास जो कोरीव लेखांचा पुरावा मिळाला आहे, तो त्यावेळीं उप- लब्घ नसल्यानें चुकी हाणें अपरिहार्य होते. आपण ही रासांतील यादी हिंदुस्थानांतील ११०० इसवीच्या वेळच्या परिस्थितीक्षी तंतोतत कशी जुळते हें आपण पाहूं. माग २ मध्ये नांवांचा जो अर्थ आम्हीं केला आहे तोच आम्ही येथ घेतों.

पहिलीं पांच नांबं ककुस्थ ( कच्छपघात ), परमार, सदावर (तोमर), चाहमान, छंदक ( चंदेल ) म्हणजे प्रसिद्ध ग्वाठेर, माळवा, दिल्ली, सांभर, बुंदेळखंड येथील राजघराणी या भागांत वर्णिलेली आहेत तीं

५५७० सामान्य परिस्थात.

होत. सहावे शिलार म्हणजे ठाण्याचे शिलाहार घराणें होय. सातवे अभीयर अथवा आमभौर यांचे राज्य कोठें होतें हे टाडनें सांगितलें नाहीं. चचापोत्कट आणि परिहार म्हणजे अनहिलवाड आणे कनोज येथील नुक- तींच मोडलेलीं राजघराणी होत. पण त्यांचे लहान अवशेष प्रतिहारांच्या मंडावरप्रमाणें असलेच पाहिजेत. मेवाडचे गुहिलोत राजघराणे प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणें मांगरोळचे ( काठियावाड ) गुहिल राजघराणे त्यांच्या प्रकरणांत वार्णिळें आहे.यादवांच्या नांवाखाली यादव, भाटी आणि काठेवाडचे जाडेजा व चूडासमा हे येतात. पण त्या वेळेस ब्रियानाचे यादव आणि मथुरा अथवा महाबनचे यादव होते. जेसलमीरचे भाटी या यादींत सांगितले नाहींत. याचें कारण बहुघा असे दिसतें का, सलमीरची अद्याप स्थापना नव्हती. तें शहर ११५७ मध्यें स्थापिले गेलें ( गोरीशकरचा टॉड पा. २२४ ). आणि काठेवाड आणि कच्छमध्यें अद्याप दुसरी दोन कुळें आलीं नव्हतीं, ते प्रांत त्यावेळीं अनहिलवा- डच्या चालुक्याखाली होते. टाक यांचें राज्य यावेळीं यमुनेवरील काष्ठ येथें होतें अघ्षे टॉड म्हणतो. आमच्या मतें कित्येक समजतात त्याप्रमाणें ते तक्षकनागाचे वंशज नाहींत. चंबळ नदीच्या पूर्व किनाऱ्यावर भैसरो- डासमोर बडोली येथें हू्णांचें राज्य होतें. येथील सुंदर कोरलेल्या दग- डांचें मंदिर हूणाविवाहमंडप म्हणून प्रसिद्ध आहे. गोड अथवा गोर यांचा बंगालच्या सेना्शी कांहीं संबघ नार्ही. सेनांची सत्ता बंगाल्यांतच ११०० नंतर स्थापित झाली आणि यामुळें त्यांचे नांव यादींत नाही. हे गोड गुड म्हणजे ठाणेश्वराभोंवतालचा देश येथील राहणारे असून यांचें मोठें राज्य अजमेराभोवतीं होतं. त्यांपासून अजमेर चोहाणांनीं घेतली अशी देतकथा टोडनें दिली आहे. ( कित्येक ही देतकथा खरी मानत नाहींत ). बडगूजरहि यावेळीं एक समथ राजकुळ होतें. त्यांची सत्ता आंभेरभोंबतालच्या प्रदेशावर होती व राजपुर राजघानी होती. टोडनें दुसर्री दंतकथा अशी दिली आहे की, कछबाहानीं हा देश त्यांजपासून हिसकून घेतला. रासांतील यादींत त्यांचें नांव गरु असे दिलें आहे, हे गुजर शद्धांचें प्राकृत रूप आहे. शेवटी निकुंपार्चे एक राज्य त्यावेळीं स्वानदेशांत होतें. गोरीदोकरनें दाखाविलेल्या ११५३ इसबीच्या एका

कायस्थ. ५७७१

, कोरीव लेखावरून ही गोष्ट सेद्ध होते. जयपूर इलाख्यांतहि यांचें छोटे | राज्य होतं. यावरून निदुंप हे उत्तर व दक्षिण हिंदुस्थानचे क्षात्रिय दिस- । तात, तसे शिलाहार नाहींत. मराठ्यांत इललीं त्यांचे नांव ।नेकम आहे. । ह्याशिवाय राठोड अथवा राठ आणि राक्षपाल यांचीं नांवं । म्हणजे कनोज आणि मोंधघीर येथील राजघराण्यांचीं नांवे आहेत. तसेंच चेदीचे कलचूरी हेहय रासांतील यादींत आहेत. बाकींच्या नांवाची । राजघराणीं कोठे होती हें ठरविणे कठीण आहे; आणि टोंड, गोरी- हेकर व मोहनलाल पांड्या यांनाहि ठरवितां आले नाहीं, मात्र दाहिमा हे त्यावेळीं प्रसिद्ध होते, आणि दघिचिक्तषीचे वंशज म्हणून कोरीव- । लेखांत वर्णिळे आहित. पण रासांतील यादीत यांचें नांव दघिषट दिलें आहे. हा वंद्रा १०४० इसवीच्या एका कोरीवलेखांत जोधपूर संस्था- । नांतील परबत्सर जिल्ह्यांतील कन्‌सेरू देवळांत वर्णिलेला आहे (ए. । इ. १२ पा. ६१). सांभरच्या चाहमानांचे ते मांडलिक आहेत. गोंदा - । वरीवरील खालेनर येथून ते मारवाडांत गेले ब तेथें परबतसर, जालोर । व साचोर या प्रांतांत १३०० इसवीपर्यंत ते राज्य करीत होते. हा । कोरीवलेख लिहिणारा “ छच राजा प्रत्यक्ष राज्य करणारा होता आडा । रजपूत नव्हता. ” असो, कारट्टपाल म्हणजे काठी नव्हे आणि काठि- । यावाडांत ११०० इसरवींत काठीचे कोठेंच राज्य नव्हते. तसेंच जाट । या यादींत येऊं हाकत नाहींत आणि जाटांन! क्षात्रिय मानलेले नाहीं व

त्याचें यावेळी रार्ज्याहि नव्हतें. येणेंप्रमाणें, ऐतहासिक पुराव्याच्या अभावी । आम्हांस इतकेंच म्हणतां येतं कीं बाकीची राजघराणीं कोठें होतीं याचा । अद्याप ठाव लागला नाहीं.

कायस्थ.

कायस्थ आपल्यास वंशानं क्षत्रिय मानतात. या कालविभागां- । तीळ कोरीवलेखांत त्यांचें नांब वारंवार येतं. जरी स्मृतीप्रमाणें त्यांची । जात दरम्यानी आहे तरी त्यांचा समावेश क्षत्रिय वर्णांत कारितां । येईल. कायस्थ धंद्याने ठेखक होते. अर्थात्‌ कोरीवलेखांचे लेखक या

(2:

नात्यानं त्यांचें नांव नेहमीं येतें. राहण्याच्या देशावरून यांचेहि या

५७२ सामान्य परिस्थिति.

काळविभागांत पोटविभाग पडलेळे दिसतात. कारण एका लेखांत १००० इसवीच्या ( ए. इ. १२ पा. ६ ) एका गौडकायस्थाचें नांव आहे. येथें अन्वय हा शब्द योजिलेला नाहीं. जेथें त्याचा उपयोग केला जातो तेथें तो कुलाचा सूचक दिसतो. उदाहरणार्थ बिजो- लिया लेखांतील नैगमान्वय ( बंगाल जे. आर. ए. एस. ५५ पा. ४० ) किंवा गोडान्वय शिवालिक स्तंभळेखांतील ( इं. ए. १९ पा. २१८ ). हें सांगितलं पाहिजे कीं दक्षिण हिंदुस्थानांतील कोरीव- छेखांत कायस्थ लेखकांची नांवें कधीं कर्धी येतात; जसे, कोंकणां- तीळ अपराजिताच्या लेखांत आलीं आहेत. कांकणांतील कायस्थ प्रभूंची अशी दंतकथा आहे कीं, ते उत्तर हिंदुस्थानांतून या का- लाच्या नंतर येथे आठे. ११०० इसवीमधीळ कायस्थाच्या उल्ले- खाशीं या दंतकथेचा मेळ घालतां, असें म्हणतां येईल कीं, लेखां- तील कायस्थांचे वंशज हछींचे दवणे-कायस्थ असावेत.* वेश्य.

या कालविभागांत ब्राह्मणांचे अनुकरणानें राहण्याच्या देशावरून वेश्यांचेहि अनेक पोंटभाग पडले. परंतु यो काळांतील लेखांत उत्तर हिंदुस्थानांतील वैऱ्यांचे चौऱ्याशीं विभागांचे कोठेंच नांव आलेलें नाहीं. कांहीं कुलनामें येतात, उदाहरणाथ प्रागवाटान्वय किंवा बिजो- लिया लेखांतील कारापक्वंश, त्याचप्रमाणे पोरवाल आणि मोढ ( इं. ए, ११ पा. ७२ मोढान्वयप्रसूतमह्ाक्षपटाळिक ) हीहि नांवें येतात. पण अन्वय शब्दावरून हीं पोटजातीचीं नांवें नसून कुलनामे दिस- तात. हे वेऱ्य पुष्कळ ठिकाणीं जैन असावेत. यामुळें पोटजातींतच विवाह होण्याची मर्यादा नसावी. दक्षिणेंत आणि हिमाळ्यांतील प्रदे-

  • या कोर्रावळेखांत प्रभु हा शब्द अमात्याच्या नांवांशीं जोडलेला आहे, कायस्थ लेखकाच्या नांवाशीं जोडलेला नाहीं.

शूद्ठ-अस्पृद्यज्ञाति- ५७३

‘शांत वैद्य शैवहि दिसतात. कांगडांतील वैजनाथ देवळांतील लेखांत ॥तें देऊळ दोघा वेश्‍्यबंधूंनीं बांधल्याचे वर्णन आहे. आणि दक्षिणें- ॥ तील वीरशैव म्हणजे लिंगायत वैश्य प्रसिद्धच आहेत.

शूद्र.

शूद्रांचेंह्ि्या कालाविभागांत अनेक पोटविभाग राहण्याच्या देशाव- रूनच नव्हे तर आणखी त्यांच्या हजारों धंद्यावरून पडले हें सांगावयास ॥ नकोच. प्रत्यक धंदा व पेशा यांनीं आपापली एकेक पोटजात बनवून ‘बिवाह-संबंध आपल्याच पोटजातींत मर्यादित केळे. यावेळेस अनु- लोम विवाहाची चाल पुढें सांगितल्याप्रमाणं तर अगदींच बंद पडली; ॥आणि प्रत्यक जात व पोटजात, ब्राह्मणापासून खालपर्यंत, विवाह आपल्यांतच करूं लागली. यामुळें, तसेंच जातिद्युद्धतेच्या कल्पना- ॥मुळें आणि खाण्यापिण्याच्या व इतर व्यवहारांच्या फरकामुळें सर्व हिंदुसमाजभर पोटजाते उत्पन्न झाल्या, प्रत्येक वर्णात म्हणजे मख्य व उप जातींत हजारां पोटजाते हछां हिंदुसमाजांत दिप्तत आहेत ॥व्या आमच्या समजुतीने या काठविभागांत ( १००० ते १२००) उत्पन झाल्या. पण यापूर्वीच्या कालविभागांत मुख्य व पोटजाति एकेएकच, भेद न पावलेली, सवे हिंदुस्थानभर असे, तेव्हां अलबेरूनीने जरी शास्त्रास अनुसरून चारच वर्ण सांगितले आहेत, तरी त्या वणांत पोटजाति उत्पन्न होण्याचा कळल त्याच्या वेळेस सुरू झाला ॥असावा, आणि प्रत्यक्ष विभाग त्याच्या नंतर पडळे असावेत.

अस्पृच्यजाति अत्यंत प्राचीन काळापासून बहिष्कृत म्हणजे अस्पुड्य ह्यांच्या ॥पुष्कळ जाति असत व ते नेहमीं शहराच्या व गांवाच्या बाहेर रहात. कोरीवलेखांत वारंवार नांव मेद आणि चांडाळ यांचें येतें, म्हणजे म. भा…३१७

५७४ सामान्य परिस्थिति.

भंगी आणि गर्दन उडवणारा. हे सर्वांत नीच मानले जात. पण अल्बेरूनीनें आणखी नांवें दिलीं आहेत. अस्पृश्यांचे तो पुढील प्रमाणें वर्णन करितो. “’ शूद्रानंतर अत्यंज म्हटलेल्या जाति येतात. या निरानेराळ्या प्रकारचीं खाळचीं कामें करितात आणि कोणत्याहि वर्णांत यांचा समावेश होत नाहीं. यांच्यांत आठ वर्ग आहेत, ते सरीस आपसांत विवाह करितात. फक्त धोबी, चांभार आणि कोळी ह्यांत आपसांत विवाह होत नाहीं. हे आठवर्ग येणेंप्रमाणेः:–धोबी, चांभार, गारुडी, टोपल्या व ढाली करणारे ( बुरूड ), कोळी, मासे- मारणारि, जंगळी पशु व पक्ष्यांची शिकार करणारे आणि कोष्टी. हे आठ वर्ग गांवाच्या बाहेर पण जवळच राहतात.

दुसरे ढोक हाडी, डोंब, चांडाळ आणि बघतो हवे कोणत्याच जातीं- त किंबा वर्गांत नाहींत हे गांवांतील अत्यंत खराब, म्हणजे झाडण्याचे काम करितात. यांचा एकच वर्ग मानला जातो. किंबहुना हे शूद्र बाप आणि ब्राह्मणी आई यांची गैरकायदेशीर झालेली संततीप्रमागें मानले जातात. यासाठींच ते बहिष्कृत आहेत ‘’ ( सजाऊ भा. १ ग…20:) ;

हा वरील उतारा असें दाखावितो कौ, अल्बेरूनीच्याहि वेळीं ( १०३० इ. ) दोन वर्ग अस्पृश्यामध्ये असत; त्यांत दुसरा अधिक नीच मानला जाई. किंबहुना खुर्दादबानेंह्ि (९०० इसवी ) अस्पु- ऱ्यांत दोन वर्ग चांडाळ आणि लहुड असे सांगितळे आहेत. दुसरा म्हणजे लहुड दोऱ्यावर नाचणारा ( नट ) आहे असं त्यानें वर्णिले आहे. तात्पर्य हा दुभेद फार जुना आहे, आणि लहुड जार्तांचे अट्बे- रूनीने सांगितलेले आठ वर्ग एका स्मरातिवचनांत दिलेले बरोबर मिळतात. यांत तिघांखेरीज आपसांत विवाह होत असत हें अल- बेरूनीचें वाक्य चमत्कारिक दिसतें आणि तें चूक असावें. निदान एकंदर हिंदु पोटजातींच्या रिवाजाप्रमाणे हछींच्या काळीं ते आप-

अस्पृद्यजाति. ५७५

सांत विवाह करीत नाहींत. धोबी, कोष्टी आणि बुरूड यांस अस्पृर्य कां मानेळें गेळें यांचे कारण मुळींच ध्यानांत येत नाहीं. त्यांस अगदीं अलीकडे पर्यंत अस्पृश्य मानीत हें मात्र खरें. यांचे काम मुळींच वाईट दिसत नाहीं आणि यांचा विवाह दुसऱ्याशी होत नसे असे अलबेरूनीनेंहि लिहिलें आहे. तेव्हां यांची अस्पृर्यता नांवाची असावी आणि हल्लीं ज्याअथी ते स्पृर्य झाळे आहेत, त्याअर्थी त्यांच्या यादींतील बाकीचे वर्ग अस्पृश्य राहण्याचे कारण दिसत नाहीं. डोम आणि हाडी हा शब्द स्मृतींत सांपडत नाहीं, बघतो शब्द तर अश्रुत आहे. या चार अस्पृश्य जाति घाणेरडे काम करितात आणि यामुळेंच त्यांस अधिक अस्पृर्य मानलें गेलें असावें.

आम्ही अन्यत्न दाखविल्याप्रमाणे जातींची संस्था वंशा आणि धंदा |. या दोन्ही भेदावर बसाविली आहे. पहिले तीन वर्ण वंशानं आर्य असून शूद्र वर्ण आणि अस्पुर्य द्रविडवंशी आहेत. धंद्यांचा विचार करितां ब्राह्मणांचा धंदा याजन आहे आणि क्षात्रियांचा युद्ध आहे. वैशयांचा प्राचीनकाळीं धंदा कृषि होता; परंतु बोद्ध काळांत त्यांत कामेहल्या घडत असल्यानें तो त्यांनी सोडला (भा. २ पा. १८२ पहा ). मध्ययुगीन काळांत कृर्षांचा धंदा शूद्रांकडे गेला आणि खुर्दा- दबानें ९०० इसवींत शूद्रांचे वर्णन शेती करणारे असेंच केलें आहे तें बरोबर आहे ( सदर पा. १७२ ), पण वैऱ्यांनीं शेती सोडल्या- नंतर मध्ययुगीन काळांत कित्येक ब्राह्मण व क्षत्रिय यांनीं शेतकी घरली आणि पराशरस्मृतीमध्ये एका विशिष्ट वचनानें तसें करणें मान्य केळे गेळें (भा. २ पा. १८३ ). परंतु यामुळें त्यांचा दजी कमी होऊन गूद्रांप्रमाणें ते लेखठे जाऊ लागले. अशी स्थिति हिमाल्यांत विशेषतः: व दक्षिणेंत दिसते. कांगड्यांत आम्हांस असें सांगितले गेठें की, नगरकोटिया ब्राह्मण तदेशीय ब्राह्मणांशीं रोटीबेटी- व्यवहार करीत नाहींत. कारण ते होती करतात किंबहुना मुजरीचे

०५७६ सामान्य परिस्थिति.

काम करितात, हिमालय प्रदेशांतील शेती करणारे राठी हे तिसऱ्या दजाचे क्षत्रिय आहेत असे मानले जाते, वरिष्ठ दर्जाच्या क्षत्रियांस मुली देण्याचा त्यास अधिकार आहे; ‘ पण त्यांच्या मुली घेण्याचा अधिकार नाहीं. ओरिसांत नवीन आलेल्या ब्राह्मणांनी तदेशी शाती करणारे ब्राह्मण शूद्र मानिळे हें आपण पाहिळेंच आहे (भा, २). दक्षिणेंतहि कांहीं शती करणारे ब्राह्मण आहेत; त्यांस नीच मानलें जाते. आणि शेती करणारे क्षत्रिय, माळी आणि इतर, यांस शूद्र अयोग्यरीतीनें ठेखिले जाते.

ही गोष्ट सांगण्यासारखी आहे की, राजपुतांचा मुख्य धंदा युद्धाचा असला तरी या कालविभागांत राजपुतांनी आपलें नांव शोयांनेच नव्हे तर विद्दत्तेनेंह्दि गाजविले. किंबहुना कांहीं विद्वान्‌ प्रसिद्ध राजे या कालांत असे झाले कौ, त्यांचे नांव निरनिराळ्या विषयावर्राल त्यांच्या ग्रंथांना अजरामर झालें आहे. भोज, गोविंदचंद्र, बल्लाळ व लक्ष्मणसन, अपरादित्य, सोमेश्वर चालुक्य, राजंद्र चोल यांच्या काते कालसमुद्रावर अद्याप तरंगत आहेत आणि वाचकांस आनंद व ज्ञान देत आहेत. गायन व नृत्य यांची कला या काळीं वृद्धिंगत झाली. अनेक राजांनीं आश्रय दिल्याने काइमीरचा हर्ष, माळ- व्याचा उदयार्देत्य ब सर्वांत अधिक तंजावरचा राजराज यांनीं तीस चचांगळा आश्रय दिळा. गायन व नृत्य यांबद्दल तंजावरची अद्याप ख्याति आहे. तात्पथ क्षत्रिय ब्राह्मणांच्या बहुतेक बरोबर आहेत असं अट्बेरूनीनें केलेलें वर्णन सत्य आहे. ते शस्र व शास्त्र या दोन्ही विद्येत प्रवीण असून आर्यवंशाचा विशेष गुण म्हणजे स्वातंत्र्याची चाड व ज्ञानाची प्रीति या बद्दलची त्यांची परंपरागत ख्याति त्यांनीं कायम ठेविली.

प्रकरण दुसरं. विवाह वमैरे चालींत बदल.

या कालविभागांत हिंदूच्या विवाहाच्या रीतींत अत्यंत महत्त्वाचा फरक पडला. पृवे शतकांत ब्राह्मणक्षत्रियांस आपल्या खालच्या वणाच्या स्त्रिया करण्याचा अधिकार असून त्याप्रमाणें ते करीतहि असत. ९०० इसवी सुमारें ल्हिणारा खुदादबा हा सुद्धां लिहितो कीं, ब्राह्मण कतरिया ( क्षत्रिय ) यांच्या मुली घेऊ शकतात पण ते त्यांस आपल्या मुली देत नाहींत; आणि ९०० इसवीच्याच सुमा- राचे चव्हाण स्रीशीं लयन केल्याचे राजशेखराचें प्रसिद्ध उदाहरण आपल्या समोर आहे. पण अल्बेरूनी लिहितो, ‘‘हिंदूळा पूवी आपल्या खालच्या वणोच्या स्रिया करण्याचा अधिकार होता. पण आमच्या काळांत ब्राह्मणांत खालच्या जातीची स्री कधीं करीत नाहींत. !”’ साहजिकच सर्वे जातींत व पोटजातींत जातीच्या बाहेर विवाह करणें बंद झालें. ही मर्यादा कां उत्पन्न झाली याचें कारण स्पष्ट दिसत नाहीं. बहुधा खालच्या जातींच्या स्त्रियांच्या संत- तास जो कमी दर्जा नवीन स्मृतिवचनांनीं दिला गेला त्यापासन ही अडचण उत्पन्न झाली असावी. अलबेरूनीनेहि या कमी दजाचा उल्लेख “ अशा खालच्या जातींच्या स्त्रियांची संताते आईच्या जातीची मानली जाते ‘! या वाक्यांत सांगितला आहे. उदाहरणाथ, एकाच घरांत ब्राह्मण बापाला ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैऱय अशीं मुळें होऊं लागली. भाग २ यांत दाखाविल्याप्रमाणें मनुस्मृतिनियमानं हीं सर्व मुलें ब्राह्मणच समजलीं जात होतीं. किंवा क्वचित्‌ प्रसंगी आईच्या जातीपेक्षा श्रष्ट पणं मधल्या जातीची मानली जात. ब्राह्मण, क्षत्रिय व वैऱ्य यांच्या खानपानव्यवहारांत याचवेळीं भेद उत्पन्न झाला

५७८ सामान्य परिस्थिति.

विशेषतः मध्यदेश व दक्षिण हिंदुस्थान यांर्ताल ब्राह्मण-वैऱ्यांनीं

मांसाहार सोडला. अर्थात्‌ अशा मिश्र कुटुंबांत अडचण पडूं लागली असावी. त्याचा परिणाम साहजिकच असा झाला कीं विवाह त्याच जातींत किंबहुना जार्तांच्या पोटविभागांत मर्यादित झाला.

हिंदु समाजांत दुसरा महत्त्वाचा फेरबद्दल असा झाला कीं, बाल- विवाहाची चाल ज्यास्त रूढ झाली. बालविवाह प्रथम केव्हां होऊं लागले हव निश्चयाने सांगतां येत नाहीं. अलबेरूनीच्या काळी बालविवाह सर्वत्र रूढ झाले होते हे निश्चित आहे.. कारण तो म्हणतो ( सचाउ भा. २ प्रा. १९ पा. १५५) ‘“’ हिंदूमध्ये लयन लहान वयांत होतात आणि यामुळें मुलांची लग्ने आईबाप ठरवितात. ” हाच व्यवस्था हल्लींहि अमलांत आहे. हें अल्बेरूर्नाचे बिधान प्रत्यक्ष निरीक्षणाचें आहे, स्मृत्यांवरून केलेलें नाहीं. पण पराशरस्मृतीचे वाक्य “ अष्ट- वर्षामुद्ववहेत *, मुलींची वयोमर्यादा आठ वर्षें ठरविणारे, त्याच्या पूर्वीच उत्पन्न झाळें असावें, प्रथ्विराजाचें पाहिलें लयन बालविवाह होते हं आपण पाहिलेच आहे. कल्याणच्या विक्रमांक चालक्पाच्या मुलाचे लग्न गोव्याच्या कंदब युवराजाशीं झालें तेंहि बालविवाहच होतें. रज- पुतांमधील अश्या उदाहरणांवरून त्यावेळच्या सर्व हिंदूंत बालविवाह प्रचाळित होता. बाणानें राज्यश्रीच्या विवाहाचे वर्णन इ. स. ६०० मध्यें केळें आहे, त्यांत राज्यश्री पूणवयांत आठेली असून विवाहसमा- रभांत लम़ाच्या दिवशींच संभाग झाल्याचे वर्णन केलेलं आहे. तेव्हां ६०० पासून १००० इसवींपर्यंत बालविवाह रूढ झाळे असें दिसतें. ते कां रूढ झाळे याचे कारण सांगणें कठीण आहे. १०३० त बालविवाह पूर्ण रूढ होते, तेव्हां मुसलमानांच्या जुलमामुळें ते रूढ झाले असें जें किल्येक म्हणतात तें बरोबर नाहीं. आम्ही अन्यत्न म्हटलें आहे त्याप्रमाणें स्रियांस बौद्धभिक्षणी होऊं न देण्या- साठीं ही चाल लोकांत प्रचारांत आढी असावी. बोद्धधर्माने वयांत

यामा या ताड, भा

1

विवाह वगेरे चालींत बदल. “८७९

। आलेल्या अविवाहित सत्रांस मिक्षणी होण्याचा अधिकार असे. तेव्हां । मुर्लाचें लहान वयांतच लग्न करण्यानें याचा प्रतिकार होत असल्या- । मुळे असेच विवाह लोकांस आवडूं लागळे, आठव्या व नवव्या शत- । कांच्या अंती बौद्धधम नष्ट झाला तेव्हां बालविवाहाचा प्रचार लोकांत जास्तच रूढ झाला असावा. असो, कारण कांहॉहे मानलें तरी । या कालविभागाच्या आरंभीं बालविवाह रूढ झाले होते आणि या । कालांत ते जास्तच प्रचारांत आले.

क्षत्रिय आणि वैश्य यांमध्यें शाखा आणि गोत्र या कालविभागांत नष्ट झाळे, आणि त्यांच्या निरानराळ्या पोटजातींनीं आपल्यांतील कुलें म्हणजे नुख नांवानीं परिगणित केले आणि कुलाच्या व नुखाच्या बाहेर पण पोटजार्तांच्या आंत विवाह करावा असा निबैध केला. हाच निमय हल्लीं अमलांत आहे. या नियमांचे अनुकरण शूद्रांच्या किंब- हुना अस्पृर्यांच्या सर्व पोटजातींनीं केळे. सारांश सर्व हिंदु समाजांत त्याच जातीस किंबहुना पोटजातीस किंबहुना पोटजातीच्या पोट- विभागास विवाह-संबंध मर्यादित झाले. अर्थात्‌ हिंदु समाजांत एक- त्वाची सहानुभूति नष्ट झाली आणि हिंदु लोक यामुळें समाज या दृष्टीनें नेहमींच दुर्बल रहात आळे आहेत. पूर्वी सांगितल्याप्रमाणें हिंदूंतील वर्णविभाग नष्ट करणें अशक्‍य आहे, कारण हा विभाग भिन्न मानव- वंश व भिन्न कर्म यांवर रचला आहे. परंतु पोटजातींची संख्या कमी करणें ह॑ शक्‍य व जरूर आहे. निरानेराळे पोठविभाग रक्ताच्या झुद्धतच्या चमत्कारिक कल्यना किंवा इतर वेडसर कारणे यानीं उत्पन्न झाळेळे एकत्रित होण्यास मुळा’च हरकत नाहीं.

आर्यवणीमध्ये हिंदुळाकांत प्राचीन काळापासून विधवा-विवाह- प्रतिषेध प्रचलित आहे. हा वैदिक सूत्रां इतका किंबहुना वैदिक संहितां इतका जुना असेल, अल्बेरूनी आपल्या काळाविषयीं ठिहि- तांना ““विधवांस पुनर्विवाह करितां येत नाहीं, त्या सती जातात किंवा

५८० सामान्य परिस्थिति.

तपर्स्वार्रातीनें आयुष्य कंठितात ‘’ असें योग्य रीतीनें लिहितो. | (सचाऊ भा. १ पा. १५५). तो आणखी लिहितो कौं, “राजांच्या | विधवा फार वृद्ध नसतील तर किंवा त्यांचे पुत्र जिवेत नसतील तर । बहुधा सती जातात. ‘” बालविवाहाची नवी चाल व विधवा विवाहइ- निषेधाची जुनी चाल यांच्या एकीने लौकरच वरिष्ट वर्णांच्या हिंदूत बालविधवारूपी अनुकंपनीय स्थितींतल्या स्रिया दिसू लागल्या. आणे । आश्चर्य हें कौ, संमोगापूर्वी वैधव्य आल्यास त्या मुर्लांचा पुनर्विवाह करावा असा मनुस्मतीचा नियम असून तोहि ह्यवेळीं बंद पाडला । या कलिवर्जाबद्दल आम्ही पुढें लिहिणार आहोंत, व तें या काल- | विभागांत उत्पन्न झालें असें दाखविणार आहोंत. बालविधवांचा पुनाविवार्हाहे कां बंद केला गेला हें कल्पनातीत आहे

हिंदूस चारपेक्षां जास्त बायका करितां येत नाहींत असें अट- बेरूनी लिहितो तें चमत्कारिक आहे. बायकांच्या संख्येबद्दळ धर्म शास्त्रांत कोठें नियमन नाहीं व परंपरंत व इतिहासांतहि दिसत नाहीं. विशेषतः राजे लोक वाटर्ताळ तितक्‍या बायका करीत आणि प्रत्यक्ष श्रीकृष्णाला १०८ राण्या होत्या. पृथ्बिराजाला सुद्धां आठा- पेक्षां आधिक राण्या असल्याचें वर्णन रासांत आहे. हिंदूंत घटस्फो- टाची चाळ नाहीं ही गोष्ट मात्र अलबेरूनीने लिहली आहे. ही व्यवस्था हिंदूतच दृष्टीस पडते आणि ती अद्यापहि तशी कायम आहे हं त्यांस निःसंशय भूषणावह आहे.

हिंदुलोकांत आप्तांशीं यम करीत नाहींत, बाहिरच्याशीं करितात असं अलबरेरूनीहि लिहितो ( सचाऊ भाग २ पा. १५५ ). गो- त्लाच्या बाहेर परंतु जातीच्या आंत विवाह करावा असा जो निबंध आहे त्याचा हा अनुवाद आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जातीच्या बाहेर विशेषतः खालच्या जातीशी विवाह करणें यावेळीं निषिद्ध होतें. परंतु एकाच जातींत आचारावरून व रक्तशुद्धतेच्या कल्प-

क जळ ९ विवाह वगर चालात बदल. ५८१

नांनीं कित्येक विभाग पडले, त्यामुळे या कालविभागांत बंगाल्यांत कुलीन विवाहाची विलक्षण पद्धत उत्पन झाली. बछाळसेनानें पांच

ब्राह्मण व पांच कायस्थ कुटुंबे बाहेरून आणलीं. तो हिंदुधर्मशास्त्रांत

स्वतः प्रवीण असल्यानें त्यानें अशी आज्ञा केली कीं, स्थानेक जाति रक्तशुद्धतेंत व आचारांत हीन असल्यानें त्यांच्याशीं यानीं विवाह करूं नये. परंतु काळांतरानें हळूहळूं ह्याहि कुटुंबांतील मुलो श्रष्ट मानलेल्या कुटुंबांत जाऊं लागल्या आणि हे कुलीन नवरे आंद-

‘णाच्या ठाळचीनें अनेक बायका करूं लागळे. बंगाल जनेळ ३४ यांत एका लेखकानें असें लिहिलं आहे कीं ही परवानगी लक्ष्मण-

सनाच्या वेळीं मिळाली. तो असेंहि म्हणतो कीं, हीं बाहेरचीं कुटुंबे आल्यापासून आतांपर्यंत २८ पिढ्या झाल्या आहेत

विवाहासंबंधीं अल्बेरूनीचें सर्वांत चमत्कारिक विधान असें आहे कीं, हिंदुलोकांत रंडीबाजीची परवानगी आहे, भाग २ पा. १८५

। वर खुदांदबाचें असेच विधान दिलेलं आहे. याचा अर्थ त्याच्या मतें

असा दिसतो कीं हिंदुस्थानांत व्यभिचाराला शिक्षा नाहीं. सर्व देवळांत, विशिषतः शिवाच्या मंदिरांत, वेश्‍या पूजेच्या वेळीं नाचण्यासाठीं वाहिलेल्या वैऱ्या-अतत हें खरें. आणि या मंदिरा-

। “पासून राजे लोकांस पुष्कळ उत्पन्न असे. परंतु अल्बेरूनीची अशी । समजूत दिसते कौ, देवळांत वेश्या असल्यानें ज्यास्त लोक दर्शनास

येतात आणि देवळाचं उत्पन वाढतं. अलबेरूनी चांगुळपणानें आणखी

-असं लिहितो कीं, “ ब्राह्मण लोकांचें चाळेळ तर ते देवळांत एकाहि । वेश्येस नाचू देणार नाहींत. पण राजे लोक शिपायांस पगार देण्या- । साठीं उत्पन्नाच्या लालळचीनें परवानगी देतात ‘’ पण ह म्हणणें

आमच्या मतें ब्राह्मणांसंबंधीं किंवा राजासंबंधी खरें मानतां येत नाहीं. हिंदुळोकांच्या या वेळच्या दुसऱ्या चालीरीति वर्णन करतांना

“प्रथम सर्तांच्या चालीचा उल्लेख केळा पाहिजे. ही चाळ यावेळीं

५८२ सामान्य परिस्थिति.

जिवेत व सर्वत्र प्रसृत होती. तसेंच वृद्धपणीं गंगेंत किंवा इतर
पवित्र नदींत बुडून प्राण देण्याची चाल ह्यावेळी होती. कल्याणचा
सोमेश्वर या सारख्या कित्येक राजांनींहि ह्यारीतीनें प्राण दिल्याची
उदाहरणें आहेत. प्रयाग येथील गंगायमुनासंगमावर असलेला वट-.
वृक्ष अजून प्रसिद्ध होता व अलट्बेरूनांने त्याचा लललेख केला आहे.
ब्राह्मणांस व क्षत्रियांस जळून मरणें हें एका. विशेष वचनानें मना आहे म्हणून ते गंगेंत जलसमाधि घेतात’’ हें त्याचें आणखी विधान ( सचाऊ भा. २ प्र. ६५ पा. १५८ ) लक्षांत ठेवण्यासारखे आहे. या विशेष वचनाचा या विषयावरील कलिवर्जवचनाकडे कटाक्ष दिसतो. ( भृगतश्िपतने श्रैव वृद्धादिमरणं तथा ). या वाक्याचा शब्दशः अर्थ लावला तर वृद्धळोक व इतर यांनीं अग्नींत किंवा कड्यावरून उडी टाकून मरू नये असा होईल. अर्थात्‌ नदींत बुडून मरण्याची पर- वानगी कायम राहिली. कांहींहि असो, अलबेरूनींच्या या विधानांत कलिवर्जवचनाचा स्पष्ट उल्लेख आहे.

पोशाख व अलंकार या संबंधी विशेष लिहिण्यासारखें नाहीं. कारण अल्बेरूनीच्या ग्रंथांत ह्या विषयावर विशिष्ट विधाने आम्हांस मिळालीं न!हींत, भाग २ यांत सांगितल्याप्रमाणें सिंध, पंजाब आणि जवळचे प्रदेश यांतील लोकांचा पोशाख मिश्र असावा, म्हणजे हिंदूचा जुना पोशाख दोन धोतरें ह्याशिवाय कुडता व तुमान हीं. ञ्यास्ता असावीं. दागिन घालण्याचा सोस लोकांत पूर्वीसारखाच कायम होता. सासबाहु देवळांतील लेखांत ( इं. ए. १६ ) देवाच्या अलंकारांचे जे वर्णन आहे त्यावरून राजे लोकांत व श्रीमंतांत कोणते दागिने वापरीत याची कल्पना होईल. पण कनोजच्या खस्र्रियांच्या पोशाखांचे मनोरंजक वर्णन राजशेखरानें काब्यमीमांसेंत पुढीलप्रमाणें केलें आहे. “ कानांतळे तांटक गालांवर नाचत असून गळ्यांतील लांब हार, नाभीपर्यंत असठेला, हृळत आहे आणि उत्तरीय गुल्फा-.

विवाह वगेरे चालीत बदल. ५८३

पासून कंबरेपर्यंतच्या सर्व भागाभोवती गुंडाळलें आहे, अशा रीतीचा ‘कनोजांतील स्ररियांचा ६.५४ नमस्कार करण्यासारखा” आहे, याव- रून असं दिसतें कीं उत्तर हिंदुस्थानांतल्या स्रिया दोन वस्त्रें वाप- ‘रीत. पैकी उत्तरीय खांद्यावरून घेतलेले असेंच, परंतु पायांपर्यंत ‘खालचें शरीर सर्व त्यानं झाके. चहरा मात्र उघडा रहात असावा

त्याशिवाय तांटक दिसणार नाहोंत; आणि हार उत्तरीयावरून घालीत असावेत. दक्षिणच्या स्रियांना ( गुजराथेसुद्धां ) उत्तरीय हछीं असत नाहीं, पण त्यांचें एकच वस्त्र इतकें लांब असतं कीं उत्तरीयाचेंहि काम त्यानें होतें. उत्तरेस आणि गुजराथेंत तांड झांकण्याची जी चाल ‘आहे ती मुसलमानी काळांत मागाहून उत्पन झालेली दिसते

शेबटीं लोकांच्या अन्नाविषयीं आम्ही पूर्वी विस्ताराने लिहेळंच आहे. उत्तरेकडील ब्राह्मण कांहीं विशिष्ट प्राण्यांचेच मांस खात

।पण दारू निषिद्ध मानीत. दक्षिणेंत ब्राह्मण दोन्ही निषिद्ध मानीत. किंबहुना जैन धर्म बराच प्रसृत असल्यानें व वैश्य बहुतेक जेन असल्यानें ब्राह्मणांनीं जैनांचे अनुकरण केलें ब आहेंसा तत्त्वाचा पूर्ण आणि न्यायप्राप्त पुरस्कार केला असें म्हणतां येईल. या काल- विभागांत अहिंसा तत्त्वाची लाट हिंदुस्थानावर परतळेळी होती आणे जिनांशिवाय वैष्णव आणि लिंगायत हेहि पक्के शाकाहारी बनले

यामुळें रोटीव्यबहारहि जातांच्या जातींत मर्यादित झाला. पृवेकाळीं ब्राह्मणांना क्षत्रिय, वैय किंबहुना कित्येक सच्छूद्र यांचें अन्न खाण्यास इरकत नव्हती तर ह्या कालांत ते आपल्याच जातात (केवा पोट- ।जातींत अन्नव्यवह्वार करूं लागले. तात्पर्य हिंदुसमाजाचे या काल- विभागांत निरानेराळे पोटविभाग पडून त्यांत रोटी व बेटी हे व्यव- हार बंद पडले.

  • ताटंकवल्गनतरंगितगण्डलेखमानामभिलंम्बिदरदोलिततारहारम्‌ ।

। अश्रोणिगुल्फर्पारमेंडलितोत्तरीयं वेश नमस्यत महोदयसुंदरीणाम्‌ ॥

“८४ सामान्य परिस्थिति.

अहिंसेचा क्षत्रियांवराहे पगडा बसला आणि कांद्दींनीं ठराविक दिवशीं मांस वर्ज केलें. कांहीं थोडे वैष्णव क्षत्रियह्ि आहेत; ते मुळींच मांस खात नाहींत. दारू न पिण्याविषयीं त्यांचा पूर्वींचा लौ- किक राहिला नाहीं असें दिसतें. (मागच्या कालविभागांतीळ अरब लेखकांनीं राज्य करणारे क्षत्रिय दारू पित नाहींत असें लिहिलें आहे). कारण अल्बेरूनी लिहितो, “’ कांहीहि खाण्याच्या पूर्वी ते. दारू पितात आणि मग जेवावयास बसतात. ‘’ (सचाऊ व्हा १

१८० ). हें विधान सर्व हिंदूसंबधीं केलेलें दिसतें, पण तें. क्षत्रियांसच लागू केलें पाहिजे, याच्या पुढचे विधान “ ते गोमांस खात नाहींत’’ हे सवे हिंदूना लागू आहे. हिंदूंनी फार प्राचीन काळा- पासूनच गोमांस वर्ज केलें आहे व गोमांसभक्षण महापातक मानेलें आहे. गाईंबेलांची हिंसाहि प्राचीन काळींच बंद झाळेली आहे; आणि या काळीं अहिंसेची लाट परत फिरली असल्यानें गोहत्या- निषेध हें हिंदुधमांचें एक महान्‌ तत्त्वच बनलें. हृींप्रमाणेंच या नाजुक प्रश्नावर हिंदुमुसलमानांचें त्यावेळींहि वेर असावें |

हल्लीं प्रमाणेच तेव्हांहि हिंदु प्रेते जाळीत व सुतके ळ अल्बेरूनीनें जन्माचे सुतक सांगितलें आहे. ब्राह्मणाला आठ दिवस, क्षत्रियाळा बारा, वेश्याळा पंधरा व शूद्राला एक महिना; हे थोडें चमत्कारिक दिसतें. स्त्रियांच्या रजस्वला स्थितीतींल चार विटाळाचे दिवस यांचाहि उल्लेख त्यानें केटा आहे. ‘गोंदान म्हणजे केशकतेन विधि तिसऱ्या वर्षीं होत असे आणि कर्णच्छेदन सातव्या किंवा आठव्या वषी.’ ही दुसरी चाल हिंदुळोकांतच असून ती विशेषतः मुसलमानांहून त्यांचा भेद दाखविते, अल॒बेरूनीनें गर्भाधान संस्का- राचाहि उल्लेख केला आहे. बालविवाह प्रचारांत आल्यानं या संस्काराचे महत्त्व वाढलें असावें.

प्रकरण तिसरें- धमैक्यनाश व धार्मिक द्वेष.

। जर पूर्वींच्या कालविभागांत सिंधखेरींज सर्व हिंदुस्थानांत एकच । धर्म म्हणजे हिंदुधम असल्याची सुखप्रद स्थिति होती, तर ह्या ॥ कालविभागांत पुनः हिंदुस्थान पूर्वीच्या तीन धम असल्याच्या दुःखद ॥ स्थितींत, आणि प्रद्येक धर्मात विशषषतः हिंदुधर्मांत भिन भिन्न द्वेष कर- । णारीं मतें असल्याच्या शोचनीय स्थितींत,जाऊन पडला, या कालवि- । भागांत सिंधखेरीज गझनी, काबूल आणि पंजाब या प्रांतांत मुसलमानी

धर्माची सत्ता चाळू झाली, आणि गुजराथ आणि राजपुताना यांत जैनधर्माची सत्ता चाळू झाली. ( दक्षिणेंत मात्र जैनधर्म मागे पडला) ॥ आणि हिंदुधर्मांच्या अन्तर्गत निरनिराळीं तत्त्ज्ञानें आणि निरनि- | राळ्या देवांच्या उपासना यांत तंटे उपस्थित होऊन ते विकोपास गेले, अर्थातच मजबूत राष्ट्राचे जै एक मुख्य लक्षण धर्मैक्य तें नाश पावून हिंदुस्थान दुर्बळ झाळें. ह्या प्रकरणांत वायव्येकडे मुसलमानी ॥ धर्माचा प्रसार आणि पश्चिमेकडे जैनधर्माचा प्रसार आम्हास वर्णन करणें आहे, तसेंच हिंदुधर्मांच्या अन्तर्गत उत्पन्न झालेल्या द्वेषयुक्त मतांचे वर्णन करावयाचें आहे.

मुसलमानी धमे । गझनी येथें मुसलमानी तुकी राज्य स्थापन होऊन सबुक्‌तगीन आणि महमूद यानीं काबूल आणि पंजाब प्रांत जिंकले हे आम्ही ॥ पूर्वींच वणेन केलें आहे. याचा परिणाम असा झाला कीं, “ गोर- भारत ? ( सिंधूच्या पश्चिमेकडील भाग काबूल व झाबूल ) हा तर मुसलमानी झालाच पण पंजाबचोहे स्वातंत्र्य नष्ट होऊन तेथील

५८६ सामान्य परिस्थाते.

लोकांचा बराच मोठा भाग जबरदस्तीने मुसलमान केला गेला. ही गोष्ट ह्या कालविभागाच्या प्रारंभी (९७५ ते १०२५ इ. ) घडली. सबुकत्‌गीन आणि महंमद या दोघांनींहि जिंकलेल्या प्रांतांतील लो- कांस जबरदस्तीने मुसलमानी धर्मात खचण्याची नीति, एक राज- कीय सोय या दृष्टीने आणे दुसरें धमाच्या कडवेपणाने, चाल- विली. येथील लोकांनीं अश्या जबरदस्तीच्या बाटाविण्यास केलेला विरोध दुर्बळ होता, याचें कारण बहुधा येथील लोकांची हिंदुधम भावना-विशेषत: सिंधुनदाच्या पाश्चिमेस-दुर्बळ होती. हे पश्चिमेकडचे लोक हीं इतके पर्णपणे मुसलमान झाले आहेत कीं ९०० वर्षा- पूर्वीच आम्ही हिंदु होता-घोरच्या डोंगराळ प्रांतांताहि हिंदु होतो-ही गोष्ट ते अजिबात विसरले आहेत. अफगाण आणि पठाण हल्लीं असं मानतात कौं असीररया व अरबस्थान येथून आलेल्या सेमेटिक लोकांचे आम्ही वंशज आहोंत.परंतु पंजाबच्या पाश्चिम भागांतील लोक बहुतेक मुसलमान झाळे असले तरी त्यानीं मात्र आपल्या राजपूत अगर जाट जार्तांची जुनीं नांबें कायम ठेविठीं अहेत, आणि आपले विवाह संबंध आपल्यासच मर्यादित ठेवढे असून हिंदु काळांतील कांहीं |वोधे ते अद्याप पाळतात. सत्रे पंजाब प्राधान्याने मुसलमान या काळाच्या शेवटीं झाला ( १२०० इ, ); कारण शिहाबुद्दीन घोरीनाहे बऱ्याच अंशीं पूर्वा चीच जबरदस्तीने जितांस मसलमान बनावेण्याची नाते चालविली. पंजाबचा डोंगरी प्रदेश मात्र आणि कार्मीर हा स्वतंत्र असल्यानें हिंदु राहिला.

पंजाबच्या पूर्वेमागांत जबरदस्तीनें बाटाविण्याची नीति पश्चिमे इतक्या जोरानें चालविली गेली नाहीं हे आपण पाहिलेंच आहे. शिहाबुद्दिननेंहि तसेंच केळे. सरस्वती, यमुना आणि गंगा यांच्या प्रदेशांत ही नीति तर बहुतेक टाकून दिळी गेली. यामुळें संयुक्त प्रांत मुख्यतः अद्याप हिंदु आहे. हा नीर्तांत बदळ कशामुळें झाला

धघमेक्यनादा व धार्मिक द्वेष. ५८७

याचीं कारणें अशीं दिसतात कीं ( १ ) मुसलमानी धर्मवेडे

सद्धा दसऱ्यांस जबरदस्तीने बाटावण्याच्या कामांत थकून जातात (२) कदाचित्‌ लोकांस, विशेषतः राजधानापासून दूर असलेल्या प्रांतांतील लोकांस, धर्मांत दुभंगळेळे ठेविल्यापासून राजनीतिदृष्टया फायदा आहे हें महमुदाच्या लक्षांत आलें असेल (३) कुतुबुर्दान आणि अल॒तमश हे धमेवेडे मुसलमान नसून शाहाणे राज्यक्त होते. त्यांस इंप्रज लोकांप्रमाणेच लोकांच्या धर्मांत हात न घालणें न्यायाचे व शहाणपणाचे आहे हें समजले दिसतं. (४) शेवटचं कारण हं कीं येथील लोकांची हिंदुधर्मभावना पंजाबांतील लोकांपेक्षा व त्याहून सिंदुनदीच्या पळीकडच्या लोकांपेक्षा जास्त जोरदार होती. हा प्रदेश ब्राह्मणी धर्मांचे जन्मस्थान आहे. हिंद तत्त्वज्ञानाच्या आचार्यांची ही उपदेशभूमि आहे. हिंदूनी इश्वराचे अवतार मानलेले राम व कृष्ण यांचें जन्म-कम-क्षत्र हेंच आहे. या अनेक कारणांनी आम्हांस असें वाटतें कीं, या प्रांतांतील लोकांच्या धमात अडथळा आला नाहीं; आणि यामुळें ते अद्याप सर्व हिंदुस्थानच्या हिंदु लोकांमध्यें धरमनिष्ठेत बलवान्‌ आहेत. या प्रांतांतील ह्यांचे मुसलमान लोक बाटलेल्या हिंदूचे वंशज नसून अफगाण किंवा मोंगल दिल्लीपतींच्या राज्याच्या काळांत अधिकारी नात्यानें आलेल्या मुसलमानांचे वंशज आहित अथात्‌ हे त्या प्रांतांत अल्पसंख्याक आहेत आणि जो हिंदुस्थानचा राजकीय नकाशा या भागास आम्ही जोडला आहे त्यांत हा प्रांत हिंदु समजण्यास हरकत नाहीं. पूर्वेकडे बंगाल्यांत जबरदस्तीने बाट- विण्याची पद्धत यापुढें ‘खिळजी सुभदारानीं व ल्या पुढील राजांनीं चालविली आणि यामुळें कांहींसा बंगाल्यामध्यें मुसलमानी लोकांचा जमाव अधिक आहे. परंतु ही गोष्ट आमच्या कालवबिभागानंतर झाली, यामुळें वर सांगितलेल्या नकाशांत बंगाल प्रांत हिंदूच सम- जला पाहिजे, याप्रमाणे सतलजपासून ब्रह्मपुत्रापयंत आणि हिमा-

५८८ सामान्य परिस्थिति.

लयापासून विंध्यापर्यंत या कालावभागाच्या प्रारंभी हा सर्व प्रदेश

हिंदु होता तरी या काढविभागाचे शेवटीं धर्मोरचे ऐक्‍य या प्रदेशां- तहिं गुजराथ आणि राजपुताना या प्रांतांत जैन धर्माचा प्रसार आणि बंगाल्यांत वैष्णव धर्माचा प्रसार झाल्यानें नष्ट झालें, जेन- धर्माचा एका प्रांतांत प्रसार व दुसऱ्या प्रांतांत संकोच कसा झाला याचा इतिहास मनोरंजक असून त्याचीं कारणें काय झाली छद आम्ही उपलब्ध ऐेतह्यासिक पुराव्यावरून येथें सांगण्याचा प्रयत्न करितों. हा इतिहास नीट समजण्यासाठीं जैनधर्माच्या उदयापासून या कालविभाग!पर्यंत त्याच्या प्रसाराचा इतिहास थोडक्यांत देणें अवश्य आहे. जेनधमे.

जैनधमे व बौद्धधर्म यांचा घोटाळा कित्येक पाश्चात्य विद्वान्‌ व कित्येक पुराणांचे लेखक करतात. कारण दोघांचेंहि बलवान्‌ तत्त्व अहिंसा आहे आणि बुद्ध ( बोध झालेला ) आणि जिन ( जिंक- णारा ) हीं नांवें दोघानांहि . लावलेली आळतात ( उदाहरणार्थ बुद्धो जिनःपातु व: ). तसेंच मह्ावीराच्या अनुयायांस जैन हें नांव मागून पडळें आहे, पूर्वीचे त्याचें नांव निग्नेंथ होतें. शिवाय महा- बीर आणि गोतम हे समकालीन होते. तथापि यांत हेका नाहीं कीं गोतम दोघांपैकी अलीकडचा होय. वैदिक धर्मांच्या विरुद्ध बंड कर- णारा दोबटचा तत्त्वज्ञानी बुद्द होय आणि महावीर काळ आणि विचार ह्या दोन्ही दृष्टीने त्याच्या पूर्वीचा होय. वैदिक धर्माच्या कोण- कोणल्या मुद्यांचा यांनीं निषेध केला हें आपण पाहूं. उपनिषदिक तत्त्ववेत्यांनीं विश्वाच्या अत्यंत श्रेष्ठ आध्यात्मिक प्रश्नांबद्हद विचार करून कांद्दी सिद्धांत यावूर्वींच प्रातिपादन केळे होते; तरी ते अद्याप वैदिक धर्माला चिकटून होते. या ओपनिषदिक विचारासह वैदिक धमात मान्य असलेळे पुढीळ मुद्दे आहेत. ( १) वेद परमेश्वराने

धर्मेक्यनाहा व धार्मक दवेष. ५८९

उच्चारठेडे आहेत. (२) वेदांतील देव इंद्र, वरुण इत्यादि आणि उत्तर वैदिक कालांत शिव आणि विष्णु हे पूज्य आहेत, (३ ) या वैदिक देवतांची हिंसायुक्त वैदिक यज्ञांनीं पूजा करणं अत्यंत श्रियस्कर आहे ( ४ ) चातुबण्यव्यवस्था ईश्वरनिर्मित असून यज्ञकर्म चालविणारे ब्राह्मण धर्मदृष्टया श्रेष्ठ आहेत. (५ ) आश्रम चार असून त्यापैकीं तिसरा तपाकरितां आहे आणि चोथा संन्यासानें मोक्ष मिळविण्या- साठीं आहे. हे दोन आश्रम ब्राह्मषणांसच मोकळे आहेत असें ब्राह्मण यावेळीं म्हणूं लागळे होते. ( ६ ) शरीरांत जीवात्मा असून तो पर- मेश्वराचा म्हणजे परमात्म्याचा अंशा आहे. ( ७ ) कर्माप्रमाणे आत्म्याचे अनेक योनींतून संसरण होतें.

उपनिपत्‌ कालांतच तिसऱ्या मृद्याबद्दल तत्त्ववेत्ते असं सांगू लागले होते कौ, हिसायज्ञानें परम पुरुषार्थ साधत नाहीं आणि मोक्ष संन्यासानेंच साधेल. भगवद्रीतेमध्ये दोहोंना एकाच दर्जावर ठेवले आहे, म्हणजे पूर्वीच्या धर्मानेष्ट लोकांचे यज्ञ व संन्यास, चातुर्वर्ण्य चातुराश्रम्य, तसेंच तपाचे आणि संन्यासाचें तत्त्वज्ञान, योग व सांख्य, या सर्वांसच भगवद्रीतेनें समान लेखिळें आहे. पण याशीवाय भगवद्भक्तीनें नवीन मत पतिपादिळें असून त्या मागीनें, स्रिया आणे शूढ, ञ्यांस ब्राह्मण मोक्ष नाहीं असं ह्मणत, त्यांस सुद्धां मोक्षास जातां येतें असे प्रतिपादिळें आहे.

इ. स. पू. १००० पर्यंत भारतीय आर्यधमाच्या प्रगतीचा इतिहास थोडक्यांत वरप्रमाणें आहे.ञुने धमीभिमानी लोक हे साती मुदे मानीत तर निरनिराळे तत्त्ववेत्ते कांहीं मान्य करून इतरांचा निषेध करीत यानंतर अनेक प्रतिषेधक तत्त्वज्ञानी झाळे, पण शेवटचे दोन महावीर आणि गोतम हे जास्त जोरदार असल्यानें त्यांनीं स्थापेलेळे प्रति- षेधक धर्म अद्याप जिवंत आहेत. गोतम आणि मद्ावीर या दोघांनी

म. भा…३१८

५९० सामान्य परिस्थिति.

पाहिल्या पांच तत्त्वांचा निषेध केला आणि सातवे तत्त्व म्हणजे कमीसिद्धांत मान्य केला. पण महावीर तप आणि संन्यास हे दोन्ही आश्रम मान्य करितो आणि गौतम त्याच्याहि पुढें जाऊन तप खोटें मानतो आणि केवळ संन्यास मान्य करितो. अर्थात लोक त्याचे अधिक ऐकूं लागले. विशेषतः त्यानें सर्व लोकांस, आर्य व अनार्य, त्रैवार्णिक व शूद्र यांस, आपल्या संन्यास-संस्थेत घेतळें आणि तप म्हणजे शरीरकष्ट यास बिलकुल फाटा दिला, यामुळें त्याच्या धरमीचा प्रसार जास्त झाला, त्याच्या मतें ईश्वराढे नाहीं ब आत्माहि नाहीं, निदान या विषयीं विचार करूं नका असें आपल्या अनुयायास त्यानें सांगितलें, गृहस्यांनीं नीर्तांचें आचरण करावें व मिक्षूंनीं सर्व संसार-परित्याग करावा या गोष्टीवर त्यानें जास्त जोर दिला. महा- वीराचा [नेषेध गोतमाहून कमी होता असें म्हणतां येईल. कारण उपवासादि शरीरक्केश त्यास मान्य होता आणि त्याचा संन्यास पूर्ण- पणाचा होता म्हणजे भिक्षूनीं कपडा सुद्धां वापरू नये असा त्याचा उपदेश असे. गृहस्थांच्या नीतिमत्तेवर त्याचाहि पूर्ण कटाक्ष होता. दोघांनाहि योग आणि सांख्य तत्त्वज्ञान मान्य होतीं आणि वेद व ब्राह्मण दोन्ही अमान्य होते इं सांगावयास नको,

याप्रमाणे ब्राह्मणी धर्मांचा शेवटचा ब सर्वांत अधिक निषेध करणारा बौद्धधर्म असल्यानें तो सहजच जेन धमीपेक्षां जास्त प्रसार पावळा. शिवाय आम्हांस असें वाटतें को, बुद्धान सामान्य लोकांस त्यांच्या भाषेंत उपदेश केला तर महावीरानें तसा केला नाहीं. त्यामुळें बौद्धधर्मशास्र पाली भाषेंत लौकर उत्पन्न झालें; ह्या उलट जैनधर्मशासत्र दीर्ध काळपावेतो लिहिळें गेळं नाहीं. तसेच बोद्ध मिक्षूचा जीवनक्रम अगदीं सोपा होता. या उलट महावीरानें मुनींना नम्न राहून शरीर-शोषण करण्याचें व्रत सांगितल्याने जैन तपस्या आचरण्यास कठीण होती. आणि शेवटची गोष्ट ही को, अशोक

धर्मेक्यनाहा व धार्मिक द्वेष. ५९१

आणि कनिष्क दोन बोद्ध धर्माचे अनुयायी सम्राट यांच्यामुळे बोद्ध- धर्मास फारच जोर आला. या कारणांनीं हिंदुस्थानांत विराषत: उत्तरे- कडे पुष्कळ शतके बौद्धधर्म बहुजनसमाजाचा धर्म राहिला;आणि जेन- धर्म अल्पसंख्यांक होता. हृरनत्सांग याच्या तपशीलवार प्रवास वृत्तावरून हिंदुस्थानचा जो धार्मिक नकाशा आम्ही तयार करून पहिल्या भागास जोडला आहे, त्यावरून असे दिसेल कीं, हिंदु- स्थानाच्या किल्येक भागांत म्हणजे कपेश, सिंध, मगध, माळवा बंगेरेंत बौद्धधर्म सर्वव्यापी असून हिंदुस्थानच्या इतर भागांत हिंदु- धर्मांच्या बरोबर्रानें तो प्रसृत होता,पण जेनधर्म कांहीं थोड्या भागांत आणि तोहि थोड्या लोकांत सातव्या शतकांत प्रसृत होता. बिहार, ओरिसा अथवा कलिंग, चोळ आणि कर्नाटक यांतच तो दिसत होता. यापुढें कुमारिळ आणि शंकर यांनीं जेव्हां बौद्धधमीवर शेव- टला हृल्ा चढविला,त्यावेळेस जैनधम कमी महत्त्वाचा शत्रू असल्यानें त्याजवर विशेष हला झाला नाहीं आणि यामुळें तो चाळू राहिला पण बौद्धधर्मीवर निकराचा हल्ला होऊन त्याचा हिंदुस्थानांत बहुतेक उच्छेद झाला. तथापि ही गोष्ट लक्षांत ठेवली पाहिज कीं, बुद्धि- सामर्थ्यांत बौद्धधर्माहून जैनधम कधींच कमी नव्हता; आणि बाद- रायणाच्या ब्रह्मसूत्रांत जेनधर्माचे तत्त्वज्ञान महत्त्वाच मानळें असून त्याचेंहि खंडन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. किंबहुना आमचें मत असें आहे कीं, जैनधरमी प्रारंभापासूनच वादाला जरूरी अस- लेल्या सर्व शाखत्रांत, विशेषतः न्याय आणि व्याकरण यांत, निष्णात असल्यानें त्यांच्याकडे लोकांचं लक्ष बरेंच वेधळें जाई. बुद्धिवान्‌ ब्राह्मण ज्याप्रमाणें बौद्ध होत त्याप्रमाणें जैनांच्याहि धर्मात वेळो- वेळीं मनाची खात्री पटल्याने व त्याचप्रमाणें मान मिळविण्यासाठी जात आणि जेनांची विद्दत्ते बद्दलची ख्याति कायम ठेवीत असं दिसतें.

बौद्ध धमीप्रमाणे किंबहुना इतर प्रत्येक धर्माप्रमाणे जैनधर्मात

ह…

५९२ सामान्य परिस्थिति.

लोकरच दोन शाखा झाल्या. दिगंबरांचा कटाक्ष मुनींच्या नय्नात्वावर असे तर श्रवेतांबरांनीं मुनींना दोन पांढरी वस्त्रं वापरण्याची परवानगी दिली. ज्या जैनांनी दक्षिणेस जाऊन प्रथम धर्मोपदेश केला ते दिगं- बर शाखेचे होते. दक्षिण हिंदुस्थानांत जे श्रेतांबर हल्लीं दिसतात, ते अलीकडच्या काळांत गुजराथ आणि राजपुताना येथून बहुतेक व्यापारा- करितां आठेळे आहेत, पहिला जैन महान उपदेशक दक्षिण देशांत आला त्याचे नांव भद्रबाहु आहे. ह्या एका दीध दुष्काळांत उज्जनीा सोडून पुष्कळ अनुयायांसह दक्षिणेंत आला आणि म्हेसूर इलाख्यांतीळ श्रवण बेळगोळ येथपर्यंत गेला. दुसरे जैन बिहारमधून कलिंग मार्ग पूर्व किनाऱ्याने दक्षिणेंत गेळे असळे पाहिजेत. ह्याप्रमाणे जैनधमे आंत्र, तार्मीळनाड आणि कर्नाटक या प्रांतांत प्रस्थापित झाला. खिस्ती शकाच्या प्रारं्भांच्या हातकांतच, तसेंच हुएनत्सांग याच्या काळांत व नंतर, जेनधर्माचा या प्रांतांत प्रसार होता; पण महा- राष्ट्रंत नव्हता. जैनमुनी विठ्ठान्‌ असल्याने या देशांतील तिन्ही लोकभाषांचा ल्यानीं अभ्यास केळा आणि तामिळ, कानडी व तेलगू या भाषांत त्यानीं पहिले ग्रंथ लिहिले; आणि त्यामुळें या प्रांतांतील सामान्य जनांवर त्यांचा बराच पगडा बसला, अर्थातच या प्रांतां- ताळ सामान्य ढोकांतहि पूर्वी जैन होते व दृल्लीं आहेत. उत्तर हिंदु- स्थानांतील अशिक्षित जनसमूहाांत फारच थोडे जेन असतात, ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारवी आहे.

जैन पंडितांनी लोकभाषताळ आपल्या ग्रंथांत संस्कृत शब्दांचा मूळ आविकृत स्वरूपांत ( तत्सम ) उपयोग केला आणि याररी्तानें तामेळ, कानडी आणि आंध्र वाड्मयास फारच शोभा आणिली. बौद्धाप्रमाणें नरम उच्चार केलेल्या प्राकृत राब्दांचा त्यानीं उपयोग केला नाहीं. यामुळेंच त्यांच्या या देशी ग्रंथलखांस गोडी आली आहे. त्यांनीं देशी भाषांचे संस्कृतांत व्याकरणहि लिहिलें. त्यांनीं

धमक्यनाश व धामक छष. ५९३

मुलांच्या शिक्षणाकारेतां शाळाहि घातल्या असें दिसतें. कारण आंध्र, तामिल आणि कर्नीटक या प्रांतांत, किंबहुना महाराष्ट्रांत, मुलांस वर्णमाला शिकविण्याचा प्रारंभ करितांना पहिलें नमनाचें वाक्य “ ३४ नमः सिद्धम्‌ ! असें जें शिकवितात तें जैन आहे हें आश्चर्य करण्यासारखे आहे. तेळग॒ लोक “ ३ नमः शिवाय सिद्ध नमः ? असा मंत्र वापरतात ( आंश्नकर्नाट जैनिझम पा. ६४ दक्षि- णेतील जैनधर्माचा इतेहास; रामस्वामी ऐयंगार. एम्‌. ए. ). वरील मंत्रांतीळ दुसरा भाग बोद्ध आहे असें रामस्वामी म्हणतात. पण तो जैन आहे असें दिसतें. ‘“ पहिला भाग मागून देवांनी दक्षिणेतील जैनांचा प्रभाव नष्ट करण्याकरितां जेव्हां शैवांनीं स्वतः मठ आणि पाठशाला म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या शाळा शहरांत व खेडे- गांवांत स्थापिल्या तेव्हां जोडला. !’ “’ कलिंग म्हणजे ऊरिया देशांत हा मंत्र सिद्धिरस्तु ‘ एवढाच आहे. हा स्पष्टपणें जैन आहे. महाराष्ट्रांत ‘ ३ नमः सिद्धम्‌ ‘ ह्याला ‘ श्रीगणेशाय नमः ‘ असें अगोदर जोडतात. या जुन्या मंत्रावरून दक्षिण देशांतील मुलांस शिकविण्याच्या कामांत मोठा भाग प्राचीन काळीं जैन तपस्वी घेत असें दिसतें.

जैन लोक हिंदु राजांच्या दरबारांतहि मान्यता मिळविण्याचा अत्यंत प्रयत्न करीत. तामिळ देशांत पांड्य आणि चोल राजांनीं जैन गुरूस दाने दिलीं आहेत. पांड्यांचीं राजधानी मदुरा हिच्या- जवळ,खिस्ती शकाच्या प्रारंभीच, मोठमोठालीं जैन देवळें व तपस्वि- गृहें बांधिली गेली. म्हैसूर प्रांतांतील गंगंवाडींत गंगराजांनीं जनांस विशेष आश्रय दिला आणि बहुधा ते स्वतःच जेन होते. स्यमेतभद्र नांवाचा एक दिगंबर महान्‌ धर्मापदेशक होता. श्रवण वेळगोळ येथील डोंगरांतील शिलालेख नं. ४४ यांत असें वर्णन आहे को, यानें पाटलीपुत्र, माळवा, सिंध व टक्क देश ( पंजाब ) येर्थे ““ ढोल

८९४ सामान्य परिस्थति.

पिटला !” ( प्रत्यक्ष आणे वादी लोकांस आव्हान केलें ); नंतर
दक्षिणेंत कांचीस तो आला व तेथून कर्नाटकांत आला. याच्यामागून
सिंह्यानेदी झाला. यानेंच गंगवाडीचं राज्य स्थापन केळे अशी सम-
जूत आहे. स्यमंतभद्र हा ‘ आप्तमीमांसा ? या महत्त्वाच्या जैनग्रंथाचा
कर्ता अहे. या ग्रंथांत स्याद्वाद * सिद्धांताचे सर्वांत अधिक मान्य
विवरण आहे. पूज्यपाद हा आणखी एक विद्वान जैन होता.
जिनेन्द्र व्याकरण * नांवाच्या जैन संस्कृत व्याकरणाचा तो कर्ता आहे. “’ कांची येर्थाळ * हिमशीतल ‘ राजाच्या दरबारांत अकलंकानें बौद्धांचा पराभव केला, आणि या पराभवानें बौद्धांची दक्षिण हिंदु- स्थानांतन हकालपट्टी त्यानें साध्य केली. ‘’ ( वरील अयंगारचा प्रंथ पा. ३३ ). तात्पर्य दक्षिणेतील निरनिराळ्या राज्यांतील दरबारांत जेनांनीं आपल्या विद्वत्तेनें आणि तपश्चर्येने कृपा संपादिली; आणि पुष्कळ राजांनी त्यांस गांवें इनाम दिलीं, तसेंच ल्यांच्याकरितां मंदिरे बांधिली आणि जिनाच्या प्रचंड मूर्ति कोरल्या. हें येथें सांगण्यासा- रखें आहे कीं, जैनधर्म व बोद्धधम ह्या दोहोत इश्वर आणि मूर्ति- पूजा यांचा निषेध आहे तरी शेबटीं बुद्ध आणि जिन यांर्चाच देवा- सारखी पूजा मान्य झाली, आणि मंदिरें बांधून त्यांत त्यांच्या मूति ठेविल्या गेल्या. ( हें येथें कबूल केलें पाहिजे कीं, कांहीं जैन मतशाखा मूर्तीस मार्नात नाहींत, किंवा कोणत्याहि रूपाची पृजा करीत नाहींत ). जैनांनी तोर्थकराच्या मूर्त केल्या आणि ल्या प्रचण्ड व भव्य मंदिरांतून पूजूं लागल्या. “ ही इंश्वरभक्तीची पद्धति मनोवेधक असून फारच भव्य दिसते, आणि तिर्चेच अनुकरण हिंदु लोकांनीं केळे. ? ( सदर पा. ७७ ). याचा परिणाम असा झाला कीं दक्षिणेंत निरानेराळ्या राजवंशाच्या कारकीदांत भा. १ व २ यांत पूर्वी सांगितल्याप्रमाणें प्रचंड ह्विंदु देवळें उत्पन झाली आमचेंहि मत असेंच आहे कीं, हिंदूंतीळ मूर्तपूजा बोद्ध व जन

यतम य्य हा

धघर्मेक्यनाश व धार्मिक द्वेष. ५९५

यांच्या मूर्तिपूजेमुळें सुरू झाली नसली तरी तिच्या अनुकरणाने जास्त वाढली यांत संशय नाहीं.

याप्रमाणें दक्षिणेंत जैन धर्माच्या प्रसाराचा इतिहास योडक्यांत दिल्यावर या भागांत वर्णिठेल्या कालविभागांत दक्षिणेंत जैनधमीचा ऱ्हास किंबहुना ल्याचा अंत कसा झाला याचे संक्षिप्त वर्णन मुख्यतः रामस्वामी अय्यंगार यांच्या उपरोक्त ग्रंथाच्या आधाराने आम्ही करितों. जैनांस विरोध शैव मताच्या पुनरुज्जीवनानें व त्याच्या जोरदार प्रचारकांनीं केला. “ सम्बन्दर ( एक शेव साधु ) यानें पांड्य राज्यांत जैनधर्माचा उच्छेद केला, तर अप्पर यानें पछव राज्यां- तून जैनांस हांकळून दिलें.’? (पा. ६६ ). ही गोष्ट आठव्या शत- काच्या प्रारंभीं झाली. पण दहाव्या शतकाच्या अंतीं सत्ता पावलेले चोल राजे शिवाचे कट्टे भक्त होते आणि ल्यांनीं पूर्वीच्या राजांपेक्षां जैनांचा जास्त क्र्रतेने छळ केला. आपण पूर्वी पाहिळेंच आहे कीं छळ झालेल्या जैनांच्या शापामुळे एक चोळ राजा मेला अशी दंतकथा आहे. तेव्हां चोलांनीं जैनधमे नष्ट करण्याकारेतां आपल्या राजस- त्तेचा उपयोग केला याजबद्दल दुंका नको. मदुरा येथें राजराज चोल यानें बांधलेल्या मोठ्या शिवदेवाल्यांत तामिळ देशांतील प्रसिद्ध ६३ “ नायनार ‘ म्हणजे शेवसाधु यांच्या मूर्ति त्यानें पूजेसाठी बस- विल्या. पण ह्याहिपेक्षां “ मदुरेच्या रमानाक्षीच्या मंदिरांतील “ गोल्डन ढिली टँक’ म्हणजे सुवर्ण पद्मसरोवरावर्राल मंडपाच्या भिंतीवर काढ- ठेल्या वेलबुट्टीत जैनधर्म आणि हिंदुधर्म यांतील तीव्र झगड्यांत झालेल्या भयेकर प्राणहानीच्या प्रसंगाची जीं चित्रे आहेत,/त्यावरून जैन धर्माचा कसा उज्छेद झाला हें टक्षांत येतें ( पा. ७९ ).

तामील देशाकडून कर्नाटकाकडे म्हणजे दक्षिण मराठादेश व म्हैसूर यांकडे वळून पाहतां पहिल्यांत पूर्व चालुक्य हे जरी स्वतः कड्रे हिंदु होते तरी ल्यांनीं जैनांस आश्रय देऊन जैन देवळें व साधु

५९ सामान्य परिस्थिति.

यांस दानें दिलीं. यानेतर दुसऱ्या कालविभागांत (८०० ते १०००) राष्ट्रकूटांच्या सत्तेखाली जैनधर्माचा उत्कर्षच राहला. आणि भाग २ (पा. २०३ ) यांत सांगितल्याप्रमाणे कांहीं राष्ट्कूट राजे जैन साधूंचे भक्ताहे बनळे आणि दक्षिण महाराष्ट्रदेशांतीळ शेतकरी प्रजें- तहि जैनधर्माचा प्रसार झाला. वैश्य तर इतर प्रांतांत्रमाणेच अहिंसा

धर्मांचे चाहते असल्यानें बहुतेक जैन होतेच. म्हैसुरांतील गंग राजे

>___<»»»»»-«

स्वतः जैन होते. राष्ट्रकूट घराण्याचा अधिकारी इंद्र चोथा हा कृष्ण ।

तिसरा याच्या पाश्चात्य गंगवंशीं राणीपासून झालेला पुत्र असल्यानें धमंशील जेन होता. जेव्हां पुढें उत्तर चाढुक्यांनीं शवटचा राष्ट्रकूट राजा कक्कल याचा उच्छेद केला तेव्हां. इंद्र चोया यानें राष्ट्रकट सत्तेचें पुनःस्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण तो सिद्धीस गेला

नाहीं. तेव्हां सछ्लेखन विधानें ( हें एक जेन व्रत आहे ) त्यानें कट्ट्या

जैनांप्रमाणे आपला प्राण दिला ( भा. २ पा. १५१ ). मालखेड येथें

आम्ही गेलो होतों तेव्हां किल्ल्यांत एक्या जैन मठाचा अवरोष आम्हांस

दिसला ( भा. २ पा. ३५४ ), आणि गांवांतह्ि एक जैन बस्ती आहे. यावरून असे स्पष्ट होतें कौ, दहाव्या शतकाच्या शेवटीं

दाक्षिण महाराष्ट्रदेशांत जैन धर्माचा उत्कर्ष होता. पण पाश्चात्य उत्तर

चालुक्य यांची सत्ता या कालविभागांत ( १००० ते १२००) प्रस्थापित होऊन त्यांतील तेलप वगेरे राजे कट्टे शौव असून ल्यांनीं जैनधर्माचा छळ केला, “’ या प्रांतांतीळ परंपरागत दन्तकथा मान- ल्यास बस्तींतीळ जैन मूर्ति व देवता फेकून दिल्या जाऊन ह्यांच्या ठिकाणीं पोराणिक देवतांच्या मू्ति बसविल्या गेल्या. ‘? ( वरील ग्रंथ पा. ११२ ). रामस्वामी उत्तर चाढुक्यांची सत्ता थोडे दिवस राहिली असें चुकीनें म्हणतात, कल्चूरींनीं त्यांची सत्ता ११२६ त नव्हे तर ११५९ त उल्थली; आणे कलचूरींची सत्ताच उलट थोडे दिवस

राहिली. तथापि कलचूरींचें बंड म्हणजे एक धार्मिक बंड बहुधा

थमक्यनाळ व धामक दष. “५९७

असावें. कारण विञ्जन कलचूरी हा जैन होता. पण विञ्जन आणि ‘कलचूरींची सत्ता हावमताच्या परत फिरलेल्या लाटेपुढें लवकरच नष्ट झाली; आणि लिंगायत पंथाच्या रूपानं पुढें सांगितल्याप्रमाणे रैवम- ‘तास नवें स्वरूप प्राप्त झालें.

तुंगभद्रेपलीकर्डाल मुख्य कनीटकांतं गंगांचे राज्य दार्घकाळ होतें. ते जैन साधूचे अनुयायी होते. गंगांची सत्ता तंजावरच्या चोलांनीं इ. स. १००४ सुमारें उलथून पाडली; पण त्यांचीहि सत्ता गंग- वाडींत होयसलांनीं नष्ट केली, होयसल प्रारंभीं जैनधर्माचे अनुयायी होते. पण प्रसिद्ध विष्णुबर्धन राजास रामानुजानें वैष्णवधर्म मान्य करण्यास लाविलें; तेव्हांपासून वैष्णव मत म्हेसूर इलाख्यांत मज- बूत पायावर बसळें आहे. “ याप्रमाणें म्हेसुरांत राजाश्रय सुटल्याने, तामिळ देशांत चोलांनीं छळ केल्यानें, आणि दक्षिण महाराष्ट्र देशांत लिंगायत पंथानें त्याची जागा पटकावेल्यानें, जैनधर्माचा दक्षिण हिंदुस्थानांत साहजिकच कायमचा ऱ्हास झाला. जरी बर्राच मोठी संख्या या धर्माची अनुयायी अद्याप आहे तरा यापुढें लोकांत किंवा राजदरबारांत प्रिय असल्यानें मिळणारा राजकीय मोठेपणा जैन लोकांना यापुढें राहिला नाहीं. ”

जैनधर्माचा आंत्र देशांतहि कसा ऱ्हास झाला हें वर्णन करणें बाकी आहे. बिहार देशाहून परभारें दिगंवर जैन आंत्र देशांत खार- वेल नांवाच्या राजाच्या वेळीं आले तेव्हांपासून आंध्रांत जैनधर्माची प्रतिष्ठापना झाली होती. वर सांगितलेल्या ग्रंथांस आंध्रासंबंधें जो एक लेख वी, शेषगिरिराव॑ यांनीं जोडला आहे त्यावरून असं दिसते कीं, स्थानिक परपरा आणि कैफियती यांवरून आंघ्रांतहि शैवमताचा जोर झाल्यानेच जैनधर्माचा पाडाव झालेला सिद्ध होतो, पूसपाति आणि इतर आंघ्रातीळ राजपूत बैदिक धमाचे अभिमानी होते. प्राच्य चाटुक्यांनीं पुढें हौव कवींना आश्रय दिला, त्यांपैकी नन्नयांनें

“५९८ सामान्य परिस्थिात.

महाभारताचे तेलळगूंत भाषांतर केलें. यामुळे शैवमताचा जोर अधिक होऊन त्यास आधार मिळाला. हशैवमताच्या पुनर्जीवनाची ही लाट । प्राच्य गंगांच्या वेळीं अधिकच जोरावली, कारण हे राजे प्रारंभीं शैव होते. बरंगळचे काकतीय हेहि शहैवच होते, आणि त्यांनीं जैनांचा अधिकच छळ केला. शेवटची गोष्ट ही कीं, ‘’ वरंगळच्या गणपाति देवासमोर तेल्गू महाभारताचा कर्ता टिकण याशीं झालेल्या वादांत जैनांचा पराभव झाला, तेव्हां त्यानें जैनांस अगदींच चोपेलें; ही गोष्ट विशेष प्रसिद्ध असून मद्रास म्याझियममधीळ हस्तलिखित प्राच्यपुस्तकांच्या संप्रह्मांतील एका काव्यांत वर्णळेंली आहे. ‘’ (पा. २८ सदर ).

या कालविभागांत दक्षिण हिंदुस्थानांत झालेल्या जेनधर्माच्या पीछेहाटीचा व ऱ्हासाचा थोडक्यांत इतिहास वरीलप्रमाणे आहे. हा ऱ्हास मुख्यतः शिवभक्तीच्या लोकप्रियतेची जी लाट परतली तिच्या कारणानें झाला. शैव साधूंनी अनेक चमत्कार केल्याच्या गोष्टी किंवा जैनवादींचा विजय किंवा दोघांची योगिक सिद्धि यांचें वर्णन कर- ण्याची आवश्‍यकता नाहीं. ( दोन्हीं धर्मांत योगमार्ग मान्य केळेला असून त्याची फारच प्रशंसा केळेली आहे ). याचप्रमाणें जेनांच्या छळाच्या गोष्टी किंवा असहिष्णु चोळ राजांनीं हिंदुराजांची परपरा- गत झांत व समतोल वृत्ति सोडून जैनांस सुळींहि दिलें या गोष्टी विस्ताराने सांगण्याची जरूरी नाहीं, तेव्हां जेनधर्म दक्षिणेत मार्गे हटला तरी पश्चिमेकडे याच कालविभागांत कसा उत्कर्ष पावला याच्या वर्णनाकडे आतां आपण वळूं

भाग २ मध्यें आम्ही सांगितलेच आहे कीं या पूर्वीच्या काल-

विभागांत (८०० ते १००० ) गुजराथेत व राजपुतान्यांत जैन- धमाचा वरचढपणा नव्हता. तेथें त्याचा उत्क्ष याच कालविभागांत झाला असें आम्ही मानितों. या कालळविभागांत शैव राजपूत राजांचे

धर्मेक्यनाश व धार्मिक द्वेष. ५९९

अमदानींत त्यांचा आयुधांचा गर्व व प्राण घेण्याचा धंदा चाळू असतांहि हा आअहिंसा-प्रधानधम तेथें प्रसृत झाला याचें आश्चर्य वाटतें. सर्व राजपूत राज्यांत, सांबर व मेवाड, माळवा व गुजराथ. यांत, या काळांत सर्व राजे शिवभक्त, दक्षिण हिंदुस्थानांतील क्षत्रिय राजाप्रमाणेंच कट्टे शिवभक्त, असूनहि जैन धर्माचा प्रसार झाला. बॉद्ध किंवा जैन आहिंसेविषयींचा आदर यावेळीं देशभर पुन: वाढला होता हें खरें. किंबहुना उपनिषदांच्या वेळेपासून हा अहिंसेचा आदर हिंदु लोकांत पुनः पुनः परतठेला दिसतो; आणि वैदिक प्राणिहिंसा- युक्त यज्ञांची मान्यता त्यांनीं पुन, पुनः सोडलेली दिसते. यावेळीं मूळचा हिंदुधम अथवा वैदिक आर्य धर्म यांचें पुनरुज्जीवन, कुमा- । रिळ व इंकर यांच्या काळीं झांलेळें शांत झाळें होते; आणि बोद्ध आहिंसा मतांची लाट सर्व देशभर परतली होती हें खरें. पण या लाटेनें दक्षिणेंत जैन धमास मदत केली नाहीं. ( याची कारणें आम्ही पुढें सांगू ). याउलट गुजराथ, माळवा आणि राजपुताना यांत जैनधर्म जास्त लोकाप्रिय होण्यास तिनं मदत केली. या चम- त्काराचें कारण, म्हणजे हिंदुस्थानच्या पाश्चिम भागांत जैनधर्माच्या प्रगर्तांचें कारण, वैयतिक सामर्थ्य झालें. व्यक्तीच्या सामर्थ्यांचे मोठे बलवान्‌ परिणाम होतात असें आम्ही मानतों. या कालविभागांत जैन मताचा उत्कषे पाश्चिमेकडे जैन महापंडित हेमचंद्र याच्या वजनामुळेंच झाला असें आमचें मत आहे.

या महान जैन उपदेशकाचें चरित्र कुथारिळ किंवा शंकर यांच्या चरित्राप्रमाणें अधुक नाहीं. कारण गुजराथचे दोन मोठे राजे जय- सिंह सिद्धराज आणि कुमारपाल यांच्या राज्याशी त्याचा निकट संबेध, आहे. आम्हांला एकदां असें वाटलें होतं कौ, हा दक्षिणचा जैन असावा निदान ल्यास दक्षिणेकडून स्फूर्ति मिळाली असावी; परंतु तसें दिसत नाहीं, किंबहुना दक्षिणचे जैन उपदेशक दिगंबर होते.

“६०० सामान्य पारास्थात. ।

( दिगंबर लोक संन्यासाचें तत्त्व त्याच्या सर्व न्याययुक्त परिणामासह पाळतात हें कबूल केलें पाहिजे ). गुजराथ आणि व जैन हे बहुतेक श्रेतांबर होते व आहेत. ते आपल्या. मुनींना दोन झुभ्र वस्रे वापरण्याची परवानगी देतात. शिष्य आणि युरु या दोन्ही परिस्थितींत हेमचंद्र श्वेतांबर होता. गुजरार्थेतील एका वैश्य कुलांत त्याचा जन्म झाला. त्याच्या आईनें त्याच्या लहानपणींच आपल्या जैनगुरूस त्यास अर्पण केलें. गुरूच्या लक्षांत त्याची अत्यंत बुद्धिमत्ता व त्याचें भावी महत्त्व आलें होतें. हेमचंद्र शेवटीं आचार्य झाला आणे अनहिलवाड येथीळ एका जैनमठाचा मुख्य होऊन तेथें आला. त्याचा जन्म १०८४ इसवींत मानतात, आणि ग्रृत्यु ११६८ इ. म्हणजे वयाच्या ८४ वर्षी मानतात. यानें तीन मोठे ग्रंथ लिहून आपली कौर्ति अजरामर केली. एक संस्कृत व प्राकृत भाषांचे व्याकरण; दुसरा दृधाश्रयकाव्य ( यांत गुज- राथच्या चाट्क्यांचा इतिहास दिलेला असून त्यांतच आपल्या व्या- करणांच्या नियमांची उदाहरणें एकामागून एक दिलीं आहेत ); आणि तिसरा देशी नाममाला अथवा देशी शद्वांचा कोश. असें म्हणतात कीं एका हिंदु पंडितानें “ तूं हिंदूचेच व्याकरण उपयोग कारेतोस ‘ असा टोमणा हेमचंद्रास मारला, तेव्हां त्यानें स्वतः संस्कृत व प्राकृत भाषांचे स्वतंत्र संपूर्ण व्याकरण लिहिलें. हें व्याक- रण हत्तीच्या गंडस्थळावर ठेऊन हत्तीवर हेमचंद्रास बसवून मोठ्या सभारंभानें राजवाड्यांत नेऊन खजिन्यांत ठेविलें गेलें. तें जयासिह- सिद्धराजास अर्पण केलें असून त्याचें नांव सिद्धहेम यासाठींच ठेविळें आहे. हेमचंद्र हिंदुस्थानांत पुष्कळ फिरला होता असें दिसत

  • नाहीं. पण त्याचें वजन कुमारपालावर इतके बसलें कीं, त्यानें कुमारपालापासून जैनांकारेतां अनक सवलती संपादन केल्या. वशेषतः जैनांस पवित्र असलेल्या दिवशीं प्राणिहिंसा बंद असावी

नवे वष्णव मत, ६०१

असा हक्क त्याने मिळविला.” गुजराथेंत जैनधमीचें जें वर्चस्व आहे निदान त्या देशांत आहेंसा तत्त्वाला जो अल्यंत मान मिळतो तो हेमचंद्राच्या वेळेपासून आहे.

चोह्ाणांच्या मुळुखांत, किंबहुना सतलज नदीपर्यंत, जैनधमीचा याच काळांत प्रसार झाला, तो इतका कीं, माराडांतील बहुतेक सर्व वैशयांनीं जेनधमीचा स्वाकार केला. हे मारवाडचे व्यापारी हिंदुस्थानच्या दूरदूर भागांत व्यापाराकरितां जातात व तेथें आपला जेनधमे नेतात. माळवा आणि मेवाडमध्योहि मागूनचे राजे जरी स्वतः कट्टे शैव होते, तरी ते जैनधर्मास अनुकूल असून या काळीं जनघर्माचा प्रसार होण्यास कारण झाळे. या इतिहासांतील निर- निराळ्या प्रकरणांत जैनधर्मास अनुकूल असणाऱ्या राजांची उदा- हरणें आठींच आहेत; त्यांचा येथे पुनः निर्देश करण्याची आव- इ१यकता नाहीं.

नवें वैष्णव मत.

उत्तर हिंदुस्थानच्या बाकीच्या प्रदेशांत जैनधर्म राजांस किंवा लोकांस विशष प्रिय झाल्याचें दिसत नाहीं. ( सर्व देशभर अनेक वैऱ्‌य मात्र जैन असल्याचें दिसतें ). गाहडवालांच्या किंवा पालांच्या अथवा सेनांच्या अमदानींत जैनधर्म ब्रिशेष प्रिय झाल्याचें दिसत नाहीं. उत्तरहिंदुस्थानच्या मध्यभागांत किंवा पूर्वभागांत याप्रमाणें जैनधर्माचा उत्कर्ष झाला नाहीं तरी अहिंसा वृत्तीचे पुनरुज्जीवन तेथे पश्चिमेपेक्षां या कालविभागांत कमी होते असें नाहीं, आपण पाहिळेंच आहे कीं, मगधामध्यें बोद्धधर्मांस नवीन आचायानीं जास्त जोर आणला; आणि किल्येक विद्वान्‌ बोद्ध तिबेटमध्ये नेहमीप्रमाणे

शवृद्धपणीं कुमारपालास हेमचंद्रानें जैन केलें अज्नी गुजरार्थरंत समजूत आहि;पण तीं चालुक्यांच्या प्रकरणांत सांगितलेल्या कारणांसठ(‘ खरी नाही.

| ९०२ सामान्य परिस्थिति | ।

उपदेश करण्यासाठीं गेळे, आणि त्यांनीं तिबेटांत या शांततेच्या धर्माची सुधारणा केली. पण अहिंसासिद्धांताचा जास्त. पुनरुज्जीव-

नाचा जोर नव्या वैष्णवमताच्या उत्पत्तींत दिसतो. हें नवे वैष्णव- मत या काळीं बंगाल्यांत जैन किंवा बौद्ध धर्मा इतर्केच अहिंसातत्त्वा- भिमानी होतं. किंबहुना नवें वेष्णवमत श्रीकृष्णाच्या भक्तीस जोड-

ठेले जैनमतच होय असें, ज्याप्रमाणें खिस्ती मत म्हणजे ज्यू लो- कांच्या मताला जोडलेळें बोद्धमतच म्हणतां येतं त्याप्रमाणें म्हणतां येतें. हिंदुस्थानांत यावेळीं मगधाशिवाय इतरत्र बोद्धधम उच्छिनन झाला होता. बुद्धाचे रूपांतर होऊन तो विष्णूचा एक अवतार मानला गेला होता, आणि सामान्यपणें बौद्ध वैष्णव झाले होते. साहजिकच या लोकांत अहिंसातत्त्व परतलेल्या लाटेच्या जोराने वाहूं लागलें आणि नव्या वेष्णवमतानें पूर्वीपेक्षांहिे जोरानें अहिंसेचा पुरस्कार केला. बुद्धाच्या जन्माच्या पूर्वी फार प्राचीनकाळी भगवद्रीतीनं अहिं- सेचा उपदेश केला हें खरं; परंतु भगवद्वीतेची आहेसा वैदिक धर्मा- तील प्राणेहत्यायुक्त यज्ञाशीं विरोधी नाहीं हें महाभारतावरून सिद्ध होतें. वॉदिक हिंसा ही हिंसा नाहीं असा महाभारताचा सिद्धांत आहे. पण ईश्वराच्या आराधनेकरितां प्राणेहल्या करणें हं केव्हांहि अमान्य ठरणार, आणि यामुळें वेदिक धमाचा हा एक भाग ज्यू धर्मातल्या प्रमाणेच दुर्बळ होता, आणि या मुद्यावर जैन आणि बौद्ध हृया करीत व त्यांच्या उपदेशकांचा हिंदु म्हणजे वैदिक प्रति- वाद्यांवर विजय होत असे. नवीन वेष्णव मतांत अहिंसा सिद्धांत पूर्वीपेक्षां जास्त निश्चयाने प्रतिपादिळा असल्यानें जैनांचे त्याविरुद्ध चाळेना; आणि यारीतीनें हा धर्म सामान्य लोकांस अधिक प्रिय झाला. कारण त्यांत त्यांच्या प्राचीन विष्णुदेवतेची भाक्ते असून शिवाय . प्राणिहिंसायुक्त वैदिक यज्ञ बंद केळे गेळे. या नवीन वैष्णव धर्मांत हिंसायुक्त यज्ञ बंद केळे गेळे इतकेच नव्हे तर मांसाहारापासून

नवे वैष्णव मत. ६०३

निवत्तीचें तत्त्व जैनामप्रमाणेंच अंगिकारिलें गेलें, यामुळें यावेळीं सिंधु- नदीपासून व्रह्मपुत्रापर्यंत या नवीन वैष्णव मताचा प्रसार झाला आणि वैष्णवांनीं प्राणिहिसा आणि मांसाहार टाकून दिला. हल्लींहि पंजबांत वैष्णव अन्न म्हणजे मांसरहित अन असा शब्दव्यवहार होतो.

हे नवीन वैप्णवमत दक्षिणेकडून आलें किंवा वैष्णव भागवत पुराणाच्या उपदेशामुळें उत्पन्न झालें असें दिसत नाहीं,शंकराचायांच्या उपदेशाने तं उत्पन झालें असेंहि नाहीं, कारण शंकराचार्य वैदिक विधींचे पक्के मानणारे होते. उत्तर हिंदुस्थानांत हें मत कशानेहि पसरळें असो, तें भागवत पुराणामुळें नाहीं हें निश्चित आहे. कारण भागवताचा काळ आम्ही अन्यत्र दाखावेल्याप्रमार्णे इ. स. १० व्या शतकापूर्वी मानतां येत नाहीं. आणि काऱ्मीरच्या इतिहासांत राजा अवंतिवमन्‌ ( ८५५ ते ८८४ ) हा नवीन तऱ्हेचा पक्का वैष्णव होता. त्यानें पूवीच्या मेघवाहनाच्या काळाप्रमाळेंच कारमीर राज्यांत प्राणिहिंसा बिलकुल बंद केली (भा.१ पा. २२१). याप्रमाणे ९व्या शतकांतच वोद्ध अहिंसा-प्रीति परतठेठी दिसते आणि अवंतिवर्मन्‌ यानें तो स्वतः कट्टा वैष्णव असल्यानें आपली राजकीय शक्ति अहिंसातत्त्व अमलांत आणण्यास उपयोगांत आणली. सम्राट प्रतिहार भोज हाहि परम वैष्णव होता (भा. २ पा.१७४). आणि त्याचा नातूहि वैष्णव होता. परंतु हे राजे अवंतिवर्मनच्या तऱ्हेचे म्हणजे मांसाहारनिवृत्त आणि प्राणिहिंसा बंद करणारे होते कीं नाहीं हे सांगतां येत नाहीं. गाहडवाल राजे लक्ष्मी अथवा श्री इचे उपासक दिसतात. कारण त्यांच्या कोरीव लेखांत प्रारंभी तिचे व दामोदराचें नमन आहे. ते तत्त्वतःस्मात होते. ते माहेधर असल्याचें वर्णन कोरीव लेखांत असले तरी भूमिदानाच्या वेळी त्यांनीं वासुदेवार्चेहि पजन केल्याचं वर्णन आहे. मगधांत तरबोद्ध राजे होते आणि ते , आअहिंसातत्त्वाचे कड़े आधारस्तंब होते. येथेहि एका राणीने सबंध

६०४ सामान्य परिस्थिति.

महाभारत ऐकल्याचें आपण पाहतों. पूर्व बंगाल्यांत सेन राजे प्रारंभीं

शिवोपासक होते, पण त्यांच्यांतीळ सर्वांत प्रसिद्ध राजा. लक्ष्मणसेन हा परम वैष्णव होता, आणि तो आहिंसा तत्त्वाला पक्का आधार देणारा होता असें मानलें पाहिजे. तो स्वतः मांसानेवृत्त असलाच पाहिजे. तरी पण आपल्या राज्यांत त्यानें प्राणिहिंसा बंद केल्याचा पुरावा आपल्याजवळ नाहीं. याचे वैष्णवमत ओरिसांतील जगन्नाथा- हुन आलेलें दिसतें. ओरिसांत वेष्णवमत यावेळीं प्रबल होतं. (याची कारणें पुढें देऊं ). याप्रमार्ण उत्तर हिंदुस्यानांत पश्चिमेकडे जेन धर्म व पूर्वेकडे आणि उत्तरेकडे वेष्णवधर्म याकाळीं त्यांतील प्रमुख तत्त्व . आहिंसामत यासह प्रबळ झाला होता.

परंतु हे नवीन वैष्णममत आणि जैनधमे यांचं अहिंसेबद्दळ या- प्रमाणे ऐक्य असलें तरी तपस्ये संबंधानें त्यांच्यामध्ये फारच विरोध होता, तपस्येच्या बाबतींतही हिंदु समाजाचें मत पुनः पुनः बद- ललेळें आहे. शारीराचें शोषण करावें किंवा पोषण करावें या तत्वा संबंधे पुनः पुनः लोक मतांत बदल झालेला आहे. श्रीकृष्णाच्या चरित्रा- वरून प्रत्यक्ष असा उपदेश निघतो कीं, जगतांतील सुखें उपभो- गावीं हा खरा सिद्धांत आहे, तथापि श्रीकृष्णाच्या उपदेशांत दोन्ही मार्गीमधाळ मध्याबेंदूचा मार्ग श्रेष्ठ आहे असें सांगितलेळें दिसतें. परंतु कृष्णभक्ताचा कल यापुढें उपभोगाकडे ( एपिक्यूरियन तत्त्व- ज्ञानाकडे ) वळला; आणि बंगाळ व मध्यदेश यांत यावेळी लोकांत हें मत प्रिय झालें. तेव्हां जैनधर्माप्रमाणेंच वेष्णवमतानं अह्दिसेचा पुरस्कार केला तरी जैनधमाविरुद्ध त्यानें उपभोगाचा पुरस्कार केला लंबक जसा एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे वळला म्हणजे तिकडे शेवटास जातो, या रीतीनें या नव्या वैष्णवमताचें चेनबाजींत पर्य- ,वसान झालें.राधाभक्तीचा पंथ अद्याप उत्पन्न झाला नव्हता असं दिसतें कारण भागवतांत राधा सांगितलेली नाही. पण कृष्ण-गोपांच्या

नवे वैष्णव मत. ६०५

लीळा हा यावेळच्या वैष्णवमताचा अग्रेसर सिद्धांत दिसतो. वेष्णव- मताचें नवीन पुराण भागवत, यांतहि या लीला अनुकरणीय नाहींत असे स्पष्ट सांगितलें आहे. कारण परीक्षितानें महतांचें हें अनीतीचे कृत्य सामान्य जनांनीं अनुसरावें कीं काय £ असा प्रश्न केला असतां शुक भागवतांत असें उत्तर देत नाहीं कीं या र्लाला म्हणजे, जीवात्म्याची षरमात्म्याविषयीं ठाटसा दाखाविणाऱ्या कल्पित गोष्टी आहेत.या उलट स्पष्ट असें उत्तर तो देतो कीं महतांचीं कृत्ये नव्हेत, तर महतांचे उपदेश अनुसरणीय आहेत. अर्थात्‌ भागवताचें असें स्पष्ट मत दिसतें को, हें कृष्णाचे वतन ऐतिहासिक आहे पण तें

। अनुकरणीय नाहीं. तथापि कृष्णाच्या या कामलीलांविषयीं लोकांच्या । कायम असलेल्या विश्वासांतून राधापंथ निघणं अपरिहाय होतें. कारण । कोणीतरी एक कृष्णाची मुख्य प्रिय स्री मानल्यावांचन लोकांचे समाधान

होत नाहीं, आणि लक्ष्मणसेनाच्या द्रबारांतील कवि जयदेव याच्या

। गीतगोविंदांत फारच मोहक रीतीनं कृष्ण आणि राधा यांच्या अनुचित

कामलीलांचें वर्गन या काळांत उत्पन्न झालें.

राधापंथाचा यापुढें परिपोष होऊन राधा पुढें प्रथक्ष कृष्णाची बायको ठरली. पण हे स्थित्यतर १२०० इसवीनंतर झाळें अस- ल्याने आपल्यास ल्याशीं कांही कतेव्य नाहीं. लक्ष्मणसेनाच्या बेळीं हा राधापंथ नुकताच उदयाला येत होता, आणि ओरिसा- मधून जें वेष्णवमत त्याच्यावेळीं बंगाल्यांत आलें त्यांत राधेस जागा नव्हती. तथापि त्यांतहि शुंगारोत्तजक पुष्कळ गोष्टी होत्या हं नाका- रतां येणार नाहीं. पूर्वी म्हटल्याप्रमाणें हिंदुसमाज यावेळीं तपस्ये

कडून चैनीकडे वळला होता. हिंदु राज्यांच्या या वेळच्या अत्यंत
वैभवाचाहि याच दिशेकडे परिणाम होणे अपरिहार्य होतें, अलंकार- । झात्ष यावेळीं लोकांत प्रिय झालें होते, हेंहि आपण पाहिलेच आहे.

मं. भाटे

६०६ , समान्य परिस्थिति.

या प्रश्नाची काळजीपूर्वक छाननी होणें अद्याप बाकी आहे. परंतु त्यावेळच्या बंगाल्यातील व ओरिसांतील वैष्णव मतांत श्रीकृष्ण आणि गोपी यांच्या कामलीलांच्या कथांचा पूण अन्तभीव होता; आणि शरीरशोषणापेक्षां हारीरपोषणाकडेच त्याचा जास्त कल होता.*

वछूभ आणि चैतन्य हे अद्याप यावयाचे होते आणि या इंगा- रिक कल्पनांना जास्त अशुद्ध किंवा आुद्ध स्वरूप मिळावयाचें होतें. पण एवढें खरें कों, याचे बीज यावेळी पेरळें गेट. असो, वैष्णव- मतांतीळ हे उपभोगतत्त्व आणि त्यांतील अहिंसातत्त्व यामुळें जैन- धर्मापेक्षा तें लोकांस जास्त प्रिय झालें असलें पाहिजे आणि यामुळे उत्तरहिंदुस्थानांत जैन धर्माच्या प्रसारास अडथळा आला असावा. यावेळी दक्षिणेंतहि वेष्णवमत पसरलें. परंतु त्यांत ह्या निकृष्ट स्वरू- पाचा अन्तभाव नव्हता. त्यांत आहिंसा तत्त्व मान्य केळे गेळें आणि यारीतीनें जनांचा आक्षेप दूर केला गेला; पण त्याबरोबरच तप- स्येचें तत्वत अंगिकारलेळें दिसतें. शिवाय वेदप्रामाण्य आणि वणाो- श्रमधर्म, अर्थादू ब्राह्मणांचे धार्मिक श्रष्ठत्त्व,त्यांत मान्य असून दक्षि- णच्या लोकांच्या पुराणधमाभिमानी वत्तीस त॑ अधिक पसंत पडलं शेकराचायांच्या तत्त्वज्ञानांत भक्तियोगाळा फारशी जागा नाहीं; आणि भाक्तियोग तर प्राचीन काळापासून वैष्णवधर्माचा मुख्य सिद्धांत आहे तेव्हां शांकरतत्त्वज्ञानाला विरोध करून उपनिषद्‌, भगवद्वीता आणि ब्रह्मसूत्रे हीं जीं पुराणमताभिमान्यांचीं मुख्य पवित्र स्थाने | त्यांचा निराळा अर्थ लावन निराळें तत्त्वज्ञान उपदेशिण्याची आव- इयकता होती. एक नवीन, जोरदार वेष्णव उपदेशक या कारणानी दक्षिणेंत उत्पन्न झाला. तामिळ देश ह्या भागवत पुराणांत सांगि-

  • चोल गंग याने यावेळी (११५० इ. ) बांधलेल्या जगन्नाथाच्या देवळावरील अन्छील चिल्लांची उपर्पात्त अन्यथा लागत नाहीं.

नवे वेष्णव मत, ६०७

तल्याप्रमाणे पूर्वीपासून वैष्णवमताचा मुख्य किल्ला आहे; आणि
। आलवार म्हणजे वैष्णव साधु तेथें प्राचीन काळापासून, जसे शैव
। साधु नायनार शिवाचीं स्तोत्रे गात आळे आहेत, त्याप्रमाणं विष्णूची
| स्तोत्रे गात आले आहेत. पण वैष्णवमताला शांकर-सिद्धांत-विरोधी
। तत्त्वज्ञानाचा आधार पाहिजे होता, तो देण्याचें काम यावेळीं
’ रामानुजानें केलें.
रामानुजाचें चरित्र प्रसिद्ध असून तं डॉ. भांडारकरांच्या वैष्णव-
धर्मीवरील पुस्तकांत उत्तम रीतीनें दिलें आहे. याचा जन्म इ. स. । १०१७ त झाला; आणि त्यानें कांची येथें यादवम्रकाश नांवाच्या
अद्वैत ( शांकर ) तत्त्वज्ञान्यापाशी प्रथम तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. | त्याच्या उपदेशानें त्याच्या मनाचें समाधान न झाल्यानें आलवारां- । च्या प्रबंधाचा त्याने खोळ अभ्यास केला, आणि त्यांच्या “ भक्ति- । रसाचे पान केलें. ‘! त्रिचनापद्छी जवळील श्रीरंगम्‌ येथील वैष्णव- । मठांत यामुनाचार्याच्या मागें तो उपदेशक ( महंत ) झाला. आणि वर निर्देशिलेल्या आयाच्या पवित्र ग्रंथावर आपलीं नवी भाष्ये लिहून । त्यानें आपल्या आयुष्याचें महत्‌ कतेव्य केलें. त्यावेळचे चोल राजे । शैव होते, त्यांनीं रामानुजानें वैष्णव मत सोडावें याविषयीं प्रयत्न । चालविला, तेव्हां तो तेथून पळून म्हैसूर मधील होयसळ राजा । विष्णुवर्धन याच्या आश्रयास गेला. हा राजा जंनमतानुयायी होता. परंतु रामानुजानें त्यास उपदेश करून आपल्या मताकडे वळविले. । (इ. स. १०९६) ।__ रामानुजाचें मत अर्थात्‌ दक्षिणेंत पसरिळें; आणि नंतरच्या शत- कांत त्याचा भावी अनुयायी रामानंद यानें ते उत्तरेकडे नेलें. । “रामानुजाचा बैष्णव सिद्धांत जुना पांचरात्र सिद्धांतच असून त्यांत । नारायण आणि विष्णु ह्या दोन तत्वाचा आणखी समावेश आहे. | त्याच्या मतें ईश्वराचे अत्यंत पूज्य नांव नारायण आहे, त्याच्या तत्त्व-

८०८ सामान्य परिस्थिति.

ज्ञानांत गोपालकृष्ण हें नांव कधींच सांपडावयाचें नाहीं !? ( पा. ५७ ). तेव्हां रामानुजाच्या सिद्धांतांत राधापंथाचा - निकृष्ट भाग नाहीं हें सांगणें नको. ““भगवद्रीतेचा भक्तियोग त्यानें घेतला आहे हें. खरें, पण भक्तीचे स्वरूप त्याच्या मतें परमेश्वराचे संतत ध्यान याच प्रकाराला येऊन पोहोंचतें.याप्रमाणें प्राचीन चालत आलेल्या भाक्तासे- द्वांताला कांद्दींसे ब्राह्मण धमीचे स्वरूप त्यानें दिळें आहे. कारण त्याच्या मतानें शूद्र परम मोक्ष मिळण्यास योग्य नाहींत. पण रामा- नुजाचा जो पंथ रामानंदानें पुढें उत्तरेस चालविला त्यांत शूद्रांनीं आपला अधिकार मिळविला ‘’ ( सदर). याप्रमाणें रामानुजाचं मत मुळांत पुरातनमताभिमानी ब्राह्मणांच्या श्रष्ठत्वाचें होतें तरी त्याच्या उत्तरेकडील निघालेल्या पंथांत तें सुटळें आणि वर्णधर्म जरी सुटला नाहीं, तथापि जातीच्या कारणानें उत्पन होणारा वरील विद्दिष्ट भाग त्यांतून नाहींसा झाला.

नवीन अथवा वीर दैवमत.

याप्रमाणें नवीन वैष्णवमत निरनिराळ्या स्वरूपानें शैवमताच्या विरुद्ध पूर्वेते आणि दक्षिणेस म्हणजे आंध्र आणि तामिळ देशांत वाढत असतां कनाटकांत याच वेळीं लिंगायत पंथ उत्पन्न होऊन शैव धर्माचा पुनः जोर बसला. खरें म्हटलें तर हा जोराचा उपक्रम जैनधर्माच्या विरुद्ध होता, उत्तर कर्नाटकांत कलचूरी बंडामुळे थोडी वर्षे जैनधर्माचा विजय झाला,त्याच्या विरुद्ध शैवधर्माने आपली जागा पुनः व्यापण्याचा हा जोरकस प्रयत्न केला, या नव्या शैवमताचा इतिहास देण्यापूर्वी प्राचीन काळापासून शैवधर्माचा इतिहास थोड- क्‍्यांत देणें जरूर आहे.ज्याप्रमाणें जैनधमाचा आम्ही प्रारंभीचा थोड- क्‍्यांत इतिहास दिला त्याप्रमाणें लिंगायतमत नीटपणे लक्षांत येण्या- साठीं शैवधमांचा प्रांचीन इतिहास देणें जरूर आहे.

नवीन अथवा वौर दोवमत. ६०९

शैवधर्म निःसंशय वेदांहइतके जुने आहे. वैदिक क्र॒षींनीं या देवाचें भयंकर म्हणजे रुद्रस्वरूपांत तसंच मंगल म्हणजे शिव स्वरू पांत स्तवन केलें आहे. वैदिक तत्तवज्ञान्यांनींच, ज्याची इतर देवता केवळ भिन्न स्वरूपे आहेत अश्या परमेश्वराची, कल्पना उद्‌भूत केली आणि उपनिषत्कालीन तत्त्ववेत्त्यांनीं पखह्माचा सिद्धांत प्रस्थापित केला. यापुढें वेद-धर्मीयांत मतभेद झाला. कांडींनीं विष्णूस परमे- खर मानळें तर इतरांनीं शिवाला मानलें. बहुमत विष्णूच्या तफे होतें, हें ‘ अभ्निर्वरे देवानामवमो विष्णुः परम: ! या ऐतरेय आरण्य- कांतील वाक्यावरून दिसतें, परब्रह्माशीं शिवाचें तादात्म्य ही मागू- नची कल्पना आहे. प्राचीन दशोपनिषदांत ती सांपडत नाहीं, नंत- रच्या श्रताश्वतरांत ती प्रथम स्पष्टपणें मिळते. असा मतभेद व्हावा ‘ हं ठरलेलेच आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे प्र्येक धमाच्या वाढींत ‘ झाडाप्रमाणें दोन स्कंद नेहमीं फुटतात. वैदिक आर्यधर्मांत याच । न्यायानें वेदोत्तर कालांत वैष्णयवमत आणि दहेवमत असा विभाग पडला. तरी पण लौकरच सामान्य जनांत शेवमताचा प्रसार अधिक झाला, कारण सामान्य लोकांत भूतांचा व पिशाच्चांचा जास्त धाक असतो, । ब निसर्गाच्या भयंकर आपत्तींची भीति जास्त असते. पिशाच्चांचा । व रोगांचा अधिपाति रुद्रशिव आहे असें मानलें गेळें होतें. ह्याशि- बाय हिंदुस्थानांतील मूळच्या लोकांत ठिंगपूजा प्रसृत असून त्याज- विषयीं वेदांत किल्येक स्पष्ट उल्लेख आहेत. उत्तर वैदिक काळांत या । लिंगपूजेचें आणि शिवपूजेचें ऐक्य झालें. हें ऐक्य डॉ. आर. जी. | भांडारकर मानतात (पा. ११५ ) त्याहून प्राचीन काळीं झालें असें आमचें मत आहे. आम्ही पूर्वी अनेकदां सांगितलें आहे कीं, अनु- ‘ छेख ह निश्चित प्रमाण नव्हे. जरी पतेजलीनें शिवाच्या मूर्तीचा उल्लेख केला असून शिवलिंगाचा केलेला नाहीं, किंवा ‘ वेम कड- फिशिस्‌ ‘ याच्या नाण्यांवर शिवाचे मानवी स्वरूप दाखविठेळें आहे

६१० सामान्य परिस्थिति.

तरी यावरून असें सिद्ध होत नाहीं कौ, त्यांच्या काळीं ठिंगपूजा प्रचारांत नव्हती. महाभारतांत शिवपूजेचें लिंगपूजेशीं तादात्म्य स्पष्ट- पणें वर्णन केळें असल्यानें मह्याभारत-काळीं म्हणजे इ. स. पू. २०० च्या काळीं ठिंगपूजा लोकांत पूर्ण मान्य झाळी होती. तेव्हां त्या- काळींहि हृ्ींम्रमाणें शिवाचीं दोन स्वरूपें होतीं, म्हणजे पंचमुखी मानवी स्वरूप आणि टिंगस्वरूप अशीं होतीं हें खरें, तरीपण लिंग- पूजा ही लोकांत जास्त प्रसत झाली. कारण त्या पूजेला एक उदात्त तात्त्विक किंवा आध्यात्मिक अर्थ प्राप्त होऊन त्यांतील मूळची कल्पना बिलकुल नष्ट झाली. हल्लींडि लिंगपूजेंत कोणाच्याहि मनांत अशील कल्पनेची भावना येत नाह. या रीतीनें आर्य आणि अनार्य पूजांचा आध्यात्मिक मेळ होऊन ती फार प्राचीन काळीं सामान्य लोकांचा पूजामार्ग बनला.

वैष्णवमताप्रमाणेंच शैवमतांत प्राचीनकाळी निराळें तत्त्वज्ञान उत्पन्न झाळें. महाभारतांत पाथुपत तत्त्वज्ञानाचा पांचरात्र, सांख्य, योग आणि वेदांत या तत्त्वज्ञानांबरोबर उलेख आहे. किंबहुना या प्रमाणे पांच ज्ञानें आहेत असं त्यांत स्पष्ट वचन आहे. बादराय- णाच्या वेदांतसूत्रांतह्ि (इ. स, पू. १५०) पांचरात्र आणि पाद्युपतया दोन्ही मतांचे खंडन केलेलें आहे. हें पाशुपत मत मूळांत काय आहे हें मूळ ग्रंथ आपल्या समोर नसल्यानें सांगतां येत नाहीं. शेकरा- चार्यांनीं आपल्या भाष्यांत त्या मताचा उद्घार केला आहे आणि माधवानोह्ि सर्वदर्शनसंग्रहांत केला आहे. शैव आगम पुष्कळ आहेत, पण ते अलीकडचे आहेत. सर्व दौव मतें तप मानतात, | आणि इुएनत्सांगनें शैव तपस्वी शिवाच्या देवाल्यांत राहतात असं सांगि- तळे आहे. हे लकुलीश आगमाचें अनुयायी दिसतात. लकुलीश ह्वा प्रसिद्ध शैव तत्त्वज्ञानी सहाव्या शतकांत गुजराथेंत झाळा असें. दिसतें. भडोच जिल्ह्यांत कायावतार नांबाचें त्याचं तीर्थ आहे. या

नवीन अथवा वीर दौवमत. ६११

व पूवीच्या काळविभागांतील कोरीवळेखांत ह्या रोवतपरूयांचं बारीक
वर्णन आढळतें. यांच्या नांवाच्या शेवटीं शिव किंवा राशि असें उप-
पद येतें. उह्ाहरणाथ, बाप्पा रावळचा गुरु हारीतराशि होता.
त्यांच्यांत गादीची परंपराहि असे, आणि एका कोरीवलेखांत राजाच्या
वंशावळीप्रमाणें यांचीहि वंशावळ दिळी आहे. पण आपल्या या
विषयाच्या चर्चेतील मुख्य मुद्दे अनिश्चित राहतात. हे शैव तपस्वी
ब्राह्मणच जातीचे असत किंवा सर्व जातींचे, लकुलीशाच्या आग-
मांत प्राणिहिंसायुक्त वैदिक यक्ष मान्य आहेत कीं नाहींत आणि
। त्यांत मांसान्न नोषद्ध आहे कीं काय हें समजत नाहीं. या मुद्यांच्या
निर्णयाकरितां शैव तांत्रिक ग्रंथांचा काळजीपूवक अभ्यास झाला ‘ पाहिजे. आमचो माहती अल्प असल्यानें या मुद्यांवर निश्चित मत देणें शक्‍य नाहीं, व खुद्द लकुलीशाचा ग्रंथ अद्याप उपलब्ध नाहीं. ‘ पण निरानेराळ्या दैवपंथांत सर्व जातींस त्यांच्यांतील तपस्वी होण्याची परवानगी असावी हें संभवनीय आहे. आणि या तप- रूवयांना मांसान वर्ज असावें, परतु गृहस्थ अनुयायांस शैवमतानें वैष्णवमताप्रमाणें मांसान निषिद्ध केलें असावें असं दिसत नाहीं. या कारणांनीं सामान्य लोकांचा-विशषतः: हूर रजपुतांचा ज्यांनीं सातव्या व आठव्या शतकांत मुसलमानांच्या वाढत्या लाटेस विरोध करून हाणून पाडलें त्यांचा-घमे शैवधर्मच होता. या संबंधानें बाप्पा राव- ळचा महान पराक्रम त्याचा दैवगुरु ह्वारीतराशे याने प्रेरित केळेला होता. इतर रजपूत कुळांतहि या व मागच्या कालविभागांत, कांही थोडे अपवाद खेरीज करून, शिवभक्तीचाच धर्म अंगीकृत होता. असो, हिंदुस्थानची व विशेषत कुंतलदेशाची धार्मिक स्थिति या बाबतींत

*ळलकुलीशाच्या पंचाध्यार्यांचचा उल्लेख पुष्कळदां येतो पण तो अ्रंय अद्याप मिळालेला नाहीं.

६१२९ सामान्य परिस्थिति.

उत्तर चाठुक्यांच्या अमदानींत (हे कडे शौव होते) अशा रीतीची होती; इतक्यांत एकाएकीं पूर्वी सांगितल्याप्रमाणें कळचूरींच्या बंडामुळें जैन- धर्म पुढें सरसावला

जेनांची हकीकत आणि लिंगायतांनीं बसव पुराणांत दिलेली हकीकत भिन्न असली तरी दोहोंत कांहीं मध्यवती गोष्टी एक आहेत. लिंगायत पंथाचा संस्थापक बसव हा ब्राह्मण असून चाढुक्यांचा कलचूरी सेनापति, त्यांची सत्ता बळकावणारा विजन, याचा कांहीं काळ तो प्रधान होता. आमच्या मतें. बसव स्वतःच मोठा तत्त्व- ज्ञानी व धर्मसुधारक होता. डॉ. रा. गो. भांडारकर असं म्हणतात कीं, तत्पूर्वी सुरू झालेल्या आराध्य नांवाच्या मताचा केवळ तो एक जोरदार पुरस्कता होता, पण आम्हांत तसें वाटत नाहीं. आम्ही डॉक्टरांच्या मताहून त्यांचा योग्य आदर करून आपला मतभेद नमूद करितों.बसवाचे सिद्धांत इतके नवीन व निराळे आहेत कीं,त्यासच या नवीन मताचा संस्थापक मानलें पाहिजे. बसव पुराणांतील, नारदानें भारतवष!त शैवमत नष्ट झालें असें सांगितल्यावरून दांकरानें नंदीस शैवमत स्थापन करण्यास पाठाविलें त्या नंदीचा अवतार बसव होय या कथेचे तात्पर्यहे तेंच आहे. आराध्य नांवाच्या पूर्वीच असलेल्या पंथातून त्यानें कांहीं मतें घेतलीं असतील, पण त्यांस त्यानें अगदी नवीन निराळें स्वरूप दिलें. त्याचा मामा बलदेव हा त्याच्यापूर्वी राजाचा दिवाण होता, आणि मामाच्या मृत्यूनंतर तो स्वतः दिवाण झाला. त्याची बह्ीण राजास विवाहिळी होती असें म्हणतात, पण जैन म्हणतात की, ती राजाची राख होती. बहुधा ही जैनांची गोष्ट बनावट असावी, आणि बसव याचा वर्णधमावर विश्वास नसल्यानें या प्रतिळोम विवाहासंबंधानें त्यास हरकत नसावी. यावरून स्पष्ट दिसतें कीं, प्राचीन परंपरा सोडण्यास बसव पूर्ण तयार होता. या

रीतीनें बसव आणि त्याचा जैन राजा दोघांनाहि जुन्या मतांच्या लोकांच्या

नवीन अथवा वोर शवमत. ६१३

जातिकल्पनेविषयीं अनादर होता.पण इतर महत्त्वाच्या धर्माच्या बाब- तींत त्यांचा मतभेद असल्यानें दोघांत जोराचा तंटा उपस्थित झाला. बसवानें खजिन्यांतून लिंगाइतांचे धार्मिक पुढारी ‘ जंगम! यां करितां पुष्कळ रकमा खच केल्या; तेव्हां राजानें बसवावर काम चालविले, यामुळें बसव पळाला. यानंतर काय झालें यासंबंधाने भिन्न हकीकती आहेत. पण विञ्जनाचा एका जंगमाने खून केला हें निश्चित आहे (इ. ११६७). या रीतीनें जैन आणि लिंगायत यांचा तंटा सुरू झाला. कलचूरींचं बंड थोडेंच दिवस टिकले, आणि हक्क- दार राजा चालुक्य सोमेश्वर यानें ते ११८२ इसवींत मोडले. पण ठिंगायतांचा पंथ कुंतठांत म्हणजे दक्षिण महाराष्ट्र देशांत जोरानें वाढला आणि त्यानें कर्नाटक देशांतून जैनधर्माचा कायमचा पाडाव केला.

या नवीन वीर शोंवपंथाचे विशेष सिद्धांत, ज्यामुळे त्यांस जैन- धर्माचा पाडाव करितां आला ते, येथें सांगितळे पाहिजेत. प्रथम गोष्ट ही कीं, बसवानें अहिंसा धर्मास मुख्य स्थान दिले, आणि या- वेळीं हिंसेविरुद्ध लोकमताचा जो प्रवाह चालला होता ल्यास मान दिला. अर्थात्‌ हिंदुधमाच्या ज्या दोषी भागावर जैन हछा करून जय पावत तो भाग हिंदुधर्मातून त्यानें काढून टाकला. दुसरे, त्राह्मणांना धार्मिक श्रेष्ठत्व आहे हें मत त्यानें नाकरळें; आणि प्रत्ये- कास परमगति मिळविण्याचा अधिकार आहे हें मत प्रदिपादले. अगदीं दक्षिणचे वैष्णव हिंदुमधील प्राचीन वर्णव्यवस्था न सोडतां तीस चिकटून बसले हे आपण पाहिलेंच आहे. बसवानेंघेर्यानें पुढे येऊन जाति झुगारून दिल्या आणि ह्याच्या वेळीं तरी ब्राह्मणांचा आणि चांडाळांचाहि विवाह झाला. त्यानें संन्यास आणि तप हे दोन्हीहि नाकबूल केळे, आणि जैनांच्या पुढें जाऊन त्यांच्यावर एक मुद्दा अधिक गांठला. त्याचा उपदेश असा आहे कीं प्रत्येकाने उद्योग

्१४ सामान्य परिस्थिति.

करून आपलें पोट भरावे, कोणी मिक्षा मागूं नये, त्यांचे धार्मिक.

गुरु जंगम यांनींहि मिक्षा मागू नये.’! उद्योगाचे महत्त्व व श्रेष्ठत्व प्रतिपादणारा व भिक्षा बंद करणारा असा हिंदुस्थानांतील पहिला

तत्त्ववेत्ता बसव होय. त्यानेंच एकद्यानं उपदेशिळें की, कायकानेंच

( कर्माने ) कैलास ( मोक्ष ) मिळेळ. तसेच सर्व लोकांनीं नीत्या-

चरण करावें ह्याबद्दल त्याचा अत्यंत कटाक्ष असून यांत त्यास जेन आणि बौद्ध धमोपेक्षांहि अधिक जय आढा. कारण एकंदर ठिंगायत समाज छचोरपणा सोडून विशेष नीतिमत्तेचे आचरण करतो. शेव- टली गोष्ट ही कीं, सामान्य जनांच्या ठिंगपूजेसच त्यानें उचळून

घरिळें आणि यारीतीनें त्यांचा देव त्याने बदलला नाहीं.या लिंगकल्प- नेत एक परमोच्च आध्यात्मिक अर्थ घालणें त्यास जरूर होतें.त्याप्रमाणं करून त्यानें आपल्या पंथीयांनीं शिवार्चे पवित्र टिंग शरीरावर नेहमीं धारण करावें असें प्रतिपादिले. ब्राह्मणांचे जानवें त्यानें टाकूनच टाकलें होतें, त्याऐवजी ठिंगायतांकरितां लिंग बांधलेला एक चांदीचा दोरा त्यानें घातला. ब्राह्मण आणि जातिव्यवस्था यांस काढून टाक-

ल्यानें बसवास साहजिकच लोकांस त्यांच्याच भाषेंत उपदेश कारितां;

आला. जुन्या धर्मवादि पांडितांशीं संस्कृत भाषेंत जेनांप्रमाणे वाद- विवाद करण्याकडे त्यानें लक्षच दिलें नाद्दी; आणि कानडी भाषेंत आपल्या धर्माचा त्यानें लह्मान लहान जोरदार वाक्‍्यांनीं उपदेश केला. हेच लिंगायतांचे पवित्र प्रंथ झाळे आहेत. या कारणानेंहि सामान्य जनांच्या दृष्टीनें त्यानें जैनांवर आणि जुन्या धर्मीभिनानी पॉडेतांवर जय मिळविला. तेव्हांपासून दृींपर्यंत कर्नाटकांत शेतकरी व व्यापारी वगात लिंगायतांचा अधिक भरणा आहे. | लिंगायत पंथाची निरनिराळीं तत्त्वज्ञानविषयक मते रामानुज किंवा शांकर यांच्या तत्त्वज्ञानाच्या तुलनेंनें काय आहेत हं आम्हास; येथें पाहण्याची आवश्‍यकता नाहीं. वाचकांची इच्छा असल्यास डॉ.

क *- शी

वीरशेव संस्थापक याविषयीं राईसचा लेख. ६१५

रा. गो. भांडारकर यांचा शैवधर्मावरीळ विद्वत्ताप्रचुर ग्रंथ पह्हावा. पण हं येथें सांगितलें पाहिजे कीं, ठिंगायतांनीं जातींचे तत्त्व जरी’ काढून टाकिळें, तरी हिंदूंच्या स्वभावाप्रमाणे त्यांत थोडीशी जाति- व्यवस्था उत्पन झाली आहे. ह्यांत आचार्य आणि जंगम हे ब्राह्मणां- सारखे असून जंगम विवाहित असतात. पंचमांत कित्येक जाति. आहेत पण त्या फार नाहींत. सामाजिक सुधारणेच्या दृष्टीनें लिंगा- यत पंथ स्त्रियांचा कैवारी आहे.त्यांच्यांत श्रियांनाहि लहानपणीं उपनयन संस्कार आहे. त्यांस रजस्वलाकाळीं विटाळांत बाजूस बसावें लागत नाहीं, आणि पुरुषाप्रमाणेंच स्रिया परमगति म्हणजे सामरस्य मिळ- विण्यास योग्य आहेत असं ते मानतात. ह्या पंथांत एक निराळी गायत्री आहे ( 3३% नमःशिवाय ) आणि निराळी गोत्रव्यवस्थाहि आहे. हे मांस आणि मद्य यांपासून अल्यंत निवृत्त अततात.

टिप्पणी. वीरदेव पंथ व त्याचे संस्थापक याविषर्या राईसचा लेख.

कर्नाटकी वाढ्ययाच्या इतिहासावरील राईसच्या ग्रंथांतन “ लिंगायत पथ व त्यांचे बसव आणि इतर संस्थापक ? याविषयींचा पुढील उतारा आम्ही येथे देतों (पा. ४० ते ५५ ). “ वीरशेव म्हणजे कट्टे गौव इतर शैवांपासून म्हणजे (१) सामान्य (२) मिश्र (हे शिव आणि विष्णु दोघां ची पूजा करितात ) आणि (३) शुद्ध हशोब (हे शिवाचीच पूजा करितात पण लिंग बाळगीत नाहींत) यां पासून मिन्न आहेत.वीरशेवांची विशिष्ट खूण ही कीं ते (स्त्रिया व पुरुष) गळ्यांत अडकवलेले व चांदीच्या किंवा लाक- डाच्या लहान पेटींत घातलेलं दगडाचे लिंग नेहमी अंगावर बाळगतात. जेगम म्हणजे लिंगाइताचे घार्मेक गुरू लिंग डोक्यावर बांधतात. हा हिंग बांधण्याचा वाघि उपनयनाप्रमाणें अत्यंत पवित्ल असून लहानपणां- तच केला जातो.?

“बसवानें असरा उपदेश केला आहे काँ, सर्व जातीचे लोक किंबहुना

“६१६ सामान्य परिस्थिति.

अंत्यज, ठिंगाइत पंथांत सामील होण्यास अधिकारी आहेत. ठिंगाइ- -तांचें दुसरे विशेष हे का ते प्रेते दहन करीत नाहींत आणि त्यांच्यांत विधवांचा पुनर्विवाह मान्य आहे. त्यांचा घर्मग्रथ २८ शोबागमांचा आहे. शिवगीताहि ते श्रेष्ठ मानतात. त्यांचे मुख्य ख्रिद्धांत अष्टावरण आणि षटू- स्थल आहेत. प्राचीन त्रेसष्ट तामिल साधूनां ते मानतात, पण यापँका आठच वीरशैव आहेत, अलीकडील साघु म्हणजे वसव आणि त्याचे मुख्य शिष्य हे होत. यांचा मुख्य मठ म्हैसूर प्रांतांतील चित्तलदुगे येथे आहे.”

“या पंथाचा प्रसिद्ध संस्थापक बसव हा एक आराध्य ब्राह्मण होता. लहानपर्णी तो मलप्रभा आणि कृष्णा यांच्या संगमी कप्पडी गांव आहे व तेथें संगमेश्वर नांवाचें शिवाचे पूज्यस्थान आहे तेथ रहात असे. येथे वीरशेव पंथाचा उद्धार करावा अशी परमेश्वराची प्रेरणा त्यास वाटूं ला- गली. त्याचा मामा आणि सासरा बिजलाचा मेली होता. तो मेला तेव्हां त्यास त्याच्या जागी नेमले, त्याची बहीण पद्मावती हिचे लग्न राजाशी

  • झाले होतें. त्याच्या दुसऱ्या बहिणींचा मुलगा चन्नबसव ह्वा त्याचा मुख्य शिष्य होता, त्याच्या मदतीनें आपल्या सिद्धांताचा व शिवपूजेच्या नवीन मार्गाचा तो उपदेश करूं लागला. राजाचा खजिना त्याच्या ताब्यांत असल्याने जगमाच्या मदर्तासाठी त्याने मोठाल्या रकमा खच केल्या. ‘मंचन नांवाचा दुसरा एक ब्राह्मण मंत्री होता -त्यानें बसवावर सरकारी पेसा खाल्याचा आरोप आणला, राजानें त्यास पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो पळाला आणि आपल्या अनुयायांस मिळून त्यानें राजाचा पराभवहि केला.तेव्हां राजानें त्यास निरुपायानें पूर्वीच्या जागेवर नेमले.”

“यानंतर बर वृत्त घडलें त्याची हर्काकत भिन्न सांगतात. लिंगाइत म्हणतात की, राजानें दोघा लिंगाइत भक्तांचे डोळे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हां बसवानें कल्याणनगरास शाप देऊन व आपल्या अनुयायांस राजास ठार मारण्यास सांगून तो संगमेश्वर येथें एकांतांत राहिला; आणि

शेवर्टी तेथील शिवालिंगांत विलीन झाला. जेन लोक म्हणतात की, बस-

बानें एक विष भरलेले फळ राजास पाठविलें; आणि पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या उळवी गांवास तो पळुन गेला; तेथ राजाच्या घुक्नानें वेढा दिला तेव्हां निरांशेनें बसवानें विाहिरींत उडी टाकून जीव दिला.

ध्यम. य

-४८%१%%.७. ५, -.€

वीरदषोव संस्थापक याविषयीं राईचा लेख. ६१७

५ब॒सवानें लिंगाइत पंथाची तत्त्वे प्रतिपादन करणारे कानडी गद्य ग्रँथ धुढील लिहिले आहेत, षदस्थलवचन, बालज्ञानवचन, सच्चरित्रवचन, राजयोगवचन आणि मंत्रगोप्य.?”

“बसवाचा मुख्य शिष्य चन्नबसव हा होय. यास बसवाहूनाहिे अधिक मानतात. त्यास प्रत्यक्ष शिवाचा अवतार समजतात, बसव राजकारणांत’ गुंतलेला असल्यानें घर्मप्रसाराचें काम मुख्यतः चन्नबसवाच्या देखरेखी- खालीं असे, मामाच्या मरणानंतर राजकृपंत तो घेतला गेला असोहि म्हणतात. दुसरे मुख्य सहकार्यकर्ते माडिवाल, माचय्य, प्रभुदेवे आणि सिद्धराम होतं. यांनी केलेल्या चमत्कारांच्या गोष्टी चन्नबसव व इतर घुराणांत अनेक दिल्या आहेत. ”

याप्रमाणें या कालविभागांत पश्चिमेकडे जेनघर्मांचा प्रसार झाला तर दक्षिणेकडे शैवघमींचा झाला आणि पूर्वेकडे, किंबहुना काइमीरपर्यंत उत्त- रेकडे, वैष्णव धमाचा प्रसार झाला. या दोन धर्मात कित्येक पंथ उत्पन्न झाले व त्यांची निर्रानराळीं तत्त्वज्ञाने, निरनिराळ्या कल्पना व परिभाषा यांसह उत्पन्न होऊन देशांतील बुद्धिवान्‌ लोकांची पारलोकिक प्रश्नांविषयी. विरोधी सिद्धांतांनी घांदल उडाली, या पंथांत निरनिराळे देव मुख्य इश्वर मानले गेले इतकंच नव्हे तर आपल्या मुख्य परमेश्वराचे इतर देव अंकित आहेत असें दाखविलें जाई. शेव आणि वैष्णव या मुख्य जोर- दार मतांशिवाय दुगी आणि गणपति यांचीहि भक्ति, निराळी तत्त्वज्ञानें व आगम यांसह, उत्पन्न होऊन आणखी दोन पंथ उत्पन्न झाले व त्यांत हे देव सर्बात श्रेष्ठ मानले गेले, हे शाक्त व गाणपत्य पंथ बहूघा याच काळांत उत्पन्न झाले अक्षावेत, तथापि याबद्दल आमचे जवळ निश्चित घुरावा नाहीं. या निरनिराळ्या पंथामुळें कित्येक सामाजिक बदल होऊनः या पंथांचे ग्रहस्थ अनुयायी, ज्यांस उच्च तत्वज्ञानाच्या प्रश्नावर विवाद करितां येत नसे ते, लहान मुद्यांवरच भांडू लागले, हा देव मोठा काँ तो देव मोठा ! ब्राह्मण धार्मेक दृष्टया श्रेष्ठ कां १ मुनींना नभ्न राहणेच जरूर आहे कीं नाहीं ! स्त्रियांत मोक्षाची पात्रता आहे कीं नाहीं! इत्यादि

१८ सामान्य परिस्थिति.

प्रश्नांवर सामान्यलोकाहे विवाद करू लागले. यामुळे हिंदु जनता, तींत अनेक एकमेकाला विरोधी आणि आपसांत झगडणारे पंथ उत्पन्न होऊन विभागली गेली. अर्थात्‌ घार्भिक ऐक्य ही षी राष्ट्रीय शक्तीची मुख्य एक बाब आहे ती नष्टझाली. हे भिन्न भिन्न पंथ ज्या एका मुद्यावर मात्र एकमत होते, तो आहिंसा सिद्धांत होय. प्राणिहत्या आणि मांसाहार यांचा सर्वानी प्रत्यक्ष निषच नसला तरी अव्हेर केला; आणि यामुळांहे हिंदुराषट्राची संर- क्षणशाक्ते दुबेलळ झाली. अभिनवगुस्त आणि कल़ट यांनी कारिमरांत जो नवा खिद्धांत प्रतिपादिला त्यांतहि आहेंसा तत्त्वाचा पुरस्कार केलेला दिसतो. भाग २ यांत हा श्राकलूट कोण असा आम्ही प्रश्न केला आहे. “ देशाच्या उद्धाराकरितां अवंतिवर्मनूच्या वेळीं हा झाला ” असे कल्ह- णानें याचें वर्णन केलें आहे. हा वेष्णव ग्रंथकार असावा असें आम्हांस वाटलें, पण डॉ. भांडाकरांच्या शेवधमांवरील पुस्तकावरून हा शोव तत्त्व- वेत्ता होता असें दिसतें. तथापि वर सांगितल्याप्रमाण यानें आहिंसेचाच पुरस्कार केला असावा. असे नसते तर अवातेवर्मन्‌ या कड्या वैष्णव राजा- च्या पूर्वी वर्णिलेल्या अमदानीत त्याचा प्रसार झाला नसता. तथा हें मान्य केळें पाहिजे कीं, उत्तराहंदुस्थानांतील आणि महाराष्टांतील बहुजनसमाज स्मातं घमांचाच अनुयायी हाता, स्मात मतांत हिंहुघमांचे पांची मुख्य देव सारखेच मोठे मानलेले आहेत. .दक्षिणेत शेव घम आणणि पूवस वेष्णव घर्म यांनीं मात्र जैनघमींचा पाडाव केल्यानंतर आपसांत इतक्या द्वेषाने युद्ध चालविलळें कॉ, राजेलोकांनी आपली राजकीय सत्ता विरोधी घर्म पादाक्रांत करण्याकडे उपयोगेली. एका चोल राजानें रामानुजास

  • शिव सवात भ्रष्ट देव आहे ? असें कबूल करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला हें आपण पूर्वी पाहिळेंच आहे. अद्यापहि शैव आणि वेष्णव घमांच्या ग्रहृस्थ अनुयायांमध्ये कर्नाटक, आंश्र आणि तामिल देश यांत द्वेष चाळू आहे. माध्व मत आणि तत्वज्ञान १४ व्या शतकांत उत्त्पन्न होऊन या तंद्यांत आणखी तिसरा पंथ उत्पन्न झाला

शिव आणि विष्णु यांच्या भक्तींतील विरोध काहून टाकण्याचा प्रयत्न बेंगालच्या विजयसेनानें केलेला त्याच्या देवपारा कोरीव लेखावरून ( ए इ. पा, ३१०७) दिसून आलेला पाहून आम्हांला आश्चथे वाटले. विजयसेन

शेव वैष्णवमतांच्या एकीचा प्रयत्न. ६१९

जैव होता पण ओरीसामधून बंगाल्यांत बहुधा त्याच्याच वेळीं वैष्णव- मत पसरत आलें असावें. कारण त्याचा नातु लक्ष्मणसेन हा परम वैष्णव होता हें आपण पाहिलेच आहे. तेव्हां विजयसेनास या दोन्ही भाक्ति शिव आणि विष्णु एकाच मूर्तीत आणून एकत्र करण्याची कल्पना सुचली असावी. आणि त्यांने आपल्या बांधलेल्या देवाल्यास प्रयुम्ने- श्वर हं योग्य नांव देऊन शिव आणि विष्णूची एकत्र केलेली मूर्ति त्या देवालयांत ठेवली. या शिलालेखांत मूर्तींचे वर्णन पुढीलप्रमाणें आहे. “£लक्ष्मी आणि शेलकन्या या दोघांचे पाते ज्या मू्तीत एकत्र आहेत आणि एंकीनें खेळतात, त्या प्रच्ुम्नेश्वर नांवाच्या. मूतींस आम्ही नमस्कार करितों. या दोघीनीं आपल्या पतींच्या मध्यें उभे राहून अभिन्न मूर्ती करण्याच्या कामांत कांहींसा अडथळा केला आहे. जगाचा नाश कर- णारा शिव याचें भूषण जे गजचम तेंच चित्रित पीतांबर आहे, आणि गळ्यांतला हार तोच महानाग आहे. अंगाला लावलेले चदन हच मस्म आहे. हातांत घेतलेली नीलमण्याची माळ हीच रुद्राक्षमाळ असून त्यांतील गरूडमाणि गोनस आहे. आणि मोत्याचा हार हाच अस्थींची माला आहे. ? या वर्णनावरून आम्हांस असे वाटतें कीं एकच मूर्त शिव आणि विष्णूसारखी दिसत असावी.

विजयसेन कर्नाटक ऊर्फ दक्षिण येथील क्षत्रिय होता, आणि महारा- ट्रांत खुद्द पंढरपूरच्या विठोबाच्या भक्तीचे या कालविभागाच्या अंतीं जें एक नवीन वैष्णव मत उत्पन्न झालें त्यांत हीच दोन्ही मतें एक कर- ण्याची भावना दृष्टोत्पत्तीस येतं. डा. रा. गो. भांडारकर यांच्यामते ही भाक्ति महाराष्ट्रांत दक्षिणिकडून आली असून विठोबा हा शब्द विष्णु

  • लक्ष्मीवलभशैेलजादयितयोरद्वैतलीलाग्रहम प्रयुम्नेश्वरशन्दलाऊछनम. घिष्ठानं नमस्कुमेहे । यत्नालिज्चनभज्ञकातरतया स्थित्वान्तरे कान्तयोः देवीभ्यां कथमप्यमिन्नतनुताशिल्पेन्तराय:कृतः ॥ १ ।॥ चित्रक्षोमेभचर्मा हृदयविनिहतस्थूलहारोरगेन्द्रः श्रीखण्डक्षोद मस्मा करनिहितमहानीलर- त्नाक्षमालः । वेशस्तनास्य तेने गरुडमणिलतागोलप. कान्तमुक्ता-नेप- थ्यन्नस्थिमालासमुचितरचनः कल्पकापालिकस्य | २

६२० सामान्य परिस्थिति.

शब्दाचें कानडीरूप आहे. परंतु विठोबाच्या भक्तीचे वेणव मत दक्षि- “णच्या रामानुजाच्या वैष्णव मताहून फार भिन्न आहे. तसेंच बंगाली आणि ऊरिया भाषेंत विष्पु शब्दाचें प्राकृत रूप विष्ठु आहे. परंतु पढपूरचें वष्णव मत बंगालच्या वेष्णव मताहूनहृि भिन्न आहे. त्यांत भोगाचं स्वरूप मुळींच नाहीं. त्यांत गोपींचा मुळींच उललेख येत नाहीं. पंढर्रास रुक्मिणी सुद्धां मागाहून आली. पंढरुरची विष्णूची मूर्त स्तरी- देवतेविरह्तित आहे. तिची तऱ्हा सुद्धां अद्वितीय आहे. कारण दोन्ही हात कमरेवर ठेवले असून डोक्यावर शिवलिंग आहे, ही मूर्ति कोणी बस- विली हं अद्याप निश्चित झालं नाहीं. कारण पुंडलिक हा विठोबाचा भक्त पौराणिक आहे. डॉ, भांडारकरांनीं ऐतिहासिक दाखले दिले आहेत त्यावरून हे॑ ठिकाण या विष्णुमूतींवरूनच मुळांत पुण्यक्षेत्त मानलं गेलें असें दिसतें. इ. १२४९ च्या कोरीब लेखांत भीमरथीचा उललेख आहे. तेव्हां यावरून असें अनुमान निघतें कीं, पंढरपूरचा विठोबा यापूर्वी १०० वषें, निदान ५० वषे, प्रसिद्ध असावा. इ. १२७०च्या पंढरपूर येथेच असलेल्या एका शिलालेखांत केशवाचा पुत्र भानु यानें एक आत्पोयाम यज्ञ केला, त्या यज्ञांत लोकांच्या झुंडी आणि विठ्ठल व इतर देव संतुष्ट झाले असे वर्णन आहे ( भांडारकरांचें वेष्णणय मत पा. ८१,८८ ), पांडुरंग हें नांव हेमचद्राच्या मतें शिवाचें नांव आहे, अ॥णि पढरपूर येथें एक शिवाचें देवालयहि आहे. तेथें यात्रेकरूंस विठोबाच्या दर्शनापूर्वी जावें लागतें, ह्याशिवाय पेढरपूर येथील विठ्ठलमागीचा कोणत्याहि तत्त्व- ज्ञानाशी संबंघ नाहीं. हा एक केंवळ भक्तिमार्ग असून तो प्रथम नाम- देव ( सुमारें १२७० इ. ) आणि ज्ञानदेव महाराष्ट्रांतील सर्वोत मुख्य जुने वेष्णवभक्त, यांनीं वाढविला. विठोबाचें मंदिर सवे महाराष्ट्रभर वर्गणी जमवून बांधलें गेळे असें देवळांतील चोऱ्यांशीच्या १३०० इस- बीच्या सुमाराच्या लेखावरून दिसतं. त्याप्रमाणें १३व्या शतकांत महा- राष्ट्रांत विठोबाची भाक्ते प्रसुत झाली, तरी पण पंढरपुरास ती प्रारंभी १२व्या शतकाच्या अंतीं किंवा मध्याच्या सुमारास आली असलीं

  • कानडींत बिट्टीदेव रूप येतें.
पंढरपुरचा विठोबा. ६२१

पाहिजे; म्हणजे या भागांतील कालाविभागांतलींच ती आहे. तेव्हां हं आश्चय आहे काँ, त्यांत शिवभक्तीचा किंवा बोदिक यज्ञमागीचा बिल- कुल द्वेष नाही; आणि कोणत्याहि तत्त्वज्ञानांशीं तिचा संबंध नाही, तींत जातिभेदाहि टाकलेला नाहीं. या मतांत सर्व जातीचे लोक जाति ठेऊन घेतले जातात; आणि ते इंश्वरासमोर समान असून भक्तिभार्गाने सर्वास मोक्ष साध्य आहे, मग ते पुरुष अथवा स्त्रिया, ब्राह्मण अथवा ब्राह्मणेतर असोत. तात्पर्य या रीतीनें भगवद्रीतेचा शुद्ध भक्तियोग-सिद्धांत यांत खऱ्या रीतीने अंमलांत आणला आहे.

याप्रमाणें दौवमत आणि वेष्णवमत एक करण्याचे हे दोन प्रयत्न । झाले असून त्यांचा जास्त ‘प्रसार झालेला नाहीं आणि हिंदुघर्म अद्याप | या दोन मतांत दुभंगलेला आहे हे दुदेंव होय. हिंदुघर्मास किंवा जेन | घर्मास आहिंसा टाकण्यास सांगणें शक्‍य नाहीं, कारण त्यांच्या अध्या- । त्मिक प्रगतीचा हा न्यायप्रासत परिणाम आहे. तसेंच अद्वेत खरें की द्वैत । खरं हें ठरविणे कठीण आहे, आणि परमेश्वर आणि जग एक आहेत ।काॉ दोन या प्रश्नावर मिन्न मत बाळगण्याविषयीं लोकांचे एकमत झाल्यास ।कांहीं नुकसान नाही. पण निःसंशय ‘ हिंदुघमांनें शिव मोठा काँ विष्णु ।मोठा हा विवाद सोडून देणें शक्‍य आहे. असें असून एका चोळराजाने विष्णु मोठा असें मानण्याबद्दलळ लोकांचा छळ केला. आणि अधघिरा- जेन्द्र ( यास वेष्णव क्मिकंठ म्हणतात ) यानें विदम्बरम्‌ टेकडीवरील विष्णु देवाल्याचा विध्वस केला (इ. ए. १९१२ ). अलीकडीछ तत्त्ववेतत्यांनी तुलसीदासाप्रमाणे महाभारतांत केलेल्या अशा स्पष्ट प्रयत्नास अनुसरून या दोन्ही भक्तींचा विरोध काढून टाकण्याचा प्रयत्न केला, हा विरोध महाभारताइतका लुना आहे हं खरें, पण महाभारतांत विष्णूस ‘पुख्य देव मानून खुद्द शिव त्याची पूजा करितो आणि विष्णु शिवास एख्य मानून त्याची स्तुति करितो (अनुशासन पर्वार्ताल उपमन्यु भाख्यान पहा ). परंतु प्रद्युम्नेश्राच्या मागीनें आणखी असा प्रयत्न धाला पाहेजे कीं, या दोन्ही देवांची एकच मूर्ति करावी, किंवा पंढर- येथील विठोबाच्या मूतीप्रमागें विष्णूच्या डोक्यावर शिवलिंग दाख-

म, भा…४.०

८२२ सामान्य परिस्थिति.

वावे आणि शिवलिंगाच्या डोक्यावर विष्णूच स्वरूप दाखवावे. याप्रमाणे या दोन्ही भाक्ते एक करण्याचा पद्धतशीर प्रयत्न केल्यास, हिंदुघमोतील ही फूट नाहींशी होऊन हिंदूंच्या दुर्बलतेचें एक कारण निघून जाईल.

टिप्पणी १. मोक्षाविषर्यीच्या भिन्न कल्पना.

मोक्ष कोणास मिळेल म्हणजे लन्ममरणाच्या फेऱ्यापासून गुक्त होण्यास कोण योग्य आहे याविषयीं हिंदुंमध्ये भिन्न कल्पना होत्या व जेनांत सुद्धां होत्या. प्रत्येक घर्मामध्यें मोक्षाची कल्पना असते आणि त्यांचे एक विर्िष्ट . स्वरूप मानलें गेळेळें असतं. पण इतर घर्मात एखाद्या विशिष्ट लोकांख मोक्षाचा अधिकार नाहीं अशी कल्पना नसते. अलूबेरूनीनें या विषयावर | घुढीलप्रमाणें लिहिळे आहे (भा. १ प्रा. २ पा. १०४), “मोक्ष कोणास मिळूं शकेल याविषयी हिंदूलोकांत भिन्न कल्पना आहेत. कांहीं लोक असें मानतात काँ ब्राह्मण ब क्षत्रिय यांसच मोक्ष मिळेल, कारण त्यांबच वेदाघध्ययनाचा अधिकार आहे. पण कित्येक असें मानतात कीं व्यासव- चन * पंचवीस जाणा म्हणजे तुमचा कोणताहि घम असला तरी तुम्हीं मुक्त व्हाल ‘ असें असल्यानें प्रत्येकास मोक्षाचा अधिकार आहे. तसेच भगवद्गीता म्हणते ‘ स्त्रिया, वेर्य व शूद्र सुद्धां माझी भक्ति करतीळ तर मला येऊन पोहोंचर्ताल, मग ब्राह्मण व क्षत्रिय यांची गोष्टच काय!” ” | या विषयाची अल्बेरूनीची माहिती स्पष्टपणें बारकाईंची दिसते. फक्त ५ वेदमार्गानेंच मोक्ष मिळेल अशी प्राचीनकाळी समजूत होती हं आश्चर्य-/ कारक नाहीं. कारण खिस्ती लोक बायबलाच्याच द्वारे उत्तम गति जे आणि मुसलमान लोक कुराणाच्याच द्वारेंमिळेळ असं मानतात. ओपनि-: षदिक आये तत्त्ववेत्यांनी आणखी एक असा सिद्धान्त प्रतिपादिला की मोक्ष संन्यासानेंच मिळेल. हीच कल्गना बोढ व जैन घर्माने घेत ( खिस्तानोहे हाच. सिद्धांत उपदेशिळेला दिसतो ), ज्याअर्थी स्त्रिय आणि शूद्र यांस वेदाध्ययनाचा आणि संन्यास्राचा अधिकार नाहीं,

क… का

मोक्षाविषर्यांच्या भिन्न कल्पना. दरड

त्याअर्थी त्यांस मोक्ष मिळणें शक्‍य नाहीं असे पूर्वी मानीत, प्राचीन घर्मा- भिमानी पण उदार भगवर्द्रातेने भक्तीचा नवीन सिद्धांत प्रतिपादिला, आणि या मार्गानें स्त्रिया आणि शाद्र (यांत वैद्याहि मिळविले गेले ) यांस वेदाध्ययन किंवा संन्यास यांचा अधिकार ब्राह्मणक्षात्रियांप्रमार्णे नख्रला, तरी भक्तिमार्गानें परमेश्वरापाशीं पोंचून त्यांस मुक्ति मिळेल असा सिद्धांत उपदेशिला. व्यासानें सांख्यमतानुरूप ज्ञान मुख्य मानळें आणि परमेश्वराचे खरें ज्ञान झालें म्हणजे मोक्ष मिळालाच अर्से प्रतिपादिले. भगमद्रीतेचें उदार मत श्रीकृष्णकालीन तत्त्ववेच्यांस भूषणास्पद आहे. आणि अर्से अल्बेरूनीहि कबूल करितो, पण श्रीकृष्ण स्वतः शूद्र होता | म्हणून हे मत त्याने प्रतिपादिले असं तो म्हणतो. हिंदुघमंग्रेथांची बारीक | पाहिती असलेल्या अल्‌बेरूनीनें हें चुकीचे विधान कसें केलें हे आश्चर्य

कारक आहे. श्रीकृष्ण हा नंदाचा मानीव पुत्र होता आणि नंद खरोखर

शेवटच्या गतीची कल्पना वेदांत्याहून वेष्णवांची निराळी होती. ण रामानुज हा पक्का पुराणघरमांभिमानी तत्त्ववेत्ता असल्यानें मोक्ष मिळ-

॥ाम्हांस वाटतें. लिंगायत अथया वीररशेव यांची मोक्षाची कल्पना णवांहून निराळी आहे. कारण त्यांचा सोत श्रेष्ठ देव शिव आहे, पण गणांच्या मतें स्त्रियांसह प्रत्येकांस मोक्षाचा म्हणजे केलासांत शिवाच्या वेचा अधिकार आहे. बोद्धांची मोक्षाची कल्पना या. सर्वोहून निराळी ‘सून त्याचें नांबहि त्यांच्यांत “निवाण’ आहे. पण निर्वाणाला संन्यासाची पवश्यकता आहे असें ते मानतात, हा संन्यास त्यांच्या मतें स्त्रियांस ॥वबोस. मोकळा आहे, जेन प्रारंभी पूवी सांगितल्याप्रमाणें बोद्धावेक्षा

८२४ सामान्य परिस्थिति.

कमी उदार मताचे होते. कारण दिगंबर केवल्य मिळविण्यास कड्या संन्यासाची आवश्‍यकता आहे असे मानतात. दोघा दिगंबर आणि श्वेतां- बर तत्ववेच््यांमध्यें घार येथें एका परमार राजाषुढें झाळेला वाद आम्ही पूर्वी उल्लेखिळाच आहे. यांत दिगंबराचें असें मत होतें कॉ स्त्रिया आणणे वस्त्रे पारेघान केलेला सन्यासी यांस मोक्ष मिळणार नाहीं. याप्र- माणें मोक्ष म्हणजे जन्ममरणापासून मुक्ति हा जरी भिन्न मतांचा एकच अभिप्राय आहे, तरी ही सुक्ति कोणास मिळेल याबद्दल निरनिराळ्य! लोकांत निरनिराळीं मतें होती. अथात्‌ देशांतील धममतभेदांत यानें जास्तच भर वडली.

(2 | टप्पणा २९, कित्येक भागांतील परमतसरहिष्णुता,

हं येथें सांगण्यासारखे आहे कीं, उत्तर हिंदुस्थानांतील राजे परघर्म- मतसहिष्णु असत, आणि शैव राजांनीं वेष्णवांचा छळ केल्याबद्दल किंवा हिंदूंनी बोद्ध जैनांचा छळ केल्याबद्दल अथवा या उलट उदाहरणें उत्तरेत सांपडत नाहींत, किंबहुना तेथील राजे इतर्के परमतसहिष्णु होते काँ, त्यांनी परघमोस दानोहे दिली आहेत. उदाहरणार्थ, गोविंदचंद्र ह्या परममाहे- श्वर असून त्यानें बोद्ध साधूंस जेतवनांतील एका विहारांत मिक्षूंच्या चरितार्थाकरितां सहा गांवें दिलीं (ए. इं. ११ पा. २२), उलट मदनपाल बोद्धराजा असून त्यानें आपल्या राणीस महाभारत ऐकवि- णाऱ्या ब्राह्मणांस एक गाव दिल्याचे पूर्वी वणेन आलेंच आहे. ही राणी हिंदु असावी. हें सांगण्यासारखें आहे की, शेववेष्णवांत व बोडाहिंदूत विवाह होत असत. गोविंदचंद्र परममाहेश्वर असून याची एक राणी बोद्ध राजकन्या होती. उत्तर हिंदुस्थानांत जैन व हिंदु यांच्याताहे विवाह होत होते ब इललीं होतात. असो, गाहडवाल राजे, त्यांच्या कोरीव ळेखावरून, विशेष परमतसहिष्णु दिसतात. भूदानाच्या वेळी केलेल्या धार्मिक विर्घांत ते माहेर असतांहि शिवाची आणि विष्णूची दोघां-

कित्येक भागांतील परमंतसाहेष्णुता. ६२५

ववोहि पूजा करीत. इतर राजांच्या लेखांत शिव किंबा विष्णु यांपैकी एकाचीच पूजा केल्याचा उल्लेख येतो.

ह्याशिवाय मुसलमानानीं उत्तर हिंदुस्थानांत या कालविभागांत अनेक हिंदु देवळांचा विध्वेस केला असतांहि गुजराथ व महाराष्ट्र्‌ येथील हिंदु राजे व लोक इतके परमतसहिष्णु होते की, त्यांनीं मुसलमानांस आप- ल्या शहरांत-विशेषतः समुद्र किनाऱ्यावर-मशिदी बांधूं दिल्या. किंबहुना । इराणी आखातांतील होर्मज येथून आलेल्या एका खोजा व्यापाऱ्यास । खुद्द सोमनाथ येथे ‘ मिजिगिती ‘ ( मशीद ) बांधू देण्यास परमपाझु- ‘पताचार्य, महापंडित, महत्तर, घमंमूर्त आणि अभय ह्या पचकुलीने, ‘ अनदिलवाड येथे राज्य करणाऱ्या अ्जुनदेब चालुक्या तर्फे मलिकदेव ।स्थानिक अधिकारी असतां, संमति दिली, या मिजिगितीला बांधण्यास । जमीन दिली गेली इतकेंच नव्हें तर तिच्या नित्य खर्चास हिंदुंनीं कांही बाजार लावून दिले. आणि ही सवे गोष्ट एका संस्कृतांत लिहिलेल्या | शिलालेखांत नमूद केलीं. हा लेख संवत्‌ १३२०, वलभी ९४५, सिंव्ह संवत्‌ १५१, आणि हिजरी ६६२ या सालचा असून “जो कोणी मशि- दीला किंवा तीस दिलेल्या दानाला हरकत करील त्याला ठराविक झ्याप ब शासन होईल?” असें नेहर्माप्रमाणें त्यांत म्हटलें आहे (भावनगर कोरी- ॥वळेख पा. २२५ ). यावरून गुजराथचे हिंदु परमतसहिष्णु किती होते ॥याचें उदात्त चित्र दिसून येतं. जयसिंह सिद्धराज, पारशांनीं खंबायतमध्यें आपली मशीद पाडली अशी एका मुस्लमानाची तक्रार ऐकून खुद्द स्वतः तेथे गेला आणि त्यानें मशीद आपल्या खर्चाने बांधून दिली ही गोष्ट ( इलि, २ ) आम्हीं पूर्वी सांगितलीच आहे. याचप्रमाणें राष्ट्रकूट व त्पांच्या पूर्वांचे चालुक्य राजे यांनीं आपल्या देशांत मुसलमानांस मशिदी ॥बांधूं दिल्या व मुसलमानांस आपल्या जाताचे इनसाफ करण्याचा अधि- ॥काराहि दिला ( भा. २ पा. १६६ ). तर्सेच ठाण्याचे शिलाहार संजान येथें वसलेल्या पारशी व मुसलमानांस विशिष्ट हक देऊन गांवांचीं दान- पत्रें त्यांसाहे कळवीत असत, गुजराथ आणि महाराष्ट्र यांतील हिंदु राजे ॥ हिंदुलोक यांची ही परमतसहिष्णु वात्ति प्रशसेस पात्र असून इतिहासांत “ वेशोष नमूद करण्यासारखी आहे. अथात्‌ हे हिंदुराजे जैनांसहि सहिप्णु-

६२६ सामान्य परिस्थिति.

तेनें वागवीत ह्यांत आश्चर्य नाही. या कालविभागांतील गुजराथचे चालुक्य राजे आणि नेतरचे वाघेल राजे यांनीं जैनघमास उत्तेजन दिलें, जैन पंडितांचा आदर केला आणि जैन देवळांस दाने दिली, कल्याणचे चालुक्य जैनघर्माचा विरोध करीत तरी कऱ्हाडचे शिलाहार राजे, (विशे- घतः विजयादित्य ), ते कोल्हापूरच्या महालक्वर्मांचे कट्टुभक्त असूनहि, ज्ञैनांना उदार असत आणि जैन मंदिरांना आणि जैन मुनींना त्यांनी कित्येक गांव इनाम दिले (ए. इं. ३ पा, २०७), बहुधा गुजराथेत आणि दक्षिण महाराष्ट्र देशांत जैनघर्माचा प्रसार या दोन्ही राजांच्या वेळी झाला,

प्रकरण ४ थे. हिंदुधरमाचें बदललेले स्वरूप.

पूर्वीच्या प्रकरणांत आम्ही जार्ताचें उपजातीकरण तसेंच विवाह ब इतर चालींतील बदल हिंदु इतिहासाच्या या कालविभागांत कोणते झाले याबद्दल विवरण केलें आहे. तसेंच पुढें या कालविभागांत शैव आणि वेश्णव यांचे नवे पंथ उत्पन होऊन हिंदु समाजांत ज्या धार्मिक भेगा पडल्या ल्याजाविषयींहि विवेचन केलें. आतां या प्रकरणांत हिंदु धर्माच्या साधारण इतर स्वरूपाविषयी चचो करून हिंदु धमाला मध्ययुगीन हिंदुकालाच्या अती हल्लींचे स्वरूप कसें प्राप्त झालें आणि हिंदु धर्माच्या वैदिक स्वरूपाहून तं कसें भिन्न आहे हें दाख- वावयाचें आहे, व्यासानें वेदसंहिता जुळवून तयार केल्या तेव्हांपासून मसल्मानांनीं उत्तर हिंदुस्थान जिंकले तेंथपर्यंतच्या चार हजार वषांच्या दीर्घ कालांत हिंदु धर्माचें स्वरूप एकच रहावें हें अशक्‍य आहे, तथापि हिंदु धर्म हा अद्याप वैदिक कषींच्या धर्माशी संबंध ठेर्वात आहे असें पुढील विवेचनावरून दिसून येईल.

वेद.

आपल्या विवेच नास वेदांपासून प्रारंभ करूं.हिंदु धर्माचे हे इंधरदत्त ग्रंथ आहेत असे मानलें जातें. वेदांचा अभ्यास ब्राहमण अद्याप तोंड- पाठ करून करीत. कारण ब्राह्मणांचे वेदरक्षणे करणं हें कर्तव्यच आहे. या विषयासंबंधी अलळबेरूनीर्ने पुढील विधानें केलीं आहेत. “ब्राह्माण लोक अथ समजल्याशिवाय वेद उच्चारतात आणिं अश्या रीतीनेंच ते तो घोकतात. फारच थोडे लोक त्याचा अर्थ जाणतात आणि ल्याहूनह्दि थोडे वेदांत एकंदर काय सांगितलें. आहे याची पूर्ण माहिती मिळवितात ?” (सचाऊ भा. १ पा. १२८). ही

६२८ सामान्य परिस्थिति.

परिस्थाते अद्यापहि कायम आहे, आणि वेदांत निष्णात असलेले ब्राह्मण हृल्लीं फारच थोडे आहेत. ही स्थिति प्राचीन म्हणजे बुद्ध- पूर्व काळाहून अगदीं मित्न आहे. त्यावेळीं प्रत्येक ब्राह्मण किंबहुना क्षत्रिय व वैश्य यांस वेदाध्ययन करावें लागे. अल्बेरूनी पुढें लिहितो. “ ब्राह्मण क्षात्रियांस वेद शिकवितात. परन्तु त्यांस तो ब्राह्मणांसहि शिकविण्याचा अधिकार नाहीं. वैऱ्य आणि शूद्र यांस वेद शिक- ण्याची परवानगी नाहीं. ‘! बोद्ध काळांत पुष्कळ वैश्‍य बोद्ध झाल्यानें

वेदाध्ययन सोडून बसले आणि यामुळें त्यांचा बेदा्शी संबंध सुटला.

धर्मनिष्ठ क्षत्रिय अद्याप वेद पठण करीत आणि त्यांस आतांहि अधिकार असला तरी पण थोडेसेच वेद शिकतात,तथापि हल्लीचा कलि- युगांत क्षत्रिय नाहींत असा जो समज तो अद्याप उत्पन्न झाला नव्हता, याविषयीं हा स्पष्ट पुरावा आहे. अल्‌बेरूनीच्या विधानावरून क्षात्रि- यांचें आस्तत्व तेव्हां मान्य होतें इतकेंच नव्हे, तर ११ व्या शतकांत त्यांना वेदाध्ययनाचा अधिकार मान्य होता असं सिद्ध ह्वोतें. अर्थात्‌ “कलावाद्यन्तयोः स्थितिः’ हें विरोधी वचन त्यापुढे उत्पन्न झाळेळे १४ व्या शतकांतळें दिसतें, असा भाग २ यांतील परोशेष्टांत दिळेला आमचा सिद्धांत अल्बेरूनीच्या वरील विधानांनीं जास्त मजबूत होतो.

“: वेदांत बहुतेक स्तातिपर पद्य आहेत आणि अर्म़ीर्ताल निर. निराळ्या यज्ञांची विधाने आहेत. हे यज्ञ इतकें पुष्कळ व कठिण आहेत कीं, ते तुम्हांला चांगलें मोजतां येणार नाहींत. ‘। हल्लीं धमीनिष्ट

ब्राह्मणांसहि हे यज्ञ किती आहेत हें सांगतां येणार नाहीं. कारण

अल्बेरूनीनें हिंदुस्थानची मनोरंजक माहिती दिली त्या काळानंतर वैदिक यज्ञ बहुतेक टुप्त झाळे आहेत हें आम्ही पुढें सांगणारच आहो.

“ वेद ल्ह्रि नयेत असें हिंदु मानतात. कारण ते विशिष्ट उच्चा रानेंच म्हटळे पाहिजेत. यासाठी चुकी होऊं नये म्हणून वेदांस कलम लात्रीत नाहींत. यामुळें वेद बरेच नष्ट झाले आहेत. ” या

वेदिक यक्च. ६२९

अशा भोळ्या समजुत’मुळें वोर्दक वाड्मयाचा बराच भाग, १ १व्या शतकापूर्वी लुप्त झाळेला दिसतो. पण अलबेरूर्नानें आणखी मह-

त्त्वाची माहिती येथें अशी दिली आहे कीं, ल्याच्यापूर्वी थोडींच वर्षे । काईइमीरच्या एका प्रासेद्ध बसुक्र नांवाच्या ब्राह्मणाने वेदांचा अर्थ सांगण्याचे काम हातीं घेतलें आणि वेद नष्ट होईल या भौतीनें समग्र वेद लिहून काढला. “ सर्व ब्राह्मण ज्या कामाबद्दल मार्ग सरत । तें काम यानें अंगावर घेतलें. ‘ याप्रमाणे कारमीरांत प्रथम वेद इ. । स. १०००च्या सुमारास लिहिला गेला असें दिसतें व ल्यावर वसु- । क्रानें भाष्य केलें. हें वसुक्राचें पहिळें वेदभाष्य हीं उपलब्ध आहे कीं नाहीं हें माहीत नाहीं. दक्षिणेंत माधव विद्यारण्यानें विजया- नगर येथें केलेल्या व हीं उपलब्ध असलेल्या वेदभाष्यांत त्याचा -उपयोग झाला असलाच पाहिजे.

वेदिक यज्ञ.

। प्राचीन वैदिक आयांचा मुख्य धर्म अम्नि ठेऊन त्यांत नित्य
। आणि नैमित्तिक वेदाविहित यज्ञ करणें हा होता, छांदोग्य उपनिषदांत
। अश्वपति राजा आपली प्रजा किती धार्मिक आहे हें वर्णन करि-
। तांना ‘ न मे स्तेनो जनपदे नानाहितासम्रिः ‘ “ माझ्या राज्यांत चोर
। नाहीं आणि ञ्यानें अभ्नि ठेवला नाहीं असा गृहस्थ नाहीं. ‘ असें
| -म्डणतो. ही प्राचीन परिस्थिति ह्यावेळपर्यत इतकी बदलली होती
। कीं एखाद्या हिंदु राजानें माझ्या राज्यांत अभ्नि ठेवला आहे असा
। एकहि गृहस्थ नाहीं असें म्हटलें अततां चाललें असते. हल्लीं तर
’ जाह्मणांनीं सुद्धां अभ्नि ठेवणें सोडून दिळें आहे. तर्थापे अल्बे-
। रूनांच्या काळीं थोडे ब्राह्मण अम्नि ठेवीत असत, तो म्हणतो, “ जे
। आह्मण एक आश्नि ठेवतात त्यांना इष्टिन्‌ म्हणतात आणि जे तीन
। ठेवतात त्यांना अग्निहोत्री म्हणतात ( सदर पा. १०२ ). याशिवाय
जो अम्नीस विशेष आहुति देईल ( रोजच्या यक्ञापेक्षां मोठा यक्ष

«६३० सामान्य पारोस्थति.-

करील ) त्याला दौक्षित म्हणतात. ”/ दाक्षेत आणि आवस्थक या ब्राझणांच्या सन्मानाच्या पदव्या या काळच्या कोरीव लेखांत येतात. हल्लींच्या काळीं या संज्ञा केवळ आडनांवे बनल्या आहेत. कांहीं थोडे वरच यज्ञ कधीं कधीं सर्वे हिंदुस्थानांत विशषतः दक्षिणेंत हल्ली केळे जातात हें खरें. पण ही वेंदाविहित कर्मसंस्था म्हणजे गृद्या- झींत नित्य होम देणें बहुतक ठळुप्त झाली आहे असें म्हणतां येतें. नेमित्तिक यज्ञ.

पण नैमित्तिक यज्ञ, उदाहरणार्थ उंपनयन किंवा विवाह यावेळी केलेळे होम, दृष्ींप्रमाणें त्यावेळीहि होत असावेत, भूदानाच्या संस्का- रांत या कालविभागांत नेहमीं अग्नांत होम केला जात अस. किंब- हुना या कालविभागांतील कोरीब लेख भूमीदानाच्य पवित्र ब बडेजा- वाच्या प्रसंगीं जे दाघे धार्मिक विधि केले जात त्यांचं विस्ता- रानें वर्णन करितात. हीं वर्णने फारच महत्त्वाची आहेत, व ल्याव- रून सर्व हिंदुस्थानभर हिंदुधर्म आचारांत वैदिक आंणि पौराणिक विधि या दोहोंच्या मिश्रणाने कसा झाला होता हं सिद्ध होते. दान देणारा राजा एखाद्या पुण्यनदींत, एखाद्या - प्रसिद्ध घाटावर, स्नान करून देव, मनुष्य आणि पितर यांचें तपेण करी (हा विधि वैदिक सूत्रांतळा आहे ), सूर्याचे उपस्थान करी ( हाहि वैदिक विधि आहे), नंतर शिव आणि विष्णु यांची पूजा करी (ह्या पोरा- णिक देवता आहेत ); आणि शेवटीं पुण्य ब पवित्र अग्नीत घृताचे हवि देई ( वैदिक विधि ) आणि नंतर दान घेणाऱ्याच्या हातावर दानजल सोडी.” या विधिवर्णनावरून या वेळच रजपूत राजे पुराण-

  • यमुनायां स्नात्वा यथावाधि देवक्षिमनुष्यभूतपितुृंश्र तपयित्वा सूयभट्टारकयुपस्थाय सर्वकतारं भगवन्तं शिव विश्वाधारं बासुदेव समभ्यर्च्य हुतवहं हुत्वा ॥ ( इ. ए. १४ पा, १०३ ), कांहीं ठिकाणीं बासुदेवाचें नांव गाळलेलं असतें.

मूर्तिपूजा. ६३१

धमीभिमानी होते इतर्केंच नव्हे तर वैदिक यज्ञ करणें महत्त्वाचें मानीत आणि यज्ञ करण्याचा आपला हक्क प्रत्यक्ष बजावीत. पण हे यज्ञ घ॒त हवीनीं होत असत हें कांहीं लेखांत सांगितलेंहि असते. जेन सुद्धां हिंदु राजांनीं दिलेल्या दानांच्या मजबुतीकरितां अशा वैदिक यज्ञांनीं दिलेलीं दानं घेत हें सांगण्यासारखे आहे.

मृतिपूजा

याप्रमाणें या कालविभागांत हिंदुधर्म वेदिक आणि पोराणिक बिधींचा मिश्र बनळेला होता आणि हृल्लींहि आहे. पण वैदिक तपण, सूयोपस्थान आणि हवन त्यावेळीं होतें, तरी तें हळुहळू पुढें कमी झालें. आणि पौराणिक देवता शिव, विष्णु, देवी, गणेश आणि सूर्य यांचीच पूजा मुख्य होऊन हिंदूच्या नेहमींच्या धर्मविर्धांत आली.मूर्तिपूजा वेद- मान्य आहे कीं नाहीं या प्रश्नाचा आम्ही येथे विचार करीत नाहीं. पण वैदिक सूत्रांत ईश्वराच्या नित्यपू्जेत मूर्तींची पूजा सांगितलेली नाहीं. बौद्धधमांत ईश्वर नाहीं येथून प्रारंभ झाला आणि शेवटीं बुद्धाच्याच मूर्तीची पूजा सर्वत्र अमलांत आली. असा हा बौद्धधम उ- च्छेंद पावला तेव्हां हिंदुधमांत मूर्तिपूजा जास्त वाढली, आणि प्र- ल्येक धरीं लहान ल्हान मूर्तीची प्रत्यही पूजा करण्याचा परिपाठ पडला. किंबहुना निरनिराळ्या निबंधांत आणि धार्मिक बिधीवरीळ ग्रंथांत याजविषयीं वचनेंहि आलीं. इल्लीं चाळू असलेली पंचायतन- पूजा या काळांत उत्पन्न झाली किंवा निरानेराळ्या देवतांच्या भक्ती- मधीळ विवाद काढून टाकण्यासाठी इंकराचायानीं ती पूर्वी प्रचारांत आणली हें सांगतां येत नाहीं. पण हें निश्चित आहे कीं, इली प्र- मारणे याकाळीं सुद्धां निरनिराळ्या देवतांच्या लहान मूर्ति प्रक्यक घरांत असत. कारण भूमिदान करितांना कोरीव लेखांत बर्णिळेली शिव किंवा बिष्णु किंवा दोन्ही देवता ह्यांची पूजा देवळांत जाऊन

८२२ सामान्य पारिस्थिति.

केली असावी असें वाटत नाहीं. ह्या मूर्ति राजगृहांत असलेल्या चलमूति असाव्या. ह्या धातूच्या असत किंवा विशिष्ट खुणांचे, आका राचे व रूपाचे लहान दगड ल्या त्या देवतांची माननेलीं प्रतीके असत. प्रत्येक घरांत होणाऱ्या या मृर्तिपजेनें गृह्या्नींतीळ वैदिक होम शबटीं मागें पडले

या देवतांशिवाय प्रत्येक शहरांत व गावांत निरानराळ्या देवतांची मंदिरें असत, व त्यांत दगडांच्या किंवा धातंच्या मार्ति ठेविल्या जाऊन त्यांची पूजा होत असे. राजे, राण्या, प्रधान, श्रीमंत व्यापारी किंब- हुना भिक्षा मागणारे ब्राह्मण तपस्वी ज्यांस त्यांच्या पवित्र आचरणाच्या आदरानें शेकडां देणग्या मिळत, असे सर्वे, स्पर्धेने प्रचंड व सुंदर देवळें आपापल्या इष्टदेवतेंची विशषतः शिवाची आणि विष्णूची बांधीत. अर्थात्‌ सर्व हिंदुस्थान देशा अश्या मंदिरांनी या कालवि- भागांत भरून गेला होता. या देवळांत ठेविलेल्या मर्ति बहुधा दग- डाच्या असत. परंतु कित्येकदां सोन्याचांदीच्या किंबहुना रत्नांच्याहि मूर्ति असत. श्रीमंत राजे व व्यापारी ह्यांच्या मदर्ताला या बाबतींत अधश्रद्धाहि उपयोगी पडली. आणि निरनिराळ्या द्रव्याच्या मूति बन- विण्याचे निरानेराळे अधिक फळ मानलें गेलें. अल्बेरूनी लिहितो, “ रत्नाची मूर्ति केली असतां राष्ट्रांतील स््रीपुरुषांचें कल्याण होईल सोन्याच्या मूतीपासून ती करणाऱ्यास सत्ता मिळेल. चांदीच्या मूर्तीने कीति आणि पितळेच्या मूर्तीनें दीधराज्य मिळेळ. दगडाची मूर्ति जमीनीची मिळकत ज्यास्त देईल ‘’ ( सदर पा. १२१ ). याप्रमाणें घनवान्‌ राजे व व्यापारी यांस सोन्याचांदीच्या किंबहुना रत्नाच्या मूर्ति करण्यास प्रोत्साहन मिळे, पण त्याचा उपयोग ठुटारू व जेते यांना धर्महानि करण्याच्या कामीं बोलावर्णे करण्यांत होई. अलबे- रूनी यानें युक्तीने येथे आणखी असे लिहिलं आहे कीं, “ मर्तींचा आदर हिंदुोक, जे मूर्तींची प्रतिष्ठा करितात त्यांच्यामुळे करितात

मूर्तिपूजा. ८२२

मूर्ति ज्या द्रव्याची बनली आहे त्यामुळ करीत नाहींत. ‘’ अथात दगडाची मूर्ति सोन्याच्या मूर्त इतकीच भक्ताला फलप्रद होई. परंतु मॉल्यवान्‌ मूर्त चोरांच्या आणि लटारूंच्याच फायद्यावर पडत. महमुदानें शेकडो देवाल्ये टून सोन्याच्या मार्त नेल्या तरी हिंदुळोक सोन्याच्या माते करीतच राहिले, किंवा दगडाच्या मूर्तींना मोल्यवान्‌ दागिन घालीतच राहिले, हें या कालविभागांतील पूर्वी सांगितलेल्या कोरीव लेखांवरून सिद्ध होतें. सोन्याच्या मूर्ति करणें मागें पडलें आहे तरी मूर्तींना दागिने घालण्याचा सोस चाळूच आहे

पु. ६ प्र. १६ यांत यावेळीं हिंदुस्थानांत मृतिपूजेचा भोळसट- पणा किती वाढला होता हें आम्ही वाणिळेंच आहे. अलबेरूनीच्या तत्त्व-विवेचक बुद्धीस हिंदूतील मृर्तिपूजेचा भर आश्चर्यकारक वाटे तथापि त्यानें हें मान्य केलें आहे कीं, प्राचीनकाळी सर्व मनुष्यजात अरब सुद्धां, मूर्तिपूजक होती.अल्बेरूनीनें प्रांजळपणे हेंहि कबूल केलें आहे कीं, हिंदुस्थानांत मूर्ति न पूजणारे तत्त्ववेत्ते लोक होते. हिं- दूच्या मूर्तिविषयक चमत्कारिक कल्पना संबंधें लिहितांना त्यानं असं. म्हटलें आहे कीं या कल्पना सामान्य अशिक्षित लोकांच्या आहेत “ ज़ मोक्षाच्या मार्गाठा लागले आहेत किंवा जे तत्त्वज्ञानाचा विचार करितात ते परमेश्वराची म्हणून बनविलेली मूर्ति पूजिण्याचें स्वप्नां- तहि आणीत नाहींत. !’ अलबेरूनीनें अबरीष आणि नारद ह्यांच्या कथा, हिंदु मूर्ति कसे पुजू लागले ह्याचा इतिहास सांगण्यासाठी दिल्या आहेत, त्या येथ देण्याची आवश्‍यकता नाहीं. पण हिंदुस्था- नांतील त्यावेळच्या प्रसिद्ध मूर्ति त्यानें विस्ताराने वर्णिलेल्या आहेत,. तं वणन येथे देण्यासारखं आहे. प्रथम मुलतान येथे सूयांची मात होती. “ ही मूर्ति लाकडाची असून कोरडोव्हा येथील चर्मानें ती वेष्टिलळेली आहे. तिच्या डोळ्याच्या ठिकाणीं दोन लाट बसविले आहेत. ही गेल्या कृतयुगांत ( म्हणजे सुमारें ४२ लक्षवषापूर्वी ) बन-

२९२३४ सामान्य पारेस्थति.

विली गेली अशी समजूत आहे. महमद कासमनें मुलतान जिंकले तेव्हां त्या मूर्तीचे पुष्कळ उत्पन्न आहे असें पाहून त्यानें ती राहूं दिली. पण त्याच जागेवर त्यानें एक मशीद बांधली. जेव्हां कार्मे- तियन पंथी मुसल्मानांनीं मुलतान घेतलें तेव्हां जालम इबन शेबान यानें ही मार्त फोडून पृजाऱ्यांची कत्तळ केली. त्यानें खलिफांची बांधलेली मशीद बंद करून सूर्यदेवाच्या मंदिराचीच कार्मेतियन मशीद बनेविली. जेव्हां यशस्वी महमुदानें कार्मतियन सत्तेस तेथून हांकून लावलं तेव्हां जुनी मशीद त्यानं उघडून तीच ञम्मा प्राथनेची जागा केली आणि कार्मेती मशीद ओस पडूं दिली. ‘’ ही मुलतानच्या सूर्य- देवाच्या मंदिराच्या दैवविलसिताची मनोरंजक हर्कांकत नमूद कर- ण्यासारखी आहे

अलबेरूनीनें यापुढें जी माहिती दिली आहे ती फारच महत्त्वाची आहे. माहितीच्या या खजिन्याची यापूर्वी आम्ही पूर्ण तपासणी केली नाहीं याबद्दल वाचकांची क्षमा मागावयास पाहिजे. येर्थाल वर्णन इलियटलाहि कसें सांपडलें नाहीं ह्याचें आश्चर्य वाटतें. त्यास व आम्हांस जी दोन गूढें पडली होती त्यांचा खुलासा या वर्णनावरून होतो. अल॒बेरूनी लिहितो:-( सचाऊ भा. १ पा. ११७) “ ठाणे- श्वर येथें सव हिंदूस अत्यंत आदर असलेली चक्रस्वामिन्‌ नांवाची मूर्त होती. ती पितळेची असून मनुष्याच्या उंचीची आहे. ही मात, सोमनाथाचा स्वामी महादेवटिंग यासह, हल्लीं गझर्नाच्या भुयारांत पडली आहे. चक्रस्वामीची माते भारताच्या वेळीं त्या नांवाच्या युद्धाच्या स्मरणार्थ केली अस मानतात. ‘’ या वर्णनावरून दोन गूढ सुटतात. पुढील मुसलमानी इातेहासकारांनीं ठाणेश्वराच्या मूर्तांचे नांव जगसोम असे दिलेले, चक्रस्वामी या नांवाबद्दल पारशी लिपींत चकोनं वाचले गेलेले स्पष्ट आहे; आणि ही मार्त. शिवाची नसून विष्णूची होती. दुतरें उत्‌बीनें जरी सोमनाथावरील महमुदाच्या

मार्तेपूजा. ६३५

! स्वारीचें वर्णन केलें नाहीं, तरी १०३० इसवबीमध्यें केलेल्या या . अल्बेरूनीच्या विधानावरून, ते तत्कालीन असल्यानें, सोमनाथा- वरील स्वार्राच्या सत्यतेबद्दल कांहीं एक रुंका उरत नाहीं. या मूर्ति. हजारों किंवा लाखो बषोपूर्वी बनविल्या गेल्या असं भोळसटपणानें समजलें गेल्यामळें त्यांच्याविषयी अत्यंत आदरभाव होता आणि त्यांच्या ठिकाणीं अद्भत शक्ति आहे अशीहि लोकांची कल्पना असे. अथात मुलतान आणि ठाणेश्वर यांत अमूप संपात्ते लोटली आणि त्याचा परिणाम या देवस्थानांचा नाश करण्यांत झाला, अलुबेरूनी आणखी एका प्रसिद्ध मूर्तीचा उछेख करितो, ती काऱ्मीरांतील शारदेची मूर्ति होय. हिच्या दर्शनास रंकराचार्य गेले होते. ह्याशिवाय हिंदुस्थानांतील ज्या प्रसिद्ध मूर्तीविषयीं ऐतिह्यासेक दाखला मिळतो त्या काशी ब उज्जयिनी येथील शिवाच्या मूर्ति भोलसा येर्थाळ भेलुस्वामी नांवाची विष्णुमार्त, जगन्नाथ ये्थाल विष्णूची मूर्त आणि पंढरपूरचा विठोबा व कोल्हा- पूरची महालक्ष्मी या होत. याशिवाय कांची येथील शिवाची मूर्ति व अल्बेरूनीनें स्वतः सांगितलेली रामेश्वर्ची मूति यांचा उछ्लेख केला पाहिजे. कोट कांगडा येथील देवीविषयीं आम्ही पूर्वी लिहिळेंच आहे. आणि उतूबीनें वर्णन केल्याप्रमाणे मथुरा आणि कनोज येथील शेंकडों मूर्ति महमुदानं फोडल्या. येथें अल्‌बेरूनीने वराहामोहिराच्या बृह्त्संहितचा नामनिर्देश करून निरनिराळ्या देवांच्या मूर्त कदा असाव्या याविषयीं माहेती दिलीं आहे. यावरून दोन तीन मनोरंजक गोष्टी स्पष्ट होतात ल्या । प्रथम सांगूं. पहिली गोष्ट ही कीं, रामानंदाच्या पूर्वी रामाचीं देवळें । नव्हतीं अशी शंका पुष्कळ लोक घेतात. पण वराहमिहिराने दरारथ- । पुत्र राम याच्या मूर्तीचे वर्णन केलें आहे आणि अल्बेरूनीने ते घेतलं ‘ आहे, यावरून सहाव्या शतकापासून अकराव्या शतकापयत

६३८ सामान्य परिस्थति.

रामाच्या मूतीची पूजा होत असे असें सिद्ध होतें. दुसरें, विष्णूच्या मूर्तीना आठ हात, चार हात आणि दोन हात असल्याचे वर्णन आहे आणि या हातांत निरानिराळ्या वस्तु किंवा आयुधे द्यावयाची आहेत. दोन हाताची विष्णूची मूति केल्यास एका हातांत रंख असे आणि दुसऱ्या हातानें पाणी काढीत आहे असे दिसे. हें वर्णन चमत्कार्रक आहे, आणि पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीस लागू नाहीं. तिसरें, बलदेव, प्रद्युम्न, सांब, ब्रह्मा, इंद्र, यम, सूर्यपुत्र रेवंत, सूर्य सप्तमात, भगवती आणि ‘मनुष्याच्या शरीरावर हत्तीचे डोके असलेला’ विनायक यांच्या मूर्तीचे वर्णन आहे. शबटल्या दोहोशिवाय बाकीच्या सर्व मूति अलीकडे दिसत नाहींत. कांगड्यांतील वैजनाथाच्या देवळांत द्वारांत शिरतांनाच एक गणेशाची मूर्त आहे; तिला सहा हात असून भगवद्वीतेवरील आपल्या प्रसिद्ध ( ज्ञानेश्वरी ) टीकेत ज्ञानेश्वरांनी वर्णि- लेल्याप्रमाणे ह्या सहा हातांत आयुधे आहेत. या वैजनाथ देवळाच्या भिंतीवर आणि शिखरावर बाहेरून निरानेराळ्या देवतांच्या मूर्त कोरल्या आहेत, त्या इतक्या मनोइर आणि निरानेराळ्या देवतांचे सांगितठेळे परिषद्‌, वाहूनें व आयुधे यांच्या बारीक वर्णनाप्रमाणे हुबे- हुब व अगदीं प्रत्यक्ष असल्यासारखं तंतोतंत कोरल्या असून त्यांचा अभ्यास करण्यासारखा आहे. हें देऊळ त्यांत कोरलेल्या लेखावरून इ. स. १२०० च्या सुमाराचें बांधळेळें आहे.

“ य मूर्तींचे भक्त मेंढे आणि टोणगे कुऱ्हाडीनें मारतात, व त्यांचे रक्त पिऊन स्वत:स पुष्ट करितात. ‘? हें अलबेरूर्नांचें विधान चमत्कारिक आहे. ते प्रत्यक्ष निर्राक्षणाचे नसून शाक्ततंत्रांतठे असावें निरानेराळ्या देवांच्या पूजाऱ्यांविषयीं अलबेरूनी पुढील माहिती देतो “ विष्णूचे पूजारी भागवत असतात. सूर्याचे मग ब्राह्मण आणि महादेवाचे पूजारी जटा वाढाविळेळे, अगाला राख लाविठेळे, गळ्यांत मेढेल्यांच्या हाडांचीं माळा घातलेले आणि तनळ्यांत डुबक्या मारणारे

मूर्तिपूजा. ६३७

असे तपस्वी असतात” (पा. १२०). ह्या विधानाला या काळां- तीळ कोरीव लेखांत विशेषतः महादेवाच्या पूजाऱ्यांसंबंधानें दुजोरा मिळतो. बदाऊं येर्थांल शिलालेखांत ( ए. इं. भा. १ पा. ६४) दोन शैव तपरूव्यांचें विस्त्त वर्णन आहे. पहिल्याच नांव वमेशिव असून तो अनाहेल्पाटणचा राहणारा होता. लह्ानपणीं दाक्षिण देशांत गेला असतां बोद्धांनां बसविलेठी एक मूर्त त्यानें काढून टाकली. पुढें उत्तर वयांत तो तपश्चर्येने व विद्वत्तेनं प्राप्ताद्वे पावला आणि फिरत फिरत बदाऊं येथें आला. तेथे रुल्ह नांवाच्या तेर्थाल राजाच्या एका दिविर मंत्र्याने बांधलेल्या शिवादेवाल्यांत त्यास पूजा सांगितंठी, “ दुसरा तपस्वी मूळचा हरियान (दिल्ली भोवतालच्या ) देशांतील राहणारा ब्राह्मण असून त्यानें शिवाच्या सेवेसाठीं धनाचा ‘व संसाराचा त्याग केला. त्याचा एक शिष्य पंचप्रवरी वत्सगोत्री ।गौड देशांतील ब्राह्मण असून त्याचं नांव ईशानाशेव होतें, व त्यास ‘गुरून पूर्ण परीक्षा करून तपरूयाच्या गादीवर बसविलें. त्यानें त्या ।भरतपुरींत उंच शिखराचें एक सुंदर शिवालय बदाऊंच्या राजाच्या त्याच रुल्ह मंत्र्याच्या मदतीनें बांधळें. त्या देवाल्यांतील पूजाहि वरील तपसूवयास सांगितली, ‘” या वर्णनावरून शैव तपस्वी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर दोन्ही दिसतात, आणि ते एकाच प्रकारचे कठीण ‘तप आचरून आयुष्य ईश्वरसेवेंत घालवीत. ब्राह्मणेतर तपस्वी शिव- ‘देवाल्यांतीळ मूर्तींची पूजा संभाळी. हृल्लींहि अशीच चाल आहे. वाल्याचा पूजाक्रम याप्रमाणे शेव तपरूयांच्या स्वाधीन केल्याचा दाखला पुष्कळ कोरीव लेखांत मिळतो. उदाहरणार्थ, आल्हणदेर्बांच्या घाट शिलालेखांत तिर्ने बांधलेल्या शिवदेवालयाची संभाळ एका म, भा…४१

३८ सामान्य परिस्थिति.

लाट तपरूयाकडे दिल्याचे विधान आहे. (इं. ए. १ पा. ५२) तसेच वत्सगोत्री एका ब्राह्मण तपरूव्यानें बांधळेळे शिव देवालय व दुसरें मध्यदेशांताळ एका गंगाधर नांवाच्या धर्मशील व विद्वान्‌ ब्राह्मणाने बांधलेले, शैव तपरूयांच्या स्वाधीन केल्याचा दाखला ए. इं. २ (पा, ५२ व ४१ ) यांत आहे.

मठ.

हे तपस्वी, शैव किंवा वैष्णव, देवळांच्या शाजारीं रद्दात, हुएन- त्सांगनॉहे लिहिळें आहे कीं, “’दैब तपस्वी आणि जैन अथवा निग्रंथ माने आपापल्या मठांत व देवालयांत राहतात. ‘’ याप्रमाणे मठांची संस्था इ. स. ६०० इतकी जुनी निश्चयाने आहे आणि ती बहुधा बौद्ध विह्ारांची नकूळ आहे, या कालविभागांत बोद्ध धम मगघा- खेर्राज इतरत्र नष्ट झाला, आणि बहुधा बोद्ध मंदिरे आणि विहार शिवाची आणि विष्णूची मंदिरें व मठ यांत रूपांतरित झाले. पण या काळच्या कोरीव लेखांत मठ बांधल्याचा स्पष्ट दाखलाहि मिळतो ए. इं. २ (पा. २३१०). यांत एक व्याख्यानशाला बांधल्याचा व तसेंच शिवमंदिराच्या जवळ उद्यानशांलठा बांधल्याचा उदछेख आहे. तेव्हां तपरूयांच्या व्याख्यानाकारेतां जागा व राहण्याकारेतां मठ बहुधा बांधीत असावेत. दाक्षिण हिंदुस्थानाशिवाय असे मठ आतां बहुधा दिसत नाहींत. म्हणजे हृ्ीं आपल्यास जसे बोद्ध संन्याशाचे विहार दिसत नाहीत तसेच पाडुपत योग्यांचे मठहि दिसत नाद्दींत.

आगम आणि तंत्रत्रंथ. निरानेराळ्या देवांच्या निरानेराळ्या पूजांचे प्रकार, त्याचप्रमाणे तप आणि संन्यास यांचे निरानेराळ्या तपरूयांच्या भिन्नभिन्न पंथांत

7 “की

  • लाटान्बयः पाशुपत: तपस्वी श्रोरुद्ररशिवधिवत्‌ व्यघत्ताम्‌ | स्थानत्य रक्षाविधिमस्य ताबद्यावन[मिमीते भुवनाने राभु:ः ॥

आगमन आणि तत्रग्रंथ. ८२९

चाळू असलेले आचार यांनीं या कालविभागांत नवीन धर्मग्रंथ, आगम आणि तंत्र या नांवाचे, उत्पन्न केले, व त्यांत हे निरनिराळे प्रकार बिधि म्हणन सांगितळे गेळे, असे आगम पुष्कळ आहेत; पण ते , हिंदु धर्मार्तील पांच मुख्य देवांच्या पूजेसंबंधाचेच आहेत. या पांच देवांच्या निराळ्या पूजाविधींतहि भिन्नाभिन पंथ आहेत, व एक पंथ दुसऱ्या पंथाहून पाहिल्याबरोबर भिन्नपणें ओळखण्यासाठी प्रत्येक | पंथांत कपाळावर्रालळ गंध लावण्याची तऱ्हा निराळी सांगितली आहे. वेदाला निगम संज्ञा असून या नवीन धर्मग्रंथांना आगम म्हणतात; ‘ आणि आगमांचा अधिकार वेदाहूनह्ि जास्त समजला जातो. तंत्र म्हणजे अश्याच प्रकारचे दुसरे ग्रंथ असून त्यांत निरनिराळ्या पूजा- ‘बिधींबरोबर अनेक मंत्र व गुप्तपणें करण्याचे कित्येक विधि सांगि- ‘तळेळे असतात. या तंत्रविधींत ब्राह्यण आणि ब्राह्मणेतर यांचा ।समान हक्क असे असें दिस

तें. वैदिक तप आणि संन्यास यांची मोकळीक फक्त ब्राह्मणांसच मार्नात, पण आगमांतील तपश्चर्या सर्व हिंदूना सारखी मोकळी मानल्याचें दिसतें. हें आगम आणि तंत्रांचे | वाड्मय निरनिराळे आणि विस्तृत असून त्याचा ऐतिहासिक दृष्ट्या बिचार करण्यास त्यांचा अभ्यास करणं जरूर आहे, त्थापे रंक- | एचायांच्या पूर्वीच असें वाड्मय उत्पन्न झालें होतें हं निश्चित दिसतें. )े कारण पाठुापत्गादि अनेक मतवाल्याशीं इंकराचार्यांचा विवाद झाला. कालविभागांत हें वाडूमय जास्त महत्तवास आलें, आगि म्हणूनच प्रा काळांतील कोरीवळेखांत निरानेराळ्या तपस्व्यांचें वर्णन येतें.

सेस्कार व कमे यांची वाढ,

हे नवीन धार्मिक वाड्यय उत्पन्न झाल्यानें धार्मिक कर्मे, विधि व र वाढले हे सांगावयास नको. प्रत्येक देशांत धर्मशाखाचा भभ्यास अधिक झाला, आणि अनेक संस्कार व विधि यांवर विस्तृत

६४० सामान्य परिस्थिति.

प्रेंथ विद्वान्‌ ब्राह्मणांनी किंबहुना राजांनीं लिहिले. या कालांतीळ धमावरचा पहिला ग्रंथ म्हटला म्हणजे विज्ञानेश्वराची मिताक्षरा होय. हा प्रंथ याज्ञवल्क्य स्मृतीवर दक्षिणेतील कल्याण येथ लिहिला गेला, ठाण्याचा राजा अपरादित्य यानें अपरार्क नांवाचा दुसरा विस्तृत ग्रंथ लिहिला. बंगाल्यांत बछालसेनाने निरानेराळ्या अनेक दानांवर दानसागर ग्रंथ स्वतः लिहिला आणि त्याचा पुत्र लक्ष्मण- सेन याच्या दरबारांतील विद्वान्‌ पंडितांनी अनेक ब्र्मकमेसमुच्चयासारखे

दुसरे ग्रंथ लिहिले. गोविंदचंद्राच्या अमदानींत कनोज येथेंहि धर्म-

शास्त्रावर ग्रंथ झाले. आणि शेवटीं हेमार्द्रीच्या चतु्वगाचिंतामाणे नांवाच्या प्रचंड ग्रंथाचा उछेख केला पाहिजे, हा ग्रंथ आमच्या कालानंतर सुमारें १०० वर्षांनीं देवगिरी येथें निमीण झाला. या अनेक ग्रंथावरून हछांचा हिंदुधम या कालविभागांत पुराणें. आणि आगम यावरून कसा निघाला आणि मूळच्या साध्या वेदिक आर्य-

घर्म-स्वरूपाहून त्यास निराळे कसे स्वरूप आलें हें दिसून येईल उदाहरणाथ, बाणानं प्रतापवर्धनासारख्या एका मोठ्या राजाच्या उत्तराक्रयेचे जे साधें वर्णन केलेलें भाग १ यांत आम्ही विस्ताराने दिलेल आहे त्याची, व गरुड पुराणांतील वणिलेलीं अत्यावेधी ची

निरनिराळीं श्राद्धे व दाने यांची, तुलना करावी. सर्वच बाबतींत

संस्कार वाढले; आणि अनेक व्रतें व क्रिया, पौराणिक देवतांच्या

भक्तीसंबंधें उत्पन होऊन प्रचारांत आल्या; त्या विस्तासने येथ

सांगणें आवश्‍यक नाहीं. विशेषतः ब्राह्मणाचें आन्हिक धार्मिक कृत्य.

वेदिक यज्ञांच्या ऐवजीं प्राणिहिंसाविरहित नवीन यक्ष निरनिराळ्या भानगडीच्या संस्कारांसह विशेषतः विष्णु आणि देवी यांच्या भाक्ते- |

इतकें निरानेराळ्या कर्मांनीं भरलेले सर्वव्यापी झालें कीं, त्यास फुर- सत थोडीच राहत असे. नैमित्तिक संस्कार व कर्मेहि पुष्कळ वाढलीं.

संबंधे सांगितलें गेळे. पोराणिक देवतांच्या रथयात्रा जैन रथयात्रांच्या

*। ।

संस्कार व कर्मे यांची वाढ. ६४१

अनुकरणाने प्रचारांत आल्या. तात्पर्य नवीन आगमांप्रमाणें आणि विस्तारलेल्य! पुराणांप्रमाणे पौराणिक देवतांची भाक्ते इतकी वाढली कीं, वैदिक सूत्रांत सांगितलेले घर्मविधि मागें पडले. तरी पण ब्राह्मण- क्षत्रियांत हे विधि आणखी पौराणिक विधींसह चाळू राहिले.

अल्बेरूनीनें त्याच्या काळीं पंजाबांत चाळू असळेळे उपवास आणि उत्सव यांचे दिवस विस्ताराने वर्णिले आहेत;ते आम्हां पुढें टिप्प- , णींत देतो. ते बहुतेक हल्लींच्या सारवेच आहेत, पण कांहों हल्लीं छुप्त झाले आहेत. हे मुख्यत; शिव आणि विष्णु यांच्या भक्तिसंबर्धे असून कांहीं देवी आणि सूर्य यांच्या भाक्तिसंबंधीं आहेत, अल्बे- रूनीनंतरच्या काळांत आगम आणि पुराण यावरून आणखी किव्येक पवित्र दिवस उत्पन झाळे असावे. किंबहुना अलुबेरूनीची यार्दाच परिपूर्ण नसावी. असे विशेष पवित्र दिन शिलालेखांत आढळतात उदाहरणाथे एका कलिंग दानपत्रांत ( ए. इ, ४ )आपल्यास गोविंद- द्वाद्शींचा उठेख आढळतो. या लेखाच्या प्रसिद्ध करणाऱ्यानं गोविंद- द्वादर्शांची व्याख्या दिली आहे, त्यांत कित्येक प्रह्यांचे विशोष योग दिठेल आहेत.* सूर्यचंद्रांच्या व ग्रहांच्या निरनिराळ्या नक्षत्रांतील व राशींतील स्थितींवरून अनेक पवित्र योंग उत्पन झाळे आणि पवित्र दिवसांची संख्या वाढली. श्राद्धांचीहि संख्या वाढली हें सांगावयास नको. कन्यागत श्राद्धाचा उल्लेख गुजराथच्या वीसळदेवाच्या १२५४ इसर्वांच्या एका कोरीवळेखांत आला आहे (इ. ए. २ पा. १९४)

पुराण ग्रंथांची वाढ.

पंथापंथांचे आगम आणि तंत्र यांशिवाय मध्ययुगीन हिंदुकालांत

प्राचीन पुराणांच्या विस्तत आवृत्ति निघाल्या. प्राचीन अठरा पुराणे

  • फाल्गुनस्य च द्वादव्यां कुंभस्थितदिवाकरे | नक्रस्थिते सुर्यसुते जावे कार्मुकसस्थिते ॥ पुष्यक्षे बवसंयुक्त शाभने भानुवासरे । गोविंदद्वादशी श्रॉक्ता देवानामापे दुलभा ॥

“६४२ सामान्य परिस्थिति.

लहान असून ह्यांत यावेळीं या पांच देवतांच्या भाक्तेसंबंधें विशिष्ट- ‘पंथयुक्त भाग आणखी घातले गेले. यामुळें या देवतांस पौराणिक योग्य रीतीनें म्हणतात. पुराणांत शिव, विष्णु, देवी आणि गणपति यांचे महत्त्व वर्णिळेळें आहे, आणि त्यांच्या भाक्ते संबंधाची अनेक व्रते सांगितठीं आहेत. शिवाची भाक्ते एकंदर जनसमाजांत जास्त असल्यानें दहा पुराणांत शिवाचें महत्त्व वर्णिलेळें आहे; विष्णूच्या माहात्म्याचीं चार असून देवी व गणपतीचे महात्म्य वर्णिणारीं दोन दोन आहेत.* या कालविभागांत सूर्याची भाक्त मार्गे पडलेली दिसते; पण दहाव्या शतकांत भागवत पुराण उत्पन्न झाल्यानें विष्णुभक्तीस फार जोर आला. या देवतांच्या भक्तीचे निरानेराळे विधि वब पंथ प्रचारांत आळे. शिव, विष्णु, देवी आणिं गणपाते यांच्या अनेक मान्य मूर्तिसंबेधानें सबंध हिंदुस्थानांत प्रसिद्ध असलेली क्षेत्रे पुराणांत परिगाणित केली असून त्यांचें माहात्म्य वर्णिळं आहे. स्कंदपुराणांत हिंदुस्थानांतील चोऱ्याशी प्रसिद्ध शिवालिंगे सांगितली असून प्रत्येक टिंगाच्ण माहात्म्यासंबधे विशिष्ट पौराणिक गोष्टी दिल्या आहेत. इतर पुराणांत विष्णु, देवी आणि गणपाति यासंबंर्धाची पुण्यस्थानें वर्णिली आहेत व त्यांच्या गोष्टी दिल्या आहेत. हें सर्वे वाड्मय पहिल्या आणि दुसऱ्या कालविभागांत वाढलें जाऊन तिसऱ्या कालविभागांत इल्ली आहे तसें झाळें असावें,

उपस्मृत्या आणि उपपुराणें. हिंदुधरमार्चे बदललेळें स्वरूप आणि त्यांत वाढळेलीं व्रतें आणि संस्कार यांनीं उत्पन्न झालेली गरज, आगमांच्या उत्पत्तीनें व अठरा पुराणांच्या विस्ताराने, भागली न जाऊन जुन्या अठरा स्मृतीशिवाय

  • अष्टादशपुराणेषु दशभिगींयते शिव: ।

वट

चतुभि्गीयते विष्णुद्वांभ्यां शक्तिश्च विघ्नपः

कलिवजे. ६४३

उपस्मत्या आणि जन्या अठरा पुराणांशिवाय उपपुराणें या किंवा पूर्वीच्या कालविभागांत उत्पन झालीं. आम्ही इतस्त्र दाखविलें आहे कीं, याप्रमाणें भागरतपुराण १०व्या शतकांत उत्पन्न झालें. उप- स्मृत्या आणि उपपुराणें यांत कोणते नवीन विधि सांगितळे आहेत हं पाहून त्यांचा काल ठरविणें हें फार महत्त्वाचें व मनोरंजक आहे; पण हं वाड्मय फार मोठें असून त्याचा अभ्यास करण्यास फार मेहनत लागणार आहे. तथापि बहुतेक असं निश्चयाने म्हणतां येतें को, हं वाड्मय या कालविभागांत उत्पन्न झालें, कारण कलि- वर्जांचा उछेख या उपपुराणांत विशेषतः आदित्यपुराणांत सांपडतो या कलिवरजांवरून सूत्रकाळाच्या वैदिक धर्माहून इछीचा हिंदु धर्म कसा भिन्न आहे ह्याची संपूर्ण कल्पना येते. या पुराणांत सांगि- तलेळे कलियुगवर्ज धम म्हणजे, वैदिक सूत्रकाठापासून (इ. स १००० ) मध्ययुगीन काळाच्या अंतापर्यंत ( सुमारं १२०० इसवी) जे धम किंवा विधि ठुप्त झाळे तेच होत. हछीच्या हिंदुधमात काय चाळ आहे आणि वैदिक सूत्रांत किंबहुना स्मृत्यांत काय मान्य आहे ह्यांच्या तुलनेनें हे कालिवर्ज नियम सहज काढतां येतात. या यादी- वरून हिंदुधर्माची बदललेली स्थिति पूर्णपणें लक्षांत येते. अशा बदलास कांहीं तरी आधार पाहिजे म्हणून हे कलिवज प्रकरण उप- पुराणांत दिलें गेळें आणि निबंधकारांनीं म्डणजे धर्मशास्त्रावर्रल ग्रंथकारांनी उपपुराणांतील हीं वचनें आधारास घेतलीं.

४0: य

कालवज कलिवज वचनें ( हीं परिशिष्टांत दिलीं आहेत ) बारकाईनें तपा- सलीं असतां आपल्यास असें दिसून येतं कीं, यांतले कांहीं निषेध

या कालविभागांत उत्पन्न झाळे व अनेक निषेध ह्याहि पूर्वकालीं उत्पन्न झाले. चितेत अथवा कड्यावरून उडी घेऊन प्राण देण्याच ।

९४ सामान्य परिस्थिति.

निषेध ( एका विशेष वचनानें हा निषेध आहे असें अलबेरूर्नानेंहि लिहिळें आहे ) पूर्वी दाखविल्याप्रमाणे १००० इसवीच्या सुमारास उत्पन झाळा असावा. पूर्वीच्या कालविभागांत धर्मशील हिंदूनीं चितेत जाळून घेतल्याचीं उदाहरणें आहेत. खुद्द कुमारिल यार्रातीनें चितेत जळून मेला. तसेंच रोण्यांच्या होळींत कुमारगुप्त जळून मेल्याचा उललेख एका कोरीव लेखांत आहे (भा. १ पा. ९७ ). याचप्रमाणें अनुलोम असवर्ण विवाहाचा निषेध स्पष्टपणें या काळांतला आहे. कारण राजशेखरानें ( सुमारें ९४० इ, ) क्षत्रिय खरी केली होती. संन्यासाचा निषेध बौद्धकाळांतला दिसतो,आणि अग्निह्वेत्राचाहि तसा दिसतो. कुमारिळ आणि रइंकरानंतर हे निषेध काढून टाकलेले दिस- तात, कारण संन्यास व अग्निहोत्र अद्याप थोडे तरी ब्राह्मण घेतात. यामुळें या दोन विषयांवर कलिवजे वचनांत विरोधी वाक्यें आहेत, दुसरें असें कीं, कांहीं कलिवजे-निषेध बुद्धांस पटणारे असून दया किंवा नांतीची शुद्धता यांनीं स्पष्टपणें प्रेरित आहे. पण कांहीं निषेध केवळ धर्मवेडामुळें घातळेळे दिसतात. सवे जातींत विशेषतः ब्राह्मणांत जातीच्या झुद्धतेच्या कल्पना इतक्या वाढल्या कौं, जातीच्या बाहेर विवाह तर बैद झालाच पण खाणें पिणेंहि बंद झाले. कांहीं उत्तर हिंदुस्थानच्या ब्राह्मणांच्या पोटजातींत कधीं कधीं जातीतीलच पण परकीय इसमाच्या हातचे अन्नहि चालत नाहीं व पाणीहि चालत नाहीं. दक्षिण हिंदुस्थानांत अस्पृश्यांची छायाहि दोषी समजतात. पूवीच्या कालविभागांत क्षत्रिय व वैश्य यांच्या येथं ब्राह्मण अन खात, किंबहुना कित्येक शूढांचेड्ि खात, ही गोष्ट आतां कलिवजेव- चनानें वंद झाली. पण ब्राह्मणा-त्राह्मणांत किंवा क्षत्रियांत व वैऱ्यांत आपसांत जेवण्याची मनाई कोणत्याच वचनानें नाहीं. पण हीहि प्रथा या कालविभागांत जातीच्या शुद्धतेच्या कल्पनेनें बंद झाली.

छुध्दीकरणाचा निषेध. ६४५

शुद्धीकरणाचा निषेध.

पण सवांत धर्मवेड्या मतांचा व जातीच्या शुद्धतेच्या कल्पनांचा जास्त हानिकारक परिणाम शुद्धीकरणाच्या निषेधानें झाला. ह्या निषेध अल्बेरूनींच्या काळीं झालेला दिसतो, आणि यासंबंधें कलिवर्ज वचनहि नाहीं.एका विद्वानूत्राह्मणाशींया विषयावर अलबेरूनीचं भाषण झाळे असें दिसतें. कारण तो असे स्पष्ट म्हणतों कों मुसलमानी देशांत गुलाम करून नेलेले ठोक परत आले असतां त्यांच्या शुद्धीकरणार्थ प्रायाश्चेत्त सांगितलेळें आहे, पण हें प्रायाश्चित्त वर्णन करून तो पुढें असें लिहितो कीं, असे लोक पुनः जातींत घेतले जात नाहींत, असेच तो ब्राह्मण म्हणाला (सचाऊ भा. २ पा. १६३ ). अल्बे- रूनीच्या काळांत सुद्धां लोकमताची ही स्थिति होती, मग या काल- विभागांत आणि नंतर, हिंदु ठोकांच्या धर्मवेडाला जास्तच जोर आला हें सांगणें नको. त्यामुळें जबरदस्तीने बाटविलेल्या लोकांस त्यांच्यावर जबरीनें लादलेल्या धर्मांत राहण्याशिवाय गत्यंतर राहिलें नाहीं. ‘ एकदां बाटला कीं पक्का बाटला असाच हिंदुधमीचा सिद्धान्त ठरला. यामुळें हजारों हिंदु पुष्कळदां अपराधाशिवाय कायमचे मुसलमान किंवा खिस्ती झाले हें आपल्यास माहितच आहे.

टिप्पणी

अलूबेरूनीने पारिगाणित केठलें उपास व उत्सवदिवस

(१) अलूबेरूनीनें हिंदूंतील उपवासदिन विस्ताराने दिले आहेत, ते पंजाब व काइमीरांतील आहेत. कांहीं थोड्याशा फरकाने ते व हल्लीचे एकच आहेत. तो लिहितोः–(सचाऊ भा. १ पा. १७५) “’ झुद्ध पक्षांतील अष्टमी व एकादशी उपासाचे दिवस आहेत. एकादशी विशेषतः वासुदवाच्या भक्तीसंबंधाने आहे, आणि ते लोक रात्रभर जागतात, या रीतीनें एकादशीचे केलेलें वर्णन हल्लींहि लागू पडतें. अष्टमीचा उपवास बहुतेक लस आहे. तो देवीसंबंधाचा आहे. जेनांत तो अजून पाळतात,

६४६ सामान्य परिस्थिति.

भाद्रपद कृष्गाष्ट्मांचे जन्माष्टमी म्हणून वर्णन अलूबेरूनीनें केलें आहे. ह्यावरून त्याचे माहेने पौर्गमान्त दिसतात. “ चेत्राचा साहवा दिवस सूर्यपूजेसंबंधं पवित्र आहे. ” हा उपास हल्लीं फारसा पाळीत नाहींत, कारण सूयोपासना लुप्त झाली आहे. “ आषाढांत अनुराधा नक्षत्राचा दिवस उपासाचा मानतात.?’हा नीट समजण्यांत येत नाहीं. पण या देव- शयनी एकादर्शाचें त्यानें योग्य वर्णन केलेलें आहे. हा दिवस सर्व हिंदु- स्थानमर उपासाचा मानतात. “श्रावण पोणिमा सोमनाथाच्या उपासाचा दिवस आहे.” हल्लीं हा उपास नसावा. पण त्यावेळी समुद्राकिनाऱ्यावरील सोमनाथ येथें नारळीपोर्णिमेचें महत्त्व असावें. पावसाचे वारेहि यावेळीं कमी होऊन समुद्र शांत होतो. “अश्विनी अष्टमी भगवतीच्या उपासाचा दिवस आहे, चंद्र उगवला म्हणजे उपास सोडतात. ” हा उपास अद्याप बायकांत पाळतात. “’ भाद्रपद पंचमी सूर्याच्या उपासाचा दिवस आहे. खिडकोंतून आंत आलेल्या सुर्यकिरणांची धूपानें ब पुष्पांनीं पूजा करि- तात. ” हा दिवस विशेषतः मुलतानांत पाळीत असावेत. तेथील प्रसिद्ध सूर्यमंदिर आम्हीं पूवी वर्णिळेंच आहे. कार्तिकांतील वासुदेवाच्या उठ- ण्याचा दिवस ( एकादशी ) हाहि वागला आहे, पण चंद्र रेवतींत अस- ल्यास त्याचें महत्व अधिक असं जे सांगितलें आहे ते हल्ला ठाऊक नाही, “ भाष्म पांचरात्र-उपासाचा. पहिला दिवस हाच आहे. ब्राह्मण मात्र दुसऱ्या दिवशीं उपास सोडतात. ” ही गोष्ट अलीकडे ठाऊक नाहीं. “ पोष षष्ठी सूय़ांचा उपास दिवस आहे. ? हा रथससमीच्या पू्षींचा दिवस होय; पण हल्लीं या दिवर्शी उपवास करीत नाहींत. “माघ तृतीया बायकांचा उपास दिवस आहे. ह्यास गोरीतृतीया म्हणतात. ” रामनवर्मांचा उपास त्यानें सांगितला नाहीं ह्याचें आश्चर्य वाटतें.

(२ ) अल्अेरूनीनें वर्णिलेले उत्सवादेन पुढीलप्रमाणें आहेत ( पा. १७६). “ चेत्र शुद्ध द्वितीया हा कार्मीरांत मोठाच उत्सवदिन मानतात. तेथील राजानें या दिवशीं तुकोंबर मोठा जय मिळविला.” हा विजय हिंदु- स्थानांत [दिग्विजय करणाऱ्या लालितादित्यानें तुकांवर मिळविलेला असावा.

उत्सव दिवस. ८४७,

हा एक संस्मरणीय विजय असून भाग १ यांत “ हिंदुस्थानच्या मध्य- युगीन इतिहासांत त्याचा प्रामुख्यानें उल्लेख केला पाहिजे ” अर्से आम्हीं त्याचें वर्णन केलें आहे. “ चेत्र एकादशीस बासुदेवाच्या हिंडोल्याचा उत्सव होतो. आणि पोर्णिमेस बायकांचा वसंतोत्सव असतो.” दोन्ही दिवस आ- पल्या इकडे प्रसिद्ध नाहींत. वेशाख तुतीया ही गौरी तृतीया “वैशाखी दर- मीस राजाच्या आज्ञेने ब्राझमण चार दिवस गांवाबाहेर जाऊन यज्ञ करितात.” मेष संक्रातीचा उत्सव पंजाबांत विशेष आहे;आणि अजूनहि वैशाखी या नांवानें प्रसिद्ध आहे. “ज्येष्ठशुद्ध पौर्णिमा बायकांचा उत्सव आहे. आषाढाचे सर्व दिवस उत्सवदिन आहेत. आणि श्रावण पोर्णिमेच्या दिवशी ब्राह्मणांस दाने देतात, अश्विन महानवमीच्या दिवशीं उसाचा रस भवानीला अर्षण करितात आणि कोकरें मारितात, अश्विन पोर्णिमेच्या दिवर्शी जनावरांचा उत्सव असतो व त्या दिवशीं लोक कुस्त्या खेळतात. ” भाद्रपद पितु- पक्षाचाहि उल्लेख आहे व मघायुक्त चंद्र असेल तो दिवस विदोष मह- तत्वाचा सांगितला आहे. ( पोर्णिमांत महिन्याप्रमाणें यास अश्विनवद्य म्हटलें पाहिजे होतं ). “ भाद्रपद तृतीयेस स्त्रियांचा उत्सव असतो. त्या टोपल्यांतून रोपें कारेतात आणि रात्रीं देवीची पूजा कारेतात. कार्तिक प्रतिपदेस दिवाळीचा उत्सव असतो. त्या दिवशीं लक्ष्मी एक दिवसा- करितां बळिराजास सोडते. मार्गशीषे तृतीया स्त्रियांचा उत्सवदिवस आहे. माघ तृतीया हि स्त्रियांचा उत्सर्वादन आहे. स्त्रिया माघ महिना- भर थंड पाण्यानें रान कारेतात. फाल्गुन पौर्गेमा स्त्रियांचा दोला उत्स- वदिन आहे. लोक गांबढ्यांतून होळी पेटवितात. फाल्गुन १९ वा शिव- रात्रीदिन आहे. लोक महादेवाची पूजा करून सर्वरात्र जागून काढतात.” शिवरात्रीचे हें वर्णन बरोबर आहे, पण तिथींत हस्तरोष आहे चतुर्दशी पाहिजे. “ मुलतान शहरांत सूर्याचा एक विशेष उत्सव असतो. त्यास सांब परियात्रा म्हणतात. ” वरील वणेनांत आलेले बहुतेक उत्सव आपण इल्लींहि पाळतो, यावरून ते निदान अलू्‌बेरूनीच्या काळाइतके (१०३०७ इसवी) लुने आहेत,

प्रकरण पांचवं. राजर्काय परिस्थिति.

भाग २ यांत वर्णिल्याप्रमाणे इ. सनाच्या दहाव्या रातकाच्या अंतीं काबूलपासून कामरूपपर्यंत आणि कार्इ्मारपासून कुमारीपर्यंत भारत- वर्ष अनेक राज्यांत विभागिळें असून या लहान मोठ्या राज्यांवर अनियंत्रित सत्तेचे हिंदु राजे ( बहुतेक रजपूत ) राज्य करीत होते, ‘तथापि हीं राज्यें एका दृष्टीनें ठिमिटेडू मॉनर्कीज (मर्यादित राज्यें) होतीं. कारण पाश्चात्य देशांतील राजनीतिशास्त्राच्या अळीकडील सिद्धांताप्रमाणे राजसत्तेस वाठेळ तो कायदा करण्याचा मर्यादाराहित अधिकार असून ञ्या राष्ट्रांत कायदा करण्याची राजाची ही सत्ता पार्लमेंटच्या म्हणजे लोकसभेच्या कायदा करण्याच्या अधिकाराने मर्यादित असते त्या राष्ट्रास लिमिटेड मॉनकॉ म्हणतात. भाग २ यांत दाखविल्याप्रमाणे भारतवषात राजास किंबहुना लोकांस नवीन कायदे करण्याचा किंवा जने बदलण्याचा अथवा ते रद्द करण्याचा मुळींच अधिकार नव्हता. राष्ट्रास लागणारे सवे कायदे स्टिक्त्यानें मनूस लोकांवर राज्य चालविण्याकारेतां प्रारंभींच दिले आहेत अशी ‘समजूत आहे. हा ईश्वरदत्त स्मृत्युक्त कायदा हिंदुस्थानांतील सर्व ठिकाणीं यावेळीं चाळू होता. आणि यामुळे अनियंत्रित राजसत्तेला मर्यादा होऊन वाटेल तसे कायदे करून जुलमी अमलाला जसा जोर दुप्पट येतो तसा प्रकार त्यावेळच्या राष्ट्रांत मुळीच नव्हता. तेव्हां हिंदुस्थानांतील ही निरनिराळीं अनियंत्रित सत्तेची राज्यें वस्तुत: लिमिटेड मॉनकीज (मर्यादित राजसत्तेची राज्ये ) होती. आणि ज्यामुळे राज्यकारभार चांगळा चाळत असून लोक सुखी असत.

दुसरं असे कीं भाग २ यांत दाखविल्याप्रभाणें जमीन,हवा,देद्याची

राजकीय परिस्थिति. ६५९.

परिस्थिति, लोकांची भाषा आणि भिन्न प्रांतांच्या लोकांतील इतर निरनिराळेपणा, या फरकामुळं देशांत निरनिराळीं राज्ये असणे हीच देशास योग्य आणि जर्रीची परिस्थिति होती. या कालविभागांत अस- ठेली राज्यें वरील कारणांनी हिंदुस्थानचे साहजिक पडणारे निरानराळे भाग याशीं तंतोतंत जुळतात, या रीतीनें कारमीर, यू, पी, राज- पुताना ( रेतस्थान व डोंगरी मुळूख ), गुजराथ, काकण, माळवा, बुंदेळखंड, मध्यप्रांत, बंगाल, तेलंगण, द्रविड, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र ही निरनिराळी राज्यें असून त्यांचे प्रांत नेसार्गिक देशविभाग होते. या सर्व राज्यांचे एकच साम्राज्य होण्यास अनुकूल कारणें म्हणजे वंश,धर्म व प्राचीन परंपरा यांचें यांत ऐक्य, होतें हं खरें. पण ज्याप्रमाणें मध्ययुगीन युरोपांत पवित्र रोमन साम्राज्याखालीं सुद्धां निरानेराळ्या राज्यांचा एक जीव झाला नाहीं, त्याप्रमाणें मध्ययुगीन भारतांतहि या राज्यांचा एकजीव होऊन एक साम्राज्य उत्पन झाले नाहीं. याची कारणें दोन्ही ठिकाणीं एकच झाली. भारतवर्षीय साम्राज्या- ची कल्पना मात्र भारतीय राजापुढे नेद्वमीं असे. तथापि या कल्पनेंत मांडलिक राज्यें नष्ट करण्याचें मत नसून त्यांनीं साम्राज्य धन्याचें नांवा- ला मांडाळिकत्व कबूल करावें एवढीच कल्पना असे. अशा रारताचें साम्राज्य, म्हणजे सम्राट अगर चक्रवती होण्याचा मान, मिळविण्याच्या हेतूनेच बहुधा भिन्न हिंदु राजांतील सवे लढाया असत. कारण ह्या सम्राटाचा मान बापापासून मुलाला वंशपरंपरेने चालावा अशी कल्पना नव्हती, तर तो प्रत्यक्ष सामथ्यांवर अवलंबून असे. यामुळें या निरनिराळ्या राज्यांतील प्रत्येक महत्त्वाकांक्षी ब कर्तृत्ववान्‌ राजास दिखिजयानें असा साम्राज्यमान मिळविण्याचा आयेकार असे. राजशेखरानें सम्राट्‌ आणि चक्रवती यांत एक बारीक चमत्कारिक भेद सांगितला आहे. “* जो भारतवषे दाक्षिण समुद्रापर्यंत जिंकतो तो सस्राटू आणि जो कुमारीपुरापासून हिमाल्यापलीकडींल बिंदुसरापर्यंत

५५० सामान्य परिस्थिति.

एक हजार योजन लांबीचा सर्व देश जिंकतो तो चक्रवर्ती ‘” असें त्यानें म्हटलें आहे. यांतला स्पष्ट दिसणारा फरक असा कीं चक्र- वर्तीनें कारमीर आणि नेपाळ जिंकले पाहिजे आणि दक्षिणेकडे चोल आणि पांड्य यांस जिंकले पाहिजे. परंतु या कालविभागांतील कित्येक लहान लहान राजे सुद्धां आपल्यास चक्रवर्ती म्हणवितात. उदाहरणार्थ, बाराव्या शतकांतील एक ठाण्याचा शिलाहार राजा आ- पल्यास कांकण-चक्रवर्ती म्हणवितो; आणि लक्ष्मणसेनानें आपल्यास कामरूपावनी-मेडळ-चक्रवर्ती हें नांव घेतले आहे (प्रो. बंगाल ५ पा, ४६७). मोठमोठालीं नांवें हळूहळू महत्त्वाने कमी ‘्हार्वात, हें साधारण आहे. उदाहरणाथ अनेक लहान राजानीं सुद्धां कोरीव लेखांत महाराजाधिराज ही पदवी घेतलेली दिसते. तथापि चक्रवती ही पदवी माळव्याच्या भोजास (१००० ते १०४० इ. ) योग्य होती, कारण त्याचा शब्द कारऱमीरांत सुद्धां मानला जात असे. हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासांत अशोक आणि समुद्रगुप्त आणि मध्ययुर्गांन इतिहासांत लालितादित्य हे राजशेखराच्या व्याख्येप्रमाणे खरोखर चक्रवती होते; आणि अर्वाचीन इतिहासांत ओरंगजेब होता. तथापि या कालविभागांत चोल, चालुक्य, गाहडवाल,आणि पाल ही राज्ये साम्राज्ये ह्वोती असें सामान्यतः म्हणतां येतं; कारण त्या प्रत्येकाखालीं कित्येक मांडाळिक राजे असत.

हिंदुराजांच्या ह्या साम्राज्य–मान मिळविण्याच्या धडपडीच्या हानि कारक परिणामाविषयीं आम्ही पुर्वी लिहिळेंच आहे. हिंदु राजनैतिक तत्त्वज्ञानांत साम्राज्य म्हणजे मॉगल क्रिंवा ब्रिटिश साम्राज्याप्रमाणे लहान राज्ये खालसा करणें नव्हतें. भोज किंवा कर्ण यांनीं राज्यें जिंकली तरी तीं नष्ट न करितांहि त्यास चक्रवती ही पदवी मिळाली, अर्थात्‌ त्यांचा मुळ्ख किंवा सामर्थ्य वाढलें नाहीं. यामुळें साम्रा- ञ्याच्या मानाकारितां होणाऱ्या चुरशीमुळें विजय पावणाऱ्या राजाचें

राजकीय परिस्थिति. ६५१

सामर्थ्य न वाढतां भांडणारे दोन्ही राजे दुर्बळ होत. अजमीरच्या विग्रहराजानें मात्र दिछीच जिंकलेळें राज्य खालसा केलें, (याचें फारण बहुधा अनंगपालाला पुत्न नसावा ), आणि यामुळें विग्रह- राजाचें बळ कनोजच्या गाहडवालांच्या बरोबर झाळें. चोहाण आणि राठोड यामध्ये लागलेली साम्राज्यमानाबद्दलची ही चुरस पृथ्विराज आणि जयचंदाच्या काळापर्यंत पोहोंचली आणि या दोघांमधील तीन्न शत्रुत्व दोघांच्याहि दुबळतस कारण होऊन दोघांचाहि तिसऱ्या झत्रनें नाश केला

मागील कालारषभागाच्या अंती असलेलीं निरानेराळी राज्यें या कालांतहि एक दोन विशिष्ट अपवादांखेरीज नांदत होतीं. यापैकीं । महत्त्वाचा अपवाद पंजाबचा होता, हं राज्य प्रारंभीं वाणिल्याप्रमार्णे । या कालविभागाच्या आरंभीं गझनीच्या महमुदापुढें पडलें; आणि ‘पंजाब हिंदुभारतांतून वगळला गेला. पंजाबाच्या नाशाचीं कारणें आम्हीं इतरत्र दिलाच आहेत, पण ल्यांपैको एक महत्वाचे कारण । पुनः सांगण्यासारखें आहे. तें राज्यांत पुरेसें मजबूत खडे सैन्य नसणें । हं होय. सर्व मध्ययुगीन हिंदु राज्यांत अर्शाच स्थिति होती. याची । चिकित्साहे आम्ही पूर्वी केढी आहे (भा. २पा. ३५० ). अरबी प्रवाशी सुलेमान यानें लिहिळें आहे कीं, हिंदु फोजा मुख्यतः सामं- तांनी आणलेल्या मदती पथकांच्या असतात व त्यांचा पगार ते आप- । ल्यास लावून दिलेल्या मुळुखाच्या उत्पन्नांतून देतात. मागच्या काल- । विभागांतील कनोजच्या सम्राट प्रतिह्यारांनीं मात्र मजबूत खडे सैन्य बाळ- गळें होते.पण अलीकडील इमतिहासांतीळ पेशव्याप्रमाणें पुढील कनो- । जच्या प्रंतिहारांनीं मजबूत हुजूर फोज ठेवण्याकडे दुर्लक्ष केळें आणि । त्यामुळें राज्यपालास तुर्कास शरण जावें लागलें. तथापि गझनीच्या । सत्तेतून यू. पी, दोन कारणांनीं वाचळें. एक महमुदाच्या पुढचे । राजे कर्तृत्वर्डान झाळे आणि दुसरें कनोजचें राज्य गाहडवालांनीं

८५२ सामान्य परिस्थिति.

जिंकले. गोविंदचद्रापयेत गाहडबालांनीं मजबूत खडी फोज ठेवटी असें दिसते, पायदळ, धोडदळ व गजदळ यांचें खडे सैन्य गोविंद- चंद्राने ठेवल्याचा उल्लेख एका कोर्रावळेखांत असून त्यानें हम्मीरास आपल्या राज्याची सीमा पाळण्यास भाग पाडले असें वर्णन आहे असो, प्रतिहार यानंतर स्वतंत्र राज्य करणारे दिसत नाहींत.

या कालविभागाच्या आरंभीं दुसरीं दोन राज्य करणारीं कुळें नाहींशी झालीं तीं दक्षिणचे राष्ट्रकूट आणि गुजरांथचे चावडा. दोन्ही देशांत त्यांच्या जागीं दोन नवीन समर्थ राजकुलें येऊन महाराष्ट्र आणि गुजराथ य़ा राज्यांचे बळ पुनः कायम झालें. बंगाल्यांत पाढांची सत्ता कमी होऊन एक नवीन राज्य सेनांचें स्थापित झालें; आणि त्यांनीं पाढांची बंगाल्यांतील सत्ता विभागिली. द्रविड देशांत चोलांची सत्ता उत्कषीस पावली आणि त्यांनीं उत्तरेस गंगेपर्यंत किंब हुना हिमाल्यापर्यंत दिग्विजय केला. तथापि लौकरच प्राच्य गंगांनीं किंग अथवा तेलंगण येथ निराळें राज्य स्थापिळे; आणि चोलांची सत्ता तार्मांल अथवा द्रविड देशांतच मर्यादित केली. याप्रमाणे हिंदु- स्थानाचे भाषा,हवा, जमीन यांच्या. फरकांनीं पडणाऱ्या निरानराळ्या भागांत याहि कालांत वस्तुतः निराळीं राज्यें होतीं. मध्ययुगीन किंबहुना अलिकडील युरोपांतीळ राज्यांहून हीं राज्ये मोठी असतांद्वि त्यांच्या इतको मजबूत राष्ट्रे कां झालीं नाहींत हा मध्ययुगीन हिंदु भारताचा इतिहास लिहिणाऱ्यापुढे प्रश्न आहे. युरोपांतील खिस्ती लहान राष्ट्रांनीं. अरब व तुके यांच्या हछ्यांचा प्रतिकार करून आपलें स्वातंत्र्य राखळें. पण हिंदु राज्ये मोठी असूनहि तुक आणि अफगाण यांपुढं या कालविभागाच्या अंती नष्ट झाली. याचें कारण काय £

’ अन्यत्र सांगितल्याप्रमाणें याचें कारण असें कौं या निरानेराळ्या हिंदु राज्यांत राष्ट्रीय भावना उत्पन्न झाली नाहीं. राष्ट्रीय भाननेच्या जोरावर युरोपांतील लह्वान राष्ट्रें हॉलंड किंवा बेळजम, इंगेरी किंवा

राजकीय पारोस्थति. ८५३

पोलंड, जर्मनीच्या किंबा तुकाच्या हृल्ल्यास शेंकडा वर्धे दाद न देतां स्वतंत्र राहिळीं आहेत. हिंदु राज्यांत मागील कालविभागांत थोर्डाशी राष्ट्रीय भावना होती,तीहि या कालविभागांत नष्ट झाली.“’याचें

। कारण आम्ही पुढील भागांत सांगू !’ असें आम्ही भाग २ (पा.२”५५९)

यांत म्हटलें आहे. हें कारण आमच्या मतें या कालविभागांत पूर्वी 2७22. शि >

वर्णिल्याप्रमाणे जाताचें जें टढीकरण झालें तं होय. या कालविभागांत जातिझुद्धतेच्या वाढलेल्या कल्पना, ब्याच-

। प्रमाणें आहेसा तत्त्वाचे वाढलेळें प्राबल्य, व यामुळें अनेक जार्तानीं । स्वीकारलेला शाकाहार इत्यादि अनेक कारणांनीं प्रत्यक जात किंब-

क 70000:

। हुना पोटजात रोटीबेटी-व्यवहारांत अलग पडली. यामुळें हिंदु समा-

। जाचे लह्वान लहान स्वसंकुचित शकडो समाज पडून त्याची एकी । नष्ट झाली; आणि आपलें राज्य स्वतंत्र असावें याबद्दलची सामुदा- । यिक शुद्ध स्वाहिताची कल्पना नष्ट झाली. पूर्वीच्या कालविभागांत । आपसांतील विवाहसंबेधानें निरनिराळ्या वर्णात एकीची कल्पना । जागृत असे; आणि सर्वांत रोटीव्यवहाार असल्यानेंहि एकीच्या । कल्पनंत आणखी भर पडे. दुसरें, हिंदु धर्माच्या पुराण मताच्या । पुनरुज्जावनानें आतां असें मान्य झालें कीं, राज्य करण्याचें कतेब्ये

क्षत्रियांचे आहे, किंबहुना त्यांचाच हा अधिकार आहे. या काल- विभागांत राज्य करणारीं सर्व राजघराणी हिंदुस्थानभर क्षत्रिय होतीं, निदान तीं आपल्यास क्षत्रिय म्हणर्वात हें लक्षांत घेण्याजोगे आहें.

॥ या राज्य करणाऱ्या घराण्यांनी विशेषतः रजपुतांनीं या जातीच्या

। दढीकरणाच्या कल्पनेवरूनच आपल्ाहि एक निराळा संघ बनविला, | यामुळें इतर जातीशीं किंबहुना शेती करणाऱ्या क्षत्रियांशींडि त्यांचा | संबंध तुटला. या स्थितीत देशयाविषर्याचें लोकांचें राजकीय ओदासीन्य

॥ भयंकर वाढलें. राज्ये राजांची खासगी मिळकत आहे अशी समजूत

म, भा…४२

६१० सामान्य पारिस्थिति.

झाली आणि राजपूत राजांनीं जर आपली मिळकत घालविली तर लोकांचें काम इतर्केच उरतें कीं, ज्याकडे ती मिळकत गेली त्याची सत्ता मान्य करून त्यास कर द्यावे. राजांच्या हक्काचें संरक्षण राज्य करणाऱ्या जातीनेंच करावें, कारण हा त्यांचाच अधिकार आहवे. लोकांचें कर्तव्य इतकेंच कीं, परमेश्वराने जो राजा ल्यास लढाईत यश देऊन पाठविला असेल त्याची आज्ञा पाळावी, याप्रमाणें राष्ट्रीय त्वाची भावना या काळीं ठोळांतून समूळ नाहींशी झाली. राजपुतांताहि देशभाक्ते किंवा राष्ट्रायत्व उरळें नाहीं, केवळ स्वामिभक्तीची कल्पना कायम राहिली. राज्यांतील लोकांचें स्वातञ््य रक्षण करणें हें आपलें कर्तव्य आहे हें रनपूताहि विसरळे. रजपूत शिपायांत जी मनोवृत्ते राहिली किंवा ज्या मनोवत्तीला जागृत करण्याचा वःरंवार प्रयत्न होई ती वृत्ति स्वामिभक्तीची असे, म्हणजे जो धनी आपल्यास वेतन देतो त्याच्या इमानीं नोकरीची.यामुळं अन्यत्र लिहिल्याप्रमाणे रजपूत शिपाई मुसलमान राजांकारितांहि प्राण देण्यास तयार असत. काबूडचे शाही हिंदु राजे नष्ठ होऊन त्यांच्या जागीं गझनीच्या मुसल- मान राजांची सत्ता कायम झाली तेव्हां त्यांच्याहिे नोकरींत रज- पुतांनीं प्राण दिल्याची उदाहरणें पूवी आलेलीं आहेत. तेव्हां या कालविभागांतीळ हिंदु राज्ये दुबळ होतीं ह्यांत आश्चर्य नाहीं. आणि पृथ्विरज आणि जयचंद यांच्या राजपूत सैन्यांचा एकेकाच लढाईंत पराभव होऊन हे दोघे वीर राजे लढाईंत मारले गेले, तेव्हां परकीय सत्तेस लोकांनीं राष्ट्रीय विरोध केला नाहीं ह्यांतहि आश्चर्य नाहीं. हिंदूंच्या तीव्र बुद्धिमत्तेनें राष्ट्राची खरी अंगे कोणतीं याचा शोध केला नाहीं आणि राष्ट्राचा खरा सिद्धांत बनविला नाहीं हें दुर्दैव आहे. पण याचेंहि आश्चर्य नको, कारण पाश्चाल्य देशांताहे अठ- राव्या शतकापर्यंत राजा म्हणजे पिता हा सिद्धांत मानला गेला होता. हिंदुस्थानांत धर्मशास्रांत हीच कल्पना मांडळी गेढी आहे.

राजकीय परिस्थाति. ८५५

किंबहुना हंदु राजांच्या याहि काळांतील वतंनाविषयीं सामान्यतः असें म्हणतां येतें कीं, ही पितृकल्पना ते प्रत्यक्ष अमलांत आणीत आणि आपल्या प्रजेवर ते सहसा जळूम करीत नसत. ही गोष्ट हिंदु राजांत भूषणावह आहे. दीर्घायुष्याच्या बल्ीविषयीं ऊफीनें जभियत-उल– । हिकायत यांत जी गोष्ट सांगितली आहे ( इठि. भा. २ पा. १७४ ) ‘ती या दृष्टीनें मनोरंजक आहे;आणि ल्यावरून असें दिसतें कीं मुस- लमानी राजांपेक्षां हिंदुराजे कमी जुलमी असत. कारण ल्यांचा पक्का विश्वास असे कीं, गांजलेल्या प्रजेच्या शापांनीं जुलमी राजाचं आयुष्य ‘ कमी होतें. या गोष्टीचें महत्त्व कांहीं असो, हिंदुराजांपुढें प्राचीन भार- ।ताचा नमुनेदार राजा श्रीरामचेद्र याचें उदाहरण नेहमीं असे. आणि ‘यामुळें मध्ययुगीन लेखांत जुलमी राजांचा उल्लेख फारच थोडा येतो. ( यास कदाचित्‌ कारमीरचा इतिह्यास अपवाद असेल ). दुसरें असें कीं, हिंदु राज्यांचा खर्च फार मर्यादित असे. त्यांत खड्या फोजा नव्हत्या किंवा बाहवेरील नोकरशाह्या नव्हत्या; या कारणांनीं मध्ययुगीन हिंदु राज्यांचा खर्चे कमी असे. तिसरें,साधारणतः हिंदु स्वमाव कमी क्रूर असतो, यामुळें अनियात्रित राजसत्तेचीं मध्ययुगीन हिंदू राज्ये द्धां व्यवस्थित चाळून सुखी असत. मुख्य गोष्ट हौ को, अंतस्थ व ।ब्राहेरील शत्रूंपासून संरक्षण कमींत कमी खर्चानें त्यांत होत असे. मध्य- | पुगीन अनियंत्रित सतेचा हिंदूराजा अलीकडच्या परकी नोकरशाही- पेक्षां कमी खर्चाचा असे हें कदाचित्‌ उलट वाटेल. पण पुढें दाख- वेल्याप्रमाणे मध्ययुगीन कालांतील हिंदू राज्यांचा मुलकी व फौजी १ फारभार हल्लींच्या ब्रिटिश किंवा मोंगल राज्यांपेक्षा पुष्कळ कमी ॥प्र्चांचा असे. शेवटली गोष्ट ही की, हिंदू राजांस कायदे करण्याची [त्ता नसे, म्हणजे नवीन कायदे करणें किंवा जुने बदलणें किंब-

422)

“ठं असेल तर तो व्यक्तिविषयक असे. अशा मर्यादित सत्तेच्या

[द सामान्य परिस्थिति.

राज्यांत सामान्य लोक अ्थातू आनंदाने रहात; आणि यामुळेच लोकसभेच्या माफत राजकीय सत्ता मिळविण्याचा लोकांनीं पश्चिमे- प्रमाणे कधीं प्रयत्न केला नाहीं. याशिवाय हिंदूंच्या धार्मिक समजती प्रमाणें लोकसभांना सुद्धां नवीन कायदे करण्याचा किंवा जुने बदल- ण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार नाहीं. दिवाणी कायदा आणि गुन्ह्यांचा व शिक्षांचा कायदा, त्याचप्रमाणे करांचे प्रकार व करांची किमान मर्यादा स्मृतीत ठरविली आहे. यामुळेहि लोकस- भांची गरज हिंदु राज्यांत कधीं भासली नाहीं. असे आहे तरी अश्या संस्था नसल्याने त्याचप्रमाणें राज्याचा माळक राजा आहे, लोक नाहींत, अशी चुकीची राष्ट्राची कल्पना असल्यांने एक हानिकारक परिणाम असा झाला कीं, राष्ट्रीय भावना दुबळ झाली आणि ती या कालविभागांत नष्ट होऊन भारतीय हिंदु राज्ये सहजच नाश पावली. असो, राजास याप्रमाणे देशाच्या कारभारांत लोकसभा किंवा लोकसभाधिकृत प्रधान यांची मदत नसून तो आपल्या खुषीप्रमाणे वाटेळ ते प्रधान नेमी; आणि त्यांचे अधिकारायुष्य राजाच्या मर्जी- पर्यंतच असे. हे प्रधान किती होते आणि त्यांचीं कामें काय असत हें पाहणें मनोरंजक आहे. नीतिशास्त्राच्या ग्रंथांवरून तं न पाहतां ( कारण यांचे काळ अनोश्वित आहेत ) तें आपल्यास या कालवि- | भागांतल्या कोरीव लेखांवरूनच पाहिलें पाहिजे.मोज ही कीं, कोरी- | | वलेखांत इनामगांव।चीं दानें नोंदलेली असतात पण त्यांत सर्वे प्रधानांची आणि स्थानिक अधिकाऱ्यांची नांवोह्दि दिळेढीं असतात.बंगाल्यांतील कोरीवळेखांत तर ही यादी नेहमीं विस्तृत तपशीलवार असते त्यांत पुढीळ प्रधान सांगितलेले सांपडतात:-(१) राजामात्य. (२) पुरोहित. (३२) महाधमांध्यक्ष ( ४ ) मह्ासांधिविग्रह्िक ( ५ ) महासेनापति. (६) महासुद्राधिकृत. (७ ) महाक्षपटाठिक ( ८ ) महाप्रातिह्ार (९ ) |

राजकाय परिस्थिति. ८५७

महाभोगेक ( १० ) महापीढुपाते (ए. इं, १४ पा. १५९ ).या नांवामागें लागलेला महाराब्द असें दाखवितो कीं, त्यांचा हाताखालीं त्या नांवाचे दुसरे अधिकारी असत पण हे आपापल्या खात्याचे मुख्य असून राजाकडे जाण्याचें काम यांचें असे. (हा महारशब्द एका काइमीर राजानें प्रथम लाविला भा. १ पा. २०९ ), याशिवाय मुख्य राणी, मुख्य राजपुत्र ( युवराज ) आणि मांडलिक राजे यांचा उल्लेख कोरीवलेखांत येतो, पण ह्यांस प्रधान म्हणतां येत नाहीं, किंवा त्यांचा सछा नेहमीं घेत नसत. तरी पण जमिनीची दानें त्यांनाहि कळवावी लागत. गाहडवालांच्या दानलेखांत पुढील अधिकारी सांगि- तठेळे आढळतात:-( १ ) मंत्री. ( २ ) पुरोहित (3) प्रातिहार (४ ) सेनापति ( ५ ) भांडागारिक ( ६ ) अक्षपटालिक. ह्याशिवाय (७) वैद्य (८) ज्योतिषी आणि (९) खासगी कारभारी (अन्तःपुरीक). दूताचेंहि नांव येतें व राज्ञी आणि युवराजांचें, ( गोविंदचंद्राचे कोरीवलेख इं. ए. १८ पा. १५ व ए. इं. ४ पा, १०१).चेदीचा कर्ण याच्या ठेखांत पुढील नांवें आहेतः-( १ ) महाराज्ञी ( २ ) महाराजपुत्र ( ३ ) महामंत्री ( ४ ) महासांधिविग्राहिक ( ५ ) महामात्य (६) महाधर्माधिकराणिक (७) महाप्रतिह्ारी ( ८ ) महाक्षपटलिक (९ ) मह्ाभांडागारिक ( १० ) महासामंत ( ११ ) महाप्रमत्तकरी आणि ( १२ ) महाश्वसाधनिक ( ए. इं. ११ पा. ४१ ). दुर्दैवानें परमार चेदेळ आणि चाटुक्य राजांच्या दानलेखांत दरबारी अधिकाऱ्यांची नांवें येत नाहींत. पण पूर्वी सांगितल्या प्रमाणें ठाण्याच्या शिला- हारांच्या दानळेखांत पुढील अधिकाऱ्यांचे नांव येतें ब त्यांच्या संम-

  • मदनपालाच्या दानपंत्रांत ( जे. बी. ५९ पा. ७१) १, ४, ५,
    ७८. याशिवाय महासामन्त आणि महाकुमारामात्य हे दोन आणखी सांगितले आहेत.

८५८ सामान्य परिस्थिति.

तीची सहीहि असतेः-( १ ) महामात्य (२) महासांधिविग्राहिक (३ ) श्रौकरण (४ ) ब ( ५ ) दोन भांडागारिक, भदानलेखांत ( ए. इं. १२ पा. २५१ ) ह्याशिवाय ( १ ) राजपुत्र, (२ ) मंत्री, (३ ) पुरोहित आणि ( ४ ) अमात्य यांचा उल्लेख आहे. मुख्य प्रधानाचा उलेख कारितांना “’सवे राज्याच्या चिंतेचा भार त्यावर आहे ” असें ठाण्यांत वर्णन येते. वरील निरनिराळ्या राज्यांतील वर्णनां- वरून (यांत फारसा फरक नाहीं ) राजाचे प्रधान किती व कोणते या मध्ययुगीन इतिहासाच्या काळांत असत तं आपण पाहूं. पट्टराणी आणि युवराज त्याचप्रमाणें वैद्य, ज्योतिषी व पुरोहित हे प्रत्येक राज्यांत महत्त्वाचे अधिकारी असत, पण हे प्रधान नव्हत. एक मुख्य प्रधान असे त्याचं नांव कांहीं ठिकाणीं मंत्री व कांहीं ठिकाणीं महामात्य असें येतें. मंत्रिन्‌ शब्दाचा अथ ‘ सल्ला देणारा , आणि अमात्य शब्दाचा ‘ नेहमीं जवळ असणारा ‘ असा आहे. पर- राज्याचा प्रधान महासांधिविग्राहिक सर्वत्र आहे. तसेंच जमिनीचा मुख्य कारभारी महाक्षपटाळिक सर्वत्र आहे. ठाण्यांत मात्र या- ऐवजीं ‘ श्रीकरण ‘ म्हणजे जमिनीच्या पत्रकांचा अधिकारी हं नांव आहे. जमाखचे आणि खजिना भांडागारिकाच्या स्वाधीन असत. महाप्रतिह्ारी म्हणजे राजाचा द्वाररक्षक हा सवंत्र आहे,तसाच सेना- पातिहि आहे. बंगाल्यांत हत्तींचा मुख्य अधिकारी निराळा असे, कारण बेंगाल्यांत गजदळ मोठ्या प्रमाणावर बाळगलेळें असे (यामुळेंच बंगालच्या राजास गजपाति संज्ञा होती ), आणि इतर राज्यांत निराळा घोडदळाचाहे मुख्य अधिकारी असे. मुख्य न्यायाधीशांचा उल्लेख कोठेंच येत नाहीं ह्याचें आश्चर्य वाटतें. बहुधा वरिष्ठ कोटात येणाऱ्या सर्व कामांचा निकाल सर्व मंत्र्यांच्या व सभ्यांच्या मदतीनें राजा स्वतःच करीत असे हें पुढें सांगू. मंत्र्यांची सछा घेतलीच पाहिजे असा निबेध नव्हता, पण राजा बहुधा असा सल्ला घेई. ठाण्यांत

॥। राजकोय परिस्थिति. ८५९

मात्र असा सल्ला घेणें राजास प्रात्त असे, इतकेंचं नव्हे तर पांच प्रधानांच्या मान्यतेची सही दानळेखांवर व इतर राजकीय लेखांवर घेणें जरूर असे; तरच तें पक्के मानलें जाई. ही वहिवाट ठाण्याच्या शिलाहारांच्या राज्यांत विदाष होती. यावरून तेथील कारभार अधिक संस्कृत असून मंत्र्यांच्या जबाबदारीची कल्पना तेथे उत्पन झाली होती. कदाचित्‌ असें असेल कीं, ठाण्याचें राज्य राष्ट्रकूटांचें मुळांत मांडाळेक असल्यानं तेथील महत्त्वाचे कारभारी साम्राज्य दरबारांतून नेमठे जात; आणि त्यांची संमति सवे महत्त्वाच्या कामांत अवश्य मानली जाई. हाच पद्धत शिलाहार स्वतंत्र झाल्यावराहे चाळू राहिली असावी. असो, मध्ययुगीन कालांतील ही प्रघधानसंस्था त्यांच्या नांवा- सह मुसलमानी काळांत इतकी लुप्त झाली कौं, शिवाजीने हिंदुरांज्य पुनः प्रस्थापित केलें, तेव्हां त्यानें दिलेलीं प्रधानांचीं नांवें १ त्यांची कार्म अगदीं मिन्न आहेत हं पुढील टिप्पणीवरून दिसेल,

टिप्पणी –शिवाजीच अष्टप्रधान.

। बाराव्या शतकांतील हिंदु राज्यांतील प्रघानांचीं नांवें सतराव्या शतकांत । हिंदु राज्य श्िवार्जाने स्थापन करून जी प्रघानसंस्था निर्माण केली त्यांत । यावी असं आपल्यास सकृदृशेनी वाटतें, पण उत्तर व दक्षिण हिंदुस्थान | या दोन्ही ठिकाणच्या मुसलमानांनी कारभाराची सर्वे पद्धत इतकीबदळून । टाकली की, मध्ययुगीन पद्धत किंवा नांबें यांचा अल्पशेषहि उरला नाहीं. यावरून मुसलमानी राज्यकारभार चालविणारे किती स्वतंत्र व कल्पक- । बुद्धांचे होते हें दिसून येतें. इृलीच्या ब्रिटिश राज्यव्यवस्थेरताहिे पूवीच्या । मुसलमानी किंबा मराठी राज्यव्यवस्थेचीं कांहीं अंगें बाकी आहेत. । असो, शिवार्जाच्या प्रधानांची नांवें व कामें मध्ययुगीन हिंदु कालांतील | नांवाहून मित्र आहेत हं पुढीलवरून दिसेल, शिवाजीचे अष्टप्रधान येणें- । प्रमाणें होतेः-(१ ) पेशवा अथवा मुख्य प्रधान, मुलकी व फो्जी दोन्हीं | कारभाराचा मुख्य, (२) सेनापति ( ३ ) अमात्य (४ ) सचिव

९६० सामान्य परिस्थिति.

(५ ) मंत्री ( ६ ) सुमंत ( ७ ) पंडितराव (८ ) न्याया्धॉश. असात्य हा जमीन महसुलाचा अधिकारी असे; आणि सुमंत परराज्या- घिकारी, सचिव हा दसर ठेवणारा आणि मंत्री हा खाजगी अधिकारी होता ( रानड्यांचा मराठी सत्तेचा उदय. पा, १२६ ), मुख्य प्रघा- नांचें पेक्चषबा हं नांव मुसलमानांपासूनच घेतलें गेलें.लोकांना त्या नांवाची इतकी संवय झालीं होती काँ; ते नांव न बदलतां तसंच ठेवणें शिंवा- र्जालाहि फायदेशीर वाटलं. कदाचित्‌ शिवाजीनें असाहि विचार केला असरेल काँ आपण विजापूरच्या सुलतानाप्रमाणेंच स्वतंत्र आणि सामर्थ्य- वान्‌ आहोंत, आपलाहि पेशवा आहे असे लोकांस समजावें. मुसलमा- नांनी ठेवलेलीं दुसऱ्या प्रधानांचीं नांवं मुजुमदार, सुरनीस, सबनीस, डबीर वगैरे त्यानें बदललीं आणि नवीन संस्कृत नांवें देऊन त्यांच्या कामांतहि थोडा बदळ केला. भारतेतिहासस॑शोधकमंडळ पुणें यांच्या जुले आक्टोबर १९२३ च्या त्रैमासिकांत राजेश्री शेजवलकर यांचा एक निबंध छापला आहे, त्यावरून शिवाजीनें आुक्रनीतिसारांतून अष्टप्रधा- नांची नांबें घेतलीं हं दाखाविण्याचें श्रेय त्यांनीं घेतलें आहे. हीं नांवे अर्शीः—( १ ) सुमंत (२).) पंडित (३ ) मंत्री (४ ) प्रधान (५ ) सचिव ( ६ ) अमात्य ( ७ ) प्राड्विवाक्‌ ( ८ ) प्रतिनिधि यांत प्रतिनिर्धीच्या ऐवजीं सेनापति शिवाजीने घातला हें बरोबरच केलें. पण दुसऱ्यांची कामेंहि शिवाजीनें थोडी अधिक नीतिसाराहून बदलली. “ सुमंत हा जमाखर्चाचा प्रधान होता, पण शिवाजीनें त्यास परराज्याचा प्रधान नेमिले, अमात्य जमिनीचा प्रधान होता, १ण शिवबाणीच्या व्यव- स्थेत तो जमाखर्चाचा प्रधान झाला. मंत्री हा परराज्याचा प्रधान होता, पण तो खासगी कारमारी झाला. साचेव युद्धमंत्री होता, पण तो दस- राचा अधिकारी झाला, ” हा तप्शील कदाचित्‌ कोठें चुकलेला असेल, पण हँ स्पष्ट आहे का हीं नांवें ब ही कामे मध्ययुगीन कोरीवलेखाहून फारच मिन्न आहेत. म्हणजे द्यूक्रनीतिसारांताहे बाराव्या शतकांत प्रच-

सुमन्त्रः पंण्डितो मन्त्री प्रचानः सचिवस्तथा । अमात्यः प्रा डावेवाकश्च तथा प्रातानाधेः स्मृतः ॥ पा. ७५

शिवार्जांचे अष्टप्रधान. ६६१

लिंत असलेला नांवाचा ब कामांचा उलेख नाहीं. तेव्हां हा ग्रेय मुसलमानी काळांत निमीण झाला असा तक होतो. पंडित हें अगदींच नवीन नांव आहे. मध्ययुगीन काळांतील धमाध्यक्षाचें मात्र ह काम आहे. प्राडविवाक हं नांव शिवाजीनें न ठेवतां न्यायाधीश ठेवलें. पण स्मृत्यांत व मध्ययुगीन कोरीव लेखांताहे न्यायाधीश हे नांव नाहीं. अक्षपटलिक, भांडागारिक व सांधिविग्रहिक हीं नांवें नीतिसाराच्या का- ळांत अगदीं विसरलेला दिष्तात. अमात्याला नवीन काम व अर्थ दिलेला आहे, आणि सचिव हं नांव अगदींच नवीन आहे व त्याचें कामाहि नवीन आहे. मध्ययुगीन कालांत दसराच्या कामाचा कोठें बंदोबस्त दिसत नाहीं ह्याचें आश्च्य आहे. असो, मध्ययुगीनकालां- तील राजदरबारांतील कारभाराची पद्धत पुढील काळांत अगदीं विसर- लेली दिसते. स्थानिक कारभारांतहि मध्ययुगीनकालांतील नांवें व काम बदललीं हं पुर्ढील प्रकरणावरून दिसेल,

प्रकरण ६ वें. राज्यकारभार.

मुलकी आणि फोजी कारभाराची पद्धत या कालविभागांत सर्व देशांत एकच असून त्यांत बार्राकसार्राक भेद होते. ही पद्धत स्मृत्यां- मधून व त्याचप्रमाणे निरानेराळ्या नीतिश्शात्रांतून चांगळी वर्णिलेली आहे; व कोटिल्याचें अर्थशास्र सांपडल्यापासून चेद्रगुप्त मौर्य याच्या इतक्या जुन्या काळीं ( इ. स, पू. ३०० ) हिंदु राज्यांत राज्य- व्यवस्था कशी होती याची आतां आपल्यास पूर्ण कल्पना मिळाली आहे. हीच जुनी कारभाराची पद्धत कांहीं महत्वाच्या बदलाने या पुस्तकांत वार्णेलेल्या मध्ययुगीन कालांत अमलांत होती. पाहिल्या कालविभागांत (६०० ते ८०० ) जी पद्धत चाळू होती तिचें वर्णन आम्ही पहिल्या भागां , केळें आहे; आणि दुसऱ्या कालविभागांतील पद्ध- तीचें वर्णन (८०० ते १००० ) दुसऱ्या भागांत केळें आहे. या कालविभागांत ( १००० ते १२०० ) चाळू असलेल्या कारभार- पद्धर्तांचे वणेन या प्रकरणांत आम्ही करितों. ही पद्धत बहुतेक पूर्वीच्या सारखी असली तरी त्यांत कांही फेरबदल दिसून येतात. दुदैवाने या विषयांत आपल्यास अट्बेरूनींची मदत मिळत नाहीं, कारण त्याच्या हिंदुस्थानावर्राल ग्रंथांत त्याच्या वेळच्या हिंदु राज्यांत मुलकी व फोजी कारभाराची पद्धत कशी होती याजावेषयीं वर्णन नाहीं. परंतु या कालविभागांत कोरलेल्या इनाम गांबांच्या सनदांतून या विषयावर बरीच विस्तृत माहिती मिळते;आणि या मनोरंजक माहितीव- रून निर्रनराळ्या देशांतील कारभाराच्या पद्धतींचा तपशील आम्ही पुढें देत आहां. आम्ही पुढें दाखावेणारच आहों कीं, मुसलमानी -काळांत मध्ययुगीन हिंदु राज्यांतील ही. कारभारपद्धाते अगदींच नष्ट झाली.

अमली कारभार. द्द

मराठ्यांनी हिंदु राज्याचा पुनः उद्धार केला त्यांत तचा लवलेशहि दिसत नहीं हें आश्चर्य आहे,

अमली कारभार

पूर्वी सांगितल्याप्रमाणे भारतवर्ष या कालविभागांतहि कित्येक लहान मोट्या राज्यांत विभागलेला राहिला. दरूखनच्या चाटुक्यांच्या येऊरच्या शिलालेखांत [इं. ए. ८ पा. १८ ] यांची संस्था ५९ दिळेली आहे. यानंतरच्या मराठी कवींच्या काव्यांत छपन्न राज्यांचा उल्लेख येतो तो या संख्यवरून असावा. गाहडवाल, पाल, चा- लुक्‍्य व चोल यांची मोठालीं राज्ये असून त्यांत त्यांच्याखालीं कित्येक मांडलिक राज्यें होतीं.तथापि त्यांचा कारभार बहुतेक स्वतंत्र चाळे;आणि यामुळें परंपरेच्या “१९ संख्येंत त्यांची गणती असावी. अमली कारभाराचा मुख्य अधिकार प्रत्येक राज्यांत राजाचा असं हे सांगावयास नको. हा राजा क्षत्रिय किंवा रजपूत असे; आणे राजाचा अधि- कार वंशपरंपरेने चाळे. हृछोच्या राष्ट्रातील कारभाराची महत्त्वाची शाखा म्हणजे कायदेमंडळ मध्ययुगीन हिंदु राज्यांत कोठेंच नसे, आणि यामुळें राजास केवळ बजावर्णाचे व न्याय देण्याचे देशांतील वरिष्ठ काम करावयाचें असे. शिवाय राजापासून सवे मानमतराब व सन्मान मिळे हे सांगावयास नको.

राजाची मुख्य राणी म्हणजे पट महिषी आणि मुख्य राजपुत्र म्हणजे य॒वराज हे राजाच्या खालोखाल महत्त्वाचे अधिकारी असत म्हणजे राज्यकारभारांत त्यांना कांहीं अधिकार असे. राजाच्या गैर- हजेरीत किंवा ‘आजारीपणांत राजाचे काम ते करीत हे उघडच आहे. गाहडवालांचे कांहीं दानठळेख मदनपालाच्या नांवें त्यांनीं

त ९ क वाता साल >. राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळीं जवळ बसलेल्या राणीच्या डोक्या- भावती सोन्याचा पट्ट बांधीतात त्यावरून हें नांव पडलें आहे.

6.” €> *

६९४ सामान्य परिस्थिति. केले हें त्यांच्या प्रकरणांत व्णिळेंच आहे. प्राचीन काळापासून ( रामायण पहा ) युवराजाची नेमणूक मोठ्या समारंभाने. होत असे. एका गाह्ृडवाळ कोरीवलेखांत जयचेदास युवराज नमल्याचा उछ्ठेख आहे (इं. ए. ४ पा. १२३ ). कांहीं दक्षिणच्या कोरीव लेखांत राजाचा भाऊ बहुधा युवराज असून त्याचेंहि नांव लेखांत नेहमी येतं. याची अधिकारमर्यादा काय होती हें सांगतां येत नाहीं. मागच्या प्रकरणांत राजाच्या प्रधानांचे अधिकार व हुद्दे यांचें वर्णन आह्मी केलेंच आहे. र

हिंदु राज्यांतील जमीनमहसुली कारभाराकडे प्रथम लक्ष देतां प्रत्यक राज्याचे जिल्हे ब ताळुके असे विभाग असत. यांचीं संस्कृत नांवें मित्न राञ्यांत भिन्न दिसतात. उत्तरेकडे जिल्ह्याचें नांव भुक्ति आणि माळव्यांत मंडळ व महाराष्ट्रांत राष्ट्र असे. अगदीं दक्षिणेस आपल्यास बहुधा नांव मिळत नाहीं,(नाड आणि तर अशीं नांवें केरळ लेखांत येतात ), पण गांवाची संख्या नेहमीं सांगितलेली असते त्यावरून जिल्ह्याचा किंवा ताल्क्‍याचा बोध होतो. सबंध कोंकण राज्याचोहि वर्णन ‘पुरी-कोंकण-चतुद॑शशत’ असे येतें. हे जिल्हे कधीं कधीं फार मोठे असत, आणि त्यांच्या म्यांदाहि कित्येक वेळां बदलत. उदाहरणार्थ, चालुक्यांच्या पूर्वीच्या अमदानींत ‘ करहाटक बारा हजार’ यांत पुण्याचाहि समावेश होत असे. पुणें हें फार जुनें शहर असून स्टेन कुनाऊ यानीं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका दानलेखांत ( ए. इं. १२ ) पुण्याचा उछेख आहे. ताटक्‍्याचा हिस्सा बहुधा त्यांत असलेल्या गांबांच्या संख्येवरून बोधित होई. ही तऱ्हा पुढें सांगितल्याप्रमाणें उत्तेरेकडेद्दि दिसते. तहसील अथवा ताळुका याचें बहुधा विषय हें नांव असे; आणि त्याच्या मर्यादा बहुतेक बदलत नसत. विषयाऐवजीं गाहडवालांच्या यू. पी. मध्यें सांपड- ठेल्या लेखांत नेहमीं पत्तला हें नांव येतें. हा राब्द नर्वीन असून

अमली कारभार. देद५

त्याचा अर्थ किंवा अलीकडचें त्याचें रूप मिळत नाहीं. या गाहड- वाळ लेखांत पुष्कळदां जिल्ह्याचे नांव येतच नाही. फक्त पत्तला सांगितलेली असते. पण खरोखरच पत्तला सांगणें पुरेसे आहे. बंगाल्यांतील सेनांच्या दानलेखांत भुक्ति आणे मंडल दोन्हीं सांगि- तळेलीं असतात; आणि पालांच्या लेखांत भुक्ति, विषय आणि मंडल असे येतात. पैकीं मंडळ हा विषयाचा लहान भाग आहे. माळ- व्याच्या एका लेखांत मंडळ आणि प्रतिजागरणक ( हा रब्द नवीन आहे) असे दोन शब्द आले आहेत आणि ल्याच्यांतला लहान विभाग वोडशिर ४८ असा सांगितला आहे ( परिशीष्ट पह्ा ). प्राम आणि नगर हा शेवटचा विभाग असून ( बंगाल्यांत मात्र याचा अपवाद दिसतो ) त्यांचे लहान हिस्सें सांगितळेळे असत नाहींत.

या निरनिराळ्या विभागांचे कारभार करणारे अधिकारी पुर्ढाल- प्रमाणं दिसतात. भुक्ति अथवा प्रांत याचा अधिकारी राजस्थानय असून जिल्ह्याच्या अधिकाऱ्याचें नांव दख्खनच्या लेखांत राष्ट्रपाति असें येतें. बहुतेक सर्वे राज्यांत ताठुक्‍याच्या अधिकाऱ्याचे नांव विषयपाते असं येतें, गांवाच्या मुख्य अधिकाऱ्याचे नांव फक्त माळ- व्यांत पट्टाकिळ येतें. उत्तर हिंदुस्थानच्या दानलेखांत दान दिलेल्या गांवांतील एकंदर रहिवाशी तसेच शेजारचे गांवचे रहिवाशी यांना दानपत्र संबोधले असून त्यांस ब्राह्मण व ब्राह्मणोत्तर म्हणून त्यांचा तपशील कुटुंबी, कायस्थ, दूत, वैद्य, महत्तर, मेदचांडालपर्यत असा दिळेंलठा असतो ( परिशाष्टांतील परमर्दिनचा ठेख पहा ). अन्यत्र किल्येक वेळां यांचें वर्णन फक्त जानपद या एका शाब्दानें केलें जाते. ज्या लोकांचा नांवानें उछ्छेख केलेला आहे त्यांकडे त्या गांबांतील

“यावरून मराठीतील कुलंबी हा शब्द निघाला आहे. त्याचा अर्थ स्थायिक कुढुंबयुक्त शोतकरी,

६६८ सामान्य परिस्थति.

काम आणि त्याजबरोबर कांहीं उत्पननहि असलेलें दिसतें. ह्याशिवाय कित्येक जिल्हा अधिकाऱ्यांची नांवें येतात तीं शशोश्किक, गोल्मिक आणि तरिक म्हणजे जकातीचा अधिकारी, गुल्म म्हणजे पोलीस ठाण्याचा अधिकारी आणि तरिक म्हणजे गलबतांतून होणाऱ्या दळणवळणाचा अधिकारी अशीं होत. य्‌. पी. आणि बंगाल यांमध्यं नदीमार्गीने उतारूंची व मालांची बर्रंच नेआण चाळू असे त्याजवर निराळा अधिकारी असणें अवश्य होतें. दक्षिण हिंदुस्थानांतहि जेथे नद्या ओलांडल्या जात तेथें सरकारला व नाविकांना कांहीं कर द्यावा लागे; यांच्यावराहदे एक अधिकारी असे. सरकारी जंगलाकारितां आणि राजाच्या गोशाळेकरितां ब जनावरं निपजविण्याच्या कार्या- कारितां निराळे ‘ अध्यक्ष ‘ नांवाचे अधिकारी असत, आणि शेवटीं या सर्व मुलकी अधिकाऱ्यांच्या हाताखालचे शिपाई यांस चाट म्हणत. फॉजेतल्या शिपायांस भट म्हणत. या सर्व लोकांस म्हणजे सरकारी इसमांस इनाम गांव दिल्याची माहिती होणें अवश्य असें, कारण प्रत्येक गांवासंबंधानें त्यांस विशेष्ट कर्तव्य असे. उदाहरणार्थ, इनाम गांवांत चाट व भट यांनीं शिरू नये असा- दानलेखांत अधिकार दिळेला असतो, अचाटभटप्रवेक्षाः याचा अर्थ कोणत्याहि मुलकी अथवा फौजी नोकरानें जिनस खरेदी करण्यास किंवा वेठीस माणसें करण्यास इनाम गांवांत जाऊं नये अशी मनाई असे.

माळव्यांतील लेखांत वर सांगितल्याप्रमाणें गांवच्या मुख्यास पट्ट- किल म्हणत; पण गाहडवाल लेखांत प्रामपाते म्हटळें आहे आणि गुजराथ व दक्षिण इकर्डाल लेखांत प्रामकूट म्हटलें आहे.हा शब्द गुज- राथ, माळवा आणि कोंकण येथें गामोट या रूपाने दृ्लीहिे अव- शिष्ट आहे.प्रत्येक गांवचा कारभार स्वतः पुणे असे, गांवचा चोकी- दार, तसाच दूत, वैद्य आणे जोशी त्याचप्रमाणें भंगी आणि गदंन उडविणारा मांग म्हणजे मेद व चांडाळ असे नोकर असत

अमली कारभार. ९७

गावांच्या दानलेखांत दान घेणाऱ्याचे अधिकार स्पष्ट तपशिलाने सांगितलेले असतात, व त्यावरून खालसा गांवांत सरकारचे किंवा स्वतः सर्व लोकांचे काय हक असत याची मनोरंजक माहिती मिळते. गाहडवालांच्या यू. पी. मर्धांळ दानलेखांत गांवाच्या हद्दीत सांपडणारे लोहू व लबण यांचा हक्क दिलेला असतो; तो फार महत्वाचा असे. लोखंडाची व पोलादाची जरूर सुतार व शिपाई यांना असे. तसेंच समुद्र दूर असून माळ नेआणीची साधनें कठीण असल्यानें यू. पी, मध्यें मीठ ही एक किंमती वस्तु असे; यामुळें गांवांताल खाऱ्या विहिरीच्या पाण्यापासून उत्पन होणाऱ्या मिठावर इनामदारास पूर्ण हक्क दिळा जाई, भा. १ यांत सांगितल्याप्रमाणें बहुधा सर्व राज्यांत मिठावर सरकारी कर असावा, आणि मिठाच्या कराच्या उत्पन्नावर एका स्वतंत्र अधिकाऱ्याची देखरेख असावी. त्याचप्रमाणे गांवांतीकळ गत व ऊषर म्हणजे खड्डे सुड़ ब ऊसर जागा याहि महत्वाच्या असतात; व त्या इनाम गांबांत इनामदाराच्या असत. खालसा गांवांत अशा जागा सरकारच्या किंवा गांवकऱ्यांच्या समाईक असाव्यात.तसेंच इनाम गांबांतील ज्या ज्या वस्तु दिलेल्या आहेत त्यांचा तपशीलहि महत्वाचा असतो आणि त्यावरून या मध्ययुगीन काळांतील राज्यांत जमीनमहसुली खात्याची व्यवस्था दिसून येते. गाहडबालांच्या दानलेखांत दिलेल्या वस्तूंची यादी येणे प्रमाणे आहे:-“ जल, स्थळ, ऊषर, पाषाण, डोंगर, नदा, वन, आम्र आणि मधूक,लोह व लवण,जे जे जमिनीच्या वर व खालीं आहे तें. यू. पी. मध्यें आंब्याची व मोहाची झाडें हींहि महत्वाची अस- तात, आणि ज्या झाडांचे विशिष्ट मालक नसत तीं खालसा गांबांत सरकारी मानली जात. त्याचप्रमाणे दगडाच्या खाणी, लोखं-

८६८ सामान्य परिस्थिति. डाच्या खाणी, खाऱ्या विहिरी, डोंगर आणि जंगलाचे भाग* हे सर- कारी समजळे जात. पण जंगलासंबंधे आपल्यास ही आणखी गोष्ट लक्षांत ठेवळी पाहजे की, सरकारी जंगलाचे कांहीं हिस्से ठोकांस जळाऊ ठाकड तोडण्यासाठी मोकळे असत. सर्व इनाम लेखांत आणखी असें वर्णन असतें कीं तृणयू[ते- गोचरपर्यंत ( सुद्धां ) गांव दिला आहे, याचा अर्थ गवताची कुरणे व गाई चरावयाची जागा यांसाहित गांव दिला आहे. यावरून असें दिसते कीं प्रत्येक गांवास गवताचें कुरण आणि गुरचरणाची जागा तोडलेली असे; व त्यामुळें गाईचें दूध आणि नांगराकरितां बैल यांचा पुरवठा निश्चित असे. अशीं गवताची कुरणे आणि गुरचर- णाच्या जमिनी-ज्यांत गांवांतील गुरांस चारण्याची मोकर्ळांक आहे- दृ्लांच्या काळीं गांबांतून राखलेल्या [दिसत नाहींत. परमर्दिनूच्या ११६६ इसर्वांच्या दानलेखांत [ पारोशोष्ट ] ऊस, कापसाची झाडें आणि सण हेंहि आम्रमधूका बरोबर दिल्याचा उछेख आहे. बुंदेल- खंडांत या तीन उत्पन्नाच्या बाबी महृत्वाच्या दिसतात, आणि म्हणून त्यांचा स्पष्ट निर्देश केलेला आहे. परंतु खालसा गांवांत या उत्पन्ना- वर कांहीं सरकारी हक्क असे असें दिसत नाही,

आतां गांवांतून कोणते कर वसूळ होत इकडे वळून पाहतां
यांचाहि उछेख तपशिलानें दानलेखांत मिळतो, कारण ते कर गां-
वच्या इनामदारास मिळावयाचे असत हें उघड आहे. हें आश्चर्य
करण्यासारखे आहे कीं पहिल्या कालविभागांत नेहमीं येणारा
उद्रंग ‘ शब्द या कालविभागांत कोठेंच येत नाहीं ( ठाण्याच्या

*मेदान बंगाल्यांत जगल नाहीं, त्यामुळं तेथे लहान लहान खूरटी झाडं सुद्धां महत्त्वाची असतात, तीं बंगालच्या लेखांत *सझाटीवटप:? अश्या शब्दाने इनामदारास दिळलीं असत, झाट हा रादर हलांच्या भाषेंत झाड असा झाला आहे.

अमली कारभार. ८६९,

एका लेखांत इ. ए. ३ पा. २६७ मात्र आला आहे. ) सर्व लेखांत येणारे शब्द भाग-भोग-कर-हिरण्य असे आहेत. यांचा अर्थ जमिनीच्या उत्पन्नापैकी ऐेनजिनसी दिळेला भाग (-३- ) आणि व्यापार व उद्योग यांच्या नफ्यावर दिळेला नगदी कर (२८) प्राचीन काळापासून महाभारतात व स्मुत्यांत जो कर सांगितलेला आहे तोच असावा, पण कनोजच्या राज्यांत उत्तर प्रतिहारांच्या वेळीं याशिवाय किल्येक लहान लहान कर लादले गेले असें दिसतें. या- पैकीं पुष्कळांचा अथीहि लागत नाहीं. ही यादी येणेंप्रमाणेंः— (१) कूटक ( २ ) दशबंध ( ३ ) विंशत्युक्थ ( ४ ) अक्षपटालिक- प्रस्थ ( ५ ) प्रतिहारप्रस्थ ( ६ ) आकर (७ ) तुरुष्कदंड आणि ( ८) वरवइ्झे ( बसही दानळेख इ. ए. १४ पा. १०३ ). गाहड- वालांच्या इनामळेखांत ह्याऱिवाय दोन आणखी चमत्कारिक कर सांगितळे आहेत ते ( ९ ) कुमरगदियानक (इं. ए.१८पा. १५ ) आणि ( १० ) प्रवणीकर ( ए. इं. ४ पा. १६९ व १२३). ए. इं. ९ (पा. १०२ ) यांत पुढील शाब्द-प्रयोग घातला आहेः– “६ कुमरगदियानक वगश्‍ेरे नित्य व अनित्य कर. ” प्रतिहारांच्या उतरत्या काळांत जमीन महसुठाचा कारभार कसा त्रासदायक झाला होता आणि हीच स्थिति गाहडवालांच्या वेळींहि कशी राहिली हें यावरून दिसेळ. पूर्वी सांगितल्याप्रमाणें तुरुष्कदंड हा कर तुकांना खंडणी देण्यासाठीं लादला होता हें दिसतंच आहे. पण बहुधा याचें उदाहरण घेऊन दुसरे बारके कर लादले गेळे. अक्षप- । टलिक म्हणजे जमीन महसुलाचा कारभारी याच्या करितां एक । प्रस्थ ( मूठभर धान्य ) प्रतिहार ( द्वाररक्षक ) याच्या करितां दुसरा । प्रस्थ वगेरे कर लादले गेले. दहावा हिस्सा आणि विसावा हिस्सा । कोणाकरितां किंवा कशयाकरितां लादला हें समजत नाहीं. पण येथें म. भा…४२३

६७० सामान्य परिस्थिति.

१ 2

मराठ्यांनी मोंगळी |ुळुखावर लादलेल्या चोथ व सरदेशामुर्खाची आठवण येते. हे कर प्रत्यक्ष ऐनजिनसी असत हं सांगावयास नको.

नगदी कर, खरेदीविक्रीवर व तयार केलेल्या मालाच्या नफ्यावर,नग- रांत मंडपिका म्हणजे चावडीवर घेतला जाई;आणि गांवढ्यांत बाजारांत घेतला जाई. यांतहि एक पन्नासांश सरकारी कराशिवाय धार्मिक कारणांकरितां किंवा विशिष्ट लोकांच्या फायद्याकारेतां बारिक सारिक कर ढादलेळे दिसतात. काठेवाडांताळे एका शिलालेखांत ( भावनगर कोरीव लेख पा. १५७ ) या करांचें एक मनोरंजक वर्णन आढळतं. “ मंगलपूर ( मंगरोळ ) मंडपिकेत प्रत्येक धान्याच्या गा्डावर चार कार्षापण, प्रत्यक गाढवाच्या ओझ्यावर अर्धा, विड्याच्या पानांच्या उंटाच्या ओझ्यावर एक, पानांच्या गाडीच्या ओझ्यावर -॥- वगेरे मंडपिकेंत येणाऱ्या सरकारी उत्पन्नांतूनह्यि दररोज धर्मार्थ कांहीं दिलें जाई. येथें आणखी तपक्षीळ आहेत त्यांतल्या कांहीं बाबी लक्षांत येत नाहींत. या सर्वे नगदी कराला शुल्क म्हणत आणितो मंडपिर्केत वसूल होई.

मुलकी अधिकाऱ्यांत पूर्वी सांगितल्या प्रमाणे तहशीलदार म्हणजे मामलेदार याबद्दल सर्व दानलेखांत विषयपाति हा शब्द हेतो. दक्षि- णच्या लेखांत जिल्हा अधिकाऱ्याचे राष्ट्रपति असें नांव येतें; आणि बंगालच्या लेखांत राजस्थानीय येते ( याचा अर्थ जिल्ह्यांतील राज- प्रतिनिधि असा होतो ). गाहडवालांच्या दानळेखांत कोणत्याहि मुलकी अधिकार्‍्याचें नांव नसतें. पण पत्तलावर मुख्य अधिकारी असलाच पाहिजे. माळव्यांत मंडलोई हें नांव अद्याप बांकी आहे, आणि तें मंडलपति याचें प्राकुत रूप आहे. तात्यर्य या निरनिराळ्या विभागांच्या मुख्य मुलकी अधिकाऱ्याचे नांव पतिरब्दांत आहे. हा अधिकार बहुधा वंरापरंपरेचा नसावा; तर राजानें किंवा मुख्य | मुलकी प्रधानाने. काढता येण्यासारखा असावा. हे सांगण्यासारखे

अमली कारभार. ८७१

आहे कौ, देशमुख व देशपांडे हीं नांवें दक्षिणेत मुसलमानी काळांत दिसत असून हल्लींहि शिक आहेत, पण तीं या काळच्या कोरीव- लेखांत मुळींच येत नाह्मींत. यावरून तीं, मुसलमानी नसून संस्कृत असलीं तरी, मुसलमानी काळांत उत्पन्न झालेली दिसतात. शिवाय जिल्ह्याचे दप्तर ठेवणारा देशपांडे याच्यासारखा मध्ययुगीन कोरीव- लेखांत कोणी अधिकारी दिसत नाहीं. तथापि प्रत्यक खेड्यांत दप्तर ठेवळेलें निश्चित दिसते. कारण खेड्याचा दप्तर ठेवणारा करणिक याचा उल्लेख कोरीवलेखांत अनेकदां येतो. भा. १ यांत दाखवि- ल्याप्रमाणें कोटिल्याच्या अर्थशास्रांत ‘अक्षपटल ‘ याचा अर्थ जमा- बंदी दप्तर ठेवण्याची जागा असा आहे. अर्थात्‌ अक्षपटलिक म्हणजे गावांतील दप्तराचा मुख्य. याच रशब्दाचें स्वरूप संक्षिप्त होऊन वर्ण- व्यत्यासानें माळव्याच्या लेखांतील पट्टाकेल शब्द झाला आहे, आणि ह्याच मुळावरून हृल्लींचा पटेल किंवा पाटील शब्द निघाला आहें. गांवच्या मुख्यास दुसऱ्या देशांतील ळेखांत ग्रामपति (जे. बी ५९ पा. ७१ ) किंवा प्रामकूट किंवा नुसते महत्तर ( कोकणांत याचें हृ्लींचें रूप म्हात्रे आहे ) अशीं नांबें येतात. गांवच्या कारभारांत पाटिळास मदत करणिक करी. याजजवळ करण म्हणजे खाते- दारांची यादी असे. हा शब्द कोकणांत कर्णिक म्हणून येतो, घाटा- वर कुलकणी आणि दक्षिण हिंदुस्थानांत कर्णम्‌ असें रूप येतें उत्तर हिंदुस्थानांत कोठें कराणिक तर अन्यत्र कायस्थ म्हणत ( पर- मर्दिदेवाचा. लेख पहा ए. इं. ४ ). या लेखांत दुसरे नोकर सांगि- तळे आहेत ते दूत, वैद्य, महत्तर ‘मेद आणि चांडालपर्यंत’ असे वार्णैले आहेत. गांबरकऱ्यांत ब्राह्मण असत, त्यांचा निर्देश नेहमीं प्रामुख्यानें येतो ( उदाहरणार्थ परमारळेख इं. ए. १६ पा. २०४). यांत नुसतं वैधयिक म्हणजे ताळुक्यांतठे अधिकारी, पट्टाकेळ, जान- पद, ब्राह्मण आणि ब्राह्मणोत्तर असा उल्लेख आहे. शहर म्हणजे

८६७२ सामान्य परिस्थिति.

पट्टण याकरितां विशेष अधिकारी असे (ए.इं,४पा,१० १). हे गांबचे व शहरचे अधिकारी हल्ींप्रमाणं त्यावेळींहि वंशापरपेरच असावेत. जमिर्नांचा मोजणी होत असे (भा.१पा.१-१९२), आणि निव- त॑न हा शाहू बिध्याऐवजीं बहुधा उपयोगीत. पण कधीं कधीं दान. दिलेल्या जमिर्नाचे माप ‘ अमुक नांगरांनीं जोतलेली ‘ अशा रीतीनें दिलेळे आहे (इं. ए. १८ पा. १५). बह़ाळसेनाच्या नेहृट्टी दान लेखांत (ए. इं. १४ पा. १५९ ) दान दिलेल्या गांवाची चतुःसीमा इतकी तपशीलवार व बारकाईनें दिली आहे कीं, त्यावरून -जमिनीचे दप्तर किती तपशीलवार असे हें दिसून येतं. यांत गांवचे एकंदर क्षेत्राहि उन्मानांत दिलें आहे ( हं माप नौट लक्षांत येत नाहीं ); त्याचप्रमाणें गांवचा ऐनाजिनसी वसळ किती होतो हं सांगि- तळें आहे [ ह्यांचाहह माप नीट टक्षांत येत नाहीं ]; आणे नगदी बसलाहि दिलेला आहे. तो पांचश्ष जुने कपर्दिक इतका थोडा दिलेला पाहून आश्चये वाटते. एक कपर्दिक म्हणजे पाव आणा धरला तर हें उत्पन्न सरासरी आठ रुपये होतें. पण हृ लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, पैश्याची किंमत त्यावेळीं हल्लीं पेक्षां - फार मोठी होती. आणि

&: ५

शिवाय, त्या गांवच्या नगदी वसलाचा हा आंकडा आहे, गांवचा मोठा वसल म्हणजे उत्पन्न झालेल्या धान्याचा षष्टांश धान्यस्वरूपां- तच असे. जमिनींची विक्री किंबहुना इनाम गांवांची दानाविक्री कर- ण्यास हरकत नव्हती. ही गोष्ट परमर्दिदेवाच्या सेम्रा दानपत्रांत स्पष्टपणें सांगितली आहे (ए. इं. ४ पा. १५३ ). हे व्यवहार बहुधा सरकारी दप्तरांत नमूद केळे जात. कारण त्यांत त्यांचा माग लावतां येत असे (भा. २ पा, २७५ पहा ).

हें स्पष्ट दिसतें कीं या व्यवहाराचे दस्तरेवज विशेषतः सरकारी लेख मोठ्या काळजीने आणि दरबारीपणानें तयार होत असावेत. कारण सर्व भूमिदांन ताम्रपटावर लिहिलीं जाऊन त्याच्यावर सही

अमली कारभार. ६७३

शिक्का केला जात असे. दान देणारा राजा दानपत्नावर स्वतः सही करी, आणि सहीचा दरक ‘स्वहस्त ‘ रब्द घाली. ही सही मळांत भुजपत्राच्या लेखावर केली जात असे; आणि नंतर ताम्रपटावर त्याची नक्कळ केली जाई. कधीं कधीं दान देणारा राजा सहीच्या रेवजीं मजकुराच्या शवटीं ‘ मंगलं महाश्री: ‘ एवढाच राहू लिही व केव्हां केव्हां आणखी सह्ीहि घालीत असे [ उदाहरण इं. ए. १४ पा. ३४९ ]. जमीरनौर्चे दान गांवांतील रहिवाश्यांसमोर तसेंच भोवतालच्या गांवाच्या रहिवाशांसमोर प्रसिद्ध केळें जाई. विशिष्ट दरबारचे अधिकारी असं दान प्रसिद्ध करीत व त्यांचें नांव ताम्रपटांत शेवटीं दिळें जाई. माळव्याच्या राज्यांत दानलळेख फारच संकलित तयार होत, तर इतर ठिकाणीं ते फारच तपश्लीलाचे असून त्यांत बंगाल्यांतल्या लेखांप्रमाणे दान देणाऱ्या राजाचा वंशेहितास विस्ता- राने दिळा जाई.असा इतिहास देण्याबद्दल स्मृतीतून स्पष्ट आज्ञाहि आहे

जमीन महसूलारिवाय इतर उत्पन्नाचे खाते म्हणजे व्यापार व कारागिरी यांच्यावरील कर म्हणजे शुल्क याचें महत्त्वाचें होतें. आणे प्रथेक विषयांत ( म्हणजे तालक्‍्यांत ) हल्लींच्या जकातदाराप्रमाणें शोल्किक नांवाचा अधिकारी निराळा असे. तसेंच तरिक म्हणजे नदी उतारावरील अधिकारी, त्याचप्रमाणं खाणी म्हणजे आकर यांचा अधिकारी, गाई, म्हशी, बकऱ्या, मेंढ्या यांच्या वाढीवर देख- रेख ठेवणारा अधिकारी,याची नांवें येतात [ जे. बी. ५९ पा. ७१]. बंगालच्या कोरीवळेखांत अधिकाऱ्यांची विशषष तपशीलवार यादी येते त्यांत वरशिवराय आणखी अधिकारी सांगितळे आहेत ते:–१ क्षत्रपालळ शेतावर नजर ठेवणारा, २ प्रांतपाळ देशाच्या सरहृद्दीवर नजर ठेवणारा आणि ३ कोड्रपाल म्हणजे .-किछ॒यावरील अधिकारी, या सर्व यादीवरून बंगाल्यांत आणि तत्दनुरूप इतर देशांतहि वसूली कारभार तपशीलवार आणि हल्ली प्रमाणें व्यवास्थत होता.

८९७४ सामान्य परिस्थिति.

या निरनिराळ्या देशांत कोणतें नाणें काय किमतीचे चालत असें हें पाहणें मनोरजक आहे. द्रम्म आणि दीनार यांचा वारंवार उल्लेख लेखांत येत असून द्रम्म चांदीचे व दीनार सोन्याचे असत. मुसलमानी काळांतील दाम शब्द द्रम्मापासूनच निघाला आहे. हल्ली हा दाम स्मृतिशेष आहे.दामाची किंमतपूर्वी चार रुपयाइतकी असावी .* मोंगल दाम तांब्याच्या असून चाळीस दामाचा एक रुपाया असे.ठाण्या- च्या लेखांत द्रम्मांचा उलेख आहे. एका कांकणलेखांत मलवर निष्क शब्द आला आहे ( मुंबई, जे. आर. ए, एस्‌. ९ पा. २४१ ). मळवर म्हणजे मलबार आणि यावरून निष्काचें वजन आणि किंमत मुसलमानी व मराठी कालांतील रुपयाप्रमाणें निरनिराळ्या देशांत भिन्न असल्याचें दिसतें. निष्क सोन्याचें नाणें महाभारतांतह्वि ठाट्लिखित आहे. लहान नाण्यापैकीं काषापणाचें नांव येते. बहुधा इछांच्या आण्या इतकी त्याचीं किंमत असावी. किंबहुना आणा शब्द त्याचेच संक्षिप्तरूप आहे. त्याच्या खालीं क्पार्दिकाचा उछ्लेख मिळतो. कपर्दिक म्हणजे पांव आणा. दिसतो: एखाद्या राष्ट्राचे एकंदर उत्पन्न किंमतीच्या रूपांत कोठें सांगितलेळे आढळले असतें तर त्या- पासून फार’च महत्त्वाची माहिती मिळाली असती. म्हणजे मध्ययुगीन काळांतील नाण्याची किंमत व मध्ययुगीन राज्यांची उत्पन्नाची इयत्ता हृ्छींचया आकड्यांच्या तुलनेने आपल्यास नाट कळली असती; परंतु दुर्देवाने असे उछेख कोठेंच आम्हांस मिळाले नाहींत.

*झुपया शट्ट मागील कालाविभागांत काठेवाडांतील एका वि. सं. १०१० च्या लेखांत प्रथम दिसतो (भाग. इ. पा. &८ ), त्यांत “: द्रम्ममेक करी दद्यातुरगो रूपकद्दयम्‌ ‘ असे वाक्‍य आहे, त्यावरून हे प्रमाण दिसतं.

न्यायपध्दाति. «७५

न्यायपद्धाते,

कारभाराची पुढची बाब, आणि हिंदु कल्पनेप्रमाणें राज्याच्या अधिकाराची अत्यंत महत्त्वाची बाब, न्यायदानाची होय. आतिप्रा- चीन काळापासून हिंदु राजे प्रजेचा न्याय स्वतः करीत आणि रोज प्रातःकाळी फिर्यादी ऐकून घेण्यास दरबारांत बसत ( मनु ). त्यांच्या गैरहजरांत प्राडविवाक त्यांचे जागीं काम करीत. मध्ययुगीन कालांत हीच पद्धति चाळ होती असें राजतरोगेणीवरून स्पष्ट दिसतें ( भा. १ पा.२-१००). पण या कालांतील कोरींवठेखांत दरबारी अधिका- ऱ्यांत प्राड्विवाकाचें नांव आलेलें नाहीं; यावरून पूर्वी सांगितल्या- प्रमाणें सवे प्रधरानांच्या ब सभ्यांच्या मदतीनें आपल्या दरबारांत येणाऱ्या विवादांचा निकाल राजा स्वतः करी असें दिसतें, दंड- नायक नांवाचा अधिकारी सर्व कोरींवळेखांत येतो, तो जिल्ह्यांतील न्यायाधिकारी असावा. आरोपी ब्याच्या कोरटांत येऊन सभ्यांच्या मदतीनें आरोपाचा निकाल झाल्यावर तो आरोपीस शिक्षा करीत असे. स्मृतिनियमाप्रमाणें दिवाणी आणि फोंजदारी अता व्यवहारांत भेद नाहीं. सर्व दिवाणी फौजदारी व्यवहाराचे ठरलेले विषय (विवाद) असत; आणि त्या प्रत्येकांत जो पक्षकार हरेल त्यास दंड द्यावा लागे किंवा अपराध्यास कैदेची किंवा वधाची शिक्षा होई. पोलिस आणि जेल हे बहुधा दंडनायकाच्या हाताखालीं असावे, आणि त्यांजवर त्याच्याच बरोबर्राचे दांडिक आणि दंडपाशिक हे अधिकारी असत ( बंगाल. जे. आर. “५९ पा. ७१ ). प्रत्यक जिल्ह्यांत चोर व दरो- डेखोर यांचा पत्ता लावण्याकरितां चौरोद्धराणिक नांवाचे अधिकांरी असत. हिंदुधर्मशासत्रांत व हिंदु राज्यांत चार व दरोडेखोरांना हुडकून काढण्याच्या कामास अब्यंत महत्त्व दिळें जाई; आणि चोरांस प्रत्यक्ष चोरी करीत असतांना पकडले गेले असतां निर्दय शासन म्हणजे

६७६ सामान्य परिस्थिति.

डावा हात तोडला जाण्याची शिक्षा दिळी जाई. लहान फौजदारी विवाद गांबची पंचायत किंवा गांवचे अधिकारी कायमच्या निका- लांत काढीत.प्रत्येक इनामाच्या दानलेखांत ‘सदशापराधः’ असा राब्द येतो; याचा अर्थ आमच्या मतें असा आहे कीं, दहा लह्मान अप- राधांची चौकशी गांवच्या अधिकाऱ्यांनी करावी, अर्थात्‌ त्यांत हो- णाऱ्या दंडाची रक्कम इनामदारास मिळे. यापेक्षां मोठाळें गुन्हे तसेच मोठाळे दिवाणी दावे यांत वादीनें आपली फिर्याद प्रत्यक्ष राजापुढें किंवा जिल्ह्यांतील राजस्थार्नायापुढें अथवा दंडनायकापुढें मांडावी अशी पद्धत दिसते; ब या अधिकार्‍्यांस राजा इतकेच निकालाचे अधिकार असत, म्हणजे. तेहि सभ्यांच्या मदताने निकाळ करीत ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे को, हिंदुन्यायपद्धतींत अपील नव्हतीं. जिल्हा कोटांत हरणाऱ्या पक्षकारास राजापुढें आपला न्याय नेण्याची परवानगी असे; व राजास योग्य वाटल्यास त्या विवा- दाची चोकशी प्रारंभापासून पुनः केली जाई. पेशव्यांच्याहि काळा- पर्यंत अशीच पद्धाते असल्याचे दिसतें.

शेवटीं अल्बेरूर्नानें याविषयीं जे लिहिलें आहे ते पुढें देऊ. ( प्रकरण ६५ पा. १५८), “ वार्दास आपली लेखी फिर्याद व आपला दस्ताऐवज द्यावा सागे. दस्तऐेवज नसल्यास साक्षीदार कमीत कमी चार आणावे लागत. साक्षीदारांच्या उलट तपासणीची परवानगी नसे. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांस खुनाबद्दल शिक्षा नसे पण त्यांस राज्यांतन हांकळन दिलं जाऊन त्यांची मिळकत जत्त केली जाई. चोरीबद्दळ ब्राह्मणांस डोळे काढळे जाऊन डावा हात व उजवा पाय तोडल्याची शिक्षा असे. क्षत्रियांस डोळे काढण्याची शिक्षा मात्र दिळी जात नसे. इतर जातीच्या लोकांस देहांत शिक्षा असे. ‘? या पुराव्यावरून ब्राह्मणांस सुद्धां या कालविभागांत चोरी- बद्दह कशी कडक शिक्षा होई हें दिसून येतें. साक्षीदारांची संख्या

दाक्षिण हिंदुस्थानांतील लोकसभा. ६७७

अमुकच असावी असा स्मृत्यांत नियम दिसत नाहीं. वकिलांची संस्था ब्रिटिश अमलांतच उत्पन्न झाळेली असून पूर्वकालीं नव्हती; अथात्‌ साक्षीदारांच्या उलट तपासणीची तेव्हां कल्पनाच नसे. परंतु त्यांना मोठ्या समारभानं शपथ दिली जाई आणि शपथेवर खोटें सांगितलें. असतां पुढील जन्मांत आपल्यास भयंकर परिणाम भोगावा लागेळ अशी भीति असे, यामुळें त्याकाळी हल्लींपेक्षां साक्षी दार जास्त खरें बोलत. प्रत्यक्ष राजाच्या दराऱ्यामुळेंह्रि पूर्वी साक्षी जास्त खऱ्या होत असाव्या. आणि याच कारणानें एकंदर दाव्यांची विशेषत: दिवाणी दाव्यांची पूर्वी संख्याहि कमी असावी.

जेथ विवादाचा. निकाल होण्यांत अतिशय शंका पडे, तेथे निर- निराळीं दिव्ये करीत असल्याचें अलबेरूनीनें वर्णन केळे आहे. कदाचित्‌ हं वर्णन धम्रंथांवरून त्यानें केलें असावें; प्रत्यक्ष निरी- क्षणावरून नव्हे. कारण कोणताहि पक्षकार वर्णिलेली दिव्ये कर- ण्यास कसा तयार होत असे याचें गूढ आहे. दिव्य करणारा खरा असो किंबा खोटा असो अभ्नि,जल इत्यादिकांच्या दिव्यांत निसर्ग आपला घर्म सोडणार नाहीं. कांहीं यात गुप्तर्रातीते योजिळी तर गोष्ट निराळीं. या रंकेचें समाधान कसेंहि असो, दिव्य हिंदु धमशास्त्रांत सांगितली आहेत; आणि अलबेरूनीच्या पुराव्यावरून या काल- विभागांत न्याथपद्धतींत दिव्यांचा उपयोग होत असे असें दिसतं.

दाक्षिण हिंदुस्थानांतील लोकसभा.

दक्षिण हिंदुस्थानांत म्हणजे केरळ आणि तामिळ राज्यांत हिंदु- स्थानच्या इतर भागांडून कांहीं विशिष्ट परिस्थाते असल्यानें लोक- सभा असत; आणि त्यास अमलबजावर्णांचे व न्यायदानाचे अधि- कार असत. या देशांतील मूळच्या द्रविडवंशी लोकांची वस्ती फारच मोठी होती; इतकेंच नव्हे तर हे लोक इतर प्रांतांतल्यापेक्षां जास्त

६७८ सामान्य परिस्थिति.

सुधारले होते. तसेंच यांच्यावर येऊन बसलेल्या आर्यवंशी लोकांचा थर अगदीं थोंडा होता, आणि शिवाय हे लोक आपल्यास इतके झुद्ध मानीत कीं, ते तद्देशीय लोकांपासूत अगदीं तुटक रीतीनें निराळे रहात. तथापि सुद्धां प्रत्येक ठिकाणीं खेड्यांच्या पंचायती, जिल्ह्यांच्या लोकसभा आणि सर्व राष्ट्राची लोकसभा असल्याचा दाखला कोराींवलेखांत मिळतो. हे कोर्रीवळेख तामिळ व मल्याळी भाषेंत असल्यानें आमच्या अभ्यासाच्या बाहेर आहेत. परंतु के. पी. मेनान यांच्या “ मलबारच्या इतेह्यासा’वर जर्नळ ऑफ इंडियन हिस्टरी ( एप्रिळ १९२५ ) मध्यें एक परीक्षणळेख आला. आहे त्यांतील पुढीळ उतारा या विषयासंबंधें आम्ही देतों, आम्ही पूर्वी रा. पिले यांच्या इ, ए. २४ यांतील लेखावरून देवळांच्या कार्यावर देखरेख करणाऱ्या सहाशे लोकांच्या सभेचा उल्लेख केलाच आहे.

“ तीन प्रकारच्या लोकसभा म्हणजे ‘ कुट्रम’ असत. “तर ‘ म्हणजे खड्याकरितां एक, ‘“नाडू’” म्हणजे जिल्ह्याकरेतांएक आणि सबंध केरल देशाकारेतां एक. पहिल्या खेड्याच्या सभेंत गांवांतील कुटुंबांचे मुख्य म्हणजे ‘ करणवर ‘ जमून स्थानिक महत्त्वाच्या गोष्टींचा विचार कर्रांत. नाडूची सभा याहून विस्तृत गोष्टींचा विचार करी. तिला प्रातिनिधिक संस्थेचे स्वरूप असून मोठे अधिकार असत; व कधीं कधीं ती राजाचाहि अधिकार अमान्य करी. “’

“: * केरलोत्पात्ते ! ग्रंथावरून असें कळतें की, त्या देशावर जेव्हां पेरुमाळ राज्य करूं लागले तेव्हां राजाच्या सत्तेला कांहीं आळा असावा म्हणून ब्राह्मणांनी देशाचे अठरा विभाग पाडळे; आणि राजास अठरा लोकसभा देऊन त्यांचे मत महत्त्वाच्या बाबतींत नेहमीं ध्यावे असं ठरविलें. “पांचरी’ ‘“सहार’ आणि ‘सहा हजार’ अशा नांवाच्या सभा लोगान सांहेबानं जमाविठेल्या सहाव्या शतकांतील एका सिरियन ताम्रपटांत ( नं. २) उछलेखिल्या आहेत. ज्यू आणे:

दाक्षिण हिंदुस्थानांताळ लोकसभा. ६७९

। श्लिस्ती यांनांहि त्यांच्या सभांतून विशिष्ट अधिकार असत. ‘ ( खिस्ती लोक आणि मुसलमान लोक बऱ्याच प्राचीन काळी येऊन मलबा- रांत वसती करूं लागले होतें. ) । “राजेश्री पी मेनान यांनीं खड्यांच्या सभांचा उल्लेख करणाऱ्या अनेक कोरीव लेखांचा दाखला दिळा आहे. केरळांतील स्थानिक सभांची वाढ तामिळ देशांतील स्थानिक सभांच्या प्रसिद्ध वाढी- प्रमाणंच झालेली दिसते. उत्तर पव, चोळ आणि पांड्य यांच्या | कोर्रावलेखांत तामीळ देशांतील लोकसभेचे वर्णन पुष्कळ आलें आहे, केरळांतील खड्यांच्या सभा आशान म्हणजे पाटील याच्या अध्यक्षतेखाली जमत, सामाजिक तंट्यांचा निकाळ करीत, लहान । मुकादम्यांचा फैसंठा करीत, आणि देवळांच्या निरानेराळ्या गरजांची । व्यवस्था लावीत. मलबारांत प्रथम आलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी । नायरांच्या “तर! (गांवच्या) लोकसभेचा अव्हेर केला. सर्व देशाची ।मोठी सभा बारा वर्षांनीं एकदां भरे.तिचा अध्यक्ष वछुवनाड असे किंवा ।वछतिरि राजा असे. तेराव्या शतकांत झामोरिन राजानें हा अधिकार आपल्याकडे घेतला.अशी शेवटली सभा १७४३६. त भरली होती.’ “स्थानिक व्यवस्था वंशपरपरेंनें चाललेल्या अधिकाऱ्यांच्या हातीं ।असलेली दिसते. देशाचे नाडू विभाग म्हणजे जिल्हे नाडूवाली यांच्या अधिकारांत असत. नाडूचे पोटविभाग देशम्‌ असत, ब्याज- ‘वर देशवालींचा अधिकार असे. देशम्‌ याचे आणखी पोटविभाग ॥ असत; पण ते जातीच्या संघवार असत; म्हणजे नंबुरीचं गांव, ।नायरांचें “तर’आणि खालच्या जातींच्या ठोकांचे ‘चेरी’ असे असत. याप्रमाणे पाश्चवेम किनाऱ्यावरील “नाडू’ आणि ‘देशम्‌? पूर्वे किना- ‘ऱ्यावर्राळ त्याच विभागांहून भिन्न असत; कारण ब्यांत अमुक ‘नगरं व गांब॑ असे विभाग नसून नायरांचे अमुक संघ बगेरे विभाग असत.” (पा. ११५ ते ११७).

६८० सामान्य परिस्थिति.

फोजी व्यवस्था,

या कालविभागांतील हिंदु राज्यांच्या फौजी व्यवस्थेचे आपणांस
वर्णन करणें बाकी आहे. पूर्वीच्या काळविभागांत आम्हीं फौजी व्यव-
स्थेचं वर्णन केलेंच आहे (भा.२पा३८०-५); आणि तीच व्यवस्था
याहि कालविभागांत राहिली. या राज्यांत खड्या फौजा थोड्याच
असत, आणि राज्याची फोज सरदारांच्या पथकांची असे. गोविंदर्च-
द्रानें मात्र खडी मोठी फोज ठेविलेली दिसंते. गजसैन्य प्रत्येक राज्यांत
राजाचें ठेवळेठं असे; कारण त्याचा जबरदस्त खर्चे करण्याचें सामथ्य
राजासच असें. बंगालच्या फौजेत परदेशांतील भाडोत्री शिपाई
असत; हें या कालांतील मदनपालाच्या ठेखावरूनहि दिसतें ( बंगाल
५९ पा. ७१ ). आणि त्यांत पूर्वीच्या काळांतील भागलपूर कोरींव-
लेखांत सांगितळेलेच परदेशी शिपाई आहेत; म्हणजे गोड, मालव
खस, हृण, कुलिक, कर्नाट आणि लाट यांचेच नांव असून चो-
डांचें नांव मात्र अधिक आहे. या कालविभागांत चोळ ( चोडहि
लिहिलें जाते) मोठे सत्तावान्‌ झाले, तेव्हां चोड शिपायांची शौयोबद्दल
ख्याति पसरून बंगालच्या फोजेत त्यांची भरती झाली ह्याचें आश्चय
नको. कनौट शिपायांची ख्याति अलबेरूनींनेंहि नमूदकळी आहे, व
कन्नर ‘ शिपाई पंजाबपर्यंत उत्तरेकडे फोजेंत भरती होत. कर्नाटक देशाचे वर्णन करितांना “ जेथून कनर नांवाचे फोजेंत प्रसिद्ध अस- छेळे शिपाई येतात तो देश?’ असें वाक्य त्यानें घातलें आहे (सचाऊ भा, १. पा. १७३ ). ही परिस्थाते आतां उलट झाली आहे. लोकांचे स्वभाव बदलतात असें जं मत भा.२ (पा.३८२) मध्यें आम्ही दिलें आहे त्या मतास या गोष्टीने पुष्टि मिळते.कारण कनड लोक अद्याप मजबूत आणि लढवय्ये असले तरी ते दूरदूरच्या देशांत शिपायाची नोकरी करण्यास जात नाहींत..

फौजी व्यवस्था. ६८१

महृनपालाच्या कोरींवळेखांत पूर्वकाळविभागांताळ भागलपूरच्या कोरीवळेखांत सांगितलेलेच फौजी अधिकारी सांगितळे आहेत ते असेः—( १ ) महासेनापति ( २ ) दोौःसाध्य-साधनिक (३) गज, अश्व, उष्ट्‌ आणि नाविक यांचे. अधिकारी (४ ) प्रेषणिक ( दूत किंवा हेर ) ( ५ ) गमागमिक आणि (६ ) अमभित्वरमाण (या दोन शब्दांचा अर्थ लागत नाहीं हें भा. २ मध्यें सांगितठेंच आहे). बंगालशिवाय इतर राज्यांतहि नाविकांच्या अधिकाऱ्यांखरीज हेच अधिकारी असावेत. अश्वदलाचा कोठें मुख्य अधिकारी निराळा बुंदेलखंडाप्रमाणें असे. साधारण शिपायास भट म्हणत. पोलिस- खाते फाजखाल्याहून निराळे असावें. पोलिसांचे गुल्म म्हणजे ठाणी असत; आणि त्यांचे अधिकारी गोल्मिक असून ते जिल्ह्यांच्या दांडिक अधिकाऱ्याच्या’ हाताखालीं किंवा राजस्थानीयाच्या हाताखालीं असावेत. हे तक आम्ही ज्या क्रमानें अधिकाऱ्यांचा उल्लेख कोरी- वलेखांत येतो त्या क्रमावरून करीत आहोंत (परिशिष्ट पहा. ).

या कालविभागांतील लेखांतहि शिपायांस किंबा अधिकाऱ्यांस वेतन कसें व काय मिळे याजबद्दल विधानें मिळत नाहींत. बहुधा भा. २ यांत तक॑ केल्याप्रमाणे त्यांस कांहीं नगदी वेतन मिळून सर- कारी कोठारांतून धान्य मिळे, मुलकी अधिकाऱ्यांना जमिनी आणि गांवें लावून दिळेलीं असंत असें दिसतें. श्रेष्ठ अधिकारी, मुलकी व फौजी, यांस नगरे लावून दिलीं असावींत.

समरांगणांत सेनेचे आधिपत्य नेहमीं राजाकडे असे; आणि हत्ती- वर राजा सेनपुढें चाल.

सन्मानाचे उगमस्थान,

सर्व पदव्या राजा देत असे. न्यापारी लोकांची श्रष्ठी ही पदवी सुद्धां राजा देई ( ए. इं. भा. २ पा. २२७).

प्रकरण सातवे. भाषा व वाड्यय.

दुसऱ्या. भागांत वर्णन केल्याप्रमाणे हिंदु मध्ययुगीन इतिहासाच्या दुसऱ्या कालविभागांत ( ८०० ते १००० ) हिंदुस्थानच्या हांच्या देशभाषा देशांतील राजकीय, विशेषतः धार्मिक, कारणांनी उत्पन्न झाल्या. कारण बोद्धधम उाच्छिनन होऊन हिंदुधम नवीन तऱ्हेचा बनला, त्या वेळेस संस्कृताचा अभ्यास ज्यास्त जोरानें होऊं लागला. मुख्यतः शंकराचायांचें नवीन तत्त्वज्ञान लोकांस त्यांच्या भाषेंत सम- जून द्यावें लागळें. यामुळे अपभ्रंश भाषा जरी आर्य हिंदुस्थानांत प्रचाठित होल्या, तरी ह्यांत पुष्कळ बदल होंऊन संस्कृतांतून जसेच्या तसेच घेतलेले ( तत्सम ) शाद्व पुष्कळ वापरले गेल्याने आणि संस्क- तांतून विभक्त्यंत रूपें व धातुसाधित रूपं जशीच्या तशींच वापरू लागल्यानें बदल झाला. आयेतर भाषांतहि शुद्ध संस्कृत रद वाप- रळे जाऊं लागल्याने नवे रूप येऊन सोंदर्यहि आलें,या रीतीनें हछाच्या संस्कृतोत्पन्न देशी भाषा मार्गील कालविभागांत अस्तित्वांत आल्या; म्हणजे बंगाली, हिंदी पूरबिया, हिंदी पश्चिमी ( राजस्थानी ), पंजाबी, गुजराथी आणि मराठी. व त्याचप्रमाणें हल्लींच्या आर्येतर देशीभाषा, कानडी, तेलगू, तामील व मल्याटम्‌ याहि जन्मास आल्या. या कालविभागांत या सर्व भाषा इतक्या उत्कषे पावल्या कौं त्यांत संस्कृतांतल्याप्रमाणें आप्त वाड्यय उत्पन्न झाळें. या निरानेराळ्या भाषांच्या प्रांतांत जुन्या एकाच देवनागरी लिर्पावरून निरानेराळ्या लिपीहि उत्पन्न झाल्या हें आश्चये करण्यासारखे आहे. या लिपीची नांवे अल्बेरूनीनें पुढीलप्रमाणें दिलीं आहेत ( भा. १ पा. १७३). “< सर्वांत अधिक प्रासेद्ध लिपि म्हणजे सिद्धमात्नका होय. ही

भाषा व वाउडयय. ६८२३

‘काइमीरांत आणि वाराणशींत चालते. हिंदुशास्राच्या अभ्यासाची हीं वरिष्ट ठिकाणें आहेत. हीच लिपि मध्यदेशांत म्हणजे कनोज भोंव- तालच्या आयीवर्तांत चालते. ‘’ ही लिपि म्हणजे पूरबिया हिंदी होय. ‘“ माळव्यांत नागरी म्हणून निराळी लिपि आहे. तिच्यांत व वरीळ लिपींत आकारांत थोडासा भेद आहे. तिसरी एक टिपि अध- नागर नांवाची वरील दोन्ही लिपि मिळून झालेली आहे. ही भाटि- यांत आणि पंजाबच्या कांहीं भागांत चालते. !’ (माटियाशहर आणि देश, हा सिंधच्या उत्तरेस असून पंजाबचा एक भाग झेलमच्या पश्चि- मेस होता अस आम्हीं प्रारंभीच्या भूगोलिक प्रकरणांत ज मत दिलें आहे त्याचं येथ टर्ढाकरण सांपडत ). हीच बहुधा हल्लांची पंजाबी लिपि असावी. “ दुसऱ्या लिप्या म्हणजे दक्षिण हिंदुस्थानांत समुद्र किनाऱ्यावर चाळू असलेली मलयबरी, अलमन्स्राची सैंधव, कर्नाट देशांत “’ जेथून कनर नांवान प्रसिद्ध असळेळे फौजेतील शिपाई येतात, ‘” चाळू असलेली कनाटकी, आंध्र देशांत चाललेली आंधी दिरवर देशांतली ॥देरवरी (द्राविडी ), लाड देशांतठी लारी आणि पूर्वे देशांत बोद्ध वापरीत असलेली गोरी या होत.

हिंदुस्थानांत चाळू असलेल्या लिप्यांचें हें संपूर्ण वर्णन आहे; आणि ह्यावरून असें आपणांस अनुमान काढतां येते कीं, या वर्ण- नांत भाषेसंबंधानॉहि परिस्थिति पूर्ण प्रतिबिंबळेली आहे. याच भाषा

त हछा प्रचाठत आहत. पूवपजाब व कारमारपासून बनारसंपर्यंत पूव

हिदाभाषा व तचा [लपा आह. माळव्यात आण राजपुतान्यात

पश्चिमी-हिंदी आहे. उत्तर सिंधांत आणि पश्चिम पंजाबांत एक निराळी भाषा आहे; आणि सिंधांत सिंधी आहे. पश्चिम किनाऱ्या-

प.

वरील भाषेस व लिपीस मलवरी म्हटलें आहे. बहुधा समृद्रानें मल-

,॥। बारांतून सिंधपयंत ती गेली असावी; आणि अल्‌मनसुरांत निराळी

४7 _ ४१

। भाषा संघवा अरबी आणि ॥हदां यांच्या [मश्रणाने बनठी असावी

३८४ सामान्य परिस्थिति.

या दोन्ही हृ्ीं जिवंत नाहींत असें वाटतें, १०३ ०इसवींत म्हणजे अलबेख्र्नांच्या काळांत गुजराथी भाषा व लिपी अस्तित्वांत आली नव्हती असें वाटतें. त्याचप्रमाणें अलबेरूनी मराठी ठिर्पाचा उछ्ठेख करीत नाहीं. बहुधा लाट देशाची लाडी भाषा ही उत्तर कोंकणांत बोळली जात होती; आणि हाच जुनी मराठी असावी. ही यादवांच्या अमदानींत तेराव्या शतकांत हीच्या मराठींत रूपांतारेत झाली. मार्कोपोलोंनें असे लिहिळें आहे कीं गुजराथेंत आणि ठाण्यांत निर- निराळ्या भाषा होत्या. मराठी ही आतां सामान्य भाषा झाली असून तिच्या निरानेराळ्या पोटभाषा म्हणजे उत्तर कोंकणांतीळ लाडी, दक्षिण कोकणांत कांकणापर्यंतची कोंकणी आणि मुख्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भ यांतील भाषा, यांस यादवांच्या सर्वव्यापी सत्तेमुळे आणि पंढरपूरच्या सर्वव्यापी भागवत भक्तीमुळे मराठी द्ृछ्ीं व्यापून आहे. या दोन्ही गोष्टी या कालविभागाच्या अंतीं म्हणजे ११७० पासून १२००पर्यंत घडल्या. मराठीची स्वतंत्र स्थिति या काळां- तील महानुभाव ग्रंथावरून दिसते आणि इ.१३००च्या सुमार ज्ञाने- श्वरीसारखा सर्वात्कृष्ट ग्रंथ निर्माण झाला, यावरून या पूर्वी शंभर वर्षे तरी मराठीची चांगर्लांच वाढ झालेली असावी. ठाण्याच्या शिलाहा- रांच्या एक) राजाच्या ठेखांत एक मराठी वाक्य आले आहे. बंगाल- मध्यें त्या प्रांताची भाषा या काळांत चांगर्लांच उदयास आलेली असावी; आणि तेथीळ निराळी लिपी गोडी हिचा उल्लेख अल्बे- रूनीनें केलाच आहे.

दाक्षिण हिंदुस्थानांतील निरानिराळ्या देश भाषा म्हणजे कानडी, तेलगू, तामिळ ऊर्फ द्राविडी आणि मल्याळम्‌ या पूर्वीच वाढून त्यांत वाड्यम उत्पन्न झाळें होते. आम्ही भा. २ यांत डा. सर म्रियरसन यांच्या “हिंदुस्थानच्या भाषांचे परीक्षण? या ग्रंथांतून उतारे देऊन कानडी, तेलगू आणि मराठी वाड्यम किती प्राचीन काळपर्यंत

भाषा व वाडबरय. ८६८”

-मारगें जातं हें दाखावरिळें आहे. ( टिप्पणी परिशिष्टांत दिठी आहे ) याशिवाय या कालविभागांत कानडी, तामिळ आणि तेलगू या भाषांत लिहिलेले अनेक कोरीव लेख मिळाले आहेत. प्राच्य गंगांच्या १०७५ इसवीच्या २का संस्कृत शिलालेखांत शजटीं तेटगू वाक्यें दिलीं आहेत (ए. इं. ४ पा. ३१४ ). तात्पर्य सवे हलछींच्या हिंदु- स्थानांत बोललेल्या देशभाषा, संस्कृतोप्तन व तामेलोत्पन्न, भाषा या स्वरूपानं, पूर्ण वाढून ल्या प्रत्येकोंत या काळांत सुंदर वाड्य़प निर्माण झालें. मराठीत महानुभाव ग्रंथ व त्यानतर १००वषानीं ज्ञानेश्वरी, कान- डींत पंपाचें आदिपुराण, तेटगूंत नन्नयाचे महाभारत हे या वेळचे ग्रंथ अजून कालाच्या पाठविर अद्याप तरंगत आहेत. प्राच्य हिंदी आणे राजस्थानी म्हणज डिंगल यांतहि त्यावेळचे ग्रंथ आहेत, पण त्यांचा अद्याप अभ्यास झाला नाही. आणि शेवटीं पृथ्विराज रासा जरी इल्लींच्या स्थितींत फार वाढलेला ग्रंथ आहे तरी मूळ स्वरूपांत आपल्या या कालविभागाच्या शेवटीं तो तयार झाला असें आम्हास वाटत, हँ देशी वाड्य़य़ मुख्यतः पद्यमय आहे; आणि बहुतेक संस्कृत काव्यांचें किंवा. पुराणांचे भाषांतर अथवा अनुकरण या ख्पानें आहे, पण खुद्द संस्कृतांत या कालविभागांत जे निरानेराळ्या अनेक विषयावर नवे ग्रंथ लिहिले गेळे त्यांकडे वाचकांचे लक्ष वेधण गैर होणार नाहीं. विधयेचीं मुख्य स्थानें काइमीर आणि बनारस होती हँ अल्बेरूनीनें लिहिटेंच आहे. आणि शिवाय बंगाल्यांत नडिया, दाक्षिणंत तंजावर आणि महाराष्ट्रांत कल्याण याहि राजधान्या विद्यांची पीठें होत्या. कनोज आणि उज्जयिनी होंढि ठिकाणे पूर्वी- प्रमाणेंच बिद्येकरितां कदाचित्‌ प्रसद्ध होतीं; आणि मध्य देशाचे विद्वान्‌ लोक बाण आणि कुमारिळ यांच्या वेळों जसे महामीमांसक होते, त्याचप्रमाणें या वेळींहि वेदांचा अभ्यास करून वैदिक यज्ञसह्ि म, भा…

६८६ सामान्य परिस्थिति.

उत्साहाने पूर्वीप्रमाणे करीत.’ असो, या बिषयांच्या यादींत अलंकार

तत्त्वज्ञान, धर्मशासत्र, न्याय, व्याकरण, ज्योतिष, वैद्यक, आणि संगीत इतके विषय प्रामुख्यानें येतात: राजेश्री पी. व्ही काणे यानी अलंकारशास््राच्या वार्ढाचा इतिहास तपशीलबार दिला असून मम्मट (११००६इ.) व इतर शास्त्रकार यांनीं यावेळीं ध्वनीचा सिद्धान्त कसा उत्क्रांत केळा हें दाखाविळें आहे. तत्त्वज्ञानांत या काळांत रामानुज वेगेरेच्या ग्रंथाने भर पडली, व सांख्य आणि योग, बोद्ध आणि जैन कौमारिळ आणि शांकर या तत्त्वज्ञानांनीं पूर्वीच प्रचेण्ड असलेलें हिंदु- स्थानचें तत्त्वज्ञानवाड्यम आणखी वाढलें. धमशास्राचा अभ्यास सर्व हिंदु राज्यांत कसा होत होता आणि मिताक्षेरेसारखे भरीव ग्रंथ कसे निमाण होत होते हें आम्ही पूर्ही सांगितलेंच आहे

न्यायांतहिि नडिया येथील हिंदु नेय्यायिकांनीं एक नवीने दिशा घेतली. हेमचंद्राचें नबें सस्कृत-प्राकुत-व्याकरण याचा आम्ही पूर्वी उल्लेख केलाच आहे. ज्योतिषांत कल्याणच्या विक्रमाचा पुत्र हा एक विद्वान्‌ राजग्रेंथकर्ता झाला आणि भास्कराचा सिद्धांत-शिरोमाणे, ज्योतिष विषयावर्राल हिंदूचा उत्कृष्ट ग्रंथ (९१७५), याच काळांतील आहे. त्याचप्रमाणें वेैद्यकांत मर्थुरेजवळीळ भदावरचा डल्हण आणि बंगालच्या नयपालाचा राजवेद्य चक्रपाणि यांनीं याच कालांत चरक-

  • अश्रान्तक्रतुकुंडमण्डलचलध्दूमावल्िद्य़ामलव्योमाशावलये विलोक्‍्य विल्सन्नीलाम्बुदालिभ्रमात्‌ । विप्रास्येरितवेदराशिविततोद्वोषोद्धरे यदग्ढे सत्पक्षप्रसरा रटन्ति पटबो ह्ृष्टा मुहुः केकिनः (ए. इं. १ पा. ४१ ),

1 हें सव तत्त्वज्ञान त्यावेळचे विद्वानू ‘लोक शिकत ही गोष्ट ए. इं. | ४. नढे बट ५ ० _*८

१ (पा. ५१) यांत एका महान्‌ पंडिताचें. पुढीलप्रमाणें वर्णन केलं

आहे, त्यावरून दिसेल. मीमांसाद्दयपारगो गुरुरसी यः काइयपीये नये ।॥ सांख्ये चाप्रातिमळतानयानधित्र्यक्षोक्षषादक्तिद्क्‌ ॥ यश्चावाकविशालमान- मलनो दुवारबोद्धाम्बुघेः । पानानान्दितकुम्मसम्मवगुनि।दग्वासख्ामन्तकः ||

भाषा च वाडय़य. द्ट्ऊ

संहितेवर विस्तृत व विद्दत्तापूर्ण टीका लिहिल्या. माळव्याचा गरजा भोज याची विलक्षण विद्त्ता आणि त्याचे अनेक विषयावरील प्रमाणभूत ग्रंथ हे पूर्वीच उद्ठोखिळेले आहेत. केरळ देशाची फलज्यो- तिथे आणि वैद्यक याबंदळ विशेष प्रसिद्रे असल्याचें मार्कोपोठोनें लिहिलें आहे (पा. ३७६). पश्चिम किनाऱ्यावर आणि पूर्व किनाऱ्या- बर कदंब आणि चोल यांच्या अमदानींत संगीताचा पुष्कळ अभ्यास झाला; आणि नृल्यकलेची विदाष प्रगति झाली. कारमीरांत दर्ष- राजाची त्यानें केलेल्या सरस संगीतपद्यांबद्द्द आणि गायनास दिलेल्या ओश्रयाबद्दळ मोठी ख्याति झाली, याप्रमाणें या कालवि- भागांत हिंदुलोकांच्या सूक्ष्म व तेजस्वी बुद्धिमत्तेबददहची कोर्ति काव्यप्रकाश आणि सिद्धांत-शिंरोमणी, नैषेंध (पंचमहाकांव्यापैकी एंक ) आणि ‘गीतगोविंद (सर्व पृथथ्वीतील अत्यंत मनोहारि वीणा- काव्य), अशा प्रकारच्या प्रेथोत्पत्तीनं कायम राहिली. तात्पये भोज आणि मम्मट, भास्कर आणि रामानुज, जर्यदेव आणि श्रीहर्ष इत्यादि अनेक चमकणाऱ्या प्रंथकत्यांच्या तारकापुंजांनें मध्ययुगीन हिंदु इतिहासाचा हा अंधःकारयुक्त भाग कांहींसा दीप्तिमान केला आहे.

“०.०२

परिशिष्ट (१) डॉ, ग्रियरसन यांच्या “हिंदुस्थानच्या भाषांचं निरीक्षण’

या ग्रंथांतील जुन्य ग्रंथाच्या कालाविषयीचा उत्तारा:–

( १) कानडी–र्‍यांतीळछ जुने ग्रंथ १७ ठय़ा शतकापर्यंत मागें जातात. कानडी वाढ्यप्राचा उगम जेनांच्या प्रयत्नाने झाला आणि पहिल्या वाढ्यय़ ग्रेथावर संस्कृताचा बराच परिणाम दिसतो. कानडी वाळायाचे तीन विभाग करितां येतात. ( १ ) जुनी कानडी १९० व्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत. यांतील मुख्य ग्रंथ व्याकरण आणि छंदः शास्त्रा यांतील मळ संस्कृत ग्रंथावरून बनविलेले आणि. भिन्न पंथांचे ग्रंथ त्याचप्रमाणें अत्यंत कालिम तऱ्हेचे लिहिलेले काब्यग्रंथ आईंत. हं वाढय़य़ ज्या जुन्या भाषेंत लिहिलं आहे ती. सारखी अवून विलक्षण दरबारो दिसते. त्यांत संह्कृतांतून घेतलेले तत्सम शब्द फारच येतात. तींतील उच्चार हल़लांच्या कानडीहून निराळे आहेत आणि विभक्तीर्ची

रूपेह्दि भिन्न आहेत. उदाहरणाथ पेपाचे आदिपुराण (९४१६इ.)

वगेरे ग्रथ आहेत. (२) मध्यकाळांतील कानडी. पूर्वांचे , विभक्तीचे आणि वाक्‍्यरचनेच नियम सवं बदळलन नवीन रूपें हात अमलांत आली

१६ व्या शतकाइतके जुने आहे. पुष्कळशा वेष्णवांची कविता दुसऱ्या काळांतली आहे.

२) तेलणू–पहिला तेलगू ग्रंथकर्ता कण्व होता अशी दंत- कथा आहे, पण ्त्याचे ग्रथ मिळत नाहींत. हल्लीं मिळणारा सवात जुना ग्रथ १००० इसवीच्या सुमाराचा आहे. यावेळीं विष्णुवर्धन ऊर्फ राज- राजनरद्र या राजाने (१०२२-१०६०). तेलणू वाड्ययास मोठा आश्रय दिला. याच्या.दरबारांत हल्ल असलेल्या जुन्यांत जुना तेलगू व्याक- रणाचा कती आणि महाभारताच्या तेलगू भाषांतराचा कती नन्नयभट्ट होता. आंप्रांची निराळी भाषा असून त्यांची लिपी उत्तरेकडील लिपीहून

परिशिष्ट. » ८८%

फारशी भिन्न नव्हती असे हुएनत्संग लिहितो; आणि कुमारिलानें आंध्र द्रविड भाषेचा उल्लेख केला आहे, ( त्यानें फक्त द्रविड भाषेचा उललेख केला आहे. याशिवाय आंश्र उचतरेचीच लिपि लिहीत हं लक्षांत ठेव- ण्यासारखें आहे ).

(३ ) बंगाठी—मागधीच्या एका पूर्वेकडील पोटभाषेतुन बंगाली निघाली आहे. ८०० वषापूवी बंगाल्यांस जे उच्चार करितां येत नव्हते ते अजूनहि करितां येत नाहींत. क्ष्म, स आणि ह्य ह्यांच्याऐवजी ते- च्छम, ष आणि ज्झ उच्चारितात. व!ढय़यांत जुन्या कबीपैकीं चंडिदास नांवाचा एक होता. १४ व्या शतकांत कृष्णर्भक्तिपर त्यानें परदे केली.

(४) प्राच्य हिंदी–फार प्राचीन काळापासून ओघमध्ये व ड्यय उत्पन्न झालें होते; त्याचें वणन करणें कढीण आहे. $व्हां तुळशीदासानें आपला ग्रंथ लिहिला तेव्हां तें नष्ट झालें ( १६२४ इसवीमृत्यु ), आणि प्रत्येक ग्रेथकार पुढें तुळसीदासाच्या तऱ्हेनें लिहूं लागला, मलिक मह- मद जैसी यानें पद्मावती काव्य त्याच्यापूवी लिहिलें आहे (१५४० ), व त्यांत मेवाडच्या रतना्संग राजाचा पराक्रम आणि अल्लाउदीन याने चितोडास वेढा देऊन घेतल्याची हकीकत वर्णिली आहे.

(५) पाश्चमी हिंदी–राजपुतान्याचे आणि खानदेशचे मिल्ल द्रविडी वंशाचे आहेत तरी आपली भाषा टाकून पश्चिमी हिंदी बोलतात, तीस भीली म्हणतात. राजस्थानी आणि मारवाडी यांत पुराणें व,छयाय- आहे; पण त्याचा अभ्यास अजून झाला नाहीं. चंदाचा एथ्विराज रासा हेंच हल्ला सर्वात जुनें हिंदी काव्य आहे, पण तें संशयित आहे. मार- बाडी भाषेंतील कुनें वाड्यय डिंगल भाषेर्ताल म्हणतात. मिराबाईची. . पद्यरचना त्रज भाषेंत आहे, त्यास पिंगल म्हणतात.

( ६) मराठी–रामतकवागीह आणणि क्रमदीश्वर यांनी दाक्षि- गात्या म्हणजे महाराष्ट्ू-अपभ्रंश असे म्हटलें आहे. पण साहित्यदपणांत दाक्षिणात्या म्हणजेच वबेदर्भिका होय असे म्हटलें आहे. हललींची मराठी इतकी लुनी आहे कीं तिला दाक्षिणात्या आणि वेदर्भिकाही नांवें असा- वीत. लुना मराढी लेख १११५ इस्रवीतला सांपडला आहे आणि दुसरा: एक १२०७ इसवीचा (ए. इं.भा.श्पा,३४२ आणि भा.९पा.१०९ ),

६९० सामान्य परिस्थिति.

(२) कांहीं आक्षेपांस उत्तर. १ डा. कृष्णस्वामी अय्यंगार यांचे अभिकुलाविषया आक्षेप

डॉ. कृष्णस्वामी अट्यंगार आपल्या जनेलळ ऑफ इंडियन हिस्टीमध्यें (१९२५ एाप्रेळ पा. १२३. १२४ ) रजपुतांचें गोत्र व प्रवर या विष- यींच्या आमच्या सिद्धांतास मान्यता देऊन आमचें म्हणणें मजबूत आहे असे कबूल कारेतात. परतु * अभ्निकुल-कल्पना निराधार आहे ह्या आमच्या सिद्धांताविषयीं त्यांनीं आपला मेतभेद प्रदर्शित केला आहे; आणि ते असे म्हणतात कीं, ही कल्पना रासाच्या पू] कित्येक शतकें सांपडते. भा. २ मध्यें आम्ही असं प्रतिपादळें आहे कां, ही कल्पना रासानंतर रासांतीळ कथेचा मलळताच अर्थ होऊन उत्पन्न झाली. डॉ. मजकूर असे म्हणतात काँ, संगममधोल एका त!मिलकाव्यांत अभिवं- शांत उत्पन्न झालेल्य़ा एका सरदाराचा उल्लेख आहे. परमारांची परंपरा आपला मूळपुरुष वरिष्ठांच्या यज्ञकुंडांतून उत्पन्न झाला अशी असल्याचें आम्ही पूर्वीच दाखविलें आहे. परतु हे परमार सुद्धां आपल्यास वसिष्ठो- द्वव सूयवंशी क्षात्रिय मानतात, तसेच या कालविभागांतील ( १००० ते १२०० ) कोरीवलेखांत कोठेंच असा उललेख -मिळत नाहीं.कॉ रजपुतांचे वंश सूर्य, सोम आणि अझ्नि असे तीन आहेत. गाहडवालांच्या एका कोरीवलेखांत चंद्राने क्षात्रियवंश पुनः स्थापिल्याचा उल्लेख आहे, पण तेथेंहिि सूर्य आणि सोम अले दोनच वंश मानिले आहेत. या चंद्रानेंच बहुधा छत्तस राजकुलांची यादी केली, तेव्हां हें निश्चित आहे कीं,मध्ययु- गींन कालांत सूर्य आणि चंद्र अश्रे दोनच क्षत्रियांचे वंश मानले गेले होते,

दुसरी गोष्ट ही कीं, डा, कृष्णश्वामी अय्ग्रेंगार प्रतिहार लक्ष्मणापासून उत्पन्न झाले ही परंपरा दक्षिगेंत माहीत होती असें म्हणतात; आणि पललज विष्णूच्या बंधूपातून उत्पन्न झाळे असा उल्लेव असल्याचें प्रमाण दाखवितात. .पण डॉ. साहेबांचे हें प्रमाण त्यांच्या स्वतःच्या विरुद्ध जातें. जर लक्ष्मणापासून उत्पन्न झाल्याची प्रतिह्ारांची परंपरा खरी आहे तर मग अभिकुडाची परंपरा निमूल आहे असे अनुमान म्हणजे वाटेल तें अठुमान काढणें नव्हे. कारण या अनुमानाशिवाय गत्यंतरच रहात

कांहीं आक्षेपांत उत्तर. ६९१

नाही. प्रतिहार जर सूर्यवंशी आहेत तर त्यांस अभिवंशी कसें म्हणतां येईल ! किंबहुना अम्नडूलकल्पना इतिहासांत निमुळ आहे; तिचाया कालांतील कोरीवलेखांत कोठेंच उल्ले्व नाही, उलट चोहाण, परमार, भश्रतिहार आणि चालुक्य हीं चारी अभ्निवंशी मानलेली कुळें या कालांतील कोरीवलेखांत सुर्यवंशी किंबा चंद्रवंशी उल्लावेलीं आहेत. दक्षिगच्या मराख्यां- ‘तहि परमार, पल्लव, चव्हाण, चालुक्य ही कुले अतून अभ्नि श॒ मुळींच मानलेला नाहीं, २ रजपुतांची गोलें याविषयीं पडित गौरीशंकर यांचें मत,

अजमीर’चे रायब्रह्मद्र गोरीशंकर ओझा या उलट अग्निकुटकल्पना निर्मूल आहे हें कब्रूल करितात; पण रजपुतांची गोत्रे त्यांची नसून पुरो- हितांची आहेत म्ह० ती उत्पत्तिदशक नसून शिष्यत्वद्शक आहेत असें प्रतिपादतात; अथात्‌ मिताक्षरेंतील विज्ञानेश्वराचा सिद्धांत ते मानतात. नागररीप्रचारिणी जनल भा. ५ नं. ४ पा. ४३५ वर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या निबघांत ते म्हणतात का, “ जोपर्यंत क्षात्रेय वैदिक कमे करीत होते तोंपर्थत ते आपलीं गोग्रें पुरोहितापासून घेत. हेंहि त्यांनीं आतां सोडून दिलें आहे. यामुळें त्यांचे गोत्र व पुरोहिताचें गोत्र हल्ली भिन्न आहे, ” पण ही त्यांची चु हीची कल्पना आहे, कारण क्षत्रिय अद्यापहि वैदिक कर्म करितात. तेव्हां रजपुतांचे गोल्ल पुरोहितांच्या गोत्राहून इल्ली भिन्न कां असावें १ आम्ही रजपुतांची स्वतःची गोत्रे पूवीपासून होती आणि विज्ञानेश्वराच! सिद्धांत चूक आहे, असें आमचें मत भा २ प्र. । मध्यें प्रतिपादिले आहे, त्याविरुद्ध पोडित गौरीशकर दोन प्रमाणं आणतात. रक,अश्वघोषाच्य़ा सोंदरानेद काव्यात असें दाखविलें आहे काँ श्रीकृष्ण ॥ आणि बलराम यांनीं आपल्या निरनिराळ्प़ा गुरूपासून निरनिराळी गोजें घेतली, त्याचप्रमाणें शाक्‍्यानींहि गुरुषासून गौतम गोत्र घेतलें. दुसरें,कोरी- । वलेखांत रजपुतांनीं गोत्रे बदललेल्याची उराहरणें आहेत. ” ही दोन्ही ॥। प्रमाणें कशी निर्थक आहेत तें आपण पाहू, ॥__ क्षात्रयांची स्वतःची गोत्रे आहेत ही गोष्ट प्राचीन इ.स.पू. २० । इतक्या लुन्या वैदिक सूत्रांवरून सिद्ध होतें हें आम्ही भाग२ यांत दाख- | धबेळें आहे; आणि इंच प्रमाण ख्रवांत बळवत्तर आहे. बैदिक सूत्रांच्या

६९२ सामान्य परिस्थिति.

प्रमाणाविरुद्ध २०० इसवीच्या सुमारें झालेल्या एका बौद्ध काव्यांत आलेल्या गोष्टींचे प्रमाण कांही किंमर्ताचें नाहीं. किंबहुना हा प्रश्न घर्म- शास्राचा आहे, विरोषतः वेदिक वचनांचा आहे. वौरेश्वरशास्त्री द्रविड यांचें शास्त्र्‍रयुक्त मत पुढें [दले आहे त्यावरून क्षत्रियांना स्वतःची गोग्रें आहित असाच वैदिकसूत्रांचा स्पष्ट आशय आहे हें दिसून येईल.

श्रीकृष्ण आणि बलराम यांनीं निरनिराळे गुरु केले म्हणून त्यांची निरनिराळीं गोत्रे झाठी, ही बोद्धांची दतकथा वेडसर दिसते. हिंदु पुरा- णांस ती अज्ञात आहे, कारण दोघांचा गुरू भागवत आणि हरिवंश यांत स्ांगितल्याप्रमाणें उजनीचा सांदीषिनी होता. दुसरे, सोंदरानंदांत सांगितल्याप्रमाणें ( पातिका पा. ४३९ ) श्राकृष्णाचें गोत्र गौतम होतें असें दिसत नाही. श्रीकृष्णाणें गोत्र अत्रि असावें. कारण त्याचे वंशज चूडासमा बगेरे आपलें गोल अतिच सांगतात.. सोंदरानंद काव्यांतील हें विघान चमत्कारिक आहे, आणि कदाचित्‌ तं प्राक्षिसाहि असेल. बौद्धांनी हिंदु कथांचा विपर्यास केला हें प्रसिद्धच आहे. त्यांच्या क्थेत’ स्रीता रामाची बह्तीणह्ि आहे व बायकोही आहे. तेव्हां याविषयीच्या बौद्ध कथेला फारसें महत्त्व देतां येत नाही.

पंडित गोरीशंकर यांनीं पुढें आणलेले ऐतिहासिक प्रमाणाहे निरथेकः आहे, ज्या कोर्रबलेखांत गोत्रे बदलल्याचा दाखला त्यांनी दिला आहे ते सर्व विज्ञानेश्वराच्या काळाच्या ( बारावें शतकाच्या ) नंतरचे आहेत. अर्थात्‌ अशी गोत्रे बदलण्याला विज्ञानेश्वराचें मत कारणीभूत झालें. किंब- हुना विक्षानेश्वराच्या मताचा अजूनह रजपुतांवर बराच पगडा आहे. घण आम्ही भा. २ मध्ये खिस्ती सनापूत्रीांचोहे कोरीवलेख् दाखविले असून त्यांत क्षत्रियांच्या गोत्रांचा उल्लेख आहे. तर्सेच दख्खनचे ‘चालुक्य’ आणि मद्रासचे पलव सहाव्या शतकाइतक्या लुन्यालेखांत आपली गोरे । मानव्य आणि भारद्वाज द्यावयास विसरत नाहींत. हीं सर्व गोत्रे पुरोहि- ताप!सून घ्यावयाची असतीं तर ती कोरीवलेखांत कधीं सांगितळी गेली नसती. आणि अलीकडच्या काळांतील कोरीवलेखांत तर गोत्रार्ष हा त्या’ क्षत्रियकुलाचा उत्पत्तिकर्ता असल्याचें स्पष्ट वर्णन आहे हं पुढें दाखवतो…

प्रथम अभ्रिवंशी मानलेली चारकुळें घेऊ, ( १ ) परमारासंबंधी, ते.

कांहीं आक्षेपांस उत्तर. . ६९३

। वसिष्ठगोत्राचे आहेत, कारण ते त्याच्या यज्ञकुंडांतून उत्पन्न झाले, (वसिष्ठ त्यांचा पुरोहित होता म्हणून नव्हे ) असा स्पष्ट उललेख आहे. उदेपूर । प्रशास्तींत ‘ वासिष्टगोजोद्धव एष लोके ख्यातस्तदादो परमारवंराः ? असं वाक्य आहे. परमारांचें हच गोत रजपुतांतच नव्हे तर मराठ्यांतहि चालू ‘ आहे. (२) चाहमान वत्सगोत्री आहेत. एका कोरीव लेखांत पहिला । चाहंमान वत्स कीच्या आनंदाश्रूपासून उत्पन्न झाला असें बिघधान आहे. । आणि बिजोलिया लेखांत पहिला. चाहमान वेत्सगोत्री ब्राह्मणापासून उत्पन्न झाला ( किंवा वत्स त्रषि-गोच्रांत उत्पन्न झाला ) असं विधान । आहे. वत्स त्यांचा पुरोहित होता अस कोठेंच म्हटलेले नाहीं, (३) प्रति । हार एका प्रतिहार त्र!झमणापासून उत्पन्न झाले अक्ष एकेठिकाणी विघान आहे.दुसऱ्यां लेखांत रामाचा भाऊ लक्ष्मण यापासून उत्पन्न झाल्याचें विघान । स्पाहे. (यांचें गोज अद्याप कळलें नाही). (४) चालुक्य द्रोणाच्या । चुलुकापायून उत्त्पन्न झाले आणि’ म्हणून भारद्द।जगोत्रती आहेत असे स्पष्ट । विधानं एका कलचूरो कोरीबंलेखांत आहे. तात्पर्य, हीं चारी राजपूत । कुळें जी गोत्रे प्रारंभापासून आतांपर्यंत सांगत आहेत त्यां गोआंतं तीं । उत्पन्न झाल्याचा कोरीवलेखांत उल्लव आहे; आणि हे सवे लेख विज्ञा- नेश्वराच्या पूर्वीचे आहेत. यावरून हें स्पष्ट आहे कॉ, त्यावेळी त्याचा सिद्धांत ठाऊंक नव्हता. | । चंद्रवंशी राजपुतांचा विचार करितां त्यांचें गोल बहुघा अत्रि असंत. । ‘आरणि पुराणांत चंद्राचा अलिं पिता असल्यानें आत्रि हा त्यांचा निःसंशय ‘प्रारंमीचा उत्पन्नकर्ता होय, आणि ही गोष्ट कल्चूरी हेहयांच्या आणि । सेनांच्यां लेखांत स्पष्टपणें सांगितलेली आहे. यादव, चूडासमा आणि लाडेजा ‘हे आपले गोत्र आत्रे देतात: तेव्हां यांचं गोल उत्पात्त दाखविते शिष्यत्व दाखवींतं नाही ‘हंच यांच्यॉसंब्रंधाने स्पष्ट आहे . ‘संयेवशी रंजयुतांच्या संबंघानें अडचण उत्पन्न होते हं खरें. मेवाडचे गुहिलोत, जयपूर अलवरचे कछवाह आणि जोधपूर-बिकानेरचे राठोड हे

॥ सूयवंशी रजपतः आहेत; आणि त्यांचा गोले अतक्रमें बेजब्राप, मानव

आणि गोतम अंशीं आहेत. आतां मंनूपासन ली बशावळ दिली जाते त्यांत ह्या कषीर्चां नांवें येत नाहींत. भा. २ मध्यें आम्हीं दाखावैले आहे

कीं, कित्येक ब्र’झणांचे गोत्र-प्रवर कहषि गार्ग्य, मुद्गल वगेरे क्षत्रिय आहेत. परंतु बैजवाप, मानव ब गोतम &.. सूर्यवंशी रा्जार्ष असल्याचें धुराणांत आम्हांस वाक्य मिळाले नाहीं. किंबहुना हे असतीलहि. ज्लोप- येत वाक्य मिळालें नाहीं तोंपर्यंत या फरकाचे योग्य कारण असें सांगतां येतें की, ही कुळें अतिप्राचीन काळा जेव्हां वेगळी झाली, तेव्हां झापल्या वैदिक कर्माकारितां तीं या क्र्षांच्या कुळांत दत्तक झाडी, म्हणून त्यांचे हे गोत्रश्रवर आहेत, हारीत तसेच मुद्रल आंगिरसपक्षास मिळाले अश्व घुराणांतलें बाक्य असून त्यावरून हें अंबुमान निघतं. एके ठिकार्ण्य पुराणांत पुत्र शब्दह्िि वापरला आहे.” तात्पर्य शिष्यत्वानें नव्हे तर घुत्र- त्वानें ही गोत्रे ह्यांची अतिप्राचीन काळीं झालीं, कारण घुरोहिताच्या गोलाची कल्पना असती तर निराळा पुरोहित झाला त्या बेळीं गोत्र बदलेल; पण ते कायम. राहतं अशीच परंपरा व पद्धाते आहे. यामुळें कित्येकांचा असा सिद्धांत आहे कां, राजपुतांचा गोत्रं अतिप्राचीनकाळी बुरोहितांपावून घेतलीं गेली, पण तीं पुढील काळी कधीहि बदलल नाहींत. ( मधुसूदनशास्त्री यांचें पुढें दिलेलें मत पहा ). €हि एकतऱ्हेने दक्तविधानच आहे; आणि यामुळेच क्षत्रिय कुलांचीं गोत्रे इजारों बघे चदलल्याशिवाय तींच आहेत. गोत्रप्रबर, तसंच बेद आणि शाखा, वैदिककर्म करण्यासाठी अतिप्राचीनकाळीं क्षनिय कुलांनी जी घेतली ती बदलू शकंत नाहींत. | |

ब्राझणांची गोले बदलत नसून उत्पत्तिसूचक आहेत; शिभ्यत्ववूचक नाहींत; मग क्षात्रेयांच्या गोव्रांची अशी अन्य कल्पना कां ? हा प्रश्न आम्हांस प्रारंभी पडला; त्याचप्रमाणे प्राचीन कोरीवलेखांत क्षत्रिय आपलीं गोते अभिमानाने सांगतात; या दोन्ही कारणावरून क्षत्रियांची गोप्रें घुसे- हितांपासून घेतलेली नाहींत असें आमचें मत झाळें आणि या मताबद्दळ उहापोह, जयपूर येथील प्रसिद्ध विद्वान्‌ शास्त्री मधुसुदन ( भेथिल ) आणि वौरेश्वर ( द्रविड ) यांच्याशी आम्हीं केला; आणि त्यांनी आमचे

  • हरितो युबनाश्वस्य हारिताः शूरथः स्मृताः । एते5त्यंगिरंखः धुत्राः क्षलोपेता दविजातेयः ||

कांहीं आक्षेपांस उत्र. ६९५

| अव्हां मत मान्य केले तेव्हांच निःशकपषरणे दुसऱ्या भागांत आम्ही हे मत । प्रतिपादिले. यानंतर निर्रानराळ्या लोकांनीं या मताविषयी शका प्रदर्शित केली तेव्हां वरील दोघा विद्वान्‌ शास्त्र्यांपासून त्यांचे लेखी मत आम्ही घेतलें ते येणें प्रमाणे | १ श्री जयपुर चे. शु. ५ खो सं. १९८२ । सन्ति ब्राह्मणानामिव क्षत्रियस्य वेश्यस्य च प्रातिस्विकानि गोत्राणि । नवोति प्रश्ने उत्तरम्‌ । दर्शपूणमासादियांगप्रकरणत्थे “आंबेयं वृणीते? इति । विघो कल्पसूत्रकाराणां सांप्रतिके ग्रन्थान्तेच प्रकरणे प्रवरनिणीयकसूत्रेघु गोत्राणां वर्णनस्य क्षात्रियवेरयरसंबंधेन बहुशो विद्यमानत्वेन सान्त तयो- । रपि प्रातिस्त्रिकगोला।ण | याजञवल्क्यस्मृतिव्याख्यायां मिताक्षरायांतदभाव- । कथने तु प्रबल्हेत्वनिदेंशेन न विश्वासाहमन्येषामापे तथोपवर्णनं तदनु- । यायित्वेनाति तत्तुल्यमेबाति मून्यत्ते द्राविडो वीरेश्वरशास्त्री. | २ श्री क्षात्रियोंका उत्पत्तिदृष्ट्या गोत्र मनु है और बेश्यांका भलन्दन है । क्षा्यांके जो भारद्वाजवत्त्सादे गात्र प्रसिद्ध हे, वे पूथबेकालमे उनके प्राचीन । घुरोहितासे प्राप्त हुवें है. वे अब बदल नही सकते, क्योके नया पुरोहित । करता मना हे. हालमें पुरोहितोंका गोत्र इसी सबबसे भिन्न हे. यह । पुराणे पीढियोसे चला हुवा गोत्र एक तऱ्हेसे प्रातासबिक गोत्र हो राया है ।.क्‍्यांके वुह्ह बदल नही कता, सम्मतोयमर्थो जयपुरस्थस्य राज़पण्डितस्य मधुसूदेनशमणो विद्यावा- । चस्पते: जयपुरस्थानम्‌ ३०1२२५, वर्राल दोन मतें निराळ्या मागीनीं एकाच निश्वयास पोंहचतात असें बाचकांल दिसून येईल. वौरेश्वरशासत्री आपलें मत सूत्रांच्या आघारानें । देतात; आणि .विज्ञानेश्वराचा सिद्धांत चुकला आहे असे स्पष्ट म्हणतात. । मधुसदनशास्त्री अतिप्राचीनकाळीं पुरोहितापासून गोत्रे घेतलीं असे म्हण- । तात पण तां बदलूं हाकत न हींत, असें स्पष्ट मत आणखी देतात, म्हणजे एका दृष्टीनें ती प्रातिस्थिकच आहेत अर्श मान्य कारेतात. त्यांनीं जयपूरच्या । सूर्यवंशी कच्छवाह्वांचें गोत्र मानव कसे आहे ही अडचण एकारीतीनें । काढून टाकिली. असो, यारीतीनें गोत्राचें भिन्नत्व कुलमिन्नत्व दर्शविते

६९६ सामान्य परिस्थाति.

व्हां भावनगरचे गुह्िल मेवाडच्या गुहिलोताहून भिन्न आहेत आणि ोधपूर-बिकोनरचे राठोड दक्षिणच्या राठोडाहून भिन्न आहेत

(३) निरनिराळ्या प्रातांतील लोकांच्या संस्क्रत-प्ाकृत उच्चाराची तऱ्हा ( राजशेखर )

पठन्ति संस्कृत सुष्ट कुण्ठाः प्राकृत-वाचिते । वाणारसांतः पूवण ये केचिन्मगधादया ॥ ब्रह्मन्‌ विशयापयामि त्वां स्वाधिकारजिहासया । गोडजस्त्यतु वा गाथामन्या वास्यु सरस्वती ॥ नातिस्पष्टो न चाश्हिष्ठो न रूक्षो नातिकोमलः । न मन्द्रो न,तितारश्व पाठी गोडेषु वाडवः ॥ रसः कोप्यस्तु काप्यस्तु रीतिः कोप्यस्तु वा गुण : । सगवे सवकणोटाषटकारोत्तरपाठिन: ॥ गद्ये पद्येथवा मिश्रे काव्ये काव्यमना अपि । गेयगर्भे स्थितःपाठे सर्वापे द्रविडःकवि: ॥ पठन्ति लटटभं लाटाः प्राकृत संस्कृत द्वेष: । जिव्ह्या ललितोळापलब्धसोन्दयेमुद्रया ॥ सुराष्ट्रत्रवणाद्या पठन्त्यापितसोष्ठवम्‌ । अपश्रंशवदंशानि ते संस्कृतवचांस्यापे ॥ शारदायाः प्रसादेन कारइर्म.रः सकविजंनः कर्णे गडूचीगण्टूषस्तेषां पाटक्रम; किमु ॥ ततः पुरस्तात्कवयो ये भवन्त्युत्तरापथे॥. ते मदृर््याप संस्कारे सानुनातिकपाठन: ॥ मार्गानुगेननिनदेननिधथिगुंणानां सम्पूणेवणरचनो यतिमिर्विभक्तः । पांचालमंडलभुवां सुभगः कवीनां श्रोत्ने मधुक्षरति किञ्चन काव्यपाठः ॥

(४) मूळ कोरीव लेखांतील महत्वाचे उतारे.

(1) ]र्‍णा8 1180100101 &. 8, उ, 30128) ४५०]. 1,/ 0. 41-43

विप्रश्रीवत्सगोत्रेभूदहिच्छत्रपुरे पुरा । सामन्तो$नन्त सामन्त पूर्णतलछो नृपस्ततः ॥१२॥ तस्माच्छीजयराज विग्रहनृपो श्रीचन्द्रगोपेन्द्रको तस्माइुलभगूवको शशिनृपो गूवाकसद्चन्द्नो । श्रीमठ्प्पयराजविध्यनृपातेः श्रीसिंहराडूविग्रही श्री- मद्दळंभगुन्दुवाकपतिनृपाः श्रीवार्यरामोनुजः ॥ १३ ॥ श्रीचण्डोवनिपेतिराणकधर- श्रीसिंहळो दूसलस्तद्वाताथ ततोपि वीसलनृपः श्रीराजदेवॉप्रेयः ॥ प्रथ्वीराजनृपोथ तत्तनुभवो रासल्यदेवीविभुस्तत्पुत्रो$जयदेव इत्यवनिपः सोमलदेवीपातेः ॥ १५॥ हत्वापाधिगमिंचलामिधयशो राजादिवीरत्रयं क्षिपं क्रूररतान्तवक्रकुहरे श्रीमार्ग- दुर्गान्विते । श्रीमत्सोलणद्ण्डनायकवरः संप्रामरंगांगणे जीवन्नेव नियन्त्रितः करभके येनेष्ठाने…सात्‌ ॥ १५ ॥ अर्णोराजोःस्य सूनुधृंतहृद्यहरिः सत्ववाशिष्ट- सॉमो गाम्मीयोदार्यवर्यः समभवद्परालब्धमध्योनदीत्सः ॥ तचित्रं जंतुजायस्थिति- रनृतमहापंकहेतुर्नमथ्यो न श्रीमुक्तो न दोषाकररचितरातिनंद्राजिह्याधिसेव्यः ॥ १६॥ ««« रतान्तपथसज्जोभूत्सज्जजो सज्जनो भुवः । वेकुन्तं कुन्तपाळोगायतो चेकुन्तपाळकः ॥ २० ॥ जाबालिपरं ज्वालापुरं रता पलिका पली । वाततूलतुल्यं रोषात्तटूलं च सोर्येण ॥ २१ ॥ प्रतोल्यां च वलभ्यां च येन विश्रामितं यशः । ढिलिकाम्रहणश्रान्तमाशिकाळाभलम्मितः ॥ २२॥ तज्ज्येष्ठभ्रातृपुत्ोभूत्पर्थ्वाराजः प्रभूपमः ॥ तस्मादर्जितश्येनागोहेमपर्वतदानतः ॥ २३ ॥ अतिधमरेते–पि पार्श्वनाथस्वचम्भुवे । दृत्त मोराकरामरामं भक्तिमक्तिश्वहेतुना ॥ २० ॥ स्वणांदिंदान- निवहेर्दशभिर्महद्रिस्तोळानरेनंगरदानचयेश्व विप्राः । येनार्जिताश्वतुरभूपातिवस्तु- पालमाक्रम्य चारुमनसिद्रिकरी ग॒हीतः ॥२५॥ सोमेश्वराळुब्धराज्यस्ततः सोमेश्वरो ‘ूपः । सोमेश्वरनतो यस्माज्जनसोमेश्वरो$मवत्‌ ॥ २६ ॥ प्रतापलंकेश्वर इत्यमिख्यां यः प्राप्तवान्‌ प्रोढपृथुप्तापः । यस्याभिमुख्ये वरवेरिमुख्याः केचिन्मताः केचिद- मिद्रुताशर्व ॥ २७ ॥ येन श्रीपाश्वनाथाय रेवातीरेस्वयंभूवे । शासने रेवणाम्रामो दृत्तः स्वगांयकांक्षिणा ॥ २८ ॥… …… (संवत्‌ १२२६ फाल्गुनाविद >)…

प्न

६९८ पारोश्षष्टर.

थर्टिशे द्वादशगते गुरोतारे च हस्तके । वृद्दिना्माने योगे च करणे तेत्तिळे तथा । गुहिळपुत्न सदाम्बर. महंघणसीहाभ्यां दत्त …नगमान्वयकायस्थछोतिगसूनुकेशवेन लिसितं । नानिगगोविंद्सूनुपाल्हणपुत्रदेल्हणनोत्कीणम ॥

(2) ज०्राणतला७8ाता’8’5 115001100101 (1109) 1. ५, क 5. 715.

ओम्‌ परमात्मने नमः । अकुंठोत्कंठवेकुंठकंठपीठळुठत्करः । संरंभः खुरतारंभे स श्रियः श्रेयसेस्तु वः । अभून्नृपो गाह॒डवालवंशे महीतळो नाम जितारिचक्रः । शेते घराभारमशेषमेष शेषः सुखी यस्य भुजे निधाय ॥ प्रध्वस्ते सोमसूर्योद्रवाविद्ति- महाक्षत्रवंशट्टयेस्मिन । उत्सन्नप्रायवेदध्वनिजगदार्सलं मन्यमानः स्वयंभः ॥ कृत्वा देह्ग्रहयाय प्रवणामिह मनः शुद्धबुद्धिधीरित्र्यास उद्धृत धर्ममागांना प्रथितामिह तथा कत्रवंशट्ट्यं च ॥ वंशे तत्र ततः स एष समभूत भपालचडामाणेः प्रध्वस्तोद्वत- वेरिवीरातिमिरः श्रीचंद्रदेवो नृपः ॥ येनादारतरप्रतापशमिताशेषप्रजोपद्रवं श्री- मद्‌्गाधिपुराथिरज्यमसमं दोविक्रमेणाजितम ॥ तीर्थानि काशिकुक्षिकोत्तरकोश- लेंद्रस्थानीयकाने परिपालाथेताभिगम्य ॥ हेमात्मतुल्यमनिशं ददता द्रिजेभ्यो येनांकता वसुमती शतशस्तुलामिः ॥ तस्यात्मजो मदनपाळ इति ल्षितींद्रश्वञामणि- विजयते निजगोतचंद्रः | यस्याभिषेककलशोलिसितेः पयाभः प्रश्षालितः कलिरजः पटलं प्रथिव्याम ॥ ख्यातस्ततो रजनिजानिरेवांबुराशेः गोविदचंद्र इति कांति” भराभिरामः । राजात्मजेन भवता समुपा्जिताने रामेण दाशरथिनेव यशांसि येन ॥ टदुर्वारस्फारगोडट्विरद्वरघटाकुंभानेर्भदर्भामो हम्मीरं न्यस्तवेरं मुद्रसमरण- क्रीडया यो विधत्ते ॥ शश्वत्‌ संचारिवल्गत्‌ तुरगखुरपुटोलेखमृद्रासनाथ क्षोणीस्वी- कारदृक्षः स इह विजयते प्राथंनाकल्पवृक्षः ॥ ,..परमभट्टारकमहाराजांधिराजपरमे- श्वरपरममाहेश्वरनिजभुजोप _तकान्यकुब्जाधपत्यश्राचंद्रदेवपादानुदध्यात परम- भट्टारकमहाराजाधिराजपरमेश्वरपरममाहेश्वरश्रामन्मदूनपालदेवविजयराज्ये ॥ अस्ये- वात्मजो महाराजपुत्रगोविंदूचद्रदेवः ॥ सिंधुरोढपत्तलायां रामेठग्रामे समस्तमहत्तम- जनपद्निवासिळेकान प्रतिवासिलोकांश्व ॥ राजराज्ञीमातृपुरोहितामात्याक्षपट- ‘लेकभांडागारिकमिषकूनेमित्तिकसेनापत्यन्तःपुरिकसमस्ताधिका रिपुरुषार्दीन समा- ज्ञापयांते संबोधयति च यथा । अस्तु वो विदितं. अनित्यायुर्गता युष्माभे!

मूळ कोरीव लेखांतील महत्वाचे उतारे. ६९९

ऱ्चातातपवशात्‌ तृणाम्रलम़ाश्यायविंदुरिव न स्थिरपद्स बधाति जीवितम्‌ मत्वा ॥

…अस्मिन्‌ ग्रामे हळानां चतुर्मिप्रमायुः । सजलस्यळः सोषरपाषाणगिरिनदीवनवा- टिकाम्गमधूकलोहलवणाकरऊरध्वांवः सिद्धियुतः सद्शापराधद्ण्डःतृणपर्णायाकर- ‘आदायसहितः संवत्‌ ११६६ पोष वय १५ रवो अयेह आसटिकायां देवतामुरेठघट्टे यमुनायां यथाविधिना स्त्नात्वा देवमनुष्यपितृतणाद्यनंतरं भगवंतं सूर्यमुपस्थाय तदनु चाभीोष्टदेवतामहेश्वरं पंचमिरुपचारेः समभ्यर्च्य भगवते जातवेद्से पूर्णाहुतिं द्ृत्वा राढुग्रस्ते सवितरि मातापित्रोरात्मनश्व पुण्ययशोभिवृद्धये भट््बाह्मणाय ‘गूगापोत्नाय रिल्हेपुत्राय भट्रकवडप्रामा्वोनेर्गताय सांख्यायनशास्िने गोतमरशेतिथ्य आंगिरसचत्रिप्रवराय श्रताध्ययनसंपन्नबाह्मणगणचेंद्राय विशुद्धून मनसा कशपृत- हस्तोद्केन ल्षित्यब्धिपवतांबरं यावत्‌ । राणकश्रीलवणप्रवाहेन चासनत्वेव प्रदृत्तो इति मत्वा यथादीयमानं भागभोगकूटकविशतिच्छवया तुरुष्कदूंड अक्षपटलादाय वलदीकुमरगादेयानकआकराहेरण्यबाह्याभ्यतरांसाद्वे एतत्‌ सर्वे अन्यदपि भूम्या- -चारणउत्पत्स्यमानं मदाज्ञापालनप्रवणेभृत्वा एतत्‌ सर्वे अस्मे उपनेतव्यम्‌ ! एतत्‌ संतत्येअआपि ॥ न केनाप्यत्र बाधा कायां श्रत्वा मुनीनां वचः… … … … ..- लिसितोयं महत्तकश्रीगांगेयानुज्ञया त्रिभूवनपालेन ठक्कुरश्रीदेवांगखुतेन खुनर- कुडनेन सातेहरखुतेन

(8) पका 1001) 8110001९01 (351808ए5818 छा’511.

अकुंठोत्कंठ? ॥ १ ॥ …चतुष्पंचाशद्धिकशतेकादशसंवत्सरे माघे मासे थुकुपक्षे तृतीयायां सोमदिने वाराणस्यामुत्तरायणसंक्रान्तो अंकतः संवत्‌ ११५४ माघखुदि 3 सोमे । वाराणस्यां देवश्रीचरिळोचनघट्रे गंगायां स्त्नात्वा श्रीमद्राजाविराज श्रीचन्द्रदेवेन … प्रचरपायसेन हृविषा हविर्भजं टृत्वा…कोशिकगोचाय विश्वा- मिजञ्ोदूलदेवरातत्रिप्रवराय छंदोगशास्रैने …गोकणंकशळलतापूतकरतलोद्कपूर्वमा- ‘पद्मसद्मनो हृद्ठकान्तं यावत्‌ शासनीकत्य प्रदत्त इति ज्ञात्वाःस्माभेः पितृदानशासन- प्रकाशनाथे निजनामाडूनकितमृद्रया ताम्पट्के निधाय प्रदत्तो … श्रीमन्मदनदेवेन ‘पितृदानभकाशकः: । शासनस्य निबन्धोयं कारितः स्वीयमृद्रया ॥ १० ॥ लिसितं “कराणिक ठक्कुर श्रीसहदेवेन । शिवमत्र मडठःलं महाश्रीः श्रांमदूनपालदेवेन ॥

१७०० परिशिष्ट.

(4) प80(8 1001] (3511808ए518 टा’91158 फ, 1, [॥ए

(]. 101. ) हलदीयप्रत्तलायां महाशोणसोग्रामनिवासिनो निखिलजनपदा– नुपगतानपिच राजराज्ञीयुवराजमंत्रिपुरोहितप्रतिहारसेनापातिभाण्डागारकाक्षपटाले- कमिषडूनोमत्तिक!न्तःपुरिकदूत करितुरगपट्टनाकरस्थानगोकुलाधकारिपुरुषांश्र्ा- ज्ञापयाते बोधयत्यादिशाते च… प्रामः सजलस्थळः सलळोहळवणाकरः समत्स्वयाकरः. सपर्णाकरः सगतोंषरः समधूकच॒तवनवाटिकाविटपतृणयूतिगोचरपर्यन्तः सोर्ध्वाधः- श्वतुराघाटविशुद्धः .-.श्रीवास्तव्यकुलोद्रूत कायस्थोल्हणसूनुना । लिखितस्तामापत्रोयं कीठनेन नपाज्ञया ॥

(1. 109) … यथा दीयमानभागभोगकरप्रवणिकरतुरुष्कद्ण्डकुमरगादे… यानकप्रभर[ते समस्तदायान दास्यतेति ।

(5. 120 ) वेष्णवपूजाविधिगुरवे

(5. 121 ) भचरपायसेन हविभर्जं हुत्वा

(1. 123 ) पवणीकरहिरण्यानेयतान्‌यतान्‌ दायान्‌

(5) ७8७ 0000) 138580 हाः 1150111000) 0 (३0ए108.-.

७७छता8 1. $. शांए 0]. 103 री

नमो वासुदेवाय ।…संवत्‌ ११६१…यमुनायां स्नात्वा यथाविधानं मन्ञर- देवक्राथेमनुष्यभूतापतृंश्र्व तर्पवित्वा सूर्य भदारकं सर्वकर्तारं भगवन्तं शिवं विश्वाधारं वाखुदेवं समभ्यच्य हुतवहं हुत्वा जीवन्तीपत्तलायां वसभीमग्रामे समस्तजनपदान्‌.

संबोधचाते यथा । ग्रामोचं सया क्षेत्रवनमधूकाम्गराकाशपातालसहितः सद्शापराधदण्डः.

भागकूटकदशबन्धविंशत्युक्तचप्रस्थाक्षपटलप्रस्थप्नतिहारपरस्थआकरतुरुष्कद्ण्डवरव- झेंहिरण्यसवादायसंयुक्त. … चतुराघाटविशुद्धः….गोतमगोत्राय, …मेमे पोत्राय…. ज्योंतिर्विदूबाह्मण अव्हेकाय प्रदत्तः…लिखितंच पुरोहितजागूकमहत्तकश्रीवाल्हण-. प्रतिहारश्रीगोतम एषां सम्मत्या. . .

(6) ॥७1॥801 2०1 01 38115185९08 ए. 1. शा. 159 3३ नमः शिवाय…स श्रीकंठशिरोमणिविजयते देवस्तमीवलभः ॥ वंशे तस्याभ्युदर्यानि सदाचारचर्यानिरूढी प्रोढां राढामकाळेतचरेः भूषयन्तोनुभावेः ७

4

मूळ कोरीव लेखांतील महत्वाचे उतारे. ७०१

<शश्वद्दिश्वाभयीवतरणस्थूळलल्यावलक्ष्येः4 कोत्यु्योळेः$ स्नपितवियतो जज्ञिरे -राजपुत्नाः । तेषां वंशे महोजाः मतिभटपृतनाम्मोधिकल्पान्तसूर:, . .सत्यशीलो. . , निरुपधिकरुणाधामसामन्तसेनः । तस्मादर्जाने वृषध्वजचरणाम्बुजषट्पदो गुणा- भरणः । हेमन्तसेनदेवो वेरिसरःप्रलय हेमन्तः । …तस्मादभदाखेलपार्थिवचक्रवार्त “निव्यांजविक्रमतिरस्छतसाहसाडूकः । दिक्पालचक्र पुटमेद्नवीतकोर्तिः पृथ्वी- “पर्तिविजयसेनपदप्रकाशः… अस्य प्रधानमाहिषा जगदीश्वरस्य शद्ान्तमॉोलिमणिरास विलासदेंवी । देवी खुतं सुतपसं सुरुतेरसूत वल़ाळसेनमतुलं गुणगोरवेनं…स खळु श्रीविक्रमपुरसमावासितश्रीमज्जयस्कंधावारात्‌ । महाराजाधिराज श्रीविजयसेन देवपादानुध्यात परमेश्वर-परममाहेश्वर-परमभट्रारकमहाराजाधिराज श्रमिद्बला- ळसेनदेवः कुशली समृपजातअंशषराजराजन्यराज्ञीराणकराजपुत्रगजामात्यपुरोहित- -महाधर्माव्यक्षमहासांधिविग्रहिक महासेनापातिमहामुद्राधिरतअतरंगबृहदुपरिक महा- .क्षपटाळेक महाप्रतीहार महाभोगिक महापीळुपाते महागणस्थ दोस्साधनिक चोरोद्वर- णिकनाबलहस्त्यश्वगोमाहिषाजाविकादिव्यापृतक गोत्मिकद्ण्डपाशेकद्ण्डनायक- विषयपत्यादीन्‌ अन्यांत्या सकलराजपादोपजीविनो अध्यक्षपचारोक्तांश्र इह अकीतितान्‌ चट्टभट्जातीयान्‌ जनपदान्‌ क्षेत्रकरांश्व बाह्मणान्‌ ब्राह्मणोत्तरान्‌ यथाहे मानयाते वोघयाते समादिशति च । मतमस्तु भवतां यथाश्रविधेमान भुक्त्यन्तःप्राते उत्तरराढामण्डळे स्वल्पदासषिणवीथ्यां खाण्डयिळशासनशासनोत्तर- स्थितः संघाट्यानययुत्तरः नार्राचाशासनोत्तरस्थशिंघाटेयानदीपाश्विमोत्तरः … एवं चतुःसीमावाच्छन्नवालाहिट्य़रामः श्रीवृषभशंकरनलेन सवास्तुनालासिलादिर्भेः ‘तालत्रयाधिकचत्वारिशत्उन्मानसमेत आढकनवद्रोणोत्तरसप्तभूपाटकात्मकः प्रत्यब्दं ‘कपर्दुक पराणपथ्वशतोत्पत्तिकः सझाटविठपः सगर्तोषरः सजलस्थलः सगुवाकाने- -रिकेरः सह्यदशापराधः परिहृतसर्वर्षाडः’ तृणय्‌तिगोचरपर्यन्तः अचाटभटपवेशः आकि चिदूपग्राह्यः समस्तराजभोगकरहिरण्यप्रत्यायसीहतः । वराहदेवशर्मणः प्रपोच्ाय -भद्रेश्वरदेवशमंणः पोत्राय लक्ष्माधरदेवशणः पुत्राय भारठ्(जसगोचाय भारद्टाजा- ‘ड्रंगरसबाहस्पत्यभवराय सामवेद्कोथमशाखाचरणाध्यायिने आचायंश्रीओवासु- देवशमणे अस्मन्मातृश्रीबलासदेवीमिः सुरसरिते सूर्योपरागे दत्तहेमाश्वमहादानद्‌- तक्षिणात्वेन उत्सष्टः मातापित्रोरात्मनश्व पुण्ययशोभिवृद्धये आचंद्रारके क्षितिसमकालं

१9०२ परिदिष्ठ.

यावद्धामाळट्रन्यायन ताम्बशासनारुत्य प्रदत्तासमाभः अतःभवाद्ूः सवरनुमन्तन्य भाविभिरापे भपाताभरपहरणं नरकपातभयात्‌ पालन धमगारवात पालनायस्‌ | भर्वान्त चाच धमानुशासनः श्लाका:…… …जतानाखलळ क्ातपालः श्रामदू बल्लाळसंनभूपाळः । आवाखुशासन रुतदूत हारघाषसा!न्यावग्राहक । सवव “अतत चशाखाद्न १६ श्राः

(7) पडा० ती’0) ॥॥8081810518’5 1150. 1. उ. 8. (0. 11).

…रमावतीनगरपरिसरसमावासितश्रीमज्जयस्कन्दावारात्‌ । परमसोगतो महा– राजाधिराजश्रीरामपातिदेवपादानुध्यातः परमंश्वरः परमभट्टारकः महाराजाधिराज श्रीमन्मटनपालदेवः कुशली ! श्रीपोण्ड्वर्धनभुक्तो कोटीश्वरावेषये हलावर्तमण्डळे काष्ठरगिरिसविंशायाबाधिकोपेतसकेवदावचट्रट्के जिंशतिकायां भमो समुपागता- शेषराजपुरुषान्‌ राजराजन्यकराजपुत्रराजामात्यमहासान्धार्वग्राहकम हाक्षपटलिक- महासामन्तमहासेनापाते महाप्रतिहार दोःसाध्यसाधनिकमहाकुमारामात्यराजस्थानी- योपरिक चोरोद्र्राणिकदाण्डिकद्ण्डपारईीकशाोर्नकक्षेत्रपपनान्तपालकटिपालाडठरक्षक- तदायुक्तविनियुक्तक हस्त्यश्वोनांबेलव्यापृतक किशोरबडवागोमहिषाजाविकाध्यक्ष दुतप्रेषाणिकगमागमिकअमित्वरमाण विपयपतिग्रामप[ते तारिक शोल्किकंगोल्मिक- गोडमालवचोडखसहूणकुलिककर्णाटलाटचाटभटसेवकादीन । अन्यांश्र्याकीतितान्‌. राजपादोरजीविनः प्रतिवासिनो बाह्मणोत्तरान महत्तमोत्तमकुटंबेपुरोगचण्डांल- पर्यन्तान्‌ यथाहे मानयाते बोधर्याते समादिशाति च । विदितमस्तु भवताम ।’ यथोपरिलिखितोयं ग्रामः स्वसीमातृणपूळुतिगोचरपर्यन्तः सतलः सोटूशः साम्गमधूकः- सजलस्थलः सगर्ताषरः सज्ञाटविटपः सद्रचापसारः सचोरोद्धराणिकः परिह्वतसवंपीडः. अचाटभटप्रवेशः अकिंचित्करग्राह्यः$ समस्तभागभोगहिरण्यादिभत्यायसमेतः रत्नच- यराजसंभोगवजितः । भमिडिट्रन्यायेन आचन्द्राकश्षितिसमकालं पित्रोरात्मनश्व. पुण्ययशोभिवृद्टये कोत्ससगोञ्राय शांडिल्यासितदेवलप्रवराय पंडितर्श्राभूषणसन्नह्म- चारिणे सामवेदान्तगतकोथमशासाध्यायिने चम्पाहिट्टीयाय चम्षाहिट्रिवास्तव्याय- वत्सश्यामिप्रजापतिश्वामिपोत्राय शोनकश्वामिपुत्राय पंडितथपुत्रश्रीवरेश्वरश्यामिशर्मणे, पट्टमहादेवीश्रीचित्रमाटिकायाः वेद्व्यासपरोक्तप्रवाचितमहाभारतसमुत्सर्जितदक्षिणा- त्वेन भगवन्तं बुद्धभट्टारकमादश्य शासनीरत्य प्रद्तोस्मामिः श्रुतो भवाद्रि&

मूळ कोरीव लेखांतोल महत्वाचे उतारे ७०३

सर्वेरेवानुमन्तव्यः भाविरंपिभूमिपतिमिभरमेर्दानफलगोरवात्‌ अपहरणमहानरकपात- भयाच दानमिद्मनुमोदानुमोघपालर्नायम्‌ । प्रतिवासिभिश्य क्षत्रकरेराज्ञाश्रवणाविधे- योभूय यथाकालं समुचितभागभोगकराहरण्यादिप्रत्याद्योपनयःकार्‍यःइाते संवत्‌ < चेंद्रगत्याचेत्रकर्मादेने ५ ॥। …रुत सकलनींतिज्ञो …श्वेयमहोदाधिः । सान्धिविग्र- हिकःश्रीमान भीमदेवोचन दूतकः ॥ राज्ये मद्नपालस्य अष्मे परिवत्सरे । ताम्त्रपट्मिमं शिल्पी तथारीतसरोखनत्‌ ॥

8) पाड8०७ “011 8861115 1180९8 01 एछा’51]18ता 06१6 (01181-

१2118) 8८ 1223 (1166 ५. 1]).) ए. 1. [1 ७. 153.

ओम्‌ । स्वस्ति । जयत्याल्हाद्यन विश्वे विश्वेश्वराशरोधृतः । चन्द्रात्रेय नरेन्द्राणां वंशश्वन्द्र इवोज्वळः । तत्र प्रवड्धमाने विरोधेविजयभ्राजिष्णुजयशक्ति- विजयशक्तिवीराविर्भावभास्वरे परमभ. म० प० पृथ्वीदेवपानुध्यात …मद्‌नवर्म ««<पर०परममाहेश्वरकालंजराधिपाते श्रीमत्परमर्दिदेवो विजयी ॥ … विकोरविषये सट्टोडा द्वादशक तथा राष्ट्रसत्क टांटट्टादशक… ग्रामाणामुपगतान्‌ जह्मणानन्यांश्र्व मान्यानधिरुतान कुटुम्बिकायस्थदूतवेद्यमहत्तराना मेद्चण्डालपर्यन्तान्‌ सर्वान्‌ संबोधयाते समाज्ञापयति चास्तु वः सांवोदेतं वथोपरिलिसिताः ग्रामाः सजलस्थला! सस्थावरजड्गगमाः स्वसीमावाच्छिन्नाः साधऊर्ध्हाः भूतभविष्यद्र्तमानानेःशेषादा- यसाहिताः प्रतिषिद्ठचाटादिप्रवेशाः … अजयसागरसंबद्धलटिआनां €ळचतुष्टयाव- च्छिना मद्नपुरे भमिः संवत्‌ १२२३ वेशाखखुदि ७ गुरुवासरे… विधिवत्स्नात्वा देवमनुष्यपितृन संतप्य भास्करपूजापुरःसरचराचरगुरुं भगवन्तं भवानीपतिमभ्यर्च्य हुतभुजि हुत्वा कुशलतापूतेन हस्तोदकेन नानागोओेभ्यो नानाप्रवरेभ्यो नाना- शाखाध्यायभ्यो नानानामभ्यो ब्नाह्मणेभ्यो प्रदत्ताः, ..पराशरगोजजयशर्मपुत्नहरशर्मा एषां पद्मेकं…इति मत्वा भवद्धिः भागभोगादिकं सर्वमेभ्यः समुपनेतव्यम’ । अमीषां समन्दिरभाकारान्‌ सनिर्गमप्रवशान्ससव।/शनेक्लुकपीससणाम्ममधूका दिभूरुहान सवनश्वभ्रिनिधानान सलोहादय्याकराना सगोकुलान अपरेरपि सामान्तर्गतवस्ताभः सहितान्‌ सबाह्याभ्यतरदायान्‌ भुज्जानानां कर्षतां कर्षयतां दानाधानविक्रयं वा कुर्वतां न केनचित्‌ काचिदूबाधा कर्तव्या । स्वहस्तोयं राजश्रीपरमादिंदेवस्य मतं मम ॥ लिखितं वास्तव्यवेश्येन पृथ्वीधरेण । उत्कीणं च पित्तलहारपाल्हणेन । मंगळ महाश्रीः ॥

१७०४ घरोशिष्ट

(9) 11081] 180९5 9 एत8ए&ए81101811 ?३’8111.1’8 1. 3. आण 0 284-5

३& स्वस्ति जया*भ्युद्यश्व । जयाति व्योमकेशो$सो यः सर्गाय बिभर्ति तम्‌ । ऐन्दवं शिरसा लेखं जगद्वीजाडकुराळातिम्‌ ॥ तन्वन्त वः स्मरारातेः कल्याणमानेशं जटाः । कल्पान्तसमयोट्यामतडिटूलयपिडूगगळाः ॥ परमभ० महारा ७ परमे० श्रीमयशोवमंदेवपादानुध्यात प. भ. म० प० श्रीमज्जयवमंदेवराज्ये व्यदीते निजकररूतकरवालप्रसादावाप्तनिजाधिपत्यसमस्तप्रशस्तोपेतसमाधेगतपर्व- महाशब्दालंकार विराजमान महाक्‌मार श्रीमलक््मीवर्मदेवपादानुध्यात समस्त- पशस्तोपेत समधिगतपश्वमहाशब्दाळडःकार विराजमान महाकुमार श्री हरिश्चंद्र देवखुत श्रीमत्‌ उद्‌यवमंदेवो विजयोद्यी ॥ विन्ध्यमण्डळे नर्मदापुर प्रतिजागरणक वोढरशिरासत्क अष्टाचत्वारिशन्मध्ये गुणोराग्रामानिवार्सनः प्रतिश्रामनिवासिनश्व समस्तराजपुरुष वेषयिक पट्किळ जनपदादीन बाह्मणोत्तरान्बोधयत्यस्तु वः संविद्तम्‌ यथा ॥ अस्मामः श्रीविकरमकालातीत षट्पश्वाशद्धिकट्टादशशत संव त्सरान्तःपाति अड्के १२५६ वेशाख शुदि १५ पोर्णमास्यां तिथो विशाखा नक्षन्रे परिघयोगे रविदिने महावेशाख्यां पर्वेणि गुवाडा घट्टे रेवायां स्नात्वा सिनपविवाससी परिधाय देवक्रषिमनुष्यान्संतप्ये चराचरगुरुं भगवन्तं भवानापातिं समभ्यच्य समित्कुशतिलामाष्टाभातामिः हिरण्यरेतसं हुत्वा भानवे अंघं विधाय कापिलां त्रि प्रद्क्षिणीकत्य उपस्पृश्य च संसारस्यासारतां दृष्ट्वा नलिनीदूळगत जळलवतरलतरं योवनं धनं जीवितं चावेक्ष्य …गर्गगोत्राय गर्गशेन्याडगगरस इति त्रिप्रवराय चाजसनेयशाखिने अभिहोत्रि यज्ञवरखुत ट्रिवेद्‌ पुरोधास माल्हुशमंणे बाह्मणाय उरपारोळेखित गुणोराग्रामो निघिनिक्षेप कल्याण धनसाहितः सवृक्षमालाकुलः । चतुष्कंटकविशुट्टो वापीकूपतडागारामनदीश्रोत वाडवाटिकाथुपयुक्तः सर्वांभ्यंतर- सिद्ध्या सह यावचंद्रदिवाकरसमद्रसरिच्छासनीकत्य प्रदत्तः तद॒त्र प्रामानेवासि पट्टकिलादि लोकेः तथा कर्षकेश्व यथोत्पद्यमानभागभोगकरहिरण्यादिकमाज्ञाश्रवण- विधेयभूत्वा अन्न ग्रामीयं सर्वे अस्मेः प्रदातव्यम्‌ । सामान्येतदू पुण्यफलं बुव्द्ठा अस्मद्वंशेरन्येरपे भाविभोक्तृभिरस्मत्‌ प्रदत्तधर्मादायोयमनुमन्तव्य: पालर्नायश्व ««स्वहस्तोये महाकुमार श्री उद्‌यवमंदेवस्य दूतकः श्रीमण्डालिक क्षेमवराजःश्रीः

मूळ कोर्राव लेखांतालि महत्वाचे उतारे. ७०५

ज॑10) पणि 00 (अणा२ झा’फछ 18605 07 एछ10808ए8 17. 1- 21 .141

(शिवस्तुतिः … चन्द्रंवश: …भरतः…हेह्यः…) स॒ एष परम वामदेव-
यादानुध्यात प०–परममाहेश्वरत्रिकालेंगाधिपतिश्रीमत्कर्णदेवः निजभुजोपा्जिताश्व”
पातिगजपार्तनरपा्तराजत्रयार्धपातः कुशली ।…महादेवी महाराजपुत्रो महामंत्री
महासा्वाविग्राईको महामात्यो महाघमाधिकरणिको महाप्रतीहारो महाक्षपटालिके
महाभाण्डागारको महासामन्तो महापमत्तवारो महाश्वसाधनिको एतानन्यांन्गाकीर्ति-
तान्‌ यथास्थाननियक्तराज5रुषान कोशाम्बपत्तळायां चन्द्रपहाप्रामनिवासिंनो
निसखिलजनपदान्यथांई मानर्यति बोधयाति समाज्ञापयाते विदितमस्त॒ भवतां यथा ग्रामोये सजलस्थलः साम्ममधूकः सगर्तोषरः सलोहलवणाकरः स्वसीमापर्यंतः

2४90600 च्य अने ५” पवी णकवा क १. सवनतृणयूतिगोचरपर्यन्त;|विद्भीकोण्डिनगोच्रायाडेगरसाम्बरपषियावनाश्वत्रिपभवराय चाजसनेयशाखि्िने उपाध्याय सीळुपोत्राय अवसथिक मालुपुत्राय पाण्डितश्रीशान्ति- शमंणे … गंगार्‍यां स्नात्वा भगवन्तं शिवभट्टारकं समभ्यच्य–प्रदुृत्तः इति मत्वा यथादीयमानभोगभागहिरण्याद्सिमस्तराजप्रत्यादाया: एतस्याज्ञाश्रवणविधेथेरदातव्या ««-. लिखितं करणिकश्योसवांनन्देन । उत्कौर्णे च विद्य नन्देन । मंगलं (11) पाडा ती’00ण) ७181 118९658 00 उृ8ए8511018, ;श९25श

(॥151प]79 0 ॥ए७]17871 ५. 1). 1024 (1. ५. ॥ 111, 5. 18 ).

««स त श्रीपृथ्वीवळुभमहाराजाधिर!जपरमेश्वरपरमभट्रारकसत्याश्रयकुल- ‘अतिळकसमस्तभुवनाश्रयचाळुक्याभरणश्रीमज्जगदेकमलदेवः श्रीमद्वलभनरेद्रदेवः कुशली । सर्वानेव यथासंबध्यमानक्ान्‌ राष्ट्रपातोर्विषयपातिग्रामकूटक आयुक्तकनि- युक्तकार्थेकारिकमहत्तरा्दान समादिशत्यस्तु वः संविद्ितमसा यथा अस्माभः शकनृपकालातीतसंवत्सरशतेषु नवखु षट्चत्वारिशदधिकेषु अकतः संवत ९४६ राक्षसी संवत्सरान्तर्गतवेशाखपोर्णमास्यामादित्यवारे यं च द्रमिळाधिपातें बलवन्तं चोलं निर्घाट्य सप्तकोंकणाधीश्वराणां सववस्व ग॒हीत्वा उत्तरादीशविजयार्थ कोल्हापुर- समापसमावासितीनजीवजयस्कन्धावारात्‌ … विषयान्तःपाति मदर्नीरगप्रामजाताय कौशिकगोत्राय बहूचशाखिने अह्मचारिणे श्रीधरभट्टपोत्राय रेवणायंभट्रपुत्राय वाखुदेवायश्मणे यजनयाजनादिषटूकर्मनिरताय वेद्वेदांगपारगाय पडदोरेद्रि सहस्रान्तःपातिकरटिकन्नाचिशातभध्ये मडभूरुरुग्रामः सधान्यहिरण्यादेयः निथि-

१9०६ पारोष्षष्ट

निधानसमेतः राजकीयानामनडुालिप्रश्षेपणीयः सशुल्कः सर्वकरबाधापद्दत$- सर्वनमस्यो&ग्रहारो दत्तः …शासनाधिकारिमहाप्रचण्डद्ण्डनायकश्रीमत्मोणायंप्रति- बद्धळेखक माइय्येण लिसखितम्‌ । मंगलं महाश्रीः श्री: श्री: ॥ (12) पडता ती00) 3180१81 हाष्या; 0 &छा’पच्या(७ झाडा

गा, 2७०

ओं … ( समयग्रराष्ट्रकूटबंशो वार्णितः ) … श्रीमत्ककुलदेवसंजातव्यपाय– नशभ्रष्टरट्टराज्ये स्वतेजोनुभावात्समधिगतपंचमहाशद्ठो तगरपुरे…मलळगलगण्ड… नन्निसमद्रप्रतापमार्तड शनिवारविजयादिसमस्तराजावाळेसमलंरूत …अपराजेत - देवराजः सर्वानेव यथासंबध्यमानकान्‌ आगामिग्रामभभोक्तृसामन्तराजपुत्रपुरषति- त्रिवर्गस्थानप्रभतिप्रधानाप्रधानान्नान प्रणतिपूजासमादेशेः समनुबोधयाते … सेवत ९१९ आपषाढवादि ४ श्रीस्थानके समवस्थितस्य राज्ञो दुश्षिणायनकर्क- संक्रान्ते … चतुदेशम्रामशतोपलाक्षितकोंकणान्तःपातिमहिरिह्वारविषयान्तर्गतभाद- नग्नामो… आघारपडिगह…(दोषसमान्वित ! ) सोद्रेगसपरिकरःअचाटभटप्रवेशः…. श्रोलोणादित्येद्वाय … आम्बरश्रेष्ठिवापेयाश्रेष्टिमिणिकचेळापेयभोजकाविभगो वणे- यादिगुणपोरनगराविष्ठितहस्तोद्कं विधाय हरिहरहिरण्यगर्भद्हनादिदेवान श्रड्ठया संपूज्य पुत्रपोत्रायुपभोगवृत्तित्वेन ग्राम: प्रदृत्तः । भुंजतो भोजयतो वा रषतः कर्षेयतो वा न केनचित्‌ परिपन्या कर्तव्या । …महामण्डळेश्वरश्रमिद्पराजितदेवो . लेखकहस्तेनारोपयाते स्वमतम्‌ मतं मम श्रीमद्पराजेतदेवस्य विरुदुंकराजनियमान्‌ महामात्य श्रीसंगळेचे महासान्धिविग्राहिकसीह्पेये च सति जसंगवेच्यसूनुना सजाता- भ्यनुज्ञेन प्रतिहस्तकअन्नंपेयेन शासनामिद्‌ं लिसखितं तत्च स्थानके भुवमा … तथा भूयोपि व्यवस्था चाच नन्वव्यावशप्रातिवीषनगरेण राजकुलस्य अर्हणाभाव्यार्थे - द्रमणो २६० अकतः दातव्यम।मंडूगलं महाश्रीः (13) पडपळरटा गी0ण) ऊड्यातेपफ 01885 0. ((२३१0१01[((७17579 ॥. 1.

  1. 5115115198 85868] 185 8 0815600 (जछा’पए0त8 810 8 ४०१९७.

(81008 081161”

«– तथतद्राज्यचिन्ताभारसमुद्ठहत्सु सर्वाधिकारिश्रीनारायणेय्य सांधिविग्र– हिकश्रीसीहपेय्य कणोटसांधिविग्राहिकश्रीकपादे श्रीकरणादेपंचप्रधानेपु सत्खु समा

मूळ कोरीव लेखांतील महत्वाचे उतारे. ७०७.

गामिराजपुत्रमात्रपरोहित अमात्यप्रधानाप्रधाननेयोगकांस्तथाराष्ट्रपातॉवेषयपातनग- रपातिग्रामपातोनयुक्तार्नयुकतराजपुरुषजनपदांस्तथा हेयमननगर पोरतिवगप्रभतश्ि प्रणतिपूजासत्कारसमादेशेः समादिशति शक नृप ……५४८ कातिकशुद्ध १५ आदित्यग्रहणपर्वोगे स्त्तात्वा सवित्रे अर्ध्य दुत्वा …उमापतिमभ्यच्ये …पाराशरगो- त्राय छन्दोगशासिने आमदेवाय … बलिचरुवेश्वदेव आमेहोतरक्रतुक्रियास्रपारिग्रह- पोषणार्थ १ स्थानकान्तर्गतषट्षषिविषयान्तःपार्तगोराम्रामान्तर्वतिक्षेत्रं ।. . .

(14) पड तीण) उिछेणयाछ2्टका’ 11150. 0. 197.

8, ,. राज्ये$मृष्यमहीमजोभवदिहश्रीगाहिलाख्यान्वये श्रीसीहार इति प्रभूत- गरिमाधारो धरामडनम्‌ । चाळक्‍्यांगनिगहकः सहाजेगः ख्यातस्तनूजस्ततत्स्तव्पुत् बळिनो बभूवरवना साराष्ट्रक्षाक्षमाः ॥.. ओ० श्रीसहाजिगपत्रठ ० श्रांमुळुकेन- श्रीसहजिंगश्वरदेवस्यानाविरतपश्वोपचारपूजाहेतो:श्रीमन्मंगळपुरमंडपिंकायां का० १ दिनेर्भात । तथा बलीवर्दुछाटमाणकाभव्ये छाटं प्रातेका०१कणभतगडकं प्र का० * तथारासभछाटाप्र०. ॥ ०तथा समस्तलोकेन निःशेषवा&कारेः पश्र्वहरा- बेरीवाटयाप्र० ॥ तथापञभरकउंटभरंप्रतिका० २ तयापत्रंभरगंत्री प्रतिद्र.१ क्षेत्रं प्रतिउचाराभाव्येका.१ आगरमध्ये खुंटितखरालिहासाका. । … तथालाटिवद्रापथ- के बहन्तशुल्कमंडापिकायामध्याव दिनंप्रातिठ० श्रीमुलकेन रूपकेकःप्दत्तः ॥… ! द्यूतमव्योदिनंप्रातेका१…तयावीडहराकेरीप्रेभेतीनां प्रत्येक पत्र ५० …मडावापूग १ ***विक्रमसं १२०२ सिंह्सं 3२ अश्विनवदि १३॥ कातिरियं परमपाशुपताचार्य. महापा$तश्रसिवज्ञस्य

(५) निर्णयसिन्थोी कालिवज्यांन

बृहन्नारदीये-समुद्रयातुः स्वीकारः कमण्डळुविधारणम । द्रिजानामसवर्णाखु कन्यासूपयमस्तथा ॥ देवराचसुतोत्पत्तिमधुपके पशोर्वधः । मांसदान तथा श्राद्धे वानप्रस्थाश्रमस्तथा ॥ दृत्ताश्षतायाः कन्यायाः पुनर्दानं परस्य च ॥ दीघकालं बह्मचर्ये नरमेधाश्वमेधको ॥ महापरस्थानगमनं गोमेधश्य तथा मखः । इमानधर्मा– न्कलियुगे वर्ज्यानाहुमनीषिणः ॥

९५७9०८ परोगधाष्ट.

हेमा. आदित्यपु.-विधवायां प्रजोत्पत्तो देवरस्य नियोजनम्‌ । बालिका- *क्षतयान्याश्व वरेणान्येन संस्छातिः ॥ कन्यानामसवणीनां विवाहश्य द्विजातार्भः ॥ आततायिद्रिजाप्र्थाणां धर्मयुद्धेन हिंसनम्‌ । ट्रिजस्याब्धी तु नोयातुः शोधितस्यापि संग्रह: ॥ सत्रदीक्षा च सवेषां कमण्डळुविधारणम्‌ । महाप्रस्थानगमनं गोसंज्ञापिश्व गोसवे । सोत्रामण्यामांपे खुराग्रहणस्य च संग्रहः ॥ अमभिहोत्रहवन्याश्य लेहो लोढापारेग्रहः । वृत्तस्वाध्यायसापेक्षमघसकोचनं तथा । प्रायश्वित्तविधानं च विपाणां मरणान्तिकम । संसर्गदोषस्तयान्यमहापातकनिष्छातिेः ॥ वरातिथिपितृभ्यश्व ‘ पशूपाकरणक्रेया । दृत्तोरसेतराणां च पत्रन्वेन परिग्रहः ॥ सवर्णान्याद्रनादुटे: संसर्ग: शोधितरपि । अयोंनो संग्रहे वृत्ते परित्यागो गुश्षस्रयः ॥ परोद्देशात्मसत्याग उद्विष्टल्यापि वर्जनम्‌ । प्रतिमाभ्यचनार्थांय संकल्पश्व सधर्मकः ॥ अस्थिसंचयना- दूध्वेमड्रस्पशनमवच । शामित्रं चेव विप्राणां सोमविक्रयणं तथा ॥ षडूभक्तानशने र्‍चान्महरणं होनकमणः ॥

माधवीये पृथ्वीचन्द्रोद्ये च–शूद्रेयष दासगोपालकुलमित्राद्वसी,रेणाम्‌ । -भोज्यान्नता गृहस्थस्य तीर्थसेवातिदूरतः ॥ शिष्यस्य गुरुदारेषु गुरुवदूवृत्तिशीलता ॥ आपदूवृत्तिट्रिंजाग्रयाणामश्वस्तानेकता तथा । प्रजा्थे तु ट्रिजाप्र्याणां परजारणि- “परिग्रहः ॥ बाह्मणानां प्रशासित्व मुखाभिधमनक्रिया । बलात्कारादिदुष्टस््रीसंग्रही विधिचोद्‌तः ॥ यतेश्य सर्ववर्णषु भिक्षाचर्या विधानतः । नवादके दशाहं च दुलषिणा गुरुचोदेता ॥ बाह्मणादिष शूद्रस्य पचनादिक्रियापि च । भुग्वभिपतनेश्वेव वृद्वादिमरणं तथा ॥ गोतृप्तिशिष्टे पर्यास शिष्टेराचमनक्रिया । पितापुत्रविरोधे तु -साल्षिणां दण्डकल्पनम ॥ यते: सायंगृहत्वं च सूरिभिस्तत्वदा्शभिः । एतानि

  • ळोकगुप्तर्थ कलेरादी महात्मभिः ॥ निवर्तितानि विद्ठद्रिन्यवस्थापूवकं बुधेः ।

निगमः—अभिहोत्रं गवालम्भ संन्यासं पळपेत्रिकम्‌ । देवराचसुतोत्पात्तें कलो पञ्च विवर्जयेत्‌ ॥ एतत्सर्वाधानपरम्‌ । स्मतिचन्द्रिकायाम । चत्वार्य- ञद्सहस्त्राणि चत्वायंब्द्शतानेच । कलेर्यंदा गमिष्यन्ति तदा तेतापरिग्रह: ॥ -संन्यासश्व न कतेव्यो बाह्मणेन विजानतेति व्यासवचनं व्य़ाख्यातम्‌ ॥ सवांधानेपि ‘विशेषमाहू देवळः । यावटूर्णंविभागोस्ति यावद्ेद्‌ः परवर्तते । संन्यास चाम्निहोचे च र्‍यावतूकुर्यात्कलो युगे ॥

हय क प “यी यय

(६ ) महत्वाची सनवारी.

७६६ पारशी संजानास येतात. <५५ कोलम शकारंभ <८<५ नेपाळ शकारंभ ९०३ इस्माइल १–बुखाऱ्याच! सा- मानी बादशहा. ९०३-१०१५सामानी साम्राज्य ९१२ याक॒ब-इ-लेस कासार प्रथम ह्दुिस्थानांत गझनीवर येतो. ५४२ नूर-सामानी; तुक गुळाम सामानी राज्यांत शिरतात. ९५९ मनस्र-सामानी ९६१-६९६ मलराज (अनहिलवाड) ९६७ सप्टवर 3० ९७५१ आक्टोबरर ९७३-५५९५७ तेलप २ उत्तर चाल़क्य ९७७ सबक्तागन तक्तनशीन होतो », शाक्िकुमार ( गुहितलोत )

9» वेजदामन ( कच्छपघात ) ९८० सवक्तागनाची वहिंड व काबळ राजा जयपालवर स्वारी ९८०-१०9३८ माह्पालनपालसत्ता

पुनः स्थापन करतो, ९८४-वज्वहस्त १ ( प्राच्य गंग ) ९८५-१०१२ राजराज १ (चोल) ९८६-१००१ नूहररा ९८८ गोविंद ( चाहमान ) ९८९ सबक्तगिन व संयुक्त हिंदु राजे यांत लढाई ९९०खु. अंबाप्रसाद्‌ ( गुहिळांत ) ९९०-१८१० अपराजित-(ठा. शि.) ५९७-१००८सत्याश्रय उत्तर चालुक्य

हमूद जन्म

९९५७-१०५० मुंज ( परमार )*

»» चामुंड ( अनहिलवाड ) ०००–१०२२ ग्‌ड ( चंदेल )

१००१ मह ची जयपालवर स्वारी… १००> वाकूपाते ( चाहमान )

)) शैचिवमा (गुहिलोत )

,) दिद्ठा राणीचा मत्य (काश्मार)* १००३-१०२९संग्रामराज काश्मीर ला. १००४ महृ८ भारियावर स्वारी १००८ मह«संयुक्त हिंदू राजाशी लढाई… १००६ महृ० नगरकोटची स्वारी १००९ विक्रमाद्त्यि ५ वा कल्याण . १०१:स्ुु.१३०५५भाज परमार १०१० वज्जड-शिलाहार ठा.

१०१० दुलभ–अनहिलवाड

१०१८–१०३८ गांगेग हेह्य

१०११ राजराज ( चोल ) जमीन मोजून धारा आकारतो

१०१३) मह० त्रिळोचनालशी लढाई

१०१४ मह० ठाणेश्वरची स्वारी

१०१४–१०४४ राजेंद्र-चोल

१०१५ अरिकेसरी-शिलाहार ठा.

१०१६ नरवर्मा-गुहिळोत

१०१७ रामानुजाचार्य जन्म

१०१८ मह मर्थरा कनोज स्वारी

१०१८-१०४० जयसिंह-कल्याण

१०१६ मह्मदाचा कनाजवरद.स्वारा

१०१९ भोज कोंकण जिंकतो

१०१९ मह० राज्यमालास जिंकून

त्यावर खंडणी बसवितो.

१०१९ मधुक!मार्णव-प्राच्यगंग

७७१०

६०१०२१ “१०२१ १०२५१

राज्यपालास रजपूत ठार मार मह० राहीव नदीवरील लढाई राजेंद्र ओरिसा जिंकतो च्रिळोचनपालशार्ही मह० यु, १०२१-१०६३भीम ( अनाठढलवाड ) १०२२ महृ० स्वातवर स्वार्रा १०२३ महृ० कालंजवर स्वारी १०२५ मह० सोमनाथावर स्वारी १०२५-१०४५ छित्त ठा.शिलाहार १०२७ भीम–शाहांचा मत्य “9३८२८ विंद्याधर-चंदेल १०२८-१०६३) अनंत लोहर काश्मीर १०९५९ महमदढाचा मत्य १५०२९ कातेवमा-गाठंलठात १०३० इंडिया ग्रथ अब्« १०३3० विजयपाल–चंदेल “१०३२ नयपाल ( पाल ) १५३३) श्रीचंद-चाहमान ,3 नियाल्तगीन काशी बाजार लु. १०३८-१०६८ वज्वहस्त-प्राच्यगंग १०३८-१ <० कर्ण-चेदी १०४० भोजळरूत जयासेंहाचा पराभव १०४० देववर्मन-चंदेल १०४०-१०६८ सोमश्वर १ उ. चालु १०४२ योगराज-गुहिलोत १०४४ विजयपाल-कच्छपघात १०४४ राजाधिराज चाले नागार्जन-शिलाहार. ठा. अनंगपाळ २ ( तोमर ) दि्‌ छोस लोहस्तंभ आणतो ») कोषप्पमची दुसरी लढाई “१०५२ राजेंद्र चोल

७४५ १०५२

परिोशाष्ट .

६८५५ वेरट ग॒हिलोत ,) भोज परभार मत्य. ०५७५ जयसिंह परभार १०५५ मामवानी-ठा. शिलाहार १०५५-१०८० उदेपूरशिवालय बांध.

,; खु. उदयारदेत्य-परभार

,» :विग्रह्पाळ 3 रा-पाल १०६० कीतिवर्मन्‌-चंदेळ १०६२ वौरराजेंद्र चोल १०६३ ववासल > रा-चाहमान १०६४-१०९४ कर्ण-अन. चाल. १०६५ प्रबांधचंद्र नाटकप्रयोग १०६८-१०७६ राजराज-प्राज्यगंग १०६५९ सॉामंश्वर-उ. चा. मत्य १०६९ हृसपाल गुहिळोत १०६५-१०७६ सोमेश्वर २ उ. चा. १०७०-१११८ राजेंद्र कुलोत्तंग चोल १८७२ अधिराजेंद्र मत्यु १०७> उत्कर्ष ( काश्मार ) १०७६-११२४ विक्रमांक उ. चाळुक्य १०७६-११४२ अनंतवमन-प्राच्यगंग १०७८ पृथ्वीराज १ ला-चाहमान १०८०–११०० चंद्र-गाहडवाल १०८५ महीपाल २ रा (पाल)

,/ सामंतसेन ( बंगाल ) १०८०-११२४ यशःकरण-चेदी १०८५१ वेरिसिंह ( गुहिलात ) १०९३-११०४ लक&्षमणदूंव परमार १०८२ श्रपाल (पाल ) १०८४-११३० रामपाल (पाल) १०५८४-११६८ हेमचेद्र-जनपंडित १०८४-१११५ अनंतपाल ठाणेशिला .

महत्वाची सनवारा.

-३०८८ वबिक्रमासेंह-कच्छपघात १०८९ हर्ष (काश्मार)

१०९३ अजयदेव-चादह्मान १०९३-११४५ जयसिंह (अनहिल.) १०९४ विजयसिंह-गुहिळोत ११०० ठेमन्तसेन ( बंगाल )

,) सु. मंडीराज्यस्थापना

११०० सलुक्षण-चंदेल

११०१ उच्च ( काश्मीर )

११०४ त्रिभुवन ऊफ मधुसूकच्छ. ११ ७४-११३३> नरवर्मा-परमार १११० जयवर्मन-चंदेल १११०-११५५ गोवदचंद्र गाहडवा. ११११-११२८ खुस्सलळ (काश्मीर ) १११७-११६० प्रोल-आंप्र

१११८ आरिसेह ( गुहिलोत ) “१११८ विक्रम चोल १११९–११९९ लक्ष्मणसेन बंगाल ११२० पथ्वीवर्मन-चेदेल

११२५ आणोराज-चाहमान ११२५ अपरादित्य-ठाणे शिलाहार ११२५ गयकर्ण-चेदी ‘११२५-११६५ मदनवर्मनू-चंदेल ११२६ सोमेश्वर ३ रा उ. चा. ११२९ चंड गुहिलोत

११२९ परिहार ग्वाल्हर किला कछ-

वाहापासून घेतात 9३१३० कुमारपाल ( पाल ) ११३३ नरवर्मा-परमार ,) विजयपाल कच्छपघात

9१३३ यशोवर्मा ( परमार ) ११३५ कुलोक्षंग २ रा-चोल

७११

११३६ गोपाळ ११३८ जगदेकमल उत्तर चाल़क्य ११४० विजयासिंह ( गुहिलोत )

१४ मंदुनपाल ( पाल ) ११४२ जयवर्मा-परमार ११४२ कामाणंव प्राच्यगंग ११४:-११७३ कुमारपाल (अन.) ११४४-११६० अजयवर्मा-णरमार ११४४-११७५ हरपाळ-ठाणे शिल

१४६–११६५ राजराज > रा चोल

११४८ राजातरागणीम्र. रचना. १५४९ पुर्थ्वीराज जन्म ११५० चोलगंग जगन्नाथमादेर बां.

,,; कुमारपालाची अजमीरवर स्वा. ११५०-११८२ तेल २, उ. चा. ११५२ वाौसल चाह० दिली घेतो ११५२ राघव-प्राच्यगंग ११५२ नरसिंह-चेदी ११५३ विसल-चा. रु. हरकेळी ना. ११७५५ रणासिेंह-ग॒ुहिलोत

») शेूरपाल-कज्छपघात ११५५-११७० विजयचंद्र-गाहडवाळ ११५८< मलिकार्जुन-ठाणे शिलाहार ११५७ अजमारची स्थापना ११६० विध्यवर्मा-परमार ११६० जयसिंह-चंदी ११६१ गोंविंद्पाळ ( पाल ) ११६१-११९१ सद्र-आंध्र ११६२ भीमसिंह ग॒हिलोत

,, विंज्जन कलच्रांचें बंड ११६५ विज्जन कल ११६७ सोयीदेव-कलचूरी

( पाल )

१9१२

३१६७ राजराज २ रा-प्राच्यगगं ११६८-१२०३ परमर्दि चंदेल ११७० जयचंदु-गाहडवाल ३१७८ राजाधिराज चोल

,, मएजुद्वोन गज्ञनी 9१७३ सामंतसिंह गहिळात ११७३ अजवपाल-( अनाहिलवाड ) ११७३-१२२० वीरचळाळ होय

१७४ पथ्वीरा. केमासाशी युदू

११७५ घोरी मलतान घेतो ११७५-१२०० अपरादित्य-ठाणे शि, ११७६ मुलराज २रा (अनहिलवाड) 9३७६ संकट कलच्री ११७८ हरिश्वेट्र-परमार

,» घोरीचा गजराथेंत एराभव

» कुलोचुंग ३ रा

३,३७८-१२३१ भीम (भोला) अन

११७९ सामंतसिंहृ गहिळोत घो«चा पथ्वी. पराभव ४, घोरी पेशावर घेतो ३१८० महेंद्रपाळ ( पाल ) ११८०-११४८ विजयसिंह-चेदी ११८०-१२१० सुभटवर्मा-परमार ३१८१ घोरीची लाहोरवर स्वारी ७१८२ पथ्वीकृ परमळ चंदेळचा परा 9” कॅलचूरांचे बंड तुटले १9१८२-११८९ सोमेश्वर ४ उ. चा. ११८४ क॒मारसिंह गाहिळोत »’ घोराची लाहोरवर दुसरी स्वारी ११८५ पथ्वी संबो. विवाह १9८७ [भलुम ४ -देवगिरी राज- धानी करून स्वतंत्र होतो.

4.4

परिशिष्ट.

११९७०७ ३) ९६१५ ११९१ १ १६२

राजराज 3 रा ( चोळ ) पृथ्वीक. घोर्रांचा पराभव. महादेव-आंत्र पृथ्वी. पराभव व मृत्यु ११९२ अनियंकभाम-प्राच्यगंग ११९> कुतुबुद्वींन मीरत दिल्ली घेतो ,, जवचंदाचा घोरीरत पराभक ११९५ मथनसिंह-गहिलोत ») कुतुबुद्दींन हरिराजाचं अज- मीर थेथीळ बंड मोडतो. ११९६ शिहा. ग्वाळेर करि. घेतो ११९७ कृत. गुजराथवर स्वारी ३१९८-१२६० गणप(ते-आंत्र ११९९ कत. अनहिलवाड घेतो. ,) महमद बसत्यार बाढूस्थान बेहार ( विक्रमशील ) ळुटतो १२०२ महमद बसत्यार बंगाल घेतो » कुतुब, कालंजरवर स्वारी १२०२ राजराज 3 रा-प्राच्यगंग १२०३ कुतुबुद्धीनाची चेर्दावर स्वारी ११०३-१२४*५ न. ला.व. चद १२०५ घोरोचा खन १२०६ पद्मसिंह गाहळोत १२०८ कृत. बदाऊं घेतो १२१० अर्जनवर्मा-परमार १२१६ मंवाढवर तुकोची चढाइ १२०५ राजेंद्र 3 चाल १२१६ देवपाल ( परमार ) १२२७ अल्त. रणथ घेतो १२३२ अल्त, ग्वा. किल्ला घेतो १२३४ ,, ची माळव्यावर स्वारी १२३५ महाकाल.-विध्वंस

अ. अकलेक जेनपंडित ५९४ अभ्निकुलळकल्पना ६९० अजमीर ६, ४०, २२५,-वर कुतु०ची स्वारी४९६,-मुसलमा- नांचा ताबा ५०५; -चे चाहभान २२१-२३० अजयवमा २६९, २७२१ अढाई दीन कीं झोंपडी > मशीद झालेले विद्यालय २२९ अण्णोगेरी-तेल-चे मांड ०राज्य३ ९० अत्रसा किल्ला २८ अधिकारी -मुलकी ६७० व इतर ६७१, ९७३ अन्न प्रकार ब व्यवहार ५८३ अनहिलपाटण २४४, ६३७, इ० अनहिलवाड ७,-चे चालुक्य २९८ -२२०, वाघेला ३१७ अनंगपाल-तोंमर दिल्ली शहर वस- वितो ४५१;-२ रा ४५२ अनेतदेव ( शिलाहार ) ३६५, २१३८६,२६९,२७४ अनंतरा-काइमी ४५८,४५९,४६२ अनंतवर्मचू-प्राच्यगंग ३९९ अपराजित > शिलाहारांचा पहिला स्वतंत्र राजा ३६१-३६४ अपराजित २रा ३६३

साचे.

अपरादित्य १ ( शिला ) ३६५ –२ रा रोवट्चा ३६७

अपरान्त-शिलादेश ३६१

अपराकॅ-टीका याज्ञवल्क्य स्मृतांची २१३६७, ६४०

अबदुल फतेह ६०,९६१

अबदुल मलिक १८,१९

अबूबकर १०५

अभयचद ३४०

अभिला/षेताथोरचेतामाणे ३८९

अमली कारभार ३६३

अभीर पदवी १५,४८६

अयोध्या-उत्तर कोशल ३२२

अरबांच्या वसाहती ३९६

अर्जुनवर्मा २७१,२७२

अर्णोराज ऊर्फ आना २२६

अलळूउतूबी-महमूदाचा समकालीन इतिहासकार १९,२२,२७

अल्तमश ५१३,५२२; ची माळ- व्यावर स्वारी २७३

अल्पतगीन १८

अब्बेरूनी १-३ वगैरे

अल्लाउर्ददान घोरीची गझनावर स्वारी ४८१-४८२

असद-सामानीसासम्राज्यसस्थापक १५

अस्नीचा किला ४४२

अस्पृद्यता ५७३-५७५

2 सारच.

अहमद-अमीरदाहीद १५ अहमद नियाल्तगीन ३४८ अहमदाबाद -उर्फ कणावती ३०४ अंग-मिथिल ३४६-रराज्य इ४३ अंतर्वेदी ४, १३ अंबरचा किल़ा ५२४ अंबरनाथ-आम्रनाथ ३६४ आ. आगम ६३८,६३९ आचुगी-शिंदेवंशीय विक्रमाचा सर- दार ३८८,४२८ आचुगगी १ ला ४३२४ आडनांवऱगोल्नाम २७६ आदित्य चोल ४०७ आदिनाथ मंदिर-देलवाडा ४४६ आनंदपाल ३३,५०,५४,५७,६८ महमुदा्शी लढाई ६१; चे मद- तनीस राजे ६७; मृत्यु ८६ आर्य अमिघान ( ऐय्य ) ३७२, ( उपपद ) ३८२ आर्यावर्त देश व गुण १२; ३९६ आयेधमप्रगतीचा तत्वज्ञानमूलक इतिहास ५८८, ५८९ आज्याधर-जेनपंडित २७२ आसाम (-<कामरूप ) चे मांड- लिकी राज्य ४४१ आंश्र ४०३,-काकतीय ४२१ डू इतिहासाची पुनरावृत्ती २१, २३

–४६, ६९, ८७, ८८, ९० इतिहासापासून बोघ ५३७ इनामगांव ६६५,-दार हक्क

६८६७-८८ इभ्राइम २०९ इलेकखान ५०, “५९,-ची बुखा-

ऱ्यावर स्वारी १८, १९ राजा

(तुकांचा) १०४ इस्माइल गझनीचा राजा ४३ इस्माईल.सामानी १३ ला १५ इंश्वरमाव १०९ इंद्रपत.दिल्लाजवळचें खेडे ४५१

४९७, ४९८, ५००

उ उत्कल.ओरिसा ४०० उच्चार भिन्नदेशीयांचे ६९६ उज्जनी ५२६ | उत्‌ूबी–अल्उतूबी १०८, १२० उत्तर चालुक्य ३७९, ३९३; उत्तर हिंदु राजे व पजाब १९३ उत्तर हिंदुस्थान-चा उच्छेद भा. १

१६२–१७३; भाग २-५२२-.

५२७

-चीं कारणें मुख्य ५२८-३८;

इतर ५३९-४६;घर्मातर५३ ०;

तील रजपूत २०२, २०५

-वरील परकीय स्वाऱ्या ५२८ उत्तरेकडील राजे ३६६ उदयादित्य ( परमार)२६१,२६२

साचे.

उदेपूर २६३

उपपुराणें ६४३

उपवासदिनांची वाढ ६४१, ६४५

उपस्मृत्या ६४२, ६४२३

उरगपूर-पांड्यराजघानी ४२४

ऊबट -बाजसनेयी संहितेचा टीका- कार २५८

उत्सवदिनांची वाढ ६४६

पॅ ऐय्य-उपपद ३७१,३२७२, ३८२ ओ ओहिंड २६ ओरिसा ४०३-४०६ ओढप्रांत २०० क़ कच्छपवरात-( ग्वालेर ) १२४, कुल ४४८–४५१;- व कच्छवा 20९४-५८ कच्छवाह ५२४,-अलवर आणि जयपूरचीं रजपूत घराणीं ४४८ कटोच-७९,८३; ४७१-७२ ५६५ कदंब राजे (गोवा) ३८६,४२३२; –हनगळ ४२३५,४४० कनार-( कणावती ) शहर ४४३ कनोज ३,४,९,१३,११३,२२२ -चे गाहडवाल ३२१-३०;-चे प्रतिह्ार सम्राट १६९,३३९, २८५, चें राज्य १६५; वर महमुदाची स्वारी १०६,११३-

1

११५,११८;चा उच्छेद५० ६- ष्‌ ०्ट कन्हेरीँकृष्णागिरी लेणे ३६१ कंथड ( काठे, किल्ला ) १३५ कंदाहार-रजपूतांचा देशा २९ कपिलेंद्रदेवे ४०६ कर ६६७,-७० करमाती मुसलमानी पंथ ६०, ६२ कर्णराजा ( चेदी ) २५३,३८४;- ची धारेवर स्वारी २६०,२६२; “चालुक्य ३०४-५; -सेंगार-कनारशहर संस्थापक ४४३ -हैहय कलचूरी २८९-९२ कर्णावती २९०,२९३,३०४ कनोटक-प्रांत ३८० करहाटक ४३४,४२३६;–कऱ्हाडे ब्राह्मण ५५९ कलचूरी २०२; २८८-९७; -केल्याण ३१९४-९५; कलजंदचा-किल़ला २०७,–रेवट १०७;–राजा १०९-१० कलळूट ६१८ कलश ( कारभीर ) ४५९ कल्हण ४६० कलापग्राम ४६२ कलियुग संबतू ४३२३,–उ. शास्र शक ४६२ कलिवर्ज प्रकरण ६४३ कालेंगराज ( रेहय, कलचूरी )४४ १

-:

कालेंग दे. ३९६;–नगर ३९९

कल्याण ३४०;-नगर ३८५

करतवार संस्थान ४६९

कसदार–’ पांढऱ्या हिंदुस्थान ! ची राजघानी ३५

कानडी भाषा व वाढ्ययय ६८८

कान्यकुन्ज १२४

काबूल–किल़्ला १६,२९,३१;-च्या

, उच्छेदाची भासमान कारणें

१६२३–१७२; न” जलालाबाद १८६; चे शाहीराजे१३३०-३१

कायदे करणें ६५५

कायस्थ ५७१-७२

कारकीर्द सरासरी २२४२३४ २७५

कार्तवीर्य–कत्त-रट्ट ४२९,४३०

कार्पासवस्त्र-( तामिल देश ) ४०९

कालवे व दक्षिण हिंदु.४१०,४११.

कालंजर किल्ला ५,२८७,-वर मह. स्वारी १२६-१२९कुतु०-५१५ कालिदास–कालनि्णय ४३४ काव्यमीमांसा.व भूगोलवणन ११ काशी-कनोजराजघानी ३२२,३२४ काइमीर प्रांत ब हहर ८-ची पंडि- तसभा ३६७,३६९; -णाराज्येतिहास ४५७-६ १; कांगडा,–किल्ला व त्यांतील देवळें ७९-८४;-चे रजपूत ४६८ कांची ३८८,३८६ कांबोज-( तिबेट ) ३४३

टा के आनन तिकिट… योनी सिली को. 42. आ हती… कमळी च हड मोड जह क य » स ल सह समक र किक आपका >

सूचि.

कार्तेराज–ग्वालेर राजा ४४८-४९ कीर्तिवमेन्‌-चंदेल़ २७९,

,, ९ ला कदंब ४६१ कौर्तिस्तंमाची चाळ ५०३ कुतुबमिनार ५०१-५०२,

–ची विसलदेवकृत स्थापना ५०३

कुतुबुद्दीन र १७,३१८,४४५,४८९ ५०९-१०;-चारित्र११-५१२; -ची मशीद ४९९,५००

कुनिंद लोकऱमंडीसं ०(कनेत)४ ६६

कुमारपाल-चालक्‍्य गु.३०८-३१४

कुमारिलभट्ट मृत्यु ६४४

कुलीनविवाह ३५६, ५८१

कुंडी राज्य ४२९, -प्रदेश ४३६

कुंतल ३८०, ४२३, ४२७

केरळ प्रांत व वेशिष्ट्य ४२५

केरोलींचे यादव ४४४

केरवसेन (बं.) ५२०

केसरी वश ( ओरिसा ) ४०४

केमास प्रधान ४७६,४७८-७९

केवतांचें बंड ३४५

कोट–कांगड्याचे राज्यई४७०-४७२

कोंहराम ५१२

काकण–चक्रवती ३६३, ३६५,

३६७,४२४; सस ३८२,२८४ कोलाहल-गंगांचे मूल नगर ३९७

श्रीकृष्ण व अल्बेरूनी ६२२३;–उप-

देश ब तपस्या ६०४ कृष्णात्रेयगोच्र हेहय ४४२

साचे. ण

खडें सैन्य ६५१,६५२

खवासखान ८१

खिलगिली किल्ला ४२६

खिस्तीमत £ ज्यूमतास जोडलेले बौद्धमत ) ६०२

खुश्रुमलिक ४८३

गख्खार ६९,५१०

गजपति ६५८; > बंगालरा, ३२४

गझनी ८,१६,२९,५८,१२२;-चा नाश २०२, २१०;–ची ळूट ४८१–८२;–च्या राजांची नाणीं २११;

गणपति ( काकतीय आंग्र ) ४२२

गणेश देवता ४२२, ६४२;

“(षड्भुजा मूति ६३६

गर्जिस्तान > जॉर्जिया ९०

गह्रवाल > गाहडवाल ३३१-३२,

गंगप्राच्य २९७;–ब ओरिसा प्रांत ४०५;-कुलवगोत्र ३९८-४०४; –वंद्यावळ ४० ६

गांगेय १९८–२००;

गग ( म्हैसूर ७१३८४०

  • रांगातेली ०? ( म्हण ) २४६

गंगेश्वर–जयपूरमंदीर ४०५

गंगेकोंड–चोलपूर ४१६

गंड–(चंदेल) १२६–१२९,२७७

गंडर दित्य ( शि. कऱ्हाड ) ४३२७

गाहडवाल ३२१,३३१–३३५;-च गोत्र ३४१; दक्षिणचे ३ ३९-४१ गांगेयदेव (हैहय डाहाळ) ६,२४५, ९८४८३२८५२६ गिघोरचे महाराजे (बगाल)२८४ गिरनार येथील मंदिरं ३१७ गुजराथ २५५,-णनांवाचा काल २९९-३००;-प्रांत मयीदा ६; -मघील चार शक ३०७; -मुसलमानांच्या ताब्यांत जातो ३१७;-वर कुठुबुद्दीनाची स्वारी परदररपप गुरु गोविंदसिंग १९२ ग्रजर २५५,२९०,२९९-३०० -प्रतिहार ४५५ गुहिलोत २३७ गोत्र-श्री कृष्णाचे ६९२;–कुलनांव २९३,५६३; बलरामाचे ६९२; रजपुतांचीं २९८ गोपाल-सेनापति (चंदेल) २७९ गोविंदचं ३२९,३२३,३२८,३४७; गोविंदराय ( दिल्ली) ४५३ -व महमूद युद्ध ४८५,४९० गोविंदद्वादशी ६४१ गोव्यांतील गौडसारस्वत ५५५-५६ गोहिल-रजपूत ४४६ गोंक-कऱ्हाड शि० ४३६ गोतम–रजपूत ४४२; -णातत्त्वज्ञान ५९०

द सूचि.

गोर ५११७;-भारत ५८५ ग्रंथ १०००-१२०० तील-६४० ग्रंथ-शास्त्रीय ३८६, ६८७ ग्रामसंस्था ४२६-२७ ग्रामाधिकारी ६६५, ६६६ ग्वालेर कच्छपघात ४४८ दुबकुंड १२४,५१० मह० स्वारी१२६ १२७;घोरीची ५२४, ५२५ घ घळिस (उपनांव) ५५९ घारापुरीचीं लेणी २७४—३७५ घियासुद्दीन बखत्यार (बं. ) ५२३ घेसास ४३८, ५५१, ५५९ घोरी ८८, ८९;राज्य ४८१-४८३ च्च चक्रवर्ती-व्याख्या १२;३४३८ इ_ पद ४७९;गुणदोष ५३१५३२ -चामान वराजे ६४९–६५० चक्रस्वामिन्‌ ६२३४, ५३५ चतुर्वगार्चिंतामाणे ग्रंथ ६४० चव्हाण-नडूलचें घराणें ४४७, ४५ १;-कुल व काळ ५६६ चंर्गाझ १४६ चदवाह जयचं. घोरी-युद्धस्थल५०७ चंदेल ५–धंग ३९;-चंद्ररा. १२५; -बुंदेलखंडचे राजे २७६-२८७; ची मइमूदा्शी लढाई ११४- ११६; २०२ व्युत्पात्त २७६; नाणें; २७८ वंद्यावळ २८५;

—राजघानी व भव्य मंदिरं २८६-२८७ व गोंड ४५४ चंद्रदेव २५४, २५५; २९ १; गाह-

डवाल२२१-३, ३२२७, ३३७-८ चेद्रलेवा २८७, ३८८, ४३७ चंपा(बा)५,४० इतिहास ४१६-३ चंपारण्य २९० चातुवण्यांची उपपद नामें ३२ चालुक्य ३७०,-तील दोन भेद

२९८; (अनहिलवाड)३००-

वंशावळ ३२०;-1उत्तर चा.

३८०; ३९३; ४१५, ११६

गात्र ६९३ चावडा राज्यकाळ ६५२ चाळके ३९१ चाहमान ( सांबर ) २२१–२३०

-“्कूलव गोत्र ९९३ च दिलो

४५२; ची वंशावळ २२२-२३ चांडाळ ५७४ चांदोड स्स चद्रपुरी ४१९ चित्तलदुर्ग ( म्हेसूर )-लिंगायतांचा

मुख्य मठ ६१६ चित्पावन ५५६ चितोरगड -_ चित्रोर ७ चूडासमा–४४५; रजपूत ६९३ चेदि कलचूरी २८८-२९६ चोडगंग ३९७, ४००-४०३ चोल साम्राज्य ५, ४०७-४१८ चोंलपूर ४१३,

क ७

चोहान ( चाहमान ) ४०, ४५३ -ंकण्जतवानू ४९७; ५२३२ ५२४ ळ्छ छट-कदंब ( गोवा ) स्थापक ४३२ छप्पन्न राज्ये ६६३ ज़ जगदेव २६५ जगन्नाथ मंदिर ४००, ४०५ जगमनपू्र ४४२, ४४३ जझोति २८६ ब्राह्मण ५५४ जटावमेन सुंदर-पांडय ४२४ जमाबंदी ४११ जमीन—मोजणी ६०२ जयकेशियू–कदंबराजा ४३२३,४२४ जयचंद्र गाहडवाल ३२९,३३०व पृथ्वीराज ५०६ व महंमद घोरी ५०७, मृत्यु ५०८ जयपाल–कुल वब गोत्र ३३१ राजघानी २४, २९; ३८

जयासेंह उर्फ सिद्धराज गुज. चालुक्य ३०५–३०८,३१७ १८ दाक ३८७,ची घारेवर स्वारी२४५,

जयास्रेंह उत्तर चालुक्य २ ८२-३८४

जयन्ती (बनवासी ) ४३१

जलंदर ८

जहांगीर ८०, ८२

जगम ६१५

जगीसखान १६६

जंजुआा रजपूत १९१

चेदुबाल राजा ११४

जाजमहू ५

जाजलूपूर ४४२

डिजा-४४५,६९३

जातिसंस्था ५२३७,५७५ दढ बंघन काळ ३३२३,चा पारेणाम ५३२ ५२५;चे पोटविभाग’१४७-५०

जिल्हा ६६४, अधिकारी ६६५-६

जैतुगी-जेत्रपाल देब० यादव ४२०

मोह्याल ब्राह्मण ३३, ४० ४२, । जेत्रसिंह-गुहिलोत-२३३,५२७ ४७, ‘ ६, ९२, ९८–वंश । नैनधमे,-प्रसार ४३७,५९९,६०१,

२८; ची सबुक्तगीनाशीं पाहिली लढाई ३४; दुसरी लढाई ३७, ४१;–तह ३१६ ४० केद४ट, दाऊ कत्या ५० जयपूर ( ओरेसा ) देवालय ४०५ जयवम घार २६७, २६९; २७५ जयासेह परमार २४७, २६०, २८२:-२७५

६०४,-व महाराष्ट्रा ५९६ व गुजराथ ६०९१; च्या दोन शाखा ५९२-तील उपवासदिन ६४५; पंडित व संस्कृत भाषा ५९९२- ग्रंथ व ग्रंथकतं ५९४;-लोक व राजदरबार ५९३; व बौद्धघम ५८८–५९२ वब शेव ५९८; -चा ऱ्हास ३९५,५९”५-९६;

८ सचे.

“चे कारण ५९८ जोहारताल ५२५ ज्योतिष २०५-२०६ ज्वालामुखीचे देवालय७६;४७१-२ झ. झाबुलिस्तान १९१ ट्‌. टाहिरटी १०५ टांकराजे ३१ टांकसाळ २१२ ठा्णे-शिला, राजघा.७;किल़ा ३६२; ३७४-मलिकाफर घेतो ३६८ ठाणेश्वरर १००-१०३ ड. डहाल ४४३–चं राज्य ५ डामर लोक-कारमीर ४६० डुबल (चालुक्यवंश ) ३१७ डोर-रजपूत १०९; ४४४

त. तगरपूर ३६९,३७१९ तपस्या ६०४ तबकात-मुसलमानी ग्रंथ-काल ४८४,४८८; बंगाल वृत्तांत ५१८,५१९

तत्र ग्रेय ६३८,६२९

ताज मुसलमानी-ग्रथ ४८४ तामील प्रदेश ४०८; ६०७ तालुका ६६४,-चे अधिकारी ६६५ तिबेट ३४३

तिवारी ब्राह्मण २८८

तुझुष्कदंड व मराठ्यांची चोथाई १५६-१५७; २०२२२२

तुर्की गुलाम १७,१८

तुर्वसुवशा ४०८

तुलसाोदास ६२१

तुवर-पांडषथवशज ४४४

तेलणू बाड्यय ६८८

तेधुरलंग ५७,१४६, १६६

तेलप-उत्तर चालुक्य ३८०-८१

तोगनखान १०४

तोफेचा शोध १६८; उललेख ५२९

होमरदेश ४४२; (नूरपूर) ४५ १–

४६३; वेश ४६४– ६५

तोशी नदी–पंजाब ९३

त्राणकोर ४२५; > वेनांड ४२६

ल्रिंकालेंगाचे प्राच्य गंग २१९६-४० ६

त्रिगत देश ४७१

त्रिपुर-तेउर हैयय राजघानी ५,२८८ २९६, ४७६

क. >

। त्रिलोचनपाल (शाही) ६३, ६४,

९३, ९८ महमुदाचा मांडलिक

होतो ८६, ८७;-स्वातंत्र्याथ

लढाई ९०,९१;१२४;२००-१ त्रवेंद्रम–केरळ राजघानी ४२७

लोक्‍्यबमेन्‌ -२८३–२८४ द्‌

१५/ 77)

द्रद ४५८ दलचंद ५७

(3 स्याचे. भट

दक्षिणापथ १२, १३ २४९-२५ १; दक्षिणेकर्डाल राजवंश ८ हरिवंश ) । घारेबंदी ४११ ४०२; क्षत्रियराणीं ५६३ घारावर्ष–घोरीशी लढाई ४४६ दानसागर ग्रंथ ६४० धूमराजा ( परमार ) ४४६ दिद्दाराणी (काश्‍मीर) १३० न दिल्ली १०, ४०;-चे मूळ शहर नगरकोट > भीमनगर ७६, ७७; ४०0४०००” स्थापना नडिया–( बंगालची राजघानी ) वरं “५ र; नात क्त नर मह- | बख्त्यारची स्वारी ५१ ७; झुदाची स्वारी ४९७ चे तोमर नरपाते ३२४ 9 ४५० ४१: री देवगड किल्ला २७९–२८० ब) (र सात नवे वेष्णवमत-_६०२ नस (दुसरा ) १५

देवगिरी दोलताबाद ४२०८ २ लू जह

क डार नहरवाल–अनहिळवाड ८६ पाटण ष्‌ १ :) -] ऱ्य १ १

देवाळ प्रांत ४८३ र्यी चे देवी, मुख्य देवत ६४२ ; र

  • नदनचा किल्ला ९४, ९५

देश नामें २९६;–वरून जातिनामें

८ए५३–५५५ नागदा–गुहि० राजघानी–५५७ ग र्ड हढप्रहार-यादवकुलसंस्थापक-४१ ९ याक प ११ द्वारसमुद्र–होयसल राजघाना ४२२ नामें ४५५;

द्वैपायनी देवी ४३६ थ्

घनेर ( नुरप्र सं.) ४८६

(तु ह तशी रे ३१४-३१५ घमोत्बाइपारेणाम १७२ नारदिन किल्ला ८५-८६ घर्मोतर ४२, ४८-४९, ५३, ८९; ६. टॅ

९४ -९५;१०७,१०९,१२६ । नासिरुद्दीन, स्वुक्तगीन पहा. घग -चंदेलल २७६–चं राज्य १६५ निआल्तगीन १९ ७;-ची बनारसेवर धार ६,७;-वर स्वारी २४५–४६; | स्वारी २९१

नायक सज्ञा-४२८ नायकी-देवी घार्राचा पराभव करते

१०

निश्ापूर, खुरासानची राजघानी४३, ४५,५१२

निषघ-नलराज-देश ४४८, ४५४

नुरपूर सं ४६३-४६६

नूहू २१७२१८, ४९

नेपाळ राज्य व शक ४६१

नैषधक्राव्य ३३०

न्यायपद्धति ६९७५-६७७

प.

पट्टमाहिषी ६६२३

पट्टवर्धन ५५१, ५५९

पथानकोट ४६३, ४६४

पदव्या १३६२; ३८७; ६८१;

पन्हाळा (प्रगालक) ४३६

परकीय भुवेश ३७३, ३७६

परकीय राजे १९१

_ परकी सैन्य १७

परमतसहिष्णुता ६२४,– ६

परमार्देदेव चंदेल २८१-८३;५१५

परभार’कुल व गाल ६९३; घार- २३१९-२५९ नाम ५६६ भोज इतर २६०-७५ अवू ४४६- वंशावळ २७४

पळासिंग ४२३२, ४३५

पंचमहादब्द ३९८

पंजाब १८५; ५८७; व महमूद ८६, ८७; खालसा–९०–९८ चे शाहीराजे १३१०-१३ १;– वरील सत्ताघारी ५२८;-चे

सूचि.

सेनिक १६७; चे दीर्घ पार- तंत्र्य १८४; च्या उंच्छेदार्ची कारणें १६३-१८५ व महा- भारत १९३-१९४ व हिंदुघमं ५३० व क्षत्रिय जाती १८९- ९९

पंडीर (पांडव वश) ४६४

पाखंडी मुसल. व त्यांचे हाल १०५

पाटण ३६८५१४;

पानबत ६९, ७५

पारशी हिंदु येतात ३७५-३७६

पाल (बंगाल) ३४२–३५१; राज्य ३५५;-उपपद ४७०

पाशुपत ६३८, ६२९

पांचाल (कनोज) ३२१, ३३५

पांडे ब्राह्मण १६२

पांड्य ४२३-४२४

पीथी-पीठापूर ३४६

पुजारी वर्ग ६३६

पुराणग्रंयथ वाढ ६४१-६४२

पुरी-कोंकणराजधानी ३६२,३७४

पू्ण-बुद्धशिष्य ३६१

पूवे चालुक्य ८७

पेशावर ( पुरुषपूर ) २८, ४२ ४७; ४८३

पोट जाती ५७३

पोषाख ५८२ ५८३

पोंडवघन—वरेंद्रराजघानी ३४५

प्रतापरुद्र-आंश्र ४२२

सूचि.

प्रतिहार–सम्राट ४०; २०२; ४१ ६९२३

प्रद्युम्रेश्वर शिववेष्णवेक्य-मंदीर ६१९–६८६२९१

प्रधान संस्था ३७०, ३७१, ६५६, ६५९

प्रबांध चंद्रोदय नाटक २७९

प्रभु उपपद ३७२, ३७३

प्रयाग २००

प्रतिनिधाक व्यवस्था ४२७

प्रोळ आंश्र ४२१

पृथ्वीराज २८१, ४७३, ४७४; राज्यारोहण २२४, – विवाह ४७६, ४७७–पराक्रम ४७८ ४७९—महमद घोरी युद्ध ४८४-४९५; –वयोमान व मित्या ४७५; ४८०—मृत्यु ४८९, ४९०, ४९५

पृथ्वीराजरासाग्रथकाल ६८५

फ़

फिरदोसी कवी १४७, १४८

फिरस्ताकार ११५

फिरोजकोह-राजघानी ४८२,४८२३

फिरोजशहा ८०, ८२

फिरोज तघलघ ४०६

फोजिव्यवस्था ६८०, ६८१

ब बझान गुजरराजघानी ६ बदाउ-राष्ट्रकूट राज्य ४४४, ४४५

श्र

बदामी ३८५

बनवासी जयन्ती ४३१

बनारस १९८, १९९;(राजघानी) ५०८;चा उच्छेद ५०८,५०९

बर्बरक ३०६

बरद्वान-संगारराज्य ४४३

बरण बुलंद शहर १०८

बल्लापुर(वंश वराज्य) ४६९,४७०

बल़ाळसेन ३५५

बसव–ठिंगायतपथ स्थापक ३९४; चीं मत्ते ६९१२-६१४; मृत्यूव ग्रथ ६१६, ६१७

बस्त शहर सबुक्तगीन घेतो ३५

बस्तर संस्थान ४२२

बेंगाळ,-चे दान भाग ३५०,३५१ -वाड्यय ६८८

बंदुकीच्या दारूचा शोध १६८

बाथिंडा २९, ४९

बारी शहर ४, १२५

बियाना ४४४

बिहार ( अंग ) ४४१

बिल्हण कवी २७१

(4

बुंदेलखंड राज्य ५

बेक्‍्टुझून ४५

बेळगांव ( बेणुग्राम ) रट्ट राज- घानी ४२९

बेळुर ( बेलापुर ) यादव ४२२

१९

बोद्धघमप्रसार ३४४

खूचि.

भरेह ४४२, ४४४
ब्रह्मपूर ( ब्रह्मोर ) चंबा राजघानी भागवत पुराणकाल ३७५, ६. ३,

४६२

ब्रह्मक्षत्रीय शब्दाथे ३५८, ३६०

ब्राह्मण-काबूल, सिंध वपंजाब १६ राज्य १६२;कारमीर राज्यई४६०

क्रह्मणणक्षत्रीय ३२, ५५, १६२; -ची मूळ भूमी ५६६-चे निर- निराळे उल्लेख ५५०–५५२चे पोटभेद २८९; ५५०-५६१; -चे तत्वज्ञानभेद ५५ ४;-तील पेच गोड ब द्रावीड ह्या भेदा- चा काळव विशेष५५२-५५३; “घराण्याची वसाहत ४१४; व तिचीं कारणें ५५५-५५६;

-तील गोत्र शाखा १५६; विहार

५२०वघमाचें जन्मस्थान५८७ भे भगवन्त देव ( सेंगर ) ४४४ भगवन्तभास्कर मयूख ग्रंथ ४४ड मट उपपद क्षालियांचे ३७३ भट्ट तुक ८ भट्टी राजे ५४, ५८ भडोच ( लाड राजघानी ७ र्‍णाभ्गगुकच्छ २७१ भातेंडा २६, भद्रबाहू जैन उपपशक पहिडा ५९२ भरतलोक ३३७ भरतपुरी ( बदाऊं ) ६३७

६ड्र

भाटिया शहर ५२, ५५, ५७ -वर

स्वारी ५४.५७,६८३

भाटी राज्य ( झाबूल प्रांत ) १६

भाटी रजपूत १९१

भारप तेल्पांचा सेनापती ३८१

भाषा व वाड्यय ६८२-६८४

मिल़ूम- (यादव ) राजे ४२०

मीम-अनहिलबाड १३१५-१३७; ३०३-३०४; (भोला) ३१५- ३१९ शिहा. स्वारी ४७६

मीम-८२,८४,९८,१२०,१३१

भीमनगर ८४,१३०

मीमदेव-शाही शिलाळेख ३२

भीमाचे बंड ३४९

भुवनेश्वर ४०५

भुबनेकमल (एथ्वीराजप्रधान)४७९

भेरा शहर ( पंजाब ) ९६,९७

भेलसा ६,७,२८४–वर अलतमरा- ची स्वारी ५२५,५२६

भमोज-परमार ४०; २०२,२२९– २५९; ३८२-८४; राज्यारो- हण २४२,२४४,२४६,२४८, २५४-२५६ ग्रंथ कतृत्व २४० -४१ दातृत्व २५६-५८ मंदीर जॉणोद्दार २४३, २५६ स्नान २ १७ मृत्यु २४७

साचे.

भोज २ रा ( शिलाहार ) ४३८ म.

मठ ६३८

मथुरा १०९,४४४-ची लूट ११०- १११, देवालये १२१

मदनपाल (राठोड) १०१ (बदाउं राष्ट्रकूट ) ४४५

मदनवर्मन्‌ (चंदेल) २८०,२८१

मद्रासकडील क्षत्रिजाती ५६७

मदुरा ( पांड्य राजघानी ) ४२४

मनसूर बादशहा १८,१९,४२

–दुसरा ४५

मराठ देश ७

मराठी वाढ्ययय ६८९

मराठे व कानडे ४२७

मर्यादित राज्य(1,61111160 110-

_ पाक्कालाए ) ६४९

मालिक काफूर ४१७,४२३,४२४

मलिकदेव ५२४

मछ्तिकालुंन (शि०) ३६६,३६७

मसऊद- १०५;–ची दुदेंबी कार- कीर्द २०२-२०९२ रा२०९

महंमद ( गझनी )-कारभारपद्धती १९७ खोरासान ४२, ४३. ४५, ४६ गझनी घेतो ४४ च- रित्र लेखक १४३,१४९,१५० जन्म ३८, द्रव्यलोभम १४६ घमेबुद्धि १०५, १४५, ४१७ नाते व न्याय १४३, १४४,

१३

पदवी १४१,१४२फोज १६६ बुद्धिचातुर्ये ३६,२३८ राजनीति १४३, १४९ लढाईत प्रवेशा १८;–तील घोरण व तडफ ११७, ११८ लष्करवयवस्था १५०-१५१ विद्याप्रियता १४५ शिक्का ( फारशी ब संस्कृत १ २१२ वब शिवाजी १५९३-१६१ सेन्य १४२; संपत्ति भांडार ७७-७८, १४२ स्वभाव १४२, १%० स्वाऱ्या—इलेक्वानावर ५ ९;-कनोजवर स्वारी १०६- ११६; कालंजर १२६ कारभीर ४५८; किरात, स्वात वगैरेवर स्वारी १२५; गर्जिस्तान घेतो ९०;–ग्वाठेरर १२९,१२९; जयपालवर४७,४८;ठाणेश्वरावर हृल्का १००-१०३; दबलवार शहरची कचल १३१६; नगर कोटावर स्वारी ७६-८४;भाटि- यावर स्वारी ५५; मुलतानवर स्वारी ५९-.६४; राह्ाब नदी- वर्रालळ लढाई ११९; सोमनाथ- वरील स्वारी १३२-१४९१; स्वाऱ्यांची संख्या ५२ स्वाऱ्यांचा हेतु व परिणाम १५३-१५७, ३४३, ४८७; साम्राज्य ९८, ९९,” ९२९१५, एडढायरढाट; १५४, ५६; साम्नाज्यशेवट

१8

१४५… १४२:/ १७९ १५१४१५२; २०८, २१०; हिंदू १७०, १९९, २०० महमद तघलक ८० महमद बखत्यार ३५०; ५१६, ५१७ *महमद–महमूद गझनीचा मुलगा १९५, १९६-कारकीर्द २०८ महाकाळ मंदिरविध्वंस ५२६ महादेवाची मंदिरे ४२६ महामंडलेश्वर ४३५ महाराष्ट्र–तीन ३८०;-वर चोलांची

  • णणास्वारी ३८३ महालक्ष्मी-कोल्हापूर ४३ ६ महावन (यादव ) ४४४ महावीराचं तत्त्वज्ञान ५९० महीपाल (पाल) ३४२–३४४; -णदुसरा ३४५ महोब्रा ( चंदेल राजघानी ) २७७ २८७, ५१८ मंडावर शहर व स्वारी ५२३-५२४ मंडी ब सुकेत ४६६-४६८ मंदहकूर २७ मदार ४०१ मातुलकन्यापरिणयाची चाल ४१० माध्वमत «६१८ माने ( तवर वंश ) ४५३ माबार-पांड्य देशवणन ५६० मारवाड मंगलाना ५०५

सचि.

मार्कोपोलो ३६७

मालखेड (राष्ट्रकूट-कर्नाटक) ३७२

माळवा प्रांतविस्तार २७४ —तील अराजकता व युद्धे रर रक्सा यर -““्वर अल्तमशची “,२९६ पार -“-चा दोवट २७३

मांझा प्रदेश बव शीख १६७

मांडलिक राजघराणीं-दक्षिण हिंदु- स्थान ४१९-४४० उत्तर हिंदु- स्थान ४४१ ४५५

मांसान ५४६ ६११,६१५,६१८

मिताक्षरी ३८९, ६४०

मिरज ४३६, ४३७

मिरत–(डोर रजपूत) ४४४, ४९८

मिश्रविवाह बांदिकाल ५४९, ५६५

स्वारी

मिसकाल-एक वजन विदोष १११

मुत्फिली (आंश्र) देशवर्णन ५६० मुलतान ९,—(प्रल्हादपूर) १२६ मूलराजा-अनहिल चालुक्य राज्य- संस्थापक २०१, ३०३ ३८१ मुसलमानची-तुर्काशी लढाई १०४, १०५५, ५४१६७६० मुसलमानी धर्म, हिंदुलोक ५८७;- च्या स्वाऱ्या ४२, ५२७,५ ६५ मुंज (परमार) २३९, २४२,२८१ मुंतसीर-सामानी १९ मूर्ति-पूजा ५९४, ६३१, ६३२,

/

सचि.

६३५-तत्त्व्ञान ६३३ -ऱचे परिणाम २१३-२१७ -णविध्वंस ४९६, ४९८, ५०८, ५१६, ५२६

मेकल-झरिसा ३०३

मेद-अस्पृद्य जाती ५७३,५७४

मेर लोक ५१३

मेरूवमन (चंबा) ४६२

मेवाड ( गुहिलोत ) २३१-२३८; वर मुसलमानांची स्वारी ५२७

मोह्याल ब्राह्मण ३३

मोक्ष कल्पना ६२२-६२४

मोंगीर मुद्रगिरी(बंगाल राजघानी)५

मोदूद-२०३,-च्या स्वाऱ्या २०८

य.

यशोवमे परमार २६६,२६९,२७५

यश:कर्ण कलचूरी १९२

यशःपाल (पाल) २०१

यज्ञ ६२९; नैमित्तिक ६३०

याकूब-इ-लेस, कासार हिंदुस्थाना- वर प्रथम येतो १६

यादववंश ३९०; (देवगिरी) राज्य ४१९-४२१, ४२८-४३०-८- मथुरा व महावन येथील घराणे ४४४;– चूडासमा ४४५;– केरोलांचे घराणं ५०९

यायावर्रीळ ( राजशेसवर )

युवराजपद ६६१,६६४

येलबुर्ग शिंदे ४२७,४२८

१५

र,

रजपूत १६,४५४,२३६-७,२३६० कच्छवाह ४४८ कांगडा ४६८ तवर४४८पथानिया४६४बालो- रिया ४७० भट्टी लोहर ४६० गोत्रे ६९१-६९६, ५६९ ५७१–चादर्जा ५६१ ; तील दोष ५३०, ५३१, ५३२८ व मांडारकर ३२५२ राज्यें व उच्छेद ५११-५२१ मुसड्मान ९४, ९५ ]शास्त्रशास्त्रजता ५७६ शहा- बुद्दीन ५२९-५३१ स्वामिभक्ति ६५५४ हिंदुसमाज ५४५

रट्ट-सोंदत्ती ४२९,४२०,४२३२९

रणजितर्सिंग ८०, ४६९

रणथंबोर चव्हाण राजघानी ५०४,

५०७५ वर अल्तमरशाचा स्वारी ५२३

रथयात्रा ६४१

रत्नपूर ४४१

रत्नराज ( कल्चूरी ) ४४१

रभामंजरी नाटिका ३४०

राऊळ (उपपद ) ३७३

राजकीय-एकी ५३८;-भदासीन्य १८७,१८८; सोय ५८६

राजद्रोही ४५८

राजपट्टी ४४३

राजराज (प्राच्य गंग ) ३९९, ४०२,४१२

राजराजेश्वर ( तंजावर ) ४१०

१द

राजरोखर ३, ११, १३,६९६

राजाविराज ( चोळ ) ४१४

राजापूर ( शिलाहार ) ४३६

राजेंद्र (चोल ) ४१२, ४१३; व चीनदेश ४१४; ४१५

राज्य-च्या उच्छेदाच्या पायऱ्या ८७,८८,१०० कारभार ६६२ खचे ६५५ राजाच्या पिढ्यांची सरासरी ३९३ –मयोदेत ३४८

राज्यपाल १०४, ११२, ११६, ११८; १२४, १२५, १९८, १२९, २७७; ३८४

राठी-क्षाविय ४६३; ५६५

राठोंडव राष्ट्रकूट २ २९ शाखा४४५ कुल ब नामाचा काळ ५६६ जोघपुर ३३०, ३३२१, ३३५ ३२३६८, २४३, ३७८

राढ ( बंगाल प्रांत ) ४४३

राणा–चंबा सं> ४६३

राघा ब कृष्ण ६०४, ६०५

रामचंद्रबाबा शेणवी ५२६

राममंदिर ६३५.

रामानुजाचार्य६२३;चारित्र ६०७,८

रायपिठोरा-हेंदुसप्राट ४७३, ४८०

रावळ २३७

रासाग्रथ ३३४, ४८४, ४८९, ४९३७ कई

राटरकूट ३३१, ३३५, ३७९ व

४७३

सूचि.

अरब ३६६ कुल ३४१ पदवी ३८७ बदाऊं ४४५.

राट-२४०, चे उच्छेद १७३शास्त्र- सिद्धांत ब विद्वान्‌ वग ५४३,५४४ सामथ्यं ९८ खडी फोज ५४२-५४३

साष्टी ( कपर्द्रिदोप ) ४३३

राऱरीय-भावना ६५२, चा अभाव, कारण ६५३, ६५६ लरमनी ५२३५, ५३९ परर्काय प्रवेश ५४१ भाषा ५४० राजभक्ती ५४० ६५५लढाई५३५-५३६

राहीब नदी ११९, १९८

रुद्र ( आंग्र ) ४२१९

रुद्रम्मा ( आंश्र ) राज्यकतीं ४२२

रुप्यांचें घर मह० नेलं ७८

रेडीऱ्राषट्रकूट ४२९

रेनसी-वृथ्वीराज पुत्र ४९६, ५०४, ५९०५

रोटी बेटी व्यवहार ५३२, ६४४

रोम, ळूट १११, ऱ्हास कारण १७४, १७५

लकुलीद ( शेवतत्त्वज्ञानी ) काळ व मत ६१०, ६११

लखनोती ३५५

लल्त्रिय ( शाही) २८, ३० ३१, ।

लक्ष्मणदेव (परमार) २६३, २६४ लक्ष्मणसेन (बंगाल) ३५५ वर बख-

__ ह काम आडी चळ

सचि.

त्यार स्वारी ५१७,५२० ५२१ लक्ष्मीघर सेनापाति ग्रंथकर्ता ३२५ लक्ष्मीवर्मा २६८, २६९ लागऱ्न्कर ५०५ लाट ( गुजराथ ) १३००, १३०२ लाड ब्राहमण ( मार्कोषोलोकृूत व- ण॑न ५५७, ५६० , लारंदेश ५५८, ५६० । लालकोट ( दिली ) ४५२, ४५४१,

४९८,४९९ लाहोर २८,३१,४८३१ लिपी ६८२, ६८४ लिंगायतपंथ ३९०, ३९४, ६१३-

६१५; व अस्पृभ्य ६१६ लेवनपद्धति ६७३ लोककाळ ८० लोकसमा ६७७,६७९ लोमशक्कष्याश्रम ४६६ लोइकोट (काश्मीर किल़ला) १२६ लोहरवंद काश्‍मीर ४५७, ४६० लोइस्तंम ४९९;५० ०

च बज्रइस्त ( प्राच्यगंग ) ३९८ वत्सगोन ६२७, ६३८ बल्सराज ( चंदेल ) २७९;

–( धुंगर )) ४४३ वडनगर (नागरांचें मूलस्थान) ३ १३ बरंगळ आंप्रराजघानी–४२ १ बरेंद्र ( उत्तरबंगाल ) ३४५

१७

वर्ण-गुण व क्म ३२-पोट जाती;- भेदनिरास ५७९-विभाग५७९ बाहँंड राजघानी ८,९९,३०,४२-९ वंश-दोन अर्थ (रजपूत) ३३८ वारणावत-बुलंददाहर १०८ बाघेला (व्याप्रपली) ३१६-१७ विक्रमपूर ३८९ विक्रमशील येथील कत्तळ ५१७ विक्रमादित्य (उत्तर चालुक्य) सोमे- शर २ चा पुत्र ३८५ ३८६, ३८७, चा लग्नं ३८८-३८९, विक्रमादित्यउज्जेनमूरतिविध्वंस ५२६ विग्रहराज (चाइ०) २२४ २२५ पाल वीसल विग्रहपाल ४था २२६ विज्जबल (कलचूरी) ३९०, ३९४. 7 खरिंदे ४२८ बिजयचंद्र ( गाइड ) ३२८,१२९ विजयराज (भाटी) ५३, ५५,५७ विजयसेन-सेन ३५२, २५३-शिव- वेष्णवैक्यप्रयत्न ६१८, ६१९-२१ विजयांदित्य (कऱ्हाड) ४३४,-७-८ विठोबा (पंढरपूर) ६१९-६२१ विद्याधर १२४, चंदेल २७७–८ वंदा ३६८, ३६९ विद्यापीठे ६८५-चा नाश २२९, २४०, ४९६ विधवाविवाह ५७९, ५८० विनयादित्य होयसल ४२२-४२२३ विराटनगर (इनगल) ४३१

शट

विवाहसंबंध ४६०, ६२४, ६४४

अनुलो ३२३ क्रांति५७७ विज्ञानेश्वर मिताक्षरा टीकाकार ८९ विष्णुभाक्ते ४० १,-माहात्म्य ६४२

मंदिर ४२३, ५२५, ६३६ विष्णुवधेन (होयसल यादव) ४२२ विंघ्यवर्मा ( परमार ) २७०-२७१ बीर केरलवमंन्‌ (लावणकोर) ४२६ बीरबल्लााळ (होयसल ) ४२३ वीरराजेंद्र ४१५

वीसलदवेव विग्रहराज पहा

वेद ६२७, व क्षत्रिय वेश्‍्य ६२८ लेखन ६२९

वेश्‍्यांचा वर्ग ५८१ ढ

बेंगी देश ३९७

वौदिक काळ १८७, संस्कृति व. भाषा ८

वेद्यदेव (बंगाल) ४४१

वेद्यनाथ–अलंकारशासत्रकार ४२२

वेयाक्तक महत्तु १७७, ५१२, -ण्तबकातचे मत ५१३

वेशयजाते ५७२-५७३ लिंगायत पंथी ३९५ बौद्ध कालीन ५७५

वेष्णवमत-नवें ६० १-६ ०८ -णप्रसार ४२३, ६०४

ब्यापारी बंदरे ३७४

ब्याख्यान ग्रह ६३८

वीरशैव मत ६०८,६१३-६१६

दा शक करत्यांचं एक लक्षण ३०७ “कलियुग ४६२-कोलम ४२६ -नेपाळ ४६१लोककाल (शास्त्र ८०, ४६८ सेन ३५३ शनिवारसिद्धि ४३७ शहाजी व सवुक्तगीन २३,४३ शिहाबुद्दीन घोरी ४४४,-चा यु व हेतु ५३०,-चां नाणी ५०८

  • हिंदूशी लढाई ४८१-४८३ श्री शंकराचार्य-आद्य ४२५ शारदालिपी ४६२ शाही-राजे काबूल पंजाबचे १३० १३१-ब्राह्षण ३९, ४०-ची नाणीं २१२-राज्य१५७, १६५ शियालकोट ४८३ शिलाहार ३६१—च्या तीन शाखा ४३५ कऱ्हाड, कोल्हापूर४२५- ४३९ ठाणें ४३६ -मराठे रजपूत ३७०, ३७ १-बंश ४३६ वंशावळ ३७८ चा शेवट ३६८ चे क्षत्रियत्व ३६९ शिवलिंगपूजा ६०९,६१० शिवाजीचे अष्टप्रचान ६५९-६६१

-ची घर्मभावना १४५-व महमूद

२१-२४, ४४, ४६८६, ४७२७२, ७८,८९, १७८ शिवमाहात्म्य ६४२

शिवाल्ये ४४१,५२५,६३७

। शिवालिक-डांगर ४९७

प्रांतावर अल्तमशची स्वारी५२३ शिसोदे ३४३ गुहिलोत पहा. । शिक्षणारभाचें वाक्‍्यप्रकार ५९३ । शिंदे घराणें, ४२७-चा प्रांत ४२८ । शिंदेनाड ४३७

शेतकी व ब्राह्मण ५७५,५७६ डोलार-शिलाहार ३७०,४३८

।शेव घमांचा इतिहास ६०९ व

वेष्णवतटा ४१ संत ४११

स.

सचाऊ-अल्बे०चाभाषांतरकार १३० सणफुल़ ( शिलाहार ) ४३५ सतीची चाल २८९,५८२ सप्त कोंकण ३८३-३८४ सबुक्तगीन १८,२१-चा न्याय२२, २३-चे राज्य २४,२९,२३०, ३८ व जयपाळ २३५ मूर्तिविध्वंस । २६च्या लढाया ३७ मृत्यु ३ ॥पमरसिंह (गुहिलोत) २३२

जान नगर ३७३,३७५, ३७५७,

सचि.

—>—२–»-२»:»»»»>२> २२२२२२०२२२ -»——३३कब्नूूं गना कनन–.—२>—३>—:३4३::८८८३»»>

१९

संभाजी व मसाऊद१९६,२०५-७ संयोगिता पृथ्वीरार्जाविवाह ४७७. संसारचद ८२ संस्कार,-व कर्म-वाढ ६३९ ६४१ सादी व सोमनाथ १४०- १४१, सामंत फोजा ६५१ सामंतसेन ( बंगाल ) ३५२ सामानी साम्राज्य संस्कृति १९-२०; -म्विंश व नाश १९ सामान्यपारोस्थाते ५४७–६९६ साम्राज्य कल्पना ६४९ —चा परिणाम ६५०-६५१; १५५ -प्सिस्थापक २३१,२४६-७ २’५२ सावराष्ट्रीय विरोध व त्याचें महत्त्व ५३६,५३७; व शिवाजी५३६ सासबहु मंदीर ४४८, ४४९ साहिलवर्मत््‌ (चंबाराजा) ४० सांबरचं चाह० ६,२२१-२३० -ण्’ची शाखा ४४७ ख्रिंधण (यादव) ४२१ सिंधप्रांत व त्यांतील शहरें ७, ८;- –चा उच्छेंद १६२,१७३ सिधूनदी (ऱसिहून) ५२,७४ यिंह-नृ्सिह उपासना १२५,१२६ सिंहलद्वीप (संगारराज्य)४४ ३ -पतिसरा ३८९,३९० सिद्धराज-जयसिंह चालुक्य पहा. सिरांज ( संगार ) ४४३ सिलोन (सेरंदिब) ६१

२१०

सुकेतराल्य व वंद इ. ४६८

सुरुंगी दारूचा शोध २०४

सुलतान पदवी ४६, २१२

सुलेमान (प्रवासी) ६५१

सुव्णघेनु दान ४१२

सूर्यपूजञा दिन(३)६४६-७,-भाक्ति

६४२मेदिरव मुसलमान ६३३-४

सेन ( बंगाल ) ३३९,–उपपद ४६९७, ४६८, ४२९ नांवा- वरूनच अनुमान ४६६, ४६७ -ऱराज़े (पूर्ववंगाल) १५० ची जात ३५७, ३६० लखनोती व रजपुतकुल यादी ५६३, वंश ब शक १५३, ३५६, ३५७

सेबकपाल जयपाल नातू १३१

संगर ( रजपूत ) घराणें ४४२ -ण्वेश व राज्यविस्तार ४४३

सेल्जुकी तुकांचे बंड २०३,२०५

सेनिकांची भावना ( हिंदु व मुस- लमान ) ४८५,४९०८

सोपारे (शिलाहार राजघानी) ३६१

सोमनाथ ७, पट्टण १३८, –‘्दैवालय १३९, ३११ उप- बासदिन ६४६; वरील स्वारी १३२-१४१ ची संपत्ति १३७ —ही मूर्त नव्हे १३४

सोमेश्वर उत्तर चालुक्य ३८४, ३८५ णादुसरा ३८६;२८७

सोलंखपाल ४५०, ५१०,४५२

.-२२»»>«»><»><»»»»»»»<»«««>६-३२««<»»—_६::»»-<»»><»»»> बन न्य

सचि.

। सोळखी (चालुक्य) २९८

सोंदत्ती-रट्टराजघानी २. ली ४२९ स्कदपुराणाचा काळ ५५२ स्यमंतभद्र-नैनउपदेशक ५९३-४

स्वमेश्वर (ओरिसा) ४०२

ह्‌

हत्तांचें सेन्य ४९२, ४९३

हनगळ ४३१

हम्मीर १५; २२९

हयपति ३२४

हृरिभक्ति ( बंगाल ) ३५६

हरिराज एथ्वी > भाऊ ५०४,५० ५

हृरियान मुठव ४५३, ६३७

हेलबीड ४२२

हर्ष १८१, ४५९, ४६० र्‍्हास- ‘कारणें ५४४, ५४५

हवान्सी किल़्लास्वारी२०३,२०४प्रांत ४९७, ४९८;कुतु”स्वारी५२३

हिमाल्यांतील राज्यें ४५७, ४७२

हिरात १६

हिंदी प्राच्य व पाश्चम वाढ्य़ाय६८९

हिंदु जाति अल्बेरूनी ५४७, ५४९ घर्म १२५ पराभव कारणें ७१–७३ धर्मभावना नरम असल्याचा पारणाम १८२ १८३, १९२-विवाहपद्धतीतील विदेोष ५८०;-माहेने ब त्रहतु ९; मुसलमान १६३– १७०, १७६; राजे ६६, ६७;–चा

साचि.

दोष १८९१;–राज्ये १६५ राज्यनाशाचीं मुख्य कारणे १८२ -१८५ राष्ट्रीय विरोध ५३७ लोकांतील वैगुण्य १३७ शिपाई ४२५०४८१५६१ ८९ १९.९, २००, ५३३ ची शेवटची लढाई ६५-७५ व सबुक्तगिन शेली लढाई २७,४९१ संयुक्ताची ३ री लढाई ९१ सैन्य १७० हिंदुस्थान (स. ९१२ तील ) १६ -लव जमेनी ५३१-५३२-चा जुना रस्ता ९९ तील तलवारी १६९ चे दोन भाग ३—तील १२ व्या हश. तील धार्मिक स्थिति ५८४-५८५ पांढरे ३५ -“चा भूगोल ३ १४ चीराज- कीय स्थिति अल्बेरुनी १०

हिंसाबंदी–कुमारपाल, अकबर ३१९३२ २१४ हूण २४२

२१

-ाचें चरित्र ५९९,६०१ हैहय–चेदी-२४४, २४५ -णरजपूत २९ ३्मुद्रा २९५–वशा

वळ २०६ ण्शाखा कलचूरी ४४१ हायसल ३८०, र्‍”ची विक्रमावर स्वारी ३८८,

४२२-४२२३ ह्यूरनसंग १, २, १८६

क्षत

क्षात्र) ३१५९-चे अस्तित्व ३३८, ६२८ जाति (मद्रास) ५६७, ५६८ दर्ज ( हिमालय प्रांत ) ५६४-वंश ३३८,-ची उत्पात्त, गोत्रे व शाखा आणि त्यांचा काळ ५७९ भेद ५४८,

५६१, ५६६ विवाहसंबंध ५६२, ५६२ ५६४ न्न

हेमचंद्र जैनपंडित-व्य़ाकरणकार ३०६ । ज्ञानेश्वरी ६८४

शुद्धिपत्र-

( प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे शुद्धिपत्न देण्याचा विचार नव्हता. तरी कित्येक बरुरीच्या विशेषतः सनाच्या दुरुस्त्या पुढें दिल्या आहेत. )

घन ओळ अश्रुद्ध॒ झ्द्ध

१२९ २७ १९२३ १०२

१५९ २५ लिहिलें नाहीं. ठेविलं पाहिजे.

१७३ ९४ २2 रर १०८०९

२३८ . २९९७९ ११७३

२६३ रड १०५६ते१९८१ १०५९–१०८० २८९ १७ १०६७ १०३७

२९५ ५,१० ११६९व११७० ११५९व११६० २९६ ९ ११७०(दोन ठिकाणी) ११६०(दोन ठिकाणा) ३श्ड ६,१० ११७७,११७९ ११७३,११७६ र्र्ड श्र ११५३ ११७३

३५१ १३,१४,२० १०३२,१०३६,११६४१०३८,१०५९,११६१ ३७० द ११५४ ११४८

३८५ द्‌ १०२१७ ११४८

२३९९ ऱ्र २१८१ १०६८

४०६ २९,२०० .१५,११८२,२१५२ २५११९२ टाय “£ २१ ११९२-१२०९ १२०२-१२१९

(त)

अशुद्ध शुद्ध ९७४ ९७७ ९६१—९७३ १०१२-१०१८ १०१४-१०४ई४ १००१ १००८ £ ११७९ सामंतर्सिंह़ गुहिलोत ! हं सर्व काढून टाकलें आहे.

्ी ११७९

शश्ट्ट २२९

न्य डे

डे

€7* षः

  • £«. २

    2 र ्ध व

सक ऱ्ट टीक ह कट अकर र

५4:४2. गा ” “वला के जडे र. न्य क ऱ्ट ला. ली.” ध> -> 25-23 ह — क क 1 नल

  1. २५ 1) द 3 क ति का क

५०. १ ०… ००-०५

789 9४-८४ ०५८०7 ४९८००२

»्त्ञाटाळल्य :-

1२७ ००३१ -0.)

७ टटी

1] ४ १ | 11 ऱ् हे. अ: क्क द्व कं जी दर ) ई ४ ऱ् चि न 2८20 !|

मा एव १५७, 0११२03 11800 457 ४8१17६५९18 03187”38

?[.₹5६ 20 ॥३१० २६/५०४६ ९८५२0७ (0२ 51.॥?5 ॥२0०/ 1-5 ?0९0९८

(॥५॥४६२5॥४ 0 10२0०५९०0० [रर

ली 6 1||0. १0 90 0. £. 66

  1. 3) (31) 505 515 ४४ उण0४ 0

॥१41/॥591४/१00

See More Hide

PDF डाऊनलोड करा

 

 

comments powered by Disqus